ही बातमी समजली का? - ८६
आजच्या 'पुणे टाइम्स'मध्ये फिल्म इन्स्टिट्यूटच्या २००८च्या बॅचविषयी ही बातमी आली आहे -
Course delays a norm, but 2008 FTII batch a soft target
कोर्स पूर्ण करायला इतका वेळ का लागतो आहे ह्या काही जणांच्या प्रश्नांची काही उत्तरं त्यात आहेत. उदा. -
- ह्या सुमाराला अॅनालॉग → डिजिटल तंत्रज्ञान बदलामुळे नवी यंत्रणा आली.
- विद्यार्थी संख्या वाढली (शॉर्ट टर्म कोर्सेस चालू केले गेले.)
- फॅकल्टी पुरेशी नव्हती.
- वाढत्या विद्यार्थीसंख्येनुसार यंत्रणा वाढली नाही.
- २००९च्या बॅचला प्राधान्य दिल्यामुळे त्यांचे प्रकल्प गेल्या जुलैमध्ये पूर्ण झाले.
आता, संपाचं दमन करण्यासाठी २००८ची बॅच सॉफ्ट टारगेट म्हणून वापरली जात आहे. अर्धवट माहितीचा प्रसार करून विद्यार्थी जणू काही गुन्हेगार आहेत असं चित्र उभं केलं जात आहे. काही विद्यार्थी आळशी असतीलही, पण जी सरसकट विद्यार्थ्यांची नालस्ती चालू आहे ती पद्धतशीरपणे केली जात आहे. त्यात अर्थातच हितसंबंध गुंतलेले आहेत. त्याचं विश्लेषण करणारा हा आणखी एक लेख -
FTII student arrests a masterstroke: They turn the spotlight away from Gajendra Chauhan
It doesn’t matter where one stands on Chauhan’s appointment or if you think FTII is in shambles, to arrest people after midnight is unmistakably repressive. Taking students into custody in the dead of the night is not going to help FTII improve either its academic standards or discipline. If anything, these midnight arrests indicate a worrying neglect from FTII’s administration.
प्राध्यापकांनीही झाल्या प्रकाराबद्दल सरकारकडे निषेध नोंदवला आहे.
By adopting an aggressive and confrontationist path you are only deepening misgivings and hardening postures all around. We urge the government to take a pragmatic and honourable view rather than a high-handed view of the strike.
कोर्स पूर्ण करायला इतका वेळ
ह्या सर्वाला मोदी आणि गजेंद्र कारणीभुत आहेत हे कळल्यानी विद्यार्थ्यांबद्दल अतिव सहानभुती निर्माण झाली.
फॅकल्टी पुरेशी नसणे वगैरे हे संप करण्यासाठी पुरेशी कारणे २००८ पासुन २०१४ पर्यंत वाटले नाही हे ही पटले. ह्या सर्व अडचणी चालतात फक्त गज्जुभाऊ आले की संप करायचा हे समजुन घेण्याचा प्रयत्न चालू आहे.
>>ह्या सर्वाला मोदी आणि
>>ह्या सर्वाला मोदी आणि गजेंद्र कारणीभुत आहेत
असं कोण म्हणतंय? "२००८ चे विद्यार्थी अजून पास आउट झले नाहीत कारण ते निकम्मे आहेत; असल्या निकम्म्यांची बाष्कळ बडबड काय ऐकायची" असा पॉइंट मांडला जात आहे त्याचा काउंटर आहे.
------------------
अवांतरः अॅनालॉग ऐवजी डिजिटल तंत्रज्ञान आले म्हणून असे काय बदल घडतात? जे बदल घडतात ते हार्डवेअर लेव्हलला.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
फॅकल्टी पुरेशी नसणे वगैरे हे
ह्याचे काय?
दुसरीकडे ऋ म्हणतो की आमच्या पैश्यावर चालणार्या इंस्टीट्युट वर कोण नेमले जाते आहे ह्या बद्दल त्यांना घेणे देणे असणारच.
पण ते हे सरळ विसरतात की आमच्या पैश्यावर असल्या इंस्टीट्युट काढाव्यात का नाही हे आधी विचारले तरी कुठे आहे आम्हाला. त्याचा आधी निकाल लावा आणि मग त्यावर कोणाला नेमायचे ते ठरवा
लोकसभा, बजेट वगैरे
>>पण ते हे सरळ विसरतात की आमच्या पैश्यावर असल्या इंस्टीट्युट काढाव्यात का नाही हे आधी विचारले तरी कुठे आहे आम्हाला. त्याचा आधी निकाल लावा आणि मग त्यावर कोणाला नेमायचे ते ठरवा
विचारले नाही हे म्हणण्याला काय आधार आहे?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
विचारले नाही हे म्हणण्याला
हा प्रश्न आधी ऋ ला विचारायला पाहिजे ना.
प्रकाटाआ
उगाच कोणाशीही काय कुस्ती या विचाराने प्रकाटाआ
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तंत्रज्ञान
नवी यंत्रं आली. सॉफ्टवेअर आलं. ती विकत घेण्यासाठी प्रचंड पैसा लागला. ती चालवण्यासाठी नव्यानं प्रशिक्षण घेणं आलं. जुन्या तंत्रज्ञानावर शिकलेले वयोवृद्ध प्राध्यापक लोक आणि संस्थेतले जुने-जाणते प्रशिक्षित तंत्रज्ञ तिथे अपुरे पडू लागले. तेव्हाच विद्यार्थीसंख्या वाढली त्यामुळे प्रश्न अधिक बिकट झाला.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नवी यंत्रं आली. सॉफ्टवेअर
गजेंद्र चौहानांच्या निवडीला समर्थन नाही. त्या क्षेत्रातले ते एक व्यक्ती म्हणून तोंड-ओळख आहे पण अध्यक्ष म्हणुन कसे ते माहीत नाही अर्थात. पण जर विद्यार्थांना ते मान्य नसेल आणि त्यामागे त्यांची ठाम्/योग्य कारणं असतील तर तसं होऊ नये हे प्रामाणिकपणे वाटतं - ते तितकं सोप्प नाही हे इतक्या दिवस चाललेल्या संपावरून आणि जास्तित जास्त पाठींबा असूनही काही होत नाहीये हे दिसतंच आहे. पण मला एक विचारायचं आहे, तुम्ही वर म्हणता ते सगळं (गैर-व्यवस्थापन) घडत असताना त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी कोण होतं? जे कोणी असेल ते नक्कीच गजेंद्र चौहानांपेक्षा सरस असतील, कारण FTII च्या म्हणण्यानुसार गजेंद्र चौहान हे पहिलेच असे अध्यक्ष आहेत जे ह्या पदाला पात्र नाहीत शिवाय अध्यक्ष पदावरून तेव्हा असा गदारोळ झाला नव्हता किंवा झाला असेल तर तो एवढ्या तिव्रतेचा नसावा. मग त्याआधी अध्यक्षपदी असलेल्यांच्या नेमणूकीवरही प्रश्न का उभे राहू नयेत वा राहिले नाहीत ? आणि गजेंद्र ह्यांच्या नेमणुकी आधीच त्यांना का 'जज' करावं?
काल परवापर्यंत गजेंद्र चौहान नकोच असं ठामपणे मलाही वाटत असतांना आज ह्या सगळ्या चर्चांनंतर दुसरी बाजूही पहावी असं वाटू लागलय.
समंजसपणा
संस्थेतले प्रश्न सोडवण्यासाठी काही वेगळं करणं गरजेचं आहेच. मात्र, 'गजेंद्र चौहान' किंवा अनघा घैसास वगैरे लोक हे त्याला उत्तर नाही; विद्यार्थ्यांना खलनायक करणं हा त्यावरचा उपाय नाही; तसंच दमनशाहीनं हा प्रश्न सुटणारा नाही; उलट तो आणखी चिघळतो आहे. सध्याच्या गदारोळात आणि तीव्र भावनातिरेकात समंजसपणाचा अभाव दिसतो आहे. शांतता प्रस्थापित झाली, तर काही शहाण्या लोकांना एकत्र घेऊन हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. पण ते शहाणपण आज कुठे दिसत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
शहाण्या लोकांना एकत्र घेऊन हा
चिंज - "शहाण्या लोकांना" म्हणजे "तुमच्या आवडीच्या आणि तुमच्याच विचारसरणीच्या" लोकांना असे तुम्हाला म्हणायचे आहे ते कळतय.
पण तसे सरळ सरळ म्हणा ना.
आणि ह्या गदारोळा मुळे संधी
आणि ह्या गदारोळा मुळे संधी आलीच आहे तर मुळापासुनच विचार करा ना. ह्या इंस्टीट्युट सरकारनी चालवाव्यात का? विचार इथपासुनच चालू करावा. अध्यक्ष कोण असावे वगैरे फार नंतर.
मला गजेंद्र काय भारतीय सिनेमातल्या देवानंद सोडुन कोणाबद्दलच प्रेम नाही. त्यामुळे कोण अध्यक्ष होतय वगैरे ह्यात अजिबात रस नाही.
पण गेली १० वर्ष वाट्टेल ते चाललेले गप्प बसुन बघणार्यांना गेल्या १५ महिन्या जो कंठ फुटला आहे त्यामुळे ह्या प्रतिक्रीया लिहायची वेळ आली. जर टिकाच करायची असेल तर त्यात संतुलन तरी दाखवा ना. एका घरचे शेण म्हणजे पक्वांन्न आणि दुसर्या घरचे शेण कडू ही भुमिका कशाला?
मी अगदी ऐसीवर सुद्धा मोदीसरकार ला कायम शिव्या घातल्या आहेत, पण असे सिलेक्टीव्ह बॅशिंग बघुन चीड येते. त्यामुळे माझ्या साठी तरी तो मुद्धा गजेंद्र आहे का गोरीला आहे हा कधीच नव्हता. ह्या दांभीक लोकांचा विरोध करायचा म्हणुन मी प्रतिक्रीया लिहीत होते.
