Skip to main content

ही बातमी समजली का? - ८

भाग | | | | | |

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ११०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

-----

'जोगवा' आणि '७२ मैल' सारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक राजीव पाटील ह्यांचं वयाच्या चाळिशीत हृदयविकारानं निधन.

'न'वी बाजू Mon, 30/09/2013 - 21:33

(शुभवर्तमान, अर्थात गोग्गोड बातमी)

देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे. (यूहन्ना (किंवा याह्या, किंवा (मराठीत) योहान) ३:१६)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 30/09/2013 - 23:25

बातमी अशी नाही. पण महिन्याच्या सुरूवातीला पास झालेल्या कायद्याच्या निमित्ताने एका सरस्वतीची गोष्ट:

Manual scavenging: The worst job in India; PS: it’s illegal too

नंदन Tue, 01/10/2013 - 13:53

गर्भपात करावा की करू नये, हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीला आहे.
-- गव्हर्नर रिक पेरी नव्हे तर त्याची बायको अनिता पेरी.

टेक्ससमधले सगळेच रिपब्लिकन्स अजून मध्ययुगात चाचपडत नाहीत, हे पाहून अं. ह. झालो :)

राजेश घासकडवी Wed, 02/10/2013 - 06:41

In reply to by नंदन

टेक्ससमधले सगळेच रिपब्लिकन्स अजून मध्ययुगात चाचपडत नाहीत, हे पाहून अं. ह. झालो

नवऱ्याचं आडनाव घेतलं, आणि टेक्ससमध्ये फर्स्ट लेडीची भूमिका निभावली म्हणून त्याच्या बायकोलाही रिपब्लिकनत्व बहाल करायचं? नंदन, तुमसे ये उम्मीद नही थी.

ऋता Wed, 02/10/2013 - 18:36

अल कायदा इतर कट्टर इस्लामिक संघटनांना आपल्या पंखाखाली घेऊन मोठी होत आहे-http://www.bbc.co.uk/news/magazine-24306159 .
भारतात याबद्दल नक्की कुठल्या पातळीवर काय उपाययोजना चालू आहे हा प्रश्न पडतो. युद्धांच्या वेळी भारत एक होतो असा इतिहास असला तरीही दहशतवादा विरूद्ध ही एकजूट कशी प्रदर्शित करणार ?

ऋषिकेश Thu, 03/10/2013 - 09:28

In reply to by ऋता

याचे उत्तर माहित नाहीच पण यानिमित्ताने अश्या प्रश्नांबद्दल अधिकृत माहिती जाणून घ्यायचे उपाय सांगतो.
१. तुमच्या भागातील खासदाराला* प्रश्न पाठवा व त्याला सदर प्रश्न संरक्षणमंत्र्यांना प्रश्नोत्तराच्या तासात/किमान लिखित स्वरूपात विचारायची विनंती करा**. बहुतांश खासदार (स्वतःला अडचणीत आणणारे प्रश्न सोडल्यास) सकारात्मक उत्तरे देतात असा अनुभव आहे.
किंवा
२. थेट संरक्षणमंत्र्यालयाला तुम्ही पत्र लिहु शकता
किंवा
३. वृत्तपत्रात लेख लिहिता आल्यास उत्तम, नपेक्षा वाचकांच्या पत्रात तरी उल्लेख करा. बर्‍याच लोकप्रतिनिधींचं या सदराकडे, आपल्याला वाटतं त्यापेक्षा अधिक लक्ष असतं :)
किंवा
४. वरील तिन्ही उपाय ;)

==========
* खासदार सत्ताधारी पक्षाचा असला तरी हरकत नाही, तोही प्रश्न विचारू शकतो.
**प्रश्न संसद सत्र सुरू व्हायच्या आधीच पाठवता येतात - पाठवावे लागतात, तेव्हा सध्याचा काळ योग्यच आहे.

ऋषिकेश Thu, 03/10/2013 - 17:39

In reply to by ऋता

आभार!
प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाखाली असला तरी थेट तुम्हाला किंवा फक्त तुम्हालाच होता असे नाही.
केवळ त्यानिमित्ताने दिला होता :)

गैरसमज नको म्हणून हे स्पष्टीकरण

नगरीनिरंजन Fri, 04/10/2013 - 09:00

http://www.firstpost.com/life/road-kill-the-national-emergencyplain-sight-1130401.html
तासाला १३ मरतात म्हणे. मिनिटाला ५० जन्माला येतात त्यापुढे हे प्रमाण नगण्यच म्हणा!
प्रत्येक धर्माने घेतलेल्या बळींप्रमाणे हे प्रगतीधर्माचे बळी आहेत असे निराशावादी लोक लगेच म्हणतीलच. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/10/2013 - 07:33

In reply to by नगरीनिरंजन

A large body of evidence suggests that humans are far more likely to develop fears of dangers that were present in the ancestral environment, but far less to dangers in the current environment, Snakes for example, are hardly a problem in large urban cities, but automobiles are. Fears of cars, guns, electrical outlets, and cigarettes are virtually unheard of, since these are evolutionarily novel hazards -- too recent for selection to have fashioned specific fears. The fact that more city dwellers go to psychiatrists with fears of snakes and strangers than fears of cars and elecrtical outlets provides a window into hazards of our ancestral environment.

-- Evolutionary Psychology by David M. Buss, p.87, copyright Allyn and Bacon.

राजेश घासकडवी Wed, 09/10/2013 - 06:51

In reply to by नगरीनिरंजन

हा प्रश्न गंभीर आहे हे खरंच आहे, पण राष्ट्रीय आणिबाणीचा आहे की नाही याविषयी शंका आहे.

We have 1% of the world’s registered motor vehicles but account for 9% of traffic deaths

हे नोंदताना हेही लक्षात घेतलं पाहिजे की भारताची लोकसंख्या जगाच्या १७.५% आहे. आकडेवारीबाबतही एकंदरीत नक्की काय बरोबर हे कळत नाही. कारण इथल्या आकडेवारीनुसार जगाच्या सरासरीत आणि भारताच्या आकडेवारीत दहा टक्क्यांपेक्षा फरक नाही. नऊ पटीचा तर निश्चित नाही. वरची 'जगाच्या १% मोटर व्हेहिकल्स' ही आकडेवारी निश्चितच संशयास्पद वाटते.

अपघातांचं प्रमाण लोकसंख्येच्या मानाने वाढलेलं आहे हे निश्चित. १९७० ते २०१० या काळात लोकसंख्या २.२ पट झाली, तर अपघाती मृत्यू ९.२ पट झाले. मात्र याचबरोबर वाहनांची संख्या ८२ पट झालेली आहे आणि रस्ते ३ पट वाढलेले आहेत. (दुवा पृ ९) थोडक्यात असं म्हणता येईल की ७० साली वहानं जवळपास नव्हतीच, त्यामुळे रिकामे रस्ते होते. आता माणसं आणि वहानं यांची गर्दी वाढली पण रस्त्यांचं प्रमाण पुरेसं वाढलं नाही म्हणून अपघात वाढले. एका अर्थाने प्रगतीची किंमत म्हणण्यापेक्षा रस्ते दहापट करण्याचा खर्च न परवडल्यामुळे ही वाढ झाली आहे असं म्हणता येईल. ९० च्या दशकात मोठ्या प्रमाणावर रस्तेबांधणी झाली, तेव्हा अपघाती मृत्यूंच्या वाढीचा दर काहीसा आटोक्यात होता. मात्र त्यानंतरच्या दशकात ही समस्या अधिक बिकट व्हायला लागलेली आहे हे उघड आहे.

परदेशांत पादचारी आणि वहानं यांचं प्रमाण भारताच्या तुलनेने व्यस्त असतं. तिथे अपघात होतात ते रस्ते कमी पडल्यामुळे नव्हेत, तर वेग वाढल्यामुळे होतात. यालाही एका अर्थाने प्रगतीची किंमत म्हणता येईल. पण निदान अमेरिकेत तरी ते प्रमाण गेली पन्नासेक वर्षं सातत्याने कमी होत चाललेलं आहे. सीटबेल्ट, हेल्मेट, एअरबॅग, अधिक चांगल्या गाड्या यांमुळे अपघाती मृत्यू घटले आहेत.

प्रवास हा कायमच धोक्याचा ठरलेला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला ठगच दरवर्षी काही हजार प्रवाशांना मारत. आणि हे अनेक शतकं चालत आलेलं आहे. दरोडेखोर, वाटमारे, पूर, अतिवृष्टी, आणि अपघातांचे बळी वेगळेच. आज एकविसाव्या शतकात धोका त्याकाळपेक्षा वाढलेला आहे का? मला वाटत नाही.

अजो१२३ Mon, 07/10/2013 - 10:55

अल्पसंख्यकांनी कर्ज बुडवले तर काय बिघडले असा एक युक्तिवाद.
http://ibnlive.in.com/news/not-a-problem-if-minorities-do-not-repay-gov…
बहुसंख्य - सवर्ण - उच्चशिक्षित - पुरुष - धडधाकट - कमावता , इ इ असल्याने माणसाचा एकूण किती कॉस्ट मोजावी याचे छान पैकी मॉडेल तयार होईल.

बॅटमॅन Mon, 07/10/2013 - 12:46

In reply to by अजो१२३

आशिष नंदींच्या विधानाची आठवण झाली. दलितही भ्रष्टाचार करतात म्हणजे लोकशाही समर्थ आहे इ.इ.इ.

विसुनाना Mon, 07/10/2013 - 15:47

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन , तुमचा(ही) गैरसमज झाला असावा असे वाटते. (तसे नसावे अशी आशा आहे.)
त्यांना असे म्हणायचे होते की - 'तुम करो तो शिष्टाचार, हम करे तो भ्रष्टाचार? आँ?'

आजवर उच्चवर्णियांनी जो शिष्टाचाराप्रमाणे दिसणारा भ्रष्टाचार केलेला आहे (उदा. अगदी साधे - माझ्या मुलाला तुझ्या युनिव्हर्सिटीतून पीहेच्डी दे! = तू मुझे खुजा, मै तुझे खुजाऊं ) तो शर्करवगुंठित असल्याने कुणाला दिसला नाही. दलितांच्या हातात आता कुठे, नुकतीच सत्ता आल्याने त्यांना स्वतःच्या भ्रष्टाचारावर पांघरूण कसे घालावे ते समजत नाही / किंवा ते अत्यंत सफाईने तो करू शकत नाहीत. म्हणून हल्लीच्या काळात जास्तीत जास्त दलित भ्रष्टाचार करताना पकडले जातात. दलित उच्च्वर्णियांपेक्षा जास्त भ्रष्ट असतात असा त्याचा अर्थ नाही.- असा त्यांचा (आशिस नंदी यांचा) युक्तीवाद होता.

बॅटमॅन Mon, 07/10/2013 - 16:22

In reply to by विसुनाना

तुमचे प्रतिपादन योग्यच आहे. पण नंदींच्या प्रतिपादनात दलितही भ्रष्टाचार करू धजावतात म्हणजे त्यांची तेवढी डेरिंग होते याचा अर्थ लोकशाही समर्थ आहे असा होतो हे एका अर्थाने लोकशाहीला योग्यच आहे असे एके ठिकाणी दिसले. त्या अनुषंगाने मी शोधलेले साधर्म्य ठीक आहे असे वाटते. पर्फेक्ट म्याच नसले तरी चालून जावे बहुतेक.

