दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१३ मे
जन्मदिवस : मलेरियाच्या जंतूंचा शोध लावणारे नोबेलविजेते रोनॉल्ड रॉस (१८५७), चित्रकार व शिल्पकार जॉर्ज ब्राक (१८८२), राष्ट्रपती फक्रुद्दीन अहमद (१९०५), लेखिका दाफ्ने द्यु मोरिए (१९०७), राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी (१९१३), नर्तिका बालसरस्वती (१९१८), समीक्षक भालचंद्र फडके (१९२५), समीक्षक गो. मा. पवार (१९३२), लेखक आर्मिस्टेड मॉपिन (१९४४), गायक स्टीव्ही वंडर (१९५०), संगीतकार आनंद मोडक (१९५१)
मृत्युदिवस : 'बकिंगहॅम पॅलेस'चा वास्तुरचनाकार जॉन नॅश (१८३५), अभिनेता गॅरी कूपर (१९६१), जाझगायक व वादक चेट बेकर (१९८८), लेखक आर.के.नारायण (२००१), नाट्यकर्मी बादल सरकार (२०११), छायाचित्रकार जगदीश माळी (२०१३)
--
१६३८ : दिल्ली येथील लाल किल्ल्याचे बांधकाम सुरू.
१८८८ : ब्राझिलमध्ये गुलामगिरीविरोधात कायदा अमलात आला.
१९४० : दुसरे महायुद्ध : जर्मन सैन्य फ्रान्सच्या भूमीवर. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी पार्लमेंटमध्ये 'Blood, toil, tears, and sweat' हे आपले सुप्रसिद्ध भाषण केले.
१९५० : ब्रिटनमधील सिल्व्हरस्टोन येथे पहिल्या फॉर्म्युला वन स्पर्धेची सुरुवात.
१९५२ : प्रजासत्ताक भारताच्या पहिल्या संसदेचे (राज्यसभेचे) पहिले सत्र सुरू झाले.
१९५८ : 'वेल्क्रो'ची ट्रेडमार्क म्हणून नोंदणी.
१९६८ : फ्रान्समधील विद्यार्थ्यांच्या विद्रोही चळवळीला साथ देत कामगारांनी देशव्यापी संप पुकारला. आठ लाख विद्यार्थी आणि एक कोटी कामगार यांची ही युती अभूतपूर्व होती.
२००८ : जयपूर येथे बॉम्बस्फोट; १२ मृत
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
ते झालंच,
पण कोकिळ व्रतात नक्की करायचं काय असतं?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
कोकिला व्रत रखने वाली
कोकिला व्रत रखने वाली स्त्रियों के लिए नियम है कि पहले आठ दिन तक आंवले का लेप लगाकर स्नान करे। इसके बाद आठ दिनों तक दस औषधियों कूट, जटमासी, कच्ची और सूखी हल्दी, मुरा, शिलाजित, चंदन, वच, चम्पक एवं नागरमोथा पानी में मिलाकर स्नान करने का विधान है।
इसके अगले आठ दिनों तक पिसी हुई वच को जल में मिलाकर स्नान करें और अंतिम छह दिनों में तिल, आंवला और सर्वऔषधि से स्नान करना चाहिए। प्रत्येक दिन स्नान के बाद कोयल की पूजा करें और अंतिम दिन कोयल को सजाकर उसकी पूजा करें। पूजा करने के बाद ब्राह्मण अथवा सास-श्वसुर को कोयल दान कर दें।
मग यानंतर परत कोकीळा व्रत
मग यानंतर परत कोकीळा व्रत येईपर्यंत, म्हणजेच पुढची १७ वर्षे ११ महिने स्नान करु नये का? नाही म्हणजे कमावलेलं पुण्य उगाच एका भुक्कड स्नानाने गमावले, असे व्हायला नको....
करेक्ट
करेक्ट.
म्हणजे मग त्या काळादरम्यान साठलेल्या अंगमळापासून एक झक्कास गणपतीही बनवता येईल!
मग झाली की फुल्लफ्लेज्ज पार्वती!!!
रामा वाचव. आज काही खरं नाही
रामा वाचव. आज काही खरं नाही
म्हणजे मग त्या काळादरम्यान
याजागी अंगमळापासून अंमळ गणपती बनवता येईल, हे वाक्य अंमळ जालीय वाटेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कोयले की पूजा, कोयला दान कर दें
"कोयले की पूजा", "कोयला दान कर दें" असे चुकून वाचले.
