Skip to main content

ही बातमी समजली का? - ३२

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी या धाग्याचा वापर करावा

=========

आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सध्या ब्राझिलला आहेत. चीनच्या अध्यक्षांची व त्यांची भेटही झाली. त्याचे कव्हरेज चीनच्या मुख्य पॉपल्स डेलीत आले आहे काय या उत्सुकतेने तिथे गेलो,. त्या वृत्तपत्राने या भेटीची अजून तरी दखल घेतलेली नाही (बीबीसी ने ९ करार केल्याचे म्हटले आहे, पैकी एक संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहे)

मात्र त्यावेळी पोपल्स डेलीवर लिशुई नावाच्या शहराबद्दल कळले. हे तेथील अमर्त्यांचे शहर आहे :)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 16/07/2014 - 07:47

याआधी मी काय मुक्ताफळं उधळलेली आहेत ती बदलता येणार नाहीत. निदान यापुढे तरी काळजी घेतलेली बरी. हे असं काही उघडकीस येणं अगदीच लज्जास्पद आहे, संपूर्ण देशासाठीच -
Ancient caste system worked well, ICHR head says

(या माणसाच्या मागे माध्यमं हात धुवून लागली आहेत हे निश्चितच. पण डोंगर पोखरल्यावर माध्यमांच्या हातात उंदरापेक्षा बरंच जास्त काही मिळतंय.)

बॅटमॅन Wed, 16/07/2014 - 11:53

तमिळनाडूत एका समारंभात धोतीवाल्यांना प्रवेश ब्यान! साल्यांना ठोकून काढले पाहिजे.

(जालीय राडाप्रेमी) बट्टमण्णन.

http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4810272338143827791&S…

बॅटमॅन Wed, 16/07/2014 - 12:12

In reply to by ऋषिकेश

अहो पण लुंगीच्या आत काहीतरी असते ना- कपडे आय मीन ;) त्यामुळे मालफंक्षणही तितके तीव्र राहणार नाही. शिवाय बायका लुंगी नेसत नाहीत, सबब लुंगीवाल्यांच्या मालफंक्षणात कुणाला जास्ती इंट्रेस असेलसे वाटत नाही, उदा. पार्टीतल्या मालफंक्षणाचा लीक्ड व्हिडो इ.इ. या केसमध्ये पापिलवार आपलं व्हायरल होणारच नाही =))

अनुप ढेरे Wed, 16/07/2014 - 13:29

http://timesofindia.indiatimes.com/india/SC-wants-countrywide-debate-on…

सर्वोच्च न्यायालयाला इच्छामरणाबद्दल चर्चा हवी आहे. पॅसीव युथनेशिआबद्दल टू बी प्रिसाइज. तुम्हाला काय वाटतं? हा अधिकार असावा की नसावा?
मला वाटतं की हा अधिकार असावा आणि अ‍ॅक्टीव युथनेशिआचाही* अधिकार असावा.

===
* पॅसीव म्हणजे औषधं न घेणं. अ‍ॅक्टीव युथनेशिआ म्हणजे मुद्दाम लिथल औषधं घेणं.

बॅटमॅन Wed, 16/07/2014 - 14:31

In reply to by ऋषिकेश

गर्भहरणास (फॉर व्हाटेव्हर रीझन) मान्यता मिळाली रे मिळाली की सेक्स सिलेक्टिव्ह अ‍ॅबॉर्षण्स वाढणार नैत याची ग्यारंटी, झालंच तर युथनॅशियाच्या योग्य वापराबद्दलची ग्यारंटी देववत असेल तर मला काहीही अडचण नाही, नपेक्षा हे कायदे अंमळ वांझोटे आहेत.

बाकी, प्राणच त्यागायचे असतील तर जैनांच्यातलं यमसल्लेखना व्रत दुसरं काय आहे? किंवा आपल्यातलंही प्रायोपवेशन? वेगळा कायदा करण्यातले औचित्य समजत नाही.

प्रचंड निसरड्या आणि उतरत्या वाटेवर तेल लावलेल्या पायांनी भरधाव जाऊनही संतुलन राखण्याचा प्रकार वाटतो हा.

सविता हलपन्नावरसारख्या केसेस डोळ्यांसमोर ठेवून असे कायदे बनवण्यातलं औचित्य समजू शकतो, पण ते रेअरेस्ट ऑफ द रेअर साठी ठेवावे असं वाटतं- विशेषतः गर्भ विशिष्ट नं. ऑफ आठवड्यांपेक्षा जास्ती वयाचा असेल तर.

ऋषिकेश Wed, 16/07/2014 - 14:38

In reply to by बॅटमॅन

विशेषतः गर्भ विशिष्ट नं. ऑफ आठवड्यांपेक्षा जास्ती वयाचा असेल तर.

कमी वयाचा असे म्हणायचे आहे का? तसे असल्यास वाचण्यात चुक झाली होती आता समजले. सहमती आहे.
गर्भ पाच-सहा आठवड्यांहून कमी वयाचे असताना गर्भपात करण्यास अनुमती द्यावी असे माझे मत आहे. (बहुदा त्याआधी लिंगही समजत नाही आणि होऊ घातलेल्या आईच्या जीवाला धोका नसतो). जास्तीत जास्त ४ का ५ महिन्यांपर्यंत गर्भपात करता येतो बहुदा, नंतर मिसकॅरेज घडवावे लागते.

बाकी या टेक्निकॅलिटीज डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवता येतील मात्र गर्भपात म्हणजे कैतरी भयंकर हे मला मान्य नै.

बाकी इतर बाबतीत दोन्ही बाजुंकडे अतिशय स्ट्राँग मुद्दे आहेत. मला दुसर्‍या बाजुचे मुद्देही मान्य आहेत. फक्त तरीही माझा कल याला मंजूरीच्या बाजुने आहे कारण प्रत्येकाच्या जीवावर ती व्यक्ती सोडल्यास कोणाचाही अधिकार असता कामा नये असे माझे मत आहे. (आणि गर्भपातात हेच लॉजिक बरोब्बर उलट आहे हे आगाऊ मान्य. मात्र तिथे व्यक्तीचा मेंदू बर्‍यापैकी तयार व्हायच्या आत (बहुदा ५ महिने) त्याकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघणे मला अयोग्य वाटते).

मन Wed, 16/07/2014 - 14:40

In reply to by ऋषिकेश

व्यक्तीचा मेंदू बर्‍यापैकी तयार व्हायच्या आत (बहुदा ५ महिने) त्याकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघणे मला अयोग्य वाटते).

बरोब्बर. म्हणजे जे जे स्वतंत्र व्यक्ती म्हणून नाहित; त्यांच्या सोबत तुम्ही काहीही करु शकता!!!
असच म्हणायचय ना?

घनु Wed, 16/07/2014 - 15:14

In reply to by ऋषिकेश

बाकी या टेक्निकॅलिटीज डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवता येतील मात्र गर्भपात म्हणजे कैतरी भयंकर हे मला मान्य नै.

सहमत.

सविता Wed, 16/07/2014 - 15:39

In reply to by ऋषिकेश

गर्भ पाच-सहा आठवड्यांहून कमी वयाचे असताना गर्भपात करण्यास अनुमती द्यावी असे माझे मत आहे.

