मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ११०
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
ॲपल आयपॉड अखेरीस बंद
आयपॉड हे मी ॲपलचे विकत घेतलेले पहिले प्रॉडक्ट. मी स्वतःला ॲपल फॅन समजत नाही पण ॲल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलची दणकट बॉडी, अत्यंत भरवशाचे स्क्रोलव्हील, सुंदर आवाज, दिवसेंदिवस चालणारी बॅटरी या सगळ्या गोष्टींमुळे वापरायला खूप मजा आली. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या एका मित्राला बाबापुता करुन आणायला लावला. विकत घेतला तेव्हा मी माझे नाव त्यावर कोरुन घेतले होते. खिशात जवळपास २०००० गाणी ठेवू देणारा हा म्युझिक प्लेअर मी जवळपास १० वर्षे वापरला. हिंजवडी ते चिंचवड अशा पायपिटी करताना आयपॉडने साथ दिली. मराठी, हिंदी, इंग्रजी, नवी, जुनी गाणी, पु.ल. देशपांडे, शंकर पाटील, बाबामहाराज सातारकर वगैरे बरंच काही ऐकलं. यात गाणी मॅनेज करण्यासाठी ॲपलचे आयट्यून हे अतिभयानक साॅफ्टवेअर वापरावे लागे. तो एक प्रकार सोडला तर आयपॉड मस्तच होता. फोनवरच गाणी ऐकता येऊ लागल्यामुळे आयपॉडची गरज राहिली नाही तेव्हा विकून टाकल्यानंतर आयपॉडबाबत गेली अनेक वर्षे काही वाचले नव्हते. उरलेला माल संपल्यावर आयपॉडची विक्री अखेरीस बंद होणार ही बातमी वाचल्यावर अचानक आयपॉडबद्दल आठवले.
ॲपल
ॲपल या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरल्यावर या कंपनीची कशी उगाचच हवा निर्माण केली गेली आहे ते लक्षांत येते. आयपॉड साठी आयट्यून वापरण्याची सक्ती ही त्रासदायकच होती. तसेच त्यांचा आयपॅड हा सुरवातीला प्रचंड लोकप्रिय झालेला प्रॉडक्ट वापरताना असे लक्षांत आले की तो दिवसेंदिवस स्लो होत जातो. आणि शेवटी वापरण्यायोग्य रहातच नाही. शिवाय ॲपस च्या बाबतीत मोनोपोली, इतर प्रॉडक्टसशी नॉन - कॉम्पॅटिबिलिटी हे त्रासदायक ठरतात. सध्याच्या संपूर्ण सॉलिड स्टेट पीसींपुढे तर हे प्रॉडक्टस कासव ठरतात.
माझा अनुभव थोडा वेगळा आहे
आयपॉड वापरल्यानंतर सुमारे दहाएक वर्षे मी ऍपलचे एकही प्रॉडक्ट वापरले नाही. मात्र गेली पाचएक वर्षें मॅकबुक आणि आयपॅड वापरतोय. काही महिन्यांपासून आयफोन वापरतोय. पीसीच्या मानाने मॅकबुक खूपच चांगला आहे. आयपॅड ठीक ठाक. अजून जाणवण्याइतका स्लो झालेला नाही. आयफोन मात्र आवडला नाही.
!
wow!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आमचं लाडकं द अनियन
Apple Discontinuing iPod After 21 Years
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अमेरीकेत
अमेरीकेत ऍपल च्या उत्पादनाची काय किंमत आहे ?भारताशी तुलना नको.तेथील अर्थ व्यवस्था नुसार..
आणि भारतात किती आहे ते माहीत च आहे.
खुप वर्ष पूर्वी माझ्या मित्राने ऍपल चा मोबाईल घेतला होता किंमत ४० हजार पण त्या मध्ये व्हिडिओ play होत नसे.
बाकी किरकोळ मोबाईल मध्ये व्हिडिओ play होत होता..१९ ते २० वर्ष पूर्वी ची घटना असावी.
किंमत
मागच्या वर्षी मी (बायको फारच मागे लागली होती म्हणून, नि त्या निमित्ताने ही शिंची आयफोन, आयफोन म्हणतात ती भानगड नेमकी असते तरी काय, ते पाहावे, म्हणून) तीन आयफोन-१२ (स्वतःसाठी, बायकोसाठी, मुलासाठी) घेतले. प्रत्येकी $८००च्या आसपास या दराने जवळपास $२,४००चा फटका बसला. (तरी बरे, लेटेष्ट आयफोन-१३ घेतला नाही, नाहीतर आणखी मोठा फटका बसला असता. सामान्यतः माझी मजल ही $१००-२००दरम्यानचा स्वस्तातला अँड्रॉइड घेण्याकडे असते. या वेळी बायको जरा जास्तच मागे लागली, म्हणून…)
माझे प्रामाणिक मत: उगाच जास्त पैसे मोजून एक अत्यंत convoluted प्रकार स्वतःच्याच गळ्यात मारून घेण्याचा वायझेडपणा आहे. असो चालायचेच.
(अपेक्षित श्रेणी: माहितीपूर्ण.)
ह्यामध्ये
ह्यामध्ये ‘तेथील अर्थव्यवस्थेनुसार’ यावर काही टिप्पणी नाही. किमान तुमचा पगार तरी सांगा म्हणजे तुम्हाला फोन परवडला की नाही हे ठरवता येईल.
वस्ताद, हं!
नाही, माझा पगार मी सांगणार नाही, परंतु… ‘सामान्यतः माझी मजल ही $१००-२००दरम्यानचा स्वस्तातला अँड्रॉइड घेण्याकडे असते.’ यावरून काय तो (अर्थ)बोध व्हावा.
(परवडवायचेच म्हटले, तर परवडवता येते – क्रेडिटकार्डे कशासाठी असतात? – तो प्रश्न नाही. प्रायॉरिटीज़चा प्रश्न आहे. शेवटी, क्रेडिटकार्डांचीसुद्धा परतफेड कधी ना कधी – आणि बहुधा सव्याज – करावी लागते, हे लक्षात घेता, हा इतका खर्च आपल्याला या गोष्टीवर करायचा आहे का, हा प्रश्न उरतो. असो चालायचेच.)
अॅपल चे संगणक आणि आयफ़ोन भयंकर महाग असतात
अॅपल चे संगणक आणि आयफ़ोन अव्वाच्या सव्वा महाग असतात. ब्रॅण्ड च्या नावावर जो प्रीमियम घेतला जातो तो जबरदस्त आहे. त्याच सोयी असलेला अॅण्ड्रॉईड फ़ोन ६०% किमतीत मिळतो. नुसत्या नावावर एवढी जास्त किंमत घेणे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लक्षण आहे असे मी मानतो .
संगणक क्षेत्रात अनेक वर्षे असूनही मी कधीच अॅपल च्या वाट्याला गेलो नाही. तेवढे पैसे खर्च करुन ईतर दोन गोष्टी जास्त घेता येतात.
अर्थात देणारे आहेत म्हणुन ते किंमत जास्त लावतात. पण आपण घ्यावे की नाही हे आपण ठरवायचे.
कोणाला हा प्रश्न पडत नाही पण मला पडतो
भारताच्या स्वतंत्र लं ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत हा काळ काही खूप मोठा नाही.
भारताच्या स्वांतंत्र लढ्यात सहभागी असणारे,स्वतंत्र भारत कसा असावा हे ठरवणारे नेते.
महात्मा गांधी.
Dr Babasaheb.
भगत सिंग,राजगुरू,सुखदेव,नाना पाटील ,झासी ची राणी असे खूप सारें
स्वतंत्र भारताचे वय ७५ वर्ष.जास्तीतजास्त दोन पिढ्या होवून गेल्या.
आपल्याला माहीत असणाऱ्या प्रसिद्ध स्वतंत्र योध्ये,धोरण ठरवणारे.
ह्यांची मुल सत्तेत का नाहीत ? हा पहिला प्रश्न.
ही सर्व लोक खरेच लोकप्रिय असतील तर त्यांची एक पिढी तरी सत्तेत असती.
भारतात निवडणुका चालू झाल्या ह्यांचे वारस का निवडून आले नाहीत हा दुसरा प्रश्न.
आदरणीय होते ना देशाला
नेहरू घराणे मात्र आता पर्यंत सत्तेत होते त्यांचा त्याग मोठा होता का?
खुप किचकट प्रश्न मला पडतो.
अगदी सरदार पटेल चे पण वारसदार सत्तेत नाहीत.
पण स्वतंत्र नंतर सत्तेत आलेल्या लोकांच्या जे देशाच्या स्वतंत्र लढ्यात सहभागी नव्हते,ह्यांनी बिलकुल कोणता ही त्याग केला नव्हता.
खोलवर अभ्यास केला तर त्यांचे पूर्वज ब्रिटिश लोकांचे हित चिंतक च असतील.
अशा लोकांच्या घरात मात्र पिढ्यान् पिढ्या सत्ता आहे.
लोक मूर्ख आहेत का निवडून देणारी?
स्त्री लं दैवत्व बहाल करून तिला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवून तिचे शोषण करण्याची जी पद्धत समाजात आहे
तसाच हा प्रकार तर नाही ना?
" xxxx यांना पडून
इतरांना अनुत्तरित करणारे प्रश्न व xxx यांना सुचणारे चिंतनीय विचार" असा धागा त्वरेने काढण्याचा विचार ऐसीचे कर्तेधर्ते का करत नाहीत?
म्हणजे राजेशजींना तुम्ही xxx
म्हणजे राजेशजींना तुम्ही xxx म्हणताय?
