ऑक्सफॅमचा जागतिक श्रीमंतीवरचा रिपोर्ट आणि पुरोगाम्यांचे चित्त.
http://www.forbes.com/sites/laurashin/2014/01/23/the-85-richest-people-i...
The 85 Richest People In The World Have As Much Wealth As The 3.5 Billion Poorest
As the World Economic Forum begins in Davos, Switzerland, Oxfam International has released a new report called, “Working for the Few,” that contains some startling statistics on what it calls the “growing tide of inequality.”
The report states:
•Almost half of the world’s wealth is now owned by just one percent of the population.
•The wealth of the one percent richest people in the world amounts to $110 trillion. That’s 65 times the total wealth of the bottom half of the world’s population.
•The bottom half of the world’s population owns the same as the richest 85 people in the world.
•Seven out of ten people live in countries where economic inequality has increased in the last 30 years.
•The richest one percent increased their share of income in 24 out of 26 countries for which we have data between 1980 and 2012.
•In the US, the wealthiest one percent captured 95 percent of post-financial crisis growth since 2009, while the bottom 90 percent became poorer.
प्रचंड आर्थिक असमानतेतून मानवतेत कोणकोणते अन्याय संभव आहेत? याचे एकूण सामाजिक परिणाम काय? संपत्तीचे हे कायदेशीर संहतीकरण असेच कोणत्या स्तराला जाणार आहे?
देव, धर्म नि परंपरा यांना झोडायला घेतलेला दंडुका बाजूला ठेउन ही नक्की किती मोठी बला आहे याचा उहापोह करणे सच्च्या पुरोगाम्यांसाठी आवश्यक आहे असे वाटते. कोणी म्हणेल यात पुरोगाम्यांचा संबंध काय? वेल, या सगळ्या गोष्टींचे परिणाम शुद्ध सामाजिक असतील.
खरोखरच धार्मिक गोष्टींचा परिणाम या महाविकृतींपेक्षा मोठा आहे अशी धारणा आहे का?
एक रोचक बाब म्हणजे स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी, बुद्धीवान, विवेकी, सुशिक्षित, विचारी, दूरदृष्टे, ज्ञानसंपन्न, विज्ञानवादी, नैतिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशील, इ इ समजणार्या प्रामाणिक पुरोगाम्यांना सुमार बुद्धीच्या श्रीमंतांनी निव्वळ मूर्खात काढले आहे.
आज जगाच्या आर्थिक असमानतेला, पर्यावरणाच्या घाण अवस्थेला, अतिरेकी चळवळींच्या फोफावण्याला, नैसर्गिक स्रोत ८-१० पिढ्यांनंतर संपण्याला*, पांढर्या अर्थव्यवस्थेपेक्षा आकाराने मोठ्या असणार्या काळ्या अर्थव्यवस्थांना,सामान्य नोकरी करणार्या बांधलेल्या माणसाला आपलेच आयुष्य जगायला वेळ न मिळायला, भ्रष्टाचार माजायला**, युद्धांसाठी आयुधे खपवायला, न्यूक्लिअर आणि तत्सम मानवता नष्ट करण्याचे पोटेंशिअल असणारे इव्हंट व्हायला, इंटेग्रेटेड अर्थव्यवस्थांच्या व्हिम्समुळे निष्कारण कुठेही आर्थिक झटके बसायला, स्थानिक उच्च दर्जाच्या गोष्टी निर्यात होऊन जगात सर्वत्र उपलब्ध असायला, इ इ १% श्रीमंत (फक्त श्रीमंत, बाकी काही नाही) लोक कारणीभूत आहेत.
* जस्ट अ व्ह्यू.
** अंशतः
---------
पैकी पुरोगामी पर्यावरण नावाचा एक मुद्दा "त्यांच्या परीने" योग्य तो भर देऊन हाताळताहेत हे मान्य करावे लागेल. पण त्या लढाईत त्यांची औकात काय आहे हे आपण पाहतच आहोत. बाकी मुद्दे आहेत हे देखिल त्यांच्या गावी नाही. त्यांचे स्वरुप काय आहे आणि त्यांची उत्तरे काय आहेत हा भाग अलहिदा. धर्म आणि परंपरा झोडणे यात जगाची प्रचंड उर्जा अनावश्यक रित्या ते खर्च करत आहेत.
=====================================================================================================================
लेख आडकित्ता, अंतराआनंद आणि रमताराम यांना अर्पण.
स्वतःची पोटं भरली की चघळायला
स्वतःची पोटं भरली की चघळायला विषय उरतात ते धर्माचे. त्यामुळे चरचा तर होणारच ओ. भले मग दुष्परिणाम कशामुळेही कसेही होवोत. शेवटी "अहो रूपं अहो ध्वनि:" असे उष्ट्रगर्दभांप्रमाणे करणे हेच कैकांचे जीवनध्येय इ. होऊन जाते. ती सर्कस आपण एंजॉय करायची.
तदुपरि
का ब्रे? बाकीच्या पुरोगाम्यांनी कोणता मार्क्स मारला आहे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अगदी अलिकडे धर्म आणि आधुनिक
अगदी अलिकडे धर्म आणि आधुनिक व्यवस्था यांपैकी कशाचे उपद्रवमूल्य जास्त आहे यावर या तिघांशी चर्चा झाल्याचे आठवते. इतरांना हे काय लिहिले याची लिंक तितकीशी लागणार नाही. शिवाय मला माहित नाही कि ते कशाचे उपद्रवमूल्य जास्त आहे याबद्दल काय मत राखून आहेत.
---------------
यात धर्मप्रणित व्यवस्थाकालाची व विज्ञानाधारित व्यवस्थाकालाची तुलना असल्याने घासकडवींचा उल्लेख इंट्रिंसिक आहे. तो उघड केला तर भारतात 'सुप्रसिद्ध' मोदींची राजकारण्यांना ओळख करून दिल्यासारखे होईल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अच्छा!
म्हणजे तुम्ही अर्धपोटी राहून कॅपिटलिझमची हाडं चघळताहात तर!
रच्याकने : आम्हाला अग्रपूजेचा मान दिल्याबद्दल अजोंचे झाइर आबार!
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
ही कमेंट तुम्हांला इतकी
ही कमेंट तुम्हांला इतकी लागावी यातच बरंच काही समजून गेलं. धन्यवाद!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अग्रपूजेचा मान तुम्हाला नाही,
अग्रपूजेचा मान तुम्हाला नाही, त्या ८५ लोकांना आहे. प्रसाद वाटताना तुमच्या वाट्याला आला कि नाही ही वैयक्तिक बाब झाली. पण तुम्ही बुद्ध्या प्रसाद पदरात पाडून घेतला नसावा असे तुमच्या संतापातले सात्विकत्व पाहून वाटते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हाय्ला!
ह्ये कसं काय बा?
अरपण का काय ते करताना तुमच्या तोंडात आमचंच आलं की वो पह्यलं, मंग तेला अग्रपूजा न्हाई तं काय म्हणावं बा? बगा वर्ती काय लिवलंया तुमी?
>>
"लेख आडकित्ता, अंतराआनंद आणि रमताराम यांना अर्पण."
कुणाचं हाय पैलं? आँ?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
प्राब्लेम हा आहे की
प्राब्लेम हा आहे की पैशाबरोबरच त्याच्यासोबत येणारी सत्ताही हेच १% लोक बर्याच ठिकाणी नियंत्रित करतायत. त्यामुळे पुरोगामी कितीही प्रामाणिक असू द्या, कितीही बोंबा ठोकून ठोकू द्या, त्या श्रीमंताचं शाट्टंही वाकडं करू शकलेले नाहीत. असो.
घाटस्थ भट साहेब, पुरोगामी
घाटस्थ भट साहेब, पुरोगामी प्रामाणिक असूनही श्रीमंतांचे शष्पही वक्र करू शकत नाहीत हे एक दुखणे आहे. पण सध्या त्याहीपेक्षा मोठे दुखणे असे आहे की हे सो कॉल्ड पुरोगामी प्रामाणिक नाहीत आणि तरीही प्रामाणिक असल्याचा दंभ मिरवतात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅटमॅन, माझा रोख शुद्ध,
बॅटमॅन, माझा रोख शुद्ध, प्रामाणिक पुरोगाम्यांकडेच असतो.
-----------
अप्रामाणिक नि दांभिक (पुरोगामी) लोकांना कसे हाताळावे हा माझ्या क्षमतेबाहेरचा प्रश्न आहे. न्यूट्रल किंवा प्रतिगामी अशा अप्रामाणिक लोकांनी हौस म्हणून स्वतःस पुरोगामी असे प्रोजेक्ट केले तर फारसा पडत नसावा. अगदी अशा दांभिक पुरोगाम्यांकडून एखादे सत्कार्य होत असल्यास इग्नोर करायला हरकत नाही.
--------------
पण जन्विन पुरोगामी लोकांची जबाबदारी मोठी आहे. पुरोगामी म्हणजे समाजाची भविष्यातली दिशा सांगणारे लोक. समाजाच्या समस्या, मानसिकता, आवश्यकता यांची खूप खोलात जाणिव त्यांना असणे गरजेचे आहे.
---------------------
पुरोगामी लोकांचा आधुनिक काळ जेव्हापासून चालू झाला आहे तेव्हापासून निर्माण झालेल्या सार्या "नव्या" सामाजिक समस्या प्रामाणिक पुरोगाम्यांच्या अंधत्वाची साक्ष आहेत. त्यांचीच दखल घेण्याचा विचार आहे. देवा धर्माच्या उणिवा जगप्रसिद्ध आहेत, पण आधुनिक व्यवस्थांच्या उणिवा देखिल प्रसिद्ध करायचा प्रयत्न व्हायला पाहिजे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पण जन्विन पुरोगामी लोकांची
मला हा प्रतिसाद आवडलेला आहे.
आधुनिक व्यवस्थांच्या उणिवा
पण आधुनिक व्यवस्थांच्या उणिवा देखिल प्रसिद्ध करायचा प्रयत्न व्हायला पाहिजे.
उदा.
१) समाजवादी संरचनेत (व साम्यवादी संरचनेत) सुद्धा पर्यावरणाची वाट लागली होती. उदा. सोव्हियत रशिया, चीन. (याचा विदा मधे मिळाला होता. पण हरवला. शोधतोय.)
२) साम्यवादी रशियामधे तर स्टॅलिन ने आपल्याच जनतेतील अतिसामान्यांची कत्तल केलेली होती. व माओ ने सुद्धा. कॅपिटलिस्ट संरचनेत कोणत्या राजकीय नेत्याने आपल्याच जनतेची (अतिसामान्यांची) थेट कत्तल केलेली होती का ?? (आता लगेच मोदींचे २००२ च्या दंगलीचे चे उदाहरण पॉलिमॉर्फिझम वापरून फिरवून गुगली टाकण्यात येईलच. की बघा मोदींनी .... मुस्लिमांची. नैका ??)
३) भारतात स्वातंत्र्योत्तर कालात समाजवादी संरचना १९९० पर्यंत होती. (आज ही ती संपुष्टात आलेली आहे असे नाही.) पण गरीबी वाढतच गेली.
(आता लगेच मोदींचे २००२ च्या
पण मग असा आरोप करायचा तर सुप्रीम कोर्टावरही अविश्वास दाखवणे भागच पडते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सहमत आहे. भांडवलवाद, समाजवाद,
सहमत आहे. भांडवलवाद, समाजवाद, साम्यवाद म्हणजे फक्त इंडस्ट्रीयल इकॉनॉमिच्या बेफाम घोड्याचे लगाम कोणाकडे पाहिजेत याबद्दलचे वाद आहेत.
प्रत्यक्षात स्वार बदलला तरी घोड्याच्या टापांखाली चिरडले जाणारे तेच असतात.
अर्थात भांडवलशाहीत आपल्यालाही घोड्यावर स्वार व्हायची तितकीच संधी आहे असे (अमेरिकन) ड्रीम पाहण्याची सोय असते म्हणा आणि विषमतेच्या अशा कितीही बातम्या आल्या तरी या स्वप्नातून जागे होता येत नाही.
