पब, बायका, भारतीय संस्कृती... (अरुण जोशी काय म्हणतात?)
(व्यवस्थापन - एका बातमीच्या निमित्ताने चालू झालेली चर्चा भारतीय संस्कृतीविषयीच्या अरुण जोशींच्या काही विधानांमुळे वाढली. त्यामुळे वेगळा धागा काढला आहे.)
बायकांनी पबमध्ये जाऊ नये: गोव्याचे मंत्री
आता बोला!!...
अन् देशभर पसरलेल्या
अन् देशभर पसरलेल्या शिल्पांतील सुशील स्त्रिया (अगदी हंपीच्या मंदिरातील सामान्य स्त्रियासुद्धा) पायघोळ बुरखे घालून कधीच दिसत नैत. सगळ्या अत्यंत तंग काचोळ्या आणि तोकडे कपडे घालुनच दिसतात.
मग कुठली संस्कृती बरं म्हणत असतील मंत्रीमहोदय आणि अजो?
का भाजपाचे मंत्री महोदय आणि अजो मुघल नियमांना भारतीय संस्कृती समजत आहेत?
मंत्री भारताच्या
मंत्री भारताच्या संस्कृतीबद्दलचं विधान करताहेत. असं मत असलेल्या माणसाचा स्त्रियांबद्दलचा अवमानकारक दृष्टिकोन स्पष्ट दिसतो. असा माणूस स्त्री-पुरुष समता पाळेल, असा विश्वास कसा ठेवणार? त्यांचं मत खाजगी व्यक्ती म्हणून असेल तर ठीक. मंत्री म्हणून ते संविधानातल्या मार्गदर्शक मूल्यांना धरून नाही.
हे पुन्हा काहीही. ते
हे पुन्हा काहीही. ते पुरुषांबद्दल काहीही बोलले नाहीत. (पण अंदाजच काढला तर त्यांनी श्रीराम सेनेचे समर्थन केले आहे जिने पबमधे जाउन दारू पिणार्या पुरुषांना देखिल बदडले आहे.) . त्यांना पुरुषांनी तोकडे कपडे घालावेत नि दारू प्याबी असे म्हणायचे आहे हा थोडा जास्त अर्थ झाला.
मेघनाप्रती माझीही सॉलिडॅरिटी
आम्हाला आमच्या नजीकच्या भूतकाळातल्या पूर्वजांबद्दल प्रेम नाही, फार्फार जुन्या पूर्वजांबद्दल आहे. तर मग?
परंपरागत रित्या भारतीय बायका दारू पीत नसत असे माझे मत आहे.
भारतात काय फक्त बामणी, नागर, विधवा झाल्यावर भुंड्या केल्या जाणाऱ्या किंवा नीरस कपडे घालणाऱ्या स्त्रिया रहायच्या का काय? मोहाची चढवणाऱ्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया काय आपल्या, भारतीय नाहीत?
अगदी अगदी.
आणि सारासार विचार न करता ते मत सर्वांवर लादावे, कुणी प्रतिवाद केलाच तर उदगीरचा दाखला द्यावा. इथे बाकी खेड्यात वाढलेलं कुणी नाहीच, सबब तुमच्याशी कोण प्रतिवाद करणार, नै का. एक जरी खेडेवाला इथे आला तरी तुमची अनेक मते अशी पत्त्यांच्या बंगल्यागत ढासळतील. शेवटी आपण खेडेगावचे, सबब आपल्याइतके मातीशी कनेक्टेड कोणीच नाही (तेही गेली कैक वर्षे आपण शहरात राहिल्यामुळे गावाकडची सद्यःस्थिती काय आहे ते ठौक नसेल हे नजरेआड करून) हा ख्याल तो बहुत अच्छा है.
पण मग कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटीसारख्या खेड्यातही गुत्ते होते. १९४० सालच्या टीचभर मिरजेतही होते, सांगलीतही होते. आता म्हणा, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राइतका अनैतिक नव्हता. मग सेतुमाधवराव पगडींच्या लिखाणातल्या मराठवाड्याच्या उल्लेखालाही किंमत नाही. कोण पगडी आणि ते काय लिहिणार? शेवटी त्यांचा जन्म काही मराठवाड्यात झालेला नाही, त्यांची मते काय अरुणजोशींपेक्षा ग्राह्य असणार?
कसलीही कौंटर उदा. दिली तरी हा रडीचा डाव थांबणार नाही.
तर्कतीर्थ जोशीबुवा
तर्कतीर्थ जोशीबुवा सातारकडचे(आधी कुठलेही असोत पण नंतर तिकडे स्थायिक झाले), म्हणजे त्या दुष्ष्ट वैट्ट पश्चिम महाराष्ट्रातलेच की ओ. तुलनेने पगडी बरे, मराठवाड्यात रहायला तरी होते. बरे, यांच्या मराठवाडी धोशामध्ये विदर्भाचा कुठे उल्लेखही येत नाही हे रोचक आहे.
आणि सारासार विचार न करता ते
आणि सारासार विचार न करता ते मत सर्वांवर लादावे,
हा कसा अर्थ काढला? मी माझं मत मांडलं तर ते तुमच्यावर लादलं असं कसं होईल? तुमचे मत माझ्यापेक्षा वेगळे असायच्या अधिकाराचा मला सन्मानच आहे. तुम्ही मत जुळत नाही व खोडायला विदा नाही म्हणून, तुमचे फायनल मत मांडून, विषय सोडून द्या.
कुणी प्रतिवाद केलाच तर उदगीरचा दाखला द्यावा.
मी राज्यांत फिरलो आहे, किती फिरलो आहे, कुणाशी किती गप्पा मारल्या आहेत हे न जाणता असे म्हणू नये.
एक जरी खेडेवाला इथे आला तरी तुमची अनेक मते अशी पत्त्यांच्या बंगल्यागत ढासळतील.
हा आत्मविश्वास जास्त नाही का?
शेवटी आपण खेडेगावचे, सबब आपल्याइतके मातीशी कनेक्टेड कोणीच नाही
हे न केलेले दावे आहेत. कोण कोणाशी किती कनेक्टेड आहे याचा काय संबंध? ज्याला जी माहिती आहे तो ती देतोय. काही एक्मत करायचंच असेल तर चर्चेला सीमारेषा घालू. त्या सीमांत काय निरीक्षण निघते ते पाहू.
(तेही गेली कैक वर्षे आपण शहरात राहिल्यामुळे गावाकडची सद्यःस्थिती काय आहे ते ठौक नसेल हे नजरेआड करून) हा ख्याल तो बहुत अच्छा है.
असं नाहीय. शिवाय मला व्यक्तिगत कमेंट पासून दूर राहायचे आहे.
पण मग कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटीसारख्या खेड्यातही गुत्ते होते. १९४० सालच्या टीचभर मिरजेतही होते, सांगलीतही होते.
