Skip to main content

रहमान, रिपिटेशन आणि गोडवा

(अलीकडे काय पाहिलंत? या धाग्यातून चर्चा वेगळी काढली आहे.)

या प्रतिसादाला किंवा उपचर्चेला थेट उत्तर म्हणून नाही, पण अन्य धाग्यावरील प्रतिसाद आणि खवउचकपाचक यांच्या संदर्भात अलीकडे वाचलेल्या ह्या दोन संबंधित लिंक्स:

१. 'I' ह्या तमिळ चित्रपटाच्या संगीताबद्दल लिहिताना भारद्वाज रंगन. (अवांतर - विक्रम ह्या नायकाचे मूळ नाव Kennedy Vinod Raj असे आहे!)

It’s not that Rahman has been producing bad music, exactly. But there was a time he used to make songs like Chandralekha and Strawberry kanne, and you’d sit up and, slowly, smile at the playful bombast of it all, the sight of a Dickensian orphan stumbling into a smorgasbord. That we haven’t seen in a while, and that’s what I is. To complain that the songs are overdone, overproduced is to find fault with a Persian carpet for having too many colours, too many motifs. That’s what Shankar’s cinema is. That’s what Shankar’s cinema needs. A simple “melody song” like Kaadhal anukkal sounds so wussy in the context of this filmmaker. If you’re going to make a “melody song” for a Shankar movie, then you’d better make it like Ennodu nee irundhaal, which sounds as if Sid Sriram is standing on St. Thomas Mount and howling at the moon, which is where, presumably, his lover is. The situation isn’t entirely inconceivable if you know Shankar’s work.

२. 'अतिपरिचयादवज्ञा' हे जरी खरं असलं तरी वारंवार ऐकल्यामुळे एखादा युक्तिवाद कसा खरा वाटू शकतो किंवा निरर्थक शब्दांची सामान्य सुरावटही पुन्हा पुन्हा ऐकून कशी कानाला अधिक गोड वाटू लागते, हे सांगणारा व्हिडिओ. (संदर्भपुस्तक - On Repeat: How Music Plays the Mind )

इंद्रियांचे रिसोर्सेस जपण्यासाठी उत्क्रांतीतून निवडला गेलेला हा मार्ग असावा, असं कधीतरी वाटून जातं.

चिंतातुर जंतू Fri, 19/09/2014 - 12:10

>> To complain that the songs are overdone, overproduced is to find fault with a Persian carpet for having too many colours, too many motifs. That’s what Shankar’s cinema is. That’s what Shankar’s cinema needs.

चित्रपटाची जातकुळी किंवा आशय ह्याला अनुसरून संगीत असावं ह्याविषयी अडचण नाही. शांत प्रकृतीची गाणी हळूहळू लुप्तच झाली ह्याविषयी अडचण आहे. मला रंगीबेरंगी पर्शियन कार्पेट आणि केवळ एक-दोन रंगांतले रॉथकोचे कॅनव्हास दोन्ही प्रिय आहेत.

शांत प्रकृतीचं एक गाणं -

चित्रपट - किनारा किनारा (१९६३)
गायिका - लता
संगीत - जयदेव

मी Sat, 20/09/2014 - 15:49

In reply to by चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतूंच्या मताशी सहमत.

To complain that the songs are overdone, overproduced is to find fault with a Persian carpet for having too many colours, too many motifs.

the complaint now is that we see lots of Persian carpets with many made in china and very few Rothko's canvases.

मेघना भुस्कुटे Sat, 20/09/2014 - 19:24

In reply to by मी

या सगळ्यातून इतकंच सिद्ध होतं, की पूर्वी तथाकथित (हा शब्द वापरण्याची वेळ माझ्यावर यावी ना? हा हन्त हन्त!) संथ, शांत, मधुर सुरावटी बनण्याचं प्रमाण जास्त होतं. हल्ली तथाकथित (हा.श.वा.मा.या.ना? हा.ह.ह.!) कंठाळी, वाद्यकल्लोळ असलेल्या, आवाजी सुरावटी बनण्याचं प्रमाण जास्त आहे.

रेहमान कंठाळी आहे, असं सिद्ध होत नाही. धन्यवाद.

घाटावरचे भट Fri, 19/09/2014 - 16:49

बाकीचं तांत्रिक वगैरे माहित नाही, पण लक्षात राहील असं एकही गाणं (अनेक वेळा ऐकूनही) बहुधा 'दिल्ली-६' नंतर रहमानकडून आलेलं नाही. 'हायवे'चं संगीतही फार काही श्रवणीय नाहीये.

