एन.आर.सी., एन.पी.आर. आणि सी.ए.ए बद्दल
(गेल्या काही महिन्यात मी यावर थोडेफार वाचून जसं समजलं तसं थोडंफार लिहिले आहे. त्यामुळे खालील वेच्यावर चर्चा आवश्यक वाटते. मला माझ्या अभ्यासासाठी याविषयीची साधक बाधक माहिती हवी आहे. उपर्युक्त मुद्द्यांवर खंडन मंडन व्हावे, चर्चा व्हाव्यात आणि एक वैचारिक आशययुक्त लिखाण व्हावे यासाठी सध्या दोन लेख किंवा स्फुट म्हणा हवं तर ते इथे पोस्ट करित आहे. तज्ञांनी प्रबोधन करावे आणि वाचकांनी अभिप्राय द्यावे. धन्यवाद)
लेख क्र. १
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAB) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी अभियान (NRC) या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. भारतीय नागरिक म्हणून जेव्हा नोंद केली जाईल तेव्हा त्या व्यक्तीचे मूळ हे सप्रमाण भारतीयच असले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला भारताचे नागरिकत्व जेव्हा प्रदान करायचे असेल तर कँब ची अंमलबजावणी महत्वाची ठरणार आहे. विरोधक उगाचच विरोधाला विरोध म्हणून दुरुस्ती विधेयकाला विरोध करत आहेत. परदेशातील अल्पसंख्याक म्हणजे शेजारच्या तीन मुस्लिम देशातील अल्पसंख्याक यात हिंदू, शिख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध हे धर्म आपसुकच आले. मूळातच भारत हा सेक्युलर देश आहे तो केवळ आणि केवळ बहुसंख्य हिंदू आहेत म्हणून. काही लोक, नेते आणि विचारवंत हे हिंदुराष्ट्र करण्यासाठी भाजपाचे असे प्रयत्न चालले आहेत असे म्हणत आहेत. पण ते काही खरे नाही. काही माथेफिरू हिंदूंना असे वाटतेय हिंदुराष्ट्र झाले पाहिजे पण तथ्य हे आहे की बहुसंख्य हिंदू हा विचारशील आहे. तो कधीही धर्माच्या नावाखाली एकत्र होत नाही. आणि होणारही नाही. कारण हिंदू धर्मात पटत नसलेल्या गोष्टींचा ठामपणे विरोध करण्याऱ्यांचे नेहमीच स्वागत केले आहे. नवा विचार अंगिकारून जुन्या परंपरा आणि रूढींना प्रगतशील हिंदूंनीच मूठमाती दिली आहे. आस्तिक, निधर्मी, दैववादी, भोळसट अध्यात्मिक आणि नास्तिक असे अनेक वर्गात हिंदू विभागला गेलाय. पटत नसलेल्या गोष्टींना प्रतिप्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक हिंदूला आहे. बंडखोरी ही रक्तातच असते. मुळातच सर्जनशील आणि विवेकी हिंदूंना हे हिंदुराष्ट्र व्हावे असे अजिबात वाटत नाही. त्यामुळे अमुक तमुक विधेयके वा कायदे हिंदुराष्ट्रासाठीच आहेत असे पसरवणारे आणि भासवणारे ठार वेडे आहेत. दुसरा मुद्दा हे विधेयक आणि कायदे आत्ताच आणायची गरज काय तर राज्यसभेत आणि लोकसभेत संख्याबळावर पारित करण्यासाठी आवश्यक असलेली तीक्ष्णबुद्धी आणि कमालीचे धाडस. असे धाडस केवळ आणि केवळ भाजपाचेच लोक करू शकतात दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रीय पक्षात ही धमक नाही. राष्ट्रासाठी जे योग्य ते आधी केलेच पाहिजे असा भाजपाचा पहिल्यापासूनच अजेंडा आहे. मतपेढीसाठी राजकारण करणे भाजपाला कधी जमणार नाही आणि अखिल भारतीय हिंदू ही भाजपाची मतपेढी आहे असे म्हणणे म्हणजे महामुर्खपणाचे लक्षण होय. काही कपाळकरंटे लोक म्हणत आहेत की भाजपाला संविधानात वाटेल तसे बदल करायचे आहेत म्हणूनच अशी विधेयके आणि कायदे आणले जात आहेत. खरंतर या देशात संविधानात घटनात्मक दुरुस्तीच्या नावाखाली संविधानाची तोडमोड "कोणत्या" राष्ट्रीय पक्षाने केलीय हे अभ्यासकांना आणि जाणकारांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे उगाच दिशाभूल करून काहीही उपयोग होणार नाही. कँब आणि एन.आर.सी ह्या गोष्टी खुप वर्षापूर्वीच व्हायला हव्या होत्या पण नाकर्तेपणामुळे आणि कृश राजकीय ईच्छाशक्तीमुळे साध्य झाले नाही. किंवा असे धाडस केले गेले नाही. सीमावर्ती भागातील राज्ये परदेशातील घुसखोरींना कित्येक दशके सहन करीत आहेत हे सदसद्विवेकबुद्धी असणाऱ्या लोकांना चांगलेच माहिती आहे. बांग्लादेश, पाकिस्तान या देशातून भारतात येणाऱ्यांचे लोंढेच्या लोंढे काही कमी नाहीत. आसाम, बंगाल, काश्मीरमधील जनतेला हे पिढ्यानपिढ्या भोगावे लागलेय. हे विधेयक आणि कायदा केवळ भारतीय नागरिकत्व प्रदान करणाऱ्या बाबींची पुर्तता करण्यासाठीच आणली गेलीयेत. मुळात भारतीय असलेले मग ते कोणत्याही धर्माचे असोत त्यांना ह्या कायद्याचा कसलाही त्रास होणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मुळ मुद्दा विरोधकांचा हाच की निर्वासित मुसलमान धर्मीय लोकांना भारताचे नागरिकत्व का देणार नाही? हाच आहे. मुळात शेजारच्या मुस्लिम राष्ट्रात धार्मिक अल्पसंख्याक म्हणून ज्यांचा छळ होतोय त्यांच्यासाठीच हे विधेयक आणि कायदा आहे. बहुसंख्य असणाऱ्या लोकांसाठी नाही. एक फुटपट्टी म्हणून पहायचे झाल्यास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेजारील राष्ट्रांमध्ये असलेले त्याकाळच्या अल्पसंख्याकांची टक्केवारी आणि आजची टक्केवारी पाहिली की कळेल हा कायदा का लागू करावा लागला. विरोधाला विरोध म्हणून विरोधकांनी आंंदोलने केली ती हिंसक झाली त्यात तेल ओतून स्वतःच्या मतपेढीसाठी राजकारण करणारे सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते तेवढेच जबाबदार आहेत. अस्ताव्यस्त पसरलेल्या भारतात अव्वाच्या सव्वा वाढणाऱ्या लोकसंख्येला नोंदणीकृत करण्यासाठी हि विधेयके आणि कायदे महत्वाची भूमिका बजावतील. या नोंदणीकृत जनगणनेच्या आधारे या देशात कल्याणकारी आणि लक्षवेधी योजना राबवल्या जातील. आजपर्यंत नागरिकत्वाच्या बाबतीत कोणीही कडक धोरण स्विकारले नाही. आवो जावो घर तुम्हारा अशी सीमावर्ती राज्यात आजवरची स्थिती होती. पासपोर्ट, पँनकार्ड, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र आणि आधार यातील नोंदणीघोटाळे लक्षात आल्यानंतर अशा कायदेशीर विधेयकाची गरज भासली. तीची पुर्तता करणे हे मोठ्या जोखमीचे काम. त्याहून जोखमीचे काम म्हणजे अपप्रचार करून भडकवलेल्या जनतेला समजावून सांगणे. कारण स्वतःचे आस्तित्व दाखवण्यासाठी काही राजकीय पक्ष, नेते, संघटना या आंदोलनाला हिंसक वळण देऊन आपणे इप्सित साध्य करित आहेत. घरदार सोडून शिक्षण घेण्यासाठी विद्यापिठात गेलेला विद्यार्थी आंदोलनात भाग घेऊन बस कशासाठी पेटवेल? हिंसेला उत्तेजन का देईल? आजवर या देशातील असंख्य हिंसक आंदोलने ही ज्या त्या संधीसाधू राजकीय पक्षांनी किंवा संघटनांनीच केली आहेत. दूर्दैव अशा हिंस्त्र घटनांचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होतो. समाजकंटकांना कोणताच पक्ष वर्ज्य नसतो. जो आगी लावायला पैसा देईल तो आपला बाकी दुनिया गेली तेल लावत अशी मानसिकता. त्यात बेरोजगारांची मोठी फौज. मग काय कमी पैशात भरपुर मनुष्यबळ. ही आपल्या देशातील दूर्व्यवस्था. शिक्षणव्यवस्था मोडकळीस आल्याने बेरोजगारी वाढते. टक्केवारीचे, भ्रष्टाचाराचे डोंगर उभे राहिल्याने परकीय गुंतवणूकदार देशात गुंतवणूक करत नाहीत. गुंतवणूक करूनही प्रकल्प उभे होई पर्यंत सरकारे बदलून धोरणे बदलतात मग गुंतवणूकदार आखडते हात घेतात. भ्रष्टाचाराच्या केसेसमध्ये कोर्ट, माननीय सुप्रिम कोर्टाचे निकाल गुंतवणूकीचे प्रकल्प स्थगित करणे किंवा करार रद्दबातल करणे, तर काही भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांना वाचवण्यासाठी निकाल तारखा लांबवत राहणे अशी धोरणे प्रगतीला बाधक आहेत. कोणत्याही घटनेचा निकाल आपल्या मनासारखा लागला तर न्यायव्यवस्थेवर अढळ विश्वास, जयजयकार. मनाविरुद्ध लागला तर न्यायालये विकली गेलीएत, पैसा फेकून, कायदा वाकवून निकाल हवा तसा वळवता येतो वगैरे वल्गना करायच्या. असा सगळा बुद्धीहिन प्रकार आपल्याकडे चालूय. सगळे विषय सामाजिक असो वा राजकीय एकमेकांत कमालीचे गुंतलेले असतात. सारासार विचार करून सांप्रत काळात कोणत्या गोष्टींची, कोणत्या मुद्यावर ठाम राहण्याची गरज आहे हे बारकाईने पाहून, आजूबाजूच्या घटनांचा कनोसा घेऊन, चौरसपणे वाचून, चौकसपणे निरिक्षण करून आणि विवेकाने अवलोकन करून व्यक्त होण्याची गरज आहे. माध्यमं धनाढ्यांच्या हातातील बाहुले झाली आहेत. महत्त्वाचे मुद्द्यांना, विषयांना टाळण्यासाठी कोण कोण कोणाची कशाच्या मोबदल्यात कशी मदत करत आहे हे चाणाक्षपणे बघायची गरज आहे. नीरक्षीर विवेकबुद्धी जागरूक ठेवून सिंहावलोकन करणे एवढेच हाती आहे आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या.
