मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७३
काही काळाने ऐसीचे दिवाळी अंकातील लेख फक्त जयदीप चिपलकट्टी आणि धनंजय यांनाच समजतील :(
मला वाटतं विधान जास्त
मला वाटतं विधान जास्त स्पेसिफिक असावं. काही काळाने ऐसीचे दिवाळी अंकातील जयदीप चिपलकट्टी आणि धनंजय यांनी लिहिलेले लेख फक्त जयदीप चिपलकट्टी आणि धनंजय यांनाच समजतील
बाकी आदूबाळ, रुची, विनय दाभोळकर, उसंत सखू, मुकुंद कुळे, रेणुका खोत, रुबिना पटेल, अरविंद कोल्हटकर, नानावटी या सगळ्यांचं लिखाण चिपलकट्टी आणि धनंजय यांच्या पातळीला नेलेलं त्या लेखकांना आवडणार नाही आणि चि. आणि ध. जोडीलाही आवडणार नाही.
अर्नब
#ArnabGoswami pic.twitter.com/MsLdwwuU6w
— Raosaheb (@RaosahebMantyat) November 1, 2016
अमेरिकन निवडणुका
नुकताच असा विचार मनात आला.
अमेरिकन निवडणुकेकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून आहे. म्हणजे अगदी सगळ्या ८ बिल लोकांचे नसले तरी २-३ बिल लोकांचे तरी.
अमेरिकेची लोकसंख्या - ३३०-३५० कितीतरी मिल.
त्यातले वोटिंग पात्र - २५० मिल (२०१२ चा आकडा २३५ मिल)
प्रत्यक्ष जातात - ५०-५५%
म्हणजेच - १२५-१५० मिल
म्हणजे ज्या गोष्टीकडे अब्जावधी लोकं टक लावून बघतायत ती केवळ १५० मिल लोकं मिळून ठरवणार.
(अवांतर: यावेळी ट्रंप इफेक्ट मुळे वोटर टर्नाउट ६०%+ होईल असं वाटतंय.)
जास्तीत जास्त किती रकमेची नोट
जास्तीत जास्त किती रकमेची नोट असावी याला काय निकष असावेत?
अमेरिकेत १०० डॉलरची नोट सर्वात मोठी आहे. परचेसिंग पॉवर पॅरिटी नुसार एका डॉलरचा रुपयातला विनिमय दर १७ रुपये असा काहीसा आहे. त्यानुसार अमेरिकेतली सर्वात मोठी नोट १७०० रुपयांची आहे. मग आपली (सध्याची) १००० रुपयाची नोट लहानच आहे त्यापुढे.
जाणकारांचे काय मत आहे?
हे थोडं बदलतं चित्र आहे.
हे थोडं बदलतं चित्र आहे. ५०च्या दशकात, जेव्हा अमेरिकेतल्या रिटेलच्या किमती आत्ताच्या साधारण दहापट कमी होत्या तेव्हाही शंभर डॉलरची नोट होती. किंबहुना सिव्हिल वॉर (१८६५) साली अनेक राज्यांनी शंभर डॉलरच्या नोटा (सोन्याचा आधार नसलेल्या) काढल्या होत्या. पण गेल्या शतकाभरात बॅंका, चेक्स, क्रेडिट कार्ड वगैरे गोष्टी आल्या तसतशी खिशात रोख पैसे बाळगण्याची गरज कमी व्हायला लागली. त्यामुळे शंभर डॉलरच्या वरची नोट अजूनपर्यंत सर्रास वापरात नाही. (काही इश्यू केल्या गेल्या होत्या, पण जनसामान्यांमध्ये नाही) तेव्हा 'जास्तीत जास्त कितीची नोट असावी' याचं उत्तर तितकंसं स्पष्ट नाही. हे थोडंसं 'किती वजन स्टॅंडर्ड वजन असावं' यासारखं आहे. सर्वसामान्य माणसांना मोजमाप करण्यासाठी पाउंड चालतं - कारण बटाटे काही पौंड घ्यावे लागतात. पण त्याच्या दुप्पट - किलोचं वजन असलं तरीही चालतं. कारण पाव किलो मोजता येतं तितक्याच सहजपणे अर्धा पौंड मोजता येतं. साधारण आठवडाभर पुरेल इतकं डाळ, तांदूळ, किराणामाल वगैरे घेण्यासाठी जितका खर्च येतो त्याच्या दुप्पट ते चौपट किमतीइतकी मोठी नोट असायला हरकत नाही. त्यामुळे सध्याच्या १००, ५००, १००० हे वितरण ठीक आहे. सर्वाधिक नोटेच्या किमतीच्या अनेक पटींचे व्यवहार होतात तेव्हा चेक किंवा क्रेडिट कार्ड वापरावं अशी अपेक्षा असेल. आणि या सुविधा अनेकांपर्यंत पोचायला लागतील तसतशी ती अपेक्षा वाढत जाईल.
