Skip to main content

ही बातमी समजली का? - २२

भाग १ - १० चे दुवे इथे | ११ - २० चे दुवे इथे | २१

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचं वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---------

http://www.universityherald.com/articles/9383/20140513/earth-crust-anta…

एक वर्षाला १५ मीमी, उर्ध्व दिशेने हालचाल होत आहे, त्यावरील बर्फ वितळून इतरत्र गेल्याने, जे १००० वर्षांत व्हायला हवे. आशा करू या पृथ्व्वी दोन्ही धृवांवर टोपणांसारखी "उघडणार" नाही.

गब्बर सिंग Wed, 14/05/2014 - 06:52

http://timesofindia.indiatimes.com/india/BJP-promises-to-be-tough-on-Pa…

भाजपा निवडून येणारे असे केवळ एक्झिट पोल्स वरून गृहित धरलेत ? छान.

असो.

निवडून येणार्‍या प्रत्येक अमेरिकन राष्ट्राध्यक्षास एक मधुर स्वप्न दिसत असते - की इस्रायल व पॅलेस्टाईन यांच्यात करार घडवून आणून शांतता प्रस्थापित करणे. लवकरच त्यास कळते की हे कसे व किती कठिण आहे ते.

तद्वत भारताच्या प्रत्येक प्रधानमंत्र्यास पाकिस्तानबद्दल एक गोड गैरसमज असतो. (उदा. पहा: अरुण शौरींचा व्हिडिओ तूनळीवरील) अनेक प्रधानमंत्र्यांनी सामोपचार/मैत्री, व्यापाराची लालूच, a stable and prosperous Pakistan is in India's interest वगैरे स्टेट्समनगिरी (पहा: गांधीगिरी), कॉन्फिडन्स बिल्डिंग मेझर्स, हॉटलाईन, समझौता एक्सप्रेस, मिलिटरी टू मिलिटरी डायलॉग, काश्मिर ला प्याकेज अशी अनेक हत्यारं/औषधं वापरून पाहिलीयेत. पण पाकिस्तान इज & हॅज बीन अ टफ नट.

गब्बर सिंग Wed, 14/05/2014 - 09:53

In reply to by मन

शांतता, स्वातंत्र्य, व भरभराटीच्या अंतिम ध्येयाकडे जाताना क्रौर्य हे देखील उच्च मूल्य आहे असा विचार करायला सुरुवात केली तर ?

नितिन थत्ते Wed, 14/05/2014 - 09:58

In reply to by गब्बर सिंग

तसं उघडपणे म्हटलं तर 'ते'च फक्त वैट्ट असतात आणि 'आम्ही' कध्धी कध्धी दुष्टपणा करत नाही हे पोश्चर कसं टिकेल? (आम्हाला अफजलखानाला मारण्याचे सुद्धा नैतिक जस्टिफिकेशन लागते म्हटलं !!!)

ऋषिकेश Wed, 14/05/2014 - 10:15

In reply to by नितिन थत्ते

तसं उघडपणे म्हटलं तर 'ते'च फक्त वैट्ट असतात आणि 'आम्ही' कध्धी कध्धी दुष्टपणा करत नाही हे पोश्चर कसं टिकेल?

+१
मात्र याउप्पर कौर्याचा अर्थ 'प्रत्यक्ष युद्ध' असा अर्थ लावला जात असेल तर सध्याच्या काळात तो मुर्खपणा ठरेल.

(आम्हाला अफजलखानाला मारण्याचे सुद्धा नैतिक जस्टिफिकेशन लागते म्हटलं !!!)

तत्कालीन नैतिकतेला आताची परिमाणं लावायची म्हटली की अशी कसरत करावी लागणारच ;)

राही Sat, 17/05/2014 - 17:13

In reply to by ऋषिकेश

त्यापेक्षा अशी परिस्थिती, इतकी समृद्धी इथे निर्माण करूया की इथेच रहाण्यात कश्मिरी लोकांना स्वारस्य वाटेल. पैशांचा छनछनाट हा सगळ्यात मधुर नाद असतो म्हणतात. कश्मीर प्रश्न सुटला की सगळे संपलेच ना?
सध्या अशी (परिस्थिती निर्माण होण्याची) शक्यता निर्माण झाली आहे असे म्हणतात.
किती छान, नाही?

मन Wed, 14/05/2014 - 10:09

In reply to by गब्बर सिंग

वरील प्रतिसादात भर घालून अजून प्रतिसाद लिहीत होतो, तोवर तुझा उपप्रतिसाद आला.
हा माझा पूर्ण प्रतिसाद :-
सामोपचार/मैत्री, व्यापाराची लालूच, a stable and prosperous Pakistan is in India's interest वगैरे स्टेट्समनगिरी (पहा: गांधीगिरी), कॉन्फिडन्स बिल्डिंग मेझर्स, हॉटलाईन, समझौता एक्सप्रेस, मिलिटरी टू मिलिटरी डायलॉग, काश्मिर ला प्याकेज

पाकिस्त्ना काय कीम्वा काश्मीर मुद्दा काय ह्याबद्दल आपण ह्याहून अधिक आणि ह्याहून वेगळे काय करु शकतो ?

काश्मीर खोर्‍यापुरते :-
चीनने आख्ख्या सिक्यांग ह्या पूर्वीच्या फुटीर विभागाचा(इथे पूर्वी तुर्क टोळ्यांचे प्राबल्य होते, मुख्य हान वंशीय चीनी सत्ता क्वचितच आणि असलीच तर नाममात्र असे.) लोकसंख्येचे प्रमाण व्यस्त* केले म्हणतात.
(तिथे चीनच्या मुख्य भूभागातून)
तिबेटातही तेच करायचा प्रयत्न आहे म्हणतात.
भारताने ते काश्मीरमध्ये करावे का ?
करणे योग्य आहे का ?
करणे जमणार आहे का ?

*व्यस्त करणे म्हणजे उदाहरण क्र १:- चीनने प्रचंड संख्याबळाचा पुरेपूर फायदा घेत तिथे हान वंशीय चीनी लोकांना , प्रामुख्याने लष्करी लोकांना वसवले.स्थानिक पुरुषांची जबरदस्त संख्येने समूहहत्या केली.(masscare and pogroms असा शब्द त्यासंदर्भात ऐकला आहे.) सिक्यांगमधील घराघरातून प्रजननक्षम वयाच्या स्थानिक स्त्रिया ओढून बाहेर काढल्या. सैनिकात "वाटल्या".
त्यांना झालेली मिश्रवंशीय प्रजा चीनी संस्कृतीच्या प्रभावात वाढवली गेली. आज तिथे स्वत:ला चीनी समजणारी मिश्र
वंशीय प्रजा बरीच आहे.chinese have breeded out locals in that region. आता तो भाग चायना
बर्‍यापैकी सात्मीक्रुत केलाय्/पचवलाय/गिळलाय. कठोर व भयानक हिंसात्मक पावले एका पिढीपुरती निर्दयपणे राबवत
रहायची. पुढची पिढी येइस्तोवर बाहेरच्यांच्या प्रजेला स्वत:ला स्थानिक म्हणण्याचा क्लेम मिळालेला असतो.
(आक्रमकाची पुढची पिढी "आम्हीही इथेच वाढलोत" वगैरे म्हणू शकते.) अशी ही पद्धत आहे.

उदाहरण क्र २:-
इस्रायलनेही काहीसे असेच धोरण वापरलेले दिसते.(त्यांनी मिश्र प्रजेचा झोल निर्माण केला नाही.
त्यांनी पेल्स्टिनी लोकांना "फक्त" ओढत फरफटत घराबाहेर काढले, घरांवर कब्जा केला. बाहेर काढलेल्या लोकांना मरण्यास सोडून दिले. दिवसेंदिवस हे अधिकाधिक भूभागावर करत गेले, व क्लेम वाढवत नेला.
आज जे काय साठेक लाख ज्यू तिथे आहेत ते "आम्ही इथलेच आहोत; आम्ही इथेच वाढलोत.हीच आमची मातृभूमी" वगैरे
म्हणत असतात. ज्यूंनी त्या भूभगाच्या मालकी हक्कात खुबीनं स्वतःला पॅलेस्टिनींसोबत हायफनेट करुन घेतलय.
)

पुन्हा विचारतो :-
(काश्मीरमध्ये फुटीरतावादी बरेच आहेत हे गृहित धरुन )भारताने ते काश्मीरमध्ये करावे का ?
करणे योग्य आहे का ?
करणे जमणार आहे का ?

नितिन थत्ते Wed, 14/05/2014 - 10:20

In reply to by मन

समांतर उदाहरण...
एका रात्री एका जागी काही वस्तू ठेवल्या....
मग त्या जागेला कुलूप लावले.
मग एका पिढीनंतर (३५ वर्षे) ते उघडले.
मग कोर्टात केस आली.
वस्तूंना वहिवाटीचा हक्क निर्माण झाला.
दुसर्‍या पार्टीला सांगितले "तुम्ही ३५ वर्षात त्या जागेचा वापर केला नाही, तुमचा हक्क आता राहिला नाही"

एन्जॉय

ऋषिकेश Wed, 14/05/2014 - 10:42

In reply to by नितिन थत्ते

दुसर्‍या पार्टीला सांगितले "तुम्ही ३५ वर्षात त्या जागेचा वापर केला नाही, तुमचा हक्क आता राहिला नाही"

वस्तु म्हणजे मुर्ती सुद्धा का? ;)

मन Wed, 14/05/2014 - 10:45

In reply to by नितिन थत्ते

तुमच्या टायमिंगला सलाम.

'न'वी बाजू Wed, 14/05/2014 - 17:15

In reply to by मन

करणे जमणार आहे का ?

हा खरा कळीचा प्रश्न आहे.

अन्यथा आज आपण ही चर्चा करत नसतो.

('जमणार आहे का'पेक्षा 'करून झेपणार आहे का' म्हणूया.)

आडकित्ता Wed, 14/05/2014 - 18:25

In reply to by 'न'वी बाजू

यू मीन, हे असले उद्योग माणसांनी करावेत, असे तुमचे म्हणणे आहे?

'न'वी बाजू Wed, 14/05/2014 - 19:40

In reply to by आडकित्ता

कोणी कोठले उद्योग करावेत किंवा कोठले करू नयेत याबद्दल कोणताही दावा मी केलेला नाही. फक्त वस्तुस्थिती सांगितली.

असले प्रकार 'आपण' यदाकदाचित जर कधी केले नसतीलच, तर त्यामागे 'आपल्यातील माणुसकीचा (एकमेवाद्वितीय) झरा' हे कारण नाही, एवढेच सुचवायचे आहे. (हं, आता, 'आपल्यातील माणुसकीच्या (एकमेवाद्वितीय) झर्‍या'चा वारंवार दावा करून बोनस ब्राउनी प्वाइंट मिळवता येतात, ही गोष्ट वेगळी.)

