ही बातमी समजली का? - १०६
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____
http://www.thehindu.com/news/national/modi-is-gods-gift-to-india-venkaia...
देवकांत बरुआंचा पुनर्जन्म झालाय का?
कडू औषध
PPF, NSC, KVP व्याजदर कमी.
http://www.thehindu.com/opinion/editorial/article8377859.ece
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
यापुढे ट्रॅक ठेवला
यापुढे ट्रॅक ठेवला पायजे.
जेव्हा कन्हैया किंवा तत्सम प्रकरण हॉट होईल तेव्हा समजावे की आता कुठेतरी नागरिकांच्या खिशात हात घालण्यात येणार आहे.
--------------------------------------
अवांतर: सीमेवर सैनिक गोळ्या खात आहेत बर्फात गोठत आहेत आणि तुम्हाला व्याज दराची पडली आहे. बोला भारतमाता की जय !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
थत्तेचाचा - महागाईचा दर कमी
थत्तेचाचा - महागाईचा दर कमी आहे आणि घाउक महागाई दर तर गेले १६ महीने उणे असताना, ८.६ टक्के दर द्यायला हवा होता असे तुमचे म्हणणे आहे का?
एकीकडे राजन नी रेपो रेट कमी करावे असे म्हणायचे आणि दुसरी कडे ८.६% रेट सरकार देणार. हे लॉजिकल आहे का?
कधीच पक्षीय स्टँड सोडुन कॉमेंट करता येऊ शकत नाही का?
ह्या उच्च दरामुळे बँकांना ठेवी मिळण्यात अडचण येते आहे असे ऐकले मी.
येस. त्या लिंकेतपण हेच म्हटले
येस. त्या लिंकेतपण हेच म्हटले आहे. डिपॉझिट येते नाहीत कारण हे सरकारी व्याजदर आर्टिफिशिअली चढे आहेत. डिपॉझिट नाहीत म्हणजे कर्ज देता येत नाहीत.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
काव्यशास्त्रविनोद
तुम्हाला त्यांच्या प्रतिसादातली खोच कळली नाही की कळून घ्यायची नाही?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
व्याज दर कमी करणे हे जर चुक
व्याज दर कमी करणे हे जर चुक वाटत असेल तर तसे ते स्पष्ट लिहावे जी काही त्याबद्दल ची कारण मिमांसा असेल ती घेउन, बाकीचे रेफरंस कशाला? सारखे सारखे तेच तेच विषय सगळीकडे जोडायचे असतील तर काय बोलणार? चालू द्या.
व्याज दर कपात जर बरोबर वाटत असेल तर ह्या अश्या काँमेंट्ची गरज च नाही.
आपलं बूड जळतं तेव्हा
व्याज दरात कपात करणं आर्थिक नीतीच्या दृष्टीनं योग्य की अयोग्य हा मुद्दाच नाही. मोदींना मत देणारा जो मोठा मध्यमवर्ग आहे त्याला ह्या गोष्टी आवडत नाहीत आणि तो अशा निर्णयांनी खवळतो, हा मुद्दा आहे. नुकतीच ज्या वेळी ईपीएफ दरात कपात केली होती त्या वेळी ट्विटरवर #rollbackepf हा हॅशटॅग प्रचलित करण्यात हाच मध्यमवर्ग पुढे होता. उदा. हे पाहा किंवा हे पाहा.
त्यामुळे तेव्हा अशा खवचट कमेंटाही केल्या गेल्या -
ह्याचा रेटा इतका होता, की अखेर जेटलींना खरोखर माघार घ्यावी लागली. त्या सगळ्याचा संदर्भ थत्तेंच्या प्रतिसादाला आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुमचे २०० टक्के बरोबर आहे
तुमचे २०० टक्के बरोबर आहे चिंजं.
अगदी!
अगदी!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
खरे तर मोदींना मते देणार्या
खरे तर मोदींना मते देणार्या मध्यमवर्गाचे बूड दुसर्याच गोष्टींनी जळते आहे. मोदी त्या बाबत काहीच करत नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. जर मोदी त्या बाबतीत काही करणार असतील तर व्याज दर ७ टक्के केला तरी तक्रार नसेल.
व्याजदर वगैरे आपापसातला मामला आहे हो.
मोदींच्या मतदारांच्या खर्या
मोदींच्या मतदारांच्या खर्या उद्दिष्टाबद्दल मी आधीपासूनच बोलत होतो.
- हाणीन बत्ते
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
एक मिनिट - बँकएफडीवरच्या
एक मिनिट - बँकएफडीवरच्या व्याजावर स्लॅब रेटने आयकर भरायला लागतो. त्याउलट ८.६%ने मिळणारं पीपीएफ व्याज टॅक्सफ्री आहे. ही अॅपल-टू-अॅपल तुलना नाही.
पंचवीस बेसिस पॉइंट घटवून काय होणार आहे? अॅपल-टू-अॅपलच्या पातळीवर आणायला १४० बेसिस पॉइंट घटवून ७.२% करायला हवा.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
७.२ केला तर लोक लिटरली जोडे
७.२ केला तर लोक लिटरली जोडे मारतील हे एक.
दुसरं. पीपीएफपेक्षा तुलना NSC शी करायला पाहिजे. PPF हे १५ वर्षाच्या लॉक-इनने येतं. NSC चे व्याजदर आता ८.१ आहेत. जे FD च्या बरच जवळ आहे. NSCच व्याज ट्याक्सेबल आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
ओबामा क्युबा ला जाऊन राऊल कॅस्ट्रो यांना भेटले
ओबामा क्युबा ला जाऊन राऊल कॅस्ट्रो यांना भेटले - ओबामा यांना कम्युनिस्टांबद्दल जरा जास्तच कळवळा आहे. क्युबा हे कोणत्याही अर्थाने अमेरिकेसाठी महत्वाचे वाटत् नाही. तरीही.
त्यांच्या हेल्थकेअर बद्दल आणि सिगार्स बद्दल बोलबाला आहे ... पण बाकी विशेष काही नाही. संबंध नॉर्मलाईझ करून असे काय दिवे लावणार आहेत ते रजनीकांतच जाणे.
कशासाठी सिगारसाठी
आजच हे वाचलं -
Cuba Has a Lung Cancer Vaccine — And America Wants It
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
क्युबा च्या दारुण आर्थिक स्थितीबद्दल
क्युबा च्या दारुण आर्थिक स्थितीबद्दल. क्युबाचे मानवाधिकार रेकॉर्ड. कॅस्ट्रो ने २०१० मधे "दबे लब्जोंमे" माफी मागायचा क्षीण यत्न पण केला होता.
क्युबन जोक - One Cuban young woman complains to another. “He lied to me! He told me that he was a luggage handler! It turns out, he’s nothing but a neurosurgeon!”
