स्वामी समर्थ आहेत
सौभाग्यलेणी
अंगारा
पैपाहुणा
सणवार
गोडधोड
पोथी
उद्यापन
वेळच्या वेळी सग्गळं काही
शंभर आवडी निवडी
नातवंडी आणि पत्वंडी
गावामध्ये दवंडी
स्वामी समर्थ आहेत
जग पुढे चाललंय
(म्हणजे कै हो? )
शेवटी नातू होऊदे म्हणजे झालं
कार कशाला बुडाशी
आमचा काळ भारी
तुमचा काळ फालतू
पण विडीओ च्याट लावून देई
बारशाला नवीन साडी
ईश्वरा सोडव रे बाबा
आता काही इच्छा नाही राहिली
शेवटी
स्वामी समर्थ आहेत
प्रतिक्रिया
आवडली!
आवडली!
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
मार्मिक कविता!
हा हा! मार्मिक कविता!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अगदी!!!!
अगदी!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कविता कळली नाही. कळण्याचं एक
कविता कळली नाही.
कळण्याचं एक वेळ सोडून देता येईल, तसं फारसं काहीच कळत नाही म्हणा मला - पण पोचलीही नाही ती माझ्यापर्यंत!
***
अब्द शब्द
मीही कवितेच्या बाबतीत
मीही कवितेच्या बाबतीत अर्थापेक्षा काय (अॅबस्ट्रॅक्ट)जाणवतंय याला महत्व देतो. तरीही माझ्या कपॅसिटीत ही कविता नाही जाणवू शकली..
काही घटना किंवा तत्सम संदर्भ असू शकेल जो तुम्हाला, मला माहीत नाही..
छान!
एक आजी आठवली.
कविता
कविता एखाद्या विशिष्ठ व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून लिहिली आहे असे वाटते.
आणि तसेही कुठलेही 'स्वामी' सगळ्याच बाबतीत समर्थच असतात!
दणदणीत दीर्घ कविता होवू
हे पटलं. मात्र श्रद्धा-अंधश्रद्धा यापेक्षा एका विशिष्ट व्यक्तीच्या चित्रणातून एकंदरीत आज्जीबाईंचं चित्रण यातून होऊ शकेल. सुरूवात उत्तम झालेली आहे. मला वाटतं ही कविता अनेक भागांची व्हावी. या आजींचा भूतकाळ काय होता? याचंही चित्रण केलं तर त्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर दिसून येऊ शकतील.