अन्यथा, या धरेस बेसुमार मानवी लोकसंख्येची समस्या दुरूनदेखील नसावी, अशी अटकळ आहे.

बॅटमॅन Wed, 14/05/2014 - 19:40

In reply to by 'न'वी बाजू

(हं, आता, 'आपल्यातील माणुसकीच्या (एकमेवाद्वितीय) झर्‍या'चा वारंवार दावा करून बोनस ब्राउनी प्वाइंट मिळवता येतात, ही गोष्ट वेगळी.)

न'वी बाजूने क्या बात बोली है. बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है.

बॅटमॅन Wed, 14/05/2014 - 19:46

In reply to by 'न'वी बाजू

बूच बसले!

तसेच

उपरोद्धृत वाक्यातील 'येतात'पुढे एक 'च' लावायचा राहून गेला!

सबब एक च राहून गेला त्याची भरपाई प्रतिसादरूपी बुचाने जाहली. लॉङ्ग लिभ नेचार!

अतिशहाणा Thu, 15/05/2014 - 00:54

आंतरजालावरील खाजगी माहितीच्या हक्कासंदर्भातील युरोपियन न्यायालयाचा खळबळजनक निर्णय. गूगल व तत्सम 'सेवा'दात्यांना बराच मोठा बांबू बसणार असे दिसते.

http://www.washingtonpost.com/business/technology/eu-court-people-entit…

ऋषिकेश Sun, 18/05/2014 - 00:29

In reply to by अजो१२३

ह्म्म..
मोदींना संसदेत फारसे विरोधक नाहितच, (२०० विरोधक हा आकडा अतिशयच फसवा आहे). पाच वर्षांनी त्यांना विरोध करू धजणार्‍यांचे काय होईल हे आता सांगणे घाईचे ठरेल पण विरोध वाटावा पण तो नोंदवायची भिती वाटावी अशी परिस्थिति येऊ नये अशी इच्छा!

अजो१२३ Sun, 18/05/2014 - 11:47

In reply to by ऋषिकेश

नितिश हे खूप चांगले, कुशल, अकोमोडेटीव नि बुद्धिमान राजकारणी आहेत. रेल्वे त्यांनी सुधारली, श्रेय , फेज लॅग मुळे लालूला गेले. पण मोदींना विरोध करण्याचा त्यांनी अतिरेक केला. इतका कि इतका चांगला माणूस अपमानित झाला हे ही बरे वाटले.

ऋषिकेश Sun, 18/05/2014 - 16:35

In reply to by अजो१२३

शेवटचे वाक्य सोडल्यास सहमत आहे.
मोदींवर टिका करण्याचा अतिरेक त्यांच्याकडून झाला हे खरेच पण तरीही मला त्यांचे जाणे बरे वाटले नाही. बिहारच्या नागरीकांच्या दृष्टीने वाईट बातमी आहे :(
कारण पुन्हा असमंजस परिस्थिती निर्माण होऊन लालु आदी वाचाळवीर - जे संपत आले होते - ताकदवान होत जाणार!

गब्बर सिंग Sun, 18/05/2014 - 04:10

http://www.ndtv.com/elections/video/player/the-buck-stops-here/bjp-is-n…

उमा भारतींचा इंटर्व्ह्यु. बरखा ने घेतलेला. किमान पहिली ४ ते ५ मिनिटे एकदम शहाण्या मुली सारख्या उमा भारती....

अलभ्य लाभ !!!

(अन्यथा इतर वेळी .... हे जाळू ... ते केशवपन करू.... वगैरे वगैरे)

नगरीनिरंजन Sun, 18/05/2014 - 09:09

In reply to by ऋषिकेश

इंडिपेन्डन्टचं वाक्य फार आवडलं:
Modi might be a fine tonic for India, loosening the shackles of corruption, boosting growth from a meagre 5%, emancipating millions of workers - rural ones especially - from poverty, and stalling the sexually transmitted democracy of the Nehru-Gandhi dynasty

पण इकॉनॉमिस्टच्या संपादकीयातलं हे वाक्य वाचून भारतातल्या काही लोकांचा मेजर अपेक्षाभंग होऊ शकतो अशी काळजी वाटली.
“The last [Congress Party-led] government dithered and was preoccupied with bolstering India’s welfare state. India’s new rulers must be more strategic and ruthless.”

अनुप ढेरे Sun, 18/05/2014 - 09:11

In reply to by नगरीनिरंजन

sexually transmitted democracy of the Nehru-Gandhi dynasty

=))
हेच क्वोट करणार होतो.

अनुप ढेरे Sun, 18/05/2014 - 09:13

In reply to by नगरीनिरंजन

“The last [Congress Party-led] government dithered and was preoccupied with bolstering India’s welfare state. India’s new rulers must be more strategic and ruthless.”

या वाक्यात तर अजून एका गब्बर-घासकडवी वादाची चर्चेची ठिणगी आहे.

गब्बर सिंग Sun, 18/05/2014 - 15:05

In reply to by अनुप ढेरे

या वाक्यात तर अजून एका गब्बर-घासकडवी वादाची चर्चेची ठिणगी आहे.

कॉंग्रेस (फारच) वेल्फेअरिश (बनली) आहे ह्याबद्दल तरी घासकडवी यांचा आक्षेप नसेल. पैसे फेका अन मते मिळवा अशी फिलॉसॉफी काँग्रेस ची नसेलही पण कल्याणकारी राज्याचे "इवलेसे रोप" जे होते ते गेल्या १० वर्षांत "तयाचा वेलु गेला गगनावेरी" झालेले आहे असे म्हणायला जागा आहे - हे तरी ते मान्य करतील.

आता हे काम सरकारने करणे योग्य की अयोग्य (इष्ट की अनिष्ट) यावर आमच्यात वाद आहेतच.

ऋषिकेश Sun, 18/05/2014 - 08:45

व्हिएतनाममध्ये 'अ‍ॅन्टी-चायनीज' दंगल. चीनने आपल्या 'नागरीकांना' सोडवायला सुरूवात केली आहे (नोट चीनी नागरीकांना, चीनी वंशाच्या/हान वंशाच्या व्हिएतनामी नागरीकांना नव्हे)

नगरीनिरंजन Sun, 18/05/2014 - 14:34

In reply to by ऋषिकेश

याचं मूळ कारण मला वाटतं चीनने व्हिएतनामच्या हद्दीत ऑईल रिग नेऊन तेल काढायला सुरुवात केली आणि वर त्या रिगच्या रक्षणार्थ युद्धनौकांचा ताफा नेऊन तिथे उभा केला हे आहे ना?
http://online.wsj.com/news/articles/SB10001424052702304431104579547241211054588
व्हिएतनाम-चीनचा हा गोंधळ काय किंवा युक्रेनचा प्रश्न काय, सगळे शेवटी ऑईल-गॅसपाशीच येऊन थांबते. हे असे तणाव भविष्यात कमी होतील असे वाटत नाही.

अजो१२३ Sun, 18/05/2014 - 15:18

In reply to by नगरीनिरंजन

जागतिक उर्जा व्यवस्थेचे प्रकार, तंत्रज्ञान, स्रोत, बाजार, वितरणप्रणाली, रेग्यूलेशन, इ इ प्रकार किचकट आहे. प्रूवन रिझर्वच्या टर्म्समधे जरी गेली काही वर्षे प्लेटो पिरियड दिसत असला तरी प्रोग्नोस्टीकेटेड रेझर्वस्च्या टर्म्समधे उतरण केव्हाच चालू झाली आहे.

आज व्यवस्था नीट कशी चालवावी हा प्रश्न आहे.
उद्या तिचा किचकटपणा कसा हाताळावा हा असेल.
नंतर असंतुलने कशी हाताळावीत असा असेल नि
शेवटी अभाव कसा हाताळावा हा असेल.

अजो१२३ Sun, 18/05/2014 - 16:10

In reply to by नगरीनिरंजन

इथे (या विचारांसाठी) आपल्या नि माझ्या प्रतिसादांना निरर्थक श्रेण्या नाही मिळाल्या म्हणजे मिळवली.

'न'वी बाजू Sun, 18/05/2014 - 18:03

In reply to by अजो१२३

'मला जे समजले नाही ते', अशी जेथे 'निरर्थक'ची व्याख्या आहे, तेथे यात नेमके आक्षेपार्ह असे काय आहे?

(असो. वरील 'निरर्थक' श्रेणी मी दिलेली नाही.)

(पुरवणी: वरील 'निरर्थक' श्रेणी 'रोचक' श्रेणीत मी बदललेली आहे.)

नगरीनिरंजन Wed, 21/05/2014 - 15:39

In reply to by अजो१२३

निरर्थक नाही पण निराशावादी अशी श्रेणी असती तर नक्कीच मिळाली असती.
जणू काही या घटनांचा परिणाम चांगला होईल की वाईट होईल ते आपल्या दृष्टीकोणावर अवलंबून आहे.
शिवाय सगळं चांगलंच होईल या आशावादामुळे वाईट झलं तर करायचं काय यावर कधी चर्चाच होत नाही आणि जेव्हा वेळ येते तेव्हा कसलीही तयारी नसल्याने प्रचंड नुकसान होते.
वर सरकार व सत्ताधार्‍यांना याची कल्पना असेल आणि त्यांचा "सगळ्यांना" वाचवायचा प्लॅन तयार असेल अशीही सोयीस्कर समजूत करुन घेतात बरेच लोक. :-)

मन Wed, 21/05/2014 - 15:48

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही नि मी शतायुषी झालो तरी आपल्या हयातीत आख्ख्या जगातले तेल संपण्याचे चान्सेस किती?
ज्यावर नियंतरण नाही, पण भविष्यात धोका संभवतो अशा गोष्टीचा त्रास किती करुन घ्यावा ?

नगरीनिरंजन Wed, 21/05/2014 - 16:28

In reply to by मन

धोका होण्यासाठी तेलाचा खडखडाट होणे आवश्यक नाही.
वर अजोंनी दिलेल्या पायर्‍यांपैकी दुसर्‍या पायरीतच धोका सुरु होतो आणि तो अजून ७५ वर्षं होणार नाही (तुझे वय २५ धरले तर ;-) ) याची मलातरी खात्री नाही.
शिवाय समजा असं काही झालं तर काय करायचं याचा विचार करणे याला त्रास का म्हणायचं ते मला समजत नाही.
गब्बरसिंगनी मिल्टनचे दिलेले वाक्य आठव. क्रायसिसमध्ये ज्या कल्पनांचा आजू-बाजूला प्रादुर्भाव आहे त्याच मूळ धरतात.
बाकी आपण किरकोळ, आपल्या चर्चेने काय झाट फरक पडणार वगैरे मुद्दे असतील तर बाकीच्या सगळ्याच चर्चा अत्यंत हास्यास्पद ठरतात.