-------------------
भूषण वर्धेकर
पुणे
------------------
लेख क्र. २
सीएए हा कायदा कोणत्याही भारतीयांना लागू होत नाही. विरोधक उगाचंच लोकांच्या माथी नको त्या गोष्ट सांगून भरकटवत आहेत. जे धर्माच्या आधारे छळवणूक होती म्हणून भारतात आश्रित म्हणून आले होते, निर्वासितांसारखे राहत होते. त्यांना कायमस्वरूपी नागरिकत्व देण्यासाठी ही कायदादुरुस्ती केली आहे. उगाच राईचा पर्वत करून मग सरकार भविष्यात अमुक करेल तमुक करेल अशी बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करून काय मिळणार. मुळात बिनडोक विरोधकांनी भाजपा सरकार मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी हा कायदा लागू करतंय असे म्हणणे म्हणजे निव्वळ थाप आहे. एकतर विरोधक सरसकटपणे भैसटलेले आहेत. धोरणात्मक निर्णयशुन्यता असल्याने भंजाळलेले विरोधक आणि त्यांचे समर्थन करणारे सुशिक्षित लोक हे उगाचच धार्मिकदृष्ट्या ध्रुवीकरणासाठी वातावरण निर्मिती करत आहे. विरोधकांनी सुधारणा करावी आपल्या धोरणात. कधीकाळी कॉंग्रेसचे नेते सीएए, एनपीआर साठी आग्रही होते. संसदेत प्रश्न मांडत होते. आता फुकाचे ढोंग करतायत. अशा पुचाट डबलढोलकी प्रवृत्ती मुळे मोदी पुन्हा २०२४ मध्ये निवडून येणार. विरोधक कामचुकारपणा करतात मग सरकाचे फावते. मुळातच एनसीआर, सीएए वगैरेमुळे भारतीय नागरिकांना काहीही त्रास होणार नाही. एनसीआर फक्त आसामसाठीच लागू करण्यात आला होता. एनपीआर सर्व्हे दर दहा वर्षांनी केला जातो. मग उगाचंच फुकाचा आव आणून माथी भडकवत आहेत विरोधक?. सगळा वेड्यांचा बाजार मांडलाय.
©भूषण वर्धेकर
पुणे
लेख क्र. ३
(हे उत्तर एक मित्राला एका ब्लॉगवर लिहिले होते म्हणून पोस्ट करतोय)
Dear friend,
NCR is meant only for Assam and implemented duly in Assam as per strict warning by Hon Supreme Court. For state like Assam it costs around 50k Crores, how would it be possible all over India without any reason. For Assam there a strong reason for NRC implementation.
NPR is national population register every decade it has been carried out since pre indepedence. It is a base database foe Census of India. It is mandatory to all people living or staying in India.
CAA is just Amedment not an Act. It will be applicable for only 31313 peole who already came to India and resinding in India with permanent residence certificate given by then govt of Congress. It is not at all supportive to get Citizenship of India. It is alrwady demanded by many political leaders but not yet recognized. BJP finally took a oportunity to ammend that bill into act CAA. This CAA will be never affected any people in India who are already staying. it is applicable for those people who came before 31 Dec 2014.
Now Minorities in neighbour muslim coutries are only those who are Non muslim. In 3133 people no one is muslim. CAA is not affecting any muslim in India.
Citizenship is right of each citizen who born in India or his/her parents are from India only..
First clear your mind this act is targeting only for muslims. India is secular country only because of majaority of Hindu people. All over the world show me any one country which has majority of muslims and declared as Secular country. India never can be so called Hindu Rashtra. We the indians are religious but not fools. We have right to ask questions to our religion right or wrong. Most of rebels are from Hindu religion only because they have faith, belief and confidence about humility is in our culture. CAA is affecting only for Rohingyas who came from Myanmar, Rakhen territory. Why these rohingyas coming to India only and staying here. Why not in Bangladesh and Pakistan and in Afganistan?
So before protesting please do read constitution first nothing is been added new in recent times. These things should be implemented and ammended long time ago. But due to vote bank politics no one can dare to do this.
BJP has guts to do this hence they proceed for it.
NCR, CAA NPR will never affect any person who is already citizen of India.
हिंदू राष्ट्र? बहुतेक नेपाळ
हिंदू राष्ट्र? बहुतेक नेपाळ असावे.
नाही.
The Constitution of Nepal, adopted in 2015, affirms Nepal as a secular federal parliamentary republic divided into seven provinces.
असे विकिपेडियावर आहे.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
सेक्युलॅरिझम आवडे हिंदूंना,
सेक्युलॅरिझम आवडे हिंदूंना, नेपाळला वास लागला होता म्हणायचा,हुशार आहेत.
बाहेरून आलेले फक्त मुसलमान आहेत
बाहेरून आलेले फक्त मुसलमान आहेत असे शेंबड्या पोराला सुद्धा वाटणार नाही आणि सरकार आणि कायदे समर्धक ह्यांना सुद्धा वाटत नाही.
धार्मिक पराकोटीचे अत्याचार हे हिंदू वर झाले आहेत पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये त्या मुळे बाहेरून आलेल्या मध्ये हिंदूच जास्त संख्येने असणार हे न समजण्या एवढे सरकार आणि कायदा समर्थक दूध खुळे नक्कीच नाहीत.
पण सर्व शहाणपण आणि तेज बुध्दी मत्ता फक्त आमच्या कडेच आहे असा मोठा गैर समज पुरोगामी लोकांचा आहे.
कायदा आण्याचा मूळ उध्येश च अन्याय ग्रस्त लोकांना न्याय देणे हा आहे.
वांशिक हिंसाचार मुळे मुस्लिम येथे असले मग ते पण अन्यायग्रस्त च असे सांगणे हे सुद्धा दिशाभूल करणारे वाक्य आहे.
वांशिक हिंसाचार होत म्हणून तो प्रश्न सोडवण्यासाठी साठी किती भारतीय सैनिकांनी बांगलादेश युद्धात प्राण दिले आहेत आणि तो प्रश्न सोडवला आहे बांगलादेश निर्मिती करून .
आणि हे शहीद झालले हिंदू,शीख,सैनिकच संख्येने जास्त आहेत.
इथे पण मुस्लिम चा सहभाग कमीच आहे.
जो प्रश्न मिटवून टाकला आहे बलिदान देवून परत त्याचे भांडवल का करत आहात
कागद सांभाळा
हा फारच विनोदी दावा आहे. कागद मी सांभाळून ठेवायची आणि विचारल्यास दाखवायची गरजच नसती तर कुणी गळे काढलेच नसते. दर दहा वर्षांनी जनगणना होते ती अशीच होते. कुणीही कसलेही कागद विचारत नाहीत. दिलेल्या माहितीवरून कुणालाही डिटेन्शन कँपमध्ये पाठवलं जात नाही की डीपोर्ट केलं जात नाही. त्यामुळे जनगणनेवर कुणी असे आक्षेप घेत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कोणी तरी सांगताय म्हणून ते
कोणी तरी सांगताय म्हणून ते सत्य च असेल असे समजणे मला पटत नाही.
परंतू, असत्यच असेल हे तुम्ही ठामपणे म्हणू शकता. उदा. नाव कमावलेली प्रसारमाध्यमे.
प्रत्येक माध्यम चा एक दृष्टिकोन असतो.
प्रत्येक माध्यमाचा एक अजेंडा असतो ,दृष्टिकोन असतो.
प्रत्येक जण वेगळेपण जपत असतो.
शेवटी मीडिया पण एक धंधा च आहे ..
धंधा चालवायचं तर गिऱ्हाईक हवंच.
तशी प्रत्येकाची वेगळी गिऱ्हाईक असतात असे म्हणुया पाहिजे तर.
नाही तर काही लोकांच्या काही महत्वकां शा असतात ते funding karun media la ठराविक पद्धतीचा विचार मांडण्यासाठी किती ही पैसा खर्च करतात .
मीडिया चे काम असे दोन प्रकारे चालते असे माझे मत आहे.
N d TV ram mandir झालच पाहिजे अशी भूमिका कधीच घेणार नाही आणि झी न्यूज तिथे राम मंदिरच झाले पाहिजे हे ठणकावून सांगेल.
इथे दोघात कोण चुकीचं आणि कोण बरोबर हे आपणच ठरवायचे असते.
कुठल्याही माध्यमाच्या
कुठल्याही माध्यमाच्या भूमिकेकडे पूर्वग्रहाने बघू नये, तेही पूर्ण बातमी ना वाचता किंवा न ऐकता. भावनेच्या भरात आपण चुकीच्या गोष्टींना समर्थन तर देत नाही ना? हे ही बघायला हवे. उदा: राममंदिराला समर्थन देणे.
हिंदू राष्ट्र कसं काय निर्माण होईल.
लोकशाही देश असलेला आणि राज्य घटने नुसार राज्यकारभार चालत असलेला भारत देश हिंदू राष्ट्र कसा होईल.
ही भीती निरर्थक आहे आणि फक्त हिंदू समाजा बद्द्ल इतर धर्मीय लोकांमध्ये अविश्वास वाढवा म्हणून निर्माण केलेली काल्पनिक कल्पना आहे.
लोकशाही पद्धती मध्ये बहुमत ला जास्त किंमत दिली गेलेली आहे ज्या गोष्टीला बहुमत आहे ती गोष्टच योग्य आहे असे समजले जाते.
इथे हिंदू बहुसंख्य आहेत आणि बहुमत च सरकार ठरवते मग आणि वेगळं हिंदू राष्ट्र निर्माण करायची गरज काय.
भारतात हिंदू बरोबर मुस्लिम समाजाची सुद्धा प्रगती झाली आहे .
मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्या प्रगती मध्ये कधी अडचण आली नाही.
जे हक्क हिंदू ना आहेत तेच हक्क मुस्लिम ना पण आहेत
बीजेपी च्या राजवटी मध्ये त्यांचे हक्क डावले गेले आहेत असे वाटत नाही.
रोचक
तुम्ही म्हणता की बिकाऊ माध्यमांवर तुमचा विश्वास नाही. वर तुमची अशी अपेक्षा दिसते की तुम्ही सांगाल ते लोकांनी सत्य म्हणून मान्य करावे. ह्यातला विरोधाभास तुम्हाला दिसत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे, पण तुम्ही लोकांचे मतपरिवर्तन करू शकाल असा तुमचा समज असला तर तो मोठा रोचक आहे, एवढेच यावर म्हणू शकतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुम्हाला हवा तेवढंच घेतले तुम्ही माझ्या पोस्ट मधून
कोणी तरी सांगताय म्हणून ते सत्य च असेल असे समजणे मला पटत नाही.
हे वाक्य सुद्धा माझ्याच पोस्ट मध्ये आहे ते नाही वापरलं प्रती उत्तर देताना .
आणि तुम्ही सांगता मी सांगतो त्या म्हणून लोकांनी विश्वास ठेवून विचारात बदल करावा अशी माझी इच्या आहे.
परस्पर विरोधी होईल हे.
माझी अशी बिलकुल इच्या नाही
दुर्दैवी
एवढे मोठे प्रतिसाद लिहून लोकांचे मतपरिवर्तनही करायची तुमची इच्छा नसेल तर काय उपयोग इतके टंकण्याचा! त्यापेक्षा काही तरी विधायक करा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
काही प्रश्न
राष्ट्रव्यापी NRC वरून दिल्लीत इतका वाद व्हावा हे आतार्किकच. पण अगदी साधा मुद्दा आसामचा नाही का ? आसाममध्ये झालेल्या NRC मध्ये ज्यांची नावं यादीमध्ये आली नाहीत, त्यांच्यामध्ये तरी हिंदू मुस्लिम असा भेदभाव होणारच ना ? तर यामधले सगळे काही स्थळांतरीतच आहेत असे नाही. मग झाला की नाही भारतीय मुसलमानांवर भेदभाव ? यात काही चुकीचे असेल तर जरूर सांगावे. यात पुन्हा ती ऑलिव्हर च्या व्हिडिओत दाखवलेली भयंकर IRONY आलीच, कि यादीत नाव नसलेल्या मजुराकडूनच डिटेन्शन कॅम्प बनवले जातात आहेत वगैरे.
नवीन आलेल्या सगळ्या प्रतिक्रिया, प्रतिसाद आणि कमेंट्स वाचल्यानंत
नवीन आलेल्या सगळ्या प्रतिक्रिया, प्रतिसाद आणि कमेंट्स वाचल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळा रिप्लाय देण्यापेक्षा एकच साग्रसंगीत पोस्ट करतोय.
