दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२७ मे
जन्मदिवस : लोकभाषा अभ्यासक केशव भवाळकर (१८३१), अणुकेंद्रकाच्या विभाजनाच्या संशोधकांपैकी एक नोबेलविजेते जॉन कॉकक्रॉफ्ट (१८९७), पर्यावरणतज्ज्ञ रेशल कार्सन (१९०७), लेखक बाळ सामंत (१९२४), ज्ञानपीठविजेते लेखक भालचंद्र नेमाडे (१९३८), क्रिकेटपटू रवी शास्त्री (१९६२)
मृत्युदिवस : क्षय, कॉलरा, अँथ्रॅक्स इ. होण्याची कारणे शोधणारे नोबेलविजेते, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक (१८४३), स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (१९६४), संगीतसमीक्षक व संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरूळकर (१९८६), एन्झाईम्स, प्रथिने आणि विषाणूंचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन नॉर्थरॉप (१९८७), इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी शोधणारा नोबेलविजेता अर्न्स्ट रूस्का (१९८८), विचारवंत, संस्कृतपंडित, ‘मराठी विश्वकोशा’चे प्रधान संपादक, साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९९४), संसदपटू, अर्थतज्ज्ञ व घटनापंडित मिनू मसानी (१९९८)
---
१९०८ : खिलाफत दिवस.
१९३० : त्या काळची जगातली सगळ्यात उंच असलेली ख्राईस्लर इमारत लोकांसाठी खुली झाली.
१९३९ : डी. सी. कॉमिक्सने बॅटमॅनची पहिली चित्रकथा प्रकाशित केली.
१९५१ : तारापोरवाला मत्स्यालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन.
१९६७ : ऑस्ट्रेलियाने स्थानिक मूलनिवासी लोकांना लोकसंख्यागणनेत मोजण्याचे ठरवले.
१९८६ : 'ड्रॅगन क्वेस्ट' हा पहिला 'रोल-प्लेयिंग' व्हिडीयो गेम प्रकाशित.
१९९४ : वीस वर्षे विजनवासात घालवल्यानंतर ७५ वर्षीय नोबेलविजेता विद्रोही लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन रशियात परतला.
१९९७ : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बिल क्लिंटन राष्ट्रध्यक्ष असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा खटला चालवण्याची परवानगी दिली.
१९९९ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेग येथे स्लोबोदान मिलोसेविचवर कोसोवोमध्ये माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल गुन्हा दाखल केला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- क्षणभंगुर
प्रतिक्रिया
लेख
लेख आवडला. प्रत्येकाचा समजून घेण्याचा प्रवास साधारण या प्रकृतीचाच असेल असं वाटतं. तुमची आठवण लख्ख आहे. नेमकं कधी काय घडलं, नेमका कशाचा उलगडा कधी झाला, नेमकी खूणगाठ कधी बसली याचा ताळेबंद अजूनही चोख आहे याचे कौतुक वाटते. असो. कुतुहलाने पुढच्या भागांची वाट पहातो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
वहाणा
'मिसळपाव'वर तुम्ही 'वहाणा' नावाचा एक धागा काढला होता, त्याची आठवण करुन देतो.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
खरंतर
जे वळण निर्णायक असतं, दिशा बदलून टाकणारं असतं ते लक्षात राहतंच. त्यासाठी खास काही करायची गरज पडते असं नाही.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
अनाईस् निन्
'अनाईस् निन्'चे एक वाक्य आठवले -
Each friend represents a world in us, a world not born until they arrive, and it is only by this meeting that a new world is born.
मात्र यातला 'मित्र'विशेष एखादी व्यक्तीच असायला हवी असे नाही. आपल्याला एखादी जोरदार किक् बसायला निमित्त होणारी कुठलीही गोष्ट आयुष्यात फरक करून जाते.
कोल्ह्यावलोकन
आम्ही कसले सिंह? (बाय दी वे, दिवसातले वीस तास झोपून राहातो तो वनराज? आपल्या माद्यांनी आणलेली शिकार खाऊन, जांभया देत, सिंहिणींना गर्भार करत आयुष्य काढतो तो जंगलचा राजा? या पुरुषी आदर्शांचा धिक्कार वगैरे.. असो!)आम्ही तर कोल्हे- तरस. त्यामुळे आमचे मागे वळून पाहाणे हेही तसेच असणार पण 'म्हणोन काय इतरें, पाहोचि नये?' तर प्रस्तुत लेखातले असे मागे बघणे आवडले.