प्रत्यक्षात स्वार बदलला तरी
फरक आहे. समाजवाद आणि साम्यवादात जे चिरडले जातात त्यांना काही ऑप्शनच नसतो, ना त्यांना कुठे तक्रार करायची संधी असते. ना कोर्ट असते ना न्याय असतो.
भांडवलवादात संधी असतात, दमन होत असेल तर न्याय मागता येतो. तुमच्या स्किल, क्षमता, स्वभाव ह्यांना मार्केट मधे एन्कॅश करण्याची संधी असते आणि तशी पूर्ण शक्यता असते.
कोर्ट मार्केट चालवत नाही.
कोर्ट मार्केट चालवत नाही. अमेरिकेत साधं तुरुंगांचं खाजगीकरण केलं तर जगात सगळ्यात जास्त कैद्यांचं प्रमाण असलेला देश झाला आहे तो.
मार्केटमध्ये न्याय-अन्यायाच्या व्याख्या ऑईल प्राईसपेक्षा झपाट्याने बदलू शकतात. त्यामुळे भांडवलवादातले न्यायदान आणि इतर व्यवस्थांतलं न्यायदान सारखंच फार्सिकल असते. विशेषतः स्वारांना गैरसोयीच्या ठरणार्या प्रकारात.
अमेरिकेत साधं तुरुंगांचं
काय वाईट झाले? तुरुंगात ठेवायला पाहीजे असे लोक बाहेर असले की भारत होतो.
हा अगदीच चुकीचा समज आहे. जगात जिथे अन्याय बोकळला आहे तिथे मार्केट इकॉनोमी नाही हे मुळ कारण आहे.
तुरुंगात ठेवायला पाहीजे असे
सॉरी. तुमची-माझी गृहीतके वेगळी असल्याने वृथा वाद घालण्यात अर्थ नाही.
मार्केटमध्ये
मार्केटमध्ये न्याय-अन्यायाच्या व्याख्या ऑईल प्राईसपेक्षा झपाट्याने बदलू शकतात. त्यामुळे भांडवलवादातले न्यायदान आणि इतर व्यवस्थांतलं न्यायदान सारखंच फार्सिकल असते.
ही दोन वाक्ये लक्षणीय आहेत.
पहिले वाक्य - ननि, तुम्ही स्वतःला च एक पार्टी द्या. एक चिकन बिर्याणी + टेकिला + मस्त बनारस पान. This is an important insight and most people, who claim to understand capitalism, do not have this one.
पण दुसरे वाक्य तुम्ही केवळ समस्या म्हणून सादर केलेत. संधी म्हणून पहा. आता तुम्ही "कोणासाठी संधी" हा प्रश्न विचारणार आहात हे मला माहीती आहे. पण या मुद्द्यावर मी विशद न करता सुद्धा तुम्ही एका वेगळ्याच पातळीवर स्वतः ला नेऊन ठेवू शकता.
श्रेणी
नगरीनिरंजन यांचा हा अाणि प्रतिसाद पटले अाणि अावडलेही, पण श्रेणी देताना चुकून ‘सर्वसाधारण’ अशी दिली गेली. मला मार्मिक द्यायची होती, पण अाता बदलता येत नाहीये.
- स्वधर्म
नेमके.
नेमके.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कॅपिटलिस्ट संरचनेत कोणत्या
या धाग्याचा उद्देश धर्मप्रणित, ईश्वरप्रणित जुनी व्यवस्था विरुद्ध इतर सार्या व्यवस्था आहे. म्हणून साम्यवादी आणि भांडवलवादी यांची तुलना इथे अस्थानी आहे. पण व्यवस्था जुनी असो वा नवी, धर्मप्रणित वा आधुनिकता प्रणित, साम्यवादी वा भांडवलवादी, आपल्याच (खरे तर विरोधी) लोकांचा नायनाट करणे हे सार्वत्रिक असावे.
भांडवलवादी कत्तलींची उदाहरणे -
१. रेड इंडियन्स
२. फ्रेंच आणि आफ्रिकन्स
३. स्पॅनिश आणि द अमेरिकी
४. ऑस्ट्रेलियन्स आणि अबॉरिजिनल्स
५. जालियनवाला बाग
६. हिटलर नि ज्यू
७. श्रीलंकेतले तामिळ
८. पूर्वोत्तर नि कश्मिरातला ए एफ पी एस ए
९. दिल्ली १९८४
१०. गुजरात २००२
...
...
...
लिस्ट खूप लांब आहे.
-----------
बाय द वे, भांडवलवादी कत्तली करत नाहीत म्हणत कत्तलवादी गब्बर त्यांच्याबाजूने असणे विरोधाभासी आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजो - तुमचा प्रतिसाद पूर्ण
अजो - तुमचा प्रतिसाद पूर्ण हुकला आहे. पहील्या ४ उदाहरणात तर ज्यांची कत्तल झाली ( ते पण मान्य नाहीये पण ते द्या सोडुन ), ते त्या देशाच्या जनतेचे भाग नव्हतेच. ज्यु आणि तामिळ लोकांना त्या देशाचे लोक आपली जनता मानत नव्हतेच. तसेही, हिटलर कॅपिटलिस्ट वगैरे नव्हता.
गुजरात मधे कत्तल वगैरे झाली, हेच मुळी खोटे आहे. दोन धर्मातल्या लोकांमधे मारामारी/दंगल झाली.
दिल्ली, काश्मीर आणि पूर्वोत्तर मधे समाजवादी सरकारच काम करत होते.
जे लोक/राज्यकर्ते
जे लोक/राज्यकर्ते कॅपिटेलिस्ट/लोकशाहीवादी/उदारमतवादी होते, त्यांनी केलेली कत्तल. आपल्याच असो नैतर अजून कोणत्या लोकांची.
१. हिटलर सामान्य लोकांच्या मतदानाने निवडून आला होता ना?
२. तामिळ सरकार लोकशाही सरकार नव्हते?
३. मोदीपूर्व गुजरातेत भाजप अस्थिर होती. मोदींच्या शैलीमुळे (फुकटात काम करायचे) त्यांचे प्रचंड प्रमाणात पक्षात हितशत्रू होते. आणि मोदींचा विकपॉइंट (दंगलीच्या वेळी शांततेचे आवाहान करायचे असते हे माहित नसणे) हे त्यांना माहित होते. माझ्या व्यक्तिगत मते मोदींची इच्छा नसताना स्टेट मशिनरी वापरली गेली. भारतात प्रत्येक दंगलीत हे होते. Sometimes I tend to say Modi killed 600 rioting Hindus and his political enemies killed 1300 Muslims!!!
४. दिल्लीत स्टेट मशिनरी लाज वाटेल इतक्या प्रमाणात वापरली गेली. सत्ताधारी राजकीय पक्ष + पोलिस विरुद्ध शीख अशी ती दंगल होती. दिल्लीत शीखांत आणि हींदूंत असाधारण बॉन हॉमी आजही आहे.
५. समाजवादी सरकारे ना? धार्मिक तर नव्हे ना?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भांडवलवादी कत्तलींची
अजो - तुमचे टायटल हे आहे. मी फक्त भांडवलवादी ह्या शब्दा बद्दल लिहीले होते, बाकी चालु द्या.
अवांतर - १९८४ ची इतकी भिषण दंगल आणि कत्तल होउन, पंजाब मधे कॉग्रेस सरकार कसे निवडुन येउ शकले हा प्रश्न काही मला सुटत नाही.
कॉग्रेसचे सरकार इतके वर्षे
कॉग्रेसचे सरकार इतके वर्षे उभ्या भारतात आले तसेच!!!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पुरोगामी हा शब्द समाजवादी व
पुरोगामी हा शब्द समाजवादी व पर्यावरणवादी वगैरे लोकांना आलटून पालटून वापरलेला पाहून मजा वाटली. आमच्या (म्हणजे माझ्या) मते जे काय होतंय ती प्रगती असून आपण "पुढे" चाललो आहोत अशी ज्यांची ठाम श्रद्धा असते ते पुरोगामी.
बाकी बेशिकातच घोळ घातला असला तरी बाकी मुद्यांवर चर्चा वाचायला व करायला आवडेल.
अरेरे
इतकी संकुचित व्याख्या? पुरोगामी म्हणजे ज्यांचा आम्हाला विरोध ते, अशी व्याख्या आहे. या, जरा त्या पाश्चिमात्य देशातून माहेरी या, म्हणजे समजेल.
-Nile
@ गवि, पाश्चात्य सामाजिक
@ गवि, पाश्चात्य सामाजिक श्रेष्ठतेचा दाखला हवा होता ना?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तो एक पुरोगामिची!!!
पुरोगामीचा शब्दशः अर्थ पुढे म्हणजे चांगल्या स्थितीकडे जाणारा असा होतो.
---------------
या लेखापुरता हा शब्द ईश्वर, धर्म, सनातन मानवी मूल्ये, जुनी डिसेंटीग्रेटेड अर्थव्यवस्था, कमी वैज्ञानिक शोध प्रणित समाजव्यवस्था यांचेपासून दूर जाणारी व्यवस्था समर्थणारे लोक यांचेसाठी वापरला आहे. सर्वसाधारणपणे खालिलप्रमाणे विचार करणारे लोक पुरोगामी म्हणून अभिप्रेत आहेत.
१. ईश्वर नाही. ब्रह्मांड अनादि, अनंत नाही. ब्रह्मांडात ईश्वरत्व वा नैसर्गिक सम्यकता नाही. आपण सगळे एका अपघाताचा परिपाक आहोत. तांत्रिकदृष्ट्या आपण निसर्गच्या भौतिक नियमांना बद्ध आहोत नि म्हणून मानवाच्या फ्रीविलला (इच्छेवरील सार्वभौम अधिकाराला) अर्थ नाही. आपल्या सगळ्यांचा उद्गम निर्जीव आहे म्हणून सम्यक अशा जगन्नियंत्याकडे समस्त मानवजातीचे ओरियंटेशन असणे गरजेचे नाही. भौतिक प्रगती, सर्वायवल, जीन्स पास करणे इ इ हीच मानवाची जीवनकर्तव्ये आहेत. माणूस माणूस म्हणून परस्परांत ईश्वरप्रणित कनेक्ट नाही. शिवाय मनुष्य ईश्वरवादी आहे म्हणजे तो मूर्खच असला पाहिजे.
२. धर्म असेट नसून लायाबिलिटी आहे. It has outlived its utility. धर्म सोडून द्या. धर्माची तत्त्वे मूर्खपणाची आहेत. आम्ही स्वतःस कोणत्या धर्माचे म्हणत नाही. मग व्यक्तिगत विचारसरणी कशी असावी, कुंटुंब कसे असावे, समाज कसा असावा, समाजातील इतर सर्व व्यवस्था कशा असाव्यात हे सर्व आम्ही नव्याने आपली बुद्धी आणि विवेक वापरून ठरवणार. असेच प्रत्येकाने करावे. आणि वरील १ मधील तत्त्वज्ञान लक्षात ठेऊन करावे. धर्म पाळणारा प्रत्येक जण दांभिक असतो. जगातले प्रत्येक भांडण हे धर्मप्रेरित असते. धर्म ही इतर कोणत्याही अन्य समस्येपेक्षा मोठी समस्या आहे. जगातले ९३% लोक शुद्ध धार्मिक आहेत आणि हे प्रमाण ५% च्या खाली येईल तो सुदीन. हे ९५% लोक "शुद्ध धार्मिक" प्रेरणेतून भांडत असतात, त्यांच्या भूभागाला आग लागली आहे आणि बाकीच्या ७% लोकांचे विश्व शांत नि प्रगल्भ आहे.
राजकारण, न्यायदान, समाजकारण, विज्ञान, इ इ मधून धर्म पूर्णतः हद्दपार केला पाहिजे (हा साम्यवादच नव्हे, यात भारतीय/अमेरिकन लोकशाही पण आली.) आणि त्यांचे स्वरुप निधर्मी असे हवे. धार्मिकाने आपला धर्म ड्यूटीवर असताना काढणे म्हणजे तर महापापच. धर्म आणि धार्मिक संकल्पनांचा उल्लेख करणे म्हणजे मागासलेपणा मग "पर्यायी सुयोग्य समाजव्यवस्था नक्की कशी असावी" यावर कोणतेही मत वा एकमत नसलेले चालेल.