मुळात काही लोकांनी डोक्यात खूळ घालून घेतलंय की एन.आर.सी., सीएए, एन.पी.आर. वगैरे केवळ आणि केवळ मुस्लिमांना त्रास देण्यासाठी आणि भारतातून हुसकावून लावण्यासाठीच भाजपाने आणलेले संविधानिक शस्त्र आहे. हा निव्वळ खुळचटपणा आहे. जसा अंधभक्तांचा आयक्यू आहे तसाच या कर्मदरिद्री तथाकथित भोंदू लोकांचा आयक्यू आहे. काही वेडपट लोकांना वाटते की भारत आता हिंदूराष्ट्र होणार तर काही ठार वेड्यांना वाटते की सरकार म्हणजेच भाजपा मुस्लिमांना शोधून शोधून टिपून भारताबाहेर घालवणार.
एक तर प्रत्येक कायदा हा संविधानातील तरतुदीनुसारच केला जातो. आणि हो काही महामहिम लोकांना वाटते की भाजपा संविधान बदलणार. म्हणजे यांच्या मंदबुद्धीच्या मते संविधान म्हणजे किराणामालाच्या दुकानातील यादी आहे कोणीही त्यात हवा तसा बदल करेल असे काही जणांना वाटते. असो अशी दिवाळखोरीत गेलेले बुद्धीजीवी आहेत म्हणून करमणूक छान होते त्यामुळे त्यांना काहीही बोलायला नको.
काहींचा गोडगैरसमज आहे की एन.आर.सी. भाजपाने आणलेल खुळ आहे. एन.आर.सी. फक्त आसामसारख्या राज्यासाठीच अनुकूल होते म्हणून आमलात आणले ते पण माननीय सुप्रीम कोर्टाने फटकारले तेव्हा. संपूर्ण भारतात एकाच वेळी लागू करणे कदापि शक्य नाही.ज्या पद्धतीने परकीय शक्तींनी दंगलखोरांना हाताशी घेऊन भारतात दंगली घडवल्या, पेड आंदोलने केली त्यामुळे सरकारला कोण कीती पाण्यात आहे याचा चांगलाच अंदाज आलाय. आत्ता काही कमेंट्स आणि त्यावरील रिप्लाय वाचताना समजले की काही स्वयंघोषित सेक्युलर लोकांना दिवसाढवळ्या स्वप्ने पडू लागलीत की सरकार म्हणजे भाजपा भारतीय मुस्लिमांना वेचूश वेचून हाकलून देतंय. उदाहरणार्थ १९८९-९० साली काश्मीरमधील पंडितांना जसे शोधून काढून हाकलून दिले होते. अर्थातच काश्मिरी पंडितांसाठी "यांच्या" सारखे स्वयंघोषित सेक्युलर लोक तेव्हा नव्हते आवाज उठवायला कदाचित नाहीतर काश्मिरी आतंकवादी गपगार झाले असते. असो असतं एकेकाचं नशीब. जे होणार नाही त्याबद्दल व्हिज्युअलाईजेशन करून टाहो फोडून धाय मोकलून रडून सिद्ध करायचे असते की आम्ही कसे सेक्युलर आहोत. मुळात भारतात जो तो सोयीनुसार भूमिका घेतो. यात सो कॉल्ड पुरोगामी आणि सेक्युलर अव्वल आहे. असो त्यांच्याबद्दल बोलू तेवढेच कमी.
कोणत्याही देशाला नागरिकत्वासंबंधी कायदे करायला आणि अंतर्गत सुरक्षेसाठी कायद्यात संविधानिक पद्धतीने दुरूस्ती करण्यासाठी मुभा असतेच.सीएए हा कैक वर्षापासून प्रलंबित होता. कॉंग्रेसच्या काळात ह्यावर कसलीही प्रक्रिया झाली नाही का झाली नसावी हा चर्चेचा विषय नक्कीच आहे. आसाममध्ये एन.सी.आर लागू करण्याची धमक कॉंग्रेसप्रणित सरकारमध्ये कधीच नव्हती ती धमक भाजपाने दाखवली. एन.पी.आर. वर तर दस्तुरखुद्द पी. चिदंबरम यांनी संसदेत भाषण केले होते कधीकाळी. घुसखोरांचा लेखाजोखा ठेवण्यासाठी या कायदेशीर बाबींचा संविधानिक मार्गाने उपयोग होईलच. मात्र घुसखोरीच्या आडमार्गाने जी काही दुकानदारी चालू होती भारतात त्याला चाप नक्कीच बसणार आहे. विशेषकरून सीमेलगतच्या राज्यात घुसखोरांनी जो काही उच्छाद मांडला होता तो तेथील मूलनिवासी लोकांनीच सहन केलाय. मुळात असे काही कायदे असतात आणि कायदेशीर रित्या संविधानिक पद्धतीने एखाद्या हाताबाहेर गेलेल्या गोष्टीवर ताबा मिळवता येतो ही बाब समस्त भारतीयांना चांगलीच समजलीय. मात्रदी सत्तेत आल्यापासून माझी व्यक्तीगत खात्री झालीय की मंदबुद्धीच्या अंधभक्तांना जेवढी अक्कल असते तेवढीच अक्कल तथाकथित सो कॉल्ड पुरोगामी आणि सेक्युलर लोकांना असते. अंधभक्तांना मोदी सरकारच्या कोणत्याही गोष्टींचा मुस्लिमांना (त्यांच्या भाषेत यवनांना किंवा म्लेंच्छांना) त्रास झाला की आतून आनंदाच्या उकळ्या फुटतात कशासाठी काहीही माहित नसते फक्त "आता कशी जिरवली यांची" हा एकमेव बुळचट अविर्भाव. तर दुसरीकडे सोकॉल्ड बुद्धीजीवी लोकांना एकाच भयगंडाने पछाडलेले असते की "मोदीसरकार अल्पसंख्याकांवर जुलूम करतंय". ही अचाट मंडळी उगाचंच फुकाचा आवा आणून वैचारिक टाहो फोडत असतात. मोदींनी काहीही केलं की यांच्या पोटशूळात दुखणारच. असो. ही अशी मंडळी आणि अंधभक्त ही उर्वरीत भारतीयांना करमणुकीसाठी मिळालेली मोठी देणगी आहे. सोबत न्यूज चँनेल्स तर रतीबच टकत असतात. असो.
एवढे लिहून थांबतो.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
बरं.
बरं.
------------
तुमचा प्रतिसाद ३३% पटला आहे. दोहो बाजूंना टोकाची मतं आहेत, ना नाही.
पण तुमचा उर्वरित ६६% प्रतिसाद हा "तुच्छतापूर्वक" वाटला. की -ह्या लोकांना काय कळणार? च्छ्या!! असं.
- ह्यामुळे ऐसीवरचा तुमचा प्रवेश सुकर होईलही, पण आर्ग्युमेंट करताना समोरचा निघून जाईल. त्याचं काय?
असो, लिहीत रहा (तेवढं वैयक्तिक होऊ नका.)
* - पेस्तनकाकांचा फॉर्मुला वापरून काढलेली टक्केवारी.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
मी असाच आहे हो.
दोन्हीकडच्या वैचारिक, भावनिक आणि आगतिक गोष्टींचा अभ्यास, आकलन आणि बाबी समजून प्रतिसाद देतो. एकतर सुवर्णमध्य किंवा दोन टोके. डिप्लोमँटीक कमेंट्स जमत नाही. हांजीहांजी करणे त्रिवार शक्य नाही.
आणि तुच्छतावादी दृष्टिकोन पुण्यात शिकल्यामुळे आलाय.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
अं?
माझ्याबद्दल आणि माझ्या समविचारी लोकांबद्दल अशी भाषा वापरल्यावर आम्ही पुढे काही वाचू, असं का वाटलं तुम्हाला?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खूळ नाही तर काय नक्की??
सीएए, एन.आर.सी आणि एन.पी.आर हे मुस्लिमांना चेपण्यासाठीच भाजपाने आणलेले कायदे आहे त असा जो काही ग्रह करून घेतलाय लोकांनी त्यावर काय बोलणार?
असा विचार करणारे आणि अंधभक्ता माझ्या दृष्टीने एकसारखेच. कोणालाही वंदू नये की कोणालाही निंदू नये.
जसे काही कट्टर हिंदूंना वाटते की या कायद्याच्या आधारे आता मुस्लिमांना छळू तशीच मंदबुद्धी असणारे विरोधक झाले आहेत. सरकारने कोणताही नवीन कायदा आणलेला नाही. नेहरु लियाकत ट्रिटी चाच भाग फक्त कायद्यात पारित केलाय. जो कित्येक वर्षे खितपत पडला होता.
असो.
आता भविष्यात जेव्हा कधी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा येईल तेव्हा विरोधक हेच कँसेट रिपिट टेलिकास्ट करतील. मुळात कायदा दुरुस्ती आणि विधेयके ही देशाच्या एकसंधता राखण्यासाठी गरजेची असतात. आपला देश भला मोठा त्यात नैसर्गिकरित्या बरीच विविधता मग प्रत्येकाच्या सोयीनुसार देश चालवायचा का?
जे भविष्याच्या दृष्टीने योग्य आहे ते कोणतेही सरकार करणारच. भाजपाने केलं की बऱ्याच लोकांचे पित्त खवळते. का कुणास ठाऊक?
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
काहीही!
लोकांनी हा ग्रह करून घेतला आहे, हा तुमचा ग्रह आहे. कारण लोकांना विचार करता येत नाही, असं काहीसं गृहितक त्यामागे आहेत. ते धरून लिहीत सुटलात तर तुमचं म्हणणं मनावर का घ्यायचं?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सीएए, एन.आर.सी. आणि एन.पी.आर.
Permalink Submitted by नितिन थत्ते on बुधवार, 04/03/2020 - 08:37.
हा कायदा हे मुस्लिमांना चेपण्याचे एक हत्यार आहे.
-------------------------------
सीएए, एन.आर.सी. आणि एन.पी.आर. हे मुस्लिम विरोधी आहेत आणि भाजपाने मुस्लिमांना चेपण्यासाठी हे कायदे आणले आहेत असा जो समज आहे तो कसा काय?
असा ग्रह कोणी करुन घेतलाय? कशासाठी?
माझा आक्षेप या गोष्टीवर आहे. कारण नसताना अश्या भुमिकांमुळे फुटीरवादी लोकांचे फावते. त्यांची टोकाची रिॲक्शन येते मग हिंदुत्ववादी चेकाळतात. सावळा गोंधळ सुरु होतो.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
प्रथम त्यांना वाटले की
>>>सीएए, एन.आर.सी. आणि एन.पी.आर. हे मुस्लिम विरोधी आहेत आणि भाजपाने मुस्लिमांना चेपण्यासाठी हे कायदे आणले आहेत असा जो समज आहे तो कसा काय?
आम्ही काय अलीबागहून आलोय काय?
अहो भाजप काय काल निर्माण झालेली पार्टी नाहीये ? जनसंघ असता पासूनच मुसलमान त्यांना खुपतात हे आम्हाला माहिती नाही काय?
प्रथम त्यांना वाटले की आसाममधील एन आर सी मध्ये मुसलमानच सापडतील आणि मग त्यांना आपण बेदखल करू. म्हणून ते इतक्यावर्षापासून "बांगला देशी घुसखोर" हा प्रचार चालवत होते- मुसलमानांचे नाव न घेता. पण आसाममधील एन आर सी मध्ये मुसलमानांपेक्षा हिंदू "घुसखोर" जास्त सापडले. मग "मुसलमानच फक्त" बेदखल व्हावेत म्हणून सीएए आणला.
ते क्रोनोलोजी वालं भाषण बीजेपीच्या वेबसाईटवर सुद्धा होतं.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हा चांगला होता
अजून एखदा येउद्यात.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
खूप च खोटे बोलता राव तुम्ही
घुसखोर मध्ये मुस्लिम पेक्षा हिंदू च जास्त असणार हे न समजायला bjp aani त्यांची यंत्रणा मूर्ख आहे का.
कोणी ही सांगेल तुलनेने हिंदू च जास्त असणार.
कारण पीडित,शोषित तेच आहेत मुस्लिम अत्याचाराचे.
काही ही लिहिता तुम्ही दुसरण्याना मूर्ख समजून.
असो
असो
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
थोडं चुकीचं वाटलं
तुम्ही अमित शहांच्या क्रोनॉलॉजी भाषणाला पुडी म्हणून सोडून दिलंत. तिथं ते स्पष्टपणे "NRC फक्त आसाम मध्ये नाही, तर देशभरात होणार" म्हणाले होते.भाजपा च्या ट्विटर हॅन्डलवरच ट्विट याच EFFECT च होतं. तुम्ही म्हणता की देशविरोधी कारवायांवर नजर ठेवण्यासाठी हे करण्यात आलं, हि माहिती कुठून मिळाली ते माहित नाही. तर कारण काहीही असो, दिल्लीतल्या अराजकतेसाठी शहांना का जबाबदार धरण्यात येऊ नये ?
भाजप अल्पसंख्यांक, specifically मुसलमानांच्या विरोधात आहे, किंवा मुस्लिमद्वेषी शक्ती भाजपखाली मजबूत झाल्या हे तुम्हाला पटत नाही. मी सुद्धा असं वरवरचं विधान मानणार नाहीच. पण तुम्हीही एकदा CAA NRC चा विरोध दादरी, योगी आदित्यनाथ गुजरात riots या context मध्ये बघा. हे असं करणं गरजेच आहे की नाही तो गौण मुद्दा, पण हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न उठल्यावर काश्मिरी पंडितांचा मुद्दा येणं जितकं स्वाभाविक आहे तितकंच हेही आहे. मुद्दा काय तर पुरोगाम्यांना हे सरकार मुस्लिम विरोधी का वाटतं, हे awandering थोडं coy वाटलं.
हिंदू मुस्लिम वाद तयार करून सरकार स्थापन करण्याचा एक काळ होता
हिंदू मुस्लिम वाद तयार करून सरकार स्थापन करण्याचा एक काळ होता. आता राष्ट्रभक्त आणि राष्ट्रद्रोही हा वाद आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. बऱ्याचशा भक्तांचा आवडीचा मुद्दा म्हणजे काश्मिरी पंडीतांचे शिरकाण आणि स्वयंघोषित गोरक्षा याच्यापुढे ते जात नाहीत. आम्ही अश्मयुगीन काळात जावू पण हिंदुत्व वाचवू ही यांची खुळचट कल्पना. युनेस्कोच्या अहवालानुसार जगात ज्या काही चाळीसच्या वर सिव्हिलायझेशन्स होत्या त्यापैकी बऱ्यापैकी लोप पावल्या टिकली, बहरली ती इंडस सिव्हिलायझेशन म्हणजे हिंदू संस्कृती थोडक्यात. आता भक्तांना या गोष्टी कोण समजावून सांगणार? असो.
पुरोगामी मंडळी हुशार हं. वाचन, लेखनात आणि वैचारिक आयुधे वापरण्यात निपुण. मात्र या मंडळींना वाटते की भाजपा फक्त अराजकता पसरवण्यासाठीच सत्तेत आलेय. आणि सर्वात मोठी अंधश्रद्धा म्हणजे भारतातील सगळे हिंदूंचे समर्थन भाजपालाच आहे. ही निव्वळ धुळफेक आहे. दक्षिणेकडे कॉंझर्वेटिव्ह विचारांची देवभोळी जनता खूप आहे. मात्र त्यांनी भाजपाला नेहमीच नाकारले आहे. केरळ आणि तमिळनाडूतील जनता तर सरळसरळ झिडकारून टाकते भाजपाला. कारण तिकडचा प्रांतिक अस्मितावादी विचार.
म्हणजे भाजपा फक्त आणि फक्त हिंदूहित लक्षात घेऊन मुस्लिमांना डावलून सरकार चालवतंय ही निरूपयोगी थाप आहे.
संसदेत तयार होणारे कायदे टाईमपास म्हणून बनवत नाहीत. त्यावर नक्कीच पुढच्या काळातील होणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करूनच कार्यवाही केली जाते.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
धूळफेक?
मूळ मुद्द्याऐवजी अशा गोष्टी लिहिणे - ज्यांची इथे चर्चाच झालेली नाही - ही धूळफेक नव्हे?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सीएए, एन.आर.सी. आणि एन.पी.आर. ला विरोध करणारे
सीएए, एन.आर.सी. आणि एन.पी.आर. ला उगाचंच विरोध करणारे जे कोणी आहेत त्यांच्यबद्दल लिहिलेय. कारण त्यांचा एकमेव आकस आहे की भाजपा करतय म्हणजे नक्किच काळेबेरे असणार. ह्याच गोष्टी जर काँग्रेसने केल्या असत्या तर असाच विरोध झाला असता का? (काँग्रेसने केले असते असे आपन गृहित धरुया)
कारण एकुण विरोध हा भाजपा करतय म्हणून आहे दुसरे काही नाही. कायदा तो कायदा त्यात हिंदु मुस्लिम कोठुन आले?का सरकारने कोणती मोहिम हाती घेतलिये कि मुस्लिमांना शोधुन काढून बाहेर काढायची????
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
बुद्धिभेद
कायद्यातील तरतुदींवर आक्षेप घेतल्यास 'हे लोक असेच आहेत' असे म्हणणे म्हणजे आक्षेपांचा प्रतिवाद होत नाही. हा तर बुद्धिभेद होतो - 'जो सरकारला विरोध करेल तो देशद्रोही' प्रकारचा. असे विचार मांडलेत तर इकडे कुणी तुम्हाला गांभीर्याने घेईल अशी अपेक्षा ठेवू नये.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बुद्धीभेद नव्हे सद्यस्थिती
बऱ्याचशा लोकांना कॉंग्रेसमुळेच भारताची फाळणी झाली असे वाटते तसेच काहींना भाजपाबद्दल वाटते. प्रतिवादा मध्ये सीएए, एन.सी.आर वगैरे कसे संपूर्ण देशासाठी तोकडे पडतात यावर प्रकाश टाकायला हवा. पण तसे होत नाही. १३० कोटी लोकांमध्ये घुसखोर ओळखणार कसे हा मुलभूत प्रश्न आहे. घुसखोर म्हणजे विनापरवाना भारतात वास्तव्य करणारा परकीय माणूस. ही समस्या जगभरातील सर्वच देशांना भेडसावत आहे. सीएए मध्ये मूळ मेख अशी आहे की १३२०१४ पूर्वीपासून राहत असलेलेच अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देणार. ३१३१३ वगैरे आकडा आहे स्थलांतरित लोकांचा. ज्यांना या आधीच परमनंट रेसिडेंट सर्टीफिकेट मिळाले होते. मात्र त्यावर त्यांना नागरिकत्व प्रदान करता येत नव्हते. प्रश्न असा आहे की यांच्या व्यतिरिक्त कीती अल्पसंख्याकांना सरकार नागरिकत्व देईल? २०१४ नंतर आलेल्यांना पुर्वीच्या प्रथेप्रमाणे नागरिकत्व दिले जाईल. एक ११ वर्षाच्या राहण्याची अट शिथिल केली गेलीय पाच का सहा वर्षेसाठी. पक्की खात्रीपूर्वक माहिती नाही कोणते कलम आहे त्यासाठी.
मग सीएए च्या अंतर्गत न येणाऱ्यांंसाठी नेमका मसुदा काय? आणि सरकार अशा लोकांना शोधणार कसे? सगळ्याच योजना, सरकारी लाभ आधारला लिंक केलेत मग निवडणूक ओळखपत्र का करत नाहीत सरसकटपणे? काही प्रमाणात आधार आणि निवडणूक ओळखपत्रे जोडली गेली आहेत प्रायोगिक तत्वावर. भाजपा करतंय म्हणजे वाईटच करतंय हा भ्रम बऱ्यापैकी लोकांना आहे. का कुणास ठाऊक? थोडं विषयांतर होईल पण गेल्या वर्षी २०१९ फेब्रुवारीत पुलवामा हल्ला आणि नंतरचा सर्जिकल स्ट्राईक वगैरे हा भाजपाला निवडणुकीत यश मिळावे म्हणून पाकिस्तान आणि भारत यांचा सुनियोजित कट होता वगैरे अशाही कॉन्स्पीरेसी थिअरीज वाचण्यात आल्या. हसावे की रडावे कळंत नव्हते त्या वाचून.
या सीएए वगैरेच्या गदारोळात जबाबदार विरोधकांनी महत्त्वाचे प्रश्न विचारणे आणि मुद्यावर पकडून सरकारला बोलतं केलं पाहिजे हे होत नाही. डिस्टिंक्ट बायफर्केशन्स पाडली जाताहेत किंवा पडली गेलीयत.
यामुळे लोकशाहीचा खेळखंडोबा होतो. मुद्दे महत्त्वाचे असतात विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्यासाठी. पण ना विरोधक तेवढे प्रगल्भ आहेत. ना सरकारला पडलीय त्याची. विरोधकांची जिरवायची कशी आणि ज्याची जिरत नाही त्याला अडकवायचा कसा हा घातक खेळ चालू झालाय. त्याला काही हुश्शार राष्ट्रभक्तीचे कोंदण लावत आहेत हे दूर्दैव.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
विषयांतर
हे थोडं नाही पुष्कळच विषयांतर आहे त्यामुळे पास.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
उदाहरण सांगितले मी
बाकी काही नाही. असो.
नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर म्हणजेच एन.पी.आर. ला का विरोध करत आहेत??? हे तर दर दहा वर्षांनी येते ना?खरी माहिती द्यायल कय प्रॉब्लेम आहे लोकांना? काही साहित्यिक खोटी महिती द्या म्हणून लोकांना सांगत होते असे वाचले. गरज काय? असे चुकीचे सांगण्याची?लोकांना भडकावले का जातेय? काहीतरी मोटीव्हेशन असेल काय? अश्या कोणत्या संघटना आहेत ज्या हिंसक आंदोलने करायला उद्युक्त करतात? तथाकथित धर्माचे ठेकेदार का प्रक्षोभक भाषणे देत आहेत लोकांना भडकवण्यासाठी? याची उत्तरे कोण देणार? प्रश्न कोण विचारणार? जबाबदार विरोधक कुठे गेले? विद्यापीठातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे हिंसक आंदोलने करण्यासाठी पेट्रोल,आग लावायची साधने, आयुधे येतात कुठुन?हे प्रश्न कोन विचारणार??
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
ज न ग ण ना
काय म्हणता यावर? आणि यावर?
या प्रतिसादात लोकसत्तामधल्या ज्या लेखाचा दुवा दिला आहे त्यातून साभार :
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
निवांत वाचून प्रतिसाद देईन
असो.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
No Documents Needed For NPR,
No Documents Needed For NPR, Nobody Will Be Classified Doubtful: Amit Shah - NDTV https://www.ndtv.com/india-news/no-documents-needed-for-npr-nobody-will-...
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
कागज नही देखेंगे
आज तुमच्याकडून हे अपेक्षितच होते. आणि गृहमंत्री जे म्हणत आहेत ते खरे असेल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, ह्यापूर्वी सरकारने उलटसुलट वक्तव्ये केली आहेत. त्यासाठी डिसेंबरमधील ह्या बातमीतील तपशील पाहावेत :
Amit Shah says no NPR-NRC link, his Govt linked it 9 times in House
उदा :
आंदोलकांच्या आक्षेपांचा विचार केल्यामुळे सरकारला उपरती झाली असली तर ते चांगलेच आहे. त्यामुळे आंदोलन करणे आवश्यक होते असेच सिद्ध होते. त्यामुळे आंदोलकांवर उगीच टीका करणे थांबवावे ही विनंती.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जर एन.पी.आर. साठी जर कागद पत्रे जमा करावी लागली तर
जर एन.पी.आर. साठी जर कागद पत्रे जमा करावी लागली तर बिघडले कुठे?
