ऐसीवर विचारजंती कंपूबाजीचं वातावरण आहे का?
मन यांचा हा प्रतिसाद वाचला.
'काँग्रेसराज्याची कुणी भीती घेतली तर तो बिन्डोक व अकलेने कमी.
भाजपराज्याची कुणी भीती घेतली तर तो मात्र परम आदरणीय , अतिसंतुलित, थोर विचारवंत.'
हे त्यातलं कळीचं वाक्य. भाजप/कॉंग्रेस हा केवळ एक मानदंड झाला. सश्रद्ध/अश्रद्ध, प्रतिगामी/पुरोगामी (दोन्ही शब्दांना तथाकथित हे विशेषण लावून), कॉंझर्व्हेटिव्ह/लिबरल, परंपरावादी/आधुनिकतावादी या सर्वच बाबतीत ऐसीची मनोवृत्ती पुरोगामी, उदारमतवादी, लिबरल, स्त्रीवादी वगैरे दिशेला झुकलेली दिसते. याला माझी हरकत नाही. बहुतेकांची नसावी असं वाटतं. टिळक आणि आगरकर या दोघांची विचारसरणी अशीच दोन वेगळ्या दिशांकडे तोंडं केलेली होती. दोन्ही आपापल्या पद्धतीने व्हॅलिड विचारसरणी होत्या.
मात्र अनेकांना असा सेक्युलर, लिबरल, पुरोगामीपणा हा विचारजंतीपणा वाटतो. सर्वप्रथम हा शब्द समजून घ्यायला हवा. विचारवंतपणाचा आव आणणारे ते विचारजंत असा साधारण अर्थ मी काढतो. पब्लिकच्या भावना न ओळखता केवळ शब्दांचाच कीस काढणारे अशीही एक छटा आहे. एक सोयीस्करपणा, एक खोटेपणाही त्यात आहे. सोयीस्कर अशासाठी की त्यात पाश्चिमात्यांचं कौतुक आणि आपल्या पारंपारिक विचारांवर, प्रथांवर हल्ला असतोच. त्याचबरोबर आपल्या धर्मातल्या चुका जेव्हा इतर धर्मांत दिसतात तेव्हा त्यांच्याविषयी विचारजंती लोक मूग गिळून गप्प बसतात अशीही तक्रार असते. 'प्रत्येक हिंदुद्वेष्टा हा विचारवंत नसतो, पण प्रत्येक विचारवंत मात्र हिंदुद्वेष्टा असतोच' असं वाक्य इतर संस्थळावर एका सदस्याच्या सहीत अनेक वर्षं होतं. विचारजंत हे आपल्या परंपरांचा विरोध करतात इतकंच नाही तर दुस्वास करतात असा काहीसा आरोप असतो. विभूतींवर हल्ला करणं, प्रतिमाभंजन करणं यातून त्यांना एक विकृत प्रकारचा आनंद मिळतो असा काहीसा दावा असतो. 'पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारे' 'विचारसरणीचे किंवा विचारपद्धतीचे गुलाम असलेले' 'हस्तिदंती मनोऱ्यात बसणारे' वगैरे दूषणं त्यांना दिली जातात.
हे सगळं ठीक आहे. जगात कुठेतरी असे भोंदू विचारवंत असतीलही. कदाचित ऐसीवरही असतील. मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की 'ऐसीवर अशा विचारजंतांची कंपूबाजी आहे', 'श्रेणी देताना अशी कंपूबाजी दिसून येते ' 'उजव्या बाजूचे विचार मांडले तर सगळे जण सरसावून तुटून पडतात' 'परंपरा-धर्म विरोधी विचार मांडले तर तुमचं कौतुक होतं, बाजूचे विचार मांडले तर तुमची चेष्टा होते' या जातकुळीच्या तक्रारी हळूहळू, आडून आडून येताना दिसतात. त्याही मायनॉरिटीकडून. आणि अशा तक्रारी मला तरी एक व्यवस्थापक म्हणून गंभीरपणे घ्याव्याशा वाटतात. वैचारिक दुफळी असणारच, आणि असावीच. कारण जितक्या अधिक बाजूने एखाद्या विषयावर मतं मांडली जातील तितके अधिक पैलू दिसतील. एकसारखा विचार करणाची फक्त चार टाळकी एकमेकांशी बोलत राहिली आणि बाकीच्यांचा आवाजच नसला तर संस्थळाच्या प्रगतीसाठी ते उपयुक्त नाही. कोणाचंच मत चुकीचं नाही, सगळ्यांचंच बरोबर - बाबासाहेबांचंही बरोबर आणि तात्यासाहेबांचंही बरोबर - अशी मुळमुळीत, सर्वव्यापक गुडीगुडी भूमिका मला घ्यायची नाही. माझं म्हणणं बरोबर आहे असं एकमेकांना ठासून सांगताना किंचित हाणामाऱ्याही व्हायच्याच. जोपर्यंत बोचकारणं, रक्तपात, हाडं मोडणं वगैरे होत नाही तोपर्यंत कुस्त्यांचे डाव रंगायला हरकत नाही. मात्र त्याला गॅंगवॉरचं स्वरूप येणं इष्ट नाही.
ऐसीवर विचारजंती कंपूबाजीचं वातावरण आहे का?
ऐसीवर उजव्या/पारंपारिक/सश्रद्ध/कॉंझर्व्हेटिव्ह विचारसरणींचा आवाज दाबला जातो का?
ऐसीवर अशा गॅंगवॉरना सुरूवात होताना दिसते आहे का?
तसं असल्यास, वातावरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून नक्की काय करावं?
याबद्दल तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल.
हा सर्क्युलर रेफरन्स नव्हे
हा सर्क्युलर रेफरन्स नव्हे का?
म्हणजे समजा पहिल्या तीन प्रश्नांचं उत्तर "हो" असेल, तर उत्तर देणारेही "विचारजंती कंपूबाज" असणार. किमानपक्षी इतरांचा आवाज हे विजंकंबा गँगवॉर करून दाबून टाकणार.
हाच प्रश्न "इतर" संस्थळांवर विचारला तर कदाचित प्रामाणिक (अनबायस्ड या अर्थाने) उत्तर मिळू शकेल.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
सर्क्युलर रेफरन्सची शंका
सर्क्युलर रेफरन्सची शंका रास्त आहे. पण तितक्या टोकाला परिस्थिती पोचलेली नाही अशी आशा आहे. टोकाची परिस्थिती असते, आणि कोणाचा आवाज दाबला जातोय का याची पर्वा नसते तेव्हा असे प्रश्न विचारण्यात अर्थ नसतो आणि विचारलेही जात नाहीत. ऐसीअक्षरेवर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे त्यामुळे सर्व बाजूंची मतं व्यक्त करायला मुभा आहे. त्याचा फायदा सगळेच घेतील अशी आशा आहे.
हाच प्रश्न "इतर" संस्थळांवर
हाच प्रश्न "इतर" संस्थळांवर विचारला तर कदाचित प्रामाणिक (अनबायस्ड या अर्थाने) उत्तर मिळू शकेल. +१११
नवे दिसता!
मराठी संस्थळांवर नवे वाटतं तुम्ही!
-Nile
(कोणी तरी मंद मंद
(कोणी तरी मंद मंद स्मितहास्याची स्मायली काढा रे)
रमतय
रमतय, करमतय म्हणून थांबलोय. फार काही मोठी तक्रार वगैरे ह्या संकेतस्थळाबद्दल नाही.
पण दखल घेतलित त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
संकेतस्थळ छान आहे. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे हापिसातून उघडणारं एकमेव आघाडीचं मराठी संकेतस्थळ आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
संकेतस्थळ छान आहे. (+१)
हे वाक्य अतिशय आवडले. या वाक्याकरता वरची मार्मीक श्रेणी. बरेचदा आपण गोष्टी बाय डिफॉल्ट धरुन चालतो अन चांगले मुद्दे अधोरेखीत करत नाही. वर मन यांनी आवर्जून उल्लेख केल्याने छान वाटले.
जसे विचारवंत सदस्य हवेत तसेच लाघवी हवेत, इमोसनल हवेत , विनोदी हवेत. अन तसे इथे आहेत विविध प्रकारचे सदस्य ऑलरेडी आहेत. अशी सरमिसळ हवी अन त्या त्या सदस्यांना त्यांच्या त्यांच्या बलस्थानाकरता मॉरल बूस्टींग हवे.
फक्त माहीती-माहीती देण्याकरता प्रतिसाद न लिहीता पाय खेचायला तसेच पाठीवर थाप द्यायला प्रतिसाद यायला हवेत. असो. आता थांबते
टिवटिव
उजवे आणि डावे सगळीकडेच असतात, असावे पण सगळ्याच गोष्टीत उजवं-डावं करणं फारसं उद्बोधक किंवा गमतीशीर नाही.
तुम्ही मुद्द्याला थोड्याश्या सटल पद्धतिने हात घातला आहे, गँगवॉर नसलं तरी माईक्रोब्लॉगिंगचं(ट्विट्विरलाईक) प्रमाण फारच वाढलं आहे व त्यातून (त्याच-त्या) वैयक्तिक मताशिवाय फारसं हाताला लागत नाहीये ही खंत मला वाटते आहे. ह्यात माझा सहभागही काही वेळेला असतो. हे फारसं चांगलं नाही असं माझं तरी मत आहे.
माझे विचार
"मुद्दाम केलेली कंपूबाजी" असे नाही म्हणता येणार पण २ गोष्टी ऐसीवर आहेत - (१) उपक्रम स्टाईल अत्यंत विचारवंत व तज्ञ लोक (२)कदाचित परस्परांशी "घट्ट" मैत्री असणारे लोक. = घट्ट मैत्री राखून असणारे तज्ञ व विचारवंत लोक.
बर्यापैकी, प्रत्येकाचे एक राखीव क्षेत्र आहे ज्यात त्या त्या व्यक्तीला खूप माहीती आहे. पण त्यामुळे चिल्लर/खुर्दा लोकांना दबदबा वाटू शकतो. अर्थात कोणी मुद्दामहून दबाव आणत नाही.
_______
श्रेणीव्यवस्थेमुळे चिल्लर/थिल्लर कमेंटस ना आळा बसतो. विचारपूर्वक मोठे कधी कधी क्लिष्ट प्रतिसाद येतात. एक स्पर्धात्मक वातावरण रहाते .... आता ते चांगलं की वाईट हा मुद्दा वाद घालण्याजोगा आहे. (मला चिल्लरपणा/थिल्लरपणा आवडतो शिवाय स्पर्धा म्हटले की कापरे भरतात. आता माझ्यासारखे अजून १०-१२ तर असतीलच की.)
______
एक अजून गोष्ट म्हणजे "ऊबदार/ आपुलकीचे प्रतिसाद / खरडी/ व्यनि" .... ताई/भाऊ/अक्का शब्दांनी जी कौटुंबिकतेची एक आपुलकीचे प्रतिबिंब हृदयात पडते ते मला तरी आवडते. सर्वांना रुचेलच असे नाही.
__________
अन एवढे बोलून परत मला हे सर्व मांडायचा हक्क आहे का ते माहीत नाही. कारण मी बर्याच दिवसात आलेले नाही, काही विशेष कॉन्ट्रीब्युटही केलेले नाही. पण घासकडवींचा हा धागा (कौतुकास्पद वाटला) आवडला म्हणून मांडले.
अन एवढे बोलून परत मला हे सर्व
लिहीलं नाही म्हणून संस्थळाबद्दल बोलण्याचा हक्क नाही असं समजू नये, सारीका काय किंवा आणखी कोणी काय.
(आणि हो, थिल्लर/चिल्लरपणा मलाही आवडतो. काळ-वेळ किंवा धागा पाहून तो ही करून टाकायचा.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
:)
थँक्स अदिती.
ऑ
आभार वैग्रे ते ही चक्क अदितीला! कसलं गदगगून आले असेल तिला. डोळे पण पाणावले असतील म्हणून हा रूमाल अदितीला.
अदिती, वस्सकन अंगावर येऊ नकोस, गुलाबी रंग टाळलाय रुमालासाठी
- (हलकट) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
फार काळजी करायचं वातावरण आहे
फार काळजी करायचं वातावरण आहे असं वाटत नाही, मजेत चालू आहे. संपादक हाणामारीवर कातरी चालवत नाहीत हे खूप आवडतं. निरर्थक कॉमेंट्सना पब्लीक झोडपतं तेही ठीक... पण कधी कधी उगाच कीसकाढू चर्चा होतात. आता मला ते कीसकाढू वाटत पण त्यावर दणादण प्रतिसाद येतात सो ते वैयक्तिक मत झालं. पण एकंदर छान वाटत.
ऐसी हे फ्रिज सारख झालय. सारख उघडूना आत कायतरी नवीन असेल असं वाटतं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
ऐसी हे फ्रिज सारख झालय. सारख
पूर्ण नसलो तरी बर्यापैकी सहमत. तसे वाटणे यातच ऐसीचे यश सामावले आहे.
अन गुर्जींचेही धाग्याबद्दल आभार.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रतिसाद
ऐसीवर कंपूबाजी आहे का याबद्दल निश्चित मत असं देता येत नाही. मला तसं वाटत नाही. पण अधिकाधिक लोकांना तसं वाटू लागलं तर त्याबद्दल काळजी करण्याजोगी परिस्थिती उद्भवेल. असो.
मराठी साईट्सच्या आजवरच्या अनुभवावरून एक लक्षांत येतंय की समविचारी लोकांनीच एखाद्या साईटवर नांदावं असा एकंदर पॅटर्न दिसतो. एका प्रकारचा विचार करणारे, तशी विचारधारा मानणारे त्या त्या साईटीला आपला "बालेकिल्ला" मानतात आणि दुसर्या किल्ल्यांवर जाणं कमीकमी तरी करतात किंवा थांबवतात. या प्रकारचं ध्रुवीकरण होताना आपण पहातो.
दुसर्या प्रकारच्या विचारांच्या सद्स्यांना येनकेनप्रकारेण - प्रसंगी गलिच्छ शब्द वापरून , डुप्लिकेट आयडीजच्या बुरख्याआडून अनेक वैयक्तिक स्वरूपाची हीन विधानं करून - आपल्या साईटीवर येऊ न देणं हे प्रकारही पाहिलेले आहेत. त्याची परिणती ती साईट बंद पडण्यात झालेलंही पाहिलेलं आहे. कंपूबाजीचा अतिरेक झाल्यावर काय होतं याचं ते सर्वोत्तम उदाहरण आहे.
इतकं टोकाचं उदाहरण जरी क्वचितच पाहायला मिळालं तरी त्यातून कंपूबाजीचं पर्यवसान कशात होतं हा धडा मिळाला आहे. ऐसीचे चालक आणि हितचिंतक तो धडा कधी विसरतील असं वाटत नाही.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
मराठी साईट्सच्या आजवरच्या
मराठी साईट्सच्या आजवरच्या अनुभवावरून एक लक्षांत येतंय की समविचारी लोकांनीच एखाद्या साईटवर नांदावं असा एकंदर पॅटर्न दिसतो. एका प्रकारचा विचार करणारे, तशी विचारधारा मानणारे त्या त्या साईटीला आपला "बालेकिल्ला" मानतात आणि दुसर्या किल्ल्यांवर जाणं कमीकमी तरी करतात किंवा थांबवतात.
तंतोतंत. यात फार काही चुकीचं आहे असं मलाही वाटत नाही. असं होतंच.
