सध्या काय वाचताय? - भाग ११

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========
The Mating Mind नावाचं evolutionary psychology च्या मोजक्या भागावर लक्ष देणारं पुस्तक वाचलं. ३००+ पानांमध्ये माणसाचा मेंदू आहे तेवढा, तसा विकसित का झाला, ठराविक मूल्यांना नैतिक महत्त्व का आहे, कलाप्रकारांचं महत्त्व, त्यातही अभिजन-बहुजन अशी कलांची विभागणी असा मानवी वर्तनाचा अभ्यास करून त्याची उत्क्रांतीजनक संगती लावण्याचा प्रयत्न आहे. माणसाचा मेंदू एवढा मोठा, उत्क्रांत का याचं उत्तर म्हणून एकचएक कारण देता येणार नाही, जसं मोराच्या पिसाऱ्याबद्दल देता येतं. लांडोरांनी सुंदर पिसाऱ्याचे मोर निवडले म्हणून मोराचा पिसारा टिकला, वाढला. असं मानवी मेंदूबद्दल म्हणता येत नाही. मेंदूची क्षमता मोजण्यासाठीही मुळात मेंदू विकसित व्हावा लागतो, मनुष्यांमध्ये स्त्री गर्भवती झाली की पुरुष आपली जबाबदारी पूर्ण सोडून देत नाही, त्यामुळे पुरुषही चिकीत्सक असतात, अशी वेगवेगळी कारणं दिलेली आहेत. एकूण मिळून जो सिद्धांत मांडलेला आहे तो पटण्यासारखा आहे.

पण मांडण्याची पद्धत पाहता, त्यात खोडून काढण्यासारखं काही नाही, असं म्हणावंसं वाटतं. ठराविक विषयातला, मोजका भाग निवडून त्यावर ३००+ पानं लिहीणं फार ताणलेलं वाटतं. शिवाय पुस्तकात विदा, चित्रं, आलेख नाहीत. क्वचित कुठे न्यूयॉर्कर इ. मधली कार्टून्स आहेत तेवढंच. पुस्तकातला रंजकपणा जास्त आणि सडेतोड विधानं, पुरावे कमी असा दुसरा आक्षेप. सुरूवातीला मेंदूची तुलना मोराच्या पिसाऱ्याशी करून सनसनाटी निर्माण करण्याची (खास अमेरिकन) पद्धतही वापरलेली आहे. एक प्रकारे 'संशयरत्नमाला' लिहीली आहे, पण लिहीण्याची पद्धत अविकसित आहे.

---

त्यानंतर लगेचच The Best American Science Writing 2012 हे पुस्तक वाचायला घेतलं. आणि पहिलं पुस्तक का आवडलं नाही हे लगेचच लक्षात आलं. हे पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी लिहीलेली anthology आहे. ललित अंगाने सध्या विज्ञान क्षेत्रात काय सुरू आहे याची तोंडओळख म्हणता येईल. दोन पानांचा जीव असणारे लेख पातळ केलेले नाहीत. विषयही सरळ, सोपी उत्तरं असणारे नाहीत. मूत्रपिंडाची भारत, पाकिस्तान, इंडोनेशियामध्ये चाललेली तस्करी, त्या निमित्ताने होणारी लुबाडणूक, याबद्दल असणाऱ्या लेखात, किंचित का होईना इरानचाही उल्लेख आहे. इरानमध्ये मूत्रपिंड विकत घेण्यावर कायदेशीर बंदी नाही तरीही तिथले 'विक्रेते'सुद्धा गरीबच आहेत अशा विषयावर एक लेख आहे. मेंदूबद्दल आपल्याला कितीतरी गोष्टी समजलेल्या नाहीत हे त्या विषयावर संशोधन करेपर्यंत समजलेलं नव्हतं, याबद्दल एक लेख आहे. साधारण २५-३० लेखांपैकी दोन नावं भारतीय (बहुदा एक भारतीय वंशाचा) दिसली.

मोठ्यांसाठी लिहीलेलं खऱ्या गोष्टीचं पुस्तक असं या The Best American Science Writing चं वर्णन करता येईल. फारच मजा आली ते वाचायला.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

छान ओळख करुन दिलीस अदिती. अँथॉलॉजीस मला फार आवडतात. अनेक लेखकांचे एकाच विषयावरचे, एकाच थीमला वाहीलेले विचार, ते विचार करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी धाटणी फार आकर्षक वाटते.

वाचण्यासाठी वर काढून ठेवले आहे. तूर्त रोज सकाळी त्याच्याकडे आदराने पाहातो आहे.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आओ गले मिले!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे क्राईम अँड पनीश्मेंटसाठी लागू नसावं {दु:खी स्मायली}, चांगलं रंजक पुस्तक आहे की हो!
ब्रदर्स कारमाझोव मात्र २००६ मध्ये विकत घेतल्यापासून ३०० पानांपुढे अजूनही गेलो नाहिये. एवढा मोठा ठोकळा डोस्टोयेवस्कीने कसा लिहिला हे नवल आहे. किती रिकामा वेळ असेल त्याच्याकडे ह्याला काही मर्यादा?

किती रिकामा वेळ असेल त्याच्याकडे

रिकामा वेळ नसायला काय झालं? त्याला ऐसीअक्षरे थोडीच माहीत होतं तेव्हा?

मी नुकतेच "मेळघाटावरील मोहर" हे डॉ. रविंद्र आणी डॉ. स्मिता कोल्हे यांच्या कामाबद्द्ल लिहिलेले पुस्तक वाचले. १९८४ पासुन हे डॉ. दांपत्य तिथे होणारे आदिवासांचे शोषण याविरुद्ध आवाज उठवत आहेत. त्यांनी कुठलीही संस्था स्थापन केलेली नव्हती. आदिवासींच्यात त्यांच्यासारखीच जिवनशैली जगुन , त्यांच्यातीलच एक होउन जो लढा त्यांनी दिलाय त्याला तोड नाही. ते काम चालु करण्याअगोदर बाबा आमटेंना भेटले होते. बाबा त्यांना म्हणाले डॉ. प्रकाश आमटेंनी जे काम हेमलकसा येथे उभे केले त्याला आनंदवनचा पाठींबा होता हा मुद्दा लक्षात असु दे. आणखीही अनेक सेवाभावी जवळपास(३३) संस्थांचा त्यांनी स्वतः अभ्यास केला आनी निर्णय घेतला की आपण संस्था स्थापन करायची नाही. खुपच हृदयस्पर्षी असा त्यांचा प्रवास आहे. अलीकडे १-२ वर्षात त्यांनी अनेक आदिवासी तरुनांना प्रशिक्षीत करायला संस्था स्थापण केलीय. कारण एवढा पैसा त्यांच्याजवळ नाही. गजानन महाराज प्रतिष्टान शेगावने त्या प्रशिक्षणाचा खर्च उचललाय.ते पैसे संस्था असल्याशिवाय नियमाने देउ शकत नाहीत म्हणुन.

मी बाबा आमटेंच्या चालु केलेल्या श्रमसंस्कार शिबीराला २०१३ ला हजर होतो. बाबांपासुन प्रेरणा घेउन महान ही संस्था स्थापन करुन मेळघाटामध्येच काम करणार्या डॉ. आशिष सातव यांची माझी तिथे भेट झाली होती. मी डॉ.सातवांना विचारले की मी काय योगदान देउ शकतो. तेंव्हा ते म्हणाले की पैसे खुप मीळतात( दानातुन). पण तिथे प्रत्यक्ष तळमळीने काम करणार्यांची वानवा आहे. तर तुम्ही प्रत्यक्ष येउ शकता काय? तिथे मी विपश्यनेवर बोललो होतो तेंव्हा डॉ.सातव मला म्हनाले की तुम्ही हेच काम करु शकता तेथेही. कारण त्यांनी स्वतः विपश्यनेचा कोर्स केलेला होता. मग मी त्यांना २०१४ ला येतो म्हणुन सांगीतले. नुकत्याच वाचलेल्या पुस्तकात डॉ. सातवांचाही उल्लेख आहे. त्यामुळे मी पावसाळ्यानंतर स्वतः तिकडे जाणार आहे. कीती दिवस रहाणार हे अर्थातच तिथल्या माझ्या अनुभवावर अवलंबुन असणार आहे. योगायोगाने मला डॉ. विकास आमटे जे आनंदवन सांभाळतात त्यांच्याशी विस्त्रुत आनी मनमोकळि चर्चा करता आली.

जाउन आल्यावर मी अनुभव लिहीलच. पण तोपर्यंत या पुस्तकाचे वाचन जरुर करावे.

उत्तम मनोदय!
कार्याला शुभेच्छा!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद.

एखादी कादंबरी वाचताना आपल्या डोळ्यासमोर हळूहळू पात्रांचा चेहरा आकार घेत जातो, पण बर्‍याचदा ती प्रतिमा संपूर्ण स्पष्ट नसते. कथानकाच्या ओघात लेखक अनेकदा शारीरिक वैशिष्ट्यांचा उल्लेख करत असला तरी त्यातल्या रिकाम्या जागा वाचकाची कल्पनाशक्ती आपापल्या अनुभव आणि कुवतीप्रमाणे भरून काढत असते.

ही प्रक्रिया बव्हंशी अजाणता होत असली, तरी काही काळाने/पुनर्वाचनात तिच्याकडे त्रयस्थपणे पाहता येऊ शकतं. (विशेषतः कादंबर्‍यांच्या बाबतीत - कवितांच्या बाबतीत व्यक्तिगणिक आणि वाचनागणिक पडत जाणारा फरक फार अधिक असावा आणि एका अर्थी, ते कवितांचं व्यवच्छेदक लक्षणही म्हणता येऊ शकेल.)

या प्रक्रियेचा मागोवा घेणारे 'What We See When We Read' अलीकडे प्रसिद्ध झाले. त्यातला काही भाग येथे वाचता येईल. (लेखातली उदाहरणं जरी इंग्रजी/रशियन 'क्लासिक्स'मधली असली, तरी त्यांच्याजागी मराठीतली उदाहरणं योजून पाहणं फारसं अवघड नसावं.)

शाळा कांदबरीमध्ये बालपणातील शाळेतील जीवन उभे राहते.

हिलरी क्लिंटन काकुंचं हार्ड चॉइसेस मैत्रिणीने दिलं म्हणुन आणलं, पण लगेच बोर झालं.

पुस्तकाबद्दल तुमचं अजून काही निरि़क्षण असेल तर सांगा की
म्हणजे जर लगेच बोर होउनही तुम्ही पुढे वाचलं असेल तर ..... Biggrin

मुरवत ठेवलंय सध्या. काही दिवसांनी परत उघडलं कि (/तर) सांगते.