३. सारी मानवी मूल्ये प्रश्ननीय आहेत. कोणत्या घटनेस चांगले वा वाईट म्हणता येत नाही. तो केवळ दृष्टीकोन असतो, बाजू असते. दुसर्या बाजूने पाहिले तर कोणतीही घटना समर्थिता येते. महान, पवित्र असं काही नसतं. सगळं काही जीन्स आणि हार्मोन्समुळे होतं. आईचं बाळावरचं प्रेम हे शुद्ध जैविक असतं. प्रेम, आदर, त्याग, सत्य, न्याय, अहिंसा, पराक्रम, मानीपणा, इ इ किंबहुना अर्थहिन आहे. मास्लोचा पिरॅमिड सर्वकाही. घटना आणि कायदे हे प्रमाणग्रंथ. त्यांचं लॉजिक परफेक्ट.
४. नव्या अर्थव्यवस्थेत मानवाचं कल्याण झालं आहे. त्याचं सुख वाढलं आहे. कष्ट कमी झालं आहे. सुखभोग वाढले आहेत. शाश्वती वाढली आहे. आरोग्य वाढलं आहे. मनोबल वाढलं आहे. स्वच्छता वाढली आहे. समता वाढली आहे. सर्वांसोबत जास्त चांगल्या प्रकारे न्याय झाला आहे. सन्मान वाढला आहे.
५. विज्ञानाने प्रत्येक शोध लावावा. तो लगेच वापरायला मानवतेला द्यावा. त्याचे आर्थिक आणि दूरगामी सामाजिक , नैसर्गिक परिणाम जे काही होतील ते पाहता येतील. शोध हा सुज्ञपणे वापरता येईल असाच मनुष्य उत्क्रांत झाला आहे. शिवाय या शोधांचा लाभ शोधकर्त्यांना सर्वात जास्त प्रमाणात व्हावा, हे एन्शूअर नाही केले तर शोध घेणे बंद होऊन जाईल. विज्ञान आणि वैज्ञानिक भारी लोक आहेत. त्यांची जगाच्या सगळ्या समस्या सोडवल्या आहेत. पुढेही सोडवणार आहेत. तेव्हा निश्चिंत राहा. शिवाय शास्त्रज्ञ म्हणतात ते प्रमाणवाक्य. ते जनरली खरेच असते मग ते transcendental to human intelligence का असेना.
===================================================================
आज ९३% लोक धार्मिक आहेत असे स्टॅट आहे, पण यात काही दम नाही. धर्मकेंदित जीवन जगणारे लोक प्रचंडच कमी आहेत. धर्म ही एक गूढ अस्मिता म्हणून उरलाय. प्रत्येकाचे पुरोगाम्यात धर्मांतर झाले आहे. जे धार्मिक उरले आहेत त्यांत धार्मिकतचे तत्त्वज्ञान समजून घेणारे पुन्हा नगण्य आहेत. सध्याला पुरोगामी युग धुमधडाक्यात चालू आहे.
या धाग्यावर खर्या आणि दांभिक धर्माच्या त्रुटी विरुद्ध खर्या आणि दांभिक नवव्यवस्थांच्या त्रुटी चर्चायचा उद्देश आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरुणराव तुस्सी ग्रेट हो!
एकदा हे तुमच्या मते पुरोगामी कोण हे लिष्ट करून सांगा बघू! म्हणजे आडकित्ता, अंतराआनंद आणि रमताराम यांचा उल्लेख तुम्ही वर केला आहे म्हणजे ते नक्कीच पुरोगामी असणार. आता बाकी सगळे मेंबर पुरोगामी आणि नॉनपुरोगामी लिष्टात घाला बघू म्हणजे आम्हाला पण कळेल आम्ही कोंणच्या गटात जायचं ते! शिवाय हे पण सांगून टाका की पुरोगाम्यांनी नक्की पर्यावरण, आर्थिक धोरणे, सामाजिक समानता आणि इतर सामाजिक मुद्द्यांवर काय ऑफिशियल भूमिका घ्यायची असते ते (ते धार्मिक-अधार्मिक, स्त्री-पुरुष, हिंदू-मुस्लिम, उत्क्रांती-नॉनउत्क्रांती आम्हाला ठाऊक आहे, तुम्हीच नीट समजावून सांगितलयंत!). मग आम्हाला नक्की काय-काय ऑप्शन आहेत ते कळतील, नाहीतर असं करायचं का? तुम्हीच आमच्या पण प्रतिक्रिया टंकून टाका की..आम्ही आमचा आयडी आणि पासवर्ड सरेंडर करू का? पण जाऊ दे झालं, तुम्हाला फक्त पुरोगामी-सनातनी खेळायचंय त्याचा आता लई कंटाळा आलाय! तुम्हाला नाही का हो कधी कंटाळा येत? कोणे एके काळी तुम्ही हा दिलेला प्रतिसाद आणि त्यावर आलेल्या श्रेण्या आणि खास करून मेघनाने दिलेला अभिप्राय आठवला आणि हळवी झाले. नंतर काय झालं हो तुम्हाला?
अवांतर पुरवणी: जॉन स्टुअर्टने वाईजर या पुस्तकाची ओळख करून दिली होती त्याबद्दल थोडे,
Nudge coauthor Cass Sunstein and leading decision-making scholar Reid Hastie shed light on the specifics of why and how group decisions go wrong—and offer tactics and lessons to help leaders avoid the pitfalls and reach better outcomes. In the first part of the book, they explain in clear and fascinating detail the distinct problems groups run into:
• They often amplify, rather than correct, individual errors in judgment
• They fall victim to cascade effects, as members follow what others say or do
• They become polarized, adopting more extreme positions than the ones they began with
• They emphasize what everybody knows instead of focusing on critical information that only a few people know
(No subject)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+१
+१
ओळख
वर नगरीनिरंजन यांना पुरोगाम्यांची लक्षणे सांगीतली आहेत. ते आपलंच वर्णन आहे असं वाटणारे सगळे. पण अग्रगण्य लोक घासकडवी, ऋषिकेश, चिंज, मेघना, अदिती, अस्वल, अंतराआनंद, तुम्ही, संजोपराव, आडकित्ता, गब्बर, बॅटमॅन, रमताराम, कविता महाजन, कोल्हटकर, नाईल, नानावटी, गवि, शहराजाद, अतिशहाणा, नवीबाजू, इ इ हे आहेत. यातला नाईल सोडला/ले तर सगळे माझ्यामते प्रामाणिक पुरोगामी आहेत.
खुश?
पुरोगाम्यांनी या गोष्टींवर भूमिका घ्यायची असते ही जाणिव आहे ही आनंदाची बाब आहे.
=========================
पुरोगाम्यांचा १००% फोकस धर्मावर टिका करण्यावर असतो. कदाचित धर्मावर टिका करणारा तो पुरोगामी अशी व्याख्या झालीय. त्यांच्या फोकसचा पाय चार्ट ठिक करण्याचा मला कंटाळा येत नाही.
======================
मेघनाच्या (किंवा कुणाच्याच)चांगल्या अभिप्रायांसाठी मी लिहित नाही. आपला बायस बाजूला ठेऊन ३६० डीग्री विचार करायची, मुद्दे प्राजंळपणे मान्य करायची ज्यांची पद्धत नाही तिथे संवाद नसलेला बरा. शिवाय मला व्यक्तिगत स्पष्टीकरणे द्यावी लागायची चीड आहे.
======================
Thanks for the introduction. Here if I choose to call the lobby of the progressive on this website as "A Group", it is really interesting to see how it has gone WRONG. Wrong in the sense far away from the thoughts of Narendra Dabholkar whose thoughts are very balanced, deep and practical on where the society should head. I even wonder if you people pay heed to what the mascot of the progressive movement says.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सॉरी.
रा.रा. अजो ह्यांस,
स.न.वि.वि.
(आपल्याला मी पुरोगामी वाटत असलो तरी) मी पुरोगामी नाही. धन्यवाद!
फुडल्या वेळी आम्हाला या(तनां)तून वगळावे ही विनंती.
आपला,
नॉट अॅट ऑल पुरोगामी
==================
भूतकाळातील आस्वल्य.
हेच
अरुणजोशींनी सांगितलेली लक्षणे मला लागू पडत नाहीत. तसाही मी बऱ्यापैकी प्रतिगामीच आहे. फक्त धार्मिक बाबतीत हिंदुत्त्ववाद्यांना विरोध करुन हिंदू धर्म चांगल्या स्वरुपात ठेवण्यासाठी प्रयत्न करतो.
ओके. मी इथून पुढे आपला उल्लेख
ओके. मी इथून पुढे आपला उल्लेख टाळेन.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बाप दाखव नाहीतर....
तुम्ही सांगितलेली पुरोगाम्यांची लक्षणं मला कशी लागू पडतात हे दाखवून द्या कृपया...
मी ईश्वर मानत नाही, ब्रह्मांडात सम्यकता मानत नाही, आपण सगळे एका अपघाताचा परिपाक आहोत, वगैरे कोणी सांगितलं? असं मी कुठे म्हटलं आहे ते दाखवून द्या. नाहीतर माझ्यावरचा हा हीन आरोप मागे घ्या.
भौतिक प्रगती, सर्वायवल, जीन्स पास करणे इ इ हीच मानवाची जीवनकर्तव्ये आहेत असं मी एकाही ठिकाणी लिहिलेलं नाही. इतकंच नव्हे, तर 'धर्म पाळणारा प्रत्येक जण दांभिक असतो. जगातले प्रत्येक भांडण हे धर्मप्रेरित असते. धर्म ही इतर कोणत्याही अन्य समस्येपेक्षा मोठी समस्या आहे. जगातले ९३% लोक शुद्ध धार्मिक आहेत आणि हे प्रमाण ५% च्या खाली येईल तो सुदीन. हे ९५% लोक "शुद्ध धार्मिक" प्रेरणेतून भांडत असतात, त्यांच्या भूभागाला आग लागली आहे आणि बाकीच्या ७% लोकांचे विश्व शांत नि प्रगल्भ आहे.' वगैेरे मी कधीही बरळलेलो नाही. तुमच्या बहुतांश विधानांबद्दल हेच लागू असल्याने ती मी लिहून दाखवत नाही.
तेेव्हा कृपया पब्लिक फोरमवर माझ्या बाबतीत अपप्रचार करणं थांबवावं.
अगदी तुम्हालाच उद्देशून सारं
अगदी तुम्हालाच उद्देशून सारं वर्णन नाही. म्हणून ते वेगळं आहे वाटतं. तुमच्यासाठी टेलरमेड करून लिहितो (कंसात).
=============================
आपण सगळे एका अपघाताचा परिपाक आहोत (विश्वसृजन बिग बँग पासून झाले आहे.)
भौतिक प्रगती (भौतिक प्रगती करायला पाहिजे, होतही आहे. त्यामुळे माणूस अधिक आश्वस्त फील करत आहे, इ इ ), सर्वायवल, जीन्स पास करणे (आपले उत्क्रांतीवरचे मागचे विचार असं म्हणतात.)
'धर्म पाळणारा प्रत्येक जण दांभिक असतो. जगातले प्रत्येक भांडण हे धर्मप्रेरित असते. (असं आपण म्हणाला नाहीत. मान्य.) धर्म ही इतर कोणत्याही अन्य समस्येपेक्षा मोठी समस्या आहे. जगातले ९३% लोक शुद्ध धार्मिक आहेत आणि हे प्रमाण ५% च्या खाली येईल तो सुदीन. (http://www.aisiakshare.com/node/3017 इथे आपण प्रकट केलेले धर्मविषयक वचन अनालिटिकल स्वरुपात आहेत आणि सौम्य शब्दांत हेच सगळे म्हणतात. अर्थातच त्याचा अर्थ असा होतच नाही असे तुम्ही म्हणू शकता. आणि वाक्यरचना भिन्न आहे म्हणून तुम्ही ते सिद्धही करू शकता.)