अजो१२३ Mon, 07/10/2013 - 15:52

In reply to by बॅटमॅन

हे वाक्य वाचल्यानंतर माझ्या मनात नंदींबद्दल बरीच इर्षा निर्माण झाली. सकाळपासून प्रयत्न करतोय कि मलाही असे एक वाक्य सुचावे, पण छ्या! ईश्वर काही लोकांना फार उच्च कोटीची प्रतिभा देतो, आणि आम्हाला एक वाक्य सुचायची मारामार. शेवटी बायका नवर्‍यांवर लुबाडगिरी करताहेत (ते 'तसलं' cheating on म्हणायचे आहे हो)तेव्हा समाज बलवान होत आहे इथपर्यंत झेप गेली, पण समाधान झालं नाही. उगाच प्रतिभावंतांच्या वाक्यातले शब्द फिरवल्यासारखं वाटलं.

याच/असल्याच आशयाचं पण नंदींपेक्षा भारी विधान करू शकणारा/री कोणी ऐसीवर आहे का?

सन्जोप राव Tue, 08/10/2013 - 06:27

In reply to by अजो१२३

याच/असल्याच आशयाचं पण नंदींपेक्षा भारी विधान करू शकणारा/री कोणी ऐसीवर आहे का?
आता सगळ्या जगाची नजर 'न'वी बाजू यांच्या प्रतिक्रियेवर लागून राहिली आहे.

'न'वी बाजू Thu, 10/10/2013 - 15:37

In reply to by सन्जोप राव

आता सगळ्या जगाची नजर 'न'वी बाजू यांच्या प्रतिक्रियेवर लागून राहिली आहे.

नंदींच्या लॉजिकनेच जायचे झाले, तर इथे आमच्यासारख्यांच्यासुद्धा प्रतिक्रियेची दखल घेतली जाते हे मराठी आंतरजाल भरभराटीला आल्याचे लक्षण मानावे लागेल. असो. टू ईच हिज़ (ऑर हर) ओन; आम्हां काय त्याचे!

अवांतर:

ऐशा नरा

शीर्षक रोचक आहे. यावरून एक बुद्धकथा आठवली. काहीशी अवांतरच आहे, परंतु तरीही ती इथे डकविण्याचा मोह आवरत नाही.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एकदा बुद्धांकडे एक गृहस्थ तावातावाने येतो. बुद्धदेव त्यास फलाहार अर्पून त्याचे आतिथ्य करतात. परंतु गृहस्थ वेगळ्याच मनःस्थितीत असल्याकारणाने त्या आतिथ्याचा अव्हेर करतो.

"हे बघ, मी इथे तुझ्याकडे फळे खायला आलेलो नाही. तेव्हा ती तू तुझ्याकडेच ठेव. मी तुला एवढेच सांगायला आलेलो आहे, की तू एक अत्यंत ढोंगी, धूर्त आणि पाजी मनुष्य आहेस." इथून सुरू करून पुढील पंधरा ते वीस मिनिटे तो मनुष्य बुद्धांना पाली भाषेतील तमाम सुरस आणि चमत्कारिक शिव्या ऐकवतो.

बुद्ध शांतपणे ऐकून घेतात. नि त्याचे झाल्यावर केवळ एक ट्रेडमार्क स्मितहास्य करून त्या मनुष्यास उद्देशून म्हणतात:

"बरे, मला एक सांगा. मी आपल्याला ही इतकी सारी फळे अर्पण केली. आपण ती स्वीकारली नाहीत. म्हणजे मग ती फळे नेमकी कोणाकडे गेली?"

"हॅ:! एवढे साधे कळत नाही? अरे, अर्थात तुझ्याकडे! आणि म्हणे मी बुद्ध!"

"बरोबर. आता मला सांगा. आपण मला या इतक्या सार्‍या शिव्या अर्पण केल्यात. मी त्या स्वीकारल्या नाहीत. म्हणजे मग त्या शिव्या नेमक्या कोणाकडे गेल्या?"
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

असो. तर या निमित्ताने आपल्या 'इमेल्डा मार्कोस-स्मृती संग्रहालय प्रकल्पा'स हार्दिक शुभेच्छा. आपला संग्रह उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊन त्रिभुवनात प्रसिद्धी पावो, अशी (आपण मानत नसलेल्या) ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना. तथास्तु!
==============================================================================================================
तळटीपा:

दुर्दैवाने पालीचा आम्हांस गंध नसल्याकारणाने आम्हांस त्या शिव्या अवगत नाहीत. सबब, आम्ही त्या येथे नोंदवू शकत नाही, याबद्दल दिलगीर आहोत.

तरी बरे, पुणे मुक्कामी आमच्या घरात असंख्य पाली सुखेनैव नांदत असत नि स्वैरसंचार करीत असत. तरीही काही उपयोग झाला नाही. एवढे करून आम्हांस पालीचा गंध नाही तो नाहीच!

'ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या'चा न्याय पालींना बहुधा लागू नसावा.

काळा मठ्ठ बैल … Thu, 10/10/2013 - 17:11

In reply to by 'न'वी बाजू

आता सगळ्या जगाची नजर 'न'वी बाजू यांच्या प्रतिक्रियेवर लागून राहिली आहे.

'ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या'चा न्याय

छे.
भरवशाच्या म्हशीला टोणगा.

मन Mon, 14/10/2013 - 09:11

In reply to by बॅटमॅन

सचिन हा भारताचा खरा बॅट्-मॅन (फळकूट मानव.)
त्याच्या निवृत्तीने ऐसी वरील बॅटमॅन(वटवाघूळ मानव) नि:शब्द झालेला दिसतो.

नगरीनिरंजन Mon, 14/10/2013 - 05:22

या प्रतिसादात ज्या वादळाबद्दल चर्चा झाली होती त्याबद्दल ही बातमी:
for-the-first-time-in-a-century-todays-middleclass-children-will-be-worse-off-than-their-parents
विकसित देशांतल्या मध्यमवर्गीय लोकांची मुले आणि विकसनशील देशांतल्या लोकांची नातवंडे त्यांच्याइतकी श्रीमंत नसतील असे या अहवालावरून वाटतेय.

मन Mon, 14/10/2013 - 09:21

In reply to by नगरीनिरंजन

१.मांजर खाली पडलं तरी चार पायांवर पडतं.
२.पाश्चात्त्य जगात आर्थिक आरिष्ट आलं तरी निम्मी लोकं भूकबळी म्हणून मरण्याची शक्यता नाही.
३.त्यांचं दारिद्र्यही आपल्या श्रीमंतीपेक्षा श्रीमंतच आहे.(हे तुम्हीच अ‍ॅज गुड अ‍ॅज इट गेट्स मध्ये म्हटलय.)
४.शेअर मार्केटचा पर्फेक्ट टॉप आणि पर्फेक्ट बॉटम कधीच तो निघून गेल्याशिवाय समज्त नाही. तो मागे वळून पाहतानाच समजतो.
कित्येकदा जो आपल्याला टॉप वाटतो, त्याच्या दहापट वाढ अजूनही शिल्लकच असते.(भारतीय मार्केट २००६ च्या असपास ६००० अंशावरून १००००वर गेलं; इतिहासात प्रथमच.हे "न भूतो" ठरलं.
पण "न भविष्यती" नाही. तिथून पुढल्या दोन्-तीन वर्षात ते २१००० ला पोचलं. आपण आहे ती प्रगती पाहून स्तंभित होत असलो, तरी शतकभरापूर्वीही मानव तेव्हाची प्रगती पाहून स्तंभित होत होता हे ही खरं. १९१० साली कोणता तरी रिपोर्ट होता त्यात "ह्यापुढे फारसे वैज्ञानिक शोध लागणे, उपकरणे बनणे वगैरे शक्य नाही" असा निष्कर्ष होता!) असो.
मूळ मुद्द्दा. ह्या एका पिढित जरी जीवनमान किंचित खालावलं तरी पाश्चात्त्य जीवनमानाची दिशा व आलेख खालीच जात राहणार हे खात्रीने कसे सांगता येइल?

आधुनिक तंत्रज्ञानए समस्या संपतीलच असे सांगता येत नाही, तसे संपणार नाहितच असेही सांगता येत नाही.
एकूणात काय, तर भ्रमित होण्यासाथी चांगला विषय आहे हा.

नगरीनिरंजन Mon, 14/10/2013 - 13:48

In reply to by अजो१२३

मला भीती वाटली तर त्यांना वाईट वाटेल म्हणून फक्त मी घाबरत नाही; अन्यथा मलाही फार सांख्यिकीविदाफोबिया आहे.
शिवाय त्यांच्या अॅडव्हान्स्ड स्टेजच्या आशावादाबद्दल काळजीही वाटते म्हणून अशा बातम्या टाकण्याचे पथ्य पाळावे लागते. ;-)

राजेश घासकडवी Sat, 26/10/2013 - 21:58

In reply to by नगरीनिरंजन

शिवाय त्यांच्या अॅडव्हान्स्ड स्टेजच्या आशावादाबद्दल काळजीही वाटते म्हणून अशा बातम्या टाकण्याचे पथ्य पाळावे लागते.

हा भारी वाईट रोग आहे हो. सुदैवाने या रोगाची लागण जगात फार लोकांना नाही. निराशावादाने बनलेली प्रकृती असल्या रोगाच्या संसर्गाला चांगलीच रेझिस्टंट असते ही आम जगाच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. ;)

अजो१२३ Mon, 14/10/2013 - 11:17

http://www.indianexpress.com/news/govt-suspends-ias-officer-for-controv…
यु पी त मिंटिंगच्या नोटीसचे टायटल चुकले म्हणून १९९७ बॅचच्या आय ए एस अधिकार्‍याला निलंबन. अधिकार्‍याचे म्हणणे बातमीत नाही. एकंदरीत फार अन्यायकारक प्रकार वाटला. रामजन्मभूमी या शब्दाचेच इतके वावडे असावे हे मला दु:खा पेक्षा विनोदी जास्त वाटले.
पण कार्यप्रणवतेचा हाच दंडक सर्वत्र लावला तर अख्खे यु पी अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन खाली करावे लागेल.

मन Mon, 14/10/2013 - 11:35

In reply to by अजो१२३

घटनेची पार्श्वभूमी, पूर्वेतिहास ठाउक नसला की गोष्टी चमत्कारिक वाटतात.
अधिकार्‍याचे मंत्र्यांशी संबंध, त्याचा पूर्वेतिहास, त्याची जात किंवा तो कोणत्या लॉबीचा आहे हे सर्व माहित झालं तर गोष्टी तितक्याशा धक्कादायक रहात नाहित.
.
पेप्रात पूर्वी "ताटात चतकोर पोळी टाकली म्हणून बायकोने केला नवर्‍याचा खून " असे वाचून आश्चर्य वगैरे वगैरे वाटे.
नंतर समजले की ब्व्हंशी केसेस मध्ये टाकलेली पोळी ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी टह्रलेली असते.
पेपरवल्यांना अक्कल नसते किंवा पब्लिकला अक्कल नसते असे पेपरवाले समजतात म्हणून असे मथळे नि बातम्या देतात ठाउक नाही.
.
ललित मोदिंनी दीड हजार किंवा लाख ह्यासारख्या बीसीसीआय साथी क्षुल्लक रकमेचा हिशेब नीट दाखवला नाही म्हणून त्यांचे निलंबन वगैरे वगैरे बातम्या गंमतीशीर वाटतात.
मोदिंचा गैरव्यवहार असलाच तरी ते पैसा रुपी पाण्यातला मासा आहेत हे लक्षात आलं की गोष्ट उमजते.
दीड लखाचा हिशेब ह्याचा संबंध नसून थरुर आणि ललित मोदी एकमेकांची अंडीपिल्ली बाहेर काढत आहेत, तो त्यांचा पावर स्ट्रगल आहे हे वास्तव लक्षात घेतले तर चक्रावून जायला होत नाही.