आणखी लिहिलंत तर आवडेल.
एकुणच काही आंतरराष्ट्रीय प्रश्नात त्यांची भुमिका मोठी होती, त्याबद्दल काही विशेष लेखन आहे का?
शिवाय बिल क्लिंटन राष्ट्रपती असताना हिलरीतैंच्या भुमिकेबद्दलही जाणून घ्यायला आवडेल.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

डॉ.एस एल भैरप्पा यांचे पर्व वाचत आहे(मराठी अनुवाद-सौ उमा कुलकर्णी) या पुस्तकाने माझ्या धार्मीक आणी दैवीक समजाच्या पार चिंधड्या उडवल्या. आपणा पैकी बराच जणाने वाचले असेल.

हे पुस्तक मी दोन तीन वेळा वाचले आहे. महाभारतावर आज पर्यंत हजारोंच्या संख्येत नाटक आणि उपन्यास लिहिले असतील. त्यात या उपन्यासाचे स्थान उठून दिसते. यात पात्र सामान्य माणसा सारखे आहे. पण त्यात त्या मुळे धार्मिक आस्थेची चिंधड्या उडण्याचे काहीच कारण नाही. महिर्षी व्यासांनी एवढी ताकतवर पात्र निर्माण केली कि प्रत्येक कवी आणि लेखकाला आज ही त्यांचे आकर्षण वाटते. आणि तो ही यां पात्रांपासून प्रेरणा घेतो. या पात्रांत आपण आजचा समाज ही पाहू शकतो. उदा.
गांधार विजय

हा उच्च लेख आणि प्रतिक्रिया वाचल्या!

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जबर्‍या आहे!!! ही प्रतिक्रिया पाहिली का?

Master Shifu - शनिवार, 5 एप्रिल 2014 - 12:06 PM IST

"याआधी घरामध्ये बेडरूम बाहेरच्या खोलीत किचनमध्ये 4-5 वेळा माकड येऊन गेलं होतं. टेरेसवरील भाज्या, फळे खाऊन गेलं होतं"....हो का? आमच्याकडे pan ek pandaa yeto ani Poppins khaun jato..

ROFL ROFL ROFL ROFL

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL
हा प्रतिसाद मला अगदी मार्मिक वाटला:

अनिल छत्रे - सोमवार, 7 एप्रिल 2014 - 11:34 AM IST
माकडाने चार्जर पण चोरून नेला होत का?......

ROFL ROFL

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL ROFL ROFL

तिथे 'माकड' या आयडीने दिलेल्या प्रतिक्रियाही जबर्‍या आहेत.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी!

मर्कट पीडा - शुक्रवार, 13 जून 2014 - 03:26 PM IST
संध्या बाई, परवा एका माकडाने आमच्या घरून पार्ले-जी चा पुडा पळवला... तो दिसला का तुम्हाला गच्चीवर?

ही पण भारी!

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अगदी अगदी!

तरी पोपा म्याडम कै दिसल्या नैत अजून. स्वाती ठकार, ज्युनियर ब्रह्मे, इ. व्यक्तिमत्वेही कै दिसली नैत, पण बाकीच्यांनी त्यांची उणीव पुरती भरून काढलेली आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दमयंती दांडेकर उर्फ डीडी - मंगळवार, 8 एप्रिल 2014 - 06:06 PM IST
यांची प्रतिक्रिया वाचून ठसका लागला.

गेली काही वर्षं पुण्यातून निघणारं 'खेळ' हे अनियतकालिक सातत्यानं गंभीर साहित्यविषयक मजकूर देतं. त्याचा ताजा अंक 'नव्वदोत्तरी कादंबरी विशेषांक - भाग १' नुकताच आला आहे. नोबेलविजेता जर्मन लेखक ग्युंटर ग्रासची आणि चेक लेखक मिलान कुंदेराची मुलाखत त्यात आहे. नंदा खरे, विलास सारंग, शांता गोखले, आनंद जातेगांवकर, नेमाडे, दिनानाथ मनोहर अशा काही लेखकांच्या इतिहासाकडे वेगळ्या प्रकारे पाहणाऱ्या समकालीन कादंबऱ्यांवर अंकात एक लेख आहे. जागतिकीकरणानंतरच्या कादंबरीबद्दल प्रवीण बांदेकर आणि विश्राम गुप्तेंचे लेख आहेत. हेमंत देसाई, सीताराम सावंत, प्रवीण बांदेकर आणि श्याम मनोहर ह्यांच्या कादंबऱ्यांविषयी किशोर बेडकीहाळ ह्यांचा लेख आहे. शिवाय, भारतीय इंग्रजी कादंबरीवरही एक लेख आहे आणि इतरही काही लेख आहेत. अजून अंक वाचलेला नाही पण इथे काहींना अंकात रस असू शकेल म्हणून माहिती देतो आहे. अंक हवा असला तर संपादक मंगेश नारायणराव काळे ह्यांच्याशी संपर्क साधावा. (०२० - २५४५ ४४७३, ९७६६५ ९४१५४)

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"कल्टिव्हेटींग कंपॅशन" - बुद्धिस्ट मेडिटेशनवरचे पुस्तक वाचते आहे. खूप आवडत आहे.

एक दाखला नमूद करते - जर तुमची आई किंवा तुमचा जवळचा मित्र काही कारणाने अस्वस्थ अगदी वेडसर झाले अन त्यांनी चाकूने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय करता? तिच्या/त्याच्या हातातून चाकू कसाबसा काढून घेता अगदी मग त्यांच्यावर हात उगारावा लागला तरी चालेल. पण चाकू काढून घेण्याच्या पश्चात तुम्ही त्यांना मारहाण करता का? - तर नाही.

तसेच जर प्रत्येक जीवाला तुम्ही "मित्र" माना. मैत्रीच्या नात्यातून त्या जीवाकडे पहा. जरी त्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला असेल तरी एक कंपॅशनेट (सहानुभूतीपूर्ण) दृष्टीकोनातून सर्वांकडे पहायची सवय लावा.

We are all equal - in wanting happiness & not wanting suffering. And if it's worthwhile for me to gain happiness, then it's worthwhile for everyone else to gain happiness.

हे असे छान छान विचार शिकवले की मला प्रश्न पडतो :-
हे नक्की कुठं कुठं लागू करता यावं ? कुठं लागू करु नये ?
ज्यूंनी १९३० - १९४० च्या दशकात हिटलर/नाझींबद्दल अशीच भूमिका घ्यायला हवी होती का ?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मूळात हिटलरने तशी भूमिका घ्यायला हवी होती तर मग ज्यूंना गरजच पडली नसती. अर्थात कोंबडी आधी की अंड आधी हा वाद कायमच रहाणार.

वरील प्रतिसाद संपादित करत असतानाच त्यास बूच बसले.
तपशीलवार प्रतिसाद :-
हे असे छान छान विचार शिकवले की मला प्रश्न पडतो :-
हे नक्की कुठं कुठं लागू करता यावं ? कुठं लागू करु नये ?
ज्यूंनी १९३० - १९४० च्या दशकात हिटलर/नाझींबद्दल अशीच भूमिका घ्यायला हवी होती का ?

सध्या आपण दृष्टीआड सृष्टी हा अल्गोरिदम वापरत असलो तरी आसपासची सामाजिक स्थिती काय आहे ?
लहान गावातील काही अल्पवयीन मुलींना धोक्यान फसवून मोठ्या शहरात आणून विक्री वगैरे होते, भलभलते प्रकार होतात.
लहान मुलं पळ्वली जातात, त्यांचे डोळे फोडून किंवा हात-पाय वगैरे तोडून त्यांना भीक-मागण्या-योग्य बनवलं जातं.
ह्या प्रकारातील, किंवा कोणत्याही गंभीर गुन्ह्यातील बळींनी नक्की काय भूमिका घ्यायची ?
तुमची आर्थिक फसवणूक करुन गबर झालेल्या निर्दय अप्पलपोट्याबद्दल काय भूमिका घ्यायची ?

"विश्वब्म्धुत्व असावं. सगळं छान असावं. कुणालाच वाईट म्हणू नये" ही भूमिका इतकी जनरलाइझ्ड करता येइल का ?

आधी कोंबडं की आधी अंडे हे माहित नसेल तर हा "सगळ्यांनाच माफ करायचा" कीम्वा "चांगले समजण्याचा" उपदेश अमलात आणून आपण स्वत:ची सावधानता कमी करत नाही का ?
ती का कमी करावी ? इतरांच्या हरामखोरीचा बळी आपण ठरुन "सद्वर्तनी मनुष्य" हे टायटल गळ्यात मिरवण्यात शहाणपण आहे का ?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे जे बुद्धीस्ट तत्वज्ञान आहे ते सर्वांनी आपलसं केलं तरच प्रश्न सुटतील. शिकारी माणसाळले तरच प्रश्न सुटतील. ही गोष्ट केवळ स्वप्नात शक्य आहे हे माहीत आहे Sad

ओके.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Smile आयव्हरी टॉवरवासी तत्वज्ञान आहे याची कल्पना आहे पण या तत्वज्ञानाचीही आपली एक जागा आहे. एक ट्रान्स्फॉर्म करण्याचं पोटेन्शिअल त्यात आहे. म्हणून क्वचित असा विचार करण्यास प्रत्यावय नसावा.

ओके

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ज्यूंनी १९३० - १९४० च्या दशकात हिटलर/नाझींबद्दल अशीच भूमिका घ्यायला हवी होती का ?

ज्युंना गांधीजींनी दिलेला "शांततामय मार्गाने प्रतिकार करा" हा सल्ला नेहमी आठवतो.
ज्यु शांत राहिले मात्र प्रतिकार केला नाही Sad

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरूण साधूंसारख्याने इतका कमालीचा अस्ताव्यस्त लेख लिहावा याचं भयंकर आश्चर्य वाटलं.

त्यात सारखं सारखं हे पिचपिचीत आहे, ते लिबलिबीत आहे, तमुक पिळपिळीत आहे हे वाचून ते सध्या काय आहार घेतात याबद्दल कुतूहल वाटलं.

पुढच्याच आठवड्यात आलेल्या दुसर्‍या लेखाने साधूंच्या लेखाच्या फारेण्डी धज्जियां उडवल्या आहेत.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

होय, वाचले होते दोन्ही. Sad

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वरती एक दोघांनी लेखांचे दुवे दिले आहेतच.
त्यातच आमचीही भर.
http://www.loksatta.com/lokrang-news/hum-aapke-hain-koun-a-movie-symboli...

