भाषण

पहिल्या 'मराठी बालकुमार साहित्य संमेलना'त भारांनी केलेले अध्यक्षीय भाषण (पूर्वार्ध)

हे अध्यक्षीय भाषण या अंकात समाविष्ट करण्यामागची भूमिका:

अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे 'संत साहित्य संमेलना'पासून ते 'आदिवासी साहित्य संमेलना'पर्यंत अनेक प्रकारच्या साहित्याची संमेलने भरतात. बहुतेक संमेलने ही त्या त्या प्रकारच्या साहित्याची उपेक्षा टाळणे, त्यांचे वेगळे वैशिष्ट्य जोपासणे, त्याबाबत चर्चा घडवून आणणे, साहित्याच्या मुख्य धारेत दखल घ्यायला लावणे, जनसामान्यांना त्या साहित्याची उद्दिष्टे स्पष्ट करून सांगणे, इत्यादी अनेकविध कारणांनी स्वतंत्ररीत्या संपन्न होत असतात. बालवाड्मय वा बालसाहित्यही त्यास अपवाद नाही.

Subscribe to RSS - भाषण