हे ९५% लोक "शुद्ध धार्मिक" प्रेरणेतून भांडत असतात, त्यांच्या भूभागाला आग लागली आहे आणि बाकीच्या ७% लोकांचे विश्व शांत नि प्रगल्भ आहे. (वरच्या धाग्यावरचे आपले सगळे विचार वाचा. धर्म नसला कि शांती असते , प्रगती होते, इ इ. सौम्य शब्दांत आपण तेच म्हणाला आहात. )
=======================
प्रामाणिक पुरोगामी म्हणणं अपप्रचार नव्हे. तुमची एक विचारधारा आहे जिच्यावर मी टिका करत असतो. तुमच्या विचारसरणीवर टिका करायचा मला अधिकार नाही का? हेच का अभिव्यक्तिस्वातंत्र्य?
============================
मी इथे आपली वचने उद्धृत करतो.
तसा हा मुद्दा प्रचंड तकलादू होता. पक्ष आलटून पालटून सत्ता करतात.
दांभिकता
हा आपला प्रामाणिकपणा
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्रामाणिक पुरोगामी म्हणणं
कोणाला सिंह म्हणणं हा अपप्रचार नाही, पण सिंहाच्या व्याख्येत जर गाढवाची लक्षणं देऊन नंतर कोणाला सिंह म्हटलं तर तो अपप्रचार ठरतो.
मी आत्तापर्यंत तुमच्याशी चर्चा करताना तुमच्या विधानांना बेनेफिट ऑफ डाउट दिलेला आहे. शक्यतोवर शब्द चुकले तरी तुमचा हेतू काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहेे. पण गेले काही दिवस तुमच्याकडून येणाऱ्या विधानांमध्ये एक अनावश्यक त्रागा, आततायीपणा आणि वैयक्तिक टीकेची धार आलेली जाणवते. कितीही कुशन घेतलं तरी ती बोचल्याशिवाय राहात नाही. तेव्हा कृपया संयत विधानं करावीत ही विनंती.
.
.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आपल्या विचारसरणीवर टिका होणं
आपल्या विचारसरणीवर टिका होणं वैयक्तिक, आततायी इ इ वाटत असेल तर दुर्दैवी आहे.
===============
जे आयडी अशा प्रकारचे प्रतिसाद देतात त्यांना मी एक पायरी पुढचा प्रतिसाद देतो पण जे सुज्ञपणे मुद्दा मांडतात त्यांना त्यांच्यापेक्षा सौम्यपणे लिहितो. उदा. काँग्रेस, सोनिया, ममो, चिदंबरम, इ इ ची बर्याच ठिकाणी भाजपेयींच्या विरोधात स्तुति केली असताना ते इग्नोर करून आडकित्ता "तुम्ही पेड मोदी समर्थक का?" असे विचारतात तेव्हा त्यांना खमक्या उत्तर देणे आवश्यक असते. पण त्याचा अर्थ त्या लॉबीतल्या प्रत्येकालाच मी तसेच लेखतो असा होत नाही.
=============
माझ्या विचारांमुळे व्यक्तिगत त्रास होत असेल तर माझ्याकडून पूर्णविराम.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
गम्मत आहे
सगळा धागा वाचून गम्मत वाटली. पुरोगामी मंडळी बाकीच्यांना येता जाता हीन लेखतात, बऱ्याच वेळा समोरच्याची सहज अक्कल काढतात. विशेषता चुकून कोणी भाजपा वा मोदीला समर्थन दिले कि तो लगेच बुश स्टईल आपल्या विरोधात असतो. तेंव्हा इतका सामारोच्याचा मनाला लागेल असेल वगैरे विचार करताना दिसत नाही. उलट असे बोलून जाहीर अपमान केला तरच लोक सुधारतात असा एक समज आहे.
जाहीर अपमान केला तर कोणी
जाहीर अपमान केला तर कोणी सुधारेल असे वाटत नाही. सूडोपुरोगामी लोक्स तर नाहीच नाही. कुत्र्याचे शेपूट सरळ होईल पण यांचा पुरोगामीपणा सुडोगिरीतून बाहेर येणे शक्य नाही.
(तरारलेल्या गळवांचे पुरावे म्हणून प्रतिसाद दाबून टाकायला मोकळा आहे.)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रतिसाद दाबून टाकणे
हा हा. काही लोकांचे विशेषतः आजो आणि तुमचे प्रतिसाद दाबून टाकाणे अवांतर, खोडसाळ वगैरे श्रेण्या देवून हा प्रकार मला जरा गमतीदार वाटतो. दाखवताना पुरोगामी लोक व्यक्ती आणि मत स्वत्यांत्राचा वगैरे उदो उदो करतात पण विरुद्ध काही आलेले फारसे खपत नाही. थोड्केमे मानवी स्वभाव आहे. मग तो कुठली सेक्युलर, स्युडो सेक्युलर, सेक्युलर फंडामेंटलिस्ट अथवा नुसताच नेहमीचा संघीय फंडामेंटलिस्ट असो. सगळे ह्या बाबतीत एकाच माळेचे मणी आहे. काय तो उन्नीस बीस किंवा फारतर १६-२० चा फरक पण १-२० चा फरक नक्कीच नाहीयेत असे निदान मला तरी सकृतदर्शनी जाणवते
थोडं वेगळं मत.
श्रेण्या मतविरोधाला वापरल्या जात असतील तर ते दुर्दैवी आहे.
माझ्या मते श्रेण्या मत मांडण्याच्या शैलीला दिल्या जातात. मुद्दा कितीही विरोधी असेल तर प्रोब्लेम नसावा पण ज्या आक्रस्ताळी आणि वैयक्तिक तू-तू मै मै शैलीत प्रतिसाद येतात त्याला दर वेळी प्रति-प्रतिसाद देऊन "हे बरोबर नाही" वगैरे टंकण्यापेक्षा श्रेणी देऊन नापसंती दर्शवता येते. किंवा प्रत्येक ठिकाणी एकच मुद्दा मांडला जात असेल, तर त्यालाही काही अर्थ उरत नाही. तेही श्रेणीतर्फे सुचवणं सोपं आहे.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
श्रेण्या देण्याला विरोधाला नहिये
माझा श्रेण्या देण्याला विरोधाला नहिये. पण कित्येक वेळेला सरळ सरळ मुद्दाम दिल्याचा भास होतो. आणि ठराविक आयडी ह्यांचे प्रतिसाद कितीही लोजीकल असले तरी देखील अवांतर, खोडसाळ दिलेले आढळतात.
मला हे कळत नाहीये की अवांतर वगैरे श्रेण्या असलेले प्रतिसाद मिटलेले का असतात. दिसू देत की प्रतिसाद आणि श्रेणी हा थोडासा सोफ्टवेअरचा प्रश्न आहे किंवा जे काय नियम ठरवलेले आहे त्याच्या प्रश्न आहे.
मला हे कळत नाहीये की अवांतर
विचारांची मुस्कटदाबी, एनीवन?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुम्ही तुमच्याकडची सेटिंग्स
तुम्ही तुमच्याकडची सेटिंग्स बदलून ते प्रतिसाद उघडे दिसतील अशी व्यवस्था करू शकता. लेखाच्या खाली, प्रतिसादांच्या वर ती बदलता येतील.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आम्ही भारतात बंदी घालू.
आम्ही भारतात बंदी घालू. तुम्ही अमेरिकेत जाऊन पुस्तक वाचू शकताच कि. असं म्हटल्यासारखं आहे.
==================
श्रेणी काहीही असो. तो प्रतिसाद दिसावा कि न दिसावा हे श्रेणीमुळे का ठरावे? मग "न दिसण्यालायक" अशी एकच ऋण श्रेणी असायला पाहिजे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
थ्रेशहोल्ड नामक प्रकरणात आपणच
थ्रेशहोल्ड नामक प्रकरणात आपणच आपल्याला काय दिसायला हवं ते ठरवू शकतो काका! असं काय करता!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
पण काकू, जे लॉगिन करत नाहीत
पण काकू, जे लॉगिन करत नाहीत त्यांचं काय? आणि लॉगिन करूनही जे तितके कष्ट करत नाहीत त्यांचं काय?
===========
असं काय करता पुढे प्रश्नचिन्ह असायला हवं होतं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
झोंबलेल्या मिरच्या पोचल्या!
झोंबलेल्या मिरच्या पोचल्या! असो. मोठे व्हा.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मोठे व्हा. या जगात.
या जगात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हो,
हो. पुरोगाम्यांच्या मते हे एकच जग असते. पुढचा मागचा कर्मविपाक नसतो. तेव्हा याच जगात मोठं व्हायचंय बर्का अज्जो
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
या जगात म्हणजे जन्म घ्या.
या जगात म्हणजे जन्म घ्या. मोठे व्हायचा प्रश्न नंतर येतो. भाषेचे दौर्बल्य!!!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सेटिंग्स
मला तसे वाटलेच होते की हा सेटिंग्स बद्दल असणार आहे. पण हाच नियम सगळीकडे सारखा का नाही? म्हणजे निगेटिव्ह श्रेणी असेल तर प्रतिसाद दिसण्याची जबाबदारी माझ्यावर का? कसेही असले तरी ते दिसलेच पाहिजेल हे खरे म्हणजे मूळ सेटिंग्स असायला पाहिजेल
कसेही असले तरी ते दिसलेच
एक्झॅक्टली. इतर वाचकांना जे भडकाऊ वाटले ते नविन वाचकांनी वाचू नये, टाळावे म्हणजे काय? वाचकांना भडकाऊ म्हणू देत पण ते लेखन संस्थळ का लपवत आहे? भडकाऊ म्हणून लपवलेल्या लेखनाकडे पाहण्याची नॉन्-बायस्ड वाचकाची काय नजर असेल?*
----------------
* इथे असा प्रश्नच येत नसावा का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्रतिसाद उडवत नै म्हणजे लै
प्रतिसाद उडवत नै म्हणजे लै भारी असा समज आहे त्याला इलाज काय ओ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आणि म्हणे
आणि म्हणे अभिव्यक्तिस्वातंत्र्यवादी.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
एवढ्या मार्मिक प्रतिक्रियेला
एवढ्या मार्मिक प्रतिक्रियेला निर्र्थक ठरवल्याबद्दल ह्या लोकांचा निषेध.
३ शब्दांत लेखकाने किती कमाल केलीये. नासीरसारख्या कसलेल्या अभिनेत्याने एखादा पॉज घेऊन .. पुढलं वाक्य म्हणावं , तशा पद्धतीने ही प्रतिक्रिया वाचून पहा, मग त्यातली गंमत कळेल.
असो. सगळंच उलगडून सांगायचं असेल तर मजा काय राहिली.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
(No subject)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आहेच मुळी भारी.
उडवला नसला की ज्याला खुजली असेल तो उघडून पहातोच की नक्की का दाबला गेला प्रतिसाद ते. मॉडरेशनचे काम क्राऊडसोर्स होते अशाने.
पण उडवावेत. नुस्ते प्रतिसाद नै, आयड्याही उडवाव्यात असे माझे स्पष्ट मत आहे.
"स्वतंत्र" अभिव्यक्ती करण्यासाठी आपला स्वतंत्र पेपर काढावा अन तितके वाचक मिळवावे, असे उद्योग गेल्या पिढीतले लोक करीत. घरं, बायकोचे दागिने विकून्बिकून पत्रकार झालेले अनेक पुरोगामी मला ठाऊक आहेत. (एकही प्रतिगामी संघिष्ट असे करताना पाहिला नाहिये, रच्याकने.)
आपल्या पिढीत १२-१५शे रुपडक्यांत डोमेन नेम घेऊन, किंवा अनेक फुकट बुलेटीण बोर्डांवर संस्थळ काढायची सोय आहेच की.
तेव्हा, हितंच येऊण "अभिव्यक्ती" करीन, आन तुम्ही मी "केलेली अभिव्यक्ती" बघाच. इतरांना आवडली नाही म्हणून दाबली गेली, तर व्यवस्थापनाने माझी अभिव्यक्ती उघडून दाखवा, असला आग्रह कामून भो?