या प्रश्नाचं थोडं उत्तर त्या विशिष्ट देशाच्या दरवाढीच्या दरावरही अवलंबून असतं. अमेरिकेत हा दर सुमारे ३ टक्क्यांवर गेली काही दशकं आहे. त्यामुळेही मोठ्या नोटांची गरज पडेनाशी झालेली आहे. यापुढे पडेल असं वाटत नाही. भारतात हा दर ८ टक्क्यांच्या आसपास असतो. त्यामुळे दर काही दशकांनी वरचा आकडा वाढू शकतो. इतकी वर्षं तो वाढवण्याची गरज नव्हती कारण पंचवीस तीस वर्षांपूर्वी जेव्हा दर कमी होते तेव्हा शंभर रुपयाच्या नोटेत काम व्हायचं. त्यावेळी मध्यमवर्गीयाकडे हजाराची नोट दिसतही नसे. आता ती सर्रास दिसते. यापुढे कदाचित दोन हजाराच्या नोटेची गरज पडेल. त्यापुढे लागेल का? आत्तातरी सांगता येत नाही.
जास्तीत जास्त किती रकमेची नोट
जास्तीत जास्त किती रकमेची नोट असावी याला काय निकष असावेत?
चलन हे तिन भूमिका पार पाडते मुख्यत्वे -
(१) मोजदाद करण्याचे एकक
(२) देवाणघेवाणीचे माध्यम
(३) व्हॅल्यु साठवून ठेवण्याचे साधन
यातल्या (१) चा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याशी संबंध कमी असावा. पण २ व ३ चा जवळचा संबंध असावा.
(२) व (३) मधले संतुलन राखण्यासाठी चलनाचे denomination (मूल्यवर्ग) केले गेले असावेत. देवाणघेवाणीचे माध्यम म्हंजे लिक्विडिटी ची गरज. लिक्विडिटी मधे उपलब्ध राशी(amount) व वैविध्य (denomination) हे दोन आलेच. व्हॅल्यु साठवून ठेवण्याचे साधन म्हंजे कॉस्ट्/बेनिफिट्स ऑफ स्टोरेज हे पण आले.
हिलरी
Hillary won the popular vote. Her reaction be like.. pic.twitter.com/pgcC7B1gnj
— Raosaheb (@RaosahebMantyat) November 10, 2016
छे छे छे, या अमेरिकेत असे होणे फार वाईट आहे.
लॉस एंजेलिस मध्ये एका गरीब मेक्सिकन कुटुंबाला भुकेसाठी वाळके गवत खाताना पाहून एका अमेरिकन वकिलाला फार वाईट वाटले. "छे छे छे, या अमेरिकेत असे होणे फार वाईट आहे. बसा माझ्या गाडीत."
गाडीत बसल्यावर त्या कुटुंब प्रमुखाने त्याचे आभार मानायला सुरुवात केली.
"काही काळजी करू नका आता! माझ्या घरामागे उंच, हिरवेगार गवत आहे!". वकील म्हणाला.
xxx
सरकारचा काय संबंध?
२. सोन्याच्या खाणींवर सरकार नियंत्रण कसे ठेवते? समजा त्यांनी १०० kg सोने "तयार केले" आणि सरकार ला सांगितले की फक्त ५० kg झाले, तर?
कळलं नाही. सरकारचा काय संबंध. सोन्याच्या जागी प्लास्टीकचं खेळणं घेऊन पहा. मी ते खेळणं बनवतो. मग मी १००० बवतो का ५०, यात सरकारचा काय संबंध? (सोन्यावर पेट्रोल वगैरे प्रमाणे सबसिडी वगैरे नाही, भारतात, हा माझा अंदाज.)