जब तक है जान - टुकार
रॉकस्टार - ठीक
रांझना - ठीक
रावण - अतिशय टुकार
ब्ल्यू - ठीक

मेघना भुस्कुटे Fri, 19/09/2014 - 17:37

In reply to by घाटावरचे भट

रॉकस्टार ठीक?
रॉकस्टार ठीक??
रॉकस्टार ठीक???

...... मला काही सुचेचना पुढे बोलायला. पिण अडकली राव माझी. र्‍हाव द्या.

अस्वल Fri, 19/09/2014 - 22:16

In reply to by मेघना भुस्कुटे

+१ टू मेघना.
रॉकस्टारला ठीक का म्हणले तुम्ही? वाईट वाटलं.
बाकी सोडा पण "फिर से उड चला" असं पिसासारखं अलगद तरंगणारं गाणं तरी ऐकाच- कसलं जबरदस्त आहे!
आणि "नादां परिंदे" वगैरे पण.
अर्थात संगीताबरोबरच गाणी लिहि़णार्या इर्शाद कामिल ह्यांचा वाटासुद्धा तेवढाच मोठा आहे.
प्वाईंट इज- रॉकस्टार खतरनाक आहे( संगीत्/चित्रपट दोन्ही).

घाटावरचे भट Mon, 22/09/2014 - 06:30

In reply to by अस्वल

मेघना आणि अस्वल, तुमच्या दृष्टीने असेल रॉकस्टार चांगला. शिवाय वर अस्वल यांनी गाण्याच्या अक्षरांचाही उल्लेख केलेला आहेच. माझ्या दृष्टीने जर गाण्याचे सूर आणि गाणं कसं गायलंय (आवाज वगैरे) हे जर लक्षात राहाणारे नसतील तर शब्द कितीही चांगले असले तरी त्याचा फतरे काही उपयोग नाही. माझं म्युझिकल कंडिशनिंगच तसं आहे त्यामुळे ते एक असो. त्यादृष्टीने रॉकस्टारची गाणी माझ्यासाठी ठीक आहेत. मला रॉकस्टारचं आवडलेलं गाणं म्हणजे 'जो भी मै कहना चाहूं'.

सिफ़र Mon, 22/09/2014 - 12:46

In reply to by घाटावरचे भट

रहेमान चं सोडा पण 'फतरे' हा शब्द लैच आवडतो....खुप आधी वापराचो.....सालं ह्या पुण्यात आलो अन शुद्ध भाषेचे वाईट संस्कार झाले...
विदर्भातील फोतरा(टरफला) या शब्दावरुन आलेला शब्द असावा.

नेमका हा शब्द कोणत्या गावचा म्हणायचा? थोडक्यात तुम्ही कुठल्या घाटावरचे भट?

...(भाषाचे अर्धवट संस्कार झालेला) सिफ़र

बॅटमॅन Mon, 22/09/2014 - 13:00

In reply to by सिफ़र

सालं ह्या पुण्यात आलो अन शुद्ध भाषेचे वाईट संस्कार झाले...

"पुण्यात आलो अन 'शुद्ध मराठी' नामक एका पुणेरी बोलीचे वाईट संस्कार झाले" असे पाहिजे. ऐसीवरच कोल्हटकरांनी सांगितल्याप्रमाणे तथाकथित शुद्ध मराठी ही एका इंग्रजाने कायम केलेली आहे. तिला शुद्ध म्हणणे म्हणजे???? शिव शिव शिव शिव....

मी Mon, 22/09/2014 - 13:59

In reply to by बॅटमॅन

ऐसीवरच कोल्हटकरांनी सांगितल्याप्रमाणे तथाकथित शुद्ध मराठी ही एका इंग्रजाने कायम केलेली आहे. तिला शुद्ध म्हणणे म्हणजे

धारोष्ण गोमुत्र शिंपडल्यास दोष रहात नाहीत* - पुणेकर शास्त्री विद्वान.

*अगदी व्याकरणाचेही

बॅटमॅन Mon, 22/09/2014 - 14:03

In reply to by मी

आमच्या माहितीप्रमाणे गोमूत्रास धारोष्ण ही संज्ञा लावली जात नाही. मूळ दावा पडताळून पहावयाचा जाहल्यास थंड गोमूत्र शिंपडले तरी दोष राहतो असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.

घाटावरचे भट Mon, 22/09/2014 - 13:32

In reply to by सिफ़र

थोडक्यात तुम्ही कुठल्या घाटावरचे भट?

