Submitted by ppkya on शुक्रवार, 29/09/2023 - 07:14
तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला? तुम्ही स्वतःहून सांगितल्याशिवाय कसे बुवा कळणार तुम्ही कोण ते, नाही का? अगदी बरोबर आहे. आणि तसे हा प्रश्न अध्यात्मिक किंवा तात्विक दृष्ट्या विचारलेला नाही, तर सरळ सरळ व्यावहारिक आहे. जरा विचार करा. आजकालच्या जगात आपण आपल्या बद्दलच्या विविध गोष्टींची महिती आपण चकटफू सगळीकडे नकळत देत असतो. तुम्ही म्हणल ते कसे? आपण मोबाईल वापरतो, संगणक वापरतो, विविध प्रकारे हि दोन्ही यंत्रे वापरून आपण आपल्या अनेक जीवनावश्यक तसेच इतर गोष्टी आपण करत असतो. त्याद्वारे स्वतःबद्दलच्या माहितीचे अनेक पैलूचे ठसे आपण सोडत असतो. पटते ना?
Submitted by सर्व_संचारी on बुधवार, 26/07/2023 - 02:41
आपल्या नायकाची एक मजेदार सवय अशी आहे, की तो कॉलेजला कधी सायकलवर, कधी चक्क चालत तर कधी बसने जातो. आजूबाजूचा परिसर न्याहाळत जायला त्याला आवडतं आणि न्याहाळण्यासाठी बघणाऱ्याचा वेग कमी असेल तर जास्त चांगलं. तसंही आपल्या नायकाला वेगाचं थोडं वावडंच आहे.
Submitted by विवेक पटाईत on शुक्रवार, 14/07/2023 - 18:48
आज चंद्रयान आकाशी उडाले आणि सोशल मीडियावर महापूर आला. पुरोगाम्यांनी देवाचा आशीर्वाद घेणाऱ्या वैज्ञानिकांवर प्रश्न उपस्थित केला.काहींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. शेटजी बाहेर होते म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी झाला. भक्तांनी मोदी है तो मुमकिन है चा नारा बुलंद केला. बर्नल ट्रेंड ही सुरू केला. शौचालय बांधणे म्हणजे विकास. याला काय कळते इत्यादी.ऐसीकरांचे याबाबत काय मत आहे हेही जाणून घेणे गरजेचे वाटले म्हणून हा धागा
Submitted by हर्षदा on शुक्रवार, 30/06/2023 - 16:57
सदाफुलीचं एक रोप बाल्कनी समोर आपोआप रुजलं आणि आपोआप वाढलं काही पाणी वगैरे तसं त्यानं मागितलं नाही आणि आम्हीही फारसं काही लक्ष दिलं नाही. सदाफुली तशी विदेशी त्यामुळं मला आपलं वाटायचं की या फुलांवर काही येणार नाही. पण जशी फुलं आली तशी हळूहळू गर्दी व्हायला लागली. पहिल्यांदा मावा (अफिड) नी रस शोषून घ्यायला सुरुवात केली आणि मी म्हटलं झालं गेलं आता रोप. पण मग वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्यादेखील दिसायला लागल्या. या मुंग्यांचं आणि या मावा कीटकांचे वेगळे नाते असते.
Submitted by विवेक पटाईत on शुक्रवार, 31/03/2023 - 10:06
ब्रम्हज्ञानाचा विचारू.
त्याचा ब्राम्हणासीच अधिकारू.
वर्णानां ब्राम्हणो गुरु:(14/7/30)
समर्थ म्हणतात ज्या व्यक्तीने वेद, उपनिषद, दर्शन शास्त्र इत्यादीं वैदिक ज्ञानाचे अध्ययन केले आहे. ज्याला ब्रम्ह विद्येचे ज्ञान झाले आहे. तोच ब्राम्हण आहे आणि त्यालाच चारी वर्णाच्या लोकांनी त्याला गुरु मानले पाहिजे. दुसर्या शब्दांत ब्रम्हज्ञानी व्यक्तीलाच सांसारीक आणि आध्यात्मिक उपदेश देण्याचा अधिकार आहे. भग्वद्गीतेत योगेश्वर म्हणतात गुण आणि कर्मानुसार चार वर्णांची मी निर्मिती केली आहे. मनुस्मृती अनुसार शिक्षणांतर अर्जित ज्ञानाच्या आधारावर जाती ठरते.
