मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०९
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
योग्य की अयोग्य . प्रगल्भ की सुमार
विचार आहे हे मला माहीत नाही .पण एक विचार माझ्या मनात नेहमी येतो.
जरा विस्ताराने सांगतो.
अणू स्फोटाची चाचणी घेतली की संबंधित देशातील नागरिकांना अभिमान वाटतो(हे पुढे असेच समजावे)
१)विनाशिका निर्माण केल्या की देश वासी आनंदी होतात.
३) अतिशय तीव्र क्षमतेचा विनाश करणारी सैन्याची ताकत असली की देश वासिय लोकांना गर्व वाटतो.
४) रोबोटिक सैन्य
५) drone
आणि असे अनंत हत्यार ,सैन्य दलाकडे असावीत.
पोलिस कडे असावीत
असे लोकांना वाटते.
पण हीच सर्व विनाशकारी अस्त्र , शस्त्र, ही दुसऱ्या देश सोडा हुकूमशाही वृत्ती चा नालायक माणूस देशाचा नेता झाला तर स्वतःच्या जनते विरूद्ध वापरेल.
सामान्य जनता त्याला विरोध करू शकणार नाही..
काहीच व्यक्ती करोडो लोकांना गुलाम बनवतील.
हा विचार माझ्या मनात नेहमी येतो.
स्पेस मध्ये राहून काही शे च लोक पृथ्वी वासियांचे मालक असतील असे पण मला नेहमी वाटते.
यांत्रिक मानव बनवणे हा अंतिम उद्देश च नाही.
मानवी मेंदू चे कार्य कसे घडते आणि मानवी मेंदू वर नियंत्रण प्राप्त करून माणसाला नियंत्रित करणे शक्य आहे का?
हाच अंतिम उद्देश आहे .
हाच हेतू बलाढ्य सक्षम लोकांचा आहे.
ही नेहमीच शंका येत असते.
निर्मिती खर्च झीरो आणि फुकटात साधन तयार होईल.
आणि हवं तेव्हा त्याचा विनाश पण करता येईल.
एखादी देवनागरीतली टेक्स्ट फाईल
एखाद्या डिवाइसमध्ये बरोबर दिसते, पण दुसरीकडे पाठवल्यास ब्राह्मी लिपीसारखी अक्षरे दिसतात.
तर Unicode आणि बाइनरीकरण झालेले utf8 वगैरेसंबंधी लेख वाचले. पण प्रश्न असा आहे की अगोदरच्या फाइलमधले encoding कोणते होते व ते दुसरीकडच्या रीडरला न दाखवता येण्याचे कारण शोधता येईल का? म्हणजे कुठेतरी settings बदल करायचे व ते कोणते?
शिवाय एखादी text file - pdf मध्ये बदलू गेल्यास तिकडे विचित्र क्यारेक्टर उमटतात. याचेही कारण शोधायचे आहे.
घेणारच.
इतक्या प्रचंड जनसमुदायास भारून टाकणारा आहे रजिनिकांत. आणि रजिनिकांत फावल्या वेळात हिमालयात सोलो ट्रिपा करतो तेव्हा तो ओळखण्या पलिकडे साधा असतो.
रामदेवबाबा एक प्रामाणिक नम्र माणूस आहे. ( जिथे हार मानायची, पळ काढायचा तिकडे घाबरत नाही.)
झी सारेगम कार्यक्रमात त्याला बोलावले होते मार्गदर्शन करण्यासाठी. अझमत ( पुढे जिंकला) दहा वर्षांचा किरकोळ शरीराच्या गायक मुलाला रामदेव बाबा श्वासाचे महत्त्व सांगू लागला. पण अझमतपुढे त्याने हार मानली. "ये लडका तो मेरे से भी लंबी सास खिंचता है।"
डिवाईस . . .
Android phone.
वेगवेगळ्या app आणि ओनलाईन साईट्समधून conversion करून पाहिल्यावर समजलं की काही ठिकाणी हा प्रकार होतो. zamzar dot com ने व्यवस्थित केली पीडीएफ.१. बाकी आपला मजकूर कोणत्या encoding चा आहे हे समजलं तर बरं होईल. काही notepad editors ते auto detect करतात. ( Unicode/ANSIचे विविध फ्लेवर असतात.)
-------
१ - zamzam स्वर्गातला झरा .
Zamar - हिब्रू भाषेत देवाची स्तुती.