बापरे
>>ब्राह्मण अथवा सास-श्वसुर को कोयल दान कर दें।
ब्राह्मणाला सासू-सासर्यांच्या इक्विव्हॅलंट मानलंय इथे. म्हणजे ४९८(अ) चा गुन्हेगार. कुणा ब्रिगेडी माणसाने लिहिलेलं दिसतंय.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हे व्रत आहे, वेगवेगळी उटणे
हे व्रत आहे, वेगवेगळी उटणे वापरून "राणी मोनालिसा" सारखे स्नान करणे नाही.
राणी?
मोनालिसा (खरं नांव लिसा घेरार्डिनी) ही तर फ्लोरेन्समधल्या एका व्यापार्याची पत्नी (म्हणजे शेठाणी!!) होती ना?
एकदा गणपती नंतर पार्वती अन
एकदा गणपती नंतर पार्वती अन नंतर डायरेक्ट मोनालीसा ???
नैष्ठिक निग्रह नैय्ये तुमच्याकडे.
(No subject)
एकदा गणपती नंतर पार्वती अन
एकदा गणपती नंतर पार्वती अन नंतर डायरेक्ट मोनालीसा ???
नैष्ठिक निग्रह नैय्ये तुमच्याकडे.???
शुचिताईनी आघोळीचा थाट सांगितला त्याला हे उत्तर, येथे राणी मेानालिसा नाही राणी क्लिआेपात्रा म्हणायचे होते.
ओके देन
राणी क्लिओपात्रा म्हणायचं असेल तर आमचं काही म्हणणं नाही.
घाला तिला आंघोळ जशी हवी तशी!
हां, मोनालिसा असती तर वाद होता.....
राणी मोनालिसा कसे स्नान
राणी मोनालिसा कसे स्नान करायची ह्यावर ही आपले थोडे ज्ञान पाजळावे, कृपया!
ती युरोपियन असल्याकारणाने
ती युरोपियन असल्याकारणाने मध्ययुगातल्या प्रथेप्रमाणे रोज स्नान करतही नसेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पण ती जेव्हा करत असे तेव्हा
पण ती जेव्हा करत असे तेव्हा ते कसे असायचे स्नान हे हेमंतांना महित असावे, त्याबद्दल त्यांनी सांगावे असं माझं म्हणणं होतं.
हम्म रैट्ट.
हम्म रैट्ट.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मला राणी क्लिआेपात्रा
मला राणी क्लिआेपात्रा म्हणायचे होते. राणी क्लिआेपात्रा गाढवीनीचे रोज वाटीभर दुघ घेऊन अंगाला लेप लावून आघोळ करत असेे.
ही राणी खुप सुंदर होती तिच्याशी लग्न करण्यासाठी अनेक राजांमध्ये लढाया झाल्या. शेक्सपिअर साहेबांनी राणी क्लिआेपात्रावर नाटक काढले ते अजरामर झाले.
धन्यवाद माहितीबद्दल
धन्यवाद माहितीबद्दल
शेक्सपिअर साहेबांनी राणी
शेक्सपिअर तुमचे साहेब आहेत होय! त्यांच्याकडे १३व्याचा पगार मागायचा आहे ह्ये ध्यानी असूंद्या.
एक अवांतर शंका : नाटक काढल्याने श्क्सपिअर साहेब अजरामर कसे काय झाले?
नाटक काढणे व ल्हिणे यात काय फरक आहे?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
शेक्सपिअर तुमचे साहेब आहेत
शेक्सपिअर तुमचे साहेब आहेत होय! त्यांच्याकडे १३व्याचा पगार मागायचा आहे ह्ये ध्यानी असूंद्या.
एक अवांतर शंका : नाटक काढल्याने श्क्सपिअर साहेब अजरामर कसे काय झाले?
नाटक काढणे व ल्हिणे यात काय फरक आहे?
नाही बाॅ, हे नाटक काढल्याने म्हणजे लिहल्याने शेक्सपिअर अजरामर झाले
शेक्सपिअर तुमचे साहेब आहेत
शेक्सपिअर तुमचे साहेब आहेत होय! त्यांच्याकडे १३व्याचा पगार मागायचा आहे ह्ये ध्यानी असूंद्या.
एक अवांतर शंका : नाटक काढल्याने श्क्सपिअर साहेब अजरामर कसे काय झाले?
नाटक काढणे व ल्हिणे यात काय फरक आहे?