Submitted by नील on मंगळवार, 28/03/2023 - 22:51
आधी आपण बघूया प्रोजेक्टच्या सुरुवातीला सेट केलेले अजेंडे आणि नियम किती साध्य झाले वगैरे:
( पहा उपोद्घात )
१. मन्नत:
नवस तर फिटलाच असं म्हणता यावा. सो इकडे मी स्वतःला १०० % मार्क दिल्यास कोणाची हरकत नसावी.
२. मुंबूड्या:
मुंबईत जन्मलो आणि वाढलो तरी गेली १५ वर्षं पोटापाण्यासाठी पुण्यात राहून काम करतोय.
आई आणि बहिणीसाठी मुंबईला येणं होत रहायचं पण एकंदरीत धबडग्यात मुंबईचा टच सुटल्यासारखाच झालेला.
Submitted by नील on सोमवार, 27/03/2023 - 13:17
चौफेर समाचार दिवाळी २०२२ मध्ये माझ्या टॅक्सीनाम्याविषयी विस्तृत लेख प्रसिद्ध झाल्याने, (संपादक अरुण नाईक ह्यांचे विशेष आभार)
शेवटचे दोन लेख लगेच ऐसीवर टाकले नाहीत.
ते आत्ता टाकतोय.
-------------------------------
शेवटचा दिवस...
खरं सांगायचं तर मीही आता ह्यातून बाहेर पडायला आतुरलेलो.
ह्यानंतर रविवारी दुसरं काय काय करता येईल ह्याचे प्लॅन्स ऑलरेडी डोक्यात चालू झालेले.
शनिवारी रात्री पार्ट्या करणं, रविवारी आधी पोहे आणि मग मटण खाऊन लोळत पडणं, किंवा वीकेंड गेटवेजचे प्लान्स करणं हे सगळं राहून जात होतं.
Submitted by अजित गोगटे on शुक्रवार, 16/09/2022 - 10:08
काल गुरुवारी टाकलेल्या पोस्टमध्ये मी माझा विनातिकिट लोकलचा प्रवास व त्याबद्दलची माझी मते लिहिली होती. काही जण या संदर्भात आणखी एक मुद्दा मांडतात. ते म्हणतात की, रेल्वे सरकारची म्हणजे लोकांचीच आहे. लोकांनीच महसूल बुडविला तर सरकारचा गाडा कसा चालणार? त्यामुळे सरकारला प्रामाणिकपणे महसूल देणे हे नागरिक म्हणून लोकांचे कर्तव्य आहे. पण प्रश्न असा आहे की, स्वत:चा महसूल बुडू नये, याची रेल्वेला व त्यांच्या कर्मचाºयांनाच जर फिकीर नसेल तर नागरिकांकडून तरी प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी व किती ठेवता येईल?
Submitted by अजित गोगटे on गुरुवार, 15/09/2022 - 17:08
माझे वास्तव्य कल्याणला व नोकरी मुंबईत. सन १९७८ ते सन २०२० अशी तब्बल ४२ वर्षे मी कल्याण ते बोरिबंदर (आताचे सीएसटी) अशी दैनंदिन ये-जा मध्य रेल्वेच्या लोकलने केली. कल्याण ते बोरिबंदर हे रेल्वेचे अंतर ५६ किमी आहे. मी सरासरी महिन्याला २५ दिवस कामावर गेलो असे गृहित धरले तरी या काळात मी लोकलने केलेल्या एकूण प्रवासाचे अंतर १४ लाख ११ हजार २०० किमी एवढे होते. परंतु मध्यंतरीची सलग १२ वर्षे मी तिकिट किंवा मासिक/त्रैमासिक पास न काढता हा लोकलचा प्रवास केला. म्हणजे माझा विनातिकिट केलेला प्रवास सुमारे चार लाख तीन हजार २०० किमी एवढा होता.
Submitted by अजित गोगटे on बुधवार, 14/09/2022 - 14:41
मी अनुभवलेले काही मासलेवाईक किस्से:
१.
.....ताक वाढा हो माय!
कल्याणच्या पारनाका भागात सुमारे ३५ वर्षांपूर्वी एक ब्राह्मण व्यक्ती दुपारच्या वेळी वाड्या-वाड्यांमधून फिरून तिला हव्या असलेल्या खाण्याच्या वस्तूचीच फक्त भीक मागत असे. वयाची पन्नाशी ओलांडलेला हा माणूस आमचाच आडनावबंधू म्हणजे गोगटे होता. खरं तर तो त्याच भागातील एका मोठ्या वाड्याचा वडिलोपार्जित मालक होता. परंतु भाऊ आणि भावजयीने वेडा ठरवून घराबाहेर काढल्याने भीक मागून पोटाची खळगी भरण्याची वेळ त्याच्यावर आली होती!
पाने