होमिओपथी हा एक स्युडोसायंस
होमिओपथी हे एक स्युडोसायंस आहे हे माझे थोड्याबहुत वाचनानंतर, अभ्यासानंतर झालेले मत होते/आहे. त्यातील तत्वे हास्यास्पद आहेत हे उघडच आहे. तरीदेखिल ही पॅथी आजच्या आधुनिक विज्ञानाच्या बहारीच्या काळात टिकून कशी आहे हा प्रश्न नेहमीच सतावतो. ॲलोपथीचे वर्षानुवर्षे उपचार घेऊनही बरा न झालेला जुनाट आजार होमिओपथीने बरा झाला असे सांगणारे अनेकजण दिसतात. माझ्या वडिलांच्याच बाबतीत असे उदाहरण घडले आणि होमिओपथीबद्दलच्या गुढात भरच पडली. झाले असे, वडिलांच्या उजव्या डोळ्याच्या खाली एक wart (मस सारखा एक उंचवटा) आला, तो उंचवटा वरचेवर वाढतच गेला. तीन चार महिन्यात त्याची वाढ तिप्पट झाली. तोवर ते दुखत नव्हते पण कालांतराने धक्का लागल्यानंतर थोडे दुखु लागले. शिवाय डोळ्याच्या खाली असल्याने नंतर त्रास होऊ शकतो असे वाटून त्वचारोगतज्ञाकडे तपासणीसाठी नेले. तो म्हणाला लेझरने छोटी सर्जरी करून वार्ट काढून टाकावे लागेल. एकादिवसात सगळे होईल आणि थोड्याश्या वेदना होतील, व्रण पडेल, खर्च ५ हजार येईल असे सांगितले. पण कोविडची दुसरी लाट अजून न संपल्याने अश्या प्रकारच्या सर्जरीज अजून चालू झाल्या नव्हत्या. आम्हालाही रिस्क नकोच होती त्यामुळे ३ महिन्यानंतर सर्जरी करून घ्या असे सांगितले. दरम्यान ह्या तपासणीनंतर दीड महिन्यानंतर एका ओळखीच्या गृहस्थाने जवळच्या एका गावात होमिओपथी डॉक्टर आहेत आणि ते अश्या आजारांवर खुप चांगला उपचार करतात असे सांगितले. वडिलांचादेखिल होमिओपथीवर आजिबातच विश्वास नसल्याने ते गेले नाहीत. मात्र अनायासे आठवड्याभरातच एका कामासाठी त्या गावात जावे लागले. तेव्हा बघू तरी काय म्हणतात म्हणून ते त्या डॉक्टरांकडे गेले. त्यांनी साबुदाण्यासारख्या गोळ्यांची एक डबी आणि एक मलम लावण्यासाठी दिले. हा कोर्स २ महिन्यांचा होता. फीज ५० रू आनि गोळ्या व मलम १४० रू. वडिलांनी गोळ्या घ्यायला सुरूवात केली, मलम मात्र कोठे तरी गहाळ झाला. गोळ्या घेऊन २ आठवडे होतात तोवरच त्या गोळ्याचा आकार कमी होत असल्याचे आढळले आणि एका महिन्यानंतर तर चांगलाच जिरला होता. दोन महिन्यानंतर ह्या गोळ्या सम्पल्या तेव्हा आजिबात व्रण न पडता हा गोळा पुर्ण नाहिसा झाला. तर हे कशाने झाले असावे? ह्या गोळ्या घेत असताना इतर कोणतेही उपचार वडिल घेत नव्हते. ह्या गोळ्या कामाला कश्या काय आल्या हे अजूनही समजले नाही. अर्थात ह्या उदाहरणामुळे होमिओपथीबद्दलचे माझे मत बदलले जरी नसले तरी कुतुहल मात्र नक्कीच वाढले आहे.
ॲक्युपंक्चर
माझा असाच अनुभव आहे अक्युपंक्चरचा. एकदा स्टेशनवर अचानक पडले. नी गेव्ह आऊट. तो अर्थ्रायटिक गुडघा होता. ततपश्चात कुबड्याच घ्याव्या लागल्या. फिझिकल थेरपी, एक्स रे सर्व झाले. मी फार धास्तावले होते की हे कायमचे अपंगत्व आले की इतक्या नॉट सो ओल्ड वयात नी रिप्लेसमेन्ट सर्जरी ओढावली.
मग एकदा मनात आले बघू यात हे ॲक्युपंक्चर काय असते ते. ३ सिटिंग्ज (प्रत्येकी ३० मिनीटे) कुबड्या गेल्या, दुखणे ९५% सबसाईड झाले. भयानक कल्पनेबाहेर यश मिळाले.
नंतर एकदा पेरी-मेनापॉजच्या सिंप्टम्स्वरती हीच ॲक्युपंक्चर थेरपी ट्राय केली. उपयोग शून्य!!!
बाकी गंभीर डिसॉर्डरझ्ना नख लावायची हिंमतच नाही. गरजही नाही.
काही प्रश्न
१. मस/गोळा कधीपासून दिसू लागला आणि किती दिवस वाढत होता नेमका?
२. त्वचारोगतज्ज्ञाचे निदान काय होते? (निदानाशिवाय फक्त उपचारच कसे सांगितले?) त्याने कारणे कोणती सांगितली? त्याला तुम्ही पर्यायी उपचार कोणते हे विचारले का? सर्जरी हाच अंतिम उपाय आहे असे तो म्हणाला का किंवा तुम्ही तशी समजूत करून घेतली? तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात दाखवण्याचा विचार केला होता की सर्जरी करावीच यावर तुम्ही ठाम राहिलात? कोविड व्यतिरिक्त अजून दुसरे कारण नसावे ना?
३. होमिओवैद्याने गोळ्या निनावी दिल्या असतील असं गृहीत धरून, त्याने मलम कोणते दिले होते हे सांगता येईल का? तुम्ही त्या मलमातील घटक तपासले का? गहाळ झाल्यावर तुम्ही नवीन मलम का आणले नाही/ मलम लावणे must नव्हते असे होमिओवैद्याने सांगितले होते का? नाही सांगितले तर तुम्ही मलम लावणे का बंद केले?
४. तुमच्या वडिलांना कोविड झाला होता का? तो गोळा कमी झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे आलेला विषाणूजन्य गोळा असू शकतो. (जो त्याच्या त्याच्या गतीने किंवा मलमासारख्या उपायांनी लवकर बरा होऊ शकतो) अशा अनेक शक्यता असू शकतात.
५. त्वचारोगतज्ज्ञांना कॉस्मेटिक उपचारांमधून जास्त नफा होऊ शकतो म्हणून पर्यायी उपचार असूनही त्यांनी महागडा उपचार सुचवला असण्याची शक्यता आहे. जर अशी केस असेल तर तुम्ही त्यांची पुन्हा भेट घेऊन त्यांना "समज" द्यावी :)
स्युडोसायंस नाही.
ते एका प्रतिसादात खाली दिले आहे.
