दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१३ मे
जन्मदिवस : मलेरियाच्या जंतूंचा शोध लावणारे नोबेलविजेते रोनॉल्ड रॉस (१८५७), चित्रकार व शिल्पकार जॉर्ज ब्राक (१८८२), राष्ट्रपती फक्रुद्दीन अहमद (१९०५), लेखिका दाफ्ने द्यु मोरिए (१९०७), राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी (१९१३), नर्तिका बालसरस्वती (१९१८), समीक्षक भालचंद्र फडके (१९२५), समीक्षक गो. मा. पवार (१९३२), लेखक आर्मिस्टेड मॉपिन (१९४४), गायक स्टीव्ही वंडर (१९५०), संगीतकार आनंद मोडक (१९५१)
मृत्युदिवस : 'बकिंगहॅम पॅलेस'चा वास्तुरचनाकार जॉन नॅश (१८३५), अभिनेता गॅरी कूपर (१९६१), जाझगायक व वादक चेट बेकर (१९८८), लेखक आर.के.नारायण (२००१), नाट्यकर्मी बादल सरकार (२०११), छायाचित्रकार जगदीश माळी (२०१३)
--
१६३८ : दिल्ली येथील लाल किल्ल्याचे बांधकाम सुरू.
१८८८ : ब्राझिलमध्ये गुलामगिरीविरोधात कायदा अमलात आला.
१९४० : दुसरे महायुद्ध : जर्मन सैन्य फ्रान्सच्या भूमीवर. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी पार्लमेंटमध्ये 'Blood, toil, tears, and sweat' हे आपले सुप्रसिद्ध भाषण केले.
१९५० : ब्रिटनमधील सिल्व्हरस्टोन येथे पहिल्या फॉर्म्युला वन स्पर्धेची सुरुवात.
१९५२ : प्रजासत्ताक भारताच्या पहिल्या संसदेचे (राज्यसभेचे) पहिले सत्र सुरू झाले.
१९५८ : 'वेल्क्रो'ची ट्रेडमार्क म्हणून नोंदणी.
१९६८ : फ्रान्समधील विद्यार्थ्यांच्या विद्रोही चळवळीला साथ देत कामगारांनी देशव्यापी संप पुकारला. आठ लाख विद्यार्थी आणि एक कोटी कामगार यांची ही युती अभूतपूर्व होती.
२००८ : जयपूर येथे बॉम्बस्फोट; १२ मृत
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- दोन गुलाबजाम
औषधांचे ब्रँड निवडण्यावरच
औषधांचे ब्रँड निवडण्यावरच बंधने
तथाकथित शोषक डॉक्टर होता. आता तो फार्मासिस्ट असणारे.
---------------------
Greenpeace used the study for fundraising under the slogan, “You’re not half the man your father was.”
हे सगळं खरं आहे का ???? याचं पुढे काय झालं ??
हे प्रश्न मी का विचारतोय ?? उत्तर खाली -
औषधांचे ब्रँड निवडण्यावरच बंधने : बद्दल.
जेनेरिक नांवे डिस्पेन्सिंगमधे घोळ होऊ नये म्हणून लिहायची आहेत. त्यापुढे कंसात हव्या त्या ब्रँडचे नांव लिहिल्यास ते औषध केमिस्टने देणे बंधनकारक आहे. उदा. Tab. Paracetamol (Crocin) (ही माझी माहिती आहे, व ऑथेंटिक सोर्सकडून परंतू तोंडी मिळालेली आहे.)
हे जर झाले नाही, तर केमिस्टना हाती धरून हवा तो ब्रँड पुश करणे कंपन्यांना सोपे जाईल. फार्मा कंपन्यांकडून 'गिफ्ट्स' घेणे डॉक्टरांना अलाऊड नाही, ते याचसाठी. पण केमिस्ट लोकांना अशी गिफ्ट्स, कॅश व स्कीम्स घेता येतात, व ते घेतात.
जेनेरिक व ब्रँडेड बद्दल थोडे:
१. जेनेरिक नावाने नामवंत कंपन्याही औषधे बाजारात आणतात. उदा रोश कंपनीचे अ जीवनसत्व पूर्वी अरुव्हिट नामक सुंदर चवीच्या च्युएबल टॅबलेट रूपात उपलब्ध होते. तेच आता जेनेरिक नावाने, तसेच, फक्त ९० पैशत एक गोळी या भावात उपलब्ध आहे. अर्थात, टॅक्ससह १० रुपयांत एक कोर्स होतो.
परंतू, या बदल्यात अनेक केमिस्ट कॉड लिव्हर ऑईलच्या गोळ्या खपवतात, ज्या अधिक महाग आहेतच, शिवाय कमअस्सल आहेत.
२. "बॉम्बे मार्केट" नावाने फेमस असलेल्या फ्लाय बाय नाईट कंपन्यांनी बनवलेली औषधे, ज्यात लेबलवर छापलेल्या प्रमाणात, व अपेक्षित शुद्धतेत मूळ औषध असण्याची शक्यता पडताळून पाहण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. कंट्रोलर ऑफ ड्रग्जचा काहीही कंट्रोल यावर नाही. हा एक व्हॅलिड व गंभीर आक्षेप जेनेरिक औषधांवर घेतला जातो.
३. काही औषधे जीवनावश्यक म्हणून घोषित केली जातात. ज्यामुळे ब्रँडेड असले, तरी त्यांची किंमत अत्यंत कमी ठेवावी लागते. अर्थात यात तोटा नसतो, पण फायदा कमी असतो. कंपन्या अशी औषधे बनवतच नाहीत, त्याऐवजी सिमिलर औषधे पुश करतात. उदा, डेक्सामिथाझोन ऐजवी बीटामिथाझोन. अशा औषधांचे अनेक ब्रँड्स बंद पडले आहेत, व नाईलाजाने १० रुपयांऐवजी १०० रुपयांचे औषध वापरावे लागते.
४. ब्रँडेड औषधे महाग असण्याची किंवा काही कंपन्यांची ब्रँडेड औषधे महाग व काही स्वस्त असण्याची कारणे : पहिले, व कॉमन कारण सरळ सरळ नफेखोरी हे असले, तरी समजा एक अल्बेंडाझोलची गोळी १० पैशांना मिळते. तिला प्रचंड घाण वास व कडू चव असते. चव गोड करायची तर गोळी एक रुपयाला मिळते. वास घालवायचा तर तिचीच किंमत ३ रुपये होते. साधे कारण टेक्नॉलॉजी बदलते.
निमेसुलाईडची गोळी पोटात घ्यायची ती स्वस्त मिळेल. पण तिचा इफेक्ट उशीरा येईल व अॅसिडिटी होईल. तीच तोंडात वितळून इंजेक्शनच्या वेगाने काम करणारी हवी असेल तर महाग होते. सस्टेन्ड रिलिज उर्फ २४ तास हळूहळू काम करत राहणारी हवी असेल तर किंमत बदलेल.
ब्रँडेड औषध लिहिताना या बाबींचा विचार केला जात असतो. पेशंटला कोणते औषध जास्त सहन होईल त्यानुसार ते लिहिले जाते.
अर्थात पहिले "नफेखोरी" क्रायटेरियाही वापरलेला जात असू शकतोच, पण अशा बाबी नेहेमीच व प्रत्येक व्यवसायात दिसतील.
***
रच्याकने :
आयुर्वेद व होमिओपथीवाल्यांना हापिशली अॅलोपथिक औषधे लिहिण्याची परवानगी देण्यापाठी कंपन्यांचे मार्केट वाढवणे हा एक मोठा उद्देश आहे. यामुळे फार्मा लॉबीकडून यासाठी भरपूर 'हातभार' लावला गेला असे ऐकून आहे.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
संपूर्ण प्रतिसाद संग्रही
संपूर्ण प्रतिसाद संग्रही ठेवावा असा. आडकित्ता, माझ्यातर्फे पार्टी तुम्हास.
तुमचा हा प्रतिसाद मित्राला पाठवलेला आहे. incisive विश्लेषणाचा उत्तम नमुना असं सांगून. तुमचे नाव देऊन पाठवलाय.
----
Unintended consequences चे यापेक्षा चांगले उदाहरण कुठले असेल ??
through the workings of an entire system, effects may be very different from, and even opposed to, intentions ____ Kenneth Arrow
-----
शॉल्लेट. याला म्हणतात "न्याय".
फार्मा कंपन्या ह्या नफेखोर असतात व त्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून पॉलीसी बनवणारा राजकीय नेता हा "जनकल्याणाधिष्ठित" जे निर्णय घेतो ते खरोखर तसे असतात - या गृहितकातची सुमधुर फले आहेत ही.
मेरा हीरो
फेसबुकवर पाहिलेला एक फोटो (फोटोशॉप वगैरे असला तर माहीत नाही.)
कॅप्शन : तेरा ध्यान किधर है ? ये तेरा हीरो इधर है.
स्रोत
(कृ.ह.घ्या.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हा हा, मी वेगळ्या क्याप्शनने
हा हा, मी वेगळ्या क्याप्शनने पाहिला होता.
'अबे बीसी, दुल्हा इधर है, बरातियोंके फोटो क्यों खीच रहा है बे'
(रच्याकने, जंतू ह.घ्या. वगैरे सूचना टाकायला कधीपासून लागले? हेच काय ते अच्छे दिन?)
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
(रच्याकने, जंतू ह.घ्या. वगैरे
असे लिहायला लागते म्हणजे काळ मोठा कठीण आहे, असे न वाटण्याइतपत सुरक्षितता येईल तो सुदिन, इ.इ. असे सूचित करावयाचे असेल हो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे दुसरे.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
ही बातमी वाचली.
आग्रा, दि. १८ ऑगस्ट १६६६.