वर सारिकानं म्हटल्याप्रमाणे सदस्यांत घट्ट मैत्रीही आहे. माझ्या बाबतीत तरी माझ्या असं लक्षात आलं आहे की, अशा प्रकारचे मित्र असल्याशिवाय एखाद्या साइटवर फार काळ नांदणं मला मानवत नाही. याला कुणी कंपूबाजी म्हणतील. म्हणोत. पण जोवर मित्र म्हणताहेत त्या प्रत्येक गोष्टीला आंधळा पाठिंबा दिला जात नाही, किंवा एरवी ज्यांच्याशी कडाडून वाद होतात त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आंधळा विरोध केला जात नाही, तोवर कंपूबाजीला काही हरकत घेण्याचं मला कारण दिसत नाही.
मी नावं घेऊन लिहिणार आहे. तितका मोकळेपणा आपल्यात आहे हे गुर्जींच्या चर्चाप्रस्तावानंच सिद्ध झालं आहे.
अदिती, चिंजं, मी, गुर्जी, ऋ, थत्तेचाच्या हे लोक पुरोगामी/आधुनिक/स्त्रीवादी (तथाकथित!) प्रकारची मतं देतो. बॅट्या, अरुणजोशी, अनुप ढेरे हे लोक परंपरा/संस्कृती जपण्याच्या कलानं असतात. पण हे वॉटरटाइट कम्पार्टमेंट्स आहेत का? अजिबातच नाही. चिंजंच्या 'हुच्चभ्रू' टीकेवरून मी त्यांच्याशी वाद उकरून काढल्याचं मला आठवतं. तसंच बॅट्या आणि अजोंमध्ये आधुनिकता आणि परंपरांवरून कडाडून वाद झालेलेही दिसतात. थत्तेचाच्या सहसा आधुनिकतेच्या बाजूला झुकलेले असले, तरी त्यांच्या मते जेव्हा अवास्तव टोक गाठलं जातं, तेव्हा ते आवर्जून विरोधी पक्षाच्या बाजूनं उभे राहतात. अजोंशी इ-त-के वाद होऊनही आम्ही दोघांनीही एकमेकांच्या मतांचा प्रतिवाद करणं सोडलेलं नाही (आणि आमची बाजूही सोडलेली नाही!). बॅट्या आणि माझ्यात स्त्रीवादावरून वाद झाले, तरी त्याच वेळी खरडवह्यांमधून आम्ही तिसराच काहीतरी आचरटपणा (जसं की बॅट्यानं लहानपणी तयार केलेली चित्रकथा. :ड) शेअर करत असतो. गुर्जी सहसा 'शांत व्हा मंडळी, पाणी घ्या' भूमिकेत असले, तरी उत्क्रांतीचा विषय निघू देत. 'अरुणजोशी विरुद्ध गुर्जी सह इतर सेनानी' असा सामना बघायला लोक सज्ज होतात. रुचीसारखी स्वच्छ-आधुनिक-स्त्रीवादी विचार करणारी व्यक्ती मिळणं कठीण. पण लग्नसंस्थेवरून झालेल्या वादात मी वृथा टोक गाठलेलं पाहून तिनं मला झापलं होतं आणि मी चुपचाप मान्यही केलं होतं. तसंच लोकांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांच्याशी वाद घालताना आपण तितके कडवट-कोरडे उरत नाही, हे माझ्या लक्षात आलं ते ठाणे कट्ट्यात गविंना भेटल्यानंतर. मी तसं स्वच्छ नोंदलं होतं.
ही फक्त काही उदाहरणं आहेत. असे अनेक सदस्य आणि अनेक प्रसंग आहेत. जंत्री द्यावी तितकी कमी. असं आहे, तोवर कंपूबाजीची काळजी करण्याचं ऐसीला काही कारण नाही!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मेघनाचा विस्तृत प्रतिसाद
मेघनाचा विस्तृत प्रतिसाद आवडला. मग ऐसीवरती , फक्त मार्मिक अशी यांत्रिकी श्रेणी देऊन भागतं. ना तिला कळतं कोणी श्रेणी दिली आहे ना माझा काही संवाद होतो. अर्थात आम्ही दोघी संवादाच्या (प्रोत्साहनात्मक) ओलाव्याला मुकतो. मला स्वतःला श्रेणीऐवजी संवाद आवडेल.
______
मग कोणी असे म्हणेल की तू श्रेणी नको देऊस, दे उपप्रतिसाद. पण अन्य कोणी असे प्रतिसाद देत नसताना आपणच देत बसायचं ऑकवर्ड होतं.
_____
मला सर्वांकडून हे जाणून घ्यायला आवडेल की श्रेणीव्यवस्था हे ऐसी चे बलस्थान आहे की लिमिटेशन? अन का?
हा घे उपप्रतिसाद!सविस्तर
हा घे उपप्रतिसाद!सविस्तर मागाहून...
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
श्रेणीव्यवस्था ट्रोलांना
श्रेणीव्यवस्था ट्रोलांना कंट्रोल करण्यासाठी चांगलीय. आणि फक्त +१ किँवा किँवा आभार अशा एखाद दोन शब्दांच्या उपप्रतिसादांऐवजी श्रेणी देणे जास्त सोयिस्कर वाटते. हेमावैम.
झालं!
म्हणजे आता विचारजंतीपणाबद्दल विचारजंतीपणा करायचा का?
-अ-विचारजंतू
-Nile
१) ऐसीवर विचारजंती कंपूबाजीचं
१) ऐसीवर विचारजंती कंपूबाजीचं वातावरण आहे का? (माझे उत्तर - अजिबात नाही. पण कंपूबाजी झाली तरी त्यात काहीही अयोग्य/चूक नाही.)
२) ऐसीवर उजव्या/पारंपारिक/सश्रद्ध/कॉंझर्व्हेटिव्ह विचारसरणींचा आवाज दाबला जातो का? (माझे उत्तर - अजिबात नाही.)
३) ऐसीवर अशा गॅंगवॉरना सुरूवात होताना दिसते आहे का? (माझे उत्तर - अजिबात नाही.)
सिरियसली - माझ्यासारख्या ला इथे सहन केले जाते ह्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
खरं
<<माझ्यासारख्या ला इथे सहन केले जाते ह्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.>> गब्बरशी प्रथमच सहमत.
<<मूर्खाचे दावे शहाण्या व्यक्तीला सहज खोडून काढता यायला हवेत ______ रमताराम>> हे असलं काही लक्षात ठेवत जाऊ नको रे. आमचेच दात आमच्याच घशात घालायला वापरायचा एखादा/दी.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
कंपुबाजी कि नही जाती वो हो
कंपुबाजी कि नही जाती वो हो जाती है|
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
थोडक्यात
तस वातावरण आहे अस वाटत कींवा दिसत अस म्हणता येइल.
माझा वावर जेवढा आहे तेवढ्यावरुन केलेल हे निरिक्षण आहे.
संस्थळाच्या स्वतःच्या प्रकृतीनुसार काही विशिष्ट मुद्द्यांमधे विशिष्ट बाजूला झुकत माप दिसत.
टोकाला गेलेल ते अजून तरी दिसत नाही.
It's unethical. It's not illegal
कंपूबाजी
कंपूबाजी ही प्रत्येक संस्थळावर असतेच, तशी ती इथेही जाणवते. पण ती 'विचारजंती' लोकांची वाटत नाही, विचारवंतीही वाटत नाही. मी इथल्या कंपूबाजीला विचारपंथी म्हणेन. तसेच वर उल्लेख केल्याप्रमाणे या कंपूबाजांकडून एकमेकांतली घट्ट मैत्री दाखवण्याची एकही संधी सोडली जात नाही. पण इथले कंपूबाज इतरांचे म्हणणे ऐकून घेतात, साठमारी करत नाहीत. कधीकधी त्यांचे प्रतिसाद इतके तरल असतात की ते त्या ग्रुपशिवाय अन्य कोणाला कळतही नाहीत. इथेच त्यांचे वैचारिक श्रेष्ठपण सिद्ध होते.
एखाद्यावर टीकेचा भडिमार करण्यापेक्षा त्याला अनुल्लेखाने मारण्याचे कसबही या कंपूकडे आहे.
कंपुबाजी वगैरे मलातरी कधी
कंपुबाजी वगैरे मलातरी कधी जाणवली नाही. संस्थळ प्रवृत्तीच्या अत्यंत विरोधी मते आलीच तर इथले लोक बर्याचदा दुर्लक्ष करतात किँवा जास्तीजास्त थोडी टवाळकी. कोणी लगेच खोपचात घेऊन दमदाटी करत नाही.
कधीकधी जरा जास्तच किस पाडला जातो एखाद विषयाचा. आणि उगाच कारण नसताना नसते संदर्भ आणले जातात अधेमधे. पण तो त्या त्या सदस्यांचा प्रॉब्लेम आहे. किँवा इनजनरलच मराठी संस्थळांवर तसे होत असावे (मला फारसा अनुभव नाही). त्याच्याकडेसुद्धा इतर लोक दुर्लक्षच करतात.
विअर्ड &/ स्कँडलाइजीँग विचार इथे मोकळेपणाने मांडु शकतो. आणि कोणीही सौँस्कारांची लेक्चरबाजी करत नाही हा केवढा प्लस पॉइंट आहे ऐसीचा!
डायलॉग्ज नि थेटरमालक
हरकत तर नाहीच. पुरोगामी, उदारमतवादी असणे खूप महान आहे. ते काय ते नीटसे कळणे पण अवघड असते. ते बिंबवणे / पाळणे अजूनच कठीणच. कोणते पुरोगामित्व/प्रतिगामित्व किती प्रताडावे/कौतुकावे याचे तुलनात्मक ज्ञान, आर्थिक - सामाजिक महत्त्व, सर्वात कठीण विषय आहे. तो नीट कळत नाही (माझे व्यक्तिगत मत) हा इथल्या अशा पुरोगाम्यांचा विक पॉइंट आहे. पण त्यात संस्थळाचा दोष नाही.
असं काही नाही. अलिकडे लोक अगदी ओरिजनल सेक्युलर, लिबरल, पुरोगामी इ इ असतात. असा कोणी भेटला तर तो आव आणत आहे, खोटे बोलत आहे असे किंचितही वाटत नाही. आमच्या ऑफिसातले बरेच लोक ट्रॅडिशनली भाजपचे. म्हणायचे हा पक्ष सेक्युलर, लिबरल, पुरोगामी आहे. यावेळेस ते भाजपला मत देत नाहीत. मोदीमुळे सेक्युलर, लिबरल, पुरोगामी धोक्यात येईल असे त्यांना पटले आहे. हा आव कसा? ऐसीवर कोणी फारसे खोटारडे विचारजंत नाहीत. प्रत्येकाच्या भावना प्रामाणिक आहेत असे जाणवले आहे. पण मागे एकदा मांडलेली भूमिका चूक होती असे मान्य करणे अभावानेच आढळते.
बाजारात १०० पुरोगामी असतील तर त्यातील ९९ "बाजारातील पुरोगामीत्व निदर्शानाचे ढोबळ प्रकार" अवलंबत असतात. एखादाच विचारी असतो. म्हणून अगदी टोकाला जाऊन जंत म्हणणे अयोग्य. भावना प्रामाणिक आहेत तोपावेतो चर्चा करत राहावे.
आपण "पारंपारिक विचारांच्या" पब्लिकच्या कितीतरी शतके पुढे आहोत असे इथल्या बर्याच पुरोगाम्यांना 'माहित आहे'. न्यूनगंड देईल इतका तो आत्मविश्वास असतो. देव आहे असे मानणे मूर्खपणाचे आहे याची प्रचंड खात्री पण देव नाही असे मानणे त्यापेक्षा अजूनच बुद्धिश्रमकारक असते याची कल्पनाच नाही. देव नाही यावर हार्वर्ड आणि ब्रह्माकुमारीज मधे दोन शोधनिबंध स्विकार झालेले आहेत इतका आत्मविश्वास. शिवाय शब्द काही का असेनात अर्थ सोयिस्कर तोच घ्यायचा हि ही परंपरा आहे. फार स्प्ष्टीकरणे द्यावी लागतात. मुद्दा कळेपर्यंत अवांतर झालेले असते. येदियुरप्पा भ्रष्ट का असा प्रश्न आम्ही पुरोगाम्यांना विचारला तर ते शील दिक्षित का असे डायवर्जन करतात. त्याने चर्चेची रया जाते.
अमान्य. सगळे प्रामाणिक आहेत.
हे फारसे जाणवले आहे. इथले जे चांगले आहे ते शोधायची वृती जास्त आहे. जे परदेशात चांगले आहे ते सत्य का मांडू नये?
ब्रह्मदेवाने याकरिता यांना अनंत ब्रह्मास्त्रे दिली आहे. अमोघ. परंपरेचे स्वरुप न जाणणे, इतिहास व सत्ये न जाणणे, काळाचा फॅक्टर विचित्रपणे वापरणे, परंपरा म्हणजे ती त्याज्यच हे माहित असणे, अशा त्यागाला पुरोगामिता म्हणणे, अशा त्यागाच्या जाहिरातीच्या फॅशनचे वेड असणे हे बरेच कूल आहे. हल्ला केल्यावर रास्त, प्रांजळ चर्चा बरेच सदस्य करतात हे इथले बलस्थान आहे.
असे कसे शक्य आहे? इथे वर 'धर्मांत' हा शब्द आला आहे. कसं आहे, व्यक्ति, कुटुंबे, समाज, धर्मे, व्यवसाय, सरकारे, विज्ञान, पर्यावरण, अर्थकारण,
अध्यात्मतत्त्वज्ञान हे कसे/किती फोल, दुषित आहेत हे पुरोगाम्यांना माहित आहे. त्यास्थानी दुसरे उत्तम ते काय हे ही त्यांना प्रबुद्ध पणे माहित झाले आहे. म्हणून या शब्दांशी निगडित एकही पारंपारिक संकलना चर्चिली जाते तेव्हा तिच्यावर टिकेची झोड उठवली जाते. यात इस्लाम नि नक्षल ला थोडे स्पेअर केले जाते, पण बाकी सर्व कोणताही भेदभाव न ठेवता रगडून घुतले जातात. असला प्रकार ते काही नवश्रीमंत, नवविदेशवारीकर, इ इ नवपुरोगामी करतात.नॉट अप्लीकेबल फॉर ऐसी. विरोध करतात पण तो (त्यांच्या परिने ) रास्त असतो. नो हल्ला. नो भंजन. नो विकृती. नो दुस्वास
मुळात पाश्चात्य लोक काही पद्धतीनी का वागतात हे कळल्याशिवाय यांना आरोप म्हणता येत नाही. लोकांना आपल्या जागेचं, पद्धतींचं कौतुक असतं. कारण तिथला इतिहास माहित असतो. मला दिल्लीचं आहे. त्यातही काही वावगं नसावं. शिवाय भारतीय लोक तसेही स्वतःचे डोके लावत नाहीत म्हणून फक्त ऐसीवर आरोप करणे चूक. उलट पाश्चात्य देशांतील सार्या सिस्टिम (पोलिस, ट्रॅफिक, कस्ट्म, ओफिसे, मनोरंजनगृहे, प्रवास एजन्सी, वांशिक्-भेद, नागरीकता भेद, आर्थिक, शैक्षणिक क्लास भेद, कुटुंब, आरोग्य, इ इ अनेक अनेक ) मधे भारतापेक्षा काय काय चांगले आहे, का आहे, ते इथे लोक का करत नाहीत, कसे करावे, इ इ सांगण्यास उत्तेजनच असावे. त्याला 'एन ए' भाग अर्थातच आम्ही टाळू.