हे आत्ताही आलौड आहे. जर गर्भ ६ आठवड्यापेक्षा कमी वयाचा असेल तर विशेष कोणतेही कारण न देता गर्भपात करता येतो (मला आत्ता मूल नकोय... अ‍ॅज सिंपल अ‍ॅज दॅट). एम. टी. पी. ( मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगनन्सी) असे त्या प्रोसेसचे नाव आहे ज्यात फक्त औषध देतात. ६ आठवड्या पेक्षा गर्भाचे वय जास्त असेल तर मग प्रोसेस जास्त अवघड होत जाते. गर्भपात करून देणा-या सेंटरला जास्त कागदोपत्री माहिती, अमु़क टमुक पोलिस फॉर्म भरा वगैरे प्रोसेस वाढत जाते.

५-५.५ महिन्याचा गर्भ असे पर्यंत सुद्धा व्हॅलिड कारणासाठी गर्भपात (वरील प्रमाणे प्रोसेस मधून जाऊन) करता येतो उदा. होणा-या बाळात काही क्युअर होऊ न शकणारे व्यंग सापडले इत्यादी.

लिंगनिदान साधारण ६ महिन्या नंतर करता येते असे वाचल्याचे स्मरते. आणि त्यानंतर गर्भपात अलौडपण नाहीये, लिंगनिदानाची शक्यता हे एक भारतीय कंटेक्स्टमधले कारण झालेच पण शिवाय त्यात गरोदर बाईच्या जिवाला धोका होण्याचे चान्स पण जास्त असतात वगैरे ऐकलेय (कारण गर्भ बराच मोठा झालेला असतो, फक्त औषधाने तो पाडला जाऊ शकत नाही, शस्त्रक्रिया करावी लागते विच इज अ‍ॅज गुड अ‍ॅज डिलिव्हरींग अ प्रिमॅच्युअर बेबी!)

मन Wed, 16/07/2014 - 15:48

In reply to by सविता

मला आत्ता मूल नकोय हे वाक्य स्त्रीनं म्हणणं अलौड आहे कायद्यानुसार.
स्त्रीला जर मूल नको असेल तर ती गर्भपात करवून घेउ शकते.
पुरुषाच्या मतास कायदा प्राधान्य देत नाही असे समजते.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 16/07/2014 - 18:14

In reply to by मन

भारतात गर्भपातासंबंधी कायदा, गर्भाच्या वडलांच्या मताबद्दल काय म्हणतो हे मला माहित नाही.

पण बहुजनांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता किती प्रमाणात स्त्रिया, गर्भाच्या वडलांविरोधात जाऊन गर्भपात करवून घेऊ शकतात आणि किती वेळा आईच्या मनाविरोधात गर्भपात करवून घेतला जातो याचाही विचार व्हावा असं वाटतं. 'सत्यमेव जयते'च्या एका भागात आईच्या मनाविरोधात नवरा, सासरच्या लोकांनी गर्भपाताची सक्ती करणं, याबद्दल थोडी उदाहरणं, चर्चा होती.

ऋषिकेश Wed, 16/07/2014 - 15:48

हल्ली आआपच्या बातम्या का दिसत नैत असा प्रश्न पडला असेल ना?
बाकी च्यानेलांचे, वृत्तपत्रांचे नाहित नाही.

राजदिप सरदेसाईंनी राजीनामा दिल्यावर (का द्यायला लावल्यावर) आता ही बातमी यावर अधिक प्रकार टाकते आहे.
दुर्दैवाने आता इथे काहींनी हिणवलेल्या माझ्या काही शंका या तितक्याशा "शंका" राहिलेल्या नाहित. :(

मेघना भुस्कुटे Wed, 16/07/2014 - 15:56

In reply to by ऋषिकेश

अवघड आहे.

या पार्श्वभूमीवर इथे (तरी) शंका आणि बातम्या नोंदवण्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मग त्याबद्दल पुढे काही कृती होवो किंवा न होवो.

चिंतातुर जंतू Wed, 16/07/2014 - 16:28

In reply to by ऋषिकेश

बातमी शेअर केल्याबद्दल आभार. त्यातच हेदेखील दिसलं :

According to two newsroom staffers with knowledge of developments, CNN IBN’s bulletin at night as well as the graphics on air, were edited to remove references to the criminal charges faced by Shah. One journalist said this was done on instructions of managing editor Vinay Tewari, who said that is how Upadhyay wanted it. Tewari declined to comment.

बॅटमॅन Wed, 16/07/2014 - 16:45

In reply to by अनुप ढेरे

साहजिकच आहे. बीजेपीची मारायचा मौका दिसतोसे वाटले की वाहत्या गंगेत घ्या हात धुवून-शुद्धीकरणास मोदी समर्थ आहेच ;)
हर हर ती काँग्रेस गेली आणि सेकुलारिझम खलास झाला!!!

ऋषिकेश Wed, 16/07/2014 - 16:36

अर्रर्र! काय हे!
भाजपा दिल्ली विधानसभा निवडणुकांना घाबरतेय की काय अशी शंका येऊ लागली आहे.

केजरीवालांचे ट्वीट बघा:
After failing to buy any AAP MLA, BJP now trying to buy 6 cong MLAs. Price - Rs 20 crores each, 2 ministers and 4 chairmen.

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) July 16, 2014

सव्यसाची Wed, 16/07/2014 - 17:00

In reply to by ऋषिकेश

या पूर्ण बातमी मध्ये जे काही आहे ते sources. ते जर तुम्ही खरे समजत असाल तर हरकत नाही.
पण जोपर्यंत सरकार बनत नाही तोपर्यंत माझा तरी विश्वास बसणार नाही. तरीही आपण समजून चालू कि sources खरे आहेत तर काय दिसते?

मला वाटते आपण हे वाक्य घाईत वाचले.

Prospects of government formation in Delhi could hinge on a group of Congress MLAs breaking away to support a BJP government to avoid fresh assembly polls.

Party sources said six Congress MLAs might consider supporting a BJP government in Delhi as BJP's prospects seem most attractive in the assembly polls following its massive victory in the Lok Sabha elections.

या बातमी मध्ये कुठे असे लिहिले आहे कि भाजप घाबरली आहे? म्हणजे मला असे काही दिसले नाही. तुम्हाला दिसले असेल तर सांगा.

ऋषिकेश Wed, 16/07/2014 - 17:04

In reply to by सव्यसाची

बरोबर आहे.
बातमीत तसे थेट म्हटलेले नाही. मात्र लेखनात बिट्वीन द लाईन प्रकार असतो हे मान्य व्हावे.
आणि भाजपा घाबरतेय ही शंका माझी स्वतःची आहे.

सव्यसाची Wed, 16/07/2014 - 17:08

In reply to by ऋषिकेश

मान्य. बीटविन द लाईन हा प्रकार असतोच. पण मग मी वर दिलेल्या दोन ओळी मधून भाजप घाबरल्याचे दिसत नाही.
बाकी विनंती एवढीच की तुम्ही त्या ओळी सांगा ज्यातून तुम्हाला अशी शंका आली.

ऋषिकेश Wed, 16/07/2014 - 17:12

In reply to by सव्यसाची

मला बातमीमुळे नाही तर भाजपाच्या संभाव्य कृतीमुळे शंका आली
भाजपा (किंवा कोणताही राजकीय पक्ष) निव्वळ लोकांचा निवडणूकीवर खर्च होईल म्हणून पुन्हा निवडणूका होऊ देणार नाही यावर माझा विश्वास नाही!

सव्यसाची Wed, 16/07/2014 - 17:28

In reply to by ऋषिकेश

समजा भाजपने असा काही प्रयत्न केला.
पण मग त्यांना सरकार स्थापन करण्याचा संवैधानिक अधिकार आहे कि नाही? कि फक्त घाबरूनच अश्या वेळी सत्तास्थापनेचे निर्णय घेतले जातात?