--------
मला होमिओपॅथी लहानपणापासून लागू होत होती. होमिओपॅथिक कॉलेज घराजवळच( शीव) होते व उपचार औषधे लागू पडत. पण पुढे तिकडे गर्दी फारच होऊ लागली आणि ते कॉलेज व हॉस्पिटल इरला ( पार्ल्याजवळ) येथे गेले.. मग डॉ हब्बु हेसुद्धा घराजवळच होते. खरे तर ते एमबीबीएस. पण त्यानी होमिओपॅथीचीही पदवी घेतली व तीच औषधे देऊ लागल्यावर आणि रिझल्ट्स आल्याने प्रचंड गर्दी होऊ लागली. सकाळी नऊला दवाखाना उघडायच्या अगोदर सहापासून नंबर लागे. मग त्यांचेकडेही जाणे बंद झाले.
डोंबिवलीत आल्यावरही एक डॉक्टर मिळाले पण तेही वारले. मग ओवर द काऊंटर औषधे घेऊ लागलो. त्यांचाही गुण येतोच.
Skin treatmentसाठी Benkoment ब्रांडची पंधरा वेगवेगळी मलमं मिळायची. त्यातली आता दोन तीनच मिळतात.
तळहात,पायाची सालटी जाणे यावर इतर ट्रीटमेंट खर्च करून फेल गेल्यावर ते डॉक्टर "तुम्ही मैदा आणि आंबट पदार्थ खाता म्हणून गुण येत नाही" सांगायचे. पण होमिओपॅथी दुकानात त्याने दिलेले 'ग्राफाइटीस' मलम एवढे गुणकारी होते की दोन दिवसांत साफ बरे झाले.
( चार होमिओपॅथिक डॉक्टरांची रेडिमेड औषधे मिळतात. साधारणपणे नेहमीच्या तीस रोगांवर असतात. ) स्वतः दुकानदारही औषध बनवून देतो. तीस रुपयांच्या गोळ्या सात दिवस पुरतात. त्याचा अनुभव उपयोगी पडतोच. रेडिमेड औषधांत जे असते ते x6 powerचे असते. पण x200 power चे पटकन गुण देते. म्हणजे की आपण स्वत: होमिओपॅथी पुस्तक वाचून त्यातून औषध शोधून दुकानातून विकत घेण्याचा खटाटोप करण्याची गरज नाही.
रेडिमेड औषधे इतर ठिकाणीही उपलब्ध असतातच.
डॉक्टरकडे जाण्यासाठी ओटोला पैसे लागतात त्यापेक्षाही कमी खर्चात होमिओपॅथी औषधे गुण देणारी आहेत.
((सूचना
स्वउपचार चार दिवसांपुढे घेऊ नयेत. ताप हे विविध वाइरल रोग असू शकतात तेव्हा उगाच वेळ काढू नये. ही माझी मते आहेत ऐसी संस्थळ किंवा मी जबाबदारी घेत नाही. ))
काही शक्यता
१. Placebo effect
२. शरीर आजाराशी झुंजत असतेच. ते युद्ध शरीराने जिंकले.
३. The disease ran its course.
होमिओपथीला मी सूडोसायन्सही ह्मणणार नाही. तितकेही सायन्स त्यात नसते. Double-blind, randomised, placebo-controlled trials मध्ये होमिओपथी सतत फेल होते.
पण ही उपचारपद्धती चालू द्यावी असे मला एकाच कारणासाठी वाटते. रुग्णास placebo देण्याचा तो उत्तम मार्ग आहे!
मात्र पहिल्यांदा आधुनिक वैद्यकीय उपचारच करावेत असे मला वाटते.
कावळा बसायला आणि फांदी तुटायला?
कदाचित त्या वॉर्टचं वजन खूप वाढलं आणि म्हणून तो गळून पडला? किंवा पिकला आणि गळून पडला? किंवा शरीर जिंकलं?
विज्ञान म्हणायचंच असेल तर अशा किमान पाच-पन्नास लोकांवर प्रयोग करायला लागेल; काही लोकांना साखरेच्या गोळ्या दिल्या, काहींना होमिओपॅथिक साखर दिली. आणि मग किती लोकांचे वॉर्ट गळून पडले?
एका सांगोवांगीवरून होमिओपॅथी हे विज्ञान आहे का नाही, यांपैकी काहीच म्हणता येत नाही.
मला अनुभव चांगला आहे.
विज्ञानाबद्दल बोलायचं तर -
१) जी गोष्ट सविस्तर लिहिली आहे तीच दुसऱ्याने जगात दुसरीकडे करून पाहिली तरी तेच परिणाम दिसतात तर ते विज्ञान म्हणू शकतो.
होमिओपॅथी यात येऊ शकते.
२) मंत्राने सापाचे विष उतरवणे ही क्रिया एखाद्यास साध्य असेलही. परंतू ती विद्या दुसऱ्या कुणास साध्य नसते, देता येत नाही मग विज्ञानाच्या व्याख्येत बसवता येत नाही.
प्लासिबो नाही हो.
रोगच बरा होतो. दरवेळेसच प्लासिबो कसा काम करेल?
ज्यांना होमिपथीच्या चार गोळ्यांतील साखरेनेही डाइबेटिस वाढतो त्यांनी घेऊ नये. मुळात एवढ्या स्वस्तात रोग बरा होतो ही कल्पनाच इतर वैद्यकीय सेवेच्या लोकांना पसंत पडत नाही. आणि रुग्णानांही .किती रंगवून त्याचे पुराण ऐकवतात.
होमिओपथी लिंक्स
http://mr.upakram.org/node/2651 होमिओपॆथी एक थोतांड
http://mr.upakram.org/node/2660 प्लासिबो
http://www.mr.upakram.org/node/820 बाराक्षार पद्धती
http://mr.upakram.org/node/2408 होमिओपॆथी वैयक्तिक अनुभव
http://misalpav.com/node/15374 साखरगोळ्या
http://misalpav.com/node/7514 डॊक्टर
http://www.maayboli.com/node/42681 होमिओपॆथी आणि पेन-किलर्स
माझा प्रवास हे डॉ.शंतनु अभ्यंकर यांचे या विषयावर पुस्तक प्रकाशित झाले आहे.त्यांचा होमिओपॅथी ते अॅलोपॅथी असा शैक्षणिक प्रवास झाला आहे. लेखक व प्रकाशक डॉ शंतनु अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक ब्राह्मणपुरी मु.पो. ता.वाई जि. सातारा किंमत- १२० रु. अंनिस वार्तापत्र एप्रिल २०१४ मधे पुस्तकाचा परिचय आला आहे
थोतांड ते थोतांड.