हे खरे आहे. इथली कंप्लीट पुरोगामी लॉबी एकाच प्रकार प्रोग्रामिंग केलेल्या सॉफ्टवरसारखी, सारख्याच विचारांची आहे. उदा. क्ष विषयावर अ विचारजंताने ९२% पुरो जायचे म्हटले तर कोणीही, कशाला ८५% ने काम भागेल असा देखिल विरोध, सुझाव देखिल करत नाही. शिवाय ऐसीवर 'बाऊ केल्याशिवाय' न्याय मिळत असे एक कल्चर आहे. अन्यायाची चर्चा करताना सरकारपुढे आकडे फुगवऊन सांगायचे असतात. पण समस्या नीट जाणायची असेल तर इथे तरी बिगर बाऊ चर्चा करा. सरकारला म्हणा ९२% स्त्रीया हुंडा आजही देतात. इथे चर्चेत खरा आकडा लिहा. श्रेणी देताना कंपूबाही असते का नाही हे कसे सांगणार? ती कोण देत आहे ते गुप्त असते.
तुटून नाही पडत. पण उपेक्षेने मरते असे लेखन इथे. मागे इथे सुप्रिया जोशी का कोणी 'हे लोक सर्वच बाजूंनी ब्राह्मणांनाच का नावे ठेवतात?' अशा आशयाचा धागा टाकला होता. तेथिल प्रतिसाद (म्हणणे ऐकूनही न घेणे) आणि किंबहुना प्रतिधागे सुद्धा, ऐसी किती 'वाममार्गी' लागले आहे याचे द्योतक आहे. सणावाराचे कौतुक करणारा धागा असेल त्यावर 'मला त्यादिवशीची पुरणपोळी आवडते. इतर काय आम्ही कशाला बघू' अशा प्रतिक्रिया असतात. यात खोटे काही नाही पण सांगायचे अशा वागण्याचे जे भूषण आहे ते वेधक आहे. नि त्याच वेळी त्या सणाची अनावश्यकता सांगणारे १-२ धागे बाजूला चालू असतात.
याची आवश्यकता नसावी. कारण ही सगळी (मनातून आलेली खरीखरी) विचारसरणी आहे. चेष्टा जास्त वाटली तर आपण मधे येऊ शकता. एका बाजूचं नैसर्गिक प्राबल्य आहे. इथे कोणताही अन्याय नाही.
पुन्हा सांगतो, कोणत्या विचारसरण्या आहेत नि कोणत्या विचारसरणीचे प्राबल्य आहे याची चिंता करण्याची गरज नाही. त्याला आपला प्रवाह पकडू दे. पण चर्चाच नीट, प्रामाणिक, मार्गावर, माहितीपूर्ण, व्यक्तिगतात मधे न आणता, अवांतरेच महत्त्व न धारण करता, समोरच्याचे म्हणणे ऐकत, पटताहेत ते मुद्दे प्रांजळपणे मान्य करत आणि अंततः "असहमतीवर सहमती" त एंड व्हायची इच्छा कमित कमी ठेऊन, इगो बाजूला ठेऊन "किमान सहमती" तरी प्राप्त करावी. चर्चेत रिगर असावा. हे सगळं व्यवस्थापन म्हणून करता येणार नाही. हा एक सदस्य करू शकतो. योग्य तिथे इन्पुट देऊन. वाटल्या संपादक आणि सदस्य यांमधे 'सहायक, सल्लागार' अशी मिडल मॅनॅजमेंत आणू शकता. हा आय डी कधी मधी "वातावरण" मस्तं ठेवेल.
विचारसरणींना वाहिलेल्या गटांचा संवाद इथे होतो. काही लोक विचित्र श्रेण्या देतात. पण तेही दुष्टपणानेच केले म्हणता येत नाही. कोणाला कोणता आशय पोहचतच नाही, म्हणून अशा श्रेण्या येतात. तुम्हा लोकांकडे कोणता आयडी कोणत्या आयडीला न चुकता, कंसिस्टंट निगेटीव श्रेण्या देतो याचा टेबल बनवता आला तर त्याला अर्थ आहे का हा सब्जेक्टिव निर्णय घेण्यात येईल. मग तो अधिकार काढून घेण्यात यावा.
हो. लोक म्हणतात संहत पुरोगामी हलाहल ज्यांना ज्यांना आवडतं, त्यांनी हे स्थळ त्याकारणासाठी बनवलं आहे. पण त्यात गैर काही नाही. (फक्त ते आमच्या ४-५ जणांच्या अक्षाला संख्येने फारच भारी पडतात ही आमची समस्या आहे पण तक्रार नाही.)
माझा सोडून, हो.
समजा सारे ऐसीकर त्यांच्या पुरोगामीत्वाच्या इम्डेक्सप्रमाणे एका ओळीत बसवले (अतिपुरो ते सामान्यपुरो) नि त्यांना ऐसीवरील एका नवख्या सदस्याचा खालिल पॅरा वाचून दाखवला -
"४.३० ला उठलो. करदर्शन म्हटले. संध्या केली. लिंबाच्या काडीने दात घासले. साडीआड स्नान केले. देवाचे दर्शन घेतले. आई-वडिलांच्या पाया पडले. बॉय फ्रेंडच्या पाया पडले. देवळात जाऊन आले. ज्योतिषाला परिक्षेबद्दल विचारले. साडी घातली, टिकली लावली, बांगड्या घातल्या, कॉलेजात गेले. E=mc^2 मधे constant का नाही असा विचार मनात येऊन गेला. पण विचारला नाही. प्रिती नि मुग्धाला दारू नि फुकायचे सोडा, पब मधे जाऊ नका म्हणून आज १००व्यांदा सांगीतले. चारूला म्हटलं लग्नाअगोदर टाळ हाच माझा सल्ला असेल. इलेला तर मी बोलतच नाही. तिच्या संबंधांचं काँफिगरेशन दर नव्या दिवशी एक नवी काँप्लेक्क्षिटी घेऊन येतं. घरी तुळशीचे एक पवित्र पान खाल्ले. एका काकांनी अंगावर पवित्र गोमूत्र शिंपडले. मांमांचे पाय दाबून दिले. भावाचे कपडे इस्त्री करोन दिले. आईसोबत भाजी केली. गृहपाठ केला त्यात दासबोध वाचायचे राहिले. बॉयफ्रेंड चांगलाच आहे पण तो नवराही चांगलाच निघाला म्हणून मंगळवार करत आहे. "
तर त्याच्या शेवटाला येईतो सारे ऐसीकर मूर्छित असतील. तेच इलेचा पॅरा असता तर सार्या ग्रंथींचे सारे हार्मोन्स आउट ओफ स्टॉक झाले असते.
ऐसीवरचे वातावरण, सन्मानाचा, संवादाचा, मॅनर्सचा दर्जा खूप उच्च आहे. सिनेमातील डॉयलॉगबाजी बुलंदी असल्यामुळे थेटरमालकाने चिंतीत व्हायचे नसते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
काय कल्ला नाय.
वाचलाच नाय तर कलेल कसा?
लांबलचक प्रतिसाद वाचायचा सत्तर रुपये पडतील.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
=))
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
"४.३० ला उठलो. करदर्शन
.
E=mc^2 मधे constant का नाही
विचारला असता तर समजलं असतं ... c2 हा स्थिरांकच आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
=))
तसे नाही.
c square हा स्थिरांक असेलही.
पण तो इतका पर्फेक्त कसा काय बसतो ; असा त्यांचा सवाल आहे.
म्हणजे २२/७, २.७१७ असला काहीतरी अपरिमेय आकडा घेतल्याशिवाय गणित केलय असं वाटूच कसं शकतं, असा
त्यांचा सवाल आहे. c square हे पूर्णांकात येणारं उत्तर आहे. अरे constant हा काय पूर्णांक असू शकतो ?
काहीतरी भल्लामोठ्ठा, जड बोजड अवघड वाटेल असा आकडा नको का ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
c square हे पूर्णांकात येणारं
तू पण नाही ना विचारलंस गूगलबाबाला! कोणत्या एककात c२ हा पूर्णांक आहे रे?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
णंबर शिष्टीमचे
र्याडिक्स म्हणून जर c घेतला तर c२ च कशाला, cन जिथे नεΝ हे सर्वच पूर्णांक असतील, हाकानाका.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शिंपल
येवढी शिंपल गोष्ट ठाऊक नाही? हे पाहा.
आवाज दाबला जात नाही हे तर उघड
आवाज दाबला जात नाही हे तर उघड आहे.
नैतर अजोंना इथे राहणे अशक्य झाले असते.
>>इथली कंप्लीट पुरोगामी लॉबी एकाच प्रकार प्रोग्रामिंग केलेल्या सॉफ्टवरसारखी, सारख्याच विचारांची आहे. उदा. क्ष विषयावर अ विचारजंताने ९२% पुरो जायचे म्हटले तर कोणीही, कशाला ८५% ने काम भागेल असा देखिल विरोध, सुझाव देखिल करत नाही.
तसे वाटत नाही. मी स्वतः पुरोगामी/स्त्रीवादी प्रतिसाद देतो असं मेघनाने व्हाउच केलं आहे. पण अनेकदा मीच समलिंगींसाठी/तृतीयपंथीयांसाठी वेगळे कायदे, लिव्ह-इन अशा विषयांवर विरोधी प्रतिसाद दिलेले आहेत. म्हणजे ते कायदे करायला माझा विरोध नाही. असलेल्या कायद्यांत त्यांना (कायदा सुधारून) बसवता येत नसेल तर वेगळा कायदा बनवावा. पण नक्की तसे आहे का याची खातरजमा करावी असा स्टॅण्ड मी घेतला आहे. विवाहांतर्गत बलात्कार या विषयातसुद्धा बलात्काराची व्याख्या खूप काळजीपूर्वक करावी लागेल असा मुद्दा मी मांडला आहे. "बलात्कार टाळण्यासाठीचे सल्ले" या विषयावरसुद्धा 'प्रतिगामी' स्टॅण्ड घेतला आहे.
सरकारने नागरिकांच्या खाजगी बाबींवर लक्ष ठेवायला हरकत नाही असा संस्थळाच्या धोरणाच्या विरोधी स्टॅण्ड सुद्धा मी घेतला आहे.
तेव्हा सगळी लॉबी एकसारखाच विचार करते असे नाही. आय मीन प्रत्येक मुद्द्यावर ९२+ टक्के सहमती असतेच असं नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
=))
"सनई चौघडे " चित्रपटात एक भन्नाट तर्क मांडणारे कोल्हापुरी का अजून कोणतेतरी पारंपरिक पार्श्वभूमीचे ज्येष्ठ नागरिकाचे पात्र आहे.तुमचे युक्तीवाद हुबेहूब तसेच वाटतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मला असा दाट संशय आहे की
मला असा दाट संशय आहे की अजोंनी एक टंकनिका ठेवलीये!
कित्ती मेगाबायटी प्रतिसाद देतात!
अवांतर - टं
चकनिका असे लिहीणार होते पण तो मिपावर ऑलरेडी झालेला जोक आहेअतिअवांतर - "ठेवलीये" या शब्दाचे वेडेवाकडे अर्थ काढू नयेत.
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
थोडीशी चूक झाली. एक ऐसीवर नि
थोडीशी चूक झाली. एक ऐसीवर नि एक मिपावर.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजोंनी
टंकनिका ठेवली असेल तर पेशवाईतल्या कवी अमृतरायांच्या लेखनिकांसारखेच तिचेही हाल होत असावेत. अमृतरायांची स्फूर्ती/प्रतिभा इतकी सुपरफाष्ट होती म्हंटात की चारपाच लेखक बोरू सरसावून बसले तरी काही शब्द/वाक्ये निसटायचे म्हणे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ऐसी हे एक संतुलीत संस्थल
ऐसी हे एक संतुलीत संस्थल आहे.मराठीतील सर्वात जुने संकेतस्थल असणाची टीमकी मीरवार्या साईटवर प्रचंड कंपूबाजी व तीही फक्त उजव्या विचारसरणीची आहे. तिथले एडमीनही उजव्या विचारसरणीचे आहेत.
™ ग्रेटथिंकर™
तिथे तुम्ही अरुणजोशींचा रोल
तिथे तुम्ही अरुणजोशींचा रोल (संस्थळ वि भूमिका) करत होतात. इमॅजिन करा, आपल्या दोघातच जर तु तु मी मी झाली तर इंटरनेट, किमान मराठी स्थळे हँग्/जाम्/ओवर्लोअड का काय ते होऊन जातील.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
overrate
प्रिय अरुण,
आपण स्वतःस overrate करता असे आपणास वाटत नाही का ?
आपल्या दोघातच जर तु तु मी मी झाली तर इंटरनेट, किमान मराठी स्थळे हँग्/जाम्/ओवर्लोअड का काय ते होऊन जातील.
हे काय किंवा
तुम्हा सगळ्यांना मी एकटा भारी कसा पडतो
हा प्रश्न काय , स्वस्तुती झाली की ही.
इतरांना म्हणूदेत की अरुण बौद्धिक दांडगाइत मॅचोमॅन आहे ते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
असं काही नाही हो. हा गंमतीने
असं काही नाही हो. हा गंमतीने म्हटलेला भाग आहे. माझा असला कुठला समज नाही.
आणि स्थळावर इतके दर्जेदार लेखक असताना मी गंभीरपणे म्हणतोय असे वाटायला नको.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नाही.. पण...
हाच प्रश्न "इतर" संस्थळांवर विचारला तर कदाचित प्रामाणिक (अनबायस्ड या अर्थाने) उत्तर मिळू शकेल. +१११ सहमत
एका शब्दपेक्षा दोन बरे.
या धाग्यावर इतर संस्थळावर
या धाग्यावर इतर संस्थळावर प्रामाणिक प्रतिसाद येतील असा प्रतिसाद आणि त्याला एकदोघांचे अनुमोदन दिसले. त्याचा अर्थ कळला नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१ मलापण कळलं नाही. इतर
+१ मलापण कळलं नाही.
इतर संस्थाळावरचे जे लोक ऐसीबद्दल 'प्रामाणिक' मत देऊ शकतील ते ऐसी नियमीत वाचत असणारच ना? मग त्यांचे इथे खाते असेलच. नसले तर लगेच बनवता येतच की...
विचारजंत फार बोकाळलेत ................
विचारजंत फार बोकाळलेत , अविचारपोषकांची फवारणी करावी लागेल .
कंपूबाजांसाठी फोडा आणि झोडा नीतीचा अवलंब करावा असे बाण की मुण त्या छे गव्हेरा ला म्हणत होते . J)
अवांतर.
श्रेण्यांमधे "पकाऊ" "कीसकाढू" व "काडीबाज" अशा श्रेण्या देण्याची सोय करता येईल का?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
ऐसीवर विचारजंती कंपूबाजीचं
रहेगा तो भी अप्पुन लोड नै लेता है| कंपूबाजांना फाटयावर किंवा अनुल्लेखाने मारणे आताशा अंगवळणी पडलेय!
- (ऐसीकर) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
कंपूबाजांना फाटयावर किंवा
असं होतं तर मग "पंचा" च्या केलेल्या "पंचनामा" ने तुमची "पंचाईत" का केली?
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
हं
हं, अजुन एक नोंद!
स्वगतः सोक्या, लेका नोंदी वाढतच चालल्या आहेत. इट क जवाब...का काय म्हणतात ते लक्षात आहे ना?
- (पंचाची काच घट्ट असलेला) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
पंचाची काच घट्ट
द्रविडिस्थानातल्या वास्तव्याला अनुसरून आहे काय
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
...
'पीपल हू वेअर ग्लास पंचाज़ शुडण्ट थ्रो ष्टोन्स' हे सुभाषित कधी ऐकले नाहीयेत का, काका?
तूर्तास एवढा दंडवत
तूर्तास एवढा दंडवत स्विकारा!
