दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२ मे
जन्मदिवस : लेखक जेरोम के. जेरोम (१८५९), लेखक मिखाईल बुल्गाकोव्ह (१८९१), युरोपमधली सगळ्यात मोठी डिजिटल प्रकाशनसंस्था काढणारा ॲक्सेल स्प्रिंगर (१९१२), गायक पं. वसंतराव देशपांडे (१९२०), दिग्दर्शक सत्यजित राय (१९२१), वेस्ट इंडियन क्रिकेटपटू ब्रायन लारा (१९६९), फुटबॉलपटू डेव्हिड बेखम (१९७५)
मृत्युदिवस : चित्रकार, शिल्पकार, वास्तुतज्ज्ञ व शास्त्रज्ञ लिओनार्दो दा विंची (१५१९), विचारवंत व संपादक प्रा. दि. के. बेडेकर (१९७३), पॉलिमर्सवर काम करणारा नोबेलविजेता गिलिओ नत्ता (१९७९), चेतापेशींमधल्या संदेशवहनाबद्दल संशोधन करणारा नोबेलविजेता जॉन एकल्स (१९९७), गोवा मुक्तिसंग्रामातील सैनिक पुरुषोत्तम काकोडकर (१९९८), उद्योगपती मोहनलाल पिरामल (२००१)
--
१८६९ : 'फोलीज बर्जर' हा म्यूझिक हॉल पॅरिसमध्ये सुरू. संगीत, गायन, नृत्य, नाट्य इ. ललित कला सादर करण्यासाठीचे युरोपातील हे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र होते
१८७२ : मुंबईत 'व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्यूझियम'चे (आजचे भाऊ दाजी लाड संग्रहालय) उद्घाटन
१९२५ : फरीदपूरच्या कॉंग्रेस अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी इंग्रज सरकारला सहकार्याच्या बदल्यात वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केली
१९४५ : दुसऱ्या महायुद्धात बर्लिन रशियन फौजांसमोर पडले; इटलीचा पूर्ण पाडाव
१९५२ : जगातले पहिले जेट विमान लंडनहून जोहान्सबर्गला निघाले
१९५५ : 'कॅट ऑन अ हॉट टिन रूफ'साठी नाटककार टेनेसी विलिअम्सला पुलित्झर पुरस्कार मिळाला
१९६८ : 'मे ६८' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थी चळवळीची फ्रान्समध्ये सुरुवात. पाश्चात्य समाज, संस्कृती, शिक्षणव्यवस्था, युद्धविरोधी चळवळ यांत आमूलाग्र बदल घडवणारी ही चळवळ होती
१९८२ : 'द वेदर चॅनल'ची सुरुवात
१९८९ : ऑस्ट्रियालगतच्या आपल्या सीमा हंगेरीने खुल्या केल्या. त्यामुळे पूर्व जर्मन पश्चिमेला पळून जाऊ लागले. अखेर याची परिणती बर्लिनची भिंत पडण्यात आणि शीतयुद्धाची अखेर होण्यात झाली
२००८ : 'नर्गिस' चक्रीवादळाचा म्यानमारला तडाखा. १,३८,००० मृत व लाखो बेघर
२०११ : अमेरिकन सैन्याच्या गुप्त मोहिमेत कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा मृत्यू
२०१३ : सरबजीत या पाकिस्तानने पकडलेल्या तथाकथित हेराचा तुरुंगातल्या मारहाणीमुळे मृत्यू
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
दमलो!!
नुस्ता स्क्रोल करोन दमलो
प्रतिक्रिया वाचून झाल्यावर देतो....
कैगा
छान आणि तितकाच विस्तृत परिचय आवडला. "मौज प्रकाशन" ने जयंत नारळीकरांपासून विज्ञान विषयाशी निगडीत असणार्या कथानकाना आपल्या प्रकाशन प्रेफरन्सेसमध्ये स्थान दिल्याचा आनंद झाला होताच. श्री.अरुण हेबळेकर यांची अशा विषयावरील ही कादंबरी जरूर वाचेन इतपत आता म्हणतो.