ज्यांचा कार्यकारणभाव सिद्ध झाला नाही, तो त्यावर लादू नका. लादलात तर मी (आणि इतर सुज्ञ लोक) त्याला विरोध करणार. तो विरोध प्रत्येक वेळेस इतपत सौम्य भाषेत असेलच असं नाही; कारण थोतांड पसरू न देणं ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची जबाबदारी असते, असं मला वाटतं.
हे तुम्ही मान्य करा असा आग्रह नाही; मात्र प्रत्येक वेळेस मतं व्यक्त करायची गरज नसते एवढं निश्चित म्हणेन.
अहवाल
“ जी गोष्ट सविस्तर लिहिली आहे तीच दुसऱ्याने जगात दुसरीकडे करून पाहिली तरी तेच परिणाम दिसतात तर ते विज्ञान म्हणू शकतो.
होमिओपॅथी यात येऊ शकते.”
असे सिद्ध करणारा अहवाल उपलब्ध आहे काय? त्यात इतर चल control केले होते काय? तो peer reviewed आहे काय?
“सांगोवांगीच्या गोष्टी ह्मणजे (चुकलो, म्हणजे) विदा नाही”
मुदलात…
तुमचा आक्षेप दुसऱ्या विधानाला आहे. तो आक्षेप ठीकच आहे, परंतु, मुदलात मला पहिल्या विधानाच्या प्रेमाइसमध्येसुद्धा गडबड वाटते. कारण, त्याच हिशेबाने जर जायचे झाले, तर ‘सूर्य पूर्वेला उगवतो, नि पश्चिमेला मावळतो’ हे साधे विधानसुद्धा या ‘वैज्ञानिक’ निकषात कितपत बसेल, याबद्दल साशंक आहे.
(उत्तर ध्रुवावर सूर्य दक्षिणेला उगवतो, नि दक्षिणेलाच मावळतो, झालेच तर, दक्षिण ध्रुवावर सूर्य उत्तरेला उगवतो, नि उत्तरेलाच मावळतो, असे कायसेसे ऐकून आहे ब्वॉ. अर्थात, मी स्वतः कधी उत्तर किंवा दक्षिण कोठल्याच ध्रुवावर गेलेलो नसल्याकारणाने, माझ्याकरिता ही सांगोवांगीचीच गोष्ट आहे; सबब, हा विदा नव्हे, विज्ञान तर नव्हेच नव्हे, असाही दावा करता येईलच म्हणा!)
(अतिअवांतर: कोलंबसाने १४९२ साली अमेरिकेचा शोध लावला म्हणे. (सांगोवांगीची गोष्ट.) उलटपक्षी, मी १९९२ साली अमेरिकेचा (गेला बाजार सान फ्रान्सिस्को विमानतळाचा) शोध लावला (विदाबिंदू), असा माझा दावा आहे. One small step for man, one giant leap for mankind, वगैरे वगैरे.)
असो चालायचेच.
किंचित दुरुस्ती
“ढापणी” म्हणजे चष्मा नव्हे. “ढापणी”चा अर्थ किंचित वेगळा आहे.
चष्म्यास कुत्सितार्थाने अनेकदा “ढापण” असे संबोधतात; “ढापणी” असे नव्हे. (वस्तुतः, “ढापण” म्हणजेसुद्धा चष्मा नव्हे. “ढापण” बोले तो, घोड्याने नाकासमोर सरळ जावे, आजूबाजूस विचलित होऊ नये, या उद्देशाने, त्याला आजूबाजूचे दिसूच नये, एतदर्थ घोड्यास लावण्यात येणारे blinkers अथवा blinders. चष्मा काहीसा ढापणासारखा दिसतो, या कारणास्तव चष्म्यास कुत्सितार्थाने “ढापण” म्हटले जाते, तथा, त्या अनुषंगाने, चष्मा लावणाऱ्या व्यक्तीस कुत्सितार्थाने लिंगानुसार “ढापण्या” अथवा “ढापणी” म्हणून संबोधिले जाते.)
सांगण्याचा मतलब, “ढापणी किती जाड आहे” हे विधान, चष्म्याच्या वा त्याच्या भिंगाच्या जाडीच्या संदर्भात न होता, चष्मा घालणाऱ्या मुलीच्या वा स्त्रीच्या जाडीच्या संदर्भात (आणि तेदेखील कुत्सितार्थाने) व्हावे.
बाकी चालू द्या.
मनात पडणारा प्रश्न
पण उत्तर मिळेल ह्याची असणारी कमी शक्यता.
मानवी मुलाची वाढ ही प्रचंड हळू होते
एक वर्ष तर त्याला चालता पण येत नाही
पाच वर्ष पर्यंत थोडेफार ते सक्षम होते.
पूर्ण नाही
अति प्राचीन काळात माणूस जेव्हा त्याच्या प्रथम अवस्थेत होता. जंगलात राहत होता.
असंख्य शिकारी प्राणी त्याचे शत्रू होते
तेव्हा तो इतका प्रचंड काळ म्हणजे जवळ जवळ सहा सात वर्ष आपल्या मुलांचे संगोपन कसे करत असतील.
बाकी प्राण्यांची पिल्ल जन्म झाल्या नंतर काहीच महिन्यात सक्षम होता.
काही तर जन्म झाल्या बरोबर चालायला लागतात.