_/\_
-('नव्या'बाजूने सुटलेला पंचाचा काचा आवरणारा) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
हो
नक्कीच.इथली श्रेणीपध्दत ही कंपूबाजी वाढवायला हातभार लावते.तथाकथित सेक्युलर, विज्ञानवादी इत्यादी इत्यादी मतांविरूध्द लिहिले तर कंपूबाजांमध्ये निरर्थक/खोडसाळ इत्यादी प्रतिक्रिया देण्याची अहमहमिका लागते.
नक्कीच.
गॅंगवॉर होणार कसे?इथले वातावरण बघून उजवे/सश्रध्द लोक इथे फार काळ थांबत नाहीत (बॅटमॅन सारख्यांच्या चिकाटीचे कौतुक वाटते. अशी चिकाटी सगळ्यांमध्ये नसते).त्यामुळे डाव्यांचे/अश्रध्द लोकांचे/तथाकथित विज्ञानवादी लोकांचे इथे बहुमत आपोआपच आहे.
१. सर्वप्रथम श्रेणीपध्दत काढून टाकावी. यातून कंपूबाजीला प्रोत्साहन मिळते. मला वाटते या प्रकारामुळे विकास, क्लिंटन इत्यादी मिसळपाववर नेहमी लिहिणारे इथे कंटाळले.
२. संपादक मंडळात तुम्ही स्वत:, अदिती, ऋषिकेश इत्यादी एकाच प्रकारच्या (कमी अधिक प्रमाणात डाव्या/अश्रध्द/स्त्रीवादी इत्यादी) मंडळींचा भरणा आहे. त्यामुळे सुरवातीपासूनच या संकेतस्थळावर मिसळपावप्रमाणे विविध विचारांचे लोक येणे शक्य झाले नाही असे दिसते. संपादक मंडळात थोड्या इतरांचा भरणा केला तरी ऐसीअक्षरेचा हा चेहरा बदलायला किती उपयोग होईल हे सांगता येणार नाही.गेल्या २-३ वर्षापासून जे चित्र उभे राहिले आहे ते असे एकाएकी जाणार नाही.
३. या संकेतस्थळाचा चेहरा बऱ्यापैकी डावा असा आहे.तो बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले नाहीत तर हा चेहरा असाच राहणार आणि ऐसीअक्षरे एका विचाराच्या लोकांचे आणि मिसळपाव दुसऱ्या प्रकारच्या विचाराच्या लोकांचे हा भेद राहणारच. आता हे प्रयत्न करावेत की नाही, करायचे असतील तर कसे करावेत हे संपादक मंडळालाच ठरवावे लागेल.
मिसळपाव ऐसीपेक्षा चार वर्षे जुने संकेतस्थळ आहे हे मान्य. तरीही आज मिसळपाववर नियमितपणे लिहिणारे आणि ऐसीअक्षरेवर नियमितपणे लिहिणारे यात तुलना केल्यास ऐसी बरेच मागे आहे हे समजून येईलच.मिपावर दिवसातून अक्षरश: शेकडो प्रतिसाद येतात.ऐसीवर तसे नक्कीच होत नाही.हे चित्र बदलायला हवे असे मुळात संपादक मंडळाला वाटत असेल तर ते कशामुळे होते याचा विचार करून ते चित्र कसे बदलता येईल हे बघायला हवे. खरे सांगायचे तर मलाही ऐसीअक्षरेपेक्षा मिसळपावच आवडते.सुरवातीच्या काळात ऐसीअक्षरे बरे वाटायचे.पण लवकरच या संकेतस्थळाच्या मर्यादा माझ्या लक्षात आल्या त्यामुळे माझा वावरही इथे कमीच झाला आहे. (त्याने कोणालाही फरक पडत नाही हे मला माहित आहे तरीही एक सदस्य म्हणून मलाही माझे मत आहेच).
वाईट काय आहे
संकेतस्थळाचा चेहरा डावा असल्याने नक्की काय फरक पडतो हे समजले नाही. Birds of a feather flock together हे माहीत असेलच.
असाच अगदी उलट प्रतिवाद माझा आहे. नीलकांतचे मनोगतावरचे प्रतिसाद वाचले तर त्याची विचारसरणी बऱ्यापैकी पुरोगामी आहे हे कळेल. मी अनेकदा त्याच्याशी भेटलो/बोललोही आहे.. मात्र याउलट मिसळपाववरील बहुसंख्य सदस्य व अनेक संपादक पुराणमताभिमानी विचारांचे आहेत याला कंटाळून माझा मिपावरचा वावर कमी झाला. 'उजव्यां'ना समर्थन याला तुम्ही सर्वसमावेशकत्व म्हणत असाल तर ऐसी हे 'घेट्टो' राहिले तरी चालेल असे मला वाटते.
Why your left profile is prettier हा लेख वाचा. 'डा'वी बाजू कळून येईल.
तुम्ही स्वत:, अदिती, ऋषिकेश
तुम्ही स्वत:, अदिती, ऋषिकेश इत्यादी एकाच प्रकारच्या (कमी अधिक प्रमाणात डाव्या/अश्रध्द/स्त्रीवादी इत्यादी) मंडळींचा भरणा आहे.
अदिती डाव्या विचारसरणीची आहे ?
डावी विचारसरणी - ह्या शब्दाचे अनेक अर्थ/उप-अर्थ असावेत बहुतेक. पण पि.ह. तुम्हास अभिप्रेत असलेला अर्थ सांगा -
१) परंपरा/धर्म यांचे विरोधक
२) पीडीतांचे/शोषितांचे/उपेक्षितांचे प्रतिनिधीत्व करणारे
३) समानतेला सर्वोच्च मूल्य मानणारे
४) आणखी काही
छे गोली और आदमी तीन
मला तर गब्बरभौसुद्धा बर्याचदा डाव्या विचारसरणीचे वाटतात
[ओरिगिनल गब्बरभौसुद्धा उपलब्ध संसाधनांचं (पक्षी: गोळ्या) समान वाटप व्हावं (पहा: प्रतिसादाचे शीर्षक) या मताचे होते, असं वाटतं.]
झायीर णिषेद. मला शिवी
झायीर णिषेद.
मला शिवी दिल्याबद्दल नंदन चे खाते निस्सारीत का काय ते ... करण्यात यावे अशी व्यवस्थापनास विनंती करतो.
बरं मग?
विरोधी विचारसरणी सहन करण्याची क्षमता नसलेल्यांची चिंता कोणी का करावी बरे? (आम्ही अनेक संस्थळांवर विरोधाला सडेतोड उत्तर देऊन वास्तव्य केले आहे (अनेकदा बॅन होऊनसुद्धा!) याचे पुरावे अजून अस्तित्वात आहेत. ते पाहिल्याशिवाय आमच्यावर "तुम्ही नाही का पळालात" असा आरोप करण्याचा हास्यास्पदपणा करू नका म्हणजे झालं.)
-Nile
१. श्रेणीपद्धतीला दोष देण्यात
१. श्रेणीपद्धतीला दोष देण्यात अर्थ नाही. श्रेण्या "कंपूबाजक" आहेत का हे चेक करण्याकडे संपादंकाचे दुर्लक्ष होते खरे. पण १०० पैकी ९५-९७ श्रेण्या योग्यच नि लेखकास प्रोत्साहन देणार्या असतात. असतात,२-३ कंपूवृतीनिदर्शक असतात. पण त्यापेक्षा जास्त पर्फेक्शन शक्य नाही.
२.
असे नाही. आवाज क्षीण असेल तर दबतो. पण कोणते कटकारस्थान असते, चमूबाजी असते, हे चूक.
अगदीच अमान्य. तुम्ही उजवे असाल तर विरोध करायला इतके उत्तम, चांगले लोक इतरत्र मिळणार नाहीत. पण तरीही संस्थळाची वा संपादकांची अशी "विचारसरणी ठरवण्याची कृती" इथे नसते. उदाहरण म्हणून सांगतो - मला रस नाही - पण ऐसीच्या पहिल्या पानावर ज्ञानेश्वरांचे चित्र असावे - असा एक धागा काढा - उत्तम चर्चा करा. पटवून द्यायला कोणी आड येणार नाही.
संस्थळ म्हणून कोणता रंग लावून घ्यायचा नाही, आणि इथे कोणता रंग रंगला तर तो संस्थळ म्हणून पुसायला जायचे नाही, अशी इथे ऑन पेपर ऑफ पेपर पॉलिसी आहे. आवडणं न आवडणं निजी प्रश्न आहे, यात संस्थळाने काही करावे असे नाही. शिवाय हे लोक आत्मसुखी टायपाचे आहेत, ट्रॅफिक ओढण्यात रस नसलेले.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शिवाय हे लोक आत्मसुखी टायपाचे
असं असेल तर बोलणच खुंटलं Traffic मध्ये मज्जा असते. Trolling म्हणत नाही, Traffic म्हणतेय.
______
हा तेजा यांचा प्रतिसाद पुरेसा बोलका आहे. श्रेणी व्यवस्थेमुळे ताबडतोब नको असलेली मते विरून जातात = दृक माध्यमात तरी तसेच वाटते की आवाजच पुसला गेला आहे. अन फक्त विरोधी आवाज उठून दिसतो.
मी देखील श्रेणॆववस्थेच्या विरोधातच आहे अन म्हणूनच मी वरती विचारले आहे की हे बलस्थान आहे की वीकनेस?
चुकीचा अर्थ
श्रेणी व्यवस्थेमुळे 'सदस्यांना' नको असलेली मते झाकली जातात. मात्र ती तिथेच असतात. एक जास्तीचे क्लिक केले की ती मते तशीच दिसतात. 'सर्वसमावेशक' व्यवस्थेत ही मते 'संपादकां'ना नको असली की उडवली जातात व ती दिसत नाहीत.
आवाज नक्की कुठे पुसला जातो याबाबत थोडा विचार करणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम, स्पष्टपणे आणि
सर्वप्रथम, स्पष्टपणे आणि ठामपणे विरोधी मत मांडल्याबद्दल आभार. या प्रतिसादाला अनेकांनी रोचक श्रेणी दिलेली आहे, हेही मला कौतुकाचं वाटतं.
तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला लक्षात आलेलं आहे, पण त्यात श्रेणीपद्धतीचा दोष नसावा. 'फोनमुळे गुन्हेगारांना एकमेकांशी बोलणं सोपं होतं त्यामुळे गुन्हेगारी वाढते' - यात जसा फोनला वाईट ठरवण्यात अर्थ नाही, तसंच श्रेणीपद्धती वाईट नाही. तिचा गैरवापर होतो असं तुम्हाला म्हणायचं असावं. मुळात श्रेणीव्यवस्था ही बऱ्याच चांगल्या प्रतिसादांचं कौतुक जास्त व्हावं व आणि काही मोजक्या वाईट प्रतिसादांना आळा घालणं व्हावं यासाठी अमलात आणलेली होती. सर्वसाधारणपणे ९३% श्रेणी या सकारात्मक असतात तर ७% नकारात्मक असतात असं दिसून आलेलं आहे. म्हणजे अपेक्षेप्रमाणेच वापर होतो आहे असं दिसतं. माझा खात्री आहे की ३ पेक्षा अधिक श्रेणी मिळालेले प्रतिसाद हे निश्चित वाचनीय असतात आणि ज्ञानात किंवा रंजनात भर घालतात.
मिसळपाववर अधिक सदस्य आहेत, आणि अधिक अॅक्टिव्हिटी आहे हे मान्य. त्यामुळेच प्रतिसादसंख्या अधिक आहे. किंबहुना दर दिवशी येणाऱ्या लेखांची संख्या, आणि दर दिवशी येणाऱ्या प्रतिसादांची संख्या यांचं प्रमाण तिपटीहून किंचित अधिक आहे. पण हा तिप्पटीचा आकडा थोडा फसवा आहे हे लक्षात घ्या. ऐसीवरती अनेक ठिकाणी लेख एकत्र करण्याची सोय आहे. उदाहरणार्थ 'ही बातमी समजली का' किंवा 'सध्या काय पाहिलंत' त्यामुळे ट्रॅकरवर जास्त लेख दिसण्याऐवजी तेच मटेरियल मोजक्या लेखांत विभागलं जातं. प्रतिसादांबाबतही तेच. अनेक ठिकाणी 'प्लस वन' किंवा 'प्रतिसाद आवडला' या पद्धतीचे प्रतिसाद न येता श्रेणी दिल्या जातात. त्यामुळे दिसणारी संख्या कमी दिसते. याचा अर्थ मिपावर जास्त लोक नाहीत असं नाही. पण माझा अंदाज आहे की मिपावरचं एकंदरीत लेखन (शब्दसंख्या) बघितलं तर ते साधारण ऐसीच्या दुप्पट असावं. अडीच वर्षांच्या कालावधीत मिपाच्या निम्म्यापर्यंत पोचणं ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. आणि ही अडीच वर्षं मराठी संस्थळांना एकंदरीत फार कठीण गेली. उपक्रम बंद पडलं, मनोगतचा ट्रॅफिक रोडावला, ऐलपैल अजून चालू आहे की नाही कल्पना नाही... तेव्हा ऐसीवर चांगले लेखक वाचक यावेत, त्यांना इथे राहावंसं वाटावं याबाबत व्यवस्थापन भरपूर प्रयत्न करतं आणि त्यांना यशही येताना दिसतं आहे.
एकंदरीत चेहरा बदलण्याबाबत - डावा किंवा उजवा यापेक्षा मला वैचारिक आणि ललित असा भेदभाव करावासा वाटतो. वैचारिक लेखन, चर्चा वगैरे भरपूर होतातच. पण त्याबरोबर ललित लेखन - व्यक्तिचित्रणं, चांगली प्रवासवर्णनं, कथा, चांगल्या कविता वगैरे अधिक येणं श्रेयस्कर वाटतं. अर्थात तो इथे चर्चेचा मुद्दा नाही.
क्लिंटन व विकास यांची नावं तुम्ही घेतली आहेत. पैकी विकास यांनी इथे मुळात फार लिहिलं नाही. क्लिंटन यांनी लिहिलं. पण ते आता संपूर्णपणे मिसळपाववर लिहितात. त्यांचं लेखन मी तिथे आवर्जून वाचतो, आणि आवर्जून प्रतिसादही देतो. त्यांनी इथे लिहिलेलंही आवडेल. कदाचित भविष्यात पुन्हा लिहायला लागतील अशी आशा आहे. पण प्रत्येकच लेखक इथे टिकून राहील अशी खात्री देता येत नाही.
तुमच्या नावाबद्दल सूचना मागणाऱ्या धाग्यावर धमाल दंगा झाला होता तो अजूनही आठवतो. लिहीत चला.
मिपावर
शेकड्याने प्रतिसाद येतात ही भूतकाळातील गोष्ट झाली. पूर्वी जेव्हा मिपावर एक कोलेज-कट्ट्याचे खेळीमेळीचे वातावरण होते तेव्हा ही गोष्ट कमी-अधिक फरकाने खरी होती. पण जसजसे मिपावर अतिउजव्या, संघीय लोकांचे प्रमाण वाढत चालले अहे तसतसे अनेक नेहेमी लिहिणारे लोक गायब झाल्याचे दिसत आहे आणि इथलेही लिखाण रोडावले आहे. आता जुने धागे पुन्हा उसवून लोक थोडी चहलपहल कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी सारखे चैतन्य आता मिपावर नाही. पूर्वी नेहेमी लिहिणारे परा, टारझन, झकासराव, सहजराव, संजोप राव इ. मंडळी गायब झालीत. दुसरे म्हणजे- १० कोटींच्या महाराष्ट्रातले एक अग्रगण्य संकेतस्थळ असल्याच्या दावा करणार्या संकेतस्थळावर ४-५ हजार सदस्य आहेत आणि त्यात ६०-७० कार्यरत सदस्य सोडले तर फारसे कुणी तिथे लिहितही नाही ही स्थिती तिथल्या व्यवस्थापन व संपादकांची वृत्ती स्पष्ट करणारी आहे.