आपण आपला "स्वतंत्र" बाण्याचा पेपर उर्फ संस्थळ काढून त्यावर हवं ते तांडव, थयथय वा थुईथुई नृत्य करा की! नाही कोण म्हणतंय?
संदर्भः
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
थयथयाट बाकी छान आहे.
थयथयाट बाकी छान आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे संघद्वेष्ट्या
इथे संघाचा संबंध काय? १६ मे पासून ताळ सुटलाय का? का ती कुमार केतकराची जीवनपद्धती आपलीशी वाटतेय? दुपारी वाटीभर तुप खाउन संध्याकाळी शेजारच्या बामनाचे जिवितकार्य संघाच्या नावाने खपवायचे? तुम्हाला काय संघ वार्यावर पडलाय असं वाटतंय का कि कोणीही थिट्या आडकित्त्यानं यावं आणि कातरायचा प्रयत्न करावा?
कधी देशाच्या आदिवासी भागात गेलाय का? ईशान्य भारतात एखादी चक्कर? तुमच्या पश्चिम भारतातल्या सुरक्षित शहरातल्या क्लिनिकमधे येऊन आपल्या सेवाकार्याबद्दल गायची परंपरा संघात नाही. माझे स्वतःचे कितीतरी पाहुणे संघासाठी जीवन वेचून राहिलेत. एकही फायदा न घेता. आज केंद्रात त्यांचं पुरस्कृत सरकार आलेलं असताना देखिल!!!
१९९३ ला लातूरचाच असल्याने भूकंप पाहिला. कोण पुरोगामी आला होता तिथे? अख्खी संघाची पलटन दाखल झालेली. त्यांनी "कोणताही भेदभाव न करता" सेवा केल्याचं मी स्वतः पाहिलं आहे. भारतीय लष्करानंतर लोकांत तेच सर्वात प्रिय होते. पेपर काढून मेंदूची खाज भागत असेल, देशसेवा होत नाही.
----------
तुम्ही संघाचा तात्विक, राजकीय, वैचारिक, इ इ विरोध करायला काही हरकत नाही. पुणे परिसर अलिकडे ब्रह्मसत्तेचा इतिहास असलेला भारतातला अपवादात्मक परिसर आहे. तिथे उजव्या बाजूचा वैचारिक कडवटपणा दिसणे नि म्हणून तिकडच्या रॅशनल माणसाला त्याची तिडिक असणे हे एका मर्यादेपर्यंत समजले जाऊ शकते. पण तो विचार देशपातळीवर लावू नका.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
थयथयाट बघून करमणूक झाली.
थयथयाट बघून करमणूक झाली.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
समलैंगिकांच्या परेडमधला तुमचा
समलैंगिकांच्या परेडमधला तुमचा घटनाबाह्य थयथयाट बघूनही आमचीही करमणूक झाली होती. तिची परतफेड.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजो, संघाच्या सामाजिक
अजो, संघाच्या सामाजिक कार्याविषयीच्या तुमच्या वाक्यांमधे तथ्य आहे. निस्वार्थी आणि प्रामाणिक मदत करायला ते पुढे आल्याची उदाहरणं तुम्ही दिलीत ती नक्कीच दखल घेण्यासारखी आहेत. त्यांची अनेक मते / गोष्टी पटत नसल्या तरी त्यांचे सर्वच कार्य शून्यवत समजणंही चूकच.
या बाबतीत मला या सर्व गोष्टी विहिंप करत असते असं वाटत होतं. आदिवासींमधे कार्य, दहशतवाद्यांनी बळी घेतलेल्यांच्या अनाथ मुलांचं शिक्षण वगैरे अशी उदाहरणं प्रत्यक्ष पाहिली आहेत आणि हिंदू या शब्दाकडे लक्ष न देता त्यांना मदतही केली आहे. कारण ते खरोखर एक पैशाचा अपहार न करता मदत पोचती करताहेत असं दिसलं म्हणून.
सर्व एकच परिवार आहे हे माहीत असूनही संघ आणि विहिंप हे कामकाजाच्या पद्धतीबाबत वेगवेगळे आहेत असं मी मानत होतो. संघाची ही कामं माहीत नव्हती.
संपूर्ण १००% हिंदू लोकसंख्या करु वगैरे टाईपची विधानं न केल्यास बाकी कार्य चांगलंच आहे. नुकतेच सरसंघचालकांनी विविधतेला जपणं याला महत्व दिल्याने आनंदच झाला.
संघाचा राजकीय, तात्विक, इ इ
संघाचा राजकीय, तात्विक, इ इ विरोध करणारांबद्दल माझं काही मत नाही. (विरोधी मुद्दा खूप नीट मांडला तर मी तिकडे भरकटत जातो.)
---------------
ऐसीच्या फोरमवर* प्रांजळपणा दाखवू शकल्याबद्दल अभिनंदन.
======================
संस्थळकारांना स्वतःला प्रांजळपणा दाबून धरणे अभिप्रेत आहे असे नाही. पण आडकित्ता, मेघना यांच्यासारख्या आयडींमुळे संघाबद्दल चांगलं बोलणं, मग ते खरं का असेना, इतर आयडींना अवघड जात असावं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
संघाचा राजकीय, तात्विक, इ इ
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
भूकंपाच्या वस्तूस्थितीबद्दल.
लातूरच्या भूकंपात मी स्वतः मेडीकल टीम नेऊन मदत कार्य केले होते, तसेच गुजरातेतही. ट्रकभरून औषधे नेली होती. दोन्ही ठिकाणी. वरती मला पुरोगामी असल्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहेच तुम्ही.
बाकीच्या डिंग्या काही सांगू नका. मदत म्हणून आलेल्या इंपोर्टेड ब्ल्यांकेट तंबू ढापणारे देखिल पाहिलेत, पण ते असोच.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
ट्रकभरून औषधे नेली होती. बरेच
बरेच लुटत असावात पेशंट्सना.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
इथे आडकित्ता सांङताहेत की ते
इथे आडकित्ता सांङताहेत की ते "मदत कार्य" करायला गेले होते. तरी त्यांच्यावर 'बरेच लुटत असावात पेशंट्सना' वगैरे विनाकारण आरोप करून त्यांना उचकावू पाहणे हे ट्रोलिंग नाही तर काय आहे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सहमत. ट्रकभरुन औषधे नेणे =
सहमत. ट्रकभरुन औषधे नेणे = इतर पेशंटना लुटणे असा निष्कर्ष कसा काढता येईल? उगीच आकसाने म्हटल्यासारखे वाटले. वैद्यकीय व्यवसाय उत्तम एथिक्सने करुन उत्तम पैसा कमावणारे लोक असूच शकत नाहीत? मी तर अगदी घरात नात्यात उदाहरणं पाहिली आहेत.
तेव्हा स्वकमाईतून पदरमोड करुन कोणी ट्रकभर मदत घेऊन आपद्ग्रस्त भागात गेलं तर लूटच असं होत नाही. जो एकीकडे रोज सामान्य पेशंटना लुटतो त्याची इतर कुठेतरी गरज नसताना ट्रकभर मदत घेऊन जाण्याची नीयत असेल का ?
एकीकडे रोज सामान्य पेशंटना
एकीकडे रोज सामान्य पेशंटना लुटतो त्याची इतर कुठेतरी गरज नसताना ट्रकभर मदत घेऊन जाण्याची नीयत असेल का ?
आनंद पिक्चर मधला रमेश देव आठवला.
अय्यो रामा... माझ्या या
अय्यो रामा... माझ्या या प्रतिसादाला खोडसाळ श्रेणी ?
मन आक्रंदून उठलंय.. का .. ? का ? का अशी श्रेणी..?
उद्विग्नतेचा कडेलोट झालाय.. का ? का का अशी श्रेणी ..?
सदसदविवेकबुद्धीला स्मरुन सांगा तुमच्या... मायभूची आन हाय तुम्हाला.. का का का ??
शांत व्हा तुम्हाला मार्मिक
शांत व्हा तुम्हाला मार्मिक दिली आहे मी. आणि अजोंना भडकाऊ.
मी भडकाऊ..!! वॉव.. आखिरकार
मी भडकाऊ..!!
वॉव.. आखिरकार इतने साल बाद जम्या... !!
हुश्श.. अब मैं आंखे मिटनेको मोकळा.
या बाबतीत गप्प बसणं अयोग्य
या बाबतीत गप्प बसणं अयोग्य वाटतं म्हणून प्रतिसाद.
मदतकार्य करणाऱ्या लोकांवरच उलटे आरोप करणं खोडसाळपणा सोडून इतर काहीही नाही. या प्रकार, प्रवृत्तीचा निषेध.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हाच तर्क लावून संघ एवढी मदत
हाच तर्क लावून संघ एवढी मदत करतो (तुमचाच दावा) म्हणजे संघ किती लोकांना लुटत असेल ते स्पष्टच आहे.
अगदी हाच हलकटपणा आडकित्ताने
अगदी हाच हलकटपणा आडकित्ताने संघाबाबत केला तेव्हा....
----------
असो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
'बरेच लुटत असावात
याला अकारण उचकावणाऱ्या ट्रोलिंगशिवाय दुसरं काहीही म्हणता येत नाही, विशेषतः आडकित्तांनी आपल्या चांगल्या कामाविषयी सांगितलेलं असताना. समजा त्यांची संघाच्या मदतकार्याबद्दलची माहिती चुकीची किंवा अपुरी असली तरीही ऐसीवर सदस्यांनी एकमेकांवर असे आरोप करणं शोभत नाही. मी या वक्तव्याचा निषेध करतो.
रियल ट्रोलिंग
आडकित्ता लातूरला आला होता का याबद्दल मला सिरियस डाउट आहे. संघाचे लोक गेले नाहीत असं एकही गाव नव्हतं. या बाबाला एकही माणूस दिसू नये म्हणजे याने हेलिकॉप्टरमधून पाहणी केली असणार.
The following is a report on earthquake and relief efforts by
Rashtriya Swayamsevak Sangh - Janakalyan Samiti (Maharashtra Prant)
Office: 309, Shanivar Peth, Motibaug, Pune - 411030, Ph: (091)0212-450 883
__________________________________________________________________________
Rashtriya Swayamsevak Sangh - the organization working for the national
rejunevation since 1925 - has been following the motto of "Selfless Serivce is the Medium" right from its inception. For the last years its emphasis on social
service is noteworthy. In order to alleviate the suffering of the distressed
people due to severe drought during 1972-73 in the state of Maharshtra,
a separate wing was established for the exclusive purpose of giving multi-fold
help for the needy people, affected by the drought. Under the name of
'JANAKALYAN SAMITI' (Maharashtra), it has been working since then, on a permanent basis.
In the past, whenever natural diasters or calamities had struck blows, the
devoted workers of the 'Janakalyan Samiti' had rushed immediately to the
troubled areas - be it coastal land in Andhra Pradesh affected by unprecedented
cyclone or be it Morvi village (Gujarat) suffered by the breakage of nearby
Machen Dam. Similarly, necessary help was sent to earthquake hit people of
Uttarkashi (UP). In case of the displaced families of Kashmiri Pandits, fleeing
due to the atrocious attitude of the pro-Pak militants and the apathy of the
state and central authorities, all possible help was rendered for their
ad-hoc rehabilitation in and around Bomabay. For the exemplary service, the
Janakalyan Samiti has been praised by one and all.
Now it is trying its level best to meet the urgent needs of thousands of
earthquake stricken people in Maharashtra.
One doesn't understand as to why this should be the fate of human beings. The
dance of death and distruction at Killari and surrounding villages defies
description. The crumbled houses, shattered hopes, death of near and dear
ones, cries of anguish. Even stones will be moved to tears. You can grasp
the magnitude of the calamity by perusing some of the details given here
under.
On 30/09/93 at 3-5 AM there was an earthquake of 6.5 Richter Scale followed
by 3 consecutive aftershocks.