मिरजेत वा कोल्हापूर जिल्ह्यात किती टक्के शेतकरी वा कामगार १९४० मधे दारू पीत? हा टक्का "शेतकरी दारू पितात" असे म्हणावयास पर्याप्त आहे का?
"शेतकरी दारू पितात" म्हणताना जवळजवळ सारे शेतकरी दारू पितात असे वाटते. एखादा टक्का पीत असेल तर ठिक. पण ९९% पीत म्हणत असाल तर ... अवघड आहे.
आता म्हणा, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राइतका अनैतिक नव्हता.
असं नक्कीच म्हणता येईल, पण हा धाग्यचा विषय नाही.
मग सेतुमाधवराव पगडींच्या लिखाणातल्या मराठवाड्याच्या उल्लेखालाही किंमत नाही. कोण पगडी आणि ते काय लिहिणार? शेवटी त्यांचा जन्म काही मराठवाड्यात झालेला नाही, त्यांची मते काय अरुणजोशींपेक्षा ग्राह्य असणार?
आपण पगडींची मते अवश्य माना. माहिती म्हणून इथे लिहा देखिल. पण त्यांनी "मराठवाड्यातले शेतकरी व त्यांच्या बायका दारू पितात" असले विधान केले असेल तर माझी असहमती नोंदवायचे स्वातंत्र्य मला हवे. लेखक कोणीही झंड असो, मी त्याच्याशी एकमत दाखवणे आवश्यक नाही.
कसलीही कौंटर उदा. दिली तरी हा रडीचा डाव थांबणार नाही.
असं नाही. मला जे काही रिजनेबल वाटेल ते मी स्वीकारेन.
"शेतकरी दारू पितात" म्हणताना
"शेतकरी दारू पितात" म्हणताना जवळजवळ सारे शेतकरी दारू पितात असे वाटते. एखादा टक्का पीत असेल तर ठिक. पण ९९% पीत म्हणत असाल तर ... अवघड आहे.
हाच तुमच्या विचारपद्धतीचा दोष आहे. ९९% नाही म्हणजे १% च पाहिजे काय? मधले काही असू शकते याचा तुम्ही स्वीकार करीत नाही.
असं नक्कीच म्हणता येईल, पण हा धाग्यचा विषय नाही.
बिनबुडाचं अजूनेक वाक्य. तसे म्हणायचे असेल तर त्यात निव्वळ तुमचा बायस आणि अज्ञान दिसते.
आपण पगडींची मते अवश्य माना. माहिती म्हणून इथे लिहा देखिल. पण त्यांनी "मराठवाड्यातले शेतकरी व त्यांच्या बायका दारू पितात" असले विधान केले असेल तर माझी असहमती नोंदवायचे स्वातंत्र्य मला हवे. लेखक कोणीही झंड असो, मी त्याच्याशी एकमत दाखवणे आवश्यक नाही.
कदाचित मी पुढीलप्रमाणे विचार करतो असे आपल्या मनात असावे.
"हौ डेअर अरुणजोशी डिसॅग्री विथ पगडी!" तर असे काही नाही. डिसॅग्री कुणाशीही व्हा, फक्त त्याला बेसिस काही असला तर ठीक. नपेक्षा मी न्यूटनशी डिसॅग्री होतो, पण तेवढ्याने त्याचे नियम चुकीचे सिद्ध होत नाहीत. त्याचप्रमाणे, लोकांनी ग्रंथांतले उल्लेख दिले तर त्यांची चिकित्सा न करता "हॅ:! असले ग्रंथ वाचून काय कळतं?" छाप डीसमिसल करून तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. ज्या काळात आज टाईम ट्रॅव्हल करणे साध्य होत नाही, त्या काळाबद्दल अनुमाने करण्याचे साधन म्ह. ग्रंथ आणि इतर काही गोष्टी. तुम्ही जर ग्रंथांना डिसमिस करीत असाल (कारण तुमच्या मते ते पुरेसे रिप्रेझेंटेटिव्ह नाहीत म्हणून), तर त्याच न्यायाने तुम्ही कुठे राहिलात आणि कुठे फिरलात हेही डिसमिस करता येईल, कारण भारतातही सर्व लोकांना तुम्ही भेटला नाहीतच. सांगोवांगीच्या अनेक गोष्टी तुम्ही ग्राह्य धरल्या.
आता म्हणाल डिसमिसलचे स्वातंत्र्य आहे. ऑफ कोर्स ते दोघांनाही आहे. पण मुद्याचं काय? न वाचता, जराही न तपासता तुम्ही ग्रंथांना जर डिसमिस करू पाहता, तर लोकांनी तरी तुमची मते का एंटरटेन करावीत? वैचारिक शिस्तीची अशी एकतर्फी अपेक्षा तुम्ही का करता हा मला फार आधीपासून पडलेला प्रश्न आहे. अशी अपेक्षा करणं हे अनफेअर आहे हे तुम्हांला जाणवत नाही का?
न वाचता, जराही न तपासता
न वाचता, जराही न तपासता तुम्ही ग्रंथांना जर डिसमिस करू पाहता, तर लोकांनी तरी तुमची मते का एंटरटेन करावीत? वैचारिक शिस्तीची अशी एकतर्फी अपेक्षा तुम्ही का करता हा मला फार आधीपासून पडलेला प्रश्न आहे. हे अनफेअर आहे.
मते एंटरटेन करावीत असाही माझा आग्रह नाही. मी तो कधीच केला नाही. तुम्हाला मी 'जे मत' लिहिले आहे ते "बिना वैचारिक शिस्तीचे", "निरक्षर", "बिना अनुभवाचे", "खोटारडे", "अनव्हेरिफाइड" इ इ वाटत असले तर क्षुक्ष्क्षा आहे म्हणून दुर्लक्ष करा ना. मी कधी आग्रह धरला कि माझेच मत खरे आहे नि ते सर्वांनी मानावे? तुमचा अनुभवसंच, माझा अनुभवसंच; तुम्हाला प्रभावित करणार्या गोष्टी, मला प्रभावित करणार्या गोष्टी; सत्य प्रस्थापित करण्याची तुमची शैली, माझी शैली या गोष्टी वेगळ्या असू शकतात.
