Skip to main content

ही बातमी समजली का - भाग १७९

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

---

चिंतातुर जंतू Tue, 10/07/2018 - 13:54

In reply to by गब्बर सिंग

खरी रसदार मांसल बातमी ही आहे. तिचा स्रोत हार्वर्ड विद्याविभूषित आहे.
Being gay is against Hindutva, it needs a cure: BJP MP Subramanian Swamy

अबापट Tue, 10/07/2018 - 14:38

In reply to by चिंतातुर जंतू

आता स्वामी म्हणतात म्हणजे असणारच खरे आणि शास्त्रीय!! शिवाय सज्जड पुरावे पण असतीलच त्यांच्याकडे .

गब्बर सिंग Mon, 16/07/2018 - 07:41

In reply to by चिंतातुर जंतू

Being gay is against Hindutva, it needs a cure: BJP MP Subramanian Swamy

.
बोंबला.
.
-----
.
ॲक्च्युअली स्वामीजी असं पण म्हणाले की समलैंगिकांना सेलिब्रेट करायला परवानगी द्यायला नाही पायजे. इथे

.
.
If it annoys Mr. Swami then the celebrations should be done even more frequently. Let the homosexuals rub Swami's nose to the ground by having more frequent and grand celebrations.
.

नितिन थत्ते Tue, 10/07/2018 - 09:49

नो कमेंट

जियो इन्स्टिट्यूट सुरू होण्यापूर्वीच तिला इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्सचा दर्जा देण्यात आला आहे.

पुढच्यावेळी निवडून येण्याची खात्री नसल्याने घाई
?

अबापट Tue, 10/07/2018 - 14:41

In reply to by नितिन थत्ते

आता यात कुणालाही काहीही वावगे वाटत नाही . दुर्दैवाने..कारण आयआयटी मध्ये चांगलं काय होतं/आहे ( गलेलठ्ठ पगाराची किंवा परदेशी सोय करणारी नोकरी याव्यतिरिक्त ) हेही पब्लिकला माहीत नसतं, त्यामुळे चव नाही त्याकरता कोण काय म्हणणार ?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/07/2018 - 07:41

In reply to by नितिन थत्ते

Post by Prof Sandeep Shukla, IIT Kanpur

There seems to be a lot of confusion about this Jio University getting the tag of "Institute of Eminence". Let me clarify a few - it is indeed true that private universities tagged as such are not supposed to get the 1000 crores infusion of funds from the UGC, unless government makes more U-turns on its declarations like Viswajeet, 10+10 IoE and so on. However, that does not matter. A University that has not even put its pillars in place -- claiming to hire world class faculty -- is a pipe dream. I remember 20 years ago when Dhirubhai Ambani Institute at Gandhinagar was started by Reliance. They hired a number of retired faculty from IITs who visited US to recruit faculty, and I met them at that time. They were paying more than IITs at that time, but it did not help this institute at all. There was no faculty I know of, who came to join that institute despite higher pay and would have been selected at IITs. Further, those who joined have left since -- and the institute is no where in the world rankings. The students I have seen from there, are no where as good as IIT students. Another example is Ashoka University. They promised very high pay to run their Computer Science program. They have 2-3 faculty even after 10 years or so since inception, who are not comparable to IIT or IISc faculty by any stretch of imagination. Further, they pay as much as 5-10 lacs for teaching a course by faculty from ISI and other top institutes just for a semester,
in order to cover their curriculum. But such floating faculty can only leave their main job and go 2-3 times a week, and since their research labs are not located there, other than class room teaching, they cannot really impart any research experience to the students. Students from that institute suffer massively in placement and further studies. So giving high pay does not necessarily attract faculty -- unlike corporate jobs where high pay gets one good executives and vice presidents etc. They still do not have post graduate program in Computer Science. I can give many such examples from first hand experience.

So on what promise did the committee believe that a promised university will become eminent in 5 years when they do not trust that some of the top universities such as Jadavpur University or one of the older IITs can get eminence? They are already in top 500 of QS ranking anyway.

It seems the entire definition of "greenfield institutes" was created with this university in mind -- otherwise it makes no sense.

Now, even if the 1000 crores are not given to this "greenfield Institute" -- what does it give which makes people so upset about it? It gives the tag which can be monetized by the institute to charge huge tuition and take as many foreign students (note that foreign students with top dollars will not come here unless no other good university in US, Canada, UK etc take them - that is a fact -- especially given the reputation we have gained in women safety, lynching and what not). So the top dollar paying foreign students are unlikely to be of high quality but the money can be made by the University.

Second, currently, no government department -- such as DST, MEITY give large projects to private universities, and they prefer government institutes and universities to run their projects. Having worked with DST/MEITY, I have seen that even if a private university comes with a proposal, they are very reluctant to trust them to carry out very large projects -- with exceptions such as BITS Pilani, Amrita University and may be 1-2 more. Now, that can change when the government gives you a tag of IoE, as the DST and MEITY or any government funding agency cannot but entrust an institute tagged by its own government as eminent.

The term eminent in most dictionaries are applied to people or entities with a proven record. So even the name is now a misnomer.

So this tag itself is worth many times the 1000 crores about which there seems to be confusion. I am willing to believe that 1000 crores will not flow to the private ones as declared by UGC -- but it does not really matter. One can make many times over that amount with large scale projects from the government and tuition encashing the tag.

So those who think that no funds is going to Jio means every thing is fine -- are in deep denial of the reality. It is a way for a government to bless an entity of their friends to rampantly exploit students and their parents, and also for giving a license for government funds from various agencies to flow freely to them.

That is where the outrage is -- and the outrage is very much warranted.

Disclaimer: I was a primary member of the IoE proposal team of IIT Kanpur, so I am disappointed by the fact that IIT Kanpur was not selected but I am not outraged by it -- as in any competition -- there is win and loss. That is not a reason to be outraged. Even though BITS or Manipal quality is no where near IIT Kanpur, Madras, KGP etc -- but that is also not a point of contention as they were in two different categories. What is outrageous is this rampant cronyism and playing fiddle to a private industry who has no experience in higher education excellence nor any reasonable proof that they can do it.

गब्बर सिंग Tue, 10/07/2018 - 20:53

Ease of doing business Rankings : आंध्रप्रदेशाचा पहिला नंबर. महाराष्ट्र १३ वा.
.
ही अशी स्पर्धा इष्ट आहे. म्हंजे पर्यावरणवाद्यांचे व कामगारांचे फाजील लाड करण्याची वृत्ती कमी होईल.
.

