Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या जवळ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

अजूनही सिनेमाच्या सुरुवातीला सर्टफिकेटवर 【 हिन्दी 】 【 रंगीन 】 【 सिनेमास्कोप 】 असं टाईप करतात का?

कंसाची नक्षी जरा वेगळी असायची लहानपणी.

इतक्यात लक्षच गेलं नाही.

नितिन थत्ते Fri, 18/05/2018 - 14:17

In reply to by चिमणराव

https://en.wikipedia.org/wiki/S._R._Bommai_v._Union_of_India

ही केस राज्यशासन बरखास्त करण्याविषयी (कलम ३५६) असली तरी यातले मुद्दे लागू ठरतील...
वरील दुव्यावरून

या केसमध्ये कोर्टाने घालून दिलेली तत्त्वे

The majority enjoyed by the Council of Ministers shall be tested on the floor of the House.
Centre should give a warning to the state and a time period of one week to reply.
The court cannot question the advice tendered by the CoMs to the President but it can question the material behind the satisfaction of the President. Hence, Judicial Review will involve three questions only:
a. Is there any material behind the proclamation
b. Is the material relevant.
c. Was there any mala fide use of power.
If there is improper use of A356 then the court will provide remedy.
Under Article 356(3) it is the limitation on the powers of the President. Hence, the president shall not take any irreversible action until the proclamation is approved by the Parliament i.e. he shall not dissolve the assembly.
Article 356 is justified only when there is a breakdown of constitutional machinery and not administrative machinery

(अपूर्ण)....

चिमणराव Fri, 18/05/2018 - 15:01

हम्म.

एक विचार आला की अर्धे जेडीवाले उद्या तटस्थ राहून कॉंग्रेसची गोची करणार.

भुजबळ Thu, 31/05/2018 - 19:46

प्रणव मुखर्जी संघाच्या मुख्यालयात जाणार आहेत याविषयी मत काय्>

मला वाटते चांगले करणार आहेत मुखर्जी आणि संघ दोघेही. राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजे वाळीत टाकलेला शत्रू नाही. त्याच्याशी बोलणी हूओ शकतात.

गवि Sat, 02/06/2018 - 12:46

उगीच जरा एक जुनी आठवण.

इथे कोणी शाळेत असताना "२१ अपेक्षित"वर परीक्षा पार पाडल्यात का? ते अजूनही छापतात का?

'न'वी बाजू Sat, 02/06/2018 - 17:49

In reply to by गवि

इथे कोणी शाळेत असताना "२१ अपेक्षित"वर परीक्षा पार पाडल्यात का?

ही काय विचारण्याची गोष्ट झाली?

"पार पाडल्या" इज़ अॅन अंडरष्टेटमेंट. पूर्णावलंबित्व म्हणा! "२१ अपेक्षित" घोकायचे (अगदी अंधतेने घोकायचे), नि परीक्षेत ओकायचे. परीक्षेतील उज्ज्वल यशाची हमी!

फार कशाला, आम्हीच नव्हे, तर खुद्द बोर्डसुद्धा "२१ अपेक्षित"वर पूर्णावलंबी होते. बोले तो, "२१ अपेक्षित"मधले प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत जसेच्या तसे यायचे. Ad verbatim ad literatim. अगदी त्यातील टायपोंसह. म्हणजे, "२१ अपेक्षित"मधील प्रश्नात जर एखादा गंभीर टायपो असेल, जेणेकरून मल्टिपल चॉइसच्या चार पर्यायांपैकी चारही चुकीचे ठरतील (तीन खरोखरच चुकीचे असल्याकारणाने, आणि चौथा कदाचित टायपोमुळे तद्दन चुकीचा रेंडर झाल्याने), तरी तो प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत जसाच्या तसा छापून येत असे. आणि "२१ अपेक्षित"मध्ये त्याला बरोबर म्हणून दिलेला चुकीचा पर्याय बोर्डाच्या परीक्षेत लिहिणे अपेक्षित असे.

थोडक्यात काय, स्वतंत्र विचार, झालेच तर खोक्याबाहेरील विचारसरणी वगैरे भानगडी विद्यार्थ्यांत तर सोडाच, परंतु बोर्डाचा पेपर सेट करणाऱ्या परीक्षकांतसुद्धा जोपासल्या जात नसत. नुसते गतानुगतिकत्व एन्करेजले जाई. आनंदीआनंद होता सगळा बोर्ड म्हणजे.

कोण जाणे, कदाचित "२१ अपेक्षित" अजूनही असेल, नि त्यातील चुकांसह प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत जसेच्या तसे येतही असतील. (मला कल्पना नाही.) आफ्टर ऑल, हेरिटेज म्हणून काही गोष्टी तरी जशाच्या तशा ठेवायला नकोत?

बिटकॉइनजी बाळा Sat, 02/06/2018 - 20:33

In reply to by गवि

केवळ 21 अपेक्षितच नव्हे, तर मी नवनीत प्रकाशनाचा प्रचंड चाहता आहे.
मी गाईड्स वापरली, निबंधमाला वापरल्या, स्वाध्याय वापरले, आणि शिक्षक हस्तपुस्तिका सुद्धा वापरल्या.
मला जे शिक्षक लाभले ते सर्व जवळपास सुमार दर्जाचे होते. घरी कुणी दहावी ओलांडून गेलेले नसल्याने मला नवनीत हा सर्वोत्तम क्वांलिटीचा एकमेव चॉईस होता. म्हशींवर बसून नसलो, तरी नवनीत मी खूप आवडीने वाचले आहेत. गाईड्सना नावे ठेवायची फॅशन होती तरी मला कधीही नवनीत गाईड्स निरर्थक वाटले नाहीत.
उत्तम छपाई, उत्पादनमूल्ये, परवडणाऱ्या किंमती, जवळजवळ निर्दोष, सुबोध नार्वेकरांची अत्यंत सुबक चित्रे अशा गुणांमुळे मी नवनीतग्रुप चा खूप मोठा फॅन आहे.

मला फक्त एक गोष्ट कायम खटकते ती म्हणजे दहावीनंतरची नवनीत प्रकाशने कमी आहेत./ होती. ती जागा विशेषतः गणितासाठी, रिलायबल सिरीजने भरून काढली.

गवि Sat, 02/06/2018 - 20:46

In reply to by बिटकॉइनजी बाळा

नवनीत तर ग्रेट होतंच. पण तितपतही वाचायला वेळ उरलेला नसणाऱ्या आम्हा पब्लिकला २१ अपेक्षित तरंगण्यासाठी सुखड पुरवत असे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/06/2018 - 09:12

In reply to by गवि

आमच्या घरी विक्षिप्तपणा जनुकीय असावा. नवनीत गायडं आणि २१ अपेक्षित या गोष्टींकडे तुच्छतेनं बघितलं जायचं. कॉमिकं वाचायलाही वडलांचा विरोध होता. डीडी मेट्रो आल्यावर तिथे दाखवल्या जाणाऱ्या मालिका बघण्याबद्दलही आक्षेप होता; का तर १२ मिनीटं मालिका, जाहिराती, १२ मिनीटं मालिका यामुळे अटेंशन स्पॅन कमी होतो.

आता चाळीशीला टेकलेल्या मला आणि भावाला अभ्यास करताना बघून आमचे बापू आणि मातोश्री "कसं बरोबर पालकत्व निभावलं," वगैरे गफ्फा हाणत बसले असते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे आम्हां भावंडांची त्यातून सुटका झाली.

चिमणराव Sat, 09/06/2018 - 09:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सामान्य मुलांसाठी नवनीत उत्तम होतं.
हा प्रश्न आला की हे उत्तर लिहायचं बस्स.

'न'वी बाजू Sat, 09/06/2018 - 19:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचेही तीर्थरूप असेच वायझेड होते. त्या पिढीत आईवडील - विशेषतः वडील - वायझेड नसल्यास ते फाऊल धरले जात असे; त्याने हिंदू धर्म आणि संस्कृती बुडत असे.

(फरक इतकाच, की तुमचे तीर्थरूप हे संघिष्ट असल्याबद्दल वाचलेले आहे; आमचे कट्टर संघविरोधी होते, नि वर स्वतःस प्रागतिक/प्रगतीवादी/पुरोगामी वगैरेसुद्धा समजायचे. थोडक्यात काय, संघिष्ट काय नि पुरोगामी काय, सगळे सारखे - सारखेच वायझेड!)

१४टॅन Sat, 09/06/2018 - 19:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्या घरी विक्षिप्तपणा जनुकीय असावा. नवनीत गायडं आणि २१ अपेक्षित या गोष्टींकडे तुच्छतेनं बघितलं जायचं. कॉमिकं वाचायलाही वडलांचा विरोध होता. डीडी मेट्रो आल्यावर तिथे दाखवल्या जाणाऱ्या मालिका बघण्याबद्दलही आक्षेप होता; का तर १२ मिनीटं मालिका, जाहिराती, १२ मिनीटं मालिका यामुळे अटेंशन स्पॅन कमी होतो.

अगदी अगदी अगद्दी. तंतोतंत परिस्थिती माझ्याकडेही. दहावीत इभूनाशाअशा जरा अतीच जायला लागलं म्हणून हट्ट करून ते २१ अपेक्षित घेतलं. (साशामध्ये बारा वाजायचे ते वाजलेच, पण ते असो.)
माझ्या पिढीच्या तुलनेत मी बराच अँटिक आहे. पब्लिक पाचवीपासून क्लासमध्ये जायचा. स-ग-ळे. मी फक्त दहावीत गेलो. इ.स. २००५-६ च्या सुमारास एक मोठ्ठा अजस्त्र सीआरटी टीव्ही होता, तो बरेचदा स्पार्क पडपडून खपल्यावर टीव्ही काही आला नाही आजपर्यंत. त्यामुळे मालिका नव्हे, चालू अवस्थेतील टीव्ही दिसणं ही माझ्यासाठी सध्याही तशी नवलाईच् आहे. मलाही त्याची गरज अशी भासली नाही ते वेगळं.

बाकी आईवडील आहेत, आणि ते आम्हाला कुठेही टेकून (चाळिशी डोळ्यांवर आहे फक्त- :P) अभ्यास करताना पाहिलं तर

"कसं बरोबर पालकत्व निभावलं,"

ह्या गफ्फा हाकतातच. त्यामुळे असो.

चिमणराव Sun, 10/06/2018 - 07:48

In reply to by १४टॅन

**स्पार्क पडपडून खपल्यावर टीव्ही काही आला नाही आजपर्यंत**

अशी सांस्कृतिक उपासमार का बरं करावी?

'न'वी बाजू Sun, 10/06/2018 - 09:10

In reply to by चिमणराव

... आजमितीस माझ्या घरात दोन टीव्ही आहेत. ते कशालाही कनेक्टेड नाहीत. ना अँटेनाला, ना केबलला, ना डिशला. घरात ते कोणी चालू करण्याचा प्रश्न त्यामुळे अर्थातच उद्भवत नाही. आणि फ्रँकली, वी डोंट मिस देम अॅट ऑल. किंबहुना, आपल्या घरात टीव्ही आहे(त), हे लक्षातसुद्धा येत नाही.

एके काळी ते कनेक्टेड असायचे. डिशला, नाहीतर केबलला. परंतु तेव्हासुद्धा बघणे विशेष किंवा जवळपास होत नसे. (साला वेळ कोणाला असतो इथे?) घरात टीव्ही असावा, असे शास्त्र आहे, म्हणून टीव्ही होते, आणि टीव्ही आहेत म्हटल्यावर एक पद्धत, प्रथा किंवा परंपरा म्हणून ते केबल नाहीतर डिश कशाशी तरी जोडलेले असत. परंतु केबल काय किंवा डिश काय, फुकटात तर येत नाहीत! (कायच्या काय चार्जेस असतात साल्यांचे.) आणि मग टीव्ही बघायचा जर नाही, तर मग दरमहा भोसडीच्यांच्या टाळक्यावर पैसे तरी काय म्हणून ओतायचे? पैसे काय आपल्याला फुकटात येतात? म्हणून मग शांतपणे एके दिवशी सर्व्हिस बंद करून टाकली, काँट्रॅक्ट संपल्यावर, त्यानंतर पुन्हा कशाला टीव्ही जोडले नाहीत. टीव्ही मात्र ठेवलेत, असूदेत म्हणून. पाहू, पुढेमागे कधी टीव्ही बघावासा वाटला, तर पुन्हा सर्व्हिस जोडू. तूर्तास तशी निकड वाटत नाही.

आणि काही सांस्कृतिक उपासमार वगैरे होत नाही घरात टीव्ही चालू नसला तर. इंटरनेट कशासाठी असते?

चिमणराव Sun, 10/06/2018 - 09:22

In reply to by 'न'वी बाजू

Tv = आजुबाजुला /दूरवर काय चालले आहे हे जाणून घ्यायचे माध्यम. इमेलला न्युज अपडेट्स असतातच. किंवा ओनलाइन न्यूज चानेल्स. मराठी मालिका?

१४टॅन Sun, 10/06/2018 - 12:28

In reply to by 'न'वी बाजू

प्रत्येक मुद्द्याशी सहमत. आंजा असल्यास टीव्हीची गरजही भासत नाही म्हणा.
पेनड्राईव्ह/क्रोमकास्ट वगैरे वापरून आरामात फिल्लम पहायला मोठी स्क्रीन हा त्याचा भारी वापर आहे. मॉनिटरएव्हढ्याच आकाराची स्क्रीन असल्यास मात्र निरुपयोगीच.
(अवांतर: मराठी मालिका पाहण्यासाठी टीव्हीचे कनेक्षन घेणाऱ्यांची सांस्कृतिक, आध्यात्मिक, आत्मिक, मानसिक उपासमार नव्हे, कुपोषण झालेलं असतं कुपोषण.)