कारण जर देशासाठी लोकांची माहिती सरकार जमा करत असेल तर त्याचा दुरुपयोग केला जाईल अशी भिती का वाटावी???
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
देशाचे गृहमंत्री
आता देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह म्हणताहेत की कागदपत्रे दाखवायची गरज नाही. तुमचे गृहमंत्र्यांशी मतभेद असतील तर ते योग्य ठिकाणी मांडा. हे ते ठिकाण नव्हे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तेच तर
समजा गृहमंत्री परत म्हणाले की कागदपत्रे दाखवा तर बिघडले कुठे?
कारण "कागज नही दिखाएंगे" ही भुमिका का?
साधा विचार करा मोबाईल सिम कार्डासाठी कागद दाखवावे लागतात. बँकेमध्ये अकाउंट उघडण्यासाठी देखील कागदपत्रे जमा करतो.
मग एन.पी.आर. साठी जर सरकार कागदपत्रे दाखवावी लागत असतील बिघडले कुठे?
मुळात एक पुर्वग्रहदुषित दृष्टीकोन तयार झाला आहे किंवा तयार केला गेला आहे की विद्यमान सरकारने म्हणजे भाजपाने जर एखादी गोष्ट सांगितली की ती वाईट. काहीतरी काळेबेरे करणार सरकार. उदा. याच चर्चेत कोणीतरी जावईशोध लावलाय की भाजपाने हे कायदे मुस्लिमांना चेपण्यासाठी आणले आहेत. किंवा मुस्लिमांचे नागरिकत्वाचे अधिकार काढून घेण्यासाठी अश्या कायद्यांचा वापर सरकार करेल असा फुकाचा दांभिक प्रचार केला जातोय कशासाठी?
माझा आक्षेप या गोष्टींना आहे.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
पूर्वग्रहदूषित
माझ्या वरील प्रतिसादातून उद्धृत -
हे म्हणून झाल्यावर तुम्ही म्हणता -
तुमची गोलपोस्ट नक्की काय ती ठरवा. आधी तुम्ही विचारत होता की दर दहा वर्षांनी एनपीआर होतेच ना, मग आताच हा कांगावा कशाला? तेव्हा तुम्हाला सांगितले की दर दहा वर्षांनी जी होते ती जनगणना आणि त्यात कागदपत्रे मागत नाहीत. आता गृहमंत्रीही मान्य करताहेत की एनपीआरसाठी कागदपत्रे मागणार नाहीत. तरीही तुम्ही हे जर पुन्हापुन्हा विचारत असाल की कागदपत्रे का नकोत, तर तुमची गोलपोस्टच वेगळी आहे. ते आता गृहमंत्र्यांना विचारा.
एनपीआरसाठी कागदपत्रे मागत नसतील तर आमचा त्याला विरोध नाही, जसा तो जनगणनेला नव्हता. तरीही तुम्हाला असे म्हणावेसे वाटत असेल तर पूर्वग्रह कुणाचा ते तुम्हीच पाहा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
त्यामुळे पूर्वग्रह कुणाचा ते पण तुम्हीच पाहा.
मी कधीच विरोध केला नाही. सीएए असो की एन.आर.सी. असो की एन.पी.आर.
गोलपोस्ट नाही ती.
लोकांचा भोंगळ विरोध कशासाठी या बद्दल विचारतोय.
विरोधक लोकांची माथी भडकवत आहेत. त्याची काहीही गरज नव्हती आणि नाही.
पूर्वग्रह कुणाचा ते मला चांगलेच समजले आहे. सद्सद्विवेकबुद्धी असणारा उगाचंच कांगावा करीत नाही. एकूण जे काही काहूर माजवले गेलेय की हे कायदे अमुक लोकांचे नागरिकत्व काढून घेणार, विशेषकरुन मुस्लिमांवर अन्यायकारक आहेत हे कायदे हा जो अपप्रचार चालुये त्यामुळे नकळतपणे दोन डिस्टिंक्ट पंथ पाडले गेले आहेत या अपप्रचारामुळे. हिंदू विरुद्ध मुस्लिम. आणि जेव्हा जेव्हा असे धार्मिक वाद होतात तेव्हा भाजपाला चांगलाच फायदा होतो. कारण आपोआप ध्रुवीकरण केले जाते काहीही कारण नसताना. आपल्या भारतात भोळी जनता खुप आहे जी दुधखुळी आहे. जी आपोआप प्रभावीत होते आणि वर्चस्वतावादी संघटनांना बळी पडते.
विरोधकांनी जी गोष्ट होणार नाही त्याची भिती पसरवून मुस्लिमांना (सुशिक्षित आनि अशिक्षित) भडकवले आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीने जे करायचे होते ते केले.
भविष्यात सरकार जेव्हा लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा आणेल तेव्हा खरी मजा येणार आहे. जर असेच बालिश चाळे विरोधकांनी आणि तथाकथित बुद्धीजीवी लोकांनी केले तर २०२४ ला पुन्हा मोदीशेठ डोक्यावर बसणार. मग आहेच मित्रों.. भाईयों और बहनो वगैरे.. म्हणजे परत २०२९ पर्यन्त भक्तगण सुस्साट.
मला तर विरोधकांवर फार दया येतेय. केविलवाणे झालेत बिचारे.
असो.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
बरं
इतरांबद्दलची दया आत प्रवेशली तिथे वादाचा विषय संपला. त्यामुळे बरं झालं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वादाचा विषय कधीच नव्हता
मला साधक बाधक चर्चा करायला आवडतात.
चर्चेमुळे बऱ्याच नवनवीन बाबी समजतात. या चर्चेने मला बऱ्याच नव्या गोष्टी, माहिती आणि महत्वाचे लोकांची तात्विक बैठकीची पातळी (चांगल्या अर्थाने लिहितोय हं) समजते. खंडन मंडन करण्यासाठी असे नवनवे मुद्दे हाताशी राहातात. कारण मी न्युज चॅनेल्स पाहणे सोदून दिले आहे कधीच्याच काळी. वर्तमान पत्रे वाचतो. लोकसत्ता, दि वायर, बीबीसी मराठी सध्या तरी वाचनीय असतात भले त्यातील बऱ्याच गोष्टी खटकतात. मग टाईमपास साठी भक्तमंडळींचे अतार्किक लिखाण वाचतो.
आपण आणि आपले विचार किती वेगळे आहेत हे समजण्यासाठी आजुबाजुला भक्तमंडळी आणि हल्लीचे पुरोगामी व सोबतीला बीग्रेडी असतील भरपूर मजा येते. एकेकाचे विचार, मते आणि जावईशोध ऐकले, वाचले की मनोरंजन तुफान होते.
बाकी आयुष्य सुंदर आहे हो फक्त इंटरनेट मुबलक पाहीजे.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
How many times can a man turn his head...
भाजपा मुस्लिमांचे अहित करते कि नाही हे समजण्यासाठी माझ्या मते डेमोग्राफिक, राजकारण, अर्थशास्त्र याचा तगडा अभ्यास लागेल. माझा तितका नक्कीच नाही. पण भाजपा मुस्लिमविरोधी आहे हे एखाद्या व्यक्तीला का वाटू शकतं, हे दादरी, योगी, इ. इ. गोष्टींमधून दिसतं. मान्य, ह्या फारच वरवरच्या गोष्टी असू शकतील, माहित नाही. पण हे असे वाटणे मूर्खपणाचे हे म्हणणारे आपण कोण ? शाहीन बाग आंदोलन as far as i know पुरोगाम्यांनी छेडलेले आंदोलन नव्हे. आंदोलनांची सुरुवात आसाम मध्ये झाली. कुठलाही व्यक्ती आसाम आंदोलन हे पूरोगाम्यांचे नसून अतिशय conservative आणि उजव्या आसाम्यानच आहे हे ओळखेल. थोडक्यात, पुरोगामी आणि भक्त असे दोन विभाग करून दोन्ही मूर्ख म्हणणे म्हणजे वैचारिक जबाबदारी झटकायचा प्रयत्न वाटला.
1)भाजपा सरकार मुस्लिम विरोधी आहे आणि प्रत्येक गोष्ट हिंदुहितार्थ आणि मुस्लिमद्वेषातून केली गेली आहे.
आणि
2) CAA आणि NRC हा मुस्लिमांवर अन्यायकारक आहे.
1 आणि 2 ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या माहितीप्रमाणे हि चर्चा 1) वर नाही. आत्ता केवळ 2 वर बोलूयात. आणखी एक भाग जो चर्चेत वगळला गेला, रामचंद्र गुहा आणि योगेंद्र यादव यासारख्या विचारी आणि अहिंसक जनांना अटक का करण्यात आली होती ? कपिल मिश्राची काय खबर ? Aftermath of protests, if you will.
कसे काय मुस्लिमांवर अन्यायकारक आहेत?
सीएए हा भारतीय मुस्लिमांना लोकगू होतोय का? आणि कसा? कुठे आलेय छापून सीएएसाठी भारतीय मुस्लिमांना वेठीस धरणार आहेत??
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
जबाबदारी कोणाची?
आपण भारतीयच आहोत, हे सिद्ध करण्याची जबाबदारी मुस्लिमांवर टाकली आहे; त्याकडे तुम्ही साफ दुर्लक्ष करत आहात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
... Pretending he just doesn't see !
इतके प्रतिसाद आहेतच की. हा एक आहे बघा. हा पण आहे. तुमचं म्हणणं काय, तर बाबा राष्ट्रव्यापी एनआरसी ही पुडी आहे. तस होत नाही सर. गृहमंत्र्यांचं बोलणं जर पुडी असेल तर सत्यासत्य काय ? गृहमंत्र्यांचं बोलणं गंभीरपणे घेतलं जाणारच. यापुढची गोष्ट. एनआरसी येणारच नाही असं ना प्रधानमंत्र्यांनी ना गृहमंत्र्यांनी अश्वासित केलं आहे. केवळ अजून "विचार आणि चर्चा नाही झाली" इतकंच. हि पुडी आत्ताचीच नाही. भाजपाच्या अश्वासनाम्यातही एनआरसी होतं. शहा 2019 निवडणुकींआधीही एनआरसी बद्दल बोललेत.
एन.आर.सी. हा आसामसाठी लागू केला होता
एन.आर.सी. हा आसामसाठी लागू केला होता. भारतासाठी नाही. आसामसाठी एन.आर.सी. लागू करायल गरज का भासली? त्याची पार्श्वभूमी काय? त्या यादीमध्ये १९७१ नंतरचीच लोक आणि आधीचे लोक असे का? बांग्लादेशाची फाळणी आणि यांचा काय संबंध?
याची उत्तरे मिळाली कि कळेल एन.आर.सी. आसामसाठी का लागू केला गेला?
संपूर्ण भारतात एन.आर.सी. लागू केला जाइल तेव्हाची का असेल पार्श्वभूमी? का आसामसारखेच संपूर्ण भारतात लागू होइल का?
एकच औषध सगळ्या रोगांवर कसे चालेल?
आणि समजा भाजपाने जाहिरनाम्यानुसार एन.आर.सी. संपूर्ण भारतात लागू करायचा ठरवला तर भाजपा फक्त मुस्लिमांना का बरे टार्गेट करेल?
भाजपा मुस्लिमांवर अन्याय करतेय हे पटवून देण्यासाठी तुम्ही योगी, गुजरात, दिल्ली वगैरे ठीकाणाच्या दंगली कारणीभूत ठरवत असाल तर शुभेच्छा!!!
कारण भक्तलोक जसे काँग्रेसी हे मुस्लिमधार्जिणी आहेत म्हणत व्हऑटाबाउटिझमचा खेळ सुरु करतात तासाच हा प्रकार आहे.