बॅटमॅन Wed, 21/05/2014 - 16:30

In reply to by नगरीनिरंजन

बाकी आपण किरकोळ, आपल्या चर्चेने काय झाट फरक पडणार वगैरे मुद्दे असतील तर बाकीच्या सगळ्याच चर्चा अत्यंत हास्यास्पद ठरतात.

अगदी अगदी.

मन Wed, 21/05/2014 - 17:00

In reply to by नगरीनिरंजन

+१

बाकी आपण किरकोळ, आपल्या चर्चेने काय झाट फरक पडणार वगैरे मुद्दे असतील तर बाकीच्या सगळ्याच चर्चा अत्यंत हास्यास्पद ठरतात.

हे असं मला खरोखरच सगळ्याच चर्चांबाबत खूपदा वाटतं.

नगरीनिरंजन Thu, 22/05/2014 - 05:22

In reply to by मन

मलाही वाटतं आणि बहुतेक ते तसंच आहे. :-)
त्यावर एक उपाय आहे; जे काही आपल्या अवतीभवती आपोआप घडतंय त्याचं समर्थन करत राहायचं. कोणताही बदल झाला पाहिजे असं म्हणायचं नाही.
बदलाबद्दल बोललं की पॉवरलेसनेस उघडा पडतो माणसाचा.
उदा. लिव-इनची चर्चा असेल तर सर्वोच्च न्यायालय म्हणतंय तेच हिरीरीनं म्हणायचं किंवा रिसोर्सेस बद्दल चर्चा असेल तर अधिकृत मीडियाची व सरकारची आहे तीच भूमिका घ्यायची.
थोडक्यात जे चाललंय तेच कसं बरोबर आहे हे इतक्या ठामपणे म्हणायचं की लोकांना वाटलं पाहिजे की हा म्हणतोय तसंच घडतंय. :-)
असं केल्यास तू एक सुजाण, मॅच्युअर व द्रष्टा विचारवंत होशील.

राजेश घासकडवी Wed, 21/05/2014 - 22:00

In reply to by गब्बर सिंग

मस्त. या व्हिडियोबद्दल गब्बरला नुसती टकिलाच नाही, तर आमच्या घरी केलेली फ्रोझन मार्गारिटा लागू!

पीक ऑइलबद्दलची चर्चा ७० च्या दशकात चालू होती एवढंच माहीत होतं. त्यापूर्वी इतक्या जुन्या काळापासून हे चालू आहे हे माहीत नव्हतं. प्रत्येक टप्प्याला 'पुढच्या पंधरा वर्षात तेल संपणार!' असं गेलं हे रोचक वाटलं.

गब्बर सिंग Wed, 21/05/2014 - 23:25

In reply to by राजेश घासकडवी

तर आमच्या घरी केलेली फ्रोझन मार्गारिटा लागू!

Mass produce it !!! :-)

नाहीतर "Peak घरी केलेली टेकिला" बद्दल चर्चा सुरु होईल.

नगरीनिरंजन Thu, 22/05/2014 - 20:17

In reply to by राजेश घासकडवी

ग्रेट!

1. We do not run out of resources. We learn to use them efficiently and find substitutes when they eventually do run out deplete.

2. We have seen throughout history that the human mind's ability to innovate coupled with a free market economic system is an unlimited resource.

1. We can repeat this infinitely.
2. Brought to you by...?

Nile Tue, 27/05/2014 - 21:40

In reply to by गब्बर सिंग

बहुतांश व्हिडीओ हा शाब्दिक खेळ आहे.

0:20 We will eventually run out of resources. (काही वाक्यांनंतर) We are finding substitute as they start to deplete!!

तांब्याचं उदाहरणही तसंच. तांब्याची किंमत वाढली हे चांगलं असा दावा हा मनुष्य करतो आहे. उलट, सहजतेनं मिळणारं तांबं संपत चालल्याने तांब्याच्या माईनींगचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. इथे समांतर उदाहरण म्हणून भविष्यातील एक काल्पनिक काळ घेता येईल. पृथ्वीवरील तांबं संपलेलं आहे. आता चंद्रावर जाऊन तांबं खणून आणत आहेत. हे महाशय पुन्हा हेच म्हणतील की छे छे, रिसोर्सेस संपले नाहीएत, पहा आम्ही नविन मार्ग शोधले आहेत म्हणून.
(कमी महत्त्वाचा, फायबर ऑप्टीक्स हा ताब्यांला 'रिसोर्स' पर्याय म्हणून 'निवडला गेला' ही दिशाभूल आहे.)

ऑईल बद्दलच्या आकडेवारींबद्दलही तीच कथा. जूनी इस्टिमेट्स चूकीची होती असा आणि म्हणून आताची इस्टिमेट्सही चूकिची आहेत, काळजी करू नका असा फसवा संदेश व्हिडीओ देत आहे. १९ व्या शतकातली इस्टिमेट्स ही त्याकाळातली टेक्नॉलॉजी वापरून, त्या काळातल्या टेक्नॉलॉजीने जितके तेप उपसता येईल त्यावरून काढलेली होती. वाढलेली इस्टिमेट्स ही नव्या तंत्रज्ञानामुळे वाढलेल्या 'रिकव्हरी फॅक्टरला' गृहित धरून काढलेली आहेत.

"Oil reserves in 12 of California’s 52 giant fields have continued to appreciate well past the age range at which most fields cease to show significant increases in ultimate recovery. Growth of reserves in these fields accelerated in the 1950s and 1960s and is mostly explained by application of secondary and tertiary recovery techniques."

नुसते चुकिचे इस्टिमेट्स आहेत काळजी करू नका असे म्हणण्यापेक्षा जर जास्त स्पष्ट आकडे दिलेत तर माहिती विश्वासार्ह होईल. ऑईलचे इस्टिमेट्स देतानाच किती वर्षं ऑईल पुरेल याबाबत कोणतेही भाष्य तो करत नाही. (जगातील ५०%पेक्षा जास्त देश जेव्हा 'विकसित' होऊन पश्चिमेइतकं ऑईल वापरू लागतील तेव्हा किती वर्ष ऑईल पुरेल?)

मुख्य आक्षेप हा जसजशी मागणी वाढेल तसतशी किंमत वाढेल आणि नवनिवन मार्गाने अधिक ऑईल (रिसोर्सेस) उपसू शकू या द्यावाला आहे. हे खरे असण्याकरता दोन गृहितकं आवश्यक आहेत. १. इन्फिनीट रिसोर्स २. सर्वसामान्य कन्झ्यूमरची इन्फिनीट पर्चेसिंग पॉवर.

गब्बर सिंग Wed, 28/05/2014 - 03:46

In reply to by Nile

तांब्याचं उदाहरणही तसंच. तांब्याची किंमत वाढली हे चांगलं असा दावा हा मनुष्य करतो आहे. उलट, सहजतेनं मिळणारं तांबं संपत चालल्याने तांब्याच्या माईनींगचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. इथे समांतर उदाहरण म्हणून भविष्यातील एक काल्पनिक काळ घेता येईल. पृथ्वीवरील तांबं संपलेलं आहे. आता चंद्रावर जाऊन तांबं खणून आणत आहेत. हे महाशय पुन्हा हेच म्हणतील की छे छे, रिसोर्सेस संपले नाहीएत, पहा आम्ही नविन मार्ग शोधले आहेत म्हणून.
(कमी महत्त्वाचा, फायबर ऑप्टीक्स हा ताब्यांला 'रिसोर्स' पर्याय म्हणून 'निवडला गेला' ही दिशाभूल आहे.)

.
उत्तर देण्याचा यत्न करतो.
.
तांबे हे कशास पर्याय म्हणून होते हा प्रश्न विचारतो. चांदी हा तांब्यापेक्षा जास्त चांगला वाहक (विजेचा) आहे - असा माझा समज आहे. चांदी महाग होती म्हणून तांबे वापरायला लागलो आपण. मग तांब्यास मागणी वाढली म्हणून सबस्टिट्युट शोधावे म्हणून अल्युमिनियम व नंतर इतर मार्ग शोधण्याचा यत्न झाला.

----

फायबर ऑप्टीक्स हा ताब्यांला 'रिसोर्स' पर्याय म्हणून 'निवडला गेला' ही दिशाभूल कशी आहे - हे काही समजले नाही.

Nile Wed, 28/05/2014 - 11:09

In reply to by गब्बर सिंग

चांदीचा वापर वायर्स साठी घाऊक प्रमाणात होत होता असा तुमचा दावा आहे का? माझ्या माहितीत तरी असे कधीच नव्हते. चांदी नेहमीच महाग होती. तांबे आणि अल्युमिनम आज वेगवेगळ्या कारणानुसार वापरतात. (वेगवेगळे गुणधर्म, फायदे/तोटे इ. )

फायबर ऑप्टिकचा वापर विशेष अ‍ॅप्लिकेशन्समध्येच होतो. कोणत्याही मेटल वायरचे तोटे कमी करण्याकरता फायबर ऑप्टीक वापरली जाते. तांबे महाग होत चालले/संपत चालले म्हणून पर्याय फायबर ऑप्टिक आहे असे म्हणणे ठार चूक आहे. आजतरी ऑप्टिक केबल तांब्यापेक्षा महागच असेल.

गब्बर सिंग Wed, 28/05/2014 - 13:55

In reply to by Nile

चांदीचा वापर वायर्स साठी घाऊक प्रमाणात होत होता असा तुमचा दावा आहे का?

नाही.

----

तांबे आणि अल्युमिनम आज वेगवेगळ्या कारणानुसार वापरतात. (वेगवेगळे गुणधर्म, फायदे/तोटे इ. )

ह्या वाक्यात तुम्ही तुमचे मत मस्त मांडलेले आहे.

घराचे वायरिंग करताना आपण फायबर ऑप्टिक केबल वापरत नाही.

----

एक क्षणभर लहान मुले ही कस्टमर मानली तर - आई व वडील हे दोघे ही मुलांवर प्रेम करतात, लालन पालन पोषण करतात. पण आई व वडील हे परफेक्ट सब्स्टिट्युट्स (एकमेकांचे) नसतात.

---

गब्बर के ताप से तुम्हे सिर्फ एक ही आदमी बचा सकता है.... खुद गब्बर - गब्बर हाच गब्बर चा परफेक्ट सब्स्टिट्युट आहे.

गब्बर सिंग Thu, 29/05/2014 - 00:40

In reply to by Nile

प्रतिवाद करण्यासारखे उरलेच नाही.

-

ठीकाय. करतो.

चांदी तांब्यापेक्षा चांगली वाहक आहे. पण जेव्हा विजेच्या क्षेत्रात क्रांती होत होती तेव्हा वाहक म्हणून डिमांड निर्माण झाली तेव्हा चांदी महाग होतीच. व हे महाग असणे हे - चांदीचा पुरवठा मागणीपेक्षा अत्यंत कमी आहे - या सत्याचे निर्देशक होते. चांदी महाग होती (त्या काळी सुद्धा) व याचा अर्थ तिचा तुटवडा होता - ही माहीती price मुळे मिळाली व आजही मिळत्ये. आणि म्हणूनच चांदीपेक्षा कमी किंमतीचा पर्याय शोधण्याचा यत्न झाला व तांबे सापडले. आता तांबे हे चांदीइतके चांगले वाहक नव्हते पण गिव्हन इट्स प्राईस ... इट वॉज कॉस्ट इफेक्टिव्ह. अँड इट हॅज बीन.