हातात पहिले पुस्तक कधी आले ते आठवत नाही. पण मे महिन्याच्या सुट्टीत पुढच्या वर्षाची पुस्तके निम्म्या किंमतीला विकत घेतल्यानंतर त्यातले मराठीचे पुस्तक वाचून काढायचे हे ठरल्यासारखे होते. शाळेतला प्रवास हा 'चांदोबा', 'किशोर' ('शेतकरी' ही!) असा झाल्यानंतर सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, बाबुराव अर्नाळकर, एस.एम. काशीकर, चंद्रकांत काकोडकर, बाबा कदम असा घाईघाईत झाला. द. स. काकडे यासारखे काहीतरी नाव असलेल्या आणि शाळकरी वयातल्या मनाला सुखद वगैरे गुदगुल्या करणार्रे चावट लेखन करणार्या लेखकानेही काही काळ भुरळ घातली होती. फडके-खांडेकर, अगदी अत्रेही कधी फारसे आवडले नाहीत. यानंतरचा नैसर्गिक टप्पा असतो तो पु.लं, व.पु.काळे , दळवी, माडगूळकर, मिरासदार यांचा. यातले मिरासदार (काही कथा वगळता) आणि वपु( शून्य कथा वगळता) यांची साथ सुदैवाने सुटली. आण्णा आणि तात्या अजूनही बरोबर आहेत. शशी भागवत आणि नारायण धारप यांच्याबरोबर एक मोठे अफेअर झाले. भागवत अकालीच गेले आणि धारपांची पुनरावृत्ती सुरु झाली. तरीही हे दोघे अधूनमधून डोके वर काढतात. 'कवितांना- ज्यांनी आयुष्यभर साथ दिली' अशी सुनीताबाई देशपांडेंची एक प्रस्तावना आहे. त्या कविता बाकी कॉलेजमधल्या वासरुप्रेमाला नकार देऊन एखाद्या इंजिनिअरशी लग्न करणार्या प्रेयसीसारख्या दुर्लभच राहिल्या. मिलिंद बोकील, आशा बगे, शं.ना.नवरे आले आणि गेले. मग कधीतरी 'गुरुनाथ आबाजी' नावाचे ('निळे, सुगंधी धुके')प्रकरण आयुष्यात आले आणि 'प्रिये, तू भेटल्यानंतर मला मी आतापर्यंत कसा काय जगत होतो याचे नवल वाटले' म्हणणार्या त्या कवीप्रमाणे (कृष्णाकाठच्या कुंडलसारखे) आयुष्य 'पहिले उरले नाही'.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
इतक्या थोडक्यात?
दिस इज अजिबात नॉट गुड बाबा.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
धीर धरा
धीर धरी, धीर धरी. धीर धरा तुम्ही खीर करते साबुदाण्याची.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
_/\_ वाचतेय.
_/\_ वाचतेय.
लेख आवडला
हे खूपच पटलं. अनेक कलानुभवांसाठी हे खरं आहे असं जाणवतं. गाणं असो सिनेमा असो कि पुस्तकं असो. कलानुभव आपल्यात बदल करतात बर्याचदा. पण कधीकधी आपल्यात झालेल्या बदलांमुळे, वयातील बदल असो किंवा विचारातील, आधी न आवडलेला एखादा कलाविष्कार नंतर, दुसर्या संधी मध्ये खूप आनंद देऊन जातो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१
आधी फार आवडलेल्या कलाकृती(!) पुढे आवडल्या नाहीत तर त्या का आवडल्या नाहीत याचा विचार करतानाही बरंच काही शिकता येतं.
लेखाच्या शेवटी क्रमशः पाहून आनंद झाला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
स्त्री
आयुष्यात विशेषत्वाने ज्या स्त्रिया आवडत किंवा निदान ज्यांच्यावर क्रश होता अशातल्या काही नंतर तितक्या आवडत्या राहिल्या नाहित ह्याचा विचार करतानाही बरंच काही शिकता येतं
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कलाकृतीमुळे मनुष्यावर होणारा
कलाकृतीमुळे मनुष्यावर होणारा परिणाम आणि आयुष्या येणाऱ्या इतर व्यक्तींमुळे माणसावर होणारा परिणाम यांच्यात काही फरक असतो का, असला तर काय?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आयला! हा विषय वाचून उत्सुकता
आयला! हा विषय वाचून उत्सुकता प्रचंड चाळवली. काहीतरी सखोल (म्हणजे डिट्टेलवार) येऊ द्यात भाऊ!