रुरल एल्क्ट्रिफिकेशन चा दर
रुरल एल्क्ट्रिफिकेशन चा दर गेल्या १ वर्षात बराच वाढला आहे. २०१५ साली भारतात १८००० गावं अशी होती की ज्यात वीज पोचली नव्हती. आत्ता तो आकडा १२०००वर आला आहे. आणि अजून दोन वर्षात तो शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट आहे. त्या मिशनचा आढावा घेणारा हा लेख.
http://www.theguardian.com/global-development/2016/mar/21/electrifying-i...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
जमिनीवरचे वास्तव?
आणि ही ग्राउंड रिअलिटी?
‘महावितरण’ची ‘मागेल त्याला वीज’ कागदावरच
मुळात जिथे वीज आहे तिथेच इतकं लोड शेडिंग असतं, तर सगळ्यांना कनेक्शन मिळूनही वीज किती वेळ मिळणार, ह्याविषयी शंका आहे. वीज उत्पादन क्षमतासुद्धा वाढवायला लागेल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ओ मालक. लोड नाही हे आहेच. ते
ओ मालक. लोड नाही हे आहेच. ते लोड हळू हळूच येणारे. तरी वीज पोचवायची सुविधा नव्हती ती आली ही मोठी सुधारणा नाही काय?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
लोड
म्हणूनच मी लोड घेत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
डिपेंड्स की किती काळात वीज
डिपेंड्स की किती काळात वीज येते नाहीतर विज नसलेल्या डिसट्रिब्युशन सिस्टीमचा मेंटेनन्स न झाल्याने त्याच कामावर पुन्हा खर्च करावा लागायचा
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
किती खेडी होती?
२००१च्या खानेसुमारीप्रमाणे तेव्हा भारतात ६३८००० गावे होती. मध्यम शहरे, शहरे आणि महानगरे वेगळी. म्हणजे यावरून १९४७ साली साधारण ६४५००० खेडी असायला काहीच हरकत नसावी, कारण २००१ पर्यंत शहरीकरणाचा आणि शहरांनी जवळच्या खेड्यांना गिळण्याचा रेटा आणि रेट वाढला होता. गेला बाजार ६४०००० तर असतीलच. यापैकी किती खेडी १९४७मध्ये विद्युतीकरण झालेली असावीत? माझ्यामते जास्त नसावीत. कारण तेव्हा मुंबईच्या आसपासच्याच निमशहरांमध्येच वीज नव्हती, तर दूरस्थ खेड्यात कुठून येणार? तर मुद्दा असा की २०१५ पर्यंत यातल्या फक्त १८००० गावांत विद्युतीकरण व्हायचे राहिले. म्हणजे ६४ वर्षांत विद्युतीकरण बर्यापैकी गतीने झाले, नाही का? अर्थात एखाद्या गावाचे विद्युतीकरण होणे म्हणजे नक्की काय, याची व्याख्यासुद्धा केली पाहिजेच. गावात एखाद्या मोक्याच्या ठिकाणी, उदा. पोस्ट ऑफिसमध्ये, वीज पोचली म्हणजे विद्युतीकरण झाले असे समजायचे की कसे.
अर्थात एखाद्या गावाचे
प्रत्येक घरात कनेक्षन पोचणे ही व्याख्या नक्की नाहीये हे माहितिये. मोक्याच्या ठिकाणी पोचली अशी व्याख्या आहे (मोस्टली)
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
नाय हो !! ६७ वर्षात काहीही
नाय हो !! ६७ वर्षात काहीही झालेले नाही.
--------------------
६ लाख ४० हजार खेडी हा आकडा बरोबर असेल. तर त्यातल्या सुमारे ६ लाख २० हजार खेड्यांचे विद्युतीकरण ६७ वर्षांत झाले. सुमारे ९००० खेडी दरसाल.
म्हणजे मोदी सरकारचा वेग सेम अॅज काँग्रेस?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ही १८००० खेडी नक्कीच गुजरात
ही १८००० खेडी नक्कीच गुजरात आणि बिहार मधली असणार. बिहार मधे पण १० वर्ष भाजप सत्ते होते ना.
६७?
"कैच झालं नै" मध्ये ही २ वर्षेदेखिल अॅडवलीत की काय?
आँ. १९४७ ते २०१४ पर्यंतच ६७
आँ.
१९४७ ते २०१४ पर्यंतच ६७ वर्षं झाली.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हा हा. ९९-२००४मध्ये बरीच
हा हा. ९९-२००४मध्ये बरीच प्रगती झाली की.
असो. २००८ ते २०१४ च्या रेटचा ग्राफ पाहिलेला. रोचक होता. शोधतो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
एक संदंर्भ
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आकडेवारी आश्वासक आहे. पण मी
आकडेवारी आश्वासक आहे. पण मी तिच्या क्रेडिबिलिटीबद्दल कुणी ऑडिट केलंय का ते शोधू इच्छितो. तुम्ही असं म्हणा की गब्बर सिनिकल आहे पण - Governments have strong incentives to inflate the numbers. ( यात मी नवीन काहीच सांगत नैय्ये)... ऑडिट झाल्यावर ही आकडेवारी क्रेडिबल ठरली तर शॉल्लेटच.
नैतर चीन सारखं नको. की आकडेवारी इन्फ्लेट करण्याचे कौशल्य व स्ट्राँग ट्रॅक रेकॉर्ड असूनही .... आज (गेल्या वर्षभरात) परिस्थिती इतकी नाजूक झाली की सरकार आकडेवारी मॅनिप्युलेट सुद्धा करू शकत नाही म्हणून मार्केट चा कॉन्फिडन्स आणखीनच ढासळला.
अगदी अगदी. या सरकाराची
अगदी अगदी. या सरकाराची आकडेवारी तर जरून तपासावी. मी शोधतोय. पण अजून पूर्ण हिस्टोरिकल डाटा मिळाला नाही.
एलेक्ट्रिफिकेशनची व्याख्या मिळाली. १०% घरांमध्ये वीज कनेक्षन + शाळा ग्रामपंचायत इथे कनेक्षन. अजून काही आहे का शोधतोय.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आकडेवारी
या लिंकवर जी पीडीएफ आहे त्यात पान १३ वर एक रोचक आलेख आहे.
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=3&ved=0a...
१. त्यावरून असं दिसतं की तथाकथित सोशालिझमच्या काळात विद्युतीकरणाचा वेग चांगला होता. तो सोशालिझमला सोडचिठ्ठी दिल्यावर घटला.
२. २००१ च्या जनगणनेनुसार देशात ६ लाख अडतीस हजार खेडी होती २००४ मध्ये त्यातील सुमारे ४ लाख ७५ हजार खेडी विद्युतीकृत होती. म्हणजे २००४ मध्ये सुमारे १ लाख ५३ हजार खेडी विद्युतीकरणाशिवाय होती. जर २०१४ मध्ये १८ हजार खेडी उरली असतील तर दहा वर्षात १ लाख ३५ हजार खेड्यांचे विद्युतीकरण झाले. सरासरी १३ हजार ५०० खेडी प्रतिवर्षी.