मी जन्मापासून पुण्यातच आहे. पण माझी आजी जळगावची आहे. ती कधी कधी वापरते हा शब्द.

घाटावरचे भट Mon, 22/09/2014 - 14:09

In reply to by अनुप ढेरे

माहित नाही. मी इतके दिवस त्याचा अर्थ फतरे = पत्थर = दगडं असा लावत होतो. असो. आमचं भाषिक अज्ञान काय सांगावं....

अतिशहाणा Fri, 19/09/2014 - 17:41

In reply to by घाटावरचे भट

रोझा, दिलसे वगैरे काळातला रहमान वेगळाच होता. कदाचित त्या काळात त्याचे प्रयोग नाविन्यपूर्ण वाटत असत. आता त्याचं निव्वळ दळण चालू आहे. जय हो ला ऑस्कर मिळाल्यापासनं तर त्याचं संगीत फारच टीपिकल झालंय. एखाद्या गाण्याची नुसती सुरुवात ऐकली तरी 'रहमान' असं लगेच कळतं इतकं सगळं प्रेडिक्टेबल आहे.

चिंतातुर जंतू Fri, 19/09/2014 - 19:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>> कमी झाली आहेत हे खरं आहे, पण आहेत.

शांत प्रकृतीची नवी उदाहरणं म्हणून वर दिलेल्या दोन्ही गाण्यांमधलं ऑर्केस्ट्रेशन ऐकलं तर मला माझाच मुद्दा सिद्ध झाल्यासारखा वाटतोय. गाण्याचा मूड किंवा जातकुळी पाहता त्यांना इतके नाचरे ठेके नसते तरी चाललं असतं, पण ते दिले जातात. किंबहुना तशी सक्तीच असल्यासारखे दिले जातात. त्या जुन्या 'सुवर्ण'काळात नौशाद आणि शंकर जयकिशन ह्यांनीही असंच केलं होतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 19/09/2014 - 19:44

In reply to by चिंतातुर जंतू

'किनारा किनारा'मधल्या गाण्यात चिक्कार व्हायलिनं वाजतात; गायिकेचं कौशल्य किती जास्त, गायिका किती वरच्या पट्टीत गाऊ शकते हे दाखवण्याजागी नवीन शांत गाण्यांमध्ये बहुसंख्य लोकांना जवळचे वाटतील असे ठेके, चटकन आत्मसात करता येतील अशा चाली वापरले आहेत. उलट आता संगीत लोकाभिमुख झालेलं आहे.
(आणि उगाच शेवटची काडी - बायका कमी रड्या दाखवल्या जात आहेत.)

लॉरी टांगटूंगकर Sat, 20/09/2014 - 20:09

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चक ले ये मुरब्बा वाला शिनेमा पाहीलाय कोणी?? कसा आहे? गाण्याचा व्हिडीओ पाहून भारी असेल असं वाटतं आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 21/09/2014 - 04:26

In reply to by लॉरी टांगटूंगकर

थोडा वेळ चांगली करमणूक होते. हा धागा आधीच वाचल्यामुळे मला चित्रपट पाहून आनंदच झाला.

बॉम्बे टॉकीज - कभी गम, कभी...?

अनुप ढेरे Sun, 21/09/2014 - 08:31

In reply to by लॉरी टांगटूंगकर

त्या सिनेमातली मुरब्बा गोष्ट भारीच आहे. अनुराग कश्यप म्हणजे फक्त दारू, ड्रग्स, खून, फसवणूक एवढच नाही हे कळतं. पण एखाद्या शहराची अंडरबेली दाखवणं, नॉर्मली कोणी बघायला जात नाही अशा भागात चित्रिकरण ही त्याची खासियत याहीमध्ये दिसते. मस्तं आहे ती गोष्ट.

अमुक Fri, 19/09/2014 - 19:46

नंदनने उल्लेखलेल्या पुनरावृत्तीवाल्या मुद्द्यासोबत जाणारा विचार कौशल इनामदार याने २००६ साली मांडला आहे. संपूर्ण लेख वाचनीय आहे पण इथे त्यातला सुसंगत भाग देतो आहे.