चिमणराव Wed, 11/07/2018 - 06:00

मासेमारी करायला जाणय्रा बोटींना सॅटेलाइट डेटा/पिक्चर देऊन माशांचा घोळका समुद्रात कुठे आहे हे दाखवल्याने वेळ आणि पेशांची बचत होते, धंधा फायदेशिर होतो. तसं आंध्र/तेलगु चाननेलवर देताना पाहिलं आहे.
अशामुळे बिज देणारी मोठी मासळी लवकर नष्ट होते. महाराष्टातले हलकट पर्यावरणवादी हे होऊ देत नाहीत. तुमचे नंबर गेले खड्ड्यात.

गब्बर सिंग Wed, 11/07/2018 - 06:06

In reply to by चिमणराव

महाराष्टातले हलकट पर्यावरणवादी हे होऊ देत नाहीत. तुमचे नंबर गेले खड्ड्यात.

(१) नंबर शेवटी खड्ड्यातच जातात. नंबर ची आकडेमोड करणारा सुद्धा. तेव्हा जाऊदेत.
(२) पर्यावरणवाद्यांना जे विशेषण तुम्ही लावलेत ते एकदम शॉल्लेट आहे.
.

गब्बर सिंग Wed, 11/07/2018 - 11:38

In reply to by ओंकार

संविधानाच्या १९ व्या परिशिष्टात सेक्शन २ आहे व त्यात अभिव्यक्तीवरील बंधने खाली डकवत् आहे. ह्यामुळे सरकारला इतका वाईड लॅटिट्युड मिळतो की बस्स.
जोडीला - नोकरशहा हा सरकारच्या सेवेत असतो. .
आणि मोदी-सरकार हे अभिव्यक्तीच्या बाबतीत फार उदार नाही असं अनेकदा समोर आलेले आहे. तेव्हा परिणाम काय होणार हे सहज सांगता येण्यासारखं आहे.
.
.

Nothing in sub-clause (अ) of clause (1) shall affect
the operation of any existing law, or prevent the State
from making any law, in so far as such law imposes
reasonable restrictions on the exercise of the right
conferred by the said sub-clause in the interests of 4[the
sovereignty and integrity of India,] the security of the
State, friendly relations with foreign States, public order,
decency or morality, or in relation to contempt of court,
defamation or incitement to an offence.]

गब्बर सिंग Thu, 12/07/2018 - 22:33

In reply to by चिंतातुर जंतू

“If Russia is an oligarchy, how long can we resist calling India one?”

.
.
ऑलिगार्की असणं हे अनिष्ट का आहे ते लेखकाने सांगितलं तर बरं.
सर्व प्रकारची विविधता इष्ट असते पण इकॉनॉमिक व पॉवर स्टेटस ची विविधता नसायलाच हवी ? का बरं ?
सर्व जाती, धर्म, रेस, एथ्निसिटीज, वंश, पंथ असावेत. भाषिक विविधता असावी, सांस्कृतिक विविधता असावी.
पण इकॉनॉमिक व पॉवर स्टेटस ची विविधता मात्र मोडून काढली पाहिजे ??
तिथे मात्र कोणी कमीजास्त नसायला हवेत आणि सगळे जे जास्तवाले आहेत त्यांचे दमन करून सगळे समान पातळीवर आणले पाहिजेत ???
का बरं ??
.
.
------------
.
.

The rise of India’s super-rich – the first and most obvious manifestation of the billionaire Raj – was propelled by domestic economic reforms. Starting slowly in the 1980s, and then more dramatically against the backdrop of a wrenching financial crisis in 1991, India dismantled the dusty stockade of rules and tariffs that made up the Licence Raj. Companies that had been cosseted under the old regime were cleared out via a mix of deregulation, foreign investment and heightened competition. In sector after sector, from airlines and banks to steel and telecoms, the ranks of India’s tycoons began to swell.

.
.
सुपर रिच आणि कंपन्यांकडून सर्वात जास्त टॅक्स ओरबाडून घ्यायचा. आणि वर त्यांच्यावरच अल्पजनाधिपत्य चा आरोप करायचा ?? उलटा चोर .....
.
.

गब्बर सिंग Fri, 13/07/2018 - 03:39

In reply to by चिंतातुर जंतू

मुद्दाम वेगळा प्रतिसाद लिहित आहे. अमेरिकेतल्या कंपन्यांचं मार्केट कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे आणि त्याविरोधी सुद्धा असाच आरडाओरडा सुरु झालेला आहे.
.
ऑलिगार्की आणि मार्केट मधल्या कंपन्यांचं मार्केट कॉन्सन्ट्रेशन* वाढणं हे दोन एकच नाहीत. भिन्न आहेत.
.
पण दोन्ही अल्पजनाधिपत्य कडे जाणारे आहेत.
.
प्रश्न - मार्केट कॉन्संट्रेशन वाढणं म्हंजे काय ?
उत्तर - उदा. एक वस्तू पुरवणाऱ्या डझनभर कंपन्या असणं व त्यांचा मार्केट शेअर सुमारे ८% ते १२% असणं - ह्या स्थितीकडून - तीच वस्तू पुरवणाऱ्या डझनभर कंपन्या असणं आणि त्यांचा मार्केट शेअर - एकीचा ३०%, दोघीचा प्रत्येकी २५%, आणि उरलेल्या ९ कंपन्यांचा मिळून २०% - अशी स्थिती येणं.
.

चिंतातुर जंतू Wed, 11/07/2018 - 14:36

'व्हरायटीज ऑफ डेमोक्रसी' नावाच्या प्रकल्पाअंतर्गत प्रकाशित झालेल्या अहवालानुसार ब्राझील, भारत, रशिया, तुर्कस्तान आणि अमेरिकेसारख्या काही देशांत लोकशाहीची पीछेहाट झालेली आहे.

चिंतातुर जंतू Wed, 11/07/2018 - 15:20

In reply to by अनुप ढेरे

जंतु, तुम्हा कम्युनिस्ट लोकांना लोकशाहीबद्दल खरच पडलेली असते?

ढेरे, तुम्हाला सगळे विरोधक खरंच कम्युनिस्ट वाटतात, की हा सन्मान खास माझ्यासाठी?

गब्बर सिंग Fri, 13/07/2018 - 11:12

In reply to by अनुप ढेरे

तुम्ही नाही वाटत कम्युनिस्ट.

.
सर्टिफिकेटच दिलंत की ओ, ढेरेशास्त्री तुम्ही चिंजं ना ?
.
पण - चिंजं कम्युनिष्ट वाटत नाहीत - असं म्हणताना माझी जीभ अडखळेल.
.

चिंतातुर जंतू Fri, 13/07/2018 - 15:39

In reply to by गब्बर सिंग

चिंजं कम्युनिष्ट वाटत नाहीत - असं म्हणताना माझी जीभ अडखळेल.