ट्विटरपे चर्चा
आजचा विनोदविषय - अमित शहा बिहारी लिफ्टमध्ये अडकले.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
U.S. college majors: Median
U.S. college majors: Median yearly earnings vs. gender ratio
Somebody On Aisi, please poke a hole in this.
सॉलिड अभ्यासपूर्ण, विद्रट
सॉलिड अभ्यासपूर्ण, विद्रट (विदा युक्त) लिंक आहे. आताच नवर्याला पाठवली.
थोड्या वेळात सारांश लिहीते.
_______
(१) पुरुषप्रधान majors जास्त quantitative असतात
(२) बुद्ध्यंक हा quantitative SAT score बघुन काढतात
(१) आणि (२) => majors जितके पुरुषप्रधान तितका बुद्ध्यांक जास्त ...............................(३)
______
मग त्यांनी US College majors विरुद्ध gender ratio आलेख काढला त्यात त्यांना मिळाले की स्त्रीप्रधान majors वाले विद्यार्थी हे पुरुषप्रधान majors वाल्या विद्यार्थ्यांपेक्षा खरच कमी कमावतात. २ च अपवाद नर्सिंग आणि ट्रान्स्पोर्टेशन. नर्सिंग जरी स्त्रीप्रधान majors असले तरी पगार बरा आहे आणि ट्रान्स्पोर्टेशन जरी पुरुषप्रधान major असले तरी पगार कमी आहे. ..................(४)
____
पण फक्त (४) वरुन हा निष्कर्ष निघतो का की स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी कमावतात? ............. मूळ प्रश्न
____
मग त्यांनी २ शक्यता रुल आऊट केल्या - (१) बेरोजगारी (२) under-employment
त्यांना असे आढळले की दोन्ही majors मध्ये वरील २ मुद्द्यांच्या संदर्भात काही फरक आढळला नाही. अर्थात पुरुषप्रधान majors चा बेरोजगारीचे प्रमाण, under-employment चे प्रमाण हे स्त्री-प्रधान majors इतकेच आढळले.
_____
अर्थात मग त्यांनी सरासरी पगार विरुद्ध SAT score आलेख काढला म्हणजे जवळ जवळ सरासरी पगार विरुद्ध quantitative majors असाच कारण SAT score is mapped to Quantitative major .............. संदर्भ (१) आणि (२)
_________
त्यांना हे आढळलं की Quantitative major जे की पुरुषप्रधान major आहेत त्यांना जास्त पगार आहे कारण मोठ्या कंपनीज Quantitative स्किल ला ( design products, perform data analysis, manage the company) जास्त महत्त्व देतात. आणि त्यामुळे पुरुषांना सरासरी पगार आपोआप जास्त मिळतो.
_______________
हुश्श! हे समजायला काही वेळ लागला. आता त्यात लुपहोल्स शोधणं पुन्हा कधीतरी (=आज्/उद्याच ;))
काय विवक्षित क्षती
स्त्रिया ज्या व्यवसायांत अधिक प्रमाणात आहेत, ते बहुतेक श्यवसाय कमी मिळकतीचे आहेत. आकडे ठीकच आहेत, आणि पूर्वीसारखेच आहेत.
ज्या (पूर्वीच्या वा सद्य) समाजांत घरकाम स्त्रिया करत, त्या समाजांत घरकामाकरिता आर्थिक मोबदला कमीच असे/आहे. आकडेवारीत आश्चर्यकारक ते काय?
तुमच्या मते कारण कुठले आणि कार्य कुठले (विच इझ द काॅझ, विच दि इफेक्ट)?
आता हा पेपर पहा
रिट्रो-काऊजॅलिटी.
जर मुलींचे कंडीशनींग लहानपणापासून ...
-------
आता हा पेपर पहा. अगदी पहिल्या धारेची दारू असलेला आहे. आयमीन नुकताच प्रकाशित झालेला आहे. यानुसार " labor market increasingly rewards social skills ". जर मुली STEM मधे कमी घुसत असतील व क्वालिटेटिव्ह विषयांमधे असलेल्या कोर्सेस कडे जास्त जात असतील तर त्यांना "अच्छे दिन" येणार आहेत असे दिसते.
गृहितक - क्वालिटेटिव्ह विषयांमधे असलेल्या कोर्सेस मधे शिक्षण घेण्यामुळे सोशल स्किल्स वृद्धिंगत होतात (STEM चे कोर्सेस केल्यामुळे होतील त्यापेक्षा.).
मला वाटतं कळीचा प्रश्न हा आहे
मला वाटतं कळीचा प्रश्न हा आहे की - quantitative majors हे पुरुषप्रधान का असतात? जास्त स्त्रिया quantitative majors कडे का वळत नाहीत?
प्रेफरन्स मध्ये हा लिंगभेद का आहे?