लंकेची पनवती
स्वर्गाहूनी रम्य म्हणवली जाणारी लंका इतक्या अधोगतीस कशी काय प्राप्त करती झाली? श्रीलंका अवघ्या दशकभरापुर्वी जवळजवळ सर्व मानांकनात सर्व सार्क देशांत सर्वात आघाडीवर असे. सर्वत्र माजलेले अराजक लंकेस आणखी काय काय दिवस दाखवणार आहे ते त्या दशाननालाच ठाऊक.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
???
मग काय, लंकेत रामराज्य यावे अशी तुमची इच्छा आहे?
काय फरक आहे
राम राज्य काय आणि रावण राज्य काय दोन्ही राज्य समृध्द च होती.
राम चे नाव घेवून मिळणारी सत्ता काय आणि रावणाचे नाव घेवून मिळणारी सत्ता काय.
एकच असते दोन्ही.
लोकशाही सत्ता पद्धती मध्ये
देशाचे ,राज्याचे राज्य करते म्हणजे लोक प्रतिनिधी.
देश आणि राज्याच्या गरजा काय
१)सर्वांना समान न्याय जात,धर्म,आर्थिक स्थिती,प्रतिष्ठा ,प्रांत, लिंग ह्याच्या शी काही देणेघणे नसावे.
२)देश आणि राज्य ह्यांची प्रगती व्हावी आणि ह्या प्रगतीत समजतील सर्व घटक समाविष्ट असावेत.
३) पर राष्ट्र धोरण
कोणते देश आपल्याला योग्य सहाया करत आहेत ह्याची ओळख पटवणे आणि त्यांच्या शी मैत्री करणे.
काय दिसतं आहे आज.
लोकप्रतिनिधी कसे निवडले जातात
त्यांची जात कोणती आहे,त्यांचा धर्म कोणता आहे,ते कोणती भाषा बोलतात,त्यांचा प्रांत कोणता आहे.अजून तरी लिंग कोणते आहे हे बघून मत दिले जात नाही पण पुढे सांगता येणार नाही.
पुढे स्त्री आणि पुरुष हे एकमेकांचे शत्रू होवू शकतात.
ह्या विचार श्रेणी मुळे
गाढव असणारा मूर्ख व्यक्ती पण लोकप्रतिनिधी म्हणजे सत्ता धारी होत आहे .
फक्त जात,धर्म,भाषा ह्या मतदार लोकांची संख्या जास्त असल्या मुळे.
ह्या अशा गाढव सत्ता धारी कडून देश हीत होणारच नाही..
लोक प्रतिनिधी गाढव असतील तर त्यांना निवडून देणारे महा गाढव आहेत.
नवीन अंध श्रद्धा.
जातीचा लोकप्रतिनिधी च आपल्या जाती च भले करेल.
आपल्या धर्माचा लोक प्रतिनिधी आपल्या धर्माचे भले करेल.
आर्थिक स्थिती वर हा नियम लागू नाही.
उच्च आर्थिक घटकातील लोक प्रतिनिधी गरीब लोकांचे कधीच भल करणार नाही..
TV आणि समाज माध्यम जो पर्यंत प्रश्न उभा करत नाहीत.
थिल्लर माध्यम टीव्ही न्यूज चॅनेल आणि समाज मध जो पर्यंत कोणता प्रश्न उभा करत नाहीत.
तो पर्यंत. भरमसाठ संख्या असणाऱ्या लोकांना काहीच प्रश्न पडत नाहीत.
बहुसंख्य हिंदू असणारा देश भारत.
गाई हा प्राणी सर्वात पवित्र.
देवाचा दर्जा.
पण कोणत्या जाती ची गाई.
भारतीय जाती च्या.
.भारतात किती देशी breed च्या गाई आता आहेत
आकडेवारी शोधून पण मिळणार नाही.
पृथ्वी वरून नष्ट होणाऱ्या स्पेसिस मधून भारतीय देशी breed च्या गाई पण पृथ्वी वरून नष्ट होणाऱ्या सपेसिस च्या यादीत 99% असणारं
पवित्र ,पूजनीय.
आणि हे योग्य पण आहे.
ह्या बहुसंख्य हिंदू असणाऱ्यांच्या देशाची अवस्था आहे
खोट्या,बकवास नाटकी श्रद्धा हिंदू च नाही तर तमाम धर्मात आहेत.
स्वार्थ फक्त माणसाला समजतो.
कोणाला हा प्रश्न चुकून तरी पडला आहे का?
बाकी माहीत नाही पण माझ्या गावात ५० पण देशी गाई नाहीत
ह्या वरून देशात किती असतील ह्याचा अंदाज करा.
फक्त हिंदू च स्वार्थी नाहीत तर सर्व धर्मीय लोक ही पण ह्याच वृत्तीचे आहेत.
मेंढरं पेक्षा माणसाची अवस्था वाईट आहे
अब्ज मध्ये माणसं जगात आहेत पण त्यांचे नियंत्रण काही लोक च करतात.
मेंढरं डोळे झाकून नेत्याच्या पाठी जात असली तरी वाघ,सिंह, कुत्रा, तरस बघितले तर दिशा बदलतील
पण माणसं नेत्यांच्या पाठी जाताना इतकी आंधळी होतात की त्यांना धोका समजत च नाही.
त्या मुळे ..
हुशार अतिशय हुषार लोकांनी भ्रम निर्माण
केलेल्या..
जाती,धर्म,आस्तिक,नास्तिक, ह्या भूल भूलया मध्ये मानव रुपी मेंढरं वावरत असतात.
त्यांना सत्य स्थिती ची जाणीव का होत नाही?
हा प्रश्न माझ्या मनात आहे
अस्तित्व का आहे ? काहीच नसणे
अस्तित्व का आहे ? काहीच नसणे म्हणजे तरी नक्की कसे ?
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
...
काहीच जर नसते, तर तुम्हाला हा प्रश्न पडला नसता.
असो. विश्वाच्या बाहेर नक्की काय आहे? आणि, विश्वाच्या बाहेर म्हणजे नक्की कोठे?
छोटा नाही मोठा प्रश्न आहे
माणूस सध्या भयंकर अवस्थे मधून जात आहे.
भौतिक सुख माणसाला मानसिक सुख देवू शकत नाहीं.
शहर .कृत्रिम रीत्या लोकांचे एकच ठिकाणी एकत्रीकरण.
त्याच बरोबर नोकरी करणाऱ्या लोकांचे हक्क कमी करणे
म्हणजे फक्त शिक्षित ,अशिक्षित आधुनिक गुलाम काहीच लोकांची सेवा करत आहेत..
कुटुंब व्यवस्था पूर्ण उध्वस्त.
बँक घोटाळे,बाकी अनेक घोटाळे त्या मुळे शिक्षित गुलाम पण मानसिक त्रासात..
खरेच कोणी सर्व्हे केला तर आज माणूस त्याच्या इतिहासातील सर्वात कठीण काळातून जात आहे.
ढोंगी,निर्लज्ज ,स्वार्थी हे सर्व एक तर सत्ताधारी किंवा उद्योगपती आहेत.
त्यांनी असा प्रचार केला आहे की खऱ्या समस्या अदृश्य झाल्या आहेत.
लोकांना ओवसिस च सत्य वाटत आहे .
आणि बिचारे त्या मागे धावत आहेत
लवकर बरे व्हा
माणूस त्याच्या इतिहासातील सर्वोत्तम कालखंडातून जात आहे. पूर्वी फक्त राजा-महाराजांना उपलब्ध असलेल्या खानपान, आरोग्य, पर्यटन या सुविधा चार दिडक्या फेकून मिळवणे बहुतेकांना सहजशक्य झाले आहे. समस्या कधीच अदृश्य होत नसतात. जुन्या समस्यांच्या ऐवजी नवीन समस्या निर्माण होतात. लहानपणी डबा घेऊन वावरात गेल्यावर कुठे बसायचे या समस्येऐवजी भरपूर खायला मिळाल्यामुळे अजीर्ण झाले ही समस्या निर्माण होणे ही सुधारणा आहे.
रोजनिशी
मानवी इतिहासात लेखनाचा शोध लागल्यानंतर केलेल्या कामाची नोंद केली जाऊ लागली. चरित्रे, बखरी ही त्याची काही उदाहरणे.
व्यक्तिगत पातळीवर काही पिढ्या रोजनिशी लिहीत होत्या.
हल्ली रोजनिशी किती प्रमाणात लिहिली जात असावी ? काही अंदाज ?
हं
कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांपासून म्हणजे अंदाजे १९९६-१९९७ पासून ते पुढे अनेक वर्षे मी रोजनिशी लिहायचो. त्यामागे, इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करणे हा हेतू होता. माझे काही मित्रही हा उपदव्याप करायचे.
नंतर कमाई करू लागल्यानंतर हळूहळू लिहिणं कमी होत गेलं. त्यातल्या काही डायऱ्या अजूनही संग्रही आहेत.
आजकाल मी आणि माझ्या माहितीतलं कुणी रोजनिशी लिहीत नाही.
मी सात वर्षांपूर्वी पर्यंत
मी सात वर्षांपूर्वी पर्यंत नियमाने रोजनिशी लिहायचो. दररोज काहीना काही लिहायचे असे असा स्वतःला घालून घेतलेला दंडक होता. किमान पाच वर्षे तरी नित्य नेमाने लिहिली. "आज काही लिहिण्यासारखं नाही" हे किमान लिहायचंच. त्यानंतर बंद करून टाकले.
रोजनिशींचा स्वतःच्या आयुष्यातला एक तुकडा पाहायला पुढे उपयोग होतो. अगदी लहानलहान गोष्टींतून आपले आयुष्य रिक्रिएट होऊ शकते. तसा उपयोग खासच आहे.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
.
रोजनिशी तिऱ्हाइताच्या हाती पडली तर?