परकालदास टु कल्याणदास. (मिर्झाराजे जयसिंगाच्या पदरीचे कारकून)
"......अठे ठीक छे अपरंच सेवोजी अठास्यो भागो...."
(जदुनाथ सरकार, Shivaji's visit to Aurangzeb at Agra).
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मेरा दूसरा हीरो
विवाहानंतरही प्रेयसी-प्रियकर असावा! : नेमाडे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
दूसरा कसला, ऑफ स्पिन.
इथेच मराठी माणूस मार खातो. एकच प्रियकर-प्रेयसी? कुठे नेऊन ठेवला उदारमतवाद आमचा!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उदा. इथे पहा.
भाजपा वाले लगेच - हे आपल्या संस्कृति च्या (सांस्कृतिक मूल्ये वगैरे) दृष्टिकोनातून बघितलं पायजे असा "युक्तिवाद" करतील. उदा. इथे पहा.. (विवाहबाह्य संबंध व सेन्सॉरशिप हे भिन्न विषय आहेत पण कल्चरल नॅशनलिस्ट्स/प्युरिस्ट्स लोकांना स्त्रीपुरुष संबंध फक्त सांस्कृतिक दृष्टिकोनातूनच पाहिले जावेत असे वाटत असते. आजच्या पिढीत नवीन कल्चर बनवण्याची क्षमता सोडाच पण कल्चर बदलण्याची सुद्धा क्षमता नसते व त्याला लागणारी "विचारीक बैठक" (whatever that sh** is) तर त्याहून नसते - असा दृढ विश्वास असावा कल्चरल प्युरिस्ट्स मंडळींचा. )
कल्चरल प्युरीस्टांना मुलं कशी
कल्चरल प्युरीस्टांना मुलं कशी काय होतात हे मला कधीही न उलगडलेलं कोडं आहे.
किरण नगरकर आता अँटी सेन्सॉरशीप फंड स्थापित करणारेत.
किरण नगरकर आता अँटी सेन्सॉरशीप फंड स्थापित करणारेत.
किरण नगरकरांची लेटेष्ट मुलाखत.
------------
प्रश्न - Housing is a central issue in the plot. It’s not just about escaping the chawls anymore, it’s about privacy. And now the police even raid hotels…
उत्तर - Absolutely. There’s a garden outside the house I live in, the Bombay version of a garden, you know. There are couples waiting there for sunset, for 7 o’clock, so they can start smooching. And my heart goes out to them! I’ve written about such an episode in Saat Sakkam Trechalis (Seven Sixes are Forty-Three) and it comes up again and again in my work. So many of those young people’s lives could get difficult now. They’re going to be in dire trouble at home because of the “shame” they’ve brought upon their families. I really hope the parents file incredible suits for crores of rupees against the police for defaming their children.
आश्वासनांची पिसे
लोकसत्तातील या लेखात पी.चिदंबरम यांनी केंद्र सरकारने गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी दिलेली आश्वासने आणि त्यांची सद्य स्थिती यांचा मोठा वेधक आढावा घेतला आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दॅट्स ऑके. असाच आढावा
दॅट्स ऑके. असाच आढावा चिदंबरम यांच्या कारकीर्दीबाबतसुद्धा घेता येईल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मग? पॉइंट काये?
मग? पॉइंट काये?
चिदंबरम ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारचे काम छान छान असते / लोकांना आवडले असते तर विरोधात बसून असे लिहायची वेळ येती ना. पण त्यांच्या कामाची पावती लोकांनी त्यांना दिलीये. आता त्यांनी सद्य सरकारच्या तृटी दाखवल्यावर त्यांनी केलेल्या चुका होत्या/नव्हत्या/कोणत्या यांचा काय संबंध?
का आपले उगाच?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कदाचित थत्तेकाकांचा पॉईंट हा
कदाचित थत्तेकाकांचा पॉईंट हा असावा की, ज्याने आधीच फार काही केले नाहीये संधी असताना त्याने दुसर्यांवर टिका का करावी?
जो लोग शीशो़ंके घरोंमे रहते है .... असे काहीतरी.
चिदंबरम नी अशी काहीतरी टिका करणे हे भाजपच्या पथ्यावरच आहे. त्यांना लगेच तू काय केलेस असे विचारता येते
पण त्यांनी जे काही केले किंवा
पण त्यांनी जे काही केले किंवा केले नाही त्याचा हिशोब जनतेने निवडणुकीच्या दरम्यान चुकता केला आहे.
तेव्हा सद्य सरकारचे मुल्यमापन करताना त्याचा संबंध येतोच कुठे?
==
दुसरे असे की हा लेख एका वर्षातील कामगिरीचा आढावा नसून मोदींनीच दिलेल्या आश्वासनांची सद्यस्थिती वर्णन करणारा आहे.
"मी काम करवून घेईन" या त्यांच्या प्रचारावर लोकांनी मते दिली असताना विरोधकांनी असे मुद्देसुदपणे "बघा याला काही करवून घेणे जमत नाहीये" असा दावा करणे मला योग्य वाटते.
चिदंबरम यांचा हा दावा चुकीचा असेल तर तो कसा चुकीचा आहे असा प्रतिवाद अपेक्षित आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
>>विरोधकांनी असे मुद्देसुदपणे
>>विरोधकांनी असे मुद्देसुदपणे "बघा याला काही करवून घेणे जमत नाहीये" असा दावा करणे मला योग्य वाटते.
हे बरोबर आहे. पण ते लगेच एक वर्षात म्हटले तर उपयोगाचे नाही.
[२६ नोव्हेंबरनंतर चिदंबरम यांना अर्थ मंत्रालयातून गृहमंत्रालयात जावे लागले. त्याच वेळी अर्थव्यवस्था ढासळू लागली. चिदंबरम यांची पुनर्स्थापना अर्थ खात्यात झाल्यावर त्यांनी अर्थव्यवस्था पुन्हा बरीचशी रुळावर आणली असा दावा त्यांना करता येईल].
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पण ते लगेच एक वर्षात म्हटले
पन लक्श्यात कोन घ्येतो?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
१. जनधन, किंवा शाळांमध्ये
१. जनधन, किंवा शाळांमध्ये स्वच्छतागृह ही आश्वासनं फोल आहेत किंवा या योजना फेल आहेत हे काहीच म्हटलेलं नाही. उलट त्या लेखातल्या आकड्यांने या योजना उत्तम चालू आहेत अस वाटतं. मोघम कहितरी म्हटलय चिदूने.
२. नक्की कुठल्या योजनांना नक्की किती बजेट कपात झाली आहे हे दिलं नाहीये. नुसतच "महिला, बालक, दलित आणि मागासवर्गीय यांच्या कल्याणासाठीच्या महत्त्वपूर्ण योजनांसाठीच्या तरतुदीत मोठी कपात वर्षभरात झाली". (रस्त्यांना जास्तं अॅलोकेशन हे यांच्या कल्याणाचं कसं नाही हे मला समजत नाही पण ते जाउदे)
३. मुंबैतील मॉरल पोलिसिंग, गोमांस मुद्दा हे राज्यसरकारने काढले आहे हे चिदंबरम यांना माहिती नसावं?
४. नीती आयोग तर चांग्लाय की. नियोजन आयोगात राज्यांना प्रतिनिधीत्व नव्हतं (बहुधा). इथे डायरेक सगळे मुख्यमंत्री आहेत की सदस्य. (कॉग्रेसी मुख्यमंत्री नियोजन आयोगाच्या बैठकींना न जाता इफ्तार पार्ट्यांना जातात हा बहुधा मोदींचा दोष नसावा.)
५. निर्यातेचा मुद्दा बरोबर असावा. पण त्याच बरोबर हेही दिसतं.
त्यामुळे या लेखाला 'आश्वासनांची पिसे' असलं काही म्हणणं गम्मतशीर वाटतं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मुंबैतील मॉरल पोलिसिंग,
ते दोन्हीकडे एकाच पक्षाचं सरकार असल्याने खापर फोडणे सोपे अन सोयीस्कर जात असावे बहुधा.
बाकी "मोदीवर टीका करणे" ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची नेसेसरी व सफिशियंट कंडिशन मानणार्यांना एकूणच तारतम्याचे काय म्हणा. लेखाचे शीर्षक 'तारतम्याची पिसे' असेही शोभून दिसावे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
'पिसे' म्हणसे काढलेली पिसे
'पिसे' म्हणसे काढलेली पिसे नव्हेत, आश्वासने ही पिसे लाऊन उडून गेली असे काहिसे डोक्यात होते. पंख लिहायला हवे होते - पटकन नै सुचलं ते असो.
---
प्रतिवाद आवडला
१. शक्य आहे. मलाही लेख वाचताना असंच वाटलेलं
२. योजना कोणत्या रद्द झाल्या हे दिलेलं नाही हे खरेच पण आकडे बरेच मोठे आहेत. ते खरंच असतील तर याचा अर्थ सरकारला यांचे कल्याण करायचे नाही असा होत नाही तर त्याला कमी प्राधान्य आहे असा होतो. जीएसटी विधेयकापेक्षा सरकारने या महत्त्वाच्या मुद्द्यांना मागे टाकणं योग्य/अयोग्य हा पर्स्पेक्टिव्ह झाला पण बोलकं आहे हे मान्य व्हावे!
हे रस्ते वगैरे स्पेसिफिकली शाळेत जाणार्या मुलांसाठी किंवा महिलांना सुरक्षित चालता यावं म्हणून बांधले जाताहेत का? बहुदा नाही. मग हे महिला/बाल किंवा पुरूष कल्याण असे विभागता येणार नाहीत. ते जनकल्याण झाले. त्याबद्दल घोषणा ऐकल्या आहेत पण गेल्या वर्षीच्या भाषणात ते नसल्याने त्याच्या सद्यस्थितीचा परामर्श चिद्दुंनी घेतला नसावा.