I started humming the tunes of Roja, the moment I stepped out of the theatre. The tunes had a great recall value and despite that, I discovered in some time that humming these tunes was not so enjoyable. I did not give it much thought then, but later when Bombay released, and the same phenomenon was repeated, I was curious. In both cases, I had loved the music. It had excited me. And yet humming it was not enjoyable. It was when I was going through an economics book and came across Alfred Marshall’s Law of Diminishing Marginal Utility when I broke the ‘Rahman’ code, and like Perry Mason, I kicked my leg for not getting the solution earlier.
...
...
...
Using Illayaraja’s technique of composition, Rahman’s standard composition was broken into short musical phrases which were repeated in different words. Take for example:
Dil hai Chhota sa,
(Repeat with a minor change) Chhoti si Aasha
(Repeat the same phrase) Masti bhari Man ki
Bholi si Aasha

Now what has happened here is that you have already heard the complete phrase twice. The same formula is repeated throughout the song. Now, what happens in effect is that we are hearing the song twice or thrice in one go! You can compare it to a Salil Chowdhari’s song for instance – ‘Tasveer teri dil mein’. You’ll notice that all the musical phrases in the sign line (dhruvapad) are different. Illayaraja, and later, Rahman used this new technique of composition. It gave a recall value to the tune but also ensured that its shelf life was shorter. Slowly but surely all music directors in the Hindi film industry also started using the same technique. It was a very foolproof technique and you could see that in songs of Anu Malik and Anand-Milind, whenever they were not lifting a composition in toto! But nobody could do it like Rahman and that is what differentiated him from the pack. It is not enough to just have short, repetitive phrases – they also needed to be consistently melodious and this is what Rahman did the best.

मला व्यक्तिशः रहमान फार आवडतो तो त्याच्या संगीततल्या नव्या 'ध्वनी'मुळे आणि प्रयोगशीलतेमुळे. चिंजंच्या भावनेशी बर्‍यापैकी सहमत आहे. परंतु चित्रपटांच्या मागणीनुसार त्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे रहमान चित्रपटेतर संगीतात कसा आहे ? हा खरा प्रश्न उरतो.
रहमानचे एक शांत प्रवृत्तीचे हे गाणे - 'कण्णथ्थिल मुत्थमित्ताल' या चित्रपटात आणि तेच गाणे चित्रपटाविना.
एक चित्रपटातले अंगाईगीत.
अर्थात, अशी गाणी बोटावर मोजण्याइतकीच आहेत, हे खरे.

रोचना Sat, 20/09/2014 - 08:05

In reply to by अमुक

रोचक निरीक्षण आहे.

माझा सर्वात आवडता आल्बम "थिरुडा थिरुडा". त्यातल्या "वीरपांडी कोटयिले" मधलं ऑर्‍केस्ट्रेशन अजूनही खूप आवडतं.

कादलन चा आल्बमही मस्त होता.

विषारी वडापाव Fri, 19/09/2014 - 20:55

बाय द वे दुनिया दिलवालो की मधल जा री जा हे गाण आणि हुसैन साहेबांच्या मीनाक्षी मधल सोनू च दो कदम और सही हे गाण रहमान ची बेस्ट आहेत अस माझ एकल कोंड मत : )

अस्वल Sat, 20/09/2014 - 22:04

In reply to by विषारी वडापाव

दो कदम और सही -नक्कीच. खूपच सुंदर चाल आहे आणि गायलंयही ग्रेट!
जनरली पब्लिक रोजा/दिल से किंवा बाँबे ह्यातल्या गाण्यांना जेवढं भारी समजतात तसं ह्या गाण्याला नाही.
का कोण जाणे.

अमुक Sat, 20/09/2014 - 09:40

In reply to by नितिन थत्ते

राह में उन से मुलाक़ात हो गई, जिसे डरते थे वोही बात हो गई....> सुन सुन सुन बरसात की धुन सुन.....> सऽ सऽ ओ सऽ, वी लऽव यूऽऽऽ
तो स्वतःच्या एका गाण्याची चाल स्वतःच्याच दुसर्‍या गाण्यांना लावणारा अन्नू मलिक ? ;) (वर दिलेली शेवटची दोन तर एकाच चित्रपटातली आहेत !)

