ही बातमी समजली का - ११०
कोण म्हणतं की पुरुषांचा कमिटमेंट शी काहीही संबंध नसतो ? ए मोहन हे कम्युनिझम शी एवढे निष्ठ आहेत की ...
----
राज्यात ३०% सहकारी संस्था बोगस. - विना सहकार नाही उद्धार.
बोगस संस्था कशा ठरवल्या?
बोगस संस्था कशा ठरवल्या? त्याची कृती....
एके दिवशी सहकार निबंधक कार्यालयातून एक अधिकारी/कारकून (वीक डे ला दिवसा) तुमच्या सोसायटीत येतो. सोसायटीचे पदाधिकारी त्याला भेटत नाहीत. मग तो एक (सर्वेक्षणाचा) फॉर्म सोसायटीच्या वॉचमनकडे देऊन जातो. त्याबरोबर काही कव्हरिंग लेटर नसते फॉर्म कशासाठी आहे, कधीपर्यंत भरून द्यायचा आहे कुणाकडे द्यायचा आहे याविषयी काही माहिती दिलेली नसते. तो फॉर्म वॉचमन पदाधिकार्यांना देतो/देत नाही. पदाधिकार्यांना त्याचे गांभीर्य कळेल अशी कोणतीही सूचना फॉर्मवर नसते.
वन फाइन डे- सहकार खाते म्हणते "ज्या सहकारी संस्थांनी हे फॉर्म भरून दिलेले नाहीत त्या संस्था बोगस आहेत" म्हणून त्यांची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. या यादीत नियमितपणे एजीएम घेणार्या, ऑडिट करणार्या, ऑडिट रिपोर्ट सबमिट करणार्या, निवडणुका घेणार्या संस्था देखील आहेत.
एके दिवशी सहकार निबंधक
एके दिवशी सहकार निबंधक कार्यालयातून एक अधिकारी/कारकून (वीक डे ला दिवसा) तुमच्या सोसायटीत येतो. सोसायटीचे पदाधिकारी त्याला भेटत नाहीत. मग तो एक (सर्वेक्षणाचा) फॉर्म सोसायटीच्या वॉचमनकडे देऊन जातो
कोणीही येत वगैरे नाही.. सरकारी माणसं इतकीदेखिल तसदी घेणार नाहीत नक्की ..
अहो आमच्या सोसायटीला तर अशी काही सोसायटी या पत्त्यावर अस्तित्वात नाही अशा आशयाचं पत्र आलं. जर अस्तित्वात नाही तर पत्र कसं पाठवलं??
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/center-scheme-name-of-pm/…
थेटरात मोदी सरकारचे गुणगान गाणारी क्लिप दाखवणे अनिवार्य!!!!! काय वायझेडपणा आहे
भ्रष्टाचाराला आळा कसा घालायचा
भ्रष्टाचाराला आळा कसा घालायचा हे सोनियांकडून शिका- मेनका गांधी
http://www.loksatta.com/desh-videsh-news/maneka-gandhi-cites-sonia-exam…
हे सरकार शेतकर्यांचे नसून
हे सरकार शेतकर्यांचे नसून सावकारांचे आहे. - ह्या बातमीतला मजकूर सत्य असेल तर सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन. फडतूस शेतकर्यांना गोंजारणं बंद करा.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/vinod-ta…
काहीही हं मलिक !!
काय संबंध?
अमानुल्ला खान गेला. - खरंतर
अमानुल्ला खान गेला. - खरंतर त्याचा एन्काऊंटर करायला हवा होता.
अमरावतीची प्रगती निश्चित!
मटारी पत्रकारीतेचा कहर - फ्रान्सची युवती झाली अमरावतीची सून
बाब्बौ! http://timesofindia.i
बाब्बौ!
http://timesofindia.indiatimes.com/india/Sonia-Gandhi-was-driving-force…
A top BJP leader said it is significant that for the first time the bribe-giver has been convicted but still people do not know who the bribe-taker is.
http://economictimes.indiatimes.com/news/defence/upa-government-intenti…
It also listed an effort by the main accused to get the then Italian prime minister Mario Monti to reach out to his Indian counterpart Manmohan Singh.
मनमोहन स्वच्छ होते पण मंत्री खाबू होते हा ष्ट्यांड गळून पडणार काय?
मराठवाड्यात जी धरणे आहेत ती
भाजपाच्या लोकांनी अतर्क्य बोलायचे असा निर्धारच केलेला आहे का ?
----------------
‘व्होडाफोन’ची पुनरावृत्ती!
‘व्होडाफोन’ची पुनरावृत्ती! केंद्र सरकारने गेल्या महिन्यात असा निर्णय घेतला की बीटी कापसाच्या बियाणांच्या किमती कमी करण्यात
http://www.loksatta.com/vishesh-news/cutting-on-royalties-on-cotton-123…
कोणाला काही जास्तिची माहीती आहे का?
बीटी एवीतेवी आलंच आहे आणि
बीटी एवीतेवी आलंच आहे आणि फोफावलंच आहे तर (ते तितकं इफेक्टिव्ह राहिलं नाही काअसंच काहिसं कारण देऊन) त्याचं पेटंट रद्द करणारेत म्हणे. तसे झाले तर बीटी कापूस मॉन्सेटो सोडून इतर देशी कंपन्याही बनवू/कॉपी करू शकतील
वा वा वा! फार्मास्युटिकल नंतर आता बायोटेक्नॉलॉजितही भारतीय कंपन्या प्रगती करणार तर! या योगे मॉन्सेटोचं नाक कापलं गेलं तर अधिक आनंद होईल :प
या परदेशी उद्योगधंद्यांना शक्य त्या सगळ्या मार्गांने चेचून अगदी तथाकथित अनैतिक (म्हणजे ज्यांच्यामुळे पाश्चात्य आदळपाट करतील - करूदे लक्ष नै द्यायचं :प ) वगैरे मार्गाने का होईना फक्त आणि फक्त भारतीय कंपन्यांचा फायदा करून द्यायला शक्य ते उपाय सरकारं करू लागलीयेत हे कित्ती भारीये!