हा प्रश्न मला तर लगेच पडला
चीन नी कृत्रिम सूर्य निर्माण केला अशी बातमी झाडून सर्व मीडिया नी दिली.
आर्टिफिशियल sun हा शब्द ठळक पने वापरला.
पण खरे तर फ्युजन रिॲक्टर तयार केला असावा आणि सूर्य ज्या पद्धती नी ऊर्जा निर्माण करतो तशी ऊर्जा रिऍक्टर च्या आतमध्ये निर्माण केली असणार.
ही खरी स्थिती
पण बातम्या बघून आणि ठळक पने आर्टिफिशियल sun हा शब्द वाचून लोकांस सूर्य च आठवला असेल
आणि आकाशात आता चीन चं सूर्य च असेल असे वाटले असणार.
एका यू tube महाभाग नी तर चीन चंद्र पण निर्माण करून आकाशात सोडणार आहे हे पण पिल्लू सोडून दिले आहे.
आणि कोणत्याच मीडिया ग्रुप नी फ्युजन रिॲक्टिर विषयी काहीच lihle नाही.
मीडिया वाले सनसनाटी निर्माण करणारी भाषा न्यूज देताना का वापरत असतील .
हा प्रश्न नेहमी मनात येतो.
गहन प्रश्न
समाजवादी,पुरोगामी सुधारित विचाराचे,समता वादी ,भांडवल शाही विरोधी लोक.
विज्ञान च्या नावाखाली संघटित भांडवल शाही लोकांच्या जीवनात नको इतका हस्तक्षेप करते
आर्थिक,सामाजिक,सामाजिक परिणाम करून त्यांना स्वतःचे गुलाम च बनवण्याचे उद्योग करते
तरी वरील समाजवादी,पुरोगामी आंधळे पने सर्व समजत असून पण जे चालले आहे त्यालाच विज्ञान
का समजत असतील ?
म्हणजे काय?
विज्ञान म्हणजे माझ्या मते तरी => प्रयोगांद्वारे पुन्हा पुन्हा पडताळून पाहता येणारे सत्य.
आता हे कुठल्याही माणसाने (समाजवादी/धार्मिक/आदिवासी/निअँडरथल/बाबूलाल इ. इ.) पडताळून राहिलं तरी हे सत्य तसंच राहिलं पाहिजे.
तुमच्या मते लोकं भलत्या कशालाच तरी विज्ञान म्हणताहेत का?
तुमची व्याख्या कागदावर ची
आदर्श व्याख्या आहे.
ते आईन्स्टाईन सारख्या महान संशोधक पर्यंत च लागू होती
हाडाचे संशोधक,कोणाचेच गुलाम नसलेले संशोधक तेव्हा पर्यंत होते
आता पहिला उद्देश काय? संशोधन कोणत्या विषयावर करायचा हे ठरले जाते.
तसा आराखडा बनतो
मग संघटित क्षेत्रात संशोधक नोकरी करत असतात.
ती क्षेत्र व्यापारी तत्व वर आराखडा जसा आहे तसेच संशोधन करतात
त्याला मान्यता देणारी संघटना पण संघटित देशांची असते त्यांच्या वर विविध राजकीय,आर्थिक दबाव असतो
.
स्वतंत्र निर्णय घेण्याची त्यांची पण कुवत नसते.
ही सर्व सिस्टीम बघितली की तुम्ही जी विज्ञाना ची आदर्श व्याख्या करत आहत त्या मध्ये आज चे विज्ञान बिलकुल बसत नाही
ते ठरवून त्या व्याख्येत बसवले जाते .
डिटेल्स
हे मोघम होतंय.
तुम्ही म्हणता तशी "निष्कर्ष आधी ठरवून" मग केलेली संशोधने आहेतच (कॉफी/साखर ह्यांची शरीरासाठी आवश्यकता इत्यादी)
पण ती मार्केटची किंवा बाजारपेठेच्या दबावामुळे प्रसिद्ध केलेली संशोधनं आहेत. त्यासाठी अक्ख्या विज्ञानालाच बोल का लावायचा हो?
हे म्हणजे अमुक एक लेखक बकवास लिहितो म्हणून डायरेक्ट भाषेलाच शिव्या देण्यासारखं झालं.
उलटं उदाहरण देतो - जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप सध्या बातमीत आहे. त्यात कित्येक प्रकारचं विज्ञान, इंजिनिअरींग वापरलं गेलंय - ह्यात काय चूक? आणि हे विज्ञानाच्या मूळ व्याख्येशी सुसंगत नाही का?
जेम्स वेब
दुर्बीण अवकाशात आहे ती कोणासाठी ?मिळणारी खरी माहिती लोकांसाठी किती असेल? आणि त्या संबंधित यंत्रणेकडे किती असेल?
ती दुर्बीण म्हणजे जगासाठी भंडारा नक्कीच नाही.
कमी महत्वाची माहीतच जगाशी share केली जाईल
बाकी गुप्त माहिती म्हणून कडी कुलुप लावून बंद केली जाईल.
किंचित शोधाशोध
किंचित शोधाशोध केलीत तर हे सापडेल - Who gets to use NASA's James Webb Space Telescope? Astronomers work to fight bias
जगातल्या बहुतेक दुर्बिणींनी गोळा केलेल्या प्रतिमा काही काळ फक्त त्या-त्या संशोधकांनाच मिळतात. काही काळानंतर ते सगळं विदागार कुणालाही डाऊनलोड करता येतं.
हलकेच घ्या!
हायवेवरून जाणाऱ्या प्रत्येक गाडीचा भुंकत पाठलाग करणाऱ्या श्वानाला विचारावं का, की बाबा मिळाली तुला ही गाडी तर नक्की काय करणारेस तू?
कृपया उपमा ताणू नका- आपल्याला उद्देशून अपशब्द वापरण्याचा कोणताही विचार नाही.