ऋषिकेश Wed, 16/07/2014 - 17:35

In reply to by सव्यसाची

सवैंधानिक अधिकार आहे.
तो अधिकार किती नैतिकतेने मिळवला जातोय हे पहायचे तेवढे आपल्या हाती आहे.

अनुप ढेरे Wed, 16/07/2014 - 17:19

In reply to by सव्यसाची

आता त्याच बातमीत ही पण ओळ आहे.

Aam Aadmi Party could also get another chance if a Congress breakaway group decides to back Arvind Kejriwal's party. AAP has already accused BJP of horse trading.

पण... काय आता

ऋषिकेश Wed, 16/07/2014 - 17:34

In reply to by अनुप ढेरे

तसे झाल्यास आआप घाबरली असे म्हणेन.
आआपने एकदा सत्ता सोडल्यावर फुटिरांच्या आधारे पुन्हा मिळवायचा प्रयत्न ही घोडचुक असेल

(जर अख्खी काँग्रेस पुन्हा आआपला पाठिंबा द्यायला तयार झाली तर दोघेही - आआप व काँग्रेस - घाबरली असे म्हणावे लागेल हे ही स्पष्ट करतो. उगाच ट्रुथ टेबल मधील दर शक्यतेसाठी एक उपपप्रतिसादाची मालिका नको नै का?)

ऋषिकेश Tue, 22/07/2014 - 11:35

In reply to by सव्यसाची

केजरीवाल यांनी खरे सांगितले की खोटे हे सध्याचा दडपलेल्या मिडीयाकडून कळणे कठीण आहे.

आजची ही बातमी जरा अधिक स्पष्ट आहे व वेगळा मुद्दा मांडते.

The BJP thinks that if an election is held again the Aam Aadmi Party will get " unnecessary" revival in public space even if it won't win seats to form the government.

थोडक्यात त्यांनी आआपचा धसका घेतलाय की काय शंका येऊ लागते! :P ;)

मन Sun, 10/08/2014 - 17:13

In reply to by गब्बर सिंग

विचारशक्तीच्या मर्यादा समजून घ्यायच्या असतील तर शेतकरी कामगार पक्षानं समाजवाद, साम्य्वाद, भारतीय परिस्थितीचे अवलोकन ह्यातून निर्मिलेला अनमोल दाभाडी प्रबंध आधी वाचून या.
काय ?
तुम्ही तो वाचला नाहित?
हुडुत.
तुमची इथं यायची लायकीच नाही.
आधी वाचून या.
मगच लिंका देत प्रदर्शन करा.

'न'वी बाजू Sun, 10/08/2014 - 18:36

In reply to by मन

या प्रतिसा(/वा)दात कोठेही 'फडतूस' हा शब्द वापरण्यात आलेला नाही.

सबब, हा प्रतिसा(/वा)द फाऊल का धरण्यात येऊ नये, याची कृपया कारणे दाखवावीत.

('हुडुत' सिंप्ली डझ नॉट कौण्ट.)

अजो१२३ Thu, 17/07/2014 - 19:20

In reply to by ऋषिकेश

ते "मानवी हक्कांचे संरक्षण" म्हणाले, "गे राईटसचे नव्हे." या बीजेपीवाल्यांसाठी गे (असण्याचे इ )राईट्स मानवी राईट्स नसावेत.

बॅटमॅन Thu, 17/07/2014 - 19:56

In reply to by अजो१२३

ह्यूमन राईट्स ऑफ गे'ज़ असे म्हणाले ते. ह्यूमन राईटमध्ये सेक्शुअल राईट्स येत नसतील तर ठीक, नपेक्षा चूक.

माहितगार Thu, 17/07/2014 - 17:22


भारतातील अनेक आदिवासी जमातींचे संगीत आणि त्या संगीताशी असणारा सांस्कृतिक संबंध हा विषय फारसा हाताळला जात नाही. या विषयाच्या अभ्यासक प्राची दुबळे यांनी गेली काही वर्षे प्रत्यक्ष आदिवासींमध्ये राहून या संगीताचा अभ्यास केला आहे. त्यांच्याकडून आदिवासी संगीताबद्दल जाणून घेण्याची संधी रसिक आणि अभ्यासकांना "आदिवासी संगीत : एक ओळख" या सप्रयोग व्याख्यानात मिळणार आहे. सुदर्शन संगीत सभा या उपक्रमाच्या अंतर्गत ३१व्या भागात आदिवासी गीतांच्या गायनासह ही विशेष प्रस्तुती गायिका-संशोधिका प्राची दुबळे करणार असून त्या प्रत्यक्ष आदिवासींच्या ध्वनि-चित्रफितीही दाखवतील. अभ्यासक संगीतकार चैतन्य कुंटे त्यांच्याशी संवाद साधतील. रविवार, दि. २० जुलै रोजी सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच येथे हा कार्यक्रम होणार असून देणगी प्रवेशिका अर्धा तास आधी उपलब्ध होतील.

घनु Fri, 18/07/2014 - 12:26

In reply to by गवि

:(

गवि, तुमच्या कडून ह्या अपघाताचा/दुर्घटनेचा सविस्तर आणि नेहमीप्रमाणे असलेला अभ्यासपूर्ण वृत्तांत ऐकायला आवडेल. अर्थात अजून बर्‍याच गोष्टी बाहेर यायच्या आहेत अपघाता संदर्भात.

मयुरा Fri, 18/07/2014 - 02:41

काही वृत्तपत्रांच्या बातम्यांनुसार असं म्हणणं आहे की जर जमिनीवरुन क्षेपणास्रांचा वापर करुन विमानावर हल्ला केला गेला असेल तर पायलट ला जराही कल्पना आलि नसावी.
कसं बरं हे शक्य आहे? त्यांच म्ह्णणं असं आहे कि अश्या प्रकारचे मिसाईल्स लक्ष्याला पाठीमागुन भेदतात,
माझी शंका अशी आहे कि कुठ्ल्याच विमानामध्ये अजुनपर्यंत अशी यंत्रणा अस्तित्वात नाहीये का?
म्हणजे आता पर्यंत विमानाचा असाही अपघात होऊन जिवीतहानी होऊ शकते...अशी शक्यताच कधी कोणी विचारात घेतली नव्हती का?

एक ना दोन.. असे हजारो प्रश्ण उभे राहतीलच.. त्यावर खचुन उलट सुलट बातम्या छापुन येतीलच..सोशल मेडीया मध्ये ऊत येइल..असो.

२९५ प्रवाशांना आदरांजली.

-मयुरा.

अपरिमेय Fri, 18/07/2014 - 03:38

In reply to by मयुरा

जी विमाने प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जातात त्यांत येणार्‍या क्षेपणास्त्रांपासून वाचवणारी कोणत्याही प्रकारची यंत्रणा बसवणे शक्य नाही. जर ती विमाने या धोक्यापासून वाचवण्याच्या दृष्टीकोनातून डिझाइन केली तर विमानप्रवासाची किंमत १०० पट वाढेल. ही क्षेपणास्त्रे ध्वनीच्या वेगाच्या ३ ते ४ पट वेगाने जातात. या कमर्शियल विमानांचे पायलट त्यापुढे काहीच करू शकत नाहीत.

