ही बातमी समजली का? - ५१
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा/जाईल.
===========
माझे मत : चुकीच्या जागी योग्य माणूस. हे मत प्राथमिक आहे. नीती आयोग म्हंजे नेमके काय व या आयोगाचा स्कोप काय आहे हे अजून पुरेसे स्पष्ट झालेले नाही. पण तरीही - This is a bad beginning. कारण नियोजन आयोग बरखास्त करून त्याजागी दुसरा आयोग नेमणे व त्याचा आवाका संदिग्ध असणे ("संदिग्ध ठेवणे" अशा शब्द्प्रयोग मी करत नाहिये.) हे फ्री मार्केट च्या संकल्पनेस कितपत धरून आहे हा माझा प्रामाणिक प्रश्न आहे.
---
पण मोदींवर टीका करणारी काही मंडळी बदललेली आहेत. मोदी कसेही वागले तरी अतर्क्य टीका करीत राहणे हा आपला राष्ट्रीय छंद झालेला आहे की काय अशी शंका यावी. पूर्वी मोदी अतिरेकी वेगाने निर्णय घेतात व राबवतात व Democracy's primary founding principles is to increase deliberation (even if it slows down the process) - असल्याने मोदींची काम करण्याची (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह) स्टाईल भीतीदायक आहे असा मुद्दा असायचा.
आता "प्लेटांच्या च्या वाजण्याचा आवाज येतोय लेकिन खाना नही आ रहा" किंवा "कृती होताना दिसत नाहिये" किंवा रिझल्ट्स दिसत नाहियेत - असा आरडाओरडा सुरु झालेला आहे. शरद यादवांनी तर परवा नियोजन आयोग बरखास्त करणे हा मोदींचा एककेंद्रीपणा कडे वाटचाल करणारा निर्णय आहे असा "शून्य = शंभर" अशा स्टाईलचा आरोप केला होता.
जयराम रमेश तर अक्षरशः नुसते आरोप करीत सुटलेले आहेत. "मर्डर ऑफ डेमोक्रॅटिक इंडिया" काय व "एबीसीडी" काय !!! जरा इतिहासाचे भान ठेवा म्हणावं. मनमोहन सिंग हे अत्युच्चशिक्षित, स्वच्छ चारित्र्याचे, प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेले, जागतिक स्तरावरचे विशेषज्ञ, आंतरराष्ट्रीय संघटनांमधे सुद्धा काम केलेले, नीतीवान प्रधानमंत्री होते. २००९ - २०१४ या कालात तर त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा ५ वर्षांचा पूर्व अनुभव सुद्धा होता. परंतु २००९ मधे जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा पहिल्या सहा आठ महिन्यांत त्यांनी स्वतःच (२००४ - २००९ दरम्यान) निर्माण केलेला ९%+ चा जीडीपी ग्रोथ रेट चार टक्क्यांच्या आसपास घसरला होता. आणि त्यावेळी तर त्यांचे "२००४ - २००९ दरम्यान पाय ओढणारे" कम्युनिस्ट्स सुद्धा अल्पमतात असल्याने निष्प्रभ होते. हे मान्य आहे की त्यावेळी जागतिक अर्थव्यवस्थेत प्रचंड उथलपुथल होत होती. मंदी होती. पण Why was such a PM with all the requisite credentials not able to manage the crisis better ?
आभार कशाबद्दल. तुला खरंच असं
आभार कशाबद्दल.
तुला खरंच असं वाटतं की जेलमधे दहापंधरा वर्षं काढून मनुष्य पुन्हा पूर्वीसारख्याच सर्व संधी मिळायला पात्र होतो?
विद्यार्थिनीवर एकदासुद्धा बलात्कार करणारा शिक्षक किंवा कर्मचारी हा कायदेशीर शिक्षेनंतर का होईना पण पुन्हा शाळेच्या /मुलांच्या क्षेत्रातला कोणताही जॉब मिळण्यास "क्वालिफाईड" असू शकतो?
संदर्भ पहा: त्याला तसे कसब
संदर्भ पहा:
त्याला तसे कसब असल्यास व या कारणाने जॉब नाकारला जाऊ नये.
कसब असल्यास?? व्हॉट??!!
विद्यार्थिनीवर एकदासुद्धा बलात्कार करणारा शिक्षक किंवा कर्मचारी हा कायदेशीर शिक्षेनंतर का होईना पण पुन्हा शाळेच्या /मुलांच्या क्षेत्रातला कोणताही जॉब मिळण्यास कसब असलेला , "क्वालिफाईड" असू शकतो?
एकदासुद्धा ब्रीच ऑफ ट्रस्ट, चोरी, कॅश घेऊन पलायन केलेला मनुष्य सजा भोगून आला की बँकेच्या कॅश व्हॅनचा ड्रायव्हर बनू शकतो ?