पोलिसांच मॉरल पुलिसिंग देशभरात चालु आहे (आधीही होतं). गोमांसाबद्दल केंद्रीय स्तरावरही चर्चा सुरू होती अशा बातम्या होत्या. याव्यतिरिक्त चिद्दुंची यादी मोठी आहे.
प्रश्न निती आयोग कसाय हा नसून त्याचे कामकाज कधी चालणार, नक्की कार्यकक्षा काय? त्यांचे अधिकार काय आहेत वगैरे आहे. त्याबद्दल मोठा असमंजस आहे.
५. ही दोन्ही एकाच हत्तीची दोन टोकं आहेत असं माझं मत. गब्बर सारखे आळशी ( ) त्यातून खरे चित्र चितारू शकतात पण .. असो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पूर्तता : नियोजन आयोग
यातले प्रत्येक वाक्य खरे आहे असे मानू.
मला नेमके हेच हवे आहे.
१) राज्यांमधील सरकारे आणि केंद्र सरकारची खाती यांच्यासाठी निधीची तरतूद करण्याचे अधिकार - हेच सेंट्रल प्लॅनिंग आहे. नीती आयोग सुद्धा बरखास्त केला जावा. अशा प्रकारचा आयोग अस्तित्वातच न आणण्याबद्दल कायदेशीर तरतूद केली जावी.
२) पंचवार्षिक योजना ही संकल्पना बेकायदेशीर आहे असे घोषित करावे.
३) योजना भवन ची इमारत एखाद्या डान्स बार ला आंदण म्हणून दिली जावी. Let people come to know that this Govt is deeply hostile to the very concept of Central Planning.
४) नियोजन आयोग हा राज्यपातळीवर सुद्धा अस्तित्वात आणण्यावर बंदी घालावी.
५) भारताची व्याख्या - Sovereign Socialist Secular Democratic Republic - अशी आहे. त्यातून सोशॅलिस्ट हा शब्द वगळला जावा. घटनादुरु...
निर्यातेच्या मुद्द्यावर हा
निर्यातेच्या मुद्द्यावर हा लेख रोचक आहे.
http://www.moneylife.in/article/indian-export-performance---is-it-that-b...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आजचा मोदी फोटो
एका शेखच्या मिठीत मोदी. मंगल दिन आज...
स्रोत - फेसबुक (फोटोशॉप वगैरे असल्यास कल्पना नाही.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
गोष्ट धमाल मिठीची...
आणि अर्थातच नेटकरांनी आपली अक्कल पणाला लावली...
15 #ModiInDubai Memes That Shouldn't Exist
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जबरा
मस्त.
- (चिंजंच्या मोदी फोटू सीरिजचा चाहता)
हे तर लिपलॉक करायच्या दिशेने
हे तर लिपलॉक करायच्या दिशेने ....
+१ काहीतरीच फोटो आहे. क्षण
+१
काहीतरीच फोटो आहे. क्षण नीट टिपायचा ना
लिप ऑफ फेथ
छे१! इथेही लिप सर्व्हिसच२
१. મરાઠી છે
२. ही नव्हे
ठ्ठो
ठ्ठो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शिप ऑफ थिसिअस
आनंद गांधींनी जवळपास ३४ तासांचे फूटेज ओपन सोर्स केले आहे.(बातमी जुनी असावी तरीही!)
हा त्याचा दुवा. असं फिल्म्स मध्ये पहिल्यांदाच होत असावं.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
ऑल इंडिया रेडिओला कानपिचक्या
Another caged bird: how the government cracked down on All India Radio
याकूब मेमनच्या फाशीच्या कव्हरेजबद्दल सरकारनं तीन टीव्ही चॅनल्सना 'कारणे दाखवा' नोटीस पाठवली. एडिटर्स गिल्डनं सरकारच्या ह्या निर्णयावर टीका केली. रेडिओवर ह्याची बातमी आली. तर आता सरकारनं रेडिओला कारणे दाखवा म्हटलंय. जाम मजा आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
http://www.ndtv.com/india-new
http://www.ndtv.com/india-news/ftii-students-hold-director-captive-after...
'कलाकार' लोकांना हेही माफ असतं का?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मज्जाच आहे सगळी
या सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू देऊ नये.
२००८ सालाचे विद्यार्थी अजून हॉस्टेलमध्ये राहातात. मज्जाच आहे सगळी.
पडद्यामागची खरी कहाणी
मुळात संस्थेकडे पुरेशी सामग्री नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आपले प्रकल्प वेळेवर पूर्ण करता येत नाहीत हे संस्थेत सगळ्यांना माहीत आहे. हा बॅकलॉग क्लिअर करण्यासाठी अधूनमधून एखादं वर्ष 'झीरो यर' घोषित होतं. त्या वर्षी नवे विद्यार्थी घेतले जात नाहीत आणि फक्त बॅकलॉग क्लिअर करायला प्राधान्य दिलं जातं. ह्यापूर्वी २००९च्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन त्यांचे प्रकल्प पुरे करण्यात आले होते, त्यामुळे २००८चे विद्यार्थी मागे राहिले. हा प्रशासकीय निर्णय असल्यामुळे त्याची जबाबदारी प्रशासनावर येते. आता सरकारतर्फे विद्यार्थ्यांचं दमन करण्यासाठी हा २००८च्या विद्यार्थ्यांचा मुद्दा अशा प्रकारे समोर आणला जातोय, की चूक विद्यार्थ्यांचीच आहे असं सकृतदर्शनी वाटावं. मात्र, खरं काय आहे, ते संस्थेतले शिक्षक जाणून आहेत. विद्यार्थ्यांना साहाय्य करणारे कंत्राटी कामगार घरी बसवले आहेत, त्यामुळे अपूर्ण प्रकल्प पुढे नेता येणार नाहीत. आता सरकार शिक्षकांवर आणि संचालकांवर दबाव आणून ह्या अपूर्ण प्रकल्पांचं मूल्यमापन करायला त्यांना भाग पाडतं आहे, पण ते अतिशय निरर्थक आहे. ज्या फिल्मवर पोस्ट-प्रॉडक्शन झालेलंच नाही, त्याच्या संकलनाचं किंवा ध्वनिमुद्रणाचं मूल्यमापन 'आहे त्या स्थितीत' कसं करता येईल? अपात्र माणसांची नियुक्ती मागे घ्यायला हटवादी सरकार तयार नाही; शिवाय, अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्यांची नालस्ती सुरू आहे. चालला आहे तो सगळा प्रकार खूपच उद्वेगजनक आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हे २००८ पासून संस्थेत शिकणारे
हे २००८ पासून संस्थेत शिकणारे विद्यार्थी पोटापाण्याची काय सोय करून असतात?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
उदरनिर्वाह
सगळ्यांबाबत सरसकट विधान करता येणार नाही, पण निदान काही जण हळू हळू शॉर्ट फिल्म वगैरे छोटी कामं घेऊ लागतात. (छोटी कामंच घेता येतात, कारण पदवी अद्याप मिळालेली नसते.) त्यांना काही राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिकं वगैरे मिळाली, तर अर्थात अधिक कामं मिळतात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कामगार
>> विद्यार्थ्यांना साहाय्य करणारे कंत्राटी कामगार घरी बसवले आहेत, त्यामुळे अपूर्ण प्रकल्प पुढे नेता येणार नाहीत.<<
कामगरांवर इतके अवलंबन असते हे पटत नाही. विद्यार्थी क्राउडफंडिंग सारखे अनेक मार्ग वापरतात का? एकेका ट्रेडच्या ११-१२ जणांचे प्रोजेक्ट्स पूर्ण होत नाहीत हे चिंताजनक आहे. त्यातही तुम्ही म्हणता तशी ही मुले क्रीम ऑफ़ प्रकारची असतात.
सचिन कुंडलकर सारखे दिग्दर्शक या संस्थांचे ड्रॉप आउट आहेत.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
कामगार, इ.
संस्थेची बस चालवत चित्रीकरणाच्या स्थळी नेणं, बोजड यंत्रणा बसवर चढवणं / उतरवणं, चित्रीकरणाच्या स्थळी ती गरजेनुसार हलवणं किंवा इतर (ऑफिस बॉय करतील तशा प्रकारची) कामं हे कामगार करतात. एका डिप्लोमा फिल्मच्या वेगवेगळ्या अंगांवर काम करणारे बरेच विद्यार्थी असतात. त्यामुळे एक फिल्म अडकली की खूप जणांचा डिप्लोमा अडकतो.
बहुधा डिप्लोमा फिल्म वेळात पूर्ण होईना म्हणून कंटाळून अखेर त्यानं संस्था सोडली आणि आपलं काम सुरू केलं. त्याला आधीपासून सुमित्रा भावे / सुनील सुकथनकर वगैरेंबरोबर काम करण्याचा अनुभव होता, ओळखी होत्या. प्रत्येक विद्यार्थ्याला हे शक्य होईल असं नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
यातल्या काही विद्यार्थ्यांना
यातल्या काही विद्यार्थ्यांना अटक केली आहे काल रात्री. हा पोलिसांचा मूर्खपणा आहे.
http://www.hindustantimes.com/india-news/kejriwal-to-ftii-students-run-c...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
'सामना' चित्रपटाबद्दल
'सामना' चित्रपटाबद्दल स्क्रोलमध्ये आलेला शांता गोखलेंचा लेख - Why Jabbar Patel’s ‘Saamna’ became a landmark film in 1975 – and remains one today
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लेख आवडला हो. मस्त लिहिलाय.
लेख आवडला हो. मस्त लिहिलाय. शेवटचे ३ प्यारे अत्युत्कृष्ठ.