हा स्टडी खूप आवडला. यात भोकं
हा स्टडी खूप आवडला. यात भोकं पाडण्याची काय गरज आहे हे मला कळलेलं नाही. किंबहुना आजच्या काळात यापेक्षा वेगळं नक्की काय अपेक्षित होतं?
पहिल्या ग्राफमध्ये ज्या विषयांमध्ये जास्त पुरुष असतात, त्यात अधिक पैसे मिळतात हे दिसतं. पण मला प्रश्न असा आहे की हाच ग्राफ शंभर वर्षांपूर्वी कसा दिसत असेल? आणि तो कसा बदलत गेला असेल... मला खात्री आहे की ग्राफचे सगळेच पॉइंट डाव्या बाजूला गोळा झालेले असतील. आणि अजून पन्नास वर्षांनी पाहिलं तर ग्राफमध्ये दिसणारा एक्स्पोनेन्शियलसदृश कर्व्ह जास्त सपाट झालेला असेल. तसंच आज जी शून्य ते शंभर वाटणी दिसते ती चाळीस ते सत्तर दिसू शकेल. इंजिनियरिंगसाठी आज मुली कमी जातात यात आश्चर्य करण्यासारखं फार नाही, कारण गेल्या पन्नास शंभर वर्षांत बदल होत होत ते प्रमाण शून्यावरून काही टक्क्यांवर आलेलं आहे. अमेरिकेत स्त्रियांनी नोकऱ्या करण्याचीच सुरूवात काही दशकांपूर्वी महायुद्धामुळे सुरू झाली हे लक्षात घ्यायला हवं.
यात भोकं पाडण्याची काय गरज
हे काही फारसे पटत नाही. क्वांटीटेटिव्ह स्किल्स ही जर इतकी हाय-प्रिमियम वर असती तर कंपन्यांनी सब्स्टिट्युट म्हणून संगणक वापरला असता. नैका ?
पण हे सोडून दिले तरी .... खालील भाग पहा ....
---
कंपनी मॅनेज करणे हे composite skill आहे. क्वांटिटेटिव्ह कमी व क्वालिटेटिव्ह जास्त.
प्रॉडक्ट डिझाईन हे सुद्धा बर्याच प्रमाणावर काँम्पोझिट स्किल आहे. क्रिएटिव्हिटी ची गरज असते त्यात - असा माझा समज आहे.
भारतातला इस्त्रायली वंशद्वेष?
या बातमीचे शीर्षकच मोठे मजेदार वाटले, जागतिकीकरणाचा प्रभाव दर्शवणारे:
India: British musician claims racial discrimination against Indian partner by Israeli-themed café
excess
excess liberalisation
एक्सेसिव्ह लिबरलाय्झेशन म्हंजे काय ओ ?
असे मॉडेल की जे कामगारांची उत्पादकता वाढवते व मार्केट कडे दुर्लक्ष करते ?? - म्हंजे काय ??
--------------
घ्या. मशीन शुड नॉट बी द कॉम्पीटीटर ऑफ लेबर. ( आता लगेच - त्याचा शब्दश: अर्थ न घेता .... लुक अॅट द स्पिरिट ऑफ इट - असा मुद्दा येऊ देत. )
मलाही हेच प्रश्न पडलेले आहेत.
मलाही हेच प्रश्न पडलेले आहेत. विशेषतः मशीन हे मानवाचं कॉंपिटिटर कसं काय ब्वॉ? आणि शेतीसाठी बैल वापरले तेव्हा कशी काय कोणी तक्रार केली नाही, की बैल हे माणसाचे कॉंपिटिटर होऊ बघताहेत म्हणून?
औद्योगिक क्रांतीच्या आधी ८० टक्के माणसं जनावरासारखी राहायची आणि कष्ट करायची. आता यंत्रांनी काम करायला सुरूवात केल्यावर आता फारच थोडी माणसं तितक्या हलाखीत राहातात. तरीही यंत्रांबद्दल तक्रार का?
शेतीसाठी बैल वापरले तेव्हा
तुमचा पत्ता व्य नि करा. एक मस्त वाईन ची बॉटल पाठवतो. सिरियसली.
हंटर-गॅदरर लोक मुळात शेती
हंटर-गॅदरर लोक मुळात शेती करायलाच अनुत्सुक असतात व असायचे याचा एक तरी विदा मी देऊ शकतो. बैलाबद्दल तक्रार करणे फार पुढची गोष्ट.
बैल माणसाचा कॉम्पिटीटर होत नाही कारण बैलाला तेवढी अक्कल येणे शक्य नसते. बैलाच्या मागे फिरुन माणूस मात्र निर्बुद्ध कामात बैलाला कॉम्पिटीशन देऊ लागतो.
यंत्रांचंही थोडसं तसंच होतं इतके दिवस पण त्यांची अक्कल वाढेल याची लक्षणे दिसू लागली आहेत. अर्थात त्याने काही वाईट होणार नाही हे निश्चितच ठरलेले असल्याने त्यावर मौन.