अजो१२३ Mon, 14/10/2013 - 11:46

In reply to by मन

मनोबा, आपल्या म्हणण्यात तथ्य आहे. पण ते इथे लागू आहे का याबद्दल शंका वाटते. पण मी जे सांगतोय ते युपी सरकारचं वास्तव आहे. कारण बातमी इंटेलिजेन्सच्या खात्याकडे असलेल्या अजेंड्याचा मथळा चूकून टाकला असे लिहिले आहे. सो.. ही मसाला लावलेली बातमी नसावी वाटतं.

अजो१२३ Mon, 14/10/2013 - 17:20

http://www.business-standard.com/article/pti-stories/young-turk-mohan-d…

मोहन धारीया यांचे निधन झाले. ते पुण्यातून निवडून गेले होते हे पाहून नवल वाटले. हे जंजिरा स्टेटचे स्वातंत्र्य काय प्रकार असावा? बातमी फार रोचक आहे.

पण सर्वात भारी, बातमीतली शेवटची ओळ -
Interestingly,even though a bitter critic of Indira Gandhi, Dharia was conferred the prestigious Indira Gandhi Award for National Integration in 2011, by Congress president Sonia Gandhi.

सोनियांच्या अशा कामांची लिस्ट बनवता येईल.
१. शिख माणसाला पंतप्रधान करणे. (कडवट शिखांचा काँग्रेस विरोध कमी तीक्ष्ण झाला आहे, मत अजून बीजेपी-सॅड लाच पडते.)
२. राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना माफी मिळावी इच्छा.
३. हे मोहन धारीया प्रकरण
४. सोनिया फिरंगी आहे म्हणून पी ए संगमा यांनी हंगामा केला. राष्ट्रवादी स्थापन केली. तिच्या पोरीला भारताची सर्वात तरुण केंद्रीय मंत्री बनवले.
५. सोनिया पीएम झाली तर चंपी करणार म्हणणार्‍या सुषमा स्वराजकडे ती स्वतःहून जाते, अलिंगन देते, संसद नीट चालू ठेवायला मदत करा असे म्हणते.

विरोधकांबाबत साधारणतः त्यांचा अप्रोच फार कॉर्डीयल असतो. पश्चिमेत सर्व विचारसरणींचा, मानवतेचा आदर करणारी अल्प्संख्य पण कण्खर मंडळी आहेत, कदाचित तिच त्यात समाजाचा कणा आणि यशाचे गमक असावित. सोनिया बहुतेक याच लॉटचा प्रॉडक्ट असाव्यात.

अपवाद - मौत का सौदागर असे मोदींसारख्या निर्वाचित मुख्यमंत्र्यांचे कामापेक्षा जास्त कडक वर्णन

बॅटमॅन Mon, 14/10/2013 - 17:44

In reply to by अजो१२३

मौत का सौदागर असे मोदींसारख्या निर्वाचित मुख्यमंत्र्यांचे कामापेक्षा जास्त कडक वर्णन

अगदी अगदी. आणि या मोदींचा उदोउदो सेक्युलरवाल्यांनीही लैच केलाय. गोध्राकांडाचे वर्णन जिनोसाईड म्हणून केलेले पाहताना तर हहपुवा होते =))

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 14/10/2013 - 19:55

In reply to by बॅटमॅन

Genocide या शब्दाची व्याख्या -
विकीपीडिया - Genocide is "the deliberate and systematic destruction, in whole or in part, of an ethnic, racial, caste, religious, or national group",[1] though what constitutes enough of a "part" to qualify as genocide has been subject to much debate by legal scholars.
डिक्शनरी.कॉम - the policy of deliberately killing a nationality or ethnic group
मेरियम वेबस्टर - the deliberate and systematic destruction of a racial, political, or cultural group

एखाद्या धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, जातीय किंवा राष्ट्रीय गटाची हेतूपुरस्सर, कट करून केलेली कत्तल म्हणजे जेनोसाईड. यातला कोणता भाग गुजराथ-गोध्रा प्रकरणात हास्यास्पद/हहपुवास्पद आहे?

बॅटमॅन Mon, 14/10/2013 - 20:22

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

संख्या. हजार बाराशेच्या कत्तलींना जिनोसाईड म्हणणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही.

आता एकही कत्तल कशी चूक अन तदनुषंगिक भावनाफवारे येतीलच इथे, पण प्रश्न योग्य शब्दयोजनेचा आहे. अन विषयाचा कात्रज करण्याचे कसब ज्यांच्याकडे आहे त्या सर्वांनी ते तूर्तास आपल्याकडेच ठेवावे.

चिंतातुर जंतू Mon, 14/10/2013 - 21:56

In reply to by बॅटमॅन

Much of the debate about genocides revolves around the proper definition of the word "genocide".

[...]

M. Hassan Kakar in his book The Soviet Invasion and the Afghan Response, 1979–1982 [...] quotes Chalk and Jonassohn: "Genocide is a form of one-sided mass killing in which a state or other authority intends to destroy a group so defined by the perpetrator.

[...]

Some critics of the definition of genocide under international law have also argued that the definition was partly influenced by Joseph Stalin, and that this is the reason why it does not include political groups

संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Genocides_in_history#Alternative_meanings…

Any of the following acts committed with intent to destroy, in whole or in part, a national, ethnical, racial or religious group, as such: killing members of the group; causing serious bodily or mental harm to members of the group; deliberately inflicting on the group conditions of life, calculated to bring about its physical destruction in whole or in part; imposing measures intended to prevent births within the group; [and] forcibly transferring children of the group to another group.

संदर्भ : Convention on the Prevention and Punishment of the Crime of Genocide (CPPCG) adopted by the UN General Assembly on 9 December 1948 and came into effect on 12 January 1951 (Resolution 260 (III)). Article 2:

बाकी चालू द्या.

बॅटमॅन Mon, 14/10/2013 - 23:07

In reply to by चिंतातुर जंतू

रोचक. वंशविच्छेद असाच अर्थ वाटत असे. १९४६ ची व्याख्याही तशीच होती. १९४८ ची व्याख्या अजून पातळ केली तरी ते कनोटेशन काही अंशी आहेच. तरीही शीख दंगलींना हा शब्द लावण्यात येत नाही आणि याला मात्र येतो. रोचक आहे खरेच.

'न'वी बाजू Tue, 15/10/2013 - 04:43

In reply to by मी

(त्या परिस्थितीत, त्या घटनेचा 'सुवर्णमंदिर' असा उल्लेख सयुक्तिक असण्याबद्दल साशंक आहे, परंतु तेवढा नॉमेन्क्लेचरचा बारीक मुद्दा वगळल्यास सहमत आहे.)

मी Tue, 15/10/2013 - 05:29

In reply to by 'न'वी बाजू

सहमत, सुवर्णमंदिर म्हणजे भिंद्रनवाले डोळ्यासमोर येण्याची शक्यता अधिक , दिल्ली-१९८४ योग्य ठरावे. नॉमेन्क्लेचर सुधारल्याबद्दल आभार.

नितिन थत्ते Tue, 15/10/2013 - 08:47

In reply to by 'न'वी बाजू

आणि गोध्रा सुद्धा पोष्ट गोध्रा (बेस्ट बेकरी वैग्रे) म्हणायचे आहे की नुसते गोध्रा की गोध्रा + पोष्ट गोध्रा म्हणायचे आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 14/10/2013 - 22:16

In reply to by बॅटमॅन

हजार बाराशेच्या कत्तलींना जिनोसाईड म्हणणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही.

हजार-बाराशे लोक मारण्याच्या घटनेचं वर्णन, भले न पटणाऱ्या शब्दांत, वाचून ज्यांना हसू आवरत नाही अशा लोकांना काय म्हणावं? कोणी psychology विषयाचे अभ्यासक आणि/किंवा तज्ञ इथे आहेत काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 14/10/2013 - 23:30

In reply to by बॅटमॅन

उडिसात १७ लोक चक्रीवादळाने गेले तर ते सुद्धा टळलं तर आवडलं असतं, असा विचार करणारे लोक आम्ही! तेवढी संवेदनशीलता नसेल तरीही, हजार-बाराशे लोकांची कत्तल करण्याच्या प्रसंगाचं वर्णन वाचून हसायला येणारे लोक अभ्यासाचा विषय का वाटू नयेत? फार नसतात असे लोक.

बॅटमॅन Mon, 14/10/2013 - 23:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एकतर्फी विचार करणार्‍यांकडून, जाली(य) लिबरलांकडून अशी मौक्तिके वेळप्रसंगी बाहेर पडतातच. कुठल्या मुद्द्याची किती अन कशी गल्लत केल्यावर वरच्या प्रतिसादासारखे विनोदी प्रतिसाद तयार होतात हे समजायला असे प्रतिसाद फार उपयुक्त आहेत. त्यामुळे चालूद्या.