चांगली गोष्ट आहे. कारण, मी कम्युनिस्ट वाटत नाही असं म्हणताना कम्युनिस्टांची जीभ जरादेखील अडखळत नाही. म्हणजे, तुम्ही कम्युनिस्ट नाहीत. :-)

चिंतातुर जंतू Wed, 11/07/2018 - 15:55

In reply to by अनुप ढेरे

हिंदूमधल्या बातमीतून -

"My choice of partner should not be my sister... prohibited under Hindu law. Allowing the choice of a partner should not extend to incest... sado-masochism...," Mr. Mehta voiced the government's apprehensions on Wednesday.
In a sharp retort, Justice D.Y. Chandrachud said the Bench is not here to adjudicate over any "kinky notions" of sexual orientation.

हे विनोदी आहे. पण सुब्बू स्वामी जे म्हणतात त्याची री न ओढणं हे किमान ठीक.

गब्बर सिंग Wed, 11/07/2018 - 21:30

केंद्रसरकार कडून नेट न्युट्रॅलिटी ला मान्यता
.
मोदींचा आणखी एक लेफ्ट टर्न.
.
थत्तेचाचा, हुलू, गूगल, नेटफ्लिक्स खुश.
.
येताजाता अंबानी व अडाणींच्या नावानं बोंबलणारे लोक या बाबतीत मात्र गप्प असणारच आहेत.
.

आता अमुक यात्रेला शिखरावर रोपवेने जा, डोलीने जा किंवा हेलिकॉप्टरने, दर एकच.. असंही करावं. शेवटी त्याच जागी तितक्याच altitude, latitude, longitude वर पोचतोय. कॅरीयर कोणी का असेना.

आणि त्या उंचीच्या कोणत्याही शिखराला सेम दर. वर अमरनाथ आहे, वैष्णोदेवी आहे किंवा विरार आहे याने काय फरक पडतो?

गब्बर सिंग Wed, 11/07/2018 - 21:51

In reply to by गवि

हृदयावरची शस्त्रक्रिया, मेंदूवरची शस्त्रक्रिया आणि पायाच्या अंगठ्यावरची शस्त्रक्रिया यांना प्रतिइंच समान फी असायला हवी.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/07/2018 - 03:49

In reply to by गब्बर सिंग

५० किलो वजनी व्यक्ती आणि १०० किलो वजनी व्यक्तीला एकसमान विमानभाडं, बसभाडं, ट्रकभाडं पडतं.

नितिन थत्ते Thu, 12/07/2018 - 11:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

देअर इज नथिंग राँग ऑर राइट अबाउट इट. इट इज कम्प्लीटली डिपेंडंट ऑन द सर्व्हिस प्रोव्हायडर ॲण्ड द कस्टमर. कस्टमर इज फ्री टू चूज अनदर एअर लाइन (द्याट मे ह्याव प्रायसिंग पॉलिसी डिझायर्ड बाय कस्टमर). कस्टमर ऑल्सो हॅज ॲन ऑप्शन ऑफ नॉट ट्रॅव्हलिंग ॲट ऑल.

पॉईंट इज - इफ यू डॉण्ट वॉण्ट सोशालिझम यू मस्ट चूज क्यापिटलिझम होल्ली ॲण्ड नॉट सिलेक्टिव्हली.

हा प्रतिसाद ३_१४ अदिती यांच्यासाठी नाही. जनरल आहे.

गब्बर सिंग Thu, 12/07/2018 - 21:06

In reply to by नितिन थत्ते

५० किलो वजनी व्यक्ती आणि १०० किलो वजनी व्यक्तीला एकसमान विमानभाडं, बसभाडं, ट्रकभाडं पडतं.

.
थत्तेचाचांशी सहमत.
.
विमानप्रवासात स्टँडर्ड लगेज सोडता .... बाकीच्या बॅगेज चे पैसे आजकाल वजनावर असतात.
.
.
विमान कंपन्यांनी व्यक्तीच्या वजनानुसार तिकीट कमीजास्त लावलं तरी त्यात गैर काहीही नाही.
.
हां. हे असं केल्याने फुर्रोगामी लोक बोंबलायला लागतील हे खरं आहे.
पण एनीवे फुर्रोगामी हे - कंपन्यांवर जोरजबरदस्ती करण्यात, जंगलातील उंच झाडांची कटाई(उंची कमी) करण्यात व त्याद्वारे इतर झाडांना संधी देण्याचा घृणास्पद, निष्फल यत्न करण्यात धन्यता मानणारे असतात. तेव्हा त्यांना फाट्यावर मारणे इष्ट.
.

नितिन थत्ते Thu, 12/07/2018 - 10:24

In reply to by गब्बर सिंग

>>थत्तेचाचा, हुलू, गूगल, नेटफ्लिक्स खुश

मी कधीही नेट न्यूट्रालिटीला सपोर्ट केला नाही. आपले डीटीएच टीव्हीवाले तुम्हाला पॅक्सच* देतात ते जर चालतं तर नेटमध्ये न्यूट्रालिटी का हवी आहे? हा माझा प्रश्न आहे. किंवा केसरी टूर वाला तुम्हाला "त्याला वाटतील त्या" स्थळांची वेगवेगळी प्याकेजेस बनवतो. तसं नेटमध्ये का नको?

*अ-ला-कार्टेचा ऑप्शनपण असतो पण तो खूप महाग पडतो. तसाच केसरीबरोबर न जाता स्वत: टूर ॲरेन्ज करण्याचा ऑप्शन असतोच. तसा नेटमध्येही असेलच.

गब्बर सिंग Thu, 12/07/2018 - 20:41

In reply to by नितिन थत्ते

मी कधीही नेट न्यूट्रालिटीला सपोर्ट केला नाही.

.
वावावा. क्या ब्बात है. वेल्कम टू द क्लब.
.

गब्बर सिंग Wed, 11/07/2018 - 21:45

समलैंगींच्याबद्दल मोदीसरकारचा बुळगेपणा
.
म्हणे सर्वोच्च न्यायालयाच्या शहाणपणावर आम्हाला विश्वास आहे.
.
किती तेजायला बुळगे आहात तुम्ही.
.
तुम्ही सत्तेत तरी आहात असं तुम्हाला वाटतं का ?
इतके बुळगे आहात, आणि ही असली फटटूगिरी करायची असेल तर २०१९ मधे सत्ता का हवी आहे तुम्हाला ?
हा राजकीय दृष्ट्या प्रॅक्टिकल निर्णय आहे अशी पाठ थोपटून घेण्यासाठी ??
.
.