1) Total Calamity victim villages
* Tal. Ausa (Dist. Latur) : 42 villages
* Tal. Nilanga (Dist. Latur) : 10 Villages
* Tal. Omerga (Dist. Osmanabad) : 61 villages
* Total : 113 villages
* Totally damaged villages : 24
* Partially damaged villages : 56
* Partially damaged but no death : 33 villages
* Total deaths : about 34000
* Total families affected : about 38000
* Total Economic loss : about 800 crores
* Total Number injured : about 5465
The Janakalyan Samiti has strong base in Latur. Vivekananda Medical Foundation
and Research Center has been on the forefront in rendering the yeoman service
throughout the region. That is why, the workers of samiti could rush to the
troubled spots within two hours and they were able to provide urgent medical
help and allied services.
Within two hours after the calamity the medical & other relief work was
started at three villages by Vivekananda Medical Foundation & Research Center.
About 200 patients were immediately admitted to the hospital and about 400
patients were treated as OPD patients in the adjacent school (Rajasthani
School) by providing shelter and food. About 40 operations were performed
within first two days. Out of the 200 patients, 86 required major surgery
and hospitalization for 2 to 6 months.
Daily about 10 doctors are visiting seven villages with two ambulances &
treating about 100 to 150 patients at the site. Other relief work like
providing food, shelter and day-to-day requirements is done with cooperation
of some of the local voluntary organizations and others.
In the last few days, the Janakalyan Samiti has been striving hard to provide
relief in cash as well as in kind for the needy people in some of the villages.
The proposed task of rehabilitation is enormous in size as well as in monetary
terms. A brief resume of the work done and the minimum needs is given here
under:-
1. Health centers and orthopaedic rehabilitation at about seven centers in Ausa.
2. Free medical treatment & investigations required for the patients
admit in other hospitals like C.T. scanning, Major operative treatment,
Dialysis etc.
3. Complete rehabilitation with respect of housing, professionals, physical
mental etc. The village will comprise of 200 to 300 houses, 2 to 3
borewells, one school, sanitory blocks & other facilities like post
office, credit society, gram panchayat, cost of which will be about
2.5 crores.
Swayamsevaks:
* From states other than Maharashtra : about 1000
* From Maharashtra : 4000
* From Latur & Osmanabad : 1100
Relief Work Done:
* About 550 persons were removed alive from the debris.
* About 3055 dead bodies were removed and were creamated.
* Food provided for about 2150 patients and relatives at Solapur civil hospital,
Vivekanand Hospital and Ausa Rural hosptial upto 06/10/93 every day.
* At about 14 villages - medical help has been provided through mobile van
and still continued.
* At Vivekanand hospital about 200 inpatients treated and about 40 major
operations were done in the first two days.
* About 400 patients treated on OPD basis by providing shelter and food at
Rajasthan highschool.
* The major operations will be continued for about 2-3 months at Vivekananda
Hospital, Latur.
* Immediate medical and other relief work started at 3 villages by Vivekanand
hospital, Latur within 2 hours.
Villages Sanctioned by the Government for relief work:
* Tal. Ausa : Mangrul, Sirsal, Gubal, Limbala, Nandurga, Banegaon, Talani
* Tal. Omerga: Sastoor, Tavashi-Gad, Udatpur, Kaludev Limbala.
* Permanent centers have been established at these villages and daily 50-100
swayamsevaks have worked at these centers. For above villages 6000 food
packets are provided daily.
Work Methodology:
* Ration cards are given to the families of the above mentioned villages and
clothes, utensils, seeds and other daily needs are met. With the help of
excavator roads were cleared and debris were removed to findout the dead bodies.
* 6000 kgs. seeds were supplied to the farmers.
* Schools have been restarted under the trees and temperoary shelters by
providing books and other school materials to about 1500 students.
* total survey of all above villages has been completed from Rehabilitaiton
point of view.
Special Events:
* Latur District BJP president Dr. Gopalrao Patil removed about 500 alive
persons with the help of other injured and affected people at village
Kawatha Tal. Omerga.
* Senior Army officials praised the work and informed the work done by
Swayamsevaks to Hon. Speaker of Lok Sabha Shri Shivraj Patil when he visited
Mangrul village Tal. Ausa.
* Hon. Speaker of Lok Sabha, Sri Shivraj Patil tasted the food and appreciated
at Nandurga village .
* 15 days' baby saved and brought to the hospital as well as 122 years old
lady was found and brought to hospital.
* About 1.5 kg Gold ornaments found at Tavashi-Gada village under the debris
were returned to the owner by our Swayamsevaks.
* Food was provided to the Police force, Military force, Doctors and Nurses
working under the Govt. administration for whom no provision was made.
* Good discipline mainatained at centers while providing the relief.
* Sweets and clothes were offered (refer: Times of India (october 26 , 1993))
to about 20,000 affected families on the sacred day of VIJAYA DASHAMI (DASARA)
PROMINENT PERSONALITIES VISITED THE CENTERS
* Manyashri H.V.Sehadriji - Sar Karyavaha (RSS)
* Hon. Advaniji - BJP President
* Hon. Atalji - Opposition Leader of Lok Sabha
* Hon. Mallikarjunayya - Dy Speaker of Lok Sabha
* Hon. Uma Bharathi - MP
* Acharya Giriraj Kishore - Karyavaha Vishwa Hindu Parishad
Future Plans:
Government allotted one (1) village for total rehabilitation. The village
will comprise:
* 200-250 houses * 1 Samaj Mandir
* 2 borewells * Sanitory blocks
* 1 school * 1 dispensary
* Reconstruction of destroyed temples.
* Rehabilitation of needy students
* Rehabilitation of orphans.
Cost of the Construction is projected to be about 2.5 crore per village.
It is proposed to erect Bharat Mata Mandir in 15-20 another earthquake
affected villages where facilities for Balwadi (Junior KG), Library, Medical
center, Bhajani Mandal etc. will be provided. Estimated cost for construction
of such buildings is around 2.5 crores.
Donate generously in the name of :
1) RSS Janakalyan Samiti, Pune (Maharashtra)
Regd. No. M.A.H. 805- Pune,, Date 9-2-1973 (Under Societies Regn. Act)
2) Vivekanand Medical Foundation & Reserach Center, Latur
Phone : 91-02382-3512, 3513
for
Dr. Ashok Kukade
(President, RSS Janakalyan Samiti,
Maharashtra Prant, Surgeon at
Vivekanand Medical Foundation, Latur)
इथे अगोदरच सगळे लोक संघद्वेष्टे आहेत. त्यात हा आडकित्ता रेटून खोटे बोलतोय. ते ही समोर लातूरकर असताना. संघाची अशी बदनामी करण्यासाठी सभ्यता सोडून त्याला चापला पाहिजे असे माझे मत आहे. आडकित्त्याची वर लिहायची पद्धत सजेस्ट करून गेली कि चोरीने स्वेटर घालणारा तो माणूस संघाचा होता. असा भ्रम माजवण्यासाठी पण कडक भाषा गरजेची आहे.
-------------------------------------------
एकतर संघाचे विचार ऐसीवरच्या पुरोगामी लोकांना आवडत नाहीत. वर संघाच्या कार्याबद्दल लोकांत आकस, संभ्रम, नावड निर्माण करणे खोडसाळपणाचे आहे. त्याचा योग्य तो समाचार घेतला पाहिजे. आणि मी स्वतः याला साक्ष होतो हे मुख्य कारण आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
संघकार्याचा उल्लेख/चांगला
संघकार्याचा उल्लेख/चांगला उल्लेख न केल्याने आडकित्ता जर लातुरास आला नसेल तर मॉडर्न टेक्नॉलॉजीचाही चांगला उल्लेख न करणारे तुम्हीही या ग्रहावर रहात नाही असेच म्हटले पाहिजे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रतिगामी संघिस्ट कुठेही
प्रतिगामी संघिस्ट कुठेही मदतीला जातात का असं त्यांनी विचारलंय ते वाचा अगोदर.
-----------
ते जर आज असे म्हणत आहेत आणि लातुरला भूकंपाच्या वेळी गेलो होतो असे म्हणत आहेत आणि काही लोकांनी ब्लँकेट चोरायला मात्र आले असेही म्हणत आहेत तर त्यांची खबर घेणं आवश्यक आहे. आमचे बाप भूकंपात मरता मरता वाचले. सगळ्यात पहिल्यांदा संघाचे लोक पोहोचले होते तिथे. आडकित्ता लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन संघाची बदनामी करू शकत नाही. ऐसीवर त्याला टाळ्या मिळतील पण मी सतत विरोध करेन.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पण मला एक कळत नाही की
पण मला एक कळत नाही की अडकित्ता ह्यांनी संघाचा उल्लेख केलाच नाहीये त्यांच्या प्रतिसादांतून (माझ्या नजरेतून तसा त्यांचा प्रतिसाद सुटला असेल तर क्षमस्व).
आणि अडकित्ता म्हणाले काय नी मी काय नी अजून कोणी काय, असं काही पसरवल्याने हे कस, संभ्रम, नावड निर्माण होणार आहे का खरंच? जसं तुम्ही म्हणताहात की इथे सगळे पुरोगामी आहेत, तर मग अर्थात लोक चाचपून-पडताळून मगच एखाद्या गोष्टी बद्दल आपलं मत व्यक्त करतील ना, कोण कशाला एकाच्या सांगण्यावरून असे मतं करेल लगेच? त्यामुळे तुमची चिडचिड थांबवा!
बाकी
आपण सगळ्यांनी अता ह्यावर वाच्यता थांबवू या, विनंती( कळकळीची).
अडकित्ता ह्यांनी संघाचा
एकतरी संघिष्ट प्रतिगामी देशसेवेला गेलाय का असे त्यांनी विचारले आहे. वरचे प्रतिसाद पुन्हा पाहा. त्याला मी उत्तर दिले आहे. त्यांचे लातूर प्रकरण मला माहित नव्हते म्हणून मी इतकं सिरिअस घेतलं नाही. पण हा नालायक चक्क लातूरबद्दल बोलू लागला तेव्हा हा किती खोटं बोलतोय याची कल्पना आली.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
इथेही मार्मिक? सुधरा.
इथेही मार्मिक? सुधरा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
माझे वडील औसा तालुक्यात
माझे वडील औसा तालुक्यात (किल्लारी या भूकंपाच्या केंद्रापासून जवळ) १००% घरे पडलेल्या ४ गावांचे ग्रामसेवक होते. आडकित्ता तिथले संघाचे काम नाकारतोय म्हणजे ...
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मग हाच विदाबिंदू अगोदर दिला
मग हाच विदाबिंदू अगोदर दिला असता तर काय आभाळ कोसळले असते?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आडकित्ता "फक्त पुरोगामी लोक
आडकित्ता "फक्त पुरोगामी लोक मदत करतात" हे सिद्ध करताहेत. ते स्वतः पुरोगामी आहेत. ट्रकभर औषधांचं श्रेय स्वतःकडे घेताहेत. ते ज्याने पाठवलं, पैसे दिले ते वेगळे असले तर "त्याचेही" आर्थिक श्रेय स्वतःकडे का घ्यावे? आणि ते सरकारी डॉक्टर म्हणून गेले असले "तर" स्वतःच्या मदतीचे श्रेय का घ्यावे? हा माणूस दांभिक पुरोगामी वाटतोय*.
---------------
* आहे म्हणालो नाही. म्हणायची इच्छा होतेय असे म्हणतोय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अगदी अगदी. या ठिकाणी ऋषिकेशशी
अगदी अगदी. या ठिकाणी ऋषिकेशशी सहमत आहे. हे फालतूचे ट्रोलिंग आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
+१
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मी नेहमी आडकित्ता यांना अतिशय
मी नेहमी आडकित्ता यांना अतिशय आदराने लिहित असतो ते वरचेवर आपली पातळी सोडत असतात. I wished I would contain his nuisance.
=======
बादवे - आडकित्ता यांनी मला अकारण थेट "नीच" म्हटले होते तेव्हा आपण सगळे कुठे होतात? एका डॉक्टर कडून ती शेवटची अपेक्षा होती.