-
हॅ हॅ हॅ
अॅमेझॉन
अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांच्या वर्क-लाईफ प्रॅक्टिसबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. जेफ बेझोनेही वादात उडी घेऊन काही अन्याय होत असल्यास थेट त्यालाच कळवा असं सांगितलंय.
संदर्भः हा लेख http://www.nytimes.com/2015/08/16/technology/inside-amazon-wrestling-big...
लेख वाचनीय आहे. अवश्य वाचा. पण अॅमेझॉनला सिंगलआऊट केल्यासारखा वाटला. अॅपलसारख्या महाकाय कंपनीपासून टिंडरसारख्या स्टार्टपपर्यंत बहुतेक कंपन्यांचे वर्क कल्चर वेगळे नाही. (मायक्रोसॉफ्टबद्दल मात्र चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत)
लेखातील काही रोचक वाक्ये.
“The joke in the office was that when it came to work/life balance, work came first, life came second, and trying to find the balance came last.”
"Amazon is where overachievers go to feel bad about themselves.”
“Nearly every person I worked with, I saw cry at their desk.”
“I would see people practically combust.”
“I was so addicted to wanting to be successful there. For those of us who went to work there, it was like a drug that we could get self-worth from.”
When you have so much turnover, the risk is that people are seen as fungible. You know that tomorrow you’re going to look around and some people are going to have left the company or been managed out.”
जबरदस्त भारी आहे. ताकाला जाऊन
जबरदस्त भारी आहे.
ताकाला जाऊन भांडं लपवत नाहीयेत हे फार आवडलं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
वाचतोय. अॅपल/अॅमेझॉन मधली
वाचतोय. अॅपल/अॅमेझॉन मधली नोकरी पसंद नसेल तर दुसरीकडे नोकरी शोधायला संधी असतेच ना ? विशेषतः अॅमेझॉन/अॅपल चा अनुभव असल्यानंतर तर नक्की असते. निमरोड हुफियन चा क्वोट हेच सांगतो.
न्युयॉर्क टाईम्स चे धोरण - म्हंजे जे लोक (रीड: कंपन्या, उद्योजक) यशस्वी आहेत त्यांची शक्य तितकी अतिकठोर स्क्रुटीनी करून "बिचार्या" कर्मचार्यांचे शोषण होत आहे असे जगाला भासवून आपण कसे त्यांच्या बाजूचे आहोत असे दाखवायचा यत्न करणारे वृत्तपत्र. थोडक्यात काला पत्थर मधली अनिता बनायचा यत्न करणारे. बार्गेनिंग पॉवर ही अस्तित्वातच नसायला हवी व असलीच तर ती सरकारने "cut down to size" करावी अशा स्वरूपाचा युक्तीवाद करणारे.
संधी असते
संधी असते. शिवाय अॅमेझॉन कर्मचाऱ्यांनी इतर (कमी लाभ देणारे?) पर्याय असतानाही स्वतःहून केलेली निवड आहे. (अॅमेझॉनच्या गोदामांमध्ये एसी देण्याऐवजी उन्हाळ्यात बेशुद्ध पडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केवळ अॅम्ब्युलन्स देणे मात्र खटकले)
विशेषतः अॅमेझॉन/अॅपल चा
येस्स्स Why can't people use Amazon. थोडी वर्षे कळ काढून टाटा करुन फेसबुक्/गुगल वगैरे कंपनीत जायचे.
.
कसे काय तुम्ही नकारात्मक स्थितीतही संधी शोधता गब्बर I envy that spin.
कसे काय तुम्ही नकारात्मक
धन्यवाद.
तुमच्या स्तुतीमुळे मी हुरळून गेलेलो आहेच (खरोख्खर, मनापासून सांगतो). तेव्हा त्याचे निमित्त करून जरा थोडास्सा आगाऊपणा करतोच. ही डायग्रॅम बघाच. स्त्रीवाद्यांना गैरसोयीची वाटणारी व्हेन डायग्रॅम आहे. मी तुमचे लक्ष निळ्या वर्तुळाकडे खेचू इच्छितो. त्याबद्दल जो मजकूर लिहिलेला आहे त्यात खरी insight दडलेली आहे. नकारात्मक स्थितीतही संधी शोधण्याच्या माझ्या वृत्तीमागे माझे प्रेरणास्थान हेच आहे.
युरेका
गब्बर यांना अभिप्रेत विरोधाभास कळला मला-
जर स्त्रिया खरच २३% कमी पेड आहेत + खरच कंपन्या नफाखोर आहेत => सर्व नफाखोर कंपन्या फक्त स्त्री कर्मचारी ठेवतील.
पण तसे दिसत नाही => एक तर स्त्रिया २३% अंडरपेड नाहीत किंवा कंपन्या फक्त नफाखोर नाहीत
काहीतरी एक बोला. दोन्हीकडून ढोल बडवू नका.
प्रकाटाआ
प्रकाटाआ
काऊन?
काऊन?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
प्रश्नातच उत्तर दडले नसेल
प्रश्नातच उत्तर दडले नसेल काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कावणे हा शब्द बर्याच दिवसात
कावणे हा शब्द बर्याच दिवसात ऐकला नाही.
त्यांनी काऊन हा शब्द
त्यांनी काऊन हा शब्द "काम्हून" अर्थात प्रतिसाद काय म्हणून काढून टाकलात अशा अर्थाने लिहिलेला आहे. कावणे या क्रियापदाचे रूप म्हणून नव्हे असे दिसते.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
ओह शक्य आहे.
ओह शक्य आहे.
एकतर्फी
मूळ लेख खूपच एकतर्फी वाटला.
अॅमेझॉन लोकांना राबवून घेते, त्यांच्यात work life balance हा प्रकार फारसा नाही किंवा त्यांची targets फारच आक्रमकरित्या आखलेली असतात इ. गोष्टी लोकांकडून ऐकल्या होत्या.
पण लेखात वर्णन केलेली open hostility, दोन टीममधला उघड् संघर्ष, एकमेकांना लागेल असल्या भाषेत बोलणं - हे सार्वत्रीकरण केल्यासारखं आहे.
वैयक्तिक बाबींमुळे कामातील रेटिंग कमी मिळणं इथवर ठीक आहे, पण बाकी सगळं शितावरून भाताची परीक्षा केल्यासारखं वाटलं.
.
बाकी अॅपल, अॅमेझॉन इ. राबवून घेणार्या कंपन्या म्हणून प्रसिद्ध आहेतच. मायक्रोसॉफ्ट, फेसबुक , गूगल इ. आपल्या लोकांची काळजी घेतात आणि work life balance वगैरे वर लक्षही देतात.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
असेच
मलाही लेख खूपच एकतर्फी वाटला. विशेषतः कॅन्सर पेशंट, जन्मतः दगावलेले बाळ, आजारी वडिलांची काळजी वगैरे उदाहरणे घेऊन लेख खूपच मेलोड्रामाटिक केलाय. लेखावरील प्रतिक्रियाही चांगल्या आहेत. अनेकांना अशी गळेकापू स्पर्धा, बदललेली कार्यसंस्कृतीही हे वास्तव स्वीकारायला जड जातंय.
मात्र २ दिवसांत शिपिंग / २५ मिनिटांत सेम-डे शिपिंग / १०० डॉलर प्रतिवर्षाच्या दरात स्वतःची वेबसाईट वगैरे 'सामान्य ग्राहकाला' अाकर्षित करणाऱ्या गोष्टीमागची ही एक सत्यकथा आहे. (वॉलमार्ट-अॅपल-फॉक्सकॉन यांच्या चीनमधील ब्लू कॉलर कर्मचाऱ्यांची अवस्थातर याहूनही बिकट आहे.)
जेफ बेझोची प्रतिक्रिया इथे http://www.nytimes.com/2015/08/18/technology/amazon-bezos-workplace-mana...
एका अॅमेझॉन कर्मचाऱ्याचे प्रत्युत्तर वाचले.
https://www.linkedin.com/pulse/amazonians-response-inside-amazon-wrestli...
एक्स अॅमेझॉन कर्मचाऱ्याची प्रतिक्रियाही मनोरंजक
https://www.linkedin.com/pulse/ex-amazonians-reply-all-those-amazonian-r...
बाप रे! प्रचंड पिळवणूक चालते
बाप रे! प्रचंड पिळवणूक चालते असे या लेखावरुन वाटते. न्यु यॉर्क टाइम्स ला झोंबेल असं काहीतरी अॅमॅझॉनने केलेले दिसते. एकदम पेटूनच हा लेख टाकलाय.
एकांगीच वाटला मलाही.
तुमच्या प्रश्नाचे नेमके उत्तर इथे आहे
तुमच्या प्रश्नाचे नेमके उत्तर इथे आहे
ओहो! शक्य आहे. The Internet
ओहो! शक्य आहे.
बेझोस ने काहीतरी करुन कागदी वर्तमानपत्रांना पुनरज्जीवन द्यावं. सध्या किंमती फार वाढल्यात वृत्तपत्रांच्या.
असंच वाटतंय
न्यूयॉर्क टाईम्समधल्या कुणीतरी प्रभावशाली व्यक्तीच्या शेपटावर अॅमेझॉनने पाय दिलेला दिसतोय. (एखादी वस्तू उशीरा डिलीवर झाली की काय?)
न्युयॉर्क टाईम्स चे अॅमेझॉन शी असलेले युद्ध बरेच दिवस चालू आहे.
न्युयॉर्क टाईम्स चे अॅमेझॉन शी असलेले युद्ध बरेच दिवस चालू आहे.
हे आश्चर्यजनक नाही व नसावे. स्पर्धक आहेत. एकमेकांना ठोकायचा प्रयत्न करणारच.