नाही बाॅ, हे नाटक काढल्याने म्हणजे लिहल्याने शेक्सपिअर अजरामर झाले
हे व्रत ज्यांना महिनाभर
हे व्रत ज्यांना महिनाभर करावयाचे आहे त्यांनी पहिले 8 दिवस तीळ व आवळा कल्प, नंतरचे 8 दिवस सर्वैषधी चूर्ण (आयुर्वेदिक दुकानात मिळते), पुढचे 8 दिवस वेखंडाचे चुर्ण व नंतर 6 दिवस सर्वैषधी चूर्ण लावून स्नान करावे. म्हणजे हे व्रत केल्याने पुण्य आणि सौंदर्य दोन्हीचा लाभ होईल. पण हे व्रत ईतके सोपे नाही, महिनाभर केले तर रोज दिवसभर उपास करून संध्याकाळी पुजा करून जेवण, महिनाभर पंलगावर न झोपता चटई टाकन जमिनीवर झोपावे लागते. नवरे मंडळीनां महिनाभर संन्यासी व्हावे लागते.
नोकरी न करता मरमर घरकाम
नोकरी न करता मरमर घरकाम करणार्या महिलाम्ना एका दिवसात व्रत करण्याची मुभा आहे का? असल्यास किती घरकाम केले की ते 'मरमर'ठरते?
धन्यवाअद
नवरे मंदळींवर लादलेल्य्स्स जबरदस्तीच्या सन्यासाचा णिशेढ
शुचितै, पण ते शिलाजित कशाला
शुचितै, पण ते शिलाजित कशाला हो?
पण कोकिळ व्रतात नक्की करायचं
गानकोकिळेचे गाणं 'दीदी तेरा देवर दीवाना, हाये राम कुडियों को डाले दाना' सतत म्हणायचं असतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आमच्यात 'कुहू कुहू बोले
आमच्यात 'कुहू कुहू बोले कोयलियां' हे गाणं म्हणतात...
आमचं घराणं अधिक कर्मठ आहे!!!
आमच्याकडे पक्ष्यांना दाणे
आमच्याकडे पक्ष्यांना दाणे घालून त्यांची भूक भागवण्याला अधिक प्रोत्साहन देतात. कर्मठपणा नावालाही नाही आमच्याकडे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आमचे तुमच्यापेक्षा जास्त
आमचे तुमच्यापेक्षा जास्त कर्मठ आहे. आमच्यात "कोकिळ कुहुकुहु बोले, तू माझा तुझी मी झाले" - हे मराठी गाणं म्हणतात. नैतर राज सायबांचा "राग मारामारी" सुरु होतो.
होय बाबा!
मग तुमचं जास्त कर्मठ (आणि कडवट!!)
(बाकी कडवा = कडवट हा शोध ज्या शिवसेनावाल्याने लावला त्याची तारीफ करावी तेव्हढी थोडीच!!)
बागेत कोकिळ कुहुकुहु बोले....
बागेत कोकिळ कुहुकुहु बोले.... इन्शा अल्ला! माझं मन हफिसातच रंग उधळत नाचायला लागलये...
हेला चला बागामघी रंग खेळू चला...रंग खेळू चला आआआआ!!!.रंग खेळू चला आआआआ!!!
(No subject)
जिगरमा बडी आग है.
जिगरमा बडी आग है.
बीडी जलाईलेऽऽऽ
क्या बात है! अर्वाचीन बॉलीबूड गाण्यांमधलं ते आमचं सर्वात आवडतं गाणं आहे!
पुरोगाम्यांनो, उगाच बोंबलू नका, ते गाणं तुमच्या गुलजारने लिहिलेलं आहे!!!!!!
"सख्या" च्या जागी
"सख्या" च्या जागी "हेला"????
हेला का?
ओह, आय सी ----- हेमंत लाटकर
मस्त जमलय
बागेत कोकिळ कुहुकुहु बोले....
बागेत कोकिळ कुहुकुहु बोले.... इन्शा अल्ला! सिफरच मन हफिसातच बायको बरोबर रंग उधळत नाचायला लागलये... आआआआ!!!
बाजूला दुसर्याची बायको आहे
बाजूला दुसर्याची बायको आहे हो... :love:
बागेत कोकिळ कुहुकुहु बोले....
बागेत कोकिळ कुहुकुहु बोले.... इन्शा अल्ला! माझं मन हफिसातच रंग उधळत नाचायला लागलये...