रोजनिशी आणि आत्मचरित्र, या गोष्टी लोक नक्की का लिहितात, हा मला नेहमी सतावणारा प्रश्न आहे. मी स्वत: दोन्ही लिहिणार नाही. (१) लिहिण्याचा आळस, आणि (२) मी लिहिली, तरी लोक (दोन्ही) वाचणार नाहीत, ही कारणे आहेतच, आणि (३) लिहिण्यासारखे काहीही नाही, हेदेखील एक कारण आहे. परंतु, त्यापेक्षासुद्धा, (४) I don't owe the world (including myself) an explanation या तत्त्वावरील माझी अढळ श्रद्धा, हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
(शिवाय, कागदाचा/मेगाबाइटांचा अपव्यय, वगैरे फुटकळ कारणेसुद्धा जमेस धरता येतीलच.)
----------
(रोजनिशी लिहिणे हा सांभाषणिक स्वमैथुनाचा प्रकार मानता यावा काय?)
.
पडू नये अशी व्यवस्था पुष्कळ मार्गाने करता येते. रोजनिशी ही काही डायरीत फौंटन पेनानेच लिहिली जावी असे काही नाय ना न'बा. थिंक डिजिटल आणि थिंक इन्क्रिप्शन.
बरे, फेसबुक सुद्धा आपल्या आयुष्याचा नोंदी ठेवण्यासाठी असते म्हणून काही "आज मी क्ष माणसाला ठोकले", किंवा "पहिला विवाहबाह्य संबंध !" असे पोष्ट करत नाही ना ? (किमानपक्षी मी करत नाही.) तसेच तारतम्य आपल्या रोजनिशीत ठेवता येईल ना ? सगळे तपशील लिहिण्याची गरज नसते. रोजनिशीतल्या लहान घटना बरोबर आपल्या मेमरीला ट्रिगर करून रोजनिशीतले तपशील अधिक आपल्या स्मृतींचे कोलाज तयार करते.
कुsssssन्नी आग्रह केला नाही.
आत्मचरित्र या गोष्टींबाबत शंका रास्त आहे. पण रोजनिशी काय लोकांनी वाचावी अश्या हेतूनेच लिहिली असली पाहिजे असे नाही. तुम्हीच (आणखी) म्हातारे झाल्यावर तुमची रोजनिशी वाचून "तरणी पोरं खरोखरीच येडी असतात" असे हसू शकता किनई ? तितके तरी मनोरंजन मूल्य आहे.
ओके.
हे तुमचे आवडते वाक्य तुम्ही जिथे जिथे देता तिथे नेहमी खरपूस कारण असते, इथे मात्र ते गंडलं आहे. इथे owe चा प्रश्न येतोच कुठून ? तुमचा भविष्यातील self तुम्हाला बंदूक दाखवून explanation मागत नाहीये. तुमच्या राजीखुषीने तुम्ही ते देत असेल तरच द्या. नायतर ऱ्हायलं, शिंपल!
मेगाबाईटांचा अपव्यय कसला आलाय ? मेगाबाईटांचा सदुपयोग कमी अपव्ययच जास्त असतो. त्यात तुमची काडीची भर. कागदाचा अपव्यय हे ठीक कारण आहे, तद्वत कागदावर लिहू नका, डिजिटली लिहा.
हो जरूर. मैथुन छानच असते.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
लोकांनी वाचावे यासाठी नक्कीच नाही
रोजनिशी लोकांनी वाचावी यासाठी लिहित नसावेत. मी काही महिने लिहिण्याचा प्रयत्न केला होता पण आळस मध्ये आला. आता वाचून पाहिले तर त्यावेळेची नेमकी परिस्थिती लक्षात येते. बऱ्याच वेळा भूतकाळातील (केवळ सकारात्मक) घटनांचा अतिविचार करुन वर्तमानकाळाला नकारात्मक दृष्टीने पाहण्याची माझी खोड आहे. रोजनिशी हा यावर चांगला उपाय आहे.
दुष्ट रोजनिशी
मी नवमाता होते तेव्हा पाहिले तीनेक महिने मी सतत वैतागलेली असायचे. आणि राग/दुःख झालं की नवऱ्याला ऑफिसमध्ये फोन करायचे. मग दोनेक आठवड्यांत माझ्या असं लक्षात आलं की माझे मुद्दे तेच तेच असतात. आणि त्यासाठी उगाच त्याला ऑफिसमध्ये त्रास देण्यापेक्षा आपण डायरी घालू. त्या डायरीत मी नवऱ्याचे सगळे दुर्गुण एक एक करून लिहू लागले.
मग एकदा इंटरनेटवाल्या माणसाकडून कसलातरी पासवर्ड लिहून घ्यायचा होता तेव्हा हाताशी होती म्हणून मागच्या बाजूला लिहून घेतला. तेव्हापासून ती डायरी चव्हाट्यावर आली. आणि आम्ही सगळेच फोन नंबर आणि पासवर्ड त्यात लिहू लागलो. नवरा अनेकदा पासवर्ड बघायला ती घेऊ लागला.
मला आजही प्रश्न पडतो की त्यानं तिची पुढची पानं वाचली असतील का? वाचलीच नसतील तर त्याला इतकंही कुतूहल नाही का? आणि वाचली असतील तर त्यानं भांडण का नाही केलं?
पण ती रोजनिशी फार आवडते मला.
बायकोने
लिष्टिलेल्या नवर्याच्या दुर्गुणांबाबत नवरा सहमत असल्यास नवरा बायकोच्या भांडणाचा प्रश्नच कुठे येतो? उलट एखाद दोन दुर्गुण लिष्टायचे (चुकून) राहिले असतील तर तो खूष झाला असावा
किंवा…
…सदा सुखी.
(कित्ता गिरविण्यालायक आहे.)
म्हणजे?
पुढची पानं वाचली तर त्याला भांडण काढता येईल आणि नाही वाचली तर 'असा कसा तू, तुला काहीच कसं कुतूहल नाही' म्हणत तुला भांडण काढता येईल. एकूण काय, भांडण करून तुमची दोघांची सुखानं नांदायची सोय होईल!
"डायरी घालू"! कुठून आणतेस हे शब्दप्रयोग, तिथे एक नवसही घाल!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हम्म्म
डायऱ्या, वह्या ह्या आमच्या पच्चीम महाराष्ट्रात सर्रास 'घातल्या' जातात. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त झाल्याने आम्ही (आमच्याच हा !) तोंडात (तोंडातच हा!) बोटे घातली.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
समाजमाध्यमं?
समाजमाध्यमं उर्फ सोशल मिडीया अशाच पोस्टींनी भरलेला असतो, अशी माझी समजूत आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अमृत महोत्सव वर्ष आणि योग दिवस
दोन वर्षांनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात यावर्षी योग दिवस साजरा होईल. योग दिवस फक्त एक सरकारी परंपरा राहिली की लोकांना त्याच्या फायदा काय झाला विशेषकरून करोना काळात.
insurance for planned surgery
माझ्या परिचयातील एका १५-१६ वर्षांच्या मुलीची या महिन्यात तिरळेपणा घालविण्यासाठी शस्त्रक्रिया करायचे ठरले आहे.
अशा शस्त्रक्रियेतून (planned surgery) काही नुकसान झाले तर आर्थिक भरपाई मिळावी असा कोणता विमा भारतात आहे का/ असतो का?
योग्य माहिती देणाऱ्यांचे आगाऊ आभार.
अधिक माहिती: सदर मुलीच्या तिरळेपणाबद्धल काही वर्षांपूर्वी मी इथे http://www.misalpav.com/node/38378 लिहिले होते.
स्वार्थी अतिशय स्वार्थी बुद्धी असणारा माणूस प्राणी
स्वार्थी आणि अतिशय सुमार बुद्धी असणाऱ्या माणसं चे वर्चस्व पूर्ण नष्ट करावे.
सर्व सरकार,सर्व यंत्रणा ह्या कृतीम बुद्धिमत्ता असणाऱ्या भावना हिन रोबोट च्या ताब्यात देणे हे गरजेचे आहे
माणूस ना सरकार चालवण्याची क्षमता राखून आहे ना पृथ्वी चे हीत माणूस samvhalalel.
माणूस ह्या पृथ्वी साठी आणि लोकांसाठी सर्वात धोकादायक घाणेरडा प्राणी आहे.
बरोबरच आहे तुमचं...
पण मनुष्यजात हवीच कशाला मग? सगळे मनुष्य मरून गेले की पृथ्वीला रोबॉटांचीही गरज नाही ना उरणार?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एक शंका
पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तिला बाहेर काढल्यावर पालथं झोपवून आणि पाठीवर दाब देऊन त्याच्या नाकातोंडात गेलेले पाणी बाहेर काढावे, असं पूर्वी अनेकदा वाचलं होतं. पण अलिकडच्या बऱ्याच इंग्रजी चित्रपटांत अशा व्यक्तिला उताणं झोपवून छातीवर दाब देऊन तोंडातले पाणी बाहेर काढलेले दाखवतात. तर शास्त्रीय दृष्ट्या यातील कुठली पद्धत बरोबर आहे ?
आणखी एक पर्याय?
पाण्यात न जाणं ही पद्धतही चालून जाईल!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
https://www.bbc.co.uk/programmes/articles/1L2dJ3KQsjJPXdZ4Vp3jckh/what-t...
इथे पहिले१ असता पाठीवर झोपवणे हा पर्याय बरोबर आहे.
असो, या प्रश्नावरून आमच्या मनात एक छोटामोठा विचार/प्रश्न आला. लोक असे छोटेमोठे प्रश्न गुगल का करत नाहीत ?