अभ्या.. Sun, 10/06/2018 - 15:48

In reply to by १४टॅन

मराठी मालिका पाहण्यासाठी टीव्हीचे कनेक्षन घेणाऱ्यांची सांस्कृतिक, आध्यात्मिक, आत्मिक, मानसिक उपासमार नव्हे, कुपोषण झालेलं असतं कुपोषण

बळंच उगी सर्वांगीण सशक्ततेचा आणलेला आव.
नाही बघत ना टीव्हीवर मराठी सिरीयली तर राहु दे ना, का उगी तमाम जनतेच्या पोषणाची चिंता.

अभ्या.. Sun, 10/06/2018 - 17:32

In reply to by १४टॅन

असं नाही, असं नाही, तुम्ही जनरल पब्लिकच्या वैयक्तिक आवडीवर काहीही जनरल शेरे मारायचे आणि पळुन जायचे नाही चालणार बाबा.
हे वैचारिक सुपोषणाचे चिन्ह नाही. आदर करायला हवा कीनई सर्वसामान्यांचा?

चिमणराव Sun, 10/06/2018 - 17:42

In reply to by अभ्या..

घरात कुणी आजी आजोबा असतील तर बटण दाबलं, पडद्यावर चित्रं हलली की त्यांंचं काम झालं. त्यात किचकटपणा असला तर ते हात लावत नाहीत.
दोनचार मराठी न्युज चानेलवरच्या बातम्या बघायच्या, रोजचा पेपर दुपारच्या वामकुक्षीसाठी.

'न'वी बाजू Sun, 10/06/2018 - 17:50

In reply to by चिमणराव

वर्तमानपत्रांना रिमोट कंट्रोल बसवले पाहिजेत. केवळ आजोबा पिढीला वर्तमानपत्रांना हात लावता येऊ नये म्हणून.

मज्जा!

१४टॅन Sun, 10/06/2018 - 18:17

In reply to by अभ्या..

एक म्हणजे मी पळून गेलो नाहीए. चर्चा, वाद, भांडणाला कायम तयार.
-
दुस्रं म्हणजे आवडीनिवडींवर शेरे मारल्यासारखं दिसत जरी असलं, तरी माझा रोख मालिकांवर आहे हे बऱ्यापैकी अध्याहृत आहे. मालिका बघतात म्हणून ते लोकच रद्दी असं माझं अजिबात मत नाही. त्यामुळे माझा शेरा वैयक्तिक नव्हता.
मराठी मालिका तद्दन भिकारचोट असतात हे माझं म्हणणं आहे. त्या आवडणाऱ्या बव्हांश लोकांनी कधीच त्यांच्याबाबत विचार केलेला नसतो, देशोदेशीच्या कलाकृती पाहिलेल्या नसतात (आणि म्हणून त्यांना त्यातलं भिकारचौट्य कळत नाही) इतकंच मला म्हणायचं होतं.
-
सामान्यांच्या आवडीचा आदर करायला मी काही मंचीय कलाकार नाही, म्हणून तो प्रश्नच येत नाही.

अभ्या.. Sun, 10/06/2018 - 20:15

In reply to by १४टॅन

अब्बाब्बा, मालिका पाहणाऱ्यांचे कसले कसले कुपोषण होते म्हणताव आणि लोकच रद्दी असे माझे मत नाही असेही म्हणताव. कसे हो हे?
आणि बघणाऱे लोकांची वैयक्तिक आवड आहे ती, एखाद्याला वैयक्तिक नडण्यापेक्षा डायरेक्ट इतका होलसेलातला द्वेष? हा वैयक्तिक होण्यापेक्षा अधिक त्रासदायक आहे असे वाटत नाही का तुम्हाला?
आणि देशोदेशीच्या कलाकृती वगैरे वगैरे बघुनसुध्दा अशा पध्दतीचा द्वेष अंगात भिनत असेल तर मालिकांतले भिकारचौट्य परवडले म्हणतो मी.
आणि मंचीय कलाकार झाल्यावरच सामान्याच्या (तसे पाहता आपण सोडून इतर सर्वांच्याच) आवडीचा विचार करायला पाहिजे असं थोडीच आहे.
काय म्हणता?

१४टॅन Sun, 10/06/2018 - 20:44

In reply to by अभ्या..

१) लोकांची आवड, तिही तीच एक आवड रद्दी. त्यांची खाण्यापिण्याची, गाण्याची इत्यादी आवड उत्तम असूच शकते.
२) लोक रद्दी नाहीत.
दोन्हींमध्ये काहीही संबंध नाही. 'ते' वाक्य अतिशयोक्तीपूर्ण होतं, हे थेट लिहीतोच आता.
उदाहरणार्थ; उद्या एखाद्या मालिकेचा जबरी फॅन, एखाद्या पात्रासारखे आविर्भाव करणारा वगैरेपर्यंत- माझ्याकडे मदत म्हणून पैसे मागायला आला तर मी देईन. दुसरा, ते काही न करणारा, मालिका अज्जिबात न पाहणारा आला तर त्याला मी प्राधान्य वगैरे अजिबात देणार नाही.
--
परत, लोकांप्रती माझ्या मनात द्वेष नाही. त्यांच्या एका विवक्षित आवडीबद्दल (सध्या द्वेषच म्हणूया) आहे. लोक नद्यांत कचरा टाकतात, रुळांवर शौचास बसतात म्हणून मला त्यांच्या त्या सवयींबद्दल घृणा वाटते, त्या लोकांबद्दल (व्यक्तिमत्त्वांबद्दल) नाही.
--
तुमच्या प्रतिसादात मात्र मला फक्त 'आला मोठा शाना' छाप, आधीच्या माझ्या ह्या संस्थळावरच्या वावरातून बनत गेलेल्या माझ्याबद्दलच्या तुमच्या द्वेषपूर्ण मताचाच परिपाक दिसला. तो असो.
--
तिसरा मुद्दा: ह्याशिवाय कलेतलं विचारप्रवर्तन का काय ते कधीच येणार नाही, असं नाही वाटत? तुमच्या आजूबाजूची कला तीच ती जुनी मूल्यं कवटाळून बसली आहे, ह्याबद्दल वाईट वाटायला नको?
--
लोकांचा विचार केला पाहिजे. त्यांच्या कलेबाबतच्या 'आवडीं'चा विचार करायला, कोणीही बांधील नाही. नसावं.

अभ्या.. Mon, 11/06/2018 - 17:32

In reply to by १४टॅन

बाकी युक्तीवादाबद्दल असोच पण्

तुमच्या प्रतिसादात मात्र मला फक्त 'आला मोठा शाना' छाप, आधीच्या माझ्या ह्या संस्थळावरच्या वावरातून बनत गेलेल्या माझ्याबद्दलच्या तुमच्या द्वेषपूर्ण मताचाच परिपाक दिसला.

हे एपिक आहे. वावरत राहा. शुभेच्छा.

१४टॅन Mon, 11/06/2018 - 20:07

In reply to by अभ्या..

बचेंगे तो और भी वावरेंगे!
तुमच्या त्या 'पळून जाणे' वगैरेवरून मी वरील निष्कर्ष काढला आहे. जर फक्त माझ्या त्या एका शेऱ्यावरून तुम्ही ते म्हणला असाल, तर थोडीशी क्षमा असावी. 'थोडीशी' ह्यासाठी, की मी बोल्लो, आणि प्रतिवाद करायला परत परत आलोही. त्यामुळे पळून जाणे ह्यात काही तसं तथ्य नाही.
आणि बाकी विषय जनरल कलेपर्यंत गेला आहेच, तर सांगाच काय वाटतं ते.

वाचक Fri, 22/06/2018 - 06:58

In reply to by १४टॅन

बचेंगे तो और भी वावरेंगे!

आम्ही असे वावरलो की बावरलो कधीच नाही
आम्ही असे वावरलो की बावरलो कधीच नाही...

एकदाच असे बावरलो की सावरलो कधीच नाही

उगाचच आपले अवांतर... बाकी चालू द्या :)

अजो१२३ Sun, 24/06/2018 - 12:29

In reply to by १४टॅन

मराठी मालिका तद्दन भिकारचोट असतात हे माझं म्हणणं आहे.

हे खरं असावं.पण हॉलिवूडपेक्शा किमान १० पट सरस असाव्यात. बाकी रेशल बायस नि सांस्कृतिक न्यूनगंड कधी कधी सबकाँशस असतो.

चिमणराव Sun, 10/06/2018 - 18:21

In reply to by 'न'वी बाजू

इंटरनेट हे जिओ ४जी च्या दणक्यानंतर स्वस्त/ परवडणारे होऊ लागले.
लोक मोबाईलवर सिरिअली पाहू लागले. दोनशे रुपयांत रोज दीड जीबी डेटा ( अधिक फुकट कॉल.)मागच्या वर्षी अडिचशे रुपड्यात फक्त एक जीबी डेटा फुंकून प्यावा लागायचा.

'न'वी बाजू Sun, 10/06/2018 - 09:37

In reply to by १४टॅन

अदिती आणि मी गेल्या जन्मात भावंडं असू.

Sublimation???

(किंबहुना, तो 'गेल्या जन्मात' वगैरे भाग लक्षात घेता, यास double sublimation म्हणता यावे, किंवा कसे?)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/06/2018 - 23:24

In reply to by 'न'वी बाजू

'न'बा, तुमच्यासाठी 'फ्रेंड्स'मधला एक विनोद उपयुक्त आहे - घरी टीव्ही आहे कारण फर्निचरचा फोकल पॉइंट कुठे ठेवायचा यावर घरात एकमत होईना!

आमच्या घरी आता नवीन भांडणं चालतात; मी आता भांडण सोडून दिलंय. पण मुद्दा आहेच. बऱ्या अर्ध्याला जाहिराती बघायला आवडत नाहीत. मला काही जाहिराती आवडतात; उदा. 'व्होल्व्हो'च्या जाहिरातीत 'these are the few of my favorite things' याचं रिमिक्स (शब्दांकडे दुर्लक्ष केलं तर) बरं आहे. त्यासाठी थोडा कचरा सावडावा लागला तरी चालतो. किंवा मध्येच जाहिराती आल्या की घरकामं उडवून देता येतात.

पण बऱ्या अर्ध्याला ठाण मांडून टीव्ही बघायचा असतो. जाहिरातींमुळे साधनेत भंग येतो. मग आम्ही टेनिस मॅचसुद्धा रेकॉर्ड करतो आणि तासभर उशिरा बघायला सुरुवात करतो. ताबडतोब सगळ्या बातम्या पोहोचल्या पाहिजेत असा माझा आग्रह नसतोच, त्यामुळे सध्याचा सौदा दोघांनाही मान्य आहे.

अजो१२३ Sun, 24/06/2018 - 12:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यांच्या अकाली मृत्यूमुळे आम्हां भावंडांची त्यातून सुटका झाली.

त्यांचा अजूनही तीव्र अकाली मृत्यू झाला असता तर आमचीही तुमच्यापासून आणि तुमच्या ऐसीवरच्या विचारहिन गफ्फांपासून सुटका झाली असती. अर्थात सुटकेचं सुख प्रत्येकाच्या नशीबी नसतं हे मान्य आहेच.
=============
किमान आता होओ.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 24/06/2018 - 22:49

In reply to by अजो१२३

सुटका ही मनाची अवस्था असते, अजो. आपली सुटका झाली, हे समजण्यासाठीही काळ जावा लागतो. आणि सुटका करणं, किंवा स्वातंत्र्य मिळवणं या गोष्टी आपल्याच हातात असतात. आपला हात जगन्नाथ. प्रयत्न करत राहावं, जमतं कधीतरी. किंवा असं वाटायला तरी लागतं.

अजो१२३ Mon, 25/06/2018 - 05:10

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि सुटका करणं, किंवा स्वातंत्र्य मिळवणं या गोष्टी आपल्याच हातात असतात.

हा भ्रम आहे. तुमचे अकाली मेलेले दोन्ही पालक ज्या प्रकारे तुमचे स्वातंत्र्य बाधित करत असत त्यापेक्षा कितीतरी पट आज अनेक जण करत आहेत. त्यांच्यापासूओन सुटका तुमच्या अजिबात हातात नाही. हे जर तुम्हाला लागू होत नाहीये असं वाटत असेल तर एक तर तुम्हाला स्वातंत्र्य या संकल्पनेची आकलनबुद्धी नाही वा तुमचे आईवडील कमालीचे विकृत लोक होते.

अजो१२३ Mon, 25/06/2018 - 05:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पालकांच्या, मंजे दोन्ही, अकाली मृत्यूचा भावंडांच्या मानसिक स्वास्थावर परिणाम होतो. म्हणजे त्यांची बुद्धी शाबूत असते, पण अनेक बाबींत नि विशेषत: पालकांशी निगडित बाबींत ते अत्यंत संवेदनशील असतात. खूपच भावूक असतात. त्यांना त्या संदर्भात कोणतंही निगेटिव विधान चालत नाही. ते एरवी कितीही कल्पक असोत, कितीही मोठे झालेले असोत.
आपण त्यांचेशी जे सुटकेचं असोशियेशन केलं आहे, मग ते गंमत म्हणून का असेना, अयोग्यच नव्हे तर क्रूर आहे अनलेस ते लोक काहितरी महाभयंकर घाण होते. कारण विशेषत: त्यात अकाली नि दोन्ही असे शब्द आलेत. तुमचं विधान तुम्हाला सामान्य वाटत असेल, तर ललितात वैगेरे ठिक आहे. ते तुमच्या प्रत्यक्ष जिवनात योग्य आहे असं वाटत असेल तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्या निकटच्या व्यक्तिंबद्दल कीव, सहानुभूती वाटत आहे.
=========================
ऐसीचे अनेक वाचक तुम्ही लिहाल त्याला काय मर्यादा असावी याची काहीही अपेक्षाच करत नाहीत.त्यातल्या अनेकांची तुमच्या मानसिक , वैचारिक अवस्थेवरच विचित्र मतं आहेत. म्हणून ती आपल्याशी संवादच करत नाहीत. (हे देखील एका अर्थाने क्रूर आहे ). तुमच्या या विधानानं मी देखील या क्लबमधे जायच्या टोकाला आलो आहे. तसं गुपचुप करणं मला अजूनच बेकार वाटतं म्हणून आपल्याशी संवाद केला आहे.