अधिक गुंतागुंत
जागतिक मार्केटमध्ये, सोन्याची किंमत हे जागतिक उत्पादन आणि मागणी दोन्हीवर अवलंबून आहे. (तुर्तास इतर गोष्टी, उदा. स्टॉक मार्केट, हाऊझिंग वगैरेचा परिणाम, सोडून देऊ.)
अनेक उत्पादक असल्याने आणि ते एकमेकांविरुद्ध स्पर्धा करत असल्याने (वादाकरता, मागणी-उत्पादन यात प्रचंड तफावत नाही असे गृहित धरू, म्हणजे स्मलगिंग करायला सिरीअस शॉर्टेज हवं वगैरे). जर सरकारने किंमत रेग्युलेट केलेली नसेल तर ओपन मार्केट मध्ये त्यांना काळ्याबाजारात सोनं विकण्याचा काय फायदा होईल हे मला अजूनही कळलेलं नाही. जर काळ्याबाजारात विकून जास्त पैसे मिळायला उत्पादनापेक्षा मागणी खूप जास्त हवी. सद्ध्यातरी, सोन्याची परिस्थिती तशी नाही. मी सोन्याच्या खाणीत काम करतो, ही अवांतर माहिती.
टोईंग व्हॅनची पावती
मला टोईंग व्हॅनची पावती बघून नेहमी प्रचंड प्रमाणात चीड येते. एक टोईंग व्हॅन एका वेळेस कमीतकमी १० दुचाकी उचलत असेल आणि दिवसाकाठी कमीतकमी २० फेर्या मारत असेल. महिन्याचे अगदी २५ दिवस व्हॅन चालत असेल तरी मासिक उत्पन्न ५ लाखाच्या आसपास असावे. मग असे असतांना हे लोक पावतीवर सर्व्हिस टॅक्स नंबर असलेली पावती का देत नाहीत ?
किंवा जर वार्षिक उत्पन्न १० लाखाच्या आसपास असेल तर टॅक्स नंबर घेणे बंधनकारक नाही पण मग तसी सुचना सर्व्हिस बिलावर छापणे आवश्यक असते ना ?
कि ही सरकारच्या संगनमताने चाललेली चोरी आहे काय ? किंवा माझी समजूत चुकीची आहे ?
२-३% एखाद्या वर्षी नाही, आपण
२-३% एखाद्या वर्षी नाही, आपण सस्टेन्ड २-३% लेवल बोलतोय असं समजतो. वाटत नाही. तसं झालं तर एफ.डी.आय प्रचंड कमी होईल, भारत हा प्रगत झालेला असेल. पुढल्या १० वर्षात ते होईल असं वाटत नाही.
पण ३०-४० वर्षात, कदाचित. किंवा तोच राहू शकतो (जास्त शक्यता). किंवा १५-२० सुद्धा होऊ शकतो (चक्र उलटी फिरली तर पण तसं वाटत नाही). इंटरेस्टिंग टाईम्स.
लोगो जाउद्या, शेजारी
लोगो जाउद्या, शेजारी श्रध्दांजलीपण नाही कुठे.
लोगोमधे स्थान नसायला, खालीलपैकी अनेक कारणे असू शकतात.
१. तुमची,आमची ब्राउजर कॅश क्लिअर नाही झाली, त्यामुळे नवीन लोगो/मजकूर दिसत नाही.
२. त्यांची मोदींशी मैत्री होती.
३. त्यांनी पहिल्या टर्ममधे भ्र्ष्टाचार केला होता. (नंतर कॅस्ट्रोंसारख्या गरिबांसाठी मोफत स्किम चालवल्या पण पहिल्या टर्मचे काय?)
४. त्या बहुमताने निवडून आल्या होत्या.
किंवा
५. काम चालू आहे, दिसेल लोगो.
अरे हो की राव
त्यांचा अनेक मराठी वर्तमानपत्रात आलेल्या मृत्युलेखांत उल्लेख क्रांतिकारी स्त्री असा वाचलाय.
अनेकांनी त्यांच्या आयुष्यापासुन प्रेरणा घेतलेली आहे. अनेकांच्या आयुष्यात त्यांनी आनंद निर्माण केला.
अम्मा स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्वतः संघर्षातुन एकाकी वाट करत उच्च पदावर पोहोचलेल्या एक कर्तुत्ववान स्त्री होत्या.