===============
शिवाय इथे देखिल -
A truckful of medicines do not cost less. If one could afford this in the early career, one must have made unreasonable money. And if unreasonable money was not made, and medicines were sent on behalf of someone, he should not steal the credit. But his wording conveys otherwise.
=============
काही लोक किंवा काही विचार आपल्याला आवडत नाहीत म्हणून नेहमी त्यांच्या उपमर्द करू नये. सभ्य टिका करावी. आडकित्ता यांचा माझ्यासोबतच्या संवादाचा इतिहास फार बेकार आहे. मी जितका जास्त गप्प बसतो तितके ते जास्त चढतात. त्यांना वाटतं कि मीच तेवढा सात्विक (केजरीवाल) आणि कोणाला काहीही लिहू शकतो. लोकांचं तेच करण्याचं सामर्थ्य काय आहे याची एक झलक जाणवून द्यायला काय हरकत आहे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
इफ आय रिमेम्बर राईट, आडकित्ता
इफ आय रिमेम्बर राईट, आडकित्ता यांनी "अजोंचा नीच शब्दांत निषेध करण्याची इच्छा होत आहे" असे विधान केले होते. डायरेक्ट नीच म्हटले असल्यास तसा प्रतिसाद दाखवावा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मी तरी कुठं डायरेक्ट लुटेरा
मी तरी कुठं डायरेक्ट लुटेरा म्हटलं आहे? "असावात" असं म्हटलं आहे. म्हणजे "आडकित्ता यांचा लुटेरा शब्दाने निषेध करण्याची इच्छा होत आहे."
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बाकीच्या डिंग्या काही सांगू
सरकारी मदत स्वतःची म्हणत तू डींग्या टाकू नकोस.
सगळ्या पुरोगाम्यांची घरे चेक केली पाहिजेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तर व्यवस्थापनाने माझी
तुमच्या शॉर्ट सर्किट डोक्यात मुद्दा घुसणार नाही पण तरीही ...
एकतर ही काही मागणी, इ इ नाही. एक विचार आहे. बहुसंख्य आयडींची एक तात्विक अलाईनमेंट असली तर त्यांनी पाहिलेल्या परिप्रेक्ष्याने प्रत्येक नववाचक लिखाणाकडे तसे पाहतो. "अरुणजोशी विषय१ श्रेणी खोडसाळ -२" इथपर ठिक आहे. पण हे आहे काय ते डिफॉल्ट वाचकासाठी त्रागाच आहे, जास्तीचे कष्ट आहे, इ इ म्हणून प्रतिसाद दाबणे इष्त नाही. अगदी अलाइनड लोकांना देखिल विरोधी विचार काय आहेत यात रस असू शकतो.
ही केवळ तांत्रिक सुचना आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
माझ्या वतीने एक निव्वळ
माझ्या वतीने एक निव्वळ तांत्रिक सूचना सांगू का?
इथे कुठलाही धागा उघडला, की 'लिमिट टेस्टींग' साठीचे तेच तेच किच्च साद प्रतिसाद, स्पेसिफिकली तुमचे, लै बोअर होतात बघा. जरा ते सगळं पांढर्या शाईत लिहायचं बघणार का?
धन्यवाद!
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
जरा ते सगळं पांढर्या शाईत
ह्याला अश्लिल श्रेणी का मिळु नये.
अजून एक निव्वळ तांत्रिक
अजून एक निव्वळ तांत्रिक सूचना:
वैचारिक विरोध करताना पातळी सोडू नकात. भाषा सभ्य वापरा. प्रतिगामी विचारांचे विरोधक तुमच्या बाजूने आहेत म्हणून तुम्ही काहीही म्हणून नामानिराळे व्हाल अशा भ्रमात राहू नकात. मी एकटा तुम्हाला हाताळायला पुरे आहे. तुमचं भाषासामर्थ्य आणि ज्ञानसामर्थ्य नक्की किती आहे आणि जगाला ते किती उपयोगाचं आहे ते स्वतःपाशी ठेवा.
----------------
मी कुठे काय लिहावं हा माझा प्रेरोगेटीव आहे. त्यात लूडबूड नको.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ठ्ठो
ठ्ठो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
(एकही प्रतिगामी संघिष्ट असे
In the light of new information, this needs to be answered in a different way now. लातुरला भूकंपात गेलेले तेव्हा ड्र्ग्जच्या नशेत होतात का? तुम्हाला एकही संघिष्ट दिसला नाही? डोळ्याचेच डॉक्टर ना?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
डबल झाला एकच प्रतिसाद
.
श्रेयक्लेमर
या वेळची 'मार्मिक' मी दिली, बरे का!
(विशेष काही नाही, असेच आपले सहज. उगाच गंमत म्हणून.)
सौ चूहे खाके ... च्या
सौ चूहे खाके ... च्या धर्तीवरचा प्रतिसाद आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कोणताही विदा न देता,
कोणताही विदा न देता, कार्यकारणभाव न सांगता घासकडवींनी धर्माबद्दल नको नको ते लिहिलं आहे. मी तशी अवतरणे दिली आहेत. आणि भडकाऊ मी? पुरोगामी असहिष्णुता?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अस्वलभौ, या प्रतिसादाकडेही
अस्वलभौ, या प्रतिसादाकडेही लक्ष वेधतो. यात कोणाचा भास होतोय हो! नासीर नक्की नै!
यात एका दीर्घ पल्ल्याच्या ऐतिहासिक बेअरिंच्या ड्वायलॉगचंही बीज आहे नै?
बट यस! काय नजाकत है! मान गये!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हो हो!
जमतंय हो जमतंय! असंच रसग्रहण करत रहा. सवाल एक जवाब दो. सवाल जवाब सवाल जवाब.. चूप.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
थोडक्यात
थोडक्यात अरूणजोशींशी एकदा का होईना पण असहमत झालेले सगळेच पुरोगामी तर. (अन च्यायला आम्ही नेहमीच असहमत असतो तरी अप्रामाणिक!)
-Nile
यातले सगळे आमच्याशी योग्य
यातले सगळे आमच्याशी योग्य तिथे सहमती राखतात. पुढचं लिहायची गरज आहे?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
म्हणजे?
याचा अर्थ, जिथे त्या सगळ्यांची तुमच्याशी असहमती असते तिथे ती तुम्हाला अपेक्षितच असते. म्हणजेच तुम्ही जाणूबूजून जे इतरांना चुकीचं वाटेल असं लिहता असा अर्थ घ्यायचा का? नाही तुमची भाषा लैच दुबळी आहे म्हणून सपष्टच विचारावं म्हणलं.
-Nile
मी तुम्हाला गुलाबजामुन खा
मी तुम्हाला गुलाबजामुन खा म्हणालो आणि तुम्ही मला आवडत नाही असे म्हणालात तर ती योग्य तिथे असहमती असते आणि ती मला अगोदरपासूनच अपेक्षित असते असे नाही. शिवाय मी जाणूनबाजून तुम्ही असहमत व्हाल असे मत मांडतोय असेही होत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरे अरे अरे!
किती वाईट ते भाषेचे आकलन!
याला असहमती म्हणत नाहीत हो. उगाच काहीतरी उदाहरणं देऊन आपली आधीची चूक झाकण्याच्या नादात अनेक चुकांना उघड्यावर तर पाडत नाही आहात ना? बाकी तुमचे एकंदरीत भाषेचे दौर्बल्य पाहता तुमच्या निरर्थक (अन तुम्ही म्हणाल न-निरर्थक, ही झाली असहमती) वाद घालायच्या सवयीचे फार कौतुक वाटते. असो, चालू द्या. नाही म्हणजे, तुम्ही थोडीच थांबणार आहात?
-Nile
मस्त लिस्ट!
सुपर्ब! या लिस्टमधे बॅटमॅन आणि अदिती एकाच लिस्टवर आहेत हे बरं आहे आता याच लिस्टवर नगरीनिरंजन यांचंपण नाव घालून टाका म्हणजे ते आणि गब्बरसिंग एकाच लिस्टवर आलेली पाहून मी डोळे मिटायला मोकळी! अरे हो पण व्याख्या त्यांनीच दिलीय नाही का, म्हणजे ते पुरोगामी असल्याचं असं सहजासहजी कबूल नाहीत करणार.
आता लिस्ट देऊन टाकलीयत तर हे पण सांगून टाका की पुरोगाम्यांनी नक्की पर्यावरण, आर्थिक धोरणे, सामाजिक समानता आणि इतर सामाजिक मुद्द्यांवर काय ऑफिशियल भूमिका घ्यायची असते ते! नुस्तं,
असं मिळमिळीत उत्तर नाही चालणार.
हेपण तुमच्यामतेच ना? मग ठीक आहे. तरी पण या क्रायटेरियावरही वरचे किती पुरोगामी आहेत पहायला हवं. पण
तुमची पद्धत आहे ते फार चांगलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या लिस्टवर थोडं काम करायला हवं हे तुम्हीही मान्य कराल. या निमित्ताने मी-प्रामाणिक आणि नाईल्या-अप्रामाणिक पुरोगामी असल्याचं माझ्या निदर्शनाला आणून दिल्याबद्दल तुमचे आभार मानते आणि आता मात्र मी या धाग्यातून सपशेल माघार घेते आणि मी स्वतःला पुरोगामीत्वापासून मुक्त करण्यासाठी ३६० डीग्री विचार करायला लागलेली आहे हे प्रांजळपणे मान्य करते.
धाग्यातून सपशेल माघार
तुम्हाला बोलावलं नव्हतं मी या धाग्यावर.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आँ????
बोलावलं नव्हतं?
इथे कोण कोणाच्या आमंत्रणावरून प्रतिसाद देतात काय?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मेटा?
ह्या तिन्ही ओळी एकत्र वाचून गंमत वाटली.
-Nile
अरुण जोशींना प्रतिसाद
अरुण जोशींना प्रतिसाद देण्यावर आक्षेप नाही. निरर्थक श्रेणी देण्यावर आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अधार्मिक व्यवस्थांचे अनिष्ट
अधार्मिक व्यवस्थांचे अनिष्ट परिणाम धार्मिक व्यवस्थांपेक्षा प्रचंड प्रमाणात जास्त आहेत असा साधा हापपोथेसिस धाग्यावर मांडला आहे. सदस्यांचे परस्परसंबंध काय आहेत, कोणकोणत्या विषयांवर त्यांचे एकमत नि दुमत असते याचा काही संबंध नाही. उदा. स्त्रीवाद सोडला तर अदिती नि बॅटमन समविचारी आहेत असे मला वाटते. यात डोळे मिटण्यासारखं काही नाही.
============================
हा धागा एका विषयावर गंभीर चर्चा करण्यासाठी निर्माण करण्यात आला आहे. असंबद्ध गोष्टी लिहून वर आपणच कसा आपला बहुमूल्य वेळ दिला इ इ वाटत असेल अशा आयडींना प्रतिसाद देण्यापासून परावृत्त करणे इष्ट.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बाय द वे, रुचि यांचा
बाय द वे, रुचि यांचा प्रतिसाद, त्याची भाषा, धाग्याच्या पार्श्वभूमीवर नीटपणे वाचल्यास तो खोडसाळ आहे असे मला तरी वाटते. पण इथल्या पुरोगामी जनतेला तो मार्मिक वाटला आहे. नि त्यांना इथे असा खोडसाळपणा करायला आमंत्रण दिले नव्हते हे माझे म्हणणे खोडसाळ वाटले आहे.
================
ऐसीवरचे पुरोगामीत्व तत्त्वतः कल्याणकारी नाही असा विचार बळकट होत असतानाच ते असहिष्णू आहे हा नविन विचार बळावतो आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पण अग्रगण्य लोक घासकडवी,
अरे अदिती, मेघना... अहो घासकडवी.. अरे नाईल..ओ नवीबाजू.. ऐका.. ऐका. मी पण पुरोगामी.. आता मी तुमच्यात.. य्ये...!!!
य्य्ये! पाऽऽर्टी!
य्य्ये! पाऽऽर्टी!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
जब्राट!
लेख वाचून buzzword bingo आठवला... पण ते असो.
"नाही शब्दांची मोजणी
नसे अर्थाची टोचणी
लिहिणे गंगौघाचे पाणी.."