मराठे Fri, 18/07/2014 - 06:25

In reply to by मयुरा

प्रवासी विमान 'चुकून' टार्गेट होण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. याआधी बरेचदा असे प्रकार झाले आहेत. आणि प्रत्येक वेळी त्या त्या देशाने आपली जबाबदारी स्विकारलेली आहे. अगदी आता आत्ता २००१ मधे सुधा सायबेरियन एअरचे विमान उक्रेनच्याच मिलिटरीने चुकून उडवले होते. त्याआगोदर अमेरिकेन एअरफोर्सने इराणचे मक्केची यात्रा करणार्‍या यात्रेकरूंना घेऊन जाणारे एक विमान मिसाईल वापरून पाडले होते.
http://www.theguardian.com/world/2014/jul/17/history-of-airlines-shot-down-malaysia-airlines-mh17

गब्बर सिंग Fri, 18/07/2014 - 07:15

http://timesofindia.indiatimes.com/videos/news/Row-over-VHP-leaders-ant…

अशोक सिंघल यांनी जे काही बोलले आहे त्यानंतर मनिष तिवारींचा डायलॉग - The true colors of BJP and Parivar...

आपल्या देशात हे तीन डायलॉग खूप वापरले जातात -

१) अमक्या अमक्याचाअ "खरा चेहरा उघड" झालेला आहे.
२) अमुक अमुक ची "वेळ आलेली" आहे.
३) तमुक चा "प्रश्नच उद्भवत नाही".

मन Fri, 18/07/2014 - 10:00

In reply to by गब्बर सिंग

अशोक सिंघल खरोखरच असे म्हणाले असतील तर ते इतके मवाळ कसे झाले ह्याचे आश्चर्य वाटते.
त्यांचाही एक दिवस वैचारिक विकास होइल अशी आशा आता वाटते आहे.

गब्बर सिंग Fri, 18/07/2014 - 14:08

ही बातमी कमी व लेख जास्त आहे -

भारत, चीन, ब्राझिल, रशिया व दक्षिण आफ्रिका (BRICS) यांनी मिळून जी ब्यांक स्थापन केल्ये तिचे स्वरूप व त्यामागील हेतू -

http://www.washingtonpost.com/blogs/monkey-cage/wp/2014/07/17/what-the-…

मन Sun, 10/08/2014 - 17:15

In reply to by गब्बर सिंग

अशा घटनेच्या विश्लेषणाबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते एसेम जोशी, राममनोहर लोहिया वगैरेंचा अभ्यास कामास येइल.
आधी समग्र लोहिया, एसेम (एस एम) वाचून या. मग बोलू.
अनभ्यस्त असताना इथे येण्यास लाज नाही वाटत?

'न'वी बाजू Sun, 10/08/2014 - 18:22

In reply to by मन

लिंका कोण तुमचा काका टाकणार???

कसा कोणी करावा अभ्यास??????

(एवढी अ‍ॅम्बीशियसली एक्सेसिवली बेसिक गोष्ट कळत नाही?????????)

(साक्षरांवर) अन्याय!!!!!!!!!!!!

............सा… Sun, 10/08/2014 - 19:03

In reply to by 'न'वी बाजू

खवचट शिरोमणी नबा यांस मज पामराकडून साष्टांग दंडवत!!!
गब्बरला काही बोलायचं काम नाय हां!!! एकदम रॅडिकल अन युनिक विचार मांडतो तो, भले लिंकांमधून का होईना. आता आळशी लोक लिंका न वाचता तूच समजाव तूच समजाव टाहो फोडतात त्याला कोण काय करु शकतं :(

मन Sun, 10/08/2014 - 20:31

In reply to by 'न'वी बाजू

आदरणीय नबा, लिंका न देण्याच्या कारणाकडे सारीकाने निर्देश केलाच आहे.

@सारीका :-
"तूच समजाव " हेच्च म्हणण्म योग्य आहे. तुला विषय समजला असेल तर काही साधारण गोष्टी तुला सांगता यायला हव्यात.
उदा :- भूमितीचा पहिला धडा काय असतो ? बिंदू, रेषा, वगैरे प्राथमिक axioms,assumptions,गृहितके त्यात असतात.
तितकी माहित असतील, तर पुढे जाता येते तर्क लावत किम्वा चर्चा करत.
भूमितीविषयी चर्चा सुरु असेल "काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीची वर्ग उरलेल्या प्रत्येक बाजूच्या लांबीच्या वर्गाची बेरिज असतो " असा काहीतरी पायथागोरस थेरम आहे ना ; तो तुम्हाला सरळ सिद्ध करता यायला हवा. दरवेळी युक्लिडच्या किंवा पायथागोरसच्या लेखाच्या, पुस्तकांच्या लिंकांचा वर्षाव करणे शहाणपणाचे नव्हे.
अर्थव्यवस्थेतही नियंत्रण असावं का, किती असावं ; स्वात्म्त्र्याच्म काय करायचं ; स्वात्न्म्त्र्याचा झेंडा घेउन गैरप्रकार केल्यानं इतरांच्या जीवावर बेतू शकतं म्हणून रेग्युलेटरही निर्माण झाले; पण आता ते हवेतच कशाला, रेग्युलेटारच काढूनच टाका, नकोतच; अशा लायनीवरच्या भूमिका ह्याच मुळात अ‍ॅम्बिशिअसली बेशिक आहेत.
त्यापेक्षा महत्वाचे असे की हे रेग्युलेशन असावे का, किती असावे हा चिरंतन वाद अनादि काळापासून सुरु आहे. (प्लीझ, नाणी आणि अर्थव्यवस्था आताच अस्तित्वात आली आहे; असे म्हणू नका. नाणी नव्हती तेव्हाही अर्थव्यवस्था होती. देवाण घेवाण होती, बार्टर शिश्टीम होती तेव्हाही अर्थव्यवस्था होती. )
अक्षरश: शेकडो - हजारो नव्हे तर लाखो पाने त्यावर खर्ची पडलीत.
नुसत्या लिंका फेकत सुटणे व्यर्थ आहे. कारण --
तुम्ही एक लिंक द्याल, मी चार देइन; तुम्ही चाळीस द्याल. ह्यास अंत नाही.
तुम्ही अ‍ॅदम स्मिथनं अमुक अमुक म्हटलेलं उद्धृत कराल, मग मी मार्क्स किंवा अजून एखाद्या विरोधी पक्षातल्या डॉन माणसाचे दाखले देइन.
थोडक्यात काय, ती चर्चा अ‍ॅडम स्मिथ व मार्क्स ह्या दोघात होइल.
मला अ‍ॅडम स्मिथशी चर्चा करायची नाहिये.
ऐसीकरांशी करायची आहे.

त्यांना जर काही समजलं असेलच, तर इथे मांडावं.

पायथागोरसच्या आणि युक्लिड लिंका फेकता आल्या म्हणजे तुम्हाला भूमिती लै लै येते असे काही नाही.
ह्याचा अर्थ इतकाच की तुम्हाला त्या लिंका जमा करायला पुरेसा वेळ आहे.
असा वेळ काढू शकल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन अवश्य करेन.
पण त्याने तुमचा मुद्दा अज्याबात शिद्द होत नाय.

तुम्हाला जे समजलय ते इथे मांडा ना.