स्त्री शक्तीचे त्या प्रतीक होत्या. त्यांचा इतका अपमान झाला, खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले पण त्या सर्वांना पुरुन उरल्या.
काही चॅनलांनी मुद्दाम धर्मेंद्र बरोबरील त्यांची नृत्यफित सातत्याने दाखवुन/ एम जी आर च्या अंत्ययात्रेवेळची त्यांच्या झालेल्या अपमानाची फित दाखवत राहुन जाणीवपुर्वक
त्यांचे राजकीय कर्तुत्व झाकण्याचा प्रयत्न केला.
दहावीच्या परीक्षेत त्या संपुर्ण तामिळनाडु राज्यातुन दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या दुर्देवाने त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही.
अल्पावधीतच लता मंगेशकरांसारखा त्यांना जगण्यासाठी आर्थिक संघर्ष करावा लागला. स्वतः स्वतःची दिशा ठरवत त्या मार्गक्रमण करत राहील्या.
अशा संघर्षशील स्त्रीचे प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे शिवाय अस्सल भारतीय असलेल्या व्यक्तिमत्वाचे क्रांतिज्योतीचे चित्र लोगोवर लावले तर अनेकांना त्यापासुन प्रेरणा मिळेल.
शिवाय त्यांनी कुठल्या विचारसरणीच्या नावाखाली माणसे मारली नाहीत. निवडुन आल्या पुर्णपणे लोकशाही मार्गाने हरल्या तेव्हा ही शांतपणे माघार घेतली माणसे मारली नाहीत.
त्या रसिकही होत्या साड्या आणि चपला यावर त्यांनी रसिकतेने प्रेम केले. त्यांच्या कडे अभिजात सौदर्य दृष्टी होती. मी गेल्यावर हिरव्या रंगाच्याच साडीतच मला दफन करावे असे सांगण्याइतकी मृत्युबेपर्वा रसिकता होती.
शिवाय त्या क्रांतिकारी असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे त्या ज्या धर्मात जन्मल्या त्याच्या परंपरांना मुल्यांना न जुमानता त्यांना जी मुल्ये स्वतः महत्वाची वाटत होती त्या अनुसार माझा मृतदेह दफन करावा असा आग्रह त्यांनी केला होता. यावरुन त्यांची परंपराबाह्य विचार करण्याची क्षमता व हिमंत दिसुन येते.
थत्तेचाचा, ते काणे होते.
थत्तेचाचा,
ते काणे होते. हॉटेल लगेच सापडले. जेवणे "बरे+" होते. जोरदार कौतुक करावे असे नव्हते.
पोळ्या मात्र चांगल्या होत्या.
बरोबरच्या लोकांना हे हॉटेल थत्तेचाचांनी रेकमेंड केले आहे हे स्पेसिफिकली सांगीतले. त्यातल्या जवळजवळ सर्वांना तुम्ही कोण हे माहीती नसल्यामुळे, त्यांचे कुतुहल जागृत झाले. त्यामुळे तुमचे गुणवर्णन केले.
>>पोळ्या मात्र चांगल्या
>>पोळ्या मात्र चांगल्या होत्या.
साधे जेवण म्हटल्यावर मी पोळ्यांच्या दर्जावरच जेवणाचा दर्जा ठरवतो. :)
ते काणे मला ओळखत असण्याची मुळीच शक्यता नाही. मला डोंबिवलीच्या पाटणकर नामक बैंनी ते रेकमेंड केले होते. (त्या बै त्या काण्यांच्या नात्यात असाव्यात). पण चिपळूणात थत्त्यांची बरीच घरे असल्याने (आम्ही तसे तिथलेच) त्यांना कुतुहल वाटले असेल.
कानडी का असावेत ते काही कळले
कानडी का असावेत ते काही कळले नाही.
पण एकुणात पुरोगाम्यांना जातीची चौकशी फार.
गोतावळ्यात सर्व मराठी, जवळ जवळ सर्व कोकणस्थ ब्राह्मण. त्यातल्या बायकांना शाकाहारीच लागते. बाहेरचे सारखे खाऊन आता कंटाळलेल्या लोकांना साधे शाकाहारी जेवण पंजाबी वैगरे पेक्षा बरे वाटते.