नंतर तांब्याची किंमत वाढत गेली कारण डिमांड वाढत गेली. पुरवठा ही वाढत गेलाच. पण तांब्याची किंमत वाढत गेली हे या गोष्टीचे द्योतक आहे की जरी पुरवठा वाढत गेला तरी ज्या प्रमाणात मागणी होती त्या प्रमाणात पुरवठा वाढत गेला नाही. व याचे पर्यावसान वाढलेल्या किम्मतीत झाले. किंमत वाढत गेली तसतसा - efforts to find substitutes to copper became more and more feasible and cost-effective. व अ‍ॅल्युमिनियन प्रचलीत झाले. आता अ‍ॅल्युमिनियम हे तांब्याचे परफेक्ट सबस्टिट्युट नाही. चांदीचे तर नाहीच नाही. पण तरीही प्रचलित आहे.

Nile Thu, 29/05/2014 - 02:06

In reply to by गब्बर सिंग

मूळात दोन्ही धातू विजेचा शोध लागण्याच्या कित्येक शतके आधीपासून मानवाला माहित आहेत. दहाव्या शतकापासून तांब्याच्या खाणी असणारी जागा.

व हे महाग असणे हे - चांदीचा पुरवठा मागणीपेक्षा अत्यंत कमी आहे - या सत्याचे निर्देशक होते.

हे पूर्ण सत्य नाही. फक्त मागणी-पुरवठा या दोनच गोष्टींमुळे किंमत ठरत नाही. तुमच्या वाक्यातील सप्लाय म्हणजे प्रोडक्शन असे गृहित धरतो.

१ ग्रॅम चांदी मिळवण्याकरता किती खाणकाम करावे लागते विरूद्ध १ ग्रॅम तांबे मिळवण्याकरता किती खाणकाम करावे लागते ह्यामुळेही किंमत ठरते. उदा. मी सद्ध्या काम करत असलेल्या सोन्याच्या खाणीत प्रतिटन खाणकामामुळे मिळणारी चांदी ही सोन्याच्या पाचपट आहे. (अर्थातच, हे प्रमाण खाणीनुसार बदलते.) एक पर्स्पेक्टिव्ह म्हणून, आजपर्यंत ~१७०,००० ट्न्स इतके सोने बनवले गेले आहे. मी काम करत असलेल्या खाणीत साधारण तेव्हढे खाणकाम (१५०,००० ट्न्स ऑफ 'ओर') दर दिवसाला होते.

सांगायचा मुद्दा, चांदी आणि सोने याची किंमत अनेक शतके आधीच मानवाला कळली ती त्यांच्या मुबलकतेमुळे. चांदी महाग असण्याचे कारण फक्त मागणी जास्त आहे असे म्हणणे बरोबर नाही. चांदी तांब्यापेक्षा जास्त दुर्मिळ असणं हे ही एक महत्वाचं कारण आहे.

गब्बर सिंग Thu, 29/05/2014 - 03:46

In reply to by Nile

मूळात दोन्ही धातू विजेचा शोध लागण्याच्या कित्येक शतके आधीपासून मानवाला माहित आहेत. ---- मान्य होते, आहे, व असेल.

----

१ ग्रॅम चांदी मिळवण्याकरता किती खाणकाम करावे लागते विरूद्ध १ ग्रॅम तांबे मिळवण्याकरता किती खाणकाम करावे लागते ह्यामुळेही किंमत ठरते.

मान्य होते, आहे, व असेल.

----

फक्त मागणी-पुरवठा या दोनच गोष्टींमुळे किंमत ठरत नाही. ----- मान्य होते, आहे, व असेल.

----

चांदी महाग असण्याचे कारण फक्त मागणी जास्त आहे असे म्हणणे बरोबर नाही. चांदी तांब्यापेक्षा जास्त दुर्मिळ असणं हे ही एक महत्वाचं कारण आहे.

मान्य होते, आहे, व असेल.

नंदन Thu, 29/05/2014 - 11:52

In reply to by गब्बर सिंग

बहुतांश व्हिडीओ हा शाब्दिक खेळ आहे.

या मताशी सहमत आहे. दर खेपेला पर्याय उपलब्ध होईलच असे नाही. शेवटी जो सारांश मांडला आहे, त्यातही हा विरोधाभास आहेच.

पुढील विधान कदाचित 'Ad hominem' स्वरूपाचं वाटू शकेल - पण प्रस्तुत महाशय जिथे कार्यरत आहेत ती Institute for Humane Studies ही कोक बंधूंच्या प्रभावक्षेत्रातली संस्था आहे. चार्ल्स कोक, रिचर्ड फिंक, आर्ट पोप इ. संचालक त्याच वर्तुळातले. कोक उद्योगसमूहाच्या कंपन्यांची पर्यावरणविषयक अनास्था आणि पेट्रोलियममध्ये गुंतलेले आर्थिक हितसंबंध लक्षात घेतले - तर असा प्रचार करणं त्यांच्या किती हिताचं आहे, हे कळून येईल. (सत्तरच्या दशकात, अनेक सिगरेट कंपन्यांच्या चालक-मालकांनी सिगरेटचा आणि कर्करोगाचा अज्जिब्बातच संबंध नाही, असं छातीठोकपणे सांगणारे काही वैज्ञानिक उभे केले होते त्याची या संदर्भात आठवण झाली.)

गब्बर सिंग Thu, 29/05/2014 - 12:39

In reply to by नंदन

कोक उद्योगसमूहाच्या कंपन्यांची पर्यावरणविषयक अनास्था आणि पेट्रोलियममध्ये गुंतलेले आर्थिक हितसंबंध लक्षात घेतले - तर असा प्रचार करणं त्यांच्या किती हिताचं आहे, हे कळून येईल. (सत्तरच्या दशकात, अनेक सिगरेट कंपन्यांच्या चालक-मालकांनी सिगरेटचा आणि कर्करोगाचा अज्जिब्बातच संबंध नाही, असं छातीठोकपणे सांगणारे काही वैज्ञानिक उभे केले होते त्याची या संदर्भात आठवण झाली.)

तसेच टोनी ब्लेअर, बुश, चेनी व हमीद करझाई हे सगळे फॉर्मर ऑइल इंडस्ट्रीतले लोक आहेत.

नंदन Thu, 29/05/2014 - 12:46

In reply to by गब्बर सिंग

>>> तसेच टोनी ब्लेअर, बुश, चेनी व हमीद करझाई हे सगळे फॉर्मर ऑइल इंडस्ट्रीतले लोक आहेत.
--- 'ऑपरेशन ऑफ इराकी फ्रीडम'चे मूळ नाव 'ऑईल' होते - पण ते गैरसोयीचे ठरेल म्हणून लिबरेशनचे फ्रीडम करण्यात आले हा जे लेनोचा विनोद आठवला :)

अजो१२३ Thu, 29/05/2014 - 12:48

In reply to by गब्बर सिंग

ते तेलन् तांबं गेलं कशाच्या कशात, तुमच्यासाठी नाईलसाहेबांनी किती मोठमोठाले प्रतिसाद टंकले याचंच जास्त आश्चर्य वाटतंय.

काळा मठ्ठ बैल … Thu, 29/05/2014 - 12:55

In reply to by अजो१२३

ते तेलन् तांबं गेलं कशाच्या कशात, तुमच्यासाठी नाईलसाहेबांनी किती मोठमोठाले प्रतिसाद टंकले याचंच जास्त आश्चर्य वाटतंय.

का?
मोठे होते पण त्यात
'पो + ग्यास' नव्हता म्हणून?
की तरीपण त्यांना
ट्यार्पी मिळाला म्हणून?

अजो१२३ Thu, 29/05/2014 - 13:00

In reply to by काळा मठ्ठ बैल …

सांगतो, पण अगोदर आपण मला आपला प्रतिसाद कवितेसारखा का रचला आहे ते सांगाल का?

Nile Fri, 30/05/2014 - 00:55

In reply to by अजो१२३

तुमच्यासाठी नाईलसाहेबांनी किती मोठमोठाले प्रतिसाद टंकले याचंच जास्त आश्चर्य वाटतंय.

तुम्ही लांबलचक अन अनाकलनीय प्रतिसाद लिहता याबद्दल आम्ही कधी काही बोललो का?

Nile Fri, 30/05/2014 - 01:12

In reply to by नंदन

असं काहीतरी असणार असं वाटलं होतंच.

जाता जाता, डीसीतील नॅशनल म्युमियम ऑफ नॅचरल हिस्टरीमध्ये 'ह्युमन इव्होल्यूशन' एक्झिबीशन करता कोक बंधूपैकी एकाने फंडींग दिलेलं पाहिलं आणि माझ्या कोमल हृदयाला काय धक्का बसला म्हणून सांगू!

राजेश घासकडवी Fri, 30/05/2014 - 01:18

In reply to by नंदन

दर खेपेला पर्याय उपलब्ध होईलच असे नाही.

आत्ताच्या खेपेला पर्याय आपल्यापुढे दिवाणखान्यातल्या हत्तीप्रमाणे सोंड वासून बघत उभा आहे. आणि तो पर्याय एकदा खरोखर अस्तित्वात आला की पीक ऑईलचा आरडाओरडादेखील कायमचा कायमचा तेल लावत जाणार आहे. कारण सौर ऊर्जा ही तेलाच्या साठ्यांच्या शेकडोपट दरवर्षी मिळते.

गब्बरचं म्हणणं हे की प्रत्यक्ष तुटवडा आहे की नाही हे तेलाच्या किमतीवरून ठरतं. तेलाच्या किमती वाढल्या की पर्यायी उपाय बनवणं स्वस्त बनतं. मग ते उपाय प्रस्थापित झाले की स्केलमुळे म्हणा, किंवा अनुभवामुळे म्हणा - ते स्वस्त होत जातात. सौर ऊर्जा अशीच स्वस्त होत जाते आहे. तेव्हा या व्हिडियोत म्हटल्याप्रमाणे याखेपेलातरी तेल संपलं की काय करायचं, अशी काळजी नाही.

मन Fri, 30/05/2014 - 09:41

In reply to by राजेश घासकडवी

तुमच्या आशावादाच्या गुदगुल्या ह्या शांत आल्हाद झुळुकेप्रमाणे वाटतात.
बरं वाटतं वाचून च्यायला.