अजून एक गोष्ट म्हणजे हातात हातोडा लागलाय म्हणून प्रत्येकच गोष्टीला खिळा समजायचं का /
धार्मिक - भाविक -गोग्गोड लोकांची पब्लिक लै खिल्ली उडवतात.
का उडवतात ? त्यांना काही काम करायचं असलं की ही सात्विक भाविक मंडळी "तमक्या ग्रंथात दिलय ना ? हां मग करुया" असं म्हणत सुरु करतात.
अरे ?? काय हे ?
ह्या गोग्गोड भाविकांत आणि तुमच्यासारख्या अर्थशात्र्यांत फरक काय ?
निव्वळ वेगळी पुस्तकं एवढाच?
आपलं वैचित्र्य आपल्याला नेहमीच जाणवतं असं नाही.
त्रयस्थ म्हणून दरवेळी स्वतःचं परीक्षण करता येतच असं नाही.
पण इतरांच्या नजरेतून तुमचं वागणं कसं दिसतय ते साम्गितलं तर कदाचित तुम्हाला फीडबॅक म्हणून त्याचा उपयोग होउ शकतो.
अर्थात कुणाच्या फीडबॅकला किती महत्व द्यायचं हे ठरवणं पण गुंतागुम्तीचं आहे; हे मान्य.
माझा फीडबॅक :-
हाती हातोडा आहे; म्हणून प्रत्येक दिसेल त्या गोष्टीला खिळा समजणे थांबवा.

............सा… Sun, 10/08/2014 - 20:42

In reply to by मन

मला अ‍ॅडम स्मिथशी चर्चा करायची नाहिये.
ऐसीकरांशी करायची आहे.

क्या बात!!! क्या बात!!! __/\__
____________
पण काही रॅडीकल संकल्पना इन्फ्युज करुन तो पुरेसा ऑक्सिजन टँकमध्ये टाकत असतो ते कौतुकास्पद आहे एवढेच म्हणायचे आहे. यात व्यक्तीपूजा अजिबात नाही ती करायला (खव अन व्यनि आहेत ;)).

मन Sun, 10/08/2014 - 20:42

In reply to by ............सा…

अजून लिहीत होतो तोवर प्रतिसादावर बूच बसले.

आळसाबद्द्दल :-
आम्हाला लिंका उघडण्याचा आळस असेलही(कह्रं तर तोही नाहिये, पण थोड्यावेळासाठी मानूया की आम्ही आळशी आहोत.). पण सारीका व गब्बर ह्यांचा आळसही कमी नाही.
तुम्ही मार्केटात जाउन तुम्ही पुस्तकं खरेदी करा ना.
आम्ही तर आळशीच आहोत. तुम्ही नाहित ना ?
मग प्रो- मार्क्स, प्रो-सोशालिस्ट, प्रो- न्याशनालिस्ट लिंकाही तुम्हीच शोधा. तुम्हीच वाचा.
आम्हाला तुम्ही दिलेल्या लिंका वाचायचा कंटाळा आहेच. आणि म्हणूनच शोधून शोधून तुम्हाला लिंका आणून द्यायचाही कंटाळा आहे.
आमचं वागणं अत्यंत सुसंगत आहे. त्यात कन्सिस्टन्सी आहे.
तुमच्यात कंटाळा नाही ना, जाउन मार्केट मध्ये दास क्यापिटल खरेदी करुन वाचत बसा. कम्युनिष्ट म्यानिफेस्टो ऑन लाइन उपलब्ध आहे. तो वाचा. दाभाडी प्रबंध वाचा. आणि मग बोला.
तुम्ही आधुनिक अर्थशास्त्र्यांची पुस्तकं वाचूनच मार्क्सला हाड थू म्हणताय.
हे म्हणजे आयुष्यभर फक्त आणि फक्त सावरकर, आरेसेस ह्यांचीच पुस्तकं, प्रपोगेंडा वाचत रहायचा आणि सर्वच कॉंग्रेसी कार्याला हाड थू म्हणायचं असं झालं.
अरे?
काय हे ?

............सा… Sun, 10/08/2014 - 20:59

In reply to by मन

मनोबा तू असं म्हणतोस का की गब्बर फक्त लिंका भिरकावतो , तो प्रतिवाद करत नाही? करतो सगळे पहातात तो प्रतिवादही करतो. अगदी "डुक्कराशी घाणीत खेळू नये" असं लोक म्हणतात तरी शांत डोक्याने प्रतिवाद करत असतो.
वेल बी इट!!! आता व्यक्तीपूजेकडे अर्गुमेन्ट झुकायच्या आत एवढच बोलून खाली बसते की - बी फेअर!!!

अजो१२३ Sun, 10/08/2014 - 21:24

In reply to by मन

हे म्हणजे आयुष्यभर फक्त आणि फक्त सावरकर, आरेसेस ह्यांचीच पुस्तकं, प्रपोगेंडा वाचत रहायचा आणि सर्वच कॉंग्रेसी कार्याला हाड थू म्हणायचं असं झालं.

अगदी खरं. असं बरेच लोक करतात. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्यकालीन, नि स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस मंजे फक्त पाप्यांचा महाकुंभ होती असे मानणारे चिकार असावेत. वर जे 'अपवाद' ते कधी खर्‍या अर्थाने कधी काँग्रेसचे नव्हतेच (जसे सरदार पटेल) असा दावा!!!

............सा… Sun, 10/08/2014 - 21:30

In reply to by अजो१२३

प्रत्येकाला आपले "कन्व्हिक्शन्स" निवडायचा अन त्याचे समर्थन करण्याचा अधिकार्/स्वातंत्र्य आहे. मग पुढे???

मन Sun, 10/08/2014 - 21:37

In reply to by ............सा…

माझे मुद्दे मांडून झालेत.
तुमचेही मुद्दे इथे आलेत.
राहूदेत दोन्ही इथेच.
अधिक नव्यानं मांडण्यासारखं मजकडे काहीही नाही.

अजो१२३ Sun, 10/08/2014 - 20:43

In reply to by मन

आपलं वैचित्र्य आपल्याला नेहमीच जाणवतं असं नाही.
त्रयस्थ म्हणून दरवेळी स्वतःचं परीक्षण करता येतच असं नाही.
पण इतरांच्या नजरेतून तुमचं वागणं कसं दिसतय ते साम्गितलं तर कदाचित तुम्हाला फीडबॅक म्हणून त्याचा उपयोग होउ शकतो.

लाखमोलाचं वचन आहे.
--------------------------

नितिन थत्ते Sat, 19/07/2014 - 10:46

In reply to by गब्बर सिंग

On tax reform, suddenly, unlike with the Sonia Gandhi government, the previously not possible is now feasible and likely. The much needed and overdue national Goods and Services Tax is likely to be in place by February 2015

हे अगदी पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. जुन्या काळात जीएसटी शक्य नव्हता आणि आता तो शक्य झाला आहे याचे कारण 'जुन्या सरकारची कमतरता' नसून खरे तर विरोध करणारी राज्ये आणि केंद्रसरकार त्यावेळी वेगवेगळ्या पक्षांची होती. आता दोन्ही सरकारे एकाच पक्षाची आहेत हे आहे.

यापूर्वी जेव्हा सेल्स टॅक्स ऐवजी व्हॅट लागू झाला तेव्हाही भाजप सरकारांनीच विरोध करून त्याची देशव्यापी अंमलबजावणी रोखून धरली होती.

सुरजित भल्ला यांनीच बजेटविषयी इतरत्र वेगळेच लिहिले असल्याचे वाचलेले आहे.

गब्बर सिंग Sat, 19/07/2014 - 13:42

In reply to by नितिन थत्ते

यापूर्वी जेव्हा सेल्स टॅक्स ऐवजी व्हॅट लागू झाला तेव्हाही भाजप सरकारांनीच विरोध करून त्याची देशव्यापी अंमलबजावणी रोखून धरली होती.

अगदी अगदी.