कंपुबाजि आहे
कंपुबाजि हमखास आहे पण विचारवंति किंवा उदारमतवादि लोकांचि नाहि. एका कंपुचे उदाहरण देतो: हायपर सिंग, चॅटमॅन, तणतणोबा, 'भ'th बाजु यांचा एक कंपु आहे. यातिल काहिंनि श्रेणिंविषयि पुर्वि व्यवस्थित गळे काढले आहेत तर काहिंनि श्रेणिव्यवस्थेचि खिल्लि उडवण्यासाठि श्रेण्या दिलेल्या आहेत. पण संकेतस्थळावर हे लोक आणखि थत्ते, जोशि यांचा वावर वारंवार असल्याने प्रशासनातले लोक यांचि नावे घेउन यांचा उदोउदो करतात आणि यांना हरभर्याच्या झाडावर चढवतात. खरेतर लेखन फक्त काहि ज्येष्ठ लोक (कोल्हटकर, चंद्रशेखर, नानावटि) करतात बाकिचे टिवल्याबावल्या करतात. इतर उरलेले आपलि अभिरुचि कशि उच्च आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतात. या सर्व दलदलित नवे लोक येतात आणि उत्साहाने काहिबाहि लिहितात आणि नंतर फिरकत नाहित. ललित लिहिणार्यांचे तर फारच हाल होतात. एखाद-दुसरा लेखन हाच व्यवसाय असलेला काहिबाहि लिहितो, त्याला थोडाफार प्रतिसाद मिळतो.
मिपावर लोक भरभरुन लिहितात. लोकांना काहि लिहिण्यापुर्वि आपल्याला अनुल्लेखाने मारले जाइल असे वाटत नाहि. भटकंति असो किंवा पाककृति असो किंवा पर्सनल प्रॉब्लम्स असो मिपावर लोक मांडतात. तिथे माहितिपुर्ण लिहिणार्यांचि संख्या कमि आहे असेहि काहि नाहि. एकुण सद्यस्थितित मिपावर जाउन वाचायला आवडते. अहो इंग्रजि भाषेतलि माहिति जालावर उपलब्ध असतांना सेकंडहँड माहितिपुर्ण प्रतिसाद, लिंका, चुकिचे इंग्लिश नि कर्कश्श पिसिंग काँटेस्ट पहायला नवे लोक येतिलच असे नाहि. ते जाउद्या विकिपिडियावर माहिति असो कि लिखानाचे वर्कशॉप असो कि छोटे बौद्धिक कट्टे असो यातला कुठला उपक्रम यशस्वि झाला आहे?
असो.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आत्ता प्रतिसाद लिहिताना तुमचा आयडी 'ऐसिभाट ऋषि' होता... उत्तर देता देता तो बदलला ते बघून गंमत वाटली.
एका कंपुचे उदाहरण देतो: हायपर
एका कंपुचे उदाहरण देतो: हायपर सिंग, चॅटमॅन, तणतणोबा, 'भ'th बाजु यांचा एक कंपु आहे. >> ही सगळी तुमचीच डिस्प्ले नावं होती ना?
अरविंद कोल्हटकर
अरविंद कोल्हटकर ह्यांचे लेखन आपणास आवडते असे आपण लिहिले आहे.
तुम्हाला रस असू शकेल अशी एक गोष्ट व्य नि केली आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अवांतर
अवांतर निरीक्षण - ऱ्हस्व-दीर्घाचा वापर (किंवा विटाळ) रोचक आहे. कळावे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुम्ही त्यांची जुनी स्वाक्षरी
तुम्ही त्यांची जुनी स्वाक्षरी विसरलात वाट्टं www.aisiakshare.com/node/2738#comment-53572 या+आसपासच्या प्रतिसादांवरुन थोडी आयड्या येइल.
दलदलित
पहिल्यांदा पददलित सारखी नवी संज्ञा आहे असे वाटले, पण नंतर लक्षात आले.
प्रथमतः हा मिपा वि ऐसी असा
प्रथमतः हा मिपा वि ऐसी असा सामना नाहीच आहे. तर ऐसीमध्ये सुधारणा कशा घडवून आणता येतील याची घेतलेली प्रयत्नपूर्वक दखल आहे अन त्यावर प्रतिक्रिया देणे अपेक्षित आहे.
दुसरे हे की जी गोष्ट आपल्याला उदोउदो वाटू शकते तीच काही जणांनी दिलेली जेन्युइन (प्रामाणिक) कॉम्प्लिमेन्ट असू शकते. मलाही हेच वाटते की शक्यतो कॉम्प्लिमेन्ट्स खवतून द्याव्या/घ्याव्या. अन फोरमवरती फॉरमल अन अनबायसड (निरपेक्ष)असावे. पण तो माझा विचार झाला अन सार्यांनी सहमत व्हावेच असे नाही.
ऐसी सुरु किती वर्षे झाली आहेत की ज्यायोगे असा क्वान्टिफायेबल फरक दिसू शकेल?
असे अजिबात नाही. अस्मि कधीच दाखवत नाही किंबहुना मी एकदा तिचे याबद्दल कौतुक केलेले की सर्वांनी मठ्ठ व रद्दी ठरविलेल्या सिनेमांबद्दल ती चांगले २ शब्द लिहीण्याचे धाडस दाखविते. नगरी निरंजन, "न" वी बाजू यांनी व मी देखील, कधी फार उच्च अभिरुचीचा "आव" आणल्याचे मला स्मरत नाही.
आपल्याला, आता सिलेक्टिव्ह रीडींगच करायचे असेल तर कोण काय करु शकते?
ज्याला तुम्ही टिवल्याबावल्या म्हणता ते अन्य संस्थळांवर होत नाही का?
अन माझा अजून एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे की - २ काय किंवा १०० काय संस्थळांशी लॉयल्टी राहू शकत नाही का? ऐसीवर सुधारणा सांगण्यासाठी , आपण अन्य संस्थळाशी कसे लॉयल आहोत याची टिमकी/जंत्री लावलीच पाहीजे का?
आता आमच्या नावाचा ज़िक्र झालाच आहे, तर...
...आमच्यापुरतेच बोलतो.
अभिरुची? यह किस चिडिया का नाम है?
(नाही म्हणायला, सिंहगड रस्त्यावर 'अभिरुची' म्हणून कोठल्याश्या खाण्याच्या जागेबद्दल आठवले. "भिडेबाग"१ की कायसेसे म्हणतात त्याला.)
------------------------------------------------------------------------------------------------------------
१ "कारण शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार?" - पु.ल.
आतले-बाहेरचे
सर्वप्रथम खुलासा: मी मराठी संकेतस्थळांवरचा नियमीत वाचक/ प्रतिसादक आहे. मिसळपाव.कॉम इथे मी अजूनही नियमीत लिखाण करतो.
मिसळपाव.कॉम हे माझे सध्याचे सर्वात आवडते संकेतस्थळ असले तरी तिथल्या मर्यादांमुळे, (जसे की संपादनातील मनमानी) सुरुवातीला मला ऐसी अक्षरे हा एक उत्तम पर्याय वाटला होता. मी नव्याने इथे रुजु झाल्यानंतर मला इथे सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे इथले मोकळे वातावरण. संपादकांची नावे उघड असणे आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा मार्ग खुल असणे.
परंतु त्या नंतर मी इथे लिखाण थांबवण्याचे एकमेव कारण म्हणजे श्रेणी हा प्रकार. श्रेणी हा प्रकार पूर्णपणे मजा घालवणारा आहे कारण तो अत्यंत छुप्या पद्धतीने केला जातो. नक्की कोण कोण श्रेणी देते आणि त्यांना श्रेणी देण्याचा अधिकार का आहे ह्याचा खुलासा कुठेही केलेला नाही. ज्या पारदर्शीपणामुळे मी इथे आलो त्यालाच तडा देणारा हा प्रकार होता. मी सुरुवातीला एक फु़टकळ प्रतिसाद दिला होता, त्यावर लगेच एकाने 'निरर्थक' ही श्रेणी देऊन मला इथे आपले स्वागत नसल्याचे जाणवुन दिले. त्यामुळे मी नंतर इथे बरेच दिवस फिरकलो नाही. काही दिवसांनी परत आल्या नंतर मला पुन्हा ही श्रेणी बदलून कुणीतरी रोचक केल्याचे दिसले. अर्थात मूळ प्रतिसाद निरर्थक नसला तरी फारसा रोचक वगैरेही नव्हता. आणि हे सगळे अत्यंत गुप्तपणे केले जात असल्याने अत्यंत अविश्वासाची भावना निर्माण झाली. ह्या कारणामुळे इथे अनेक नविन सदस्य पुन्हा फिरकत नाहीत. त्यातच इथे कंपू निश्चितच आहेत. बरेच सदस्य खूपच सलगी असल्या सारखे सतत प्रत्येक धाग्यावर एकमेकाना प्रतिसाद देत असतात ज्यामुळे नविन सदस्यांना सतत आपण बाहेरचे आहोत ही भावना वाढीस लागते. त्यात कट्टे आणि तिथे जाणारे तेच ते सदस्य आणि त्यावरचे रटाळ लेख हे भर टाकणारे असतात.
ह्या सगळ्याचा परीपाक असा होतो की, आधीच आपण बाहेरचे आणि त्यात हे आतले आपले मूल्यांकन श्रेण्या देऊन करणार असा समज होऊन परत येण्याचे मोटीवेशन राह्त नाही. त्यामुळेच इथे फक्त तेच ते लोक सातत्याने एकमेकाची पाठ थोपटणारे लिहित असतात. संकेतस्थळांवर मजा आणणारे वादवाविवाद (सोप्या शब्दात मारामार्या) इथे फारसे होत नाहीत आणि इथे मन रमत नाही.
ह्या सगळ्यामुळेच हे लिहिण्यासाठी मला माझी आंतरजालावरील नेहमीची ओळख इथे वापरावीशी वाटली नाही. ह्यात ट्रोलिंग करण्याचा हेतू नसुन चालकांना अनबायस्ड मत कळवणे हा आहे.
बाकी चूक भुल देणे घेणे.
काही दिवसांनी परत आल्या नंतर
श्रेणीसुविधा ही मराठी संस्थळांवर नवीनच आहे. ऐसीवर जेव्हा ती वापरायला सुरूवात केली तेव्हापासून सर्वच श्रेणीदाते, संपादक आणि ज्यांना श्रेणी मिळते ते, अशा सर्वांसाठीच एक लर्निंग कर्व्ह होता. श्रेणीची किंमत ही बेरीज-वजाबाकीतून ठरते. जर एकाला एखादा प्रतिसाद निरर्थक वाटला, आणि दोघांना तो चांगला वाटला तर धन श्रेणी मिळेल. अनेक वेळा आम्ही संपादक अशा कमी श्रेणीचे प्रतिसाद तपासून चुकून कुठच्या चांगल्या प्रतिसादाला वाईट श्रेणी मिळालेली असेल तर ती दुरुस्त करतो. त्यामुळे दुरुस्त करताना 'रोचक' मिळावी, का सर्वसाधारण की उपेक्षित मिळावी हे तितकंसं महत्त्वाचं नाही. सर्वसाधारण प्रतिसादाला गरज नसताना वाईट श्रेणी मिळाली आणि ती बदलून पुन्हा प्रतिसाद उघडा होणं महत्त्वाचं.
असो. तुम्ही संस्थळांचे वाचक आहात, तेव्हा एक विनंती करतो. ऐसीवरचे कुठलेही दोनचार लेख उघडा आणि त्यातल्या प्रतिसादांना मिळालेल्या श्रेणी तपासून पहा. मला खात्री आहे की चांगली श्रेणी मिळालेले प्रतिसाद खरोखरच वाचण्यासारखे असतात. तसंच वजा श्रेणी फार कमी प्रतिसादांना मिळते. आणि तेही प्रतिसाद उघडून वाचण्याची सर्वांना सोय असते. ज्यांना श्रेणीमध्ये काही अर्थ वाटत नाही त्यांना त्या किमतीकडे दुर्लक्ष करण्याची पूर्ण संधी आहे.
असो. अनबायस्ड मताबद्दल धन्यवाद.
श्रेणी ही पद्धत छुप्या
श्रेणी ही पद्धत छुप्या पद्धतीने होते त्यामुळे पारदर्शकतेला तडा जातो. इथे लोक मुख्यत्वे स्वांतसुखाय लिहितात. आपल्या लिखाणावर कुणी 'निरर्थक' असा शेरा मारणे हे लिखाण उडवण्यापेक्षा अपमानास्पद आहे. आणि हा शेरा कुणी मारला हे लिहिणार्याला माहित नसल्याने, एखादा छुपा कंपू आपल्याला टारगेट करत आहे असा समज होणे स्वाभाविक आहे. जो पर्यंत श्रेणीदानाची सुविधा ही सर्व सदस्यांना मिळत नाही किंवा ती कुणाला आहे आणि कोणत्या निकषावर दिली आहे हे स्पष्ट होत नाही, तो पर्यंत माझ्या सारखा नवा सदस्य इथे रुळणे कठीण आहे. ह्याचा अर्थ ऐसी हे वाइट स्थळ आहे असे नाही, ऐसीवरही चांगले लिखाण होते. पण ते इतर स्थळांवरही होते आणि मूख्य सदस्य सगळीकडे तेच असल्याने खास इकडे येण्याचे कारण रहात नाही. एखादी वाचनमात्र चक्कर इतपत वावर माझा नक्की असतो.
'छुपे' वगैरे म्हणत आहात, पण
'छुपे' वगैरे म्हणत आहात, पण जालावर सगळेच आयडी असतात तेव्हा नक्की कोण याला काय अर्थ आहे? आपल्या लोकशाहीत गुप्त मतदान पद्धतीने आपण आपले प्रतिनिधी निवडतो. या पद्धतीचे फायदे आहेत, म्हणून आपण ती स्वीकारतो.
याच्या बरोब्बर विरुद्ध अनेकांना वाटू शकतं, वाटतंही. त्यामुळे कुठच्याच व्यवस्थेत सर्वच जण समाधानी आहेत असं होणारच नाही. इथे आम्ही ही व्यवस्था राबवलेली आहे, जी अनेकांना आवडते, काहींना आवडत नाही. त्यावर काही इलाज नाही. मला वाटतं आहे त्या व्यवस्थेचा फायदा घेऊन त्यातून चांगलं काय घडवता येईल ते पहावं.
तसे निकष कुठच्या संस्थळांवर मांडलेले असतात? संपादक कोण होणार याचे निकष कोण ठरवतं? किंबहुना किमान एका तरी संस्थळावर खरडवही आणि व्यनिची सुविधा मिळण्यासाठी सदस्यांना आपला वावर एस्टॅब्लिश करून वाट बघायला लागायची. स्वतःचे धागे आणि प्रतिसाद संपादित करण्याची सुविधा अनेक ठिकाणी नसते. तरी ऐसीवर आम्ही वापरत असलेले निकष सांगतो.
१. जालावर - म्हणजे इतर संस्थळांवर, फेसबुकवर, ब्लॉग्जवर असलेला सभ्य, सकारात्मक वावर
२. ऐसीवर नव्याने केलेला सभ्य, सकारात्मक वावर (लेख लिहिणं, मनापासून प्रतिसाद देणं इ.)
हे दोन मुख्य निकष आहेत. यांच्या आधारावर सुमारे ३०० सदस्यांना श्रेणीचे अधिकार दिलेले आहेत. जसजसे नवीन सदस्य येतात, तसतशी यात भर पडते. आता या सगळ्यांच्या याद्या कुठे जाहीर करत बसायचं? तुम्हाला जर ३०० लोकांचा कंपू आहे असं वाटत असेल तर काय करणार?
