दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१८ मे
जन्मदिवस : पर्शियन कवी उमर खय्याम (१०४८), छ. संभाजी आणि येसुबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू (१६८२), गणितज्ञ, क्रियाशील विचारवंत, युद्धविरोधी प्रचारक, नोबेलविजेता बर्ट्रांड रसल (१८७२), कथाकार विठ्ठल सीताराम गुर्जर (१८८५), सिनेदिग्दर्शक फ्रँक काप्रा (१८९७), पिच्युटरी ग्रंथीतील स्त्रावांवर संशोधन करणारे नोबेलविजेते व्हिन्सेंट द्यु व्हिन्यो (१९०१), माजी पंतप्रधान एच्. डी. देवेगौडा (१९३३), अभिनेत्री फरीदा जलाल (१९४९), क्रिकेटपटू ग्रॅहॅम डिली (१९५९)
मृत्युदिवस : मलेरियाचे रोगजंतू शोधून काढणारे नोबेलविजेते आल्फोंस लाव्हेराँ (१९२२), नागार्जुनसागर धरणाचे स्थापत्य अभियंता कानुरी लक्ष्मण राव (१९८६), पहिल्या भारतीय सिनेअभिनेत्री कमलाबाई गोखले (१९९७), पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे (१९९४)
---
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस.
आंतरराष्ट्रीय एड्स लसीकरण दिवस.
१९१० : पृथ्वी हॅले या धूमकेतूच्या शेपटातून गेली.
१९१२ : दादासाहेब तोरणे यांचे नाट्यचित्रीकरण "श्री पुंडलिक"चे मुंबईत प्रदर्शन.
१९४० : 'संत ज्ञानेश्वर' चित्रपट मुंबई-पुण्यात प्रदर्शित.
१९४४ : क्रीमिआतील तातार लोकांना सोव्हिएत रशियाने हाकलून लावले. उझबेकिस्तान व इतर ठिकाणी त्यांचे स्थलांतर केले. त्यामुळे आज क्रीमिआत रशियन लोकांचे प्रमाण अधिक आहे.
१९७२ : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.
१९७४ : पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी; आण्विक शस्त्र असणारा भारत जगातला सहावा देश बनला.
१९९८ : पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. ही कामगिरी करणारा तो पहिला मराठी युवक ठरला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- गवि
- गलिव्हर
प्रतिक्रिया
मस्त लेखन गवि. एकदम त्या
मस्त लेखन गवि. एकदम त्या क्षणी तिथे आहोत असे वाटले.
खरच, आपण खूप गोष्टी चालवून घेत असतो. "चलता है" ज्या दिवशी आपल्या आयुष्यातून कमी होईल तो सुदिन.
+१
गवि, इतर ललित लिखाणाबरोबर हे लिखाणही येऊ द्या. एयर-क्रॅश प्रकारातल्या डॉक्यूमेंटरी बघण्याएवढा आनंद(?) तुमचे लेख वाचून मिळतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पर्सनल टच
प्रसंगाशी असलेला तुमचा वैयक्तिक अनुभव जास्त प्रभाव पाडून गेला. (विमानाच्या अपघांतांबद्दल अगोदरच असलेल्या तांत्रिक माहितीमुळे असेल कदाचित)
-Nile
मस्त लेख
मस्त लेख. साध्यासुध्या शब्दांत त्या भयंकर घटनेचं वर्णन केलेलं आहे.
अपघात किंवा दुर्घटना झाल्यानंतर लगेचच भावनांचा कल्लोळ उठतो. त्या गदारोळात नक्की काय झालं हे तपासून पहाण्यापेक्षा असं व्हायला नको या तिडीकीपोटी कोणावर तरी ठपका ठेवण्याचा प्रयत्न होतो. ९११ नंतर वल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती पुरेशा मजबूत होत्या का असा प्रश्न उठला. सर्वच इमारती विमानाचा धक्का सहन करण्याइतक्या मजबूत कराव्यात अशीही मागणी भावनेच्या भरात झाली होती. अर्थातच ते करणं शक्य नाही हे उघड झालंच.
कुठचीही व्यवस्था परिपूर्ण नसते. सुरक्षिततेसाठी थोडी माया ठेवलेली असते, पण वजन इतकं वाढल्यावर धागे उसवतातच.
मी
औरंगाबाद मध्ये पाऊल ठेवण्याच्या एक वर्षे आधीची ही घटना.. नंतर तो रस्ता बंद करुन लांबचा बायपास सुरु ठेवला व अंबाजोगाई एस टी चे भाडे २ रुपये वाढले... ( विद्यार्थी दशेत मोठी चाट होती खिशाला :).. ट्रक आणि विमान अपघात कसा झाला असेल हे पटण्या पलिकडे होते... नंतर बरेच दिवस पोलिस केस आणि तपास वाचत होतो... औरंगाबाद च्या आठवणी जाग्या केल्याबद्द्ल धन्यवाद...
२ टन वजन म्हणजे खरोखरच जास्त
२ टन वजन म्हणजे खरोखरच जास्त होतं. निष्काळजीपणा भोवला सगळ्यांना.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
बापरे!! ५२ लोकं जळुन, होरपळुन
बापरे!! ५२ लोकं जळुन, होरपळुन मेले!! भयंकर!!
दोन टन एवढं जास्त वजन आहे हे पायलटला समजलं नाही का? म्हणजे पायलटला कुठे दिसत नाही का की आपण कीती वजन उचलतोय ते?
जे कोणी सामान भरण्याचा मुख्य होतं त्यांना " चालतंय, विमानाला एवढं सामान म्हणजे कैच नै!! भरा रे!! उरकुन टाका" अशा प्रकारे काम करावंसं वाटलं त्याअर्थी त्यांना त्याविभागाचं ज्ञान नसताना काम दिलं होतं जे संवेदनशील काम आहे अन लोकांचे प्राण जाउ शकतात..
असो..होउन गेलं पण आतातरी लोकं नेमुन दिल्याप्रमाणे कामं करंत असतात का? का भ्रष्टाचार आहेच...(काय तरी प्रश्न विचारलाय मी!! :-S) :sick:
http://shilpasview.blogspot.com
चांगलं आहे रे. अजून येऊंद्या.
चांगलं आहे रे. अजून येऊंद्या.
तुमची गप्पा मारल्यासारखे लिहिण्याची शैली मस्त असते.
ते वांद्रे समुद्रकिनारा इथे का नाही आलं?
तुमचा एअरक्रॅश चा मागचा भाग
तुमचा एअरक्रॅश चा मागचा भाग वाचत असताना या सिरिज मधे औरंगाबाद येईल अशी अपेक्षा होतीच...
या अपघाताचा उल्लेख औरंगाबादमधे आजही अधुन मधुन एकायला मिळतो.
या अपघातानंतर अपघाताच्या कारणांबद्दल अनेक वावड्या उठल्या होत्या. त्यातली एक म्हणजे पायलट आणि को-पायलट यांचात असणारे अफेअर.
आज या बद्दलची अधिक माहिती मिळवत असताना संसदेच्या साईट वर चर्चेची एक लिंक मिळाली
http://parliamentofindia.nic.in/ls/lsdeb/ls10/ses6/13270493.htm
वाचनीय लेख... वैयक्तिक
वाचनीय लेख... वैयक्तिक अनुभवाची पार्श्वभूमी छान कथन केली आहे...
याच अपघातात विडिओकॉनचे उद्योगपती सीनियर "धूत" वारले हे ऐकले होते...
निष्काळजीपणाने झालेला भयंकर अपघात...