आणि आता दोन वर्षात १८५०० खेडी अजून झाली नाहीत? शेम शेम !!!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
यूपीएच्या काळातील उरलेल्या
यूपीएच्या काळातील उरलेल्या वर्षांचा विदा मिळाल्यास अजून नीट पाहता यावे. तूर्त फक्त ३ डेटा प्वाइंट्स दिसताहेत, त्यावरून फारतर यूपीए २ च्या शेवटच्या २ वर्षांत परिस्थिती गंडली होती असे म्हणता येईल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१ शिवाय वर थत्त्यांनी दिलेला
+१
शिवाय वर थत्त्यांनी दिलेला विदा बघता तुलनेसाठी हीच वर्षे मुद्दाम निवडली असावीत!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मला या सगळ्या प्रकाराबद्दल
मला या सगळ्या प्रकाराबद्दल जरा जास्तच शंका येत्ये. पियुष गोयल यांनी मुद्दाम २०१३ च्या पूर्वीचा डेटा दिलेला नैय्ये. आख्खी ऊर्जा मंत्रालयाची वेब्साईट धुंडाळली. नंतर ती दीनदयाळ ग्रामज्योती योजना (हे नवीन फॅड काढलेले आहे भाजपाने) ची वेब्साईट धुंडाळली, ते ४२ पानी प्रेझेंटेशन पाहिले कुठेही २०१३ च्या पूर्वीचा डेटा नाही. शून्य. लबाड साले. माणसाला डेटा सापडलाच नाही तर काय तुलना करणार ... डोंबल !!!
२००५-०६ मध्ये राजीव गांधी
२००५-०६ मध्ये राजीव गांधी कायतरी कायतरी योजना सुरू केलेली याचसाठी. त्यात बराच चांगला दर होता हे नक्की कुठेतरी पाहिलं होतं. सापडत नाहीये.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हे घ्या
http://m.thehindu.com/opinion/op-ed/on-paper-electrified-villages-in-rea...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
प्रतिज्ञा + आश्वासन
न खाऊंगा न खाने दूंगा
निर्दोष मुक्तता झाल्यावर तिकीट दिले आहे ही चांगली गोष्ट आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तुम्ही गूगल करालच म्हणून
तुम्ही गूगल करालच म्हणून थांबलो होतो प्रतिसाद द्यायचा.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हॅ हॅ हॅ.... अॅक्विटलच
हॅ हॅ हॅ....
अॅक्विटलच पहायचं तर.......
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हॅहॅहॅ, हेच उदाहरण सुचलं का
हॅहॅहॅ, हेच उदाहरण सुचलं का तुम्हाला? आम्हाला वाटलं ते मौतच्या सौदागरांचं येईल.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
लोहपुरुषाचं पण आहे.
लोहपुरुषाचं पण आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
भारतात किमान ८ कोटी लोक शुद्ध पाण्यास वंचित
भारतात किमान ८ कोटी लोक शुद्ध पाण्यास वंचित आहेत. डायर्हिया ने दरवर्षी किमान दीड लाख मुलं दगावतात.
----------
देश**ची मांदियाळी - फर्ग्युसन कॉलेजात राडा
----------
मराठी अभिनेते/अभिनेत्र्यांचे "सामाजिक भान". सामाजिक भानाची फॅशनच आलेली आहे. मागे ती सई ताम्हणकर जरा पिऊन नाचली होती तर लोकांनी तिला सामाजिक भानाची डाबरजनमघुंटी पिलवायचा यत्न केला होता. आता पिण्याच्या पाण्याच्या वापरावरून कैच्याकै विधानं करायची शर्यत लागलेली आहे. म्हणे होळीसाठी/रंगपंचमीसाठी पाणी वापरताना जपून वापरणे म्हंजे सामाजिक भान असते. काय डोकी फिरलियेत लोकांची !!!!
१. फार देशद्रोही माजलेत
१. फार देशद्रोही माजलेत देशात
याहून गंभीरः
२.
हे विधानही मला फार धाडसी वाटते. मीही महिलांची किंवा पुरूषांची त्या महिला आहेत किंवा पुरूष आहेत म्हणून पुजत वगैरे नाही (नि त्यांना त्या कारणाने कमीही मानत नाही.)
पण शीख समाज फक्त महिलांची पूजा करू शकत नाही किंवा कसे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
David Headley: Hated India
David Headley: Hated India since 1971 when Indian planes bombed my school
हे माहीती नव्हतं मला. आजून चारपाच शाळांवर बाँबिंग करायला हवं होतं. रासायनिक अस्त्रं वापरून. व्हीएक्स गॅस वापरून.
----
शेतकऱ्यांचा माल विकून दलाल मोठे झाले __________ सयाजी शिंदे उवाच.. मग दलालांचा माल विकून शेतकर्यांनी मोठं व्हावं !!! हाकानाका !!!
वो सुबह कब आयेगी?
फॅसिस्ट मोदीच्या राज्यात आम्हा लोकांना काय-काय करायला लागतय!!! आधी कशा मस्तं इफ्तार पार्ट्या व्हायच्या दर वर्षी. आता इथल्या रानटी लोकांचे सण साजरे करावे लागतायत! कधी संपणार हे काय माहिती
http://www.dnaindia.com/india/report-for-the-first-time-in-decades-sonia...
मै नही जानती थी के एक मुसलमान मेरा इंटरव्ह्यु लेगा : सू क्यी
मै नही जानती थी के एक मुसलमान मेरा इंटरव्ह्यु लेगा : सू क्यी. बीबीसी वर सू क्यी यांचा इंटरव्ह्यु घेणारा मुसलमान होता व ह्याची पूर्वकल्पना दिली गेली नाही असं सू क्यी म्हणाल्या (की पुटपुटल्या). ( आता लगेच आकाश कोसळल्याप्रमाणे दिग्विजय सिंग, रागा, ओबामासमर्थक, हिलरीसमर्थक, मनिष तिवारी कावकाव सुरु करतील. )
बोले तो अवांतरः म्यानमारमध्ये
बोले तो अवांतरः
म्यानमारमध्ये बौद्ध दहशतवाद असतो. इस्राएलमध्ये ज्यू दहशतवाद असतो. भारतात तर काय हिंदू दहशतवाद१ थैमान घालतो आहेच गेली दोन वर्ष. पण इतर दहशतवादाला धर्म नसतो२. असं वाक्य नुकतच वाचलं कुठेतरी.
