Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८७

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

---

गब्बर सिंग Sun, 20/08/2017 - 02:48

In reply to by पुंबा

हो. पण कुठला तरी एक स्टॅंड घेणे हे इश्यु बेस्ड असावे की आयडियॉलॉजी बेस्ड?

The Three Languages of Politics: Talking Across the Political Divides
.
-----------
.
जाताजाता : आयडिऑलॉजी ही इतकी समस्याजनक असेल तर तत्वद्न्यान या विद्याशाखेचा अभ्यास बंद करायला हवा. कारण आयडिऑलीजी ही तत्वद्न्यानाचे च अपत्य असते.
.
.

नितिन थत्ते Sun, 20/08/2017 - 19:41

In reply to by राही

शेवटपर्यंत? मी सुरुवात सुद्धा वाचली नाही.

बॅट्या कबाब खाण्याची ठिकाणे विचारत होता म्हणून क्विक सर्च करून मांसाहार कसा वैट्ट असतो त्याची लिंक पाठवली. :)

'न'वी बाजू Thu, 24/08/2017 - 07:57

In reply to by नितिन थत्ते

हिंदुस्थानात उत्तम प्रतीचे हम्मा-कबाब कोठे मिळू शकतील? शक्यतो पुण्यात?

(म्हैस-हम्मा नको. खरीखरी हम्मा. बोले तो, हम्मा-हम्मा.)

अबापट Thu, 24/08/2017 - 08:43

In reply to by 'न'वी बाजू

न बा , महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा आहे . पुण्यात नक्की मिळणार नाहीत . नॉर्थ ईस्ट किंवा केरळ मध्ये गोवंश हत्या बंदी नाहीये .तिथे मिळतील का नाही हे माहीत नाही. ( अवांतर प्रश्न : का ? एवढाच प्रश्न .)

'न'वी बाजू Thu, 24/08/2017 - 09:07

In reply to by अबापट

( अवांतर प्रश्न : का ? एवढाच प्रश्न .)

उगाच.

असे काही विचारले की थत्तेचाचा वरच्यासारखी आणखी एखादी रँडम लिंक डोळे झाकून ठेवून देतील, म्हणून. त्यांना चावी मारण्यासाठी. बाकी काही नाही.

नितिन थत्ते Thu, 24/08/2017 - 11:06

In reply to by 'न'वी बाजू

पुणे ३० मध्ये सुजाता हॉटेल (आहे का अजून?) किंवा स्वीट होममध्ये मिळू शकेल. गोरक्षकांना संशय येण्याची शक्यता शून्यवत असल्याने ;)

अबापट Thu, 24/08/2017 - 11:20

In reply to by नितिन थत्ते

थत्ते हमारी लहानपणकी गल्ली वर असा आरोप ? ( आपल्या माहितीकरता सुजाता हॉटेल ( बटाटा वडा १२० ग्रॅम फेम ) बंद होऊन कैक वर्षे झाली . त्याच्या जागी आधी सावन आणि आता मला वाटते हिंद साडी चे मॉलत्सम साड्यांचे दुकान उभे आहे . स्वीट होम मूळ मालकांकडे आहे का नाही माहित नाही . { गेले ते वाटी च्या आकाराच्या इडल्या आणि सांबरत्सम डाळ त्यावर शेवेचे दिवस !!! असो.}
बाकी त्या गल्ली मध्ये जसे थत्ते /लेले /नेने /भट यांचे प्राबल्य असे त्याबरोबरच सुजाता हॉटेल च्या जागी , कार्यालयाच्या वर एक पैशे लावून पट्टे खेळण्याचा क्लब पण होता . त्याच्या समोरच मटक्याचे आकडे पण निघायचे . तात्पर्य : त्या गल्ली ची बदनामी करू नका . मुंबई ठाण्यातल्या कुठल्याही गल्ली प्रमाणे ती होती .

आदूबाळ Thu, 24/08/2017 - 11:23

In reply to by अबापट

गल्ली लक्षात आली, पण सुजाता 120 ग्रॅम बटाटेवडे काय प्रकरण आहे?

(कोणाला यात कोटी करण्याचं पोटेन्शियल दिसलं नव्हतं का?)

अबापट Thu, 24/08/2017 - 13:04

In reply to by आदूबाळ

सुजाता हॉटेल म्हणजे पूर्वी चा सोहनींचा मोठ्ठा वाडा होता त्यातील तळ मजल्यावर फरसबंद अंगणात व आधीच्या ओसरीत टेबले टाकलेली... सर्वसामान्य हॉटेलांपेक्षा मोठे .