हेला चला बागामघी रंग खेळू चला...रंग खेळू चला आआआआ!!!.रंग खेळू चला आआआआ!!!
हे जरा जास्त होतय!
बागेत कोकिळ कुहुकुहु बोले....
बागेत कोकिळ कुहुकुहु बोले.... इन्शा अल्ला! माझं मन हफिसातच रंग उधळत नाचायला लागलये...
हेला चला बागामघी रंग खेळू चला...रंग खेळू चला आआआआ!!!.रंग खेळू चला आआआआ!!!
हे जरा जास्त होतय!
आमच्याकडे हे गाणं
आमच्याकडे हे गाणं गातात-
मूर्तिमंत भगवंत भेटला
दे, कंठ कोकिळे मला
मधुमास जीवनी आज अचानक आला
आम्रतरु मोहरला
नवरा सोफ्यावर आणि बायको चटईवर
नवरा सोफ्यावर आणि बायको चटईवर झोपायच्या व्रतात असली छचोर गाणी? त्यापेक्षा आमच्या स्काउटपथकाचे गाणे म्हणा-
'कोकिळ गाई मंजुळ गान,
सुखी अनन्न्दी राहो त्यान'
पुढच्या दोन ओळी लक्षात नाहीत. त्याऐवजी ह्याच ओळी परत एकदा गायल्या तरी चालतील. शेवटी 'कुहुकुहुकुहुकुहुकुहुकुहुकुहु' असे कूजन करावे आणि त्याच वेळी हाताचे पंजे अंगाच्या दोन्ही बाजूंना फडफडवत धावत आपल्या गटाच्या नियोजित जागी जाऊन उभे रहावे.
इथे नियोजित जागा म्हणजे चटई असल्यामुळे खोटेखोटेच धावावे. चटई फरशीवरून घसरते. नपेक्षा चालतच चटईवर जाऊन तेथे नियोजन करावे.
या व्रतात उपवास असल्यामुळे
या व्रतात उपवास असल्यामुळे बायकोच्या जवळ जाण्यास बंदी असते.
या व्रतात उपवास असल्यामुळे
या व्रतात उपवास असल्यामुळे बायकोच्या जवळ जाण्यास बंदी असते.
मग त्याऐवजी बायको नवर्याच्या
मग त्याऐवजी बायको नवर्याच्या जवळ गेली तर चालते का?
मग त्याऐवजी बायको नवर्याच्या
ही शक्यता जरी विचारात आली असती तर असली व्रते निर्माण झाली असती का?
मजबुरी का नाम....
या व्रतामध्ये बायकोला सतरंजी/चटईवर झोपायला लागण्याची शक्यता विचारात घेतली तर,
बायकू अर्ध्या रातीला हळूच नवर्याच्या (आणि तिच्या) पलंगावर घुसून झोपण्याची शक्यता नाकारता येत नाही!!!!
"ईश्कोंके लिये ना सही, बिछाने के लिये आय!
रंजिश ही सही...."
"ईश्कोंके लिये ना सही, बिछाने
हे फार्फार आवडण्यात आले आहे.
थॅन्क्यू! तात्पर्य काय की
थॅन्क्यू!
तात्पर्य काय की बायकोला अशी काहीतरी फालतू व्रतं करायला लावण्यापेक्षा नवरे मंडळींनी एक झकास ऐसपैस किंग साईझ बेड विकत घ्यावा!
मग होऊ देत खर्च!!!!
कोयल सी तेरी बोली..
कोकीळेचं महात्म्य सांगणारं आणखी एक गाणं..पण शुचिच्या सात्विक गाण्यावर उतारा..
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
गान.....
गानकोकिळेचे गाणं 'दीदी तेरा देवर दीवाना, हाये राम कुडियों को डाले दाना' सतत म्हणायचं असतं.या गाण्यापासून ती 'गानकोकिळा' राहिली नाही.
माझ्या बायकोने व आईने आताच
माझ्या बायकोने व आईने आताच शुक्रवार-रविवार या तीन दिवसाचे व्रत केले. पहिल्या दिवशी नदीवर, विहिरीवर, हे शक्य नसल्यास बाथरूम मध्ये पुर्वकडे तोंड करून सुर्याला अर्ध्य देवून आघोळ करायची नेतर चौरंगालर सोन्याची किंवा पितळेची कोकीळा झाडावर बसलेली स्थापित करूत सगळे मांडायचे. दिवसभर उपास करायचा. संध्याकाळी पुजा करन नंतर दुसर्या दिवशी असेच तिसर्या दिवशी उद्यापन करायचे. हे सर्व विधी ब्राम्हनाकडून करून घ्यायचे. सवाष्ण ब्राम्हणाला जेवू घालायचे. या तीन दिवसात पलंगावर न झाेपता चटई टाकून जमिनीवर झोपायचे. (नवरे मंडळीनी बैठिकीत सोफ्यावर पडायचे. ha! ha!) नौकरी करणार्या स्त्रियांनी एका दिवसात केले तरी चालते. . पूजेचे साहित्य पुजाविधी उद्या सांगतो
चालेल.