अवांतर :-
मानवी मनच असं बनलं आहे की काही बाबतीत ते विचित्र intituions वापरतं.
काहीही आणि कितीही तथ्य आणले, मांडली, दाखवले तरी ते नाकारत राहतं व intituionsवरच विश्वास ठेवतं;
असं परवा डिस्कवरी वरील कार्यक्रमात पाहिलं. ते मला भयंकरच आवडलं. हे असे प्रकार आदिम अवस्थेतील
उत्क्रांतीची देणगी (की अवशेष?) आहेत म्हणे.

अजो१२३ Fri, 30/05/2014 - 11:31

In reply to by मन

आशावादाला असं गुदगुल्या आणि उत्क्रांतीजात भावना म्हणणे मला मुळीच आवडलेलं नाही. उदाहरण घे. आज जमिनींचे भाव तेलापेक्षा कितीतरी जास्त आहेत. पृथ्वीचे क्षेत्रफळ वाढवायचे तंत्रज्ञान पुणेकरांनी अजून विकसित केलेले नाही. पण म्हणून का प्रत्येक नवा जन्मलेला व्यक्ति हवेत तरंगत जगतो आहे का? अगोदर जंगले नष्ट केली. मग निरुपतुक्त जागा कामास आणली. मग वापरण्यास अशक्य जागा रिक्लेम केली. मग मजले बांधायचे तंत्रज्ञान विकसित केले.
पुढे लोकसंख्या कितीही वाढो, जागेचा प्रॉब्लेम येणार नाही. कारण एफ एस आय इन्फिनिटीपर्यंत वाढवता येतो. समजा त्यातही अडचण आली तर हिमालय, दोन ध्रुव यांसारख्या जागी शेती, मत्स्यपालन, इ इ चे तंत्रज्ञान विकसित होणारच आहे. आजही २/३ भूभाग निव्वळ बिनकामी आहे. ७ बिलियन लोकांना काय काम आहे? म्हणावं लागा, ते सगळं रिक्लेम करायला! आणि समजा तरीही जमिन कमी लागली तर उंचसखल जमिनींपैकी उंच जमिनी उकरून, पृथ्वीच्या पोटात पुरुन उरेल इतकं लोखंड आहे ते काढून त्याचे मोठमोठाले तराफे (जहाजे) बनवायचे नि अँकर करायचे समुद्रात. आमच्या उप्र, बिहार, बंगाल, पंजाब मधे सुपिक माती चांगली एक एक किमी खोल आहे, दक्षिणेच्या पठारासारखा प्रकार नाही. ती त्या जहाजांत पसरायची. झाली कि नै अजून तिप्पट जमिन उपलब्ध पृथ्वीवासीयांना? आता तिही कमी पडली तर उंच आकाशात फ्लोटींग जमीनीचा तुकडा ठेवण्याचे तंत्रज्ञान येणारच आहे. आजच किती दांडगं स्पेस स्टेशन आहे.

आणि स्पेस तर अनंत आहे. माणसाला काय पाहिजे? हे जे सगळे मूलभूत द्रव्ये आहेत ते कसे काम करतात हे कळले कि झाले. म्हणजे थोडा ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन, इ इ घेऊन स्पेस मधे जायचं. काही द्रव्ये जवळपासच्या ग्रहांवरून, इ घेता येतील. त्यांच्या (रासायनिक नि आण्विक) सायकल चालत राहतात, ही द्रव्ये नष्ट होत नाहीत. फक्त त्या चालवायला उर्जा लागते. सोलर उर्जा असतेच सूर्यमालेत. आणि अख्खी सूर्यमाला मानवांनी व्यापून गेल्यावर पुढे "जमिनीचा प्रश्न" कसा सोडवायचा हा प्रश्न मला आजच्या घडीला टू मच वाटतो. तूच सांग, ज्यांची १९०० पर्यंत फक्त १ बिलियन लोक बेसिक मिनिमम स्टँडर्डनी पोसायची लायकी नाही त्यांची ट्रीलियन्स ऑफ ट्रिलियन्स लोक आधुनिक तंत्रज्ञानाने पाळल्यानंतरचे पुढचे प्रश्न विचारयची लायकी आहे का? हे काही मोदी सरकार नाही कि पाया पडताना तो किती कोनातून वाकला नि किती नाही ते मोज नि घे त्याच्यावर शंका!

आणि हा आशावाद निराधार नाही. इतिहासात मानवाची विज्ञानामुळे नि संबंधित इतर संस्थांमुळे नेत्रदिपक नि दैदिप्यमान प्रगती झाली आहे हे आपण पाहिलेच आहे. त्यावर लोकांनी खंडच्या खंड लिहिले आहेत. मग पूढे असे का होणार नाही?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आणि बाय द वे व्हाय आर यू सो फसी अँड फिनिकी अबाउट धिस ऑयल स्टफ? तुला कसं माहित कि आज संध्याकाळी तेलाचा पर्याय जो त्यापेक्षा १ कोटी पट स्वस्त आहे, नि रिन्यूवेबल आहे, त्यापेक्षा जास्त जागी अप्प्लाय केला जाऊ शकतो, सगळ्या देशांत समतोलपणे विभागला गेला आहे, इ इ चा शोध जाहिर होणारच नाही? ऑयल बनायला ज्या परिस्थिती आहेत, त्या कारखान्यात इमिटेट होऊ शकत हे कशावरून? मी पीत नाही पण दारूला चव यायला वेळ द्यावा लागतो म्हणे. यद्वत बिलियन वर्षे न लागता चटकन ऑयल बनेल अशी रासायनिक प्रक्रिया नसतेच हे तुला कसे माहित? शेवटी ते असंतच २-३ प्रकारच्या अणूंचं. शास्त्रज्ञांना एक विशिष्ट शोध लागूच शकणार नाही हा दावा कोणत्या तर्कावरून? आणि ते जाऊ दे, जगातले सगळे प्रोग्नोस्टिकेटेड रिजर्वज हे प्रूवन रिकवरेबल रिजर्व्स निघणार नाहीत कशावरून.

कल्पना कर - सगळ्या वाहनांचा, इ इ चा एग्झॉस्ट एका काँप्रेसरच्या इनलेटमधे जातो. तिथे तो हा प्रदूषण गॅस काँप्रेस करून एका सिलेंडर मधे जातो. मग हे वाहन पेट्रोल्,इ पंपात जाते, तिथे नविन पेट्रोल भरते नि भरलेले सिलेंडर दिले जाते. आता तिथेच हे सिलेंडर एका मशिनला जोडले जाते, जी सोलर पॅनेलवर चालते नि जमिनीतून पाणी घेते (झाडाप्रमाणे). त्या मशिन मधून येणारा ऑक्सिजन हवेत सोडला जातो नि थेट पेट्रोल (इथे क्रूड , इ नाटके करायची गरज नाही.) रिजर्वॉयर मधे पडते. अशाच मशीनी मिथेन, एल पी जी, ए टी एफ, इ इ साठी असतील. असे होणारच नाही हे तुला कसे माहित?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कृपया प्रतिसाद स्वतःस सुट होईल इतक्याच गांभीर्याने घ्या.

नगरीनिरंजन Fri, 30/05/2014 - 12:13

In reply to by राजेश घासकडवी

सौरऊर्जा तेलाच्या कितीही पट असली तरी आताची लाईफस्टाईल जशीच्या तशी सपोर्ट करणार नाही.
सौरऊर्जेच्या जोरावर सेंट्रलाईज्ड इकॉनॉमिज चालणार नाहीत. लोकलायझेशन करावे लागेल पण त्याबद्दल चर्चा होत नाही; कारण तेल आणि सौरऊर्जा हे परफेक्ट सबस्टिट्यूट नाहीत हे मान्य केले जात नाही.
सौरऊर्जेवर लक्षावधी वाहने व यंत्रे निर्माण करणारे अजस्त्र कारखाने कदापिही चालणार नाहीत.

अजो१२३ Fri, 30/05/2014 - 14:08

In reply to by अनुप ढेरे

तसं नै, ३६००० किमी उंचीवरचे सॅटेलाईट जर सौर उर्जेवर "चालतात" तर १० किमी उंचीवरची विमाने का नाही चालू शकत? =))
------------------------------------------------------------------------------------------------------------
कृपया प्रतिसाद स्वतःस सुट होईल इतक्याच गांभीर्याने घ्या.

'न'वी बाजू Fri, 30/05/2014 - 19:36

In reply to by अजो१२३

भारतात समुद्रसपाटीवर उन्हाळ्यात जर इतके भयंकर उकडू शकते, तर मग समुद्रसपाटीपेक्षा सूर्याला पाचसहा मैल (मराठीत: आठनऊ किलोमीटर) अधिक जवळ असणार्‍या मौण्ट एवरेष्टवर मात्र बर्फ असते, हे कसे काय?

प्यारेलाल लॉजिक...

बॅटमॅन Fri, 30/05/2014 - 19:42

In reply to by 'न'वी बाजू

तसेच, भारतातही बेंगलोर हे दिल्लीपेक्षा विषुववृत्ताला अधिक जवळ असले तरी दिल्लीत जास्त का उकडते?

मन Fri, 30/05/2014 - 13:55

In reply to by नगरीनिरंजन

तेलाच्या ऐवजी पूर्णतः सौरऊर्जा वापरतय कोण ?
तेलाला पर्याय म्हणून भरपूर सौर ऊर्जा, विविध ठिकाणी वीज (मग ती कशीही असो, tidal,solar, windmill,organic waste/biogas वगैरे) शिवाय अणूऊर्जा व जिथे अगदिच इतर काही जमणार नाही, तिथे त्यावेळी अत्यंत महाग झालेलं,
सर्वात मौल्यवान -- तेल. हे असं वापरायचा पब्लिकचा इरादा दिसतो.
म्हणजे तेल काही अगदि अगदि थोडक्याच ठिकाणी अपरिहार्यता म्हणून वापरतील्.पण म्हणजेच ते वापरात राहिल.

सध्या कशी तेल रुपाने ऊर्जा थोडी थोडी इतरित्/हस्तांतरित करता येते, तेल विकत घेता येते; पाठवता येते;
तसेच काही मार्गाने अणू ऊर्जाही वितरित होउ लागेल.

अर्थात हे सर्व माझे ह्या गोष्टींवरच्या वादातील आकलनावरून केलेले अंदाजच आहेत.
ह्यातील तथ्यातथ्यता माहित नाही. शुद्ध अंदाज.