-----------------------------
१- 'पाहिले' ह्या शब्दाचा अर्थ अतिशय वरवर चाळले असा घ्यावा. तुमच्या समोर खरोखर बुडणारा व्यक्ती असल्यास सदर दुव्यावरचा लेख पूर्ण वाचावा तथा तो विश्वसनीय आहे ह्याची खातरजमा करावी.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
नॅन्सी पोलिसींच्या तैवान
नॅन्सी पोलिसींच्या तैवान दौऱ्यामुळे चीन बिथरला आहे. चीनशी थेट पंगा घेण्याची अमेरिकेची ही पहिलीच वेळ असावी. पुढे बरेच वाढून ठेवले आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
शुद्ध मूर्खपणा
भारतीय न्यूज चॅनल मी सहसा बघत नाही
पण आज दुपारी चॅनेल सर्फ करताना हिंदी न्यूज चॅनेल समोर आले.
अमेरिकन संसदेच्या अध्यक्ष असणाऱ्या तैवान दौऱ्यावर होत्या त्यांचं तैवान सोडायची वेळ आली होती.
त्यांचे विमान धाव पट्टी वर उभे होते आणि.
त्या न्यूज चॅनल अँकर अक्कलेचे तारे तोडत होता.
आता काहीच वेळात विमान take off करेल ही पोपट पांच्छी चालू होती
इतक्या मिनिटात,इतक्या सेकंदात.
पुढे तर कहर च केला होता.
चीन नी तैवान लं घेरले आहे आणि तैवान बाजूचा हवाई भाग नॉन flying zone म्हणून जाहीर केला आहे
अमेरिकेचे ते विमान त्या भागातून जाणार आहे .आणि चीन ते उडवू न लावेल असा काही तरी मूर्ख पना चालू होता
अगदी अडाणी माणूस पण सांगेल अमेरिका चे vip विमान वर चीन काय कोणताच देश हल्ला करणार नाही
हे ह्या न्यूज चॅनल वाल्यांना का समजत नसेल.
युद्ध म्हणजे भातुकलीचा खेळ आहे काय.
आज आचार्य बाळकृष्ण यांचा
आज आचार्य बाळकृष्ण यांचा वाढदिवस जड़ी बूटी दिवस म्हणून साजरा केल्या जातो. पतंजलि गेल्या आठवढ्यापासून देशभरात 1 कोटी वनस्पतींची लागवण केली. आज मोठ्या प्रमाणात रक्तदान ही. आज त्यांचा 50 वा वाढ दिवस म्हणून कृषि, आयुर्वेद सहित विभिन्न विषयांवर चार दिवासीय सेमिनार ही झाले. त्यात एक दिवस एकीकृत चिकत्सा प्रणाली वर एलोपैथी डॉक्टरांचे अनेक प्रेझेंटेशन झाले. भोपाल एम्सचे अध्यक्ष डॉक्टर वाय.के. गुप्ता पासून अनेक प्रसिद्ध डॉक्टर तिथे उपस्थित होते. (बेचर्या आयएमए वाल्यांना किती दुख झाले असेल). या शिवाय विश्व भेजस संहिता (World Herbal Encyclopidia) चे 51 खंडांचे लोकार्पण होणार. (पहिल्या खंडाचे लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाले होते). पूर्ण ग्रंथ 109 खंडांचे होणार त्यात जगातील सर्व औषधी वनस्पतींची माहिती जगातील 2000 भाषेत (बोली भाषा समेत) असणार. ह्या महान ग्रंथांच्या निर्मितीच्या कार्याची सुरुवात 2008 पासून सुरू झाली होती. जगातील शेकडो विशेषज्ञांचे अनेक संस्थांचे यात योगदान आहे. विभिन्न विषयांवर अनेक ग्रंथांचे लोकार्पण ही आज होणार.
रोचक
विश्व भेजस संहिता (World Herbal Encyclopidia)
हिंदीतले नांव रोचक वाटले. याचा भेजाशी काही संबंध आहे का याचा जाणकारांनी खुलासा करावा.
ह्या लोकांविषयी खूप चीड आहे
अण्णा हजारे ह्यांना मूर्ख बनवून.आणि स्वतः अण्णा पण विकलेल असणार
पेट्रोल डिझेल वर बोलणारे बावा रामदेव आता गायब आहेत
मला खरड फळ्यावर खरड करता येत
मला खरड फळ्यावर खरड करता येत नाही आहे. खरड लिहून प्रकाशित करा वर क्लिक केले असता काहीच उमटत नाही. अन्य कुणाला ही समस्या येते आहे काय?
अपडेट: शिवाय ही नवीन प्रतिक्रिया देऊन सुद्धा हा धागा वर आला नाही.
Update: धागा वर आला आहे तसेच खरड देखील प्रकाशित होत आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
थ्यँक्स..
अशा बऱ्याच बारक्या(!) अडचणी अनेकांना येत आहेत. त्याबद्दल क्षमस्व.
इथे कुणी PHP, Drupal वगैरे समजणारे लोक असतील तर लंगड्या गायीला मदत करा, अशी विनंती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वंदेमातरम हे काही धार्मिक
वंदेमातरम हे काही धार्मिक गीत नाही.
मग त्यात वाद निर्माण होण्यासारखे काही आहे का?
म्हणायचे असेल तर म्हणा ... नाही तर नका म्हणू.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
वंदन?
हिंदू वगळता बाकी लोक वंदन करत नाहीत; ह्या अर्थी 'वंदे मातरम' ही संकल्पना हिंदू आहे. मातेच्या गालांचं किंवा हातांचं चुंबन कदाचित ख्रिश्चन म्हणता येईल. इत्यादी.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शब्दार्थाचा इतका कीस पाडायचा
शब्दार्थाचा इतका कीस पाडायचा म्हणजे कठीणच झाले.
वंदेमातरम चे आरबी, फार्सी, उर्दु, इंग्रजी, ---, ---, किंवा स्वाहीली भाषेत भाषांतर करा आणि त्यात जे काही असेल ते करा.
शेवटी भावना व्यक्त होणे महत्वाचे .
हे चालतय का बघा बरं.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
चड्डी कातरम?
मनुष्य गेल्यावर RIP म्हणत श्रद्धांजली वाहणाऱ्यांना हिंदू लोक झोडपत सुटलेले दिसतात.
किंवा
तुम्ही कुठलीही व्यक्ती भेटल्यावर त्यांना सलाम वालेकुम म्हणता का? वयस्कर नातेवाईक भेटले तर त्यांना नमस्कार करणं सोडून त्यांच्या हाताचं चुंबन घेता का? नाही तर लोकांना का नावं ठेवता?
आणि नाही कुणी म्हणालं वंदे मातरम, तर त्यांची देशभक्ती कमी दर्जाची ठरते का? का म्हणायचं कुणी वंदे मातरम?? चड्डी कातरम म्हणलेलं चालणार नाही का? मला तोच अर्थ अभिप्रेत आहे की!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चड्डी नव्हे.
शेंडी.
शेंडी बोले तो भटांची. चड्डी बोले तो चड्डीवाल्यांची. अर्थात, तुम्हाला पहिल्या गटाबद्दल आकस१ नसून निव्वळ दुसऱ्या गटाबद्दलच आकस २ असल्यास हेही ठीकच आहे म्हणा!
(जाता जाता: या दोन गटांमध्ये भला मोठा ओव्हरलॅप आहे, हे बहुधा सर्वज्ञात असावे. मात्र, हे दोन गट समसमान नाहीत, याची नोंद घेतली जाणे आवश्यक आहे.)
——————————
१ असा आकस असणारे लोक असतात जगात. (फॅक्ट ऑफ लाइफ.)
२ असा आकस असणारे लोकही असतात जगात. (व्यक्ती तितक्या प्रकृती. चालायचेच!)
सलाम वालेकुम नव्हे!
(अस्)सलाम आलेकुम. (पक्षी: तुझ्या घरावर शांती पडो.)
त्याला प्रत्युत्तर: व’आलेकुम (अस्)सलाम. (पक्षी: आणि पडो तुझ्या घरावरसुद्धा शांती. व बोले तो आणि. अरबी मूळ आहे. म्हणून सावरकरांना बोचायचे. अर्थात, म्हणून आवर्जून वापरण्याकरिता याहून सबळ असे दुसरे कारण नसावे, जेणेकरुन ते बोचूनबोचून सावरकर आपल्या थडग्यात क़यामतच्या दिनापर्यंत गरगर गरगर फिरत राहावेत.१)
तर सांगण्याचा मतलब, मूळ वाक्यात व नाही, त्याच्या प्रत्युत्तरात आहे.
——————————
१ सावरकर आपल्या थडग्यात क़यामतच्या दिनापर्यंत गरगर गरगर फिरत राहाण्याची कल्पना जर अंगावर शहारे आणत असेल, तर मुसलमानांच्या वंदेमातरम्-वरील आक्षेपामागील कारणमीमांसा अंधुकशी लक्षात येऊ लागावी. तसेही, (माझ्या समजुतीप्रमाणे) त्यांचा विरोध खुद्द त्या गीतास नसून, मुसलमानांवर त्या गीताची सक्ती करण्यास असावा. (हिंदूंनी – वा अन्य कोणीही – ते गीत घसा सुकेपर्यंत बोंबलण्यास त्यांचा आक्षेप नसावा; असण्याचे कारणही दिसत नाही.)
‘म्हणायचे असेल तर म्हणा ... नाही तर नका म्हणू.’ इतके सोपे नसावे ते!
त्या शांतीला सांगा, "पडु नकोस
त्या शांतीला सांगा, "पडु नकोस प्लिज.."
अरबी मूळ आहे. म्हणून सावरकरांना बोचायचे.
हे काही खरे नाही. सावरकर एक प्रगल्भ आणि देशप्रेमी व्यक्ती होते. त्यांचे संस्कृत आणि मराठी भाषांवरील प्रभुत्व वादातीत होते. आणि शुद्ध भाषेचे ते अग्रही होते. भाषेतील भेसळ त्यांना मान्य नसावी.