आमच्याकडे कोकिळा नाही, म्हणून रिमा लागूंचा फोटो ठेवायचा प्लॅन आहे.नुसताच, झाडावर चढलेला वगैरे नाही.
आणि मी हे विधी आमच्या रद्दीवाल्या काकांकडून करवून घेईन म्हणतो. आणि सवाष्ण ब्राम्हणाऐवजी माझ्या चौथीतल्या गणिताच्या शिक्षकांना जेवू घालायचा विचार आहे. असं केलं तर चालेल का?
सावकाश उत्तर द्या.. घाई नाही काही.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
घाई नाही कसं? घाई केली नाही
घाई नाही कसं? घाई केली नाही तर १८ वर्षं थांबायला लागेल. असं नको करूस अस्वला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सवाष्ण ब्राह्मण? म्हणजे
सवाष्ण ब्राह्मण? म्हणजे सवाष्ण पुरुष?
सवाष्ण ब्राह्मण? म्हणजे
सवाष्ण ब्राह्मण? म्हणजे सवाष्ण पुरुष?
सवाष्ण म्हणजे विवाहित स्त्री व ब्राम्हण म्हणजे मुंज झालेला मुलगा किंवा नवरा
सवाष्ण ब्राह्मण? म्हणजे
सवाष्ण ब्राह्मण? म्हणजे सवाष्ण पुरुष?
सवाष्ण म्हणजे विवाहित स्त्री व ब्राम्हण म्हणजे मुंज झालेला मुलगा किंवा नवरा
त्यापेक्षा हे व्रत न करता
त्यापेक्षा हे व्रत न करता शहराजवळच्या किंवा गावाजवळच्या नदीवर सहकुंटुंब जायचे आणि सर्वांनी 1 तास सुर्याकडे तोंड करून एका पायावर पाण्यात उभे राहायचे 18 वर्षाचे पुण्य 1 तासात.
हा!हा!ही!ही!हू!हू!
थँक्स! मंत्रसुद्धा आवडला-
थँक्स! मंत्रसुद्धा आवडला- एकदम सोप्पा आहे!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
हेमंतरावजी लाटकरसाहेब - हे
हेमंतरावजी लाटकरसाहेब - हे व्रत करायला लावल्याबद्दल ४९८ अंतर्गत तक्रार करायची सोय आहे का?
हेमंतरावजी लाटकरसाहेब - हे
हेमंतरावजी लाटकरसाहेब - हे व्रत करायला लावल्याबद्दल
मी फक्त माहिती टाकली. करणे न करणे ज्याचा त्याचा वैयक्तिक पश्न.
स्वतःच्या धाग्याला स्वतः
स्वतःच्या धाग्याला स्वतः रेटींग करता येणे - हे पहीलं बंद करा
स्वतःच्या धाग्याला स्वतः
स्वतःच्या धाग्याला स्वतः रेटींग करता येणे - हे पहीलं बंद करा..))))))
आॅ...?
हे कसं करायच..?
अद्याणी ( मोबल्यावर टाईपता इना) जव्हेरगंज.
हे व्रत 18 वर्षानी एकदा येते.
हे मला नीट कळलं नाही. अधिक मास दर तीन वर्षांनी येतो. तेव्हा आषाढ अधिक मास असल्याची परिस्थिती दर ३६ वर्षांनी यायला हवी. आयुष्यात जास्तीत जास्त तीन वेळा वरूनदेखील १८ वर्षं पुरेशी नसावीत असं दिसतं. तेव्हा नक्की काय हे कोणी सांगेल का?
थोडं विचार केल्यावर माझ्या
थोडं विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं. खरं तर हे व्रत दर ३६ वर्षांनीच येत असणार, पण दक्षिणा दुप्पट मिळवण्यासाठी भटभिक्षुकांनी त्याची फ्रिक्वेन्सी दुप्पट केली असणार! बारा महिन्यांचे ४८ आठवडे केले तसंच काहीतरी असावं.
