दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२९ मे
जन्मदिवस : 'हिस्टेरिया'वर संशोधन करणारा मानसशास्त्रज्ञ पिएर जेनेट (१८५९), पियानोवादक व संगीतकार इसाक आल्बेनित्झ (१८६०), लेखक जी. के. चेस्टरटन (१८७४), सिनेदिग्दर्शक जोसेफ व्हॉन स्टर्नबर्ग (१८९४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९०५), लेखक अशोक टिळक (१९२१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज (१९२९), वाढत्या लोकसंख्येशी निगडित समस्यांवर मूलभूत संशोधन करणारे पॉल एरलिच (१९३२), नेमबाज भुवनेश्वरी कुमारी (१९४५), अभिनेता पंकज कपूर (१९५४)
मृत्युदिवस : शोधक बार्थलोम्यू डायस (१५००), अनेक मूलद्रव्ये शोधणारा रसायनशास्त्रज्ञ हंफ्रे डेव्ही (१८२९), अभिनेता पृथ्विराज कपूर (१९७२), माजी पंतप्रधान चरणसिंग (१९८७), साम्यवादी विचारांचे लेखक केशव गोखले (१९५२), संगीतकार स्नेहल भाटकर (२००७), विचारवंत, राजकारणी व लेखक ग. प्र. प्रधान (२०१०), अभिनेता डेनिस हॉपर (२०१०), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (२०१२)
---
आंतरराष्ट्रीय यू.एन. शांतीरक्षक दिवस
लोकशाही दिन : नायजेरिया.
१६५८ : चंबळ खोऱ्यातील सामूगडच्या लढाईत औरंगजेब आणि मुरादने भाऊ दारा शुकोहचा पराभव केला; पुढे औरंगजेब मुघल बादशाह बनला.
१९१३ : इगॉर स्ट्राव्हिन्स्कीचे संगीत आणि निजिन्स्कीचे नृत्यदिग्दर्शन लाभलेला बॅले 'Sacre du Printemps' (The Rite of Spring) प्रथम सादर झाला. आधुनिक कलेतला हा एक मैलाचा दगड मानला जातो.
१९१९ : आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचा पुरावा शोधण्यासाठी आर्थर एडिंग्टन आणि अँड्र्यू क्लॉड यांनी प्रथम निरीक्षणे केली.
१९५३ : जगातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पहिले मानवी पाऊल पडले; एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी शिखर सर केले.
१९५८ : भूदान पदयात्रेच्या निमित्ताने आचार्य विनोबा भावे पंढरपूरच्या मंदिरात प्रथमच गेले.
१९६४ : पॅलेस्तिनी प्रश्नाबद्दल पूर्व जेरुसलेम येथे अरब लीगची बैठक; यातून पुढे पॅलेस्तिनी मुक्ती संघटनेची स्थापना.
१९८५ : पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चौदा महिने लागले.
१९८५ : ब्रसेल्समध्ये युरोपियन कपच्या अंतिम फुटबॉल सामन्यात लिव्हरपूलच्या चाहत्या प्रेक्षकांनी दंगा केला; त्यात भिंत कोसळली; परिणामी ४१ प्रेक्षक मृत्युमुखी पडले व शेकडो जखमी झाले.
१९९९ : 'डिस्कव्हरी' या यानाने प्रथम आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर डॉकिंग केले.
१९९९ : भारताचा कर्णधार महंमद अझरुद्दीन याने एकदिवसीय सामन्यात ९,००० धावांचा पल्ला पार करून विक्रमाची नोंद केली.
२०१३ : फ्रान्समध्ये पहिला समलैंगिक विवाह सोहळा संपन्न.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
पुरवणी
'पीप शो'
फटीतून बघताना अचानक,
दिवा मालवल्यामुळे
स्मृतीभ्रंश झाल्याने
पुढचे वर्णन अशक्य
क-ह-र!