अमुक Sun, 21/09/2014 - 02:11

In reply to by आदूबाळ

१. होय, बरोबर आहे. 'होडी चाले लाटेवरी' हे मला 'माजें राणी माजें मोगा'पेक्षाही अधिक आवडते. विशेषतः त्यातल्या तालवाद्याचा नादामुळे आणि कडव्याच्या चालीमुळे जी 'माजें राणी'पेक्षा वेगळी आहे.
२. माझ्या मूळ वाक्यानंतरच्या ;) या भावमुखीचा अर्थ कळलेला दिसत नाही तुम्हाला. अन्नु मलिकच्या नांवे खवचटपणा करत होतो थोडा. माझे वाक्य म्हणजे त्याची ओ़ळख नव्हे आणि त्याची काही गाणीदेखील मला बरी वाटतात. पण त्याबद्दल बोलणे इथे अतिअवांतर होईल.
३. थत्ते चाचा प्रथम खरेच थट्टा करीत आहेत असे वाटले म्हणून विचारले. पण नंतर हिमेश रेशमिया अधिक यादगार, रहमान मेलोडियस वाटत नाही, वगैरे प्रतिक्रिया आल्यावर माझे विचार खुंटले. अर्थात तो माझा दोष. ढोबळ मानाने का होईना, रेशमिया साहेबांच्या गाण्यातली सौंदर्यस्थळे कुठली वा ती गाणी अधिक यादगार कशी ते मनोबांकडून आणि टिंकू यांना अभिप्रेत असलेली मेलोडियस गाणी कोणती ते जाणून घ्यायला आवडेल, पण ते या धाग्यावर निश्चितच नव्हे.

नितिन थत्ते Sun, 21/09/2014 - 08:08

In reply to by अमुक

मला रहमानची रोजा आणि बॉम्बे मधील गाणी आवडली होती. परंतु रंगीलामधील गाणी अगदीच एकसुरी (कंठाळी) वाटली. चल छैया छैया हे चाल म्हणून आवडत नाही (शब्दांसाठी आवडते).

मला एक जान हैं हम आणि बाजीगरमधील तसेच विजयपथमधील गाणी आवडतात. (उंची है बिल्डिंग लिफ्ट तेरी बंद है वगैरे सोडा).

अतिशहाणा Sat, 27/09/2014 - 19:01

In reply to by नितिन थत्ते

मला टीपेला लावलेला सुखविंदर सिंगचा आवाज आवडत नाही. थोडा अंडरप्ले केलेली त्याची गाणी चांगली आहेत.

छैया छैया हे मलाईका अरोरा, शाहरुख आणि टीपेला लावलेला सुखविंदर असा डेडली कॉँबो असलेले टोटल टॉर्चर साँग आहे. (मला त्याची चाल आवडते. शब्द नाही). रोडट्रिप साँग म्हणून स्वदेशमधले यूँ ही चला चल राहीचे शब्द आवडले.

ॲमी Sun, 21/09/2014 - 20:04

In reply to by अमुक

मेलडीच ऐकायची असेल तर मी ५०-६० दशकातील गाण्यांना शरण जाते. त्याआधीची थोड्या गेंगण्या आवाजातली वाटतात. ७०मधेदेखील कधीकधी मेलडी सापडते.

तेरे नामचे संगीत हिमेसभाईने आणि विरासतच अन्नू मलीकने दिलय हे ऐकून फार आश्चर्य वाटलेल. (याचा अर्थ 'मला ती गाणी मेलडीयस वाटतात' असा नाही. 'हिमेस, अन्नुला नेहमी ज्यापद्धतीच्या संगीताशी बद्ध केले जाते; त्यापेक्षा वेगळे संगीत या दोन चित्रपटांत आहे' असे म्हणायचे आहे.)

विषारी वडापाव Sat, 20/09/2014 - 10:41

In reply to by मन

मला इम्तिआज अली आणि प्रीतम हे combination (जब वि मेट आणि लव आज काल ) इम्तिआज अली ह्या combination पेक्षा (रॉक स्टार आणि हाय वे ) जास्त आवडल होत

ॲमी Sat, 20/09/2014 - 18:10

In reply to by मन

+२
रहमान कधीच आवडला नाही. मेलोडीअस वाटला नाही. अगदी रोजा, दिलसे, बाँबे, रंगिला मधेपण.
रॉकस्टार अत्यंत रटाळ शिन्मा+संगीत!

'न'वी बाजू Sat, 20/09/2014 - 21:23

In reply to by ॲमी

रहमान कधीच आवडला नाही.

असे पब्लिकमध्ये, चारचौघांत, म्हणायला धाडस लागते. त्यामुळे, असा प्रतिसाद कोणी दिल्यास त्यास केवळ 'मार्मिक' अशी श्रेणी देऊन आम्ही मागल्यामागे पसार होतो, नि नामानिराळे राहतो.

- (भित्री भागूबाई) 'न'वी बाजू.