नितिन थत्ते Mon, 25/06/2018 - 10:24

In reply to by अजो१२३

>>ललितात वैगेरे ठिक आहे. ते तुमच्या प्रत्यक्ष जिवनात योग्य आहे असं वाटत असेल तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्या निकटच्या व्यक्तिंबद्दल कीव, सहानुभूती वाटत आहे.

अरे काय दिवस आलेत !! अजोंशी सहमत व्हायची वेळ यावी? उठा ले रे बाबा !! मेर्कू नय रे.....

चिंतातुर जंतू Mon, 11/06/2018 - 17:17

In reply to by यडमाठराव

आस्ताद काळेंच्या नावाचा (आस्ताद) अर्थ काय आहे ?

मुलाच्या वडिलांकडून -

देवदूत. हा पर्शियन शब्द आहे. आपण प्रसिद्ध नृत्यकलाकार आस्ताद देबू यांचे नाव ऐकले असेल.

नंदन Thu, 14/06/2018 - 12:58

In reply to by चिंतातुर जंतू

तसं फारशीत देवदूत म्हणजे फरिश्ते, आस्ताद खरं तर उस्तादशी संबंधित असावा असा एक अंदाज होता. खखोखुजा! (खरे-खोटे खुदा जाने)

'न'वी बाजू Thu, 14/06/2018 - 17:46

In reply to by नंदन

तसं फारशीत देवदूत म्हणजे फरिश्ते

फारशीत समानार्थी शब्द असू नयेत काय?

नंदन Thu, 14/06/2018 - 21:02

In reply to by 'न'वी बाजू

'अर्थात'च शक्य आहे (सिनॉनिम क्वा नोन?) :)

पुंबा Thu, 14/06/2018 - 14:01

In reply to by चिंतातुर जंतू

हे मुलाचे वडिल आज बिग बॉस मध्ये वर्णी लावत आहेत. मराठीवरून सगळ्या स्पर्धकांची आज शाळा घेतली जाणार आहे.

चिमणराव Sun, 10/06/2018 - 12:45

शुक्रवार -
१) Aol mail दोन दिवस कोणत्याच फोनातून उघडत नाही.
Service unavailable 1.1
२) gsu.oath ~~ we are part of oath for better service, accept the terms. हा काय प्रकार ? हे चुकुन डावलले गेले तर पुन्हा accept कसे करणार?

------
रविवार, १०जून
त्यांचाच काही साइट प्राब्लेम असे , आता चालू झाले.

पण ते oath काही समजले नाही.

अभ्या.. Tue, 12/06/2018 - 00:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असं मधनच कुठेतरी केव्हाही उगवून अदितीने आद्य फाउल केला आहे. त्या फ़ौलाचा निषेध.
फौला मेरे फौला मेरे हे गाणे आठवल्याबद्दल धन्यवाद.

चिमणराव Sun, 10/06/2018 - 21:31

In reply to by चिंतातुर जंतू

माझा असा समज झाला की ( दोन ठिकाणी या औऔथच्या कंडीशन अक्सेप्ट करा) इतर ठिकाणी अटी घालतात तसे काही आहे. डिनाई केल्यास ईमेल ओपन होणार नाही. And block सारखं - ब्लॉक केलेत तर सर्व लेख वाचता येणार नाहीत, जाहिराती येऊ दिल्या तर काही अडचण नाही. चुकून स्क्रीन वर डिनाइ करायला आणि साईट बंद एकाचवेळी झाले असावे.

चिंतातुर जंतू Wed, 13/06/2018 - 15:21

इतकं सगळं करतात तर सुटलेलं पोट कमी करायला काही व्यायाम का करत नाहीत? म्हणजे त्यांना माक्रोंसोबत बघून न्यूनगंड येतो त्याचं काही तरी करा ना...

अबापट Wed, 13/06/2018 - 16:02

In reply to by चिंतातुर जंतू

तुमच्या अवाजवी अपेक्षा !!! आदरणीय मोदीजींचं वय काय आणि तुमच्या माक्रोणच वय काय ..
इतर सगळ्या गोष्टींप्रमाणे यांचीही उत्तरे द्या
१. रा रा माक्रोण हे आदरणीय मोदीजींच्या वयाचे असतील तेव्हा त्यांचं पॉट किती मोठं असेल ?
२. आमचे आदरणीय मोदीजी हे फक्त शरीरानेच नव्हे तर मनानेही तंदुरुस्त , फिट , खंबीर , तडफदार आहेत . गेल्या सत्तर वर्षात असा कुणी झाला होता का ?
३. आमचे आदरणीय मोदीजी जेव्हा मनाचे सिक्स पॅक ऍब्स दाखवतील तेव्हा तरी तुम्ही विश्वास ठेवनार का ?
तुमचा न्यूनगंड हे मेकॉले आणि नेहरूंचे कारस्थान आहे .

योग्य विषयाचा अभ्यास करा आणि तो अभ्यास वाढवा .

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 13/06/2018 - 20:26

In reply to by अबापट

मनाचे सिक्स प्याक बघून आमचं समाधान होत नाही ना. मग परदेशी माक्रोंकडे बघावं लागतं. 'मेकिन इंडिया'ची शपथ आहे, प्याक दाखवा मोदीजी.

मिहिर Thu, 14/06/2018 - 04:17

ऐसीच्या फेसबुक खात्यावरून अलिकडे स्टेटसमध्ये धाग्याबद्दल एकोळी माहिती व धाग्याचा दुवा पहिल्या प्रतिक्रियेत असे केलेले दिसते. मूळ स्टेटसमध्ये जर दुवा असेल तर फेसबुक कमी लोकांना पोस्ट दाखवते असे कारण असावे. ह्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ एखादा दुवा किंवा ऐसीच्या पानातून दिसलेले युझर स्टॅट्स इ. आहे का? म्हणजे पूर्वी जेव्हा पोस्टमध्ये दुवा असायचा तेव्हा पोस्ट कमी लोकांपर्यंत पोचायची, आता जास्त लोकांपर्यंत पोचते इ.?

ऐसीअक्षरे Fri, 15/06/2018 - 15:04

In reply to by मिहिर

ह्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ एखादा दुवा किंवा ऐसीच्या पानातून दिसलेले युझर स्टॅट्स इ. आहे का? म्हणजे पूर्वी जेव्हा पोस्टमध्ये दुवा असायचा तेव्हा पोस्ट कमी लोकांपर्यंत पोचायची, आता जास्त लोकांपर्यंत पोचते इ.?

लाईक्स + शेअर्स वाढलेले आहेत.

-प्रणव- Fri, 15/06/2018 - 16:26

In reply to by मिहिर

मी रिसेंटली या विषयावर वाचत होतो. सगळ्याच म्हणणं तेच आहे - फेसबुक त्यांच्या वेबसाईटच्या बाहेर जाणारी ट्राफिक जितकी कमी करता येईल तितकी करते.

अजून एक म्हणजे बिझनेस पेज पेक्षा पर्सनल अकाउंट वरून शेअर केलेल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत जातात. म्हणूनच ऐसी च्या पेज वरच्या गोष्टींना फार लाईक्स मिळत नाहीत (पर्सनल अकाउंट शी तुलना केली तर).

बिझनेस पेज वरून शेअर केलेल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी फेसबुकवर पैसे मोजावे लागतात. वेगवेगळ्या रिजन मधल्या, वेगवेगळे इंटरेस्ट असलेल्या लोकांना या प्रमोशन मधून टारगेट करता येते.

पर एंगजमेंट रेट साधारण 1 रुपया प्रति क्लिक आहे - एंगेजमेंट म्हणजे लाईक, कमेंट, शेअर वगैरे वगैरे

चिंतातुर जंतू Mon, 18/06/2018 - 17:32

एका सद्गृहस्थांनी गाडीतून प्लॅस्टिकचा कचरा बाहेर फेकला असता अचानक शेजारच्या गाडीतून त्यांना नाजुकशा दटावणीला सामोरं जावं लागलं. प्रकरण तेवढ्यावर थांबलं नाही, तर कोट्यवधी लोकांच्या दिलांची धडकन असलेल्या नवपरिणित जोडगोळीनं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केला -

आता हे सद्गृहस्थ त्याविरोधात बोंब मारताहेत -

तुम्हाला काय वाटतं? त्या माणसाचा व्हिडिओ शेअर झाला म्हणून त्याचा खाजगीपणा भंग झाला, की अनुष्कानं आगाऊपणा केला, की मुळात 'एक चौरस मिमि' प्लास्टिक गाडीबाहेर 'चुकून' फेकण्यामुळे त्याला असा कांगावा करण्याचा हक्क नाही? की तो आता केवळ पब्लिसिटी स्टंट करतो आहे?

संपादन - आता मुलाच्या मातोश्रींनीही विरुष्काला झापलं आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 18/06/2018 - 21:40

In reply to by चिंतातुर जंतू

स्वतःच्या खाजगीपणाबद्दल जागरुक असणारे एक चौरस मिमी कचऱ्याचे जनक, श्रीमान अरहान सिंग, अनुष्का शर्माचं नाव 'मिसेस अनुष्का शर्मा कोहली' असं लिहीत आहेत. ती मात्र स्वतःचं नाव अनुष्का शर्मा असंच लावत आहे.

सदर इसमाकडे न्यायालयीन कज्जे करण्याइतपत पैसा नक्की असावा. राजकीय विधान करण्याची पूर्ण क्षमता या घटनाक्रमात आहे; विरू-अनुष्कामुळे प्रसिद्धीही मिळाली आहे; पण त्यासाठी खर्च केला नाही तर कांगावा आणि स्टंटबाजीच.

अजो१२३ Sun, 24/06/2018 - 12:38

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अनुष्का शर्माचं नाव 'मिसेस अनुष्का शर्मा कोहली' असं लिहीत आहेत.

नावात नवऱ्यांचं नाव लिहिलं तर ते विटाळतं का?

'न'वी बाजू Sun, 24/06/2018 - 21:35

In reply to by अजो१२३

नावात नवऱ्यांचं नाव लिहिलं तर ते विटाळतं का?

चांगला तथा रोचक प्रश्न आहे. नावात नवऱ्यांचे (अनेकवचन ड्यूली नोटेड.) नाव लिहिण्या-न लिहिण्याचा प्रश्न उद्भवू शकेल अशा महिलांच्या केसिस दुर्दैवाने आमच्या वैयक्तिक परिचयाच्या नाहीत, आणि ऐकिवातल्या केवळ दोनच आहेत: (१) क्कुसुम, आणि (२) द्रौपदी उर्फ पांचाली (पाँच अली). पैकी पहिली केस ही पूर्णतः काल्पनिक तथा क्केवळ केकता क्कपूरच्या सुपीक कल्पनाशक्तीचा आविष्कार असल्याकारणाने तिचा गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता नसावी. दुसऱ्या केसमध्ये, द्रौपदी ही आपल्या नावात नवऱ्यांची नावे लावत असे किंवा कसे, याबाबत काही ऐतिहासिक दाखला निदान आमच्या माहितीत तरी नाही. (कदाचित श्री. बॅटमॅन किंवा श्री. कोल्हटकर यावर काही प्रकाश पाडू शकतील.) मात्र, बहुधा ती नवऱ्यांची नावे आपल्या नावात लावत नसावी, अशीच आमची अटकळ आहे. अर्थात, यामागील कारण विटाळासंबंधीच्या तत्कालीन/सद्यकालीन/किमद्कालीन बुरसटलेल्या संकल्पनांशी संबंधित नसून व्यावहारिक सुविधेशी निगडित असावे, असा अंदाज बांधता येतो. कोठल्याही सरकारी वा अधिकृत दस्तऐवजावर स्वाक्षरी करताना ती जर 'द्रौपदी युधिष्ठिरअली (उर्फ धर्मराजअली) भीमअली अर्जुनअली (उर्फ पार्थअली) नकुलअली सहदेवअली (पांडवांचे-जे-काही-आडनाव-असेल-ते)' अशी करू लागती, तर त्या टिपिकल सरकारी दस्तऐवजावरील स्वाक्षरीकरिताची एवढीशी जागा तिला न पुरती, अथवा तिच्या स्वाक्षरीकरिता त्या दस्तऐवजास परिशिष्ट जोडावे लागते .

..........
संस्कृतची चूभूद्याघ्या/दुरुस्त करावी.

श्री. बॅटमॅन, श्री. कोल्हटकर वा अन्य जाणकारांनी यावर प्रकाश पाडावा.

वस्तुतः या आगगाडीत तिचे स्वतःचे नावसुद्धा 'द्रौपदी (उर्फ पांचाली उर्फ कल्याणी)' असे लिहिता येईल, परंतु आपल्या संस्कृतीत स्त्रियांना तथा स्त्रियांच्या अस्मितेला महत्त्व देण्याची प्रथा तथा परंपरा नसल्याकारणाने...

द्रौपदी अंगठाछाप असल्यास४अ ही समस्या अर्थातच निकालात निघावी, तथा द्रौपदी आपले नाव कसे लिहीत होती, हा प्रश्न मुळात उद्भवू नये.

४अ तसेही आपल्या संस्कृतीत स्त्रियांना फारसे शिक्षण देण्याची प्रथा तथा परंपरा नसल्याकारणाने...

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 24/06/2018 - 22:45

In reply to by 'न'वी बाजू

'न'वी बाजू हेच आमचे खरे नेते आहेत. ते द्रष्टे आहेत. सबब 'भडकाऊ' अशी श्रेणी देण्यात येत आहे.

अजो१२३ Mon, 25/06/2018 - 05:43

In reply to by 'न'वी बाजू

(अनेकवचन ड्यूली नोटेड.)

