देवयानी खोब्रागडे प्रकरण
अमेरिकेतील भारताच्या उपमहावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडे यांना अटक करण्यात आल्याचा विषय केंद्र सरकारने अतिशय गांभीर्याने घेतला आहे. भारतामधील अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱयांना देण्यात आलेली ओळखपत्रे तातडीने परत करावीत, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. (बातमी)
इतकेच नव्हे तर राहुल गांधी, सुशीलकुमार शिंदे व नरेंद्र मोदी यांनी लोकसभा स्पीकरच्या पावलावर पाऊल ठेऊन अमेरिकन सिनेटच्या शिष्टमंडळाला वेळ देणे नाकारले आहे (बातमी)
याबद्दल तुमचे मत/घटनाक्रम/जागतिक पडसाद/आंतरराष्ट्रीय राजकारणावरील परिणाम आडी अंगांनी चर्चेसाठी धागा वेगळा काढला आहे
प्रतिक्रिया
सुंदर. धन्यवाद.
सुंदर. धन्यवाद.
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
आँ ??
हे पाहिले का?
http://www.thehindu.com/news/international/world/maids-family-evacuated-...
भरारा म्हणतात की संगीता रिचर्डची फ्यामिली भारतातून "evacuate" करुन अमेरिकेत नेण्यात आली कारण इथे (भारतात) त्यांच्यावर दबाव येत होता. अरे इथे दबाव येतो म्हणून परस्पर भारत सरकारला मधे न घेता थेट व्हिसा देऊन तातडीने "एव्हॅक्युएट" ??
मजाच आहे म्हणायची. इतरही लाखोजणांवर भारतात कायदेशीर अन्याय अन दडपणं होत आहेत. त्यांना अन त्यांच्या फ्यामिलींनाही तिकडे शरण द्या आता. अमेरिका म्हणजे एकदम अन्यायग्रस्तांची मसीहाच आहे म्हणायची.
वर दिलेल्या लिंकमधे काही उत्तम प्रतिक्रिया आहेत. तशा सगळ्याच प्रतिक्रिया वाचनीय आहेत.
प्रित भरारा यांचे स्टेटमेंट
http://www.foxnews.com/politics/interactive/2013/12/19/statement-by-us-a...
-Nile
भारतीय परराष्ट्रखात्याचे प्रत्युत्तरात्मक विधान
http://www.mea.gov.in/media-briefings.htm?dtl/22682
भरारा ह्यांचे विधान व
भरारा ह्यांचे विधान व त्यावरचा परराष्ट्र खात्याचा प्रतिसाद साधारणपणे मराठी(फॉर दॅट मॅटर ऑन एनी सुलिटरेट डिस्कशन फोरमवर) संस्थळावर घडणारा सं/वाद वाटतो, थोडक्यात त्यांच्या पातळीवर बालिश वाटतो.
कुतूहल
समजा, आपण जर भारतीय परराष्ट्रखात्याच्या प्रवक्त्याच्या बुटात असतात, तर आपण या प्रसंगी (पक्षी: भरारांनी असे विधान अधिकृतरीत्या आणि जाहीररीत्या केल्यावर) नेमके काय केले असतेत?
(प्रश्न आपल्याविरुद्ध नाही. वेगळे पर्स्पेक्टिव/उपलब्ध पर्याय समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.)
एकंदर प्रकारात "भरारा विरुद्ध
एकंदर प्रकारात "भरारा विरुद्ध परराष्ट्र मंत्रालय" असे चित्र आपल्या दृष्टिने फारसे प्रगल्भ वाटत नाही, त्यातही पत्रातील (फालतू)मुद्यांचा समाचार एक-एक करुन घेणे मला नक्कीच बालिश वाटते.
त्रयस्थाच्या दृष्टिकोनातून...
...प्रगल्भ वाटणार नाहीही कदाचित. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या भूमिकेतून "प्रसंगी गप्प बसणे" हा पर्याय (निदान या प्रसंगी तरी) नसावा, असे वाटते.
गप्प बसु नये पण वकिलाचा
गप्प बसु नये पण वकिलाचा मुद्दा हा एक मोठ्या प्रत्युत्तराचा छोटासा भाग असता तर दखल घेतली असेही झाले असते आणि लाजही राखली असती, हे टेनीसच्या चेंडूप्रमाणे आला कि टोलवला असे करणे वाटले.
तर आपण या प्रसंगी (पक्षी:
यापुढील बोलणी केरी व मेनन यांच्यात होतील इतकेच जाहिर करून प्रीत भरारा यांच्या मताला उत्तर देण्याची गरज नाही असे म्हणत बेसिकली उत्तर टाळले असते. असे उत्तर देणे म्हणजे विरुद्ध पक्षाला अधिकचे तपशील देत रहाणे + संभाव्य बचावाची कल्पना देण्यासारखे झाले.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हम्म्म्...
रोचक.
मुद्दा विचार करण्यासारखा आहे खरा.
खोब्रागडे यांच्यावरील कारवाई
खोब्रागडे यांच्यावरील कारवाई व्हिसा घेताना खोटी माहिती दिल्याबद्दल झाली आहे की अमेरिकेच्या किमान वेतन कायद्याचा भंग केल्याबद्दल झाली आहे?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आता लांबणार प्रकरण.
तिढा पिळला अजूनच अमेरिकेने.
http://www.ndtv.com/article/cheat-sheet/devyani-khobragade-case-no-apolo...
http://timesofindia.indiatimes.com/india/No-retroactive-immunity-for-Kho...
वेगळाच पैलू.
या प्रकरणाला प्रथम तोंड फुटले तेव्हाच हेर-प्रतिहेरगिरीची दाट शंका आली होती. पण ऐकीव आणि खासगी माहितीवर विसंबून लिहिणे अथवा हिंट देणे योग्य नव्हते. आता थेट दुवा उपलब्ध झाला आहे. एम.ई.ए. किंवा रॉ हे बरेच गुंतागुंतीचे प्रकरण असते आणि त्याचे कोणतेही दुवे संस्थळावर चर्चेसाठी किंवा अन्य कशाहीसाठी उपलब्ध नसतात. पब्लिक आपले 'राष्ट्राचा कणा' अथवा 'सरकारी अधिकार्यांचा भ्रष्टाचार' या एवर-ग्रीन आणि एवर-पॉप्युलर मुद्द्यांवर दातांच्या कण्या करत बसते.
असो. हे प्रकरण दिसते तितके साधे नाही हे खरे.
सुरवातीला शंका आली नव्हती पण
सुरवातीला शंका आली नव्हती पण जेव्हा प्रीत भरारा याने त्या तथाकथित "मेड" ला भारतातून 'एव्हॅक्युएट" केल्याचे म्हटल्यावर डोक्यात ही शंका आली होती.
अर्थात अगदी आतल्या गोष्टी कधीच कळणार नाहीत - कळू नयेतही.
म्हणूनच वर म्हटलंय तसं. कठोर प्रतिक्रीया हवी हे मान्य किती कठोर? कशी प्रतिक्रीया वगैरे साठी सरकारच बेस्ट जज!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
?
?