गब्बर सिंग Thu, 12/07/2018 - 10:09

योगेंद्र यादव यांच्या घरी/नातेवाईकांवर आयकर खात्याच्या धाडी
.
केजरीवाल म्हणतात की हे मोदींचे व्हेंडेट्टा पॉलिटिक्स आहे. नेहमीप्रमाणे.
बॉलिवूड चा "संजू" चित्रपट जोरदार चालला. मोदींचे व्हेंडेट्टा पॉलिटिक्स. दुसरं काय ?
महाराष्ट्रात कर्जमाफी/कर्जमुक्ती दिलेली असूनही सहा शेतकऱ्यांची आत्महत्या. मोदींचे व्हेंडेट्टा पॉलिटिक्स. दुसरं काय ?
क्रोएशिया अंतिम फेरीत. मोदींचे व्हेंडेट्टा पॉलिटिक्स. दुसरं काय ?
.

>>बॉलिवूड चा "संजू" चित्रपट जोरदार चालला. मोदींचे व्हेंडेट्टा पॉलिटिक्स. दुसरं काय ?

काय गब्बरभाऊ बराय ना?

अनुप ढेरे Thu, 12/07/2018 - 17:48

https://www.livemint.com/Politics/utwVNKAc6O2LVruqPj072J/Insight-As-for…

Panagariya had favoured allowing genetically modified (GM) crops into India, which has been strongly opposed by many lawmakers from the BJP, who say they are a risk to the environment and public health and also lead to exploitation of small farmers because of repeated payments to seed manufacturers.

Sanjeev Kaushik, a senior finance official in Kerala state...
Kaushik declined to name anyone but said the economy was in a mess because of “foreign-trained” professors with little field experience.

अनुप ढेरे Fri, 13/07/2018 - 14:59

In reply to by चिंतातुर जंतू

आमची कसली प्रतिक्रिया...
बाकी जिएमची परवानगी तर देण्यात यावी असं वाटतय. म्हणजे जिएमला नक्की विरोध का हे समजत नाही. महाराष्टृत सरकारने कोणत्याशा जिएम बियाणांवर बंदी घातली आहे. शेतकरी ते बियाणं चोरुन वापरत आहेत म्हणे.

नितिन थत्ते Thu, 12/07/2018 - 19:25

In reply to by अनुप ढेरे

गुरुमूर्ती आणि बोकील यांचे "हे डेज".....
------------------------------------------
गब्बर सिंग हे अर्थविषयात खूप वाचन करतात म्हणून त्यांच्यासाठी.....
सुसुस्वामी, रामदेव आणि बोकील यांच्या प्राप्तिकर रद्द करून बँकिंग ट्रान्झॅशन टॅक्स लावण्याच्या "क्रांतीकारी"* कल्पनेविषयी त्यांचे काय मत आहे?

*क्रांतीकारी- कारण ती कुठे इम्प्लिमेंट झालेली नाही. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही ती कल्पना नाही.

गब्बर सिंग Thu, 12/07/2018 - 20:50

In reply to by नितिन थत्ते

गब्बर सिंग हे अर्थविषयात खूप वाचन करतात म्हणून त्यांच्यासाठी.....

.
हे ॲक्युरेट आहे. मी अर्थशास्त्राचा हौशी वाचक आहे.
.
.
------
.

सुसुस्वामी, रामदेव आणि बोकील यांच्या प्राप्तिकर रद्द करून बँकिंग ट्रान्झॅशन टॅक्स लावण्याच्या "क्रांतीकारी"* कल्पनेविषयी त्यांचे काय मत आहे?

.
अजिबात अनुकूल मत नाही.
.
प्राप्तीकर हा व्यक्तीला लावला पाहिजे.
मतदान हे व्यक्ती करते. लोकप्रतिनिधी व्यक्तीला उत्तरदायी असतो.
म्हणून कर हे व्यक्तीला लावले पाहिजेत.
प्रत्येक व्यक्तीला कर देणे हे अनिवार्य केले जावे.
कर हे असे ॲब्स्ट्रॅक्ट** पद्धतीने लावणे हे प्रचंड समस्यांना जन्म देणारे आहे.
.
.
** - Few people know who pays how much, when, and where the incidence falls etc.
.
.

तिरशिंगराव Fri, 13/07/2018 - 12:50

In reply to by गब्बर सिंग

प्रत्येक व्यक्तीला कर देणे हे अनिवार्य केले जावे.

ज्या व्यक्तीला दोन्ही कर आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला कर लावला पाहिजे. मग तो गरीब असो वा श्रीमंत असो.

गब्बर सिंग Sun, 15/07/2018 - 11:23

In reply to by तिरशिंगराव

ज्या व्यक्तीला दोन्ही कर आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला कर लावला पाहिजे. मग तो गरीब असो वा श्रीमंत असो.

.

हो.
एक पै ही कर न देता गृह, संपदा उपभोगी सारी = असं होऊ नये.
.

नितिन थत्ते Fri, 13/07/2018 - 14:06

In reply to by गब्बर सिंग

>>कर हा व्यक्तीला लावला पाहिजे.

करेक्ट . लीगली कंपनी ही व्यक्ती असल्यामुळे वगैरे......

नितिन थत्ते Fri, 13/07/2018 - 09:53

In reply to by चिमणराव

>>जुन्यांची संधी हुकली.

लग्नाचा खर्च प्रामुख्याने बापुस करतो. त्यामुळे जुन्यांना आपल्या पोरांच्या लग्नाच्या खर्चाचे विवरण देण्याची संधी आहे.

---------------------------------
लग्नात पंचवीसपेक्षा जास्त पाहुण्यांना जेवण देऊ नये असा नियम आला की आणीबाणी आली यावर शिक्कामोर्तब होईल.

नितिन थत्ते Fri, 13/07/2018 - 14:01

नॅनो कार फेज आऊट होणार.
http://europe.autonews.com/article/20180711/ANE/180719954/tata-calls-ti…

व्हॉटस ॲप आणि फेसबुक सर्टिफाईड देशभक्त रतन टाटांनी आता साणंद इथली जमीन गुजरात सरकारला परत द्यावी. त्यांनी तर सिंगूर सोडून १०-१२ वर्ष झाली तरी सिंगूरची जमीनही स्वत:कडेच ठेवून घेतलेली आहे.

