आपले लाडके किशोर कुमार उर्फ आभासकुमार गांगुली यांना श्रद्धांजली
.
'दु:खी मन मेरे, सुन मेरा
'दु:खी मन मेरे, सुन मेरा कहना' या नंतरची ओळ आहे 'जहां नहीं चैना, वहां नहीं रहना'. तसंच 'दिल आज शायर है, गम आज नगमा है' या गाण्याच्या शेवटी 'लेकिन लगाया है जो दांव हमने, वो जीत कर आयेंगेही' हा दुर्दम्य आशावाद आहे.
ह्यात किशोर कुमारचं योगदान किती? त्याने ही गाणी लिहिलेली आहेत का? नसतील तर मग त्याने फक्तं आवाज दिलाय, आणि संगीतकाराला अपेक्षित असलेलेल भाव गाण्यात उतरवलेत.
बाकी त्याच्या उत्कृष्ठ गायक असण्याबद्दल वाद नाहीच!
<<ह्यात किशोर कुमारचं योगदान
ह्यात किशोर कुमारचं योगदान किती? त्याने ही गाणी लिहिलेली आहेत का? नसतील तर मग त्याने फक्तं आवाज दिलाय, आणि संगीतकाराला अपेक्षित असलेलेल भाव गाण्यात उतरवलेत.>>>
काव्याचे बोल कितीही सुंदर, अर्थपुर्ण असले तरी जोपर्यंत त्याला साजेसा संगीतसाज चढवला जात नाही, जोपर्यंत ते समर्थ गळ्यातून गायले जात नाही तोपर्यंत त्यातली अर्थवाहीपणा जसाच्या तसा, तितक्याच समर्थपणे रसिकांपर्यंत पोहोचवता येत नाही. ते काम किशोरने समर्थपणे केलय त्याच्या गाण्यातून. गाण्यातला तो दुर्दम्य आशावाद आपल्या आवाजातून स्पष्ट आणि सिद्ध केलाय किशोरने.
छान लेख रे मंदार !
अनुमोदन विशाल
अगदी हेच लिहीणार होतो.
थोडी भर घालतो. गायक निवडताना त्या गाण्यांचे शब्द काय असावेत याचाही विचार केला जात असावा (आधी चाल मग शब्द या बाबतीत), किंवा अमुक शब्द असतील तर ते कुठल्या गायकाच्या गळ्यातून ते समर्थपणे पोहोचतील याचाही विचार केला जात असणारच. असो. :)
ठंडी हवा ये चांदनी सुहानी....
"त्याला श्रद्धांजली काय वहायची, रोजच अवतरत असतो तो!....."
~ सुंदर.
'मॉर्टल' असल्याने देह या ग्रहावरून नष्ट झाला तरी किशोरकुमारचा आवाज 'इम्मॉर्टल' असल्याने तो कधीच अस्तंगत होऊ शकणार नाही. सबब श्रद्धांजली ही संज्ञा निदान अशा 'अमर' आवाजाच्याबाबतीत फसवी होऊ शकते. ..... इतकेच काय, पुढे जाऊन असेही म्हणता येईल की ज्याची आठवण श्रद्धांजली अर्पण केल्यामुळे (च) राहाणार असेल तर एका अर्थी आपण त्या गायकाला विसरत चाललो आहोत....किशोरच्याबाबतीत तर हे केवळ अशक्य.
हे लिहित असतानाच शेजारी 'ठंडी हवा हे चांदनी सुहानी....ऐ मेरे दिल सुना कोई कहानी...' उलगडत आहे.....नजरेसमोर आले आहेत... पडद्यावर गाणारा खुद्द किशोर आणि ते गाणे गॅलरीत उभे राहून तन्मयतेने ऐकणारी मधुबाला.
त्याकाळी आजच्या सारखा
त्याकाळी आजच्या सारखा पिसाटलेला मिडीया नसला तरी असल्या दंतकथा भरपूर मसाला लावून सत्यकथा असल्याच्या थाटात छापणारी चित्रपटसृष्टीशी संबंधीत अनेक नियतकालिकं उर्फ गॉसिप मॅगझिन्स तर होतीच,
हे आणि
किशोरने पाकीट उघडलं आणि त्यातल्या काही नोटा काढून परत केल्या. आश्चर्यानं "किशोरदा ये क्या?" असं विचारल्यावर "अरे देखो, मैने कुछ दिनो पहले आपके दोस्त के यहां एक मराठी गाना गाया था, तो उनसे जितने पैसे लिये थे उतनेही आपसे लूंगा." अनेकदा रेकॉर्डिंगच्या आधीच मानधनाची मागणी करणार्या किशोरनं चक्क जास्त मानधन नको म्हणून काही पैसे परत केले हे बघून तिथे उपस्थित असणार्यांची बोटं तोंडात गेली.
हे
यात काही संबंध आहे का? म्हणजे तुम्ही सांगितलेली ही कथाही दंतकथाच असावी वगैरे? एखाद्या व्यवहारी व कंजूष व्यक्तीने एका मित्राच्या मित्राकडून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मिळत आहेत त्यापेक्षा कमी पैसे का घ्यावेत हे समजले नाही.
संपूर्ण परिच्छेद वाचला आहे का?
अतिशहाणा, तुम्ही संपूर्ण लेख वाचला आहे असे गृहित धरतो. वर सांगितलेली कथा ही लोकसत्तामधे काही वर्षांपुर्वी छापून आलेली आहे. त्यामुळे ही दंतकथा नव्हे. मला ती घटना ऑनलाईन सापडली नाही कारण तेव्हा लोकसत्ताची ऑनलाईन आवृत्ती नसावी. पण ही कथा संपूर्ण सत्य आहे.
यात काही संबंध आहे का?>>
तिसरा परिच्छेदात ती घटना आणि मग चौथ्या परिच्छेदात कारणमिमांसा दिलेली आहे. त्यामुळे संबंध अर्थातच आहे. कारण त्या घटनेमुळे किशोरदांविषयी खरे काय ते स्पष्ट होते तर त्यामुळे आश्चर्यचकित झालेल्यांची "बोटे तोंडात का गेली?" या प्रश्नाचे उत्तर किंवा कारणमिमांसा चौथ्या परिच्छेदात दिली आहे. (हुश्श).
दुसरे म्हणजे
एखाद्या व्यवहारी व कंजूष व्यक्तीने एका मित्राच्या मित्राकडून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मिळत आहेत त्यापेक्षा कमी पैसे का घ्यावेत हे समजले नाही.>>
वर श्रद्धांजलीपर लिखाणात अतिशय स्पष्ट लिहीले आहे की मिळत आहेत म्हणून कमी पैसे त्यांनी घेतले नाहीत — तर दिलेले पैसे योग्य मोबदल्यापेक्षा अधिक होते म्हणून जास्तीचे पैसे परत केले. आधी गायलेल्या मराठी गाण्यासाठी जेवढे घेतले होते तेवढेच घेणे त्यांना योग्य वाटले म्हणून बाकीचे जास्तीचे परत केले. (हुश्श).
आता लेख लिहील्यावर कशाचा संबंध कशाशी कसा आहे यावरही लेख लिहावा लागणार की काय? ;)
एका वाक्यात
महंमद रफी हा स्वर्गातील गंधर्व. हेमंत कुमार, मन्ना डे, तलत वगैरे यक्ष, किन्न, इत्यादी.
एका वाक्यात लेखाचा दर्जा ध्यानात आला. पुढचा लेख वाचण्याचे कष्ट घेतले नाहीत.