सध्या तरी देवयानी खोब्रागडे
सध्या तरी देवयानी खोब्रागडे इश्यू संपलेला आहे. पण तो देवयानी पुरता संपला असं मानून शांत बसणे ही घोडचूक होईल. या निमित्ताने भारताने ताणून धरल्यास अमेरिकेला दुस-या देशांच्या कायद्यांचंही आपण पालन करायचं असतं याचं भान येईल. ज्यांना देवयानी ने कायदा मोडला, कायदा मोडला, कायदा मोडला इतकंच तुणतुणं वाजवायचं आहे त्यांनी बुब्बुळावर आलेला पडदा साफ करावा.
http://naukarshahi.in/archives/10577
गेली अनेक वर्षे भारताचे आणि इतर देशातले लोक हेच करतात. कारण अमेरीकेने व्हिएन्ना कराराला पायदळी तुडवणारे कायदे बनवलेले आहेत. प्रीत भराराने यापूर्वी दोषी ठरवलेल्यांपैकी अनेक जण निर्दोष सुटले आहेत. अमेरिकेतल्या वकिलांचे काळे कारनामे सर्वश्रुत आहेत. तुम्हाला कुणाचा धक्का लागला तरी एखादा वकील फोन करून इतके इतके पैसे मिळवून देतो म्हणून फोन करतो. नुकसान भरपाईतला काही हिस्सा ठरवून घेतो. ही कायदेशीर वाटमारी अशी आहे कि आपल्या देशातला भ्रष्टाचार फिका पडावा.
भारतातून जाणारे परराष्ट्रखात्याचे नोकर हे अमेरिकेच्या व्हिसा अधिका-यांना संपूर्ण कल्पना देऊन मगच जातात. नाहीतर त्यांना स्वत:लाच कमी पगार असताना व्हिसा मंजूर कसा होऊ शकतो ? मी वाचत आहे. अमेरिकेला फक्त जशास तसे ही भाषा कळते. चीनच्या वकिलातीतल्या कर्मचा-यांच्या नादालाही अमेरिका लागत नाही. आता प्रश्न फक्त देवयानीला भारतात आणणे हा नसून अमेरिकेने भारतात मोडलेल्या कायद्यांचाही आहे. त्यांनी सुरुवात केल्यावर आम्ही ऎक्शन घेतली तर आताच का जाग यावी असं म्हणणा-यांबद्दल माझ्याकडे सौम्य शब्दात निर्भत्सना करण्यासाठी शब्दच नाहीत. अमेरिकन व्हिसावर लाचार झालेल्यांची प्रतिक्रिया ही इतकी अविवेकी असेल असं वाटलं नव्हतंच, त्याहूनही लोकसत्ताकारांची भूमिका इतकी अर्धी कच्ची असेल असं वाटलं नव्हतं.
ज्यांना अमेरिकेच्या कायद्यांची काळजी आहे त्यांनी भारताने तीच अॅक्शन का घेऊ नये याचं तर्कशुद्ध स्पष्टीकरण द्यावं. भारतातल्या अमेरिकन वकिलातींमधे शेकडो हेर व्हिसाशिवाय वावरताहेत. त्यात सीआयए चे एजंटसही असू शकतात. पाकिस्तानात या एजंटसनी दोन खून केल्यानंतरही राजनैतिक संरक्षण, व्हिएन्ना करार वगैरे मुद्दे अमेरिकेने उपस्थित केले होते.
जिज्ञासूंनी २०११ मधलं चेन्नईतल्या अमेरिकन वकिलातीतल्या अधिका-याच्या भाषणाचा किस्सा गुगळून पहावा. जयललिता यांनी भारत सरकारला अटक करण्यासंदर्भात पत्र लिहीलं होतं. पण अमेरिकेने लगेचच व्हिएन्ना कराराच्या आड लपत त्या अधिका-याला सुरक्षित अमेरिकेत पाठवलं.
लोकांनी अमेरिकेचे कायदे आहेत यावर डोकं देण्यापेक्षा आपल्या अधिका-यांनी ते कायदे वरील पार्श्वभूमीवर का पाळायचे यावर डोकं लावलं पाहीजे. तिथल्या पोलिसांच्या ते कार्यकक्षेत येत नाही म्हणून त्यांच्य़ाशी चर्चा करण्यात अर्थच नाही. अमेरिकेने चेन्नई पोलीस, तामीळनाडू सरकार यांच्याशी चर्चाच केली नाही. किंवा तिथल्या जनतेने भारतातले कायदे काय याचा कीस पाडला नाही किंवा पर्वाच केली नाही. व्हिएन्ना करार - दोन देशांतले राजकिय संबंध आणि मामला खतम ! बस्स. यापलिकडे जास्त काही म्हणायचे नाही.
....
?
?
नवी बाजू यांच्या उपरोक्त
नवी बाजू यांच्या उपरोक्त दोन्ही संभ्रमांशी ससंभ्रमती.
अनुक्रमे कोणता दुवा उपलब्ध झाला आहे आणि प्रकरण संपले कसे हे उलगडावे अशी इच्छा.
आउट्लुक ची बतामी
पहिलाच प्रतिसाद ह्या साईटवर
http://blogs.outlookindia.com/default.aspx?ddm=10&pid=3109&eid=31
बाकी सर्व विविध मतांमध्ये वरील लिंक मधली थेअरी जास्त सयुक्तिक वाटते
http://www.loksatta.com/mumbai-news/ramdas-athawale-set-to-meet-
http://www.loksatta.com/mumbai-news/ramdas-athawale-set-to-meet-barack-o...
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
.
.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
प्रकरण
प्रकरण या शब्दाची मौजमजा कमी करणारा धागा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
येन केन प्रकारेण
देवयानी प्रकरण is getting curioser and curiouser! जितके पापुद्रे सोलाल तितके नवनवीन खाली आढळत आहेत. ह्या सर्वाच्या तळाशी आहे ह्या बाईंची आपल्याला हवे ते मिळवायची धडपड.
सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयानुसार देवयानीबाईंनी हवी ती परकीय भाषा मिळविण्यासाठी परराष्ट्र मन्त्रालयावर दबाव आणून आपल्या सहकारी अधिकार्यावर अन्याय केला. असे करण्याबाबत कोर्टाने सरकारला २५,००० रुपयांचा दंड केला.
त्यांच्या देशभर पसरलेल्या ११ मालमत्तांची सरकारात दिलेली अधिकृत यादी येथे पहा. १०-१२ वर्षांच्या नोकरीत त्यांना हे कसे जमले असावे?
आपल्यावर आलेल्या सर्व संकंटांचा मुकाबला करण्याची कुवत त्यांच्यामध्ये भरपूर आहे असे दिसते. स्वतः बांधलेल्या सापळ्यामध्ये आता त्या अडकल्या आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने आपली पत पणाला लावण्याचे काहीच कारण दिसत नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात जमिनीचे
रत्नागिरी जिल्ह्यात जमिनीचे भाव काय आहेत ? ३०,००० रु एकर पासून ते १,००,०००/ रु एकर पर्यंत. लांजा मधले भाव काय आहेत ? या अकरा प्रॉपर्टीज घेणं सहजच शक्य आहे. सरकारी अधिका-यांना इन्कम टॅक्स रिटर्न्स भरावे लागतात. त्याच बरोबर प्रॉपर्टीचे वर्षातले व्यवहार लिहून द्यावे लागतात. ते लपवता येत नाहीत. ही पोर्टलवरून घेतलेली माहीती असल्याने अधिकृत आहे. त्यात लपवाछपवी काहीच नाही. या प्रकारच्या बातम्या तिला पाठिंब्याची गरज असताना कशा काय येताहेत ? सरकारी अधिका-यालाच नाही तर आयटीतल्या नोकरीत तीन चार वर्षातच या पेक्षा दुप्पट प्रॉपर्टीज करता येतात. दर तीन वर्षांनी किंवा डबल किंमत झाल्या कि त्या विकतात हल्ली. पैसे पूर्वीसारखे कुणी पोस्ट्च्या योजनेत गुंतवत नाही. माहीती दडवली असती तर गोष्ट वेगळी. यात संशय घेण्यासारखंच काही नाही. पण अज्ञान असेल तर संशयाची बीजं नक्कीच पेरली जातील.