तेव्हा वाहू द्या.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
...
ठरल्याप्रमाणे 'भडकाऊ' दिलेली आहे.
कुंभकर्णा, जागा हो.
कुंभकर्णा, जागा हो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ह्या आणि आपला आयटम नं २ वर
ह्या
आणि
आपला आयटम नं २ वर आणि त्याच्या नं १ च्या कनेक्टवर अजून प्रतिसाद लिहिन. तो भाग शेष आहे.
म्हणत तुम्ही आधीच उत्तर द्यायची बाकी ठेवली आहेत.
तुम्हाला नक्की काय विचारायय ते नीट मांडलत तर जरुर उत्तर देईन. (हो. 'टंकाळा' आला तरी ) कारण "राजा घाबरला, माझी टोपी दिली." हे तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडणार नाही. त्यातून तुम्ही त्यात पर्यावरण आणलय. धर्म, पर्यावरण,आधुनिक जीवनशैली या वर एक धागा आणाअयचं मनात होतंच पण सध्या खरोखर वेळ नाही, म्हणून जुनेच हिशेब आधी क्लीयर करून घ्यावे म्हणते.
धर्माच्या नावाने टाहो फोडून
धर्माच्या नावाने टाहो फोडून त्या व्यवस्थेत किती अन्याय झाले ते सांगताना पुरोगामी थकत नाही. आता आधुनिक व्यवस्था आलीय. किती दिवे लावलेत या व्यवस्थेने? मागचा काळ बरा होता म्हणायची पाळी आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हा रीपोर्ट म्हणजे
हा रीपोर्ट म्हणजे वस्तूस्थितीचा काहीतरी डाटा देवुन कसा विपर्यास करता येतो ह्याचे बेस्ट उदाहरण आहे.
जे मागासलेले आणि खरे गरीब आहेत, त्या मागे तिथले लोकल राज्यपद्धती, शासन ( आणि Indirectly ती लोक )जबाबदार आहे. उदा, आफ्रीका, पाक, बान्ग्लादेश, आणि भारत. मुबलक शक्यता असुन ह्या भागातील लोकांनी गरीबी निवडली आहे. भारताला तर हे वाक्य अगदी लागू पडते. भारतात जिथे लोकशाही काम करते आहे, तिथल्या गरीबांना पण बरोबर निवड करता आली नाहीये, त्याचे खापर मार्केट इकॉनॉमी किंवा श्रीमंतावर फोडणे म्हणजे स्वताचा नाकर्तेपणा झाकणे आहे. इथले शेतकरी आत्महत्या करेल, पण तोच तोच पैसे खाणारा आमदार निवडुन देइल.
अनु राव, तुम्ही माझा ड्यु
अनु राव, तुम्ही माझा ड्यु आयडी आहात काय ???
नक्कीच नाही, मी लिंका देत
नक्कीच नाही, मी लिंका देत नाही.
आणि माझ्या प्रतिसादांना कोणी अभ्यासपूर्ण म्हणत नाही. :O
खापर श्रीमंतावर फोडलेले नाही,
खापर श्रीमंतावर फोडलेले नाही, पुरोगाम्यांवर फोडलेले आहे. श्रीमंतांनी काहीही बेकायदेशीर केलेले नाही. पण ही व्यवस्था अशी असायला पुरोगामी कारणीभूत आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
•Almost half of the world’s
ही संपत्ती जरी कागदोपत्री ह्या १ टक्यांच्या हाती असली तरी, तिचा बरासचा वापर उरलेले लोक करत आहेत.
मुकेश अंबानीचे कित्येक हजारकोटीचे घर असेलही, पण त्या घरात नोकर आणि त्यांचे कुटुंबीय मिळुन ६०० लोक रहात आहेत. त्या घराचा नक्की आणि खरा उपयोग कोणाला होतो आहे.
तसेही ह्या संपत्तीचा प्रचंड मोठा भाग शेयर्स च्या स्वरुपात आहे आणि बर्यापैकी नोशनल आहे. त्या शेयर्स च्या Book Value प्रमाणे जर संपत्ती मोजली तर ती बरीच कमी होइल.
भारतातल्या गरिबांची हाल हाल
भारतातल्या गरिबांची हाल हाल करून कत्तल केली पाहिजे असे जे मी म्हणतो ना ते .... एवढ्यासाठीच.
कॅपिटल असते, सिस्टीम असते, संधी असते, व्यवस्था असते पण वेलफेअर स्टेट चा हव्यास, व शोषणाची वृथा भीती - हे दोन महत्वाचे फॅक्टर्स असतात. गरिबांच्याकडून श्रीमंतांचे शोषण होतच नाही व फक्त श्रीमंतच शोषण करतात हा आणखी एक गैरसमज.
जब वी मेट -- शाहिद, करीना
जब वी मेट हा करीना कपूर - शाहिद कपूर ह्यांचा शिनुमा मला प्रचंडच आवडतो.
त्यात एक प्रसंग आहे. एका मुलाशी करीनाचं लग्न ठरलय, त्याची कटकट/पिडा
टाळायची म्हणून करीना सर्रळ शाहिदचे मस्त चुंबन घेते (का घेत असल्यासारखे दाखवते)
(म्हणजे त्या सांगून आलेल्या स्थळाने नकार द्यावा.)
दरम्यान ह्या प्रकारात शाहिद दचकतो. त्याची गोची होते. चाचरत चाचरत "न न नही. वैसा कुछ नही है"
म्हणत त्या भावी/संभाव्य नवर्याला काही समजावू पाहतो.
त्यावर नवर्याचं उत्तर आहे. :-
"हो सकता है तुम जैसे शहरी लोगों जितना मै खूब पढा लिखा नही हूं.
लेकिन आंखे है मेरी. देख सकता हूं और समझ भी सकता हूं."
.
.
बाकी चालु द्या.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
+१
जाम आवडलेला आहे प्रतिसाद. काटकोन त्रिकोण मधले आबा आठवले.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
आभार
उपप्रतिसाद देऊन मनोबांच्या प्रतिसादाचा अटळ 'बिंदू'गामी प्रवास रोखल्याने (आठवा: धौम्य ऋषी आणि आरुणी, बांध इ.) अस्वल यांच्या प्रतिसादास मार्मिक अशी श्रेणी देण्यात येत आहे
मार्मिक
केवळ श्रेणी देण्यासाठी लॉग इन केले.
वाव्वा वाव्वा
आमच्या मालकाच्या गोठ्यात आम्ही रहातो
म्हणुन घर आमचच म्हणता
कम्युनिस्ट अनुतैला मठ्ठ बैलाचा पापा
कष्टकर्यांचा विजय असो!
लाल बावटा बैलांचा
अनुताई आम्च्या लाडाच्या
मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.
स्वतः मुकेश अंबानी त्या घरात
स्वतः मुकेश अंबानी त्या घरात रहात नाही असही ऐकलय. कोणा ज्योतिषाच्या सल्ल्यामुळे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
घर बांधण्याअगोदर
घर बांधण्याअगोदर ज्योतिषाचा सल्ला घेतला नव्हता काय ? की घर बांधताना गणपतीचा मारुती झाला ?
नंतर ग्रह फिरले असावेत.
नंतर ग्रह फिरले असावेत.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
डाव्या शेपटीचा मारुती बहुधा
डाव्या शेपटीचा मारुती बहुधा कोपला असावा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
साधारण असेच मत
साधारण असेच मत मी काही दिवसांपूर्वी स्कॉट अॅडम्स (डिल्बर्ट.कॉम) यांच्या ब्लॉगवर वाचले होते. त्यांच्या मते आता जे लोक श्रीमंत आहेत त्यांना पैशाची फारशी गरज नसल्याने त्यांनाच पैसे मिळत राहावेत म्हणजे बिल गेट्स, वॉरन बफे, अझीम प्रेमजीप्रमाणे ते दानधर्म करु शकतात. याऊलट ज्यांना पैशाची गरज आहे (उदा. मध्यमवर्गीय) त्यांना पैसे मिळाल्यास ते गरीबांपर्यंत पोचणार नाहीत.
ब्लॉगपोस्टचा दुवा सापडत नाही. त्यामुळे चू.भू.दे.घे.
ही संपत्ती जरी कागदोपत्री
हे विधान अतर्क्य विनोदी श्रेणीतले आहे. क्ष च्या संपत्तीचा वापर करायला य ला मूल्य द्यावे लागते. I mean unless y is relative or family member of x. हे उरलेले लोक तिथे जे काय करतात त्याने १% लोकांची संपत्ती अजूनच वाढते. While there is a proper economic transaction for a consideration between 1% rich and the people using their wealth, you are stating things as if there is free donation by the rich.
===================
हे पुन्हा भलतंच काहीतरी. Are shares actually sold at book value? Book value has no value.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हा जो रिपोर्ट आहे त्यात
हा जो रिपोर्ट आहे त्यात दर्शवल्या नुसार ज्या देशात आर्थिक असमानता निर्माण झालेली आहे त्यातील जवळपास सगळ्या देशांत प्रजातंत्र आहे.
१) आर्थिक असमानता ही समस्या आहे असे मानले तर प्रजातांत्रिक सरकारनेच ही समस्या निर्माण केलेली नाहीच असे म्हणता येईल ? या समस्येचे जनक सरकारच का व कसे नाही ?
२) उपाययोजना करायची झाल्यास काय करायची व कोणी अंमलात आणायची व जर सरकारने अंमलात आणली तर त्या उपाययोजनेमुळे समस्या अधिकच बिकट होणार नाही हे कशावरून ?
३) उपाययोजना आपली निर्धारीत उद्दिष्टे निर्धारित कालामधे पूर्ण करेल याची शाश्वती काय ? समजा केली व पुन्हा ५० वर्षांनी तीच परिस्थिती उद्भवली तर काय करायचे ??
४) उपाययोजना अंमलात आणण्यासाठी खर्च कोण करणार ? निधी कुठुन आणणार व कोणावर टॅक्स लावून उभा करणार ??
.
.
हे प्रश्न अस्तित्वात आहेत हे
हे प्रश्न अस्तित्वात आहेत हे कळण्याची अक्कल देखिल पुरोगाम्यांना नाही. ते सोडवायचे कसे हे दूरच राहिले. हाच तर मुद्दा धाग्यात मांडून राहीलोय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
त्यातील जवळपास सगळ्या देशांत प्रजातंत्र आहे.
प्रजातंत्र नसलेल्यांची जी अवस्था आहे त्याचा विदा कुठे आहे काय ?
actions not reactions..!...!
या धाग्यावर आणि सध्या
या धाग्यावर आणि सध्या एकंदरीतच चाललेला, व्यक्तिगत रोखाचे, आततायी प्रतिसाद देण्याचा प्रकार अतिशय कंटाळवाणा आहे. या प्रतिसादांमधून ना नवीन माहिती मिळत, ना नवीन काही शिकायला मिळत, ना काही करमणूक.
ठराविक लोकांना, ठराविक श्रेणीच का मिळतात वगैरे प्रश्न विचारण्यांनी प्रतिसादांमधली भाषा काय असते, अशा प्रतिसादांचा रोख काय असतो, आणि अशा प्रतिसादकांच्या सगळ्याच प्रतिसादांना अशा श्रेणी मिळतात का, याचा तपास करून मग बोलावं. श्रेणीपद्धत का, कशासाठी याबद्दल आधीच उदंड चर्चा झालेली आहे (दुवा १ आणि दुवा २).
हे सगळं पुन्हा पुन्हा बोलावं लागणं हे सुद्धा कंटाळवाणं आहे. पण "ऐसीवर काहीही लिहिलं तरी खपून जातं" असा काहींचा गैरसमज होऊन त्यातून अनेक इंटरेस्टिंग लोकं ऐसीवर येण्याचं टाळतात, त्यातून हा कंटाळवाणा प्रकार आणखी वाढत राहतो. त्यामुळे मला हा खरड, त्रागाछाप प्रतिसाद मुद्दाम लिहावासा वाटला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रचंड अनुमोदन.
प्रचंड अनुमोदन.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
पाने