आता एकतर्फीपणाबद्दल. माझा कोणताही विचार (अगदी वैज्ञानिकही, सामाजिक तर असोच) मी (वा कोणीही?) 'अबसॉल्यूट टर्म्स मधे' सिद्ध तर करू शकत नाही. मग कितीतरी गृहितके करावी लागतात, नि सीमा आखाव्या लागतात. बर्याचदा 'तत्व' शोधायला जाताना प्रचंड 'वर्तुलीय संदर्भ' येतात. ते मला नॉनप्लस करतात. म्हणून मला कोणतेही पक्के मत बनवायला फार अवघड पडते. तेव्हा मी एखाद्याचे एखादे पक्के मत पाहून त्या पक्केपणाची कारणे विचारतो. मी समोरच्याला त्याच पेचात पकडायचा प्रयत्न करतो ज्या पेचात मी जाऊन आलो आहे. अर्थात मला एंटरटेन करायचे कि नाही नि कधी एक्झिट मारायची याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असते, पण मी स्वतःच थोडीच म्हणणार एक्झिट मार म्हणून? माझ्या अशा प्रश्नशैलीमुळे पुढच्याला मी एकतर्फी वैचारिक शिस्तीची अपेक्षा कर्तोय असे वाटते.
उदा. विवाहांना अभिप्रेत अशी लैंगिक निष्ठा योग्य मानलेली असावी का नसावी चे उत्तर मी "असावी" असे देतो. कारण "परंपरा" असे देतो. आणि नसावी असे म्हणणार्या पुढच्याला "का नसावी" असा विचार करताना नसावी असा विचार करताना मीच जिथे थकलो होतो तिथून पुढचे प्रश्न विचारतो. अर्थातच ती टेरिटरी माझ्याही परिचयाची नसते. मग वैचारिक शिस्त इ इ अवघड पडते.
सध्याला इथे मी डोळ्यांनी पाहिलेले जग, चिंतातुर यांनी पाहिलेले जग, तुम्ही (पुस्तकांत?) पाहिलेले जग, तिन्ही वेगळे आहे म्हणू नि रजा घेऊ.
उदा. विवाहांना अभिप्रेत अशी
उदा. विवाहांना अभिप्रेत अशी लैंगिक निष्ठा योग्य मानलेली असावी का नसावी चे उत्तर मी "असावी" असे देतो. कारण "परंपरा" असे देतो. आणि नसावी असे म्हणणार्या पुढच्याला "का नसावी" असा विचार करताना नसावी असा विचार करताना मीच जिथे थकलो होतो तिथून पुढचे प्रश्न विचारतो. अर्थातच ती टेरिटरी माझ्याही परिचयाची नसते. मग वैचारिक शिस्त इ इ अवघड पडते.
अपरिचित टेरिटरी आणि वैचारिक शिस्त यांचा नक्की काय संबंध आहे? एखादा विषय परिचयाचा नसला तर वैचारिक शिस्त पाळणे अवघड का पडावे हे समजत नाही.
बाकी चालू द्या. दरवेळेस वर्तुलीय संदर्भ येतातच असेही नाही.
आदिवासी दारू पीत नसतील तर
आदिवासी दारू पीत नसतील तर छत्तीसगड इ. भागात मोहाची फुले घेऊन त्यांपासून दारू बनवणारे एलियन असावेत.
पेशवेकाळात गावोगावी कलाल नामक दारू बनवणारा प्राणी असे. तिकडे पेशवे कधी गेल्याचे ठाऊक नाही. कामगार आणि शेतकरी इतर सर्वांसोबत जात असत.
पण येस, तुमच्या फँटसीतल्या भारतातले लोक पीत नसत. प्रत्यक्ष भारतातले पीत असले तरी त्यामुळे फँटसीचे महत्त्व कमी होत नाही.
भारतीत शेतकरी दारू पितो
भारतीत शेतकरी दारू पितो (म्हणजे प्यायचा. आता खेड्यांतल्या वाईट स्थितीमुळे वैषम्य नि व्यसनाधिनता प्रचंड वाढली आहे. १९८० च्या दशकात जे दुष्काळ पडले, लोकसंख्या वाढली तेव्हा हे व्यसन एक्सपोनेंशियली वाढत होते हे मी स्वतः पाहिले आहे. पण ती आता संस्कृती म्हणणार का?) असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर कोपरापासून नमस्कार. शेतकर्यांच्या बायका पितात म्हणायचे असेल तर दंडवत. तुम्हाला नि तुम्ही ज्या हिरोंची पुस्तके वाचता त्यांनासुद्धा.
काही कामगार (खासकरून शहरी कारखान्यात्ला, ग्रामीण शेतातला नव्हे) दारू पितात म्हणता यावे. त्यांना पिळल्याने वैतागून फ्रस्टेशन काढण्यासाठी ते तसे करतात. पण हा देखिल सांस्कृतिक ट्रेंड नव्हे.
मी उदगीरला असताना, ११वी नि १२ वीला, गावापासून ५-६ किमीवर असलेल्या आदिवास्यांच्या शाळेत जाऊन १-२ तास शिकवत असे. तिथे त्यांच्याशी नि त्यांना भेटायला येणार्या कितीतरी पालकांशी मी चिक्कार गप्पा केल्या आहेत. दारू पिण्याचा ट्रेंड हा नविन आहे, नि नव्या जगाशी जुळवून घेण्याची शक्ती कमी पडल्याने तो लोकांना जुडला आहे असे जाणवते. छत्तिसगडच्या बर्याच लोकांशी मी बोललो आहे. शस्त्रे, दारू, इ इ हे सगळे पुन्हा नव्या जगरहाटीत मागे पडल्याच्या वैफल्याने आले आहे. ईशान्य भारताच्या देखिल आदिवास्यांचा हाच प्रकार आहे. मी लहान होतो तेव्हा माझे कितीतरी वडार, धनगर, पारधी, मांग, इ मित्र होते. ब्राह्मणांइतका सभ्यपणा त्यांचेकडे नव्हता असे मानले तरी त्यांची कौटुंबिक वागणूक प्रचंड चांगली होती. 'दारू प्यायची नाही / नसते' हा क्लिअर नियम असे. पण जे कॉन्स्पिक्यूअस आहे ते दिसते. ते भांडी, इ दुरुस्त करणारे भटके लोक गावात येतात. दिवसभर कष्ट करतात. रात्री त्यांच्यातला एक प्रचंड दारू पितो, गोंधळ घालतो, गाव डोक्यावर घेतो नि एक माणूस म्हणतो - "ते पहा घिसाडी , दारू पितात नि गोंधळ घालतात." (लक्ष्मणशास्त्री अशा कमेंटेटरच्या शेजारी थांबले असणार).
भारतीय शेतकरी, कामगार, आदिवासी, इ इ नि त्यांच्या बायका दारू पितात म्हणणे मंजे टोटल वाह्यातपणा आहे. ईश्वर असे म्हणणारास माफ करो.
संस्कृतीची व्याख्या करताना
संस्कृतीची व्याख्या करताना तुमचीच काहीतरी गफलत होते आहे. एकीकडे राजे आणि पुराणातली व्यक्तिमत्त्वं जे करतात, ते नाकारायचं. कारण त्यांचा लोकांशी संबंध नाही. आणि मग लोक जे करतात, तेही 'तणावापोटी करतात, नाहीतर 'खरीतर' ती संस्कृती नव्हेच' असं म्हणून नाकारायचं.