===
१. हिंदू दहशतवाद हा इस्लामी, चुकलो, निधर्मी दहशतवादापेक्षा अधिक धोकादायक आहे असं रामचंद्र गुहा काही दिवसांपूर्वी म्हणले. संदर्भ
२. हे वाक्य आमचे आदरणीय मौत के सौदागर यांनीपण म्हटलं म्हणे रिसेंटली. पॉलिटीकल करेक्टनेसचा आजार झाला त्यांनाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
प्रथम "दहशतवादाचा धर्माशी
प्रथम "दहशतवादाचा धर्माशी काहीही संबंध नसतो", नंतर "कोणत्याही धर्माची दहशतवादावर मोनोपोली नसते", नंतर "दहशतवादास धर्म नसतोच", पुढे "अमका अमका धर्म शांतिपूर्ण आहे", नंतर "कोणताही धर्म शांतिपूर्ण वा दहशतवादी असा नसतोच ... ते माणसामाणसावर ठरतं" ...... मखलाशी ची मेरी गो राऊंड चालू आहे. तुम्ही जनरलायझेशन करताय, व्हिक्टिमायझेशन करताय, स्टिरिओटायपिंग करताय, स्टिग्मटायझेशन करताय ... असं बोंबलत रहायचं. आरोपपत्र दाखल होऊ न देण्यासाठी जी काही कारणं शोधता येतील ती शोधायची, खणायची, क्रिएटिव्हली बनवायची.
Had no first-hand information of Ishrat Jahan case, says Headley
Had no first-hand information of Ishrat Jahan case, says Headley.
गुजरात येथे कथित पोलीस चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँबद्दल मला माहिती नव्हती. इशरतची माहिती मला झकी-उर रहमानकडून मिळाली, तर चकमकीबाबत प्रसिद्धीमाध्यमांकडून कळल्याचा दावा २६/११च्या हल्ल्याशी संबंधित खटल्यातील माफीचा साक्षीदार लष्कर-ए-तोयबाचा अमेरिकन-पाकिस्तानी दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याने शनिवारी विशेष न्यायालयासमोर करत संभ्रम निर्माण केला. एवढेच नव्हे, तर याबाबत आपण राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सांगितले होते. मात्र त्यानंतरही जबाबात त्याचा समावेश का केला नाही हे माहीत नसल्याचे सांगत हेडलीने ‘एनआयए’च्या तपासावरही अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
-------------------------
BJP desperate to dislodge my govt since Day 1: CM Harish Rawat - नेहमी प्रमाणे - सिस्टिम मधल्या समस्ये साठी सिस्टिम बाहेरचे लोक जबाबदार असतात.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. बाहुबली सर्वोत्कृष्ट चित्रपट! आणि संजय लीला भन्साली सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बाहुबली!! आवरा!
बाहुबली!! आवरा!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बेस्ट ज्यूरी
तुम्ही दिलेल्या दुव्यात - बेस्ट ज्युरी: कल्की - हे पाहिले.
हे काय असते, कसे ठरते, काही कल्पना ?
म्हणजे ज्या ज्या ज्यूरींनी चित्रपटांचे परीक्षण केले व मते दिली त्यांना मते देण्यामागची कारणमीमांसा द्यावी लागते व जो त्यातल्यात्यात चांगली मीमांसा देईल त्याला बेस्ट ज्यूरी हा पुरस्कार दिला जातो, असे काही आहे का?
---
अवांतर: वरूण ग्रोव्हरला एखादा पुरस्कार मिळाल्याचे पाहून बरे वाटले.
ज्यूरी पुरस्कार
साधारणतः असा विशेष ज्यूरी पुरस्कार हा 'विशेष उल्लेख'प्रमाणे (स्पेशल मेन्शन) असतो. म्हणजे एखाद्या पुरस्काराला लायक एकाहून अधिक असतील असं ज्यूरींना वाटलं, पण त्या सगळ्यांना पुरस्कार देणं शक्य नसेल तर त्यातला एखादा मुख्य पुरस्कारासाठी निवडून उरलेल्याला विशेष ज्यूरी पुरस्कार दिला जातो असं अनेकदा दिसतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हात्तेरेकी !
ऋषिकेश यांच्या प्रतिसादातून कळले की बेस्ट ज्यूरी: कल्की याचा अर्थ ज्यूरींनी निवडलेली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कल्की !
इतके गाळलेले शब्द ऋषिकेश कसे काय वाचू शकले कुणास ठाऊक ;).
मला वाटले होते की 'बेस्ट' हे ज्यूरीचे विशेषण आहे नि कल्कीच ज्यूरींत होती नि तिला ती कामगिरी उत्तम पार पाडल्याबद्दल 'बेस्ट ज्यूरी' हा पुरस्कार मिळाला की काय !! म्हणून विचारणा केली. आता कळले.
या पुरस्कारांपैकी मला आवडलेले
या पुरस्कारांपैकी मला आवडलेले निकाल
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- दम लगा के हैशा
सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री- तन्वी आझमी (बाजीराव-मस्तानी) (या चित्रपटात काम ठिक आहे पण हिला पुरस्कार मिळाला हे आवडलं)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरी) – कल्की (मार्गारिटा विथ स्ट्रॉ) (साला काय चित्रपट होता आणि हिचे कामही तितकेच थोर. यात रेवतीचे कामही थोर आहे. (अवांतरः रेवतीवरही आमचा जीव आहे बरं ))
सर्वोत्कृष्ट गीतकार – वरुण ग्रोवर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट गायिका – मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) – जुही चतुर्वेदी (पीकू)
सर्वोत्कृष्ट सेट डिझाईन – बाजीराव मस्तानी
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
काही चांगल्या निवडी
'मसान'ला बेस्ट डेब्यू पुरस्कार आहे. 'चौथी कूट'ला पंजाबी चित्रपटाचा पुरस्कार आहे. दोन्ही चांगले आहेत, पण त्यांना ह्यापेक्षा वरच्या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला असता तर मला ते अधिक आवडलं असतं.
(अवांतर : राष्ट्रीय पातळीवरचा नाही तरी किमान मराठी चित्रपटाचा पुरस्कार 'हायवे'ला मिळायला हवा होता, पण मिळाला असता तर मला आश्चर्य वाटलं असतं, कारण उमेश फिल्म इन्स्टिट्यूटचा आहे.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
+१ रिंगणच्या तुलनेत हायवे
+१ रिंगणच्या तुलनेत हायवे अधिक आवडलेला व कित्येक बाबींमध्ये श्रेष्ठ होता.
सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये रिचा चढ्ढाचे (मसान) नाव असते तरी मला अधिक आवडले असते. तन्वी आझमींनाही पुरस्कार मिळालाय हे चांगलेच पण या वर्षापुरता विचार केला तर मार्गारिटा विथ स्ट्रॉमधील रेवतीला हा पुरस्कार मिळायला हवा होता.
बाकी बॉम्बे वेल्वेट, दृश्यम यावर्षीच्या सायकलमध्ये होते का पुढिल?