बाकी श्री.चेतन सुभाष गुगळे यानी निरिक्षण केलेल्या...."तिथे कर्मचारी वर्ग फारसा टिकत नाही. लोक येतात, प्रशिक्षण घेतात आणि दुसरीकडे बदली मागून घेतात. कारण : भीती. ’आदित्य’ च्या एकंदर रचनेमुळे तिथे येणारा प्रत्येक माणूस बिचकतच येतो आणि जातो तो सुटकेचा नि:श्वास टाकून. ही भीती निर्माण व्हायला राजकारणी आणि वर्तमानपत्रवाले सारखेच जबाबदार आहेत. गल्ली पासून दिल्लीपर्यंत प्रत्येकच जण दरवेळी आदित्य च्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत असतो..." या वातावरणाशी मी सहमत आहे. हा अनुभव माझ्या काही परिचिताना उत्तर कन्नड जिल्ह्याच्या 'कैगा' गावी कार्यरत असलेल्या भारत सरकारच्या 'न्यूक्लीअर अॅटोमिक पॉवर स्टेशन' संदर्भात आला होता. तिथे प्रत्यक्ष काय काम सुरू आहे वा तिथे येणार्याजाणार्यावर इतकी सीक्रसी फिल्टर्स का लावली जातात याची नीट कल्पना नसलेली पण विविध कामाची टेन्डर्स मंजूर झालेली ठेकेदार मंडळी दबकून ये-जा करीत. 'न्यूक्लिअर', 'अॅटोमिक एनर्जी', 'हेवी वॉटर', 'स्ट्रीक्ट ड्रेस कोड' असे एरव्ही सर्वसामान्याना भयचकित करणारे (कारण भोपाळकांड) शब्द सतत कानावर पडत. कार्यालय तसेच कर्मचारी निवासस्थाने आणि तत्सम विविध बांधकामाच्या गरजेसाठी लागणारे सीमेन्ट, सळी, गर्डर्स आदी सप्लाय करण्याचे ठेके ज्या आठदहा कंपन्यांना मिळाले होते व त्यांच्याकडून ट्रक वाहतुक परवाने ज्याना मिळाले होते त्यापैकी तिघाचौघांशी माझे अगदी एकेरी पातळीवरील संबंध होते. त्यांच्याकडून पुसटसे समजत असे की, पुढे पुढे कित्येकांनी ते सप्लाय कॉन्ट्रॅक्ट पूर्णही केले नाही. कारण मिडियातील सुरक्षिततेविषयी येणार्या विकृत बातम्यांनी ही मंडळीही बिचकून गेली होती. बाहेरच्या कंत्राटदारांची ही कथा तर मग प्रत्यक्ष साईटवर काम करणार्या तंत्रज्ञच नव्हे तर बाबू लोकांचीही तीच मानसिकता झाली असल्यास त्याना तरी कसा दोष द्यायचा ?
कैग्याप्रमाणेच आदित्यचीदेखील हीच परिस्थिती असणार.
अशोक पाटील
काय हो
काय हो, नविन संस्थळावर नविन लेखापासून सुरुवात करायची तर तेच लेख, ब्लॉग, मिपा, जालरंग, आणि इथे टाकलेत.
तुमच्यासारख्या चतुरस्त्र माणसाकडून ही अशी शिळोप्याची अपे़क्षा नव्हती.
------------------------
घणघणतो घंटानाद
रोचक कादंबरी
कादंबरीचा विषय वेगळा आहे. अशा तांत्रिक प्रश्नांवर बेतलेल्या, आणि तरीही मानवी संघर्ष दाखवणाऱ्या कादंबऱ्या कमी दिसतात. अशा कादंबऱ्यांतली पात्रं हाडामांसाची, खरीखुरी, जीवंत करण्यात लेखक यशस्वी झाला असेल तर ती वाचताना एक वेगळीच पार्श्वभूमी मिळते. मला एक आठवते ती म्हणजे अकरा कोटी गॅलन पाणी. कोळशाच्या खाणीतल्या दुर्घटनेवर आधारित होती ती.
कादंबरीच्या रसग्रहणापेक्षा हा सारांश अधिक वाटला. सगळी कथा, अगदी शेवटापर्यंत सांगू नये असा प्रघात आहे. शेवट सांगितला असल्यास लेखाच्या वर 'स्पॉइलर ऍलर्ट' द्यावा ही विनंती.
हे काय आहे?
दम लागला स्क्रोल करूनच. पुस्तकच वाचेन.
वाचकाला पुस्तकवाचनाकडे नेण्याचा डाव या दीर्घ लेखनात आहे की काय अशी शंका चाटून गेलीच.
इतकं संगणकावर वाचायची सवय
इतकं संगणकावर वाचायची सवय नाही. पण वाचतो.
धन्यवाद
(पूर्ण) सारांश दिल्याबद्दल, आता पुस्तक वाचायची गरज फारशी उरली नाही.
अतिशय सुरेख असे परिक्षण
या कादंबरीत अशी काही अद्भुत ताकद आहे की तुम्ही ती एकदा संपूर्ण वाचलीत की तुम्हाला अजुन एकदा तरी संपुर्णत: वाचल्याशिवाय पुन्हा खाली ठेवावीशी वाटत नाही
चेतन मित्रा,
हे अगदी अगदी खरे आहे.
हेबळेकरांची आदित्य वाचताना हा थरार मीदेखील पूर्णपणे अनुभवला आहे.
'आदित्य' चे अतिशय सुरेख असे परिक्षण लिहिले आहेस तू.
तुझ्या परिक्षणामुळे 'आदित्य' पुन्हा वाचल्याचा अनुभव मिळाला
धन्यवाद मित्रा.
’आदित्य’चा गाभा. गाभ्यापासून बारा आरे निघतात
यात थोडी अवांतर भर - आदित्य हे नाव त्या अणुभट्टीला देण्यामागे कारण हे आहे की त्या अणुभट्टीचे भारा आरे. भारतीय परंपरेनुसार आदित्यांची संख्या ही १२ मानली गेली आहे, त्यामुळे आदित्य हे नाव
आदित्य तुला जशी अतिप्रिय तशीच मला नारळीकरांची प्रेषित प्रिय आहे. वर्षातून १-२ पारायणे होतातच होतात
आदित्य गेल्या वर्षीच वाचली असल्यामुळे आदित्यची आठवण अगदी ताजी आहे.
तू आदित्यचे परिक्षण खूप छान लिहिले आहेस.
अशाच अजून सुंदर पुस्तकांची ओळख तुझ्याकडून व्हावी ही मनापासूनची इच्छा