फिल्म इन्स्टिट्यूटवर व्यंगचित्र
फिल्म इन्स्टिट्यूटच्या वादासंदर्भात हे गमतीशीर व्यंगचित्र आज पाहण्यात आलं -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ISIS blew up a temple in
ISIS blew up a temple in Syria
हेच का ते - https://en.wikipedia.org/wiki/Baalshamin
टेम्पल शब्द इंट्रेष्टिंग.
गब्बर - हे टेंपल पाडण्यामागे
गब्बर - हे टेंपल पाडण्यामागे आयसिस चा काहीतरी थोर मानवतावादी विचार असणार अश्या प्रतिवादाच्या प्रतिक्षेत.
जोसेफ शंपीटर म्हणाला होता तसे
जोसेफ शंपीटर म्हणाला होता तसे - क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन.
मोदीरहित विनोद
आजचा विनोद मोदींविषयी नाही -
मलाही काही सांगायचंय...
पक्षी : ऐसीवरच्या समलैंगिकांना प्रभाकर बागले ह्यांच्यावर टोळधाड घालण्याचं जाहीर आवाहन!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
लेख 'रोचक' आहे.
लेख 'रोचक' आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आपलं मनही एक आतलं झाड असतं.
कॉलिंग नंदन!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मूल पितानाची मोरपिशी
चान चान चानच!!!
ईऽऽऽऽ
ईऽऽऽऽ, एवढं दवणीय पॉर्न मी नाही वाचू शकत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
निर्लज्जपणा चा कळस :
निर्लज्जपणा चा कळस : Political Parties should not come under RTI.
http://www.thehindu.com/opini
http://www.thehindu.com/opinion/op-ed/the-flawed-reasoning-in-the-santha...
राजस्थान हाय कोर्टने "आमरण उपोषण" हा गुन्हा असल्याचा निर्णय दिलेला आहे. हा प्रकार मुख्यत्वे जैन धर्मियांमध्ये मोक्षप्राप्तीकरता, धार्मिक रुढी म्हणून आढळतो.
_________
http://www.marketwatch.com/story/house-prices-in-gayborhoods-soar-20-in-...
One theory: “If you are not raising children, you have two male incomes and have more money to devote to improve their home environment,” says Gary Gates
चीन ची अर्थव्यवस्था क्षीण क्षीण होत जात्ये ?
चीन ची अर्थव्यवस्था क्षीण क्षीण होत जात्ये असे दिसतेय
बरय. चीनचा बीमोडच झाला तर
बरय. चीनचा बीमोडच झाला तर छानच.
___
बाकी रिपल इफेक्ट काय होइल ते ब्वॉ माहीत नाही.
हाहा... अमेरिकेची वाढतीये असे
हाहा... अमेरिकेची वाढतीये असे कोणाला म्हणायचे आहे का?
यू स्टिल डोन्ट गेट इट, डू यू?
Scientists make breakthrough
Scientists make breakthrough in search for universal flu vaccine
Two US research teams have carried out successful animal tests of experimental influenza vaccines that could prevent infection with any strain of the highly variable flu virus. Finding a “universal vaccine” that eliminates the need for annual flu shots and protects against new pandemic strains is one of the highest priorities in clinical virology.
Scientists reported progress in two separate papers in the journals Science and Nature Medicine. One team is a collaboration between the Scripps Research Institute in California and the Janssen Prevention Centre in the Netherlands, part of the Johnson and Johnson pharmaceutical group; the other is at the US National Institutes of Health in Maryland.
“We are moving in the right direction for a universal influenza vaccine,” said Ian Wilson, professor of biology at Scripps. “This was the proof of principle . . . The ultimate goal of course would be to create a life-long vaccine.”
Today’s flu vaccines raise immunity against a molecule on the viral surface called haemagglutinin or HA, a key protein in flu viruses like H5N1, which causes bird flu, and H1N1 better known as “swine flu”.
The “head region” of HA is a good place to attack, because it is easily accessible, but it has the serious drawback that genetic mutations keep changing it from year to year.
The approach taken by both research teams is to target instead the less accessible HA “stem region” which undergoes little or no mutation. Their results – in mice, ferrets and monkeys – show that such vaccines can prevent infection by a wide range of flu viruses, including H5N1.
“If the body can make an immune response against the HA stem, it is difficult for the virus to escape,” said Prof Wilson.
According to the Centers for Disease Control and Prevention in Atlanta, seasonal flu sends 200,000 people a year to hospital in the US and kills 36,000 a year. When a strain emerges that is not covered by an existing vaccine, the toll can be greater.
In 2009 the H1N1 virus killed somewhere between 150,000 and 575,000 people worldwide and there are fears that many millions would die if an exceptionally virulent new variant such as the 1918-19 Spanish flu, which left more than 50m dead, swept across the globe.
Experts who were not involved in the studies welcomed their findings. Sarah Gilbert, professor of vaccinology at the University of Oxford, said: “This is an exciting development, but the new vaccines now need to be tested in clinical trials to see how well they work in humans. This will be the next stage of research, which will take several years.”