नगरीनिरंजन Sat, 31/05/2014 - 02:57

In reply to by मन

बरोबर आहे; इरादा नेक आहे; पण सध्याची मार्केट सिस्टीम गुंतवणुकीवर ऋण परतावा स्विकारु शकत नाही.
आज मिळते त्यापेक्षा कमी तेल मिळत असूनही सगळ्या तेल कंपन्या आणि त्या अनुषंगाने येणारे इतर उद्योगधंदे काहीही परिणाम न होता चालू राहतील असे नाही.
शिवाय तेल हा निव्वळ ऊर्जास्रोत नाही; डांबरा-रबरापासून ते औषधा-खतापर्यंत अनेक गोष्टी तेलापासून बनतात. यातलं काय महत्त्वाचं आहे आणि मौल्यवान तेल नक्की कशासाठी वापरलं गेलं पाहिजे हे ठरवायला सध्याची मार्केट व्यवस्था लायक नाही. नफा नसेल तर माणसाच्या हिताच्या गोष्टी करण्यास ही व्यवस्था असमर्थ आहे.
तेलाचा मोठा वापर लष्करांकडून केला जातो आणि तो कमी केला जाणार नाही. यांत्रिक शेती व खाणकाम करायला तेल लागते. ते कमी करता येणार नाही.
म्हणजे काहीही होवो, काहीतरी करून आम्ही आमची जीवनपद्धती टिकवून ठेवू या म्हणण्याला हटवादीपणाशिवाय दुसरे काहीही नाव नाही आणि हा हटवादीपणा दूर करून या बद्दल विचार करायला उद्युक्त करण्यातच सगळा वेळ वाया जाणर आहे.
बदल होणारच; तो व्हायच्या आधी स्विकारायचा की नंतर लादून घ्यायचा एवढाच प्रश्न असतो दरवेळी.

गब्बर सिंग Sun, 01/06/2014 - 22:56

In reply to by नगरीनिरंजन

शिवाय तेल हा निव्वळ ऊर्जास्रोत नाही; डांबरा-रबरापासून ते औषधा-खतापर्यंत अनेक गोष्टी तेलापासून बनतात. यातलं काय महत्त्वाचं आहे आणि मौल्यवान तेल नक्की कशासाठी वापरलं गेलं पाहिजे हे ठरवायला सध्याची मार्केट व्यवस्था लायक नाही. नफा नसेल तर माणसाच्या हिताच्या गोष्टी करण्यास ही व्यवस्था असमर्थ आहे.

असत्य.

रुची Wed, 04/06/2014 - 08:36

In reply to by नगरीनिरंजन

वाक्यावाक्याशी सहमत आहे. त्यानिमित्ताने, उपरोधापेक्षा सरळ, साधा आणि प्रामाणिक प्रतिसाद अधिक परिणामकारक वाटला हे नमूद करते.

अजो१२३ Fri, 30/05/2014 - 14:21

In reply to by नगरीनिरंजन

नगरीनिरंजनजी, मला तुमच्यासारख्या तेलाबद्दल इतके ऑब्सेशन नि पॅरानिईया असलेल्या लोकांचं वर्तन कधीच समजत नाही. पृथ्वीवरचं तेल "कायमचं" संपणार आहे असा दावा तुम्ही लोक करूच कसे शकतात?

पृथ्वीवर अजून ४ बिलियन वर्षे जीवसृष्टी राहणार आहे. नि बायोजेनेसिस थांबणार आहे का या काळात? ;)
------------------------------------------------------------------------------------------------------------
कृपया प्रतिसाद स्वतःस सुट होईल इतक्याच गांभीर्याने घ्या.

गब्बर सिंग Thu, 22/05/2014 - 09:19

In reply to by अजो१२३

The environmental left has now worship-fully adopted Malthus, not on fresh scientific evidence but on the mathematical “logic” that “resources” “must” be limited. (Such evidence-free logic, requiring no wearisome study of the social sciences or of social facts, might explain why a mechanical environmentalism appeals to so many physical and especially biological scientists.) Forget about Marx, says the new left of 2010. Hurrah for Malthus.

Since 1798, however, the evidence has been no kinder to the clever priest-economist Malthus than to the clever philosopher-journalist-economist Marx. The economic historian Eric Jones notes that “economic history provides the antidote to the assumption that there is a static and readily exhaustible resource base.” Yet the “fears of these kinds are hydra-headed and astonishingly resistant to contrary evidence.” The new environmental left has ignored the overwhelming evidence that incomes depend on human creativity, not on natural resources, that innovation has unleashed creativity in resource-poor places like Japan or Hong Kong, and that the resulting high incomes generate a supply of and a demand for a better environment.

________ From page 434 of Deirdre N. McCloskey’s pioneering 2010 volume, Bourgeois Dignity

नितिन थत्ते Thu, 22/05/2014 - 10:14

In reply to by गब्बर सिंग

>>incomes depend on human creativity, not on natural resources,

हा मार्क्सच्या विचारातला मोठा फ्लॉ आहे. वस्तूची व्हॅल्यू ती बनवण्यासाठी लागणार्‍या श्रमांवर अवलंबून असते असं त्याचं म्हणणं होतं. जे अगदी प्रिमिटिव्ह उत्पादन असेल त्यालाच हे लागू होऊ शकते.

अजो१२३ Mon, 19/05/2014 - 11:29

http://timesofindia.indiatimes.com/city/bhopal/SIMI-men-hit-out-at-Modi…

अतिरेकी स्वभावाचे सिडो सेक्यूलर उघड तरी या अतिरेक्यांना यश येवो म्हणणार नाहीत, पण तसे झाले तर त्यांना आनंदच होईल.

मन Mon, 19/05/2014 - 12:42

In reply to by बॅटमॅन

उलट अतिरेकी त्यांच्या इराद्यात यशस्वी झाले तर अजून दहापट मोठी सिम्पथी लाट कुणासाठी
फायद्याची ठरेल सांगायची गरज नाही.
("त्याने देशासाथी प्राण दिले; तुम्ही देशासाठी निदान तुमचं एक मत द्या" अशी घोषणा राजकीय
टाळक्यांतून निघणं अवघड नाही.)

आज काँग्रेस पडलेली दिसते ह्याच्या इतर कारणांसोबतच एक महत्वाचं कारण म्हणजे अण्णा हजारे आणि बाबा रामदेव
ह्यांनी आंदोलनं वगैरे करुन केलेली बोंबाबोंब.(त्यांच्या मुद्द्यात तथ्य आहे का; त्यांचे मोटिव्ह्ज, मॅच्युरिटी ,मार्ग ह्याबद्दल
चर्चा होउ शकते; पण त्याचा प्रबहव ह्या निवडणुकीवर थोडा का असेना पडलाच.)
तर सांगायचं म्हणजे लै दिवसांनी इतके सारे लोक एखाद्या मोठ्या आंदोलनात वगैरे उतरले होते मंडल - कमंडल काळानंतर.
त्यावेळी मोक्याच्या क्षणी बाबा रामदेव ह्यांनी निसटायचा प्रयत्न केला. आणि ऐन भरात आलेली बोंबाबोंब टांय टांय फिस्स झाली.
(ती कॉंग्रेसद्वेषाची ठिणगी पुन्हा टाकून गेली तो भाग वेगळा. पण तेवढ्यापुरतं ते थंडावलं.)
त्यावेळी " बाबा रामदेव ह्यांना काही बरंवाईट झालं असतं तर बरच झालं; तेवढच पब्लिक अजून चिडून
मोबिलाइझ झालं असतं." अशी शांतपणे दिलेली प्रतिक्रिया परिचयातील युतीच्या माजी नगरसेवकाने दिलेली
ऐकून आश्चर्य वाटले होते.

'न'वी बाजू Mon, 19/05/2014 - 15:22

In reply to by बॅटमॅन

इंदिरा गांधींची हत्या झाली, तेव्हा काँग्रेसकडे तरी तितक्या ताकदीचे दुसरे व्यक्तिमत्त्व कोणते होते?

अशा वेळेस एखादा ठोकळा जरी उभा केला, तरी सिंपथीवेवमध्ये तरून जातो.

Nile Mon, 19/05/2014 - 22:10

In reply to by बॅटमॅन

तुम्हा दोघांचं नक्की काय चाललंय? सर्व पर्याय "आमचे विरोधक असं म्हणतीलचं" असं म्हणून आधीच कव्हर करून ठेवताय का? म्हणजे नंतर, "पहा, मी म्हणालो नव्हतो" म्हणायला? टाईम्स ऑफ इंडियात भविष्याच्या कॉलम वगैरे लिहायचा विचार आहे का काय?

अजो१२३ Mon, 19/05/2014 - 13:24

In reply to by ऋषिकेश

१. मोदींनी मायनोरीटीला भय वाटेल असं वागू, बोलू नये.
२. तसं प्रशासन करू नये.
३. पक्षातले जे करतात त्यांची संतुलन राखून हजेरी घ्यावी.
४. पक्षातल्या लोकांनी नीट वागावं.
५. मायनोरिटी लोकांनी, किमान १-२ वर्षांनी, मोदीला इग्नोर मारावे. म्हणजे पूर्वी भय असेल तर 'कायमचे' ठेऊ नये.
६. अपिजमेंटची अपेक्षा करू नये. ती आता असंभव आहे.योग्यही नाही.
७. माध्यमांनी, विचारवंतानी, हिंदूनी हिंदू मतांचे एकगठ्ठाकरण झाले, इ इ शोध लावू नयेत. सगळ्यांनी सगळ्यांना मुद्द्यावर मते दिली म्हणावे. तेच खरे आहे.
८. मोदींच्या कृतींनी मुस्लिम अतिरेकी संघटनांचा नैतिक पाया ढासळून जावा. जास्त्तीत लोक मुख्य प्रवाहात सामील व्हावेत.
९. देशभर नेहमी 'सवासो करोड देशवासी' अशी चर्चा व्हावी. हा तबका, तो तबका अशी नाही.
१०. मोदींना मारायचे प्लॅन बनू नयेत, बनले तर अयशस्वी व्हावेत, आणि त्यांचा नि त्याच्याशी काही संबंध नसलेल्या मुसलमानांचा संबंध जोडला जाऊ नये.
११. मोदींची हत्या झालीच तर देशात दंगे होऊ नयेत.
१२. नंतरचे सरकार सहानुभूतीने, धार्मिक आधाराने इ नव्हे तर कामाच्या मुद्द्यांवर निवडून यावे.
१३. नंतर मोदींचा महात्मा करू नये. २०१३ मधे काँग्रेस जसे गेंडे बनले होते तसेच नंतर बीजेपी वाले बनले तर काय अर्थ?

ऋषिकेश Mon, 19/05/2014 - 13:34

In reply to by अजो१२३

१,२,३,४,५,६,१०,११,१२,१३ इतक्या सगळ्या मुद्द्यांवर सहमती!

बाकी माझ्या इच्छांचे अपडेट्सः
७: जे प्रत्यक्षात आहे ते तसेच आनि तितकेच या माध्यमांनी विचारवंतांनी विश्लेषण करून दाखवावे.
८: मोदींच्या कृतींनी प्रत्येक अतिरेकी संघटनांचा नैतिक पाया ढासळून जावा. जास्त्तीत लोक मुख्य प्रवाहात सामील व्हावेत.

असहमती:
९: असहमत प्रत्येकवेळी तसे शक्य नाही. काही प्रश्न काही वर्गाशी संबंधित असतात.

