प्रेस्टिट्यूट्स, मोदीद्वेष्टे, विचारजंती, सिक्युलर - बातम्या
अनेक लोक अनेक वेळा अनेक ठिकाणी काहीतरी निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्खपणाची विधानं करतात. कधीकधी या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणांपायी नसताना हातापायीही होते. कधी हे प्रकरण तिथेच न थांबता दंगे होतात, ऑफिसं तोडली जातात, हल्ले होतात, बसेस जाळल्या जातात, खूनही पडतात. आजकाल या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणा करण्यात प्रेस्टिट्यूट्स, मोदीद्वेष्टे, विचारजंती, सिक्युलरना ऊत आलेला आहे. तर हा धागा अशांची विधानं, कृत्यं, घोषणा वगैरेंची चेष्टा किंवा निषेध यांचं एकत्रित संकलन करण्यासाठी काढलेला आहे. यात काही काळ जुन्या बातम्याही चालतील - गेल्या दोनतीन वर्षांतल्या - पण अगदीच काहीतरी अनमोल रत्न असल्याशिवाय त्यामागे जाऊ नये.
हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक, कट्टर राष्ट्रवादी संघटनांना, आणि मोदीभक्त वगैरेंनी केलेल्या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणाबद्दलच्या बातम्या इथे मांडू नये, त्यासाठी स्वतंत्र धागा काढलेला आहे.
सुरूवात करायला मला चटकन बातमी सुचत नाहीये, पण दोन्ही लेख एकाच वेळी प्रसिद्ध व्हावे यासाठी मी हा धागा लवकर प्रकाशित करतो आहे. इतर लोक यावर सुरूवात करून भर घालू शकतील याची खात्री आहे.
असो.....पण युवा नेते
असो.....
पण युवा नेते विद्यार्थी असतीलच असे नाही. म्हणून वेगळी संघटना. एनएसयूआय ही काँग्रेसची विद्यार्थी संघटना आहे पण यूथ काँग्रेस नावाची वेगळी संघटना आहे.
>>तसाच प्रश्न विहिंप - बजरंग दल - पतित पावन संघटना?
विहिंप आणि बजरंगदल यात काय फरक आहे हे मोहन भागवत सुद्धा सांगू शकणार नाहीत. पतितपावन संघटना ही बहुधा सावरकरी विचारांच्या लोकांची संघटना आहे. [फॉर द बिगिनर्स - सावरकर आणि संघ हे एक नव्हेत. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता/नाही. वैचारिक दृष्ट्या दोघे बरेच दूर होते].
जिस बच्चे को कभी बडा होने ही
जिस बच्चे को कभी बडा होने ही नही दिया जाएगा ... तो बडा होगा कैसे ? मोठे होण्यासाठी त्यांना किमान पक्षांतर्गत इलेक्शन्स ना सामोरे जावे लागेल. ते सुद्धा अनेक वेळा. त्यातून तावून सुलाखून जर वर चढले तर ते मोठे होतीलच. मी काहीही केले (अथवा केले नाही) तरी माझे स्थान अबाधित आहे/राहील हे जर त्यांना पक्के माहीती असेल तर ते काहीही का करतील ?
या जोडप्याचा विषय इथे निघालाच
या जोडप्याचा विषय इथे निघालाच आहे तर -
काल एनबीसीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये देवळात फटाक्यांमुळे लागलेली आग, जीवितहानी याबद्दल बोलत होते. त्या बातमीच्या शेवटी विल्यम आणि केटच्या या दुर्घटनेबद्दल असलेल्या प्रतिक्रियाही दाखवल्या. बातमीबद्दल पत्रकार जेवढा वेळ बोलले त्याच्या ८०% वेळ या जोडप्याच्या प्रतिक्रियेसाठी! अमेरिकन माध्यमं, पर्यायाने लोकही या ब्रिटीश जोडप्याला एवढा भाव देतात हे बघून ड्वाले पानावले.
दुसरे युवराज
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/varun-gandhi-indirectly-t…
वरूण राजे बोलते झाले. मोदींना लक्ष्य केले.

फॉर अ चेंज जंतूंशी समहत आहे.
In reply to झीरो सम by चिंतातुर जंतू
फॉर अ चेंज जंतूंशी समहत आहे. पुण्यात भा.ज.यु.मो. सारखे अक्कलशुन्य लोक त्याला विरोध करून अजून प्रसिद्धी देत आहेत.