खोब्रागडे दोषी असतील तर कारवाईचा आग्रह आपण सगळेच धरू. पण भारतातली प्रकरणं भारतात. त्यातल्या एका प्रकरणात मुंबई मनपाचे तत्कालीन कमिशनर जयराज फाटक, हा घोटाळा करणारे प्रदीप व्यास, अशोक चव्हाण, कै. देशमुख साहेब, गिडवाणी ( आदर्शचे प्रमोटर) आणि अन्य बरेच जण आहेत हे आपण विसरतोय कि काय ? कि ज्यांनी आदर्श प्रकरण घडवून आणलं ते स्वच्छ आणि वादग्रस्त प्रकल्पात फ्लॅट घेतलेले सदस्य दोषी म्हणून फक्त त्यांच्यावर कारवाई झाली कि आपली मन:शांती होईल ?
फेसबुक वर खूप रोचक (धन्यवाद ऐसीअक्षरे ) माहीती मिळतेय. त्यातली इथे शेअर करतोय.
आपल्याला कायद्याने कारवाई केलेल्या एसीपी वसंत ढोबळेंना आपण क्रूरकर्मा ठरवले होते. आमच्या मुलांना नाईटलाईफचा अधिकार आहे म्हणणा-यांनी हे अन्याय्य कायदे बदलावेत म्हणून मेणबत्ती मोर्चे काढले होते. ढोबळेंवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून स्टेटमेण्टस दिली गेली होती. आज तेच लोक अमेरीकेचे कायदे पाळावेत म्हणून इतके हळवे कसे काय झाले बुवा ?
....
ढोबळेंवर कायदेशीर कारवाई
हीच तर मेख आहे. या दुटप्पीपणावर सोयीस्कर मौन पाळले जाते हेही एकूण लौकिकास साजेसेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खोब्रागडे दोषी असतील तर
सहमत
प्रश्नं मनःशांतीचा नाही. अपराध्याला शासन व्हायला पाहिजे आणि त्या बरोबर अपराधात सहाय्यक होऊन स्वतःचा फायदा करून घेणार्यांना सुद्धा शासन व्हायला पाहिजे. खूप सारे लोक अपराध करून मोकळे राहू शकतात कारण त्यांना मदत करणारे, पाठीशी घालणारे लोक असतात म्ह्णून. आणि एकाला शिक्षेतून सुटका मिळाली म्हणून दुसर्यालाही शिक्षा होऊ नये असे म्हणणे अगम्य वाटते.
तुम्ही दोन वेगवेगळ्या प्रकरणांची गल्लत तर करत नाहीयेत ना?
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
किरण यांचा प्रतिसाद वाचत
किरण यांचा प्रतिसाद वाचत होतो. मनिषा यांचं उत्तर वाचून खेद वाटला.
तुमच्या या प्रश्नाला तुम्हीच उतर दिलेय. फक्त दोन विचारांचं कनेक्शन जोडलं जात नाहीय.
तुम्ही उलटा विचार का करत नाही ? आदर्श आणि आताची केस याची गल्लत कोण करतंय ? किरण यांचा प्रश्न अचूक आहे असं तुम्हाला का वाटत नाही माहीत नाही. आदर्शचा खटला भारतातच चालेल. त्याचा संबंध सातत्याने या केस मधे जोडण्याचं कारण काय ? आपण आधीच न्यायाधीश कसे असू शकतो ? आणि कायदेपालनाबाबत आपण इतके कठोर असू तर एसीपी वसंत ढोबळेंनी ज्यांच्यावर कारवाई केली ती भारताच्या अस्तित्वात असलेल्या कायद्यान्वये केली कि त्यांच्या घरच्या कायद्यान्वये केली ? त्या वेळी ढोबळेंची बदली करा म्हणून सह्यांची मोहीम काढणे, विविध वाहीन्यांवरून मोहीम उघडणे, मेणबत्ती मोर्चे काढणे यात सामील असणारांना हा कायदा मोडला गेलाय याची माहीती नव्हती का ? तो कायदाच रद्द करा अशी मागणी करणारे माझ्या माहीतीतले अनेक जण आता मात्र कठोर कायदेपालकच्या भूमिकेत वावरताना पाहणे हे आश्चर्यच आहे. याला सोयीची भूमिका घेणे असं म्हणतात.
मी स्पष्टच सांगतो कि जर देवयानीचं आडनाव खोब्रागडे ऐवजी वेगळं काही असतं तर नक्कीच या लोकांची भूमिका वेगळी असती. त्यांचे चष्मे वेगळे असते. इथे लोक किमान एव्हढं तरी म्हणताहेत कि जर आदर्श प्रकरणात दोषी असेल तर तिला भारतात शिक्षा होऊ द्या. पण आरुषी हत्याकांड प्रकरणात तिचीआई नुपूर चिटणीस ही दोषी असताना दोन दोनदा खटले चालवायला लावणा-या मेडीयाकडून काय अपेक्षा ठेवणार ? कोण लागून गेल्या नुपूर चिटणीस तलवार ? दोन्ही वेळा त्या दोषी ठरल्यानंतर नुपूर चिटणीस यांच्या आई वडीलांची मुलाखत दाखवणे, कॅनडास्थित त्यांच्या बहीणीची मुलाखत दाखवणे आणि त्या बाईने सरळ सरळ भारतातल्या न्यायव्यवस्थेवरचा माझा विश्वास उडाला असे म्हणणे हे कशातून येतं ?
अगदी स्पष्ट आहे, फक्त ते बोलून दाखवता येत नाहीये इतकंच. या प्रकरणावर सविस्तर बहिष्कृत भारत या ब्लॉगवर सविस्तर लिहीले आहे. देवयानी या सर्व प्रकारे निर्दोष असल्याची खात्री झाल्यानंतरच लिहीतोय. मला त्यांच्यापासून एक पैसा फायदा नाही कि ना त्या माझ्या ओळखीच्या, ना नात्याच्या. याच पद्धतीने निर्भया केस मधेही संतापाने सामील झालो होतो. तेव्हां मी जात पाहिली नाही किंवा निर्भयाच्या आयुष्यात काही चुका झालात का हे तपासून त्याचा संबंध जोडून घटनेचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला नाही.