एका गोष्टीचा सारासार विचार करा. आसामसाठी एन.आर.सी. लागू करताना खर्च झालेला पैसा आणि वेळ लक्षात घेता. सरकार लगेच संपूर्ण भारतासाठी लागू करेल काय?
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
आसाम
केवळ आसाम मध्ये का असेना, हिंदू मुस्लिम भेदभाव होत आहे, का नाही ? NRC देशात येईल, न येईल. आसाम चं काय ? यादीमध्ये न आलेल्या हिंदूंना मदत करणं सरकार कर्तव्य समजत, पण मुसलमानांना मात्र नाही, याशिवाय दुसरा कुठला अर्थ काढला जाऊ शकतो ?
मला नाही माहिती ! मी आपला गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया होत आहे इतकंच म्हणतोय.
भाजपा मुस्लिमांवर अन्याय करतेय हे सांगण्यासाठी मी या घटनांचा उल्लेख नव्हता केला. मी असं प्रोटेस्ट करणाऱ्या मुस्लिमांना का वाटू शकतं, हे तुमच्या ध्यानात यावं म्हणून टाकलेलं. फक्त तितकंच नाही तर सत्तेत बसलेले भाजपचे चेले चपाटे काय काय बोलून गेलेत ! गिरीराज सिंग स्पष्टपणे मुसलमान लोकसंख्या कवेत आणण्याची गरज आहे म्हणलेत.
पुनःश्च सर, हे सगळं संगण्यामागे भाजपा मुस्लिमविरोधक आहे हा माझा इरादा नाहीच. माझा उद्देश इतकाच आहे की NRC सारख्या धुसर आणि अजून अस्तित्वात नसलेल्या गोष्टीसाठी इतकं मोठं आंदोलन होत नसतं. 2014 पासून साचत आलेल्या लहान मोठ्या उपेक्षा आणि माकडचाळ्यांचा संग्रह आहे, त्याची आणि गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे उठलेल्या वादळाची ही प्रतिक्रिया आहे.
हे मान्यच. अगदी मान्य. सरकारने अजूनही NRC येणारच नाही असे सांगावे.
हा मात्र सपशेल दिशाभूल करणारा प्रश्न आहे. You know the drill, NRC च्या चाळणीतून हिंदू मुस्लिम सगळेच बाहेर येणार. CAA मधून मुस्लिमेत्तर पुन्हा आत येणार वगैरे.
NRC aani caa
NRC aani caa he दोन्ही कायदे जोडीनेच येणार .
ते एकमेकावर अवलंबून आहेत.
NRC madhye नागरिकांची नोंदणी केली जाईल आणि ह्या प्रक्रियेत जे बसणार नाहीत ते भारताचे नागरिक नाहीत असे समजले जाईल .म्हणजे थोडक्यात भारतीय नागरिकांची ओळख पटवली जाईल ज्यांची ओळख पटणार नाही ते परकीय.
मग ह्या परकीय नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी caa ha kayda aahe ( nagrigta संशोधन कायदा) ह्या मध्ये मुस्लिम समाजाला वगळले आहे.
मूळ आक्षेप इथेच आहे.
मुस्लिम लोकांना चा समावेश नाही म्हणून कायदा चुकीचं आहे हा आक्षेप आहे.
तसे हे दोन्ही कायदे नवीन नाहीत जुनेच आहेत त्या मध्ये वरचेवर बदल केले गेले आहेत.
देशाचा नागरिक कोणाला समजायचे आणि घुसखोर कोणाला समजायचे म्हणून पाहिले देशाच्या नागरिकांची ओळख पटवणे गरजेचं असते आणि हे जगात सर्वच देशात होत फक्त प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत.
स्वतंत्र पूर्व भारत हा पाकिस्तान,बांगलादेश,आणि आताचा भारत हे मिळून होता.
नंतर मुस्लिम समाजानेच आम्हाला वेगळा देश हवा म्हणून हट्ट धरला त्या मुळे धर्माच्या नावावर भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान आणि नंतर बांगलादेश निर्माण झाला.
धर्माच्या नावावर फाळणी म्हणजे सरळ विभागणी होणे अपेक्षित होते पण तसे घडले नाही आणि बराच मुस्लिम समाज भारतात राहिला आणि काही हिंदू पाकिस्तान बांगलादेश मध्ये राहिले ते स्वतःच्या इच्छेने.
भारतात कायद्याचे राज्य आणि सहिष्न हिंदू समाज असल्यामुळे येथील मुसलमान समाज येथे रमला प्रगत झाला त्यांना भारत सोडून पाकिस्तान ,बांगलादेश मध्ये जाण्याची बिलकुल गरज वाटली नाही .
पण पाकिस्तान,आणि बांगलादेश मधील धार्मिक कट्टर ते मुळे त्या देशातील हिंदू समाज देश सोडण्यास मजबूर झाला त्यांच्या वर अनंत अत्याचार केले गेले त्या मुळे त्यांनी परत भारताची वाट धरली,
मग ह्या लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे तर ते कोणते चुकीचं काम करत आहे.
जन्माने भारतात नागरिकत्व मिळते ( दुसरे मार्ग पण आहेत पण खूप मोठ्या संख्येने नागरिकत्व देणे कठीण जाईल ) पण वरील शोषित हिंदू चा जन्म पाकिस्तान ,बांगलादेश मध्ये झाला असल्या मुळे भारताच्या जुन्या कायद्या नुसार त्यांना भारतीय नागरिक समजले जावू शकत नाही म्हणून caa आणावा लागला.
आता मुस्लिम समाजा कडे वळूया .
हिंदू पण भारतात गैर मार्गाने आले मुस्लिम पण गैर मार्गाने आले मग मुस्लिम ना वेगळा न्याय का .
तर ह्याचे उत्तर हे आहे धार्मिक फाळणी तुमचीच मागणी होती ती पूर्ण झालेली आहे मग परत तुम्हाला भारताचे नागरिकत्व का द्यावे?
जो मुस्लिम समज फाळणी नंतर सुद्धा भारतात च राहिला आणि जो मुस्लिम समाज पाकिस्तान,बांगलादेश मधून फाळणी नंतर किती तरी वर्षांनी आला त्यांना एकाच तागड्यात तोलता येणार नाही.
जे गेले नाहीत ते भारताचे नागरिकच आहेत पण जे गेले आणि परत काही वर्षांनी गैर मार्गाने आले त्यांच्या साठी भारताने का सॉफ्ट कॉर्नर दाखवावा.
उलटी स्थिती असती भारत अशांत,गरीब असता आणि बांगलादेश,पाकिस्तान शांत आणि प्रगत असता .
आणि भारतीय मुस्लिम लोकांना वरील दोन्ही देशात गैर मार्गाने प्रवेश केला असता तर त्यांना पाकिस्तान,बांगलादेश नी नागरिकत्व साफ नाकारले असते आणि त्यांना घुसखोर लोकांसारखे वागवले असते .
इथे धर्माचा प्रश्न नाही देश ची सुरक्षित त आणि स्व नागरिकांचे हित जपणे हे सुद्धा मुद्धे आहेत.
तुमच्या प्रतिसादातच
तुमच्या प्रतिसादातच
बाहेरून आलेले* हिंदू "शोषित" आणि बाहेरून आलेले मुसलमान "घुसखोर" अशी स्पष्ट विभागणी आहे.
आणि भूषणकाका म्हणतात की हे डोक्यात घेतलेलं खूळ आहे.
*बाहेरून आलेले म्हण्जे ज्यांच्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारा पुरावा नाही असे लोक
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तशी विभागणी तर होणारच
ब्रिटिश कालीन भारत आणि आत्ताचा भारत इथपर्यंतच प्रवास सर्वानाच माहीत आहे.
अनेक हिंदू आणि अनेक मुस्लिम ह्यांचे जन्मस्थळ पाकिस्तान आहे पण ते भारताचे नागरिक आहेत .
लालकृष्ण अडवाणी ,दिलीप कुमार हे सर्वांना माहीत असलेली नाव.
१९४७ आणि १९५५ हा काळ पर्यंत लोकसंख्येची अदलाबदल झाली असावी कारण १९५५ का नागरिकत्व विषयी कायदा मंजूर झाला(,
वरील दावा चुकीचं सुध्दा असू शकतो माहितगार नी चूक लक्षात आणून द्यावी) आणि त्या नंतर भारताचे नागरिक कोण हे ठरवले गेले.
नागरिकत्व साठी जन्म चा पुरावा लागतो पण तो स्वतंत्र पूर्व नंतरचा लागत असेल .
त्याच्या अगोदरचा जन्माचा पुरावा लागत नसेल तर तुम्ही किती वर्ष भारतात राहत आहात हा पुरावा लागत असेल.
नागरिकत्व साठी स्वतंत्र पूर्व चा पुरावा ध्या असे कोणतेच सरकार ठरवणार नाही.
कारण मग प्रश्न किचकट होईल.
करोडो हिंदू आणि मुस्लिम चे जन्म स्थान पाकिस्तान बांगलादेश मध्ये मध्ये असेल .
हे तर मान्य आहे ना ?
त्या मुळे तुम्ही किती वर्ष इथे राहत आहात तोच महत्वाचा पुरावा लागेल
समजा भारतातील अल्पसंख्य तथा
समजा भारतातील अल्पसंख्य तथा मुस्लिम जर असे म्हणाले की भारतात अल्पसंख्य म्हणुन आम्ही असुरक्षित आहोत किंवा आमचा छळ होत आहे आम्हाला बहुसंख्य मुस्लिम असलेल्या पाकिस्तान वा अन्य देशात जायचे आहे तर काय सोय आहे? उत्सुकता म्हणुन प्रश्न.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
सर्व जग साक्षी आहे
सर्व जग साक्षी आहे की भारताची फाळणी ही धर्मावर झाली आहे.
पण हे पूर्ण सत्य पुरोगामी,आणि caa विरोधी मानायलाच तयार नाहीत.
भारताची फाळणी ही धर्माच्या आधारेच झाली आहे हे वैश्विक सत्य मान्य केले तर बाकी कोणतेच प्रश्न पुरोगामी ,आणि caa विरोधी लोकांना पडणार नाहीत.
तेव्हा सत्य स्वीकारायला शिका आणि नंतर दुसऱ्यांना तुम्ही असत्य बोलत आहात असे सूनवा.
चोरा नी चोरी करणे वाईट आहे हे सांगणे जसे हास्यास्पद आहे तसेच तुमचा caa विरोध पण हास्यास्पद आहे.
तात्या,
तात्या,
ह्यात येक गोष्ट विसरलात -
पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली आहे. भारताची नाही.
तेव्ह धर्माच्या नावावर कायदेकानू पाकिस्तानात झालेत, इथे नाही.
तुम्हाला जर भारतातही धर्म-कायद्यात आणायचा असेल तर मग तुम्ही पाठिंबा द्याच.
मला कुठलाच सर्कारी धर्म नको आहे. तेव्हा करणार विरोध सी.ए.ए./एन.आर.सी ला.
तुम्हाला हास्यास्पद वाटलं तर मनमुराद हसा
==================
भूतकाळातील आस्वल्य.
वर्धेकरांच्या या कमेंटमुळे
वर्धेकरांच्या या कमेंटमुळे त्यांना खरेच या विषयावर चर्चा करायची आहे असे दिसते. आणि ते भाजपच्या कट्टर भक्तांपैकी नसावेत असे वाटते. ( भाजपच्या कट्टर भक्तांची ओळख म्हणजे जे गुजरात दंगलीचे समर्थन 'त्यांना धडा शिकवणे गरजेचे होते, खूप माजले होते' असे करतात. किंवा परवा झालेल्या दिल्ली दंगलीचे समर्थन 'आझादी चाहिये थी ना अब लो आझादी' असे करतात ते.)
जर असे असेल तर टंकनश्रम घेण्यात अर्थ आहे. नाहीतर माझे मुद्दे माझ्यापुरतेच ठेवतो.
- ओंकार.
अगदी बरोबर
भक्तगण भयानक असतात. त्यांच्याशी वाद घातला तर मेंदू बधीर होतो.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
उदारमतवादी...
ओंकार ज्यांना कट्टर भक्त म्हणतात, त्यांना मी सायकोपाथ म्हणते... भक्त त्यापेक्षा जरा वरचे.
माझ्या दृष्टीनं, भक्तांकडे वरवर दाखवण्यापुरतीतरी करुणा, सहृदयता असते - व्यवहारात काही का होईना! उदाहरणार्थ नोटाबंदीच्या वेळेस अर्थव्यवस्थेचे घेवडे लागले तरीही राष्ट्रभक्तीच्या नावाखाली ते खपवून घेणारे, पण लोकांना त्रास होतोय, हे तात्त्विक पातळीवर मान्य करणारे. तरीही राष्ट्रासाठी सगळ्यांनी त्याग केला पाहिजे, वगैरे (भोंगळ) उत्तुंग बोलणारे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भक्तलोक २०१४ नंतर भारताला लाभलेले
भक्तलोक २०१४ नंतर भारताला लाभलेले सर्वात मोठे एंटरटेनमेंट पॅकेज आहे.
गाय हमारी माता है
हमे कुछ नही समझता है
असा दुधखुळा प्रकार आहे सगळा.
आणि दुसरीकडे सोयिनुसार भुमिका घेणारे बुद्धीजीवी किंवा सो कॉल्ड पुरोगामी किंवा संधीसाधू सेक्युलर मंडळी.
कहर करतात सगळी मंडळी ही.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
मला वाटतं
Caa,nrc विरोधी आणि समर्थक आपल्या मतावर ठाम आहेत.
किती योग्य युक्तिवाद असला तरी कोणीच मान्य करणार नाही.
मी caa समर्थक आहे आणि त्या कायद्यात काहीच दोष नाही असे माझे ठाम मत आहे.
किती ही शब्दांच्या कोलांट्या उड्या मारल्या तरी माझे मत बदलणार नाही जो पर्यंत ह्या कायद्याचे प्रतक्षात दुष्परिणाम समोर येणार नाहीत तो पर्यंत.
तीच अवस्था दुसऱ्या बाजूला आहे.
सी ए ए साठी शेखर गुप्तांनी जी
सी ए ए साठी शेखर गुप्तांनी जी ॲनॉलॉजी वापरली आहे ती चांगली आहे.
एखादे रॉकेट स्वत:हून विनाशक नसते. ते उपग्रह सोडण्यासाठी पण वापरता येते. पण त्या रॉकेटवर अण्वस्त्र बसवले की ते डेडली होते. सी ए ए हे रॉकेट आहे. आणि एन आर सी च्या अण्वस्त्रासह त्याचा वापर झाला की ते डेडली आहे. त्याचा वापर हा भाजपचा मूळ उद्देश "मुसलमानांचे मताधिकार काढून घेणे आणि त्यांना दुय्यम नागरिक किंवा न-नागरिक बनवणे" साध्य करण्यासाठीच होणार आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आताची राज्यघटना तशी परवानगी देईल?
नितीन sir tumhi म्हणता तसे मुस्लिम लोकांचे मत अधिकार काढायचे असतील तर आता ची राज्य घटना अस्तित्वात आहे तो पर्यंत ते शक्य आहे का.
त्या साठी पूर्ण बदल करावा लागेल.
राज्य घटना नाकारून दुसरी व्यवस्था निर्माण करावी लागेल.
ह्या साठी लष्कराला पूर्ण सहभागी करावे लागेल.
त्यांच्या मदती शिवाय होणार नाही.
सर्व संस्थांचे अधिकार गोठवून सर्वांना जेल मध्ये टाकावे टाकेल.
विरोधक लोकांना एक तर गोळ्या घालून ठार करावे लागेल किंवा बिना चोकशी आयुष्यभर तुरुंगात टाकावी लागेल
ना कोर्ट ना कायदा.
हे सर्व थांबवायचे असेल ( कथित स्टोरी जे तुमच्या सारख्या लोकांना असे होईल असे स्वप्न पडत ) तर फक्त लेखणी नी काही होणार नाही जीव त्यागण्यास तयार राहवे लागेल.
तुम्ही आहात का तयार.
ते नितिन थत्ते आहेत. अनिल
ते नितिन थत्ते आहेत. अनिल थत्ते नाहीत. तो इसम निराळा. फारच निराळा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नसले तयार तर काय होणार आहे ?
ते जीव द्यायला तयार आहेत की नाहीत यावरून त्यांचं आर्ग्युमेन्ट बरोबर का चूक कसं ठरणार ?
काय बोलू
एवढी टोकाची भूमिका ते घेत आहेत त्याला कसलाच आगा पिच्छा नाही.
काहीहीहीही हं थत्तेसाहेब
Permalink Submitted by नितिन थत्ते on शुक्रवार, 13/03/2020 - 07:56.
........... त्याचा वापर हा भाजपचा मूळ उद्देश "मुसलमानांचे मताधिकार काढून घेणे आणि त्यांना दुय्यम नागरिक किंवा न-नागरिक बनवणे" साध्य करण्यासाठीच होणार आहे.
-----
या मतावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नाही.
असाच जर तुमचा पुर्वग्रहदुषित द्रुष्टीकोन असेल तर तुम्हाला उदंड शुभेच्छा !!!
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
परत
आम्ही काय अलीबागहून आलोय काय?
अहो भाजप काय काल निर्माण झालेली पार्टी नाहीये. जनसंघ असता पासूनच मुसलमान त्यांना खुपतात हे आम्हाला माहिती नाही काय?
तुम्ही म्हणाता म्हणून "तसं नाही" हे मान्य करायला तुम्ही गृहमंत्री किंवा भाजप सरकारचे अधिकृत प्रवक्ते आहात का?
इथेच तुमची बाजू उचलून धरणारे राजेश १५८ की कोणा आहेत ते सरळा बांगला देशातून आलेले हिंदू हे "छळ झालेले" आणि बांगला देशातून आलेले मुसलमान "घुसखोर" अशीच स्पष्ट विभागणी करत आहेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ज्ञान/ सत्ता
अगदीच राहवलं नाही लिहिल्याशिवाय.
NRC, NRP राबविण्यामागे भाजपसारख्या बहुसंख्यांकवादी पक्षाचा अंतस्थ हेतू आहे 'त्यांना' वेचून काढणं आहे हे त्या पक्षाच्या समर्थकांनाही मान्य असेल, तो काय डाव्या/ उदारमतवाद्यांचा कांगावा वगैरे नाही. पण भाजप, मुसलमान राजकारण यापलीकडे अजून काही मुद्दे आहेत.
या प्रश्नांना उत्तर:
ज्ञान हीच सत्ता - एखाद्या व्यक्ती, समूहाबद्दल ज्ञान असणं हा त्या व्यक्ती/ समूहावर सत्ता प्रस्थापित करण्याचा/ सत्ता बळकट करण्याचा मार्ग आहे. किंबहुना ज्ञान असणं हेच सत्ता असणं आहे. इंग्रजी राजवटीने भारताबद्दल कितीतरी सर्वेक्षणं केली - Linguistic, Zoological, Trignometrical, Archeological इ. ती काय शुद्ध जिज्ञासेपोटी नाही.
मग कोणी म्हणेल परकीय राजवट वेगळी, स्वकीय तेही लोकशाही राजवट आहे, आपणच निवडून दिलेल्या सरकारला का माहिती देऊ नये?
कारण लोकशाहीतही सरकार सार्वभौम नसतं, सार्वभौमत्व हे राज्यसंस्थेला दिलेलं असतं आणि राज्यसंस्थेचे घटक आहेत सरकार, लोक आणि जमीन. त्यामुळे एखादा कायदा वैध मार्गाने जरी संमत झाला असेल तरीही लोकांना त्याविषयी आपलं मत व्यक्त करण्याचा हक्क आहे.
सरकार स्वकीय, लोकशाही असलं तरीही जर ते अतिशक्तीशाली होऊन दमन करत असेल तर लोकांना विरोध व्यक्त करायचा हक्क आहे. नागरिक म्हणून कायदा स्वीकारणं, आचरणात आणणं हे जसं राजकीय कर्तव्य आहे तसंच किंवा त्याहून मोठं नैतिक कर्तव्य आहे कायदा नैतिकदृष्ट्या चुकीचा असेल तर विरोध करणं.
थ्यँक्यू
कालच एका खाजगी संवादात मी लिहिलं, की सुदैवानं अजून भारतीय लोकसंख्येचं चांगलंसं demographic model नाही. ते तयार झालं तर अमेरिकेत २०१६च्या निवडणुकांत जशी फूट पाडली गेली, तशी फूट पाडणं फार सोपं होईल.
त्या विधानाचा असा विचार मी केला नव्हता. त्यामुळे मोठंच थ्यँक्यू!
लोकांनी जनगणनेच्या वेळेस थोडंबहुत खोटं का बोलावं, ह्याचं उत्तम उत्तर ह्यात आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उभी फुट अॉलरेडी पाडली गेलीय.
भारतातील सध्याची परिस्थिती एकतर विरोध कराल तर राष्ट्रद्रोही ठराल. समर्थन कराल तरर राष्ट्रभक्त व्हाल अशी व्यवस्था राबवली गेलीय. याला सरकार जेवढे जबाबदार आहे तेवढेच विरोधक पण जबाबदार आहे.
लोकांनी जनगणनेच्या बाबतीत खोट बोलावं जर संयुक्तिक वाटत असेल तर सरकार उघडपणे पॉप्युलेशन डेटा मँन्युप्युलेट करेल. आणि तसंही आपल्याकडे व्होटबँक जपण्यासाठी नानाविध प्रकार गेले कित्येक वर्षे सर्रासपणे चालू आहेत.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
हिंमत ए मर्दा ...
तुमच्या हिंमतीला दाद द्यावीशी वाटते. एवढी बेधडक आणि वाह्यात विधानं करायला लागणारी हिंमत माझ्याकडे नाही!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
म्हणजे जो काही सावळागोंधळ
म्हणजे जो काही सावळागोंधळ चालूय तो सर्वस्वी सरकारनेच केलाय असंच तुम्हाला म्हणायचेय काय?
विरोधकांची भूमिका नेहमीच योग्य असते का?
माझी मते मांडायला वाह्यात विधानांचो कोदण देणारे तुम्ही कोण?
हिंमतीचे म्हणत असाल तर चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट बेधडकपणे म्हणायला माझा एरवीच आग्रह असतो. सोयीनुसार समर्थन करणे, लेचीपेची भूमिका घेणे मला जमत नाही आणि जमणार पण नाही. जे आहे ते सरळ थेट.
पटलं तर तथास्तु नाहीतर शुभेच्छा
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
>>>म्हणजे जो काही सावळागोंधळ
>>>म्हणजे जो काही सावळागोंधळ चालूय तो सर्वस्वी सरकारनेच केलाय
अर्थातच सरकारनेच केलाय.
मुळात एन आर सी देशभर लागू करणार असं गृहमंत्र्यांनीच (म्हणजे सरकारनेच) संसदेत सांगितलं ना?
टर्माइट्स बाहेर काढायचेत हे सरकार सांगतंय ना?
सी ए ए मध्ये नेवके मुसलमान वगळणे हे सरकारनेच केले आहे ना?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
>>>सी ए ए मध्ये नेमके मुसलमान वगळणे हे सरकारनेच केले आहे ना?
.... सी ए ए मध्ये नेमके मुसलमान वगळणे हे सरकारनेच केले आहे ना?
असा जर तुमचा विचार असेल वा समज कसेल वा भूमिका असेल तर त्यावर मी काय बोलणार?
कारण फार पूर्वीपासून भक्तांना एकच बडबड करायची सवय जडलीय की काश्मीरमध्ये पंडितांना वेचून वेचून बाहेर काढलंय आणि त्यात तत्कालीन सरकारचा छुपा हात होता. त्याच धर्तीवर मला तुमची भूमिका वाटते. असो.