इतर धर्मियांबद्दल त्यांनी अनुदार शब्द उच्चारला नाही, मग भाषेचे त्यांना वावडे का असेल?
मुसलमान असले तरी ते भारतीय असतील... मनाने देखिल, तर त्यांच्यावर सक्ती करण्याची जरूर लागणारच नाही, असे नाही का वाटत?
आणि माझ्या माहितीप्रमाणे हे गीत लिहिले गेले तेव्हा पाकिस्तान आणि अर्थातच बांग्लादेश अस्तित्वातच नव्हते. त्यामुळे मुसलमानांना देखिल भारत ही त्यांची मातृभूमिच वाटत असणार.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
?
समजा, एखाद्या समाजात ‘मातृभूमी’ अशी संकल्पनाच नसेल तर?
त्यांनी ‘मातृभूमी’ अशी काही संकल्पना मानलीच पाहिजे, अशी सक्ती काय म्हणून?
मुसलमानांचे सोडा. हिंदूंमध्ये तरी ‘मातृभूमी’ अशी संकल्पना सदासर्वकाल होती, याची आपणांस खात्री आहे काय? (त्या ‘मातृभूमी’च्या सीमा ब्रिटिश इंडियाच्या सीमांशी संलग्न होत्या, किंवा कसे, हा फार पुढचा प्रश्न.)
मुळात एक आर्बिट्ररी संकल्पना तुम्ही उचललीत, नि स्वीकारलीत. ठीक आहे. तो तुमचा प्रश्न आहे. परंतु, तुम्ही उचललीत, म्हणून त्यांनीही उचलली, नि स्वीकारली, या गृहीतकास आधार काय?
असो चालायचेच.
समजा, एखाद्या समाजात
समजा, एखाद्या समाजात ‘मातृभूमी’ अशी संकल्पनाच नसेल तर?
काल्पनिक प्रश्नाला उत्तर देता येत नाही.
इथे सक्ती कुणीही, कुणावरही, कशाचीही करत नाहीये हे स्पष्टं केले पाहिजे.
वंदेमातरम म्हणण्याची देखिल सक्ती केलेली नाहीये.
काहींना जसा प्रश्न पडला आहे की "वंदेमातरम" का म्हणायचे?
तसाच मलाही प्रश्न पडला आहे की का म्हणायचे नाही? विरोध करावा असे त्यात काय वाईट आहे?
मुसलमानांचे सोडा. हिंदूंमध्ये तरी ‘मातृभूमी’ अशी संकल्पना सदासर्वकाल होती, याची आपणांस खात्री आहे काय?
अशी संकल्पना अस्तित्वातच नव्हती याची तुम्हाला खात्री आहे का?
भारताच्या (आणि जगातील इतर अनेक देशांच्या देखिल) सीमा-रेखा काय होत्या? कुठे होत्या? हा संशोधन आणि अभ्यासाचा विषय आहे, त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही. पण इतक्या प्राचीन काळात कशाला डोकवायचे? मुद्दा वर्तमानातला आहे, तर वर्तमान स्थितीच ग्राह्य धरणे उचित नाही का?
माझे इंग्रजी फारसे बरे नाही म्हणून आर्बिट्ररी चा अर्थ शोधला, तर अहेतूक, अनियंत्रित, कारण परंपरा नसलेला आणि अमर्याद सत्ता गाजविणारा असे अर्थ सापडले.
तुम्हाला हा शब्द नक्की कोणत्या अर्थाने आणि का वापरावासा वाटला?
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
मनुष्य गेल्यावर RIP म्हणत
मनुष्य गेल्यावर RIP म्हणत श्रद्धांजली वाहणाऱ्यांना हिंदू लोक झोडपत सुटलेले दिसतात.
कुठे ते तरी सांगा. कारण मी तरी फेबु आणि व्हाट्सॲप वर अधुन मधुन अशी रिप रिप बघत असते. काही कट्टर असतील जसे व्हॅलेन्टाईन्स डे ला विरोध करणारे वगैरे.. पण ते म्हणजे सर्व हिंदू समाज नव्हे.
तुम्ही कुठलीही व्यक्ती भेटल्यावर त्यांना सलाम वालेकुम म्हणता का? वयस्कर नातेवाईक भेटले तर त्यांना नमस्कार करणं सोडून त्यांच्या हाताचं चुंबन घेता का? नाही तर लोकांना का नावं ठेवता?
नाही सहसा नाही कारण मला "नमस्कार" किंवा "नमस्ते" म्हणायला शिकवले आहे. परंतु असे काही म्हणणे निषिद्ध नाही. आणि समजा मी कुणा परधर्मियाला नमस्ते म्हणले तरी त्याला राग येण्याचे काही कारण दिसत नाही. किंवा कुणी मला "सलाम, नी हाव, सवास्दी" वगैरे म्हणले तऱी मला चालते. ते हाताचे चुंबन वगैरे मात्र नाही जमणार.
आणि नाही कुणी म्हणालं वंदे मातरम, तर त्यांची देशभक्ती कमी दर्जाची ठरते का? का म्हणायचं कुणी वंदे मातरम??!
नाही कमी दर्जाची ठरत नाही. परंतु जेव्हा त्याला विरोध होऊ लागतो आणि ते देखिल चुकीच्या, भडकाउ कारणास्तव -- तेव्हा ते म्हणणे जरूरीचे बनते. जसे तुम्हाला तुमच्या कुटुंबाविषयी ममत्व असते, पण ते तुम्ही उठसुट जाहीररित्या दर्शवित नाही. मात्र जेव्हा (देव असे न करो) तुमच्या कुटुंबाविषयी वाईटसाईट बोलले जाते, विनाकारण चिखलफेक केली जाते, तेव्हा तुमचे तुमच्या कुटुंबाविषयीचे ममत्व, एकत्व दर्शविण्याकरता तुम्हाला बोलावे लागते, नाहीतर ती चिखलफेक योग्य आहे, तुम्हाला मान्य आहे असा चुकीचा संदेश जातो.
चड्डी कातरम म्हणलेलं चालणार नाही का? मला तोच अर्थ अभिप्रेत आहे की!
नाही चालणार. तुम्हाला तुमच्या माता-पित्या बद्दल कुणी वाईट शब्द वापरलेले चालते का? मनातल्या मनात म्हणा हवे तर.
(एक कुतुहल : वंदन म्हणले की तुम्हाला चड्डी का आठवते?)
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
बघा जमेल तसं!
बाकी लोक माझ्या मात्यापित्यांबद्दल वाईट शब्द वापरत नाहीत. मात्र मी त्यांच्या अकाली मृत्युबद्दल काळे विनोद केले होते तेव्हा काही लोक दुखावले होते, हे ऐसीवरच बघितलं आहे. आणि लोक माझ्याबद्दल, किंवा कुणाहीबद्दल वेडंवाकडं बोलले तरी माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत. खरं तर, आई-वडील गेल्यानंतर कित्येक वर्षं लागली समजायला की आपले आई-वडील स्खलनशील माणसंच होती; त्यांच्या हयातीत नाही, पण ते समजलं तेव्हा त्यांच्याबद्दल वाटणारं प्रेम वाढलं. मला देवाधर्मापेक्षा आणि तत्त्वनिष्ठांपेक्षा माणसांबद्दल प्रेम अधिक आहे. तेव्हा बघा जमेल तसं!
मी नास्तिक आहे, कुणाला, कशालाही वंदनबिंदन करणं मला जमत नाही. माझ्या व्यक्तिगत धारणांमुळे, आणि मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यात काय करते यामुळे कुणाचा काही अपमान होत असेल तर ते अंगावर ओढवून घेत आहेत. लोकांनी वंदन केल्यामुळे माझ्या भावना दुखावत नाहीत; माझ्या वंदन न करण्यामुळे कुणाच्या भावना का दुखाव्यात?
कुणी 'वंदे मातरम' म्हणायला माझा काहीही विरोध नाही. पण सक्ती करणार असतील तर मात्र मी हौसेनं 'चड्डी कातरम' म्हणेन.
'न'बा, माझं बालपण संघिष्टांनी नासल्यामुळे माझ्या टिंगलीचा मुख्य विषय चड्डीच. हे लोक सगळे शेंडीगोपाळच होते, पण शेंडीपेक्षा चड्डीचा माज जास्त होता त्यांना! शिवाय ब्राह्मणेतरांनी 'शेंडी कातरम' म्हणणं अधिक विनोदी ठरेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
असो ...!
.....
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
मला हे लॉजिक कधीच कळल नाही
वंदे मातरम् हे हिंदू धर्माची शिकवण आहे म्हणून बाकी धर्मीय विरुद्ध असतात.
वंदे मातरम् हे फक्त गाण्या मुळे ना हिंदू धर्म वाढणार आहे ना बाकी धर्म बुडणार आहे.
मग विरुद्ध विचार का.?.
धर्म इतके कच्चे नाहीत की आलतू फालतू कारणाने संकटात येतील .
हजारो वर्ष झाली.
धर्म जागेवर च आहेत.
देव ,श्रद्धा जागेवर च आहेत.
.
वंदे मातरम् ला विरुद्ध मत व्यक्त करणे म्हणजे धार्मिक कट्टर पना आहे.
कट्टर पना हा अतिरेकी विचार,वृत्ती ह्याचे जन्म स्थान आहे.
अशा लोकांचा विरोध क्रूर पणेच मोडून काढणे योग्य आहे
सैतानाची वकालत
म्हणा: ला इलाहा इल्लल्ला मुहम्मदुर्रसूलिल्लाह!
बुडाला का तुमचा धर्म? की तरला?