आता देवयानी दोषी कि निर्दोष हा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवू. पण महिलांना सुद्धा कॅव्हिटी सर्च चा मुद्दा अजिबात संतापजनक वाटू नये ? भयंकर निराशाजनक आहे. महिला या महिला नसून सोय बघून भूमिका घेणा-या ह्युमन बिइंग आहेत असं म्हणू का ? महिलांच्या अवमानप्रकरणी याच महिलांनी मोहीम चालवली होती कि ती वेश्या जरी असेल तरी तिच्याक्डे तुम्ही वासनांध नजरेने पाहू शकत नाही, तिचा विनयभंग होईल असं वर्तन कर शकत नाही. बलात्कार तर नाहीच नाही.
मग या महिला खैरलांजी प्रकरणात आणि एक महिला म्हणून देवयानी प्रकरणात हीच भूमिका कायम ठेवताना का दिसत नाहीत ?
देवयानी यांच्या भगिनी शर्मिष्ठा यांच्याकडून मिळालेली माहीती खालील लिंकवर पहायला मिळेल.
https://www.facebook.com/notes/sharmistha-khobragade/having-a-servant-is...
( या प्रकरणात मिळालेली माहीती ब्लॉग वर अपडेट करतच आहे. कुणाला महत्वाची वाटल्यास वापऊ शकता. श्रेय देण्याचीही गरज नाही).
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
तुम्हाला माझं उत्तर वाचून खेद
तुम्हाला माझं उत्तर वाचून खेद वाटला हे वाचून मला खेद वाटला..
कशातूनही काहीही अर्थ काढता येतो हे खरं आहे. पण प्रत्येकवेळी तसं करु नये अशी नम्रं विनंती.
मी माझ्या संपूर्ण उत्तरात कुठेही देवयानीबाईंची जात, त्यांचा आदर्श व्यवहारात संबंध आहे की नाही याचा उल्लेखही केला नाही. तसेच आपण नीट वाचले असेल, तर पहिल्याच ओळीत भारतातील गुन्ह्यांची (केला असेल तर) शिक्षा परदेशात करणे योग्यं नाही असेच लिहीले आहे. कारण हे म्हणजे, माझ्या मुलाने घरी काही (माझ्या दृष्टीने) चूक केल्याबद्दल, मी त्याच्या शाळेतल्या बाईंकडे तक्रार करुन, त्यांना त्याला शिक्षा करायला लावणे असाच प्रकार होईल नाही का? आणि हे करताना मीच माझ्या घराची अब्रु वेशीला टांगल्यासारखेच होईल याची मला जाणीव आहे.
मला उलटा विचार करता येत नाही. किरण यांचा प्रश्नं अचूक आहे हे तुमच मत माझं नाही. कारण ढोबळे वापरत असलेला कायदा हा गैरवर्तनासंबधात होता. आणि देवयानीबाईंवर आरोप वेगळा आणि जास्तं गंभीर स्वरूपाचा आहे. आणि तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तो भारताने नाही अमेरिकेने लावला आहे. म्ह्णून हे दोन्ही विषय भिन्न आहेत असे मला वाटते.
मी जसा तुमच्या मत स्वातंत्र्याचा आदर करते.. तसाच तुम्हीही माझ्या मतस्वातंत्र्याचा आदर करावा अशी अपेक्षा.
जातीपातीचा विचार मी कधीही केलेला नाही इतकेच नव्हे तर माझ्या घरच्यांनीही कधी केला नाही. त्यामुळे वागणूकीत भेदभाव करणे, अन्याय करणे या गोष्टी तर कधी आमच्या कल्पनेतही आलेल्या नाहीत. तुम्ही असा व्यर्थ आरोप करून आमच्या भावना दुखावता आहात असं तुम्हाला वाटत नाही का?
हे असं तुम्हाला माझ्या उत्तरात कुठे आढळले?
तुम्ही करत असलेले कार्यं, तुमची तळमळ नक्कीच खरी आहे, पण तुम्हाला न पटणारी मत मांडणारी लोकं तुमच्या विरोधातच आहेत असं कृपया समजु नये.
आणि देवयानी बाईंच्या दोषी अथवा निर्दोषी असण्याबद्दल, तसेच त्यांना शिक्षा देणे योग्य कि अयोग्य या बाबींवर मी काहीच विधान केलेले नाही. कारण तसे ठाम मत तयार होण्याइतकी पुरेशी आणि खात्रीलायक माहिती माझ्याकडे नाहीये.
तुम्ही जर माझे उत्तर परत वाचले तर तुमच्या लक्षात येईल की मी अत्यंत जनरल विधान केले आहे. कुणालाही अपराधी अथवा निरपराधी ठरविले नाहीये.
त्यामुळे तुमचा खेद अनाठायी आहे असे मला वाटते.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
तुम्ही करत असलेले कार्यं,
+१
कारण ढोबळे वापरत असलेला कायदा
>>
हे कसं आणि कुणी ठरवायचं असतं बुवा ??
बाकि काही म्हणायचं नाही.
....
अगदी अगदी!
हो हो! त्या प्रभू रामचंद्राने नाही का, त्या धोब्याचा सल्ला ऐकून सीतेपाठी आपली पत पणाला लावण्याचा नाद सोडून दिला होता.
नाहीतर भारताचे परराष्ट्रखाते!
('ऐसी'चालकांस विनंती: तेवढा तो सारक्याझम फॉण्ट जरा उठून दिसेल अशी काहीतरी व्यवस्था करा बुवा! सध्या आहे तसा आम वाचकांस दिसतोच, असे नाही.)
कपाटातले सापळे गडगडत बाहेर येत आहेत -
"स्केलेटन्स इन द कब्बर्ड आर टंबलिंग आऊट" चे मोडकेतोडके (आजच्या मराठीत तुटकेफुटके ) मराठी भाषांतरः
http://www.firstpost.com/world/more-skeletons-tumble-out-of-devyani-khob...
भारत सरकार
भारत सरकारला यातून नक्की काय साध्य करायचे आहे कळत नाही:
१. देवयानी या मुळात निर्दोष आहेत हे अमेरिकन सरकारला पटवून देणे. हा उद्देश दिसत नाही. किंबहुना त्या या प्रकरणात निर्दोष आहेत असा क्लेम भारतातही फारसा कोणी केलेला नाही.
२. डिप्लोमॅटिक इम्युनिटी. राजनैतिक अधिकार्याला अशी वागणूक देणे भारताला पसंत नाही असे अमेरिकेला ठणकावून सांगणे, व त्याकरिता राजनैतिक पातळीवर हे गंभीरपणे घेणे. अमेरिका व भारत यांत काहीतरी गंभीर वाद चालू आहे असे आंतरराष्ट्रीय पातळीवर व अमेरिकन प्रसारमाध्यमांतही जाणवून देणे. भारतासह इतर असंख्य देशांनाही अडचणीत आणणारा हा प्रश्न systemic पातळीवर सोडवणे.
३. आपण काहीतरी करत आहोत असे भारतीय जनतेला दाखवणे, ही बातमी थंड होईपर्यंत. यात भारतातील "प्रखर राष्ट्रवादी" प्रतिमा असणारे पक्ष (भाजप, सेना ई) व "दलितांचे तारणहार" प्रतिमा असणारे पक्ष (मायावती, रिपाईं ई) यांना गप्प करणे. हे अंतर्गत धोरण.