नितिन थत्ते Sat, 19/07/2014 - 18:51

In reply to by गब्बर सिंग

The value added tax was introduced as an indirect tax into the Indian taxation system from 1 April 2005. The existing General Sales Tax Laws were replaced with new Value Added Tax Acts and the VAT Rules for proper administration. Haryana became the first State in the country that had adopted the taxation on 1 April 2003. Few states Gujarat, Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, Jharkhand, Uttarakhand and Uttar Pradesh have opted to stay out of VAT taxation system

नंतर फटकून राहण्याचा त्या राज्यांना तोटा होऊ लागला तेव्हा त्यांनी व्हॅट स्वीकारला.

मन Sun, 10/08/2014 - 17:18

In reply to by गब्बर सिंग

दत्तोपंत ठेंगडी ह्यांनी भल्ला ज्या सुरात बोलताहेत त्या सुरात बोलणार्‍यांचा प्रतिवाद पाच सात दशकांपूर्वीच करुन ठेवलाय.
जगातील सर्व समस्यांवर उपाय देशीवाद हाच होय.
तुम्ही वाचलत तर तुम्हालाही पटेल.
आधी समग्र दत्तोपंत ठेंगडी वाचून या. मग बोलू अनभ्यस्त माणसा.

गब्बर सिंग Sun, 20/07/2014 - 02:22

http://marginalrevolution.com/marginalrevolution/2014/07/moral-effects-…

डॅन एरिली हा बेस्ट सेलर लेखक आहे असे ऐकून आहे.

समाजवादाचे नैतिकतेवरील परिणाम - From 1961 to 1989, the Berlin Wall divided one nation into two distinct political regimes. We exploited this natural experiment to investigate whether the socio-political context impacts individual honesty. Using an abstract die-rolling task, we found evidence that East Germans who were exposed to socialism cheat more than West Germans who were exposed to capitalism. We also found that cheating was more likely to occur under circumstances of plausible deniability.

पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी हे चांगल्यापैकी अ‍ॅपल्स टू अ‍ॅपल्स कंपॅरिझन होते का हे पहावे लागेल.

-

अवांतर - शोधपत्राच्या लेखकांपैकी एकाचे आडनाव "राडा" असे आहे.

---

(वरील डॅन एरिलीच्या शोधपत्राचा गोषवारा वाचताना हा सापडला.)

http://www.ssireview.org/pdf/Science-2013-Falk-707-11.pdf (Morals and Markets, Falk and Szech, 2013)

बाजारपेठीय व्यवस्थेमुळे नैतिक मूल्यांचा र्‍हास होतो. - The possibility that market interaction may erode moral values is a long-standing, but controversial, hypothesis in the social sciences, ethics, and philosophy. To date, empirical evidence on decay of moral values through market interaction has been scarce. We present controlled experimental evidence on how market interaction changes how human subjects value harm and damage done to third parties. In the experiment, subjects decide between either saving the life of a mouse or receiving money. We compare individual decisions to those made in a bilateral and a multilateral market. In both markets, the willingness to kill the mouse is substantially higher than in individual decisions. Furthermore, in the multilateral market, prices for life deteriorate tremendously. In contrast, for morally neutral consumption choices, differences between institutions are small.

(डॅन एरिली च्या गोषवार्‍यात असे म्हंटलेले आहे - While it was recently argued that markets decay morals (Falk and Szech, 2013), we provide evidence that other political and economic regimes such as socialism might have an even more detrimental effect on individuals’ behavior. )

मन Sun, 10/08/2014 - 17:20

In reply to by गब्बर सिंग

अअ आणि प्रशासन ही वेगवेगळी असूच शकत नाही हे व्हॉल्टेअर, रुसो, टॉल्स्टॉय वाचल्यास समजून येइल.
आधी मुळातून ह्या सर्वांचे समग्र साहित्या त्यांच्या मूळ भाषातून वाचून ये अनभ्यस्त माणसा.
मग बोलू.
त्यांनी ह्या विचारांचा प्रतिवाद आधीच केलाय.

गब्बर सिंग Sun, 20/07/2014 - 05:42

http://timesofindia.indiatimes.com/india/Healthcare-pie-Rs-5000-for-a-b…

When it comes to healthcare, some are more equal than others for the government. Under the Central Government Health Scheme (CGHS) which covers central government employees, including serving and retired babus, current and ex-members of Parliament and the judiciary, the annual per capita expenditure is more than Rs 5,000. In contrast, the National Rural Health Mission (NRHM), which caters to the rural masses, spends just Rs 180 per head.

हे अयोग्य का आहे ?

मन Sun, 10/08/2014 - 17:21

In reply to by गब्बर सिंग

हे अयोग्य का आहे ? ह्याचा उलगडा अमर्त्य सेन ह्यांनी साधार केला आहे.
आधी समग्र अमर्त्य सेन वाच. त्यांची प्रत्येक ओळ वाचून ये.
मग बोलू.

मी Mon, 21/07/2014 - 12:59

धरणातल्या पाणीसाठ्याबद्दल अद्ययावत माहिती इथे मिळू शकेल, दुर्दैवाने हि माहिती पुण्याआसपासच्या धरणांचीच आहे, त्यामुळे इतर भौगोलिक जिवांना 'सॉरी' म्हणतो.

संपादक पुणेकर असल्यास हि माहिती वर 'सध्या काय वाचतायच्या' अँकरप्रमाणे डकवून ठेवता येईल.

सुनील Tue, 22/07/2014 - 09:25

In reply to by मी

त्यामुळे इतर भौगोलिक जिवांना 'सॉरी' म्हणतो.

हरकत नै. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांच्या पातळीची माहिती मुंबईच्या वृत्तपत्रांतून रोजच्या रोज येत असते! ;)

गब्बर सिंग Tue, 22/07/2014 - 04:22

In reply to by ऋषिकेश

In democracy, it is wrong to ask the purpose behind creating a state.

The purpose is clear. A state is created to provide a space for a group, large or small, to live within particular geographical boundaries. Once this target is achieved, the state then goes about providing stability, security and economic opportunities for this population to live peacefully and prosper.

The people of this state have the right to vote for, and bring into power, whoever they think can best serve their interests. If they fail to satisfy them, they can, and should be, shown the door in the next elections, not before as it is often done in Pakistan.

लेख दोनदा वाचला. कारण कन्फ्युजन लेखकाचे झालेय की माझे याचा निर्णय होउ शकला नाही. लेखकाने जो "प्रश्न विचारणे चूक आहे" असे म्हंटले आहे त्या प्रश्नाचे उत्तर लगेचच पुढे दिलेले आहे. ही बाब मजेशीर वाटली. लोकशाही आधी आली की स्टेट आधी आले ?? आरंभबिंदु कोणता ? आरंभबिंदु आहे का ? असावा का ? असणे/नसणे irrelevant आहे का ?

----

अवांतर : - companies are not built for wall street, companies are built for customers - असा एक (बकवास) डायलॉग सिलिकॉन व्हॅली मधे मारला जातो त्याची आठवण झाली.

मन Sun, 10/08/2014 - 17:23

In reply to by गब्बर सिंग

companies are not built for wall street, companies are built for customers
हेच्च खरे आहे. ह्याबद्दल साधार लेखन - भाषणे मार्क्सची उपलब्ध आहेत.
जाउन आधी ती पहा.
समग्र मार्क्स वाचून झाल्याशिवाय इथे प्रतिसाद देण्यायोग्य स्वतःला समजू नकोस.

गब्बर सिंग Tue, 22/07/2014 - 03:11

लेटेष्ट पेपर - गोवंशहत्याबंदी वाल्यांना दिला पायजेल -

http://www.nber.org/papers/w20304#fromrss

पेपर ची किंमत $५ फक्त.