मग संस्कृती ठरवतं तरी कोण?
माझ्या मते संस्कृती म्हणजे धर्मशास्त्रातले नियम किंवा नीतिशास्त्र नव्हे. संस्कृती म्हणजे लोकांची घडती-मोडती-बिघडती-वाढती-जुळवून घेत जगती जीवनपद्धती. तुमच्या मते संस्कृती म्हणजे काय?
निकष, एक्स्क्ल्युझिव्हिटी आणि...
>> शेतकर्यांच्या बायका पितात म्हणायचे असेल तर दंडवत.
>> मी उदगीरला असताना,
>> छत्तिसगडच्या बर्याच लोकांशी मी बोललो आहे.
>> ईशान्य भारताच्या देखिल आदिवास्यांचा हाच प्रकार आहे.
>>मी लहान होतो तेव्हा माझे कितीतरी वडार, धनगर, पारधी, मांग, इ मित्र होते.
मुळात भारतीय संस्कृतीत काय बसतं हे ठरवण्यासाठी तुमचे निकष नक्की काय आहेत ते तपासणं रोचक ठरावं. भारतासारख्या अठरापगड समाजामध्ये एकाच वेळी विविध संस्कृती नांदतात, पण त्यामुळे अनमानधपक्यानं सरसकटीकरण करायला गेलं तर तोंडघशी पडायला होतं. उदाहरणार्थ, शाकाहारी असणं ही भारतीय संस्कृती आहे का? जर पुरेसे शाकाहारी आपल्या आसपास असतील, तर आपण हो म्हणू; पण पुरेसे मांसाहारीही असले तर काय करावं? मग शाकाहार आणि मांसाहार दोन्ही भारतीय संस्कृतीत बसतात असं म्हणता यावं का? एक असलं तर दुसरं नाहीच असं काही एक्स्क्ल्यूजिव्ह म्हणायची गरज आहे का?
'भारतीय शेतकरी दारू पितात' हे विधान ह्या पार्श्वभूमीवर कोणत्या अर्थानं घ्यावं? १००% शेतकरी दारू पीत असतील तरच ते खरं अन्यथा खोटं असं काही आहे का? मी माझ्या लहानपणापासून शेतात राबणारे कष्टकरी मजूर पाहिले आहेत. दिवसभर अंग मोडेपर्यंत काम केलं की थोडी तंबाखू चोळत नाही तर विडी ओढत माडी/देशी जे काय मिळेल ते पिऊन थोडंसं बधीर व्हायला ज्यांना आवडे असे अनेक त्यात होते. आणि त्यांच्या कष्टकरी बायकांनासुद्धा ते आवडत असे. हाच प्रकार नंतर मी केरळातदेखील पाहिला. अशाच एका कष्टकरी कुटुंबात वाढलेला माझा एक मित्र वडील गेल्यानंतरच्या काळात विधवा आईला रोज एक चपटी आणून देत असे. तो स्वतः अजिबात पीत नाही, पण त्याच्या दृष्टीनं हे नॉर्मल होतं. दारू ही आईची गरज होती, पण गुत्त्यात जाऊन प्यायचं तिचं वयही नव्हतं आणि संध्याकाळी पतीबरोबर घरात पिणं ही तिची रीतभात होती; गुत्ता त्यात बसत नव्हता. हे सगळं पाहिल्यावर माझ्या जर काही लक्षात आलं असेल तर ते हे, की ब्राह्मणी नागर समाजात जगणारी पांढरपेशा माणसं आणि त्यांची मूल्यव्यवस्था ह्यापेक्षा कष्टकरी लोकांची मूल्यव्यवस्था वेगळी असते. ह्या दोन्ही एकाच वेळी आपल्या देशात नांदत असतात. अमुक एकच भारतीय संस्कृतीत बसतं आणि त्याच्या विरुद्ध वर्तन बसतच नाही असं म्हणणं म्हणजे एक प्रकारचं फॅसिझम आहे, कारण ते कोणा एकाचं अस्तित्व असंस्कृत ठरवतं.
१. चिंजंचा हा प्रतिसाद
१. चिंजंचा हा प्रतिसाद पद्धतशीर प्रतिवाद, रादर संवाद, करण्याचे एक चांगले उदाहरण आहे.
२. मुळात भारतीय संस्कृतीत काय बसतं हे ठरवण्यासाठी तुमचे निकष नक्की काय आहेत ते तपासणं रोचक ठरावं.
अख्खी भारतीय संस्कृती खूपच मोठा विषय आहे. पण इथे तरी लोकसंख्येच्या, राहणीच्या दबावाखाली येण्यापूर्वीचा काळ, पाश्चात्यांच्या दारूच्या सामान्य मानण्याच्या/ग्लोरिफिकेशनच्या पूर्वीचा काळ नि (बॅटमॅनला त्याच्या गद्ध्धेपंचवीशीतील निष्कर्षांची पद्धत इथे न आणायची विनंती करून) धार्मिक लोकांची परंपरागत 'देव अमृत पितात, राक्षस मदिरा पितात' असे मानायचा काळ असे म्हणेन.
'भारतीय शेतकरी दारू पितात' हे विधान ह्या पार्श्वभूमीवर कोणत्या अर्थानं घ्यावं?
३. ऐसीवर मी अगोदर विधाने करताना ०%, ५%, १०%, ते ८०%, ९५% व १००% असे आकडे टाकी. काही, बरेच, सगळेच, इ इ शब्द लिहिण्यापेक्षा मी तसे लिहित असे. "हिंदू अतिरेकी असतात." हे विधान घ्या, म्हणणाराला '१००% हिंदू अतिरेकी असतात' असे म्हणायचे आहे कि 'हिंदू अतिरेकी नसतातच असे नाही' असे म्हणायचे आहे हे कळत नाही. हे भाषेचे दौर्बल्य आहे. (माझ्या अशा आकड्यांवर प्रचंड जोक व्हायचे. तुम्ही सर्वे कधी केला? इ इ.)
अमुक एकच भारतीय संस्कृतीत बसतं आणि त्याच्या विरुद्ध वर्तन बसतच नाही असं म्हणणं म्हणजे एक प्रकारचं फॅसिझम आहे, कारण ते कोणा एकाचं अस्तित्व असंस्कृत ठरवतं.
याच्याशी विशेष सहमत, किमान विदा नसताना. हे पुरोगाम्यांना नि माध्यमांना देखिल लागू व्हावे. मंत्र्यांना त्यांच्या संस्कृतीच्या धारणेसाठी इतकं झोडायची गरज नव्हती. शिवाय तृणमूल कॉग्रेसच्या खासदाराशी तोलायची गरज नव्हती. तो गाडीच्या टपावर थांबून अत्यंत चिथावणीखोर आवेशात 'माझ्या राजकीय विरोधकांच्या स्त्रीयांवर बलात्कार करायला माझी मुले मोकाट सोडेन", इ इ बोलत होता. त्याचे नाव गोव्याच्या मंत्र्याच्या सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही.