====
व्होडाफोनलाही लुटावं याच मताचा आहे. कितीही लुटलं तरी भारतीय ग्राहक इतका मोठ्या संख्येने आहे की कर भरूनही व्होडाफोनला नाक घासत भारतातच धंदा करावा लागेल.
परदेशी कंपन्यांना शक्य तितके असेच एक्सप्लॉईट करावे! भारतीय कंपन्यांना करमाफी द्यावी, शेतकर्यांना कर्जमाफी द्यावी आणि ते पैसे परदेशी कंपन्यांकडून कितीही गैर मार्ग वापरून लुटावे!
भारताचे भले होतेय ना, बाकीचे देश गेले तेल लावत!
==
मोदी सरकारने असेच निर्णय चालू ठेवले तर पुढल्या निवडणूकीत माझ्यासारख्याचीही मते घेईल की काय अशी शंका हळूच डोकावू लागली ये
आँ?
>>(ते तितकं इफेक्टिव्ह राहिलं नाही काअसंच काहिसं कारण देऊन) त्याचं पेटंट रद्द करणारेत म्हणे.
काहीही हं ऋ !!
पेटंट देण्यासाठी मुळात ते इफेक्टिव्ह असणं हा क्रायटेरियाच नसतो तर त्या क्रायटेरियावर रद्द कसं करता येईल.
------------------------
अवांतर: जर ते इफेक्टिव्हच नसेल तर ते पेटंटखाली राहीना का !!!
असं त्या लोक्सत्तातल्या
असं त्या लोक्सत्तातल्या लेखातच म्हटलं होतं. वर मी छापील लोकसत्तात वाचलेला लेखच असावा अशी अटकळ
त्यांनी त्यआंनी म्हटलंय की ते कमी झालं इफेक्टिव्ह असलं तरी शेतकर्यांकडून त्याला प्रचंड मागणी आहे (नो वंडर भारतीय उद्योगांना ती गिर्हाईकं हवीयेत).
==
आणि फ्रँकली ते इम्मटेरियल आहे की कारण काय देताहेत. त्या तांत्रिक बाबी झाल्या. देशी कंपन्यांच्या फायद्यासाठी परदेशी कंपन्यांची पेटंट तडकाफडकी रद्द करणं कित्ती छाने! गब्बरचं म्हणं योग्यच आहे. स्वार्थ हा उत्तम गूण आहे!
वेड लागलय गोर्या लोकांना ऋ.
वेड लागलय गोर्या लोकांना ऋ. मी सांगतेच आहे ना. कोणीतरी धागा काढला आहे ना "स्वताच्या पायावर कशी कुर्हाड मारुन घ्यावी" त्याचे ही लोक म्हणजे बेस्ट उदाहरण आहे.
हाम्रीका आणि वेस्टर्न युरोप नी स्वताला बंद करुन घ्यावे आणि अजुन होणारी हानी टाळावी.
चीन आणि भारताची कुठल्याही पातळीवर तुलना होऊ शकत नाही. मधली २ शतके सोडली तर, चीन हा नेहमीच फार्फार मोठा होता, सुपर पॉवर होता.
आज ना उद्या चीन ठोकुन काढणार आहे भारताला ( युद्धात नाही फक्त, सर्वच बाबतीत ) हे आपले माझे भविष्य.
"Jaiswal was in 2G, Raja was
"Jaiswal was in 2G, Raja was in Coalgate, Kalmadi in Choppergate...No-no, Raja was in CWG - Oh, so confusing. Think!" pic.twitter.com/HUTwkShjdL
— Anand Ranganathan (@ARangarajan1972) September 15, 2014
बजेट सेशनचा उत्तरार्ध भरपूर
बजेट सेशनचा उत्तरार्ध भरपूर करमणूक घेऊन येत आहे. विशेषतः राज्यसभेत. कारण सुब्रमण्यम स्वामी आता राज्यसभेवर गेले आहेत. पहिल्या दिवसापासून कॉंग्रेस आणि त्यांची झक्काझक्की सुरू झाली आहे. हेलिकॉप्टर घोटाळ्यात सोनियांचं नाव घेतल्यावर मंगळवारी काँग्रेसने राज्यसभा बंद पाडली. स्वामींच वक्तव्य कामकाजातून काढलं गेलं. स्वामींनी त्याला आव्हान दिलं आहे.
त्याहून अधिक, स्वामींनी गुलाम नबी अझाद यांच्या विरोधात हक्कभंग नोटीस दिली आहे. ऑगस्टाला काँग्रेसने ब्लॅकलिस्ट केलं असं विधान आझादयांनी केलं होतं जे खोटं आहे असं स्वामी म्हणतायत.
फ्री-लोडर इस्त्रायल
President Obama has proposed granting Israel the largest package of military aid ever provided by the United States to another nation, but he and Prime Minister Benjamin Netanyahu remain deeply at odds over a figure for the assistance despite months of negotiations. American officials have balked as their Israeli counterparts insisted on more generous terms for a new 10-year military aid package that could top $40 billion.
(दुवा)
टीन प्रेग्नंसी
गर्भपाताच्या मुद्द्यावर राजकारणी रण माजवत असताना, अमेरिकेतील टीन प्रेग्नंसीचा दर गेल्या २३ वर्षांत ६ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आला आहे - यासारख्या बातम्यांना फारशी प्रसिद्धी मिळत नाही.
याचा परिणाम म्हणून गर्भपातांची संख्याही रोडावली आहे. 'प्लॅन्ड् पॅरेन्टहूड'सारख्या संस्थांद्वारे मिळणारी मदत (लैंगिक शिक्षण, कॉन्ट्रासेप्टिव्ह्जची उपलब्धता) हे यामागचं एक संभाव्य कारण आहे.
महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात
महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळण्यापेक्षा आर्थिक स्वातंत्र्य आणि राजकारणाच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळणे गरजेचे आहे. इति पंकजा मुंडे - हे महिला बचत गट म्हंजे काय प्रकरण आहे ... कुणाला माहीती आहे का ?
बचत गट
ही एक प्रकारची बिगरसरकारी संघटनांनी राबवलेली महिलांची स्मॉल सेविन्ग स्कीम होती. लातूर-किल्लारी भूकंपानंतर मराठवाड्यामध्ये काही पुनर्निर्माण आणि सेल्फ-हेल्प चळवळींनी जोर पकडला. महिलाबचतगट ही त्यापैकी एक. (तुरळक प्रमाणात ही आधीही होतीच.) गावांगावांमधून बायकांना एकत्र आणायचे, इतर शिक्षणाबरोबर त्यांना बचतीचे महत्त्व सांगायचे. कमीत कमी दहा बायकांचा गट करायचा आणि दर दिवशी/आठवडापंधरवडा, जसे जमेल तसे, काही अल्प रक्कम या बायकांनी नियमितपणे गटप्रमुखाकडे जमा करायची. तिने ती व्यवस्थित नोंदींनंतर बँकेत जमा करायची. यातून मग व्यवसायासाठी महिलांना अल्प व्याजाने कर्ज घेता येते. बांगड्या विकणे, भाजी विकणे, बोहारणीचा धंदा इतक्या छोट्या व्यवसायात लागणारे सुरुवातीचे चारशे पाचशे रुपयांचे भांडवलही या बायका सावकाराकडून दर दिवशी पंधरावीस टक्क्यांवर उचलत. दिवसभराच्या उलाढालीतल्या नफ्यातून व्याज देणे कधी जमे, कधी नाही. बचतगटांमुळे हे बीजभांडवल अत्यल्प व्याजात मिळायची सोय झाली. शिवाय एन्जीओज़कडून मार्गदर्शनही मिळू लागले. त्यातून मग घरगुती उद्योग, मसाले, पापडलोणची, तयार पिठे, हस्तकलेच्या वस्तू, गोधड्या, दुपटी, लोकरीचे कपडे असे उद्योग वाढत गेले. आता त्यांची प्रदर्शने भरतात. सगळीच काही यशोगाथा नाही, पण काम बर्यापैकी चालले आहे. काही यशस्वी बचतगटांना आता दिवाळीचा फराळ, मोठ्या देवळांतील प्रसादाचे लाडू अशी कामे मिळू लागली आहेत.
होय
हा बदल खरोखर सॅल्यूटपात्र आहे. यामुळे अनुषंगाने इतर अनेक गोष्टींचे महत्त्व खेडोपाडी अधोरेखित झाले. मुख्य म्हणजे स्वच्छता. खाद्यान्ने विकायची तर पराकोटीची स्वच्छता हवी हे समजले. साक्षरता तर आलीच पण आर्थिक भान आणि पैशाचे आणि श्रमाचे मूल्यही कळले. बॅन्कांची कार्यपद्धती कळली. बँकांविषयीची भीती गेली. अर्ज, कागदपत्रे यांची भीती गेली. सरकारदरबारी खेटे घालणे जमू लागले. कर्जाची रक्कम ग्रामीण बँकांच्या अधिकाराबाहेरची असली तर तो प्रस्ताव वर विभागप्रमुख बँकेकडे पाठवला जातो. ते जमू लागले. सरकारच्या अनेक योजनांचे लाभ कसे घ्यावेत ते कळले. गटाच्या बैठकीत हिशोब मांडता येऊ लागला. कुठला कर्जप्रस्ताव बँकेकडे पाठवायचा ते गटपातळीवर ठरवताना फीज़िबिलिटीची जाणीव झाली. धीटपणे सर्वांसमोर बोलता येऊ लागले.
आज मुंबईचे 'सरस' किंवा पुण्याचे 'भीमथडी' सारख्या नावाजलेल्या प्रदर्शनांत बचतगटांचे स्टॉल्स असतात. उत्पादने हातोहात खपतात. लोक या प्रदर्शनांची वर्षभर वाट पाहातात. कित्येक गट हेवेदावे, बेहिशेबीपणा, राजकीय हस्तक्षेप यांमुळे कोलमडलेही. खेडोपाडी सर्वच ठिकाणी यश भलेही मिळाले नसेल पण यशाचा मूलमंत्र तर समजला. हेही खूप आहे.
हे मायक्रो-क्रेडिट च्या
हे मायक्रो-क्रेडिट च्या जवळपास जाणारे आहे असे दिसते. मला समजले ते खालीलप्रमाणे -
(१) महिला एक गट बनवतात व प्रत्येक महिला आठवड्याला, पंधरवड्याला काही एक ठराविक बचत करते.
(२) पूर्वनिर्धारित दिवशी महिला ती रक्कम एका व्यक्तीकडे (गटप्रमुख) जमा करतात
(३) गटप्रमुख व्यक्ती हिशेब ठेवते व पैसे बँकेत जमा करते
(४) या पैश्यातून इतर स्त्रियांना कर्ज दिले जाते
(५) (४) च्या जोडीला आणखी रक्कम कर्ज म्हणून लागली तर ग्रामीण बँकेकडून कर्ज मागितले जाते.
(६) (४) हे कर्ज अल्प दराचे असते
साधारण असेच.
