……… खतरेमे है (?) (संपादित)
ह्या वर्षी मी कोकणात गावाला गेलो होतो .तेथे स्थानिक मित्रानी मला एका गुरुजींशी ओळख करून दिली .ब्राह्मण्य ,तसेच ब्राह्मण समाजाच्या वर्तमानातील समस्या ह्यावर चर्चा झाली .ही चर्चा चालू असताना ह्या गुरुजींनी मला किस्सा सांगितला .
माघी गणेश जयंती निमित्त मी ज्या ठिकाणी राहतो तेथील गणेश मंदिरात गणेश याग होता .ज्या गुरुजींचे देहांत झाले ते (वयाने ज्येष्ठ )आणि मला हा जो किस्सा सांगितला आहे ते (वयाने कनिष्ठ )गुरुजी दोघेही त्या कार्याला उपस्थित होते .
तर ज्येष्ठ गुरुजीना ३ कन्या होत्या .२ मुलीनी आंतर जातीय (आगरी/कोळी) लग्ने केली होती .३ र्या मुलीने मुसलमान मुलाशी सुत जमवले होते .पण घरी विरोध होईल म्हणून तिने पोलिसांकडे वडिलांविरुद्ध तक्रार केली .गणेश याग चालू असताना त्या गुरुजीना पोलिसांनी उचलून नेले.३ दिवस ते पोलिस कोठडीत होते .त्या दरम्यान त्या मुलीने त्या मुलाशी लग्न केले . ३ दिवसाने त्या मुलीने आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी अर्ज केला ..त्याप्रमाणे तिचे वडील (ज्येष्ठ गुरुजी )सुटले .
वडिलांना आपल्या मुलीच्या कृत्याचा खूप धक्का बसला .आणि त्या धक्यामध्ये ते गुरुजी गेले होते .एक चक्र पूर्ण झाले होते .मला जे प्रश्न मनात गुरुजींबद्दल होते त्याची उत्तरे ह्या किस्स्यातून मिळाली होती .पण ती अशी एवढ्या लांब ,अश्या अजब घटनेतून मिळतील असे वाटले नव्हते ....
हा सरळसरळ लव्ह- जिहाद चा प्रकार आहे . आधीच ब्राह्मण मुलाना लग्नासाठी ब्राह्मण्/अब्राह्मण मुली मिळत नसताना सु(?)संस्कारित ब्राह्मण मुलीनी अशाप्रकारे आन्तरधर्मीय /आंतरजातीय विवाह करावेत हे खेदजनक आहे . त्यातच एक परधर्मीय व्यक्तीच्या मोहजालास भुलून स्वतःच्या पित्यास जेलमध्ये टाकण्याइतपत अधःपतन होणे हे मुलगी म्हणून लांच्छनास्पद आहे . ज्या पित्याने जन्मास घालून पालन-पोषण केले, त्याच्या मॄत्यूस कारणीभूत ठरण्याइतपत बहकणे हे अतिनिन्द्य आहे...
त्रिवार निषेध ...निषेध...निषेध!
असवैधानिक चेतावनी- एक अनुभव तुम्हाला सांगत आहे .हा अनुभव वाचल्यानंतर बर्याच जणांना कल्पना विलास ,अतिरंजित ,बनावट वगैरे रसाचा आनंद प्राप्त होईल .तर अश्यानी त्या आनंदामध्ये मश्गुल राहावे.
विवेकी , वास्तवाच भान असलेल्यांना ह्या पोस्त मधील गांभीर्य लक्षात येईल .
म्हणजे काय? काय करुया म्हणता?
म्हणजे काय?
काय करुया म्हणता? काही कळेना.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
+१
असंच म्हणतो.
कोण खतरेमे, काय खतरेमे... नक्की नीट सांगा तरी. 'इस्लाम खतरें में' ओरडणारे बरोबर असेल चुकीचं असेल त्यांना काय म्हणायचं ते स्पष्ट सांगतात तरी. या लेखात 'तुमचं तुम्ही काय ते समजून घ्या...' असं गुळमुळीत काहीतरी का म्हटलेलं आहे? की हे 'मी नाही त्यातली कडी लावा आतली' सारखं, बोंबलायचं तर आहे, पण ओरडून बोलण्याचा रोषही पत्करायचा नाही?
हो ना, काहीच कळत नाही. म्हणजे
हो ना, काहीच कळत नाही. म्हणजे 'उडन खटोला' ह्यांनी शेअर केलेला केवळ एक अनुभव वाटला पण त्यातून काय चर्चा अपेक्षित आहे नेमकी? कृपया 'उडन खटोला' ह्यांनी नेमका खुलासा करावा म्हणजे त्या अनुषंगाने चर्चा पुढे जाईल.