नंदन Mon, 22/09/2014 - 09:01

शांत प्रकृतीची नवी उदाहरणं म्हणून वर दिलेल्या दोन्ही गाण्यांमधलं ऑर्केस्ट्रेशन ऐकलं तर मला माझाच मुद्दा सिद्ध झाल्यासारखा वाटतोय. गाण्याचा मूड किंवा जातकुळी पाहता त्यांना इतके नाचरे ठेके नसते तरी चाललं असतं, पण ते दिले जातात. किंबहुना तशी सक्तीच असल्यासारखे दिले जातात.

चिं.जं.नी मांडलेल्या ह्या मुद्द्याशी सहमत आहे. एकंदरीतच इंद्रियांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आवश्यक लसावि वाढत चालला आहे.

थोडे अवांतर - यावरून हा लेख आठवला - http://www.wired.com/2013/06/online-trailers-cuts/

ऋषिकेश Mon, 22/09/2014 - 09:21

मला गाणं ऐकायला आवडतं, पण इतर विषयांसारखं त्यावर काही अर्थपूर्ण बोलताच येत नाही नी इतर चर्चा करत असतील तर अनेकदा डोक्यावरून जाते.
त्यापार्श्वभूमीवर ही चर्चा नुसती बर्‍यापैकी समजलीच नाही तर आवडलीही!

सगळ्यांचेच आभार!

घाटावरचे भट Mon, 22/09/2014 - 09:48

In reply to by मन

पण ही जुगलबंदी कीम्वा चढाओढ असल्यासारख्या भावनेतून लिहिली गेलिये.
लिहिलं काय आहे, सादर काय होतय. कशाचा कशाला पत्ता.

ही जुगलबंदीच आहे. चढत्या क्रमाने इंटरेस्टिंग होत जाणारी (नायतर दिल चाहता है मधली 'जाने क्यों लोग प्यार करते हैं' बघा, कशी मिळ्मिळीत वाटते, अर्थात त्याचा मूडही वेगळा आहे म्हणा). आणि ते गाणं पडद्यावर सादरही तसंच केलं गेलं आहे. आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट - एखाद्या गाण्यासाठी चपखल गायक/गायिका निवडण्याच्या बाबतीत रेहमानचा हात धरणारा कोणीही नाही. सब घोडे बारा टक्के न्यायाने सर्व गाणी कुमार सानू नाय तर उदित नारायणच्या आवाजात ऐकायची सवय लागलेल्या आपल्या सर्वांना रेहमाननेच अनेक नवनवीन गायक/गायिकांची ओळख करून दिली. आता तुम्ही दिलेलं गाणंच बघा - व्यवहारी लोकांना रिप्रेझेंट करणार्‍या प्रभू देवाला उंच आणि शार्प असलेला शंकर महादेवनचा आवाज आहे (जो गाण्याच्या शेवटी डोक्यात जातो, किंबहुना माझ्या मते दॅट इज इंटेंडेड) आणि प्यार वगैरे साईडला कविता कृष्णमूर्तीचा गोड, तिच्या नेहेमीच्या पट्टीच्या थोडा खाली लावलेला आवाज आहे (ज्यामुळे तो अजूनच गोड वाटतो).. म्हणजे गाण्याच्या चालीतून / गायकांच्या आवाजातून / नृत्यातून (आठवा: प्रभुदेवाचं आक्रमक नृत्य आणि त्यासमोर माधुरीची ग्रेस) सर्व प्रकारे जुगलबंदीचा परिणाम साधण्याचा प्रयत्न केला आहे. सबब 'लिहिलं काय आहे, सादर काय होतय. कशाचा कशाला पत्ता.' हा आक्षेप सर्वस्वी अमान्य.

तो शब्द काहीही कसेही तोडतो. गाण्याला चाल म्हणून.

असहमत. एक तरी उदाहरण द्या! उलट आजकाल आधी चाल तयार होते आणि त्यावर गीतकार शब्द लिहितो, ज्यात ही शक्यता खूप कमी होते.