इथे महिला दहादहा रुपयेसुद्धा जमा करू शकतात. आणि सुरुवातीला या जमलेल्या पैशातूनच कर्ज दिले जाते. दिवसाच्या उलाढालीवर थोडीथोडी कर्जफेड होत असल्याने कर्ज लवकर फिटते आणि बचतगटाला थोडे व्याजही मिळते. धंदा वाढतोयसे दिसले तर अधिक कच्च्या मालासाठी अधिक कर्ज घेतले जाते. अशा रीतीने जर जमा रक्कम वाढू लागली तर बँकेत मुदत ठेव ठेवून त्या तारणावर आणि सरकारच्या काही योजनांखाली तारणाशिवायही मोठे कर्ज मिळू शकते. ह्या कर्जाचा विचार आणि आत्मविश्वास बचतगटांमध्ये तेव्हाच निर्माण होतो जेव्हा त्यांची आर्थिक पत त्यांनी सुधारून दाखवलेली असते. महत्त्वाचे म्हणजे सर्व पुढाकार तळागाळातून येतो. सरकार केवळ मदतनीस असते. रोख रकमेची खैरात सरकार करीत नाही. महिलांत मोटिवेशन निर्माण करण्याचे काम एन्जीओज़ करतात.
राही मी गरीबीवरती एक पुस्तक
राही मी गरीबीवरती एक पुस्तक वाचले होते त्यात गरीबीच्या मुख्य कारणात हे कारण होते की लोकांकडे बचतीचा मार्ग नसणे. आपल्याला माहीतच आहे की पैसे गुंतविले नाहीत तर कशा १० वाटांनी पैसे निघून जातात. तुम्ही वरती जी माहीती दिली आहे ती इतकी आवडली. अशा लहान लहान प्रगती ज्या दिसत नाहीत पण समाजासाठी अतिशय मौल्यवान असतात.
राही मी गरीबीवरती एक पुस्तक
राही मी गरीबीवरती एक पुस्तक वाचले होते त्यात गरीबीच्या मुख्य कारणात हे कारण होते की लोकांकडे बचतीचा मार्ग नसणे.
अधोरेखित भागाबद्दल - तुम्हाला असं म्हणायचंय का की गरीबीची अनेक कारणे असतात. व त्यातले एक मुख्य कारण बचत करण्याचा सुलभ, सहज उपलब्ध होऊ शकणारा मार्ग उपलब्ध नसतो.
माणूस जन्माला येतो तेव्हा
माणूस जन्माला येतो तेव्हा त्याची (अर्भकाची) स्वतःची स्थिती गरीबी असते की श्रीमंती ? आईवडिलांची संपत्ती ही त्या अर्भकाची नसते. आईवडिलांच्या संपत्तीस अॅक्सेस असतो पण ती त्या अर्भकाच्या मालकीची नसते.
आज जी संपत्ती तुमच्या समोर दिसत आहे (घरात व घराबाहेर) ती १०० ते ३०० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती का ? त्यातली किती अस्तित्वात होती ? रस्ते, पूल, धरणं, बिल्डिंगा, आयपी, घरं, ब्यांका, रेल्वेज, कार गाड्या, खुर्च्या, संगणक, फॅक्टर्या, बियाणी, खतं, ट्रॅक्टर्स, बोटी, डेटा सेंटर्स, खाद्यपदार्थांचे अगणित प्रकार, कपड्यांचे प्रकार, टेबलं, घड्याळं, विमानं वगैरे वगैरे ही संपत्तीच आहे .... परंतु हे सगळे ३०० वर्षापूर्वी अस्तित्वात होते का ?
( गब्बर, तुला काय म्हणायचे आहे नेमके ? - असा प्रश्न विचारू नका. वरील प्रश्नांवर विचार करा. प्रत्येक चर्चा ही एकाने सांगायचे व दुसर्याने "हो-हो छानछान, पटलं पटलं" असं म्हणून उद्या परत मागील पानावरून पुढे चालू ठेवण्यासाठी नसते. )
एलिमेंटरी
एलिमेंटरी हायपोथेटिकल व्ह्यू घेऊन वादविवाद करण्यात काय अर्थ !!
>>आईवडिलांची संपत्ती ही त्या अर्भकाची नसते. आईवडिलांच्या संपत्तीस अॅक्सेस असतो पण ती त्या अर्भकाच्या मालकीची नसते.
त्या संपत्तीस असलेल्या अॅक्सेसमुळे (आणि प्रत्येकाच्या आईवडिलांची संपत्ती समान नसल्यामुळे) अर्भकास उपलब्ध होणार्या संधीमध्ये Skew निर्माण होतो. पुढेही आयुष्यात हा स्क्यू वाढत असतो.
क्ष ही व्यक्ती हार्वर्ड विद्यापीठाची पदवीधर असते तसेच मुकेश अंबानी* हेही त्याच विद्यापीठाचे पदवीधर असतात. परंतु मुकेश अंबानींना कर्तबगारी दाखवण्यास जी संधी मिळतेती त्या दुसर्या व्यक्तीच्या तुलनेत ..........
प्रॉपर्टीमुळे असमानता येते आणि प्रॉपर्टी वारसाने संक्रमण होण्याने ती वाढत राहते.
१. वर यादीत लिहिलेली संपत्ती श्रीमंत माणसांनीच फक्त निर्माण केली आहे का?
२. ही संपत्ती निर्माण होणे आणि टिकून राहणे यासाठी समाजात अराजक नसणे महत्त्वाचे नाही का?
३. अराजक माजू नये (रॉबिनहूड निर्माण होऊ नयेत म्हणून) म्हणून संपत्तीचे "न्याय्य भासवता येईल" असे वाटप होणे आवश्यक नाही का? अशा वाटपाचे दृश्य स्वरूप म्हणून विविध प्रकारच्या सवलती (अॅज गिव्हिंग टु द अंडरप्रिव्हिलेज्ड) आणि संपत्तीकरासारखे कर (टेकिंग फ्रॉम द प्रिव्हिलेज्ड). या दोन्ही मार्गांनी न्याय्य व्यवस्थेचा आभास निर्माण करता येतो. या दोन्ही मार्गांनी गरीब श्रीमंत होत नाहीत आणि श्रीमंत गरीब होत नाहीत. परंतु क्र २ ची परिस्थिती साध्य होत असते.