नॅनो कार चा टाटांच्या इमेजबिल्डिंगसाठी खूपच उपयोग झाला. त्याचबरोबर सिंगूरहून हकालपट्टी आणि साणंद येथे कारखाना उभारणे हे नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्या इमेज बिल्डिंगसाठीही उपयोगी पडले.
नरेंद्रमोदींची उद्योग जगतात आणि मध्यम वर्गात उद्योग स्नेही अशी इमेज झाली. आणि ममता बॅनर्जी यांची बंगालात मोअर लेफ्टिस्ट दॅन लेफ्ट अशी इमेज बनली. ममतांची ही इमेज बंगाल बाहेर निगेटिव्ह वाटली तरी बंगालात ती चांगलीच फळाला आली.

अनुप ढेरे Fri, 13/07/2018 - 14:55

In reply to by नितिन थत्ते

बरोबर!
त्या कारखान्यात इतर गाड्या बनत असतील तर त्यांच उत्पादन तडक थांबवण्यात यावं. तिथे सप्लायरचे कारखाने असतील तर तेही बंद करण्यात यावेत. कामगारांना तर फटके मारुन हकलुन देण्यात यावं.

नितिन थत्ते Fri, 13/07/2018 - 16:04

In reply to by अनुप ढेरे

१. सिंगूरमध्ये तर कसलंच उत्पादन होत नाही ना?
२. बनणाऱ्या गाड्या "पीपल्स कार" नसल्यामुळे त्या कारखान्यासाठी ज्या सवलती दिल्या असतील त्या काढून घ्याव्यात. मुळात जमीन दिली होती ती नॅनो कार बनवण्यासाठी दिली होती. अन्यथा टाटांच्याकडे पुणे आणि जमशेदपूर इथे मोप जमीन अगोदरच उपलब्ध होती.

गब्बर सिंग Fri, 13/07/2018 - 21:51

केंद्रसरकार सोशल मिडियावरील संभाषणांच्या देखरेखीसाठी नवीन विभाग उघडणार..... यावर सर्वोच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह की हे सर्व्हेलन्स स्टेट च्या दिशेने जाणारे आहे का ?
.
लेट मी गेट धिस स्ट्रेट -
.
(१) मी मोफत पुरवलेले उत्पादन्
(२) लोक जबाबदारीने व/वा बेजबाबदारीने वापरणार. त्याचे प्रचंड लाभ घेणार.
(३) सरकार माझ्यावर नजर ठेवण्यासाठी वेगळा विभाग उभा करणार्
(४) हा विभाग चालवण्यासाठी जो खर्च करावा लागतो तो खर्च माझ्याकडून घेतलेल्या करातून भागवणार
(५) जे लोक जबाबदारीने व/वा बेजबाबदारीने वापरतात त्यांच्याकडून सरकार एक पै ही घेणार नाही.
(६) ह्या विभागाकडून आलेल्या निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी माझी. व त्यासंबंधीत कॉस्ट्स मी भरायला हव्यात, माझ्या खिश्यातून.
(७) आणि हे न्याय्य, समानतावादी, प्रगतीशील धोरण, आणि लेव्हल प्लेयिंग फिल्ड ला प्रेरक आहे असं मी मानावं. कारण संविधानाचं १९ वं परिशिष्ट, सेक्शन २.
.
.

नितिन थत्ते Sat, 14/07/2018 - 10:38

>>https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/black-mo…

याने काळ्या पैशाला कसा चाप बसणार? बेसिकली डीडीच्या माध्यमातून मनी लॉण्डरिंग कसे होते? आणि ते नाव लिहिल्यामुळे कसे थांबेल?

नितिन थत्ते Sat, 14/07/2018 - 10:46

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/editorial-comfort-for…

आपल्याला शिक्षण देऊन त्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आई-वडिलांचा त्यांच्या संधिकाली सांभाळ करणे ही मुलांची कौटुंबिक जबाबदारी; परंतु अनेक तरुणांना आई-वडिलांचे ओझे जड होऊ लागते, असा अनुभव आहे.

ज्या वडिलांनी "तुला मार्क मिळाले आणि सरकारी (अनुदानित) कॉलेजात प्रवेश मिळाला तर ठीक नाहीतर मी काही तुझ्यासाठी डोनेशन देऊन मेडिकल/इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार नाही" असे आपल्या मुलांना सांगितले असेल त्यांची जबाबदारी मुलांनी घेतली नाही तरी चालेल का?

न'बांना अभिप्रेत असलेली थेरडेशाही ती हीच काय?

गब्बर सिंग Sun, 15/07/2018 - 02:02

In reply to by नितिन थत्ते

(१) लेख वाचला. नटसम्राट, अवतार, बागबान ष्टाईल दाणपट्टा चालवलेला आहे.
(२) आयुष्यभर खस्ता खाण्याच्या वल्गना करणाऱ्या आईवडिलांबाबत बोलायचे तर ---- नाठाळपणे वागणाऱ्या मुलांच्या कानाखाली आवाज काढण्याचा (सांस्कृतिक, कौटुंबिक) अधिकार आईवडिलांना असतो.
(३) त्याचप्रमाणे नाठाळपणे वागणाऱ्या (६०+) ज्येष्टांच्या कानाखाली एक सणसणीत वाजवण्याचा अधिकार त्या ज्येष्ठांच्या मुलांना देण्याबद्दल मटा च्या संपादकांचं व सरकारचं काय मत आहे ते जाणून घेण्याची इच्छा आहे.
.

'न'वी बाजू Sun, 15/07/2018 - 06:23

In reply to by नितिन थत्ते

न'बांना अभिप्रेत असलेली थेरडेशाही ती हीच काय?

मला अभिप्रेत असलेल्या थेरडेशाहीचा हा एक आस्पेक्ट अवश्य आहे.

(हा एकमेव पैलू नाही. इतरही अनेक आहेत. पण होय, ही थेरडेशाही म्हणता येईल.)

चिमणराव Sun, 15/07/2018 - 06:23

In reply to by नितिन थत्ते

ज्येष्ठ जेव्हा फार ज्येष्ठ नसतात तेव्हाच त्यांनी जागे व्हायला पाहिजे. मुलं १८ची झाली की तू तुझे चार पैसे कसेही मिळवून आण हे सांगायला हवे. एज्युकेशन लोन घेऊन शिक. फार लाड करतात आणि तीच मुले नंतर ब्लॅकमेल करतात.
लहानपणी यांची *** धुतली, यापुढे मोठेपणीही धूतच राहा हा विचार बळावतो आहे.

'न'वी बाजू Sun, 15/07/2018 - 07:01

In reply to by नितिन थत्ते

आपल्याला शिक्षण देऊन त्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आई-वडिलांचा त्यांच्या संधिकाली सांभाळ करणे ही मुलांची कौटुंबिक जबाबदारी

हे मातृ-पितृऋणाच्या पारंपरिक संकल्पनेच्या ग्रेनच्या अगेन्स्ट जात नाही काय?

