इंडोनेशियाजवळ समुद्रात ८.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
थोड्या वेळापूर्वीच इंडोनेशियाजवळ समुद्रात ८.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. (सीएनएन ८.६ सांगते आहे, तर बीबीसी ८.९)
या भूकंपाचे परिणाम नक्की काय होतील हे आत्ता तरी सांगणे अवघड आहे. पण सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्सुनामीची तीव्र शक्यता जाहीर केली गेली आहे.
पुढील नकाशात भूकंपाचे केंद्र दाखवले आहे. त्याकडे नजर टाकताच ही त्सुनामी भारताच्या पूर्व किनार्यांना तडाखा देऊ शकेल असे वाटते आहे. कारण ८.९ तीव्रतेचा भूकंप समुद्रात नक्कीच मोठी खळबळ माजवणार आहे. बंगळुरात थोडी थरथर जाणवली. पण किंचितच. फारसे काही जाणवले नाही.
तरी येणारी त्सुनामी सुमात्रा, जावा (जाकार्ता) या बेटांना मोठा तडाखा देण्याची शक्यता आहे.
येथे आणि येथे ही बातमी सविस्तर वाचायला मिळेल
यापूर्वी २६ डिसेंबर २००४ रोजी झालेल्या ९.१ रिश्टर क्षमतेच्या भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीमुळे भारतीय महासागर परिक्षेत्रातील २ लाख ३० हजारहून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले होते. त्या पार्श्वभूमीवर केवळ ०.२ एवढाच फरक असलेल्या या भूकंपाचे परिणाम कळण्यासाठी आपल्याला थोडी वाटच पहावी लागेल असे दिसते आहे.
त्सुनामीची शक्यता खोटी ठरो ही
त्सुनामीची शक्यता खोटी ठरो ही प्रार्थना
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१ असेच म्हणतो
त्सुनामीची शक्यता खोटी ठरो ही प्रार्थना
बरे होईल असे झाले तर. निष्कारण होणारी अर्थ-जिवित हानी तरी टळेल
सांभाळून
सांभाळून रे बाबांनो.इंडोनेशियातील नागरिक, तेथे गुजराण करणारे भारतिय्,मराठी सर्वांनाच लढण्याची प्रेरणा मिळो.
२०१२ चित्रपट ? प्रलयाची
२०१२ चित्रपट ? प्रलयाची सुरुवात ?
मस्करी...
ही मस्करी असेल तर आवडलेली नाही.
हे गंभीरपणे लिहिलेले असेल तर आश्चर्य वाटते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मस्करी नसावी
मनोबा,
ही मस्करी नसावी. भीती व्यक्त केली आहे असे वाटते.
असो, प्रतिसाद देणार्या स्नेहांकिता येतील तेव्हा याचा खुलासा करतीलच.