मेघना भुस्कुटे Mon, 22/09/2014 - 10:31

In reply to by घाटावरचे भट

हा मनोबानी 'लोकापवादाला भिऊन वगैरे' उडवलेला प्रतिसाद. खास तुमच्यासाठी!
***

अर्थ , शब्द ह्यांची प्रमाणाबाहेर कत्तल केली गेली की त्रास होतो.
"पुकार" चित्रपटातील हे हिट्ट गाणं पहा :-
Pyaar zindagi, pyaar har khushi,
Pyaar jisne paaya hai
Vohi dil phool jaisa khilaa
Pyaar galti hai, pyaar dhoka hai
Pyaar galti chaaya hai
Dekho phir naa karna gilaa
Oh, pyaar zindagi, pyaar har khushi,
Pyaar jisne paaya hai
Vohi dil phool jaisa khilaa
Pyaar galti hai, pyaar dhoka hai
Pyaar galti chaaya hai
Dekho phir naa karna gilaa
Pyaar hi dhadkanon ki kahani hai
Pyaar hai haseen daastan
Pyaar ashkon ki Behta nishaani hai
Pyaar mein hai chain kahan
Pyaar ki baat jisne naa maani hai
Uski naa to zameen hai naa hai aasman
Naujawaanon, baat maano
Kabhi kisise naa pyaar karna
Hey, que sera sera sera, jo bhi ho so ho
Hamein pyaar ka ho aasara, phir chaahe jo ho
Hey, que sera sera sera, jo bhi ho so ho
Hamein pyaar ka ho aasara, phir chaahe jo ho
Oh, pyaar jaise hai purab paschim
Pyaar hai uttar dakshin
Yahan hai pyaar hi har dishaan
Pyaar rog hai, pyaar dard hai
Pyaar tode dil ek din
Yahi hai pyaar ka silsila
Pyaar se hi to rangeen jeevan hai
Pyaar se hi dil hai jawaan
Pyaar kaaton ka jaise koi pann hai
Pyaar se hi gham ka samaa
Pyaar se jaane kyoon tumko uljhan hai
Pyaar to saari duniya pe hai maherabaan
.
.
.
भडक्क रंगसंगती, भन्नाट डान्स, सोबतीला माधुरी-प्रभुदेवा ह्यांच्यामुळे हे लक्षात राहतं.
पण ही जुगलबंदी कीम्वा चढाओढ असल्यासारख्या भावनेतून लिहिली गेलिये.
लिहिलं काय आहे, सादर काय होतय. कशाचा कशाला पत्ता.
हे सर्वात जास्त रेहमानभाउ करतात. म्हणून त्यांच्या नावानं आम्ही खडे फोडतो.
तो शब्द काहीही कसेही तोडतो. गाण्याला चाल म्हणून.
किंवा असं असेल की ते मुळात रेहमान ऐकायला-आवडायला एखादं वेगळं इंद्रिय लागत असावं आणि ते नसल्यानं हा त्रास होत असवा.
ठेका, वेगळ्याच वाद्यांचा वापर ह्याबद्दलची कारागिरी भन्नाट आहेच.
पण त्यासाठी शब्दांचे, अर्थाचे खून पाडायलाच हवेत का ?
(वरील गाणं हे सरळसरळ अमिताभ- संजीव कुमार-शशीकपूरच्या "त्रिशूल" पिच्चरमधल्या "मोहब्बत बडे काम की चीज है" स्टाइलवरून लिहिल्यासारखं दिसतय.
मोहब्बतवाले आणि व्यवहारी ह्यांच्यातला तो गाण्यातला संवाद आहे.)

आता वरील भूमिका मनोबानी सोडून दिलेली असल्यामुळे ती गैरलागू आहे. तरी वरील प्रतिसाद वाचू नये.

मन Mon, 22/09/2014 - 10:27

In reply to by घाटावरचे भट

बरोबर आहे.
रेहमान हा एक थोर वन ऑफ द सार्वकालिक महान वगैरे वगैरे आहे.
जो काही आहे तो तोच आहे.
मी म्हण्णं मान्य केलं आहे.
आता मेघनानं खोडसाळपणा थांबवून माझा इथे छापलेला प्रतिसाद उडवावा.
(कारण तो आता गैरलागू आहे. त्या प्रतिसादात लिहिलेली भूमिका आता माझी नाही.
तो प्रतिसाद उडवला जाणं योग्य्/आवश्यक आहे.
मला प्रतिसाद प्रकाशित करण्याचा अधिकार असेल तर अप्रकाशित करण्याचाही अधिकार हवा/आहे.
प्रतिसाद अशा पद्धतीनं पुन:प्रकाशित करणं हा अधिकाराचा भंग होय.
)

ऋषिकेश Mon, 22/09/2014 - 11:54

In reply to by मन

प्रतिसाद अशा पद्धतीनं पुन:प्रकाशित करणं हा अधिकाराचा भंग होय

असे वाटत नाही.
कारण वाचकांच्या अधिकारांचं काय?
का लेखकाने एकदा प्रकाशित केल्यावर व विकल्यावर आता मला तसं म्हणायचंच नव्हतं म्हणून पुस्तकं पुन्हा मागवून घ्यावीत?