पुणेरी पाट्या फेमस व्हायच्या आधी पासून इथे सुमारे काही हजार पाट्या होत्या . म्हणजे दारात वेलकम त्याच पाटीच्या बॅकसाईड ला "तुमचे काही विसरले तर नाही ना ? "
डावीकडे एका सेव्हन्टी एमएम बोर्डावर रेल्वे प्रमाणे इडली अमुक तमुक "ग्राम "व पुढे त्याची ८० पैसे वगैरे किंमत लिहिलेली असायची .( क्रिकेट मॅच मधील जायंट स्क्रिन ची आयडियाही नेहमीप्रमाणे पुणे ३० मधूनच निघाली हे नम्रपणे नमूद करू इच्छितो ) समोर राहणारे गोडसे च ते हॉटेल चे चालक मालक होते .
तर असो .
अजून काय माहिती हवीय ?
कोटी करण्याचा स्कोप तुम्ही आणि नंदन शेठ यांच्याकरिता शाबूत ठेवलाय .

नितिन थत्ते Thu, 24/08/2017 - 15:22

In reply to by अबापट

सुजाता हॉटेलचे एवढेच वैशिष्ट्य नव्हते. आमच्या इथे या तांदुळाचा भात आणि या गव्हाच्या पोळ्या असतात. असे म्हणून त्या तांदुळाची आणि गव्हाची सँपलस नोटीसबोर्डावर अडकवलेली असत.

अनु राव Thu, 24/08/2017 - 18:27

In reply to by नितिन थत्ते

बापटण्णा, सुजाता मधे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या रेकॉर्ड लावलेल्या असायच्या हे हि एक वैशिष्ट्य.

नितिन थत्ते Sat, 26/08/2017 - 10:30

In reply to by अबापट

>>कार्यालयाच्या वर एक पैशे लावून पट्टे खेळण्याचा क्लब पण होता .

पुण्यात त्याकाळी कॅरम क्लब्जसुद्धा खूप होते. तिथे १० रु अर्धा तास वगैरे भाड्याने कॅरम खेळता यायचा. अनेक कॉलेज विद्यार्थी तिथे तासनतास पडीक असत. (तिथे पैशे लावून कॅरम खेळताना दिसले नव्हते). अजून आहेत का असे क्लब?

१४टॅन Wed, 23/08/2017 - 11:40

In reply to by गब्बर सिंग

जेव्हा एकेकाळी 'मिसळ खाणे' ही एकमात्र 'हुच्चभ्रू' आणि 'ज्यन्ते'तली सीमारेषा मानली गेली तेव्हा त्यावेळच्या सीमारेषेच्या जनक मंडळाला आमंत्रण दिलेलं आहे.
दोन्ही बाजूंनी रद्द ठरवलेले तुमच्याआमच्यासारखे कधीही मिसळ ते सिझलर्सपर्यंत काहीही चापायला जाऊ शकतो. इतक्या पवित्र विषयात गटबाजी करणाऱ्यांचा बाकी निषेध! निषेध! त्रिवार निषेध!
बायदवे: ह्यात मनोबाचा काय संबंध?

गौराक्का Wed, 23/08/2017 - 12:10

In reply to by १४टॅन

आजकाल ज्यन्तेचं खाणं खायला जाणं हे नवहुच्चभूभू आहे हे ठाउक आहे ना?
म्हणजे, शेतात जाउन हुरडा, पिठलं भाकरी इ इ...

१४टॅन Wed, 23/08/2017 - 12:36

In reply to by गौराक्का

अगदी अगदी!
ते म्हणजे हुच्चभूंनी आपणही कसे वाईट ढुंगणाचे आहोत हे दाखवायच्या मार्गांपैकी आहे. रस्त्यावरचं खाताना- फक्त बिस्लेरीच पिणं, सॅनिटायझरने हात धुणं इ. आणखी, लो/शेप ऑफ यू वर कसंही नाचताना 'कलुळाचं पाणी' लागलं की काढता पाय घेणं इ. त्यात अंतर्भूत आहे.
नवीन धागा काढून ह्यातही नवीन गोष्टी ॲड करता येतील.

नितिन थत्ते Wed, 23/08/2017 - 15:25

In reply to by १४टॅन

>>बाकी निषेध! निषेध! त्रिवार निषेध!

कोणतीही गोष्ट त्रिवार करण्यास सहा महिन्यांची स्थगिती आहे.

