भारतीय शाकाहार आणि भूतदया
व्यवस्थापकः सदर प्रतिसाद मुळ ललित लेखनात प्रतिसाद म्हणून काही सदस्यांच्या वाचनात अवांतर व/वा रसभंग ठरू शकेल मात्र स्वतंत्र चर्चेसाठी वेगळा विषय म्हणून या प्रतिसादाचे महत्त्व लक्षात घेऊन धागा वेगळा करत आहोत. श्री अरूण जोशी यांना आवश्यक वाटल्यास अधिक तपशीलात हे लेखन विस्तारू/संपादित करू शकतील, शिवाय योग्य ते शीर्षकही देऊ शकतील.
===========
सिगारेट, दारू नि तंबाखू यांना विज्ञान नि परंपरा हे दोघेही त्याज्य मानतात.
----------
त्यावरून व्यक्तिचे पूर्ण व्यक्तिमत्व कळत नाही पण इतकेच निकष कोणाला महत्त्वाचे वाटू शकतात.
-----------------
@बॅटमॅन - शाकाहारी व्यक्तित भूतदयेचा भाव जास्त असू शकतो. बरेचदा असतो (हे मी पाहिलेले आहे). त्याकारणाने शाकाहारी व्यक्ति जास्त दयाळू असू शकते. (मांसाहार करणार्या प्रत्येकास स्वतः बकरी वा बैल कापायला सांगीतला, फक्त हे पाहायला कि त्यांचेत मानसिक विरोध होतो का, तर जितक्या सहजतेने नि आवडीने ते मांस खातात तितक्या सहजतेने नि आवडिने ते कापाकापी करणार नाहीत (हे ही भारतात प्रचंड पाहिलेले आहे). अपरोक्ष गोष्टींत काय होतं याचा मानवता फार विचार करत नाही.
खासकरून जी व्यक्ति परंपरागत रित्या मांसाहारी आहे, पण नंतर तिचे शाकाहार स्विकारला आहे (जसे जॉर्ज बर्नॉड शॉ.) ती विशेष भूतदयावादी असते.
----------------
भूतदयावाद (नि म्हणून एक मानवी चांगुलपण) नि आहारपद्धती यांचा संबंधच नाही हे विधान भारतीय परिप्रेक्ष्यात गैरलागू आहे.
लिओ टॉलस्टॉय
रशियन लेखक `काऊंट लिओ टॉलस्टॉय’ चा एक किस्सा. एकदा त्याचा एक जिवश्चकंठश्च मित्र त्याच्याकडे आला होता. रात्री झोपण्यापूर्वी तो टॉलस्टॉयला म्हणाला; “मित्रा, उद्या दुपारच्या भोजनाचा बेत काय ठरवला आहेस तू?” “तू सांगशील तो!” टॉलस्टॉय म्हणाला. “तर मग उद्या कोंबडी हवी मला. बरेच दिवसात चमचमीत असं काहीच खाल्लं नाहीये!” मित्र म्हणाला. हे ऐकून टॉलस्टॉय मनातून हादरला. विरक्ती, वैराग्य, प्रेम, भूतदया, समाजनिष्ठा, मानवता या मूल्यांमध्ये बुडून गेलेल्या टॉलस्टॉयने मनाशी एक निर्णय घेतला आणि अंथरुणावर पाठ टेकली.
सकाळ झाली. मित्र उठला. पाहतो तर काय, त्याच्या उशाशी कोंबडीचं एक पिल्लू, एक धारदार सुरी आणि टॉलस्टॉयच्या हस्ताक्षरातलं पत्र होतं. त्या मित्रानं ते पत्र उचललं; वाचलं. त्यात लिहिलं होतं; “मित्रा, काल रात्री झोपण्यापूर्वी तू उद्या मला जेवणात चिकन हवंय असं सांगितलंस खरं! पण… पण जिवंत कोंबडीला मारणं मला जमणार नाही. सॉरी. तेवढं क्रौर्य, तेवढी पाशवीवृत्ती माझ्याकडे नाहीये. तूच या सुरीनं त्या पिल्लाचा गळा काप आणि करून घे चिकन!”
काय खायचे यात माणसाला क्रूर
काय खायचे यात माणसाला क्रूर असण्याशिवाय पर्याय नाही, पण आपल्या किती निकटचा सजीव संपवायचा याचा सुसंस्कृत चॉइस मानवाची भूतदया दर्शवतोच दर्शवतो.
काय वायझेड लॉजिक आहे हे? अर्थात अजो म्हटल्यावर लॉजिक तपासत बसण्यात अर्थ नाही हे खरेच पण त्रिशतकी धागा काय आहे उत्सुकतेने बघितले तर हे वायझेड लॉजिक हाताशी आले. आमेन!!
- (काहीही खावून वेळप्रसंगी भूतदया दाखवणारा) सोकाजी
गवीय भूतदयेचा सिद्धांत
सोकाजीराव, अजो म्हटल्यावर तुम्ही लॉजिक तपासत नाही ही आनंदाची गोष्ट आहे. सुखी राहण्याचा पुरोगाम्यांचा हा सरलमार्ग आहे.
------
पण हे मर्यादित वायझेड लॉजिक काय आहे ते मी तुम्हाला पुन्हा सांगतो. प्राणीहत्या आणि वनस्पतीहत्या यांच्यात एकूण काय भेद आहेत हे पाहू जाता बाकी सगळे मुद्दे केले (मंजे शरीरासाठी मांसाहार वाईट नसतो, मांसाहार शाकाहारासारखाच चविष्ठ असू शकतो, शाकाहार एकटाच इकॉलोजीवर, इकॉनॉमीवर ताण आणेल, प्रायमेट मानव मूलतः मिश्राहारी असू शकतो, इ इ ) आणि फक्त इतकेच मान्य केले माणसाला आहारपद्धेतीच्या चयनाचा अधिकार, विवेक, पर्याय आहे तर गवि, बॅटमॅन आणि इतर प्रो-मांसाहार फायटर्सनी हे मान्य केले आहे कि भूतदया महत्त्वाची आहे. स्वतःला बिनभूतदयेचे क्रूर म्हणायला (शाकाहार्यांच्या तुलनेत) ते अजिबात तयार नाही.
-------
हा विषय पुढे गेला तेव्हा क्रौयाची, वेदनांची तुलना झाली. झाडांना फळे येतात ती प्राण्यांनी खावी म्हणून. पण झाड तोडणे आणि प्राणी मारणे हे सारखेच दुष्ट असे प्रतिपादिले गेले. प्राण्यांची आणि वनस्पतींची बायोलॉजी पाहिली तर मनुष्य ज्याला वेदना म्हणतो ती वनस्पतींना कमी असते वा वेगळीच असते हे शास्त्रीय सत्य आहे. मंजे विज्ञानाने एवढा शोध घेतला असताना वेदना, भावना 'असते हो असते' म्हणावी इतकीच 'वैज्ञानिकांकडून (शाकाहारी वा मांसाहारी सामान्य लोकांकडून नव्हे)' चाचपली गेली आहे जेव्हा कि प्राण्यांची पेन किती कमी किती जास्त याची फार प्रगत मापे आहेत. (उदा. मूल जन्मताना सगळी हाडे मोडलीसारखी वेदना होते असा स्पॅम मेल वाचलेला. मेल स्पॅम का असेना पण एक आयडिया देऊन जातो.)
यावर गविंनी एक टूम काढली कि म्हणे वनस्पती आणि प्राणी ( त्यातही मानव आणि त्यातही आपले नातेवाईक जवळचे आणि त्यातही पोटचे लेकरू आधुनिक मांसाहार्यांना सांगता न येणार्या कारणांनी अपवाद) एकच, आपण त्यांचे "सजीवत्व" वेगळे का मानावे? पुलुलेट करण्याचा दोहोंचा अधिकार सारखाच. दोहोंचे जीवन, भावना सारख्याच, तेही मानवांच्या लेखी!!! लक्षात घ्या कि भारतीय पार्श्र्वभूमीचे गविंसारखे आधुनिक भूतदयावादी (स्वतःला अॅट पार मानणारे)मांसाहारी वेगळे आणि पारंपारिक रित्या मासांहार करणारे पण "पवित्र ठिकाणी, मंगल वेळी" मांसाहार बाजूला ठेवत स्वतःला मांसाहार करताना प्रांजळपणे "कमी भूतदयावादी, इ" मानणारे वेगळे.
पण जर "मानवालेखी" प्राण्यांचे आणि वनस्पतींचे सजीवत्व गवि म्हणतात तसे डिट्टो सेमच मानले तर काय लोचा होईल पहा. सजीवत्व हे कितीतरी बाबींचे सम टोटल आहे. मूळात शाकाहारी वनस्पतींना लोवर ऑर्डर ऑफ लाईफ मानतात म्हणून ते "जास्त भूतदयावाद" क्लेम करतात. हे "समान भूतदयावाद क्लेम करणारे मांसाहारी" असे लोवर वैगेरे मानत नाहीत. मग वनस्पतींचे सगळे हक्क त्यांना मान्य असायला हवेत. उदा. गविंना स्त्रीयांचा किंवा पुरुषांचा विनयभंग होणे हे पटते का? प्राणी आणि वनस्पती यांचे सजीवत्वाचे अधिकार किंवा ससेप्टीबिलिटी (भाव, भावना)मनुष्यालेखी समानच मानले तर विनयभंग होणे न पटणार्या "आधुनिक भूतदयेचा सिद्धांत (मंजे प्राणी वनस्पती इथे म्हटले त्या अर्थाने समान अधिकाराचे) शाकाहार्यांइतकेच स्वतःला भूतदयावादी मानणार्या लोकांना पुरुषाचा पँट उतरावून पाहणे, स्त्रीचा परकर वर करून पाहणे , म्हशीचे शेपूट वर करून (काय ते) पाहणे आणि फूलाच्या रंगबिरंगी पेटल्स मधून बाहेर आलेले सुंदर सुंदर स्त्रीकेसर आणि पुंकेसर पाहणे हे समानच वाटले पाहिजे. मंजे अशा विचित्र प्रकारच्या भूतदयावादी लोकांनी (ते समान सजीव आहेत म्हणून तसेच विनयभंग न करणे स्वतःचे कल्चर, मूल्य आहे म्हणून) फूलांकडे पाहिले देखिल न पाहिजे (खाल्ले तर चालेल वाटतं).
----------------
स्वतःला समान भूतदयावादी म्हणण्याच्या नादात वनस्पतींना प्राण्यांच्या सारखेच (सर्व भावनिक, मौलिक अर्थांनी) खूळचटपणाचे आहे. या हट्टाला आपण गवीय भूतदयेचा सिद्धांत म्हणू यात.
---------------
या प्रतिसादात तुम्हाला पुन्हा शंभर वायझेड लॉजिक मिळतील अशी आशा आहे.
+१
शाकाहार्यांना झाडे कापून खाताना वाटत नाही. फळे तोडून ते खाउ शकतात.
मांसाहार्यांतील काहिंना कोकरु,कोंबडी,माकड वगैरे कापताना "कसेसेच" का होते ?
(ज्यांना अशी कापाकापी करताना अजिबात काही वाटत नै, ते कन्सिस्टंट आहेत; त्यांच्याबद्दल सवाल नाही.
ज्यांना खायला कै वाटत नै पण कापायला वैट वाट्टे त्यांच्याबद्दल सवाल आहे. )
शंकेलाच वायझेड म्हणून डिस्क्रेडिट करणे उचित नव्हे.
...
मांसाहार्यांतील काहिंना कोकरु,कोंबडी,माकड वगैरे कापताना "कसेसेच" का होते ?
(ज्यांना अशी कापाकापी करताना अजिबात काही वाटत नै, ते कन्सिस्टंट आहेत; त्यांच्याबद्दल सवाल नाही.
ज्यांना खायला कै वाटत नै पण कापायला वैट वाट्टे त्यांच्याबद्दल सवाल आहे. )
बाजारात खेकडे अनेकदा जिवंतच विकले जातात. टोपलीत (कर्कवृत्तीस साजेसे) एकमेकांच्या तंगड्या धरून बसलेले असतात. गिर्हाइकाने हवा तो खेकडा त्या बाजूला ठेवलेल्या चिमट्याने उचलून विक्रेत्याला द्यायचा, 'हा मला पाहिजेल आहे' म्हणून. तसा एखादा खेकडा चिमट्याने उचलताना हमखास खेकड्यांची आख्खी लडच्या लड उचलली जाते, ती (आपल्याला हवा असलेलाच खेकडा तेवढा सुटा करण्यासाठी) झटकावी लागते, की मग बाकीचे खेकडे आपसूक परत टोपलीत धाडकन पडतात. (अनेकदा टोपलीतल्या खेचाखेचीत त्यातल्या काही खेकड्यांच्या नांग्या तुटतातसुद्धा. पण ते खेकडे जिवंत राहतात.)
काही सॉफिष्टिकेटेड चायनीज रेष्टारण्टांत दर्शनी भागात एक फिशट्यांक ठेवलेला असतो. त्यात मोठमोठाले खाद्य मासे पोहत असतात. गिर्हाइकाने शेफास बोलवून 'मला हा मासा पाहिजे' म्हणून त्यांपैकी एका माशाकडे अंगुलिनिर्देश करायचा. शेफ मग तो मासा गिर्हाइकादेखत जाळ्याने पाण्याबाहेर काढतो, आणि शिजविण्याकरिता भटारखान्यात घेऊन जातो.
(यावरून आठवले. कॉलेजच्या अखेरच्या दिवसांत मुंबईत नरीमन पॉइंटमधील एका उंच बिल्डिंगीतील एका कंपनीत इंटर्नशिप - आमच्या काळात त्यास शब्द वेगळा होता, पण अर्थ तोच; तर ते एक असो. - करत असतानाची गोष्ट. लंचब्रेकच्या सुमारास बिल्डिंगीच्या खाली एक पारसीबावा संकीर्ण चायनीज आणि कबाब बनवून विकण्याकरिता गाडी घेऊन येत असे. 'तो कुत्र्याच्या मांसाचे कबाब बनवून विकतो' अशी आम्हां काही मित्रांची (उगाच) धारणा होती. मग रोज त्याच्या गाडीपाशी उभे राहून त्याचेच (बोले तो, त्याने बनवलेले) कबाब खाताना रस्त्यावरील कोणत्याही र्याण्डम भटक्या कुत्र्याकडे अंगुलिनिर्देश करून, चेहर्यावर अत्यंत गंभीर आणि दु:खपूर्ण भाव आणून, 'कल यह कुत्ता यहाँ नहीं दिखेगा - तेरे कबाब में रहेगा' असे एकमेकांस सुनवत असू. (त्या काळात नरीमन पॉइंटवर भटके कुत्रे आणि मद्राशी हिजडे हे दोन प्रकार भरपूर पाहावयास मिळत. तर तेही एक असो.))
तर सांगण्याचा मुद्दा, "कसेसेच" वाटणे ही कल्टिवेटेड भावना असावी.
तर सांगण्याचा मुद्दा,
तर सांगण्याचा मुद्दा, "कसेसेच" वाटणे ही कल्टिवेटेड भावना असावी.
संभव आहे. कसेसेच न वाटणे सुद्धा तसेच असू शकते. शेवटी हिटलरने इतकी माणसे मारली (वा त्यानंतर तिसर्या महायुद्धात गुजरातमधे २००२ मधे जे झालं) ते वर्णिताना जे कसंसंच वाटतं ते देखिल कृत्रिमरोपित असू शकतं. शेवटी त्या संबंध नसलेल्या, नाते नसलेल्या, कधी न पाहिलेल्या लोकांसाठी केवळ आपल्या स्पेसिजचे आहेत म्हणून कसंसंच वाटणं मिसप्लेस्ड भूतदयावाद असू शकतो.
----------
बाय द वे, मनोबाने हे वाक्य प्रतिसाद म्हणून इथे का कोट केलं आहे तर सम टाईम्स यू अॅक्नॉलेज.
प्राणी आणि वनस्पती यांना
प्राणी आणि वनस्पती यांना भिन्न वेदना होत असली तरी त्यांचे सजीवत्व समान म्हणून मांसाहारी शाकाहार्यांइतकेच भूतदयावादी असे गवि म्हणताहेत. असेच असेल तर फक्त वेदना-वेदना बद्दलच चर्चा का? त्याच लॉजिकने मांसाहारी पण विनयभंगाचा विरोधक अशा व्यक्तिने फूलांकडे पहायला पण नाही पाहिजे. ते (साले) नागडेच बसलेले असतात.
--------------
वायझेड वाटतंय खरं हे.
भूतदया म्हणजे वेदना कमी
भूतदया म्हणजे वेदना कमी राहतील असे पाहणारा अशी व्याख्या आहे का?
मला कदाचित भूतदया या मूळ शब्दाचा अर्थच नीट समजला नसावा.
१. "जास्त" आणि "कमी" भूतदया ही आपण ज्याला मारुन खातो त्याला किती वेदना होतात यावर ठरत असेल
आणि
२. वनस्पतींना प्राण्यांपेक्षा कमी वेदना होतात असे सिद्ध झाले असेल (वेदना झालेल्या दिसणे नव्हे, होणे)
आणि
३. भूतदया या शब्दात फक्त मारतानाची मरणार्याला होणारी दृश्य वेदना अभिप्रेत असेल तर..
मला अरुण जोशी यांचे म्हणणे सविनय आणि बिनशर्त मान्य आहे.
या स्थितीत शाकाहारी लोक हे उपरोक्त व्याख्येप्रमाणे अधिक भूतदयावादी असून मांसाहारी लोक कमी भूतदयावादी, रादर, भूतदयाविहीन असतात.
गविजी, भूतदया ही मनुष्यासाठी
गविजी,
भूतदया ही मनुष्यासाठी व्यापक संज्ञा आहे. तिच्यात अनेक गोष्टी असू शकतात. जसे १. भूतजीवांचे प्राण वाचवणे (औषधे देणे, इ)२. संगोपन करणे, (झाडांना पाणी देणे) इ इ. ३. वेदना कमी जास्त देणे ४. अस्तित्व नि पुढच्या पिढ्या संपवणे
त्यात "व्यक्तिची स्वतःची आहारपद्धती" एका विशिष्ट प्रकारे ठेवणे हा देखिल एक ग्राह्य निकष असू शकतो. सबब धागा केवळ या मर्यादित निकषापुरता होता.
-------------
१.
"जास्त" आणि "कमी" भूतदया ही आपण ज्याला मारुन खातो त्याला किती वेदना होतात यावर ठरत असेल
हा एक उचित निकष आहे.
२.
वनस्पतींना प्राण्यांपेक्षा कमी वेदना होतात असे सिद्ध झाले असेल
http://www.pri.org/stories/2014-01-09/new-research-plant-intelligence-m…
तसं या विषयावर संशोधन झालं आहे. ते सगळं इथे मांडता येणार नाही. ही एक अल्टिमेट प्रो-मिश्राहारी लिंक देत आहे. कशाचा अर्थ काय काढता येईल त्याच्या सीमेपर्यंत (सबल पुरावा नसताना) काढला आहे. पण तरीही "वनस्पतींना स्वतः असल्याची जाणिव असते का?" असे विचारलेच आहे. शिवाय वनस्पती आणि प्राणी यांत आपण मानतो तितकी (जाणिवांची, भावनांची, इतर उच्च जैविक लक्षणांची) सीमा काटेकोर नसावी म्हणत ढोबळ का होईना सीमा आहे हे मान्य केले आहे (इतके मांसाहार्यांना कमी भूतदयावादी म्हणण्यास पर्याप्त असावे.).
यावर हजार शंका, आपत्ती घेणार्यांचे संशोधन बाजूला ठेऊ.
३.
भूतदया या शब्दात फक्त मारतानाची मरणार्याला होणारी दृश्य वेदना अभिप्रेत असेल तर..
असं का म्हटलं आहे ते कळलं नाही. आहारात आहार कोठून, कसा आला आहे याची कल्पना माणसाला असते. आपल्या आहारपद्धेतीचा परिणाम काय झाला आहे आणि काय होणार आहे हे अभिप्रेत आहे. दिल्लीत मंगळवारी मांस खपतच नाही वा फार कमी. परिणाम होतो. भूतदयेत प्राण्यांवर होणार सारा परिणाम अभिप्रेत आहे.
टॉप ५
| प्रकार | शीर्षक | लेखक |
प्रतिसाद |
शेवटचा प्रतिसाद | |
|---|---|---|---|---|---|
| चर्चाविषय | भारतीय शाकाहार आणि भूतदया | अरुणजोशी | 328 | 29/09/2014 - 07:13 | |
| चर्चाविषय | पुन्हा ऐरणीवरः समलैंगिकता! | ऋषिकेश | 327 | 22/12/2013 - 04:55 | |
| ललित | एक विचित्र मुलगी | सुशेगाद | 305 | 20/02/2014 - 18:15 | |
| चर्चाविषय | गांधीजींना महात्मा केलेच कोणी? - अरुंधती रॉय | गब्बर सिंग | 254 | 02/08/2014 - 20:09 | |
| चर्चाविषय | अपर्णा रामतीर्थकर | सारीका | 231 | 08/06/2014 - 11:11 |
अशा प्रकारे या चर्चेने समलैंगिकता, विवाहसंस्था, महात्मा गांधी, तरुण मुली (व लैंगिकता) या लोकप्रिय विषयांना मागे टाकून सर्वाधिक प्रतिसादांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. या ठिकाणी, या माध्यमातून अरुणजोशी यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येताय.
उदाहरणार्थ सध्या मला दिसतंय त्या पेजवरून हे लिहिलंय
माझ्यासारख्या नॉन-काम्प्युटरस्पेशालिस्टाला जमलं, म्हणजे सिंपल आहे. इन्स्पेक्ट एलिमेंटची गरज नाही. फाफॉच पाह्जे असेही नाही व्ह्यू पेज सोर्स केलेत व थोडे एच्टीएमेल आले, तरी जमते. हे बघा :
| प्रकार | शीर्षक | लेखक | प्रतिसाद |
शेवटचा प्रतिसाद |
|
|---|---|---|---|---|---|
| भटकंती | लोथलच्या निमित्ताने: एक उनाड दिवस (१/२) | नवीन | ऋषिकेश |
16 16नवीन |
02/10/2014 - 18:26 |
| चर्चाविषय | ही बातमी समजली का? - ४१ | ऋषिकेश |
35 22नवीन |
02/10/2014 - 17:02 | |
मासे.
नुकत्याच एका विद्यापीठाने असं सौशोधन केलंय की मासे हा मांसाहार नाहीच, तो शाकाहाराचाच एक प्रकार आहे.
दुवा/विदा वगैरे मिळाला की टाकतोच.
अवांतर - ३०० मारायचेयेत, घरचं कार्य आहे. तेव्हा आमचाही हातभार.