'हम आपके है कौन?'ची देन

मला ह्या लेखातल्या मुद्द्यात तथ्य वातलं.
पण मागे एकदा गिरीश कुबेर ह्यांचा "चंगळवादी व्हा" हा लेख आला होता एक दोन वर्षापूर्वी; तोही आवडला होता.
दोन्हींचा आशय एकदम विरुद्ध जातो आहे असे वाटले.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

१. रोमन साम्राज्याचा उदय आणि अस्त ४० नकाशांद्वारे:

http://www.vox.com/2014/8/19/5942585/40-maps-that-explain-the-roman-empire

२. जॉर्ज ऑर्वेलनं लिहिलेलं 'माईन काम्फ'चं परीक्षणः

विशेषतः हा भाग मननीय -

...human beings don’t only want comfort, safety, short working-hours, hygiene, birth-control and, in general, common sense; they also, at least intermittently, want struggle and self-sacrifice, not to mention drums, flags and loyalty-parades.

दुसरी गोष्ट म्हणजे मार्च १९४०मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातलं भाकीत (करार मोडून हिटलरचे रशियावर आक्रमण) पुढील वर्षीच (जून १९४१) खरं ठरलं.

नकाशे भन्नाट आहेत. यू ट्यूबवर बी बी सी ची राइझ अ‍ॅण्ड फॉल ऑफ रोमन एम्पायर ही आख्खी सिरिजही उपलब्ध आहे.
पाहिली नसल्यास अवश्य पहावी.(पाहिली नसण्याची शक्यता नगण्य आहे; हे मान्य.)

रोमन साम्राज्याचं महत्व म्हणजे पाश्चात्त्य इतिहासकार जगातील इतर कोणतीही गोष्ट मोजताना नकळतपणे का असेना पण रोमनांशी तुलना करतातच. म्हणजे, ते चंगीझ खानाचं मंगोल साम्राज्य किंवा सुरुवातीच्या इस्लामिक काळातलं उमय्याद, मग अब्बासिद मोजताना त्यांचा आकार रोमन साम्राज्याच्या अमुक इतके पट किंवा अमुक इतके टक्के असा मोजतात. त्यांचे उत्पन्न, यशापयश,प्रशासनव्यवस्था ,स्थैर्य वगैरे मोजतानाही तसेच निकष.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

यस मिनिस्टर या मालिकेतही कुठल्याही कामाला उशीर लागल्यावर 'रोम वॉजन्ट बिल्ट इन अ डे' असं वाक्य टाकलेलं स्मरतं

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ऑर्वेलबाबाची लिंकही वाचली आत्ताच. अप्रतिम आहे. मनःपूर्वक आभार. " १९३०- १९४०च्या दशकात नेमकं काय होतय, का होत असावं" ह्याचं इतकं चपखल वर्णन/आकलन त्याला त्याच काळात झाल्याचं पाहून नतमस्तक झालो. खरं तर ह्या अशा गोष्टी मागे वळून पाहतानाच जास्त जाणवतात.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पाप पुण्याची , योग आणि भोग याची अनिश्चीत निश्चीत व्याख्या असलेली भगवती वर्माच 'चित्रलेखा' वाचतोय Smile

मीनाकुमारी, प्रदिपकुमार आणि अशोककुमार यांचा चित्रपट या पुस्तकावरच बनलेला आहे का? बर्याच वर्षांपूर्वी पाहिलाय. तेव्हा आवडलेला.

जे. के. रोलिंग ने "रॉबर्ट गॅलब्रेथ" या टोपणनावाने लिहीलेले "द कक्कूज कॉलिंग" पुस्तक वाचले. ठीक होते, रोलिंग यांचे आहे हे कळल्यावर थोडी आशा वाढली होती. बरेच धागे अर्धवट सोडल्यासारखे, आणि शेवट थोडासा फुसका वाटला. पण रहस्यकथेचा नायक - कॉर्मोरन स्ट्राइक - आवडला.
याच धाग्यात अलिकडे या पुस्तकाचा उल्लेख झाल्याचे आठवते, पण ती पोस्ट सापडली नाही.

मुळात वाचनाची आवड असल्यामुळेच ऐसी वर येण झालं आणि आता सदस्यही झाले. त्यामुळे या धाग्याबद्दल जरा जास्त ममत्व राहिल् हे नक्की.
नुकतच् 'एक होता कार्व्हर' पुन्हा एकदा वाचलं आणि नव्याने या पुस्तकाच्या प्रेमात पडले.
आता 'बालकांड' हे ह.मो. मराठे यांनी लिहलेले पुस्तक मैत्रिणीने वाचायला दिले आहे. ते सुरु करेन.

--
सई

सई

www.express.co.uk/entertainment/books/503574/Best-serial-killer-books माझी आवडती तीन पुस्तकं आहेत यात. रेड ड्रेगन, शार्प ऑब्जेक्टस् आणि द गर्ल विथ ड्रेगन ट्याटू. बाकीची वाचणारच आहे वेळ मिळेल तशी. सध्या द वेट ऑफ ब्लड वाचतेय.

The Professor and the Trolls

मेरी बेअर्ड या प्राध्यापिकेबद्दल हा लेख आहे. त्यातला इंटरनेट ट्रोलांबद्दलचा भाग मला फारच आवडला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगला लेख आहे. मेरी बीअर्ड ह्यांचं त्यांच्या विषयातलं (क्लासिक्स) लिखाण मी अनेक वर्षांपासून वाचतो आहे. त्यामुळे त्यांच्यविषयी आदर होताच, पण तो आता अधिकच वाढला. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी काहीच कल्पना नव्हती. त्यांच्या टिव्ही शोबद्दल ऐकून होतो, पण हे ट्रोलांचं प्रकरण वेधक आहे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आजच्या लोकसत्तेतला रवी आमलेंचा हा लेख आवडला. अगदी मनातलं लिहिलं आहे असं वाटलं.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मूळ लेखाचा दुवा वाचकांच्या सोयीसाठी देत आहे. साईबाबा होते तरी कोण? - व्यवस्थापक

