दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१५ मे
जन्मदिवस : संगीतकार मोंतेव्हेर्दी (१५६७), समाजसुधारक, तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर (१८१७), 'ऑझ'लेखक एल. फ्रँक बॉम (१८५६), क्यूरी परिणाम आणि रेडीयम शोधणारा नोबेलविजेता पिएर क्यूरी (१८५९), 'मेकॅनो' शोधणारा फ्रँक हॉर्नबी (१८६३), लेखक मिखाईल बुल्गाकोव्ह (१८९१), समीक्षक रा. श्री. जोग (१९०३), क्रांतिकारक हुतात्मा सुखदेव थापर (१९०७), अभिनेता जेम्स मेसन (१९०९), एव्हरेस्टवर पहिली यशस्वी चढाई करणाऱ्या एडमंड हिलरीचा सहाय्यक तेनसिंग नोर्गे (१९१४), अभिनेता जॉनी वॉकर (१९२३), छायाचित्रकार रिचर्ड अॅव्हेडॉन (१९२३), नाटककार पीटर शॅफर (१९२६), चित्रकार व शिल्पकार जॅस्पर जॉन्स (१९३०), अभिनेत्री माधुरी दिक्षित (१९६७), अभिनेता शायनी आहुजा (१९७४), टेनिसपटू अँडी मरे (१९८७)
मृत्युदिवस : कवयित्री संत जनाबाई (१३५०), कवयित्री एमिली डिकीन्सन (१८८६), चित्रकार व शिल्पकार कासिमिर मालेव्हिच (१९३५), चित्रकार एडवर्ड हॉपर (१९६७), स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फिल्ड मार्शल करिअप्पा (१९९३), लोककवी आणि शाहीर वामनदादा कर्डक (२००४), लेखक कार्लोस फ्युएन्टेस (२०१२), वारली चित्रकार जिव्या सोमा मशे (२०१८)
---
विश्व कुटुंबसंस्था दिन
जागतिक सदसद्विवेकी आक्षेप (Conscientious Objection) दिन
स्वातंत्र्यदिन : पराग्वे (१८११)
१२५२ : पोप इनोसंट चौथा याने फतवा काढून ख्रिश्चन धर्म न पाळणाऱ्यांचा शारीरिक छळ करण्याची मुभा दिली.
१६१८ : योहानेस केप्लरने आधी अग्राह्य मानलेल्या ग्रहगतीच्या तिसऱ्या नियमाची पुष्टी केली.
१७१८ : जेम्स पकल याने मशीनगनचे पेटंट घेतले.
१८३६ : फ्रान्सिस बेली याने सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्रावरच्या दऱ्यांमधून येणारा प्रकाश (बेलीज बीड्स) याचे प्रथम निरीक्षण केले.
१८६९ : अमेरिकन स्त्रियांना मताधिकार मिळण्यासाठी सुझन अँथनी आणि एलिझाबेथ स्टँटन यांनी संघटना स्थापन केली.
१८८९ : आयफेल टॉवर जनतेसाठी खुला.
१९०८ : लो. टिळकांवर ज्यामुळे राजद्रोहाचा खटला चालला तो अग्रलेख ('देशाचे दुर्दैव') केसरीत प्रकाशित झाला.
१९११ : 'स्टँडर्ड ऑईल'च्या एकाधिकारशाहीच्या विरोधात न्यायालयाचा निवाडा; कंपनीचे पुढे सात तुकडे झाले.
१९२८ : 'प्लेन क्रेझी' या लघुपटाद्वारे वॉल्ट डिस्नेच्या मिकी आणि मिनी माऊस ह्या व्यक्तिरेखांचे पडद्यावर पदार्पण.
१९४० : मॅकडॉनल्डने आपले पहिले उपहारगृह सॅन बर्नार्डिनो येथे सुरू केले.
१९४१ : दोस्त राष्ट्रांच्या पहिल्या जेट विमानाचे उड्डाण.
१९४८ : इजिप्त, ट्रान्सजॉर्डन, सिरिया, इराक व सौदी अरेबियाने इस्राएल निर्मितीमुळे इस्राएलवर हल्ला केला.
१९५७ : यु.के.ने हायड्रोजन बॉंबची चाचणी केली.
१९५८, १९६० : रशियानं स्पुतनिक ३ आणि ४ या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केलं.