The World Health Organisation lists many research projects aiming to develop universal flu vaccines, with different approaches. The US Food and Drug Administration is testing on animals a candidate from Okairos, a Swiss biotech company acquired by GlaxoSmithKline in 2013.
अजब न्याय हायकोर्टाचा..??
मद्रास उच्च न्यायालयाच्या एका ताज्या निकालानुसार घटस्फोटानंतर महिला पूर्व पतीकडून पोटगी/ निर्वाह भत्ता घेत असेल तर तिने अन्यत्र शारीरिक संबंध ठेवता कामा नये!
कोर्टाचे म्हणणे केवळ आर्थिक कारणांपुरतेच सिमीत असेल, असे वाटते. बाय द वे- घटस्फोटीत पत्नीला पोटगी देत राहून पुरुषाने दुसरीकडे संबंध ठेवले तर चालेल का? याविषयी न्यायालयाचे कांहीच म्हणणे नाही. म्हणजे ती त्याच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून (अंशतः का होईना) आहे म्हणून घटस्फोटानंतरही 'त्याचेशीच' एकनिष्ठ रहायचे व नैसर्गिक भावनाही मारायच्या असे तर कोर्टाला सांगायचे नाही? हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाच्या विरुद्ध नाही का??
ऐसीकरांना काय वाटते?
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
ही बातमी खरी आहे का? खरी असली
ही बातमी खरी आहे का?
खरी असली तर कुठल्याही कारणाखाली हा निकाल जस्टीफाय करता येणार नाही.
खरी आहे.
हो. १७ ऑगस्टच्या बहुसंख्य वृत्तपत्रांतून आहे.
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
लॉजिक इंग्लिशमधे लिहितो.Wife
लॉजिक इंग्लिशमधे लिहितो.
Wife had committed everything to the husband when she married. Hence when they had to separate husband had to pay maintenance as she did not have source of income. The logic of asking the husband was rooted in the fact of her commitment and hence asking husband to be committed financially. If the fact is no longer valid,there is no reason to ask the husband to continue being financially committed to the ex wife. Same should be the case if wife pays maintenance to husband.
लग्न मोडल्यावर पोटगी देणे हे "नवरा बायकोला टाकतो बायको कमिटेडच असते" या इतिहासाछे बैगेज आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
+१
+१
जर पारंपरिक परिस्थिती असेल, स्त्री कमावत नाही, पैशांसाठी नवऱ्यावर अवलंबून आहे, तर पोटापाण्यासाठी फक्त नवऱ्याशीच शरीरसंबंध असं लग्नबंधनातून तिने मान्य केलेलं आहे. जर ती कमावत असेल तर पोटगीचा प्रश्नच का यावा?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जर पारंपरिक परिस्थिती असेल,
पारंपारिक परिस्थितीतून असा विवाह झाला व नंतर घटस्फोट झाला तर अंशतः पोटगी आईवडिलांकडून सुद्धा का घेतली जाऊ नये ? विशेषतः विवाहापूर्वी तिच्या उदरनिर्वाहाचा खर्च आईवडील उचलत होते असे असेल तर ?
( विवाहाचा बेसिस हा फक्त शरीरसंबंध नसतो. व आईवडीलांशी मुलीचे असलेले संबंध हे शरीरसंबंध नसतात - ह्या दोन्ही Excessively basic facts आहेत.. )
... घटस्फोट झाला तर अंशतः
कारण परंपरेत अशी पद्धत नाही.
पोटगी नाही, पण आईवडलांच्या मागे वाडवडलांनी कमावलेल्या संपत्तीत मुलीचाही वाटा असतो, सगळ्या भावंडांमध्ये ती इस्टेट विभागली जाते. आईवडील जिवंत असतील तर "ब्याड लक', नसतील तर संपत्ती आधीच मिळालेली असेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
१९९४ पूर्वी लग्न झालेल्या
१९९४ पूर्वी लग्न झालेल्या मुलीला आइवडिलांच्या संपत्तीत वाटा देणे भावाला कायद्याने बंधनकारक नसते.
कुठले अच्छे दिन?
अच्छे दिन येतील असं आश्वासन भाजपने दिलंच नव्हतं. ते सोशल मीडियाने पसरवलं होतं.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
:ड
संघ आणि भाजपचा काहीही संबंध नाही, हे विधान मला आणखीनच पटायला लागलंय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
म्हंजे आता हा विडिओ पण फेक
म्हंजे आता हा विडिओ पण फेक म्हणायचा का मग ?
सदैव शोधात..