मन Tue, 15/10/2013 - 09:42

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

kind and scale ह्या दोन शब्दांत बॅटमॅनला काय म्हणायचय ते यायला हवं.
तरीही अधिक उदाहरणे देउन पाहतो.
एखादी कंपनी तोट्यात जाणे, कित्येकांचा रोजगार बुडणे वाईट्च.पण ते "आर्थिक आरिष्ट" किंवा महामंदी ठरतं का?
दोन्-चार वर्षांपूर्वी युनायटेड वेस्टर्न ब्यांक बुडाली.(नंतर आय्डीबीआय नं घेतली, तो भाग वेगळा.) पण त्या ब्यांकेतील कित्येक जणांची लै वाट लागली.
पण ती आर्थिक महामंदी होती का?
.
.
कुणाचंही एखाद्या अपघातात हाताचं किंवा पायाचं बोटाचं पेर कापलं जाणं किंवा आख्खं नख उखडलं वाईटच; अत्यंत वेदनादायकही(माझं स्वतःचं नख मुळासकट उखडून गेलय. महाभयानक, कल्पनातीत त्रास होतो.
वेदनाशामक औषधे न घेता दात उचकटल्यावर जो काही त्रास होउ शकेल, त्याच तोडीचा त्रास होतो.
).
पण त्याची गंभीर , अत्यवस्थ, आणि आयुष्यभर अंथरुणाला खिळायला लावण्याशी तुलना होते का? सरकारसुद्धा भरपाई देताना नुकसानईच्या स्केलवरून, अपंगत्वाच्या स्केलवरून भरपाई देते.
.
जिनोसाइड म्हणजे काय? तर एखादा वंश निर्णायक रित्या संपवणे. त्यांचा आख्खा लोकसंख्येचा तोल कायमचा बिघडणे. म्हणून होलोकास्ट हे जिनोसाइड ठरतं.
(दोनेक कोटी लोकसंख्या असणार्या समूहातील साठेक लाख लोकं दाणक्न पाच सात वर्षात संपवणे. तेही वांशिक दृष्ट्या टार्गेट करुन; रागात्,संतापाचा मॉबचा उद्रेक वगैरे काही नाही.सारं कसं नियोजनबद्ध.)
.
अमेरिका खंडातील स्थानिक रहिवाशी अल्पसंख्य बनणे हे ही जिनोसाइड ठरतं.(प्रोव्हायडेड ती युरोपीय संसर्गजन्य आजारांनीच नेटिव्ह अमेरिकनांचे हत्यांकांडापेक्षा अधिक जीव घेतले ही थिअरी चूक मानली तर्.
किंवा खरं तर ती खरी मानली तरी पिझारोच्या हत्याकांडाच्या स्केलला तोड नाही.)
.
इराण ने भोगलेले जिनोसाइड:-
पूर्वी लढायांत लढणार्‍या सैनिकांना मारत, हरलेल्यांना क्वचित बंदी बनवत. defencelss शहरे लुटत असत.
शहरातील नागरिकांना छळत, लुटत असत्.गुलामही बनवले जाई. पण तरीही ह्यांचे प्रमाण उतरत्या भाजणीने कमी असे.
मंगोल चेंगीझ खानानं आख्खा मंगोलिया घेतला. अर्धा चीन घेतला. मग वायव्य चीन्- इशान्य व उत्तर इराण ह्या दोन्हीला जवळ असणार्‍या मार्गावरील
ख्वरेझ्मी साम्राज्यावर हल्ल करुन ते नष्ट केलं. पण मग त्यांचा भूभाग ताब्यात घेताना त्यानं फक्त स्वतःचा अंमल बसवला किंवा लुटालूट केली असं नव्हे
तर इराणी पठारावर न भूतो न भविष्यती असं हत्यासत्र आरंभलं. ते किती भयंकर होतं?
इसवीसन १२००च्या आसपस त्यानं इतकी माणसं कापली; इतकी लोकसंख्या तलवारीनं संपवली की १२०० साली असलेली लोकसंख्या पुन्हा गाठण्यासाठी ह्या भूभागाला सातशे वर्षे लागली!!
सातशे वर्ष लागणं ही फार मोठी गोष्ट आहे मॅ'म. ह्या सातशे वर्षातला जन्मदर वगैरे लक्षात घेतला तर ही भयंकर गोष्ट अधिक स्पष्ट , ठळक होइल.
आधुनिक तंत्रज्ञान्शिवाय, बॉम्ब्,अण्वस्त्र्,क्षेपणास्त्र काहीही नसतानाच्या काळातला हा आकडा आहे.
ह्याची तुलना फक्त युरोपातील ब्लेक डेथ सारख्या नैसर्गिक प्रकोपाशीच होउ शकेल.
.
बॅटमॅनच्या प्रतिसादात scaleचा जो मुद्दा आहे, तो हा आहे.
.
९/११ला ट्विन टॉवर्सवर विमानं घालण्याला जिनोसाइड हा शब्द अजून वापरात दिसला नाही कुठं.
.
भारताबद्दलही बोललो असतो. पण भारतात बसून भारताबद्दल खरं बोलायची चोरी आहे.
.
बाकी प्रश्न जुनाच आहे. इथल्या प्रतिसादांत दिसणार्‍या फेमस उदाहरणासारखा. "शिप ओफ थिसियस " का काहितरी उच्चभ्रू लिहित असतात ना? तेच.
how much is too much?what about boundary lines?
जुनाच, चर्वित, अनुत्तरित प्रश्न.

अजो१२३ Tue, 15/10/2013 - 11:56

In reply to by मन

अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद. आता बॅटमॅनने कमित कमी तुमचे आभार तरी मानावेत अशी अपेक्षा.

गुजरातच्या दंग्यांना जिनोसाईड म्हणणे चूक आहे असे मला वाटते.
१. कोणत्याही स्रोताचे आकडे पाहिले तर हिंदूदेखिल बर्‍याच प्रमाणात बळी पडले आहेत.

२. जितके मुस्लिम अटक केले गेले त्याच्या ३-४ पट हिंदू गुंड अटक केले गेले.

३. हा दंगा रियॅक्शनरी होता, म्हणजे चला आपण गुजरात पुरते तरी मुस्लिम संपवू या , असा पूर्वीचा कोणता स्थानिकांत प्लॅन नव्हता. अन्य भारतात जितका धर्मद्वेष आहे त्यापेक्षा जास्त तिथे होता असे म्हणायचे कारण नाही.

४. http://www.isn.ethz.ch/Digital-Library/Publications/Detail/?id=29056 या स्थळावर १९४७ -२००३ सर्व दंग्यांचं स्टॅट्स आहे. अत्यंत माहितीपूर्ण आहे, पण मायनॉरिटीच्या बाजूने जास्तच बायस्ड वाटला. http://en.wikipedia.org/wiki/List_of_massacres_in_India इथे थोडा न्यूट्रल डाटा आहे. त्यांतली काही निरीक्षणं अशी-
अ. सहसा दंगलीत मुस्लिम लोकांचेच जास्त जान-माल नुकसान होते. गुजरातचा रेशो (२५० हिंदू आणि ८०० मुस्लिम) अन्य भारतापेक्षा वेगळा नाही. याचे दोन अर्थ होतात. १. हिंदूबहुल भारत मुस्लिमांकरता सुरक्षित नाही. २. असे नसेल, आणि दंगे प्रासंगिक असतील तर किमान गुजराती लोकांना काँस्पिक्यूअस्ली कम्युनल ठरवणे अत्यंत मूर्खपणाचे आहे.
ब. गुजरातच्या दंगलीचा १. स्वातंत्र्यापासून सर्वाधिक मुस्लिम मेलेल्या दंगली वा २. सर्वात अधिक लोक मेलेल्या दंगली असा क्रम लावला तर (४७-४८ सोडून)पहिल्या ३-४ मधे नंबर येतो. 'यावेळेचा तथाकथित सूत्रधार किंवा बघ्या किंवा पूर्वग्रहदूषित शासक पंतप्रधान होऊ पाहतोय' याखेरीज या 'दंगलींच्या स्वरुपाची' चर्चा करायची गरज नसावी इतकी ती स्टीरिओटाइअप आहे.

५. सर्वात महत्त्वाचे - जिनोसाईड डिक्लेर्ड असते,क्लँडेस्टाईन नसते, असे वाटते. इथे 'गुजरात सरकारने' असे काही जाहीरीकरण केले नव्हते. व्यक्तिगत पातळीवर सांगतो. 'गोध्राची कोच जाळण्याची घटना अतिशय लज्जास्पद आहे, मानवतेला काळीमा फासणारी आहे', 'अहमदाबादचे दंगे गोध्रा हत्याकांडाची प्रतिक्रिया आहेत' असे म्हणणारे मोदी मला सूडाने पेटलेले किंवा धूर्त राजकारणी पेक्षा कशाचा अर्थ काय काढला जाऊ शकतो हे न कळू शकलेला अमॅच्यूअर मुख्यमंत्री वाटला. कुठेही दंगा झाला नि त्यात हिंदूच मेले तर, जे गोध्रात झाले, तर जो संताप राम जन्मभूमी समर्थकास येईल तोच त्यांना आला होता असे म्हणायला हरकत नसावी. इथपर्यंत ठीक होते. परंतु त्यांनी अजून पुढे जाऊन, त्यानंतर एक वाक्य म्हटले, ज्या मागचा आवेश, मोदींना भला माणूस मानायची बरीच इच्छा असलेल्या माणसाला कंफ्यूज करतो, ते असे - "गोध्रा होगा तो अहमदाबाद होगा।" याचे दोन अर्थ निघतात, १. ते वरचेच प्रतिक्रिया आहे वैगेरे. २. अहमदाबाद दंगा (कोण्या का कारणाने असेना) समर्थनीय वाटतो. मी अटलजी असतो तर मी त्यांना राजधर्म शिकवण्याऐवजी 'वाक्यांमागचा आवेश' वर धडे दिले असते. व्यक्तिगत पातळी समाप्त.

६. बर्‍याच जाँच एजंन्सीजनी 'गुजरात सरकारला' क्लिन चिट दिली आहे. पण २-३ मंत्र्याचे जेलमधे जाणे त्याची झळाळी काढून घेते. तरीही मला कोडनानी शिवाय दुसरे नाव, सिद्ध गुन्ह्याबाबत, आज ११ वर्शे खटले चालून आठवत नाही.

७. आज सर्वच नसले तरी बर्‍याच मुस्लिमांनी मोदींना माफ केले आहे. आता ज्यांना अशी वाक्यरचना आवडत नाही, त्यांच्यासाठी -'शंका सारुन जवळ केले आहे.

८. माध्यमांनी इतकी बदनामी केल्याने गुजराती लोक पुन्हा असे करणार नाहीत. शिवाय एका मुस्लिमही कळ काढल्याचा आरोप पुन्हा आपल्यावर येईल असे वागणार नाहीत. प्रशासन तर टरकून आहेच. तिथे कधीच दंगे न होवोत!

९. मोदी दंग्याचे सूत्रधार, सहभागी,कुंपणस्थ इ इ होतेच अशीच तीव्र भावना व्हायला लागली तर मोदींनी गुजरातेत किती मंदीरे पाडली आहेत त्याचे स्टॅट्स गुजराती मंदिरप्रेम्याकडून , मोदींकरिता रचलेल्या खास लाखोलींसहित ऐकावे. मग ते खरंच धर्मांध आहेत, कि क्रूर विकासक आहेत, कि कोणतीही निष्ठा नसलेले परमार्थी, कीर्तीध्येयी आहेत, कि केवळ एक विचारमतवादी आहेत कि एक धाडसी मूर्ख आहेत कि एक ब्रेनवॉश्ड देशप्रेमी आहेत कि ....असा 'रिलेटीवली सॉफ्ट' विचार करावा.

माझ्या सोनियास्तुतीचा बाजा वाजवून मोदीसंहिता बनवणार्‍या बटू(वा)मनाचा त्रिवार निषेध!

बॅटमॅन Tue, 15/10/2013 - 12:50

In reply to by अजो१२३

मन आणि अरुणजोशी यांना एकत्रितच धन्यवाद देतो या निमित्ताने. जे म्हणायचे होते त्याची बैठक अजून पक्की केल्याबद्दल दोघांचेही बहुत बहुत आभार!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/10/2013 - 18:11

In reply to by मन

दोन्-चार वर्षांपूर्वी युनायटेड वेस्टर्न ब्यांक बुडाली.(नंतर आय्डीबीआय नं घेतली, तो भाग वेगळा.) पण त्या ब्यांकेतील कित्येक जणांची लै वाट लागली.
पण ती आर्थिक महामंदी होती का?

लै लोकांची (आर्थिक) वाट लागणे आणि अगदी दोन-चार का होईना, लोक मारले जाणं, त्यांचा जीव जाणं यातला फरक समजतच नाही का समजूनच घ्यायचा नाही?

जिनोसाइड म्हणजे काय? तर एखादा वंश निर्णायक रित्या संपवणे. त्यांचा आख्खा लोकसंख्येचा तोल कायमचा बिघडणे. म्हणून होलोकास्ट हे जिनोसाइड ठरतं.

वरच्या प्रतिसादात जेनोसाईड या शब्दाच्या शब्दकोशातल्या आणि यू.एन.ने केलेल्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यात निर्णायकरित्या असा शब्द दिसत नाही. यू.एन. च्या व्याख्येत whole or in part असे शब्द सरळच वापरले गेले आहेत. अर्थातच त्यापलिकडे शब्दांचे अर्थ कोणीही, कसेही, सोयीसवडीने लावू शकतात. पण शब्दकोश वाचणाऱ्या लोकांनी ते मान्य करावेत अशी अपेक्षा ठेवू नये.