१९७२ : १९४५पासून अमेरिकेच्या सामरिक अधिपत्याखाली असलेल्या ओकिनावा बेटसमूहाचा ताबा परत जपानकडे गेला.
१९८० : गोदावरी या संपूर्ण देशी पाणबुडीचे जलावतरण.
१९८८ : आठ वर्षांपेक्षा जास्त काळाच्या लढाईनंतर अफगाणिस्तानातून सोव्हिएत लाल सैन्याच्या माघारीची सुरुवात.
२००८ : कॅलिफोर्नियात समलिंगी विवाहांना मान्यता. मॅसॅच्युसेट्सनंतर अशी मान्यता देणारे ते अमेरिकेतील दुसरे राज्य ठरले.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
पुरवणी
'पीप शो'
फटीतून बघताना अचानक,
दिवा मालवल्यामुळे
स्मृतीभ्रंश झाल्याने
पुढचे वर्णन अशक्य
क-ह-र!
क-ह-र!
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
फालतू - सायकिअॅट्रिस्टला
फालतू - सायकिअॅट्रिस्टला दाखवा काहीतरी केमिकल लोचा आहे.
त्याशिवाय इतक्या भिकार कविता प्रसविता येणारच नाहीत.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
तत्त्वज्ञानाचे सांगाडे आणि कलाकृती
तत्त्वज्ञानाचे सांगाडे जसेच्या तसे सांगून कलाकृती बनवली, तर मला व्यक्तिशः ती आवडत नाही.
कारण खरोखर सामान्य वैश्विक तत्त्वे सांगायला जावे, तर ती अगदी थोडक्यात सांगता येत नाही - त्यांना सांगताना अतिसुलभीकरण होते, आणि त्यामुळे अपवादच अपवाद समोर येतात.
त्यापेक्षा कलाकृतीत एखादे तथ्य, घटना, व्यक्ती, भावना, तळमळ, मनःशांतीचा क्षण, वगैरे जिवंत होऊन आस्वादकाला समजली, तर वेगळे. त्याद्वारे तेच तत्त्वज्ञान अगदी आपणहून सुचल्यासारखे आस्वादकात उमलण्याची किमया कलाकाराला जमली, तर आणखी मजा येते.
वरील चारोळीत तर स्मृती, भावना, वास्तवाची जाण, वगैरे तत्त्वे नुसतीच ओकीबोकी* गुंफून वाक्य बनवले आहे.
*ओकेबोके, म्हणजे "ओकेबोकेपणाचे वास्तव जिवंतपणे वाचकाला जाणवेल" अशी रचना मला तरी गमली नाही. रचनेत जीवनाचा भकासपणा जाणवत नाही**.
**"They are not laughing WITH you, they are laughing AT you"च्या धर्तीवर "They are not feeling the sense of vacuousness WITH you; they have a sense of YOUR vacuousness." असे होता कामा नये.
----
असो. कोणाला काही आवडते, कोणाला आवडत नाही. परंतु या सदस्याच्या अनेक रचना वाचल्या, आणि शेवटी माझे हे मत व्यक्त करावेसे वाटले.
तत्त्वज्ञानाचे सांगाडे
धनंजय, हे आपल्याकडून या कवितेचं जे रसग्रहण (रस इन नॅनोग्राम्स) झालं आहे त्याच्या अनुषंगांनं लिहिलं आहे का? यात काय वैश्विक तत्त्व दिसलं? कोणता सांगाडा? कोणता अपवाद समोर आला?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
:-)
(नॅनोग्रॅम्स)
वरील कविता म्हणजे तत्त्वज्ञानातील पुस्तकातील मधल्यास एखाददोन वाक्यांचे उद्धरण वाटते. मधील दोनतीन शब्द अध्याहृत म्हणून गाळून मग चारोळीसारखे लिहिलेले आहे.
आता ही वाक्ये कुठे लागू करायची त्याचा संदर्भ या एकदोन वाक्यांत दिसत नाही. "बेनिफिट ऑफ डाऊट" म्हणून संदर्भ देऊन कदाचित मला वरील वाक्ये सार्थ करता येतील. परंतु ते नसते ओझे माझ्यावरती कशाला?