नेहरू लियाकत करार सत्तर वर्षापूर्वी टाईमपास म्हणूनच केला होता आणि भाजपाने पुन्हा टाईमपास म्हणून त्याच धर्तीवर सीएए संपादित केला असे म्हणायचेय का?
मुस्लिम देशातील अल्पसंख्याक म्हटले की मुस्लिम आपोआपच वेगळे होणार जाणूनबुजून करायची गरजच काय?
आणि आसाममध्ये जशी एन.आर.सी लागू केली डिट्टो तशीच्या तशीच एन.आर.सी. सरकार का बरे संपूर्ण देशभर लागू करेल?
तुमचा आक्षेप भाजपा वा तत्सम पक्ष हे मुस्लिमविरोधीच आहेत आणि मुस्लिमांना चेपण्यासाठीच असे कायदे आणलेत असा आहे नक्कीच समजले.
आता नवीन शतकात हिंदू-मुस्लिम वाद उकरुन काही उपयोग नाही. कारण त्यावरुन धार्मिक ध्रुवीकरण सहजरीत्या होते आणि नेहमीच भाजपाच्या पथ्यावर पडते. सीएए, एन.आर.सी. एन.पी.आर. ला विरोध करण्यासाठी मुस्लिमांना भडकावून जी हिंसक आंदोलने केली गेली त्याला कारणीभूत कोण? फक्त आणि फक्त भाजपाच आहे का?
मुद्देसुद प्रश्न आणि देशहित साधून जबाबदारीने सरकारला जाब विचारायचा कोणी?
२०२० एखाद्या समुहाला वाळीत टाकून वा बहिष्कृत करून लोकशाही टिकेल काय?
राज्यघटनेतील तरतुदीनुसारच देश चालतो. वेळोवळी ज्यात्या सरकारांनी घटनेत दुरुस्ती करून कायद्यात बदल केले आहेत. याचा अर्थ सरसकटपणे सगळ्याच दुरुस्त्या स्वार्थासाठी केल्या आहेत काय?
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
मोघम
फार्फार मोघम झालं हे.
भलती हिंमत
सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज हवाय पण जबाबदारी नको, हे कसं चालायचं? सगळं बरं झालं तर नाचायला विरोधकांना बोलावणार होते का?
त्यामुळे तुमच्याएवढी बेधडक, वाह्यात विधानं करणं मला जमणारं नाही. कृपया तुम्ही कोणतं पाणी पिता ते कळवा, मी ते टाळत जाईन. उगाच भलती हिंमत नको यायला माझ्याकडे!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भाजपा या कायद्याच्या आधारे धार्मिक ध्रुवीकरण करेल
भाजपा या कायद्याच्या आधारे धार्मिक ध्रुवीकरण करेल हे वाटणे म्हणजे भारत हिंदूराष्ट्र होईल असे म्हणण्यासारखे आहे.
या अशक्यप्राय गोष्टी आहेत.
एकतर संविधानाच्या चौकटीत राहून भाजपा काय कोणताच पक्ष सध्याच्या काळात अशा कुरापती करू शकत नाही.
नैतिकदृष्ट्या कायद्याच्या बाबी पडताळून पहायच्या असतील तर सुज्ञ आणि जबाबदार विरोधक आणि सरकारला कोंडीत पकडण्याची सुष्ट पुष्ट रणनीती आवश्यक आहे. आपल्याकडचे विरोधक सपशेल नापास कँटेगीरीतले आहेत. लोकसहभागातून चळवळी करून, आंदोलने करून सरकाला जाब विचारणे हे कालबाह्य झाले आहे. कारण बहुतेक चळवळी आणि आंदोलने (काही अपवाद वगळता) सध्याच्या काळात पेड इव्हेंट झाले आहेत.
२०२० मध्ये राजकीय आंदोलने ही स्वतःच्या किंवा संघटनेच्या किंवा पक्षाच्या आस्तित्वासाठी करणे गरजेचे झाले आहे. ह्या विषयावर खुप वेगळी आणि प्रदिर्घ चर्चा होऊ शकते.
मुळात लोकशाही बळकटीसाठी जी काही संसदेच्या बाहेर वापरली जाणारी आयुधे आहेत उदा. उपोषण, आंदोलन, मोर्चा आणि लोकसहभागातून तयार झालेली चळवळ वगैरे अत्यंत कृश झालेली आहेत. याला जबाबदार कोण?
यावर सोशोइकोपॉलिटिकल साधक बाधक चर्चा होणं आवश्यक आहे.
ज्ञान हीच सत्ता हा जुना फंडा झाला सध्याच्या इंडस्ट्री ४.० च्या युगात डेटा हीच सत्ता ही बिरुदावली लागू होऊ शकते. असो.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
असोच.
1)ह्या कडे एकदा बघा
2)तुमचा पूर्वग्रहाबद्दलचा आक्षेप काही अंशी खरा आहेच. पण "पूर्वग्रह आहे" इतक्याने काम नाही होणार ना. तो पूर्वग्रह आत्ता उफाळून येण्याची सद्यस्थितीत काही कारणे आहेत का, तो पूर्वग्रह कोणत्या घटनांच्या पायावर उभा आहे ह्यावर सुद्धा चिंतन केले जावे.
3) सगळाच दोष पूर्वभ्रमदूषित व्यक्ती, पुरोगामी यांवर टाकून नाही चालणार. गृहमंत्री अमित शहा सुद्धा भीतीचे वातावरण तयार करण्यास तितकेच जबाबदार आहेत.
असो. चर्चेची पातळी राखल्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन.
चार्वी ह्यांचे मत एकदम योग्य आहे
राजसत्ता मग ती लोकशाही पद्धतीने स्थापित झालेली असो,हुकुमशाही असो नाही तर राजेशाही.
जनतेवर जास्तीजास्त राज्य करण्याचा इच्छा बाळगून असते.
त्या साठी जनतेची सर्व प्रकारची माहिती गोळा केली जाते,
विविध समाज घटकांना एकत्र येवू द्यायचे नाही हा पण विरोध दाबण्याचा एक मार्ग आहे .
सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे ह्याची कसोटी काय,?
कारण सरकार विरोधी लोक सुद्धा जनतेला भरकटू शकतात ,भीती दाखवून जनमत सरकार विरोधी बनवू शकतात
हे पण शक्य आहेच की.
ह्या मध्ये महत्वाचा घटक असतो तो बुध्दी वादी लोक ही पण विकली जावू शकतात त्यांच्या कडून हवे तसे युक्तिवाद करवून घेणे सुद्धा काही अशक्य नाही .
आता भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे ते अल्पसंख्याक विरोधी आहे असे मत असणारा एक प्रवाह आहे त्या मुळे सरकारचा प्रतेक निर्णय हा मुस्लिम विरोधी च आहे असाच समज त्या लोकात आहे.
उद्या भारतीय जनता पक्षाचे सरकार जावून काँग्रेस किंवा डाव्या पक्षाचे सरकार येईल.
पण हे दोन्ही पक्ष हे हिंदू विरोधी आहेत असा प्रवाह सुद्धा आहे ते सुद्धा ह्या दोन्ही पक्षांच्या निर्णय कडे हिंदू विरोधी असलाच पाहिजे ह्या भावणे मधून बघतात आणि ते चुकीचे पण नाही.
मग नेहमीच सरकार आणि जनता ह्यांनी असहकर्याने वागायचे का .
आणि असाच असहकार्य राहिले तर प्रगती कशी होणार.
त्या साठी विरोध करताना डोळ्या वरचा चष्मा काढा योग्य निर्णय घ्या आणि योग्य जागीच विरोध करा.
आता राहिला माहिती गोळा करण्याचा मुद्धा
गुगल तुम्ही काय सर्च करता हे साठवून ठेवते त्या वरून तुमच्या विचार विषयी,वृत्ती विषयी अंदाज येवू शकते.
तुमचे लोकेशन मोबाईल मुळे ट्रॅक होते तुम्ही कुठे जाता किती वेळ थांबता, बार मध्ये जाता की मंदिरात जाता एकुनाएक माहिती असेतेच.
जवळ जवळ सर्व माहिती जमा होतेच.
त्या संबंधित संस्था ती माहिती कधी ही share karu शकतात.
तुम्ही सरकारी लोकांन पासून माहिती लपवून ती लपेल ही भोळी आशा आहे.
मग नेहमीच सरकार आणि जनता
सीएए कायद्याचा आणि प्रगतीचा काय संबध आहे हे स्पष्ट कराल का? उलट देशावर लोकांचा बोजा आणखी वाढून प्रगतीचा वेग कमी होईल अशा कायद्याने. प्रगती करण्यासाठी जे कायदे केले जात आहेत त्यांना विरोध नाही. उदा. एअर इंडिया विकायला काढणे.
हेच चालू आहे. पण ते समजून घ्यायला तुम्ही देखील डोळ्या वरचा चष्मा काढा आणि पहा.
- ओंकार.
CAA देशाला घातक करोणा देशाला घातक
Caa विरूद्ध अगदी जीवाची बाजी लावून उतरले ल्या संघटना ,त्यांना आर्थिक मदत करणारे छुपे समर्थक,त्यांची बाजू लावून धरणारे बुध्दी वादी ते पण फुकट.
केवढे हे सर्व देश प्रेमी आणि देशाची काळजी असणारे.
ही सर्व लोक,समर्थक,.
पाठीराखे,भांडवल पुरवठादार,बुध्दी वादी
हे सर्व करॉना विरूद्ध च्या लढ्यात गायब आहेत.
घरोघरी जावून लोकांना धोका समजून सांगत नाहीत.
फुकट मास्क आणि sanitizer वाटत नाहीत
गरीब रुग्ण साठी वर्गणी गोळा करत नाहीत.
सार्वजनिक जागा साफ करत नाहीत.
कुठे गेले देश प्रेम.
हे सर्व सरकारचे काम म्हणून घरात बसले सर्व देशाची काळजी करणारे.
आपल्या लोकांचं देश प्रेम हे ढोंगी आहे फायदा असेल तरच देशावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे.
म्हणून तर मुठ भर ब्रिटिश लोकांनी १५० वर्ष राज्य केले.
हे सर्वांना नाहीत आह त्या साठी नवीन सर्व्ह करायची गरज नाही.
=>
CAA = COVID19
कायदा वा सरकारसमर्थक CAAची तुलना जीवघेण्या विषाणू आणि रोगांशी करताना बघून भारीच करमणूक होते खरी!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
असे असेल तर
रामदास आठवले स्टाईल मंत्र तयार होईल
गो सीएए
गो एन.आर.सी.
गो एन.पी.आर.
सीएए गो
एन.आर.सी गो
एन.पी.आर. गो
रिकामटेकडे मेंदू यावर देखील डीजे वापरून गाणं तयार करतील.
आणि असे अति उच्च प्रकार भारतातच होऊ शकतात.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
असे असेल तर
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
असे असेल तर
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
स्वच्छ भारत अभियानामुळे
स्वच्छ भारत अभियानामुळे अस्वच्छ सार्वजनिक जागा आहेत कुठे साफ करायला?
हा फारच मार्मिक आहे शालजोडीतून
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
च्युत्यगिरी
हा शब्द नितीन थत्ते ह्यांचा आहे पहिल्या कमेंट मध्ये .
हा शब्द ऐसी अक्षरे ला सभ्य वाटत असेल तर आम्ही दर पाच शब्दमागे हा शब्द वापरू .
तेव्हा मान्य करा म्हणजे झाले.
?
दर पाच शब्दांच्या नंतर हा च्युत्यगिरी शब्द वापरला तर एकंदर वाक्यरचना च्युत्यगिरी वाटू शकते किंवा सगळा प्रतिसाद च्युत्यगिरी वाटू शकतो.
.
.
.
.
पाने