बोले तो, आपल्याला शिक्षण देऊन स्थिरस्थावर करण्यासाठी आईवडिलांनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, त्यांच्या त्या ऋणाची परतफेड आपण आपल्या मुलांना शिक्षण देऊन स्थिरस्थावर करण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन करायची असते, अशी काहीशी मातृ-पितृऋणाची पारंपरिक संकल्पना आहे, अशी माझी समजूत होती. (नक्की खात्री नाही, परंतु फारा वर्षांपूर्वी लहानपणी हे बहुधा सानेगुरुजींच्या 'भारतीय संस्कृती'त वाचल्यासारखे वाटते. चूभूद्याघ्या.)

बास्स्स... आपल्या आईवडिलांना (आपल्यासाठी सपोजेडली आयुष्यभर खस्ता खाल्ल्याबद्दल) आपण याहून अधिक काहीही 'देणे' लागत नाही. (बाकी सारा स्वेच्छा, आंतरिक ऊर्मी वगैरेंचा कारभार. 'भूतदया' हा घाणेरडा शब्द येथे कटाक्षाने टाळलेला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. आगाऊ धन्यवाद.)

आता, इतकी साधीसोपीसुंदर कॉन्सेप्ट हिंदू थेरडेशाहीने (स्वार्थासाठी) पर्व्हर्ट नक्की कधी केली, ते तपासावे लागेल.

----------
गृहीतक. हे नेसेसरिली चुकीचे आहेच, असा दावा नाही. परंतु, हे गृहीतक आहे, हे इथे मान्य करू या का?१अ

१अ इन एनी केस, हे गृहीतक मी माझे म्हणून मांडत नाही. मातृ-पितृऋणाची (मला समजल्याप्रमाणे) पारंपरिक कॉन्सेप्ट काय ती मांडताना त्यामागील (पारंपरिक) गृहीतक म्हणून मांडतोय.

गब्बर सिंग Sun, 15/07/2018 - 11:13

In reply to by 'न'वी बाजू

बोले तो, आपल्याला शिक्षण देऊन स्थिरस्थावर करण्यासाठी आईवडिलांनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या१, त्यांच्या त्या ऋणाची परतफेड आपण आपल्या मुलांना शिक्षण देऊन स्थिरस्थावर करण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन करायची असते, अशी काहीशी मातृ-पितृऋणाची पारंपरिक संकल्पना आहे, अशी माझी समजूत होती.

.
राजा पंडू ला याकारणास्तवच परलोकाच्या रस्त्यावरून मागे फिरावे लागले. त्याला असं सांगण्यात आलं की - तू मातृपितृॠण फेडण्यासाठी अपत्यं जन्मास घालून त्यांचं लालन-पालन-पोषण करायला हवंस. तरच तुला परलोकी जाण्याच्या रस्त्यावर मार्गक्रमणा करता येईल. अन्यथा प्रत्येक जण जर जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका करवून घेण्याच्या लालसेने वैराग्यमार्गाला गेला तर कर्मचक्र थांबेल.
.
वानप्रस्थाश्रम हा ज्येष्ठांसाठीच आहे. पण आजकालच्या ज्येष्ठांना वनात जाण्या ऐवजी इमेल, फेसबुक, व्हॉट्सॅप्प चा सोस जरा दांडगाच असतो. वाचन म्हंजे फक्त अध्यात्मिक पुस्तकं वाचणं असाही त्यांचा समज असतो. ती अख्खी पिढी फुकट गेलेली आहे. त्यातले बहुतांश लोक - धर्म, समाज, देश, आणि संस्कृती हे समानार्थी शब्द असतात असं मानून असतात.
.
( थोड्या वेळाने माझी कदाचित उतरेल .... )
.

गवि Sun, 15/07/2018 - 12:10

In reply to by 'न'वी बाजू

आयुष्यभर खस्ता खाल्ल्या.

मुळात कचोऱ्या खाण्यात इतक्या हालअपेष्टा असतात हे मुळीच मान्य नाही.

'न'वी बाजू Sun, 15/07/2018 - 18:35

In reply to by नितिन थत्ते

ज्या वडिलांनी "तुला मार्क मिळाले आणि सरकारी (अनुदानित) कॉलेजात प्रवेश मिळाला तर ठीक नाहीतर मी काही तुझ्यासाठी डोनेशन देऊन मेडिकल/इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार नाही" असे आपल्या मुलांना सांगितले असेल...

असे जर एखाद्या वडिलांनी आपल्या मुलांना सांगितले असेल, तर (अ) ते त्यांच्या अधिकारक्षेत्रात निश्चित आहे, आणि (ब) तशी जर एखाद्या वडिलांची विचारसरणी असेल, तर तीत निश्चितपणे गैर असे काही म्हणता येणार नाही. (अर्थात, ती युनिव्हर्सल बॉयलरप्लेट होऊ शकत नाही, परंतु गैरही नव्हे.)

हॅविंग सेड दॅट...

...त्यांची जबाबदारी मुलांनी घेतली नाही तरी चालेल का?

(१) वडिलांची जबाबदारी मुलांनी घेणे वा न घेणे हे वडिलांनी मुलांसाठी काय केले वा केले नाही यावर प्रेडिकेट करणे नामंजूर. (सो लेट अस नॉट मिक्स अप द टू इश्यूज़.) आणि,

(२) वडिलांची जबाबदारी मुलांनी घेणे हा (अ) वडिलांचा हक्क आणि (ब) मुलांचे कर्तव्य असण्याची कॉन्सेप्ट नामंजूर.

'न'वी बाजू Mon, 16/07/2018 - 00:00

In reply to by नितिन थत्ते

आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलांना अद्दल घडविण्यासाठी त्यांची नावे प्रसिद्ध करण्याचा उल्लेख या धोरणात आहे.

कुठे? सरकारी गॅझेटात?

अद्दल घडविण्यासाठी त्यांची नावे प्रसिद्ध करण्याचा

हा शुद्ध आचरटपणा आहे. आ ला मिसेस अनुष्का व्हॉटेव्हर-हर-फेस-इज़.

परंतु त्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे आई-वडलांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखविणे सामाजिकदृष्ट्या योग्यच आहे.

महाराष्ट्र टाइम्सला 'सामना'ने टेकओव्हर केलेले आहे काय हल्ली?

जन्मदात्यांचा योग्य सांभाळ करणाऱ्या मुलांना प्राप्तिकरात सवलत देण्याचाही प्रस्ताव आहे.

आणि फंडिंग? या प्रस्तावित टॅक्सकटकरिता लागणारे पैसे / त्यापायी होणाऱ्या आर्थिक तुटीची भरपाई नक्की कोणाच्या खिशातून येणार आहे म्हणे?