बाय द वे, काल गोव्याचे मंत्री म्हणाले कि माझ्या सांस्कृतिक दृष्टी इतरांवर लादणे चूक आहे, सबब मी विधान मागे घेतो.
आबाजी, राज्यकर्ते नि सामान्य
आबाजी,
राज्यकर्ते नि सामान्य लोक यांचे वर्तन फार भिन्न असते म्हणण्यात चूक काय आहे? जयपूरच्या आमेर किल्ल्याला जाल, तिथची शेजारची एक गढी देखिल पाहायला लोक सांगतील. ती म्हणे एका राजाने त्याच्या ९९ राण्या ठेवण्यासाठी बांधली होती. गाईड त्या गढीच्या कितीतरी गोष्टी नि त्या राजाच्या कितीतरी 'सवयी' बद्दल माहिती देईल. ते काय सामान्य राजस्थानी माणसाचे वर्तन आहे का? कॄष्ण (एकतर देव, वर राजा, वर काल्पनिक) त्याचे उदाहरण देऊन भारतीय लोक पारंपारिक रित्या दारू पीत होते असे म्हणणे चूक नसावे काय? नि आपण या व्यसनाच्या व्याप्तीबद्दल बोलतोय ( दारू भारतीयांना माहित होती कि नाही, इ नाही). मेघनाला असे उत्तर दिले तर आपणांस त्यांत इनेब्रिएटेड काय वाटले?
गावातल्या कलालावरचा टॅक्स रेट
गावातल्या कलालावरचा टॅक्स रेट लावणारे नोटीफिकेशन पाहून बहुसंख्य गावकरी दारू पित असा अर्थ काढणार? गावात पाटील, तलाठी, पोलिसपाटील, कुलकर्णी, इ इ लोक दारू पित असतील. शेतकरी, कामगार नि आदिवासी ग्राहक होते असे दाखवणारे कागद सुद्धा आहेत का?
डोळ्यावर झापड वैगेरेची भाषा नको. कोणत्याही आकड्याचा काहीही अर्थ काढता येत नाही.
शेतकरी आणि कामगार लोक दारू
शेतकरी आणि कामगार लोक दारू पीत नव्हते असे तुम्ही सिद्ध करा. तसा दावा तुम्ही केलेला आहे, सबब बर्डन ऑफ प्रूफ तुमच्यावर आहे. तुमच्या संपर्कातली चार टाळकी जे करीत तेच्च सगळीकडे होत असे हा युक्तिवाद 'उदगीरमध्ये बर्फ पडत नाही, सबब काश्मीरमध्ये बर्फ पडूच कसे शकते?' या युक्तिवादाइतकाच रोचक आहे.
दावा-मग तो होकारात्मक असो अथवा नकारात्मक-करणार्यावरच बर्डन ऑफ प्रूफ आहे. तुम्ही दिलेला विदा अपुरा आहे. पुढं बोला.
बाकी कोणत्याही आकड्याचा मनःपूत अर्थ लावायचे तुमचे स्वातंत्र्य मान्य आहेच, फक्त तसे ते इतरांनाही असावे, इतकाच मुद्दा आहे.
ठिक आहे. जी सिद्धता द्यायची
ठिक आहे. जी सिद्धता द्यायची आहे ती -
१. कोणत्या भौगोलिक क्षेत्रासाठी द्यायची आहे?
२. किती काळ? इस किती ते किती?
३. किती टक्के लोक दारू न पिले तर तुम्ही 'लोक दारू पीत नव्हते म्हणणार?'. (म्हणजे, १% वैगेरे पीत होते म्हणायचे असेल तर अगोदरच मान्य आहे.)
४. दारू कशाला म्हणायचे?
५. किती दारू पिली तर दारू पिली म्हणायचे (औषधासाठी बनवलेली दारू दारू मानू नये म्हणालो तर तुम्हाला ते रोचक वाटायचे म्हणून अगोदरच विचारतोय.)
६. शेतकरी कोण?
७. कामगार कोण?
८. सिद्धतेची मेथडॉलॉजी काय? मंजे नंतर ऑब्जेक्शन नको. बर्फ , काश्मिर, वैगेरे.
बायकांनी दारू पिणे ही भारतीय
बायकांनी दारू पिणे ही भारतीय संस्कृती नाही या मंत्र्यांच्या विधानाला माझा दुजोरा आहे. माझे हे विधान खोडण्याच्या नादात - भारतीत शेतकरी दारू पितात - असे म्हणायचे असेल तर मला आपत्ती आहे. कारण याचा पुरेसे शेतकरी परंपरागत रित्या असे करत आहेत असा त्याचा अर्थ आहे.
ठ्ठो!! मुद्दाम हंपीचे उदा
ठ्ठो!!
मुद्दाम हंपीचे उदा दिले होते, जिथे खास सामान्य लोकांची शिल्पे आहेत!(वैट्ट दुष्ष्ट) ऋ
मी वा कोणी एक - मागचा जमाना वाईट तर शिल्पातल्या बायका इतक्या गुबगुबित कशा?
राजेश घासकडवी - आपल्या काळात भरभराट होती असे इंप्रेशन द्यायला कोणाही राजाला आवडेल.
---------------------------------------------------------------------
मी - कमी कपडे, इ आपली संस्कृती नाही.
ऋषिकेश - हंपीची शिल्पे पाहा
-----------------------------------------------------------------------
शेवटी काय, तुम्ही पुरोगामी असलं पाहिजे. मग चीत भी मेरी, पट भी मेरी.
बरोब्बर
अहो ही चोट्टी, भिकारडी पुरोगामी मंडळी उद्या साठ आणि सत्तरच्या दशकातील बॉलीवूड पिक्चरांचा उल्लेख करत तेव्हा बहुतांश मुली प्यांट, हाफ प्यांट घालत असा दावा करतील. परिस्थिती काय होती ?
सआठ आणि सत्तरच्या दशकात कैक स्त्रिया भारतात नियमित साडीत वावरत. काहीठिकाणी पाचवारी की नऊवारी हा वाद असेल;
पण एकूणातच साडीचे प्राबल्य होते. ते चित्रपटात दिसते का ? चित्रपटात सरळसरळ ह्या बायका प्यांट किंवा हाफ प्यांट घालून फिरतात. तस्मात् ह्यांच्या दाव्याकडे दुर्लक्ष करत तुम्ही खिंड लढवत रहा. तुमच्या म्हणण्यात तथ्य आहेच.