नबा, नावात नाव घालणे ही मालकी लिहिण्याचे लक्षण आहे म्हणून, आणि मी काही कोणाची मालकी नाही म्हणून ऐसीवरच्या स्त्रीवादी बायकांनी गर्दा घातला असता. म्हणून तो अनुस्वार घातला आहे. तुमचे किती का नवरे असेनात, मंजे फक्त एकवेळ कल्पनेत मूठ मारायला वापर ते जन्मोजन्मीची अध्यात्मिक सांसारिक विवाहाचा इतिहास, ज्याला कशाला त्या लग्न म्हणतात, त्यात नवऱ्याचे नाव आपल्या नावात घुसडले तर असा कोणता विटाळ होतो हा मुख्य प्रश्न आहे.
---------------------
एक अनुस्वार कळू नये मंजे काय नबा....? तुमचं असं रेप्यूटेशन नव्हतं...

'न'वी बाजू Mon, 25/06/2018 - 16:15

In reply to by अजो१२३

तुमचे किती का नवरे असेनात, मंजे फक्त एकवेळ कल्पनेत मूठ मारायला वापर ते जन्मोजन्मीची अध्यात्मिक सांसारिक विवाहाचा इतिहास, ज्याला कशाला त्या लग्न म्हणतात

बायका मूठ मारतात??????

नाही म्हणजे, त्या जे काही करत असतील ते करत असोत बापड्या, परंतु त्यास 'मूठ मारणे' म्हणून संबोधणे हे कितपत सयुक्तिक होईल - किंबहुना, बायकांना (शब्दशः) मूठ मारणे हे शक्य तरी आहे का - याबद्दल साशंक आहे.

(अवांतर: आपण 'मूठ मारणे' हा वाक्प्रचार हिंदी अर्थाने वापरला आहे, याची कल्पना असल्याकारणाने त्याच अनुषंगाने प्रतिसाद दिलेला आहे. अन्यथा, मराठीत या वाक्प्रचाराचा अर्थ पूर्णपणे वेगळा - करणी, जादूटोणा आदींशी संबंधित - होतो.)

अजो१२३ Mon, 25/06/2018 - 18:11

In reply to by 'न'वी बाजू

नबा, तुम्हाला जुनी बाजू दिसणंही बंद झालं कि काय?
आपला केले गेलेला वापर आणि आपला इतिहास असं ते वाक्य नाही का?
---------------------------
मायमराठीत शेंगदाण्याचे डब्यातले गच्च मूठभर शेंगदाणे उचलले तर त्याला शेंगदाण्यांवर मूठ मारणे म्हणतात.
--------------------------
तरी

बायकांना (शब्दशः) मूठ मारणे हे शक्य तरी आहे का

मूठ संभोग ही पॉर्नची अतिशय प्रसिद्ध कॅटेगिरी आहे. बायकांची हं नबा.
-----------------------------------------------------------

नंदन Mon, 25/06/2018 - 23:54

In reply to by 'न'वी बाजू

किंबहुना, बायकांना (शब्दशः) मूठ मारणे हे शक्य तरी आहे का - याबद्दल साशंक आहे.

moot point?

अजो१२३ Mon, 25/06/2018 - 05:49

In reply to by 'न'वी बाजू

तर त्या टिपिकल सरकारी दस्तऐवजावरील स्वाक्षरीकरिताची एवढीशी जागा तिला न पुरती, अथवा तिच्या स्वाक्षरीकरिता त्या दस्तऐवजास परिशिष्ट जोडावे लागते ४.

भारतीय घटनेत राज्यांच्या यादीचे परिषिष्ट बनवावे लागले आहे. आपण असता तर नेहरूंप्रमाणे पंजाब, सिंध, गुजरात ठेऊन बाकीची दान देऊन आला असतात का?
======================
जागा हा वेगळा मुद्दा आहे. जागा नाही म्हणून नाव न लिहिणं वेगळं नि विटाळ होतो मानणं वेगळं.

अजो१२३ Mon, 25/06/2018 - 05:53

In reply to by 'न'वी बाजू

मात्र, बहुधा ती नवऱ्यांची नावे आपल्या नावात लावत नसावी, अशीच आमची अटकळ आहे.

सोडा ना, एक तर महाभारत फक्त एक काव्य आहे. दुसरं आता २०१८ चालू आहे.
-----------------------------
आता विटाळ होतो का ते बघा ना!

अजो१२३ Mon, 25/06/2018 - 06:00

In reply to by 'न'वी बाजू

तसेही आपल्या संस्कृतीत स्त्रियांना फारसे शिक्षण देण्याची प्रथा तथा परंपरा नसल्याकारणाने...

संस्कृतीचाच विचार केला तर कोणालाच काहीच शिक्षण नसणारांपेक्षा कोणाला तरी काही तरी शिक्षण असलेली संस्कृती बरी.
फुल्यासारखा कमालीचा जातीयवादी आणि कृतीकृतीत, शेतकऱ्यांचा आसूड मधे वाक्यावाक्यात् ब्राह्मणद्वेष पाहणारा अंध माणूस देखील स्त्रीयांना नि ब्राह्मणेतर जातींना कोणते शिक्षण दिले आहे हे टिपून ठेवतो.
तेव्हा भारतीय संस्कृतीबद्दल विधाने फॅशन म्हणून अद्न्यानातून करू नयेत.

नंदन Wed, 20/06/2018 - 09:41

In reply to by चिंतातुर जंतू

...मात्र, त्याद्वारे माझ्या मुलाला खालीपणा दाखवला आहे.

!!!

इंग्रजी पोस्टचा अनुवाद थेट न होता हिंदी आवृत्तीवरून आला आहे. ह्या द्राविडी* (*हिंदीच्या बाबतीत हे विशेषण वापरावे लागावे यातूनच भारतीय एकात्मतेची प्रचीती येत नाही काय?) प्राणायामामुळे हा विनोद घडला आहे.

अर्थात, मुलाला पोस्ट-स्ट्रक्चरल 'खालीपणा' दाखवायचाच असेल तर हा 'नीचा दिखाना'चा पर्यायही आहे म्हणा:

तिरशिंगराव Wed, 20/06/2018 - 12:04

In reply to by चिंतातुर जंतू

अनावधानाने कचरा बाहेर फेकला जात नाही. तो मुद्दामच टाकला जातो. कारण अशी माणसं, जगाबद्दल बेफिकीर असतात. हा इसम उगाचच कांगावा करतोय. विरुष्का चुकीचे की बरोबर हा भाग त्यानंतर येतो.

गब्बर सिंग Thu, 21/06/2018 - 23:00

In reply to by चिंतातुर जंतू

उच्चभ्रू विरुष्का विरुद्ध तो उच्चभ्रू कारवाला.
.
गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांनी त्यांच्या संपाचा भाग म्हणून दूध, भाजीपाला वगैरे आणून अनेकदा रस्त्यावर ओतलेलं आहे.

परंतू ही समस्या नाहीच. ही समस्या असूच शकत नाही.

याची कारणे खालीलप्रमाणे -

(१) भारतातला शेतकरी हा अन्नदाता आहे
(२) भारतातला शेतकरी हा प्रामाणिक, नीतीवान, व कष्टाळू आहे.
(३) भारतातल्या शेतकऱ्यांच्या सर्व समस्या जेन्युईन असतात.
(४) शेतकऱ्यांनी त्यांची भाजी, दूध रस्त्यावर आणून ओतले कारण त्यांना कोणताही पर्याय उरला नव्हता. शेतकरी "बे चा रा" आहे.
(५) भारत ही कृषिप्रधान अर्थव्यवस्था आहे,
(६) शेतकऱ्यांना अनुकंपा, परार्थ, कणव, संवेदना, सहानूभूति वगैरे ची अत्यंतिक गरज असते.
(७) उच्चभ्रूंनी कोणताही टॅक्स (उदा. स्वच्छ भारत सेस) भरला असणे अथवा भरला नसणे हा मुद्दा नेहमी गैरलागू असतो.
(८) उच्चभ्रूंनी टॅक्स (उदा. स्वच्छ भारत सेस) चुकवला असण्याची शक्यता अत्यंतिक जास्त असते. किंवा राष्ट्रियीकृत ब्यांकेचे कर्ज घेऊन ते बुडवलेले असण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा त्यांना फैलावर घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे. मग फैलावर घेणारी व्यक्ती उच्चभ्रू असो वा नीचभ्रू.
(९) शहरातल्या, उच्चभ्रू कारवाल्याने कचरा बाहेर रस्त्यावर टाकणे हे एका बाजूला आणि शेतकऱ्याने आपला भाजीपाला, दूध रस्त्यावर आणुन ओतणे हे दुसऱ्या बाजूला - ही केवळ/नुसती ॲपल्स टू ऑरेंजेस तुलना नसून फिश टू बायसिकल तुलना आहे.
.
.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 21/06/2018 - 23:28

In reply to by गब्बर सिंग

उदाहरणार्थ माझा प्रतिसाद हे राजकीय विधान आहे, शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतलेल्या दूध, टोमॅटोसारखं. गब्बरसिंग यांचा प्रतिसाद एक चौ. मिमी आकाराचा प्लॅस्टिकचा कागद आहे, माजुर्डेपणानं फेकलेला. असं मी स्वतःच म्हणणं म्हणजे स्वतःचं महत्त्व वाढवून घेऊन गब्बर सिंग यांचा अपमान करणं आहे. पण गब्बरसिंग यांना या दोन्ही गोष्टी समान वाटतात, त्यामुळे हा प्रतिसाद मनाला लावून घेण्याचं स्वातंत्र्य त्यांना नाही.

गब्बर सिंग Fri, 22/06/2018 - 01:47

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गब्बरसिंग यांचा प्रतिसाद एक चौ. मिमी आकाराचा प्लॅस्टिकचा कागद आहे, माजुर्डेपणानं फेकलेला.

.
हे गब्बरसाठी गॅलंट्री अवॉर्ड आहे.
.

तिरशिंगराव Fri, 22/06/2018 - 11:35

In reply to by गब्बर सिंग

शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकलेला माल हा पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे, त्याउलट शहरी माजोरड्यांनी प्लास्टिकची वस्तु टाकली, म्हणजे घोर अपराध आहे.
शहरी माजोरड्यांना प्लास्टिकची कोणातीही गोष्ट, नुसती हातात जरी घेतली तरी पहिल्या गुन्ह्याला ५०,००० आणि पुढच्या गुन्ह्यांना त्याच्या पटींत दंड आकारावा. हा सगळा दंड, थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचवावा.
किंबहुना, शहरी माजोरड्याने बँकेत मुदत ठेव ठेवली की लगेच तेवढ्या रकमेचे सानुग्रह अनुदान, शेतकऱ्याला देऊन टाकावे. शहरी माजोरड्याला ठेव वा त्यावरचे व्याज देण्याची बँकेची जबाबदारी नाही, असा कायदा करावा.

गब्बर सिंग Fri, 22/06/2018 - 12:33

In reply to by तिरशिंगराव

आमचा फुल्ल पाठिंबा.
.
.

शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकलेला माल हा पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे

.
अगदी.
.
शेतकऱ्यांना शौचालय बांधण्यासाठी जे अनुदान (जागतिक ब्यांकेकडून कर्ज काढून) दिले जाते ते सुद्धा न देता शेतकऱ्यांना रस्त्यावरच प्रातर्विधी करायला प्रोत्साहित करावे. ते अनुदान कर्जमाफीसाठी वापरावे. संडास बांधण्यासाठी जे सामान लागते (पोलादी सळ्या, टॉयलेट बौल वगैरे) ते सामान हे बायोडिग्रेडेबल नाही. शेतकऱ्याने प्रातर्विधी केला की त्या स्वच्छतेचा प्रश्नच नाही कारण ते बायोडिग्रेडेबलच आहे. अगदी स्वच्छतेचा मुद्दा असलाच तरी - तो स्वच्छ भारत सेस मधून आलेल्या निधीतून स्वच्छ करून घ्यावे.
.
.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 22/06/2018 - 21:25

In reply to by गब्बर सिंग

गब्बर कचरा करून शेतकऱ्यांना मदत करतो. कधीकधी प्रतिसादांची शेतीसुद्धा करतो. गब्बरलाच शेतकरी बनवा.

चिमणराव Wed, 20/06/2018 - 20:29

Oath काय ते समजले
//
In June 2017, Yahoo and AOL joined forces to create Oath, a
media and technology company with a dynamic house of global
brands, and part of Verizon. It's an exciting venture that we
believe will bring a host of new innovations and digital
experiences for our users. With Verizon, Oath can provide you
with better experiences and services.
As part of this collaboration, we're asking all users of Oath-
owned sites and services to agree to the new unified Terms of
Service and Privacy Policy, which will help us continue to deliver
and build on great digital experiences for you.
Please take some time to review and agree to the new unified
Terms of Service and Privacy Policy by clicking on the button
below. If you have already agreed, no additional action is
needed.
//

अतिशहाणा Thu, 21/06/2018 - 07:26

इथे कुणी पिक्सेलबुक वापरत आहे का. (इनस्क्रिप्टच्या xxxx)

चिमणराव Mon, 25/06/2018 - 06:31

पॅन/एटिएम/क्रे कार्डावर किती अक्षरांचं नाव दिसेल ते दाखवलं जातं. द्रौपदीने ठरवलं असतं तरी कोणत्या नवय्राचं नाव पुढे अगोदर लिहायचं ही समस्याच झाली असती.

चिमणराव Mon, 25/06/2018 - 06:38

आइवडिल जाण्याने होणारा मानसिक आघात वयाच्या १०-१५ वर्षांत अधिक असतो, म्हणजे तो एक घावच असतो. वयाच्या विशिनंतर फक्त समिक्षा केली जाते - मृत्युमुळे नक्की कोण सुटलं ते की आपण?