पिके वगैरेला पुरस्कार न मिळाल्याबद्दल आनंद झाला.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
यादी
ह्याच वर्षी होते. ज्यांच्या प्रवेशिका आल्या होत्या त्या सर्व चित्रपटांची यादी इथे आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बाँबे वेल्व्हेट मुळे अनुष्का
बाँबे वेल्व्हेट मुळे अनुष्का आणि विराट चे फाटले असे मी वाचले होते, काहीतरी ४० कोटीचा मामला होता म्हणे. त्यामुळे अश्या प्रेमी जीवांची ताटातुट करणार्या सिनेमाला काही मिळाले नाही ते उत्तमच झाले.
पुणे-५२ तयार केल्याबद्दल शिक्षा म्हणुन उमेश कुलकर्णी ला सिनेमा तयार करण्यासाठी लाइफ टाइम बॅन का लाऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस मी पाठवली आहे. कमीत कमी शिक्षा म्हणुन तोच सिनेमा त्याला रोज एकदा तरी बघायला लावला पाहिजे.
चिंजं - तुमचे परीक्षण वाचुन मी खटपट करुन पुणे-५२ मिळवुन बघितला. तेंव्हापासुन मी तुमच्यावर चिडुन आहे चिंजं.
एक स्पष्टीकरण
'पुणे ५२'चा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी नव्हता.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पण तुमच्या वर मी का चिडुन आहे
पण तुमच्या वर मी का चिडुन आहे ते तरी कळले ना आता.
कावेबाज जंतू
अरे वा! माझा कावा यशस्वी झाला म्हणजे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुम्हाला पुणे-५२ सारखा सिनेमा
तुम्हाला पुणे-५२ सारखा सिनेमा बघायला लाविन तेंव्हाच ये बदले की आग ठंडी होगी
पण बघायचा कुठे?
रिंगणच्या तुलनेत हायवे अधिक आवडलेला
बरोबर आहे. हायवेचं बुद्धीजीवी वर्गातून फेबुवर खूप कौतुक ऐकलं म्हणून पाहण्याची फार इच्छा होती. पण इकडे नागपुरात(सुद्धा) तो रीलीज झाला नव्हता. शेवटी मी गिरीश कुलकर्णींना थेट संपर्क करून विचारलं की महाराज, आम्ही सिनेमा पाहायचा तरी कुठे? पण मला उत्तर मिळालं नाही.
माझ्या काही लेखात मी महोत्सवी चित्रपट हा एक नवा वर्ग आहे अशी टिप्पणी केल्यावर लोक माझ्यावर चिडले.
असो.
येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
पण मिळाला असता तर मला आश्चर्य
हॅहॅहॅ. बळच. मोदींना लै शिव्या घालणारा, बराच पॉप्युलर असणार्या वरूण ग्रोवरला मिळालाय की पुरस्कार. असो...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
संस्था
मुद्दा व्यक्तीचा नसून संस्थेचा आहे. असो.
(मी 'रिंगण' पाहिलेली आहे. निरुपद्रवी पण बाळबोध आहे. 'हायवे' आणि 'रिंगण'मध्ये कोणता चित्रपट श्रेष्ठ ह्याविषयी वाद घालण्यासारखं फारसं काही नाही.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सर्वोत्कृष्ट गायिका – मोनाली
एक नंबर! चांगल्या निवडी. मसानही.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
संदर्भासहित स्पष्टीकरण
हे वाक्य मला लोडेड वाटतं. ते दोघं स्पर्धेत भाग घेतात इथेच खरंतर कथा संपली. पण तो हिंदी चित्रपट असल्यामुळे त्यात स्पर्धेचा निकाल दाखवलाच पाहिजे. स्पर्धा संपून ते दोघं घरी येतात, घरी कोणीच नसतं (यापुढे काय होतं ते हिंदी चित्रपटांत दाखवत नाहीत). शेवटच्या ह्या चित्रपटीकरणामुळे सगळा चित्रपटच बटबटीत वाटायला लागतो; सगळंच पैशे कमावण्याच्या हेतूने बनवल्यासारखं आणि म्हणून आपली फसवणूक झाल्यासारखं वाटतं. आत्तापर्यंत आवडलेल्या गोष्टी - अभिनय, भाषेचा लहेजा, चित्रीकरण, बनारसचा खरबरीत पोत, हे सगळं व्यावसायिक गणितांपलिकडे काही असेल याबद्दल शंका यायला सुरुवात होते.१ यापेक्षा बाहुबली, बाजीराव-मस्तानी वगैरे बघताना 'चांगलं काही शोधायला जायचंच नाही' अशी मनाची तयारी असते. मग फसवणूक होण्याचा प्रश्नच येत नाही. तसं 'बर्फी'च्या सुरुवातीलाही एवढा बटबटीतपणा केलेला आहे, की अपेक्षा वाढतच नाहीत. मग फसवणूकही कुठून होणार!
१. इंग्लिश-विंग्लिशच्या शेवटी, श्रीदेवीने नवऱ्याला "आता मी माझ्या रस्त्याला, तू तुझ्या रस्त्याला" असं म्हणून कथा संपवली असती तर ते मला आवडलं असतं. नवऱ्याला अलविदा केल्यावर पुढे ती काय करते हा त्या कथेचा भाग नाही२. वाटल्यास त्याबद्दल आणखी एक नवी कथा लिहावी.
२. 'दम लगा के हैशा'मध्ये दाखवलेले हे दोघं काही काळानंतर, मध्यमवयात आल्यावर जगाशी आलेल्या संपर्कामुळे एकमेकांशी कसे वागतील, एकत्र असतीलच का, ही दुसरी कथा बनेल. त्याचा ह्या कथेशी संबंध नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मला काही हा आक्षेप पुरेसा
मला काही हा आक्षेप पुरेसा वाटला नाही. पण असो. माझं असं 'हाय वे' च्या वेळी झालेलं तेव्हा समजू शकतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आक्षेप नाहीच.
हा आक्षेप म्हटलं तर नाहीच. हिंदी सिनेमाकडून मी भलत्या अपेक्षा ठेवते आणि फसवणूक झाली म्हणत वाईट वाटून घेते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
क्लोजर
मला अॅक्च्युअली ते क्लोजर दाखवतात ते आवडते. ते दाखवले नाही तर काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखे वाटते. उदा: नॉट विदाउट माय डॉटर मधे त्या दोघींना अमेरिकन एम्बसी दिसते तेथेच बहुधा पिक्चर थांबवलेला आहे. मला तेव्हाही वाटले होते की एम्बसीत त्यांचे स्वागत होणे, मग घरी पोहोचणे वगैरे साग्रसंगीत दाखवायला हवे होते :). तेव्हा कदाचित माझ्यासारखे अनेक लोक त्यांच्या डोळ्यासमोर असतील. मलाही दम लगा के स्पर्धेत भाग घेतल्याघेतल्या थांबवला नाही हे बरे वाटले. कथेच ज्यांना संकटांना, अडचणीला तोंड देताना पिक्चरभर पाहतो, त्यांच्या त्या अडचणी सुटलेल्याही पाहिल्यावर बरे वाटते
मला अॅक्च्युअली ते क्लोजर
एकदम सहमत, डार्क नाईट रायजेस मध्ये एंडच्या शेवटाला तो क्याफेतला सीन जो आहे त्यामुळे अख्खा पिच्चर वसूल होतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
फँड्रीत शेवटी (पण एकूण
फँड्रीत शेवटी (पण एकूण आयुष्यात पहिल्यांदाच कदाचित) तो जब्या खच्चून भिरभिरत पाटलावर, म्हणजे आपल्यावर (कॅमेर्यावर) धोंडा मारतो त्या क्षणाला कथा संपवण्याला क्लोजर मानता येईल का?