Holy Cows or Cash Cows?

Orazio Attanasio, Britta Augsburg

गोषवारा -

In a recent paper, Anagol, Etang and Karlan (2013) consider the income generated by these owning a cow or a buffalo in two districts of Uttar Pradesh, India. The net profit generated ignoring labour costs, gives rise to a small positive rate of return. Once any reasonable estimate of labour costs is added to costs, the rate of return is a large negative number. The authors conclude that households holding this type of assets do not behave according to the tenets of capitalism. A variety of explanations, typically appealing to religious or cultural factors have been invoked for such a puzzling fact.

In this note, we point to a simple explanation that is fully consistent with rational behaviour on the part of Indian farmers. In computing the return on cows and buffaloes, the authors used data from a single year. Cows are assets whose return varies through time. In drought years, when fodder is scarce and expensive, milk production is lower and profits are low. In non-drought years, when fodder is abundant and cheaper, milk production is higher and profits can be considerably higher. The return on cows and buffaloes, like that of many stocks traded on Wall Street, is positive in some years and negative in others. We report evidence from three years of data on the return on cows and buffaloes in the district of Anantapur and show that in one of the three years returns are very high, while in drought years they are similar to the figures obtained by Anagol, Etang and Karlan (2013).

बॅटमॅन Tue, 22/07/2014 - 15:52

ब्रिक्स गट का गंडलेला आहे इ.इ.इ.

http://www.livemint.com/Opinion/B5Rwub04mIqQQ4rO93vekJ/Brics-The-acrony…

बाकी लेखातली एकूण परिभाषा प्रचंड विनोदी आहे. जळजळ इतक्या स्पष्टपणे मांडलेली पाहून नुस्तं रोचकच नै, तर प्रचंड विनोदपोषकही वाटलं.

ऋषिकेश Wed, 23/07/2014 - 13:20

In reply to by बॅटमॅन

मावळात्या ज्योतीची फडफड आहे.
तसेही युपीत आमचे (आमच्या मतदारसंघातील) राम नाईक जाणारेत राज्यपाल म्हणून अशी उडती-बातमी ऐकली. बरं वाटलं :)

बॅटमॅन Wed, 23/07/2014 - 23:19

तिथी भट्टाचार्य यांचा भारताने इस्राएलला सपोर्ट करणे कसे दूऊऊऊष्ष्ट वैट्ट वैट्ट आहे ते सांगणारा लेख.

http://mondoweiss.net/2014/07/court-apartheid-israel.html

नै म्हणजे कन्क्लूजन असेल नोबल वगैरे, पण आमच्यासारखे भुक्कड लोकही गुगळून गुगळून असले लेख पाडू शकतात असे वाटल्याशिवाय राहिले नाही. एक तरी अन्यत्र न वाचलेली गोष्ट सांगा, नवीन कायच नाही.

त्यांची प्रोफाईल पाहता अजून जरा तरी बरा लेख अपेक्षित होता असे वाटल्याशिवाय राहिले नाही.

http://www.cla.purdue.edu/history/directory/?p=Tithi_Bhattacharya

नंदन Thu, 24/07/2014 - 07:42

या वर्षीच्या मॅन बुकर पारितोषिकांसाठीची लाँग लिस्ट जाहीर झाली आहे. आतापर्यंत केवळ ब्रिटिश कॉमनवेल्थमधल्या राष्ट्रांतल्या लेखकांपुरते मर्यादित असणारे हे पारितोषिक आता अमेरिकेसह इतर इंग्रजी भाषक देशांतील लेखकांसाठीही खुले झाले आहे. (गेल्या वर्षी हा निर्णय जाहीर झाल्यावर इंग्लंडमध्ये उमटलेली संमिश्र प्रतिक्रिया ही एका अर्थी अमेरिकेन बाजारपेठेच्या वर्चस्वाची कबुली देणारी होती.)

परिणामी या वर्षी प्रथमच पाच अमेरिकन लेखकांचा या संभाव्य यादीत समावेश आहे. (या पाचांतले 'The Wake' हे पुस्तक विशेष उल्लेखनीय वाटते. इसवी सन १०६६ मधल्या 'नॉर्मन इन्वेजन'वर तत्कालीन अँग्लो-सॅक्सन भाषेत लिहिलेले हे पुस्तक क्राऊडफन्डिंगद्वारे प्रसिद्ध झाले - Unbound या संकेतस्थळावर चारशे वाचकांनी आर्थिक पाठिंबा दिल्यावर). या वर्षीचे पुलित्झरविजेते The Goldfinch मात्र या यादीत नाही.

राजेश घासकडवी Fri, 25/07/2014 - 01:02

२०१२ आणि २०१३ सालांत मिळून जगभर साडेतीन बिलियनहून अधिक सेलफोन विकले गेले! त्यातले दीड बिलियन स्मार्टफोन. हे आकडे थक्क करणारे आहेत.

'न'वी बाजू Fri, 25/07/2014 - 04:01

In reply to by अतिशहाणा

२०१२अखेरीस २ स्मार्टफोन स्वतःसाठी नि बायकोसाठी म्हणून घेतलेले, नि १ बिगरस्मार्टफोन पोरासाठी. पैकी २ महिन्यांच्या आतच चिरंजीवांनी आपला फोन प्याण्टीसह जाकिटासह (दुरुस्ती केली आहे.) वॉशरमध्ये धुतला, त्या भानगडीत पुढे आणखी एक बिगरस्मार्टफोन (२०१३मध्ये) घेणे आले.

याला जीवन ऐसे नाव!

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वॉशरमधले पाणी नव्हे. पाण्याला 'जीवन' म्हणतात, हे माहीत आहे. हे जीवन बोले तो, हा सगळा एपिसोड. त्याचे 'जीवन' असे बारसे करावे, असा इरादा आहे.

'त्याचे' बोले तो, या सार्‍या एपिसोडचे. आमच्या चिरंजीवांचे नव्हे. तसेही त्यांना कोणी नावे ठेवलेली आवडत नाहीत.

तुम्हाला आवडली असती काय कोठल्याही वाट्टेल त्या अहिर्‍यागहिर्‍याने नावे ठेवलेली?

सुनील Fri, 25/07/2014 - 08:33

In reply to by 'न'वी बाजू

खिसे नीट न तपासता कपडे धुवायला टाकल्यामुळे होणार्‍या "मनी लाँड्रींगची" कल्पना (क्वचित सवय) आहे. पण अख्खाच्या अख्खा फोन?

ॲमी Fri, 25/07/2014 - 09:42

In reply to by सुनील

हेदेखील फार रेअर नसावे. मी ३ केस ऐकल्या आहेत. त्यातल्या २ केसमधे मोबाइल पूर्णपणे वाळवून मगच चार्ज केल्याने परत वापरात आलेला. पण हो तिन्ही केसांत वॉम नव्हतं. बादलीत भिजू घातलेला.

'न'वी बाजू Fri, 25/07/2014 - 15:54

In reply to by सुनील

मनी लॉण्डरिंग मी स्वतः कैकदा केले आहे. डॉलरच्या नोटा चांगल्या टिकाऊ असतात. वॉशर-ड्रायर दोहोंमधून काढल्या, तरी तुकारामाच्या वह्यांप्रमाणे जशाच्या तशा इण्ट्याक्ट बाहेर येतात.

'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः'वरून डॉलरच्या नोटा पुरातनकाळापासून अस्तित्वात असाव्यात, अशी शंका येते.