पुंबा Sat, 26/08/2017 - 12:54

देश अधोगतीच्या गर्तेत आहे. राज्य ही संस्थाच हतप्रभ झालीये. कुणीही भारताच्या सार्वभौमत्वाला सहज आव्हान देऊ धजतोय. सामान्य माणसाच्या आयुष्याला किड्या मुंग्यांइतकी सुद्धा किंमत उरली नाहीये. खुन, बलात्कार असे आरोप असणाऱ्या स्वयंघोषीत गुरूला सगळेच पक्ष पोसत राहतात दशकोदशके. कोर्ट, संविधान या साऱ्याच्या विरोधात लाखो लोक एकत्र येतात. कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत, जाळपोळ सुरू करतात. लोकांच्या जीव, संपत्ती यांचे रक्षण करण्याचे सोशल काँट्रॅक्ट केलेले राज्य हतबल होऊन पाहत राहते ही जाळपोळ, गुंडागर्दी. सामान्य लोकांना घरात घुसून आगी लावल्या जातात, त्यांची वाहने पेटवली जातात. सैन्य, अर्ध सैनिक बल, पोलिस सारे सारे निष्प्रभ ठरतात. हे भयानक आहे, इथे राहण्याची भिती वाटावी इतके भयानक.

गब्बर सिंग Sat, 26/08/2017 - 13:06

In reply to by पुंबा

लोकांच्या जीव, संपत्ती यांचे रक्षण करण्याचे सोशल काँट्रॅक्ट केलेले राज्य हतबल होऊन पाहत राहते ही जाळपोळ, गुंडागर्दी. सामान्य लोकांना घरात घुसून आगी लावल्या जातात, त्यांची वाहने पेटवली जातात. सैन्य, अर्ध सैनिक बल, पोलिस सारे सारे निष्प्रभ ठरतात. हे भयानक आहे, इथे राहण्याची भिती वाटावी इतके भयानक.

एकदम मन:पूर्वक सहमत.

अक्षरश: पाशवी बल वापरून ही प्रवृत्ती मोडून काढली पाहिजे. जाळपोळ, गुंडागर्दी करणाऱ्यांशी क्रूरपणे पेश यायला हवे.
प्रत्यक्ष सैतान सुद्धा थरथर कापला पाहिजे इतकं बल वापरून हा प्रकार मोडून काढला पाहिजे.

The only thing that can stop riots is presence of overwhelming police force.

अनु राव Sat, 26/08/2017 - 16:30

In reply to by गब्बर सिंग

गब्बु, तुला आतातरी पटले असेल की जिडिपी, रेपोरेट, रिफॉर्म, जिएस्टी, बगैरे अजिबात महत्वाचे नाहिये. मोदी जिथे लक्ष द्यायला पाहिजे तिथे अजिबत लक्ष देत नहिये. पोलिस आणि न्यायालये कमीतकमी पाचपटीने वाढवले पहिजेत असे मी पूर्वीपासुन म्हणते आहे ते पटले का?

गब्बर सिंग Sun, 27/08/2017 - 00:24

In reply to by अनु राव

पोलिस आणि न्यायालये कमीतकमी पाचपटीने वाढवले पहिजेत असे मी पूर्वीपासुन म्हणते आहे ते पटले का?

मी याच्याशी तत्वत: असहमत कधीच नव्हतो. कायदा, सुव्यवस्था, न्यायव्यवस्था ही अगदी लिबर्टेरियन विचारसरणी नुसार सुद्धा सरकारची प्रमुख (कोअर्) कामं आहेत. खरंतर लिबर्टेरियन विचारसरणी नुसार ही कार्येच फक्त सरकारने व्यवस्थित पार पाडणे अपेक्षित आहे. व इथे सरकारने स्वत: वर मर्यादा घालून घेणे गरजेचे आहे. जनकल्याणाचा भारतात जो अर्थ काढला गेलेला आहे त्यात सरकारने कल्याणकारी योजना राबवणे ह्या संकल्पनेवर अतिच भर दिला गेलेला आहे. व त्यामुळे न्यायसंस्थेकडे जे लक्ष दिले जायला हवे ते दिले जात नाही. निधी फडतूसांवर खर्च करणे हे सर्वांना जास्त महत्वाचे वाटते. २०१४ मधे (देवेंद्र सत्तेवर आल्यानंतर्) तर त्या वासुदेव मंडळींनी पेन्शन ची मागणी केली होती. तेच ते वासुदेव लोक जे पिपाणी घेऊन सकाळी सकाळी लोकांना झोपेतून उठवायला जातात ते. म्हणे "आम्ही वासुदेव लोक समाजात एक महत्वाची भूमिका पार पाडतो व त्याबद्दल आम्हाला समाजाने काहीतरी दिले पाहिजे" !!!