"कसब असल्यास" हा मुद्दा हास्यास्पदरित्या नॉन अॅप्लिकेबल आहे. नुसते ड्रायव्हिंग किंवा शिक्षकी ज्ञान म्हणजे जॉबचे कसब नव्हे.
दे लॉस्ट देअर राईट टू बी कॉल्ड क्वालिफाईड फॉर इट. जेल सोडून इतरही कॉन्सिक्वेन्सेस असतात केलेल्या गुन्ह्याचे.
अशांबाबत जॉब म्हणजे कंट्रोल्ड ऑब्झर्वेशनमधे केलेले काम उपजिवीकेपुरतेच उरावे फक्त.
हा मुद्दा रोचक आहे. पण
हा मुद्दा रोचक आहे.
पण नेहमीप्रमाणे इथे इन्सेण्टिव्हचा प्रॉब्लेम आहे. अशा लोकांना परत नोकरीत/समाजात स्वीकारण्यात समाजाला काय इन्सेण्टिव्ह आहे ते स्पष्ट नसून निव्वळ अल्ट्रूइझमला अपील केलेले आहे. अशा हवेतल्या बाता फार काळ टिकत नाहीत. कूल पॉइंट मिळवण्यापलीकडे यांचा उपयोग शून्य.
पण हल्ली कुल पॉईंट मिळवता
पण हल्ली कुल पॉईंट मिळवता मिळवता ही धोरणे प्रत्येक्षात पण येवु लागली आहेत.
कालच फाशीची शिक्षा झालेल्या जोडप्याला मुल जन्माला घालण्याचे ( आणि त्या साठी शरीरसंबंध ठेवण्याचा ) हक्क आहे असे न्यायालय म्हणते आहे.
थोडे दिवसानी तुरुंगातच कंसिव्ह झालेल्या आणि जन्माला आलेल्या मुलाच्या पालनपोषणा च्या हक्का साठी शिक्षा रद्द करुन सोडुन देण्यात आले तरी आश्चर्य वाटणार नाही.
कोणताही जॉब मिळण्यास
कोणताही जॉब मिळण्यास "क्वालिफाईड" असू शकतो?
हे जज केल्याशिवाय कसे कळणार?
निव्वळ त्याने एखादा गुन्हा केला आहे व त्याबद्दल शिक्षा भोगली आहे म्हणून त्याता थेट डिस्क्वालिफाय का करावे? तो खरंच क्वालिफाईड झालाय का ते बघावे नी मग जीब द्यावा. त्याला असाच थेट जॉब द्यावाच असे नाही मात्र "संधी" नाकारली जाऊ नये.
===
हे सगळं पुस्तकी वगैरे वाटत असलं तरी त्याला अगदी प्रॅक्टिकल कारणे आहेत. प्रत्येक वेळी गुन्हा करणारा त्या मानसिकतेचाच असतो असे नाही. समजा एखाद्याने अत्यंत निकडीच्या व त्वरीत करणे गरजेचे आहे अशा एखाद्या आप्ताच्या ऑपरेशनसाठी थोडे पैसे चोरले, त्याबद्दल त्याला पश्चाताप आहे मात्र त्याला त्या परिस्थितीत दुसरा मार्ग सुचला नाही. नवखा असल्याचे / चोरीची सवय नसल्याने पकडला गेला नी शिक्षा झाली.
पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होणे किती शक्य आहे? आणि एकुण जेलचे वातवरण भोगून आलेला प्रत्येक व्यक्ती पुन्हा ते कृत्य करेलच याची इतकी खात्री कशी काय?
मी यासाठी थांबतोय की विषय मोठा आहे आणि पुढील काही दिवस मी ऐसीवर नसेन फारसा मग असं अर्ध्यात सोडून दिल्यासारखं नको वाटायला म्हणून रितसर सांगतोय
एनी वे.. सोमवारपर्यंत विषय बारीवर टिकला तर बोलूच :)
पुन्हा तशी परिस्थिती निर्माण
पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होणे किती शक्य आहे? आणि एकुण जेलचे वातवरण भोगून आलेला प्रत्येक व्यक्ती पुन्हा ते कृत्य करेलच याची इतकी खात्री कशी काय?
:)
हे सर्व जज करुन कसब ठरवायचे आणि नोकरी द्यायची ? किचकट होणार इंटरव्ह्यू राव..!!
"कोणताही जॉब मिळवण्यासाठी क्वालिफाईड" हा भाग क्वोट करताना त्याच्या आधीचे
शाळेच्या /मुलांच्या क्षेत्रातला
हे शब्द का वगळले? स्पेसिफिक केसेस आहेत या.
पण बघू सोमवारी. ;)
ताजा गोळीबार आणि चिंतातुर जंतूंचा धागा
हुकुमशहांना विनोदाचं वावडं का असतं?
www.misalpav.com/node/16971
विनम्र असहमती नोंदवून थांबतो.
In reply to गुन्हा घडल्यावर अन शिक्षा by गवि
विनम्र असहमती नोंदवून थांबतो. आभार!