पुरुषांना गरजे पेक्षा जास्त किंम्मत द्यायची आमच्यात पद्धत नाही, त्यामुळे त्यांना आवडो न आवडो, फरक पडत नाही. त्यांचे ते असतील तेंव्हा त्यांनी ठरवावे.
अन्न-जात कोरिलेशन
>> एकुणात पुरोगाम्यांना जातीची चौकशी फार.
पुरोगाम्यांचं माहीत नाही, पण कुणाला कोणत्या जेवणाची चव आवडते ह्यात जातवास्तवाची दखल घेतली, तर रोचक माहिती हाती लागते असा माझा अनुभव आहे. पुण्यात 'बादशाहीतली आमटी आवडते' असं म्हणणारा एक संच आहे, 'दोराबजी'तली धानसाक आवडणारा एक संच आहे, आणि त्यांचा इंटरसेक्शनही नॉन-नल आहे. जातपडताळणी केली तर त्यात अनेकदा असं दिसतं की तुम्ही कोणत्या संचात आहात आणि कोणत्या जातीत वाढलात त्याचं काही कोरिलेशन लागतं.
गरती स्त्रियांमुळे गर्ता
>> तुम्हाला डीटेल्ड उत्तर दिले तर त्याची नोंद घ्यायची नाही ( म्हणजे धन्यवाद देणे वगैरे ) हे काही बरोबर नाही.
जिथे कोंकणस्थ ब्राह्मण महिलांना चिपळुणातलं जेवण विशेष आवडत नाही, अशा देशात मला राहावंसं वाटत नाही. पक्षी : तुमचं उत्तर तपशीलवार असलं तरी मला नैराश्याच्या गर्तेत टाकणारं होतं. आता नैराश्याच्या गर्तेत टाकण्यासाठी आभार कोणत्या तोंडानं मागायचे?
>>जिथे कोंकणस्थ ब्राह्मण
>>जिथे कोंकणस्थ ब्राह्मण महिलांना चिपळुणातलं* जेवण विशेष आवडत नाही,
आँ?
जेवण बरे+** होते असे म्हटले ना त्यांनी? मग आवडले नाही असा निष्कर्ष का काढला?
*चिपळूणात फक्त कोकणस्थाचीच हाटेलं नसतात कै !!!
** अनु राव यांनी बरे च्या वरची श्रेणी दिली म्हणजे जेवण फारच आवडलेले दिसते.
हा पराभव (असलाच तर) तो
हा पराभव (असलाच तर) तो चुकीच्या पीच वर मॅच खेळण्याच्या निर्णयाचा आहे.
ते ' देश बदल राहा है 'वगैरे ठीक आहे पण जंतू नी " चिपळूणातल्या बामणाच्या खाणावळीतील कस्टमर कास्ट प्रोफाइल विझावी अप्रिसिएशन ऑफ कास्ट स्पेसिफिक फूड हॅबिट्स " वगैरे मध्ये पडणे धोकादायक आहे ..
तात्पर्य : आमटी पोळी सदृश खाद्यवस्तू बद्दल लिहून जंतूंनी धोका पत्करला .
पण तरीही त्यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन
खरं तर त्यांनी होम पीच वर चरबी यकृत ते VSOP या रेंज मध्ये खेळावे ,.नेत्रदीपक फलंदाजी करावी .... ,पण नाही
(च्यायला आम्ही आमंत्रण देतोय VSOP च्या लाईव्ह डेमो चं , तिथे लक्ष नाही , याना पडलीय काण्यांच्या पोळ्यांची ... )
सुज्ञ
>> अशा तर्हेने जंतूंचा पराभव झालेला आहे असं घोषित करण्यात येत आहे.
मी म्याच खेळतच नव्हतो. माझं सच्च्या कोंकणस्थावर खरंखुरं प्रेम आहे. 'पहिलें उरलें नाहीं' ह्याचेंच दु:ख. (देशावरच्या कृष्णाकाठचा उल्लेख टाळला आहे हे सुज्ञांस कळणार, पण सुज्ञच कुठे उरले आहेत म्हणून अधिक सांगणे गरजेचे!)
चिपळुणात काय घडले?
>> जरी स्पेसिफिकली मी प्रश्नात मी विचारले नव्हते तरी ते तसे असावे असेच अपेक्ष्रीत होते. तुम्ही ते ओळखुन उत्तर दिलेत.