मी ही बातमी ३ दिवसापूर्वी
मी ही बातमी ३ दिवसापूर्वी हॅकर न्यूजवर वाचली. तिथे लोकांनी लिहिलेल्या कॉमेंट्स पण वाचण्यासारख्या आहेत.
होय कमेन्टस रोचक आहेत.
होय कमेन्टस रोचक आहेत.
मस्त
मस्त कमेंट्स आहेत. न्यूयॉर्क टाईम्सचे हितसंबंध दुखावल्यामुळे असा लेख आलाय की काय अशी शंका आली. माझे कॉलेजमधले दोन सीनियर आणि एक एक्स कलीग गेल्या सात-आठ वर्षांपासून तिथे काम करताहेत. त्यांच्याशी सहज बोललो तर त्यांना लेखात दाखवलंय इतकं विचित्र वातावरण जाणवलं नाही. अॅमेझॉनचे एकूण दीड लाख कर्मचारी आहेत. केवळ ४०-५० जणांशी बोलून इतकं प्रचंड जनरलायझेशन करणं चुकीचं वाटलं.
मला हा लेख आधी दिसला म्हणून
मला हा लेख आधी दिसला म्हणून थोडी उचकपाचक केली.
Amazon Chief Says Employees Lacking Empathy Will Be Instantly Purged
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एक्स-अॅमेझॉन
माझ्या एका माजी अॅमेझॉनियन मित्राची ह्या वादावरची प्रतिक्रिया (तो ओव्हरअचिव्हर होता आणि प्रचंड फ्रस्ट्रेट होऊन त्यानं अॅमेझॉन सोडली) -
मी कुणाला रडताना कधी पाहिलं नाही, पण लोक रडत असत हे खरं आहे. वातावरणात प्रचंड ताण असे. नोकरीला लागल्यावर जवळपास लगेचच मला झालेला साक्षात्कार - आपले इथे कधीही कुणीही मित्र होऊ शकणार नाहीत (इतकी चुरस आहे).
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सुविख्यात व्हेंचर कॅपिटलिस्ट
सुविख्यात व्हेंचर कॅपिटलिस्ट मार्क अँड्रीसन यांची रीट्वीट. अॅमेझॉन मधल्या "वर्क लाईफ बॅलन्स" बद्दल चाललेला आरडाओरडा कसा मजेशीर आहे त्याबद्दल -
.
image hosting no sign up
================================================================
अॅमेझॉन ची स्टॉक प्राईस चा चार्ट -
माझ्या माहीतीनुसार अॅमेझॉन मधे इसॉप/Amazon Restricted Stock Units आहे.
गेल्या दहा वर्षांत स्टॉक प्राईस दहापट गेलेली आहे.
.
.
screen capture windows
You Really Don’t Need To Work So Much
या वरवरच्या विसंगतीचा विचार करणारा एक लेख.
फारच इंट्रेष्टिंग. यावर
फारच इंट्रेष्टिंग. यावर विस्तृत लिहिणारी पुस्तकं आहेत का?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
लेख आवडला
छान लेख आहे.
ह्या लेखाचा संदेश - return to
ह्या लेखाचा संदेश - return to the goal of efficiency in work—fulfilling whatever needs we have, as a society
हा लेख या संदेशाच्या विपरीत आहे. या लेखात शून्य इफिशियन्सी आहे. कोणतीही नवीन insight पुढे न आणता १०४४ शब्दांचा ढीग रचणारा लेख.
-----
Those who happen to love it, do join Amazon and when they realize that the internal environment is not conducive they LEAVE and join some other organization.
ज्यांना हे असे वर्क एन्व्हिरॉनमेंट आवडत नाही ते इतरत्र नोकरी पाहतात.
----
अगदी मारुनमुटकून insight काढायचीच म्हंटले तर ह्यात - त्याने - whatever needs we have, as a society - असा सामाजिक बांधिलकीचा उच्च संदेश देऊन टाकलेला आहे.
पॉईंटर्स
हे असलं बायनरी ("र्हायचंय तर र्हा, नायतर चालू लागा") संकेतस्थळीय सुलभीकरण झालं. प्रत्यक्षात असा माज कुठल्या कंपनीला सातत्याने परवडेल असं वाटत नाही. (उदा.) जेफ बेझोसनेही टाईम्समधल्या लेखाची घेतलेली दखल, हे याचेच किंचित उदाहरण म्हणता येईल.
तसा संदेश लेखात दिसला नाही. शिवाय प्रत्येक लेखाने सुलभ उत्तराचा पेढा आयता पुढे केलेल्या हातावर ठेवायला हवा, असं थोडंच आहे? (याच लेखात, एलिझाबेथ कोल्बर्टच्या लेखाकडे आणि पर्यायाने “Overwhelmed: Work, Love, and Play When No One Has the Time” या पुस्तकाकडे निर्देश आहे.) एखाद्या गोष्टीच्या अनेक पैलूंपैकी एकाकडे निर्देश करण्यासाठी हजार शब्द फार नसावेत.
हे असलं बायनरी ("र्हायचंय तर
प्रत्यक्षात असा माज कुठल्या कंपनीला सातत्याने परवडेल असं वाटत नाही. - हेच सत्य आहे. न परवडण्यामागे स्पर्धा प्रक्रिया हे एक (एकमेव नव्हे) कारण आहे.
म्हणूनच तर म्हणतो की बायनरी हा तुम्ही निर्माण केलेला जुमला आहे. वस्तुतः निर्णय हा बहुपर्यायीच आहे. फक्त तुम्ही तो विनाकारण बायनरी आहे असे भासवता आहात.
--------
थेट संदेश नाही.
पण लेखात कै दम नाही.
बाकी एलिझाबेथ कोल्बर्ट च्या पुस्तकाचे वाचन केले की मत व्यक्त करेन.
बायनरी हा तुम्ही निर्माण
उल्टी मायनिंग इंडस्ट्री ई.पी.ए. को डाँटे? :). आपल्या प्रतिक्रियांतील सरसकटीकरण, सुलभीकरण, बायनरी विधानं आणि अॅड होमिनेमगिरी यांची उदाहरणं इथे देत बसत नाही, कारण चर्चेचा मुद्दा वेगळा आहे.
वाढलं की नाही अनावश्यक काम?
आपल्या प्रतिक्रियांतील
चर्चेचा मुद्दा माझ्या मते हा आहे की - अॅमेझॉन मधे वर्क एन्व्हायन्मेंट खूप प्रचंड प्रेशर असलेले आहे व ते समस्याजनक आहे - असे अनेकांचे म्हणणे आहे.
अॅमेझॉन मधे काम करणे अथवा न करणे हे बायनेरी नाही. १) काँट्रॅक्ट जॉब करणे (ज्यात कामाचे तास फक्त ८ असतील व पगार प्रतिघंटा रेट ने दिला जाईल, पण स्टॉक ऑप्शन्स मिळणार नाहीत), २) प्रदीर्घ काल फुल्लटाईम-एम्प्लॉयी (यात खूप प्रेशर असेल हे मान्य पण अॅमेझॉन स्टॉक ऑप्शन देते. व कर्मचारी ते घेतात व कमवतात सुद्धा.), ३) पार्ट टाईम काम करणे, ४) अॅमेझॉन मधे चार/पाच वर्षे (अत्यंत प्रेशर असलेले असूनही) काम करणे, (तसेच स्टॉक ऑप्शन्स चा लाभ चार/पाच वर्षांसाठी मर्यादित प्रमाणावर घेणे) अनुभव मिळवणे व नंतर दुसरीकडे नोकरी पाहणे, ५) अॅमेझॉन ही काही एकमेव एम्प्लॉयर नाही जगात. अनेक कंपन्या अशा आहेत की जिथे कामाचे वातावरण नॉर्मल्/प्रोफेशनल आहे - तिथे नोकरी पाहणे.
मूळ मुद्दा हा आहे की कर्मचार्याच्या प्रेशर घेण्याच्या आवडीनुसार व कुवती नुसार त्याने नोकरी मिळवावी व विश्लेषण करताना कर्मचार्याचे / संभाव्य कर्मचार्याचे रियलिस्टिक आल्टर्नेटिव्ह्ज लक्षात घेतले जावेत. विश्लेषण करणार्याने आपले प्रेफरन्सेस व अॅमेझॉन च्या कर्मचार्याचे प्रेफरन्सेस एकच आहेत असे समजू नये. जर त्या लोकांवर कोणतीही बळजबरी होत नसेल तर ते तिथे का जातील ???
मला फक्त हे सांगा की अॅमेझॉन मधे नोकरी करणे हे कसे बहुपर्यायी आहे हे जे मी वर विशद केलेय ते रियलिस्टिक आहे की नाही ?? का बायनेरी असूनही गब्बर ते बहुपर्यायी आहे असे दाखवतोय ??
------
- हे सत्य आहे हे मी मान्य केलेले आहेच. त्यामुळे Amazon will be forced to compete for workers in the labor market and as that competition becomes more and more real - it will have to change its practices in order to arrest potential attrition.
लेख आवडला.
येस्स्स हीच विसंगती नंदन तुमच्या लेखात दाखवलेली आहे.
.
लेखात वेगळाच दृष्टीकोन मांडला आहे, अनेक अदृष्य घटक विचारात घेऊन एक वेगळी इनसाइट दिली आहे. उदा - खरं तर टेक्नॉलॉजीमुळे काम कमी झालेली असूनही, जितकं काम आपण लोकांकडून करवुन घेऊ शकू तितके आपण यशस्वी ...... ही सूजवट कल्पना. सूजवट कारण मूळात एक्स्ट्रा तासांची गरज आहे की नाही या उद्देशालाच पलटी दिली आहे.
.
हाय टेक्नॉलॉजीमुळे सर्व कर्मचारी हे २४ तास रीचेबल असणे - हा एक दैत्य
.