यात "१" वर फारसा जोर दिसलेला नाही. त्यामुळे "२" किंवा "३" यातील काहीतरी गृहीत धरले, तर सुरूवातीला "२" प्रमाणे वाटणारी सरकारची प्रतिक्रिया आता "३" सारखी वाटू लागली आहे.
खुद्द मेन्स्ट्रीम अमेरिकन मीडियामधे जेवढी व्हायला हवी तेवढी चर्चा झालेली दिसत नाही. न्यू यॉर्क टाईम्स, वॉल स्ट्रीट जर्नल, वॉशिंग्टन पोस्ट इ मधे येणार्या बातम्या प्रामुख्याने व्हिसा फ्रॉड बद्दल, किंवा भारतातील उच्चपदस्थ लोकांना असलेल्या नियम वाकवण्याच्या सवयीबद्दल दिसल्या (क्वचित एखाद दुसरी "राजदुतांशी अश्या वागण्याबद्दल" किंवा "महिलांच्या बाबतीत भारतातील कल्चर वेगळे असण्याबद्दल" होती, पण त्या ठळकपणे सर्वत्र दिसत नाहीत). दुसरे म्हणजे अमेरिकन रिपब्लिकन पार्टी लिबिया, सीरिया नंतर ओबामा सरकारच्या परराष्ट्रीय धोरणातील 'फेल्युअर' म्हणून (current and future ally) भारताला दुखावण्याबद्दल (आणि एम्बसीचे खास संरक्षण काढून घेण्यात याचे पर्यवसान झाल्याने निर्माण झालेल्या दूतावासाच्या सुरक्षेच्या मुद्द्याबद्दल) मुद्दा काढेल असे वाटले होते तसेही काही दिसत नाही (फॉक्स न्यूज वगैरे पाहता).
भारतातील बर्याच जणांना यातील खाचाखोचा माहीत नसतील, त्यामुळे सगळी अमेरिका एकच अशा थाटात भारतात वक्तव्ये केली जातात (राजकीय, मीडिया कडून). पण गेल्या अनेक वर्षांत येथील जनमत भारताला बरेच अनुकूल झालेले आहे. हा प्रश्न नीट पद्धतीने अमेरिकन जनतेसमोर मांडला गेला असता तर अपेक्षित परिणाम होऊ शकला असता. सिरीयाच्या वेळी पुटिन सरकारने न्यू यॉर्क मधलीच एक पी आर फर्म पकडून बरेच उद्योग केले होते (उदा: न्यू यॉर्क टाइम्स या 'लिबरल' पेपर मधे ओबामावर टीका करणारा लेख. सध्या लिबरल म्हणजे प्रामुख्याने ओबामाधार्जिणा पेपर असे समजावे. त्यामुळे याचे महत्त्व होते) तसे भारताने काही केलेले दिसत नाही.
एकूण सुरूवातीला बराच जोर होता, पण हळुहळू विरत चाललेला दिसतो.
खूप छान प्रतिसाद. आवडला.
खूप छान प्रतिसाद. आवडला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
@फारएण्ड : या प्रकारच्या
@फारएण्ड : या प्रकारच्या विश्लेषणाची घाई झालीय असं वाटतंय.
मी म्हटलं होतं कि देवयानी प्रकरण संपलेलं आहे ते यासाठी कि त्यांची बदली यूएन मधे झालेली आहे. त्या संदर्भातली कारवाई चालू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीस पुढील आठवड्यात त्यांना संपूर्ण राजनैतिक असल्याचे पत्र देताहेत. त्याआधी भारताकडून त्यांच्या नेमणुकीचे पत्र अमेरीकेच्या परराष्ट्रखात्याकडे ( यूएन त्या देशात असल्याने) गेलेले आहे. यूएनला भारताचे पत्र मिळाले आहे. अजून तरी देवयानी यांना पुन्हा अटक केली नाहीये. यावरून अमेरीका काहीही गुरगुरत असली तरी पुन्हा वाद चिघळवणार नाही हे स्पष्ट होतंय.
देवयानी या मुळात निर्दोष आहेत हे अमेरिकन सरकारला पटवून देणे. हा उद्देश दिसत नाही. किंबहुना त्या या प्रकरणात निर्दोष आहेत असा क्लेम भारतातही फारसा कोणी केलेला नाही. >> असा क्लेम परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे. त्यांना संपूर्ण राजनैतिक संरक्षण असल्याचा त्यांचा दावा आहे. व्हिएन्ना कराराच्या कलमांशी फटकून वागणारा अमेरीकेचा कायदा स्विकारायचा कि नाही हा वाद या सर्वांच्या मुळाशी आहे. देवयानी पेक्षा ज्युनियर असलेल्या रशियाच्या ४९ अधिका-यांना अमेरीकेच्या आरोग्य योजनेत भ्रष्टाचार केल्याच्या योजनेत दोषी सापडूनही प्रीत भरारा तिथे असतानाही अमेरीकेने डिप्लोमॅटीक इम्युनिटी आहे असं कारण देऊन सोडून दिलं आहे. ब्राझील आणि चीनच्या केसेसमधे ही हीच भूमिका घेतली. प्रभू दयाळ यांनी सेटलमेण्ट केली, पण नीना मल्होत्रा यांनी केली नाही. त्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे त्यांना राजनैतिक संरक्षण द्यावं यासाठी भारताने हालचाल केलीच होती. भारताचं परराष्ट्र खातं काहीच करत नाही असे आरोप कशाच्या आधारावर चालू आहेत हे मला कळत नाही.
२. डिप्लोमॅटिक इम्युनिटी. राजनैतिक अधिकार्याला अशी वागणूक देणे भारताला पसंत नाही असे अमेरिकेला ठणकावून सांगणे, व त्याकरिता राजनैतिक पातळीवर हे गंभीरपणे घेणे. अमेरिका व भारत यांत काहीतरी गंभीर वाद चालू आहे असे आंतरराष्ट्रीय पातळीवर व अमेरिकन प्रसारमाध्यमांतही जाणवून देणे. भारतासह इतर असंख्य देशांनाही अडचणीत आणणारा हा प्रश्न systemic पातळीवर सोडवणे. >>> एक म्हण अशी आहे कि चपलेने मुंगी मरत असेल तर तिला मारायला रणगाडा कशाला हवा ? म्हणजे फक्त बॅरीकेडस हटवणे, भेट नाकारणे, फोन न घेणे या कृतीतून एकदा मेसेज गेलेला असताना उगीच वाद चिघळत जाईल अशी अॅक्शन का घ्यावी हा भारताचा पवित्रा असू शकतो. या सर्व वादाच्या मुळाशी असलेल्या अमेरीकेच्या समलैंगिक अधिका-यांना आणि व्हिसाशिवाय वावरणा-या एजंटांना अटकेत टाकणे भारताला अशक्य नाही. अमेरीकेला दुस-या देशांच्या कायद्याची कधीच तमा नव्हती. त्याची जाणीव करून द्यायला प्रत्यक्ष अटक करायला हवी असं आपल्या मुत्सद्यांना वाटत नसावे असा त्याचा अर्थ मला लागतो. यातूनही धडा घेतला नाही तर (असे वाटत नाही ) तर पुढची कृती भारत प्रत्यक्षात आणू शकतो का हे पहायचे. त्या आधी कुठलेही विश्लेषण या संदर्भात शक्य नाही.