४. अशा व्यवस्था श्रीमंत लोक निर्माण करवतात. गब्बरसिंग जरी फडतुसांनी मरून जावे असे म्हणत असला तरी मार्केटच्या रेट्यात श्रीमंत फडतूस झाला तर मरून जाण्याची त्याची इच्छा नसते. आपण फडतूस झालो तर आपल्याला जगता येऊन "पुन्हा उभारी घेता येण्याची शक्यता शिल्लक रहावी" म्हणून अशा व्यवस्थेची गरज त्यांना पटलेली असते.
*पर्सनली मुकेश अंबानी हे कर्तबगार नव्हते असा माझा दावा नाही किंवा त्यांच्याविषयी काही आकस नाही. प्लेसहोल्डर म्हणून एक प्रॉमिनंट नाव घेतले
नाय नाय. मी श्रीमंत वि. गरीब
नाय नाय.
मी श्रीमंत वि. गरीब ह्या मुद्द्यावर बोलत नाहिये.
या चर्चेचा बेसिक मुद्दा हा आहे की गरीबीची कारणे कोणती ? गरीबीला कारणे असतात का ? संपत्तीचा व आवकेचा अभाव म्हंजे गरीबी. What needs explaining is presence of wealth and income. Not absence of it. Absence of wealth is the default state.
त्यानंतरचा मुद्दा संपत्तेची निर्मीती कोण करतं. त्याहीनंतरचा मुद्दा तिचे वाटप कसे व्हावे.
तुमच्या इकॉनॉमिक्स मध्ये
तुमच्या इकॉनॉमिक्स मध्ये गरीबी ची व्याख्या काही लोकांनी अशी केली आहे -
A state or condition in which a person or community lacks the financial resources and essentials to enjoy a minimum standard of life and well-being that's considered acceptable in society.
.
काही विद्वान मंडळींनी फक्त व्याख्या करण्यासाठी ग्रंथ लिहू घातले आहेत-
http://www.irp.wisc.edu/publications/dps/pdfs/dp568.pdf
.
आम्हा इकॉनॉमिक्स कशाशी खातात हे माहीत नसलेल्यांकरता पहीली व्याख्या बरी वाटते की एक मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग करता पुरेशी साधने नसणे. त्या मध्ये बचतीचा मार्ग नसणे अगदी फिट्ट बसते.
.
आता बोला ;) चुप्पी साधून मुद्द्याला बगल देऊ नका. आता जर असं म्हणत असाल की मी म्हणतो तीच व्याख्या घ्या तर वायलं.
A state or condition in which
A state or condition in which a person or community lacks the financial resources and essentials to enjoy a minimum standard of life and well-being that's considered acceptable in society.
ठीकाय. तुम्ही दिलेली ही व्याख्या माझ्या व्याख्येचे औपचारिक स्वरूप आहे असा माझा दावा आहे.
माझी व्याख्या - गरीबी म्हंजे संपत्ती व आवकेची अनुपस्थिती किंवा संपत्ती/आवक अति तुटपुंजे असणे.
माझा दावा बरोबर आहे ?
आम्ही म्हणतो बचतीचा मार्ग हा
आम्ही म्हणतो बचतीचा मार्ग हा एसेन्शिअल आहे. हा एसेन्शिअल" भाग गब्बर तुमच्या व्याख्येत नाही. म्हणून आपला वाद होतोय.
बचतीचा मार्ग इसेन्शियल आहे असे मानले तरी पण पूर्वी बचतीचा मार्ग अनुपलब्ध होता असे नाही. आज खूप ब्यांका आहेत तरीही त्या पुरे पडत नाहीत असा विचारप्रवाह आहे. म्हणून तर मोदी सुद्धा इक्लुझिव्ह बँकिंग्/फायनान्स चा प्रचार करत आहेत. जनधन योजनेचे तेच तर उद्दिष्ट आहे. परंतु बँकांचा प्रादुर्भाव व्हायच्या आधी लोक बचत करत होते का ? कशी बचत करत होते ? मुळाशी जाऊन प्रश्न विचारतो - बचत हा संपत्ती चा एक प्रकार नाही का ? पूर्वी सोनं/चांदी/हीरेजवारात(दागिने), घरदार, जमीनजुमला या स्वरूपात बचत होत नव्हती का ? पूर्वी नाणी (शिवपूर्व कालापासून) उपलब्ध होती की नव्हती ? ती बचतीसाठी वापरली जात होती की नव्हती ?
आज बचतीचा मेनस्ट्रीम मार्ग बँक हा आहे पण तो सर्वांपर्यंत (उदा. तळागाळातले लोक) पोहोचलेला नाही एवढाच तुमचा मुद्दा असावा. व त्यासाठीच जनधन योजना आहे. ती किती परिणामकारक आहे/नाही हा पुढचा भाग झाला.
पूर्वी
पूर्वी सोनं/चांदी/हीरेजवारात(दागिने), घरदार, जमीनजुमला या स्वरूपात बचत होत नव्हती का ?
होय बचत अशा प्रकारेच होत असे.बरेचदा नाणी, सोने-धन परसदारी पुरुन ठेवले जाई. आधुनिक फ्लॅटसंस्कृतीत म्हणा, एकंदरच आधुनिक काळात तो मार्ग योग्य नाही, पुरेसा नाही. कदाचित लोकसंख्येच्या रेट्यामुळे, फ्लॅट सिस्टीम लवकर लोकांपर्यंत पोचली, त्यामानाने बँका पोचल्या नाहीत.
आज बचतीचा मेनस्ट्रीम मार्ग बँक हा आहे पण तो सर्वांपर्यंत (उदा. तळागाळातले लोक) पोहोचलेला नाही एवढाच तुमचा मुद्दा असावा.
होय तेवढाच माझा मुद्दा होता. तयाहून तो जास्त आहे असा ना अभिनिवेशही होता ना त्या मुद्द्याकडून आशा.
टेक्सस स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशन
A Texan who called Obama a gay prostitute may soon control what goes in children’s textbooks
(दुवा)
बाकी या आजींची इतरही मतं अपारंपरिक आणि विचारांना चालना देणारी आहेत.