जोडीला दुसरे उदा. "राईट टू पी" ही चळवळ व "सबके लिये शौचालय" या चक्रमपणाला प्रत्येकजण खतपाणी घालत आहे. व मोदी स्वत: यात आघाडिवर आहेत. जो निधी कायदा सुव्यवस्था व न्यायव्यवस्थेकडे जायला हवा तो निधी ह्या योजनांकडे जातो आहे.

परंतु अनु, तू फक्त लिनियर विचार करत्येस. न्यायालये जितकी जास्त वाढवशील तितक्या कोर्ट केसेस वाढणार आहेत. आज न्यायालये कमी पडत असूनही ४ लाख केसेस सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहेत. न्यायालये ही मुळातच या constraining the supply च्या तत्वावर चालतात. आता लोकसंख्या जास्त/वाढली आहे म्हणून त्याला अनुसरून न्यायालये वाढवणे गरजेचे आहे हे मान्यच. पण मग सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या १७ वरून १७० केली तर केसेस दाखल करणे वाढणार नाही कशावरून ?

आता महत्वाचा मुद्दा म्हंजे टायमिंग. न्यायव्यवस्थेचे रिफॉर्म्स हे फक्त तेव्हाच करावेत जेव्हा मोदिंना व भाजपाला अभिप्रेत असलेला राडा पूर्ण झाला की. सिक्वेन्स महत्वाचा आहे. मोदिंना किमान दोनचार राडे अपेक्षित आहेत. व ते राडे करण्या आधी न्यायव्यवस्थेचे रिफॉर्म्स राबवले तर तीच रिफॉर्म्ड न्यायव्यवस्था मोदींसाठी च समस्याजनक सिद्ध होऊ शकते. तेव्हा मोदींनी आधी भाजपा ला अभिप्रेत असलेले राडे करावेत. व नंतर न्यायव्यवस्था रिफॉर्म करावी (जर त्याने समस्या सुटणार असेल तर).

अनु राव Mon, 28/08/2017 - 14:31

In reply to by गब्बर सिंग

मोदिंना किमान दोनचार राडे अपेक्षित आहेत.

काय सांगतो गब्बु? आता साडेतीन वर्ष होत आली की, कधी होणार मोदींना अपेक्षीत राडे? :-)

गब्बर सिंग Tue, 29/08/2017 - 01:29

In reply to by अनु राव

काय सांगतो गब्बु? आता साडेतीन वर्ष होत आली की, कधी होणार मोदींना अपेक्षीत राडे?

या प्रश्नाचे उत्तर तुला माहीत असूनही मला विचारत्येस ??

अबापट Sat, 26/08/2017 - 16:50

अहो एकही उघडकीला आलेली भ्रष्टाचाराची केस नाहीये हे पुरेसं नाहीये का ? शिवाय सर्व निवडणूक जिकंत आहेत , म्हणजे लोकांनाही पसंत आहेत ते . अजून काय पायजेल तुम्हाला ?

अबापट Sun, 27/08/2017 - 12:36

गेल्या वर्षी न्या. ओक यांनी , शांतता क्षेत्रात ( ज्यात हॉस्पिटल/,शिक्षण संस्था वगैरे येत असावेत ) यांनी ध्वनी प्रदूषण नियमावली चे पालन केले जावे ( मंजे बाबुराव dj चा आवाज कमी करा , डॉल्बी बारीक ठेवा वगैरे ) असा आदेश प्रशासनाला दिला होता .( बहुधा त्यामुळे )या वर्षी सरकारने न्या ओक हे पक्षपाती आहेत असे सांगून त्यांच्या समोरील केस दुसऱ्या बेंच कडे ट्रान्सफर केली आहे १. सरकार चा हा निर्णय तुम्हाला बरोबर वाटतो का ? २ . अशाने ज्यूडीशीयरी चे स्वातंत्र्य धोक्यात येत आहे असे वाटते का ? ( म्हणजे आपलं ऐकणारा अंपायर पायजेल वगैरे ... ) सर्वांच्या मताच्या प्रतीक्षेत (मला आजोनचे आणि ऋ चे मत ऐकायला विशेष आवडेल )

अनु राव Sun, 27/08/2017 - 16:16

In reply to by अबापट

ज्यूडीशीयरी चे स्वातंत्र्य धोक्यात येत आहे असे वाटते का ?

सर्व नाही तर चांगल्या, सज्जन ज्यूडीशीयरी चे स्वातंत्र्य धोक्यात येत आहे. ओकांकडचि कामे तातडिने काढुन घेण्याचे काम ( आदेश पोचायच्या आधी ) पण दुसऱ्या एक ज्यूडीशीयरी नेच केले आहे . हे फक्त ज्यूडीशीयरी मधे नाही तर सर्व गोष्टिंमधे होत आहे.