त्या अधिक महीन्याचही असच
त्या अधिक महीन्याचही असच काहितरि झ्याटम्याट केलय ...
भटभिक्षुकांच्या बाबतीत इतक्या
भटभिक्षुकांच्या बाबतीत इतक्या तुच्छतेने बोलायची गरज नव्हती. (मी भट भिक्षुक नसुनही असे म्हणतोय)
जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्याून सुटून विशाऴगडाकडे निघाले (21 मैलाचे अंतर) तेव्हा घोडखिंड अडवून धरायला बाजीप्रभू देशपांडे (भट) नसले असते तर?
याच भटाच्या (बाळाजी विश्वनाथ) वंशावळीने शिवशाही चाळीस वर्ष पुढे चालवली. माधवराव पेशव्यानंतर प्रराक्रमी पेशवा नव्हता. (राघोबाबादादा होते पण ते पराक्रमी होते पण चंचल होते, त्यामुळे शेवटपर्यंत पेशवे झाले नाहीत.) तरी नाना फडणीसांनी काही काळ शिवशाही चालवली. पण इंग्रज प्रबळ झाल्यानुळे दुसरा बाजीराव पराक्रमी नसल्यामुळे हिंदवी स्वराज्य संपले ब
बाजीप्रभू देशपांडे हे भट नसून
बाजीप्रभू देशपांडे हे भट नसून शीकेपी अर्थात कायस्थ होते.
बाकी चालू द्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हेच्च बोलते.
हेच्च बोलते.
आड्नावां वरून जात ओळखनारे
आड्नावां वरून जात ओळखनारे प्राणी ते, कशाला त्यांच्या नादाला लागताय?
तुमचं कौतुक करावं तितकं थोडं
तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे! कोणताही विषय तुम्ही पेशव्यांवर कसा काय नेऊ शकता बुवा!
भटभिक्षुकांनी त्याची
भटभिक्षुकांनी त्याची फ्रिक्वेन्सी दुप्पट केली असणार! बारा महिन्यांचे ४८ आठवडे केले तसंच काहीतरी असावं.
याला उत्तर देण्यासाठी पेशव्यावर विषय गेला
मर्दुमकी गाजवणारे काही लोक
मर्दुमकी गाजवणारे काही लोक भटांमध्ये होते तसे इंग्रजांमध्ये पण होते. पण म्हणून काही इतर इंग्रजांनी आपल्याला आठ टक्क्यांनी गंडवायचा प्रयत्न केला नाही असं नाही ना... तसंच, पौरोहित्य करणारे लोक 'अमुक व्रत करा, तमुक व्रत करा' असं सांगत असतीलच ना. त्यांना त्यात फायदाच आहे की. प्रत्येक व्रतात ब्राह्मणाला जेवायला घाला असं म्हटलेलंच असतं.
पौरोहित्य करणारे लोक 'अमुक
पौरोहित्य करणारे लोक 'अमुक व्रत करा, तमुक व्रत करा' असं सांगत असतीलच ना. त्यांना त्यात फायदाच आहे की. प्रत्येक व्रतात ब्राह्मणाला जेवायला घाला असं म्हटलेलंच असतं.
पण त्यांनी सांगितले तरी करणे न करणे आपल्या हातात आहे. येथे बाम्हणाला जेवायला घालणे म्हणजे मुंज झालेला मुंजा चालतो.
पौरोहित्य करणारे लोक 'अमुक
पौरोहित्य करणारे लोक 'अमुक व्रत करा, तमुक व्रत करा' असं सांगत असतीलच ना. त्यांना त्यात फायदाच आहे की. प्रत्येक व्रतात ब्राह्मणाला जेवायला घाला असं म्हटलेलंच असतं.
पण त्यांनी सांगितले तरी करणे न करणे आपल्या हातात आहे. येथे बाम्हणाला जेवायला घालणे म्हणजे मुंज झालेला मुलगा.
जाऊद्यात हो. इथे सीरियस कशाला
जाऊद्यात हो. इथे सीरियस कशाला व्हायचं? पण ब्राह्मणांचा पौरोहित्याचा धंदा हा पूर्णपणे त्यांनी सांगितलेल्या भाकडकथांवर लोक कितपत विश्वास ठेवून ती व्रतं करतात यावर होता. त्या प्रत्येक व्रतात ब्राह्मणाला अमुक भोजन द्या, तमुक दक्षिणा द्या वगैरे सांगून ठेवलेलं होतं. तुम्ही म्हणता तसे खरे तर सगळे लग्नाचे विधी, सत्यनारायण, गणपती-उत्सव वगैरेंमधले धार्मिक विधी काढून टाकले तर फार बरं होईल.