मन Mon, 22/09/2014 - 12:00

In reply to by ऋषिकेश

कंटाळलो त्याबद्दल बोलून.
अवांतर :-
आम्ही इतके दखलपात्र आहोत हे पाहून क्षणभर मनोमन सुखावलो.
(ह्या टिचभर जालीय दुनियेत दोन्-पाच आय डी वगळता तसंही कुणाला टैम असणार आमच्याकडे लक्ष द्यायला असं वाटायचं.)

अमुक Tue, 23/09/2014 - 01:07

In reply to by घाटावरचे भट

'के सेरा सेरा'बद्दलचे टंकनश्रम वाचवल्याबद्दल अतिशय धन्यवाद.

रेहमाननेच अनेक नवनवीन गायक/गायिकांची ओळख करून दिली.
...................सहमत. 'दिल हैं छोटासा' गाणार्‍या मिनमिनीचे नांव तरी आधी / नंतर ऐकले होते का कोणी ? किंवा 'हरिणी' या १३ वर्षांच्या मुलीकडून प्रथमच गाऊन घेतलेले 'निल कायगिरदु' हे 'इंदिरा' चित्रपटातील गाणे ऐका. निव्वळ ती १३ वर्षांची आहे वा आवाज चांगला आहे यापेक्षाही चित्रपटातल्या कलाकारास / प्रसंगास एकादा आवाज साजेसा वाटला तर तो त्याने प्राधान्याने वापरला आहे. किंवा हिंदीत बर्‍यापैकी उपेक्षित राहिलेल्या साधना घाणेकर (सरगम) हिच्याकडून अनेक गाणी रेहमानने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांत गाऊन घेतली आहेत. माझ्या मते त्याच्या संगीताची मागणीच अशी आहे की अनेक कमावलेल्या अष्टपैलू गायक गायिकांच्यापेक्षा वेगवेगळ्या पोतांचे आवाज असलेल्या आणि रूढ अर्थाने पार्श्वगायकीस साजेसे नसलेल्या आवाजांना सहज सामावून घेता येते. थोडक्यात, त्याचे संगीत हे विवक्षित गायकीआवाजावर अवलंवून नसून एकत्र नादमेळावर अवलंबून आहे. इतकेच नव्हे तर विवक्षित शब्दांचीही खरे तर गरज पडत नाही कारण त्याचे संगीत तितकेसे शब्दप्रधान नाही. अन्यथा आम्हाला इतकी सौदिंडियन गाणी आवडती ना. असो.

असहमत. एक तरी उदाहरण द्या!
.................गाणे तोडण्याचा आरोप मी प्रथमच ऐकतो आहे कारण आत्तापर्यंत तसे कधी जाणवलेच नाही.
थोडा विचार केला असता एक गाणे आठवले कारण ते प्रथम ऐकताना त्यातले रहमानने घातलेले स्वल्पविरामी हेलकावे फारच लोभस वाटले होते.
'तक्षक' चित्रपटातले 'बूँदोंसे बाते' हे गाणे.
कडवे : मैंने पूछा बूँदोंसे सच सच बोलो हैं राज़ क्या यूँ बरसे घटा किस ग़म में
..........कहने लगी ये तो आस हैं किसी की चाह में खुशियों के
..........पर्वत की दिवानी वो, बरसे घटा मस्तानी वो, मुझमें भी हैं दिवानापन किसीका
..........देखो करने लगी हूँ मैं बूँदोंसे बाते...

यात 'सच सच बोलो | हैं राज़ क्या यूँ | बरसे घटा | किस ग़म में
.......कहने लगी ये | तो आस हैं किसी | की चाह में | खुशियों के'
अशी रचना केली आहे जी मला फारच आवडते. कदाचित अश्या प्रकाराला मनोबा तोडणे म्हणत असावेत.

नंदन Wed, 24/09/2014 - 05:31

रहमान आणि रिपिटेशन ह्या थीमवर पुनश्चः

१. 'आय'मधल्या रहमानच्या एका गाण्यावर राजने लिहिलेला 'सोनाटा' नावाचा लेख.

२. गेल्या वर्षी 'रेडिओलॅब' ह्या कार्यक्रमात ऐकलेला हा भाग. एखादं वाक्य पुन्हा पुन्हा म्हटलं (इथे दिलेलं उदाहरण - 'sometimes behave so strangely') की त्यातली नादमयता कशी जाणवते, हे सुरुवातीलाच स्पष्ट होतं.
http://www.radiolab.org/story/91512-musical-language/