अजो१२३ Mon, 19/05/2014 - 14:11

In reply to by ऋषिकेश

७: जे प्रत्यक्षात आहे ते तसेच आनि तितकेच या माध्यमांनी विचारवंतांनी विश्लेषण करून दाखवावे.

अजूनही माध्यमे उ प, बिहार मधे हिंदू कंसोलिडेशन झाले म्हणत आहेत. शेवटी त्यांना वाईट्च अर्थ काढायचा आहे. http://eciresults.nic.in/ConstituencywiseS247.htm?ac=7 इथे रामपूरमधे १० लाख मते आहेत. मतदार १:१ प्रमाणात हिंदू नि मुस्लिम आहेत. भाजप जिंकली कि लोक एके ठिकाणी 'मुस्लिम मतांचे विभाजन झाले म्हणणार" आणि ते सिद्ध होईना कि मग "हिंदूंचे कंसोलिडेशन झाले" म्हणणार. सगळ्या यू पी हिंदूंचे जर कंसोलिडेशन होत असेल तर एकट्या रामपूर मधे का, बीजेपीची सारीच मते हिंदू मानली तरी, हिंदूंनी एकच प्रबल हिंदू उमेदवार असून, नि मतदारसंघात इतके जास्त मुस्लिम डॉमिनेशन असून २ लाख मते मुस्लिम उमेदवारांना दिली आहेत?
शेवटी काही ही करून वाईटच अर्थ काढायचा ही माध्यमांची प्रवृतीत जावो. Hope they look beyond cast and religion and don't use opposite theses to draw the same cynical conclusion.

८: मोदींच्या कृतींनी प्रत्येक अतिरेकी संघटनांचा नैतिक पाया ढासळून जावा. जास्त्तीत लोक मुख्य प्रवाहात सामील व्हावेत.

मोदींच्या व इतरांच्या प्रत्येक कृतींनी प्रत्येक अतिरेकी संघटनांचा प्रत्येक नैतिक पाया प्रत्येकतः ढासळून जावा. प्रत्येक लोक प्रत्येक मुख्य प्रवाहात सामील प्रत्येकतः व्हावेत.

९: असहमत प्रत्येकवेळी तसे शक्य नाही. काही प्रश्न काही वर्गाशी संबंधित असतात.

पोलिओ डोस १२५ कोटी लोकांना द्यावा असा अर्थ घेतला का? A statement comes with a context.

ऋषिकेश Mon, 19/05/2014 - 14:19

In reply to by अजो१२३

युपीच्या विजयाचे मला पूर्ण पटले आहे असे विश्लेषण वाचलेले नाही. सगळेच वरवर चालु आहे. कदाचित अधिक खोलात गेल्यावर काही सत्ये दिसतील, ती स्थानिक मिडीयाने बाहेर आणली पाहिजेत.

बाकी पोलीयो डोस नाही लक्षात घेतला, मात्र कंटेक्स्ट कळला नाही

गब्बर सिंग Mon, 19/05/2014 - 22:57

http://timesofindia.indiatimes.com/home/lok-sabha-elections-2014/news/N…

आझम खान म्हणतात की भारतीय मुस्लिम सेक्युलर आहेत. कारण काय ... तर .... बघा त्यांनी मोदींना मतदान केले.

आझम खान यांच्या चरणाचे तीर्थ प्राशन करावे म्हणतो !!!

'न'वी बाजू Wed, 21/05/2014 - 17:27

In reply to by गब्बर सिंग

वेल, एक तर इथे 'पण या निवडणुकीत मुसलमान मतेही दाबून मोदीला मिळालेली आहेत बॉ' वगैरे जे बोंबलून बोंबलून सांगितले जात आहे, ते खोटे असावे, हाइप असावे, अन्यथा मोदींना/भाजपला मत देणारे मुसलमान खरोखरच सेक्युलर असावेत, नाही? (अन्यथा, ते बाबरी मशीद/गोध्रा/अहमदाबाद वगैरे सर्व मरो, पण एखादा मुसलमान एखाद्या अव्हवेडली हिंदुत्ववादी पक्षाला कशाला झक मारायला मत देईल? मुसलमानांना अक्कल नसते, असा काही दावा आहे काय?)

एक तर 'मुसलमान मतेही मोदींना दाबून मिळालेली आहेत' हे हाइप आहे, हे मान्य करा, नाहीतर भारतीय मुसलमान सेक्युलर आहेत, हे तरी, (वन क्यानॉट ह्याव इट बोथ वेज़), अशा अर्थीचा तो टंग-इन-चीक गूगली म्हणून घेता यावा काय? (मूळ म्हणणार्‍याचा तसा उद्देश असो वा नसो.)

गब्बर सिंग Tue, 20/05/2014 - 11:05

http://indianexpress.com/article/india/politics/orphaned-congress-cant-…

अगं अगं म्हशी मला कुठं नेशी.

मनमोहन सिंगांना जायचे होते तेव्हा ते शांतपणे आपले पंतप्रधानांचे निवासस्थान शेवटच्या दिवसापूर्वीच सोडून निघून गेले असे ऐकले.

चिंतातुर जंतू Tue, 20/05/2014 - 11:57

शहर आणि शहरीकरण - व्याख्यानमाला
शनिवार दि. ३१ मे २०१४ ते शुक्रवार दि. ६ जून २०१४, रोज सायं ६.०० वा.
वक्ते - अमिता भिडे, अदिती फडणीस, अमृता शाह, श्रुती तांबे, आरती वाणी, श्रीकांत कांबळे आणि मीरा बोरवणकर
स्थळ - प्राचार्य पंडित ऑडिटोरियम (५ नं. हॉल), आय एल एस लॉ कॉलेज, लॉ कॉलेज रोड, पुणे ४११००४

आयोजक :
परिवर्तनाचा वाटसरू, द युनिक फौंडेशन, द युनिक अकादमी
अधिक माहिती

मन Tue, 20/05/2014 - 13:56

In reply to by ऋता

हे पाहून दोन चार वर्षापूर्वी धरल्या गेलेल्या कोबाड गांधी ह्या व्यक्तीची आतह्वण झाली.
सधन शिक्षित पारशी कुटुंब; इंग्लंड का कुठेतरी भारी ठिकाणी उच्चशिक्षण, तिथे चांगला पर्फॉर्मन्स अशा
पार्श्वभूमीवर त्याचं हातात शस्त्र घेउन नक्षलवादी बनणं बर्‍याच जणांना चकित करुन गेलं.
अर्थात सध्या धरला गेलेला माणूस त्याच्या सारखा हातात शस्त्र घेत नाही; थोडंफार स्लीपर सेल सारखं काम करतो
असं दिसतय.

गब्बर सिंग Tue, 20/05/2014 - 14:43

आज आता मोदींनी संसदेस वाकून नमस्कार केला. संसदेच्या पायावर डोकं ठेवलं.

झालं आता संसदेचं परमेश्वरीकरण सुरु. आता संसदेवर टीका म्हंजे जवळपास देशद्रोह - चे दिवस फार लांब नाहीत.

मागे ओम पुरींवर संसदेत समन्स करून जाब विचारायची भाषा केली गेली होती.

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 15:41

In reply to by चिंतातुर जंतू

असला रडक्या, भावनिक पंतप्रधान काहीही निर्णय घेऊ शकतो.

जागते रहो...(काय ओरड्तात हो ते तुरुंगात?)

चिंतातुर जंतू Tue, 20/05/2014 - 15:55

In reply to by अजो१२३

>> असला रडक्या, भावनिक पंतप्रधान काहीही निर्णय घेऊ शकतो.

असं बोलू नये बरं. पंतप्रधान झाला म्हणून काय झालं? प्रत्येकाला हळवा कोपरा असतोच हो. तेही माणूसच आहेत. त्यांनाही आपलं म्हणा.

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 17:17

In reply to by चिंतातुर जंतू

पण उच्चपदस्थ लोकांनी असं रडू बिडू नये. ते चीप दिसतं. आणि वर "मी कसा पंतप्रधान झालो" म्हणून रडले असतील तर अजूनच चीप दिसतं. आता विसरा म्हणावं ते सगळं.

मन Tue, 20/05/2014 - 15:58

In reply to by अजो१२३

भावनाविहीन ,थंड रक्ताचा असण्यापेक्षा भावनिक असलेलं बरं.

जाताजाता :-
मी मोदीसमर्थक नाही.
माझा जॉब गेल्यानं त्याला काहीही फरक पडत नाही.
त्याचाही पंतप्रधानपदाचा जॉब गेल्यानं मी काही वाटून घेत नाही.

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 16:03

In reply to by मन

मनोबा, मला एक सांग.
मी मोदीसमर्थक आहे / नाही, संघी आहे / नाही, पुरोगामी आहे / नाही असे म्हणून मग का विधाने करावी लागतात?
Does a single lable describe the whole persona of a person? इतके डिस्क्लेमर का द्यावे लागतात?

बॅटमॅन Tue, 20/05/2014 - 16:03

In reply to by मन

मोदीसमर्थक नाही असे म्हणून वर मोदीच्या औटबर्स्टला वाखाणता? मोदी आला म्हणून भारत रसातळाला जाईल इ.इ. डूमसेइंग केल्याशिवाय खरे लिबरल-पुरोगामी इ.इ. कसे होणार तुम्ही? कुठं फेडाल ही पापं, शिव शिव शिव..

सेक्युलर नाव नै सापडले, स्वारी. सगळा साला या जातिभेदसमर्थक प्रतिगामी भाषेचा दोष.

मन Tue, 20/05/2014 - 17:34

मोदी पी एम झाल्यास देश सोडून जाइन ; असे कमाल खान म्हणाला होता.
आताच तो तसा खरोखरीच पाकिस्तानात गेल्याचे डेक्कन क्रॉनिकल वगैरेमध्ये वाचले.
कायमसाठी भारत सोडतोय म्हणे.

असा देश कायमचा सोडायची वेळ कुणावर आलेली पाहून बरं वाटलं नाही.

त्याची कृती आक्रस्ताळेपणा म्हणावे की विचाराम्शी प्रामाणिक राहणं म्हणावे तेही समजत नाही.

'न'वी बाजू Tue, 20/05/2014 - 19:44

In reply to by मन

पाकिस्तानचा व्हिसा इतक्या सहजासहजी मिळतो?

मन Wed, 21/05/2014 - 09:13

In reply to by 'न'वी बाजू

त्यानं व्हिसा कधी घेतला ठौक नै.
पण स्वतःचा विमानातला निरोपाचा फोटो मात्र पब्लिश केलाय.

अस्वल Wed, 21/05/2014 - 09:10

In reply to by मन

कमाल रशीद खान हा सद(?)गृहस्थ भारत सोडणार असेल तर आपले प्रचंड नुकसान आहे.
"बिग बॉस" मध्ये आपल्या खास शैलीतून त्याने करोडोंचे मनोरंजन केले. शिवाय "देशद्रोही" सारखा चित्रपट देऊन भारताचा एड वूड बनण्याकडे त्याने कूच केले होते. असं हे रत्न आता पाकिस्तानला मिळणार :(( :((
पाहिलंत मोदी, कसं नुकसान होतंय तुमच्यामुळे?

