सामाजिक

Syriaतले घर थकलेले... संन्यासी

"घर थकलेले... संन्यासी" ह्या कवितेच्या पहिल्या ३ शब्दातच ग्रेस यांनी सगळं सांगून टाकलं असावं! इतकी अर्थघन शब्दयोजना. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वररचनेतला दोन शब्दांमधला तो जीवघेणा अंतराळ.... त्यात निर्वासितांचं अस्तित्वच नव्हे, तर "टांगणीला" लागलेल्या जीवाचा दाटलेला हुंदका आहे!
समीक्षेचा विषय निवडा: 

इंटिमेट डेथ- आयुष्याचा सांगाती

टीप: हे जवळजवळ दोन वर्षांपूर्वी लिहले होते. आज सहज सापडले म्हणून अप्लोड करते आहे.

इंटिमेट डेथ- आयुष्याचा सांगाती.

समीक्षेचा विषय निवडा: 

जगायचीही सक्ती आहे....

जगायचीही सक्ती आहे... या मंगला आठलेकरांच्या पुस्तकात जगण्याचा विचार हा मृत्यू ही संकल्पना मध्यवर्ती धरुन केलेला आहे तसाच मृत्यूचा विचार जगण्याच्या परिप्रेक्षात केलेला आहे. पुस्तकात स्वेच्छामरण,दयामरण या संकल्पनेवर आधारित जगभरातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले आहे. लेखिकेच्या भावजयीचा वयाच्या ४२व्या वर्षी कॅन्सरने झालेला मृत्यू हा पुस्तकाच्या जन्माला कारणीभूत ठरला.

समीक्षेचा विषय निवडा: 

मै लडकी का दीवाना - अर्थातच एक स्त्रीवादी समीक्षा

आपल्याकडच्या उच्चभ्रूंमध्ये हिंदी चित्रपट आणि त्यातल्या सगळ्याच गोष्टींना नावं ठेवण्याची एक फॅशन आहे. या पी-क्रिटकांना ('पी-सेक'च्या चालीवरच लिहीताना, क्रिटीक या शब्दाचं मराठीकरण करताना त्याचा कीटक या शब्दाशी असणारं शब्दसाधर्म्य विसरू नये.) बाकी काही नावं ठेवण्यासारखं मिळालं नाही की चित्रपटातल्या जुनाट, सनातनी मूल्यांवर हाणण्यात मजा येते. एकीकडे "घाऊक तिरस्कार करू नये" वगैरे उपदेशामृत पाजायचं आणि वर पुन्हा हिंदी चित्रपटांचा एकेक करून घाऊक तिरस्कार करायचा, ही या उच्चभ्रूंची पारंपरिक रीत.

समीक्षेचा विषय निवडा: 

भारतातील रॅशनॅलिस्ट चळवळ

एका अभ्यासू रॅशनॅलिस्टच्या मते भारत देश हा फक्त धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचाच देश नसून नीरिश्वरवाद, विवेकवाद, मानवतावाद, चिकित्सक वृत्ती, अज्ञेयवाद यांचेही अंश कुठे ना कुठे तरी या देशात प्राचीन काळापासून सापडतात. जेव्हा हे मत आपण धसास लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यातील खरेपणाविषयी संशय वाटू लागतो. कारण आपल्या आवती भोवती धर्माच्या अतिरेकामुळे विवेक, मानवता यांना पायदळी तुडवलेली उदाहरणं मोठ्या प्रमाणात सापडतात. परंतु डॉ. जॉन (जोहान्नेस) क्वॅक या एडिनबरो विद्यापीठातील प्राध्यापकाला मात्र आपल्या देशातील हा वेगळेपणा चटकन लक्षात येतो.

समीक्षेचा विषय निवडा: 

दि अल्टिमेट गिफ्ट

Self help या आजकालच्या तरुणांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर लिहिलेल्या पुस्तकांच्या ढिगार्‍यातून खरोखरच एखादे तरी वाचनीय पुस्तक मिळू शकेल याबद्दल शंका असतानाच जिम स्टोव्हाल या लेखकाचे दि अल्टिमेट गिफ्ट हे पुस्तक हाती लागले. सोप्या व मोजक्या शब्दात आपली जडण घडण कशी असावी, आपली जीवनशैली कशी असावी, कुठल्या जीवनमूल्यांना अग्रक्रम द्यावीत, इत्यादी अनेक पैलूवर या पुस्तकात फार सुंदर मांडणी केलेली आहे. कुठलेही शब्दालंकार नाहीत, साहित्यिक टीका टिप्पणी नाही, संदर्भबंबाळपणा नाही, वस्तुपाठ म्हणून इतरांचा उल्लेख नाही.

समीक्षेचा विषय निवडा: 

फॅंड्री - जाता नाही जात ती...

(ह्यात सिनेमाची गोष्ट अजिबात सांगितलेली नाही; त्यामुळे कोणताही रहस्यभेद ह्यात नाही.)

समीक्षेचा विषय निवडा: 

'इन्व्हेस्टमेंट'

१९९०च्या दशकात किंवा नंतर जी मध्यमवर्गीय पिढी कमावती झाली, तिला आर्थिक उदारीकरणाचे अनेक फायदे मिळाले. त्यामुळे ह्या मध्यमवर्गाची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या सुधारली. पण त्यासोबत मध्यमवर्गीय विचारसरणीतदेखील हळूहळू काही बदल झाले. एखादं सरकारी खातं किंवा बॅंकेत कायमची नोकरी पटकावली, कर्ज काढून छोटा फ्लॅट घेतला म्हणजे आयुष्य सफल झालं, ह्या तेव्हाच्या मध्यमवर्गीय मानसिकतेतून हा वर्ग बाहेर आला. साध्या राहणीची जागा चैनीनं घेतली.

समीक्षेचा विषय निवडा: 

निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)

भाग १ | भाग २
ह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक