अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा/जाईल.
===========
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची एक चांगली मुलाखत. चांगली म्हणजे मला तरी कळली बॉ. एरवी आर्थिक बाबतीतलं आपल्याला काही कळत नाही.
ज्योतिषापुढे विज्ञान खुजे - महनीय सांसद पोखरियाल
भाजपाचे एक महनीय सांसद आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल ह्यांनी संसदेत एका चर्चेदरम्यान प्रतिपादले, की विज्ञान ज्योतिषाहून खुजे आहे. कणाद ऋषींनी लाखो वर्षांपूर्वी अणुचाचणी केली होती असेही ते म्हणाले. जय ज्योतिष! जय हिंदवी संस्कृती!! जय हिंद!!!
विज्ञान व ज्योतिष यांची तुलना
विज्ञान व ज्योतिष यांची तुलना करणे चूक आहे. कोणी केली तर एक पक्ष घेऊन त्याला मूर्खात काढणे चूक आहे. ज्योतिषात कालमापन, सूर्यमाला यांचे बसिक फंडे आहेत. ते शास्त्रीय आहे. गॅलिलिओ युरोपात त्याच्या ज्ञानामुळे महान बनत असताना (कम्यूनिकेशन असते तर) आमच्या उदगीरच्या ब्राह्मण गल्लीतले पोर त्या एकूण नाटकाकडे पाहून हसत सुटले असते. (हिस्टॉरिकल फॅक्ट्स - पीपल मे करेक्ट मी). फलज्योतिष टोटल बकवास असू शकते. आहेच हे सिद्ध झालेले नाही. राहायला पृथ्वी, उर्जेसाठी सूर्य, पाण्यासाठी आणि डीएनएसाठी कॉमेट्स, अनावश्यक इंपेक्ट्स टाळण्यासाठी इतर ग्रह अशी थीम बनत आहे. म्हणून इतर ग्रहांचा इतर काही रोल नाहीच हे पृथ्वीवरील जीवनाची, देहांची अजून बरीच शास्त्रीय उकल झाल्याखेरिज म्हणता येणार नाही. मनोबाचा तो पलिकडल्या गेलॅक्सीतला उंट अस्साच नाकारता येत नाही. ते सिद्ध करावं लागतं. म्हणून कोणाला या ज्योतिषाच्या पॅकेजचा अभिमान असेल तर असू देत.
---------------
थोडक्यात विज्ञानाकडे पुरेसा पुराव्यांचा, सिद्धातांचा दारूगोळा येईपर्यंत त्याने अशा लोकांचे समज उपहासू नयेत. त्याचेकडे असा दारूगोळा येईलच अशी बढाई मारू नये. कारण तेही प्रतिउपहासास तितकेच पात्र आहे.
थोडक्यात विज्ञानाकडे पुरेसा
थोडक्यात विज्ञानाकडे पुरेसा पुराव्यांचा, सिद्धातांचा दारूगोळा येईपर्यंत त्याने अशा लोकांचे समज उपहासू नयेत. त्याचेकडे असा दारूगोळा येईलच अशी बढाई मारू नये. कारण तेही प्रतिउपहासास तितकेच पात्र आहे.
विज्ञानाकडे पुराव्यांचा, सिद्धातांचा दारूगोळा नैय्ये/ कमी आहे असे तुमच्या प्रतिसादातून ध्वनित होतेय. तेव्हा सरकारचा विज्ञानाच्या क्षेत्रातील रोल (भूमिका) मर्यादित करावी का ? मर्यादित म्हंजे सरकारने संशोधन वगैरे करण्यापेक्षा प्रूव्हन सायन्टिफिक बाबी / व तंत्रज्ञान वापरावे व ते ही संशोधनापेक्षा सेवा देण्यापुरतेच - म्हंजे फक्त अॅप्लिकेशन वर भर द्यावा. हे तुम्हास कितपत संयुक्तिक वाटते ???
व्यक्तिशः माणसाच्या
व्यक्तिशः माणसाच्या प्राधान्यांचा एक क्रम असतो. शिवाय अखंड मानवजातीच्या उद्दिष्टांचा एक क्रम असतो. स्वतः मानवांची संख्या ऑप्टीमम ठेवण्यासाठी नि त्या संख्येतल्या प्रत्येक व्यक्तिची प्राधान्ये परिपूर्ण करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, इ स्रोतांचा उचित वापर करू शकणार्या मानवी संस्था अगोदर स्थिर होताना दिसल्या पाहिजेत. जनसंख्या किती आहे आणि प्राधान्ये नीटपणे पूर्ण केली जाऊ शकतात यांच्यात एक रेसिप्रोकल रिलेशन आहे. म्हणजे जगात १ करोडच लोक असले तरी ते सुखी राहणार नाहीत कारण त्यांच्यापैकी प्रत्येका फक्त जगत राहण्यासाठीच प्रचंड काम करावे लागेल. तसेच १५०० करोड लोक असेल तर स्रोत कमी पडतील, कॅओस होईल. लोकसंख्येचा ट्रेंड म्हणून लिनिअर अॅंड अपवार्ड नसावा. तो एका बँडमधे असावा. यावर पुरेसे काम होण्यापूर्वीच विज्ञान दीर्घायुष्य, अनैसर्गिक दीर्घायुष्य (पृथ्वीच्या बहिणीकडे जायला वेळ लागतो म्हणून?) आणि अमरत्व यावर काम करत आहे.
अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षा, मनोरंजन, बाल आणि वृद्ध अवस्थेत चांगले जीवन, मनःशांती, स्थैर्य, ज्ञान, स्वच्छता, आरोग्य, इ इ ही माणसाची इतर प्राधान्ये आहेत. त्याच प्रमाणे आजूबाजूचा समाज, त्याच्या व्यवस्था, निसर्ग, पुढे येणार्या पिढ्यांसाठी सस्टेनॅबिलिटी, निसर्गसौंदर्य, भूतदया, जगत्कारणाचा उलगडा होणे, खेळ, छंद, इ इ प्राधान्ये आहेत. पैकी कोणत्याही प्राधान्यांचा नीट क्रम लावता येत नाही. जे नसते, कमी असते, धोक्यात असते, आवश्यक असते, इ इ ते मनात सर्वात मोठे प्राधान्य असते.
आजघडीला अध्यात्मिक व धार्मिक वगळता जवळजवळ सगळ्याच संस्था विज्ञानाच्या डिक्टमखाली चालतात म्हणणे चूक नसावे.
आजच्या आणि भविष्यतल्या जागतिक समाजासाठी वर उल्लेखलेली प्राधान्ये काय आहेत त्यांचा काही रोडमॅप आहे का? समाजाची प्राधान्ये काय आहेत आणि वैज्ञानिक संशोधने कोणत्या दिशेने जात आहेत यात काही सांगड आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. ज्या उच्चभ्रू लोकांच्या हातात सार्या सत्ता (राजकीयच नव्हे) ते आपल्या जिज्यासापूर्तीसाठी वैज्यानिक संशोधन जितक्या खोलात करणे संभव आहे तितक्या खोलात जाऊन करत आहेत. अशा संशोधनाचं बायप्रोडक्ट हे समाजाला मूळ समाजोपयोगी संशोधन म्ह्णून विकले, दाखवले जात आहे. म्हणून उच्चभ्रूंसाठी संशोधन इंप्लिमेंट झालं कि विकास तिथेच थांबतो. सामान्य जनांपर्यंत पोचत नाही. ते प्राधान्यच नसतं.
लोकांच्या मनात जनरली सरकार सांगतंय ते सगळंच महत्त्वाचं असतं अशी भावना असते. यमुना स्वच्छ होणं महत्त्वाचं आणि मंगलयानही महत्त्वाचे. पण यमुना स्वच्छ होणे असंभव आहे म्हणणे आणि मंगलयान यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत नेऊन बसवणे (हे तर खरेखुरे रॉकेट सायन्सच आहे ना राव?) ही इथल्या उच्चभ्रूंची मानसिकता दाखवते.
सायन्सच्या डोमेनमधे अब्स्ट्रअॅक्ट, रिसर्च, प्रूवन, अंडर अप्प्लीकेशन हे चार सवते कंपार्तमेंट नसतात. एक सलग स्पेक्ट्र्म असतो. प्रत्येक प्राधान्यासाठी काय आवश्यक आहे, प्रत्येक संशोधनाने काय साधते हे पाहून सरकारने कोठे काय करायचे ते ठरवावे. माझा प्रतिसाद अबस्टॅक्ट संशोधनावर सिमित होता (वैज्ञानिकांनी खालच्या प्रतलावर इ इ लिहिले आहे वरच्या एका प्रतिसादात). फाटकी चड्डी घालून सहा आकडी गु़णाकार तोंडी केल्याचे भूषण मिरवू नये. तुम्ही ज्यांचे फॅन आहात (तुम्ही स्वतः नाही) असे श्रीमंत लोक (त्यांचे प्रतिनिधी देश म्हणा) त्यांची जिज्ञासा मिटवण्यासाठी महागडे संशोधन करू देत.
----------------------------------
बाय द वे, मला सरकारबद्दल काही बोलायचे नव्हते, तू त्याला खेचून आणलेस. मानवजातीवर होणार इष्टानिष्ट परिणाम स्पष्ट कळत नाहीत तोपर्यंत संशोधन करावे , राबवणूक करू नये असे मी म्हणत होतो.
इथे विनोदी श्रेणी देऊन ऐसीचा
इथे विनोदी श्रेणी देऊन ऐसीचा अव्हरेज आय क्यू खाली आणणारा कोण असेल?
आक्षेप
कुणी आपल्या घरात्/दारात्/टेलिफोनवर/संडासात जर ज्योतिषाबद्दल काहीही बोलत असेल, तर बोलूच देत. कुणीच काही म्हणत नाही त्याबद्दल.
पण संसदेत जेव्हा असे आगंतुक निष्कर्ष काढले जातात तेव्हा त्यावर टीका करायलाच हवी.
मिथकी मिथकी दुजाभाव
संसदेत काय बोललं जावं आणि काय नये याबद्दल कोणत्या निकषावरून आपण असे म्हणत आहात? संसद आधुनिक विज्ञानालाच बांधिल नाही. घटनेत "...आम्ही भारतीय, स्वता:स ..., .., ..., केवळ आधुनिक विज्ञान मानणारे, .... इ इ घोषित करतो असे कुठे उल्लेखलेले नाही. कोणते विज्यान मानावे हे व्यक्तिच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यात मोडते.
तुम्ही ते विधान असत्य आहे म्हणा, अर्धसत्य आहे म्हणा, स्पॅम वाचून पाठ केलेले आहे म्हणा, किंवा स्वतःच्या संस्कृतीच्या सात्विक अभिमानातून पण कमी अनालिसिस करून लावलेला अर्थ आहे म्हणा, असं अजून काही म्हणा, ते चालेल. पण असं विधान संसदेत करून नये? का? आजच्या भारतीय संस्कृतीची कितीतरी अंगे आधुनिक विज्ञानापासून दूर आहेत. अगदी रामनवमीला देशाला सरकारी सुट्टी देणे देखिल प्रचंड मोठा विनोद असू शकतो. रामच नसू शकतो, नवमीला जन्मलेला राम आणि खरा राम हे दोन वेगळे लोक असू शकतात किंवा त्याच्या जन्माबद्दल कोणतीही खरी माहिती नसू शकते (कारण रामायणात अर्ध्याच्यावर अव्यवहार्य असा अवैज्ञानिक मसाला आहे.). संसदेत रामनवमीबद्दल बोलावे कि नाही? रामाच्या कथेतील त्याचा जन्म आणि इतर हजारो मिथके संसदेत बोलण्यापासून बॅन आहेत का? मग ते मिथक आणि हे मिथक (आणि उच्च प्रतलीय विज्ञान नावाचे मिथक (ते कसे हा वेगळा विषय आहे.))यांना वेगळा दंडक का?
आक्षेप २.०
"त्या" बोलण्यावर टीका करायलाच हवी असं म्हटलं होतं, बोलायला नको असा मुद्दा नाही.
@कणाद, अणुस्फोट आणि ज्योतिषः रहावत नाही म्हणून -
आधुनिक तंत्रज्ञान-जे विज्ञानावर आधारित आहे- त्याचा यथेच्छ वापर करून मग ज्योतिषाचा, पुरातन तंत्रज्ञानातील तथाकथित प्रगतीचा पुळका येत असेल तर ते निखालस ढोंग आहे.
नवे तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या गोष्टी(गाड्या, फोन, पंखा, वीज, जनित्रं, गॅस शेगडी, टोस्टर, बूट,चप्पल,मसणातील विद्युतवाहिनी) खुशाल वापरायच्या, आणि मग त्यांचाच (पहा: इंटरनेट, माउस, कळफलक, काँप्यूटर, सॉफ्टवेअर वगैरे) वापर करून त्याविरोधात बोंब मारायची हे सगळं भयानक विनोदी आहे.
जर अशा एखाद्या पुरातन विद्येचा तितकाच अभिमान असेल तर त्या विद्येचाच रोजच्या जीवनात वापर करून मग तिची जाहिरातबाजी करायला हवी. ज्याला dogfooding असं म्हणतात.
ज्योतिषविद्या ही विज्ञानापेक्षा श्रेष्ठ मानता? हेल्मेट वापरू नका, विम्याचे पैसे वाचवा, मुलांच्या भविष्यातील करीअरबद्दल खात्री बाळगा इ.इ. थोडक्यात ज्योतिषातर्फे जे जे काही predict करू शकता त्या गोष्टी करा, आणि त्यासाठी कृपया विज्ञान्/तंत्रज्ञान वापरू नका.
बाकी तुमचा नक्की कुठल्या गोष्टीवर राग आहे हे समजत नाहीये तेव्हा पास.
अस्वलभाऊंच्या मतामागील
अस्वलभाऊंच्या मतामागील भावनेशी सहमत.
रमेश पोखरियाल यांचे "ते" विधान त्यांनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करूनच केलेले होते. त्यांना जसे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तसे इतरांना ही शाब्दिक आक्षेप घ्यायचे स्वातंत्र्य आहे.
अरुणजोशींना प्रश्न - रमेश पोखरियाल यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही एक बाब सोडली तर इतर आणखी कोणती बाब आहे की जिच्या बचावार्थ अरुण जोशींचा लढा चालू आहे ?
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा इथे
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा इथे प्रश्न नाहीय. अस्वलभाऊंचे, आपले, माझे आणि पोखरीयाल यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य कसकसे आहे मुद्दा नाही. "आधुनिक विज्ञान हे प्राचीन विज्ञानासमोर ठेंगणे आहे" या विधानात तथ्यांश किती प्रमाणात आहे हे सांगायचा माझा प्रयत्न चाललाय. ते १००% खरे वा खोटे नाही तेव्हा अगदी अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाहेरही अशा विधानांना हसण्यावारी नेण्यात येऊ नये वा कुठे बंदी घालू नये.
उदाहरनार्थ अस्वलभाऊ म्हणतात संगणक, किफलक, इ इ आधुनिक विज्ञानाच्या देणग्या "फुकटात", "यथेच्छ" वापरून त्याच्या तुलनेत प्राचीन विज्ञानाचा जयघोष करणे हास्यास्पद नि केविलवाणे आहे. मी विचारतो - अस्वलभाऊ संगणक आणि किफलक जी भाषा लिहिण्यासाठी लिहिण्यासाठी वापरतात ती "भाषा" हा कधीचा शोध आहे? रंगमंचावरचे ध्वनि, प्रकाश आधुनिक पद्धतीने आता हाताळले जाते, पण मूळात नाटक, अभिनय या संकल्पना कधीचा शोध आहे? तस्संच ज्योतिष शब्द हा तितका ववळा नाही. त्याचा उच्चार कुठे अशा प्रकारे झाला असेल तर आक्रीत घडले आहे असे वाटायचे कारण नाही. कारण त्यात अल्पांश का होईना शास्त्रीय आहे (कालगणना आणि अॅस्ट्रॉनॉमी) नि शिवाय त्याला एक सांस्कृतिक इतिहास आहे. ईंग्लडला राणी असू शकते तर आपल्याला ज्योतिषाचा अभिमान का असू शकत नाही? आणि अभिमान जाऊ द्या संडासबाहेर बंदी का असावी? संसदेत रॅशनल, शास्त्रीय, लॉजिकल, आधुनिक अशीच भाषा वापरावी म्हणायचे असेल तर लोकसभा टीवीवर कधी तासभर ओनलाईन प्रक्षेपण पहा आणि प्रत्येक विधानाचा वरील चार क्रायटेरियावर अनालिसिस काय? समत्व दाखवा. सांस्क्रूतिक बाबींचेच इतके वावडे का? १०० कावळे संसदेत काहीबाही काव काव करतात, तुम्हाला बरी सांस्कृतिक कावळ्याचीच कावकाव ऐकू येते? ज्योतिष लै भारी आहे, पोखरीयाल यांचं विधान सत्य आहे असं मी म्हणालो नाही (सायंटिफिक मेथड चा रिमार्क वजा जाता), मला ज्योतिषात काही राम आहे असं वाटत नाही (पण हे सांगाबं का लागावं?), पण कोणतंही सांस्कतिक विधान ऐकल्यानंतर पुरोगामी हडबडून जागे होतात नि इतर तसले, त्यापेक्षा वाईट सगळे सोडून त्यावर सडकून टिकून करू लागतात, हे काय?
आज बराच वेळ आहे, तेव्हा...
१. तुमचा नक्की आक्षेप काय आहे ते अजूनही स्पष्ट नाहिये. विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, अशा अनेक सोंगट्या तुम्ही लीलया हलवल्या आहेत. एक मूव्ह करा आणि त्यावर बोला. प्राचीन विज्ञानाचे तुम्ही पुरस्कर्ते असाल, तर मूळ विधानाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? "कणादांनी केलेला अणुस्फोट". त्यावर काही माहिती आहे का? नसल्यास त्या विधानाला "बोगस" म्हटल्याबद्दल तुम्हाला का राग यावा?
२. भाषा, नाटक अभिनय - ह्याचा आणि मूळ विषयाचा काय संबंध आहे? तुमचे याआधीचे कुठलेही प्रतिवाद या संबंधी नाहीत. [ पण हा वेगळा मुद्दा आहे तेव्हा त्याबद्दल वेगळी चर्चा होऊ दे]
३. मी पुरोगामी वगैरे अजिबात नाही. एक साधा सामान्य माणूस आहे आणि माझा वैयक्तिक राग आहे. कृपया पुरोगाम्यांपर्यंत (अजून तरी) जाऊ नये.
४. पोखरियाल ह्यांचं विधान सांस्कृतिक? म्हणजे ज्योतिष ही आता सांस्कृतिक बाब आहे का? विधान एक मध्ये तुम्ही म्हणालात की ते प्राचीन विज्ञान आहे, ज्याचा तुम्ही पुरस्कार करता आहात.
तेव्हा मिलॉर्ड, विधान १ आणि ४ तर्कविसंगत आहेत. पुन्हा एकवार मुद्देसूद प्रतिवाद केल्यास मंडळ आभारी राहील.
आधुनिक तंत्रज्ञान-जे
कोणते तंत्रज्ञान कोणत्या विज्यानावर आधारित आहे? हे सगळे तंत्रज्ञान, विज्ञान खरे तर फक्त एक निरीक्षणवाद आहे. त्यात तर्क संगत स्पष्तीकरण ... असूच द्या.
नाही. पण मी वाचलेल्या ज्योतिषाच्या पुस्तकात त्याचे दोन भाग आहेत असे लिहिले होते. काल आणि फल ज्योतिष. काल ज्योतिष मधे बराच विज्ञानाचा भाग आहे. ज्योतिष हा शब्द इतकाही घाण नाही कि सरळ संडास आठवावी. उत्क्रांती वा डार्विन यांचे वियान म्हटले की मला हिटलर वा आफ्रिकेतले नरसंहारच आठवायला पाहिजेत का? अणुविज्ञान म्हटले कि नागासाकी, हिरोशीमा?
काहीच्या काही
मी जे लिहिलंय त्याचा भलताच अर्थ काढलाय तुम्ही- म्हणून हे स्पष्टीकरण.
ज्योतिषाबद्दल खाजगी वावरात काहीही बोला, पण संसदेत जर अघळपघळ बोललात तर टीका स्वीकारायची तयारी ठेवा. एवढं आणि एवढंच मला म्हणायचं होतं.
प्रतिसादांत तुम्ही त्याचा भलताच अर्थ घेतलेला आहे- तो भरकटलेला आहे. आणि विषयाशी संबंधित तुलना केली तर ते उपयोगी ठरेल. ह्यात डार्विन्,हिटलर, नरसंहार वगैरे नेहेमीचे यशस्वी खेळाडू न आणलं तर बरं.
आणि संडासावरच तुमचा एवढा भर का? त्यात काहीतरी भयानक घाण आहे असं तुमच्या प्रतिसादातून ध्वनित होतंय. असो!
मिथकाबद्दलची मिथके
@जनरल सदस्य-
ऐसीवरचे सदस्य विज्ञानाला प्रश्नांकित केले कि डीफेंड करायचा प्रयत्न दिसत नाही. वैज्ञानिक विषयावरील चर्चा जेव्हा गहन होत जाते तेव्हा विज्ञानातील उणिवा समोर येतात. असा विज्ञान - परंपरा विसंवाद प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात चालू असतो. म्हणून प्रत्येक माणसाचे वर्तन, थोडे का होईना, मग तो विज्ञानाचा जाणकार असो वा नसो, पेक्यूलिअरली अवैज्ञानिक असते.
---------------
आधुनिक विज्ञान ते खरे आणि परंपरागत सारे ज्ञान ते भाकड असे मानले कि संपलेच*!!! आधुनिक उच्च प्रतलीय विज्ञानाची कोणत्याही विषयावरील बहुतांश विधाने १००-२०० वर्षांनी पूर्ण कोलांटी उडी खातात. आणि एरवीही कधी अशी विधाने सार्या इतर वैज्ञानिकच ज्ञानाशी सुसुत्र नसतात. तरीही सांप्रत विज्ञानच मानायचे शिवाय परंपरांना वाळीत टाकायचे असा पुरोगाम्यांत प्रघात आहे.
पारंपारिक ज्ञान त्यामानाने स्थिर आहे. मग त्याची चिकित्सा तरी करायला नको का? त्याला कचर्यात काढायची पद्धत (निघणार असेल तर) सन्मानाची नको का? भारतीय ज्योतिषशास्त्राने कालमापन (पळ ते युग ते ...) आणि सौर्यमाला यांची बरीच माहिती प्राचीन काळापासून जनमानसात ठेवली आहे. पॅसिफिक मधल्या एका रँडम बेटावरच्या लोकांना आकाशात १. सूर्य, २. चंद्र, ३. तारे इतकेच काय ते माहित असावे. पण काही हजार वर्षांपूर्वी सूर्यमालेच्या ग्रहांची नावे अगदी सामान्य भारतीयाला माहित होती. हे काहीही विचारात न घेता ज्योतिष म्हणजे भाकड हे समीकरण मांडणे कितपत सयुक्तिक आहे? भारतीय तत्त्वज्ञानात शाश्वततेला महत्त्व आहे. म्हणून जगाची शाश्वत सत्ये, शाश्वत मूल्ये यांबद्दल बोलताना सहसा भारतीयांत आधुनिकतेला तो दर्जा द्यायची वृत्ती दिसत नाही. पोखरीयाल यांचे वर्तन त्याच दिशेने आहे. पण त्याचे किती निगेटीव अर्थ काढले जाऊ शकतात याला मर्यादा आहे.
-------------------------------------
@अस्वल
चिकित्सा करताना पारंपारिक आणि अपारंपारिक शास्त्रशाखांची चर्चा इक्विटेबली करावी.
१. आता हिग्ज बॉसॉन लंपास झाला आहे, कधीकाळचे सुपरहीट ब्लॅकहोल त्याच मार्गावर चालू लागले आहे, तेव्हा अॅस्ट्रोफिजिक्सचे, सर्नचे नाव संसदेत बॅन करून फक्त घरात, संडासात घ्यावे काय?
२. आजपर्यंत आपण स्वतःस होमो सेपियन्स मानत होतो. आता सिद्ध झाले आहे कि आजचे आपण हे मागचे निअँडरथॅल्स आणि होमो सॅपियन्स यांची ब्रीड आहोत. ब्रीडला ओरिजनल स्पेसिस म्हणता येत नाही. म्हणजे आपण होमो सेपियन्स नाहीत. म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या आपण होमो निअँडर्थॅल्स असले काहीतरी आहोत. याचे प्रचंड परिणाम आहेत. गॅलेक्सीतले ब्लॅकहोल काढल्यासारखा प्रकार आहे हा मानवाचा उद्गम शोधताना. आता मावनवंशशास्त्र आणि संबंधित विषय संसदेत बॅन करून फक्त घरात, संडासात पर्मिट करावेत का?
------------------------------
विधानाचा सुपरिणाम जास्त मोठा आहे:
फलज्योतिषशास्स्त्र हे कंप्लीट भाकड असू शकते. (पोखरीयाल यांनी सांगीतलेली अणूचाचणी, लाखोवर्षे हे तर आहेतच) त्याचा वापर सामान्य लोकांना लुटण्यासाठी झाला तर ते मिनेस हळूहळू नष्ट कसे करावे हा प्रश्न आहे. पण फलज्योतिषशास्त्र हे खोटे आहेच हे सिद्द्ध झाले नाही. मूळात अशा प्रकारच्या सिद्धता विज्ञान देऊ शकत नाही ही सायंटिफिक मेथडची लिमिटेशन आहे. म्हणून लोकांना अशी श्रद्धा ठेवण्याचा अधिकार आहे. पोखरीयाल यांना संसदेतच काय कुठेही असा नामोच्चार करण्याचा अधिकार आहे. आणि नव्या तरुण शिक्षित (फॉर ऑल प्रॅक्टीकल पर्पोजेस डोळे अमेरिकेत जाण्यावर लागलेले भारतीय ऑडियन्स नसावेत.) देशाभिमान जवळजवळ नष्ट होत आलेल्या समाजातल्या लोकांना चेतवण्यासाठी नेत्याने स्वतःच्या अर्धज्ञानातून काही भाषण केलेले आहे. त्याचा चांगला परिणाम जास्त असेल. ज्यांना भारताची संस्कृती आणि इतिहास बकवास होता हे पटलेले आहे त्यांत मतांतर होणे असंभव आहे. प्रचंड जुन्या काळातली भारतीय कालगणना पद्धती आजच्या पद्धतीच्या मानाने किती चूक होती हे पाहिले तर पुरोगाम्यांचा अनाठायी न्यूनगंड कमी होईल हा एक साईड इफेक्ट देखिल अशा विधानांना असतो. काही लोकांमधे मात्र "पास्ट ग्लोरी" चा कंसेप्ट देशाभिमान जागवू शकतो, न्यूनगंड कमी करू शकतो.
--------------
अवांतर-
तसे हे तुम्हाला उद्देशून नाही पण "काँग्रेस ज्योतिष अॅस्ट्रॉलॉजर " असे गुगलले तर रोचक रिझल्ट्स येतात. त्यामुळे या सरकारमूळे वातावरण दूषित होतेय ही हवा उठवून द्यायच्या दुष्ट प्रयत्नांना पुरोगामी बळी पडत आहेत.
-----------------
* आपले पूर्वज किती लकी असतील? भाकडांच्या आधारावर ते ३६० कोटी (कोणी म्हणे ४६०) वर्षे जगले.
जगणे- सरव्हायव्हल
>>* आपले पूर्वज किती लकी असतील? भाकडांच्या आधारावर ते ३६० कोटी (कोणी म्हणे ४६०) वर्षे जगले.
लास्ट वाक्याचा कंटेक्स्ट सुधारून घेऊया. पूर्वज ३६०/४६० कोटी वर्षे जगले नाहीत. पूर्वजांचा वंश टिकून राहिला. पण तो टिकून राहण्यासाठी भरमसाट पोरे जन्माला घालून त्यातली अनेक रोगराईने मरत असलेली पहायला लागली. विज्ञानाच्या प्रगती*नंतर दोनच मुले जन्माला घालून ती मोस्टली रोगाने न दगावता साठेक वर्षांपर्यंत जगू शकतात.
एवढा फरक मात्र आहे.
*विज्ञानाची प्रगती असे जेव्हा म्हणतो तेव्हा बहुतांश वेळी तंत्रज्ञान आधी निर्माण होत असते आणि त्यातील विज्ञान नंतर शोधले जाते. पण ते विज्ञान शोधले की त्या तंत्रज्ञानाची पुढची प्रगती झपाट्याने होते. लसीकरणाचा शोध विज्ञानातून लागला नाही. देवीची खपली खरचटवली तर देवी होत नाहीत अशा स्वरूपाचे ज्ञान आधीपासून लोकांना होते. त्यातून लसीकरणाची कल्पना आली. लसीकरणाचे विज्ञान बनवले गेले आणि मग अनेक रोगांच्या लशी बनवता आल्या.
आपल्या अलिकडच्या प्रतिसादांतून ज्योतिष हे नवोन्मेषशाली शास्त्र आहे असा सूर भासतो. परंतु ज्योतिषी लोकांचा तसा दावा नसून ते परिपूर्ण शास्त्र आहे असा आहे.
बाकी चालू द्या.
नितिनजी आपला गैरसमज होतोय.
नितिनजी आपला गैरसमज होतोय. ज्योतिष हे श्रेष्ठ आहे आणि विज्ञान हे कनिष्ठ आहे हे विधान व्यवहार्य दृष्ट्या चूक आहेच. पण कोणत्याही विधानाचा अर्थ काढताना त्याला पार्श्वभूमी असते, त्यामागे भावना असतात, अशा भावना चांगल्याही असू शकतात, त्यात अंशतः सत्यही असू शकते, त्याला सांस्कृतिक अभिमानाचा लेप असू शकतो, इ इ इ. पुरोगाम्यांनी टिका करताना संतुलन, समंजसपणा आणि समत्व ठेवावे.
जगणे हा शब्द तुम्ही म्हणताय
जगणे हा शब्द तुम्ही म्हणताय त्या अर्थाने नसेल लागू त्या काळासाठी. पण वंश टिकण्याचे हजारो भाकड वैज्ञानिक पुराणे आणि वंश अस्तिस्तात येण्याची सात वैज्ञानिक भाकडपुराणे ज्योतिषापेक्षा "रोचक" आहेत.
----------------------------------------
@ जनरल
दोन दोन प्रतिसाद देतोय. एक व्यवहारातली चर्चा आणि एक शास्त्रीय प्रतलावरचा प्रतिसाद. हा प्रतिसाद शास्त्रीय स्वरुपाचा आहे. उत्क्रांती ज्यांनी डिटेलवारी वाचली असेल तेच मी काय म्हणतोय ते समजू शकतात. इथल्या वाचकांना माझ्या प्रतिसादांत विनोदमूल्य दिसत आहे तेव्हा अशा लोकांची कीव करून मी खाली बसतो.
भाकड वैज्ञानिक पुराणे
१. मी उत्क्रांतीची थिअरी डिट्टेलवार वाचलेली नाही. माझे उत्क्रांतिवरचे सर्वात सखोल वाचन हे राजेश घासकडवी यांच्या उपक्रमावरील मालिकेएवढेच आहे.
२. जेव्हा उत्क्रांतीची थिअरी मांडली जात होती तेव्हा सुरुवातीला एकापेक्षा जास्त हायपोथिसिस होती त्यापैकी बाकीची हायपोथिसिस पुराव्यांवर टिकली नाहीत (उदा. लॅमार्कचे हायपोथिसिस) ती मागे पडली बाद केली गेली. तेव्हा सात पुराणे असण्यात गैर काहीच नाही.
३. याचे समांतर उदाहरण विश्वनिर्मितीविषयात सापडते. सुरुवातीच्या काळात (पोस्ट जनरल रिलेटिव्हिटी & क्वांटम मेकॅनिक्स) बिग बँग, स्टेडी स्टेट, पल्सेटिंग अशी विश्वनिर्मिती विषयी विविध हायपोथिसिस मांडली गेली. त्यापैकी पुराव्यांच्या आधारे बिग बँग थिअरी सर्वात यशस्वी ठरली आहे. साधारण विसाव्या शतकाच्या अखेरपासून बिग बँगविषयी शास्त्रज्ञांना सर्वात जास्त विश्वास आहे. तरीही बिगबँगनेच विश्व निर्माण झाले असा दावा अजूनही शास्त्रज्ञ करीत नाहीत असे वाटते. (नारळीकर मात्र स्टेडीस्टेटला चिकटून आहेत असे दिसते).
४. "न्यूटनचे फिजिक्स आइनस्टाइनने चूक ठरवले" असा पॉप्युलर समज सामान्य वाङ्मयातून पसरलेला आहे. तसे समजले तर न्यूटनने* २०० वर्ष भाकड विज्ञान सांगितले असे विधान करता येईल. पण आइन्स्टाइनचे फिजिक्स हे न्यूटनच्या फिजिक्सचे विस्तारीकरण आहे.
एका दृष्टीने सर्व हायपोथिसिस सुरुवातीस भाकड पुराणेच असतात.
*न्यूटनच्या फिजिक्समधले सगळेच काही न्यूटनने शोधलेले नाही. रिलेटिव्हिटीपूर्व आणि गॅलिलिओत्तर फिजिक्सला न्यूटनचे फिजिक्स असे नाव दिले आहे.
अशी चर्चा अत्यंत उपयुक्त आणि
अशी चर्चा अत्यंत उपयुक्त आणि प्रासंगिक आहे. योग्य ते मुद्दे घेतल्याबद्दल धन्यवाद. सध्याला एकच विधान घेतो.
विकिपेडियावर एक अबायोजेनेसिस म्हणून पान आहे. ते अवश्य वाचा. त्यात निर्जीव भौतिक मूलद्रव्यांतून पहिला सजीव कसा बनला त्याच्या सात थेर्या आहेत. त्याला मी सप्तपुराणे म्हणतो. त्यावर माझा नी घासकडवींचा मस्त संवाद ऐसीवरच झालेला.
तुमच्या "गैर काहीच नाही" वर खालील भाष्य आहे. (लिखाणात खाली काही सवलती घेतल्या आहेत. पण सत्य एक सत्य हा पाढा लक्षात ठेऊन)
मी - अबाजेनिसेसिस मधे सात ऑप्शन्स आहेत्.आजचा आपला अनालिसिस ओप्शन्सच्या स्टडीवर आधारित आहे. एका ऑप्शनच्या जागी इतिहास म्हणून दुसरे सत्य मानले तर इतिहासपट प्रचंड बदलतो. शिवाय दुसर्या ऑप्शनची प्रोबॅबिलिटी दुसर्यापेक्षा फारच वेगळी असते.
घासकडवी - जितके ऑप्शन्स जास्त तितकी ती थेरी खरी असण्याची शक्यता जास्त!
मी - हे कशावरून?
घासकडवी - कारण एका ऐवजी दुसरे ऑप्शन सत्य असू शकते.
मी- सारे सजीव एकाच मूळ सजीवातून आले याची शक्यता ते दोन मूळ भिन्न सजीवांतून आल्यापेक्षा प्रचंड प्रचंड जास्त आहे.
घासकडवी - ठिक आहे. पण एक ऑप्शन हुकले तर दुसरे आहेच.
मी - ती दुसरी शक्यता "एकावर तीनहजार शून्ये" इतके पट कमी आहे.
घासकडवी - त्याने काय फरक पडतो ? शेवटी शक्यता आहे ना?
मी - मग एका देवाच्या थेरीऐवजी ३३ कोटी वेगवगळ्या वर्णनाचे देव आहेत असे म्हटल्याने "एका विशिष्ट वर्णनाचा एक देव आहे" ही शक्यता फारच बळावते.
घासकडवी -म्हणणे वेगळे आणि थेरी वेगळी*.
मी - पण शक्यता किती आहेत नि त्यातली प्रत्येक किती शक्य आहे याने सत्य काय आहे हे कसे काय सांगीतले जाऊ शकते. एक थेरी आणि तिची १००% शक्यता ही वैज्ञानिक पद्धत नव्हे काय? शक्यतांची संख्या वाढल्याने तुम्ही खुश कसे होता. हळूहळू इलिमिनेशन झालं पाहिजे नक्की सत्य काय ते सांगीतलं पाहिजे.
----
हा मूळ संवाद दोनच वाक्यांचा आहे, मी इथे थोडा खेचला आहे.
उत्क्रांतीचा पायाच मूळी प्रचंड डळमळीत आहे आणि कोणी त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. पहिल्या उत्क्रांत सजीवापासून ते मानवापर्यंत अगदी "अधिकृत विज्ञानाचा सखोल इतिहास" आहे तो उथळ आणि हास्यास्पद आहे. म्हणजे पिच्चरमधे बालहिरो उडी टाकून जमीनीवर पाय ठेवतो तेव्हा २५ वर्षांचा झालेला असतो तसा आहे. पहिल्या सजीवाने "कोणते ऑर्गॅनिक मॅटर खाल्ले" नि दिवस काढला इथपासून बोंबाबोंब. गुगलून पाहा. म्हणून मी ४६० वर्षे जगणे म्हणतो मधे मधे. त्याचे कारण कि जनतेला मधले एक एक पिक्चर दाखवणार्या वि़ज्ञानाला मधले ९९% डीटेल्स माहित नाहीत. म्हणून अधुनिक विज्यान व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात आस्ते आस्ते.
हजारो पुराणे, त्यात हजारो उणिवा आणि व्यक्तिगत, सामाजिक, जागतिक जीवन फॅशन मधे असलेल्या थेरीला अॅडजस्ट करून घेण्यात सामान्यांची फरफट होते शिवाय ती थेरी नुसतीच "प्रोमिसिंग" असते कि "सबस्टान्स" असते हे महत्त्वाचे. कारन त्या थेरीची या तिन्ही प्रतलांत जबरदस्त सोशल कॉस्ट असते.
---------------
* आता देवाची देखिल एक थेरीच नाही का?
...
लहानपणी ऐकलेल्या 'राजाचे नवे कपडे' या सुप्रसिद्ध गोष्टीची या वाक्यावरून का कोण जाणे, पण आठवण झाली. असो.
उत्क्रांती ज्यांनी डिटेलवारी
नाही बुवा.
डार्विनचं 'ओरिजिन ऑफ स्पीसीज'; कार्ल सेगन, रिचर्ड डॉकिन्स, यांची वेगवेगळी पुस्तकं, उक्रांतीय मानसशास्त्रासंदर्भात डेव्हीड बस आणि जेफ्री मिलर यांची पुस्तकं वाचलेली आहेत. आणि तुम्ही जे म्हणत आहात ते समजून-उमजून लिहिलेलं असल्यास विनोदी आहे, नसल्यास निरर्थक आहे असा माझा ग्रह झाला.
अन्यथा राजाचे नवे कपडे याबद्दल 'न'वी बाजूंशी सहमत.
विज्ञानावरची श्रद्धा, विश्वकारणाचे स्पष्टीकरण म्हणून अंधश्रद्धआह
नबीबाजूंच्या गोष्टीची लिंक मी उघडलेली नाही. पण तुमचा हा प्रतिसाद वाचून मला माझ्या आयुष्यातल्या एका फेजची आठवण झाली. तेव्हा मी अतिकट्टर नास्तिक होतो. देव नसतो हे मला सिद्ध झाले होते म्हणा*. देव फार मोठी संकल्पना आहे, ती तर असूच द्या, विज्ञान, उत्क्रांती, निसर्गाचे नियम यांना आधार मानून मी सारी मानवी मूल्ये कचर्यात काढली होती.** व्यक्तिगत आयुष्यात! देव नाही, उत्क्रांती अशी अशी झाली आहे, विज्ञान मी कसे वागावे याबद्दल सायलेंट आहे आणि माझा एक विशिष्ट प्रकारचा फिजिओसायकोलॉजिकल सेटप आहे. अशा तत्त्वज्ञानाच्या माणसाला कशातच काही अर्थ, सत्व दिसत नाही असा माझा अनुभव राहिला आहे. तत्त्वज्ञानाची हे समीकरण मी त्याच्या व्यवहार्य सीमेपलिकडे ताणून पाहिले आहे.
आता हे विधान वाचूनही आपणांस माझे वरचे लिहिणे निरर्थक वा विनोदी वाटत असेल तर एक उदाहरण देतो. पुरोगाम्यांचा एक विक पाँइंट आहे. एकतर ते वैज्यानिक नसतात. असले तर कोण्या एकाच शाखेचे असतात. विज्ञान हा त्यांचा देव असतो. नि असला देव काय करतो याबद्दलचा माझा अनुभव सांगतो. मी कट्टर नास्तिक असताना मला कोणी म्हटले कि गीता वाच, त्यात विश्वकारणाची सारी उत्तरं आहेत. मी अत्यंत आनंदाने सश्रद्धपणे गीता वाचायला घेतली. पाहतो तो काय - कृष्ण एक देव आहे आणि माणसाला कोण्या पदाला जायचे काही मार्ग तो आपल्या मित्राला सांगत आहे. त्यात पुस्तकात अनेक महान विचार होते पण मी ज्या कारणाने ते पुस्तक वाचायला घेतले त्याबद्दल अत्यंत फालतू स्पष्टीकरणे होती. मूळात कृष्णाला देव सुरुवातीलाच मानून, त्याचे सगळे बोलणे खरे मानून, पुढे पुस्तक वाचायचे असेल तर त्यात अर्थ काय आहे? विज्ञानाच्या पुस्तकांत, वाचकाचा विज्ञान हा एक क्वझि-देव असतो. ते खरेच आहे म्हणून पुरोगामी विज्ञान वाचायला चालू करतात. जे सांगीतले आहे त्यात किती उणिवा आणि मर्यादा आहेत हे विसरतात. आणि एका सीमेपलिकडचे प्रश्न, जे विज्ञान उत्तरू शकायला पाहिजे, ते उत्तरत वा स्पर्शत नाही. ते पुरोगाम्यांच्या मनातही येत नाहीत. पुरोगामी, विज्ञानचे उत्तर अधिकच्या संशोधनाने बदलते म्हणून मागच्या चूकीच्या थेर्या विसरतात. याच धर्तीवर सध्याचे विज्ञान देखिल निखलास खोटे असू शकते हा विचार त्यांच्या मनात येत नाही. शिवाय विज्ञान आज जे उत्तरले नाही ते उद्या उत्तरेल हा एक, का कोण जाणे कशामुळे, त्यांना प्रचंड दांडगा आत्मविश्वास असतो.
विज्ञान आणि पारंपारिक तत्त्वज्ञानांची तुलना करायची झाली तर माणसाच्या दृष्टीकोनातून आपापल्या अनुयायांसाठी दोहोंचे स्वरुप ईश्वरस्वरुप आहे नि एकाच प्रकारचे आहे. कारण चिकित्सेच्या एका सीमेपलिकडे दोन्ही सडकून मार खातात.
----------------------------------
* आजही देवाबद्दल मला काही माहित नाही. लौकिकार्थाने जीवनातल्या व्यवहारांमधे मी आजही प्रचंड कट्टर नास्तिक आहे. पण नास्तिकपणाचा माझा तात्विक पाया डळमळला आहे. त्याचं कारण ज्या विज्ञानाच्या आधारावर मी कट्टर नास्तिकपणा जोपासलेला होता ते माझ्या चिकित्सांची पूर्तता करू शकत नाही. खासकरून
** कचर्यात निघतात. आजच्या मानवांत जे इष्ट किंवा अनिष्ट मानले जाते ते सगळे देव गायब करून, विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर आधुनिक शास्त्रांचे (समाजशास्त्र, आधुनिक राजकारण, आधुनिक अर्थकारण, इ) नियम वापरून पूर्णतः उलटपूलट केले जाऊ शकते.
*** विनोदी वा निरर्थक वाटलं आणि का ते प्रामाणिकपणे सांगीतल्याबद्दल धन्यवाद.
-------------
तुमचं इतकं व्यापक वाचन असेल तर पहिल्या सजीवाने काय खाल्लं ते कळेल काय? कारण त्याला खायला इतर काही होतं याची शक्यता १०^३००० पट कमी आहे. आणि इतक्या मोठ्या पृथ्वीवर तो दुसरा सजीव तिथेच निघावा हा योगायोग ....असो.
प्रतिसाद अत्यंत
पूर्ण प्रतिसाद अत्यंत उत्कृष्ट.
स्वतःच्या केसमधेही पूर्णपणे याच क्रमाने घडलेले.. त्यामुळे आयडेन्टिफाय करु शकलो सहजच.
अर्थात हा दृष्टिकोन येण्यासाठीही विज्ञानाची थॉट प्रोसेसच कामी आली हेही नमूद करु इच्छितो.
मुळात विज्ञानाला कमी अथवा टाकाऊ समजण्याचा उद्देश नसून बहुतांश पुरोगामी विज्ञाननिष्ठांचा असा प्रॉब्लेम असतो की ते विज्ञानाची जागा आणि सध्याचा परीघ या गोष्टी न समजता त्याला वन साईझ फिट्स ऑल टाईपमधे वापरतात.
मार्मिक दिली आहे. दोन द्यायची सोय असती तर दोन दिल्या असत्या.
-(विज्ञानाचा ग्राज्वेट) गवि
>>देव फार मोठी संकल्पना आहे,
>>देव फार मोठी संकल्पना आहे, ती तर असूच द्या, विज्ञान, उत्क्रांती, निसर्गाचे नियम यांना आधार मानून मी सारी मानवी मूल्ये कचर्यात काढली होती.** व्यक्तिगत आयुष्यात! देव नाही, उत्क्रांती अशी अशी झाली आहे, विज्ञान मी कसे वागावे याबद्दल सायलेंट आहे....
हे पटलं नाही. देव कचर्यात काढल्यावरसुद्धा खोटे बोलू नये, दुसर्याला त्रास देऊ नये, फसवू नये ही मानवी मूल्ये बाकी राहतातच. समाज म्हणून राहण्यासाठी ही मूल्ये आवश्यक आहेत आणि समाज म्हणून राहिल्यास (एकट्याने जगण्यापेक्षा) जीवन सुखकर होते हे उत्क्रांतीतून समजते. देव नाही असे मानले तरी माझ्या ऐहिक सुखासाठी मला मानवी समाज करून राहणे आवश्यक वाटते. समाजाने मला सहकार्य करावे, सुरक्षितता पुरवावी म्हणून समाजातील सदस्यांचा विश्वासघात करणे अयोग्य आहे हे मला समजते. त्यामुळे देवाच्या अभावीसुद्धा मी ही मानवी मूल्ये मानतोच. ही मूल्ये मानण्यासाठी मला देव मानण्याची गरज भासत नाही.
>>विज्ञानाच्या पुस्तकांत, वाचकाचा विज्ञान हा एक क्वझि-देव असतो. ते खरेच आहे म्हणून पुरोगामी विज्ञान वाचायला चालू करतात. जे सांगीतले आहे त्यात किती उणिवा आणि मर्यादा आहेत हे विसरतात.
जे विज्ञानाचे विद्यार्थी नसतात त्यांच्या लक्षात कदाचित या उणीवा आणि मर्यादा आहेत हे रहात नसेल पण जे प्रॉपर विज्ञानाचे विद्यार्थी असतात त्यांना त्या मर्यादा लक्षात असतात. युक्लिडच्या भूमितीत गृहीतके असतात हे त्यांना ठाऊक असते.
>>विज्ञान आणि पारंपारिक तत्त्वज्ञानांची तुलना करायची झाली तर माणसाच्या दृष्टीकोनातून आपापल्या अनुयायांसाठी दोहोंचे स्वरुप ईश्वरस्वरुप आहे नि एकाच प्रकारचे आहे. कारण चिकित्सेच्या एका सीमेपलिकडे दोन्ही सडकून मार खातात.
हेही पटलं नाही. बरेच प्राथमिक प्रयोग आपण शाळेत करून पाहतो. [जे प्रयोगसिद्ध झालेले आहे असे पुस्तकात दिलेले असते ते ही आपण स्वतः करून पाहतो. हे काहीसे रिडिस्कव्हरिंग असते. तरी आपण ते करतो]. त्यातून बेसिक विज्ञानाची गृहीतके आणि बेसिक सिद्धांत खरे असल्याची खात्री आपण करून घेतलेली असते. पारंपरिक तत्त्वज्ञानांमध्ये तसे काही आढळत नाही. त्यामुळे दोन्हींचे स्वरूप ईश्वरस्वरूप आहे हे पटत नाही.
>>देव फार मोठी संकल्पना आहे,
या भागाशी पूर्ण पूर्ण समहत! नास्तिक माणसाने प्रेम, दयामाया, सचोटी, नम्रपणा या गोष्टी गुंडाळलेल्या असतात असा समज असलेल्या व्यक्ति पाहिलेल्या आहेत.
हे कागदावर बरोबर वाटत, पण काही गोष्टी व्हेरिफाय करता येणं शक्य नसतं. उदा. मला जेव्हा डॉक्टर एखादं औषध देतात तेव्हा त्याचा गूण येणार आहे याची चाचणी मी स्वत: करू शकत नाही. औषध कंपन्या, सरकार आणि डोक्टर यांच्यावर मी शहानिशा न करता विश्वास ठेवतो. नाग चावणं विषारी असतं हेही मी पडताळून नाही पाहू शकत. मी कोणीतरी सांगतं म्हणून विश्वास ठेवतो.
दुसर्या मुद्द्यावर माझं मत
दुसर्या मुद्द्यावर माझं मत मांडतो.
वेरिफाय करणे किंवा सिद्धता याचा अर्थ थेट प्रत्येक गोष्ट स्वहस्ते प्रयोगशाळेत सिद्ध करणे असा नसून एखाद्या (उदा.) औषधाचा गुण कसा येईल याविषयीची एक ढोबळ विचारपद्धती असते ती आपल्याला पटणे असा त्याचा अर्थ आहे.
म्हणजेच ल्युकेमियाचा अमुक एक उपप्रकार हा गुणसूत्रांतल्या अमुक विकृत रचनेमुळे होतो. इम्मॅच्युअर पेशींची अतोनात वाढ रोखण्यासाठी मुळात ही विकृत रचना नलिफाय / निष्प्रभ करणे, बुजवणे आवश्यक आहे. या उद्देशपूर्तीसाठी ठराविक आकाराचे प्रथिन / विकर किंवा रेणू तयार करुन , अथवा तयार असलेला बेस्ट फिट रेणू तिथे बूच अथवा पाचर मारल्याप्रमाणे बसवणे हा उपाय करुन त्याची टेस्ट करुन तो लागू पडतोय हे सिद्ध करणे... ही वैज्ञानिक पद्धत (विचारपद्धती) झाली.
अर्थातच ही जनरलाईझ केली तर रोगाचे मूळ कारण शोधू पाहणे --> ते सापडलेच तर --> त्या विशिष्ट कारणावर टार्गेट करणारे भौतिक, रासायनिक उपाय करुन त्याची परिणामकारकता तपासणे.. असा जनरल फ्लो येईल. मग बॅक्टेरिया --> बॅक्टेरियाचे अन्नग्रहण थांबवणारी केमिकल्स त्याच्याभोवती पसरवणे --> त्याचे पुनरुत्पादन रोखणारे द्रव्य त्याच्यावर सोडणे असे उपाय बदलू शकतात, पण पद्धती तीच राहते. याला भरपूर कष्ट आणि चिकाटी लागते.
त्याचप्रमाणे अंगारा घेतला असता साईबाबांच्या कृपेने बरकत येते, अथवा रोग बरा होतो..
किंवा विषारी द्रव्य भरपूर द्रावणात मिसळून जोराजोराने हलवून विरळ करत नेले की त्याची शक्ती वाढते आणि "काट्याने काटा काढणे" तत्वाने ते द्रव्य मूळ "रोगा"ला शरीराबाहेर ढकलते.
किंवा वात कफ पित्त अश्या तीन एन्टिटीज शरीरात असतात.. त्यांच्या असमतोलाने रोग होतात.. तो रिस्टोअर केला की ते बरे होतात..
अशा बर्याच विचारपद्धती असतात.. त्यातली कोणती आपल्याला सबळ आणि "सारासार विचार" करणारी वाटते, आणि कोणती विसविशीत वाटते हा आपापला प्रश्न.
फक्त मी काय तत्वानुसार औषध घेतोय इतके समजून घेणे इतके जरी झाले तरी उत्तम होईल असं माझं व्यक्तिगत मत आहे. मग कोणालाच कशाच्या बाजूने अथवा विरुद्ध प्रचार करावा लागणार नाही. अंगार्यामुळे पॉझिटिव्ह "वेव्ह्ज" उत्पन्न होऊन वाईट नजर टळते अशी विचारपद्धती जाणून घेऊन एखाद्याला पटली तर तो त्यासह सुखी असो..!!
मूलभूत प्रश्नांत दोन्ही सारखेच मार खातात.
कारण प्रतिसादातल्या प्रत्येक विधानाला काय काय उत्तर लिहावे हा लांबलचक प्रकार आहे आणि तो एका झटक्यात होणार नाही. (आणि तस्संही मला सारांश लिहा मधे मार्क कमीच मिळायचे. आपण दोघेही ऐसीचे सदस्य बराच काळ राहू नि सगळे प्रश्न ऐरणीवर घेऊ अशी आशा आहे. ;) )
सध्याला एक विधान घेतो. एकूण प्रतिसादाचे हे उत्तर नाही म्हणून अवांतर वाटेल.
विज्ञानाच्या सध्याच्या विधानांच्या, संशोधनांच्या उणिवा आणि मर्यादा काय आहेत हा प्रचंड मोठा नि क्लिष्ट टॉपिक आहे. शास्त्रज्ञच त्यात गटांगळ्या खात असतात. विद्यार्थ्यांचे काय घेऊन बसला आहात? "विज्ञान आणि विश्वकारण" किंवा "विज्ञान आणि समाजकारण" या प्रतलावर जेव्हा आपण विज्ञान चर्चितो तेव्हा त्याला प्रचंड मर्यादा येतात.
युक्लिडच्या भूमितीत गृहितके असतात हे मान्य. आपण भूमितीतली बिंदूच्याही पूर्वीची स्पेस ही संकल्पना घेऊ. तिच्याबद्दल काय काय सामान्य प्रश्न उद्भवतात? स्पेस का असते? किती असते? तिचा आकार काय? केंद्र असते का? असले तर कोणते? स्पेस असते का नसते (भाषेचे दौर्बल्य - म्हणजे स्पेस म्हणजे काहीही नसते असे म्हणतात तेव्हा ती असते का नसते असा प्रश्न.)? तिच्यात काही नसते का? मग परवा शास्त्रज्ञ म्हणाले स्पेसमधे शून्यातून कण आणि प्रतिकण निर्माण होतात नि पुनः नष्ट होतात. मग असे शून्यातून काय काय बनू शकते? स्पेस वाकते का? ती नसलीच तर वाकते कशी? स्पेसकाळ ही संकल्पना काय आहे? ....
आता बिंदूबद्दल. बिंदू म्हणून खरे तसे काही नसते. तो मानायचा असतो. त्याचे गुणधर्मही मानायचे असतात. बिंदू संकल्पनेचा विस्तार करून पुढे बनणार्या सार्या भूमितीय संकल्पना देखिल मानल्यात संकल्पनांत जमा आहेत. एखाद्या मानलेल्या गोष्टीचे गुणधर्म खर्याखुर्या गोष्टीला कसे काय लावायचे? भूमिती रीयल लाइफ ऑब्जेक्ट पासून सुरु केली तर सुरुच करता येत नाही. मग ती गृहितके मानायची कशी? ... असो.
पुरोगामी लोक देव आणि धर्माबद्दल "मूलभूत प्रश्न" विचारण्यात हिरीरीने पुढे असतात. मात्र विज्ञानाबद्दल मूलभूत प्रश्न विचारले कि चिडिचूप. त्यांना प्रश्न - बिग बँगचे पार्टिकल कुठून आले? उत्तर -संशोधन चालू आहे. (आतल्या गोटातले उत्तर - बिग बँग झालीच कि नाही किंवा आज आपण जे झाले असे समजतो तेच झाले काही बरेच वेगळे कल्पना नाही.). मग ईश्वरविषयक तत्त्वज्ञानालाही तेच कंशेशन द्या ना. देव दाखवा म्हटले कि (सं)शोध(न) चालू आहे हे उत्तर "तितक्याच सन्मानाने" पुरोगाम्यांनी घेतले पाहिजे.
(सं)शोध(न)
कसलं (सं)शोध(न)? धन्यवाद.
कंच्या गावचं पावनं?
स्वतः, निसर्ग नि ईश्वर यांचा शोध म्हणजे अध्यात्म. मी तरी प्रश्नओपनिषदात "देव असतो का?", "कसा असतो?" या प्रश्नांवर चर्चा आहे असे वाचल्याचे आठवते. अध्यात्म या विषयात या विषयांवर प्रचंड किस पाडला आहे. असला प्रश्न विचारणे करंटेपणा आहे. भारतातल्या* देव, धर्म आणि अध्यात्म यांनी मानवासाठी विश्वकारणासाठी आणि समाजकारणासाठी एक थीम** बनवून ठेवली आहे. ती प्रत्येक भारतीयाला माहित आहे.
* अन्यत्र आमचा अभ्यास कमी पडतो.
**आत्मा नि परमात्मा यांचेवर जे तात्विक विचार (अद्वैतवाद, इ इ) ऐकलं नै का राव?
--------------------
विश्वकारणावर आधुनिक विज्ञानाचा उद्भव होण्याअगोदर नक्की काय काम झाले आहे ते बॅट्या (बहुधा नास्तिक लॉबीचा असूनही) जास्त चांगले सांगू शकेल. शशिकांत ओक यांचे "काही" इनपुट्स देखिल प्रकाश पाडू शकतील.
-------------------
ऑन अ सिरियस नोट-
देवाचे स्वरुप (म्हणजे त्या संकल्पनेचा अर्थ) काय आहे याचे प्रचंड विवेचन भारतीय अध्यात्म शाखांनी केले आहे. पण तुम्हाला जर देव म्हटले कि त्याच्या नावाखाली आडंबर माजवणार्या शेजारच्या गणपतीपूजक भटूरड्याचे चाळेच आठवत असतील तर नाईलाज आहे. मला आयवरी टॉवर (अध्यात्म, देव, धर्म) टू आयवोरी टॉवर (वि़ज्ञान) चर्चा करायची आहे. विज्ञानाच्या नावाखाली काय आडंबर (कि अवडंबर) माजले आहे याच्यावर उतरलो तर 'चर्चा कूठच्या कुठे जाईल'***.
*** जे विज्ञानप्रणित समाजाच्या बाजूचे आहेत त्यांना फार महागात पडेल यासाठी युफेमिजम.
विज्ञान ही बदलांना सहज सामोरी
विज्ञान ही बदलांना सहज सामोरी जाणारी, प्रश्न विचारू देणारी- आक्षेप घेऊ देणारी सतत घडत असलेली प्रक्रिया आहे असं मी सरसकटीकरण करेन. कुठल्याही कल्पनेला ती मज्जाव करत नाही, त्या कल्पनेच्या अनुषंगाने जे जे काही पुराव्यांनी पडताळता येईल ते ते पाहावं यासाठी उद्युक्त करणारी ऑनगोईंग प्रोसेस. त्यामुळे विज्ञानावर विश्वास असतो यातल्या विश्वासाला सुद्धा विज्ञान ही प्रक्रिया खारीज करू देण्याची क्षमता बाळगून असते.
अध्यात्माचं असं काही आहे का सांगा. मला त्याबद्द्ल फार माहिती नाही.
विज्ञानाबद्दल आपण केलेली सारी
विज्ञानाबद्दल आपण केलेली सारी विधाने सत्य आहेत हे सर्वपरिचित आहे.
-------------
अध्यात्मात देखिल आहे. प्रचंड आहे. स्वतःच्या, जगाच्या नि ईश्वराच्या भिन्न तसेच परस्परविरोधी संकल्पना अध्यात्मात आहेत. सगुण साकार एक अनेक अनंत सांत कायनू बायनू ............. अध्यात्माची कितीतरी तत्त्वज्ञाने जगात एकत्र सुखाने नांदली आहेत असे म्हणता यावे (कॅपिटलीझम आणि साम्यवाद नांदले नाहीत, भांडले, वाईट भांडले, इ इ. तसेच इतर अनेक वाद भांडले. साले इतर वाद अध्यात्माच्या मुखवट्याखाली दुसर्याच कारणासाठी भांडले. पण कृपाळू ईश्वराच्या संकल्पनेने जगातल्या लोकांना बांधून ठेवले.) "सन्मूल्यवादी नास्तीकवाद*" (जैन, बुद्ध, चीन, जपानचे धर्म" देखिल अध्यात्माच्या शाखेत मोडतो, विज्ञानाच्या नाही.
-------------------
*माझ्या विधानांत फॅक्च्यूअल चूका असतील, पण आशय महत्त्वाचा आहे. डायग्रेशन नको.
किमान बौद्ध धर्माची एक शाखा!
>> (जैन, बुद्ध, चीन, जपानचे धर्म" देखिल अध्यात्माच्या शाखेत मोडतो, विज्ञानाच्या नाही.)
याला काहीसे तिरके जाणारे विधान दलाई लामांनी केल्याचं कळतं.
"If science proves some belief of Buddhism wrong, then Buddhism will have to change."
विज्ञान आणि अध्यात्म यांचे 'शाखा'करण करून धर्म अध्यात्माच्या शाखेखाली येतो असा तरी स्टँड दिसत नाहीय इथे.
होतं असं. अडवाणी जिनांची
होतं असं. अडवाणी जिनांची तारीफ करतात कधी कधी.
चालू वर्तमानकाळ
हा झाला भूतकाळ. वर तुम्ही म्हणालात 'चालू आहे'. आता चालू वर्तमानकाळ वापरून दाखवा पाहू काय चालू आहे ते.
https://www.google.co.in/sear
https://www.google.co.in/search?num=50&site=&source=hp&q=current+resear…
उदा. मी ही लिंक
उदा. मी ही लिंक उघडली
http://www.iispirituality.org/main/Classes.asp
ह्यात थिओलॉजी वगैरेचा इतिहास समाविष्ट आहे. चालू संशोधन असल्यास दिसले नाही. अजो खरं सांगा, तुम्ही ही साईट उघडून पाहिलीत का? :प
रिझल्ट लाखो आहेत. एकच
रिझल्ट लाखो आहेत. एकच नाही.
----------------
संशोधन चालू आहे. कितीतरी फोरम्समधे. वॅटिकन सिटीबद्दल ऐकले आहे काय? इटलीमधे* आहे. मी स्वतःदेखिल मुंबईच्या विश्वविद्यालयाच्या एका प्रोफेसरांचे योगावर रिसर्चपर पुस्तक वाचायचा प्रयत्न केलेला. पण डिस्टन्स लर्निंग जमत नाही.
हे जमतं का पाहा. मी स्वतः काहीही वाचलेलं नाही.
http://serveveda.org/
-----------------
* तिकडे.
दिलेल्या लिंकेतील २ पेपर
दिलेल्या लिंकेतील २ पेपर वाचले. त्यात आजच्या वैज्ञानिक संकल्पनांची वेदांशी सांगड घालण्याचा प्रयत्न दिसला, तेव्हा हे Tangential to Spirituality आहे. असो.
..............
पण म्हणजे असं का?
की आक्षेप घेतला की लिंका दिल्या (तुम्ही स्वत: काही वाचलेलं नसतानाच)?
म्हणजे जसे जसे आम्ही काही आक्षेप घेऊ, तशा तुम्ही सर्च करून लिंका देणार आणि त्या वाचून त्याचा अर्थ काढायची जबाबदारी पुन्हा आमचीच?
भिश्क्याव प्रकार आहे.
मी केलेल्या प्रत्येक विधानाचा
मी केलेल्या प्रत्येक विधानाचा आधार देणे मला बंधनकारक नाही. हे कै कोर्ट नाही. भारतात वैदिक संशोधन (अनेक अर्थाने) खूप होते. जनरली गुगलले तर मिळायला पाहिजे. तुम्हाला होतच नाही हे माहित असले तर प्रश्न मिटला.
थँक्स. तुमचे प्रतिवाद कितपत
थँक्स. तुमचे प्रतिवाद कितपत गांभीर्याने घ्यायचे (किंवा तुम्ही स्वतः प्रतिसादात टंकलेली गोष्ट किती genuinely मानता) ह्याबद्दल शंका होती ती फिटली :)
होतं असं
होतं असं, काही शंका थोड्या उशीराच फिटतात.
>>मी केलेल्या प्रत्येक
>>मी केलेल्या प्रत्येक विधानाचा आधार देणे मला बंधनकारक नाही.
यू लेट मी डाऊन. :(
ह.घ्या.
ह.घ्या. मोड सुरू> मग आता सही बदलून ती अशी करा -
अरुण जोशींच्या अॅब्सर्ड प्रतिसादांना श्रेण्या देणार्यांचा निषेध.
ह.घ्या. मोड समाप्त>
एकतर इथे एक विरुद्ध सगळे अशी
एकतर इथे एक विरुद्ध सगळे अशी लढाई आहे. त्यात सगळे इतके भिन्न मुद्दे मांडतात कि त्याचा प्रतिवाद करताना , ते ही टंकून टंकून, नाकी नऊ येते. मग लॉहिकल आर्गुमेंट संपले कि विदा द्या. मग विद्यावर शंका. मला अध्यात्मात रुचि आली तेव्हा मी बरेच फोरम भेटून आलो, बेबसाईट पाहिल्या. आता खास इथे उपचर्चचेतल्या उपचर्चएतील एका विधानासाठी मी इतकं सगळं आठवून सांगणं मला गरजेचं वाटत नाही. पण तुम्हाला वेळ असेल तर दिल्लीला या, मी तुम्हाला देव, धर्म, अध्यात्मावर रिसर्च करणार्या कितीतरी जागी घेऊन जाऊ शकतो.
या धाग्यात मूळ चर्चा चालली आहे - विश्वकारणाचे स्पष्टीकरण - अध्यात्म आणि विज्ञानाची परिणामकारकता. उगाच माझ्या एका वाक्यातल्या एका क्रियापदाचा काळ घेऊन रामायण करण्यात काय हशील?
>>एकतर इथे एक विरुद्ध सगळे
>>एकतर इथे एक विरुद्ध सगळे अशी लढाई आहे.
मी तुमच्यशी लढाई करत नव्हतो. तुमच्या देव अध्यात्मविषयक मतांचे खंडनही करण्याचा माझा हेतु नाही. उलट माझ्या स्वाक्षरीतून मी तुमचे म्हणणे डिफेंडच करत होतो. शिवाय संशोधन चालू आहे असे धार्मिक अध्यात्मिक लोक म्हणत असतील तर कंशेशन देऊ असंही म्हटले.
परंतु तुम्ही विज्ञानातल्या सध्याच्या आकलनाविषयी जितकी स्वीपिंग डिसमिसिव्ह विधाने केली त्याचे योग्य कंटेक्स्टमध्ये स्पष्टीकरण करत होतो. कारण तुमच्या मनात विज्ञानातल्या एकूण आकलनाविषयी खूपच गैरसमज आहेत असे मला वाटले.
मी तुमच्यशी लढाई करत
अर्थातच. सरसकटीकरण झालं आहे हे मान्य.
----------------------------------------
मी केवळ मुख्य आशयाशी निगडीत युक्तिवाद चिरेबंद ठेवायचा प्रयत्न करतो. इतर वाक्यांना एक अभिप्रेत क्वालिफिकेशन असते.
>>देव दाखवा म्हटले कि
>>देव दाखवा म्हटले कि (सं)शोध(न) चालू आहे हे उत्तर "तितक्याच सन्मानाने" पुरोगाम्यांनी घेतले पाहिजे.
पण हे उत्तर देवाचे समर्थक/भक्त/पुरस्कर्ते देत नाहीत हा प्रॉब्लेम आहे. त्यांनी शोध चालू आहे असे म्हटले तर आम्ही कंशेशन देऊ.
>>आता बिंदूबद्दल. बिंदू म्हणून खरे तसे काही नसते. तो मानायचा असतो. त्याचे गुणधर्मही मानायचे असतात. बिंदू संकल्पनेचा विस्तार करून पुढे बनणार्या सार्या भूमितीय संकल्पना देखिल मानल्यात संकल्पनांत जमा आहेत. एखाद्या मानलेल्या गोष्टीचे गुणधर्म खर्याखुर्या गोष्टीला कसे काय लावायचे?
मानलेल्या गोष्टीचे गुणधर्म खर्याखुर्या वस्तूला लावणे कोणत्या गोष्टीत शक्य असते हे सहज कळू शकते. भौतिकशास्त्रातला साधा लंबक (Simple Pendulum) ही कल्पना घ्या. यात वस्तू एका वजनरहित/न ताणल्या जाणार्या दोर्याने लटकवलेली असते. प्रत्यक्षात वजनरहित आणि न तानला जाणारा दोरा अस्तित्वात नसतो. परंतु लटकावलेल्या वस्तूच्या मानाने खूप कमी वजनाचा दोरा घेतला तर साधा लंबक म्हणून तो वापरता येतो. याचे कारण तो खरोखरचा साधा लंबक नसला तरी त्यावर येणारी निरीक्षणे (प्रॅक्टिकली- मोजण्याच्या त्रुटीच्या रेंजमध्ये) साध्या लंबकासारखीच येतील.
तद्वतच बिंदू या संकल्पनेने जे दर्शवले जाते ते प्रत्यक्षात नसले तरी तारतम्याने बिंदू कशाला म्हणायचे आणि गोळा कशाला म्हणायचे हे ठरवता येते. एका कंटेक्स्टमध्ये गोल (स्फिअर) असलेला गोळा दुसर्या कंटेक्स्टमध्ये बिंदू समजून घेता येतो.
अरुण जोशींना या गोष्टी ठाउ़क नाहीत हे पटायला कठीण आहे. या उदाहरणांप्रमाणे देव/अध्यात्म क्षेत्रातली उदाहरणे देऊन मुद्दा समजावण्याचा प्रयत्न अरुण जोशींनी करावा.
>>बिग बँगचे पार्टिकल कुठून आले? उत्तर -संशोधन चालू आहे.
बिग बँगचे पार्टिकल कुठून आले याचे उत्तर संशोधन चालू आहे असे तुम्हाला कोणी दिले? मला जर समजले असेल तर बिग बँगच्या आधी काय होते हे संशोधन शक्य नाही कारण (सध्याच्या माहितीप्रमाणे) टाइम स्टार्टेड फ्रॉम बिग बँग. The concept "before the Big Bang" is oxymoron (वदतोव्याघात).
वदतोव्याघात या शब्दाचा अर्थ
वदतोव्याघात या शब्दाचा अर्थ आज कळाला! बर्याचदा हा शब्द दिसला होता.
नंतर लिहिन.
नंतर लिहिन.
विज्ञान, उत्क्रांती,
मानवी मूल्यं कशाला म्हणावं याबद्दल आपले काही किंचित मतभेद असू शकतात.
मानवी मूल्यं - चोरी, खून, बलात्कार न करणं, अडीनडीत असणाऱ्या ओळखीच्या, परात्पर ओळखीच्या लोकांना मदत करणं, दीनदुबळ्यांबद्दल कणव वाटणं इ. ही मूल्यं उत्क्रांतिमधून आलेली आहेत, असं उत्क्रांतीय मानसशास्त्र सांगतं. १९९० च्या पुढे ही ज्ञानशाखा बरीच प्रगत व्हायला लागली. चोरी, खून, बलात्कार करणारे लोक सायकोपॅथ समजले जातात, ते कसे निपजतात याबद्दल आज संशोधन सुरू आहे. आपण कसं वागावं/वागू नये याच्या सामाजिक नियमांचं, नैतिकतेचं स्पष्टीकरण विज्ञान देत नाही असं वाटत असेल तर आपल्याला विज्ञानात सध्या काय सुरू आहे हे माहीत नाही असं खुशाल समजावं.
लोकांना देवाची गरज का वाटते याचा अभ्यासही वैज्ञानिक करतात. त्यापुढे अस्तित्त्वविषयक प्रश्न का पडतात, याचंही उत्तर विज्ञान देतं. पण त्याची (आपली) आपण शोधलेली उत्तरं सध्या विज्ञानाच्या कक्षेत बसत नाहीत. निदान आजतरी नाहीत. कदाचित अजून काही वर्षांनी उत्क्रांतीय मानसशास्त्र तिथपर्यंत पोहोचेलही. कदाचित पोहोचणार नाही.
अजिबात नाही. न्यूटनने मांडलेले चुकीचे सिद्धांत (१७ वं शतक) आजही शिकवले जातात. स्थिरस्थिती सिद्धांत* शिकवणारे लोक आहेत. आईनस्टाईनच्या गुरुत्वीय स्थिरांकाबद्दल (आणि त्याच्या इतिहासाबद्दल) वर्गांत चर्चा घडतात. लमार्कियन उत्क्रांती, मेंडलचे नियम प्रकाशित/प्रसिद्ध होण्याआधी डार्विनचं जनुकांबद्दल असणारं अग्राह्य गृहितक या गोष्टीसुद्धा अभ्यासकांना व्यवस्थित माहीत असतात. प्रत्येक शास्त्रातल्या बारीकसारीक चुकांबद्दल, तेव्हा काय घडलं याबद्दल बोलणारे गोष्टीवेल्हाळ म्हातारे संशोधक मला माहीत आहेत. वेगवेगळ्या विषयांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्या-त्या विषयातल्या अशा चुकांबद्दल उतारेच्या उतारे लिहिलेले असतात.
सध्याचे विज्ञान निखालस खोटं आहे असं म्हणणं धार्ष्ट्याचं आहे, मात्र ते निखालस चूक आहे अशी शक्यता मनात ठेवायला हरकत नाही. पण तसा एकही पुरावा दिसत नसताना, अशी शक्यता का मनात धरावी आणि त्यामुळे काय फायदा-तोटा होणार हे काहीही मला समजत नाही. त्यामुळे "सध्याचं विज्ञान निखालस चूक आहे" हे विधान मला (पुन्हा एकदा) विनोदी किंवा निरर्थक वाटतं.
विनोदी वा निरर्थक.
विज्ञानाचा अभ्यास आणि अभ्यासक यांच्याबद्दल तुमच्या मनात बऱ्याच गैरवाजवी कल्पना आहेत असा माझा समज झालेला आहे. अशा कल्पना करण्यापेक्षा एखाद्या विज्ञान संशोधन संस्थेला भेट देऊन, तिथल्या लोकांशी गप्पा मारून बरेच गैरसमज दूर होऊ शकतात. न पेक्षा टीव्ही किंवा जालावर अनेक वैज्ञानिकांचे व्हीडीओ सापडतील, ते ही बघायला हरकत नाही.
*स्थिरस्थिती सिद्धांत चूक आहे असं कोणी म्हणत नाही, तो अल्पमतात आहे.
It is near impossible to
It is near impossible to counter the whole response. Time does not permit that though I would have loved to do that.
हे एकच वाक्य घेतो.
"उत्क्रांतीय" व "मानसशास्त्र" यातून निघणारी फ्रेज दोन शून्यांचा गुणाकार आहे. Let me explain what I am saying. The theory of evoluion, without regard to evolutionary psychology aspect, is only 1% of the total story. In that 1%, there are tonnes of contradictions and gaps. They are sufficient to reject it altogether for all scientific reasons. So far as psychology is concerned, without regard to the evolution aspect of it, is in natal,pre-natal stage. It is not known whethere at all there is something called mind!!!
I apply a simple principle in assessing the psedo-scientific statements and theories. A multiplication of many numbers with a zero results in zero. A statement, generally told to be a true scientific statement, is untrue if a single contradiction to it is established to be a scientific truth.
Scientific community, to bypass this hurdle, has come up with a trick, i.e. to assert "several" possibilities than making a specific statement. Now, a typical progressive person owns none of these options and hence someone like me has to argue against all these options. Earlier scientists believed that God created life. (It's true. They did not give credit of many other things to God but so far as life was concerned they were okay with Creation.) Then it became necessary to remove God from the scene there came the theory of instantaneous generation! But it did not sell much. Then came theory of evolution by Darwin who did not know g of genetics. He put forth the theory looking at the whole bodies of organisms, not even cells, forget genes. Darwin might be extremely suprised (in heaven) to see how people are keeping his theory sustaining and yes, evolving !!!
Do you know that we are not homo sapiens by definition? It was earlier thought that they and Neaderthals never interbred. But now is proved that they have!!! And when two species interbreed, they give birth to third species (जीवशास्त्रात फक्त बापाचे नाव लावलेले चालत नाही). And I am speaking about research by renowned institutes!!! Similarly it is known for many yores that certain chemical affect the brain's function in a certain way. Neurology and psychology are based on this simple fact and thousands of random experiments done around these facts. Scientists are not able to tackle to the signal behaviors at the neuron junctions. There is no remedy for even one psychological disorder to bring the patient to normal state without lifelong medicines!!!
Your book could be an interesting read. There is no denying that both these sciences are useful to humanity in thousands of ways. But there is limit to their application so far as formation of world, life and human values is concerned.
-------------------------------------------
Now basd on your understanding of the book answer my three questions:
1. Me and other 3 siblings of mine should show "similar pattern of" values (help, compassion, etc) in comparison to the general global society. Still our values are different and they, for any one of us, may jell perfectly with a unrelated group at a random place on our planet.
2. Why was only I among them a person of no values, or practically no regard for "all" values, though genetically I was so close to them?
3. Have I am evolved in terms of change in almost all my values, from the stage when I was total atheist to a new stage with all mollified values, in a single life span?
माझं विज्ञानाचं वाचन आणि मनन किती आहे याबद्दल आपला गैरसमज झालेला दिसतो. असो. ते "अति" या सदरात मोडतं. मंजे मी नावे,देश, इसवीसन, इ फार नीट लक्षात ठेवत नाही कारण कोणती परीक्षा द्यायची नाही. पण तत्त्व काय मांडलं आहे याच्यावर मी प्रचंड मनन करतो. देवाचं जाऊ द्या, म्हणजे तो कंसेप्टच नसता तरी मला एक रुचि म्हणून विज्ञानावर भाष्य करायची इंडेपेंडेंट सवय आहे.
--------
अशी विनोदी नि निरर्थक चर्चा पुढे चालू ठेवायला आपली हरकत नसावी.
तुम्हाला एक प्रतिसल्ला देतो. आपण कोणत्या फॅशनचे बळी तर पडत नाही आहोत ना याचे नेहमी भान असू द्या. आपण एक भारी पुस्तक वाचत आहोत त्याचा उत्साह वेगळा आणि त्यात घुसून वैज्ञानिक निकषांची चिकित्सा करणे वेगळे. माझ्या पदरी निराशा आली आहे म्हणून मी असले प्रति-विज्ञानवादी प्रतिसाद लिहितो.
माझ्या पदरी निराशा आली आहे
ओके! मग काळजी नाही. मला वाटलं तुम्ही खरोखर कळकळीने विरोध करत आहात.
Then came theory of evolution
मला खरंच कोणीतरी सांगा की हे विधान वैज्ञानिक पद्धत काय असते याच्या आकलनानंतर केलेलं विनोदी विधान आहे का आकलनरहित केलेलं निरर्थक विधान आहे?* ही विधानं किंवा हा लेख आणि वरचा प्रतिसाद यात abstract पातळीवर नक्की काय फरक आहे?
मला ही चर्चा चालू ठेवण्यात काहीही रस नाही. या चर्चेसाठी लागणारा वेळ, ऊर्जा हे सगळे स्रोत उत्क्रांती, उत्क्रांतीय मानसशास्त्र याबद्दल लिहिण्यासाठी खर्च करणं आनंददायक असेल. मला वेळ होईल तेव्हा मी ते करेन.
*विनोदी असं म्हणताना निदान आकलन आहे असं सकारात्मक गृहितक असतं.
आता स्वत:चीच कीव करून खाली
आता स्वत:चीच कीव करून खाली बसतो. किमान एकातरी युक्तिवादाबद्दल बोलायचे.
पुरोगाम्यांनी प्रतिसादातल्या
पुरोगाम्यांनी प्रतिसादातल्या एकाही युक्तिवादाचा प्रतिवाद न करता डार्विन प्रेम जाहीर करणे हे मी या धाग्यावर मांडलेल्या "पुरोगाम्यांची विज्ञानविषयक श्रद्धा आणि प्रतिगाम्यांची ईश्वरविषयक श्रद्धा यात फारसे काही अंतर नाही" या विचाराची ग्वाही आहे. माझा टोन वगळला तर मी उत्क्रांतीबद्दल इथे काय काय लिहिले आहे ते सगळे शास्त्रीय सत्य आहे. कोणाला शंका असेल तर कृपया मांडा.
१. आता हिग्ज बॉसॉन लंपास झाला
यातला अधोरेखित भाग समजला नाही.
गेल्या वर्षी (२०१३) मध्ये हिग्ज बोसॉन सापडला. त्याचे गुणधर्म अपेक्षेनुसार निघाले. हा कण तयार झाल्यावर लगेचच इतर कणांमध्ये रुपांतरीत होतो. पण लंपास झाला आहे म्हणजे काय हे समजलं नाही.
कृष्णविवरंही (लंपास होण्याच्या) मार्गावर चालू लागली आहेत म्हणजे काय हे ही समजलं नाही. या वर्षी (२०१४) स्टीफन हॉकिंगने नवीन सिद्धांत प्रकाशित केला आहे आणि त्यानुसार कृष्णविवराचा आकार* बदलता असतो. पण कृष्णविवरं चांगली धडधाकट आहेत.
भारतीय संसदेत हिग्ज बोसॉन आणि कृष्णविवरांवर चर्चा होण्यापेक्षा सडक-बिजली-पानी आणि विज्ञान-तंत्रज्ञान-सामाजिक शास्त्रं यांतल्या मूलभूत शिक्षण-संशोधनासाठी खर्च यावर चर्चा होणं अपेक्षित आहे. हिग्ज बोसॉन आणि कृष्णविवर हा शास्त्रज्ञ-शिक्षकांचा विषय आहे, तिथे खासदारांनी घुसखोरी करू नये.
*सुलभीकरण केलं आहे.
http://www.extremetech.com/ex
http://www.extremetech.com/extreme/150750-cern-we-have-found-a-higgs-bo…
आणि
http://economictimes.indiatimes.com/news/science/cern-may-not-have-disc…
मला ज्या साईट्स, पेपर, ब्लॉग्स रेप्यूटेड आहेत हे बरेच दिवसांपासून वाटत आले आहे त्या सगळ्या इथे दिसत आहेत. प
https://www.google.co.in/search?num=50&q=CERN+higgs+boson+not+found%5C&…
शिवाय कोणत्याही प्रतिष्ठित माध्यमाचे नाव + Higgs boson not found गुगला.
प्वाईंट काय आहे?
एका विधानात तुमचा आक्षेप नोंदवलात तर कळेल.
नाहीतर झुरळाएवढ्या मुदद्याचा प्रतिवाद करायला अण्वस्त्रांएवढा प्रतिवाद कशाला टंका?
अजूनही ते लोक '... अशी शक्यता
अजूनही ते लोक '... अशी शक्यता आहे' छापाची शंकातुर भाषा वापरत आहेत. एकतर त्यांचे आधीचे निष्कर्ष चुकलेले असतील किंवा योग्य असतील. नाहीसा होण्याच्या मार्गावर वगैरे असं काही नाही.
आणि कृष्णविवरांबद्दल काय?
त्याच्या लिंका दिल्या तर
त्याच्या लिंका दिल्या तर अस्वलभाऊंकडून पंचाईत, नै दिल्या तर तुमच्याकडून.
संडासात
संडासात =))
बाय द वे, विज्ञानाची पार्टीकल
बाय द वे, विज्ञानाची पार्टीकल फिजिक्समधे झालेली गोची तितकीच हास्यास्पद आहे. सर्नच्या प्रयोगात हिग्ज बॉसॉन मिळाला (मंजे आहे हे सिद्ध झाले) म्हणून म्हणून तांडव करून वर्षा-दोन वर्षात मिळालेले पार्टिकल हिग्ज बोसोनच होते का म्हणू लागले नि काहीजण तर छातीठोकपणे तो हिग्ज बोसॉन नव्हता व अन्य कोणती दुसरी दोन पार्टिकले होती म्हणू लागले. पोखरीयालच्या अभिमानात आणि शास्त्रज्ञांच्या अज्ञानात (दर्जात) तिळमात्रही फरक नाही. जय विज्ञान ! जय पुरोगामीता!! जय ग्लोब!!!
------------------
हे सगळे शास्त्रज्ञ महनीय होते हे वेगळे सांगणे न लगे.
>>पोखरीयालच्या अभिमानात आणि
>>पोखरीयालच्या अभिमानात आणि शास्त्रज्ञांच्या अज्ञानात (दर्जात) तिळमात्रही फरक नाही.
फरक कसा नाही? त्या पार्टिकलवर शंकाही स्वत:च उपस्थित केली ना?
ज्योतिषांनाही शंका असतेच ना?
ज्योतिषांनाही शंका असतेच ना? नैतर मग त्यांनीच १००% जग चालवलं असतं. आणि म्हणूनच दोहोंत फरक नाही.
नासाचे बजेट कधी कधी कमी
नासाचे बजेट कधी कधी कमी करतात. का? उपयुक्ततेची, सफलतेबद्दलची आशंका असते. तसेच ज्योतिषी आपले भविष्य काही मर्यादा देऊन सांगतो. "ज्योतिषाने गुलाबी मर्यादांमुळे माझे भविष्य खरे ठरले नाही म्हणणे" आणि बाजारात टिकून राहणे व शास्त्रज्ञांनी सायंटिफिक मेथडनी (अत्त्युच्च प्रतलावरच्या बाबींचा)* अनालिसिस चालू आहे (तेव्हा मागचे वाक्य मागे घ्यायला आम्ही केव्हाही मोकळे आहोत असे म्हणणे) असे म्हणणे आणि बाजारात टिकून राहणे यात काही फारसा फरक नाही. फक्त इंडस्ट्रीजचा आकार वेगळा आहे.
* अत्त्युच्च प्रतलावरवरून शास्त्रज्ञ जसजसे खाली येतात, तेव्हा विज्ञानवादी नसून निरिक्षणवादी असतात. तिथे मात्र मला अशी टिका करता येणार.
http://www.thehindu.com/news/
http://www.thehindu.com/news/national/mulayam-to-oversee-janata-parivar…
राहू केतू शनि अशनि यांची युतीच नाही तर हे लोक एकच पार्टी बनवणार आहेत. महिन्याभरापूर्वी देखील अशीच बातमी आली होती. युपी/बिहार आणि काही अंशी कर्नाटक हे सोडून इतर कुठे हे लोक प्रभाव पाडू शकतील का हे पहाणं रोचक ठरेल.
शरद पाटलान्च्या आक्षेपाला सदानन्द मोरेन्चे उत्तर
http://m.loksatta.com/sampadkiya-news/tukaram-meets-sister-1047843/
आक्षेप:
http://unipune.ac.in/snc/cssh/ipq/ParamarshMarathi/01%20Paramarsh%20Mar…
ह्या pdf ची शेवटची दोन पाने.
pdf ची लिन्क एक रेघेवरुन साभार.
डीएनएची रचना शोधण्यासाठी
डीएनएची रचना शोधण्यासाठी नोबेल मिळवणाऱ्या जेम्स वॉटसन त्याचं नोबेल पदक विकणार आहे.