मुसलमानांनी ‘ला इलाहा इल्लल्ला मुहम्मदुर्रसूलिल्लाह’ असे (किंवा त्यांना जे काही म्हणावेसे वाटेल ते) म्हणण्यास, जगाच्या अंतापर्यंत म्हणत राहण्यास तुमचा आक्षेप (बहुधा) नसावा. (चूभूद्याघ्या. कितीही म्हटले, तरी तुम्ही तसे सेन्सिबल वाटता; पुनश्च चूभूद्याघ्या.) मात्र, तेच म्हणण्याची जर कोणी तुम्हाला सक्ती केली, तर तुम्हांस ते खपेल काय?
त्याच टोकनाने, ‘ला इलाहा इल्लल्ला मुहम्मदुर्रसूलिल्लाह’ला विरुद्ध मत व्यक्त करणे म्हणजे धार्मिक कट्टरपणा आहे, असा दावा कोणी का करू नये?
अशा (‘ला इलाहा इल्लल्ला मुहम्मदुर्रसूलिल्लाह’ला विरुद्ध मत व्यक्त करणाऱ्या धार्मिक कट्टर) लोकांचा विरोध क्रूरपणेच मोडून काढणे योग्य आहे, अशा प्रकारच्या दाव्यांबद्दल तुमचे काय मत आहे?
श्रेणी महात्म्य
मी ऐसीच्या श्रेणी पद्धतीचा अभ्यासक आहे.
आता पहा आपण एका "निरर्थक " श्रेणी च्या प्रतिसादावर प्रति प्रतिसाद दिलात. त्याला "मार्मिक" ५ अशी श्रेणी मिळाली आहे. माझ्या माहिती प्रमाणे हा जागतिक विक्रम असावा.
दहीहंडी खेळणाऱ्यांना नोकरी,
दहीहंडी खेळणाऱ्यांना नोकरी, आरक्षण आणि दहिहंडीला खेळाचा दर्जा देण्याची मुर्ख घोषणा नव्या मामुंनी केली आहे. हा अव्वल दर्जाचा मराठी खुळचटपणा आहे. दहिहंडी हा खेळ कसा असू शकतो?? मग विटी दांडू, लगोरी, डब्बा ऐसपैस पण खेळ म्हणावेत का??
मुळातच खेळाडूंना सरकारी नोकऱ्यात आरक्षण असावेच का?? त्यातही अनेक खेळाडूंना डीएसपी वगैरे बनवतात. ते फक्त शोभेचं पद असतं कि खरेच पोलिसी अधिकार मिळतात त्यांना? मिळत असतील तर धन्य आहे हे प्रकरण!!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
खेळाडू असेच तयार होत नाहीत
खेळाडू ना सरकारी नोकरी देणे हा योग्य मार्ग च आहे.
खेळातून आर्थिक प्राप्ती होत नसेल कोणते करिअर नसेल तर लष्कराच्या भाकऱ्या कोण भाजेल.
ऑलिंपिक पासून सर्व बंद करावे लागेल
आणि आयएएस, आयपीएस पास होवून अधिकारी असलेल्या अधिकारी लोकांचा काम करण्याचा दर्जा अजिबात उंच नाही.
आयएएस,आयपीएस परीक्षा मधून उत्तम दर्जा चे प्रशासक मिळतात.
ही आताच्या काळातील सर्वात मोठी अंध श्रद्धा आहे.
असे मी नक्कीच म्हणतो.
शिक्षण,परीक्षा ह्या फक्त कागदावर असतात.
ग्राउंड लेव्हल ल काम करणारे खरे लायक असतात.
खेळाडू नी खेलामधील खात्यात च नोकरी दिली तर खूप प्रगती होईल.
आयएएस,आयपीएस पेक्षा ग्राउंड lavel लं je काम करतात त्यांना च अधिकारी बनवले तर रिझल्ट उत्तम मिळेल.
..
.
खुप मोठा प्रश्न आहे
चार पाच हजार वर्ष पूर्वी .
महाभारत,रामायण, माया संस्कृती,इजिप्त मधील पिरॅमिड,जगात सापडलेले अनेक वास्तू .आकृत्या .
हे ऐकले की असे वाटते
माणसाने सर्वोच्य स्थानी जावून परत विनाश स्वतःचा स्वतः करून घेतला आहे.
गरिबी,रोग,मागास पना ह्या वर च lihale जाते पण तो काळ पाचशे सहाशे वर्ष पूर्वीचा च असतो.
चार पाच हजार वर्ष पूर्वी .
माया संस्कृती होती
Pyrimid सारख्या वास्तू बनल्या.
खूप मोठ्या आकृत्या बनल्या
तेव्हा माणूस नक्की कोणत्या प्रकारचे जीवन जगत होता ह्या वर लेखन का होत नाही.
विशाल जमीन,प्रचंड साधन सामुग्री,प्रचंड खाद्य उपलब्ध असणारा तो काळ.
आणि धर्म ,जाती ह्याचा उगम पण झाला नव्हता असा तो काळ.
मानवी इतिहासातील सुवर्ण काळ च असला पाहिजे.
सर्वोच्च पातळीवर पोचून माणूस परत खालच्या पातळीवर आला असा प्रश्न मला तरी
मानवी जीवन कसे होते हे जाणून घ्यायचे आहे.
पण त्या वर कुठेच लेखन ,माहिती आढळत नाही.
अपघात आणि नैसर्गिक निवड ह्या मधून मानव प्राणी.
अन्न मिळवणे आणि सुरक्षा हेच ध्येय.
अन्न खूप उपलब्ध सुरक्षा हळू हळू मिळाली.
Aag, चाक जे प्राथमिक शोध.
त्या नंतर डायरेक्ट झेप
हजारो वर्ष पूर्वीचे ग्रंथ .
ते लिखित आहे कोणत्या ही भाषेत असतील.
त्या हस्त लिखित मध्ये खूप मोठ्या कल्पना आहेत ज्या कल्पना आज चा माणूस पण करू शकत नाही.
राजकारण,समाज कारण,मानवी वृत्ती,गणित,भूगोल,शरीर शास्त्र,काम शास्त्र ,तत्व ज्ञान सर्व विषयात बरोबर की चूक हा प्रश्न वेगळा
पण लिखाण आहे.
हे कसे शक्य आहे.
निती मत्ता
निती , शास्त्र, विज्ञान, संगणारे महापुरुष खूप होवून गेले
पण जनता aadani च राहिली.
म्हणजे पुरातन काळापासून फक्त दुसऱ्या ना सल्ले देणारेच होते .कृती झीरो.
पुरातन सर्व धर्मीय साहित्य बघितले तर काय ते सल्ले असतात .
पण समाज जीवन त्याच्या विरुद्ध.
इतकी हुशार लोक होवून गेली फक्त सल्ले देणारे .
कृती मध्ये कोणीच ते अमलात आणले नाहीत
अमलात आणले असते तर आज माणूस सर्वात सुखी प्राणी असता.
पृथ्वी स्वर्ग पेक्षा कमी नसती.
कोणतीच दुःख आणि प्रश्न आता अस्तित्वात च नसते
खरंय. ख्रिश्चनांनी लॉबस्टर
खरंय. ख्रिश्चनांनी लॉबस्टर आदी शेलफिश खाणे सोडायला हवे होते. हिंदूनीं समुद्रोलंघन टाळायला हवे होते. मुस्लिमांनी एकपण पोरगी बुरख्याबाहेर येऊ द्यायला नको होती.
खरंच आज स्वर्ग असला असता.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
खरडफळा…
…नष्ट का बरे करण्यात आला आहे?
‘ऐसी’च्या निर्हत्तीकरणार्थ असे काही पाऊल उचलण्यात आले आहे काय?
परंतु, हे म्हणजे, मस्तकशूळाच्या निवारणार्थ (स्वतःचाच) शिरच्छेद करण्यासमान झाले नाही काय?
(तसेही, खरडफळ्याबाहेर हत्तीचा नक्की काय उपद्रव आहे?)
निर्चिलटीकरण
हा ही हेतू असू शकेल काय? मस्तकशूलनिवारणार्थ शिरच्छेद केल्यास उवा/लिखांच्या त्रासापासून सुटका होते तद्वत? खखोमाबैजा!
?
‘शिरसि मा लिख, मा लिख, मा लिख’ म्हटलेले पुरत नाही काय?
लंगडी गाय.
ऐसीवरचे बग्ज, काही गोष्टी नाहीश्या होणं हे मुद्दाम केलं जातं असं कृपया समजू नये. खरडफळा आता सुरू झाला आहे; काल (भावेप्र रविवारी पहाटे) काम करताना काही गोष्टी चुकून बंद झाल्या, त्या आता मार्गावर येत आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इन दॅट केस...
...माझी श्रेणिप्रदानव्यवस्था गेले कित्येक महिने काही अगम्य कारणांस्तव बंद आहे. कृपया यात कोणी लक्ष घालू शकेल काय?
(लोकांस उगाचच निरर्थक. पकाऊ, विनोदी, किंवा माहितीपूर्ण श्रेणी देण्यास हात तरसून राहिलाय.)
श्रेणी
एकाच व्यक्ती नी व्यक्त केलेले मत म्हणजे श्रेणी.
त्याला जास्त गंभीर कोणी घेत नसेल.
प्रतेक व्यक्ती ची विचारधारा वेगळी असते
आणि विचारधारा आणि निःपक्ष मत ह्यांचे कधीच मिलन होत नाही
अगदी न्यायाधीश पण त्याला अपवाद नसतात.
khan Academy वाल्या सलमान
khan Academy वाल्या सलमान खानला 'नोबेल' पुरस्कार मिळायला पाहिजे. जगाचं काही बरं होण्याची आशा फक्त अशाच लोकांमुळे आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
अस्थिर वातावरण हे राहणारच
मानवी स्वभाव खूप विचित्र आहे जगात किती विचारी लोक असली तरी त्यांची संख्या दुर्मिळ च.