प्राप्तिकर हा विषय केंद्राच्या अखत्यारित असल्याने त्याचा केंद्राकडे पाठपुरावा करावा लागेल.

हम्म्म्... बसा वाट पाहत, अगदी गायी घरी येईपर्यंत! मध्यंतरी, बोलायला काय जाते?

रुग्णालये; तसेच खासगी वैद्यकीय संस्था आणि धर्मादाय संस्था यांनी ज्येष्ठांना वैद्यकीय उपचारांत पन्नास टक्के सवलत देण्यासाठीची सूचनाही महत्त्वाची आहे. मात्र, ती केवळ सूचनेच्या पातळीवर आहे. खासगी रुग्णालये आणि डॉक्टर याची अंमलबजावणी करतील असे नाही.

का करावी? फंंडिंग कुठून येणार?

त्यांना करआकारणीत सवलत देण्याचे धोरणात नमूद करण्यात आले आहे; परंतु हा विषय राज्याच्या अखत्यारितील नाही. त्यामुळे या सूचना कागदावरच राहण्याची शक्यता आहे. त्या प्रत्यक्षात येण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता आहे.

थोडक्यात, बोलाचीच कढी नि...

असो.

गब्बर सिंग Sun, 15/07/2018 - 00:42

तीन महिन्यांत महाराष्ट्रात ६३९ शेतकऱ्यांची आत्महत्या..
.
.

“639 farmers have committed suicide between March 1 and May 31, 2018. Of these 639 farmers, 188 were declared eligible for compensation as per government schemes, based on the government’s criteria of crop failure, debts and their failure to repay loans,” Patil said. “Of the 188, families of 174 farmers have received compensation,” he added. Patil further said 122 cases were declared ineligible for compensation, while 329 cases were pending for further investigation.

.
.
विरोधी पक्ष काय झोपा काढतायत का ?
.
त्या १७४ कुटुंबांना नुकसानभरपाई खरोखर दिली गेली का ? की त्यात भ्रष्टाचार झाला ? जनतेचाच पैसा नैय्ये का हा ??
.
.

गब्बर सिंग Sun, 15/07/2018 - 01:29

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात .... की मोदींची एकाधिकारवादी वृत्ती ही समस्याजनक ठरेल.
.
पूर्वी एकदा एकाधिकारवादी वृत्तीचे प्रधानमंत्री होते तेव्हा "सेक्युलर व सोशॅलिस्ट" हे दोन शब्द संविधानात घुसडले गेले होते. ते सुद्धा आणीबाणी दरम्यान. तेव्हा आम्ही सहमत आहोत.
.

नितिन थत्ते Sun, 15/07/2018 - 09:17

https://indianexpress.com/article/opinion/columns/towards-a-hindu-pakis…

why we have violent Hindutva instead of a Hindu renaissance that could make Indians truly proud

लोकांनी "व्हायलंट हिंदूत्वासाठी" मतं दिली नव्हती असं अजूनही तवलीनबाईंना वाटतं. इट वॉज द सोल यूएसपी व्हाय ही गॉट दोज ॲडिशनल ७% व्होट्स दॅन १९९९ ॲण्ड फुल मेजॉरिटी.

पण ते जाऊ द्या. शिक्षणव्यवस्थेबाबतचं त्यांचं ऑब्जेक्षन मला नीटसं कळत नाही. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना भास्कराचार्य ठाऊक नाहीत हा त्या विद्यार्थ्यांचा दोष नाही का? मला तर बुवा शाळेत आर्यभट, वराहमिहीर, भास्कराचार्य यांची नावे वाचल्याचे आठवते.

त्यांचं ऑब्जेक्षन जर आपण न्यूटनचा नियम, ऑयलरचे सूत्र, लाप्लासचा ट्रान्स्फॉर्म, फोरियर सीरिज अशा प्रकारे नावे घेतो तसं भास्कराचार्यांचे सूत्र असं काहीतरी असायला हवं या प्रकारचं असेल तर मी सहमत आहे. भास्कराचार्यांचं कोणतं सूत्र/नियम/सिद्धांत अभ्यासक्रमात उल्लेखता येतील हे तज्ञांनी शोधायला हवे.

गब्बर सिंग Sun, 15/07/2018 - 10:56

In reply to by नितिन थत्ते

भास्कराचार्यांचे संशोधन नावासकट शिकवलं तर त्याचे परिणाम ..... काय होतील त्याची हिंट.
.
-----------------
.

why we have violent Hindutva instead of a Hindu renaissance that could make Indians truly proud

.
.
पण व्यक्तीला प्रामुख्याने स्वत:च्या अचीव्हमेंट्स चा अभिमान असावा असं म्हणतात ना ?
.

बॅटमॅन Mon, 16/07/2018 - 14:45

In reply to by नितिन थत्ते

तसे प्री कॅल्क्युलस किंवा अर्ली कॅल्क्युलस लेव्हलचे काही फोर्मुले आहेत खरे. झालंच तर नंबर थिअरी, डायोफँटाईन इक्वेशन्स, इ. गणिताच्या शाखांमध्ये काही फोर्मुले आहेत. भास्कराचार्यांनी जनरलाईझ्ड स्वरूपात मांडलेली द्विचलीय वर्गसमीकरणांच्या पूर्णांक उकलींची पद्धत ही वर्ल्ड फेमस आहे परंतु तिचा उल्लेख फार कुठे नसतो- ते एक करता येईल.

https://en.wikipedia.org/wiki/Chakravala_method

पण अडचण अशी आहे की ज्या विचारसरणीच्या लोकांना हे असे व्हावे असे वाटते त्यांपैकी ९९.९९९९% लोकांना याची काहीच पडलेली नसते. वैदिक गणित नामक भूलथापांना बळी पडतात. वैदिक गणित म्हणजे स्युडोसूत्रबद्ध पद्धतीने मांडलेले कैक भारतीय व युरोपियन अल्गोरिदम्सचे रीपॅकेजिंग आहे. गणित आणि संस्कृत दोन्ही येणारे लोक अल्पसंख्य असल्याने ते भाव खाऊन गेले. साला आमचं नशीबच खराब. आम्हीही जरा पन्नासशंभर वर्षांमागे जन्माला आलो असतो तर अशा काड्या करून फुकट प्रसिद्धी मिळवली असती.