३. आपण काहीतरी करत आहोत असे भारतीय जनतेला दाखवणे, ही बातमी थंड होईपर्यंत. यात भारतातील "प्रखर राष्ट्रवादी" प्रतिमा असणारे पक्ष (भाजप, सेना ई) व "दलितांचे तारणहार" प्रतिमा असणारे पक्ष (मायावती, रिपाईं ई) यांना गप्प करणे. हे अंतर्गत धोरण. >> मुद्दा गैरलागू.
देवयानी भारतात येतीलच. पण या निमित्ताने प्रकरण धुमसत ठेवण्यात परराष्ट्रीय मुत्सद्यांचे डावपेच काय असतील हे आपण काय सांगणार ? देवयानीच्या वकीलाची मुलाखत पाहिली तर प्रकरण जास्त काळ टिकेल असं वाटत नाही असं इथल्या वकीलाने मला सांगितलं. मला कायद्याचं ज्ञान नाही. पण अशा पद्धतीने प्रकरण संपलं तर निगोसिएशन्सचं काय हा विचार सध्या महत्वाचा वाटतो.
....
विश्लेषण
किरण - हो एका अर्थाने अजून हालचाली सुरू आहेत हे खरे. पण आत्तापर्यंतच्या हालचालींवरून ते मी लिहीले आहे. मुख्य म्हणजे भारतात अजूनही बराच आक्रमक पवित्रा दिसत आहे राजकीय नेत्यांचा, म्हणूनही लिहीले.
यावरून अमेरीका काहीही गुरगुरत असली तरी पुन्हा वाद चिघळवणार नाही हे स्पष्ट होतंय.>>> बरोबर. पण भारत तेवढ्यावर (जरः अमेरिका वाद चिघळवणार नाही, सामोपचाराची बोलणी करेल पण माफी अथवा आरोप मागे घेणे हे करणार नाही) समाधानी नसेल बहुधा. त्यामुळे आता पुढची स्टेप पुन्हा भारताने घ्यायची आहे.
असा क्लेम परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे. >>> माझ्या दृष्टीने: त्या दोषीच नसणे (आरोप केलेली गोष्ट त्यांनी केलेली नसणे, किंवा त्यांनी केलेली गोष्ट चूक नाहीच असे त्यांचे म्हणणे असणे) व राजनैतिक अधिकार्याला असलेले कायदेशीर संरक्षण (इम्युनिटी) या दोन स्वतंत्र मुद्द्यांपैकी भारतात बहुसंख्य नेते इम्युनिटीबद्दल बोलत आहेत. दोषी नसण्याबाबत फारसे कोणी काही म्हणत नाही. एक खुलासा: त्या दोषी आहेत की नाहीत याबद्दल हे माझे मत नाही: मी फक्त भारत सरकारच्या अॅप्रोच बद्दल बोलतोय.
भारताचं परराष्ट्र खातं काहीच करत नाही असे आरोप कशाच्या आधारावर चालू आहेत हे मला कळत नाही. >> नाही मे तसे म्हणत नाही. भारतात जी आक्रमक चर्चा सुरू आहे त्याचा परिणाम (किमान अजून) दिसत नाही एवढेच.
मुद्दा गैरलागू. >>> माझ्या मते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकार कितीही सिन्सियर असले तरी विरोधी पक्षांच्या राजकीय खेळ्यांना तसेच उत्तर द्यावे लागतेच.
योग्य पर्स्पेक्टिव्ह करिता: हा केवळ विश्लेषणाचा प्रयत्न आहे. जजमेंटल लिहीणे - कोणाला चूक वा बरोबर दाखवणे हा उद्देश नाही.
मानवी हक्क: अरेरे
देवयानी खोब्रागडे यांच्या जातीकडे पाहून त्यांच्या वर्तणुकीवर होणारी टिका अयोग्य आहे हे निश्चित. पण प्रत्यक्षात या बाई भारतातल्या नवउच्चवर्गाचे प्रतिनिधित्व करतात असे उलगडत असलेल्या तपशीलांवरून वाटते. नव्यानेच समजल्यानुसार या बाईंचे पती श्री आकाशसिंह राठोर हे मानवी हक्क-कायदा या क्षेत्रात संशोधन करतात. मानवी हक्कांवर त्यांनी दोन-चार पुस्तकेही संपादित केलेली आहेत. या आदर्श जोडप्याकडून मोलकरणीस कमी पैसे देऊन मानवी हक्कांची पायमल्ली होऊच कशी शकेल?;)
या संपूर्ण प्रकरणात ज्यांना
या संपूर्ण प्रकरणात ज्यांना आक्षेप आहेत त्यातले ९०% लोक त्यांच्या मोलकरणीला महीना २००० रु. च्या वर (पुण्यासारख्या महागड्या ठिकाणी) देत नसावेत. रोज २ तास एका महिनाभर काम केले तर इतके पैसे मिळतात. मुंबई दिल्लीत जास्त आहे. तिला जास्तीत जास्त चार घरची कामं केल्यावर महिना आठ ते दहा हजार मगार मिळतो. मुंबई दिल्लीत पंधरा ते वीस पर्यंत जास्तीत जास्त वेतन मिळत असावं. इथे तिला ३०,००० रु भारतीय चलनात आणि अमेरीकेत राहण्याची सोय, जेवणखाण, मेडीकल इतर सुविधा आणि उरलेले पैसे डॉलर मधे असा करार ठरला होता.
याउप्पर अमेरीकेचा जो कायदा लागूच होत नाही तो गंभीर गुन्हा असल्याची खात्री पटलेल्यांची समजूत काढणे हे अशक्य आहे. वर यासाठीच मी भारतातली काही उदाहरणं दिली होती. असो.
....
ढोबळें चा विषय आलाय म्हणून मी
ढोबळें चा विषय आलाय म्हणून मी उडी घेतो. कारण मी त्या वेळी त्यांच्या कारवाई विरुद्ध भूमिका घेतलेली होती.
माझी भूमिका स्पष्ट मांडतो -
१) ढोबळेंनी ज्या कायद्याचा वापर केला होता त्या कायद्यास माझा विरोध आहे. ढोबळे हे घटनात्मक दृष्ट्या पारित केला गेलेल्या कायद्याची राबवणूक करत होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई ची मागणी करणे उचित नाही. त्यांच्या बदलीची ही मागणी अनुचित आहे/होती. व मॉरल पोलिसिंग तो कायदा करत होता. ढोबळे हे त्याची अंमलबजावणी करत होते. माझा मॉरल पोलिसिंग ला विरोध आहे. ढोबळे सायबांना नाही.
२) आपल्याकडे खूप कायदे आहेत पण त्यांची अंमलबजावणी ठीक होत नाही - अशी मागणी अनेकदा ऐकू येते. (मी स्वत:देखील ही मागणी करतो अनेकदा.). जर ढोबळे साहेब जर घटनात्मक दृष्ट्या पारित केला गेलेल्या कायद्याची राबवणूक/अंमलबजावणी करत असतील तर त्या अंमलबजावणीस विरोध करण्यापेक्षा - त्या कायद्यास विरोध करणे गरजेचे होते. व ते ही जेव्हा ते करणे गरजेचे होते (when the law was being discussed in the legislature) तेव्हा जनतेने (मी ही त्यात आलोच) ते केले नाही. आता ढोबळे सायबांना विरोध/कारवाई करण्यात काय हशील आहे ? He is not a lawmaker. त्यांची बदली करवून त्यांचे नीतीधैर्य खच्चीकरण होत नाहिये का ?