एकंदर मनुष्य जमात, गतकाळाच्या तुलनेत, मानवी जिवीतहानीबद्दल जास्त संवेदनशील होते आहे. वंश, धर्म, जात, भाषा इ. मानवनिर्मित कारणांमधून आलेल्या 'दुर्गुणामुळे' कोणत्याही माणसाचा जगण्याचा हक्क हिरावून घेणं, हा फार मोठा गुन्हा, अपराध समजला जावा याकडे मनुष्यजमातीची वाटचाल सुरू आहे. या मानवतावादी विचारसरणीचा प्रतिवाद, अन्यत्र, हिंदू धर्म फार सहिष्णू आहे, अशा अर्थाचा विचार मांडणाऱ्या लोकांनी करावा यातला विरोधाभास रोचक आहे.

बॅटमॅन Tue, 15/10/2013 - 18:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा इन होल अँड पार्ट मधला पार्ट कसा ठरवायचा याच्या सीमारेषा एकतर स्पष्ट नाहीत.

शिवाय नक्की आक्षेप समजून न घेता साप साप म्हणून भुईला धोपटणे हेही नेहमीचेच.

या मानवतावादी विचारसरणीचा प्रतिवाद, अन्यत्र, हिंदू धर्म फार सहिष्णू आहे, अशा अर्थाचा विचार मांडणाऱ्या लोकांनी करावा यातला विरोधाभास रोचक आहे.

म्हणजे मी मोदीसमर्थक, गोध्रामध्ये झालेल्या कत्तलींचा समर्थक आहे असे म्हणायचे आहे का? एका संज्ञेच्या अर्थाबद्दल वाद सुरू आहे. जो जावईशोध आहे तो स्पष्टपणे मांडत तरी एकदा बघू. शिव्या तर घालायच्यात, पण धडपणे देववतही नाही अशी ही कात्री मला फार रोचक वाटते. नक्की मी कशाचा प्रतिवाद करतोय हे जर समजत नसेल किंवा समजून घ्यायची इच्छा नसेल आणि त्या अज्ञानाचे समर्थन पांघरूण-संज्ञांनी (ब्लॅङ्केट टर्म्स) करायचे असेल तर...हे नित्याचे आहे, फक्त मग तुझी विचारसरणी मानवतावादी आणि माझी हिंसावादी या ध्वनित होणार्‍या बिनबुडाच्या जावईशोधाला तिलांजली द्यावी लागेल.

मन Tue, 15/10/2013 - 20:47

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या मानवतावादी विचारसरणीचा प्रतिवाद, अन्यत्र, हिंदू धर्म फार सहिष्णू आहे, अशा अर्थाचा विचार मांडणाऱ्या लोकांनी करावा यातला विरोधाभास रोचक आहे.
हे माझ्यासाठी नक्कीच नसावं.
बाकी,मला म्हणायचं असलेलं ह्यापूर्वीच्या माझ्या प्रतिसादात येउन गेलं आहे. ह्या प्रतिसादाला उत्तर म्हणून तो पुन्हा उकलून सांगणं वगैरे नको.
प्रतिवाद आणि प्रतिसाद दखल ह्याबद्दल आभार.

'न'वी बाजू Tue, 15/10/2013 - 09:37

In reply to by बॅटमॅन

आपल्या मुद्द्याच्या प्रभावी (आणि बहुसंख्यांस पटेल अशा) मांडणीकरिता अत्यावश्यक असलेल्या काही घटकांचा आपल्या प्रतिपादनात अंतर्भाव न करण्यात आपल्याकडून झालेल्या निव्वळ हलगर्जीपणामुळे आपला मुद्दा येथे फारसा गंभीरपणे घेतला गेलेला नाही, असे लक्षात येऊन त्याबद्दल दु:ख होते. तरी, या त्रुटीच्या निवारणार्थ, आपल्या प्रतिपादनात अंतर्भूत करता येण्याजोग्या काही मुद्द्यांकडे आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो. (बाक़ी, समझने वाले को इशारा काफ़ी|)

- प्रस्तुत कत्तलीच्या वेळी गुजरातची लोकसंख्या किती, याबद्दलचे ष्ट्याटिष्टिक कोठूनतरी मिळवता आल्यास ते आपल्या प्रतिपादनात आवर्जून मांडणे उपयुक्त ठरू शकेल.

- त्यापुढे, कत्तलीतील मृतांच्या संख्येचे गुजरातच्या तत्कालीन लोकसंख्येशी गुणोत्तर (अर्थात, दरडोई अथवा पर क्यापिटा मृत्यूंची संख्या) काढून ती मांडल्यास आपले म्हणणे अनेकांपर्यंत पोहोचून ते बहुमान्य होण्यास मदत व्हावी.

कदाचित आपल्या प्रतिपादनामागे हे सर्व अध्याहृत असेलही. मात्र, (१) आपल्या प्रतिपादनात आपण कोठेही कोणत्याही प्रकारची आकडेवारी उद्धृत केलेली नाही. शिवाय, (२) आपल्या प्रतिपादनात आपण कोठेही कोणतीही क्याचफ़्रेज़ वापरलेली नाही. माझ्या मते ही दोन मूलभूत स्वरूपाची महत्पापे आहेत.

आजचे युग हे प्रेझेंटेशनचे युग आहे. आपले प्रतिपादन योग्य नसले, तरी हरकत नाही; मात्र, सादरीकरण पर्याप्त असणे अतीव गरजेचे आहे. आणि (१) आकडेवारी आणि (२) जार्गन ही सादरीकरणाची अनिवार्य गणली जाणारी दोन अंगे आहेत.

अशा परिस्थितीत, सादरीकरणाकरिता मूलभूत अशा या दोन घटकांकडे आपण संपूर्ण दुर्लक्ष करावे, आणि तरीही आपल्या प्रतिपादनास कोणी गांभीर्याने घ्यावे अशी अपेक्षा करावी, यास काय म्हणावे ते समजत नाही. अशा परिस्थितीत आपण प्रतिपादनाचे कष्टही जर न घेता, तरीही चालू शकले असते, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

तरीही, आपल्या प्रतिपादनातील या त्रुटींचे निवारण करून फिरून एकवार यत्न करून पाहावा, असे सुचविण्याचे स्वातंत्र्य, आपला एक जालीय शुभेच्छुक या नात्याने, या निमित्ताने घेऊ इच्छितो.

* * * * * * * * *

अवांतर:

१९७७ सालची ही कथा आहे. निवडणुका घोषित झाल्या होत्या, आणि प्रमुख विरोधी पक्षांच्या युतीतून जन्माला आलेला जनता पक्ष काँग्रेसच्या सत्तेस आव्हान देण्यास सज्ज होऊन उभा ठाकलेला होता. प्रचारसभांची धामधूम जोरात चालू होती.

दक्षिण महाराष्ट्रात कोठेतरी घडलेल्या अशाच एक प्रचारसभेचा प्रसंग. प्रमुख वक्तेपदी मोरारजीभाई देसाई. अशा वेळी, उपस्थित पत्रकारांपैकी कोणीतरी मोरारजीभाईंना 'त्या' एकशेपाचांसंबंधी विचारू नये तो प्रश्न विचारलाच!

मोरारजीभाईंचे उत्तर, "ते एकशेपाच नव्हतेच, ते ऐशी होते; शिवाय, ते गुंड होते", अशा स्वरूपाचे होते.

(अतिअवांतर: प्रचारसभेच्या अध्यक्षपदी - यू गेस्ड राईट! - संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्री. एस. एम. जोशी. मोरारजीभाईंच्या या वक्तव्यावर, काही नाही, मूग गिळून स्वस्थ बसले, असे आठवते. 'पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेडफ़ेलोज़' असे कायसेसे ऐकलेले आहे, ते बहुधा खोटे नसावे.)

आपले प्रतिपादन वाचून, का कोण जाणे, परंतु हा किस्सा आठवला.

* * * * * * * * *

जोक्स अपार्ट, गंभीरपणे विचार करावयाचा झाल्यास, मोरारजीभाईंच्या या प्रतिपादनात नेमके काय गैर आहे? मुंबईची अफाट लोकसंख्या लक्षात घेता ऐशी मृत्यू म्हणजे किस झाड़ की पत्ती! ऐशी नव्हे, लोकप्रिय दाव्यानुसार अगदी एकशेपाच मृत्यू जरी मानले, तरीसुद्धा, प्रतिदिनी मुंबईत याहून कितीतरी अधिक मृत्यू चालत्या लोकलमधून पाय घसरून पडल्याने, नाहीतर रेल्वेलाईन क्रॉस करताना लोकलने उडवल्याने, नाहीतर लोकलला बाहेरून लटकताना टाळके खांबावर आदळल्याने होत असतील. उडवले एखादवेळेस एखाद्या मोरारजीभाईंनी एकशेपाच, तर बिघडले कोठे? त्या एकशेपाचांचे पर क्यापिटा मृत्युमूल्य असे कितीसे?

(या निमित्ताने, १९१९ सालची अमृतसरची लोकसंख्या आणि १९५५ सालची मुंबईची लोकसंख्या, तसेच जलियाँवाला बागेतील मृतांची अधिकृत अथवा अंदाजे संख्या यांची काही आकडेवारी मिळू शकल्यास ती रोचक - आणि कदाचित कोणास मनोरंजकही - ठरावी. या दोन प्रसंगांतील 'पर क्यापिटा हौतात्म्या'ची तुलना करता आल्यास बहार यावी. शिवाय, मुंबईचा प्रसंग 'पर्स्पेक्टिव'मध्ये आणण्यासही त्याने बहुमूल्य मदत व्हावी.)

कम टू थिंक ऑफ इट, फ्लोरा फाउंटन हे मुळात कोण्या रोमन देवीच्या नावे उभारण्यात आलेले एक कारंजे होते, मुळात ते कसलेही स्मारक वगैरे नव्हते; शहराचे सुशोभीकरण हा त्यामागील विशुद्ध हेतू होता, असे कळते. त्याचा 'हुतात्मा चौक' वगैरे करून उगाच मेलोड्रामा केला - कोठल्याशा त्या मूठभर ऐशी की एकशेपाच जणांपायी!

क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करण्याची आपल्या लोकांची सवय कधी जाणार, कळत नाही!

* * * * * * * * *

अधिक शोध घेता, जलियाँवाला बागेतील मृतांची संख्या ही वेगवेगळ्या अंदाजांप्रमाणे (फक्त) ३७९ किंवा (फार फार तर) १,००० यांपैकी आहे, असे कळते. (म्हणजे हजार-बाराशेच्या तुलनेने अंमळ कमीच.) हार्डली अ म्यासाकर अट ऑल!१० चारशे ते हजारांच्या कत्तलींना 'म्यासाकर', 'हत्याकांड' वगैरे म्हणणारे लोक्स पाहिले, की हसून हसून पोटात दुखू लागते.

सबब, असल्या शब्दयोजना करण्याचे कसब ज्यांच्याकडे आहे, त्यांनी ते एक तर आपल्याकडेच ठेवावे, अन्यथा आमच्या पोटदुखीच्या औषधापोटी आम्हांस येणार्‍या खर्चाची भरपाई करावी.

- आपला जालीय लेफ्ट लिबरल,

'न'वी बाजू.
==================================================================================================================
तळटीपा:

रेलेवंट ऑर अदरवाइज़़. उदा., २००२ सालची गुजरातची लोकसंख्या. या ष्ट्याटिष्टिकचे निरनिराळ्या तर्‍हेने पृथःकरण करता आल्यास अधिकच बहार यावी.

अर्थात, जार्गन. मीनिंगफुल ऑर अदरवाइज़. उदा., 'पर क्यापिटा कत्तल'.

'कार्डिनल सिन्स' अशा अर्थाने.