जे तुम्हाला अभिप्रेत होतं ते ओळखून तेवढंच मीही गृहित धरलं. त्यामुळे चिपळुणात इतर कोणत्या जातींच्या खाणावळी वगैरे प्रश्न गौण आहेत. वर तुम्ही म्हणता की
>>जेवणे "बरे+" होते. जोरदार कौतुक करावे असे नव्हते.
पोळ्या मात्र चांगल्या होत्या.
'पोळ्या चांगल्या होत्या' ('मात्र' हा शब्दच मोठा बोलका आहे) हा जेव्हा बोलण्याचा विषय होतो तेव्हा उपरनिर्दिष्ट संदर्भचौकटीत ("चिपळुणात शाकाहारी मराठी पद्धतीचे साधेसुधे थाळीसारखे जेवण कुठे चांगले मिळते") ह्या प्रतिसादाचं अर्थनिर्णयन 'जेवण चांगलं होतं' असं मी तरी करणार नाही. फार तर,'मीट्स एक्स्पेक्टेशन्स, विच वर लो टू स्टार्ट विथ' असं करेन. आणि कुणी म्हणालं की शाकाहारी पद्धतीच्या साध्यासुध्या थाळीसारख्या जेवणात जोरदार कौतुक करण्यासारखं काही नसतंच, तर मग मी म्हणेन की -
निष्कर्ष
योग्य ते सर्व पर्याय निवडा -
१. सोमवारी जंतूला रांग न लावता रोकड मिळाली.
२. मिळालेली रोकड देणी भागवण्यासाठी योग्य प्रकारची होती. (म्हणजे पाच रुपयाच्या कोथिंबीरीसाठी दोनहजाराची नोटच उपलब्ध असं झालं नाही.)
३. शनिवारी आणि/किंवा रविवारी फुकटात चिकार दारू मिळाली. किंवा पैसे भरून चांगली दारू मिळाली. किंवा फुकटात चांगली आणि बरीच दारू मिळाली.
४. सोमवारी जाग आल्यावर चांगली कॉफी मिळाली.
५. जंतूंना अनुरावांवर लैन मारायची संधी सापडली.
बिग सिस्टर
१. सोमवारी गुरुवारी जंतूला रांग न लावता रोकड मिळाली.
२. मिळालेली रोकड देणी भागवण्यासाठी योग्य प्रकारची होती. (म्हणजे पाच रुपयाच्या कोथिंबीरीसाठी दोनहजाराची नोटच उपलब्ध असं झालं नाही.)
३. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी फुकटात चिकार (बरी+; जोरदार कौतुक करावी अशी नव्हती. पक्षी : चांगली नव्हे) दारू मिळाली. मासेही चिकार आणि फुकटात मिळाले. शिवाय त्यामुळे सोमवारी चिक्कार रोकड शिल्लक राहिली.
४. सोमवारी जाग आल्यावर चांगली कॉफी मिळाली.
५. जंतूला अनुरावांवर लैन मारायची संधी सापडली.
निष्कर्ष : तुम्ही माझ्यावर पाळत ठेवली आहे. ते कळू नये म्हणून तपशीलात किरकोळ बदल केले आहेत. ऐसीकरांनो वाचताय ना? पुरोगामीपणाचा आव आणून बिग सिस्टर मे बी वॉचिंग यू, टू!
काही गावठी प्रश्न
१- टोमॅटो सॉस आणी टोमॅटो केचप मध्ये नेमका काय फरक असतो ? म्हणजे दोघांच्या प्रोसेस मध्ये जर काही फरक असेल तर तो काय असतो ?
२- फेसबुक सारखी मोठी कंपनी जो प्रचंड प्रमाणावर डेटा सेव्ह करत असते तो सेव्ह करण्याची त्यांची काही लिमीट असते का ? म्हणजे ५ वर्ष जुन्या पर्यंत इ. असे काही
नसल्यास इतका प्रचंड डेटा ते जुना अजिबात न उडवता नवा कसा काय सेव्ह करु शकता ? ते त्यांची साठवण क्षमताच फक्त वाढवता की जुना उडविण्यावरही भर असतो ?
३- काही कुत्र्यांना फरशी टाईल्स वरच ठेवलेले दिसते. अशा कुत्र्यांची पाय फाकतात फताडे होतात, हे फरशी टाइल्स वर ठेवल्याने होतात का ? मातीत बर्यापैकी पळवलेले कुत्रे ताठ सरळ पायाचे राहतात का ? म्हणजे फताडे पाय= टाइल्सवरील दिर्घ वास्तव्य हे खरे आहे का ?