अहो, जाऊद्यात हो. त्यांनी
अहो, जाऊद्यात हो. त्यांनी मान्य केलंय ना खालच्या प्रतिसादात लग्नात विधीबिधी काही करू नये, लग्नच करू नये वगैरे लिहिलंय ना. किती त्याच त्याच गोष्टींचा कीस पाडत बसणार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
या प्रतिसादाला 'बॅटमॅन'
या प्रतिसादाला 'बॅटमॅन' श्रेणी देण्याची सोय व्हावी.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
प्रत्येक महिना हा अधिक नाही
प्रत्येक महिना हा अधिक नाही होत. फाल्गुन ते अश्विन हेच अधिक होतात बहुधा. सो दर तीन वर्षांनी येणारे अधिक हे ओळीने येत नाहीत. सो १८ वर्षातून एकदा असू शकेल.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अवांतराबद्दल क्षमस्व.
फाल्गुन ते अश्विन अधिक होतात तर ९*३ = २७ वर्षांनी एकदा असायला पाहिजे. त्यासाठी अधिक महिने ओळीने यायला पाहिजेत असंही नाही. यादृच्छिक आले तरीही सरासरी २७ वर्षांनंतर तोच महिना पुन्हा अधिक येईल.
महिना कोणता हे कसा ठरवतात - ज्या नक्षत्रात चंद्र पौर्णिमेला असतो त्या नक्षत्रावरून महिना कोणता हे ठरवतात. चित्रा नक्षत्र - चैत्र महिना, विशाखा - वैशाख, ज्येष्ठा - ज्येष्ठ... अधिक महिन्याचं नक्की काय गणित ते माहीत नाही, पण ज्या दोन नक्षत्रांच्या मध्ये चंद्र असेल त्यावरून ठरवत असतील, असा अंदाज. त्यात कार्तिक, मार्गशीर्ष, माघ हे महिने का गाळले जातात याचं खगोलीय कारण चटकन समजत नाहीये. धार्मिक, रूढींचं कारण आहे का?
अवांतराबद्दल क्षमस्व.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
घ्या, हे तुम्हाला माहिती
घ्या, हे तुम्हाला माहिती नाही? वॉट यु?
http://www.aisiakshare.com/node/1136#comment-15128
माझीही ऐकीव माहिती होती. गुगल करता वरचा दुवा मिळाला.
अजून एका ठिकाणी
प्रत्येकाची अधिक माहिन्याची टर्न झाली की मगच पुन्हा तो महिना अधिक असही नसावं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अजून थोडं अवांतरः ८१ पूर्ण
अजून थोडं अवांतरः ८१ पूर्ण झाल्यावर सहस्रचंद्रदर्शन करतात. त्याचा हिशेब करताना देखील अधिक पकडतात आणि मग तो हिशेब बरोबर येतो हे नव्याने कळाले. ८१ वर्षात (८१*१२) + २७ अधिक इतके महिने = ९९९ चंद्र. मग फुडल्या पौर्णिमेला १०००वा चंद्र.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
जर चांद्रमहिन्यात एकही
जर चांद्रमहिन्यात एकही संक्रांत नसेल तर तो महिना अधिक महिना म्हणून धरतात. जर दोन संक्रांती असतील तर त्या महिन्याचा लोप होतो (हे खूपच क्वचित होते). चांद्रमहिन्यात एकही संक्रांत नाही हे पॄथ्वी aphelion च्या जवळपास असतानाच होऊ शकते, (orbital angulr velocity कमी असल्याने), कार्तिक ते माघ पॄथ्वी perihelion च्या जवळपास असल्यामुळे त्या चांद्रमहिन्यात एकतरी संक्रांत होतेच.
हे पहा
सुमारे ३ वर्षांपूर्वी आनंद घारे ह्यांनी लिहिलेल्या 'अधिक मास' ह्या धाग्यावर अधिक मास ह्यावर बरीच चर्चा खगोलगणितीय अंगाने झाली होती.तेथे माझाहि प्रतिसाद होता. त्यामध्ये अधिकमासाचे गणित कसे असते आणि ते मास पावसाळ्यातच का येतात हे मला जमले तसे उलगडून दाखविले होते. तोच प्रतिसाद येथे पुनः चिकटवत आहे.