उदा. "The Climate Change HOAX was Karl Marx’s idea" किंवा “Many people believe the Democrat Party had JFK killed because the socialists and Communists in the party did not want a conservative president.” - मराठी आंतरजालावर अगदी शोभून दिसतील! :)
ज्या आईच्या कुशीत जन्माला आले
ज्या आईच्या कुशीत जन्माला आले त्या आईच्या कुशीवर वार करणारे म्हंजे अणे. इति उद्धव ठाकरे.
शिवसेनेचं हे नेहमी असतं - आम्ही यांच्यावर उपकार केले, अमका अमका हा आईशी गद्दारी करणारा, अमके हे ढमके यांच्या वर वार करणारे, फलाणा माणसाने पाठीत खंजीर खुपसला वगैरे वगैरे. आणि शिवसेना हीच काय ती एकदम निष्ठावान, परोपकारी, कृतज्ञ वगैरे वगैरे.
-------
समाजवादी महाराष्ट्राचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. महाराष्ट्र् ही शेतकर्यांची स्मशानभूमि आहे असं पी साईनाथ म्हणाले व त्याला राज्यकर्तेच जबाबदार आहेत. इति एनडी पाटील. -
अगदी बरोबर. शेतकर्यांच्या समस्यांसाठी शेतकरी कधीच जबाबदार नसतो. सिस्टिम च्या समस्येसाठी नेहमी सिस्टिम बाहेरचेच लोक जबाबदार असतात.
-------
Just 1% of population pay Income taxes, reveals government data. व्यक्तिगत प्राप्तीकर हा केंद्रसरकारच्या एकूण आवकेच्या सुमारे १६% टक्के होता (२०१२-१३ मधे). http://dor.gov.in/revenue_ctc
-------
On Close Inspection, India’s Sharp Growth Picture Gets Fuzzy
But as with most developing countries, where official statistics can be dicey even when they aren’t showing world-beating growth, India’s economy defies easy measurement. Most enterprises are tiny and unregistered, and most workers are employed off the books. The government’s infrequent surveys represent only a best guess of the value being added in back-alley workshops, outdoor markets and other cash-based corners of the economy.
So even if India’s measurement of gross domestic product, a broad indicator of activity, isn’t thought to be politically manipulated like China’s, it should come with a warning label: Handle with care.
GDP in India, “much more than in other economies, is more an estimate than a measurement,” said Neelkanth Mishra, a Credit Suisse economist in Mumbai.
The fog surrounding India’s GDP places challenges before analysts and policy makers—and just plain baffles some of them. The country’s central bank, sensing an economy running at less-than-full blast despite strong headline growth, has cut its main interest rate five times since the start of 2015.
थोडक्यात काय की मोजदाद जी केली जात आहे ती तितकीशी रिलाएबल नाहिये.
गरिबांना मोफत गॅस
प्यास कहती है चलो रेत निचोड़ी जाए
अपने हिस्से में समुंदर नहीं आने वाला
"ये तो खुद सर से पाव तक
"ये तो खुद सर से पाव तक भ्रष्टाचार मे लतपत है!" असा त्यांचा अण्णांबद्दलचा ड्वायलॉग मला अगदी नक्की आठवतोय. दोनच दिवसांत यांचे मंत्री अण्णांना लिंबु सरबत प्यायचा आग्रह करत होते. आणि या गृहस्थाला तोंड लपवायलाही जागा नव्हती
मी तेव्हाही असाच गडाबडा लोळून हसलो होतो! त्याची राजदीप सरदेसाईने खूप खेचलेलीच, शिवाय ते न्यूजच्यानेलवर (बहुदा एन्डीटीव्ही - विसरलो गेले ८ महिने न्यूज चॅनल बघितलेलाच नाहीये) पपेटवाले कार्यक्रम असतात ना त्यातही बरीच रेवडी उडवलेली =))
http://www.ndtv.com/india-new
http://www.ndtv.com/india-news/rahul-gandhi-for-up-chief-minister-sugge…
रोचक! झाकली मूठ तरी उघडेल आता.
काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पद स्वीकारण्याची तयारी ....
राहुल गांधी - काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पद स्वीकारण्याची तयारी .... ?
परमेश्वरा, सुखी रहा रे बाबा !!!
बिटकॉईन चा जनक कोण ?
ऑस्ट्रेलियन सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट क्रेग राईट यांनी "मीच तो सातोशी नाकामोटो" असे जाहीर केलेले आहे. काहींना खात्री आहे काहींना नाही व काहींच्या काही प्रश्न अनुत्तरित आहेत.
-----
Venezuela, in other words, is now so broke that it may not have enough money to pay for its money.
पुढे वीज बचत करण्यासाठी शाळा शुक्रवारी बंद ठेवण्याचा निर्णय.
Bonus Socialist Joke.
Q: What did socialists (like those in Venezuela) use before candles?
A: Electricity
पुजार्यांनी धर्माची
पुजार्यांनी धर्माची दुकानदारी बंद करावी = हो म्हंजे तुम्हाला सुरु करता येईल.
धर्म हे दुकान च आहे व दुकान हे उच्च नैतिक अधिष्ठान असलेले स्थान आहे. धर्म हे दुकान च असायला हवे.
Invisible hand guided action
Invisible hand guided action or inaction in AgustaWestland probe: Parrikar
ऑगस्टावेस्टलँड प्रकरणात पर्रीकरांनी स्मिथ्सोनियन "इन्व्हिजिबल हँड" ने टपली मारायचा यत्न केलेला आहे.
सिक्युलर लोक आणि संस्कृत
http://www.mydigitalfc.com/knowledge/public-ignoramus-229
भारतातल्या विचारवंतांना संस्कृतच वावडं असतं का आणि संस्कृतचा प्रचार म्हणजे शिक्षणाचं भगवीकरण हा प्रचार जो चालतो त्याबद्द्लचा हा लेख.