The father of DNA is selling his Nobel prize because everyone thinks he’s racist
यावर काही ठिकाणी या
यावर काही ठिकाणी या शास्त्रज्ञाला शिव्या घातलेल्या पाहिल्या. चेपूवर वगैरे.
सगळे वंश सारखे हे आज पॉलिटीकली करेक्ट विधान आहे. समजा याच्या विरोधात कोणी मत मांडलं तर त्याला शिव्या घालाव्यात का? त्याच्यावर गुन्हा दाखल करावा का?
वरच्या लेखात त्याचं एक वाक्य आहे की
यातलं all the testing हे नक्की काय आहे हे जाणून न घेता त्याला शिव्या घालणं मला पटत नाही.
हे काहिस पृथ्वीभोवती सूर्य फिरत नाही याच्या विरोधातील मत मांडण्यासारखं आहे असं वाटतं का?
शास्त्रज्ञ आणि अनिश्चितता + नम्रता
काही गुणधर्मांचं मूळ जीन्समध्ये आहे हे सिद्ध करणं सोपं जातं, तर काहींसाठी ते कठीण असतं. हे लक्षात आणून देणारं काही शोधलं, तर (इतर अनेक वेळा होतं, त्याप्रमाणेच) शास्त्रज्ञांना आपल्या मर्यादांची साधारणतः चांगल्या प्रकारे जाणीव असते, हे लक्षात येतं. अशा एका जनुकशास्त्रज्ञाच्या मुलाखतीतून उद्धृत -
वॉटसनचा पूर्वतिहासही त्याला
वॉटसनचा पूर्वतिहासही त्याला कारणीभूत असणार.
डबल-हेलिक्स मॉडेलचं संशोधन प्रकाशित केल्यावर, नोबेल मिळाल्यानंतर त्याने रोझालिंड फ्रँकलीनला कायमच कमी लेखलं. खरंतर तिच्या क्रिस्टलोग्राफीमुळे डबल हेलिक्सचे पुरावे मिळाले. तिच्या संशोधनामुळे वॉटसन-क्रिकला मार्ग दिसला. पण वॉटसनने तिला कधीही क्रेडीट दिलं नाही. तिने जमा केलेली माहिती, तिच्या परवानगीशिवाय, तिने प्रकाशित केलेली नसताना या दोघांनी वापरली. नोबेल मिळाला तेव्हा दुर्दैवाने रोझालिंड जिवंत नव्हती त्यामुळे ते तिला मिळालं नसतंच. एकटा वॉटसनच तिचा उल्लेख रोझी असा करायचा. या दोघांची मैत्री होती अशातला भाग नाहीच. तो तिचं कर्तृत्व नाकारण्याचा भाग होता. नोबेलनंतर वॉटसनने जे पुस्तक लिहिलं त्यातही तिचा उल्लेख गॉसलिनची सहाय्यक असा केला; वास्तविक या विषयातलं गॉसलिनचं काम तिच्यासमोर दुय्यम होतं. क्रिकने नंतर रोझालिंड फ्रँकलीनच्या संशोधनाचं महत्त्व मान्य केलं.
नोबेल पुरस्कारानंतर वॉटसनने काहीही मूलभूत संशोधन केलं नाही. वॉटसनच्या कद्रूपणाचा इतिहास काही दशकांचा आहे. आज निव्वळ एखादा संशयास्पद शब्द वापरण्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली असेल असं वाटत नाही.
श्री श्री आयझॅक न्यूटनसुद्धा
श्री श्री आयझॅक न्यूटनसुद्धा असाच कमीना होता असे वाचले आहे.
http://azadi.me/tax_terrorism
http://azadi.me/tax_terrorism_in_India
प्रितीश नंदी ... यांचा (हिंदी) लेख "भारतातील टॅक्स चा दहशतवाद" याबद्दल.
http://www.bbc.com/news/world
http://www.bbc.com/news/world-asia-30324209
उद्या म्हणजे शनिवारी, फिलिपाइन्स ला मोठा चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
पर्यावरणाचा कुझ्नेट्स कर्व्ह
मोदी, प्रकाश जावडेकर, विकेंद्रिकरण व पर्यावरण
इन्सेंटिव्ह्ज चे डायनॅमिक्स कसे असतात ते शिकायचे असेल तर हा लेख अवश्य वाचा.
दुसरी बाब अशी की पर्यावरणाचा म्हणून एक कुझ्नेट्स कर्व्ह असतो. सायमन कुझ्नेट्स (जीएनपी च्या संकल्पनेचे जनक व जीडीपी च्या संकल्पनेच्या निर्मीतीत हातभार लावणारे) यांच्या प्रसिद्ध कुझ्नेट्स कर्व्ह चे पर्यावरणाच्या संदर्भात केलेले उपयोजन. अधिक माहीतीसाठी पर्यावरणाचा कुझ्नेट्स कर्व्ह हा दुवा वाचणे. याच्या पहिल्या पानावर पर्यावरणाचा कुझ्नेट्स कर्व्ह चे विवेचन आहे. व शेवटच्या (क्र. १८) पानावर त्याचे उदाहरण आलेखाच्या स्वरूपात दिलेले आहे. या कुझ्नेट्स कर्व्ह वर भारत कुठे आहे हे शोधणे (पिनपॉईंट करणे) रोचक असेल.
भारताची वॉटर डिप्लॉमसी
http://www.firstpost.com/politics/sushma-swaraj-pm-modis-best-performin…
http://www.loksatta.com/desh-
http://www.loksatta.com/desh-videsh-news/sushma-swaraj-pushes-for-gita-…
:)
Six-months jail for Satyam
Six-months jail for Satyam Rajus: Details of their crime, how they did it
'उबर'च्या सेवेवर बंदी
'उबर'च्या सेवेवर बंदी घालण्याच्या निमित्ताने वाचनात आलेला एक लेख. (खाप पंचायती आणि 'सातच्या आत घरात'वाल्यांना) नावं ठेवणारं लेखन पुष्कळ दिसतं. त्यापलिकडे जाऊन प्रगतीचा विचार करणारे असे लेख कमी दिसतात -
Banning Uber is Not the Answer
http://www.nytimes.com/2014/1
http://www.nytimes.com/2014/12/07/magazine/who-wants-to-buy-a-politicia…
पैसा व त्याचे निवडणूकीच्या बाजारातील स्थान व राजकारणावर होणारे परिणाम (स्पेशल इंटरेस्ट पॉलिटिक्स) याबद्दल काही गैरसमज आहेत ते या लेखात चर्चिले आहेत.
हे पत्र माझ्या जालावरच्या
हे पत्र माझ्या जालावरच्या उच्चजातीय, पुरुष मित्रांनीही जरूर वाचावं.
To my white male Facebook friends
गुन्हा नाही.
भारतात आता आत्महत्या हा गुन्हा ठरणार नाही.
http://www.dnaindia.com/india/report-union-government-decriminalises-at…
स्वागत
आत्महत्येचा प्रयत्न. आत्महत्या तसाही गुन्हा नव्हता
याचा तोटा लोकं आत्मदहन, आमरण उपोषण वगैरे प्रकार लीगली करू लागतील.
परंतू स्वतःच्या जीवावर स्वतःचा अधिकार असणे मला योग्यच वाटते.
अर्थात हे प्रत्यक्षात यायला सरकार तसे बिल कधी आणते त्यावर अवलंबून असावे.
परंतू स्वतःच्या जीवावर
परंतू स्वतःच्या जीवावर स्वतःचा अधिकार असणे मला योग्यच वाटते.
एकदम सहमत.
विमा
आत्महत्या हा गुन्हा नसेल तर, आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या वारसदारला विम्याचे पैसे सुलभपणे मिळतील काय? (सध्या मिळत नाहीत, अशी माहिती आहे).
कर्जबाजारी शेतकर्यांच्या
कर्जबाजारी शेतकर्यांच्या आत्महत्येला प्रोत्साहनच जणु
अॅडव्हर्स सिलेक्शन .......
अॅडव्हर्स सिलेक्शन .......
(सध्या मिळत नाहीत, अशी माहिती
(सध्या मिळत नाहीत, अशी माहिती आहे). >> ही माहिती खात्रीलायक सोर्सकडून आहे का? कारण मी धा वर्षांपूर्वी घेतलेल्या पॉलिसीमधे, 'विमा घेतल्यानंतर एक वर्षाचा कालावधी जाऊ देऊन मग आत्महत्या केली असेल तर पैसे मिळतील' असा क्रायटेरीआ आहे. आता नविन पॉलीसीत तो कालावधी तीन वर्ष झाला आहे ही ऐकीव माहिती.
सौंदर्य आणि कला
सौंदर्य आणि कला यात फरक असतो, याचा महागड्या पण अ-कलात्मक* फोटोच्या निमित्ताने घेतलेला आढावा.
The $6.5m canyon: it's the most expensive photograph ever – but it's like a hackneyed poster in a posh hotel
*शब्दासाठी श्रेय - उत्पल.
निरीक्षण..
Posh (पॉश) असा इंग्रजी शब्द खरोखर असून तो वापरलाही जातोय अशी उदाहरणं फार कमी दिसतात.
पॉश हा शब्द मराठीतच (लई पॉष आहे ड्रेस इ इ) जास्त वापरला जात असल्याचे लहानपणी जाणवले होते. जेव्हा फॅमिली रुम वगैरेमधे एसी बसवलेलं एखादं हाटेल असायचं त्यात "अंशतः वातानुकूलित" अशी खास पाटी लावण्याइतकं त्या एसीचं अप्रूप होतं त्या काळात. थिएटरचंही तसंच. भले तासभरानंतर एसी बंद का करुन टाकत असेनात.
फॉल्स सीलिंग, एअर कंडिशनर, गालिचे वगैरे कॉमन झाल्यावर हळूहळू "हॉटेल सत्कार डिलक्स एकदम पॉश आहे" वगैरे वाक्यरचना अस्तंगत झाल्या असाव्यात असे वाटते. डिलक्स हा शब्दही तसाच वाटतो. पद्मिनी कारमधे एक छोटा पंखा बसवला असला की ती डिलक्स म्हणवायची.
इंग्रजीत पॉश हा शब्द ऐकल्याचंच स्मरत नाही. कदाचित तो फार डाउनमार्केट शब्द असावा.
निरीक्षणावरून निष्कर्ष...
'पॉश' ब्रिटिश आहे. तुमचा संपर्क अमेरिकन इंग्रजीशीच येत असावा असा त्यामुळे माझा निष्कर्ष. तरीही, तुम्हाला पॉश स्पाईस माहीत असायला हरकत नव्हती ;-)
...
याव्यतिरिक्त, याचे 'Port Out, Starboard Home' असे (अर्थात चुकीचे) backronymही एके काळी लोकप्रिय होते. असो.
मराठी आंजावर जितक्या सहजपणे
मराठी आंजावर जितक्या सहजपणे उच्चभ्रू हा शब्द वापरला जातो, तितक्या सहजपणे पॉश हा शब्द ब्रिटीश वापरतात. ("आमच्यात" अमेरिकन भाषेला डाऊनमार्केट समजत असल्यामुळे पॉश हा शब्द आपसूक उच्चभ्रू आहे.)
...
डौनमार्केट नाही, पण ऑब्सोलीट असू शकेल. (चूभूद्याघ्या.)
तो लेख मात्र रोचक आहे.
तो लेख मात्र रोचक आहे. विशेषतः शेवटचा उतारा -
ऐपत असूनही फोटोग्राफीचा छंद
ऐपत असूनही फोटोग्राफीचा छंद लागू न देणे हीसुद्धा एक कला आहे.
गांधीजयंतीला झालेल्या सफाई
गांधीजयंतीला झालेल्या सफाई अभियानानंतर -
'झाडू' ला प्रतिष्ठा, पण..
नासा लिगो लॅब
http://en.wikipedia.org/wiki/LIGO#LIGO-India
या दुव्यातील उल्लेख केलेला प्रोजेक्ट महाराष्ट्रात औंढा-नागनाथ येथे उभा राहाणार असल्याचे आज टीव्हीवरील बातम्यांत दाखवले. ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्व्हेटरी म्हणजे काय हे कोणी सांगू शकेल काय? तसेच हा प्रोजेक्ट भारतात आल्यास त्याचे काय कौतुक यावरही कोणी प्रकाश टाकल्यास उत्तम.
या विषयाबद्दल मला फार जास्त
या विषयाबद्दल मला फार जास्त माहिती नाही, पण समजलं आहे तेवढं येत्या आठवड्यात लिहिते.
मॅन्युफॅक्चरिंग वरील अतिरेकी भर
This comment has been moved here.
Corporate Germany on the cusp
This comment has been moved here.