याव्यतिरिक्त, आकृतिमय अथवा चित्रमय सादरीकरण - शक्यतो पाय चार्ट, स्क्याटर ग्राफ वगैरे - हेही एक महत्त्वाचे आणि उपयुक्त अंग आहे, परंतु ते अनिवार्य नाही. मात्र, याही तंत्राचा येथे प्रयोग करून पाहावयास प्रत्यवाय नाही. (रेलेवन्सचा प्रश्न नेहमीप्रमाणे फ़िज़ूल आहे.)

अर्थात, 'लिबरटी'.

म्हणूनच 'जालीय लिबरल'.

नेमके स्थळ आता मध्यंतरीच्या दीर्घ कालव्ययामुळे तसेच कालपरत्वे दगा देऊ लागलेल्या याददाश्तीपोटी आठवत नाही, परंतु बहुधा सांगली जिल्ह्यात कोठेतरी. (चूभूद्याघ्याची पळवाट प्रस्तुत तपशिलास लागू आहेच.)

१९५५ सालच्या मुंबईच्या घटनेतील मृतांची संख्या ८० किंवा १०५ यांपैकी कोणतीतरी एक आहे, हे आपणांस या क्षणी अगोदरच ठाऊक आहे.

उद्बोधकही ठरावी, याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही, अत एव देऊ इच्छीत नाही. (या निमित्ताने पालथ्या घड्यांची आकडेवारी गोळा करणे कदाचित उपयुक्त ठरावे.)

१० च्यामारी, माझ्या तीर्थरूपांचे थोडेच मेले?

नितिन थत्ते Tue, 15/10/2013 - 10:59

In reply to by 'न'वी बाजू

अवांतराचे अवांतर....

शरद पवारांनी फुटून पुलोद स्थापन केली आणि पुलोदचे (पवारांचा फुटीर गट + जनता पक्ष) सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. त्यावेळीही एस एम जोशींना आता सीमाप्रश्न सुटणार का असा प्रश्न विचारण्यात आला कारण आता महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार नव्हते आणि केंद्रातही "महाराष्ट्राबद्दल आकस असलेले काँग्रेस सरकार" नव्हते. परंतु त्यांच्या सुदैवाने कर्नाटकात मात्र जनता पक्षाचे राज्य नव्हते. त्यामुळे त्यांना उत्तर द्यायची गरज पडली नाही.

पुढे कर्नाटकात सुद्धा रामकृष्ण हेगड्यांचे जनता पार्टीचे सरकार आले. तेव्हा पुन्हा हाच प्रश्न विचारला गेला. (आता हेगड्यांना फक्त बेळगाव महाराष्ट्राला द्या असा आदेशच द्यायचे बाकी होते]. परत एकदा त्यांचे सुदैव मदतीला आले. एक म्हणजे जनता पक्षात काँग्रेससारखी श्रेष्ठींचे ऐकण्याची पद्धत नव्हती. आणि दुसरे सुदैव म्हणजे महाराष्ट्रात आणि केंद्रात पुन्हा म. आ. अ. काँ. स. स्थापन झाले होते. :)

मन Tue, 15/10/2013 - 10:19

In reply to by ऋषिकेश

पिंटो, कौल अशा आडनावांची माणसे पनुन कशीर/पनुन कश्मीर नावाची काश्मिरी निर्वासितांची(प्रामुख्याने काश्मिरी पंडितांची) संघटना चालवतात.
त्यांच्या बोलण्यात ह्याचा उल्लेख mass exodus असा ऐकलाय.
बाकी त्या मुद्द्यांवरून काडी टाकणे हाच उद्देश असेल तर उरलेले त्याच लायनीवरचे प्रश्न :-
फाळणीच्या वेळी २४% गैर मुस्लिम(हिंदु?) तत्कालीन पश्चिम पाकिस्तानात होते म्हणतात. आता ते २ टक्क्यांवर आलेत. ह्याला जिनोसाइड म्हणता यावे का?
युघुर का कोणत्यातरी प्रातांत हान चायनिज वंशाची अल्पसंख्या होती. तुर्कांशी नाते सांगणार्‍या वंशाची निर्णायक बहुसंख्या होती.
चायना मेनलँदमध्ये हान चायनिज वंशाचा भरणा नि बहुसंख्या असलेल्या कम्युनिस्टांची सत्ता येताच त्यांनी युघुर का तो कोणता वंश होता त्यांचे हत्यासत्र आरंभले.
शिवाय कायमस्वरूपी लष्कर तिथे तैनात केले. युघुरांच्या घरातील स्त्रिया फरफटत आणून बळजोरीने चायनिज सैनिकांत "वाटल्या".
हवा तो चायनिज सैनिक हव्या त्या युघुर स्त्रीला प्राप्त करु शकत असे. मानवतावाद, ह्युमन राइट्स वगैरे गेले **त.
.
बोंबाबोंब झाली. निषेध वगैरे झाले.
तीनेक दशके हे चालूच राहिले.
.
पण तीन दशके, म्हणजे एका पिढितच लोकसंख्येचा तोल बदलला ! आता युघुरांची बहुसंख्या तितकी राहिली नाही.
ह्या प्रकारातून झालेली संतती स्वतःला चायनिज समजेल अशीच व्यवस्था करण्यात आली आहे. अल्प प्रमाणात का असेन तिबेट घशात घालायला हेच उद्योग सुरु आहेत; पण स्केल कमी.
.
पॅलेस्टाइन नामक एक भूभाग होता १९४०च्या दशकात. तिथे त्यावेळी पंधरा वीस टक्क्यांच्या आसपास ज्यू होते.
दुसर्‍या महायुद्धानंतर त्यांना दोन हजार वर्शापूर्वी आपले येथे राज्यच नव्हे, साम्रज्य होते(एहुद इस्राइल) हे आतह्वले. जगभरातून ते इथे येउ लागले.
त्यावेळच्या स्थानिक मुसलमानांपेक्षा ह्यांची संख्या वाढत गेली. दरम्यान ज्यूंनी कित्येक मुसलमानांना मारले, कित्येकांना हुसकावून घराबाहेर काधले; घरे ताब्यात घेतली;
पॅलेस्टिनिंना रस्त्यावर आणून सोडले. ह्या प्रकाराची तुलना काश्मीरी पंडितांशी होउ शकते, अगदि थोड्या प्रमाणात का असेना.
(काश्मीर मध्ये केंद्रसरकारचे समर्थन असतानासुद्धा आपल्याच देशात ह्यांना निर्वासित व्हावं लागलं. पॅलेस्टाइनमध्ये बाहेरच्यानी येउन हुसकावूओन लावलं हा फरक. असो. )
.
.
अवांतरः-
तो कोणता तरी नियम होता ना जालिय चर्चेबाबत; चर्चा जितकी लांबेल तितकी त्याची "नाझी" ह्या विषयाकडे जाण्याची शक्यता अधिक.
तसेच भारतपुरते बोलायचे तर चर्चा लाबायल लागली की हिंदु-मुस्लिम विषयाकडे सरकू लागते.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 14/10/2013 - 19:45

ओदिशामधे आलेल्या फैलिन चक्रीवादळाचे फक्त १७ बळी. साधारण ९० लाख लोकांना वादळाचा तडाखा बसला असताना मृतांचा आकडा फारच कमी आहे. त्याबद्दल प्रशासन आणि सरकारचे अभिनंदन. वादळं टाळता आली नाहीत तरी जीवितहानी कमी झाली; कदाचित पुढच्या वेळेस एवढी हानीसुद्धा होणार नाही. १९९९ साली आलेल्या वादळात जवळजवळ १०००० लोक दगावले होते.

अजूनही प्रशासनासमोर मोठं काम आहे. पूरामुळे झालेली रस्ते, घरं, शेती, रोजगार यांची हानी, रोग फैलावण्याचा धोका, इ गोष्टी नीट हाताळण्यासाठी प्रशासनाला मनापासून शुभेच्छा.

यासंदर्भातल्या बातम्यांच्या लिंका या बातमीखाली आहेत.
Cyclone Phailin wreaks havoc in Odisha, 17 killed

नंदन Mon, 14/10/2013 - 23:01

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विज्ञानातल्या प्रगतीमुळे एकीकडे मोठी प्राणहानी टळली, त्याच सुमारास मध्य प्रदेशात झालेल्या देवळाजवळील चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांची संख्या ११५ झाली आहे. हा विरोधाभास पुरेसा बोलका आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 14/10/2013 - 23:51

In reply to by नंदन

"विज्ञान देतं, धर्म नेतो", अशा अर्थाची बरीच फेसबुक अपडेट्स आज बघायला मिळाली.

त्या निमित्ताने शासन-प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाबद्दल कौतुकोद्गार निघाले याचाबद्दल आनंद झाला. नाहीतर आपण टीका करण्यापलिकडे काहीच करत नाही का, अशी शंका बरेचदा येते.

मन Wed, 16/10/2013 - 09:28

इकॉनोंइक टाइम्स च्या कित्येक बातम्या बिन्डोक किंवा छुपा अजेंडा असणार्‍या किंवा फार लवकर जजमेंटल होणार्‍या किंवा पेड न्यूज सदृश वाटतात.
(नक्की काय ते ठरवणं अवघड आहे.)
आता हे बातमी पहा:-
http://economictimes.indiatimes.com/news/economy/finance/from-pariah-to…

राजन ह्यांनी जादूची छडी फिरवल्याची आवई सदर बातमी उठवते. बजारावर परिणाम करणारे इतर घटक, अगदि जागतिक आणि डोमेस्टिक(घरगुती?) इकॉनॉमिक टाइम्स वाल्यांना समजत नसतील
हे मानणे मूर्खपणाचे होइल.
तरी ही "पेड"गावला जायची हौस कशापायी?
हे एकेका व्यक्तिमत्वाचं पद्धतशीर उदात्तीकरण करतात. उदा:- काही दिवसांपूर्वी meet the man who is ready to help others, make friends and get the work done. अशा आशयाची
बातमी राजीव शुक्ला* ह्या इसमाबद्दल आली होती. हे एक उदाहरण; असे एकेका व्यक्तिमत्वावर ओवाळून टाकलेल्या बातम्या हे देत असतात. थोडक्यात "आर्थिक क्षेत्रातील पेज थ्री" म्हणजे इ.टा. च्या ह्या बातम्या.
.
राजीव शुक्ला ह्यांच्याबद्दल :-
हे गृहस्था दहा बारा वर्षांपूर्वी वृत्तवाहिन्यांन्वर पत्रकार होते. विनोद दुआ, दीपक चौरासिया, अर्नब गोस्वामी टाइपचे. व्यावसायिक पत्रकार.
काही दिवसांनी ह्यांचा गोडबोल्या चेहरा ऑस्ट्रेलियाला BCCIचा दौरा गेला होता तेव्हा संघ व्यवस्थापक म्हणून दिसू लागला.
दोन चार वेळेस हे bcciच्या कार्यकारिणित ह्यांचे नाव दिसले. नंतर काही दिवसात केंद्रसरकारात मंत्री आणि डायरेक काँग्रेसच्या महत्वाच्या पदांवर पोचले.
कसे पोचले, काय करुन पोचले ठाउक नाही. हल्ली क्रिकेटमधील भ्रष्टाचार/फिक्सिंग विरोधातील कारवाई करणार्‍या लोकांतील अग्रणी आहेत. अर्थात ते स्वतः धुतल्या तांदळाचे असावेत.