सोमरस म्ह. सोम उर्फ एफीड्रा
सोमरस म्ह. सोम उर्फ एफीड्रा नामक वनस्पतीची खोडे वेगळी करून, त्यांचा पाण्यात काढलेला अर्क होय. तो अंमळ उत्तेजक असतो. नॉट एग्झॅक्टलि दारू. पण इफेक्ट तत्सम असतो जरा. अन ही वनस्पती फक्त उत्तरपश्चिम भागातच मिळते. अन्यत्र यज्ञ इ. मध्ये वापरायचे झाले तर फर्जी सोम म्हणून दुसरी कैतरी वनस्पती वापरतात.
दारू न पिणे ही भारताची
दारू न पिणे ही भारताची संस्कृती?
किंतु मद्यं स्वभावेन यथैवान्नं तथा स्मृतम्|
अयुक्तियुक्तं रोगाय युक्तियुक्तं यथाऽमृतम्|| वाले वैद्य बहुतेक युरोपियन असावेत.
भारतातील मद्यसंस्कृतीबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोश्यांचा लेख वाचा, असले वेडगळ गैरसमज दूर होतील.
राहता राहिलं तोकड्या कपड्यांबद्दल...गुडघ्यापर्यंतच साडी नेसणे हे कैक जातींत पाहिले आहे. त्या स्त्रिया बहुधा भारतीय नसाव्यात.
बाकी पंगा वगैरे सोडा, किमान सामान्यज्ञानही अपडेट न करणे याला काय म्हणावे तेवढं सांगा.
भारतातील मद्यसंस्कृतीबद्दल
भारतातील मद्यसंस्कृतीबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोश्यांचा लेख वाचा, असले वेडगळ गैरसमज दूर होतील.
मी कोण्याही शास्त्र्याच्या बोलण्यात येत नाही.
राहता राहिलं तोकड्या कपड्यांबद्दल...गुडघ्यापर्यंतच साडी नेसणे हे कैक जातींत पाहिले आहे. त्या स्त्रिया बहुधा भारतीय नसाव्यात.
नागालँड मधे आजही काही जमाती पूर्ण नागड्या राहतात. इथे नग्नता ही त्यांची संस्कृती आहे असा शोध लावाल काय? कपड्यांचा एक शोध लागला, त्यात इथल्या लोकांनी रस दाखवला नाही/ गरज पडली नाही/ भूभाग तूटक होता, इ इ कारणे आहेत.
बाकी पंगा वगैरे सोडा, किमान सामान्यज्ञानही अपडेट न करणे याला काय म्हणावे तेवढं सांगा.
भारतीत ऐतिहासिक काळात सामान्य लोकांचे वर्तन कसे होते याचे कुठेही डॉक्यूमेंटेशन नाही. असले तर फारच कमी. त्यातले चार संदर्भ दिले म्हणजे संस्कृतीचे ज्ञान झाले असे होत नाही. सत्ता, विकास, साधने, विज्ञान यांची पोहच फार कमी लोकांपर्यंत असते. मागे तर अजूनच कमी.
मुद्दा
माझा मुद्दा वरील ऋ, बॅट्या, व काही प्रमाणात मेघना ह्यांच्यापेक्षा जsssरा वेगळा आहे.
"पहा. संस्कृतीत मद्यप्राशन आधीपासूनच होतं." अशा धर्तीचं काहीतरी ते मांडू पहात आहेत.
माझं म्हणणं :-
समजा संस्कृतीत नाहिये. मी म्हणतो अजिबातच नाहिये.
ठीक आहे.
पण म्हणून एखादी गोष्ट चूक कशी ?
(मेघनानं संस्क्रुती गेली गाडह्वाच्या गावात वगैरे म्हटलय; त्यात तिला हेच म्हणायचं असावं.)
तंतोतंत सहमत. शिवाय संस्कृती
तंतोतंत सहमत.
शिवाय संस्कृती हे माझ्या जगण्याचं बायप्रॉडक्ट आहे. त्याचं काय बरंवाईट होतं का, होतं की नाही याच्याशी मला घेणंदेणं नाही. मला जगण्याशी, सुखात-मनापासून जगण्याशी देणंघेणं आहे. त्यासाठी लागतील त्या निवडी मी करते, त्याचे परिणाम भोगते.
थोडक्यात - संस्कृती गेली गाढवाच्या गावात!
मी चूक आहे कि नाही याबद्दल
मी चूक आहे कि नाही याबद्दल बोललो नाही. त्यानं असं आवाहान केलं तर इतकी कावकाव का? साला, दारू पिणे चूक आहे हे डो़क्टर बोंबलून सांगत असताना त्या मंत्र्यावर टिका करणे ही काय मानसिकता आहे? धर्म आणि वि़ज्ञान एक आवाहान करत असताना अशी नक्की कोनती खाज आहे ज्यामुळे दारू न पिण्याचे आवाहान मागास वाटत आहे?
माझा हेतू मंत्र्याला झोडायचाच
माझा हेतू मंत्र्याला झोडायचाच होता, हे तुम्ही कस्काय बुवा ठरवलंत? आहात खरे सर्वज्ञ. ;-)
गुबगुबीत बायका दिसल्या की काळ उत्तम, कृष्णाचं उदाहरण गैरसोईचं झालं की राजसंस्कृती नि लोकसंस्कृती निरनिराळी, झालंच तर तुमच्या ओळखीतले चार शेतकरी दारू पीत नाहीत, म्हणजे यच्चयावत भारतीय जनता दारूबंदी पाळणारी, बरं - कुणी वेगळं उदाहरण दिलंच तर ते आपलं अपवादात्मक...
मजेत गेला बाकी दिवस!
माझा हेतू मंत्र्याला झोडायचाच
माझा हेतू मंत्र्याला झोडायचाच होता, हे तुम्ही कस्काय बुवा ठरवलंत? आहात खरे सर्वज्ञ.
हे म्हणण्यापूर्वी त्या मंत्र्याला आपण किती झोडलं आहे ते पहा ना इथेच वाचून. (त्याच्या निमित्ताने मला किती झोडून झालं हे ते पाहा.) त्याने न म्हटलेल्या गोष्टी त्याला म्हणायच्या असतील, असे म्हणणारे लोक असे असे सुद्धा म्हणतात (इंटरनेट्वरच्या जाहिरातीप्रमाणे)असे म्हणून त्याच्या तोंडी घुसडल्या आहेत. You have made a criminal out of a conservative.