त्यामुळे मी माझा त्यातल्या त्यात हल्लीचा अनुभव घेऊ शकतो, उदाहरणार्थ :
परवा चालताना माझ्या पायाला ठेच लागली. थोडेसे हुळहुळल्यासारखे झाले. मी खाली बघितले तर वाटेत पायाशी थोडा उंचवटा होता. मग मी त्याच्यावरून पाय उचलून पुढे गेलो.
आता "पायाला ठेच लागणारा उंचवटा पायाशी होता" या रोखठोक वास्तवात उगाच "वास्तवाच्या शक्यता पुसट आहेत" हा विचार करायची गरज काय? मला पूर्वी लागलेल्या ठेचांची स्मृती आहे, अथवा पूर्वी हाच उंचवटा बघितल्याची स्मृती होती, म्हणून मला वास्तव समजले, आणि त्याबाबत हुळहुळल्याची भावना मनात येऊ शकली... असा गुंतागुंतीचा विचार अनाठायी वाटतो.
असे तत्त्वज्ञानाच्या पुस्तकात असते, तर या वाक्याच्या मागेपुढे संदर्भ असता - अमुक अशा परिस्थितीत हे तत्त्व वापरायचे आहे. तमुक प्रकारची परिस्थिती या विषयाच्या बाहेर आहे, वगैरे. ते रुक्ष असते, पण विचार पटण्या-न-पटण्याकरिता अधिक साधनसामग्री तिथे असते.
आता कवीने असे एका वाक्यात तत्त्व न सांगता एखादा अनुभव सांगितला असता, समजा. आणि चांगल्या प्रकारे भावेल असा सांगितला असता, म्हणा. तर बात वेगळी होती. कवीच्या त्या जिवंत अनुभवाच्या बाबतीत मी पटलो असतो : "हो, खरेच, या अनुभवात खरे काय ते कळतच नाही. मग कवीने अनुभव वर्णन करून मला भावनांबाबत पटवले असते : स्मृतींमुळे भावना जागृत झाल्या. तेही मला पटले असते. तो कवीचा अनुभव असता, तत्त्व म्हणून काही सांगितलेले नसते. त्यामुळे "या तत्त्वाकरिता विषय कुठला, विषयाबाहेरचे मुद्दे कुठले" हा विचारही मनात आला नसता. कविता अगदीच भावली, तर मी त्या बाबत अधिक विचार करत राहिलो असतो. माझ्या स्वतःच्या अनुभवांत असे अनुभव आले असतील, त्याबाबत विचार करू लागलो असतो. माझ्या अनुभवात कदाचित "वास्तव नीट कळत नाही" असे झाले असेल. मग त्यांतही स्मृतींमुळे भावुक झालो असे अनुभव मी धुंडाळू लागलो असतो. आणि जो अनुभव कवीने सुंदररीत्या सांगितला, त्याला माझ्या वैयक्तिक अनुभवाची जोड मी दिली असती. आणि कवीचा अनुभव आणि माझे वैयक्तिक अनुभव यांना जोडून आपोआप अस्फुटपणे तत्त्व वापरण्याचे क्षेत्र मला जाणवले असते. आणि त्या क्षेत्रामध्ये ते तत्त्व आपोआप उमजून पटलेही असते.
परंतु असे उघडेनागडे तत्त्व सांगितल्यामुळे माझ्यात कुठलेही सुंदर विचारचक्र फिरले नाही. ते तत्त्व पटलेही नाही.
----
काव्य-कलाकृतींबाबत वरील सर्व अपेक्षा या माझ्या वैयक्तिक आहेत. अन्य लोकांची आवड आणि कवीचा हेतू वेगळा असेल तर ठीकच - हा खुलासा मी वर दिलेलाच आहे.
खूप खूप छान समजावून सांगीतलं
खूप खूप छान समजावून सांगीतलं आहे. अक्षरशः इतका कॉम्प्लिकेटेड मॅटर कळला. नाहीतर एरवी इटरकवि किंवा इंटरकाव्यवाचक संवाद डोक्यावरून जातात. काव्य किंवा तत्त्वज्यान विषयांशी फारसा काही संबंध नसलेल्या लोकांना देखिल सगळं कळावं इतकं स्पष्टीकरण दिल्याबद्दल आभार.
------------
कविने काहीतरी अनुभव आणि काहीतरी स्मृती नि त्या भावना जागवतात , नाही याची काहीतरी उदाहरणं द्यायला हवी होती.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
+१ सहमत आहे.
+१ सहमत आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!