क-ह-र!
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
फालतू - सायकिअॅट्रिस्टला
फालतू - सायकिअॅट्रिस्टला दाखवा काहीतरी केमिकल लोचा आहे.
त्याशिवाय इतक्या भिकार कविता प्रसविता येणारच नाहीत.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
तत्त्वज्ञानाचे सांगाडे आणि कलाकृती
तत्त्वज्ञानाचे सांगाडे जसेच्या तसे सांगून कलाकृती बनवली, तर मला व्यक्तिशः ती आवडत नाही.
कारण खरोखर सामान्य वैश्विक तत्त्वे सांगायला जावे, तर ती अगदी थोडक्यात सांगता येत नाही - त्यांना सांगताना अतिसुलभीकरण होते, आणि त्यामुळे अपवादच अपवाद समोर येतात.
त्यापेक्षा कलाकृतीत एखादे तथ्य, घटना, व्यक्ती, भावना, तळमळ, मनःशांतीचा क्षण, वगैरे जिवंत होऊन आस्वादकाला समजली, तर वेगळे. त्याद्वारे तेच तत्त्वज्ञान अगदी आपणहून सुचल्यासारखे आस्वादकात उमलण्याची किमया कलाकाराला जमली, तर आणखी मजा येते.
वरील चारोळीत तर स्मृती, भावना, वास्तवाची जाण, वगैरे तत्त्वे नुसतीच ओकीबोकी* गुंफून वाक्य बनवले आहे.
*ओकेबोके, म्हणजे "ओकेबोकेपणाचे वास्तव जिवंतपणे वाचकाला जाणवेल" अशी रचना मला तरी गमली नाही. रचनेत जीवनाचा भकासपणा जाणवत नाही**.
**"They are not laughing WITH you, they are laughing AT you"च्या धर्तीवर "They are not feeling the sense of vacuousness WITH you; they have a sense of YOUR vacuousness." असे होता कामा नये.
----
असो. कोणाला काही आवडते, कोणाला आवडत नाही. परंतु या सदस्याच्या अनेक रचना वाचल्या, आणि शेवटी माझे हे मत व्यक्त करावेसे वाटले.
तत्त्वज्ञानाचे सांगाडे
धनंजय, हे आपल्याकडून या कवितेचं जे रसग्रहण (रस इन नॅनोग्राम्स) झालं आहे त्याच्या अनुषंगांनं लिहिलं आहे का? यात काय वैश्विक तत्त्व दिसलं? कोणता सांगाडा? कोणता अपवाद समोर आला?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
:-)
(नॅनोग्रॅम्स)
वरील कविता म्हणजे तत्त्वज्ञानातील पुस्तकातील मधल्यास एखाददोन वाक्यांचे उद्धरण वाटते. मधील दोनतीन शब्द अध्याहृत म्हणून गाळून मग चारोळीसारखे लिहिलेले आहे.
आता ही वाक्ये कुठे लागू करायची त्याचा संदर्भ या एकदोन वाक्यांत दिसत नाही. "बेनिफिट ऑफ डाऊट" म्हणून संदर्भ देऊन कदाचित मला वरील वाक्ये सार्थ करता येतील. परंतु ते नसते ओझे माझ्यावरती कशाला?
त्यामुळे मी माझा त्यातल्या त्यात हल्लीचा अनुभव घेऊ शकतो, उदाहरणार्थ :
परवा चालताना माझ्या पायाला ठेच लागली. थोडेसे हुळहुळल्यासारखे झाले. मी खाली बघितले तर वाटेत पायाशी थोडा उंचवटा होता. मग मी त्याच्यावरून पाय उचलून पुढे गेलो.