त्यांच्या त्या अडचणी
त्याची अडचण दुकान जाणं ही नसते. स्पर्धा जिंकल्यामुळे लोकांच्या नजरेत मोठं होणं ही अडचण नसते. त्याची अडचण स्वतःतच असते. आपण काही मिळवलेलं नाही याची जाणीव असते, पण तो स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करायला तयार नसतो. तो प्रयत्न करायला सुरुवात करतो, तिथे गोष्ट संपते. त्याला त्याचं दुकान परत मिळालं नाही तरीही तो काही-ना-काही करून तगून राहीलच.
जब्या कॅमेऱ्यावर दगड भिरकावतो असं मला वाटत नाही. तो आपल्यावर, व्यवस्थेवर दगड भिरकावतो. कॅमेऱ्यावर भिरकावला असता, चौथी भिंत तोडली असती तर कॅमेरा तुटल्याचं दाखवलं असतं. जब्याच्या बाबतीत हे क्लोजर नाही; सुरुवात आहे. त्याचा निरागसपणा पुरता संपतो, बालपण संपतं. काहीसं 'पाडस'मध्ये होतं तसंच, पण 'पाडस'मध्ये जोडीचं आयुष्य जब्याएवढं भकास नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गेल्या आठवड्यात डच फुटबॉल
गेल्या आठवड्यात डच फुटबॉल खेळाडू योहान क्रायफ याचं कर्करोगाने निधन झालं. त्याच्या कोच आणि तो हे टोटल फुटबॉल या अत्यंत डिमांडिंग, परिणामकारक आणि नेत्रसुखद अशा फुट्बॉल खेळण्याच्या तत्वज्ञानाचे जनक होते. खेळाडू म्हणून आयॅक्स अॅमस्टरडॅम या क्लबमधून या प्रकारे फुट्बॉल खेळण्याची सुरुवात झाली. १९७० आसपास लीगमध्ये आणि युरोपात भरपूर टायट्ल्स जिंकली त्या संघाने. त्यानंतर क्रायफ बार्सिलोना या क्लबम्ध्ये गेला. तिथेही त्याने या प्रकाराची पाळमुळं रुजवली. १९७४च्या वल्डकपमध्ये हॉलंडची टीम याच तत्वज्ञानाला अनुसरून खेळली. फायनलपर्यंत पोचेपर्यंत अर्जेंटिना, ब्राझिल या संघाना हॉलंडने नमावलं. फायनलमध्ये जर्मन संघाने बॉलला स्पर्श करायच्याही आधी हॉलंडने एका गोलची आघाडी घेतली होती. या सगळ्याचा सूत्रधार क्रायफ होता. पण पुढे हॉलंड तो सामना हारले. १९७४चा हॉलंडचा संघ वल्डकप न जिंकणारा सर्वोत्तम संघ होता असं म्हणतात.
पण क्रायफचं याहून मोठं योगदान प्रशिक्षक म्हणून होतं. ८०च्या दशकाशेवटी तो बार्सिलोनाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त झाला. तिथे त्याने त्याची टोटल फुटबॉल या तत्वज्ञानात अजून सुधारणा केल्या. आत्ताच्या घडीला जगातला सर्वोत्तम प्रशिक्षक पेप गार्डिओला क्रायफच्या हाताखाली खेळाडू होता.
क्रायफने बार्सिलोना क्लबची लहान वयाचे खेळाडू घडवणारी जगप्रसिद्ध संस्था ला मासिआ सुरू केली. तिथेही ही नेत्रसुखद फिलॉसॉफी रुजवली. लिओनेल मेसी हा या अकादमीचा शिष्य आहे. गेल्या दशकात बार्सिलोना आणि स्पेनकडून फूटबॉल जगावर राज्य गाजवणार्या टीमचा कणा असलेले आंद्रे इनिएस्टा, झावी हर्नांडेझ, सर्जिओ बुस्केट हे देखील या अकादमीचे पदवीधर आहेत.
गेल्या शतकात फुटबॉलवरवर सगळ्यात जास्तं प्रभाव टाकणारा हा खेळाडू/प्रशिक्षक होता.
हा एक व्हिडिओ. यात २:३० ला जी मूव्ह दिसते त्याला क्रायफ टर्न असं म्हणतात.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
फुटबॉल खेळण्याखेरीज हे साहेब
फुटबॉल खेळण्याखेरीज हे साहेब कमेंटरीही इडियोसिंक्रॅटिक पद्धतीने करायचे आणि त्यांच्या शब्दकळेचा परिणाम डच भाषेवरही झाला असे त्यांच्या मृत्यूच्या निमित्ताने झालेल्या जालचर्चेतून समजले. त्या वाक्प्रचारांना क्रायफिआन्स असे म्हणतात.
https://nl.wikipedia.org/wiki/Cruijffiaans
उदा.
Zonder de bal kun je niet winnen. = बॉलशिवाय जिंकणे नाही.
Italië heb een paar hele goeie voetballers, maar die moet je dan wel de bal spelen, zodat ze kunnen voetballen. = इटलीकडे काही खूप चांगले खेळाडू आहेत, पण त्यांना फुटबॉल खेळता यावा म्हणून तुम्ही बॉलने खेळा. वगैरे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा हा. अशाच थीमचं हे आर्टिकल
हा हा. अशाच थीमचं हे आर्टिकल वाचलं होतं.
http://www.theguardian.com/football/2016/mar/25/johan-cruyff-father-mode...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
रोचक! हा क्रायफ म्हणजे
रोचक!
हा क्रायफ म्हणजे त्यांचा सिद्धू असावा असं दिसतंय एकूण.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Nobody has any illusion that
Nobody has any illusion that the people of this noble and selfless country will surrender glory and rights and the spiritual wealth that has come through the development of education, science and culture : कॉम्रेड फिडेल कॅस्ट्रो. गेल्या आठवड्यातल्या ओबामा यांच्या क्युबा भेटीनंतर फिडेल भाईंनी प्रथमच "मन की बात" केली त्यात त्यांनी आपल्या जनतेला अप्रत्यक्षपणे उद्देशून अशा संप्रेरकांचा वापर केला. उदा. क्युबासारख्या वैभवशाली देशास कोणत्याही "सप्रेम भेटींची" आवश्यकता नाही. "वैभवशाली क्युबा", "आध्यात्मिक संपत्ती", "ओबामा ला विनम्र सूचना" वगैरे वगैरे.