लोकशाहीची तुलना अत्यंत चुकीची
लोकशाहीची तुलना अत्यंत चुकीची आहे. लोकशाहीत कुणी ४ लोकांचे पॅनेल बसुन कोण सभ्य आणि कुणाला मतदानाचा अधिकार द्यावा हे ठरवतात का? असो. माझी ह्या प्रकाराशी असहमती आहे. कुठलेही स्पष्टीकरण सुसंगत वाटले नाही.
जो काय निर्णय तो चालकांनाच घ्यायचा आहे.
कसे पाहता, यावर अवलंबून आहे.
आम्ही बुवा आम्हांस 'भडकाऊ' श्रेणी मिळाल्यास आमचा तो बहुमान समजतो. शर्टाच्या बाहीवर चार चांद चढल्याचे समाधान लाभते. 'येस्स्स्स्स्!', 'याचिसाठी केला होता अट्टाहास!' असे होते. अंगावरच्या (अगोदरच भरपूर असलेल्या) मांसात आणखी एका मुठीची भर पडते. आसमान ठेंगणे होते. स्वर्ग केवळ दोनच बोटे दूर उरतो. इ.इ.
दुसरी गोष्ट, (मला जितपत समजते, त्यानुसार) श्रेणीव्यवस्था ही लेखकाकरिता, अभिपायात्मक, नसून, इतर वाचकांकरिता, शिफारसवजा आहे. लेखकास त्याचे काय म्हणून सोयरसुतक असावे? लेखकास जे वाटते, ते त्याने लिहावे; वाचकांनी - असलेच तर - ते वाचावे की नाही, आणि त्यांस त्याबद्दल काय वाटावे, ते त्यांनी आपापले ठरवावे. ते त्यांना आपापल्या मनाने ठरवता आले, तर उत्तमच (भले लेखकास ते पटो वा न पटो); ते त्यांस आपापल्या मनाने ठरवता येत नसेल, तर अशा वाचकांकरिता, फॉर व्हॉटेवर दे आर वर्थ, ते ठरविण्याकरिता शिफारस म्हणून, फॉर व्हॉटेवर इट इज़ वर्थ, ही श्रेणींची सुविधा आहे, इतकेच.
(आम्ही तर बुवा आम्हांस काय पाहायचे/वाचायचे वगैरेंसाठी श्रेणी-शिफारशी-अभिप्राय यांच्यावर अवलंबून नाही राहात. किंवा कधी क्वचित राहिलोच, तर समीक्षकांकडून 'अत्यंत ब्येक्कार' म्हणून अभिप्राय मिळालेला पिच्चर आम्हांस नक्की आवडणार, अशा अर्थाने. तेव्हा, लिहिणार्याने लिहीत जावे, श्रेणी देणार्यांनी श्रेणी द्यावी, आणि वाचणार्यांनी त्यांकडे दुर्लक्ष करून आपल्याला हवे तेच वाचावे, हे उत्तम.)
आणि, आपल्याला आपले लिखाण उत्तम असल्याबद्दल इतका आत्मविश्वास जर असेल, तर मग आपल्या लिखाणास कोण काय श्रेणी देतो, याची फिकीर आपण काय म्हणून करावी? आणि समजा, स्वतःच्या मगदुराप्रमाणे ते लिखाण न जोखता एखादा वाचक जर लिखाणास मिळालेल्या श्रेणीवर अवलंबून राहत असेल, तर अशा वाचकाने आपले लिखाण वाचले काय, किंवा न वाचले काय, त्याने आपल्याला काय फरक पडावा? उलटपक्षी, अशी फिकीर जर आपणांस असेल, असा फरक जर आपणांस पडत असेल, तर ते आपल्या लिखाणाच्या दर्जाबद्दलच्या आपल्या आत्मविश्वासाच्या अभावाचे द्योतक मानता यावे काय?
आणि एवढीच जर मिळणार्या श्रेणींबद्दल आपल्याला फिकीर असेल, तर मग मागून घ्याव्यात की आपल्याला हव्या त्या श्रेणी बिनधास्त! आम्हीही हेच करतो - सरळसरळ "कोणीतरी दोनचार 'माहितीपूर्ण' आणि चारपाच 'भडकाऊ' द्या रे!" असा आवस निर्लज्जपणे मागतो.
(कोणीतरी एकदोन 'मार्मिक', तीनचार 'माहितीपूर्ण' आणि चारपाच 'भडकाऊ' द्या रे या प्रतिसादाला!)
कितीही आव आणला तरी असले लिखाण
कितीही आव आणला तरी असले लिखाण मला ढोंगी वाटते. आंतरजालावर बहुसंख्य लोक का लिहितात? ह्याचा जरा प्रॅक्टीकली विचार करुन पाहा म्हणजे तुमचे हे मुद्दे किती कागदी आणि पोकळ आहे लक्षात येइल. अर्थात असा विचार करण्याची क्षमता तुमच्यामधे असण्याची मला प्रामाणिक शंका वाटते.
ह्यावर मलाच खोडसाळ श्रेणी!
ह्यावर मलाच खोडसाळ श्रेणी! वा!! आय रेस्ट माय केस.
...
ज्यास/जीस कोणास या प्रतिसादास 'खोडसाळ' श्रेणी द्यावीशी वाटली, त्याने/तिने ती दिली. त्याचा/तिचा प्रश्न. आपणांस/आम्हांस काय त्याचे?
असो. आम्ही आपणांस आता 'मार्मिक' अशी श्रेणी दिली आहे. ह्याव फन!
असो. आम्ही आपणांस आता
असो. आम्ही आपणांस आता 'मार्मिक' अशी श्रेणी दिली आहे. ह्याव फन!
धन्यवाद! श्रेणीप्रकाराचा फोलपणा ह्याहुन चांगल्या पद्धतीने ह्याच धाग्यावर सोदाहरण स्पष्ट करता आला नसता.
+१
मार्मिक! अन् नेमके!
पण आता या प्रकारातील फोलपणा लक्षात आल्यावर, जरा दुसरीही बाजू लक्षात घ्या ना! या प्रकारातील जबरदस्त करमणुकीचे पोटेन्शियल आपल्या ध्यानात येत नाही काय?
या प्रकारातील जबरदस्त
या प्रकारातील जबरदस्त करमणुकीचे पोटेन्शियल आपल्या ध्यानात येत नाही काय?
हाहाहा हा मुद्दा जबरा आहे खरा. राजेश घासकडवी प्लीज नोट!
...
मग तसे म्हणा की बिनधास्त! 'वाटते' कशाला, 'आहे' म्हणा! मी तुम्हाला 'मार्मिक' देईन, प्रामाणिकपणाकरिता!
असाच कशाला, मुळात कसाही विचार करण्याची क्षमता आमच्यात
आहेअसू शकेल, अशी पुसटशी का होईना, शंका आपणांस आली, भरून पावले.मनापासून आभारी आहे.
(आम्ही तर बुवा आम्हांस काय
सहमत! चित्रपट समीक्षा हा अत्यंत बिन्बुडाचा प्रकार आहे हे माझ मत आहे.
आणि ऐसीच्या संदर्भात तर मी भडकाऊ, खोडसाळ या श्रेण्या असलेले प्रतिसाद आवर्जून वाचतो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
श्रेणीपद्धत
श्रेणीपद्धतीने नेमके काय बिघडते हे खरेच कळत नाही. वाईट श्रेणी मिळाल्या तरी प्रतिसाद उडत तर नाहीत? ( 'जात' मधले काही उडालेले प्रतिसाद हे अपवाद असावेत.) समजा श्रेणी इथे दिसल्या नसत्या मात्र लोकांच्या मनात राहिल्या असत्याच, तर? आपण असेच समजावे की झाले. श्रेणी दिल्या नाहीत म्हणून तो प्रतिसाद सगळ्यांना आवडला आहे किंवा आवडला नाही असे ठरत नसते. इथले एक वैशिष्ट्य म्हणजे इथे द्वेष, शत्रुबुद्धी अजिबात नाही. उगीचच कुजके, घाणेरडे, मत्सरग्रस्त आणि एकेरीवर उतरणारे प्रतिसाद नाहीत. शिवराळपणा आणि फुल्याफुल्या नाहीत. त्यामुळे 'मौजमज्जा' थोडी कमी आहे. फुल्याफुल्या असल्या तर फक्त किंचित चावट विनोदासाठी असतात. 'मौजमज्जा' कमी असेल तेथे वर्दळ कमी असणारच. शिवाय येथे वैयक्तिक माहिती देखील फारशी कुणी मांडत नाही. त्यामुळे त्यातूनही ब्रौनी पॉइंट्स मिळण्याजोगे नाहीत. कट्ट्यांची वर्णने तर इतर संस्थळांच्या तुलनेत अगदीच कमी आहेत. ठीकच चाललेय की.
नावे घेऊन लिहिले जात आहे म्हणून.....
मी मिसळपाववर प्रथम सदस्य झालो आणि नंतर उपक्रमवर गेलो. मी मराठीवरही तुरळक वावर केला (त्यामुळे गब्बरसिंग यांचा आधी परिचय झाला नाही).
मिसळपाववर ट्रॅफिक फार असते आणि त्याचा कधीकधी तोटाही होतो. तुम्ही ऑफ लाईन असल्याच्या काळानंतर पुन्हा लॉगइन केले तर तुम्ही फॉलो करत असलेला धागा पार तिसर्या पानावर गेलेला असतो.
उपक्रम विशिष्ट कंपूबाजीमुळे बंद पडले यावर सहमत होणे शक्य आहे. (पण त्यामुळे ते बंद पडले असे नाही. त्यावरचा लोकांचा वावर कमी झाला. ते बंद पडले नाही. आजही ते टेक्निकली चालू आहे). तेथील सदस्यांना "इथे मऊ माती खणण्यापेक्षा तिकडे जाऊन कठीण दगड खणा" (पक्षी मिसळपाववर जाऊन आपले पुरोगामी म्हणणे पटवा) असा सल्ला मी देत असे. अर्थात मिसळपाव हे ठार पुराणमतवादी संस्थळ नाही. पण मिसळपाववर कंफर्टेबल वाटणार्यांना हाच 'मऊ माती कठीण दगड' सल्ला दिला जाऊ शकतो.
मिसळपाव हे अनेकदा पुराणमतवाद आणि विवेकवाद यांच्यात आंदोलने घेत असते. मी जॉइन झालो तेव्हा ते बरेच पुराणमतवादी* होते नंतरच्या काही काळात ते बर्यापैकी बॅलन्स्ड वाटू लागले होते. परत पुन्हा ते पुराणमतवादी झाल्यासारखे वाटत आहे. अशी आंदोलने असल्यामुळे मिसळपावबद्दल विधान करता येणार नाही.
*संस्थळ पुराणमतवादी होते म्हणजे पुराणमतवाद हे काही संस्थळाचे किंवा संपादकांचे अधिकृत धोरण नव्हते. तिथे वावरणार्या सदस्यांपैकी अशा विचारांच्या अॅक्टिव्ह सदस्यांची संख्या जास्त होती. पण कधीकधी संपादकांच्या राजकीय मतांचा प्रभाव संपादनावर पडत असावा. उदा. तिथे एका पक्षाच्या धोरणाची/नेत्याची भलामण करणारा लेख उडवला गेला. त्याचे कारण मी विचारले असता 'राजकीय प्रचाराचे व्यासपीठ म्हणून मिपाचा वापर होऊ नये असे धोरण आहे' असे सांगितले गेले. परंतु प्रतिसादांतून पक्षांवर नेत्यांवर टीका करणे सर्रास चालत असते. तेव्हा संपादकांची वैयक्तिक मते हे बर्याचदा धोरण असते. ऐसीवर निदान तसे होत नाही. कारण संपादनच होत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
असे का?
असे का होते ते ही सांगून टाका आता.
-Nile
ह्या प्रतिसादाला 'मार्मिक-५'
ह्या प्रतिसादाला 'मार्मिक-५' ही श्रेणी आहे. ही इथली सर्वोच्च श्रेणी आहे. आता ह्या प्रतिसादा असे काय आहे की धागा उघडल्या उघडल्या मी तो वाचावा? तसे पाहिले तर मिसळपाव ह्या स्थळावर टीका करण्याचे आमंत्रण देणारा काहीसा खोडसाळ प्रतिसादच आहे. अर्थात इथल्या 'आतील' सदस्यांना हा प्रतिसाद उच्च दर्जाचा मार्मिक वाटू शकतो, पण बाहेरच्यांना कधीच वाटणार नाही.
प्रतिप्रश्न
धागा उघडल्याउघडल्या हा प्रतिसाद वाचावा की नाही, हे ठरविण्याकरिता त्याला मिळालेली श्रेणी प्रथम पाहण्याची गरज आपणांस का भासावी? आपणांस आपली स्वतंत्र प्रज्ञा, सदसद्विवेकबुद्धी इ.इ. नाही काय?
उलटपक्षी, ज्यांना अशी गरज भासते, त्यांच्याकरिता ही सुविधा आहे, ती असू द्या की! त्याने आपल्याला काय फरक पडतो?
(अवांतर: यालाच 'लिबरल विचारसरणी' असे म्हणतात. किमानपक्षी, असे आम्ही तरी समजतो. 'लिव्ह अँड लेट लिव्ह', आणखी काय पाहिजे?)
धागा उघडल्याउघडल्या हा
धागा उघडल्याउघडल्या हा प्रतिसाद वाचावा की नाही, हे ठरविण्याकरिता त्याला मिळालेली श्रेणी प्रथम पाहण्याची गरज आपणांस का भासावी? आपणांस आपली स्वतंत्र प्रज्ञा, सदसद्विवेकबुद्धी इ.इ. नाही काय?
हे तुम्ही इथले मालक/चालक, राजेश घासकडवी ह्यांना सांगा. श्रेणी स्कोर बघून प्रतिसाद वाचा ही त्यांची शिफरस आहे, माझी नाही.
...
शिफारस त्यांनी करावी. ती मानावी की नाही, हा तुमचा प्रश्न. ते ठरविण्याकरिता तुम्हाला त्यांची परवानगी बहुधा लागू नये. खात्रीने सांगू शकत नाही किंवा त्यांच्या वतीने बोलूही इच्छीत नाही, परंतु बहुधा त्यांची तशी अपेक्षाही नसावी.
अहो पण शिफारस ते करतायत तुमचे
अहो पण शिफारस ते करतायत तुमचे मार्गदर्शन त्यांना द्या..मला कशाला? असे म्हणायचे होते.
उत्तर
१. सर्वप्रथम, सगळे प्रतिसाद तुम्हाला कळलेच पाहिजेत हा हट्ट सोडा. काही प्रतिसादांना 'कंटेक्स्ट' असतो. तुम्ही संस्थळांवर अनेक दिवस आहात असे लिहले आहे. म्हणजे एकतर तुम्ही मी लिहलेला कंटेक्स्ट माहित असण्याइतके दिवस संस्थळांवर नसणार किंवा तुम्हाला कंटेक्स्ट माहित नसण्याचा खोटा आव आणत असणार. ते काहीही असो, ज्यांना कंटेक्स्ट समजला त्यांनी मार्मिक श्रेणी दिली असावी.
२. प्रत्येक संस्थळांवर तुम्हाला आपल्यातल्याच समजलं जाव हा हट्ट सोडा. नाहीतर लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करा. एका फुटकळ प्रतिसादाला निरर्थक म्हणून 'रिस्पॉन्स' मिळाला म्हणून लिखाण बंद केल्याने तुम्ही कोणत्याच लोकांना "आपले" वाटणार नाही आहात.