आता "पायाला ठेच लागणारा उंचवटा पायाशी होता" या रोखठोक वास्तवात उगाच "वास्तवाच्या शक्यता पुसट आहेत" हा विचार करायची गरज काय? मला पूर्वी लागलेल्या ठेचांची स्मृती आहे, अथवा पूर्वी हाच उंचवटा बघितल्याची स्मृती होती, म्हणून मला वास्तव समजले, आणि त्याबाबत हुळहुळल्याची भावना मनात येऊ शकली... असा गुंतागुंतीचा विचार अनाठायी वाटतो.
असे तत्त्वज्ञानाच्या पुस्तकात असते, तर या वाक्याच्या मागेपुढे संदर्भ असता - अमुक अशा परिस्थितीत हे तत्त्व वापरायचे आहे. तमुक प्रकारची परिस्थिती या विषयाच्या बाहेर आहे, वगैरे. ते रुक्ष असते, पण विचार पटण्या-न-पटण्याकरिता अधिक साधनसामग्री तिथे असते.
आता कवीने असे एका वाक्यात तत्त्व न सांगता एखादा अनुभव सांगितला असता, समजा. आणि चांगल्या प्रकारे भावेल असा सांगितला असता, म्हणा. तर बात वेगळी होती. कवीच्या त्या जिवंत अनुभवाच्या बाबतीत मी पटलो असतो : "हो, खरेच, या अनुभवात खरे काय ते कळतच नाही. मग कवीने अनुभव वर्णन करून मला भावनांबाबत पटवले असते : स्मृतींमुळे भावना जागृत झाल्या. तेही मला पटले असते. तो कवीचा अनुभव असता, तत्त्व म्हणून काही सांगितलेले नसते. त्यामुळे "या तत्त्वाकरिता विषय कुठला, विषयाबाहेरचे मुद्दे कुठले" हा विचारही मनात आला नसता. कविता अगदीच भावली, तर मी त्या बाबत अधिक विचार करत राहिलो असतो. माझ्या स्वतःच्या अनुभवांत असे अनुभव आले असतील, त्याबाबत विचार करू लागलो असतो. माझ्या अनुभवात कदाचित "वास्तव नीट कळत नाही" असे झाले असेल. मग त्यांतही स्मृतींमुळे भावुक झालो असे अनुभव मी धुंडाळू लागलो असतो. आणि जो अनुभव कवीने सुंदररीत्या सांगितला, त्याला माझ्या वैयक्तिक अनुभवाची जोड मी दिली असती. आणि कवीचा अनुभव आणि माझे वैयक्तिक अनुभव यांना जोडून आपोआप अस्फुटपणे तत्त्व वापरण्याचे क्षेत्र मला जाणवले असते. आणि त्या क्षेत्रामध्ये ते तत्त्व आपोआप उमजून पटलेही असते.
परंतु असे उघडेनागडे तत्त्व सांगितल्यामुळे माझ्यात कुठलेही सुंदर विचारचक्र फिरले नाही. ते तत्त्व पटलेही नाही.
----
काव्य-कलाकृतींबाबत वरील सर्व अपेक्षा या माझ्या वैयक्तिक आहेत. अन्य लोकांची आवड आणि कवीचा हेतू वेगळा असेल तर ठीकच - हा खुलासा मी वर दिलेलाच आहे.
खूप खूप छान समजावून सांगीतलं
खूप खूप छान समजावून सांगीतलं आहे. अक्षरशः इतका कॉम्प्लिकेटेड मॅटर कळला. नाहीतर एरवी इटरकवि किंवा इंटरकाव्यवाचक संवाद डोक्यावरून जातात. काव्य किंवा तत्त्वज्यान विषयांशी फारसा काही संबंध नसलेल्या लोकांना देखिल सगळं कळावं इतकं स्पष्टीकरण दिल्याबद्दल आभार.
------------
कविने काहीतरी अनुभव आणि काहीतरी स्मृती नि त्या भावना जागवतात , नाही याची काहीतरी उदाहरणं द्यायला हवी होती.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
+१ सहमत आहे.
+१ सहमत आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!