लेखातलं एक वाक्य रोचक आहे.
लेखातलं एक वाक्य रोचक आहे.
JNU’s School of Language, Literature and Culture Studies, which claims to teach and research “Languages, Literatures and Cultures of India, Asia and Europe”, does not teach Sanskrit; it does, however, have Persian and Arabic, besides modern European languages
याची शहानिशा केली पाहिजे पण खर असेल तर सॅड जरून आहे.
http://www.jnu.ac.in/SLLCS/ ए
एक स्कूल ऑफ इंड्यन लँग्वेजेस आहे असं दिसतंय. पण तिथे काय शिकवतात हे कै दिसत नैये.
संस्कृतचं स्वतंत्र केंद्र
संस्कृतचं स्वतंत्र केंद्र (विभाग) आहे की जे.एन.यु.त. व्यवस्थित मोठी, स्वतंत्र इमारत आहे. एम.ए., एम.फिल., पिएचडी करता येते. भारतीय भाषांचे केंद्र छोटे आहे त्यामानाने.
http://www.jnu.ac.in/CSS/
संस्कृतचे केंद्र वेगळे आहे,
संस्कृतचे केंद्र वेगळे आहे, स्कूल ऑफ लँग्वेजेसचा भाग नाही असा सूर त्या लेखात जाणवला. पण स्कूल ऑफ लँग्वेजेसमधल्या डाव्यांनी सासुरवास करू नये म्हणून मुद्दामच संस्कृतचे स्वतंत्र केंद्र (विभाग) (मुरली मनोहर जोशींच्या काळात) स्थापण्यात आले (असे ऐकले आहे).
बाकी जे.एन.यु.तील इतिहास विभागात प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवतात. मध्ययुगीनवाल्यांना फारशी, आधुनिक काळ अभ्यासणार्यांना मराठी/बंगाली असा एक एक भाषेचा कोर्स करावा लागतो
शंका
डिसक्लेमर : मी शाळेत संस्कृत शिकलो आहे आणि मला संस्कृत शिकण्या-शिकवण्यात काही गैर वाटत नाही. पण संस्कृत कुणी आणि कशासाठी शिकावं ह्याविषयी लेखात मांडलेल्या मुद्द्यांविषयी मात्र प्रश्न पडले. उदा:
I will not attempt here even the barest overview of the vast corpus of knowledge accumulated in Indian knowledge traditions, since last year’s SandHI series in Financial Chronicle effectively did so. Let me just point out that in fields like linguistics, ayurveda, agriculture, water management, construction, statecraft, philosophy, psychology, ethics, environmental conservation, management — even mathematics if we are to believe Manjul Bhargava — some of Indian accomplishments have retained much relevance and applicability. Astronomy, chemistry, botany, zoology and a few more disciplines also saw brilliant developments which, if no longer relevant today, still need to be studied as they are an important part of the history of ideas.
ज्यांना भारतीय ज्ञानव्यवस्थांचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी संस्कृतचा उपयोग आहे ह्यात संशय नाही, पण मूळ वाद आयआयटीसारख्या तंत्रज्ञ निर्माण करणाऱ्या संस्थेत संस्कृत शिकवण्याबद्दल होता. आज सिव्हिल इंजिनियरिंगच्या किंवा खगोलशास्त्राच्या शिक्षणात संस्कृत घालणं अधिक व्यवहार्य आणि उपयोगी आहे, की ह्या ज्ञानशाखांमध्ये महत्त्वाचं असं काही संस्कृतात आहे का ते पाहणं, आणि असलं तर ते इंग्रजीत आणून शिकवणं अधिक व्यवहार्य आणि उपयोगी आहे?
आणि हे भारतीय ज्ञानव्यवस्थेपासून लोकांना वंचित ठेवण्याचे तोटे पाहा -
loss of self-confidence (since it is implicit that all knowledge comes from the West); loss of crossdisciplinary thinking (90 per cent of our engineers are one-track minds); consequent loss of creativity (we produce good scientists, but no great scientists); loss of a sense of aesthetics (ugliness is accepted as a normal by-product of “modern living”); loss of methods of self-exploration and self-fulfilment (the psychiatrist will always be there when depression strikes, as it inevitably will), loss of time-tested, varied and non-dogmatic sources of cultural values (yet let us lament on the degeneration of morals in our society)....
पाश्चात्य व्यवस्थेत अनेक तोटे आहेत हे मान्यच आहे, पण म्हणून इतकं सगळं काही भारतीय ज्ञानव्यवस्थेच्या वंचनेमुळे घडत असेल का? मला तर हे जरा नेमाड्यांच्या देशीवादासारखं भोंगळ वाटतंय.
आज सिव्हिल इंजिनियरिंगच्या
आज सिव्हिल इंजिनियरिंगच्या किंवा खगोलशास्त्राच्या शिक्षणात संस्कृत घालणं अधिक व्यवहार्य आणि उपयोगी आहे, की ह्या ज्ञानशाखांमध्ये महत्त्वाचं असं काही संस्कृतात आहे का ते पाहणं, आणि असलं तर ते इंग्रजीत आणून शिकवणं अधिक व्यवहार्य आणि उपयोगी आहे?
एखादी गोष्ट/आयडीआ मॉडर्न बनवणं/इंग्रजीमध्ये आणणं यासाठी दोन्हीकडची स्किल्स असलेली व्यक्ति जास्तं योगदान देऊ शकेल असं वाटतं. उदा. आयुर्वेदातल्या संकल्पनांची आधुनिक वैद्यकशास्त्राशी सांगड घालायची असेल तर संस्कृत + आयुर्वेद( मूळ आयुर्वेदिक पुस्तकं संस्कृतात आहेत माझ्या माहितीप्रमाणे) आणि आधुनिक वैद्यकशास्त्र/औषधशास्त्र या दोहोंचं ज्ञान असणारी व्यक्ति लागेल/ प्रेफरेबल असेल राईट? किंवा एखाद्या वास्तूचं रेस्टोरेशन याबाबत देखील असंच म्हणता येईल. सो आयाय्टीत किंवा इतर अभियंत्यांना संस्कृत शिकवण्याचा विकल्प देण्यात मला काहीच वावगं वाटत नाही.