(आम्ही अनेक संस्थळांवर वावरलो. पण फार कमी संस्थळांवर आम्हाला लोकांनी आपल्यातलाच समजलं. पण तसं त्यांनी समजावं असं आम्हाला कधी वाटलंही नाही.)
३. कोणत्याही संस्थळावर कोणतीही सुविधा सर्वांनाच मानवेल असे नाही. श्रेणी व्यवस्थेबद्दल इथे चर्चा अनेकदा झाली आहे. बहुसंख्यांचे मत त्याला अनुकूल दिसते. तुमचे मत तुम्ही मांडले (असेच मत इथे वावरणार्या इतरांनीही, पूर्वीही मांडले आहे.), पण आपल्या मताप्रमाणेच व्हावे हा हट्टही सोडा.
वरील मते माझी वैयक्तिक मते आहेत. मी व्यवस्थापक/संपादक वगैरे नाही ही तुम्हाला मुद्दामहून सांगतो.
-Nile
प्रत्येक संस्थळांवर तुम्हाला
प्रत्येक संस्थळांवर तुम्हाला आपल्यातल्याच समजलं जाव हा हट्ट सोडा.
हेच जर इथल्या चालकांचे मत असेल तर 'इथे कंपूबाजी आहे का?' वगैरे चौकशा करणे थांबवावे. मलाही वांझोट्या चर्चांमधे मुद्दामहुन येउन लिहायची इच्छा नाही.
चालकांचा काय संबंध?
म्हणजे? सदस्यांनी कोणाला आपल्यातलं समजावं अशी पॉलिसी चालक ठरवतात असे वाटते की काय तुम्हाला? मग बरोबर आहे. भलते गैरसमज असायचेच तुमचे.
शिवाय, जरी चालकांनी पॉलिसी केली तरी आमच्यासारखे अशा पॉलिसींना भीक घालत नाहीत, पण हे तुम्हाला इतक्यात कळायचे नाही हे स्पष्टच आहे.
-Nile
सर्व सदस्यांनी स्थळाला आपले
सर्व सदस्यांनी स्थळाला आपले समजुन लिहावे ही चालकांची धारणा असावी. तशी नसल्यास असे धागे काढणे ही वांझोटी चर्चा आहे. इथे कंपूबाजी आहे आणि पटत नसेल तर फुटा ही पॉलीसी ठेवण्याचा प्रामाणिकपणा असावा.
उगाच
श्रेणीमुळे तुम्हाला "आपल्यातलं" वाटत नाही हा तुमचा मुद्दा आहे. श्रेण्याद्वारे लोक कंपुबाजी करतात असाही तुमचा दावा आहे, त्याच्या समर्थनार्थ तुम्ही काही दाखले दिलेले नाहीत. शिवाय एका प्रतिसादाला निरर्थक श्रेणी मिळाल्याने तुम्ही संस्थळ सोडून गेलात असे तुम्हीच लिहलेले आहेत. मी दिलेले प्रतिसाद ह्या मुद्द्यांना उद्देशून होते. ते तुम्हाला कळलेले नाहीत किंवा तुमचे सोयीस्कर विषयांतर चाललेले आहे.
असेल बापडी. पण म्हणून सदस्य तसेच वागतील याची खात्री काय? उगाच काहीही! एकंदरीत तुमचे प्रतिसाद पाहता, 'श्रेणी व्यवस्था बंद करा नाहीतर मी येथे लिहणार नाही', असे तुमचे म्हणणे दिसते. जे मला हास्यास्पद वाटते. त्यामुळे हा माझा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद.
-Nile
श्रेणि सबकुछ नहि है
तुम्हाला श्रेणिकडे लक्ष देउ नका असे सांगणार्या लोकांचा प्रतिसाद काउंट पहा. रोजच्यारोज येउन प्रतिसाद द्या, काउंटर हलता ठेवा मग व्यवस्थापक-चालक मंडळि मौजमजेचा धागा काढुन तुमचा नामोल्लेख करतिल मग तुम्हि श्रेणिकडे दुर्लक्ष कराल कारण तुम्हि तेव्हा एस्टॅब्लिश झाले असाल.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
मिप्रे,
पण रमताराम यांनी "ऐसी चे महाभारत" हा मौजमजेचा धागा काढलेला अन ते संस्थापक नाहीत. तेव्हा आपण उल्लेखिलेला मुद्दा गौण ठरतो.
मित्रपरिवार
अहो सारिकातै हे मल्टिलेवल मार्केटिंगटाइप आहे. कधि मेघना यांनि तर कधि शहराजाद यांनि असे धागे काढुन सत्कार केलेला आहे. हे लोक संस्थापकांच्या कंपुतले आहेत. या प्रतिसादातला पांढर्या ठशातला भाग वाचा.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
महामहीं
यावरून आम्ही फेसबुकावर बरेचदा वापरतो ती म्हण पुन्हा एकदा लिहायचा मोह होतो आहे.
'आपले ते कडवे, दुसर्याचे ते बडवे'... शिवाय इथे आणखी एक पुस्ती जोडायचे सुचले. '... उरलेले ते नुसतेच रडवे'.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
थत्तेचाचांशी सहमत आहे. मला
थत्तेचाचांशी सहमत आहे. मला ऐसी आवडत कारण ऐसी जरा छोटं आहे. मित्रांच्या कट्टयासारखं वातावरण आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
विरोधी बाजूचे 'प्रामाणिक'
विरोधी बाजूचे 'प्रामाणिक' प्रतिसाद यायला लागले हे चांगले झाले.
श्रेणीव्यवस्थेबद्दल जे काही आक्षेप आहेत ते दूर करायचा प्रयत्न वेगवेगळ्या सदस्यांनी केलाच आहे. पण मुळात हे आक्षेप यावेतच का हे मला अजूनही कळाले नाही. 'कंपुबाजांनी'(??) खोडसाळ, निरर्थक अशा श्रेण्यांचा 'भडीमार'(??) करुन दाबून टाकलेल्या प्रतिसादांची लिँक देउ शकेल का कोणी? नक्की कितीजणांनी त्या श्रेण्या दिल्या आहेत हे बघायचय. 'एक निरर्थक मिळाली म्हणुन मी खट्टू झालो आणि जिथे अख्खे प्रतिसादच उडतात तिथे परत गेलो' हे जरा लहान मुलांसारखं कारण वाटतय.
तुमचा प्रतिसाद मला अजिबात
तुमचा प्रतिसाद मला अजिबात पटला नाही. आणि खरे सांगायचे तर अशा प्रकारचे लिखाण (किंवा हा अॅटीट्यूड म्हणा) इथे येण्यास परावृत्त करते. आपल्या लिखाणावर कुणी 'निरर्थक' असा शेरा मारणे हे लिखाण उडवण्यापेक्षा अपमानास्पद आहे. हा मानवी स्वभाव आहे. इथे लिहिणारे हे कशासाठी लिहितात? ह्याचा विचार करा. लिखाण उडवले गेले तर मला राग येतो. पण कुणी 'निरर्थक', 'उपेक्षीत' असला 'उच्चभ्रूपणा' केला की अपमानास्पद वाटते.
तरी हे तुम्ही प्रतिसादात लिहिलेत म्हणून मी प्रतिवाद तरी करू शकलो. कदाचित माझा गैरसमज असेल आणि तुम्ही तो दूरही कराल. पण समजा आपण नुसतीच 'बालिश' अशी श्रेणी देउन गेला असतात तर मी इथे कधीच परत लॉगीन केले नसते. कारण हा संवादच झाला नसता. जो अशा प्रकारच्या मंचांचा प्राण आहे. ह्यातून श्रेणी व्यवस्थेतला धोका लक्षात यावा.
कारण हा संवादच झाला नसता. जो
खरे आहे. मी "संवादातील ओलाव्यास मुकतो" यातून हेच सांगायचा प्रयत्न केलेला जो आपण खूप छान मांडला आहेत.
१. माझा प्रतिसाद केवळ
१. माझा प्रतिसाद केवळ तुम्हाला उद्देशून नव्हता. विरुद्ध बाजूने आलेल्या तिन्ही प्रतिसादाचा मला समजला तसा सारांश काढून दिलेल एक मत एवढाच त्याचा अर्थ.
२. तुमचा मुळ प्रतिसाद बराचसा गैरसमजूतीवर आधारीत असल्यासारखा मला वाटला. (कट्टे, तिथे जाणारे तेच ते सदस्य, त्यावरचे रटाळ लेख, सदस्यांमधे खूपच सलगी ???). त्यावरुन तुम्ही ऐसी नियमीतपणे वाचत नाही हा अंदाज.
३. आपल्या लिखाणावर कुणी 'निरर्थक' असा शेरा मारणे हे लिखाण उडवण्यापेक्षा अपमानास्पद आहे. हा मानवी स्वभाव आहे. > हा 'तुमचा' स्वभाव आहे. तुमच्या लेखावर 'ह्या कैच्याकै निरर्थक लिहीलय' असा प्रतिसाद आला तर तुम्ही काय करता? कोणी प्रतिसाद दिलाय हे लक्षात ठेऊन जमेल तेव्हा जमेल तसा वचपा काढता?
४. श्रेणी कोणी दिली आहे त्यापेक्षा ती कितीजणांनी दिली आहे हे पहावे. जे आपापल्या प्रोफाइलवर जाउन मिळालेल्या श्रेणीवर क्लिक केल्यास कळते. एखाद्याने ऋण श्रेणी दिली असल्यास त्याचा फार बाऊ करायची गरज नाही. वर राजेशने सांगितलच आहे की विनाकारण दिलेल्या ऋण श्रेणी न्युट्रलाइज करण्याचा संपादक प्रयत्न करतात.
२.तुमचा प्रतिसाद कुणालाही
२.तुमचा प्रतिसाद कुणालाही उद्देशुन असो. माझे लिखाण कोट करुन तुम्ही 'लहान मुलांसारखे' असे लिहिले आहे, त्याला धरुन मी माझा प्रतिसाद दिला होता.
२. कट्टे करण्याला किंवा त्यांची रटाळ वर्णने लिहिण्याला माझा आक्षेप नाही. सध्याच्या श्रेणीव्यवस्थेच्या सिस्टीममधे हे धागे 'आतले आणि बाहेरचे' हा समज दृढ करण्यास मदत करतात असे माझे मत आहे. मागे कट्ट्यांच्या धाग्यांवरही कुणीतरी हा आक्षेप मांडला होता, आता नेमके आठवत नाही.
३. वचपा काढत नाही, तिथेच प्रतिवाद करतो. माझा स्वभाव हा सामान्य मनुष्य स्वभाव आहे. तुम्ही माझ्या पेक्षा उच्च दर्जाला पोहचला असाल आणि अशा शेर्यांनी तुम्हाला अपमानस्पद वाटत नसेल तर चांगलेच आहे.
४. श्रेणी १-५ ह्या रेंजमधे मिळतात. कितीजणांनी श्रेणीदान केले आहे मी बघीतले नाही. ही माहिती सदस्यांनाच दिसते का? तसे असेल तर त्याचा काही उपयोग नाही कारण वाचकांना 'निरर्थक' हीच पाटी दिसणार. दुसरं म्हणजे एखाद्याने तरी निरर्थक असा निनावी शेरा मारुन का जावे? हे मला पटलेले नाही.
नरर्थक
निरर्थक प्रतिसाद.
-Nile
निरर्थक, खोडसाळ आणि बालिश
निरर्थक, खोडसाळ आणि बालिश प्रतिसाद!
- घ्या, श्रेणीबरोबर हा फुकट प्रतिसादाचा आहेर!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
समर्थ म्हणतात मतामतांचा
समर्थ म्हणतात
जो जे मती सापडला त्यास तेंची थर
.
नाना लोक आणि नाना मते, प्रत्येकालाच आपल मत खर/खरं. यात कुणाचा ही काहीही दोष नाही. सहा आंधळे हत्तीच्या ज्या भागाला स्पर्श करतात त्या वरून हत्तीचा आकार ठरवितात. या वरून वाद विवाद होणे साहजिकच आहे.
विचार स्वतंत्रतेला भारतीय दर्शनात महत्वपूर्ण स्थान आहे, चार्वाकला ही आपण महर्षी म्हणतो. कबीर दास ला ही त्या धर्मांध काळात संत म्हणून लोकानी संबोधित केले होते. त्यांचे दोन दोहे.
'
ताते यह चाकी भली, पीस खाए संसार ॥
'
किंवा
'कांकर पाथर जोरि कै मस्जिद लई बनाय।
ता चढि मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय॥
सार एवढाच प्रत्येकाच्या मंतांचा आपण सम्मान केला पाहिजे, आपल्याला त्याचे विचार पटो किंवा न पटो.
आपली मते मांडताना सुसंवाद झाला पाहिजे विवाद नाही याची ही खबरदारी घेतली पाहिजे.
समर्थ म्हणतात:
विवेकें अहंभाव यांते जिनावें
अहंतागुणें वाद नानाविकारी
तुटे वाद संवाद तो हीतकारी.
शेवटी प्रतिसादांना श्रेणी देणे बंद केले पाहिजे. हे उचितच.
शेवटी प्रतिसादांना श्रेणी
सहमत आहे. चालकांना हे पटणे शक्य वाटत नाही.
श्रेणिव्यवस्था
तर श्रेणि देणे हे सभ्य-चांगला वावर असल्यास मिळते हे ठिक. अरे भाइ, काहि लोक श्रेणि देता येण्याचा गैरवापर करतात किंवा वावर सभ्य-चांगला सतततच असत नाहि त्यांचा श्रेणि द्यायचा अधिकार काढायला नको का?
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
या मुद्द्याशी मी सहमत आहे.
या मुद्द्याशी मी सहमत आहे. नविन खातं उघडल्यावर लगेच श्रेणी देण्याचा अधिकार मिळु नये. आणि सतत श्रेणीव्यवस्थेचा गैरवापर आढळल्यास ती सोय काढुन घ्यावी.
गरज नाही.
मुळात श्रेणी सुविधा लगेच मिळत नाही. (असे मला वाटते.) जोवर मुद्दामहोऊन गैरवापर करणारे मायनॉरिटी आहेत तोवर तसे करण्याचे कारण नाही. वास्तव आयुष्यातही नियमांचा गैरवापर होतो, होऊ शकतो. पण किरकोळ गैरवापरास आळा घालण्याकरता भरपूर वेळ खर्च करून काही खास करणे शहाणपणाचे नाही.
-Nile
आहे
लेखाच्या शीर्षकात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी द्यावं लागतंय. पिसाळलेला हत्ती यांनी दिलेल्या प्रतिसादातील मुद्दा क्रमांक १ व २ शी सहमत त्यामुळे पुन्हा तपशीलात प्रतिसाद देत नाहीये.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
लेखाच्या शीर्षकात विचारलेल्या
ह्याचे मुख्य कारण म्हणजे इथे बाहेरच्यांना/नव्यांना कंफर्टॅबल वाटेल असे वातावरण नाही. आतले अर्थातच मजेत आहेत, हे इथल्या प्रतिसादांवरुन दिसतेच आहे. अर्थात ते ही वाईट नाही. पण इथे संवाद हा काहिसा कृत्रिम राहणार हे नक्की. अरुणजोशी विरुद्ध इतर हाच एकमेव वाद्विवाद पुन्हा पुन्हा सुरू राहिल. जो इतका कंटाळवाणा झाला आहे की वाचनमात्र सुद्ध उघडावासा वाटत नाही. साद-प्रतिसाद-वाद-संवाद हे नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक वातावरण इथे बहुविचारांचे लोक सातत्याने लिहू लागले तरच येइल. अर्थात ते सगळ्यांना आवडतेच असे नाही. जे आहे ते चालू राहिले तरी हरकत इल्ले.