तपशील
फर्स्ट हॅण्ड नाही पण सेकण्ड हॅण्ड अनुभव इथे आहे :-
http://www.aisiakshare.com/node/1563
.
बाकीचं कधी फुरसतीत पाहू.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
जी थीम अभिप्रेत आहे तिच्याशी
जी थीम अभिप्रेत आहे तिच्याशी विसंगत असल्याने हा किस्सा बाद समजावा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धागा भरकटतो आहे.
धागा भरकटतो आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
असेच म्हणतो. त्यातही नेहमी
असेच म्हणतो. त्यातही नेहमी इतरांना हे लिहा अन ते लिहा, डीटेल्ड लिहा, इ.इ. म्हणून उचकावणार्या मनोबाने हे केलंच पाहिजे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
नेहमी इतरांना हे लिहा अन ते लिहा, डीटेल्ड लिहा, इ.इ. म्हणून उचकावणार्या मनोबाने हे केलंच पाहिजे.>> बॅट्याला अनुमोदन.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
ड्वाळे पाणावले
स्वतःचे काहीच खास स्थान नाही व प्रभाव नाही असे समजणार्या मनोबाला इतका भाव मिळत असलेला पाहून ड्वाळे पाणावले.
आम्ही तर no entity होतो ना.
.
.
बादवे, धागा भरकटत आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
बघा म्हणजे "तसा मी... आता मी"
बघा म्हणजे "तसा मी... आता मी" तुम्हाला नेमके लागु व्हावे.
-अनामिक
धागा
वइनोदाने का असेना पण धागा भरकटतो आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
नाय रे बाबा
This comment has been moved here.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हांगाश्शी
आयुष्यात विशेषत्वाने ज्या स्त्रिया आवडत किंवा निदान ज्यांच्यावर क्रश होता अशातल्या काही नंतर तितक्या आवडत्या राहिल्या नाहित ह्याचा विचार करतानाही बरंच काही शिकता येतं>> मला वाटलंच होतं माझ्या अनुभवापलिकडचे काही अनुभव इतरांकडून वाचायला मिळणार असं. लगे रहो. आन्दो मनोबा, डिट्टेलवार लिवा.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
यावरुन आठवलं. हजबंड्स सिक्रेट
यावरुन आठवलं. हजबंड्स सिक्रेट पुस्तकात चाळीशीतली आई आपल्या १२वर्षाच्या मुलीसोबत चाललेली असते. रस्त्यावरच कोणीतरी शिट्टी मारतं. आधी तिला वाटत आपल्यासाठीच मारलीय. मग लक्षात येत की शरीराला नुकतीच गोलाई येणारी मुलगी चेहरा लाल करुन, गाल फुगवुन भरभर चालतेय :-). मग ती विचार करायला लागते 'एक काळ असा होता की हे सगळ खूप मिळायच, म्हणुन नकोस वाटायच. पण परवा पावसात, मागुन स्ट्रीट लाईट येत असताना, स्कर्ट घालुन पळतपळत रस्ता ओलांडत होतो आणि ट्रक ड्रायव्हरने कोल्हाशिट्टी मारली, तरी आपल्याला केवढा आनंद झाला. मिडलाईफ/मेनोपॉज :-('.
शंका (अवांतर)
कोल्हाशिट्टी, की लांडगाशिट्टी?
हम्म . यापुढे लक्षात ठेवायचा
हम्म :-). यापुढे लक्षात ठेवायचा प्रयत्न करेन.
शेवटचा १ हा आकडा बघुन व शेवटी
शेवटचा १ हा आकडा बघुन व शेवटी क्रमशः बघुनही सुखावलो!
ज्या कुठल्या मित्राने तुम्हाला हे अवलोकन करायला उचकवलं तो आता कित्येक जणांचे दुवे घेणार आहे
मस्तच..
फक्त इतक्या तपशीलात गोष्टी आठवणं आणि स्वतःकडे असं तटस्थपणे बघणं जमणं कठीण असल्याने दाद लेखनासोबत याही गोष्टींना आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गंभीर
पूर्वी मी गंभीर ,पोक्त , शांत वगैरे वगैरे होतो.