पुढच्या मुद्द्यांमधली दोन तर मला खास आधुनिक भारतीय लक्षणं वाटतात.
loss of a sense of aesthetics आणि consequent loss of creativity
ROI
>> आयुर्वेदातल्या संकल्पनांची आधुनिक वैद्यकशास्त्राशी सांगड घालायची असेल तर संस्कृत + आयुर्वेद( मूळ आयुर्वेदिक पुस्तकं संस्कृतात आहेत माझ्या माहितीप्रमाणे) आणि आधुनिक वैद्यकशास्त्र/औषधशास्त्र या दोहोंचं ज्ञान असणारी व्यक्ति लागेल/ प्रेफरेबल असेल राईट? किंवा एखाद्या वास्तूचं रेस्टोरेशन याबाबत देखील असंच म्हणता येईल. सो आयाय्टीत किंवा इतर अभियंत्यांना संस्कृत शिकवण्याचा विकल्प देण्यात मला काहीच वावगं वाटत नाही.
आयुर्वेदातलं बरंचसं ज्ञान संस्कृतात असावं असा माझा अंदाज आहे. त्याउलट कंप्युटर, इलेक्ट्रॉनिक, किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचं आहे. अगदी गणित किंवा खगोलशास्त्रात आपली एके काळी प्रगती होती असं मानलं तरीही आधुनिक गणिताला किंवा खगोलशास्त्राला नवं असं फारसं काही संस्कृतात नसावं. त्यामुळे आयुर्वेदात संस्कृत शिकून किती फायदा होईल आणि ह्या तंत्रज्ञानशाखांत संस्कृत शिकून किती फायदा होईल ह्यात फार मोठा फरक आहे. तसंच, युनानीमध्ये कदाचित फारशी शिकून उपयोग होईल, पण इंजिनियरिंगमध्ये फारशी शिकून उपयोग नाही.
>> पुढच्या मुद्द्यांमधली दोन तर मला खास आधुनिक भारतीय लक्षणं वाटतात.
loss of a sense of aesthetics आणि consequent loss of creativity
हा दावा तर मला खूपच विनोदी वाटला. कारण संस्कृताचा गंधही ज्यांना नाही, इतकंच नव्हे तर पिढ्यानपिढ्या ज्यांना संस्कृत शिकण्याचा हक्कही नव्हता असे कित्येक कसलेले देशी वाणाचे कलाकार शतकानुशतकं सुंदर निर्मिती करत आहेत. त्यांची कलानिर्मिती आता अभ्यासली जाते आणि शिकवलीही जाते.
मध्यंतरी नातीगोती की अशाच
मध्यंतरी नातीगोती की अशाच काही नावाचं नाटक पाहिलं होतं. त्यात वेगवेगळ्या काळातील नाटकांमधले प्रवेश होते.
त्यात एक कालिदासाच्या शाकुंतल मधला प्रवेश होता. त्यात दुष्यंत शकुंतलेला न ओळखून तिचा स्वीकार करत नाही त्यावेळी तो जे तिला बोलतो त्यात उपमा/उत्प्रेक्षा/रूपकांची रेलचेल होती ती अस्थानी वाटत होती. असला sense of asthetics नष्ट झाला तर चांगलेच आहे.
saw brilliant developments
saw brilliant developments which, if no longer relevant today, still need to be studied as they are an important part of the history of ideas.
रिलेवन्सच्या मुद्द्याबद्दल लेखकच हे म्हणतो. सो उपयुक्तता हाच एक मुद्दा आहे असं नाही. अभियांत्रिकी महाविद्यालयात ह्युमॅनिटीजचे विषय चालू केले जात आहेत. ते देखील थेट उपयुक्त नसतात. ( उदा: फोटोग्राफी) युनिडायरेक्षनल होऊ नयेत लोक म्हणून ते असतात अशी माझी अटकळ आहे. प्राचीन भारतातल्या शास्त्रीय/अभियांत्रिक अचिव्हमेंट्सचा अभ्यास करणं (आत्ता उपयोगी असतील/नसतील तरी) याच विचाराखाली संस्कृतचा विकल्प का देऊ नये?
हा दावा तर मला खूपच विनोदी वाटला.
दावा हा होता की स्वतःच्या इतिहासाची/ कल्चरल हेरिटेजची माहिती नसल्यामुळे त्या वरील लक्षणांना हातभार लागतो.
गंमत
>> संस्कृतचा विकल्प का देऊ नये?
विकल्प खुशाल द्यावा. इंजिनियरांना संस्कृत कशासाठी ह्याबद्दलचं लेखकाचं तर्कशास्त्र मात्र विनोदी आहे एवढंच.
>> दावा हा होता की स्वतःच्या इतिहासाची/ कल्चरल हेरिटेजची माहिती नसल्यामुळे त्या वरील लक्षणांना हातभार लागतो.
इतिहास, परंपरा माहीत नसल्यामुळे देशाची जी काही मारली जात्ये त्यामुळे सोशल मीडियावर माझं रोजच मनोरंजन होत असतं. पण म्हणून संस्कृत शिकाल तर हे सगळे प्रश्न मिटतील, किंवा संस्कृत न शिकल्याने हे प्रश्न निर्माण झाले आहेत असं म्हणणं विनोदी नाही असं मात्र नाही. :-)
सहकारी संस्थांविषयीची बातमी
सहकारी संस्थांविषयीची बातमी दिशाभूल करणारी आहे (आणि दिशाभूल पार्टली सरकारकडून होत आहे).
*सरकार म्हणजे देवेंद्र/नरेंद्र वगैरे नाही. उपनिबंधक वगैरे पातळीवर.