३) जर तो कायदा आवडत नाही तर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते ना ? न्यायालय ठरवेलच की तो कायदा घटनाबाह्य आहे किंवा कसे ते. व न्यायालयाने हे अनेकदा केलेले आहे.
४) त्यावेळी परिस्थिती इतकी बिकट होती की ढोबळेंच्या बाजूने (त्यांच्या बचावासाठी) कोणीही उभे राहीले नाही. फक्त त्यांचे बॉस (कमिशनर) तेवढे उभे होते.
५) सगळ्यात महत्वाचे - त्यावेळी या विषयावर मी "मीमराठी" या संकेतस्थलावर मधे विवाद केला होता. त्याची रेकॉर्ड्स/प्रुफं नाहियेत माझ्याकडे पण - as much as I remember, I had not criticized ACP Dhoble per se.
गंमत जंमत
US NAVY .....
This is a transcript of an ACTUAL radio communication between a U.S. NAVY ship and Canadian authorities off the cost of Newfoundland, October 1995. Radio log released by the Chief of Naval Operations 10/10/95:
CANADIANS: Please divert your course 15 degrees South to avoid collision.
AMERICANS: Recommend you divert your course 15 degrees North to avoid a collision.
CANADIANS: Negative. You will have to divert your course 15 degrees to the South to avoid a collision.
AMERICANS: This is the captain of a U.S. Navy ship. I say again, divert.
CANADIANS: No, I say again, you divert YOUR course.
AMERICANS: THIS IS THE AIRCRAFT CARRIER USS LINCOLN, THE SECOND LARGEST SHIP IN THE UNITED STATES' ATLANTIC FLEET. WE ARE ACCOMPANIED BY THREE DESTROYERS, THREE CRUISERS AND NUMEROUS SUPPORT VESSELS. I DEMAND THAT YOU CHANGE YOUR COURSE 15 DEGREES NORTH. I SAY AGAIN, THAT'S ONE FIVE DEGREES NORTH, OR COUNTER-MEASURES
WILL BE UNDERTAKEN TO ENSURE THE SAFETY OF THIS SHIP.
CANADIANS: This is a lighthouse . . . Your call.
ही पोस्ट इथं अतिअवांतर आहे असं वाटल्यास दोष माझ्याकडे घेईनच. पण ग्यानबाची मेख समजेल अशी आशा आहे
....
गेल्या महिन्यात भारतीय मूलीशी
गेल्या महिन्यात भारतीय मूलीशी लग्न केलेल्या, आणि तिचे माहेर टेररीस्ट इन्फेस्टेड भागात असताना देखिल तिथे नित्य भेट देण्यार्या अतिशय सयंत ब्रिटीश नागरिकाशी ३-४ तास चर्चा झाली. त्याने दिलेला गंभीर अभिप्राय -"आजही अमेरिका आणि युरोप बाहेर 'मानवी जग' आहे हे तिथल्या बर्याच लोकांना पटत नाही."
मानवी जग हा शब्द (सु)संस्कॄतता निदर्शक म्हणून वापरायचा आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मूळच्या तिथल्याच नव्हे तर
मूळच्या तिथल्याच नव्हे तर तिकडचे झालेल्या अनेकांनाही हे पटत नाही. मआंजावर त्याचे लै नमुने मिळतात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
A bit funny and silly..
A bit funny and silly.. http://m.indianexpress.com/news/devyani-and-meas-wisdom-provoke-90sec-sp...
“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes
कहानी में (आखरी?) ट्विस्ट
कहानी में (आखरी?) ट्विस्ट
बातमी जशाला तशी चिकटवत आहे.
.
.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4689735550252114956&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20140313&Provider=- पीटीआय&NewsTitle=खोब्रागडे प्रकरणी निकालाचे भारताकडून स्वागत
.
.
खोब्रागडे प्रकरणी निकालाचे भारताकडून स्वागत
नवी दिल्ली - भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधातील व्हिसा गैरव्यवहाराचा आरोप अमेरिकेतील न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याच्या घडामोडीचे भारताने स्वागत केले आहे. खोब्रागडे यांना अपमानास्पदरित्या रस्त्यावर अटक करण्यात आल्यानंतर देण्यात आलेल्या वागणुकीनंतर अमेरिका व भारतामध्ये मोठे राजनैतिक वादळ निर्माण झाले होते.
"यासंदर्भात न्यायालयाने दिलेला निकाल आम्ही पाहिला आहे. हा निकाल चांगला आहे. मात्र या निकालाचा विस्तृतपणे अभ्यास केला जाईल व त्यानंतर योग्य ती भूमिका जाहीर केली जाईल,'' असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयामधील प्रवक्त्याने सांगितले. भारताच्या अमेरिकेतील वकिलातीमध्ये ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी असलेल्या खोब्रागडे यांना गेल्या डिसेंबर महिन्यात न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या मुलांच्या शाळेबाहेर रस्त्यावर अपमानास्पदरित्या अटक करण्यात आली होती.
"देवयानी यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात येऊन त्यांना अडकाविण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय सरकार व भारतामधील नागरिकांनी या प्रकरणी मदत केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. देवयानी या पूर्ण राजनैतिक संरक्षणामध्ये आता पुन्हा अमेरिकेला जातील,'' असे त्यांचे वडिल उत्तम खोब्रागडे यांनी सांगितले.
देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात व्हिसा गैरव्यवहार आणि सत्य माहिती लपविल्याप्रकरणी न्यूयॉर्कमधील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने हि याचिका रद्द करण्याबरोबरच जामिनासंबंधी अटी व त्यांच्यावरील सर्व आरोप रद्द केले आहेत. तसेच त्यांच्याविरुद्ध असलेल्या आरोपांसंबंधात काढण्यात आलेले अटक वॉरंटही रद्द केले आहेत.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आणखी कलाटणी
संगीता रिचर्ड्सच्या नवऱ्याचा घटस्फोटासाठी अर्ज? http://indianexpress.com/article/india/india-others/devyani-khobragades-...
यात तिच्या नवऱ्याने संगीताबाईंवर खोटारडेपणाचे आरोप केले आहेत. (मात्र खोब्रागडेसंदर्भात ती खरे बोलत असल्याचा त्याचा दावा आहे.)
तान्त्रिक विजय
देवयानीबाईंचा तान्त्रिक विजय झाला आहे. त्यांना अटकेच्या दिवशी यूनोमधील पूर्वीच दिलेल्या (आणि सुरुवातीस कोणाच्याच स्मरणात - देवयानीबाईंसकट - नसलेल्या) पदाचे संरक्षण असल्यामुळे त्यांची अटक अवैध आहे असा निर्णय आहे.
भारताचे ह्यामध्ये जे वस्त्रहरण झाले - अशामुळे की भारताचा राजनैतिक प्रतिनिधि अन्य देशातील कायदे मोडतो आणि त्यासाठी खुळचट करारहि भारतात करून 'फिगलीफ' निर्माण करण्याचा प्रयत्न करतो - त्याला काही उत्तर नाही. त्याबाबतची वस्तुस्थिति पुरेशी उघड झालेली आहे.