बापटण्णा, हा दुर्दैवी प्रकार २०१४ पासुन नाही तर १९३८-४० पासुन सुरु आहे.

तिरशिंगराव Sun, 27/08/2017 - 19:59

सर्व सुशिक्षित, विचारी पण मनांतून मोदींविषयी सहानुभूति असलेल्या लोकांनी गंभीरपणे पुनर्विचार करायची वेळ आली आहे, असे वाटते. सध्याचे सरकार, उघडपणे झुंडशाहीला प्रोत्साहन देत असल्याचे चित्र दिसते. मग ते महाराष्ट्र राज्य असो वा हरयाणा.
अबापट, तुमच्याशी सहमत!

गब्बर सिंग Mon, 28/08/2017 - 01:54

समतोल विचाराचे एक बरे असते - मूळ मुद्द्यावर विचार करावा लागत नाही. आपण समतोल आहोत की नाही एवढा विचार केला की भागते.

पण समतोल विचार म्हंजे नेमके कोणते व कसे विचार ?
व समतोल विचार पद्धती म्हंजे नेमकी कशी ?

चिमणराव Mon, 28/08/2017 - 08:01

कायद्यात सुधारणा करायला हवी. अमेरिकेत भाडेकरूxमालक , कॅापीराइट , भ्रष्टाचार आरोप, कार अपघात/ दारू पिऊन ड्राइविंग, प्रतिष्ठा कलंकित करणारे लिखाण,यांचे निर्णय साधारण किती वर्षांत होतात?-१/२/५/१०/२५/४० वर्षे?

गब्बर सिंग Mon, 28/08/2017 - 10:58

कपिल मिश्रांनी केलेल्या भांडाफोड (?) नंतर केजरीवाल यांचा आवाज अगदी बंद झाल्यासारखं फक्त मलाच वाटतंय की इतरांना पण ??

भांबड Mon, 28/08/2017 - 12:39

ती बोंब मारण्यापेक्षा सरळ मंडईत जायचं, शेतकऱ्याकडून भाजी विकत घेताना त्याने मागितलेल्या किंमतीच्या वर २०% जास्त भाव (प्रिमियम) द्यायचा आणि ती भाजी घेऊन घरी यायचं.

जे ब्बात, तोंडानं बोंबलून, फालतू पोष्टा टाकूनशान कै होत नै.
अगदी २०% नै पण शक्यतोवर घासाघीस तरी नको

भांबड Mon, 28/08/2017 - 12:45

निदान 'काय कुठपर्यंत झालंय काम 'वगैरेहि माहित्या पुढे येत नाहीयेत .

बहुतेक सबमिशन मुव्ह म्हणून राखले असतिल. २०१९ ला रीलीज होतीलच

पुंबा Mon, 28/08/2017 - 14:36

http://www.thehindu.com/news/national/india-china-agree-to-disengage-at…

भारताने काही मिळवले की गमावले? की ना फायदा ना तोटा? भारताने पूर्ण काळ घेतलेला ठाम पवित्रा नव्या संरक्षक नितीची नांदी आहे का? या सगळ्या घटनाक्रमात भारतिय जनमानस भारताच्या संरक्षणविषयक तयारीविषयी चर्चेत ढवळून निघालं. त्याचा परिणाम संरक्षण पॉलिसीवर होईल का?

नितिन थत्ते Mon, 28/08/2017 - 15:24

In reply to by पुंबा

>>भारतिय जनमानस भारताच्या संरक्षणविषयक तयारीविषयी चर्चेत ढवळून निघालं.

+१
गंमतीचा भाग म्हणजे भारताकडे दहाच दिवस पुरेल इतकाच दारुगोळा आहे वगैरे गोष्टी कॅग*ला कळत असल्या तरी चीनला कळल्याच नाहीत असं दिसतंय. ;) चीनचा कॅगपेक्षा भारत सरकारवर जास्त भरोसा दिसतोय.

* कॅगशी आपली दुष्मनी आहे, आपल्या स्वत:च्या अकलेच्या बाहेरच्या कमेंट्स करतात म्हणून. कॅग वि सरकार या वादात मी सरकारचीच बाजू घेईन. (मग ते सरकार मोदी/भाजपचं का असेना).

नितिन थत्ते Tue, 29/08/2017 - 17:56

In reply to by अजो१२३

हे आपल्या कॅगसाहेबांना विचारा.

हा दारुगोळा किती दिवसांचा आहे हे ठरवण्याची कॅगची लायकी नाही हे मला मान्य आहे. आय ॲम ऑन द साइड ऑफ मोदी सरकार इन धिस.