मुळात ब्राह्मण या वर्णाबद्दल
मुळात ब्राह्मण या वर्णाबद्दल बोलताय का?
नुसती 'ब्राह्मण' नावाची जातच नाहीये, त्यामुळे जातीबाहेर लग्न म्हणजे वर्णाबाहेर लग्न का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ब्राह्मण नामक जात कागदोपत्री
ब्राह्मण नामक जात कागदोपत्री तरी अस्तित्वात आहे.
बाकी चालू द्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ब्राह्मण्य
ब्राह्मणं धोक्यात आहेत असं म्हणायचं असावे त्यांना. पण बर्याचशा खेड्यात हा प्रकार थोड्याप्रमाणात कॉमन आहे, अनेक गुरुजींच्या मुली अब्राह्मणी घरं पसंत करतात त्याचं कारण त्यांच्या वाढत्या वयात गुरूजींच्या घरात असलेलं सोवळ्या-ओवळ्याचं प्रस्थ आणि मुलगी असल्याने इतर बंधनं अधिक. मुलांमधे ह्या सोवळ्या-ओवळ्याच्या संकल्पनांमुळे थोडे एलिट असल्याची भावना असते व तुलनेने कमी बंधने असतात त्यामुळे मुलांची लग्ने शक्यतो त्याचप्रकारच्या ब्राह्मणी घरात होतात पण मग अशा मुली त्यांना मिळणे सध्या कठिण होत चालले आहे ही रड वाढली आहे.
मला जे प्रश्न मनात
हे कोणते प्रश्न तेच गुलदस्त्यात ठेवल्यामुळे पहिली काही पानं नसलेली रहस्यकथा वाचल्यासारखं वाटतंय.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तात्पर्य?
जातीपातीला आयुष्यात किती महत्त्व द्यावं आणि आंतरधर्मीय विवाहाविषयी किती भीती / घृणा / चीड बाळगावी ह्याविषयी गुरुजींचं वेळीच समुपदेशन झालं असतं तर त्यांचा जीव वाचला असता असं तात्पर्य ह्या गोष्टीतून काढावं का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पालक
त्यापेक्षा समुपदेशन एक पालक म्हणून अधिक उपयोगी ठरले असते, धक्का हा तिने पोलिस तक्रार केली व त्यामुळे मानहानी झाली हा पण असू शकतोच.
जातीपातीला आयुष्यात किती
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
"एक-या-दो-बस्स"च्या जमान्यात
"एक-या-दो-बस्स"च्या जमान्यात तीन-तीन मुली असणं किती धोकादायक आहे हे मला या धाग्यावरून समजलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
याचा अर्थ तू विवेकी व
याचा अर्थ तू विवेकी व वास्तवाचे भान असणारी आहेस.
मलादेखील काही प्रश्न पडले
मलादेखील काही प्रश्न पडले आहेत - गणेश यागातच गुर्जींना उचलून नेले तर मग गणेश याग पूर्ण कोणी केला?
क गुंनी पूर्ण केला असल्यास-
(१) त्यांना अचानक पडलेली जबाबदारी पेलवली का? गणेश्याग यथासांग पार पडला की त्यात काही तृटी राहून गेल्या?
............(१-अ) तृटी राहील्या असल्यास त्याचे खापर क.गु.वर फोडण्यात आले का? असल्यास तो धक्का क गुंना सहन झाला का?
............(१-ब) तृटी राहील्या नसल्यास, क.गुंना
.............(अ') त्या यशाबद्दल बढती दिली गेली का?
.............(ब')गेली नसल्यास का नाही? बढती न मिळाल्याचा धक्का क गुंना सहन झाला का?
(२) क गुंनी गणेश याग पूर्ण केला नसल्यास, गणेश यागाचे नक्की झाले काय?
आमचेबी... १. हमखास उन्हाळी
आमचेबी...
१. हमखास उन्हाळी सुट्टी मिळायला आपण कोणत्या नोकरी/व्यवसायात आहात?
१अ. समजा एखादे वर्षी पावसाळा लवकर सुरू झाला तर मे च्या उत्तरार्धात उन्हाळी सुट्टी मिळेल काय?
२. कोकणात कोणत्या गावाला?
२अ. उत्तर कोकण की दक्षिण कोकण?
२ब. स्थानिक मित्रांशी ओळखी परत का करून घेतल्या? ते ओळख विसरले होते का?
३. समजा कोकणाऐवजी खान्देशात गावाला जाणे झाले असते तर कथे(?)त काही फरक पडला असता का?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
पुढील प्रश्नांची २-४ वाक्यात
पुढील प्रश्नांची २-४ वाक्यात उत्तरे द्या.