>>अरुणजोशी विरुद्ध इतर हाच
>>अरुणजोशी विरुद्ध इतर हाच एकमेव वाद्विवाद पुन्हा पुन्हा सुरू राहिल.
मी तर ब्वॉ कधी अजोंच्या विरोधात आणि कधी अजोंच्या बाजूने लिहितो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हेच म्हणतो. "अजो वि इतर" असं
हेच म्हणतो. "अजो वि इतर" असं म्हणायची पद्धत आहे. समलैंगिकता नि सम्यकता यांच्या धाग्यांनंतर अदितीने आमचा सत्कार करणारा एक धागा काढला होता. फ्लेक्स वाला. तेव्हापासून ती फ्रेज रुढ आहे. कितीतरी विषयांवर कितीतरी वेगवेगळ्या अलाइनमेंटस होतात हे ढळढळित दिसते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजो
'अजो विरुद्ध इतर', असे म्हटल्यावर मला अजोंमधे 'मोदी' दिसायला लागले.
काऊंटरपार्ट
याला काऊंटरपार्ट म्हणून 'संजय क्षीरसागर विरुद्ध इतर हा वाद्विवाद' हे उदाहरण घेता येईल काय?
पुन्हा - ए बी सी डी
१. ऐसीवर कंपूबाजी नाही. विरोधी/भिन्न मतांचे लोक/गट असू शकतात पण ते कोणताही गैर मार्ग वापरून दुसर्या गटाला/व्यक्तिला परेशान करत नाहीत.
२. कोणी सदस्य एका गटाविरुद्ध/ व्यक्तिविरुद्ध करू लागला संपादक काय करतात ते माहीत नाही. माझा संबंध आला नाही.
३. श्रेणीचा नि कंपूबाजीचा संबंध नाही, म्हणजे श्रेणीपद्धत असल्याने कंपूबाजी वाढत वा कमी होत नाही / ठरवले तरी होऊ शकत नाही. कारण श्रेणी काहीही असली तरी 'काय लिहिले आहे' 'कोण वाचतो आहे' नि 'श्रेणी पटते काय' हे सगळे अंततः मस्ट फॉल इन प्लेस.
हलक्याने - 'अख्खं ऐसी' ए डी २०५० च्या पुढे गेलेलं असताना 'मी एकटाच' इथे बी सी ५००० मधे बसून असे वरीलप्रमाणे म्हणतोय म्हणजे बात में कुछ दम होगा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ऐसि हे उदारमतवादि किंवा
ऐसि हे उदारमतवादि किंवा विचारवंतांनि भरलेलं संस्थळ आहे हा एक गैरसमज आहे. इथले बहुसंख्य प्रतिसाद हे इतरत्र सामान्य चर्चांमध्ये जसे दिसतात तसेच असतात. आम्हि कालेजात होतो तेव्हा मराठि-इंग्रजिच्या पेपरात मोठे उत्तर दिले कि जास्ति मार्क्स मिळत असत तसं इथे मोठे प्रतिसाद दिले कि श्रेणि मिळते. इथले बहुसंख्य अॅक्टिव सदस्य एका विशिष्ट जातिचे (इन्क्लुडिंग अस्मादिक), मराठि माध्यमात शिकलेले, आयडेंटिटी क्रायसिस असलेले, फारसे सामाजिक जिवन नसलेले, हापिसातुन पगार चापुन इथे लांबलचक प्रतिसाद पाडणारे आहेत. एखादा वाघमारे यांच्यासारखा सदस्य आहे आणि त्यांनाहि सुरुवातिला त्रासच झाला होता. बाकि उहापोह चालु द्या.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
इथले बहुसंख्य अॅक्टिव सदस्य
ये बात! दुसर्या पानावर आल्याचं सार्थक झालं!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
इथले बहुसंख्य अॅक्टिव सदस्य
इथले बहुसंख्य अॅक्टिव सदस्य एका विशिष्ट जातिचे (इन्क्लुडिंग अस्मादिक), मराठि माध्यमात शिकलेले, आयडेंटिटी क्रायसिस असलेले, फारसे सामाजिक जिवन नसलेले, हापिसातुन पगार चापुन इथे लांबलचक प्रतिसाद पाडणारे आहेत
च्यायला आम्ही मराठी भाषेत शिकलेलो नाही. दिल्लीच्या राहणीमान बघता पगार ही भरपूर नाय.(घरात कार आणि ए सी नाय) सामाजिक जीवन म्हणाल घरात, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश. त्यात जात्या पण वेगवेगळ्या. सनातनी, आर्यसमाजी, जैन कित्येक धार्मिक पद्धतींचा समावेश करून घेतला आहे.
लिहिण्याची सवय असल्याने लोक लिहितात. काही टाईम पास साठी लिहितात.
शिवाय आपण विचार जंतू आहोत, हे ही सिद्ध करायचे असते ना. बाकी मराठी माणूस चर्चा करण्यात पटाईत (स्वत:चे नाव टंकायचा मजा काही औरच असतो) आहोत.
अपवाद
पटाइतसाहेब तुमच्यासारखे अपवाद असणारच.
---------
माझा आधिचा आयडि 'ऐसि मालक' असा होता. तो बॅन करण्यात आला. या संकेतस्थळावर प्रतिसाद उडवले जात नाहित, विरोधि आवाजांचि गळचेपि होत नाहि हे धादांत असत्य आहे.
इथले बहुसंख्य अॅक्टिव सदस्य
इथले बहुसंख्य अॅक्टिव सदस्य म्हणतम्हणत 'स्वतःबद्दल (बरेच)काही' सांगितलेत त्यासाठी आभार!
एखादा वाघमारे यांच्यासारखा सदस्य आहे आणि त्यांनाहि सुरुवातिला त्रासच झाला होता. >> कैच्याकै. वाघमारेँच इथे नेहमी स्वागत आणि कौतुकच झालेल आहे. नक्की कोणत्या धाग्यावर आणि कितीजणांनी त्यांना 'त्रासच' दिला हे सांगाल का?
वर श्रेणी देण्यावरून काही
वर श्रेणी देण्यावरून काही प्रश्न उपप्रश्न होते. श्रेणीचा वापर दुरुपयोग वगैरे ....
अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबद्द्ल या व्हिडिओ तील १:१० ते १:४५ हे भाषण पहा/ऐका. झेंड्याचा मुद्दा सोडा ... पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल तो जे बोलतो ते सॉलिड आहे. मला खूप उत्कट वाटले ते. अर्थात तो सगळा चित्रपटच पाहण्यासारखा आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल
कसलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य ? आम्हाला तर चक्क "This video is not available in your country" असा मेसेज येतोय आणी काळा पडदा दिसतोय. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य ते हेच्च का ?
अर्र .... हा घ्या - दुवा -
अर्र ....
हा घ्या - दुवा - https://www.youtube.com/watch?v=zemrWBIc_hE
पहा हा पाहता/ऐकता येतोय का ....
हा ही दुवा दिसत नाहिये.
हा ही दुवा दिसत नाहिये. विद्रोही चळवळींतील कवींप्रमाणे कुठं हाय स्वातंत्र्य ? आमाला नाय दिसलं असे म्हणून आरोळ्या द्याव्यात की आपल्या प्राक्तनातच नाही म्हणून हताशपणे गपगुमान पडून राहावं या विचारात आहे.
लोकसभा आणि विधानसभा
लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणूकांच्या दरम्यान पक्षांतर्गत विरोधकांना चुचकारण्याचा गुरुजींचा प्रयत्न स्तुत्य आहे. पण आमाला लोकसभेच नाय पण आता विधानसभेच तिकीट मिळालच पायजे. सांगून ठुतो.
श्रेणी
श्रेणींबद्द्लची मतमतांतरे पाहता याच धाग्यावर एक सुचवावं म्हणते....'थ्रेशोल्ड' सेट करून जशा एका मर्यादेपेक्षा जास्त श्रेणीचे प्रतिसाद वाचता येतात तसे उलटेही करता यायला हवे. म्हणजे एका मर्यादेपेक्षा कमी श्रेणीचेच प्रतिसाद दिसतील अशी व्यवस्था -कुणाला काय वाचावसं वाटतं ते काय सांगता येतय ?
lol
आयडिया खरच भारी आहे.
हा खणखणीत चौकार पाहून न वी बाजू हा आय डी तुमचाच असावा असा दाट संशय आहे
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मनोबा 'आयडी'न्हवं तर 'आयड्या'
मनोबा 'आयडी'न्हवं तर 'आयड्या' म्हत्वाची हे इसरायचं न्हाई.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
तुम्हाला आयड्या आवडली...आनंद
तुम्हाला आयड्या आवडली...आनंद झाला.धन्यवाद.
'वाचन स्वातंत्र्याची गळचेपी' वगैरे शब्दयोजना केली असती तर सूचना केवळ विनोदी अर्थानेच नव्हे तर गंभीरपणे विचार करण्यायोग्य ठरली असती का असा विचार येतोय मनात.
?
अशी कोणतीही (माझ्या मते नाटकी) शब्दयोजना न करतासुद्धा प्रस्तुत योजना गांभीर्याने घेण्याच्या लायकीची नाही, असे का बरे वाटते तुम्हाला?
(अवांतर नोंद, फॉर द रेकॉर्ड: मी तुमचा डुआयडी नाही.)
डु आय डी
तुम्ही डु आय डी असलात तरी ते तुम्ही जाहिरपणे सांगण्याची शक्यता आहे काय
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सूनर ऑर लेटर...
...अजिबात नाकारता येत नाही.
पण नाही. आम्ही 'ऋता' या आयडीचे डुआयडी नाही१, हे या निमित्ताने (एकदाचे) घोषित करतो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ 'किंवा व्हाइसे वर्सा' असे लिहिणार होतो, परंतु 'ऋता' या आयडीच्या वतीने आम्ही काही लिहिणे (आम्ही त्यांचे डुआयडी नसल्याकारणाने) उचित होणार नाही. सबब, तसे लिहिण्या-न लिहिण्याचा अंतिम निर्णय 'ऋता' या आयडीवर सोडतो. इत्यलम्|
अशी कोणतीही (माझ्या मते
तसे मला वाटतच नाही मुळात.
याच धाग्यावर श्रेणींना किती गंभीरपणे घेतात व काहीजण नाउमेद होतात वगैरे कळले. त्यामुळे माझ्या त्या प्रतिसादाच्या श्रेणी पाहिल्या आणि फक्त विनोदी मिळाल्या आहेत हे दिसले. मग वाटले की कदाचित शब्द योजना बदलून वेगळा 'श्रेणी' प्र(ति)साद मिळाला असता एवढेच.
बदल
श्रेणी पद्धतीबद्दल आक्षेप काही अंशी पटण्यासारखे आहेत, माझ्यामते इथले अनेक सदस्य आधीच इतर संस्थळांवर एकमेकांना ओळखत होते त्यामुळे इथे वावरण्यात त्यांना अवघड वाटले नसावे, पण संस्थळावर "लिखाणाला सुरवात होते त्या प्रतिसादाचीच समिक्षा(पक्षी:लक्तरे) होते" ह्या विचाराने अनेक 'ललित' लेखक इथे येण्यास घाबरत असावेत असे मला वाटते.
श्रेणीचे फायदे मला मान्य आहेत पण श्रेणी देण्याच्या पद्धतीमधे बदल करावा असे माझे मत आहे, श्रेणी ही 'विशेषणात्मक' न देता 'गुणात्मक' असावी आणि त्यायोगे मूळ उद्देश साध्य होउन नवीन सदस्यास इथे वावरण्यास सोयीचे होईल असे वाटते.
कुठल्याही बदलाला सामावून घेण्यात संस्थळाची मानहानी होईल असे नाही तर अधिक उदार धोरण म्हणून त्याकडे पहाता येईल.
बंद करा हे उद्योग
हा धागा कंपुबाजिबद्दल आहे श्रेणिव्यवस्थेबद्दल नाहि. इतर संकेतस्थळांपेक्षा वेगळेपण दाखवायचे म्हणुन मोठ्या शिताफिने आम्हि हि पद्धत मराठि संकेतस्थळांवर पहिल्यांदा इंट्रोड्युस केलि. तरि फुकटे लोक आमच्या दिडक्यांनि सुरु असलेल्या संकेतस्थळावर येउन आमच्या या अनोख्या आविष्काराला नावे ठेवतात यामुळे केव्हा केव्हा हे संकेतस्थळ बंद करावे असा विचार येतो. हा धागा आता वाचनमात्र करण्यात येत आहे.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
समारोप
उत्तम हेतू.
इतर संस्थळांवर नक्की काय चालतं याची डिटेलवार टीकात्मक चर्चा करायची असेल तर ती त्याच संस्थळांवर होणं अधिक श्रेयस्कर.
मला वाटतं श्रेणीपद्धतीवर आता फार चर्वितचर्वण झालेलं आहे. मूळ विषयावर नवीन काही मुद्दे येेत नाहीत असं दिसतंय. तेव्हा चर्चेचा समारोप मी सारांश काढून व माझी मतं मांडून करतो.
- ऐसीवर विचारजंती कंपूबाजीचं वातावरण आहे का - या प्रश्नाचं उत्तर अनेकांनी दिलेलं आहे. प्रातिनिधिक उत्तर म्हणून सारीका याचं
हे मत वाटतं.
- इतरांचा आवाज या कंपूबाजीपायी दाबला जातो का - यावर काहींचं मत पडलं की हो होते कंपूबाजी आणि त्याचपोटी काही लोकांना संस्थळावर लिहावंसं वाटत नाही. मात्र बहुसंख्यांचं मत कंपू असेल पण बाजी फारशी नाही, असली तर त्रासदायक नाही. तिरशिंगरावांचा प्रतिसाद प्रातिनिधिक आहे.
एखाद्यावर टीकेचा भडिमार
अत्यंत सहमत.
शिवाय वैचारिक श्रेष्ठत्व हा एक नवीन शब्दही कळला.
आम्हि आधिच समारोप प्रेडिक्ट केला होता
त्याचा आय्डि बंद करुन आवाज दाबुन टाकण्याचे अधिकार मालकि असल्यामुळे आहेत. बाकि स्वतःच्या पार्श्वभागावरुन उदबत्त्या ओवाळण्याचे कसब मात्र वाखाणण्यासारखे आहे.
---------
माझा आधिचा आयडि 'ऐसि मालक' असा होता. तो बॅन करण्यात आला. या संकेतस्थळावर प्रतिसाद उडवले जात नाहित, विरोधि आवाजांचि गळचेपि होत नाहि हे धादांत असत्य आहे.
समारोप पटला नाही
कंपूबाजी आणि श्रेणी ह्याचा परस्परसंबंध आहे हे ह्या चर्चेत प्रामुख्याने समोर आले. ह्याचा तुम्ही ओझरताही उल्लेख केलेला नाही.
मी अस्मि ह्यांना दिलेला मुद्देसुद सभ्य व अत्यंत मृदू भाषेतला प्रतिसाद 'निरर्थक' श्रेणी लावून दाबण्यात आला. ह्याचा अर्थ काय? निले ह्यांनी तो श्रेणी लावुन कंपूबाजी सिद्ध केली. आणि अर्थातच हे सगळे छुपेपणाने चालत असल्याने मी ती श्रेणी दिलीच नाही असे सांगत निले आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. निले किंवा अस्मि हे सदस्य इथे जसे काँग्रेसने दिग्गीराजा किंवा भाजपाने सुब्रम्हण्यम स्वामी ठेवले आहेत, तसे (ऐसीने ठेवल्यासारखे) अंगावर धावुन जात आहेत, आणि तुम्ही समारोप करताय की कंपूबाजी नाही.
पाने