अजो१२३ Tue, 20/05/2014 - 18:05

In reply to by मन

कालांतरानं त्याचं मोदींबद्दलच नि एकूणच देशाबद्दलचं मत बदलावं नि तो परत यावा. लोकांनी आपल्याला काहीच केलं नाही तरी आपण उगाच गेलो याचे त्याला वैषम्य वाटावे.

ऋषिकेश Wed, 21/05/2014 - 09:21

In reply to by मन

भुमिका समजु शकतो. विरोध आहे हे ही समजु शकतो.
पण इथे राहून वैधानिक मार्गाने विरोध करण्यापेक्षा देश सोडणे पळपुटेपणा वाटतो.

चिंतातुर जंतू Tue, 20/05/2014 - 18:04

राज्यशास्त्राचे अध्यापक आणि राजकारणाचे विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांनी लिहिलेल्या 'देश-प्रदेश - प्रादेशिक राजकारणाच्या बदलत्या दिशा' या पुस्तकाचे प्रकाशन
वेळ : रविवार १ जून, सायं. ६
स्थळ : प्राचार्य पंडित ऑडिटोरियम (५ नं. हॉल), आय एल एस लॉ कॉलेज, लॉ कॉलेज रोड, पुणे ४११००४

अनुप ढेरे Wed, 21/05/2014 - 09:32

In reply to by ऋषिकेश

हा हा हा...
माझा निकाल हा आला

LIBERTARIAN

Libertarians support maximum liberty in both personal and economic matters. They advocate a much smaller government; one that is limited to protecting individuals from coercion and violence. Libertarians tend to embrace individual responsibility, oppose government bureaucracy and taxes, promote private charity, tolerate diverse lifestyles, support the free market, and defend civil liberties.

सुनील Wed, 21/05/2014 - 09:04

In reply to by गब्बर सिंग

मजेशीर आहे.

माझा निकाल असा लागला -

Your PERSONAL issues Score is 100%
Your ECONOMICS issues Score is 40%
This quiz has been taken 21,361,583 times
According to your answers, the political group that agrees with you most is...

LEFT (LIBERAL)

Liberals usually embrace freedom of choice in personal matters, but tend to support significant government control of the economy. They generally support a government-funded "safety net" to help the disadvantaged, and advocate strict regulation of business. Liberals tend to favor environmental regulations, defend civil liberties and free expression, support government action to promote equality, and tolerate diverse lifestyles.

ॲमी Wed, 21/05/2014 - 09:34

In reply to by गब्बर सिंग

Your PERSONAL issues Score is 80%
Your ECONOMICS issues Score is 100%
This quiz has been taken 21,361,620 times
According to your
answers, the political
group that agrees with you most is...
LIBERTARIAN
Libertarians support
maximum liberty in both personal and economic matters. They advocate a
much smaller government; one that is limited to protecting individuals from coercion and violence. Libertarians
tend to embrace individual responsibility, oppose government bureaucracy and taxes, promote private charity, tolerate diverse lifestyles, support the free market, and defend civil liberties.

ऋषिकेश Wed, 21/05/2014 - 09:37

In reply to by ॲमी

अरेच्या! लिव्ह-इन चर्चेनंतरही अस्मि आणि अनुप दोघांनाही सारख्याच विचारधारेच्या कप्प्यात टाकणार्‍या टेस्टवर प्रश्नचिन्ह उभे राहते ;)

अनुप ढेरे Wed, 21/05/2014 - 09:40

In reply to by ऋषिकेश

आयला... एकतर तुम्ही दोघं म्हणत होतात की सरकारी नोंद हवी. मी म्हणत होतो की यात सरकारचा काय सम्बन्ध... तरी अस्मि लिबरल! छ्या...

ॲमी Wed, 21/05/2014 - 09:46

In reply to by अनुप ढेरे

तुमच्या दयाळू माहितीसाठी मी लग्नाच्या भानगडीतदेखील सरकारने पडू नये म्हणत होते. जर तंटे सोडवताना त्यात नाक खुपसताय तर इकडेपण खुपसा. डिस्क्रिमीनेशन नको :-)

ॲमी Wed, 21/05/2014 - 13:50

In reply to by अनुप ढेरे

मी पाहीलेल्या २ ३ उदावरुन लिव्हइनची कारणं कायदेशीरपेक्षा सामाजीक जास्त आहेत. आणि मी पाहीलेल्या अनेकानेक उदावरून लग्नाची कारणंसुद्धा कायदेशीरपेक्षा सामाजीक जास्त आहेत. तुझा विदा यापेक्षा वेगळा असू शकतो.

ॲमी Wed, 21/05/2014 - 09:43

In reply to by ऋषिकेश

त्याने स्कोअर नाय दिला आणि त्याने लिव्हइनला विरोध केला होता असेदेखील नाही. तो उगाच वाद घालत होता तुझ्याशी ;-)
तसेही त्या टेस्टमधे ५च प्रश्न आहेत. त्यातून फार काय कळणार नाय :-)

मन Wed, 21/05/2014 - 21:52

In reply to by अनुप ढेरे

सदर प्रश्नांचा एकूण ढाचा लक्षात घेता माझी उत्तरे काय असतील ह्याचा पब्लिकला अंदाज असेलच.
इथून साइट उघडत नाहिये .
कुणीतरी माझ्यावतीने उत्तरे देउन माझा स्कोर सांगता का प्लीझ ?

रुची Wed, 21/05/2014 - 20:51

In reply to by गब्बर सिंग

Your PERSONAL issues Score is 80%

Your ECONOMICS issues Score is 50%

According to your answers, the political group that agrees with you most is...

CENTRIST
Centrist prefer a "middle ground" regarding government control of the economy and personal behavior. Depending on the issue, they sometimes favor government intervention and sometimes support individual freedom of choice. Centrists pride themselves on keeping an open mind, tend to oppose "political extremes," and emphasize what they describe as "practical" solutions to problems.
टेस्ट बरोबर रिझल्ट्स देते पण त्याआधारे 'प्रतिगामी'/'पुरोगामी' अशी विभागणी बरोबर वाटत नाही. टेस्टचा आवाका फक्त नागरी स्वातंत्र्य आणि आर्थिक जबाबदार्या यावर आधारीत आहे आणि अगदीच त्रोटक आहे. यामध्ये धर्म, नितीमत्ता, वंशवाद, स्त्रीवाद वगैरे गोष्टी अधिक विस्ताराने आल्या असत्या तर "Left leaning centrist" असे उत्तर आले असते असे वाटते.

मन Thu, 22/05/2014 - 09:34

In reply to by गब्बर सिंग

काल संध्याकाळी मी RIGHT (CONSERVATIVE) असं दिसतय.

Your PERSONAL issues
Score is 10%
Your ECONOMICS issues
Score is 60%
This quiz has been taken
21,362,697 times
According to your
answers, the political
group that agrees with
you most is...
RIGHT (CONSERVATIVE)
Conservatives tend to
favor economic freedom,
but frequently support
laws to restrict personal
behavior that violates
"traditional values." They
oppose excessive
government control of
business, while endorsing
government action to
defend morality and the
traditional family
structure. Conservatives
usually support a strong
military, oppose
bureaucracy and high
taxes, favor a free-market
economy, and endorse
strong law enforcement.

बाबा बर्वे Thu, 22/05/2014 - 10:23

In reply to by गब्बर सिंग

गब्बरभौ,
क्विझमधे काही घपला आहे का ? माझ्या ओळखी तील काही संघिष्ट लोकांचा निकाल "CENTRIST" असा आलाय … उजव्या विचारसरणीच्या संघिष्ट लोकांनाही "CENTRIST" म्हणतायत राव …

गब्बर सिंग Thu, 22/05/2014 - 10:58

In reply to by बाबा बर्वे

बर्वे साहेब, तुमचं म्हणणं (प्रश्न) समजतंय मला.

पण माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचे उत्तर खरंतर नाहिये.

पण तोकडा प्रयत्न करतो.

हे क्विझ ज्याने बनवले तो लिबर्टेरियन आहे(होता). त्यात Anchoring / Framing बायस असेलच.

व भारतात लिबर्टेरियन चळवळ फारशी रुजलीच नाहिये. राजाजींनी रुजवायचा यत्न केला होता. सावरकरांनी स्वातंत्र्याबद्दल "जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते" असे सांगितले होते. मला असे म्हणायला आवडेल की सावरकर हे निदान काही प्रमाणावर तरी लिबर्टेरिअन होते. स्वातंत्र्य हे सर्वोच्च महत्वाचे आहे व समानता ही कनिष्ठ आहे - असा लिबर्टेरिअन चळवळीचा एक (एकमेव नव्हे) मुद्दा आहे. पण मला वाटत नाही की संघाच्या लोकांना याबद्दल काही मत असते. ते या मुद्द्याकडे अजाणतेपणे दुर्लक्ष करतात. (अंतू बर्वे यांचे मत मात्र विचारात घेण्याजोगे आहे. झाडाचे एक पान देखील .... ब्रह्मदेवाच्या दारात प्रत्येक भांडे निराळे.... :-) ) एकात्मिक मानवतावाद हा समाजवादाची सुधारित आवृत्ती आहे असे जे मला वाटते ते एवढ्यासाठीच.

अजो१२३ Thu, 22/05/2014 - 10:50

In reply to by गब्बर सिंग

शंभर लेबले एकत्र घुसडणे, नि प्रत्येक लेबलाला एक भलताच क्रायटेरिया ठेवणे नि त्यावरुन निष्कर्ष काढणे नि त्यावरून एक महालेबल देणे...

व्यक्ति तितक्या प्रकृती

बाबा बर्वे Thu, 22/05/2014 - 10:14

अरविंद केजरीवालला नितीन गडकरी यांची बदनामी केल्याप्रकरणी दिल्ली येथील पटियाला हाऊस न्यायालयाने २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यास कोर्ट तयार होते, पण रक्कम न भरल्याने त्यांना अटक करण्यात आली.

मटा मधील बातमीची लिंक - केजरीवाल यांची जेलमध्ये रवानगी

मटा मधील बातमीत - "भाजप नेते नितीन गडकरी यांनी जानेवारी महिन्यात केजरीवालविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचा बदनामीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी केजरीवाल यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे सांगत केजरीवाल यांनी कोर्टाकडून वेळ वाढवून मागितला होता" असा उल्लेख आहे … निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे कारण देउन कोर्टातील हजेरी टाळता येते ???????

मेघना भुस्कुटे Thu, 22/05/2014 - 10:48

In reply to by बाबा बर्वे

केवळ प्रसिद्धी यांखेरीज दुसरं काय कारण असू शकेल या अटक प्रकरणामागचं ते मला विचार करकरूनही कळेना. हे फारच बालिश आहे.