(चिडलेला स्थितप्रज्ञ.)
क्युबासारख्या वैभवशाली देशास
भाषा, सुर वगैरे ओळखीचे वाटतेय का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
Manohar Parrikar rules out
Manohar Parrikar rules out 100% privatisation in defence production
मला पर्रीकर ओव्हररेटेड वाटतात. उगीचच त्यांच्या साधेपणाचा उदोउदो केला जातो. पण त्यांचे हे वाक्य अगदी लक्षणीय आहे - (अर्थात हे काही प्रकांड पांडित्य आहे असं नाही ... पण स्वाभाविक हितसंघर्षाचे चांगले विवेचन म्हणून याकडे पहावे.)
( पर्रीकरांनंतर अनिल अंबानी जे बोललेत ते सुद्धा लक्षणीय आहे. )
+१
सहमत.
मुद्द्याची गोष्ट. आणि तीसुद्धा पर्रीकरांकडून.
Idle/Idol
फ्रॉयडियन स्लिप की मूर्तिमंत भीती उभी?
+१
एकदम नेमके आणि मार्मिक.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व दुसर्या महायुद्धात अमेरिकन बाजूच्या दिग्गज नेत्यांपैकी एक - आयसेनहॉवर यांनी मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स च्या संभाव्य प्रभावाबद्दल दक्ष राहण्याचे आवाहन केले होते. हे त्यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणात केले होते. १९६१ मधे. त्यांना म्हणायचे असे होते (माझ्या मते) की एकदा उद्योजकाने शस्त्रे सैन्यदलांना विकली की ती जो पर्यंत वापरली जात नाहीत तोपर्यंत त्या उद्योजकास रेव्हेन्यु नाही. उद्योजकास रेव्हेन्यु मिळत नसेल तर तो अनाठायी युद्धांस प्रेरक उपद्व्याप करू शकतो. जेणेकरून त्याच्या उत्पादनांची मागणी वाढेल व त्याला पैसा मिळेल. उदा. राजकारण्यांना, मिडियाला, व थिंक टँक्स ना पैसे चारून युद्धखोरीस उत्तेजना देणे. जनक्षोभ निर्माण करणे. इराक युद्धामागे हे उपद्व्याप असतील असा माझा कयास आहे. (अर्थात इतर बाबीही असतील.). व्हिएतनाम चं माहीती नाही. अमेरिकेच्या सगळ्या युद्धांमागे हे आहे असं सुद्धा म्हंटलं जाऊ शकतं. वचने किम दरिद्रता.
हे ठीक आहे. पण .....
अशा प्रकारच्या विचारांच्या ढिगार्याखाली इतर सकारात्मक बाबी गाडल्या जातात. उदा. ड्युअल युज तंत्रज्ञान निर्मीती होऊ शकते, शस्त्रे निर्यात करू शकतो आपण, आपल्या शत्रू देशांतील असंतुष्टांना गुलफाम हसन सारख्या हस्तकांकरवी प्रेरणा देऊ शकतो आपण.
आहे, तसेही आहेच.
आहे, तसेही आहेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पूर्णतः सहमत नाही. प्रायवेट
पूर्णतः सहमत नाही.
प्रायवेट सेक्टरला भारताने ऑर्डर नाही दिली तर त्यांना हे परवडणार नाही ही भिती किती साधार आहे? भारता व्यतिरिक्त त्यांना खरेदीदार नाहित का? हा आयडल पिरिएडवर होणारा खर्च त्यांच्या विक्रीमुल्यातून ते वसूल करू शकत नाहीत का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मिसिंग यू...
असहमतीशी सहमत. <गब्बर मोड ऑन> जर प्रायव्हेट सेक्टरकडे टिकून राहण्याची खरी क्षमता असेल, तर तो आंतरराष्ट्रीय बाजारात आपलं स्थान आणि पत कमावेल. अशा प्रस्थापित लोकांकडे आपण आजही खरेदीसाठी जातो, मग भले ते फ्रेंच, रशियन किंवा अमेरिकन असोत. उगीच फडतूस भारतीय कंपन्यांचा विचार का करावा? आणि तेदेखील सरकारच्या स्वघोषित अकार्यक्षम कारभाराच्या समर्थनासाठी? ही मेरिटोक्रसीला चपराक आहे. हायेक असता तर त्यानं पर्रीकरांची अशी मारली असती... वगैरे.<गब्बर मोड ऑफ>
गब्बर तुम मे अब वो दम नही रहा! मिसिंग द रिअल गब्बूदादा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
भारता व्यतिरिक्त त्यांना
अगदी.
माझी खरी हीच भूमिका आहे. निर्यात, ड्युअल युज यासारख्या मार्गांनी तो टिकून राहू शकतो. इस्रायली कंपन्या कसं करतात ? ते तर आपल्यापेक्षा छोटे आहेत म्हंजे त्यांचे सरंक्षण बजेट भारतापेक्षा खूप छोटे आहे. मग त्यांना कसं जमतं ? ते तर निर्यात सुद्धा करतात व ती सुद्धा अतिप्रगत शस्त्रांची. उदा. अॅवॅक्स. भारतानं अॅवॅक्स त्यांच्याकडूनच विकत घेतली होती ना !!!
आणखी इथे पहा. थलसेनेने इस्रायली प्रक्षेपणास्त्रे घेण्याचा निर्णय घेतला. जी वायुदलासाठी सुयोग्य होती तीच थलसेनेसाठी सुयोग्य नव्हती. इस्रायल एवढे छोटे असूनही त्यांना स्पर्धा कशी करता येते ? बहुतेक सर्व बाबतीत ते भारतापेक्षा अतिशय छोटे आहेत.
भारत सरकारने हे असलं स्टॅटिक थिंकिंग सोडून देऊन .... मार्केट डायनॅमिक्स चा विचार करणं गरजेचं आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीज मुळे जे अतिसंरक्षित वातावरण निर्माण होते ते रिस्क घेण्याच्या वृत्तीस थेट मारक असते. पण आपल्या जनतेला पर्रीकरांच्या साधेपणाचे गोडवे गायला जास्त आवडतं. रिझल्ट्स गेले बोंबलत.