तीसरं साक्षात कर्मचार्यांची सुजवट कल्पना की अरे मी जास्त तास काम करतो = मी खूप बिझी आहे = मी यशस्वी आहे.
.
असे काही आऊट ऑफ बॉक्स मुद्दे जे हार्डली कोणी विचारात घेतो, या लेखात मांडले आहेत.
__________
नंदन, हा हायलाइटेड अॅनॅलिसिस तर ऑन्साइट-ऑफशोअर मॉडेलच्या बाबतीत इतका चपखल खरा आहे ना की अक्षरक्षः स्क्वेअर पेग इन स्क्वेअर होल.
महाराष्ट्र भूषण
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान.
मात्र एकंदरीत पुरस्कारावरुन सुरु झालेल्या रणधुमाळीत अत्यंत मजा आली. शिवाजीमहाराजांची हिंदुत्त्ववाद्यांना सोयीस्कर ठरेल अशी सावरकरांनी मांडलेली गोब्राम्हणप्रतिपालक प्रतिमा उभी करणाऱ्या पुरंदरेंना सुरुवातीला आव्हाडासारख्यांनी विरोध केल्यामुळे, विरोध करणारे सगळेच लोक, पुरंदरेंना जातीमुळे विरोध करत आहेत अशी आवई उठली. गिरीश कुबेरसारख्यांनी त्यातल्या त्यात जमेल तसे पुरोगाम्यांना झोडपून घेतले. वास्तविक पहिला पुरस्कार मिळालेल्या पु.ल. देशपांड्यांपासून प्रामुख्याने ब्राम्हणांनाच हा पुरस्कार मिळाला आहे याकडे दुर्लक्ष करुन पुरंदरे ब्राम्हण असल्यामुळेच त्यांना पुरस्कार देण्याला 'तथाकथित' पुरोगाम्यांकडून विरोध होतोय अशीही हाकाटी सुरु झाली. (गंमत म्हणजे हिंदुत्त्ववाद्यांचे मेरुमणी ठाकरे यांनी पु.लं.ना जसाकाय स्वतःच्या खिशातूनच पुरस्कार दिलाय अशा थाटात 'झक मारली' असा अपमानही केला होता. त्यावेळीही हे शिंचे पुरोगामीच पु.लं.ची पाठराखण करत होते.) असं ध्रुवीकरण होणं भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी सगळ्यांच्याच सोयीचं असल्याने नावापुरती थोडी झटापट झाली. वास्तविक शिवाजीच्या राज्यस्थापनेमागची प्रेरणा, मलिक अंबर, शहाजी, मराठेशाहीचे एकंदर स्वरुप, शिवाजीच्या सैन्यात आणि एकंदर राज्यात (मुसलमानांसकट) अठरापगड जातींचे योगदान अशी संपूर्ण सांगोपांग चर्चा होण्याऐवजी केवळ संकेतस्थळीय चर्चा झाल्याने प्रचंड मनोरंजन झाले.
अखेरीस पुरस्कार सोहळा आजरोजी संपन्न झाला. पुरंदरे यांचे अभिनंदन.
जसाकाय स्वतःच्या खिशातूनच
नेमके
वेगवेगळ्या रंगातला शिवाजी
पुरंदरेंना पुरस्कार मिळाल्याचा आनंदच आहे. हा त्यांच्या कार्याचा यथोचित सत्कार आहे.
मला वाटतं 'काहिंसाठी' महाराजांना वेगवेगळ्या रंगात रंगविल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमची भूमिका जातीय नाही - मुक्ता दाभोलकर
दाभोलकर\पानसरे यांच्या मते शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष आहेत. त्यांचा मुद्दा "शिवाजी महाराज मुसलमानांचा द्वेष करणारे नसून, हिंदूंचे राज्य निर्माण करणे हा त्यांच्या स्वराज्यनिर्मितीचा हेतू नव्हता.....शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शाहिरीतून निर्माण झालेली शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या राजकारणासाठी वापरता येईल हे जोखून, ही शाहिरी प्रतिमा म्हणजे शिवाजी महाराजांच्या वास्तवातील राजकीय भूमिका आहेत, असे भासवून त्या आधारे महाराष्ट्रात जे राजकारण केले गेले व जात आहे त्याला आमचा विरोध आहे..... शिवाजी महाराजांची मुसलमानविरोधी प्रतिमा रंगवून त्याचा राजकारणासाठी वापर करणे हे आमच्यासाठी जसे निषेधार्ह आहे तसेच समाजातील जातीय तेढ वाढविण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणे हेही आमच्यादृष्टीने निषेधार्ह आहे."
या सगळ्यात कुरुंदकरांनी रंगवलेले महाराज मला जास्त आवडतात. त्यात 'शिवाजी' एकेरी येतो. त्यात नाटकीय रुपांतरणाला थारा नसतो, तिथे शिवाजी नुसताच गनिमिकावा करणारा नसतो पण दगाफटका करणारा धूर्त पण असतो आणि सर्वात जास्त आवडलं ते, शिवाजी आपला (नायक) आणि औरंगजेब त्यांचा (खलनायक) अशी विभागणी नसते तर शिवाजी एका प्रवाहाचं प्रतिनिधित्व करणारा नायक असतो तर औरंगजेब दुसर्या प्रवाहाचं नेतृत्व करणारा नायक असतो. अशा तिसर्याच नजरेतून ओळख करून दिलेला शिवाजी मला अजून उठून दिसतो. कारण तो माणसासारखा माणूस असतो. भवानीमातेने तलवार दिलेला जादुगार नसतो. पानसरेंच्या दाव्यानुसार शिवाजी महाराज कदाचित मुसलमानांचा द्वेष करणारे नसतीलही पण त्याची कारणं राजकीय असली पाहिजेत. (एकाचवेळी निजामशाही, कुतुबशाही आणि मोघलाईंना आव्हान देणे व्यावहारीक पण नसावे) पण त्यांचे राज्य हिंदवी होते हे नाकारण्यात अर्थ नाही. ह्याचे स्पष्टीकरणही (गोब्राह्मण प्रतिपालक) कुरुंदकरांनी दिले आहे. कुरुंदकरांनी हेही म्हटलं आहे की, महाराज पण काळाची निर्मिती होती. त्यांच्या काळात स्त्रियांचे हक्क, अस्पृष्यता निर्मूलन असे प्रश्न येत नसतात. त्या मर्यादा दाखवूनही कुरुंदकारांनी रंगविलेली प्रतिमा खूप मोठी वाटते.
शिवाजी कोण होता
पानसरे यांची 'शिवाजी कोण होता' ही छोटेखानी पुस्तिका जिज्ञासूंसाठी खालील दुव्यावर उपलब्ध आहे. 'गोब्राह्मणप्रतिपालक', शिवाजी आणि मुसलमान आदी मुद्द्यांवर पानसरे यांची मते पुरंदरेंपेक्षा खूपच वेगळी आहेत.
https://drive.google.com/file/d/0B0KVaFAoUh0MUHhUZ3F3dDJFVHc/view
धन्यवाद
पुस्तक वाचायचा विचार होताच. तुम्ही फुकटात उपलब्ध करून दिलेत. अघाशासारखे चाळले. पान नं २३ ते ४३ (पिडीएफ ३० ते ४९) "धर्मश्रद्ध पण धर्मद्वेष्ठा नव्हे" ह्या पाठातल्या विचारांचे खंडन करणे कठिण आहे. किंबहूना तो दृष्टिकोन योग्य असावा. असं आता वाटू लागलं आहे. विचारांचा प्रतिवाद करता आला नाही म्हणून त्यांचा बळी गेला का?
मी फक्त दुवा दिलाय
मी फक्त दुवा दिलाय. पुस्तक कुणी अपलोड केलंय याची कल्पना नाही.
टोलविरोधी आंदोलनाची बातमी
टोलविरोधी आंदोलनाची बातमी पहा.
अन असे पुस्तक लिहिल्याने गोळी घातली असेल तर इतकी वर्षे गोळ्याघालू लोक्स झोपले होते का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अन असे पुस्तक लिहिल्याने गोळी
शॉल्लेट.
१९८८ ते २०१० या कालात अनेक आवृत्त्या निघाल्या त्या पुस्तकाच्या - असे पुस्तकातील पृष्ठ क्र. ४ वरून दिसते.
अन असे पुस्तक लिहिल्याने गोळी
पानसऱ्यांच्या बाबतीत ही शक्यता कमीच असावी. पण हुसेनच्या चित्रांच्या बाबतीत सनातनी लोक्स झोपलेच होते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नेमका मुद्दाम हुसेनचा मुद्दा
नेमका मुद्दाम हुसेनचा मुद्दा इथे उकरून काढलाच आहात तर मग मुलायमबद्दल काही बोलल्याने किणकिणीची किंचाळी होऊ नये, कसे? नै म्हणजे एकच गोष्ट आपण केल्यावर अन दुसर्याने केल्यावरचा वेगळा न्याय, बाकी काही नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
टोल
टोलच्या मुद्द्यावरुन त्यांचा बळी गेलाय असं वाटतंय.
टोल
टोल विरोधी आंदोकलनाने बळी गेला आसेलही. काही कल्पना नाही. पुस्तकाचे पहिले प्रकाशन १९८८ मधले आहे ही बाब अनवधानाने पहायची राहून गेली.
अशोक राजवाडे नामक गृहस्थांचं
अशोक राजवाडे नामक गृहस्थांचं आज लोकसत्तेत आलेलं पत्र:
इतिहासाचं आपलं आकलन कसं असावं?
बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार नाहीत याबद्दल टीकाकारांना कधीच शंका नव्हती. कारण इतिहासाची साधनं शोधून/ तपासून त्यांच्या आधाराने सत्यान्वेषण करण्याऐवजी शाहिरी करणं हा पुरंदरेंचा ध्यास आहे. आपण इतिहासकार नसून शाहीर आहोत हे स्वत: बाबासाहेब प्रामाणिकपणे मान्य करतात. शिवाजीची लोकप्रियता वाढवणं आणि त्याला ्रूल्ल बनवणं हे काम अनेक र्वष मोठय़ा निष्ठेने बाबासाहेबांनी केलं; पण यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीत नेमकी काय भर पडली हे कोणी समजावून सांगेल काय? उलट शिवाजीच्या नावाचा (गर)वापर करून ज्या संघटना इथे निर्माण झाल्या त्यांनी देशपातळीवर आपण अधिकच बदनाम झालो. उद्दाम, आडदांड आणि फॅसिझम प्रेरित संघटना हे जर अशा प्रयत्नांचं फलित असेल, तर आपलं मुळातच काही तरी चुकतं आहे असं म्हणावं लागेल. पुरंदरेना हात लावला तर मी तांडव करीन, हे राज ठाकरे यांचे उद्गार अशाच संस्कृतीचं फलित आहे. शिवाजीचं योग्य आणि परखड मूल्यमापन करूनही त्याला आदराचं स्थान देणाऱ्यांची (उदा. शेजवलकर) आपल्याकडे कमतरता नाही, तर दुसरीकडे सर जदुनाथ सरकार यांच्यासारख्यांनी शिवाजीबद्दल फारसे कौतुकाचे उद्गार काढलेले नाहीत आणि त्याबद्दल अनेक टीकाकारांनी त्यांना धारेवर धरलं आहे.
वाईट भाग असा की, शिवाजीचं नाव घेऊन ज्या काही (आणखी नव्या) आडदांड, जातीयवादी, खुन्नसप्रमुख आणि मोडतोडप्रधान संघटना इथे जन्माला आल्या त्यांच्याकडे लक्ष वेधून घाऊक प्रमाणात 'पुरोगामी' नावाच्या एका सबगोलंकारी समूहावर निशाणा साधण्याचं काम पुढे सुरू आहे. ही घटना राष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या प्रक्रियेचा एक महाराष्ट्रीय आविष्कार आहे. सुदर्शन राव, गजेंद्र चौहान, दीनानाथ बात्रा यांना जसं 'पुरस्कृत' केलं जातंय तसं दुसरीकडे बाबासाहेब पुरंदरे वा तत्सम शिवकीर्तनकारांना मानमरातब बहाल करून ते 'जणू काही' इतिहासकार आहेत अशी आभासी वातावरणनिर्मिती सुरू आहे. ऐतिहासिक कालखंडाबद्दल सामान्य कादंबऱ्या आपल्याकडे निर्माण झाल्या आहेत आणि त्यांना मोठी मान्यता आहे. (इतिहासाच्या विषयावर कादंबरी कशी लिहावी याचा उत्तम वस्तुपाठ 'अंताजीची बखर' या नंदा खरे लिखित कादंबरीत आहे; पण अशी उदाहरणं दुर्मीळ.) प्रगत देशांतल्याप्रमाणे जनतेचा इतिहास लिहिण्याच्या परंपरा आपल्याकडे नाहीत हे दुर्दैव आहे. अन्यथा चित्र वेगळं दिसलं असतं आणि इतिहासाला किती चित्रविचित्र आणि वेगळे कंगोरे असतात हे समजलं असतं. अर्थातच असं होण्यात काहींना अजिबात रस नाही. काहींना शिवाजी नावाचा एक 'गोब्राह्मण प्रतिपालक' हवा आहे, तर दुसऱ्या काहींना तो 'क्षत्रिय कुलावतंस' हवा आहे. एकुणात शिवाजी नावाचा एक 'िहदू महापुरुष' हवा आहे आणि अशा साच्यात शिवाजीला बसवण्यात त्यांना रस आहे. शिवाजीवर याहून मोठा अन्याय दुसरा नसेल.
दुर्दैवाने या वादाला जातीय स्वरूप आलेलं आहे ही गोष्ट गंभीर आहे; पण पुरंदरेंच्या एकूण शाहिरीला होणारा विरोध हा नुसताच जातीय पातळीवरचा नाही. एकूणच इतिहासाचं आपलं आकलन कसं असावं याविषयी काही गंभीर मुद्दे त्यात आहेत.
अशोक राजवाडे, मुंबई
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
पत्रलेखकाचा दृष्टिकोन रोचक
पत्रलेखकाचा दृष्टिकोन रोचक आहे. पण -
१. फक्त मनाला येईल त्या गोष्टी शिवाजी महाराजांविषयी खपवून शाहिरीच करायची असती तर बाबासाहेब कशाला भारतीय इतिहास संशोधक मंडळात काम करत असते? किंवा जुनी कागदपत्र मिळवायला कशाला हिंडले असते? त्यांचा शिवरायांबद्दल त्यांनी गोळा केलेल्या ऐतिहासिक माहितीचा/दस्तैवजांचा वापर करण्याबद्दलचा दृष्टिकोन कसा आणि काय होता याबद्दल मतमतांतरे असू शकतात, पण डायरेक्ट 'कारण इतिहासाची साधनं शोधून/ तपासून त्यांच्या आधाराने सत्यान्वेषण करण्याऐवजी शाहिरी करणं हा पुरंदरेंचा ध्यास आहे.'?
२. नंतरच्या पब्लिकने शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर केला ह्यात बाबासाहेबांचा दोष काय आहे हे समजलं नाही.
३. आणि शिवचरित्रापासून जितके लोकं अस्मितांच्या राजकारणाला लागले त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक थोडे तरी चांगल्या प्रकारे इन्स्पायर झाले असतील असं म्हणायला वाव आहे.
४. शिवाय 'आपल्या संस्कृतीत काय भर पडली?' हा प्रश्नही हास्यास्पद आहे. एखाद्या प्रदेशातले महापुरुष त्या त्या प्रदेशातील संस्कृतीचाच भाग नसतात काय? आणि मग अशा कर्तृत्ववान लोकांच्या कार्याची लोकांना शाहिरी पद्धतीने का होईना ओळख करून द्यायचं काम मोठं नाही का?
हे फक्त तुम्हांला उद्देशून
हे फक्त तुम्हांला उद्देशून नाही. गैरसमज नसावा. पण हल्ली असं वाटतं की कोणत्याही गोष्टीच्या काही भागाला आपला विरोध आहे आणि काही विशिष्ट अंगाना पाठिंबा आहे किंवा आपलं त्याबाबत विशेष मत नाही - या प्रकारची गुंतागुंत समजून घेण्याच्या परिस्थितीतच कुणी नाही. हे किंवा ते. आमच्यासोबत नसाल, तर आमच्याविरोधात. त्याला विरोध करता, म्हणजे तुम्ही अमुक.
असं का होतं आहे?
शाहिरीचं काम कमी महत्त्वाचं नाही. योग्य त्या ऐतिहासिक पुराव्यांचा शोध घेऊन जबाबदारीनं केलेली शाहिरी तर अतिशय आवश्यक आणि महत्त्वाची आहे. कारण संशोधन - विचारमंथन - विश्लेषण जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते समाजातल्या प्रत्येक थरापर्यंत योग्य त्या अविकृत स्वरूपात पोहोचवणंही महत्त्वाचं आहे. पण शाहिरी आणि इतिहासाभ्यासक या दोन भूमिकांमध्ये (किंवा रसिकमान्य दिग्दर्शक आणि लोकप्रिय दिग्दर्शक, किंवा योगासनासारखा आरोग्यपूर्ण व्यायामप्रकार आणि भारतीय संस्कृतीचा एकमेवाद्वितीय हिंदू वारसा) जेव्हा गल्लत सुरू होते, तेव्हा ते हेतुपुरस्सर आहे का, जर तसं असेलच तर हे हेतू कोणते, त्यांना विरोध करणार्याचं कोणत्या पातळीवर जाऊन हनन करण्यात येणार आहे, त्याची विरोधाची भूमिका किमान ऐकून तरी - समजून तर जाऊच दे - घेतली जाणार आहे की नाही, असे प्रश्न उभे राहतात.
निष्कर्षांवर न पोचता आपण हे प्रश्न का ऐकत नाही आहोत?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हे किंवा ते. आमच्यासोबत नसाल,
असं वाटत नाही. तुम्ही म्हणताय तितकं ध्रुवीकरण तर अज्जिबातच झालेलं दिसत नाही (निदान सुशिक्षित समाजात तरी). नाहीतर ऐसीवरच प्रतिसादांची संख्या आणि पर्यायाने संपादकांचा व्याप कितीतरी वाढला असता.
बर्याचदा आपलं काही मत नाही म्हणून बरेच (निदान माझ्यासारखे तरी) लोक गप्प बसत असावेत असं वाटतं (माझ्याजवळ विदा नाही). बाकी गजेंद्र चौहान, बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या ध्रुवीकरण होऊ शकणार्या विषयांबद्दलही सम्यक मते असणारे अनेक लोक माझ्या माहितीत आहेत. तुमचा सँपलसेट तपासून पाहा बॉ एकदा
बाकी गजेंद्र चौहान, बाबासाहेब
कसली लोहारकी आहे ही!