बाबा देव नव्हते, संत नव्हतेच, पण गुरूही नव्हते, असा निकाल
स्वयंघोषित धर्मसंसदेने दिला आहे. (निदान साईबाबा म्हणून कोणीतरी या
भूमीत होऊन गेले, हे त्यांनी नाकारले नाही, ही मोठीच सहिष्णुता
म्हणायची.) खरं सांगायचं तर बाबांनीही आपल्या उभ्या हयातीत मी देव आहे,
संत आहे किंवा गुरू आहे, असं कधीच सांगितलं नाही. जो तसा नसतो त्यालाच
उच्चरवानं तसा दावा करावा लागतो आणि असा दावा करणाऱ्या अनेक स्वयंघोषित
संत, अवतारी आणि गुरूंचा बाजार तेजीत असताना धर्मसंसदेला त्यांच्याबाबत
चकार शब्दही उच्चारावासा वाटत नाही. ही धर्माची हानी आहे, असं वाटत नाही.
मग प्रश्न असा की, आखाडे आणि पीठांचे धर्मधुरीण साईबाबांना बहिष्कृत
करण्यासाठी इतके का आसुसले? या फैसल्यासाठी त्यांनी कोणता शास्त्रार्थ
केला? कशाचा आधार घेतला? साईबाबा खरंच होते तरी कोण, याचा काय निष्कर्ष
काढला? त्यांच्या चरित्राचं किती परिशीलन केलं? यातलं काहीही झालं नाही.
धर्मसंसद किंवा कोणी काही म्हणो, लोकांना खरा धर्म शिकवणाऱ्या हजारो
संतांचा, सद्गुरूंचा प्रभाव हिंदू समाजातून कधीच नष्ट होणार नाही.
श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की, ''माझी निंदा करणाऱ्यांना मी कळलो
नाहीच, पण माझी स्तुती करणाऱ्यांनाही मी कळलो नाही.'' त्यामुळे
साईबाबांची बाजू मांडायची तरी का, कुणासमोर आणि कशासाठी? खरं तर या
घडामोडींना किंमतही देण्याची गरज नाही. तरीही काही गोष्टींचा विचार केला
पाहिजे.
साईबाबा खरंच कोण होते? बाबा शिर्डीत आले तेव्हा एका मंदिरात बसले.
पुजाऱ्यानं हाकललं तेव्हा (पुढे जिचं नामकरण बाबांनीच द्वारकामाई केलं
त्या) मशिदीत बसले. गावातली मुलं त्यांच्यावर दगड मारत मागे धावत तेव्हा
हसत हसत बाबा हा 'खेळ' खेळत. या कोणत्याही वेळी, 'अरे तुम्ही मला समजता
काय, मी अवतार आहे, संत आहे, गुरू आहे', असं ते बोलले नाहीत. त्याच
शिर्डीत चांदीची मूठ असलेली छत्री त्यांच्या डोईवर धरून त्यांची चावडी ते
मशीद अशी मिरवणूक निघे तेव्हाही लोकांच्या आनंदात ते सहभागी होत. ना
त्यांना दगडांचं दु:ख झालं ना छत्रचामरांचा आनंद झाला. तेव्हाची शिर्डी
होती तरी कशी? खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य बाळकृष्णबुवा
कपिलेश्वरी यांनी खाँसाहेबांचं ९०० पानी चरित्र लिहिलं आहे. त्यात
खाँसाहेब बाबांच्या दर्शनास गेले तेव्हाच्या शिर्डीचं वर्णन आहे. ते
लिहितात, ''सर्वत्र दाट जंगल, रातकिडय़ांची किरकिर, रस्ते नाहीत,
सापकिरडय़ाची भीती फार. शेतवडीमुळे चिखल भरलेला, अशा एका ठिकाणी एका चौकीत
पेटत्या धुनीसमोर हातात चिलीम घेतलेली साईमहाराजांची मूर्ती बसलेली
असे.'' म्हणजेच शिर्डी साधारण होती. तिथे बाबांमुळे हळूहळू
उच्चशिक्षितांची ये-जा वाढली तरी बाबांची साधी गावठी राहणी, त्यांची
लोकांशी असलेली वर्तणूक कधीच बदलली नाही. कुणी श्रीमंत आहे म्हणून ते
कोणाशी सलगीने वागले नाहीत की गरीब आहे म्हणून कुणाला झिडकारले नाही. उलट
कुणाला फटकारताना त्याच्या श्रीमंतीला त्यांनी काडीची किंमत दिली नाही.
कोण कसं आहे, याच्याशी त्यांना काहीच देणंघेणं नव्हतं. माणसानं कसं झालं
पाहिजे, हेच त्यांचं एकमेव उद्दिष्ट होतं. त्यांनी कुणाच्याच धर्मावर
आक्रमण केलं नाही, उलट प्रत्येकाला धर्मरत व्हायला शिकवलं. 'अल्ला मालिक'
हा मंत्र कायम त्यांच्या मुखी असे, अनेक फकीर आणि हाजीही त्यांच्या
संगतीचा लाभ घेत. पण शेकडो हिंदूही त्यांचे निस्सीम भक्त होते. शिर्डीत
रामनवमी त्यांनी सुरू केली. अनेकांना विष्णुसहस्रनाम म्हणायला लावले.
मशिदीचे नाव 'द्वारकामाई' ठेवले! खरं तर धार्मिक सलोख्याचा किती मोठा
सामाजिक प्रयोग बाबांनी सहजतेने साधला. हे ताकदीचं लोकोत्तर कार्य
संतांचं नाही? लोकमान्य टिळकांचे सहकारी दादासाहेब खापर्डे अनेकवार
साईचरणी जात. एकदा साईबाबा त्यांना म्हणाले, ''तुम्ही अन्य कुणापेक्षाही
देवाचीच सेवा करा. परमेश्वर जे देतो ते कधीच संपत नाही आणि मनुष्य जे
देतो ते कधीच चिरंतन टिकत नाही.'' खापर्डेचे तेव्हाचे सामाजिक स्थान
पाहता, तुम्ही आता केवळ माझीच सेवा करा, हे सांगून शिष्यपरिवार वाढवत
नेण्याचा मोह एखाद्या भोंदू बाबाला झाला नसता का? लोकमान्य टिळकांना
साईबाबांनी सांगितले की, ''लोक वाईट आहेत, तुम्ही तुम्हाला तुमच्यासारखे
ठेवा!'' अर्थात नेत्यानं लोकानुनयी होऊन तत्त्वाला मूठमाती देऊ नये, हा
किती मोठा राजकीय बोध झाला. जिवाला सत्याकडे, स्वरूपाकडे वळवणं ही
सद्गुरूत्वाची खूण नाही?
एकदा बाबांनी एक फळ उचलले आणि खापर्डेना विचारले, ''या फळात किती फळे
निर्माण करण्याची क्षमता आहे?'' खापर्डे उत्तरले, '' फळात जेवढय़ा बिया
असतील त्यांच्या हजारोपट.'' यावर हसून बाबा म्हणाले, ''या फळाने त्याचा
नियम आणि गुणधर्म पाळलेला आहे.'' म्हणजे सृष्टीतील सर्वच वस्तुमात्रांनी
त्यांचा त्यांचा गुणधर्म पाळला आहे, माणसानं मात्र तो पाळलेला नाही.
माणुसकी हाच माणसाचा गुणधर्म असताना माणसानं पशूलाही लाज वाटेल इतकी हीन
पातळी गाठली आहे. माणसाला त्याच्या मूळ गुणधर्माची आठवण करून द्यायला
बाबा आले होते. खापर्डेची रोजनिशी, साईसच्चरित्रासह अनेकानेक पुस्तकांतील
शेकडो प्रसंगांतून साईबाबांच्या कार्यावर आणि कळकळीवर प्रकाश पडतो.
त्यातील कशाचाही आधार धर्मसंसदेने घेतला नाही, हे उघड आहे.
भगवंत गीतेत सांगतात, 'अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।' म्हणजे
मी मनुष्य रूपात अवतरित होतो, तेव्हा मूढ लोक मला जाणत नाहीत, माझं खरं
स्वरूप जाणत नाहीत! मग साईबाबा कोण होते, हे आपण कसं जाणणार? साईबाबांना
जे आवडतं ते आपल्या जगण्यात जितकं उतरेल तितके साईबाबा खरे कोण होते, हे
जाणवू लागेल.
मग साईबाबा होते कोण? निस्संशय ते सद्गुरूच होते. संकुचित जिवाला व्यापक
करीत परमतत्त्वात विलीन करणं, हे सद्गुरूंचं एक कार्य सांगता येईल. ते
बाबांनी अहोरात्र केलं. भगवान शंकरांनी पार्वतीमातेला सांगितलेल्या
'गुरुगीते'च्या प्रत्येक श्लोकाचा दाखला देत साईबाबांचे सद्गुरूरूप उकलता
येईल. या 'गुरुगीते'त पार्वतीमाता विचारते, 'केन मार्गेण भो स्वामिन्
देहि ब्रह्ममयो भवेत?' देहात जन्मलेला जीव ब्रह्ममय कसा होईल? त्यावर
शिवजी सांगतात की, देवी जीव ब्रह्ममय कसा होईल, हे पाहण्यापूर्वी ब्रह्म
म्हणजे काय, हे पाहिलं पाहिजे. मग ब्रह्म काय आहे? तर सद्गुरूच ब्रह्म
आहे, हे शिवजी त्रिवार सांगतात. जीव गुरुमय होत नाही तोवर तो ब्रह्ममय
होऊच शकत नाही, हेही सांगतात. आता कुणाला वाटेल की अमक्या शास्त्रात तर
असं म्हटलं आहे, तमक्या पुराणात तर तमुकच देवाला श्रेष्ठ मानलं आहे.
त्यावर शिवजी स्पष्ट सांगतात, ''वेदशास्त्रपुराणानि इतिहासादिकानिच।
मंत्रयंत्रादिविद्याश्च स्मृतिरूच्चाटनादिकम्। शैवशाक्तगमादिनि अन्यानि
विविधानि च। अपभ्रंशकराणिह जीवानां भ्रांतचेतसाम्।।'' वेद, शास्त्र,
पुराणे, इतिहास, यंत्रतंत्रादि विद्या, स्मृती, शैव, शाक्त, आगमनिगमादि
अनेक ग्रंथ हे आधीच भ्रमित असलेल्या जिवाला आणखीनच भ्रांतीत टाकून
भटकवणारे आहेत! ज्या वेदांना हिंदू तत्त्वज्ञान उच्चस्थानी मानते
त्यांच्यापासूनच सुरुवात करून शिवजींनी समस्त ग्रंथ-पंथांना भटकंती
वाढवणारे ठरवले आहे. ही 'गुरुगीता'ही आता असंमत ठरवणार काय?
साईबाबा कोणीच नव्हते, हा पूर्वनियोजित निर्णय घोषित करू पाहणाऱ्या
आखाडय़ांना आणि धर्मसंसदेला या देशासमोरचे आणि धर्मासमोरचे खरे प्रश्न का
भेडसावत नाहीत? ते का उकलावेसे वाटत नाहीत? या आखाडय़ांकडे शेकडो एकर
जमिनी पडून आहेत. अमाप पैसा आहे. तेथे रुग्णालये, शाळा, उद्योगकेंद्रे
काढून लोकसेवेला आणि रोजगारनिर्मितीला चालना का द्यावीशी वाटत नाही?
धर्मातील महत्त्वाची तत्त्वं पुस्तकरूपानं छापून ती खेडोपाडी का नेली जात
नाहीत? बहुभाषिक हिंदू समाजातील ऐक्याला बळकटी आणण्यासाठी विविध
प्रांतांच्या भाषा शिकवणाऱ्या केंद्रांची साखळी देशभर का उभारावीशी वाटत
नाही? तीर्थस्थानांच्या ठिकाणी पावित्र्य, स्वच्छता राहावी आणि बाजारूपणा
नष्ट व्हावा म्हणून का पुढाकार घ्यावासा वाटत नाही?
जातिभेदाचं विद्रूप रूप सोडलं (आणि त्याची कारणं आणि त्याचं विद्रूपीकरण
हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे) तर हा धर्म कधीच कुणाला नाकारणारा वा विचार
दडपणारा नव्हता. वेदतत्त्वांना नाकारणाऱ्या चार्वाकांचाही ऋषी म्हणूनच
आदर इथे झाला आणि त्यांची हत्या कोणी केली नाही. जो धर्म प्राचीन काळातही
व्यापक आणि सर्वसमावेशक होता तो आधुनिक काळात अधिकाधिक संकुचित, असहिष्णू
आणि असंवेदनशील होत आहे, ही भावी काळातील अधर्मसंसदेची नांदीच आहे.

सन्दर्भ- चैतन्य प्रेम -लोकसत्ता

वीतराग बनो......वीतद्वेष बनो !

अत्त दीप भव !

मग साईबाबा होते कोण? निस्संशय ते सद्गुरूच होते. संकुचित जिवाला व्यापक करीत परमतत्त्वात विलीन करणं, हे सद्गुरूंचं एक कार्य सांगता येईल.
बायकांना सुंदर बनवण्याचं काम भवानीमाता करते असे समजण्यासारखे हे आहे, पण असो.
बा़की उर्वरित लेखाला जबरदस्त पास.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

बाबा देव नव्हते, संत नव्हतेच, पण गुरूही नव्हते, असा निकाल स्वयंघोषित धर्मसंसदेने दिला आहे.

कोणत्याही निर्णया ला अंडरमाईन करायचे असेल तर प्रथम निर्णय घेणार्‍याला स्वयंघोषित म्हणून जाहीर करायचे - हा बकवास आहे.

अगदी मागच्या आठवड्यापर्यंत - ज्या व्यक्तींनी/भक्तांनी साईबाबांना देव्/संत्/गुरु म्हणून मानले ते ही स्वयंघोषित च निर्णय होते की. मग केवळ स्वयंघोषित आहेत म्हणून त्यांचे ते निर्णय अवैध्/गैर होते का ? मग आज एक गट एकत्र येऊन साईबाबांना ते संत नव्हते/गुरु नव्हते/देव नव्हते असे जाहीर करतो .... तेव्हा मात्र तो निर्णय स्वयंघोषित व म्हणून अवैध ??? कसा काय ?

हा एक इंटरेस्टिंग फतवा आहे.

फेसबुकवर "ओरिजिनल फोटो ऑफ साईबाबा" म्हणून पोस्ट करणारे, लाइक करणारे आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा असे म्हणणारे श्रद्धाळू आणि राजकारणात हिंदू म्हणून पोलराइज होऊ पाहणारे लोक बरेच ओव्हरलॅपिंग आहेत. आता दोन पातळ्यांमधला (स्वतःच्या मनातला) संघर्ष हे लोक कसा सोडवतात हे पाहणे रोचक ठरेल.

आपल्या फतव्याची हिंदूंमधील स्वीकारार्हता टेस्ट करण्यासाठी धर्मसंसदेने हा फतवा काढला असेल तर त्यांनी कदाचित चुकीच्या पॉइंटपासून सुरुवात केली आहे असे म्हणावे लागेल.

>>ज्या व्यक्तींनी/भक्तांनी साईबाबांना देव्/संत्/गुरु म्हणून मानले ते ही स्वयंघोषित च निर्णय होते की

एक रोचक संवाद....