तिरशिंगराव Mon, 25/06/2018 - 15:10

In reply to by चिमणराव

मृत्युमुळे बहुतेक वेळा आई-वडीलच सुटत असावेत. रोजच्या काळज्या, आजारपण , वगैरे भौतिक गोष्टींतून तर सुटका होतेच. त्याशिवाय, आपल्या पोरांना आपण नकोसे झालोय, पण आपल्याला या जगांतून घालवून देण्याची त्यांच्यात हिंमत नाही, हे पदोपदी जाणवणे, ही खरी शिक्षा असते. त्या घोर शिक्षेतून सुटका होणाराच सुदैवी म्हटला पाहिजे, नाही का ?
बाकी, ज्या मागे राहिलेल्यांना, आपली सुटका झाली आहे असे वाटत असते, ते ही सुपातच असतात, त्यांना ही जाणीव नसते की, आपल्यावरही अशीच वेळ येणार आहे. आमेन.

अजो१२३ Mon, 25/06/2018 - 18:28

In reply to by तिरशिंगराव

बाकी, ज्या मागे राहिलेल्यांना, आपली सुटका झाली आहे असे वाटत असते, ते ही सुपातच असतात, त्यांना ही जाणीव नसते की, आपल्यावरही अशीच वेळ येणार आहे. आमेन.

कदाचित आपण मुद्दा पूर्णत: विसरत आहात. अनेक रोग झेलणारे, पीडा झेलणारे म्हातारे आईवडील मरणं नि या यातनांतून सुटणं वेगळं, त्यांचं सगळं करणारे त्या सेवेच्या तापांतून सुटणं वेगळं, तुम्ही म्हणता तसं ते सामान्य आहेच.
-------------------------
इथे दोन्ही पालक अकाली गेलेत आणि लेकीला ही एक सुटका वाटतेय. कशातून तर त्यांच्या फुशारकीच्या गप्पांतून !!! मंजे यांच्या कानांच्या तापमानासाठी दोन माणसं खपली कि यांना आनंद होतोय!!! कुठे कान कुठे दोन जीव!! ते ही सख्ख्या मायबापाचे.

आपण असं जरी मानलं की फुशारकी मारायसारखं असो, अगदी बेसिकही काही या अवेळी मेलेल्या पालकांनी केलेलं नाही तरी त्यांच्या अवेळी मरण्यानं आपली एक किटकिट कमी झाली असं सांगायची मानवी रित आहे का?

अशी व्यक्ति कोणाकोणाच्या मृत्यूनंतर (अकाली नसल्यावर तर जास्तच) काय काय म्हणू जाईल याची कल्पना येतेय का?

नितिन थत्ते Mon, 25/06/2018 - 18:48

In reply to by अजो१२३

>>अशी व्यक्ति कोणाकोणाच्या मृत्यूनंतर (अकाली नसल्यावर तर जास्तच) काय काय म्हणू जाईल याची कल्पना येतेय का?

तुमच्याशी सहमत असलो तरी तुम्ही जास्त लोड घेऊ नका असे सुचवतो.
काही जणांना आपली इमेज जपणे फार महत्त्वाचे वाटते. मग त्यासाठी त्यांना अशी विधानं करावी लागतात. याचं खूप वर्षापूर्वी निखिल वागळेंनी बाळ ठाकऱ्यांच्या बाबत विश्लेषण केलं होतं.
बाळ ठाकरे यांची फटकळ बोलणारे म्हणून ख्याती होती. आता समजा मी त्यांच्या घरी पाहुणा म्हणून गेला तर मला ठाकरे चहा वगैरे देतील तेव्हा स्वैपाकघरात आवाज देऊन चहा पाठवा असं सांगतील. तेव्हा ते व्यवस्थितच बोलतील. "या थत्तेच्या नरड्यात ओतायला चहा आणा रे!" असं म्हणणार नाहीत. कारण तेव्हा ते पब्लिक प्लॅटफॉर्मवर नसतील. परंतु पब्लिक प्लॅटफॉर्मवर त्यांना अशा स्वरूपाचं बोलणं भाग असेल.

"आपण कूल आहोत" अशी इमेज टिकवायला असं लिहावं लागतं. आपली ऊर्जा त्यात खर्च करू नये.

अजो१२३ Mon, 25/06/2018 - 21:10

In reply to by नितिन थत्ते

तुमच्याशी सहमत असलो तरी तुम्ही जास्त लोड घेऊ नका असे सुचवतो.

नक्कीच. तुमचं म्हणणं बरोबर आहे. जगात पितरांचा खून करणारी मंडळी असतात. तेव्हा एका रँडम सहसदस्याच्या केवळ काळ्या विनोदबुद्धीचे का घेऊन बसावे?
१००% सहमत.

काही जणांना आपली इमेज जपणे फार महत्त्वाचे वाटते. मग त्यासाठी त्यांना अशी विधानं करावी लागतात.

कदाचित याचा अर्थ त्यांना आपल्या स्वकीयांबद्दल आपल्याइतकेच (मंजे तुम्हा माझ्याइतके) प्रेम असते असा निघतो. विधानांच्या औचित्यावर माझं काहीही म्हणणं नसतं. विधानं कशीही काशीत घाला. मात्र मूलभावनाच हिन असल्या तर प्रचंड वैषम्य वाटतं. म्हणून हा केवळ आणि केवळ प्रतिमाव्यापार असेल तर मला आनंदच आहे.

चिंतातुर जंतू Mon, 25/06/2018 - 22:55

In reply to by नितिन थत्ते

बाळ ठाकरे यांची फटकळ बोलणारे म्हणून ख्याती होती. आता समजा मी त्यांच्या घरी पाहुणा म्हणून गेला तर मला ठाकरे चहा वगैरे देतील तेव्हा स्वैपाकघरात आवाज देऊन चहा पाठवा असं सांगतील. तेव्हा ते व्यवस्थितच बोलतील. "या थत्तेच्या नरड्यात ओतायला चहा आणा रे!" असं म्हणणार नाहीत. कारण तेव्हा ते पब्लिक प्लॅटफॉर्मवर नसतील. परंतु पब्लिक प्लॅटफॉर्मवर त्यांना अशा स्वरूपाचं बोलणं भाग असेल.

हे झालं ठाकऱ्यांचं, पण इथे पुण्यात एके काळी गल्लीबोळांमध्ये विक्षिप्तपणा ओसंडून वाहणारी घरंच्या घरं सापडायची. कमीत कमी शब्दांत अपमान करणं, फटकळपणा किंवा इतर विक्षिप्तपणा करण्यासाठी कोणत्याही पब्लिक प्लॅटफॉर्मवर असण्याची त्यांना गरज भासत नव्हती. म्हणजेच, काहींचा स्वभावच तसा, किंवा काहींच्या घरची संस्कृतीच तशी, किंवा आसपासचं वातावरणच तसं वगैरे अनेक कारणं विक्षिप्तपणापाठी असू शकतात. हे इमेजसाठी करावं लागतं वगैरे स्पष्टीकरणं ममव लोकांना ममव लोकांनी द्यावी लागत असली तर काही तरी भयंकरच गंडलेलं आहे.

अबापट Tue, 26/06/2018 - 05:21

In reply to by चिंतातुर जंतू

ठाकऱ्यांच्या मुंबयवाल्यांनी पुण्याच्या विक्षिप्तपणाची बदनामी थांबवा.( ठाणे हे मुंबय व सदाशिव पेठ यांचे संकरित उपनगर आहे याची जाणीव ठेवावी ) वि आर लाईक द्याट ओन्ली .

'न'वी बाजू Tue, 26/06/2018 - 06:46

In reply to by अबापट

ठाणे हे मुंबय व सदाशिव पेठ यांचे संकरित उपनगर आहे याची जाणीव ठेवावी

हा सदाशिवपेठेचा अपमान आहे, एवढेच नम्रपणे नमूद करून मी खाली बसतो.

धन्यवाद.

'न'वी बाजू Tue, 26/06/2018 - 06:57

In reply to by 'न'वी बाजू

(बोले तो, ठाण्याचा उल्लेख सदाशिवपेठेचे उपनगर म्हणून केला, म्हणून नव्हे. दॅट, बाय इटसेल्फ वुड हॅव बीन बॅड इनफ, परंतु तो अपमान तुलनेने सौम्य म्हणून सोडून देऊ. परंतु यातून सदाशिवपेठेने मुंबईशी संबंध ठेवला, असे जे अतिसटलतेने सूचित करण्यात आलेले आहे, ते गर्हणीय आहे. सदाशिवपेठ इतक्याही खालच्या पातळीला (अगदी डेस्परेशनमध्येसुद्धा) उतरत नाही, एवढे कृपया लक्षात असू द्यावे.

आगाऊ धन्यवाद!)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 26/06/2018 - 07:27

In reply to by 'न'वी बाजू

ठाण्यात माझ्या आजूबाजूला बऱ्यापैकी नेहमीची जनता होती. बघा आता, सदाशिव पेठेनं अगदी माता मेरीचा वसा चालवत जरी ठाणं काढलं असेल, तरी चालणारे का याचा विचार करा.

एके काळी लोक मला पुण्याची समजायचे, त्याचा मला राग यायचा. हल्ली मी हसते. "नाही हो, मी तीन वर्षं खडकीला राहिले", असं सांगते.

'न'वी बाजू Wed, 27/06/2018 - 06:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सदाशिव पेठेनं अगदी माता मेरीचा वसा चालवत जरी ठाणं काढलं असेल, तरी

सदाशिवपेठेने नव्हे!!!!!! (मुंबईने असू शकेल. कोणत्या पद्धतीने, कोणापासून, कल्पना नाही.)

कृपया ते खापर सदाशिवपेठेच्या माथ्यावर फोडू नका!

आगाऊ धन्यवाद!

चिंतातुर जंतू Mon, 25/06/2018 - 15:25

In reply to by चिमणराव

आइवडिल जाण्याने होणारा मानसिक आघात वयाच्या १०-१५ वर्षांत अधिक असतो, म्हणजे तो एक घावच असतो. वयाच्या विशिनंतर फक्त समिक्षा केली जाते - मृत्युमुळे नक्की कोण सुटलं ते की आपण?

मूळ विधान नवनीत-गाईडवरून अभ्यास यासंदर्भात केलेलं असल्यामुळे ते अंमळ हलक्याने (पक्षी : लाइटली) घेण्याची अपेक्षा असावी असा माझा अंदाज आहे. आईवडील अकाली मरण पावल्यामुळे लेखिकेची आजची मनोवस्था वगैरे फार गांभीर्याने अर्थनिर्णयन करायला गेलं, तर चुकीचे निष्कर्ष हाती लागण्याची शक्यता त्यामुळे मोठी वाटते आहे.

'न'वी बाजू Mon, 25/06/2018 - 15:52

In reply to by चिंतातुर जंतू

आईवडील अकाली मरण पावल्यामुळे लेखिकेची आजची मनोवस्था वगैरे फार गांभीर्याने अर्थनिर्णयन करायला गेलं, तर चुकीचे निष्कर्ष हाती लागण्याची शक्यता त्यामुळे मोठी वाटते आहे.

लागेनात का! लेखिकेचे, तुमचे किंवा माझे त्याने नक्की काय बिघडते?

मागे एकदा युअर्स ट्रूलींनी, हिंदुस्थानातल्या थेरडेशाहीविषयी, आईवडील हे उपयुक्त पशू असण्याविषयी, तथा Minding one's own business हा Indian virtue नसण्याविषयी काही विधानत्रयी आपल्या स्वाक्षरीतून डकविली होती. त्यावरून मनोबा पेटला होता. इथे अरुणजोशी पेटले आहेत.

मनोबा पेटला होता तेव्हा आपली तर ब्वॉ छान करमणूक झाली होती. सबब, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल त्याची मजा (सर्वांनी) पाहावी, अशा प्रस्तावाचे दोन शब्द बोलून मी आता खाली बसतो, आणि पुढील मजा पाहायला मोकळा होतो. धन्यवाद.

अजो१२३ Mon, 25/06/2018 - 18:42

In reply to by 'न'वी बाजू

जे जे होईल त्याची मजा (सर्वांनी) पाहावी

अर्थातच माझ्यासोबत जे असतात त्यांची मजा असेल हे पाहणं माझं कामच आहे. ते मी मन:पूर्वक करतो.
--------------------------------------
आपली मजा होतेय कि आपण मजा पाहतोय इतकी शुद्ध अवश्य असावी.

अजो१२३ Mon, 25/06/2018 - 18:38

In reply to by चिंतातुर जंतू

मूळ विधान नवनीत-गाईडवरून अभ्यास यासंदर्भात केलेलं असल्यामुळे ते अंमळ हलक्याने (पक्षी : लाइटली) घेण्याची अपेक्षा असावी असा माझा अंदाज आहे.

समजा तुमची दोन् अल्पवयीन मूलं गाईड वापरतात् आणि त्यानी ते वापरू नये असं तुम्हाला वाटतं. "ते दोघे अकाली गचकले म्हणून ते गाईड पाहण्यापासून नंतर माझी सुटका झाली" असं सत्य विधान आपण केलंत तर ते तुमचे किती परिजन ते अंमळ हलक्यानं घेणार आहेत?
==============================
अशा किती अकाली मृत्यूमुळे झालेल्या सूटकांच्या विनोदांवर आपण खळाळून दाद देत असता?
========================
"एक बार एक सरदारजी मर गया...." अशा विनोदी सिच्यूएशन तुम्ही स्वत:ला प्रत्यक्ष वापरता की काय?
=========================

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 25/06/2018 - 20:08

In reply to by चिंतातुर जंतू

किमान एका मराठी माणसाला काळा विनोद समजतो, असं म्हणता येईल.

माझ्या वयाच्या १३ आणि १९व्या वर्षी आई-‌वडील गेले; त्या वयात मला जेमतेम शिंगं फुटत होती; त्यामुळे व्यक्ती म्हणून मला त्यांच्याबद्दल फार कमी माहिती आहे. मात्र ज्यांचे आई-वडील दीर्घायुषी होते त्या लोकांचं वर्तन आणि माझं वर्तन यांतले काही फरक मला दिसतात. आता आई-वडलांशिवाय अर्ध्याधिक आयुष्य जगल्यावर, मला त्यांच्या मृत्यूबद्दलही विनोद करता येतात, जे इतरांना फार फार झेपत नाहीत; वगैरे वगैरे.