किंवा
अतिशय सहमत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इतक्या सुमार कर्तृत्वाचा
इतक्या सुमार कर्तृत्वाचा माणूस महत्त्वाच्या पदी आणून बसवल्यावर त्याला साहजिक विरोध होतो आणि ती नेमणूक गपचूप मागे घेण्याऐवजी त्यावर इतकी घमासान / कंटाळवाणी / संतापजनक चर्चा होते... अजून ध्रुवीकरणाचे काय निराळे पुरावे हवेत? खुद्द खोपकरांसारख्या शहाण्या माणसानंही असली भडक भाषा वापरावी, सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा ठेवणार म्हणा... वाईट चाललं आहे जे चाललं आहे ते.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
भावनाओं को समझा
अहो पण मूळ प्रतिसाद (किंवा ते उद्धृत केलेलं पत्र) बाबासाहेब पुरंदर्यांविषयी होतं ना? मग त्यात गजेंद्र कुठे आला मधेच? शिवाय इतका वेळ मी धर्मराजमुटके गजेंद्रमोक्षासाठी धावून आले असं समजून हा विषय संपला असं मानत होतो. तुम्ही परत त्याला जिवंत केलंत.;-)
असो. तुमच्या क्वोटातील भावनेशी एकंदर सहमत आहे.
ओहो, म्हणजे अणुबाँबचा वापर
ओहो, म्हणजे अणुबाँबचा वापर निरपराध लोकांविरुद्ध करण्यात आल्याने त्याचे तंत्रज्ञान शोधणारे शास्त्रज्ञ दोषी ठरतात तर!!!!!!
या राजवाड्यांचे आकलन पाहून तुफान करमणूक झाली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ओहो, म्हणजे अणुबाँबचा वापर
ही अॅनालॉजी चुकीची वाटते. अणुशक्तीचा वापर फक्त बॉम्ब म्हणूनच कसा करता येतो हे दाखवणाऱ्या शास्त्रज्ञांना दोष दिलाय असं म्हटलं तर ते सत्याच्या थोडं जवळ जाऊ शकेल.
हीही उपमा चूक आहे कारण
हीही उपमा चूक आहे कारण पुरंदर्यांवर सरळ सरळ हेत्वारोप करणारी आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कैसा जादू बलम तूने डाला ....
madaari who can fool even God
लालूंचे हे वाक्य ऐकून मला आठवलेली गाणी
१) कैसा जादू बलम तूने डाला
२) जादुगर तेरे नैना ... दिल जाएगा बचके कहा ?
३) दिल लूटने वाले जादूगर अब मैने तुझे पहचाना है
४) आग पानी मे लगाते हुए तिलिस्मात की रात ... जिंदगी भर नही भूलेगी वो ...
५) जादूगर कातिल हाजिर है मेरा दिल
६) जा रे जादूगर देखी तेरी जादुगरी
वगैरे वगैरे....
मोदींची स्तुती करायची तर स्तुती करा ना ....
मदत हवी आहे
खालील बातमी वाचून कसेसेच झाले. देव कुणावरही अशी वेळ न आणो. प्लीज कुणाला काही माहीती पुरवता आली तर पहा:
https://www.reddit.com/r/india/comments/3hk0ih/reddit_we_need_your_help_...
पेमेंट बँका
११ पेमेंट ब्यांकांना रिझर्व्ह ब्यांकेने परवाने दिले आहेत. ह्या बातमीत दिलेले सगळे फायदे कितपत प्रत्यक्षात येऊ शकतील?
ह्या बँकांमुळे डीपॉझिटर्स ना
ह्या बँकांमुळे डीपॉझिटर्स ना काय फायदा होणार आहे ते विचार करुन पण कळले नाही.
मला जर नविन अकाउंट उघडायचे असेल किंवा मुदत ठेव करायची असेल तर मी ह्या बँकाकडे का जावे?
ह्या बँकांना लास्ट माईल पर्यंत जाणे म्हणे शक्य होइल, मग सध्याच्या बँकांना का होत नाही?
मुलायमसिंग यांचे बलात्कारावर अजून एक धक्कादायक विधान
समाजवादी पार्टी प्रमुख मुलायमसिंग यांचे बलात्कारावर अजून एक धक्कादायक विधान
मुलायमसिंग यांचे मते 'गँगरेप अशक्य असतो. ते प्रॅक्टीकली शक्य नाही! एक जण बलात्कार करतो आणि इतर ३ जणांना त्यात गोवण्यात येते'.
मुलायम सिंगांसारख्या वयाने मोठ्या राजकीय नेत्याच्या असल्या विधानाचे काय अर्थ होतात?
- त्यांची बुद्धी भ्रष्ट होतेय?
- उत्तर प्रदेशातील रेपचे गुन्हे झालेलेच नाहीत; ते सर्व सपा सरकारच्या बदनामीचे कुभांड आहे असे त्यांना सांगायचे असेल?
- यापूर्वीची त्यांची या विषयावरील मते (मुक्ताफळे) 'बच्चे है, उनसे गलतीयां होती रहती है.." किंवा "लडकी- लडके की दोस्ती होती है, फिर उनकी आपस में नही बनती, तो रेप का केस डाल दिया जाता है.." इ. पाहता हा कांही पॅटर्न आहे का? बलात्काराला ते फारसा गंभीर गुन्हा मानत नसावेत का?
- मुलायम सिंग यांनी व्यक्त केलेले मत किती लोकांना पटण्यासारखे आहे?
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
हे वाक्य हिंदुत्ववादी
हे वाक्य हिंदुत्ववादी नेत्याकडून आले असते तर अख्खा मीडिया नवचैतन्याने कामाला लागला असता.
संभाव्य आक्षेपः आयडिऑलॉजीच्या नावाखाली बलात्काराचे ट्रिव्हियलायझेशन होतेय हे.
उत्तरः ज्यांनी ट्रिव्हिअलायझेशन केले त्यांच्याकडे सिलेक्टिव्हली दुर्लक्ष करणार्यांना असे बोलायचा मॉरल हक्क नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे वाक्य हिंदुत्ववादी
बरोबरच आहे. मुलायमसिंग सारख्या लोहीयाच्या चेल्याला, जेपींच्या भाल्याला आणि पक्षाचे नाव सुद्धा समाजवादी ठेवणार्या थोर्थोर समाजवादी जे काही बोलेल ते बरोबरच असणार.
काही महान लोकांना गज्जुभाऊ फारच टोचतात अगदी टोळधाड आली असे वाटते पण त्यांनी कधी लालू आणि मुलायल मुख्यमंत्री कसे झाले ह्या बद्दल पत्रप्रपंच केला नाही. युपी बिहार फार लांब राहीले, भली भली थोर मंडळी राज्याचा गाडा चालवत होते, तेंव्हा सुद्धा त्यांना काही बोचले नाही आणि कधी त्यांनी उघडीवाघडी पत्र लिहीली नाहीत.
एकदम परफेक्ट.
एकदम परफेक्ट.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खतरा!
एकदम खतरा! (फार छान यासाठी खास लातूरी शब्द)
माजवादी लोकांनी काहीही बोलले तरी झोला/बिंदी/मेणबत्ती कँपातून कोणीच टीका कशी करीत नाहीत?
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
ह घेणे किंवा न घेणे किंवा कसंही.
पळीपंचत्रपात्री खडखडायला लागली की झोले, बिंद्या, मेणबत्त्यांचे आवाज दबून जात असणार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इथं हे लागू होत नाही, पण!!
पळीपंचपात्रांचा कधीकाळी असलेला इंटलेक्चुअलिटीचा मक्ता झोले, बिन्द्या आणि मेणबत्त्यानी घेऊन बरीच युगं लोटली की आता! बर्याचदा रिकाम्यारानी हाकारे पिटणारे हे सगळे, मुलायम आजोबांची जीभ आणि बुद्धी चळलीय तरी त्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत- ते वैचारिक सोयरिक असल्याने की काय?
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
सर्वांनी निषेधच केला आहे
मी जितक्या बातम्या वाचल्या तिथं सर्वांनी निषेधच केला आहे. मीही इथे निषेध करतो. मुलायमसिंग यांचे नेहमीसारखे अत्यंत हास्यास्पद विधान.
हास्यास्पद + संतापजनक
हास्यास्पद + संतापजनक
महामूर्ख मनुष्य दिसतोय.
महामूर्ख मनुष्य दिसतोय.
अत्यंत हास्यास्पदच नव्हे तर
अत्यंत हास्यास्पदच नव्हे तर संतापजनक विधान!
गेल्या ३-४ सरकारांपैकी उत्तरप्रदेशने मायावतींच्या राज्यात सर्वात चांगली कायदा सुव्यवस्था बघितली असे अनेक जण म्हणणारे भेटायचे तो योगायोग आहे का अशी शंका होती. मात्र अशी बेताल वक्तव्ये बघून ते खरंच असावेसे वाटतेय
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
'न्यूयॉर्क टाइम्स'मध्ये भारत
कालच्या आणि आजच्या 'न्यूयॉर्क टाइम्स'मध्ये भारताविषयी दोन बातम्या आल्या आहेत -
तीस्ता सीतलवड आणि सीबीआय -
Longtime Critic of Modi Is Now a Target
'कोब्रापोस्ट'च्या स्टिंगविषयी -
When Killers Talk, Few in India Seem to Care
यातले काही तपशील धक्कादायक आहेत. तसेच, फुटकळ वादांवर माध्यमे जो वेळ आणि जागा खर्च करतात, आणि अशा बातम्यांकडे जे दुर्लक्ष करतात त्यामागच्या कारणमीमांसेविषयीची टिप्पणीही रोचक आहे.
--
माहितगार
आजचा (मोदी नव्हे लालू!) विनोद
एन्जोय मोदी, सॉरी माडी...
Lalu Prasad's Amusing Mimickry Of Narendra Modi
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कोचीन विमानतळाची सगळी वीज
कोचीन विमानतळाची सगळी वीज सौरऊर्जेतून मिळवणार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
छान बातमी आहे. हा प्रश्न
छान बातमी आहे. हा प्रश्न चूकीचाही असेल पण ढगाळ हवेत (पावसाळा) ते विमानतळ कसे चालेल?
लेखातून plans to sell any
लेखातून
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
नेमके. धन्यवाद.
नेमके. धन्यवाद.