मानव हा मेंढरं पेक्षा जास्त अंध पने वर्तन करणारा प्राणी आहे.
त्या मुळे जगाची अवस्था बरी पण कधीच असणार नाही
फक्त समस्या बदलतील .
जागतीक अन्न तुटवडा
https://www.loksatta.com/explained/global-food-crisis-current-situation-...
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
हे कमी होतं...
नैसर्गिक दुष्काळ, कोव्हिडमुळे आलेली परिस्थिती हे कमी होतं म्हणून पुतिननं युक्रेनवर हल्ला केला. अजूनही युक्रेनमधून होणारा धान्यपुरवठा पूर्ववत झालेला नाही; त्यामुळे आफ्रिकन देशांत अन्नतुटवडा निर्माण झाला आहे. आणि पुतिनला याचा वापर युद्धासंदर्भातल्या चर्चांमध्ये करता येत आहे.
सदर लेखात टेक्सासमधल्या दुष्काळाचा उल्लेख आहे. गेल्या आठवड्यापासून टेक्सासात पाऊस पडायला लागला आहे. लगेच लोकांनी दुष्काळ संपल्यासारखं वागायला सुुरुवात केली आहे. दोन आठवड्यांत फूटभर पाऊस झाला तरीही टेक्सासातला दुष्काळ त्यातून संपेलसं वाटत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
https://www.google.com/amp/s
https://www.google.com/amp/s/www.bbc.com/news/science-environment-627588...
१/३ पाकिस्तान पुराने बाधित झाला आहे. महागाई फार वाढली आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
गैर सरकारी संस्था, आंदण आणि कामं
बहुतेक कामं जी सरकारनं करायची असतात, किंवा जनरल काळजी नेत्यांना पाहिजे ते NGOs ओढून घेतात, आपल्या कुवतीनुसार अर्धिमुर्धी आडवी तिडवी करतात. सरकारही पुढचा बोजा त्यांच्यावर टाकतं, निवांत चालू राहतं हे.
एकुणात पार्टीनं किंवा सरकारी entity ने करायच्या गोष्टी आउसोर्सिंग कडे चालल्यात, फक्त प्रायव्हेट नाही तर सगळ्याच धर्मादाय वगैरे. NGOs वाले लोकांचे शत्रूच नाहीत का झाले या अर्थी?
आस्तिक नास्तिक लोकांनी एकमेकांच्या परंपरेचा काचून नव्हे पण निदान वरवर आदर करणं महत्वाचं वाटतं. सिंगल लोकांनी कपलचा आदर करण्याचं सौजन्य निदान दाखवावं ह्यात वावगं काही नसतंय.
गैर सरकारी संस्था, आंदण आणि कामं
बहुतेक कामं जी सरकारनं करायची असतात, किंवा जनरल काळजी नेत्यांना पाहिजे ते NGOs ओढून घेतात, आपल्या कुवतीनुसार अर्धिमुर्धी आडवी तिडवी करतात. सरकारही पुढचा बोजा त्यांच्यावर टाकतं, निवांत चालू राहतं हे.
एकुणात पार्टीनं किंवा सरकारी entity ने करायच्या गोष्टी आउसोर्सिंग कडे चालल्यात, फक्त प्रायव्हेट नाही तर सगळ्याच धर्मादाय वगैरे. NGOs वाले लोकांचे शत्रूच नाहीत का झाले या अर्थी?
आस्तिक नास्तिक लोकांनी एकमेकांच्या परंपरेचा काचून नव्हे पण निदान वरवर आदर करणं महत्वाचं वाटतं. सिंगल लोकांनी कपलचा आदर करण्याचं सौजन्य निदान दाखवावं ह्यात वावगं काही नसतंय.
हिंजवडी सोडून जाणं
इथं काम करणं फार वेगळं असायचं. उबग आणि वैताग आणि त्यात एवढ्या टेकड्या आणि जवळ नदी.
आस्तिक नास्तिक लोकांनी एकमेकांच्या परंपरेचा काचून नव्हे पण निदान वरवर आदर करणं महत्वाचं वाटतं. सिंगल लोकांनी कपलचा आदर करण्याचं सौजन्य निदान दाखवावं ह्यात वावगं काही नसतंय.
भारतातले ९९% लोक अडाणी आहेत.
भारतातले ९९% लोक अडाणी आहेत.
मला अडाणी व्हायला आवडेल.
अडाणी का?
आज माणसाकडे काय नाही.
सर्व काही आहे.
माणूस बोलू शकतो,लिहू शकतो,अतिशय उत्तम दर्जा असलेले शरीर निसर्गाने माणसाला दिले आहे.
Technology, शरीर शास्त्र,औषध शास्त्र,सर्व शास्त्रात माणूस निपुण आहे.
निसर्गाची कृपा निसर्गाने माणसाला उत्तम दर्जा असणारा जगात सर्वात भारी असा मेंदू दिला आहे.
. तरी जगात माणूस प्राणी सुखी नाही.
उपासमार,भूक बळी माणसं चेच जातात.
पक्षी प्राणी निसर्ग कृपेने सुखात आहेत माणसाने त्यांच्या आयुष्य त हस्तक्षेप केला नाही तर ते अजून सुखी होतील..
.इतके सर्व positive असून पण माणूस प्रतेक बाबतीत हरला आहे.
अती शहान पना मुळे पृथ्वी ल जी निसर्गाने सजीव जिवंत राहण्यासाठी जी अतुल्य अशी देणगी दिली आहे .
त्याचा विनाश माणूस करत आहे
जिथे वातावरण च नाही आणि अनेक समस्या आहेत अशा मंगल चंद्र वर वस्ती करण्याची मूर्ख स्वप्न माणूस बघत आहे.
पण पृथ्वी वर सर्व काही आहे त्याचे रक्षण करणे त्याला जमत नाही.
स्वतःलाच विनाश कडे स्वतःच घेवून जात आहे.
अशा माणूस जातीला मी १०९% अडाणी जमात समजतो.
आणि स्वतःला भाग्यवान समजतो मी योग्य वेळी जन्म घेतला 1974 ल.
तंत्र,सुख सोयी ,चांगले हवामान,निसर्गाचे अती सुंदर रूप ,निसर्गाच्या विविध छटा मी अनुभवल्या.
सर्व यंत्रांचा उपभोग घेतला.
आणि आयुष्याचा अंतिम क्षण येईल तेव्हा पृथ्वी विनाश च्या जवळ पोचलेली असेल,(पृथ्वी म्हणजे माणसाची जात) तेव्हा मी असणार नाही.
बाजारीकरण होण्या अगोदर
बाजारीकरण होण्या अगोदर विविध क्षेत्रात खूप महान संशोधक होवून गेले त्यांनी मानवी आयुष्य पूर्ण बदलेल मी बघितले.
शोध लावणे हेच ध्येय,मानवी कल्याण हेच ध्येय.
अशी ती लोक होती.
त्यांच्या शोधावर च आज माणूस उच्च स्थानावर पोचला तंत्रज्ञान मध्ये आणि त्याच्या जीवावर च आज ही प्रगती दिसत आहे.
त्या सर्व महान संशोधक लोकांचे अनंत उपकार आहेत त्यांना अभिवादन.
पण येथून पुढे संशोधन हे स्पॉन्सर असेल,संशोधक स्पॉन्सर केलेले असतील.
जगातील सर्व लोकांना स्वतःच्या फायद्या साठी लुटणारे असतील.
अशा स्पॉन्सर संशोधक लोकांकडून किती उच्च तंत्र शोधले गेले तरी त्याचा फायदा बहुसंख्य माणसांना होणार नाही
त्या मुळे विज्ञान वादी होताना पण डोळे उघडे ठेवा आपण चुकीच्या गोष्टी ना तर समर्थन करत नाही ना?
ह्याचा विचार करा.
वरील दोन पोस्ट नंतर मनातील प्रश्न
वरील दोन पोस्ट माझ्या मनात नक्की काय प्रश्न आहे तो समजावा म्हणून होता.
आता संशोधन स्पॉन्सर केलेले असते.
ह्याच्या शी किती लोक सहमत आहेत?
अंतर राष्ट्रीय कंपन्या त्यांचा धंदा वाढवा म्हणून नवीन तंत्र शोधतात आणि तोच उद्देश समोर ठेवून संशोधन होते .त्या मागे व्यापक हीत नसते.
किती लोक सहमत आहेत?
Aim fix आहे.शेवटचे उत्तर पण फिक्स असणार..
सायन्स वर आधारित मासिक,विविध माहिती देणारी यंत्रणा .
हे सर्व खरी माहिती कमी जाहिरात बाजी जास्त करतात.
अशा ह्या वातावरणात अंध पने विज्ञान वादी होणे मूर्ख पना नाही का?
प्रवासाची बिकट अवस्था
माणूस चंद्रावर गेला हे खूप अभिमानाने सांगितले जाते.
पण पृथ्वी वर च प्रवास करणे हे मोठे दिव्य आहे.
महाराष्ट्र चा विचार केला तर पुणे मुंबई exp way,aani पुणे ,मुंबई मधील अंतर्गत वाहतूक ह्याची अवस्था खूप बिकट आहे.
प्रवास करायचा खूप कंटाळा आणि वैताग येतो.
राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅफिक जॅम होण्याला सर्वात जास्त टोल nake जबाबदार आहेत.
एका गाडीला पाच ते दहा मिनिट लागतात.
फालतुगिरी आहे.
त्या पेक्षा एकरकमी पैसे गाडी घेताना वसूल करून घ्या .
आणि सर्व टोल हटवा.
कशाला टोल च गाढवपणा हवंय.