असो. मृत व्यक्तींशी मनुष्याचं नातंही गुंतागुंतीचं असू शकतं. ते उलगडण्यासाठी, समजण्यासाठी निदान मृत्यू आणि वर्तमान यांत काही काळ जावा लागतो. आणि बरंच काही ...

माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्याबद्दल आपुलकी असणाऱ्या माणसांबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या सर्वांचे त्यांच्यातर्फे आभार. तुम्हालाच काय, मलाही त्यांच्याबद्दल करुणा आहे. विशेषतः माझे मित्रमैत्रिणी. त्यांना पर्याय असूनही ते मला कलटी देत नाहीत. बिच्चारे!

गवि Mon, 25/06/2018 - 21:22

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तू एक भन्नाट व्यक्तिमत्व (आंतरजालीय) आहेस. व्यक्तिगत माहीत नाही. अनेक बाबतीत जगावेगळे विचार कित्येकदा पटकन पचतही नाहीत, पण तरी त्या विचारक्षमतेचं आकर्षण वाटतं. कौतुकही काहीवेळा.

अनेकदा विधानं करताना बिन्धासपणापेक्षा बिन्धासपणाचं नवीन रेकॉर्ड करणं किंवा लिमिट टेस्ट करणं असा भाग जास्त असल्याचाही भास होतो. पण तरीही ते भन्नाटच.

तुझ्या परीने वरील आईवडिलांबद्दलच्या विधानामागे तुझ्या मनात खूप काही वेगळं असेलही. पण याबाबतीत उदा. माझ्या पित्यासोबत मी जितकी वर्षं घालवू शकलो त्याच्या दुपटीहून जास्त वर्षं त्यांच्याशिवाय जगून झाली आहेत. ते ज्या वयात गेले त्या वयाचा मी होऊनही झालंय. सर्व आठवणी गोड नाहीत. पण काळ्या, पिवळ्या, हिरव्या, सोनेरी, कोणत्याही विनोदासाठी, उपहासाने, वक्रोक्तीने, अन्योक्तीने , कितीही तर्क ताणून बाबा लवकर गेले त्यामुळे मी कशातूनही सुटलो किंवा एकूण काहीतरी चांगलं झालं असं विधान येणं अशक्य आहे.

असं अनेकांना वाटून ते विधान जिव्हारी लागू शकतं. तसं लागणं कूल नसू शकेल, मुख्य म्हणजे त्याला तुझा काहीच इलाज नाही हेही समजू शकतो.

पण.. पण.. पण. इट वॉज व्हेरी हर्टींग. प्रत्येकाची विनोद समजण्याची एक मर्यादा असते हे वाईट मार्गाने कळलं.

असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 25/06/2018 - 23:35

In reply to by गवि

आई-वडील जिवंत असताना, त्यांच्या तोंडावरही अनेकांना स्कँड्यूलस वाटतील असे विनोद करून झाले आहेत. वडलांनीही आईच्या मृत्युबद्दल करून झाले, आम्हां भावंडांच्या आणि तिच्या वडलांच्या तोंडावर; ती गेल्यावर आठवड्यातच.

वडलांसमोर एकदा मी बोलत होते, "भेडाघाटात पौर्णिमेच्या रात्री फिरायला मजा येईल, अशी माझी कल्पना आहे." ते म्हणाले, "मग आपण तसा बेत करू." तेव्हा मी लगेच त्यांना म्हटलं, "तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर जा, मी माझी कंपनी शोधेन." त्याच्या पुढच्या आठवड्यात ते गेले.

म्हटलं तर हे वर्णन मेलोड्रामाटिक वाटतं. पण मी त्याकडे तसं बघत नाही. आई गेल्यावर त्या घटनेकडे वडीलही तसं बघत नसत. आई गेल्यावर सहा वर्षं ते जगले. आई असेस्तोवर त्यांना स्वतंत्र आयुष्य होतं; आईला नव्हतं; पण आई गेल्यावर त्यांच्या जगण्याच्या केंद्रस्थानी आम्ही दोघं होतो. मी जेव्हा त्यांना सुचवलं की, मला माझं आयुष्य आहे; किंवा मी माझं आयुष्य कसं असणार स्वतः ठरवू शकते; तेव्हा तो हेतू उरला नाही. अपराधगंड बाळगत जगणं मी नाकारते.

माझे वडील संघिष्ट होते; माझ्या आयुष्यात असलेला पहिला स्त्रीवादी पुरुष म्हणजे वडील - त्यांचा माझ्या संदर्भातला स्त्रीवाद 'बोलाची कढी' नव्हता, मला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून ते स्वतः घरकामं करायचे; आई असेस्तोवर शांत आणि गंभीर असणारा हा माणूस ती गेल्यावर, माझ्या अखंड बडबडीमुळे दंगेखोरपणाही करायला लागला; मी त्यांना मोठ्यानं हसताना पहिल्यांदा बघितल्याचं आठवतं ते मी त्यांची टिंगल केली तेव्हा.

मात्र त्यांच्या मृत्युबद्दल विनोद करण्याचं हे कारण नाही. त्याचं कारण आहे की मी तशीच आहे. मूळ प्रतिसादाची सुरुवातही, स्वतःची टिंगल करण्यापासून केली होती. माझ्या लेखी एखादी गोष्ट आहे तशी मान्य करणं, याची शेवटची पायरी म्हणजे त्यावर विनोद करणं. विनोद करण्यासाठी निर्विकारपणा लागतो. ज्याबद्दल भावना तीव्र असतात त्या गोष्टीवर विनोद करता येत नाहीत. व्यक्तींचं निराळं असतं; परक्या लोकांवर केलेले विनोद बहुदा दुष्ट असतात; आपल्या लोकांवर केलेले विनोद जवळीकीची साक्ष देणारे असतात. मला जे काही विनोदाबद्दल समजतं, ते हे आहे. किंवा हा माझा दृष्टीकोन आहे. तो इतरांना पटेल किंवा पटणार नाही. लोकांना ते पटत नाही म्हणून मी का बदलावं? मी खोटं का वागावं?

मला असले विनोद येतात, शिंकेसारखे. त्यात मुद्दाम कूलपणा मिरवणं दिसत असेल तर ती त्या लोकांमधली कमतरता आहे. मी काय-कसा विचार करते हे त्यांना समजत नाहीच, पण माझ्याबद्दल अनुदार दृष्टीकोनही ते लोक बाळगतात. लोकांच्या अनुदार वर्तनामुळे आपण खोटं किंवा अप्रामाणिकपणे वागावं हे मला माझ्या वडलांनी शिकवलं नाही. (हा घ्या, वडलांबद्दलचा आणखी एक विनोद.)

(आईला मी व्यक्ती म्हणून फारसं ओळखत नाही. ती स्वतः फार डँबिसपणा करणाऱ्यांतली नव्हती. म्हणून तिच्याबद्दल इथे लिहिता येणार नाही.)

त्यातून ऐसीवर मलाच अभिव्यक्तीस्वातंत्र्य नसेल तर ऐसीनं सगळ्यांचंच अभिव्यक्तीस्वातंत्र्य कसं काय मिरवावं?

मी माझ्या मृत वडलांबद्दल विनोद करते यामुळे मी (आणि माझा भाऊ) सोडून इतरांच्या भावना दुखावतात, यातला विनोद किती लोकांना दिसतो?

गवि Tue, 26/06/2018 - 09:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी सगळं चांगलं आहे पण,

मुद्दाम कूलपणा मिरवणं दिसत असेल तर ती त्या लोकांमधली कमतरता आहे.

"आपण काही म्हणू, ती अभिव्यक्ती, आणि ते ऐकून लोकांना जे काही वाटतं ती त्यांची कमतरता" हा विचार फारच कॉमन आहे. तो बहुसंख्य लोकांना वाटणारा विचार आहे. म्हणजे मॅजोरीटी लोकांना. म्हणजे सामान्यांना. ममव, चारचौघे/घी/घ्या/घू /घो (कोणतेही लिंग किंवा त्याचा अभाव सुटू नये म्हणून), पुरुष, शाम्ये, कंटाळवाणे लोक, उत्सवप्रेमी, भुसनळे, नातेवाईक, तू सोडून इतरजण, अशापैकी असंख्य लोकांनाही अगदी असंच वाटतं.

इतका चारचौघांसारखा विचार..? बघ बुवा.. मी फक्त रेड अलर्ट दिला.

१४टॅन Tue, 26/06/2018 - 11:25

In reply to by गवि

''असे' विनोद करणं' हे तिच्यासाठी फार नैसर्गिक, साहजिक, स्वाभाविक आहे.
अशा लोकांना कायम 'त्यांचं काय बाबाऽ...', 'अशीच्चे ती/तो... ' छाप शेऱ्यांना सामोरं जावंच लागतं. ती शेरे देणाऱ्यांची कमतरता आहे, की मर्यादा हा वेगळा मुद्दा झाला.
बाकी, ह्या विशिष्ठ केसबद्दल बोलायचं झालं तर कणेकरांनी असल्या विनोदांचं अख्खं पुस्तक लिहीलंय. नंतर त्यांना ते जॉन्र इतकं आवडलं की त्यातली प्रकरणं त्यांनी त्यांच्या इतर पुस्तकांत घुसडली. पण सेल्फ डेप्रकेटिंग का काय तो विनोद हे कणेकरांचं बलस्थान आहे. आणि तो ह्या पुस्तकात अगदी एव्हरेस्ट गाठतो. त्यामुळे नंतर नंतर ते पुस्तक चक्क केविलवाणं वाटू लागतं. पुलंनीही ह्यातला सेल्फ डेप्रकेटींगपणा वगळून (अगदी आईवडलांबद्दल नसतील, पण) असेच विनोद केलेले आहेत. हा मालकीणबैंचा विनोदाचा फॉर्म आहे. हळू घ्यावा किंवा सोडून द्यावा.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 26/06/2018 - 21:09

In reply to by गवि

मला बऱ्याच गोष्टी समजत नाहीत. रीतभात समजत नाही. गेले साडेतीन महिने लठ्ठ पगार घेऊन काम करत्ये तो प्रश्न नक्की काय आहे, याची कल्पना यायला साधारण ६-८ महिने लागतील, असं मी म्हणते. (बॉसला वाटतं आणखी जास्त काळ लागेल.) पण म्हणून रीतभात, रीतभात पाळणारे वाईट किंवा मी ज्यावर काम करत्ये तो प्रश्नच वाईट, अशी न्यायाधीशाची भूमिका मी घेत नाही. काय समजत नाही, ते समजून घेणं मला महत्त्वाचं वाटतं.

आपल्याला समजत नाही, हेही न समजणं याला काय म्हणाल? समजून न घेता, सहृदयता न बाळगता, न्यायाधीशाच्या सिंहासनावर बसून 'प्रतिमा जपण्यासाठी केलेली कसरत' किंवा 'कूलपणा मिरवणं' किंवा मला किंवा माझ्या आईवडलांना विकृत आणि काय काय म्हणणं, ही किमान सहृदयतेची कमतरता नाही का?

मला नावंच ठेवायची तर विक्षिप्त मीच स्वतःला म्हणते. डोक्यावर पडलेली, वायझेड वगैरेही अधूनमधून म्हणवते. लोकांनीही म्हणावं; मात्र त्यात हेतूवर संशय नसतो. 'आहे हे असं आहे', हे मान्य करणं असतं. त्याच हिशोबात शामू लोकांनी शामूपणा मिरवायला हरकत नाहीच. 'गर्व से कहो हम चारचौघांसारखे है' जरूर म्हणावं. कित्येक बाबतींत मीही चारचौघींसारखी किंवा त्यापेक्षा खालच्या पातळीवर आहे. मला फॅशन, मेकप वगैरे गोष्टी जमत नाहीत; कविता समजत नाहीत; संगीतात मी ढ आहे; अर्थशास्त्र डोक्यात घुसत नाही; इस्रायल-पॅलेस्टाईन प्रश्नावर उत्तर काय हे मला माहीत नाही; मी ते न लाजता मान्य करते.

'भुसनळे' हा मात्र स्पेशल अपमान आहे. स्त्रीवाद या विषयावर काहीही वाचन नाही; आजूबाजूला काय चालतं याची कल्पना नाही; पुरुषांनी बायकांना सल्ले देणं यातच मुळात पुरुषप्रधानता आहे याचीही जाणीव नाही; ते सल्ले सहृदय नाहीतच शिवाय विध्वंसक असतात; वर पुन्हा आपल्यालाच काय ती स्त्रियांची समस्या आणि त्यावरचं उत्तर समजलेलं आहे अशा आविर्भावात सतत तीच-ती बडबड करणाऱ्यांच्या रटाळपणापासून करमणूक म्हणून ते नाव ठेवलं आहे. त्यातही स्त्रीवाद या विषयावर मला फार विनोद करता येत नाहीत; माझ्या भावना त्यात गुंतल्या आहेत. मात्र त्यामागे राजकीय भूमिका आहे.

बहुतांश लोकांचे मृत्यू नैसर्गिक कारणांनी होतात; अपघातांमागेही बहुतेकदा सामाजिक कारण नसतं. त्यामुळे 'मला मृत्यूबद्दल केलेला विनोद झेपत नाही म्हणून तो वाईट' ही राजकीय भूमिका नसते; ती व्यक्तिगत भूमिकाच असते.

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 15:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला किंवा माझ्या आईवडलांना विकृत आणि काय काय म्हणणं, ही किमान सहृदयतेची कमतरता नाही का?

तुम्ही मराठी अजून एकदा शिका. टिपीकल बायकी रड आहे वरचं विधान.
तुम्हाला किंवा तुमच्या पालकांना विकृत मी म्हटलेलं नाही.
सर्व पालकांच्या अकाली मृत्यूंचा आनंद/लाभ पाल्यांना होत असेल तर एक्तर ते पालक विकृत असतील किंवा पाल्य विकृत असतील असं मी म्हणालो आहे.