It’s man with machines, not
It’s man with machines, not man vs machines: Satya Nadella at Build 2016
"माणूस विरुद्ध मशीन" अशी विचारप्रणाली नसून "माणूस अधिक मशिन" अशी विचारप्रणाली असावी असं सत्या नाडेल्ला म्हणतात. तरीच म्हंटलं ... की आमचा डिश वॉशर ताटल्या, भांडी लख्ख का करत नाही ? डाग का पूर्णपणे धुतले जात नाहीत ? भांडी आधी थोडीशी (माणसाने) घासून ... थोडी धुवुन मग डिश वॉशर मधे लावली की मग व्यवस्थित धुतो. आत्ता समजलं - असं केल्याने माणसाची प्रॉडक्टिव्हिटी वाढते असा उदात्त अंतस्थ मुद्दा आहे. जय हो. दीन दयाळ उपाध्याय झिंदाबाद !!!
---------------
बिहार मधे दारुबंदी व त्यामुळे होणारे नुकसान. मदिरेच्या व्यवसायातल्या अनेक उत्पादक, व्यापारी, श्रमिक मंडळींनी काय करावे ??
FTII, जेएनयू ही देशाला लागलेली कीड
मास्तरीणकाकू बोलल्या बै एकदाच्या
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
एफटीआयआय सोसायटी म्हणजे
एफटीआयआय सोसायटी म्हणजे काय?
आणि ह्या कोण घैसास मॅडम आहेत त्या सदस्य आहेत त्या सोसायटीच्या.
चिंजं म्हणतात मास्तरीण बाई आहेत त्या.
म्हणजे त्यांच्या कडे अॅथोरीटी दिसते, मग असे असताना काही कारवाई का नाही करत. बाहेर कशाला रडगाणे गातायत?
अगदी. तिथे जायची कशाला धडपड
अगदी. तिथे जायची कशाला धडपड करायची म?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
याचसाठी केला होता अट्टहास
अधिक माहिती इथे मिळेल.
ह्यापैकी एक महान कलाकृती (बहुधा).
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
त्यांचा नवरा मला माहिती आहे.
त्यांचा नवरा मला माहिती आहे. अतिशय चांगली माणसे आहेत.
माझा प्रश्न तो नव्हता. जर त्या घैसास बाईंकडे बदल घडवायच्या पॉवर असतील तर त्यांनी तो घडवावा ना. बाहेर कशाला सांगत बसायचे की गांजा ची शेती करतात तिथली मुले म्हणुन?
मग ह्यांना नेमुन उपयोग काय?
गांजाची शेती होते इतकी जर माहीती आहे तर पोलिसांना बोलवायचे ना.
मी असते तर अभाविपच्या *डांना बोलावुन त्या सर्व विद्यार्थ्यांना फोडुन काढले असते.
जर फोडले तर फोडायचे कारण
जर फोडले तर फोडायचे कारण नक्की काय असेल ब्रे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कारण कशाला पाहिजे? कारण फक्त
कारण कशाला पाहिजे? ( उद्या तू इस्त्राइल नी गाजामधे गोळ्या मारण्यासाठी कारण विचारशील )
कारण फक्त निमीत्तमात्र रे बॅट्या. फोडुन काढायला पाहिजे हे तर माझ्यासाठी पक्के ठरलेलेच आहे. कारण काय काहीही देता येइल.
ह्या संघाच्या लोकांचे "फोडुन काढायचे की नाही" हेच ठरत नाहीये, तो खरा प्रॉब्लेम आहे.
हाहा, रैट्ट. त्यातही
हाहा, रैट्ट. त्यातही अँटीनॅशनल अवलादींना अगोदर फोडावे, बाकीच्यांना सोडून दिले तरी चालेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
फोडा नाही तर झोडा, मी एक हातोडा
मला वाटतं की सगळ्या विद्यार्थ्यांचा कोणत्या ना कोणत्या मार्गाने निक्काल लावून मग त्या अभाविपच्या लोकांनाच विद्यार्थी म्हणून ठेवलं पाहिजे. मगच भारतातल्या चित्रपटांना अच्छे दिन येतील.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मला वाटतं की सगळ्या
नाही नाही , ती शाळा पूर्ण बंदच केली पाहिजे. तिथे कमीतकमी २-४ हजार फ्लॅट्ची स्कीम होइल. भारताच्या बजेट डेफिसिट ला थोडी तरी मदत होइल.
ज्यांना सिनेमा वगैरे तयार करायला शिकायचे आहे त्यांच्या साठी हॉलिवुड मधे बर्याच शाळा आहेत आणि गेलाबाजार घई नावाच्या माणसाची पण मुंबई मधे आहे.
चिंजं - तुम्ही अगदी उदास होत असाल ना, असे विचार वाचुन
चालू द्या तुमचं
माझी तर चांगलीच करमणूक होत्ये.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पण करमणुकीबरोबर समाजात काय
पण करमणुकीबरोबर समाजात काय पद्धतीचा विचार चालू आहे ह्याचा अंदाज पण येतो ना. डबल फायदा आहे तुमचा.
मला ना करमणुक ना दुसरे काही
मगच भारतातल्या चित्रपटांना
तिकडे सैनिक सीमेवर मरताहेत आणि तुम्हाला चित्रपटांची पडली आहे. देशद्रोही कुठचे! नाहीच घेणार अभाविपच्या विद्यार्थ्यांना एफटीआयआयमध्ये जा. मेला भारतीय चित्रपट तरी चालेल.
परि तू जागा चुकलासि
तुम्ही चुकीचा धागा निवडलात का? संघ, संघिष्ट आणि भगव्या विनोदांसाठी दुसरा धागा सुरू केला आहे ना!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ITC not ready to print larger
ITC not ready to print larger pictorial warnings - सिगरेट च्या पाकिटावर मोठे चित्रमय वैधानिक इशारे छापण्यास ITC तयार नाही.
------------------
Shani temple faceoff: Honour court order or face FIR, activist Trupti Desai tells Maharashtra CM Fadnavis
फडणवीस उगीचच आपण प्रोव्होक झालेलो नाहिओत, आपण शांत नेता आहोत असं दाखवायचा का यत्न करत आहेत ? १९५५ च्या आसपास याबद्दल कायदा झालेला होता. आता उच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेला आहे. मग मूग गिळून गप्प का ??
------------------
अन्न पुरवठा मुबलक आहे - विश्वाचा इतिहासात प्रथमच कुपोषितांपेक्षा लठ्ठ लोकांची संख्या जास्त आहे. ( प्रश्नचिन्ह )
>>१९५५ च्या आसपास याबद्दल
>>१९५५ च्या आसपास याबद्दल कायदा झालेला होता. आता उच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेला आहे. मग मूग गिळून गप्प का ??
<मोड ऑन> पण पण...... ६१ वर्षात जे घडले नाही त्याचा अचानक "आत्ताच" आग्रह का? <मोड ऑफ>
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
६१ वर्षात जे घडले नाही त्याचा
आशा बलवती राजन ... शल्यो जेष्यति पांडवान...
... आणखी .... तवलीन सिंग यांनी लिहिलेला लेख...
.......the faith and hope that his speeches inspired in 2014 is sadly fading, and we approach only the second anniversary of his government.