आणि अगदी सभ्यपणे समजणार असेल, तर लेन्स्की- श्लाफली लेखमालिका वाचाल का? हे संशोधन आपल्या हाती सुपूर्त करावं, यासाठी आपली विज्ञानातील पार्श्वभूमी सांगाल का?
तुमच्या कोणत्याच शब्दाला आक्षेप नाही
तुमचा गैर समज झालेला दिसत आहे .सामान्य लोकांना ती किचकट माहिती शेअर करा असे मी काय कोणीच म्हणणार नाही.
पण सर्व देशातील संबंधित यंत्रणेला,सरकार ना सर्व काही जे माहीत पडेल ते शेअर करा ,असे मला म्हणायचे होते.
तसे होत नाही असे मी सांगायचं प्रयत्न करत आहे
आता कुत्रा ही व्याख्या कुत्र्याला पण लागू करता येणार नाही .
इथे गैर समज होवू शकतात तर जागतिक स्तरावर एकमेका विषयी किती संशय,भीती, गैर समज असतील.
हातचा राखून च देश वागणार .
शाळेत असताना
पाचवी लं असेन .शाळेत शिकवले लोखंडी खिळ्या भोवती तांब्याच्या तारेचे वेटोळे केले आणि त्या मधून विद्युत प्रवाह सोडला की चुंबक तयार होते खिळ्यात.
हे मला काही पटले नाही म्हणून घरी आल्यावर तो प्रयोग केला
वायर चे वेश्टिंग असलेले टोक जे माझ्या हातात होते ते जळून गेले.आणि लगेच फ्यूज गेला.
देव बलवत्तर म्हणून जोरात विजेचा झटका लागला नाहीं
दुसऱ्या वर विश्वास मी कधीच ठेवत नाही.
स्वतः अनुभवले तेच सत्य बाकी सर्व साफ खोटे असे च माझे नेहमी मत असते
आणि ही वृत्ती च खरी .
विज्ञान वादी.
हसून लोळलो!
तुमच्या “प्रयोगात” विज्ञानाने (पक्षी, त्यावर आधारित तंत्रज्ञानाने) आपले काम चोख बजावले.
या प्रयोगाद्वारे विज्ञानाबद्दल काहीच नाही, पण तुमच्याबद्दल मात्र बरेच काही सिद्ध होते!
शाळेत तुम्ही विज्ञानाच्या परीक्षा दिल्या असणार. त्यातली उत्तरे पण स्वत:च्या अनुभवानुसार लिहायचात, की पाठ्यपुस्तकाप्रमाणे?
मझ्या अल्प बुध्दी नुसार
पर्यावरण ची काळजी दाखवायची मोठ मोठे शोध निबंध प्रसिद्ध करायचे , प्रतिष्ठित विज्ञान मासिकात
प्रसिद्ध करायचे,पृथ्वी चे पर्यावरण वाचवायचा ठेका ह्यांनीच घेतला आहे असे भासवून स्वार्थ साधायचा.
उदा. : जनावर पर्यावरण हानी करतात म्हणून त्यांच्याच पेशी वापरून कृत्रिम मांस निर्माण करायचे करोडो सामान्य लोकांच्या रोजगारावर संकट उभ करायचे .
आणि हे सर्व विज्ञाना च्या आडोशाने.
अशी खूप उदाहरणे डोळ्या समोर दिसतात.
त्या मुळे वरील प्रकारचे विचार मनात येतात.
एखाद्याला कोविड-१९ चा संसर्ग
एखाद्याला कोविड-१९ चा संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे, म्हणून टेस्ट केली जाते. कोविड टेस्ट चा निर्णय मिळण्याकरता खूप काळ वाट बघावी लागत नाही.
या टेस्टचा ( +, - ) जो निर्णय आहे, तो कळे पर्यंत त्या व्यक्तीने जनसंपर्क टाळायला हवा, असा नियम असणे जरूरीचे वाटते का?
जातिवंत नेत्यांचा ब्राम्हण द्वेष
काही वर्षांपूर्वीची गोष्ट घरी सत्यनारायणाची पूजा होती. गुरुजी सुंदर कोशाय वस्त्र धारण करून आले होते. गुरुजींची जुनी ओळख आणि माझ्याहून वयाने बरेच लहान असल्याने, मी गुरुजींना विचारले, गुरुजी हा नवीन युनिफॉर्म आहे का? गुरुजी हसले आणि म्हणाले नाही हो!, दोन दिवसांपूर्वी यांच्याकडे एका कार्यक्रमाला गेलो होतो. दिल्लीतील बडी मंडळी तिथे आली होती. वैदिक मंत्रोचराने पाहुण्याचे स्वागत झाले. यांची प्रतिष्ठा मोठी. आमचा उत्तम आदर सत्कार झाला. कार्यक्रमासाठी यांनी आम्हा सहा ब्राह्मणांना नवीन कोशाय वस्त्र प्रदान केले. दक्षिणही भरपूर मिळाली. मी म्हणालो गुरुजी, पण हे तर सतत ब्राह्मणांना शिव्या देत असतात. गुरुजी म्हणाले, त्यांच्या जातीचे मतदार शिव्या ऐकून प्रसन्न होतात आणि यांना मते देतात. यांना मतदारांची काळजी करायची गरज नाही. निवडणूक जिंकल्यावर स्वतःची आणि परिवाराच्या पोटपाण्याची काळजी घेण्यात यांचा वेळ निघून जातो. मी मध्येच म्हटले आणि गुरुजींना दक्षिणा ही भरपूर मिळते. असो.