गुबगुबीत बायका दिसल्या की काळ उत्तम,
याचा संदर्भ लागलेला नाही दिसतोय. पण ते असो. दोन पुरोगामी तेच निरीक्षण किती विचित्रपणे वापरतात, इतकंच सांगायचं आहे. पुरोगामी घासकडवी म्हणतात - जुना काळ वाईट. प्रत्यक्ष बायका वाळकूट्या असताना आपल्या राज्याची कीर्ती इतिहासात चांगली राहावी म्हणून राजांनी गुबगुबित लेण्या बनवल्या. पुरोगामी ऋषिकेश म्हणतो - पहा त्या लेण्या नि त्यांचे कपडे इ इ (म्हणजे त्यांच्याशी निगडीत शिल्पलेल्या गोष्टी सत्य आहेत). सामान्य लोक कमी कपडे घालत असे कसे म्हणता?
बाय द वे, गुबगुबित बायका असतील तर तो काळ दुष्काळाचा, इ नसतो.
कृष्णाचं उदाहरण गैरसोईचं झालं की राजसंस्कृती नि लोकसंस्कृती निरनिराळी,
शेवटी मुद्द्यात दम असेल तर उदाहरण देईल.
झालंच तर तुमच्या ओळखीतले चार शेतकरी दारू पीत नाहीत,
चार लोकांवरून भारताबद्दलचा निर्णय काढायची कोणाची बुद्धी आहे असा मला थोडासाही संशय असता तर मी त्या व्यक्तिशी हुज्जत घालण्याचा मूर्खपणा केला नसता. You better ask me the domain size before declaring it on my behalf without my consent.
म्हणजे यच्चयावत भारतीय जनता दारूबंदी पाळणारी,
चर्चा भारताच्या पारंपारिक सांस्कृतिक मूल्यांबद्दल चालली आहे.
मजेत गेला बाकी दिवस!
याच्याशी विशेष सहमत.
लोकांच्या बुद्धिमत्तेबद्दल
लोकांच्या बुद्धिमत्तेबद्दल निष्कर्ष काढण्याच्या पातळीपर्यंत
यात चूक काय आहे? म्हणणारार्याच्या बुद्धीचे काय असेसमेम्त आहे हे पाहूनच त्याच्या बोलण्याला महत्त्व दिले जाते.
बायकांच्या गुबगुबीतपणावरून समृद्धीचे निकष ठरवण्याच्या पातळीपर्यंत
यातही काय चूक आहे? जिथे सुदृढ , हट्टेकट्टे लोक असतात ते भाग समृद्ध असतात. प्रगत देशांचे आफ्रिकेशी अशीच तुलना होते.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आपल्यालाही
नै म्हणजे बाकीचं ठीके, पण इथे
नै म्हणजे बाकीचं ठीके, पण इथे तुम्हांला कृष्णाचं उदा. गैरसोयीचं वाटतंय. द्रौपदीचं उदा. मात्र सरसकट भारतीय समाजाला लागू करू पाहत होता ते? तेव्हा कोठे गेलं होतं तुमचं लॉजिक?
जर एका कृष्णाच्या उदा. वरून अख्खी भारतीय जन्ता दारू पीत होती असे सिद्ध होत नसेल तर मागे एका द्रौपदीच्या उदा. वरून अख्ख्या भारतीयांना बहुपतीकत्व मान्य आहे हे तुम्ही सिद्ध का करू पाहत होतात?
आणि म्हणे लॉजिक आणि कन्सिस्टन्सी..किस खेत के मूली का नाम है?
भारतीत ऐतिहासिक काळात सामान्य
भारतीत ऐतिहासिक काळात सामान्य लोकांचे वर्तन कसे होते याचे कुठेही डॉक्यूमेंटेशन नाही. असले तर फारच कमी. त्यातले चार संदर्भ दिले म्हणजे संस्कृतीचे ज्ञान झाले असे होत नाही. सत्ता, विकास, साधने, विज्ञान यांची पोहच फार कमी लोकांपर्यंत असते. मागे तर अजूनच कमी.
कमी डॉक्युमेंटेशन असले म्हणून तुमची सरसकट विधाने खरी ठरतात हे तरी कशावरनं?
नागालँड मधे आजही काही जमाती पूर्ण नागड्या राहतात. इथे नग्नता ही त्यांची संस्कृती आहे असा शोध लावाल काय? कपड्यांचा एक शोध लागला, त्यात इथल्या लोकांनी रस दाखवला नाही/ गरज पडली नाही/ भूभाग तूटक होता, इ इ कारणे आहेत.
समजा नग्नता ही त्यांची संस्कृती आहे असे म्हटले तर चुकले काय त्यात? भारतात आलूपराठा खातात, पण तो गेल्या ४०० वर्षांतच इंट्रोड्यूस झाला. त्याच्या आधी ती संस्कृती नव्हती, नंतर झाली.
बाकी बिनबुडाची आणि सरसकट विधाने करून खळबळ निर्माण करणे ही कुठली संस्कृती म्हणावी याचा विचार करतो आहे.
पण हर्कत नाही, बिनबुडाचं असलं तरी कल्पनारंजन करण्याचं तुमचं स्वातंत्र्य मी पूर्ण मान्य करतो. कोण आहे रे तिकडे, अरुणजोशींना काहीही बोलायचं नाही!!!!
म्याट्रिक्सनिवासाची नीलगुलिका सेवून एकदा शांत झोपले की सत्य दाखवू नये, माणसावर वैट्ट परिणाम होतो हे रा.रा. मॉर्फियसभाऊ झायनकर यांचे म्हणणे चिंतनीय आहे खास.
नाय हो. हाफिसमधे काम करून काय
नाय हो. हाफिसमधे काम करून काय फायदा नाय. महामुश्किलीने प्रोजेक्ट डेवलप करायचा. मग साला तो रखडणार. dropped - cancelled - on hold - postponed - under evaluation काय ना काय होणार. आता हे नाही झालं तर पर्मिटसवाले, पर्यावरणवाले, आर टी आय वाले, पी आय एल वाले, एन जी ओ वाले ओ कि ठो न कळत असताना त्याची वाट लावणार. म्हणून तिकडे लक्ष कमी केले आहे.
नि डोन्ट वरी, मी किल्ले अगदी आरामात लढवत असतो, जिकरीला वैगेरे येत नाही. पुरोगाम्यांचे लॉजिक नि कंसिस्टंसीशी प्रचंड वाकडे असते. म्हणून जिकरीला यायची गरज नसते. जो लॉजिकल नि कंसिस्टंट पुरोगामी असतो, त्याची मते आपल्याला पहिल्यापासूनच मान्य असतात.
!
अजो तेवढे कन्सिस्टंट आणि बाकीचे तेवढे इन्कन्सिस्टंट
'कन्शिष्टन्सी इज़ द व्हर्च्यू ऑफ अॅन अॅस' असे एमर्सन नावाचा साहेब म्हणून गेला म्हणे. 'कन्सिस्टंट' म्हणून संभावना करून त्यांची तुलना गाढवाशी करून तुम्ही गाढवाचा अपमान करू पाहत आहात!