गुरू: मी देव आहे असं लोक मानतात.
स्केप्टिक: तुम्ही देव आहात हे लोकांना कसं कळलं?
गुरू: देवाने त्यांना सांगितलं की मी देव आहे.
स्केप्टिक: म्हणजे तुम्ही देव आहात असं तुम्हीच सांगितलं?
गुरू: नाही. देवाने त्यांना सांगितलं.
Smile

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

संवाद... ROFL

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अगदी अगदी...धर्मसंसदेचा निर्णय मूर्खागमनी आहे हे वेगळे सांगणे न लगे, पण 'स्वयंघोषित' हा शब्द नेहमी अशाच लोकांना का लावल्या जातो काय माहिती. हे तथाकथित लिबरल लोकही काय वेगळे वागतात? आम्ही लिबरल आहोत हे कान फाटेस्तोवर ओरडणारे फक्त हेच लोक आहेत. स्वतःची टोळी सोडल्यास यांना कोणी लिबरल म्हणत नाहीत. त्यांना स्वयंघोषित का म्हणू नये? पण बघा मजा, सगळे आता या प्रतिसादावर तुटून पडतात की नाही.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हिंदुत्ववाद्यांनाही कूमी कपूर (इंडियन एक्स्प्रेस मधे पॉलिटिकल ग्रेपवाईन उर्फ गॉसिप कॉलम लिहिते ती) स्वयंघोषितच म्हणते. शोभा डे सुद्धा व सागरिका सुद्धा. तरी बरं ... भारतातल्या कम्युनिष्टांना कोणी स्वयंघोषित म्हणत नाही. ते स्वतःच आम्ही मार्क्सवादी आहोत (माकप) असं म्हणतात नाहीतर कम्युनिष्ट आहोत (भाकप) असं म्हणतात. मुलायमसिंगांना कोणी स्वयंघोषित समाजवादी कोणी म्हणत नाही. पुरोगाम्यांना (उदा. बारामतीचे साहेब) कोणीही स्वयंघोषित पुरोगामी म्हणत नाही.

भांडवलवाद्यांना मात्र आम्ही भांडवलवादी आहोत असं म्हणण्याची भीती असते. का कोणजाणे. डरपोक साले. म्हणून खलनायकी उपनामे वापरून .... मुक्ताफळे उधळित असतात.

प्रचंड सहमत.

सध्या मीडियावर, वैचारिक फ्याषनवर मोनॉपॉली कुणाची आहे ते याच्यातून स्पष्ट होतं, दुसरं काऽही नाही.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भांडवलवादी अदखलपात्र ... त्यांना कुणी स्वयंघोषित भांडवलवादी सुद्धा म्हणत नाही. (नाही म्हणायला राजेश्वरी देशपांडे ... त्यांची ... "भांडवली भणंग" .... अशी संज्ञा वापरून भलामण करतात ... हे ही नसे थोडके. मग भले त्या संज्ञेचा अर्थ प्रत्यक्ष भगवंतासही समजला नाही तरी चालेल.)

भांडवली भणंग ROFL

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो .... बाईंना भकार फारच प्रिय असावा.

पण ते सोडा व हा राग भंकार ऐका. - मेहदी हसन ... भंकार

अगदी अगदी...धर्मसंसदेचा निर्णय मूर्खागमनी आहे हे वेगळे सांगणे न लगे, पण 'स्वयंघोषित' हा शब्द नेहमी अशाच लोकांना का लावल्या जातो काय माहिती. हे तथाकथित लिबरल लोकही काय वेगळे वागतात? आम्ही लिबरल आहोत हे कान फाटेस्तोवर ओरडणारे फक्त हेच लोक आहेत. स्वतःची टोळी सोडल्यास यांना कोणी लिबरल म्हणत नाहीत. त्यांना स्वयंघोषित का म्हणू नये?

अगदी अगदी...
पण हे तथाकथित बॅटमॅनही काय वेगळे वागतात?
आम्ही बॅटमॅन आहोत हे कान फाटेस्तोवर ओरडणारे फक्त हेच आहेत.
स्वतःची टोळी सोडल्यास यांना कोणी बॅटमॅन म्हणत नाहीत.
त्यांना स्वयंघोषित का म्हणू नये?

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

अर्थातच. आम्ही स्वयंघोषितच बॅटमॅन आहोत जसे तुम्ही स्वयंघोषित काळे मठ्ठ बैल आहात.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वयंघोषित बॅटमॅन का बरे?

मी मानतो त्याचे वटवाघूळपण. माझ्यासारखे अनेकजण आहेत येथे..

बोला वाल्गुदबाबा की ...!!

(काही लोक जय आणि काही झिन्दाबाद असे म्हणून बार फुस्स करु नका..)

आयला..धन्यवाद बरं का गवि! माझे विधान मागे.

काळे मठ्ठ बैलसाहेब, आता आम्ही स्वयंघोषित नाही. (नाही आहोत म्ह. जरा विचित्र वाट्टे.)

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आयला..धन्यवाद बरं का गवि! माझे विधान मागे.

त्यांच्या वाक्यातील खोच तुम्हाला कळलेली दिसत नाही. म्हणून धन्यवाद देताय.

मी मानतो त्याचे वटवाघूळपण. माझ्यासारखे अनेकजण आहेत येथे..

यातला सुप्त गर्भितार्थ 'मला (आणि माझ्यासारख्या अनेकांना) तुम्हाला उलटे लटक(व)लेले पाहायला प्रचंड आवडेल' असा नसल्यास निदान मला तरी प्रचंड आश्चर्य वाटेल.

'खोच'क अशी श्रेणी दिली आहे.

यातला सुप्त गर्भितार्थ 'मला (आणि माझ्यासारख्या अनेकांना) तुम्हाला उलटे लटक(व)लेले पाहायला प्रचंड आवडेल' असा नसल्यास निदान मला तरी प्रचंड आश्चर्य वाटेल.

१. सुप्त गर्भितार्थ म्हणजे काय? गायीचे गोमूत्र?
२. एरवी वैयक्तिक नैतर ऑर्गनाईझ्ड हिंसेविरुद्ध कडकड करून वात आणणार्‍यांना अशी हिंस्र इच्छा व्यक्त करताना पाहून रोचक इ.इ. वाटलं.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी अगदी सुप्त गर्भितार्थ = पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला । गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ Wink

पिवळ्या पीतांबरावरनं रणजित देसाई आठवले.

प्रसंगः आळेगाव येथे माधवराव विरुद्ध राघोबा लढाईत राघोबांचा जय होतो. तेव्हा त्यांच्या डेर्‍यात सखारामबापू असतात अन चर्चा चाललेली असते. बहुतेक बापू म्हणतात- "अहो काय लढाई झाली! (विरुद्ध बाजूकडील) शुभ्र धोतरांची पीतांबरे झाली!" ROFL ROFL ROFL

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आई ग्ग!!! ROFL

('की' बरोबर 'झिंदाबाद' जात नाही.)

स्वतःची टोळी सोडल्यास यांना कोणी लिबरल म्हणत नाहीत.

लिबरल, सुडो-लिबरल वगैरे विशेषणांच्या 'शिव्या' देत राहणारे (आणि त्यावरून कडकड करून वैताग आणवणारे) बॅटमॅन हेपण टोळीतलेच का?

बॅटमॅन हेपण टोळीतलेच का?

गुड क्याच! पण सेन्स वेगळा असल्याने ड्रॉप झाला.

बाकी आवड ज्याची त्याची इ.इ.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या धर्म संसदेला हिंदूंचे ठेकेदार म्हणविणार्या कुठल्या ही संस्थेचे अर्थात भा ज प किंवा विश्व हिंदु परिषदेचे समर्थन नव्हते.

त्यांचे बस चालले असते तर स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना केंव्हाच शंकराचार्य या पदावरून काढून टाकले असते.

त्यांच्या मते हिंदूंमध्ये फूट टाकण्यासाठी स्वामी स्वरूपानंद यांचा वापर कॉंग्रेस पार्टी पूर्वी पासून करीत आहे. ( त्यांनी मोदींचे नाव घेणाऱ्या पत्रकाराच्या थोबाडीत मारली होती).

सुश्री उमा भारती, वेदांती यांनी साई बाबांचे खुले समर्थन केले.

माझ्यामते: गीतेत भगवंताने म्हंटले आहे, कुठल्या ही देवतेची पूजा करा ती मज पर्यंत पोहचते. मग दगडाची असो व वृक्षाची. यक्षांची असो व सर्पांची. साई बाबा तर एक माणूस होते. त्यांना देवाचा अवतार मानण्यात काहीच हरकत नाही कारण 'सर्व प्राण्यांना भगवंताच्या संदर्भात पाहतो तोच खरा भक्त'.

You will only be hurt a finite number of times during your life. You have an infinite number of ways to deal with it.

काल बार्न्स अँड नोबल्स मध्ये, कविता विभागात "I WROTE THIS FOR YOU" पुस्तक चाळले. खूप आवडले. काही कारणाने घेता आले नाही पण आज त्यातील एक वाक्य गुगल केले असता पुढील ब्लॉग सापडला -

http://www.iwrotethisforyou.me/

I know you move your fingers when you sleep because I have felt them move and I know I must do the same.

And I must wonder how many times we have unconsciously, in dreams or nightmares, reached for each other's hands and never even known.

When I end, I will end as a tree ends: as a fire, bleeding out the sunlight from every summer it lived.

सुंदर , क्रेझी, अतिशय सुंदर .....

शिक्षकदिनी होणार्‍या मोदींच्या भाषणाबद्दल ही एक ब्लॉगपोस्ट.

बाकी पाठोपाठ - ऋषिकेशीय प्रवृत्ती. ***चे सेकुलर. ***चे लिबरल. रोचक. उद्बोधक. मनोरंजक.... वगैरे वगैरे वगैरे. चालू द्या.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेख चांगला आहे. सक्तीची आजिबात गरज नाही. इतकंच असेल तर रेडिओवर ऐकवा म्हणावं. पंप्र साह्यबांचं भाषण ऐकणं म्हत्त्वाचं की पाहणं? सक्ती करण्याचा काय संबंध असू नये आजिबात.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इतकंच असेल तर रेडिओवर ऐकवा म्हणावं. पंप्र साह्यबांचं भाषण ऐकणं म्हत्त्वाचं की पाहणं?

ऐकणं किंवा पाहणं यापैकी काहीच महत्त्वाचे नाही असे वाटते. रेडिओवर तरी कशाला ऐकवायचे? ज्यांना ऐकायचे आहे ते ऐकतील. शाळेतील मुलांनी ऐकलेच पाहिजे असे वाटत असेल तर पंतप्रधानपदाऐवजी मुख्याध्यापक ही चांगली जागा आहे.

होय, तेही आहेच.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या फतव्याचा (वृत्तपत्रे सोडुन) अधिकृत दुवा मिळेल काय? बहुतेक हा फतवा फक्त दिल्लीसाठी काढलेला दिसत आहे, निदान डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनच्या संस्थळावर ह्याबद्दल काही दिसले नाही.

