Submitted by स्पार्टाकस on शुक्रवार, 30/03/2018 - 20:28
Dead Man's Hand - 1
-----------------------------------------------------------
पहाटे दोनचा सुमार ....
पश्चिम क्षितिजापर्यंत अथांग पसरलेला अरबी समुद्र ....
भर समुद्रात दूर अंतरावर असलेल्या जहाजांवरचे ठिपक्यांसारखे दिसणारे दिवे ....
किनार्यावर आदळणार्या लाटांचा आवाज सोडला तर वातावरणात नीरव शांतता ....
अमावस्येची रात्रं असल्याने डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा गडद अंधार ....
रस्त्याच्या कडेल उभी असलेली त्याच अंधारात सहज मिसळून गेलेली काळ्या रंगाची कार ....
"एकदा बाहेर चेक करा, आसपास कोणी दिसत तर नाही..."
Submitted by परशुराम सोंडगे on शुक्रवार, 30/03/2018 - 11:31
कथा आणि व्यथा
म्हतारीचं कॉन्फीडन्स
Submitted by परशुराम सोंडगे on शुक्रवार, 30/03/2018 - 11:31
कथा आणि व्यथा
म्हतारीचं कॉन्फीडन्स
Submitted by जयंत कुलकर्णी on बुधवार, 28/03/2018 - 12:15
स्टिकीन
Submitted by परशुराम सोंडगे on बुधवार, 28/03/2018 - 01:52
दवाखान्याचं कॅटींग बंद झालं होतं. रात्रीच्या अकरा वाजल्या होत्या.त्यामुळे रोडवरच्या टपरीत चहा प्यायला गेलो होतो.सकाळ पासून पोटात आन्नाचा कण नव्हता.थोडं चहा पाणी घेतलं.आईची तब्येत वरचीवर बिघडतच चालली होती.टेन्शन तर भयंकरच होतंच.ज्या अंगावर खांदयावर आपण खेळलेलो वाढलेलो. ते माणूस मरणाच्या दारात होत. बाबा गेल्यापासून आईनं काय केलं नव्हतं आमच्यासाठी? मरणाचा विळखा पडलेला असताना तो जीव तडफडत असताना आपण रिलॅक्स राहणं शक्यचं नव्हतं. अशावेळी आपली हतबलता खायला उठती माणसाला. हातपाय गळमन गेलें होते.जीवनाचीं क्षणभंगूरता व मृत्याची अटळता माणसाला कळू लागते.
Submitted by परशुराम सोंडगे on गुरुवार, 22/03/2018 - 22:21
झावळातच गडी ग्रामपंचायती समोर हजर झाला.तिथचं खिळपाटाला पार चिटकून फटफटी उभी केली.उपरण्याने जॅम आळपलेले थोबाडं मोकळ केल. कावरं बावऱ होऊन इकडं तिकडं पाहिलं.कुणाचाच पत्ता नव्हता.कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता.ते पथक तालुक्याहून येणार व्हतं. ते जिपड नाय नि कुणी मेंबर भी नाय .अपुनच आगुदर आलोत याचं त्यांची त्यांनाच बर वाटलं.बाकीची पथकातली मेंबर कमून आलं नसतील ?त्यांनी उगचं मोबाईलचं डबडं तपासून पाहिल.कुणाचा काल बिल आल्ता का काय ?मिस काल बिस काल काय नव्हता .
Submitted by परशुराम सोंडगे on सोमवार, 19/03/2018 - 03:08
दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या.आता एका मागून एक परीक्षा सुरू होणार.हे एक दोन महीने परीक्षाचे दिवसच …. पूर्वी परीक्षा ही एक शैक्षणीक प्रक्रीया होती.अध्यनं अध्यापना सारखीच साधी आणि निंरतर चालणारी प्रक्रीया. आता मात्र या परीक्षानां फार महत्व आलयं कारण या परीक्षाचे अधारे मुलांचे वर्गीकरण करण्यात येऊ लागले.त्या प्रमाणे गुणवत्ता यादया तयार करण्यात येऊ लागल्या. अती हुशार, हूशार, मध्यमं,साधारण आणि` ढ`असे मुलांचे प्रकार करण्यात येऊ लागले.मेरीट नावाची एक फुलपटटी तयार करण्यात आली. त्याने त्यांच्या बुदधीची मापे घेण्यात येऊ लागले.एकाच तराजूत सा-याना मोजले जाऊ लागले.
Submitted by परशुराम सोंडगे on गुरुवार, 15/03/2018 - 05:04
पुरस्काराचे खारमुरे
***************
अाज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात अामचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.ते अावाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं अापल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला."
"चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला."
"त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज."
"आज काही विशेष?"
"विशेषच अाहे.पेपर नाही वाचले काआज? "
"नाय बुवा."
Submitted by परशुराम सोंडगे on गुरुवार, 15/03/2018 - 04:45
आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. गाव गावचं पुढारी निवडण्यात अालं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत अाली.नात्या गोत्यात,पावण्या रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू सुना आमने सामने अाल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या.
Submitted by निमिष सोनार on शुक्रवार, 09/03/2018 - 13:10
वलय - प्रकरण ४३ ते ४७ ची लिंक: http://www.aisiakshare.com/node/6524
प्रकरण 48
सुनंदा राजेश सोबत राहायला मुंबईत आपल्या बाळासह आली. राकेशने बाळाचे नाव “अक्षर” ठेवले.
दरम्यान अभिजित श्रीवास्तवसाठी राजेशने लिहिलेल्या स्क्रिप्टमुळे प्रभावित होऊन अमितजींनी राजेशला जो एक गुप्त प्लान सांगितला होता त्याची वेळ येऊन ठेपली होती.
पाने