आता पुनः त्यांना नव्या राजनैतिक संरक्षणाखाली अमेरिकेत जाता येईल हे मात्र शक्य वाटत नाहीत, जरी पिताश्री 'जितं मया' च्या आरोळ्या देत तसे उच्चरवाने घोषित करीत आहेत. एकतर भारत सरकारला ही खरूज पुनः खाजवून काढावी असे वाटणार नाही. दुसरे म्हणजे अमेरिकेत जाण्यापूर्वी त्यांच्या नेमणुकीस यजमान देशाची - म्हणजे अमेरिकेची - संमति लागेल, जी मिळण्याची काहीच शक्यता दिसत नाही.
'गुन्हेगाराला दयामाया नाही' असे जे वारंवार कानावर पडते ते प्रत्यक्षात आणायचे असले तर Civil Services Conduct Rules खाली भारताच्या शासनाने देवयानीबाईंची जे वर्तन ह्यातून दृष्टीस आले त्यासाठी त्यांच्याविरुद्ध चौकशीप्रकरण सुरू करावयास हवे.
दुहेरी नागरिकत्व
त्यांच्या मुलींचं दुहेरी नागरिकत्व (आणि बेकायदेशीर पासपोर्ट?) हे एक नवीनच प्रकरण उजेडात आलं आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सर, असहमती नोंदवितो.
१. अमेरिकेसारख्या देशात, -जिथे कायद्याची चाड वगैरे असते (म्हणे)- एका जजने देवयानी यांचेविरुद्धचे आरोप फेटाळून लावले आहेत.
२. आपले वरचे स्टेटमेंट, आपल्याबद्दलचा संपूर्ण आदर राखूनही, असे दर्शवितो, की, you have ALREADY judged her to be guilty.
३. भारताच्या प्रचण्ड मिलिटरी / मार्केट इ. पॉवरला भिउन अमेरिकन फेडरल जजने असा निर्णय दिला असावा असे आपणास वाटत असेल तर त्याबद्दल आय डॉन्ट हॅव्ह एनी कॉमेण्ट्स.
४. डिस्प्यूटचा, अन भारतातील लोकांच्या चिडण्याचा मुद्दा, सकृतदर्शनी 'खोब्रागडे' -अर्थात, खोब्रागडे ज्या जातीतले असतात त्यावरून केलेले राजकारण, खोब्रागडे यांनी केलेले भ्रष्टाचार इ.- "दाखविण्यात" आलेला असला, तरीही, माझ्या व्यक्तिगत मतानुसार, माझ्या देशाच्या राजनैतिक अधिकार्यास अटक करून, देशदूतांच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन, व त्यावर कळस म्हणजे स्ट्रिप सर्च! हेच चीड आणणारे होते. या एकाच मुद्द्यावर मी देवयानी यांचे बाजूने आहे. बाकी त्यांनी त्या मेडला पगार दिला, किंवा नाही याने मला फरक पडत नाही. दिला नसेल तर शिक्षा द्या. आदर्श घोटाळ्यात फाशी द्या. नॉट द पॉईंट. पण.
पण.
हे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे.
त्यांच्यावरील आरोप व्यक्ती म्हणून केलेले नाहीत, डिप्लोमॅट म्हणून केले गेले. आरोप करताना, डिप्लोमॅटीक मिशनवरील व्यक्ती, खोट्या डिस्गाईसखाली अमेरिकेत अशा गोष्टी करतात असे म्हटले गेले, वरून यांच्यावर ह्यूमन ट्र्याफिकिंगचे कलमही लावले गेले होते असेही आईकतो.
"भारत" देशाच्या 'राजदूत' म्हणून डिफाइन केलेल्या पदावरील व्यक्तीस. (लिंग/जात/धर्म इ. गेले फाट्यावर) जर 'डिप्लोमॅटिक इम्युनिटी' आहे, तर, यांची हिम्मत कशी होते त्यांना अटक करून स्ट्रिप सर्च करण्याची?? केवळ दुसर्या देशात आपल्या देशाच्या प्रतिनिधी म्हणून नोकरीस आहेत म्हणून? नॉट डन. सॉरी.
*
व्यक्तीशः मी, या प्रकरणात श्री. प्रीत भरारा यांचे कार्यालयाकडून ऑफिशयल माफीचे पत्र येण्याची वाट पहातो आहे.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
बरोबर, माझे हेच मत आहे.
"you have ALREADY judged her to be guilty."
बरोबर आहे. मी त्यांना prejudge केलेले आहे हे खरे आहे पण ते अमेरिकेतील 'गुन्ह्या'बद्दल नाही. त्यासाठी राजनैतिक बुरखा त्यांना मिळालेला आहे. माझे मत त्यांच्या भारतातील वर्तणुकीबद्दल आहे
झ्या लेखी ह्या बाईंनी भारतातच पुरेशी गुन्हेगारवृत्ति दर्शविली आहे. अमेरिकेतील कायदा मोडण्याची पूर्वतयारी म्हणून त्यांनी भारतात नोकराणीकडून करारनामा वदवून घेतला. ह्या लिखित पुराव्यावरून स्पष्ट दिसते की ज्या देशात आपण प्रतिनिधि म्हणून जातो तेथील कायदे आपण पाळायला हवेत हा साधा सद्विचार काही डॉलर्स वाचवण्याच्या मोहातून त्यांनी केला नाही. असे अप्रामाणिक वर्तन Conduct Rules, 1964 मधील 'conduct unbecoming of a Government Servant' ह्याखाली १०० टक्के पडते.
पण मी त्यांचा वरिष्ठ नसल्याने माझ्या ह्या मताला काहीच executive value नाही. ते काम त्यांच्या वरिष्ठांनी करावे असे मी सुचवीत आहे. त्यांना अमेरिकेत राजनैतिक संरक्षण होते ह्याचा येथे काहीहि उपयोग नाही कारण हा अपराध भारत शासनाच्या नोकराने भारताच्या भूमीवर केला आहे.
काही हजारांची लाच घेतली असे सिद्ध झाले तर एखाद्या सामान्य कारकुनाची नोकरीतून बडतर्फी होऊ शकते. येथे दिवसाढवळ्या ह्या बाईंनी इतके दुर्वर्तन केले त्याची शिक्षा त्यांना का मिळू नये हे मला कळत नाही.
Sir,
Please, do forgive me for trying to argue with you, and putting down a counter-argument.
but, once again,
The individual accused, or her character, is not the point I was trying to make here. The point was 'a' country's diplomat being treated liike a common street criminal, disregarding the Geneva convention, AND America's blatant disregard towards the rest of the world's rights or sovereignty .
But since you have already said, "बरोबर आहे. मी त्यांना prejudge केलेले आहे हे खरे.." I rest my case, sir.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
माझ्या देशाच्या पंतप्रधानांनी,
माझ्या देशाच्या पंतप्रधानांनी, ऑफिशियली, अधिकृतपणे, या प्रकरणात एक स्टँड घेतला.
भारताचा नागरीक म्हणून, माझ्या पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमीकेस माझे समर्थन आहे, होते व राहील.
(आजचा पंप्र. कोणत्या पक्षाचा वा कोण आहे याने मला फरक पडत नाही.)
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
पाने