नितिन थत्ते Mon, 16/07/2018 - 15:22

In reply to by बॅटमॅन

वैदिक गणितावर जो आक्षेप घेतला जातो की "ते वैदिक नाही" त्या आक्षेपाला माझ्यामते फार अर्थ नाही. महत्त्वाचे हे आहे की ही सूत्रे पाश्चात्यांनी शोधण्याआधी इथे शोधली गेली होती का? ती न्यूटनच्या काही काळ आधी शोधली गेली असतील अगदी नवव्या दहाव्या शतकात तरी त्याचे क्रेडीट मिळाले पाहिजे. आपल्याकडे गोष्टी "वेदकाळापासून ठाऊक होत्या" असं क्लेम करण्यात काय मजा वाटते कळत नाही. ॲक्च्युअली ज्ञान वेदात आहे असे क्लेम करणे म्हणजेच त्याचे भारतीय जनकत्व नाकारणे हे सुद्धा यांना* कळत नाही.

*यांच्याच परंपरेनुसार वेद हे अपौरुषेय आहेत (आणि श्रुती आहेत- म्हणजे कोठूनसे ऐकू आलेले). ते म्हटल्यावर त्यातल्या ज्ञानाचे जनकत्व भारतीय ऋषींकडे देता येत नाही. म्हणजे रद्दीवाल्याकडे ग्रे'ज ॲनाटॉमीचं (किंवा पी एल बालानींचे थर्मोडायनॅमिक्सचे) जाड पुस्तक असल्यासारखं आहे. त्याच्याकडे ते कुठून तरी आलेले आहे. त्याने ते सांभाळून ठेवलेले आहे इतकेच.

बॅटमॅन Mon, 16/07/2018 - 15:20

In reply to by नितिन थत्ते

१. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद- या चार वेदांमध्ये ही सूत्रे नाहीत. त्यामुळे "वैदिक" या लेबलास अर्थ नाही.

२. तुमचा मुख्य मुद्दा- पाश्चात्यांनी शोधण्याअगोदर आपण शोधलेली काही सूत्रे यात आहेत का?

माझे प्राथमिक उत्तर- ॲट बेस्ट अंशत: हो. पण अनेक सूत्रे ही तेव्हाच्या "झटपट गणित" वाल्या इंग्रजी पुस्तकांतून जशीच्या तशी ढापली आहेत. त्याचे काय? ते एक्स्पोज केलेच पाहिजे. आणि अर्थातच जर काही सूत्रे अगोदर आपल्याकडे कुणी शोधली असतील तर त्यांचेही क्रेडिट दिले गेलेच पाहिजे.

३. वेद अपौरुषेय आहेत म्हणजे त्यांचे भारतीय "जनकत्व" नाकारले जाते हे खरेच. पण म्हणून मानवी जगात ते जतन करण्याची परंपरा भारतातच उत्पन्न झाली असा युक्तिवादही करता येतोच. तेव्हा ती लाईन ऑफ ॲटॅक इथे कामाची नाही.

बॅटमॅन Mon, 16/07/2018 - 15:35

In reply to by नितिन थत्ते

ती पाहिली. त्याला उत्तर लॉजिकली दिले जाणार नाही हे तुम्हांलाही माहिती असेलच. :) त्यामुळे तशा प्रकारे अर्ग्यू करण्यात फायदा नाही इज ऑल आयॅम सेयिंग.

नितिन थत्ते Mon, 16/07/2018 - 15:56

In reply to by बॅटमॅन

रद्दीवाल्याचे उदाहरण वैदिक गणितासाठी नाही. जनरल विमानांपासून ब्रह्मास्त्रापर्यंत सगळ्यासाठी आहे.

बॅटमॅन Mon, 16/07/2018 - 16:08

In reply to by नितिन थत्ते

ठीकच. माझा त्यावर काहीच आक्षेप नाही. फक्त लोकांचे (कितीही छोट्या स्केलवर का असेना) मतपरिवर्तन घडवायचे असेल तर त्याचा उपयोग होणार नाही असे वाटते इतकेच.

गब्बर सिंग Sun, 15/07/2018 - 23:11

केंद्रसरकार अत्यावश्यक औषधांच्या यादी चे पुनरावलोकन करणार आणि आणखी काही औषधं यादीत घालणार.
.
व औषधं परवडणे आणि औषधं न परवडणे = ह्या दोन बायनेरी विकल्पांतून रुग्णांची सुटका करणार.
.
.

गब्बर सिंग Mon, 16/07/2018 - 00:29

प्रताप भानू मेहतांनी नेहमीप्रमाणे ......... इन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स चा मुद्दा उचलून धरताना थरूर यांना अप्रत्यक्षपणे निर्दोषत्व बहाल केलेले आहे. थरूर यांचे वक्तव्य हे "असॉल्ट ऑन इन्स्टिट्युशन्स" (सेनादले) चे उत्तम उदाहरण आहे. पण त्याचा उल्लेख सुद्धा नाही. बाकीचा लेख बऱ्यापैकी मस्त.
.

गब्बर सिंग Mon, 16/07/2018 - 08:26

रागां म्हणतात की चीन समोर झुकणारे मोदी हे .... पहिले प्रधान मंत्री.
.
ऑ ?
.
ऑक्टो - नोव्हे १९६२ मधे जे काही घडलं ते नेमकं काय होतं ?? गणपती विसर्जनाची मिरवणूक होती वाट्टं.
.

नितिन थत्ते Mon, 16/07/2018 - 12:33

In reply to by गब्बर सिंग

डिफरन्स आहे. तेव्हा नेहरू/सरकार झुकले नाहीत- सीमेवरच्या चौक्या हटवल्या नाहीत/नवीन चौक्या बांधणे चालूच ठेवले म्हणून चीनने हल्ला केला. या वेळी सरकारने अगोदरच माघार घेतली.

गब्बर सिंग Mon, 16/07/2018 - 12:57

In reply to by नितिन थत्ते

या वेळी सरकारने अगोदरच माघार घेतली..

.
नेमकी कशात व कुठे ?
.
माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स बद्दल ?
.

'न'वी बाजू Mon, 16/07/2018 - 13:51

In reply to by गब्बर सिंग

माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स??????

नाही म्हणजे, युद्धात सैनिक अधूनमधून मरतात, याची कल्पना होती. परंतु म्हणून हल्ली भारतीय सैन्यात थेट प्रेतेच भरती करू लागले आहेत की काय?

(तुम्हाला कदाचित माऊंटन स्ट्राईक कोर म्हणायचे असावे काय?)

अनुप ढेरे Mon, 16/07/2018 - 14:08

In reply to by 'न'वी बाजू

झाँबी आर्मी कल्पना भारी आहे. वॉल्डेमॉर्टकडे होती. (इन्फेराय नावाने बहुदा.) पण त्याने ती कधी वापरल्याचं लक्षात नाही.