- फेसबुक सारखी मोठी कंपनी जो
- फेसबुक सारखी मोठी कंपनी जो प्रचंड प्रमाणावर डेटा सेव्ह करत असते तो सेव्ह करण्याची त्यांची काही लिमीट असते का ? म्हणजे ५ वर्ष जुन्या पर्यंत इ. असे काही
नसल्यास इतका प्रचंड डेटा ते जुना अजिबात न उडवता नवा कसा काय सेव्ह करु शकता ? ते त्यांची साठवण क्षमताच फक्त वाढवता की जुना उडविण्यावरही भर असतो ?
=))
दादा ! काही चुकलं का ? सांभाळुन घ्या जरा मला
दादा
मलां खरच जेन्युइन कुतुहल आहे म्हणुन तो प्रश्न मी विचारला. मला त्या क्षेत्रातलं शुन्य ज्ञान आहे. म्हणून कुतुहल वाटत इतकच.
ते त्यांचे डेटा सर्व्हर चे भव्य फोटोग्राफ्स बघितल्याने तो प्रश्न डोक्यात आला होता.
की हा इतका करोडो लोकांचे फोटो, व्हीडीयो अमुक तमुक कसे काय सेव्ह होत असेल ? काही डिलीट पण करण्याची पॉलिसी असेल का ?
पी ओ एस आणि पी ओ सी !
सध्या POS'' उपकरणांची चलती आहे.
POS = Point of Sale
याच्याशी साम्य असणारा वैद्यकीय विश्वातील एक शब्द सांगावासा वाटतो :
'POC ' = Point of Care
मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण ' Glucometer' ( रक्तातील ग्लुकोज घरबसल्या मोजण्याचे उपकरण) शी परिचित असतील.
तर काय, '' point of '' म्हणजे 'च्या जवळ'. POS हे ग्राहकाच्या जवळ आणले जाते , तर POC हे रुग्णाच्या जवळ.
आपल्या रक्ताच्या (व लघवीच्या)बर्याच तपासण्या आता रक्तनमुना प्रयोगशाळेत न पाठवता रुग्णाजवळ बसूनच करता येतात.त्याला म्हणतात ' POC testing'.
कोण हे डॉ. अक्षयकुमार काळे?
लोकसत्तेतला अग्रलेख - उडदामाजी काळे गोरे..
आणि हे तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर, पुन्हा एकदा लोकसत्तातूनच.
मागोवा गालिबच्या काव्याचा!
करमणूक
>>मतदार होण्यासाठी काय पात्रता लागते?
भारताचे नागरिक; १८ वर्षं पूर्ण वगैरे काही किरकोळ गोष्टी आणि शिवाय संमेलनाशी संलग्न साहित्य परिषदेसारख्या संस्थेचं सदस्यत्व. पुण्याच्या साहित्य परिषदेतली पुस्तकं चाळायची होती म्हणून पूर्वी कधी तरी तिथे गेलो होतो. त्यासाठी संस्थेचं आजीव सदस्यत्व घ्यावं लागेल असं मला सांगण्यात आलं. नंतर बाहेरून कळलं की तसं सदस्यत्व घेतलं तर साहित्य संमेलनासाठी तुम्ही मतदार होता. कुणाकुणाला मत द्यावं लागेल ह्या विचारानंच मी गळपटून गेलो आणि सदस्यत्व घेतलं नाही. अशा रीतीनं ऐसी एका करमणुकीला मुकलं, कारण इतर सदस्यांना कसे निवडणुकांच्या वेळी फोन येतात आणि मत देण्यासाठी गळ घातली जाते वगैरेंचे किस्से मला माहीत आहेत.
म्हणून
काही काळाने ऐसीचे दिवाळी अंकातील लेख फक्त जयदीप चिपलकट्टी आणि धनंजय यांनाच समजतील
म्हणून त्यांनी द्विस्तरीय लेख व कथा लिहाव्यात, 'लाईफ ऑफ पाय' सारख्या. एका साधा अर्थ, आमच्यासारख्या पामरांसाठी. आणि दुसरा ऐसीवरील बौद्धिक क्रीमी लेयरसाठी!