असेच एकदा एका जातिवंत नेत्याचा फोन आला. पटाईत आडनाव ही पदवी असल्याने सर्व जातीत सापडते. एवढेच नव्हे तर आणि मुसलमान ही पटाईत असतात. माझ्या पूर्वजांना बहुतेक ही पदवी छतीसगडच्या एका गोंड राजाने दिली होती. जातिवंत नेत्याने मला तुमची जाती काय हे विचारले. विचित्र प्रश्न होता. पहिल्यांदाच कुणी असा प्रश्न विचारला होता. मला थोडा राग ही आला होता, मी ही उतरलो, महाराष्ट्रातील नेते ज्या जातीच्या नामस्मणाची जपमाळ नेहमी जपतात, मी त्या जातीचा आहे. माझे उत्तर ऐकून ते जोरात हसले आणि म्हणाले पटाईत साहेब, "असे नाही. माझ्या मते तर जो जातिवंत नेता ब्राह्मणांना शिव्या देतो. तो त्याचा जातीसाठी काहीच करत नाही. फक्त स्वत:ची तिजोरी भरतो. जातीच्या नावावर मूर्ख मतदार अशांना निवडून देतात हेच देशाचे दुर्भाग्य आहे".
निष्कर्ष एकच निघतो. अधिकान्श जातिवंत नेता घरात ब्राम्हणांचा सत्कार करतात. आपल्या संस्थेत मोठ्या पदांवर त्यांना नियुक्त करतात. पण सार्वजनिक मंचांवर ब्राह्मणांविरुद्ध गरळ ओकतात. आपल्या जातीच्या मतदारांना मूर्ख बनवून राजनीतिक उद्देश्यपूर्ती, हे ब्राम्हण द्वेषाचे एकमात्र कारण आहे. असे माझे मत आहे.
आक्षेप!
प्रस्तुत प्रतिसाद हा मुळात स्वतंत्र लेख होता. आता, स्वतंत्र लेख म्हणून ठेवण्याच्या लायकीचे त्यात काहीही नव्हते, हे मला मान्य आहे. परंतु, म्हणून ‘मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार’ या सदराखाली तो हलविण्यास माझा तीव्र आक्षेप आहे.
संपादनमंडळ याकडे कृपया लक्ष देईल काय?
उत्तर
'लेख' म्हणजे काय? एखादे टेक्स्ट लेख आहे किंवा कसे हे कशावर ठरवतात?
ते टेक्स्ट 'लेख' होतेच, असा माझा दावा नाही. मात्र, 'लेख' नाही तर त्यास काय म्हणायचे, हे समजू शकले नाही, परंतु, काहीतरी म्हणणे तर प्राप्त होते, या धर्मसंकटात सापडल्याकारणाने, निव्वळ प्लेसहोल्डर तत्त्वावर त्यास 'लेख' म्हणून मोकळा झालो, इतकेच.
दोन वाक्यात सांगता आले असते
राजकीय नेते जे जाहीर भूमिका घेतात त्याच्या विरुद्ध त्यांची खासगी भूमिका असते.
जाहीर पने ते गरिबांचे कैवारी म्हणून स्वतःला प्रॉमोट करत असतील तर खासगी आयुष्य मध्ये गरीब लोकविरुध वागत असतात.
. म्हणजे
थोडक्यात सिरियल मध्ये संस्कारी बहु वाटणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात शॉर्ट कपड्यात असते. सिगारेट फुंकत असते.,ड्रिंक करत असते.
ढोंगी पना
हे पूर्ण जग ढोंगी आणि स्वार्थी लोकांनी भरले आहे,सर्व मानव जमात,सर्व प्राणी, पूर्ण निसर्ग ह्यांचे अस्तित्व फक्त टिकावे असे नाही तर त्यांना कोणतीच अडचण येता ते फुलावे असे कोणाला वाटत नाही.
आता विश्व करता काल्पनिक आहे असा समजण्याचे दिवस आहेत ,माणूस च विश्व करता,रक्षक आहे.
पण माणूस त्या लायकीचा आहे का?
अत्यंत स्वार्थी,निसर्गदत्त बुद्धीची देणगी मिळालेला स्वतचं कर्तुत्व काहीच नाही असा फालतू प्राणी आहे माणूस.
विचार फक्त माणसाचा करता येणार नाही तो अतिशय शुल्लक प्राणी आहे.
निसर्ग चक्र ठीक चालून सर्व सजीवांची ,वनस्पती सहित सर्व जीव सृष्टी ची गरज भागवण्ासाठी माणसाचे अतिशय शुल्लक योगदान आहे..
त्या पेक्षा एकपेशीय दुर्लक्षित प्राणी किंवा आज पर्यंत माहीत च नसणारे जीव हे पृथ्वी वर जीवन टिकविण्यास कारणीभूत आहेत.
माणसं मुळे आज पर्यंत पृथ्वी वर जीव सृष्टी टिकली नाही
सूक्ष्म जीव आणि अनंत कीटक,प्राणी त्यांच्या मुळे टिकली आहे
धर्म हा सर्वात जास्त संघर्ष निर्माण होण्याचा विषय आहे
माणूस खरेच बुद्धिमान असेल जसा तो स्वतः लं समजतो..
तर जागतिक सर्व राष्ट्र मिळून सर्व धर्म,त्यांच्या खुणा,त्यांचे ग्रंथ,त्यांचे विचार कायम स्वरुपी जगातून का नष्ट करत नाही..माझा धर्म फक्त योग्य आणि बाकी बकवास असा स्वार्थी विचार हा बकवास दावा का करत असतो .
कारण स्वतःची कमजोरी जगजाहीर होवू नये
माणूस ढोंगी नसेल तर .
जागतिक स्तरावर निर्णय घेवून ह्या जगातील सर्व धार्मिक स्थळ,ग्रंथ,विचार नष्ट करावेत..
आणि जगाने नव्याने सुरुवात करावी.
आणि एकदाच हा निर्णय घेवून.
धार्मिक विवाद ,त्याचे महत्व संपवावे.
पण ज्या घटना माणसाच्या लक्षात येत नाहीत त्यांना alian हे नाव देवू नका.