बॅटमॅन Fri, 25/07/2014 - 18:16

In reply to by 'न'वी बाजू

टॉयलेटात पडल्यामुळे फोन काम करेनात, त्यासाठी मग कुकरमध्ये ठेवून एखादी शिट्टी दिल्यावर काम करू लागले अशी सुरस आणि चमत्कारिक जपानी न्यूज़ वाचल्याचे स्मरते. दुर्दैवाने लिंक सापडेना. कुणाला सापडल्यास अवश्य लिंक द्यावी.

राजेश घासकडवी Fri, 25/07/2014 - 03:32

In reply to by राजेश घासकडवी

यात विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की सर्वसाधारण फोनच्या किमतीत सुमारे १०० वॉटचं सोलार पॅनेल सहज तयार होतं. म्हणजे जेव्हा प्रचंड मागणी होईल तेव्हा दोन वर्षात ३५० गिगावॉटची सोलार पॅनेल्स बनू शकतील. (प्रॉडक्शन स्केलच्या एफिशियन्सीज आल्या तर कदाचित याहूनही अधिक.) संदर्भ म्हणून - भारताची सध्याची कपॅसिटी २५० गिगावॉटची आहे...

नगरीनिरंजन Fri, 25/07/2014 - 11:09

In reply to by राजेश घासकडवी

कपॅसिटी आणि सप्लाय यात फरक असावा असे वाटते.
३५० गिगावॉट कपॅसिटीचा सर्वसाधारण सोलर प्लॅन्ट दिवसाला किती GWh देतो? आणि थर्मल प्लॅन्ट किती देतो?

अजो१२३ Sun, 27/07/2014 - 00:02

In reply to by राजेश घासकडवी

१. ३५० गिगावॅट,म्हणजे ३,५०,००० मेगावॅट. भारताची आजची क्षमता २,५०,००० आहे. म्हणजे त्यापेक्षा जास्त!! चंगळ आहे.
२. आता जगाची जनरेशन कॅपॅसिटी १,००,००,००० मेवॅ आहे. आता हे सेलचे आकडे जगाचे आहेत तेव्हा जगाच्या आजच्या कॅपॅसिटीच्या ३.५%.
३. जगाची पावर डिमांड चक्क चक्क ४०% वैगेरे वाढते दरवर्षी. असो.
---------------------------------------------------
१. "सोलर पॅनेल" ची किंमत ही सोलर पावर रिटेल किमतीच्या भागाचा खूपच नगण्या हिस्सा आहे.

मन Fri, 25/07/2014 - 16:15

http://vskbharat.com/justice-kt-thomas-demands-implementing-uniform-civ…
.
.
Justice KT Thomas demands implementing Uniform Civil Code, SanghShikshaVarg concludes in Kerala

Kottayam. Justice KT Thomas, retired Judge of the supreme court of India, suggested that uniform civil code should be implemented in the country as early as possible while he was addressing the concluding ceremony of RSS annual cadre training camp (Pratham Sangha ShikshaVarg) held at Kurichy, Kottayam.

Though the ceremony was partly interrupted with rain, the events proceeded amidst heavy rain. There was a spectacular Patha Sanchalan (Route-March) by RSS Swayamsevaks who were trained in this 21-day summer camp.

Justice Thomas further said that the makers of the constitution had intended to implement uniform civil code as early as possible. However, it has not been implemented till now. He further said RSS has the same view point in the issue.

Justice said, “ he is a Christian who attends church every week but is an Indian and Nationalist at first. He wanted to be known by his identity as an Bharatiya.

He said that during his younger days he had a different viewpoint on RSS and was of the opinion that it was a dangerous organisation,now he knows that it is a nationalist organisation working for the Motherland. He said that while seeing the discipline shown by the RSS swayamsevaks, the country is safe in its hands.

'न'वी बाजू Fri, 25/07/2014 - 16:32

In reply to by मन

Justice said, “ he is a Christian who attends church every week but is an Indian and Nationalist at first. He wanted to be known by his identity as an Bharatiya.

'ख्रिश्चन' (स्पेसिफिकली, 'ख्रिश्चन अ‍ॅटेण्डिंग चर्च रेग्युलरली') आणि 'इण्डियन' या म्युच्युअली एक्स्क्लूज़िव क्याटेगरीज़/आयडेण्टिटीज़ आहेत, याची कल्पना नव्हती.

सर्वप्रथम, असली 'स्पष्टीकरणे' द्यावी लागतात, ही शरमेची बाब आहे. तदुपरि, देणारे ती देतात, ही डब्बल शरमेची.

मन Fri, 25/07/2014 - 16:18

http://timesofindia.indiatimes.com/india/India-is-already-a-Hindu-natio…

.
.
India is already a Hindu nation, Goa’s deputy chief minister says

PANAJI: India is already a Hindu nation and "all Indians in Hindustan are Hindus", deputy chief minister Francis D'Souza said on Friday.

Defending the comments of his cabinet colleague Deepak Dhavalikar who said that Modi could make the country a 'Hindu nation', Francis D'Souza told reporters: "It was always a Hindu nation and will always be a Hindu nation. You don't have to create a Hindu nation."

D'Souza, one of the most senior minority members of the Bharatiya Janata Party (BJP) in Goa, said that he considered himself a "Christian Hindu".

"India is a Hindu country. It is Hindustan. All Indians in Hindustan are Hindus, including I — I am a Christian Hindu," D'Souza said.

Dhavalikar triggered a national controversy on Thursday while speaking during a motion congratulating Narendra Modi on becoming Prime Minister.

It is a Hindu nation there is no doubt about that,it is always a Hindu nation & will stay a Hindu nation : Francis D'Souza,Goa's Dy CM

— ANI (@ANI_news) July 25, 2014

"If we all support it and we stand by Narendra Modi systematically, then I feel a Hindu Rashtra will be established," Dhavalikar had said.

D'Souza insisted that Dhavalikar had no "clarity in his mind" because India was already a Hindu nation.

Social media swiftly reacted to the controversial statement made by Goa's deputy chief minister:

Applause "India is a Hindu nation, no doubt about that, it always was a Hindu nation & will stay a Hindu nation: Francis D'Souza, Goa Dy CM"

नितिन थत्ते Sat, 26/07/2014 - 10:37

In reply to by मन

टेक्निकली तर बरोबरच आहे.

हिंदुराष्ट्र आणि हिंदु राज्य या वेगळ्या गोष्टी आहेत.

देशातले डॉमिनन्ट कल्चर हिंदू आहे. जे नॉन हिंदू आहेत त्यांच्या संस्कृतीचे हिंदवीकरण (Indianization) झालेले आहे.

एखाद्या चित्रपटात हिंदू संकृतीचे चित्रण असते ते पाहून मुसलमानांना विचित्र आणि काहीतरी अलायन पाहतो वाटत नाही. [उलट खास मुस्लिम संकृतीतले काही असेल तर हिंदूंना मात्र ते विचित्र वाटते] त्या अर्थी हिंदु संस्कृती ही इथली नैसर्गिक संकृती आहे.

केरळातल्या ख्रिश्चनांचे तर पुरतेच हिंदवीकरण झालेले आहे.

तर्कतीर्थ Mon, 28/07/2014 - 08:08

498 - A च्या गैरवापराबाबत मी आणि इतर अनेक पुरुषमुक्ती संघटनानी मांडलेल्या भूमिकेला अखेर न्याय मिळाला आहे. कायद्याच्या गैरवापराबद्द्ल बायकाना शिक्षेची तरतूद. पहा आजचा मटा पृ १ हेड्लाईन.

माझी कुचेष्टा करणारांची तोंडे आता कायमची बंद होतील अशी आशा करतो.