राजेश घासकडवी Fri, 25/10/2013 - 23:39

In reply to by अजो१२३

छान. इतक्या जुन्या कवट्या इतक्या चांगल्या अवस्थेत आणि इतक्या मोठ्या संख्येने सापडणं म्हणजे अलिबाबाची गुहाच उघडण्यासारखं आहे. यातून काय खजिना मिळतो हे पहायचं.

मन Thu, 24/10/2013 - 11:19

http://maharashtratimes.indiatimes.com/business/--/articleshow/24620049…

.
.
.
पुण्यात डिसेंबरपासून जैव डिझेलची विक्री सुरू होणार असून, माय इको एनर्जी या कंपनीतर्फे त्याचा पुरवठा केला जाईल. डिसेंबरअखेर वाकड येथे पहिला पंप सुरू होईल, अशी माहिती कंपनीचे भागीदार संतोष वर्मा यांनी दिली.

कंपनी लवकरच जैव डिझेलच्या उत्पादनांसाठी तीन कंपन्यांच्या सुविधा ताब्यात घेणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात उत्पादनास सुरुवात होईल. टाकाऊ पदार्थांपासून जैव डिझेल तयार केले जाईल. यात टाकाऊ वनस्पीत तेल, खाण्यास योग्य नसलेल्या तेलांचा वापर केला जाईल.

सध्याच्या डिझेलपेक्षा अधिक इंधनक्षमत असेल आणि यामुळे देखभालीचा खर्च कमी होईल. जैव डिझेल स्वतंत्रपणे वा पारंपरिक डिझेलमध्ये मिश्रित करून वापरता येऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. पहिला पंप वाकड येथे सुरू झाल्यानंतर पिंपरी येथे दुसार सुरू होईल. २०१४ मध्ये २५० पंप राज्यात सुरू करण्यात येणार आहेत. सध्याच्या डिझेलच्या तुलनेत ते लिटरमागे १ ते १.५० रुपयांनी स्वस्त असेल, असे वर्मा यांनी सांगतिले.
.
.
ननि कुठे आहेत?
घासकडवींची काय प्रतिक्रिया आहे?
फार दूरची गोष्ट नाही, लवकरच ओप्रत्यक्षात येत आहे हा प्रकार.

मन Fri, 25/10/2013 - 16:31

http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5066987439537993593&S…ताज्या बातम्या&NewsDate=20131025&Provider=- वृत्तसंस्था&NewsTitle=परदेशी महिलेने कांबळीला म्हटले 'ब्लॅक इंडियन'
.
मुंबई- माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला एक परदेशी महिलेने 'ब्लॅक इंडियन' असे म्हटले असून, कांबळीने तिच्या विरोधात बांद्रा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

ज्वेल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये गाडी पार्किंग करण्यावरून कांबळी व परदेशी महिलेमध्ये वादावादी झाली. यावेळी परदेशी महिलेने कांबळीला 'ब्लॅक इंडियन' असे संबोधले. महिलेविरोधात कांबळीने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

कांबळी म्हणाले, 'परदेशी नागरिकांचे आम्ही पाहुण्यांप्रमाणे स्वागत करतो. परंतु, आम्ही त्यांना आमचा अपमान करण्याचा अधिकार देत नाही. तिने 'ब्लॅक इंडियन' असे संबोधल्यानंतर खूप वाईट वाटले. इमारतीमध्ये ती भाड्याने राहात असून, तिने भारतामधील मोठं-मोठ्या माणसांबरोबर ओळख असल्याचे सांगितले.'

ह्यावरून आठवलं.
हल्ली भाषा इतकी सोवळी का झाली आहे? अमेरिकेतसुद्धा "आफ्रिकन अमेरिकन" असे का म्हणतात? मुळात black हे white किंवा brown पेक्षा कमी नाहित हे एकदा ठरल्यावर काहीही म्हटलं गेलं तरी फरक काय पडतो?
त्यातही मुळात तुम्ही तसे आहात आणि तुम्हाला तसं कुणी म्हटलं तर काय चूक?
हे इतरांना नाही तर स्वतःलासुद्धा लागू करतो. माझे ऐन विशी मध्ये केस गेले बरेचसे. टक्कल दिसू लागलं.
पण आहे तर आहे. कुणी baldie म्हटल्यावर राग का यावा?
म्हणण्याचा टोन कदाचित दुखावणारा असू शकतो. पण इतरत्र हिणवण्याच उद्देश नसताना, निव्वळ वर्णन म्हणूनही काळ्याला काळं का म्हणायचं नाही?
गोर्‍याला गोरं म्हणतोच की आपण! मुदलात जर काळे -गोरे हे उच्च्-नीच ठरवण्याचा क्रायटेरिया नाही तर कुणी काळं म्हटल्यानी नक्की काय फरक पडतो?
.
--मनोबा

बॅटमॅन Fri, 25/10/2013 - 17:05

In reply to by मन

ब्ल्याक हे गोर्‍यांपेक्षा कमी नाहीत हे खरंच, पण समाजमनात रुजलेली वर्चस्ववादी कृष्णद्वेष्टी (आयला जब्री शब्द) भावना अजून गेली नसल्याने शब्द तसा वापरल्या गेला असू शकतो. फावड्याला फावडे म्हणणे योग्यच, पण दातात फटी असलेल्याला/दात पुढे आलेल्याला मुद्दाम फावड्या म्हणून चिडवणे म्हणजे चूकच, नै का?

अजून एक उदा. पाहू, शूद्र हे ब्राह्मणांपेक्षा कमी दर्जाचे नाहीत हे खरंच आहे आणि जन्माधारित जातीनुसार जर कुणी शूद्र असेल तर मग जातिवाचक शिवी दिल्यावर दलित का खवळतात? शूद्राला शूद्र म्हणण्यात चूक ते काय? असे म्हटल्यासारखाच तुझा प्रश्न वाटतो.

आबा Sat, 26/10/2013 - 08:56

वॉशिंग्ट्न मधल्या नॅचरल हिस्टरी म्युजीयमला एका डासाचा जीवाश्म भेट मिळाला. तो जीवाश्म साधारण साडेचारशे कोटी वर्षापूर्वीचा असून योगायोगाने त्या डासाच्या पोटात साडेचारशे कोटी वर्षापूर्वीच्या प्राण्यांचे रक्तही आहे ही गोष्ट नंतर लक्षात आली.
ही त्या बातमीची लिंक : http://www.livescience.com/40402-fossil-mosquito-blood-meal.html

मायकल क्रायट्नच्या "ज्यूरासिक पार्क" या कादंबरीमध्ये डायनासॉरचा क्लोन बनविण्यासाठी, अश्मीभूत झालेल्या डासाच्या पोटातील रक्तातून डायनासॉरचे डी.एन.ए. मिळवण्याचं वर्णन आहे.

परंतू वरच्या बातमीमधल्या डासामधून असे डी.एन.ए. चे रेणू मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण डी.एन.ए. सारख्या मोठ्या रेणूंचं हाफ लाईफ साधारण ५०० वर्षाचं असतं, असं गेल्या वर्षीच्या एका संशोधानातून समोर आलेलं आहे.
ही लिंक : http://www.nature.com/news/dna-has-a-521-year-half-life-1.11555

'न'वी बाजू Sun, 27/10/2013 - 18:41

In reply to by नितिन थत्ते

आणि एखाद्या हिंदू कुटुंबाने हा नॉर्म न पाळल्यास संघ(संयुक्त)महासचिव जातीने बंदोबस्त/अंमलबजावणी करणार आहेत काय?

मन Sun, 27/10/2013 - 19:53

In reply to by नितिन थत्ते

संघवाले हे प्रथमच म्हणत आहेत काय?
वाजपेयी सरकारच्या काळातील "तीन से कम नही" हे माजी संघप्रमुख सुदर्शन ह्यांनी केलेले आवाहन आपणास स्मरत नाही काय?
थोडक्यात, ह्यात वेगळे,नवीन विशेष ते काय; हे समजले नाही.
अर्थात त्यांनी तसे म्हटले म्हणून फार काही मोठा समजातील वर्ग त्याचे आचरण करु लागलाय असे आजवर तरी दिसले नाही.
त्याऐवजी त्यांनी तिसर्‍या अपत्यासाठी प्रचंड सवलती, धनवर्षाव, शिष्यवृत्त्या व इतर प्रलोभने सुरु केली तर परिणाम होण्याची शक्यता वाटते*.
शिवाय सात आठ दशकापूर्वीपर्यंत जोरात सुरु असलेली आर्य समाजाची "त्यांना" "आपल्यात"घेण्याची मोहिम धडाक्याने सुरु ठेवली असती तर demographic impbalanceचा इतका धाक वाटला नसता**.
.
* आणि ** :- त्यांनी असे करण्यास माझे समर्थन आहे असे नव्हे. पण त्यांच्या उद्दीष्टासाथी ह्या गोष्टी पूरक आहेत असे मला वाटते.

बॅटमॅन Sun, 27/10/2013 - 23:53

In reply to by मन

शिवाय सात आठ दशकापूर्वीपर्यंत जोरात सुरु असलेली आर्य समाजाची "त्यांना" "आपल्यात"घेण्याची मोहिम धडाक्याने सुरु ठेवली असती तर demographic impbalanceचा इतका धाक वाटला नसता**.

सहजच सर्चवले अन हे व्हिडो दिसले. जानेवारी २०१२ मध्ये कोलकात्यात ७५ आणि नोयड्यात १०२ मुसलमानांना आर्य समाजात घेतले गेल्याचे व्हिडो आहेत.

कोलकाता व्हिडो.

नोयडा व्हिडो.

त्यामुळे हे कार्य अजूनही सुरू असल्याचे दिसते-यद्यपि तादृश नीमप्रकाशझोतात नसले तरी.

मन Sun, 27/10/2013 - 11:13

अभ्यासाच्या 'प्रेशर'ने युवतीची आत्महत्या
पिंपरी - अभ्यासाचे प्रेशर आणि वडिलांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नसल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या स्नेहा दिलीप गवई (वय 23, मूळ रा. नागपूर) या मुलीने महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने दोन्ही हाताच्या नसा कापण्याचा देखील प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगरमधील वायसीएमएच रुग्णालयाच्या पाठीमागे डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात बीबीएच्या तिसऱ्या वर्षाला स्नेहा शिकत होती; तर पिंपरीतील संत तुकारामनगर येथील अक्षय सोसायटीत राहत होती. स्नेहाला कालचा पहिला पेपर देखील अवघड गेल्याचे तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. आज सकाळी सातच्या सुमारास महाविद्यालयात आली. त्यानंतर तिने सव्वासातच्या सुमारास महाविद्यालयाच्या सातव्या मजल्यावर जाऊन उडी घेतली. तिला त्वरित महाविद्यालयातून डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तिचा मृत्यू झाला होता.