Lane cutting, overspeed,, बेशिस्त वाहान चालक ही तर समस्या गंभीर झाली आहे
मानवी हस्तक्षेप पासून दूर अशी नियंत्रण व्यवस्था हवी
पोलिस वर ही जबाबदारी देवून आणि कायदे करून काही फरक पडत नाही
उच्च तंत्र वापरून च ह्या समस्या सुटतील.
पुणे ,मुंबई मध्ये अंतर्गत प्रवास तर महाभयंकर.
पार्किंग लॉट मोठ्या प्रमाणात दोन्ही शहरात नाहीत.
रस्त्यात कुठे उभी असलेली वाहने आणि अरुंद रस्ते.
आपण किती मागास आहोत त्याची साक्ष देत असतात.
सहमत!
सहमत!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
.
.
.
.
आज च्या काळातील अंध श्रद्धा
शालेय शिक्षण घेतले की माणूस शहाणा होतो आणि स्वतःच्या पायावर उभा राहतो.
1,)शिक्षित मुलांपेक्षा न शिकलेल्या मुळात बेरोजगारी चे प्रमाण कमी आहे.
२) Ba,Bcom,इंजिनिअर,आणि बाकी course करणारे वयाच्या तिशी पर्यंत आई बापाच्या जीवावर जगत असतात (एक दोन टक्के अपवाद असतील)
३) आता ज्या पद्धतीची सरकारी व्यवस्था आहे,लोक प्रतिनिधी आहे त्या वरून तर सिद्ध च होते शिक्षण आणि अक्कल ह्याचा काही संबंध नाही
शिक्षणावर लाखो खर्च करण्यापेक्षा ते सर्व पैसे वाचवले तर किती तरी लाख मुल २५ वर्षाचे होईल तेच जमा होतील
ना गुलामी ,नोकरी करण्याची गरज ना चिंता.
शिक्षण नी माणूस स्व लंभी होत नाही.
हे आज तरी खरे आहे
डिग्री घेतलेले सकाळी दहा वाजेपर्यंत झोपलेले असतात .
आणि अशिक्षित कोणत्या तरी दुकानाचे,कंपनीचे मालक असतात
स्वतःचे पैसे खर्च करून उद्योग पती लोकांना कामगार पुरवणे म्हणजे शिक्षण व्यवस्था.
स्किल कामगार पाहिजे असतील तर उद्योग पती खर्च करतील लोकांनी का करावा.
शिक्षण हा उद्योग फक्त स्वस्त कामगार निर्माण करण्याचा उद्योग आहे का?.हा प्रश्न मला पडतो
इराणी महिलांचे आंदोलन!
https://www.loksatta.com/sampadkiya/features/fearless-iranian-women-are-...
इतर मुस्लिम देशांत हे होणे शक्य आहे का?
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
...
आणि भारतात हिंदुत्ववाद्यांमुळे मुसलमान स्त्रिया आपण होऊन आणखी बुरख्यात जात असण्याची शक्यता आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हिजाब घालण्यासाठीचा दबाव,
हिजाब घालण्यासाठीचा दबाव, इनडॉक्ट्रीनेशन घरातच होत असणार ना वडिलधाऱ्या पुरूषांकडून. पहले हिजाब, फिर किताब ही घोषणा 'कर्नाटक प्रकरणानंतर मुस्लिम पुरूषांनी द्यायला सुरूवात केली. पितृसत्ता, धर्माचा जीवनाच्या सर्व अंगांवर वरचश्मा असणे, मुल्ला- मौलवींची बुरसटलेली शिकवण ही कारणे अधिक महत्वाची असावीत.
हिंदुत्ववाद्यांच्या सरसकट मुस्लिम द्वेशाने ह्या वेगळ्या आयडेंटिटीला खतपाणी घातले जाते यात तथ्य आहे पण तरीही खुप मोठा दोष इस्लाम अंतर्गत असणाऱ्या कट्टरतेकडेच जातो. पण बदल होणार आणि सामान्य माणूस धर्माच्या पगड्यातून बाहेर पडणार याबाबतीत मी तरी आशावादी आहे.
बाकी, इराणी महिलांच्या लढ्यास शुभेच्छा!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
बरोबर आहे
हे तर काहीच नाही, अफगाणिस्तानात तर हिंदुत्ववाद्यांमुळे स्त्रिया थेट शटलकॉक बुरख्यात जाऊन पोहोचलेल्या आहेत!
हिंदुत्ववाद्यांमुळे!
हे तर काहीच नाही.
काल तर हिंदुत्ववाद्यांमुळे डझनावारी अल्पसंख्यांक तरुण स्त्रिया मारल्या गेल्या!
https://www.cbsnews.com/news/afghanistan-school-suicide-bombing-attack-kabul-deaths-injuries/
इतर मुस्लिम देशांत हे होणे
भारतात सध्या तरी शक्य नाही.
प्रतेक देशाची लोक वृत्ती वेगळी आहे
पण सर्व जग च कुटुंब ह्या कसल्याच आधार नसलेल्या वाक्याने सर्व घोटाळा होतो.
पाकिस्तान,बांगलादेश, अफगाण ह्या देशात कधीच मुस्लिम महिला रस्त्यावर येणार नाहीत
त्या देशातील लोक त्याच लायकीची आहेत.
दुबई मध्ये स्त्रिया वर अन्याय होत असेल असे मला तरी वाटत नाही.
इंडोसिया,मलेशिया इथे पण स्थिती वाईट नाही.
पण भारत हा पाकिस्तान,बांगलादेश ह्या देशांच्या वृतीचाच आहे.
इथे मुस्लिम महिला नाही रस्त्यावर येणार बुरख्या साठी
जरा जपून...
उदाहरणार्थ, बांग्लादेशातल्या बायका किमान काही बाबतींत भारतीय बायकांपेक्षा पुढारलेल्या आहेत असं म्हणता येईल. बांग्लादेशचा जननदर १९९७पासून भारताच्या खाली आहे; तो अजूनही भारतापेक्षा कमीच आहे. बुरखा असो वा नसो!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बांग्लादेशात बुरखा सक्ती
बांग्लादेशात बुरखा सक्ती नाहीच. पंतप्रधान महोदयाही बुरखा घालत नाहीत. मात्र, महिला शिक्षण, नोकरीतले प्रमाण, आर्थिक स्वातंत्र्य ह्याबाबतीत बांग्लादेश मागास आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
चित्ता ह्या मांस भक्षण करणाऱ्या
चित्ता भारतात आला पण त्याचा नैसर्गिक आहार
असलेला तृण भक्षी प्राणी असलेले चितळ तिथे सोडले म्हणून पण भारतात भावना दुखावल्या जातात.
स्त्री नी समान हक्क मागितला तर कोण कोणाच्या भावना दुखावतील भरोसा नाहीं
आणि त्या मध्ये कट्टर धार्मिक असणाऱ्या मुस्लिम धर्मातील स्त्रिया नी मागितला तर अनर्थ होईल.
स्वतःची बुध्दी असनारे यंत्रमानव
चुकून निर्माण झाले ज्यांना मानव बिलकुल कंट्रोल मध्ये ठेवायची क्षमता राखत नाही.
तेव्हा एक तर माणसाचा विनाश होईल किंवा जग सुखी ,समृद्ध,सुरक्षित होईल.
काही ही घडले तरी जगासाठी ते उत्तम च असेल.
BBC हिंदी
BBC हिंदी वर एक बातमी बघीतली.
२०२३ ल जागतिक आर्थिक मंदी येणार आहे
नोकरी पेशा असणाऱ्या लोकांचं अवस्था वाईट होईल.
जागतिक बँकेचा रिपोर्ट ह्या नावाखाली.
पण आर्थिक मंदी येण्याची कारणे मात्र त्यांनी दिली नाहीत.
कोणी कोणत्या बँकेची कर्ज बुडविली.
जगातील कोणत्या सरकार नी पैसे स्वतः साठी खर्च केले.
लागत पेक्षा जास्त कोणत्या सरकार नी योजनेवर खर्च केले.
सरकारी महसूल कुठे मध्येच गायब झाला.
कोणतीच कारणे दिली नाहीत.
नोकरी करणाऱ्या लोकांना ह्याचा फटका बसेल असे भविष्य व्यक्त केले.
मग ज्या धनवान लोकांना मंदी चा फटका बसणार नाही त्या लोकांकडून योग्य मदत प्रेमाने किंवा जबरदस्ती नी घेवून ह्या मधून बाहेर पडू शकतो.
हा उपाय मात्र सांगितला नाहीं
क्रमिक विकास
मधुमेह आनुवंशिक आहे असे आपण म्हणतो.किंवा मधुमेह सारखे अनेक रोग आनुवंशिक च्या लिस्ट मध्ये आहेत.
पण ह्या मधील बहुतेक आजार हे चाळिशी,पन्नाशी ओलांडली की होतात त्या अगोदर तो व्यक्ती निरोगी असतो .
जर वय जास्त झाल्या नंतर म्हणजे चाळिशी ओलांडली नंतर मुल जन्माला घातले तर क्रमिक विकास नुसार चाळिशी ओलांडली की जे रोग होतात त्याचे जिन्स पुढच्या पिढीत जात असतील ना.
म्हणजे कोणी २० व्या वर्षी मुल जन्माला घातले तर हे अनुवांशिक रोगाची गुणसूत्र पुढच्या पिढीत जाणार नाहीत पण त्याच व्यक्ती नी जास्त वयात मुल जन्माला घातले आणि त्या वयात तो मधुमेह किंवा कोणत्या बाकी आजाराने ग्रस्त असेल तर .
ती गुणसूत्र पुढच्या पिढीत जातील. का?
माणसाचे वाढलेले वय अनेक आजारांचे पुनरागमन करण्यास जबाबदार आहे का?
हा दुसरा प्रश्न