१. कोण खतरे में होते/आहेत/असावेत?
२. लेखकाच्या मनात गुरुजी(थोरले) बद्दल काय प्रश्न असावेत?
३. कनिष्ठ गुरुजींचे व्यक्तिचित्र उभे करा.
संदर्भरहित स्पष्टीकरण करा
१. (मे चा उत्तरार्ध )
२. "एक चक्र पूर्ण झाले होते"
बोनस प्रश्न
थोरले आणि धाकटे गुरुजी यागाच्या वेळी जर हजर होते, तर मग धाकल्या गुरुजींच्या किस्स्यात "थोरले गुरुजी वारले" ही बातमी कशी आली?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
कगुंच्या चुगलखोर स्वभावावरुन,
कगुंच्या चुगलखोर स्वभावावरुन, माझा तरी कयास आहे की कगु हे धाकट्या (मु शी सू. जमवलेल्या)पोरीवर लाईन मारत होते.
________
आणखी काही प्रश्न - (१) लेखकाने शेवटी कोणत्या २ प्रकारच्या लोकांना सल्ले दिले आहेत? ते सल्ले काय आहेत?
(२) वाक्यात उपयोग करा - मश्गुल रहाणे, धक्का बसणे
कगु १-० ज्येगु
आता कुठे रहस्याचा उलगडा चालू होतोय. कगुंना पॉईंट द्यायला हवेत.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
रच्याकने, वैधनिक चेतावनी ला
रच्याकने, वैधनिक चेतावनी ला मराठीत काय शब्द आहे? सुचत नाहीये.
ताकीद शब्द नेटवर मिळाला पण तो बरोबर नाही.
नो विवेकी पीपल हिअर?
या वैधनिक चेतावनीवरून मला लक्षात आलं की ऐसीवर विवेकी, वास्तवाच भान असलेले कुणीच नाहीत? काय हे? :ghost:
अप्डेटः चुकलो, वरचा वि़क्षिप्तैंचा प्रतिसाद बघितला नव्हता.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
कोणीतरी, कोणत्यातरी भयंकर
कोणीतरी, कोणत्यातरी भयंकर खतऱ्यात असताना सदस्य अस्वल आणि सदस्या सारीका यांनी ही जी चर्चा सुरू केली आहे त्यामुळे माझं मन भरून आलेलं आहे. कोणीतरी खतऱ्यात असतान फक्त आरोळ्या मारण्यापेक्षा या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन, तो समजून घेऊन, त्याला धीरोदात्तपणे तोंड देण्याचा जो संस्कार त्यांनी केला आहे, त्याला तोड नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
संपादित
संपादित केले आहे...
हा ब्राह्मण व हिन्दू समाजावरील आघात असून ब्राह्मण मुलांचे विवाह हा यक्षप्रश्न बनलेला आहे.
* हा विषय गम्भीर असून टवाळक्या व खिल्ली उडवण्याजोगा नाही ,हे कॄपया ध्यानी घ्यावे!
वीतराग बनो......वीतद्वेष बनो !
अत्त दीप भव !
नो मोर खिल्ली
स्वारी, आता विषय कळला आहे, तेव्हा नो मोर खिल्ली.
ब्राह्मण मुलांना लग्नाला एवढे प्रॉब्लेम्स आहेत का? की तुमच्या मते ब्राह्मण मुलांना ब्राह्मण मुलीच हव्या आहेत?
उपाय- ब्राह्मण मुलांना डेटिंग वेबसाईट वगैरे वापरायला शिकवायला हवं. किंवा मग त्यांनी मुस्लीम.अब्राह्मण,अहिंदू मुलींशी लग्न करावं- हा पर्यायही उपलब्ध आहे.
काही असो, चिलॅक्स! त्यांचं ते बघून घेतील हो! उत्क्रांती उत्क्रांती म्ह्णतात ती अजून काय?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
मुळात अलिकडे मुलांनी मुलींशीच
मुळात अलिकडे मुलांनी मुलींशीच लग्ने करावीत असा आग्रहदेखील मोडीत निघू लागलाय. या जिहादला कोणता जिहाद म्हणावं हा एक प्रश्नच आहे.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
हौ अबौट
लिंग जिहाद?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
(No subject)
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
यक्षप्रश्न काये त्यात?
यक्षप्रश्न काये त्यात?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
<<विवेकी , वास्तवाच भान
<<विवेकी , वास्तवाच भान असलेल्यांना ह्या पोस्त मधील गांभीर्य लक्षात येईल .>>मला(!) नाही आले. तुमच्या लक्षात आलेलं थोडं उधार देता काय?
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de