एसार, कोलगेट आणि कॅरॅव्हान
एसार कंपनीच्या कोळसा खाण प्रकल्पांमधला भ्रष्टाचार उघड करणारा एक महत्त्वाचा लेख कॅरॅव्हान मासिकात काही दिवसांपूर्वी आला होता. त्यात उघड झालेले तपशील हे सर्वसाधारण भारतीय भ्रष्टाचाराविषयी कल्पना असलेल्या माणसाला धक्कादायक अजिबातच वाटले नसतील, पण असे तपशील उघड होणं ही एक महत्त्वाची घटना होती. कुप्रसिद्ध 'कोल गेट'मध्ये एसारला गोवणारे हे तपशील गोपनीय इमेल्स आणि इतर अंतर्गत डॉक्युमेंटसमधून उघड झाले होते. एसारमधल्याच एका जागल्या स्रोतानं ते पुरवले होते. आता एसार त्याविषयी कोर्टात जात आहे.
Essar goes after The Caravan with lawsuit for damning article, magazine gives it right back
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
दणदणीत. या लेखाबद्दल मीदेखील
दणदणीत.
या लेखाबद्दल मीदेखील ऐसीवर लिहिले होते. ज्यांना छापील अंक मिळावणे शक्य आहे त्या प्रत्येकाने वाचावा असा लेख आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मूळ लेख जालावर
सहमत. अंक नुकताच प्रकाशित झाला होता तेव्हा बहुधा सबंध लेख जालावर नव्हता. आता तो आला आहे. माझ्या लेखातला पहिला दुवा पाहावा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
लोकसंख्या आणि धर्म
२०११च्या जनगणनेचा धर्मानुसार विदा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांनी त्याचा वापर करून आपल्याला सोयीस्कर असा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्या पार्श्वभूमीवर 'इंडियन एक्स्प्रेस'मधला हा लेख बरा वाटला.
Census 2011 religious data: Why it is tough to use these numbers for identity politics
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
निवडणुका जवळ आल्या आहेत हे
निवडणुका जवळ आल्या आहेत हे पाहूनच युपीए सरकारने ही माहिती दडवली होती याची मला खात्री आहे. कारण 'हिंदूंचं प्रमाण कमी होतंय, मुसलमानांचं वाढतं आहे. असंच चालू राहिलं तर एक दिवस हा देश मुस्लिमबहुल होईल' असा ओरडा हिंदुत्ववादी गेली चाळीस वर्षं करत आहेत. ११ च्या सेन्ससमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच हिंदूंचं प्रमाण समाधानकारक वाटणाऱ्या ८० टक्के या आकड्यापेक्षा खाली गेलं.
मात्र या लेखात फारच धूसरपणा आहे. नक्की कोण या आकड्यांचा कसा अर्थ काढेल, आणि खरा अर्थ काय आहे अशी चर्चा अपेक्षित होती. सामाजिक निर्देशांक सुधारले की लोक आपोआपच कमी मुलं होऊ देतात हे जगभर दिसलेलं आहे. त्यावरून खरं तर असं म्हणता येईल की हिंदूंची सामाजिक परिस्थिती जास्त चांगली आहे, म्हणून लोकसंख्यावाढीचा दर त्यांच्यात कमी आहे. हे काही दशकं चालल्यावर अर्थातच हिंदूंचं प्रमाण किंचित काही प्रमाणात कमी होणार. केरळची आकडेवारी देऊन या युक्तिवादाकडे अगदी ओझरता निर्देश केलेला आहे, पण ही स्पष्ट मांडणी व्हायला हवी होती.
जातनिहाय
खरं तर जातनिहाय आकडेवारी सरकार लवकर प्रकाशित करेल ह्याची आशा मी बाळगून आहे. जातीनुसार सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थिती पाहिली तर ती भारतातलं वास्तव अधिक नीट दाखवेल असं माझं मत आहे. शीख, ख्रिस्ती किंवा मुसलमान समाजांमधले खालच्या जातींतले लोक आणि वरच्या जातींतले लोक ह्यांच्या वास्तवात खूप फरक असावा असा माझा अंदाज आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सो व्हॉट?
शक्यता आहे.
पण व्हाय शुड हिंदूज बी कन्सर्न्ड (ऑर एव्हन थिंकिंग) अबाउट दॅट?
बाकीच्या जमातीतले वरचे आणि खालचे स्तर यांचा सहानुभूतूपूर्वक विचार करण्याचं हिंदूंवर काही बंधन आहे का?
निवडणुका जवळ आल्या आहेत हे
हे खवचट वाक्य आहे का शिरेसली लिहिलय?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हे सीरियसलीच लिहिलेलं आहे.
हे सीरियसलीच लिहिलेलं आहे. २०११ च्या सेन्ससमध्ये हा डेटा प्रसिद्ध झाला असता तर भाजपला त्याचं प्रचंड भांडवल करता आलं असतं. त्यावेळपर्यंत काय वातावरण झालं होतं याचा त्यांना अंदाज आलेला असेलच. त्यातल्या त्यात हिंदुत्ववाद्यांना हवा मिळू नये म्हणून हा प्रयत्न होता हे मला तरी उघड वाटतं आहे. नाहीतर इतका साधा-सोपा डेटा प्रसिद्ध करण्याचं दुसरं काय कारण असणार?