नाही तर नवीनच श्रद्धा स्थळ निर्माण होतील.
आज चा माणूस
आज चा माणूस स्वतःला खूप प्रगत समजत असेल तर हा सर्वात मोठा गैर समज आहे
अप्रगत ते प्रगत आणि नष्ट होणें
ह्याची किती तरी अवतरण पृथ्वी वर नेहमी होत असतात.
मानवी जीवन किंवा कोणतीच जीव सृष्टी पृथ्वी वर निर्माण च झाली नाही.
असे मला नेहमी वाटते
आणि मानवी मेंदू वर कोणी तरी नियंत्रण करत आहे.
असे पण वाटते.
पावनखिंड
शिवरायांच्या आयुष्यातील अनेक प्रेरणादायी घटनांवर उत्कृष्ट चित्रपट बनवता येतील. स्वराज्याची शपथ, शाईस्तेखानाचे पलायन, अफजलखानाचा वध, पावनखिंडीतली लढाई, आग्र्याहून सुटका, दक्षिण दिग्विजय हे तर मार्मिक विषय आहेत. पावनखिंड या चित्रपटाचा बोलबाला आणि अगदी अमेरिकेतील थेटरात हाऊसफुल (व्हाढाट्सापवर ढोलताशे घेऊन थेटरात नाचणारे विडिओ) वगैरे ऐकून अपेक्षा फार उंचावल्या होत्या. चित्रपटाचे पोस्टरही जबरदस्त वाटले. मात्र चित्रपटाने खूपच भ्रमनिरास केला. कुठेही भव्यदिव्यता नाही. टेकडीसारखा दिसणारा पन्हाळा, लहानशा पन्हळीसारखी दिसणारी खिंड, लुटुपुटुच्या लढाया, अतिनाट्यमय संवाद, एककल्ली मांडणी हे सगळं पाहून एक चांगली संधी दिग्दर्शकाने वाया घालवली असे वाटले. हा चित्रपट इतका यशस्वी का झालाय ब्वॉ?
उत्कृष्ट !
शिवरायांच्या आयुष्यातील अनेक प्रेरणादायी घटनांवर उत्कृष्ट चित्रपट बनवता येतील
अशा येऊ घातलेल्या ऐतिहासिक ३०-३५ चित्रपटांची यादी वाचूनच आता धडकी भरली आहे. महाराष्ट्राच्या उत्क्रांतीच्या बखरीत, काही ठराविक लोकांऐवजी आता सर्वच प्रजेचे मेंदु गुडघ्यांत आल्याची नोंद होणार बहुतेक!
मानव खरच हुशार असता
मानव खरंच हुशार असता,संशोधक खरंच प्रामाणिक असते,हुशार लोक खरंच हुशार असती.
माणसं बुद्धी वापरतात हे खरे असते.शिक्षित लोक च सर्वात जास्त अंध श्रद्धा ठेवणारे असतात फक्त श्रद्धास्थान वेगळे असते हे खोटे असते तर.
आज मानव प्राणी सर्व चींतेतून मुक्त झाला असता.
सर्व आजारातून मुक्त झाला असता.
लोकसंख्या चे एकत्रीकरण करून बकाल शहर अस्तित्वात च नसती.
विविध प्राणी वनस्पती,सूक्ष्म जीव सुखात नांदत असते.
पृथ्वी विनाश होण्याच्या टोकावर उभी नसती.
सुखी आयुष्य काय असते.
पोट भर जेवण,घर,आरोग्य सुविधा, आणि उत्तम नैसर्गिक वातावरण.
आता काय आहे
दुःखी जीवन,पोट कसे भरेल ह्याची करोडो लोकांना चिंता,आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण त्या मुळे दर्जा झीरो.
विविध प्राणी वनस्पती संकटात,प्रदूषण.
पृथ्वी राहण्यास अयोग्य होण्याच्या मार्गावर.
आणि ह्याला जबाबदार फक्त नालायक माणूस जो स्वतःला हुशार समजतो.
खुप कमी वयात
खुप कमी वयात आजची पिढी.
विविध रोगांचे बळी होत आहेत किंवा त्यांच्यात लक्षण दिसत आहेत.
खुप कमी वयात डोळ्यांची कुवत कमी होत आहे..
मधुमेह, heart attack सारख्या समस्या खूप कमी वयात येत आहेत.
अगदी कॅन्सर ची पण लक्षण खूप कमी वयात आजच्या पिढी मध्ये निर्माण होत आहेत.
जास्त करून श्रीमंत देशात
ही काही प्रगतीची नक्कीच लक्षण नाहीत.
बाकी कारण देवू च नका.
आहार.
फास्ट फूड चे महत्व हुशार लोक च सांगत होती.
ती कारण देवू च नका.
मुलांना बालपण मस्त भोगू ध्या..
फालतू गैर समज समाज मध्ये हुशार लोकांनीच (+धार्मिक अंध श्रद्धा पेक्षा ह्या आधुनिक मानवाच्या अंध श्रद्धा ची पातळी अगदीच फालतू आहे) निर्माण केला .
शिक्षण.
Kg मधील पोराला फालतू अंध श्रद्धा पायी नको त्या कल्पनेने .
कथित शिक्षण साठी राबवले.रिझल्ट झीरो आहे ह्या रीती चा.
आणि पूर्ण मानवाची पुढील पिढी ह्या हुशार मूर्ख लोकांनी बरबाद केली.
सातवाहनाच्या काळात डौलाने
सातवाहनाच्या काळात डौलाने जगभर प्रवास करणारे साहसवीर नंतर कुठे गेले? व्यापाराचा एवढा मोठा वारसा आपण अचानक कसा सोडला? नंतर जवळजवळ दीड सहस्त्रक आपण नौकानयनाची विद्या पुरती गमावूनच बसलो होतो की काय?