.
.
http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5394886999517334989&S…
.
.
आत्महत्येचे दुर्दैवी घटना सतत कुठे ना कुठे घडतच असतात, त्यात इथे वेगळी दखल घेण्यासारखे काय; असे कुणीही विचारेल.
आत्महत्येच्या कारणाकडे लक्ष देउन पहा. "अपेक्षांचे ओझे " घरातील मुलिच्या खांद्याअवर दिले जात आहे.
पूर्वी ह्यात विद्यार्थी जास्त असत; विद्यार्थिनी कमी किंवा नगण्य असत. (विदा नाही . जा फुट.)
अगदि परव तिकिट खिडकीवर गाजलेला चित्रपट कोणता तो "थ्री इडियट्स" किंवा फाइव्ह पॉइंट्स समवन. त्याचच उदाहरण घ्या. प्रोफेसर वीरु सहस्रबुद्धे ह्यांच्या दोन मुली
डॉक्टर आहेत, बर्‍यापैकी शिकल्यात. तिसरा आहे मुलगा ; पण तो आय आय टी सदृश कॉलेजात लागू शकत नसल्याचे दडपण घेउन जीव देतो.
भारतीय मन दिफॉल्ट मोड मध्ये कसं काम करतं त्याचं हे उत्तम उदाहरण. लेखकाला तिसरीही मुलगीच दाखवता आली का? नाही. त्यानं "मुलानं अभ्यासाचं टेन्शन घेतलं नि जीव दिला" हेच दाखवलं. ह्याच प्रोफेसरच्या अशाच टेन्शन्मुळे त्याचा एक विद्यार्थीसुद्धा जीव देतो.(हेलिकॉप्टर + कॅमेरा सदृश उपकरण बनवायचा त्याचा प्रोजेक्ट). इथेही जीव देणारा विद्यार्थीच. विद्यार्थिनी नाही. कारण आजही मुली शिकतात. पण त्यांनी खूप शिकावं ह्यासाठी त्यांच्यावर मुलांइतकं दडपण नसतं. (आता पुन्हा "माझ्या घरात..." किंवा "माझ्या परिचयात..." अशा केसेस सुरु करु नका प्लीझ. ती उदाहरणं प्रातिनिधिक वाटत नाहित.) अभ्यासात/करीअरमध्ये आपटी खाल्ल्यानं जीव देण्यात मुलं आघाडीवर आहेत. दुर्दैवी घटनेची सदर बातमी बदलत्या मानसिकतेचे उदाहरण वाटते.

'न'वी बाजू Sun, 27/10/2013 - 19:08

In reply to by मन

(आता पुन्हा "माझ्या घरात..." किंवा "माझ्या परिचयात..." अशा केसेस सुरु करु नका प्लीझ. ती उदाहरणं प्रातिनिधिक वाटत नाहित.)

अर्थात! माझ्या घरातल्या किंवा माझ्या परिचयातल्या केसिस या व्याख्येनेच "प्रातिनिधिक" वगैरे होऊ(च) शकत नाहीत.

दुर्दैवी घटनेची सदर बातमी बदलत्या मानसिकतेचे उदाहरण वाटते.

मुलींनी आत्महत्या केल्याच, तर त्या (१) प्रेमभंगापोटी, आणि (२) झुरळ मारण्याचे औषध खाऊनच कराव्यात, असा सामाजिक संकेत असल्याकारणाने, सदर बातमी ही बदलत्या मानसिकतेचेच उदाहरण मानले पाहिजे. किंबहुना, ही नवी फ्रॉण्टियर जिंकल्याबद्दल मृतेचा मरणोत्तर सत्कार करून तिला 'नारीरत्न' (किंवा गेला बाजार 'महिलाविभूषण') पुरस्कार माजी राष्ट्रपतींच्या हस्ते मरणोत्तर प्रदान केला पाहिजे. प्रत्येक स्त्रीची छाती अभिमानाने फुलून यावी, अशीच घटना/अचीव्हमेंट आहे ही!

मन Sun, 27/10/2013 - 19:46

In reply to by 'न'वी बाजू

खवचटपणामागील संदेश पोचला. इथे केलेल्या रिपोर्टिंग मधील भाषा असंवेदनशील वाटते आहे. इलाज नाही.
पण आता मुलींकडूनही करियरच्या अपेक्षा ठेवल्या जात आहेत हे अधोरेखित होत आहे ते दाखवायचे होते. त्यात नक्की काय चुकले?
घटना दुर्दैवी आहेच हे मान्य.

'न'वी बाजू Sun, 27/10/2013 - 19:53

In reply to by मन

पण आता मुलींकडूनही करियरच्या अपेक्षा ठेवल्या जात आहेत हे अधोरेखित होत आहे ते दाखवायचे होते. त्यात नक्की काय चुकले?

प्रस्तुत घटना ही नेमक्या कोणत्या न्यायाने "प्रातिनिधिक" ठरते?

बॅटमॅन Sun, 27/10/2013 - 23:48

In reply to by आबा

कधीपासून हेच म्हण्णार होतो. नंदीची आठवण झालीच. अभ्यासाच्या प्रेशरने आधी पोरे मरायची, आता पोरीही मरतात. एकूण काय तर पोरींना शिकायची संधी मिळतेय, अन समाज सुधारतोय!

रुची Sun, 27/10/2013 - 21:43

धर्माचा प्रसार अगदी हुबेहूब बाजार-वृद्धीच्या तत्वांवर कसा बेतलेला असतो याचे एक उत्तम उदाहरण. याच नवीन पोपनी अलिकडेच गर्भपात आणि समलैंगिकता याच विषयांवर चर्चाचर्वण करत रहायची गरज नसल्याचे प्रतिपादन केले होते. ग्राहकांच्या बदलत्या गरजांप्रमाणे उत्पादने न बदलल्याणास धंद्यात घाटा येऊन, कर्जबाजारीपणाला येऊ शकतो हे समजण्यातला व्यवहारीपणा नवीन पोपकडे आहे असे दिसते.

बॅटमॅन Wed, 30/10/2013 - 15:25

सनातन प्रभातने फटाक्यांचा निषेध केला आहे. बाकी त्या संस्थेचा इतिहास काहीही असो आणि कुणी यामागच्या विचाराचे कसेही अस्थानी उत्खनन करो, मला हा विचार चांगला वाटला. विशेषतः त्यांची प्रतिमा विशिष्ट प्रकारची असूनही त्यांनी असे म्हणावे हे विशेष आवडले.

कर्टसी: घाटपांडेकाका.

आबा Wed, 30/10/2013 - 23:31

In reply to by बॅटमॅन

"हे आमच्या संस्कृतीवर आक्रमण आहे, तुम्हाला फक्त हिंदूंच्या परंपरावर आक्षेप घेता येतो, क्रिसमसच्या वेळी फटाके उडवतात त्याला विरोध करून दाखवा बरं! रोज सकाळी-सकाळी मुल्ला बांग देऊन ध्वनीप्रदूषण आणि झोपमोड करतात ते तुम्हाला दिसत नाही का? आम्हा हिंदूंच्या पवित्र परंपरांना हीन लेखण्याचे मोक्षमुल्लरी कारस्थान आम्ही चालू देणार नाही. मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमध्ये शिकलेल्या इंग्रजांच्या मुखंडांकडून दूसरी अपेक्षा तरी काय ठेवायची म्हणा !"

अशी प्रतिक्रिया दिली होती तिथे, पब्लीश करित नाहीयेत अजून, मायला ! :)

सनातनपटू आपल्या रेप्युटेशन आणि स्टिरोओटाईपला जागले नाहीत म्हणून काय झालं? आम्ही काय कमी आहोत...

आपल्या पवित्र हिंदू संस्कृती मध्ये हजारो वर्षापासून दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे. दिवाळी मधल्या वेगवेगळ्या दिवसांची नावे आपणा सर्वांना माहित असतातच. परंतू ते साजरी करण्याची आणि वेगवेगळ्या प्रथा पाळण्याची शास्त्रिय कारणे आपण आज पाहणार आहोत. शास्त्र समजून न घेता आंधळेपणाने साजरे केलेल्या सणांमुळे जीवाला फायदा होत नाही.

दिवाळीमध्ये दिवे का लावतात? : "दिवे लावण्याची" परंपरा आपल्या देशात पूर्वीपासून आहे. त्या परंपरेचे आपण सर्वजण कसोशीने पालन करीत वेगवेगळ्या क्षेत्रात दिवे लावत आलेलो आहोत. क्वांटम मेकॅनिक्स पासून ते फॅमिली प्लॅनिंग पर्यंत सर्व विषयांवरती वेदांमध्ये लिहिलेले आहे हे सर्वज्ञातच आहे आणि पाश्चात्य वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे. त्यामुळे दिवे लावण्याच्या शास्त्रिय कारणांविषयीसुद्धा सहाजिकच वेदांमध्ये माहिती आहे.

असो, तर दिवाळी, ही सहसा अमावस्याच्या आसपास येते आणि थंडीच्या काळामध्ये येते. आमावस्येच्या काळामध्ये वातावरणामध्ये पसरलेल्या अपवित्र लहरी नष्ट करून सात्विक लहरींचे ऊत्सर्जन करण्यासाठी पवित्र अश्या अग्नीचा उपयोग करावा असे ऋषीमुनींनी सांगून ठेवले आहे. मनामध्ये पवित्र भाव घेऊन पणती लावली असता वातवरणाची सात्विकता वाढते असे सर्न च्या प्रयोगशाळेत सिद्ध झालेले आहे. परंतू हिदूस्थानातील पवित्र वातावरणामध्ये* वेदांमध्ये वर्णिल्या प्रमाणे सुसज्जता करून पणती लावली असता वातावरणातील सात्विक कणांचे प्रमाण ७०% ने वाढते असे प.पूंच्या निरिक्षणास आले आहे. तस्मात कलियुगामध्ये स्वतःची सात्विक पातळी वाढवण्यासाठी पणत्या लावणे गरजेचे आहे.

दिवाळीमध्ये फटाके का फोडतात? : दानाचे महत्व आपल्या #includeपवित्र> संस्कृतीमधल्या अनेक ग्रंथांमध्ये वर्णिलेले आहे. कलियुगात दान केल्याने स्थूल देहाला १०% व सूक्ष्म देहाला ९०% फायदा होतो. सतयुगामध्ये हेच प्रमाण ०% व १००% असायचे, पाश्चीमात्य भोगवादी संस्कृतीच्या अंगिकारामुळे आणि वायव्येकडून आलेल्या परकिय आक्रमकांच्या अपवित्र संस्कृतीमुळे हे प्रमाण बदललेले आहे.

असो तर दान. दिवे लावल्यामुळे वातवरण सात्विक होते हे आपण वरच्या परीच्छेदामध्ये पाहिले. आपल्या घरासमोर दिवे लावून वाढवलेले पवित्र कण, फटाके वाजवल्यामुळे सर्वदूर पसरतात (या ठिकाणी, पवित्र कण असे म्हणले आहे, आणि वरच्या परीच्छेदामध्ये पवित्र लहरी असे म्हणलेले आहे, वाचकांनी कृपया गोंधळून जाऊ नये कारण कण व लहरी एकच असतात, हे आता पाश्चीमात्य शास्त्रज्ञांनी सुद्धा मान्य केलेले आहे). अश्या प्रकारे आपल्याला पावित्र्य दानाचे पुण्य मिळते. आणि या पुण्याच्या शक्तीमुळे त्रासदायक लहरींना ९०% प्रतिबंध होतो.

टीपा
* सनातनचे अनेक साधक बरीच वर्षे तप करित असल्याने, त्यांची अध्यात्मिक पातळी उंचावलेली आहे. ही उंचावलेली पातळी साधनारूपी फावडे वापरून सर्व हिंदूस्थानावर पसरवून टाकण्याचे पुण्यकर्म पपूंनी केलेले आहे. त्यांच्या या आध्यात्मिक कोळपणीला धर्मशास्त्रीय आधार आहे... (आता बास...)

नगरीनिरंजन Thu, 31/10/2013 - 09:29

http://www.bbc.co.uk/news/world-24746539
वाढती मागणी आणि घटते उत्पादन यामुळे वाईनचा तुटवडा नजिकच्या भविष्यात निर्माण होईल असे दिसतेय. जीएमओ द्राक्षांसाठी योग्य वेळ आली आहे.