>> निदान डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनच्या संस्थळावर ह्याबद्दल काही दिसले नाही. <<

फतवा Human Resource Development विभागातल्या (शालेय शिक्षण) सचिवांकडून आला होता असं ह्या बातमीत म्हटलं आहे. बातमीतून उद्धृत -

Earlier, an order issued by Rajarshi Bhattacharya, secretary, ministry of Human Resource Development, Government of India, dated August 29, asked all states to ensure that children assemble between 2.30pm and 5 pm on September 5 in their respective schools to listen to a TV address of the prime minister and take part in a question and answer session.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शक्य, पण निदान स्मृतीबाय तरी म्हणते की भाषण न बघण्याचे स्वातंत्र्य आहेच, बहुदा फतवा काढला असणार आणि आता सारवा-सारवी चालु असावी.

.

Few days ago i read prasoon joshi's interview (he is adevertising marketing man behind modi's success) he made a comment about those sona belt/baba bhabuti etc. type products which are sold only during night time when customer/viewer's concentration is weakest . maybe I'm reading too much but i think this counts in the same league. Beacuse every children and teacher is exhausted after whole days work

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

http://www.rd.com/culture/rd-interview-anna-quindlen/
ही मुलाखत एक २-३ महीन्यांपूर्वी वर्तमानपत्रात वाचली होती. परवा परत रीडर्स डायजेस्ट मध्ये वाचनात आली. रोचक वाटली.

What would you say is your proudest achievement?
ह्या प्रश्नाचं उत्तर विशेष वाटलं. इरावती कर्वे आठवल्या.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा उपरोध आहे की खरच तसं वाटतय तुम्हाला?
मला पुढील उत्तर अतिशय आवडलं -

The main character in your new novel, Still Life with Bread Crumbs, has had a great career, but now she’s down on her luck. Does she embody your fears of the worst that could happen, 
or is she just a work of the imagination?

Definitely imagination. I’m interested in second and third acts in American lives. I wasn’t so focused on what she’d lost as on what she might learn. She has the opportunity to become a different person. I hate the notion that at a certain point, you’re done, you’re cooked.

अर्थात दुसर्‍या शब्दात ती हेच म्हणते आहे - Every day in every way , I am getting better and better. Smile
ही जी रॉक बॉटम गाठून परत वर उसळायची वृत्ती आहे ती मला रोचक वाटते. Smile

उपरोध नाही. तो प्रश्न आणि त्याचं उत्तर दोन्ही महत्वाचं वाटलं.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

The rose communicates instantly with the woman by sight, collapsing its
boundaries, and the woman widens her boundaries.

Her "rate of perception" slows down, because of its complexity.

प्रत्येक वेळी "Mei-mei Berssenbrugge" यांची "Hello, the Roses" कविता वाचते तेव्हा फक्त dizzy-dizzy वाटतं. अक्षरक्षः त्या कवितेच्या सौंदर्यानी भोवळ येते. कवयित्रीने गुलाब पाहील्यानंतर होणार्‍या तिच्या मनस्थितीचं अन भावविश्व विस्तारुन, त्या गुलाबाच्या रंग-रुप-सुगंधाशी होणार्‍या तादात्म्याचे केलेले अधिक उत्कट अन काव्यमय वर्णन मी तरी वाचले नाही. तत्काळ भौतिकतेच्या मर्यादा लांघून, स्वर्गिय सौंदर्य पातळीवर वाचकाला ही कविता नेते. एखादं फूल पाहील्यावर त्या फुलाच्या कोमलतेमध्ये वेढून गेल्यासारखे जे होते जी मृदूकोमलता जाणवते, असीम सुगंध भरुन उरतो,जे भान हरपून जाते, ते शब्दात कसे व्यक्त करायचे याचा परिपाठ आहे ही कविता.

There is a trans-dimensional blend of human and divine or transcendental elements around me. A person can be brought up to think of a mountain as a spirit, a cardinal
point, or to think of it as inert rock. She may read unique information encoded in the fractalized dimensional ridgeline of a mountain, the crimson edge of a petal.

सुरवातच अफाट आहे -

My soul radially whorls out to the edges of my body, according to the same laws
by which stars shine, communicating with my body by emanation.

त्या अधोरेखित शब्दाला जी वेग अन तीव्रतेची "sweeping off the feet" ... रिंग आहे ती पाहता असा शब्द फक्त एखादा सिद्ध्हस्त कवि/लेखकच योजू जाणे.

या लेखाला - सर्वात आवडलेल्या काही लेखांपैकी एक म्हटले तरी चालेल -

http://www.poetrysociety.org/psa/poetry/crossroads/own_words/Mei_mei_Ber...

कविता पहिल्यांदाच वाचली.
आवडली! आभार!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile वेलकम!!!

मी नुकतीच पंजाबातल्या शिखांच्या, नानकाना पंथाच्या इतिहासावर, खालसा पंथाच्या स्थापनेवर लिहिलेली 'व्याध' ही कादंबरी वाचली. लेखक प्रशांत असलेकर, मधुरा प्रकाशन. कादंबरीचा काळ सुमारे १६६६ ते १७१६ हा आहे.
शांतताप्रिय आणि शांततेबाबत आग्रही असणा-यालाही जुलूम, विश्वासघात, कपटीपणापायी अखेरीस सशस्त्र प्रतिकाराचाच मार्ग निवडावा लागतो हा या सा-या इतिहासाचा सारांश आहे. अर्थात कादंबरी असल्याने तपशीलाचे स्वातंत्र्य घेतले असणारच. पण एकंदरीत विषयच इतका जहाल आहे की परिणाम होतोच. काही काही भाग वाचून तर पुरंद-यांच्या 'सातशे वर्षांची काळरात्र'ची आठवण येते. मुघल सत्तेशी संबंधित कुठल्याही लेखनातून अमानवी क्रौर्य वगळणं शक्य नसावंच बहुधा..
या विषयावर हाती आलेलं हे पहिलंच पुस्तक, अजून वाचायला आवडेल.

याशिवाय फॉर हिअर ऑर टू गो? (अपर्णा वेलणकर, मेहता प्रकाशन) हे पुस्तक गेल्या वर्षीच विकत घेतलं होतं. पण आत्ता वाचायला सुरूवात केली.
अमेरिकेमध्ये मराठी माणूस स्थायिक व्हायला लागून आज अर्धं शतक उलटून गेलंय. आज पुणे मुंबई वा-या कराव्या तितकं अमेरिकेला जाऊन येणं सहज वाटायला लागलंय. पण पहिली पिढी तिथे गेली, तेव्हापासूनच्या प्रवासात या स्थलांतरितांना व्यक्ती, जोडीदार, आईबाप, मुलं, व्यावसायिक, नोकरदार या वेगवेगळ्या भूमिका जगताना जे म्हणून आव्हान समोर आलं, त्याचा हा रिपोर्ताज.
भाषा, वेष, संस्कृती, नीति, हवामान काहीच सामाईक नसताना + डोक्यामध्ये भारतीयत्वाचा अनभ्यस्त अभिमान आणि भारतीयांचं सर्वसाधारण गोंधळलेपण असताना परक्या देशात बस्तान बसवणं, आपल्या मुलांना वाढवणं यात या सर्वांची प्रचंड दमछाक झाली. त्या वाटेवर असलेले असंख्य टप्पे, अडचणी, शोधलेले उपाय सगळ्याची गोळाबेरीज करून मांडणं खरंतर फार अवघड आहे.
या मंडळींनी अमेरिकेत कमावलेल्या डॉलर्सची प्रत्यक्षात किती किंमत मोजली आणि कदाचित अजूनही मोजताहेत, हे या पुस्तकातून समजून घेते आहे.

"माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...
मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले:
... क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात..."

"फॉर हिअर ऑर टू गो" हे नेटकं पुस्तक आहे. या विषयावर इतकं आणि इतक्यांदा लिहिलं गेलेलं आहे, वाचायला मिळत असूनही त्या पुस्तकाचं ताजेपण वेगळा आब राखून आहे हे विशेष! (मला फार्फार नव्हतं आवडलं पण अनेकांना ते खूप आवडतं)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"walt whitman" यांचे "leaves of grass" वाचते आहे. "Song of open road" ही कविता तर अप्रतिम आहेच पण "A woman waits for me", "Among the multitudes", "Captain, O my Captain!!!" वगैरे अनेक कविता फार सुंदर आहेत. अर्थात "Song of open road" माझी सर्वात आवडती!

खाली "Among the multitudes" कविता देत आहे.

Among the men and women, the multitude,
I perceive one picking me out by secret and divine signs,
Acknowledging none else—not parent, wife, husband, brother, child, any nearer than I am;
Some are baffled—But that one is not—that one knows me.
Ah, lover and perfect equal!
I meant that you should discover me so, by my faint indirections;
And I, when I meet you, mean to discover you by the like in you.

_____________________

"Song of open road" कवितेतील पुढील कडवं तर खल्लास आवडतं.
Allons! we must not stop here,
However sweet these laid-up stores, however convenient this dwelling we cannot remain here,
However shelter’d this port and however calm these waters we must not anchor here,
However welcome the hospitality that surrounds us we are permitted to receive it but a little while.

हा "open road" हे सतत वाहत्या जीवनाचं प्रतिक आहे असे वाटते अन कुठेही न थांबता, आई-वडील, प्रेमिक, मित्र आदि मोहात न अडकता अविरत , जन्मोजन्मी एकटे चालत रहाण्याचे प्रतिक ही कविता वाटते.

This comment has been moved here.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बुकगंगावरून माधुरी पुरंदर्‍यांची 'पिकासो' आणि 'त्या एका दिवशी' ही तर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य' ही तीन पुस्तके मागवली.
१. छ.शि.म. जीवन-रहस्य - उत्तम विवेचन. परंतु ह्याबद्दल, ह्यातल्या मतांबद्दल जालावर वाचले होते, त्यामुळे प्रत्यक्ष वाचताना तितके भारी वाटले नाही. तसेच 'जनतेचे राज्य','जनतेचे ..' वगैरे संकल्पना फार स्पष्टीकरणाशिवाय येत होत्या. एकुण पुस्तक छान आहे, पण जागर, शिवरात्र वगैरेंइतके खास वाटले नाही. जरा जास्तच छोटे आहे.
२. त्या एका दिवशी - पुस्तकात 'त्या एका दिवशी' आणि 'मला क्रियापद भेटले तेव्हा' ह्या दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट साहसी मुलगा, गुन्हेगार पकडून देणे अशा वळणाची आहे. दुसर्‍या गोष्टीत मुलीला सर 'मला क्रियापद भेटले तेव्हा' ह्या विषयावर निबंध लिहायला सांगतात. 'मरणे' ह्या क्रियापदाची झालेली ओळख, त्यातून होणार्‍या गमतीजमती, मरणाची जवळून ओळख, मरणानंतर काय ह्याबद्दलचे आईचे बोलणे ह्या सगळ्यांतून मृत्यूबद्दल एक निरोगी विचार करायला मुलांना शिकवणारी गोष्ट (पण उपदेशपर नव्हे) आहे. सहज सोपी भाषा, जाणीवपूर्वक वेगळ्या शब्दांचा वापर, गंमतीशीर उपमा हे सगळे फार आवडले. एकुणात शाळेतल्या कुणाला भेट म्हणून देण्यासाठी उत्तम पुस्तक आहे.
३. पिकासो - पिकासोचे चरित्र वाचायला सुरुवात केली आहे. बघुया माझ्या सारख्या चित्रनिरक्षराला पुस्तक कसे वाटते ते!