१४टॅन Tue, 26/06/2018 - 10:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या लेखी एखादी गोष्ट आहे तशी मान्य करणं, याची शेवटची पायरी म्हणजे त्यावर विनोद करणं. विनोद करण्यासाठी निर्विकारपणा लागतो. ज्याबद्दल भावना तीव्र असतात त्या गोष्टीवर विनोद करता येत नाहीत. व्यक्तींचं निराळं असतं; परक्या लोकांवर केलेले विनोद बहुदा दुष्ट असतात; आपल्या लोकांवर केलेले विनोद जवळीकीची साक्ष देणारे असतात. मला जे काही विनोदाबद्दल समजतं, ते हे आहे. किंवा हा माझा दृष्टीकोन आहे.

अगदी अगदी मान्य. किंबहुना विनोद अगदी हाडातच रुजला असेल, तर तो कितीही भावनिक उदात्तीकरण झालेल्या, अतिपवित्र आणि मुळात एकूणच 'ज्याबद्दल विनोद करणं हे चूक' अशा गोष्टींबाबतही मनात येतोच. अदितीने तो थेट लिहून खरंतर 'मी अश्शीच आहे' हे फार भन्नाट पद्धतीने सांगितलंय, आणि त्याबद्दल मला तिचं जाम कौतुक वाटतं. जनरली लोक क्षणोक्षणी भावुक होत असतात तेव्हा मला कसंसंच होतं.
--
एकदा मी मागे धागा काढलेला, कुसुमाग्रजांच्या कविता सुचवा म्हणून. तो उपद्व्याप ज्या कविसंमेलनासाठी केला होता, त्या कविसंमेलनाच्या आयोजक मंडळ (स्टेजवर बसून मोबाईल पाहणार) मधील एक स्त्री- मध्येच व्यासपीठावर आल्या. आमचे कान टवकारलेलेच. आधीच कुसुमाग्रजांची पुस्तकं दुर्मिळ आहेत. इतक्या (४०-५० अंदाजे) वयस्क व्यक्तीकडून एखादी अँटिक कविता ऐकायला मिळावी ही अपेक्षा. बाईंनी काय म्हणावं, तर आपल्या दिवंगत आईसाठी रचलेली अतिदवणीय कविता. थोडी थोडी जुन्या 'आई' कवितांवर बेतलेली. मध्येच त्यांच्या डोळ्यांत पाणी वगैरे, नाट्यमय पॉझही. बरं ती कविताही जनरल नाही. आपल्या आईच्या आठवणी (बाकीच्यांसाठी un-relatable, जसं एखादी पिकनिक, कुठल्यातरी नातेवाईकाला सुनावलेले बोल वगैरे ह्यांची भरपूर पेरणी) ह्यांची एक पद्यात मांडणी. आता आम्ही काही (इथे कूल दिसण्यासाठी दाखवतो तसे!) पाषाणहृदयी नाही. तिथे वाजवल्या बा टाळ्या. पण मला ते जाम डोक्यात गेलं.
कविसंमेलन होतं मराठी भाषादिनानिमित्तचं!
--

१४टॅन Tue, 26/06/2018 - 11:41

In reply to by गवि

क्वाईट पॉसिबल. फक्त, 'कुसुमाग्रजांच्याच' कविता सादर कराव्यात अशा सूचना दिल्या गेल्या होत्या.
आणि, इतके वैयक्तिक प्रसंग पद्यातून अनोळखी लोकांसमोर मांडणं,
१. असं 'ॲव्हरेज'च पद्य. फार काही छान कविता नाही
२. ह्याला भावनांचं भांडवल करणं म्हणणं अतीच होईल का जरा?
३. थोडक्यात म्हणजे अस्थानी
हे माझ्या डोक्यात 'गेलं'पेक्षा केविलवाणं वाटलं. To vent to someone is a crucial need. ती अशी पूर्ण करणं मला पटलं नाही. शिवाय त्याचबरोबर आपल्यालाही कसं साहित्याचं अंग आहे हे एददोप प्रकार नाही आवडला.
एरवी कविता म्हणून ते पद्य चांगलं असतं तर मी बाकी प्रकारांकडे कानाडोळा करण्याचं औदार्य दाखवलं असतं.

गवि Tue, 26/06/2018 - 11:35

In reply to by १४टॅन

नवनीत गाईड, एकवीस अपेक्षित.. आई वडील..

कुसुमाग्रज कविता, स्वतःच्या आईवर कविता.

वगैरे. तेवढं लवचिक अभिव्यक्तीस्वातंत्र्य चालतंय हो.

हां.. बाय द वे, जाजम, तांब्याभांडं, मंडप त्या बाईंचं होतं का?

(हमभी अतिखवचट प्रतिक्रिया दे सकते है टॅनबाबू ;-) )

१४टॅन Tue, 26/06/2018 - 11:42

In reply to by गवि

हाहाहा
एका कॉलेजात होतं, बाई शिक्षिका असाव्यात.
(माझ्या प्रतिक्रियेत खवचट काहीच नव्हतं, पण येऊद्या. तेव्हढीच करमणूक.)

गवि Tue, 26/06/2018 - 11:48

In reply to by १४टॅन

तुमच्या नाय हो. माझ्या खवचट.

बाकी ती जरा तीव्र पण चेष्टाच आहे. इथे इतकं वेडंवाकडं बोलूनही मार्मिक रोचक श्रेण्या मिळतात आणि टिकून राहतात यात सर्व आलं.

काही झालं तरी केवळ वेबसाईटचा कंट्रोल हाती आहे म्हणून सिलेक्टिव्ह भेदभाव हा आरोप खरेखरे शत्रूही करू शकणार नाहीत.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 26/06/2018 - 04:01

In reply to by गवि

मूळ विनोदाला मी काळा विनोदच म्हणत्ये. मनुष्याचा अकाली किंवा न-अकाली मृत्यू होणं ही गोष्ट गोडगुलाबी म्हणून रंगवलेली नाहीच.

'आहे हे असं आहे' म्हणून वास्तव मान्य करताना त्यात अनेकदा अगतिकता असते. हुकुमशहांवर होणाऱ्या विनोदांमध्ये, 'आपले राज्यकर्ते हुकुमशहा आहेत' हे मान्य करण्याची अगतिकता असते तशीच. मात्र आई-वडलांचा अकाली मृत्यू होतो किंवा मोदी-ट्रंप-पुतिन निवडून येतात म्हणून माझं, काळे विनोद करणाऱ्या लोकांचं आयुष्य थांबत नाही. ते काळ्या विनोदांतून आणि इतर अनेक मार्गांनी पुढे सरकत राहतं. आई-वडील गेले त्या-त्या दिवशी मला मृत्युवर विनोद करणं शक्य नव्हतं. पण त्या मनोवस्थेत अडकून न राहण्याचा निर्णय मला योग्य वाटतो.

आई गेली त्या दिवशी मी चूपचाप बसून काय सुरू आहे ते बघत होते. एक बहीण - माझ्यापेक्षा १२-१३ वर्षांनी मोठी - मला म्हणाली, "रड ना अदिती" आणि माझ्या गळ्यात पडून भावनांना आवाहन वगैरे केलं. तिच्यासमोर व्यक्त व्हावं असं मला वाटलं नाही. मी चूपचाप बघत राहिले. नंतर एक मैत्रीण आली. आपण होऊन तिच्या गळ्यात पडून मी रडले. तेव्हा तिथे त्या बहिणीसकट बाकीचे लोक होतेच, पण त्यांचं असणं-नसणं माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं नव्हतं. नंतर म्हणे या बहिणीला त्या कृतीमुळे स्वतःचा अपमान वाटला.

त्या बहिणीचं अपमान वाटून घेणं योग्य वाटतं का?

अनेकांना जो बिनधास्तपणासाठी बिनधास्तपणा वाटू शकतो ते माझ्यासाठी रोजचं, सवयीचं काही असू शकतं. जगाची रीत मला समजत नाही, किंवा समजली तरी मान्य नाही आणि मला माझं मत, माझे विचार आहेत म्हणून मी ठरावीक गोष्ट केली असंही असू शकतं. खरं तर भूमिका म्हणून, माझ्या विश्वाचा केंद्रबिंदू लोक-काय-म्हणतील हा नाही; ठरावीक गोष्ट माझ्या बुद्धीला पटते का, हा केंद्रबिंदू बनवण्याचा माझा प्रयत्न असतो.

अजो१२३ Tue, 26/06/2018 - 22:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काळा विनोद म्हणजे काय हे तुम्हाला अजिबात माहित नाहिय. काळा विनोद हा केवळ आणि केवळ काल्पनिक असतो. काल्पनिक असल्याकारणानं तो कितीही खतरनाक असू शकतो. डिक्शनरीत तुम्हाला वाचवू शकणारा शब्द दिसला (चिंजं कसली समीक्षा करतात देव जाणो, त्यांनी हा शब्द सुचवला!!!) म्हणून तो वापरून तुम्ही स्पष्टीकरणं देताय.
-------------------------
नितिनजी, मी कै लोड घेत नाहीय, पण लिटरली ते विधान कोण्याही अर्थी कसल्याही प्रकारचा विनोद नाही.
-----------------------------------
तुमच्या भावाला, बहिणीला, मित्राला वा मैत्रीणीला "तुझं हे ३-४ वर्षांचं गोड पोर आज रात्री झोपेत मेलं तर उद्यापासून तुझी त्याची नॅपी बदलण्यातून सुटका होइल नि किती मज्जा येईल" असं म्हणून एक यशस्वी काळा विनोद करून दाखवा. मग म्हणेन की यू आर फेअर टू अबसेंट पॅरेंट्स.
----------------------------------------
काळ्या विनोदाची ५० एक उदाहरणं वाचा. मग वापरा. https://www.quora.com/What-are-some-examples-of-dark-humour
Bloody none is in first person.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 27/06/2018 - 07:53

In reply to by अजो१२३

माझ्या आताच्या बाॅसनं मला नोकरीच्या गप्पा सुरू होण्यापूर्वी अनौपचारिक गप्पा मारताना विचारलं होतं, "तुला किंवा भावाला मुलं आहेत का?"

तेव्हा मी त्याला म्हटलं होतं, "आमची, म्हणजे आई-वडलांकडून आलेली गुणसूत्रं एवढी महत्त्वाची नाहीत, की ती नष्ट झाली म्हणून जगावर जुरासिक पार्कसारखा सिनेमा लादला जाईल. त्यामुळे आम्ही अपराधगंड न बाळगता, मुलं होऊ देण्याचा पर्याय विचारात घेतला नाही."

बघा आता. ठरवा काय ते!

अजो१२३ Wed, 27/06/2018 - 10:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मूलं न होऊ देण्याचा निर्णय हजारो, लाखो घेतात. त्यात काय मोठं? झालेलं मूल अकाली मरण्याबद्दल बोलतोय मी.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 27/06/2018 - 16:53

In reply to by अजो१२३

शिंका आणि माझे विनोद मागणीनुसार होत नाहीत. माझं पोट आणि आरोग्य या विनोदांवर अवलंबून नाही. त्यामुळे भलत्या मागण्या केल्यास त्या पूर्ण होणार नाहीत याची खात्री बाळगा.

बाकी आरडाओरडा ते पॅसिव्ह अग्रेसिव्हपणा करणाऱ्या लोकहो, मोठं होण्याचा एक भाग असतो तो not taking oneself too seriously. माझ्या मोठं होण्याचा तो मोठा भाग आहे. आई-वडलांच्या अनपेक्षित मृत्युंमुळे मी पहिली गोष्ट शिकले ती म्हणजे अशाश्वती आणि त्यातून not taking myself very seriously. ते अजूनही आत्मसात करणं सुरू असतं.

मात्र बालिशपणाला हा शेवटचा प्रतिसाद.

'न'वी बाजू Wed, 27/06/2018 - 17:26

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शिंका आणि माझे विनोद मागणीनुसार होत नाहीत. माझं पोट आणि आरोग्य या विनोदांवर अवलंबून नाही. त्यामुळे भलत्या मागण्या केल्यास त्या पूर्ण होणार नाहीत याची खात्री बाळगा.

पाँइंट नोटेड. (वेल मेड.)
..........

बाकी अजो, हा (बोले तो, तुम्ही फर्माइश केलेला) विनोद तुमचा आहे, त्यांचा नव्हे. तर मग तो तुम्हीच सांगा ना. त्यांना कशाला सांगायला सांगता?
..........
त्यांनी आजतागायत केलेला मला तरी आढळलेला नाही. पक्षी, त्यांचा वरिजनल नसावा. उलटपक्षी, तुम्ही फर्माइश करताय, बोले तो एक तर तुम्ही तो कोठेतरी ऐकला तरी असावा, किंवा तुमच्याच सुपीक डोक्यातून उगवलेला वरिजनल असावा. तुम्ही कोठूनतरी ऐकला असण्याची शक्यता अगदीच नाकारता येण्यासारखी नसली, तरी खूपच कमी वाटते. म्हणजे, मी हा विनोद ऐकलेला नव्हता, बोले तो तो तितकाही कॉमन नसावा. अर्थात, तुमचे सर्कल माझ्याहून वाइड असू शकतेच म्हणा. पण तरीही, का कोण जाणे, पण हा तुमचा वरिजनल विनोद वाटतो. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 28/06/2018 - 00:26

In reply to by 'न'वी बाजू

या प्रतिसादाच्या वर्णनासाठी आता मांजराचे, न-काळे विनोद सोयीचे. 'मेरीही बिल्ली और मुझसेही म्यांव'. आणि हो, तिर्री आणि तिचे सगळे बांधव या म्हणीकडे दुर्लक्ष करतील; त्यांच्या विश्वाच्या केंद्रस्थानी तेच असतात; माणसं, त्यांच्या भाषा आणि त्यांच्या भावनांना त्यांच्यात अजिबात महत्त्व देत नाहीत.

'न'वी बाजू Thu, 28/06/2018 - 07:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१. मी तुमचे (किंवा फॉर्दॅटमॅटर इथल्या कोणाचेही) मांजर नाही. (ताटाखालचे, ताटावरचे वा अन्य कोठलेही.) किंबहुना, मी मुळात मांजर नाही, असा दावा करायला भरपूर जागा आहे.
२. मी (निदान तुम्हाला तरी) 'म्याव' म्हटलेले नाही.

(बाकी, तुमच्या मांजरीच्या (अ)भावना तिलाच लखलाभ.)

असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 28/06/2018 - 08:10

In reply to by 'न'वी बाजू

तुम्हालाही मांर्जारकुलाचं माझे सदस्यत्व मिळालं असतं. तुम्हीही सोयीसवडीनं झक्कास दुर्लक्ष करता. पण मांजरं तेवढे कष्टही घेत नाहीत, त्यामुळे ते होणे नाही.

विनोदाच्या मागणीच्या मांजरीला म्यांव केल्याबद्दल तो प्रतिसाद दिला.

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 15:47

In reply to by 'न'वी बाजू

बाकी अजो, हा (बोले तो, तुम्ही फर्माइश केलेला) विनोद तुमचा आहे, त्यांचा नव्हे.१ तर मग तो तुम्हीच सांगा ना. त्यांना कशाला सांगायला सांगता?

नबा, असू द्या ना. बोले तो, तुम्हाला सांगायला नाही ना सांगीतला? तुम्ही का लोड घेता?
=============================
आता तुम्ही जर तुमचे माय बाप, मुले, बायको यांच्यावर, यांच्या जीवनातील दु:खद प्रसंगांवर, वा संभव घाण प्रसंगांवर काळे विनोद सांगायाला लागले तर मी अजून मागणी करीन. नै का?
===============
बाकी मायबाप अलरेडी मेलेले आहेत आणि त्यांची बाजू घ्यायला इथे कोणीच नाही म्हणून काळे विनोद सटासट सुचतात तेच अनंत लोकांच्या जीवनात शेजारी अनंत दु:खद घटना होतात वा संभव असतात, तिथे चिंज समीक्षित काळा विनोद करायला टरकते.
=======================
बाय द वे, न-काल्पनिक विनोदाला संवेदनशीलतेची मर्यादा असावी असं मी म्हणत होतो. मी फर्माईश केलेला विनोद नाही - मी वास्तवात असं बोलून विनोद उत्पन्न कर असा चॅलेंज (जे काय ते) अदितीला दिला. सबब तो विनोद नाही. पण तुम्हाला हा विनोद वाटला असेल तर तुमच्याबाबत मला काही विनोद करायची अनुमती द्याल का? म्हणजे नंतर ऐसीची तत्त्वे, खासगीपणा इ इ चे नियम विनोदाला नको लागू व्हायला.

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 15:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मागण्या केल्यास त्या पूर्ण होणार नाहीत

आमच्या पुढच्या मागण्या:
१. प्रतिसाद लिहा.
२. प्रतिसाद लिहू नका.

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 18:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आई-वडलांच्या अनपेक्षित मृत्युंमुळे मी पहिली गोष्ट शिकले ती म्हणजे अशाश्वती आणि त्यातून not taking myself very seriously.

हे वाक्य भारीभक्कम शब्द घालून रचलेलं असलं नि दु:खद संदर्भात असलं तरी एक विनोद होतोय. Not taking oneself seriously and taking nothing seriously सारखंच मानलं जातंय. तुमचा जीव असोच, तुमच्चं एक सुस्पष्ट चूक विधान तुम्हाला प्रतिष्ठेचा प्रस्न आहे. तुमच्या बारिक सारिक गोष्टि तुम्हाला (इतरांच्या) प्राणांपेक्षा प्रिय आहे तेव्हा माझ्या अस्तित्व विषयक बाबींचं मला फारसं मूल्य नाही असं म्हणणं सोडा.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 28/06/2018 - 20:43

In reply to by अजो१२३

1. I don't take myself too seriously. - मी स्वतःला फार भाव देत नाही.
2. Nothing is sacred. - काहीही पवित्र नाही.

माझं विधान चूक आहे, असं तुम्हाला वाटतं. माझ्या मते, त्या विधानाची चिकित्सा करण्याएवढा दम त्या एका विधानात नव्हता. त्या विनोदाचा बालमृत्यू होणं मला अपेक्षित होतं; तुम्ही ते मरतुकडं व्हेंटिलेटरवर चढवून जिवंत ठेवलंत. आता ते पोर डोक्यावर मिऱ्या वाटायला लागलं तर जबाबदारी टाळू नका. :प

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 23:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझं विधान चूक आहे, असं तुम्हाला वाटतं.

तुमची बहुतेक सगळी विधान चूकच असतात. कधी कधी ऑडिटर नेमायला लागेल इतक्या चूका, विसंगती, अद्न्याने, इ इ एकाच विधानात खच्चून भरलेलं असतं. मी कधीही त्यांकडे लक्ष देत नाही. ते तुमचं व्यक्तिमत्व आहे, आणि ते तुम्ही मुद्दाम म्हणून करत नाही हे मला कळत.
===============
सदर विधानाची केस वेगळी आहे. ते चूक नाही, ते क्रूर आहे. लक्षात घ्या "प्रत्यक्षात घडलेल्या" "स्वत:च्या संबंधित" "अतीव दु:खाच्या" गोष्टीत "स्वकियांचे टोटल वाटोळे होण्याला" आपण एक आनंद मानता हे क्रूर आहे.
--------------
उद्या, मंजे २९ जूनला, मी जर मेलो तर तुम्ही अवश्य अशाच कोणत्यातरी (म्हणजे माझ्या रॉ प्रतिसादांपासूनच्या) "सुटकेचा" आनंद घेणार.आणि तो तुम्ही अन्य ऐसीकरांसमोर जाहीर करणार. वर त्याला (काळा) विनोद म्हणणार.
----------------------
तुम्ही जे पालकांविषयी विधान केलं आहे त्यावरून मी छातीठोकपणे सांगू शकतो कि तुम्हाला त्यांचे विषयी अजिबात आदर नव्हता आणि ते मेल्याचं तुम्हाला अजिबात दु:ख नाही. आणि ते त्याच लायकीचे होते का हे ही सांगायला तुम्ही तयार नाही. त्यांच्याबद्दल सहानुभूती असणारांचे आपण आभारी देखील व्हायचे कष्ट घेत नाहीयेत, तेच स्वर्गातून (जे काय ते) आभार मानतील असं म्हणत आहात. इतक्या चर्चेत तुमच्याकडून आईवडीलांच्या प्रेमाचे एकही विधान आलेले नाही यातच सर्व समजून यावे. पालक मेल्यावर आपण कोणाच्या गळ्यात पडून रडू शकलो, कोणाच्या नाही, त्यांची रिलेटिव लायकी काय, त्यांची ऑब्जेक्शन्स काय याचा आपण विचार करता, पण पालकांचा विचार नाही करत. तिच्या गळ्यात पडून तुम्ही रडू शकत नाहीत इतक्या तुम्ही तिच्यापासून दूर आहात तर ती देखील तुम्हाला 'माझ्या गळ्यात पडून रडू न शकण्याइतकी दूर' मानणारच आणि हिशेब काढणारच. हे साहजिक आहे पण असा संतुलित विचार तुम्ही करू शकत नाही. तुम्ही अगदी रडण्याचं राजकारण करता, हे चूक नाही, हे क्रूर आहे.
-----------------------------------
छातीठोकपणे का?
तर भाषा भावना दाखवते. उदा. "आईवडीलांचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे मामाकडे कोल्हापूरला राहायला जावं लागलं. तिथे वातावरण आणि अन्न खूपच छान होतं. २-३ वर्षांतच माझी तब्येत खूप सुधारली" हे लिहिणारा मनुष्य आणि "बरं झालं आईवडील लवकर मेले, नाहीतर कोल्हापूरला जाऊन तब्येत बनली नसती" हे म्हणणारा मनुष्य वेगळे असतात.
तुमच्या एकाही प्रतिसादात थेट, प्रांजळ, स्वच्छ असं आईवडीलांबद्दल प्रेम व्यक्त करणारं इतर एकही विधान आलेलं नाही. प्रत्येक ठिकाणी रोख काही वेगळाच आहे.
----------------------------
इथे तुमच्या प्रत्येक प्रतिसादाला मार्मिक ठोकणारे ४-५ लोक पाहून तुम्हाला आपल्या विधानांत काहीही गैर वाटत नाही. मूळात आत्मियता असेल तर चूकाच दिसत नाहीत. माझं थोडं उलट होतं. आत्मियता असेल तर मला सर्व चूका दिसतात. तुम्ही, तुमचे पालक यांचेशी माझा काही संबंध नाही. तुम्ही काहीही करा, बोला, तो माझा विषय असू शकत नाही. माझ्या आयुष्यावर याचा काहीही परिणाम होत नाही. मी मख्खपणे अशी अनंत लोकांची अनंत मतं वाचत असतो, पाहत असतो. थत्ते म्हणतात हा मख्खपणा हीच परिपक्वता आहे. गवि म्हणतात कि तुम्हाला बोलायचा अधिकारच नाही. फार तर फार मिळमिळित बोललं तर बरं दिसतं. मी माझ्या कस्टम पद्धतीने अर्थ काढलेले आहेत. ते चूक आहेत नि माझं आईवडिलांवर निस्सिम प्रेम आहे म्हणून विषय मिटवू शकता. मला देखील ते विधान विनोद वाटायला चालू होइल.

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 18:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"आमची, म्हणजे आई-वडलांकडून आलेली गुणसूत्रं एवढी महत्त्वाची नाहीत, की ती नष्ट झाली म्हणून जगावर जुरासिक पार्कसारखा सिनेमा लादला जाईल. त्यामुळे आम्ही अपराधगंड न बाळगता, मुलं होऊ देण्याचा पर्याय विचारात घेतला नाही."

उत्क्रांची रेटा, उत्क्रांतीचा रेटा म्हणून जे तुम्ही नेहमी बोलत असता, तो रेटा तुम्ही एकहाती थांबवलेला दिसतो. कृष्नानं गोवर्धन धरावा तसा वा अन्य काही नास्तिकी उदाहरण.

नितिन थत्ते Wed, 27/06/2018 - 09:26

In reply to by अजो१२३

>>नितिनजी, मी कै लोड घेत नाहीय, पण लिटरली ते विधान कोण्याही अर्थी कसल्याही प्रकारचा विनोद नाही.

बरोबर. पण जाउंद्या. तुम्ही, मी, गवि हे कूल नसल्याने आपल्याला खटकते ही आपली कमतरता. सोडून द्या.

गवि Wed, 27/06/2018 - 09:38

In reply to by नितिन थत्ते

पण खटकल्याबद्दल तीव्र तशाच शब्दांत सुनावणं हेही पटलं नाही. आपल्याला वाईट वाटलं इतकं स्पष्ट सांगून थांबायला हवं किंवा पुढे साद प्रतिसाद वाढले तरी हल्ला चढवल्याचा आवेश योग्य वाटत नाही.

नितिन थत्ते Wed, 27/06/2018 - 10:39

In reply to by गवि

बिईंग फेअर टु अजो, मी प्रथम अशा प्रकारची विधानं वाचली तेव्हा मीही एकदा सुनावलं होतं. आता मी सुनावलं नाही आणि अजोंना सबुरीचा सल्ला दिला.

अजो१२३ Wed, 27/06/2018 - 11:26

In reply to by गवि

इथे समजा कुणी लिहिलं कि मी चार मुडदे पाडले. तर लागलीच ६-७ जण घेरून त्याला हे काय इ इ विचारू लागतील. अदितीच्या विधानावर अजिबात काही प्रतिक्रिया नव्हती. मग मला वाटलं कि मायबापांचे अकाली मृत्यू नि त्याचे फायदे हा ऐसीवर मिरवण्याचा मुद्दा असावा.
-----------------
बाकी समाजात विकृत नि गुन्हेगार असतात हे सामान्यद्न्यान आहे. अशी घटना झाली तर मी धावून जात नाही. मरू देत म्हणतो. मात्र इथे मी एक सहभागी सदस्य आहे तेव्हा सर्व सदस्यांच्या संवेदना मर्यादांत असणं अपेxइत आहे.

अजो१२३ Tue, 26/06/2018 - 22:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Unless you yourself are criminal or pervert or unless your parents were criminals or perverts, the statement makes no good taste.
And please don't write about the main point. Several points you made about your freedoms, ways, manners are absolutely correct and fine. Nobody has ever objected to them. But please don't mix those issues with the topic.
Simply put - the topic was - the statement was unfortunate, unbecoming. It can't be peddled as some kind of humor.
====================================
Look at the statement =
पित्याच्या अकाली मृत्यूनंतर अकबराला दिल्लीची सत्ता मिळाली.
आणि हे पहा,
अकबर स्वत: आत्मचरित्रात लिहितो - बाप फटकन मेला म्हणून चटकन सम्राट झालो, बापाच्या अंमलाखालून सुटका झाली.
दोन्ही विधानं तीच आहेत.
अकबरानं असं शब्दचयन केलं तर त्याला काळा विनोद म्हणायला कितीजण तयार आहेत?

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 15:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मनुष्याचा अकाली किंवा न-अकाली मृत्यू होणं ही गोष्ट गोडगुलाबी म्हणून रंगवलेली नाहीच.

त्रास, पिडा, कीट्कीट डोकेदुखी इ तून मुक्तता या अर्थाने गोडगुलाबी म्हणून मात्र तेव्हढि रंगवलेली आहे.

अजो१२३ Thu, 28/06/2018 - 16:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

किमान एका मराठी माणसाला काळा विनोद समजतो, असं म्हणता येईल.

तेवढ्या एका माणसाला नि तुम्हाला अशा दोनच मराठी माणसांना काळा विनोद समजत नाही.