जसेजसे वय व अनुभव वाढत गेला तसतसा मी थिल्लर, उथळ व बालिश बनत गेलो.
मराठी संस्थळांची व टवाळ मित्रांची ह्याकामी बहुमोल मदत झाली.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कधी कधी वाटतं की दर सहा
कधी कधी वाटतं की दर सहा महिन्याला आपल्या आवडीनिवडी, विचार, कल यांचा एक सर्व्हे नोंदवून आपण गेल्या काही वर्षांत, दशकांत कसे बदलत गेलो यांचा एक आलेख बघायला मजा येईल. आपण सिंहावलोकन करताना मागचीच काही वर्षं स्पष्टपणे दिसतात. कधी अनेक वर्षांपूर्वीचं अंधूक काहीतरी आठवतं आणि वाटतं, अरे, आपण असे होतो तर... कधी बदल चांगले असतात. कधी ते चांगले नसतात. मग वाटतं की ही घसरण सुरू झाली ती तेव्हाच जाणवली असती तर कदाचित थांबवण्यासाठी प्रयत्न करता आले असते.
वाचतोय.. लगेहाथ रावसाहेबही
वाचतोय..
लगेहाथ रावसाहेबही लिहिते व्हायची चिन्हे दिसत आहेत त्यामुळे उत्सुकता लागून राहिली आहे.
बिपिन कार्यकर्ते
दायरा
शिप ऑफ थिसिअस मधे एक पात्र म्हणतं "भावनाओंका एक पुरा दायरा है, उसे महसुस करना जरुरी है"*, तद्वत हि यात्रा त्याच वाटेवरची असावी.
*(तपशीलात चु.भ.दे.घे.)
"नाय रे बाबा. असं एकदम विषय
This comment has been moved here.
बिपिन कार्यकर्ते
'लेट मी गिव हिम ए सेकंड
'लेट मी गिव हिम ए सेकंड चान्स' असा विचार मी केला नसता तर...
*
दुसर्या कुणा शास्त्रीय गायकास फर्स्ट चान्स दिला असता.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकायला आवडणे ही बेसिक टेण्डन्सी आहे. तिथपर्यंत प्रवास आपोआप होतो. दरम्यान लागणार्या खाचखळग्या, उचंवट्या डोंगरांमुळे नदी वळणे घेत जाते पण शेवटी सहसा समुद्रापर्यंत पोहोचतेच, तसे काहिसे ते आहे.
>असे, मला, वाटते.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
अगदी असाच नाही, पण माझ्या
अगदी असाच नाही, पण माझ्या शास्त्रीय संगीत ऐकण्याची सुरुवात अशीच पं. जसराज (तेच ते 'ओम नमो भगवते...' वाले) प्रभृती गायकांपासून झाली. साधारण नववी-दहावीत वगैरे असेन मी त्यावेळी. त्यावेळी जसराज, संजीव अभ्यंकर, रशीद खान वगैरे मंडळी म्हणजे शास्त्रीय संगीतातली देव वाटायची. त्याच उत्साहात शास्त्रीय संगीत शिकायला लागलो त्याला अजून ४-५ वर्षं जावी लागली. मित्रांचा (प्रत्यक्ष/आंजावरील) प्रभाव वगैरे नसला तरी एकमेकांसोबत झालेल्या चर्चेतून नवनवीन ऐकायला मिळत गेलं. ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकत असल्याने त्यातले दिग्गज ऐकले आणि एके दिवशी जुन्या एम्पीथ्र्या आणि क्यासेटा चाळताना लक्षात आलं की आपण प. जसराज, रशीद खान पासून ते डी व्ही पलुसकर, अभिषेकी, मन्सूर, यशवंतबुवा जोशी, उल्हास कशाळकर, मुकुल शिवपुत्र वगैरे पर्यंत येताना आवडीनिवडींचे साचे पूर्णपणे बदलले आहेत. असो.
अवांतर - बादवे रशीद खान हा माझ्या मते क्यासेटवरच ऐकायला चांगला वाटणारा गायक आहे. प्रत्यक्ष ते मैफिलीत रशीदखानी दळण पेशन्सची परीक्षा पाहतं. कितीही तयारी असली तरी अतिशय बेशिस्त गाणं. दळणाचा आक्षेप बर्याच अंशी पं. जसराज यांनाही लागू होतो. अर्थात हे पूर्णपणे माझे वैयक्तिक मत आहे.