ताबडतोब क्षमा मागा, अशी गाढवांचा वकील या नात्याने मी आपणांस मागणी करतो.
मंत्र्यानी संस्कृती पाळा असे
मंत्र्यानी संस्कृती पाळा असे आवाहान केले आहे
आमच्यात कुत्री वगैरे पाळतात ब्वा.
बाकी जोशींनी काही तरी बडवावे, अन मग त्यांचीशी खाजवायची काहींची खाज अन त्यानिमित्ताने निघणारे धागोपधागे = ऐसी असे समिकर्ण (गजकर्ण सारखे वाचावे) माझ्या मनात पक्के होऊ लागले आहे.
जुन्या ग्रंथांना इथे निकालात
जुन्या ग्रंथांना इथे निकालात काढणारे अरुणजोशी, मागे एका धाग्यात द्रौपदीच्या एका उदा.वरून भारतीयांना बहुपतीकत्व मान्य आहे असा जावईशोध करू पाहत होते त्याकडे त्यांचे स्वतःचेच सोयीस्कर दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे 'चार लोकांवरून अख्ख्या भारताबद्दल विधाने करायचा मूर्खपणा' इ.इ. त्यांच्या प्रतिसादातली वाक्ये त्यांना स्वतःलाच लागू होताहेत हे रोचक आहे.
(आता अजूनेक बिनबुडाचा हेत्वारोप तरी होईल किंवा एखादा मेगाबायटी त्रागात्मक/सेल्फराइचस प्रतिसाद तरी येईल. पण ही इन्कन्सिस्टन्सी आहे त्याला काय करणार?)
Well, this is what I exactly
Well, this is what I exactly said -
1. It is fact that most Indians rever the Mahabharat for thousands of years.
2. Most people consider Draupadi as goddess or heroin on the right side.
3. Traditionally, people don't use foul words for her, rather they worship her.
4. Here I am not talking about the history of some Indian royalty, etc, etc.
5. I am talking about how ordinary people of India have behaved (thought about a woman married to many men) which (the behavior) does not need a proof.
यात जावईशोध काय आला? आजही द्रौपदीला घाण शब्द वापरत नाहीत. मागेही वापरत नसत. मग जावईशोध / सूनशोध कोनता?
हा हा हा. सगळं सांगितलं पण
हा हा हा. सगळं सांगितलं पण याचा निष्कर्ष तुम्ही काय काढलात ते नै सांगितलं ना.
I am talking about how ordinary people of India have behaved (thought about a woman married to many men) which (the behavior) does not need a proof.
एका बाईबद्दल भारतीयांचा असा विचार होता म्हणून इन जनरलही बहुपतीकत्वाबद्दल भारतीय लोक ओपन होते/असतील हाच तुमचा जावईशोध होता.
हे आता कबूल करवत नसेल तर नसूदे. पण सत्य हेच होते.
तिथे असे सपोजवून, इथे मात्र कृष्णाच्या उदा.ला 'राजेशाही' म्हणून झिडकारता! द्रौपदी अन पांडव काय दलित होते का?
हा तुमचा वरिजिनल प्रतिसाद पहा.
http://www.aisiakshare.com/node/2315#comment-38507
आणि बहुपतीत्व /बहुपतनीत्व, त्यांची स्वीकृती/अस्वीकृती, त्यांचा न्याय/ अन्यायकारकपणा हाच विषय चर्चायचा. नाहीतरी चर्चा अर्थेहिन होईल.
आणि मुद्दा लक्षात घ्या -'प्राचीन काळापासून आजतागायत भारतीय लोक बहुपतीत्वाची घृणा करतात. लिबरल नाहीत.' हा मुद्दा मला खोडायचा आहे.
म्हणजे एक कौंटर एक्झांपल देऊन तुमचा मुद्दा सिद्ध जर होत असेल, तर आमच्या मुद्यानेच काय घोडं मारलंय?
असे उलटसुलट बोलून कन्सिस्टन्सीची वाट तर लावताच, शिवाय "नै नै नै, मला जे बोलायचंच नव्हतं ते माझ्या तोंडी घालता" चा जप सुरू करता, म्हणून तुमचेच शब्द इथे उद्धृत केले, बाकी काही नाही.
आता मी कसा त्रागा करतो याच्यावर तुम्ही काही मेगाबायटी निबंध लिहिले तरी ही ग्लेअरिंग इन्कन्सिस्टन्सी लपणार नाही.
अतिशहाणा यांनी म्हटलेल्या 'ही
अतिशहाणा यांनी म्हटलेल्या 'ही चर्चा आता बंद करा' शी ठळक ठशासह सहमत. चर्चा आत्यंतिक व्यक्तिगत पातळीवर उतरते आहे. एकाच सदस्याला चारपाच सदस्यांनी मिळून 'तुमचं चुकीचं आहे - हे बघा असं' हे सांगत बसण्यापेक्षा वेळीच वादातून अंग काढून घेणं सर्वांसाठीच फायद्याचं ठरतं.
धागे सुटे करावेत का?
>> धागे सुटे करण्याचा प्रकार स्पेअरिंगली वापरला जावा अशीही अपेक्षा येथे व्यक्त करतो. म्हणजे असे होण्याची शक्यता कमी होईल.
माझ्या आठवणीप्रमाणे - हा धागा सुटा करायच्या आधीही त्यावर सुमारे ४० प्रतिसाद 'ही बातमी समजली का? - २९' ह्या धाग्यावर आले होते. म्हणजे धागा सुटा करण्याआधीच दंगा सुरू झाला होता. असे धागे १०० प्रतिसादांनंतर कापून नवा धागा तसाही सुरू केला जातोच, पण 'ही बातमी समजली का?'च्या नव्या धाग्यावरही पूर्वीचे सगळे प्रतिसाद अवांतरच झाले असते. त्यामुळे ह्या बाबतीत धागा सुटा काढण्यावाचून पर्याय नव्हता असं मला वाटतं. तरीही सूचनेचं स्वागत आहेच.
च्यामारी!
च्यामारी!
तुमचा नागरी, शहरी किंवा खेडवळ गाढवपणा आणि काय काय, हवा तो गोंधळ घालून लाथा झाडा पण...
आमच्या दारू बद्दल बोलियाचा काम नाय, हा, सांगुन ठेवतोय!
अजो, कोण तो शिंचा डॉक्टर जो म्हणतो दारू पिणे चूक आहे? त्या भोxxxx माझ्याकडे पाठवा!
- (अस्सल दारूप्रेमी) सोकाजी
मंत्र्यांच्या काही वाक्यांशी
मंत्र्यांच्या काही वाक्यांशी सहमत आहे. बाकी त्या पॉलबाबाच्या रेपच्या वाक्याने ही बातमी सुरु करणे म्हणजे गाढवपणा आहे.