फटके दिले पाहिजे'
दारूड्यांना मंदिराबाहेर खांबाला बांधून फटके दिले पाहिजे'
या अण्णा हजारेंच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
अण्णांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप नोंदविला आहे तर कॉंग्रेसने याला 'तालिबानी उपाय' असल्याचे म्हटले आहे.
...
1..दारुडा कोणाला म्हणावे?
२...ज्या स्त्रीया दारुड्या आहेत त्यांना पण फटक्यांची् शिक्क्षा देणार का?
३.. गटारी अमावास्येच्या दिवशी नेमके काय होईल?
४..मल्या..व दारु उत्पादक यांना किति फटके मारणार?
५..अण्णांचा आसुड..हि पुस्तिका निघणार का?
६..हिंदुना मंदीरा बाहेर,,मुस्लमानाना मशिद व ईसायाना चर्च बाहेर अशी विभागणी फटके मारताना होवु शकते का?
उत्तरे
1..दारुडा कोणाला म्हणावे?
समाजातल्या खालच्या वर्गातल्या दारू पिणार्यांना दारुड्या म्हणावे. उच्चभ्रूंपैकी दारू पिणार्यांना सोशल ड्रिंकर्स म्हणावे.
२...ज्या स्त्रीया दारुड्या आहेत त्यांना पण फटक्यांची् शिक्क्षा देणार का?
भेदभाव नसावा.
३.. गटारी अमावास्येच्या दिवशी नेमके काय होईल?
जसे वर्षातले चार दिवस लाउडस्पीकरचा धिंगाणा १२ वाजेपर्यंत घालायला परवानगी असते तशी गटारी अमावस्येच्या दिवशी स्पेशल परवानगी दिली जावी.
४..मल्या..व दारु उत्पादक यांना किति फटके मारणार?
देशी, गावठी आदि दारू उत्पादकांना पण तितकेच फटके पडणार. मल्ल्या वगैरें मोठ्या कॉर्पोरेट दारूत्पादकांचा दारूच्या कारखान्यांतून रोजगार पुरवल्याबद्दल अर्थव्यवस्थेचे तारणहार म्हणून जाहीर सत्कार होणार.
५..अण्णांचा आसुड..हि पुस्तिका निघणार का?
शक्यता नाकारता येत नाही.
६..हिंदुना मंदीरा बाहेर,,मुस्लमानाना मशिद व ईसायाना चर्च बाहेर अशी विभागणी फटके मारताना होवु शकते का?
इसायांना दारू निषिद्ध नसल्यामुळे त्यांना कुठेच फटके पडणार नाहीत. बाकीच्यांना ते हिंदू किंवा मुसलमान असले तरी मंदिराच्याच बाहेर फटके पडणार.
एन्जॉय
अण्णान्चे हे विधान म्हणजे
अण्णान्चे हे विधान म्हणजे साधनशूचितेचा, शुचिर्भूततेचा एकतर्फी अडाणी रासवट अविष्कार आहे असे वाटते.
माणूस दारुडा हौसेने बनत नाही. बनला तर त्याला बाहेर खेचुन काढायला पाच पन्नास वर्षांपूर्वीपेक्षा कितीतरी अधिक योग्य वैद्यकीय उपाय आहेत, संस्था आहेत. दारुड्यान्ना फटके मारायची भाषा करण्यापेक्षा अण्णान्नी या संस्थान्च्या कार्याच्या वाढीस लक्ष घातले अस्ते तर बरे झाले अस्ते.
अन्यथा,"महारोग्यान्ना गावाबाहेर हाकलुन द्यावे" या पूर्वापार चालत आलेल्या कृतीसारखाच "दारुड्यान्ना फटके मारा" हा अण्णाप्रणीत उपाय दिसतो आहे, जेव्हा बाबा आमटे प्रभुतीन्नी महारोग्यान्ना जवळ करुन त्यान्ची आनन्दवने स्थापली. अण्णानी बोलताना भान न राखले तरी बाकी सगळेच लोक बाबा वाक्यम प्रमाणम या धर्तीवर त्यान्च्याप्रमाणे एकतर्फी विचार करत नाहीत व असे लोक अण्णानी आत्मावलोकन केले नाही तरी अण्णान्चे मूल्यमापन जरुर करीत रहाणार हे विसरू नये.
अण्णान्चे वरील उद्गार केवळ दुर्दैवीच नव्हेत तर "भडकावू" देखिल आहेत असे माझे मत.
>>> ५..अण्णांचा आसुड..हि
>>> ५..अण्णांचा आसुड..हि पुस्तिका निघणार का?
आण्णांवर भरपुर पुस्तिका/ पुस्तके/ गाणी निघालेली आहेत.
बाकी वरील वाक्य मोठ्यांची छोटी वाक्ये या सदराखाली गणली जावीत. साध्या साध्या बोलण्यातदेखील आपण असली वक्तवे करतो. शब्दश: तोच अर्थ घेवून तसलीच कृती करतोच असे नाही.