<<
मन ह्यांच्या वरील प्रतिसादात लोकप्रभेच्या एका लेखाचा उल्लेख आहे. त्या लेखात पुढील वाक्य दिसले: "मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे महिने कायम ३० दिवस अगर काही तास जास्त कालावधीचे असतात म्हणून ते कधीच अधिक मास नसतात."
ह्याचा अर्थ मला समजला नाही. पूर्वी मी कोठेतरी वाचल्याप्रमाणे हिवाळ्याचे महिने अधिक न होण्याचे कारण केपलरचा दुसरा नियम, Equal areas are swept in equal time, हे आहे.
विकिपीडियामधून घेतलेल्या वरील आकृतीप्रमाणे जानेवारी ३ ला पृथ्वी आपल्या लंबवर्तुळाकृति कक्षेमध्ये सूर्यापासून सर्वात कमी अंतरावर असते आणि जुलै ३ ला सर्वात अधिक. केपलरच्या दुसर्या नियमानुसार जानेवारी ३ च्या पुढेमागे पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गति सर्वात अधिक म्हणजे ३०.२९ किमी/से (१०९०४४ किमी/ता) असते कारण केपलरच्या नियमानुसार सारख्या वेळात सारखे क्षेत्रफळ राखण्यासाठी पृथ्वीला कक्षेचा अधिक लांबीचा चाप चालून जायचे असते. पृथ्वीची तीच गति त्याच कारणासाठी जुलै ३ च्या पुढेमागे २९.२९ किमी/से (१०५४४४ किमी/ता) इतकी असते. (पहा http://nssdc.gsfc.nasa.gov/planetary/factsheet/earthfact.html)
ह्याचा अर्थ असा की जानेवारी ३ च्या पुढेमागे पृथ्वीवरून सूर्याकडे पाहिले तर सूर्य अधिक वेगाने आणि कमी वेळात तारकामंडलाच्या पार्श्वभूमीवर हलतांना दिसेल आणि सरासरीपेक्षा कमी वेळात एक राशि पार करेल.
चन्द्राच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावर ह्याचा परिणाम न झाल्यामुळे सूर्याच्या राशीत चन्द्राने प्रवेश केला आणि तदनंतर अमावास्या होऊन पुढचा चान्द्रमास प्रारंभ झाला तर त्याच सूर्यराशीत तो चान्द्रमास संपण्याची शक्यता कमी होईल किंवा संपूर्ण नष्ट होईल. ह्याचाच अर्थ अधिक मास सुरू होणार नाही.
ह्यामुळे असे म्हणता येते की ३ जानेवारीच्या पुढचेमागचे चान्द्रमास - हिवाळ्याचे चान्द्रमास - अधिक मास होऊ शकत नाहीत किंवा तशी शक्यता कमी असते आणि जसजशी पृथ्वी जुलै ३ कडे सरकू लागते तसतशी अधिक मासांची शक्यता वाढते.
>>
तुम्ही पण ना काका... अशा
तुम्ही पण ना काका...
अशा माहितीपूर्ण, रोचक आणि गंभीर धागयावर असले मौजमजेचे प्रतिसाद देता!
+१
+१
माझा थोडा गोंधळ झालाय.वक्रीय
माझा थोडा गोंधळ झालाय.
वक्रीय गती समान असल्यास रेषीय गती त्रिज्येच्या प्रमाणात वाढते (v=wr). त्यामुळे ३ जुलैच्या आसपास पृथ्वीची रेषीय गती सर्वाधिक असायला हवी. काय चुकतंय माझं?
सूर्यसापेक्ष गती ३ जानेवारीच्या आसपास जास्त असणार हे मात्र बरोबर वाटतेय.
मला वाटते रेषीय गती स्थिर
मला वाटते रेषीय गती स्थिर असावी.Earth sweeps equal area in equal time. त्यामुळे रेषीय आणि कोनीय गती दोन्ही बदलत असाव्यात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पण गोड आवाजाचा आणि काळ्या
पण गोड आवाजाचा आणि काळ्या रंगाचा असतो तो नर कोकिळ असतो. म्हणजे दाक्षायणिला लिंगबदलाचा (शाप का वर काय ते) सुद्धा दिला का शंकराने?
आयला झक्कास .... हसून हसून
आयला झक्कास .... हसून हसून मेले मी
पाने