>> पहिली गोष्ट साहसी मुलगा, गुन्हेगार पकडून देणे अशा वळणाची आहे. <<

माझ्या मते साहसकथा हा केवळ एक रूपबंध (फॉर्म) म्हणून घेतला आहे. आईवडिलांच्यात जे चाललं आहे ते, त्याची मुलाला होत गेलेली जाणीव आणि त्यातून त्याचं मोठं होणं हा कथेचा गाभा आहे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आईवडिलांचे वाद चालू असणे, त्यामुळे मुलाचे वैतागणे, बाबाचे मन लागत नसल्याचे मुलाला लक्षात येणे वगैरे गोष्टी कथेत महत्त्वाच्या आहेत हे मान्य आहे, पण हा भाग कथेचा गाभा आहे असे कथा वाचताना तितके वाटले नाही (असे आहे हे आधी वाचले असूनही). उलट तो भाग काहीसा चिकटवल्यासारखा आणि कमी रंजक वाटला.

"द बर्ड लव्हर्स अँथॉलॉजी" नावाचं जुनं पुस्तक परत वाचते आहे. यात पक्षांवरच्या अत्यंत सुंदर कविता आहेत. स्कायलार्क, कक्कू,व्हाइट-थ्रोट्,थ्रुश, कॅट्बर्ड, ब्लू जे, सीगल , टिट्माऊस वगैरे अनेक पक्षांवरच्या सुंदर सुंदर जुन्या कविता एकत्र आढळतात.
_____________
"द व्हाइट-थ्रोट" कवितेत, "व्हाइट-थ्रोट" पक्षाला कविने प्रेमाचा प्रवक्ता म्हटलेले आढळते.
The singing white throat, poured my gladness out
And spread my golden wonder through the trees,
That day when love burned the dead leaves of doubt,
And sifted sorrow's ashes to the breeze,
My soul sat in her sunshine by the door,
while her sweet spokesman told it o'er and o'er.
______________
"टू द स्काय-लार्क" कवितेत कवि वर्ड्स्वर्थ लार्क पक्षाला "आकाश्यात्रेचा वाटसरु" म्हणून संबोधतो.
ETHEREAL Minstrel! Pilgrim of the sky!
Dost thou despise the earth where cares abound?
_________________________________________

ब्लू जे पक्षास अनेक कविंनी खलनायक हे नाम वापरले आहे : )

I hear savage tale of you,
Raucous of voice, magnifiscently Blue,
Cannibal bird! whose dark defiant note,Villain among the birds is he,
A bold, bright rover, bad and free;
yet not without such loveliness,
as makes the curse upon him less
if larkspur blossoms were a-wing,
if iris went adventuring
Or on some morning we should see,
heaven bright blue chickory
come drifting by we would forgive
soem little sins and let them live
.
verlain among the birds is he,
a creature of inequity.
क्या बात है!!! निव्वळ सुंदर!!!
_____________
"ऑन फर्स्ट हॅव्हींग हर्ड द स्काय्लार्क" ही तर इतकी उत्कट कविता आहे. पहील्यांदा हृदय विद्ध, विदिर्ण होण्याचं रुपकच आहे ही कविता. ...व्यनि केल्यास ती कविता टायपून पाठविण्यात येइल....
"द फ्लुट ऑफ क्रिष्णा" कवितेत मॉकिंग बर्ड्च्या आवाजास कृष्णाच्या बासरीची उपमा दिलेली आहे.
पुस्तक संग्राह्य आहेच.

पक्ष्यांवरील कवितांचा संग्रह ही कल्पना सुरेख आहे. वर्डस्वर्थ आणि शेली ह्या जवळजवळ समकालीन कवींच्या दोन कविंताचे शीर्षक एकच (To a Skylark) असावे, हे मजेशीर आहे. (शेलीच्या या कवितेतली 'Our sweetest songs are those that tell of saddest thought' ही ओळ प्रसिद्धच आहे).

त्याच काळात, याची पुनरावृत्ती थोडक्यात टळलेली दिसते. पहा: The Nightingale (कोलरिज) आणि Ode to a Nightingale (कीट्स).

मराठीतल्या अशा कविता आठवायला घेतल्या तर? मला आठवणार्‍या काही:

१. केवढे हे क्रौर्य! - रेव्ह. टिळक
(मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबविले,निष्प्राण देह पडला श्रमही निमाले.)

२. पारवा - बालकवी
(तुला नाही परि हौस उडायाची, गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात, गीतनिद्रा तव आत अखंडित)

३. चार होत्या पक्षिणी त्या - कुसुमाग्रज
(दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती)

४. झाडे (बहुधा) - द. भा. धामणस्कर

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत...

कवि कोण ते कळलं नाही पण ही कविताही अतिशयच गोड आहे -

खंड्या (धीवर पक्षी)

तळ्याकाठी गाती लाटा,
लाटांमध्ये उभे झाड.
झाडावर धीवराची,
हाले चोच लाल जाड.

शुभ्र छाती, पिंगे पोट,
जसा चाफ़ा यावा फ़ुली.
पंख जणू थंडीमध्ये,
बंडी घाली आमसुली.

जांभळाचे तुझे डोळे,
तुझी बोटे जास्वंदीची.
आणि छोटी अखेरची
पिसे जवस फुलांची.

गड्या पाखरा, तू असा
सारा देखणा रे कसा?
पाण्यावर उडताना,
नको मारू मात्र मासा.
_______________

आता वाचलेली अतिशय देखणी कविता -
to the cuckoo by william wordsworth

O Blithe New-comer! I have heard,

I hear thee and rejoice.

O Cuckoo! Shall I call thee Bird,

Or but a wandering Voice? ..................||१||

While I am lying on the grass

Thy twofold shout I hear,

From hill to hill it seems to pass,

At once far off, and near........||२||

Though babbling only to the Vale,

Of Sunshine and of flowers,

Thou bringest unto me a tale

Of visionary hours. ........||३||

Thrice welcome, darling of the Spring!

Even yet thou art to me

No bird, but an invisible thing,

A voice, a mystery; ........||४||

The same whom in my school-boy days

I listened to; that Cry

Which made me look a thousand ways

In bush, and tree, and sky.........||५||

To seek thee did I often rove

Through woods and on the green;

And thou wert still a hope, a love;

Still longed for, never seen.........||६||

And I can listen to thee yet;

Can lie upon the plain

And listen, till I do beget

That golden time again.........||७||

ऐला! परवाच 'खंड्या' कवितेची आठवण निघालेली. आम्हाला शाळेत मराठी अभ्यासक्रमात होती. 'मेरा दिल ये पुकारे आजा' च्या चालीवर म्हणायचो ROFL

"Birdlover's Anthology" पुस्तकातील २५०-३०० कवितांपैकी एकच उल्लेखनीय कविता मला निवडायला सांगितली तरी मला ते अवघड जाणार नाही कारण Out of the Cradle Endlessly Rocking ही Walt Whitman, यांची कविता वाचली अन मला ती नंबर १ कविता सापडली. ही कविता मोठी आहे. १० मोठ्या परिच्छेदात ती विभागली गेलेली आहे. वाचताना वाल्मिकीमची आठवण झाल्याशिवाय रहात नाही कारण २ प्रेमिक पक्षांच्या विरहाची ही कविता आहे.

कवीच्या बालपणी अलाबामास आलेले २ पाहुणे त्याच्या नजरेस पडले. ते होते नर अन मादी मॉकिंग बर्डस.
Two feather’d guests from Alabama, two together,
And their nest, and four light-green eggs spotted with brown,
And every day the he-bird to and fro near at hand,
And every day the she-bird crouch’d on her nest, silent, with
bright eyes,
And every day I, a curious boy, never too close, never
disturbing them,
Cautiously peering, absorbing, translating.

आनंदात ते जोडपं कालक्रमणा करत असे .... तो सकाळी गाणे गात असे.

Shine! shine! shine!
Pour down your warmth, great sun!
While we bask, we two together.

Two together!
Winds blow south, or winds blow north,
Day come white, or niqht come black,
Home, or rivers and mountains from home,
Singing all time, minding no time,
While we two keep together.

अचानक एके दिवशी पक्षीण आलीच नाही . ती ना त्या दुपारी आली ना नंतरच्या दिवशी, ना नंतरच्या दिवशी अन नर वाट पहात राहिला. त्याची मन:स्थिती सैरभैर होउन गेली. समुद्राची गाजही त्याला भेसूर वाटू लागली.

Blow! blow! blow!
Blow up sea-winds along Paumanok’s shore;
I wait and I wait till you blow my mate to me.

रात्री तारे आकाशात येत, पण नराला झोप नसे, एकटा खिन्न असा किनार्यावर बसून तो तिला हाका मारत राही, केविलवाणा बोलावत राही.

Soothe! soothe! soothe!
Close on its wave soothes the wave behind,
And again another behind embracing and lapping, every one close,
But my love soothes not me, not me.

तो आर्त सुरात सागराची विनवणी करत राही - हा विशाल सागर त्याच्या उंच उंच लाटांबरोबर माझा प्रेमिक मला का परत करत नाही? का माझ्या प्रेमिकेला माझी आर्त हाक, माझं बोलावणं ऐकू येत नाही? चंद्रावर हा काय डाग आहे? ही माझी प्रेमिका तर नाही? जिथे जिथे मी नजर वळवतो, तिथे तिथे मला ती दिसते, मग ती परत का येत नाही?
असं असेल का की माझेच स्वर स्पष्ट नाहीत, तिच्या कानांवर पडत नाहीत? तसं असेल तर मी कुजबुज करत तिला हाक मारतो. मग कदाचित तिला ऐकू येईल. अन थकून गेलेला तो खालच्या पट्टीत क्षीण हाका मारू लागतो - मी इथे आहे ग, तुझ्या विरहात व्याकुळ!!! ये.