+१
साधारण त्याच पद्धतीचे धोरण भाजपाचे आहे. बिहारच्या निवडणुका जवळ आल्याने जातीनिहाय लोकसंख्येची माहिती दिलेली नाही.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/mata/10-haunted-road-routes-to-av...
बाप रे. रात्री उगाच वाचली ही
बाप रे. रात्री उगाच वाचली ही बातमी
दंग्याधोप्यांमुळे भाजपचा
दंग्याधोप्यांमुळे भाजपचा फायदा.
BJP gains in polls after every riot, says Yale study
(यात १९६२ ते २००० चा विदा वापरला आहे. गोध्रा, नरोडा-पाटीया, मुजफ्फरनगर त्यानंतर झाले.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कुठे नेऊन ठेवलाय मोदी माझा?
आणि हे चित्र पाहा :
१. Sufi ideology integral to Indian ethos: PM Narendra Modi
२. गुजराती जनतेला मोदींचं शांततेचं आवाहन
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कमल स्वरूप यांचा माहितीपट सेन्सॉरच्या विळख्यात
राष्ट्रीय पुरस्कारविजेते दिग्दर्शक कमल स्वरूप यांचा 'बॅटल फॉर बनारस' हा माहितीपट सेन्सॉर बोर्डाकडून नामंजूर -
Pahlaj Nihalani does it again, 'Battle for Banaras' gets censor's censure
मॉन्ट्रियल चित्रपट महोत्सवात अगोदरच निवड झालेला हा माहितीपट वाराणसी लोकसभा निवडणुकीदरम्यानचं सामाजिक-राजकीय वास्तव दाखवतो. कोणतेही कट न सुचवता संपूर्ण चित्रपट सेन्सॉर बोर्डानं नामंजूर केलेला आहे. १९७४मध्ये पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून शिकून बाहेर पडलेले कमल स्वरूप यांनी यापूर्वी रिचर्ड अटेनबरो यांच्या 'गांधी' चित्रपटाला दिग्दर्शन साहाय्य केलेलं आहे. 'ओम दरबदर' हा त्यांचा चित्रपट यापूर्वी अनेक महोत्सवांत गाजलेला आहे. दादासाहेब फाळकेंवरच्या त्यांच्या चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे. गोव्याच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी चित्रपटाला ३१ ऑगस्टआधी सेन्सॉर बोर्डाची मंजुरी आवश्यक आहे. नंदिनी सरदेसाई आणि चंद्रप्रकाश द्विवेदी या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी बोर्डाच्या ह्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
गे प्राइडच्या धाग्यावर
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
शेतीमालाला रास्त भाव मिळावा - शरद पवार
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
ऑलिव्हर सॅक्स-न्युरॉलॉजिस्ट यांचे निधन
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
एक शुद्ध योगायोग -- हिंदूंवरच्या वाढत्या जबाबदाऱ्या....
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
बाकी अनंतमूर्ती मात्र सुटले
बाकी अनंतमूर्ती मात्र सुटले हां..
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
Artist Against All Odd (AAAO) च्या फेबु पेज वरील कविता
Artist Against All Odd (AAAO) च्या फेबु पेज वरील कविता
माल्लेशप्पा एम. कालबुर्गी
तुमने वह सब क्यों लिखा
जो लिखना नहीं था
तुमने वह सब क्यों नहीं लिखा
जो तुम्हें नहीं लिखना था
सत्ता के सर्वशिक्षा अभियान का
तुमने गलत अर्थ लगाया
तुम्हारी गलती ठीक करनी जरूरी थी
तुम क्यों नही समझ पाए कालबुर्गी
कि हमें औरंगजेब पसंद नहीं
हमको कलाम चाहिए
जो दिखता तो वैज्ञानिक जैसा हो
पर शंकराचार्य के चरणों का दास हो
हमें दलित तो चाहिए
पर जो रामरथ का सारथी हो
आदिवासियों से भी हमें कोई भेदभाव नहीं
बस वो बानर बने रहें
कालबुर्गी तुमको समझना चाहिए था
औरतें सिर्फ एक योनी हैं
हाड़मांस की कोई इंसान नहीं
कालबुर्गी तुमको मरना ही था
ताकि कोई और पढ़ने-लिखने का अर्थ
यह न लगा ले
कि पढ़ने का अर्थ आजादी है
कि लिखने का अर्थ स्वतंत्रता है
हम ही ब्रह्म हैं
अफसोस कालबुर्गी
तुम इतनी सी बात समझ नहीं पाए
कैसे लेखक थे तुम
सतीची चाल सगळ्यात प्रथम
प्र. का. टा. आ.
शेष प्रश्न
मला एक प्रश्न नेहेमी पडतो. माझा पाय मोडलाय, तर तो आधी ठीकठाक करण्यासाठी मी धावाधाव करूं, की इतर हजारोंचेही पाय मोडले आहेत, त्यांच्या ऑपरेशनसाठी आकाशपाताळ एक करूं?
प्रख्यात कन्नड लेखक, विचारवंत
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
कोणी काहीही म्हटलं तरी जीव
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.