कवी मॉकिंग बर्ड चे सूर आपल्यापुढे शब्दात मांडत रहातो. कवी म्हणतो - त्या सुरांनी माझं आयुष्याच पालटलं. पूर्वीचा स्वच्छंदी मुलगा लोप पावला अन आजारी प्रेमाच्या त्या सुरांनी मृत्यू म्हणजे काय याची मला पहिल्यांदा जाणीव झाली.

खरच अनुभवावी अशी ही करुण कविता, http://www.bartleby.com/142/212.html येथे वाचता येईल.

सकाळी रीडर्स डायजेस्ट मध्ये शार्क ची डायरी नावाचा विनोदी लेख वाचला.
__________
हा लेख देखील रोचक आहे विशेषतः त्या लोकांसाठी ज्यांना स्वतःच्या बॉडी इमेजबद्दल न्यूनगंड आहे त्यांच्यासाठी उत्तम लेख आहे. हा देखिल एका रिडर्स डायजेस्ट मध्ये वाचनात आला.

रोचक शब्द वापरल्याबद्दल अभिनंदन. one of us, one of us...

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

उपवासाचं थालीपीठ!

निवडक रत्ने:

नाना फडणवीस, सदाशिव पेठ - शुक्रवार, 12 सप्टेंबर 2014 - 01:01 PM IST

अर्धा इंच आले टाकून थालीपीठ किती ते तिखट होणार हो? काहीही सांगता... आहो तुम्ही रात्रीपण अश्याच बावरलेल्या होत्या का हो... नाही म्हणजे नवीन पणी बवार्नेच जास्त असता आणि काम कमी... (इथे काम हा शब्द संस्कृत मधील आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी)

खाजू शेट्टी - शुक्रवार, 12 सप्टेंबर 2014 - 12:12 PM IST

ह्या लेखातून आले उत्पादकांवरच्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न काकूंनी केलाय, हे महायुतीतल्या इतर घटक पक्षांनी लक्षात घ्यावे, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.

एक karyakarta - शुक्रवार, 12 सप्टेंबर 2014 - 12:03 PM IST

त्या काळात मोदींचे सरकार नव्हते म्हणून थालीपित तिखट झले आसव आछे दिन अब आहे हे

MDH मसाले - शुक्रवार, 12 सप्टेंबर 2014 - 10:59 AM IST

अहो काकू, तुम्ही आमचे मसाले वापरून थालपीठ करत जा. मिशेलबाई, मेलिंडा गेट्स बाई पण आमचे मसाले वापरतात. सोनिया बाईना तर खूपच आवडतो आमचा मसाला. त्या आमचा मसाला चपाती बरोबर "भाजी" म्हणून खातात. किचेन किंग हो , या गरम मसाला चाय का मसाला, या चणे का मसाला कसुरी मेथी या देघी मीरच असली मसाले, सच सच M-D-H, M-D-H

पुणेकर - शुक्रवार, 12 सप्टेंबर 2014 - 10:10 AM IST

"आल्याचं" थालीपीठ न खाताच आमच्या डोळ्यात पाणी "आलं".........हर हर महादेव.....

पु ल - शुक्रवार, 12 सप्टेंबर 2014 - 07:34 AM IST

टेक वन इंच ऑफ जिंजर and किस it

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एवढा पण बाद नाहीये लेख. मांजर, आमसुलं वगैरे क्लासिक्स जाऊदे, पण "माकडाने पळवला मोबाईल" इतपतही नाहीये.

अवांतरः उपवासाला आलं चालतं का?

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सहमत आहे. जरा पानीकमच आहे. बाकी 'आला हजरत' बद्दल माहिती नाही.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फॅवरिट

स्वाती ठकार - शुक्रवार, 12 सप्टेंबर 2014 - 02:49 PM IST

काय लिहिलंय.. पशुपथिनाथ...ताठ उभी राहा... आणि इकडे बघ.. काय वाह्यातपणा चालवलाय? तुम्ही कधी साकीनाकाच्या जंगलात गेला आहात का हो? दुपारी ३ वाजता पण किर्र अंधार असतो म्हणे... तिथे जाऊन स्तनातन मंदिराजवळ मिसळ आणि तर्री खायची. पण बरोबर कमीत कमी २३ लोक तरी पाहिजेच. तरीपण तुम्ही ऐकायचं नाही हेच ठरवले असेल.. तर मात्र मला वेगळा उपाय करावा लागेल. मग मात्र मी तुम्हाला टाच दाखवीन.. चालेल ना? चल तर मग..

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

च्यायला ROFL

बादवे, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचे भाग्य अस्मादिक सोडून कुणास मिळाले आहे काय?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साधारण एका वर्षाआधीचा काळ हा मुक्तपीठीय वाड्मयाचा सुवर्णकाळ होता. प्रत्येक लेखावर येणार्‍या प्रतिक्रिया लेखापेक्षा लाख पटींनी उच्च असत. त्याच काळी प्रतिक्रियाकारांमध्ये स्वाती ठकार, बालमोहन ऊसगाव, पोपा मॅडम(एक लाट तोडी दोघा फेम), ब्रम्हे(महागात पडलेले स्त्री दाक्षिण्य), ज्यु.ब्रम्हे,नाना फडणवीस, सदाशिव पेठ या नवीन तार्‍यांचा उगम झाला. पाहता पाहता त्यांनी आकाश व्यापुन टाकले. पण म्हणतात ना एखाद्या गोष्टीचा एक काळ असतो, गेले ते राहील्या त्या आठ्वणी.

काही अजरामर कलाकृती:
आठवणींच्या विश्‍वात (मुक्तपीठ)
हिमवादळाच्या गर्तेत (मुक्तपीठ)
द बर्निंग ट्रेन (मुक्तपीठ)
हा कोणता ऋणानुबंध? (मुक्तपीठ)
सफारीमुळं झालो 'सफर' (मुक्तपीठ)
प्रयत्नांती सुयश (मुक्तपीठ)
धक्‍क्‍यावर धक्के (मुक्तपीठ)
लग्न पाहिलं करून... (मुक्तपीठ)
ब्लॅक आउटनं आणली अंधारी... (मुक्तपीठ)
नशीबवान घड्याळ' (मुक्तपीठ)
चालणारी आमसुलं (मुक्तपीठ)
परतुनि ये किकलू...
एक लाट तोडी दोघा... (मुक्तपीठ)
तलाश'ची दोन वर्षे (मुक्तपीठ)
अमेरिकी मसाला (मुक्‍तपीठ)

स्वाती ठकार ला भेटलैस? भावा काय म्हणतैस? शेवटच की.

~यन्त्रमानव.

आहाहाहाहाहा...भावा रडीवलंस!

अन स्वाती ठकारला कसा भेटलो तीपण येक छोटीशी कहाणीच आहे. लय मजा आल्ती ROFL

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एका लेखात वारे आणि "ङरज्ञश शषषशलींय जास्तच जमणारा बर्फ! असे वाक्य आहे. पहील्या आणि दुसर्‍या शब्दाचा अर्थ काय आहे?

अश्मयुगीन संस्कृतातले शब्द असावेत बहुधा.

-अश्मपाणिनि.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्तनातन मंदीर!
ROFL

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://www.nytimes.com/2014/09/12/science/a-window-into-everyday-moralit...

Committing a small act of kindness, like holding the door for a harried stranger, often prompts the recipient to extend a hand to others, but it comes at a cost, psychologists have long argued. People who have done the good deed are primed to commit a rude one later on, as if drawing on moral credit from their previous act.

३% लोक क्रेडीट वापरायचा प्रयत्न करतात; पण चांगल्या वर्तनाचे फायदे मिळालेल्यांपैकी १०% जास्त लोक चांगलं काम करतात. करा गणित गब्बरशेट!

या बातमीतला गंमतीदार भाग हा वाटला -
The survey found no significant differences in moral behavior or judgment between religious people and nonreligious ones.

या अशा विषयांवरच्या बातम्यांची शीर्षकं सनसनाटीच का असतात?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझं गणित अतिशय कच्चं आहे हे सांगूनही तुम्ही मला च्यालेंज करता !!! थांबा थांबा बायकोकडे गणिताचा क्लास लावतोच. पण बघा हं ... नंतर मात्र तुमचं काय खरं नाय. आणि तसंही .... The payoff to being a math person has never been higher.

हा लेख ब्याट्या, आदिती, राघां सारख्या गणितींसांठी. भौतिक शास्त्र, अंतरिक्ष, स्टॅट ही मंडळी म्याथ ची कझिन्स आहेत असा माझा लहानपणापासूनचा समज आहे.... मंजे सुमारे अडीच वर्षांचा असल्यापासून -

http://online.wsj.com/articles/the-best-language-for-math-1410304008?mod...

लेखाचा मथळा हा आहे - The Best Language for (learning) Math

धन्यवाद. रोचक निष्कर्ष आहेत. यद्यपि बेशिक न्यूमरसीसाठी हे अ‍ॅप्लिकेबल असले तरी पुढे नक्की किती फरक पडतो याबद्दल डौटफुल आहे. असो.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याबाबत एका भाषाविषयक फेसबुक समूहावर मी दिलेला प्रतिसाद (भाषांतराचा आणि पुनर्टंकनाचा कंटाळा) :
---
Meh. They need to study more Indo-European languages. The numbers 11-20 (or at least many of them) have names or patterns that differ from 21-99 in very many Indo-European languages. Let's consider Hindi: There are of course, the names for 0, and 1-10. The numbers 11-18 were etymologically (in an ancient language) one-and-ten, two-and-ten, ... eight-and-ten; but have mutated into very different sounds. Thus 11, one-and-ten should have been "ek-aur-das" in Hindi (ancient eka-aa-dasha, actually used form) has mutated into the almost unrecognizable "gyarah". Similarly mutated names for 12-18. The number 19 (and 29, 39... etc.) are one-less-twenty should have been "eka-unaa-biis" in Hindi (ancient form eko-na-vimshati) gets mutated into the very different sounding "unniis". Would Hindi schoolkids be particularly worse off than English schoolkids? Let's put Hindi aside. In addition to different names for 11-16, French has the numbers 70-99 rendered with unusual rules (unusally complex compared to English). Are French learners at an even worse disadvantage than English gradeschoolers? One of the investigators in the cited article compared Anglo-Canadians with Turkish-Canadians. They would do well to compare Anglo-Canadians with French-Canadians! How about comparing English with Arabic, which has more regular numbers?
---

हा हा हा ROFL एकच नंबर सरजी. अगदी नेमके अन मार्मिक!

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धर्मनिरपेक्षता या विषयावर (कृषीप्रधानता इतकीच गुळगुळीत) चर्चा कैकवेळा झाली आहे. सबब पास.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

This comment has been moved here.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

This comment has been moved here.

प्रतिक्रिया काढून टाकायची होती. तसा पर्याय कुठे दिसला नाही.

You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin