दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२१ मे
जन्मदिवस : लेखक दांते अलिघिएरी (१२६५), चित्रकार आल्ब्रेख्त ड्यूरर (१४७१), कवी अलेक्झांडर पोप (१६८८), तुरुंगातील कैद्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून धडपडणाऱ्या एलिझाबेथ फ्राय (१७८०), 'कोरियलिस परिणाम' शोधणारा गास्पार-गुस्ताव द कोरीयलिस (१७९२), पुराजीवशास्त्रज्ञ मेरी अॅनिंग (१७९९), चित्रकार आँरी रूसो (१८४४), व्यावहारिक ECG शोधणारा नोबेलविजेता विलम आईंथोवन (१८६०), रशियन हायड्रोजन बॉंब बनवणारा, शांततेचा पुरस्कर्ता नोबेलविजेता आंद्रेई साखारॉफ (१९२१), कलासमीक्षक, लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी (१९२८), हिंदी लेखक व पत्रकार शरद जोशी (१९३१), अभिनेता मोहनलाल (१९६०), मॉडेल अदिती गोवित्रीकर (१९७६)
मृत्युदिवस : भारताचे पहिले जलदगती गोलंदाज अमरसिंग (१९४०), लेखक क्लाऊस मान (१९४९), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता जेम्स फ्रँक (१९६४), मुद्रक, प्रकाशक बाळकृष्ण ढवळे (१९७३), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९९१), अभिनेता जॉन गिलगुड (२०००)
---
राष्ट्रीय दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस.
आंतरराष्ट्रीय "सुसंवाद व प्रगतीसाठी सांस्कृतिक विविधता" दिवस
स्वातंत्र्यदिन - मॉंटेनेग्रो (२००६)
१८५१ : कोलंबियातून गुलामगिरी हद्दपार
१९०४ : पारी (पॅरिस) मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना (FIFA) ची स्थापना
१९२७ : अटलांटिक पार करणारे पहिले विमान घेऊन वैमानिक चार्ल्स लिंडबर्ग पारीमध्यल्या ले बोर्जेमध्ये उतरला.
१९३२ : विमानातून अटलांटिक पार करणारी पहिली महिला वैमानिक अमेलिया एअरहार्ट उत्तर आयर्लंडमध्ये उतरली.
१९४० : आचार्य अत्रेंच्या 'साप्ताहिक नवयुग'चा पहिला अंक प्रकाशित.
१९७९ : सॅन फ्रान्सिस्कोमध्ये समलिंगींच्या हक्कांसाठी झगडणारा लोकप्रतिनिधी हार्वे मिल्क याच्या खुन्याला शिक्षा; शहरात दंगली.
१९९१ : माजी पंतप्रधान व काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी यांची निवडणूक प्रचारादरम्यान आत्मघातकी तमिळ वाघांकडून हत्या.
२०११ : सौदी अरेबियातल्या जनआंदोलनामुळे आर्थिक सवलती आणि २०१५ मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार घोषित.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- चिंतातुर जंतू
- तिरशिंगराव
छान!
सर्वसमावेशक यादी वाटते आहे. अजून भर घालण्यात फारसे हशील दिसत नाही.
फक्त एक की जर काही संशयास्पद घटना घडताना दिसली तर सर्वांच्या समक्ष ती येईल याची तजवीज करावी. अश्या व्हिसलब्लोईंगने चोरांना चाप बसतो असा स्वानुभव आहे
बाकी, अशी यादी बनविल्याबद्दल कौतुक वाटते. मात्र प्रत्यक्षात यातील २०-२५% गोष्टीच मी करतो.
जाता जाता: फक्त (आंतरजालावरील) काही (विवक्षित)मंडळी म्हणतील, घरात चोरी ही होणारच तेव्हा चोरण्यासारखे काही तुमच्या घरात ठेऊच नका.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
इकडून तिकडून गोळा केलेले ज्ञानकण
धन्स रे. पण अरे कौतुक राहू दे, इकडून तिकडून गोळा केलेले ज्ञानकण आहेत हे
काही सुचल्यास जरूर भर घाल.
http://aisiakshare.com/node/1
http://aisiakshare.com/node/1205#comment-15946
या प्रतिसादाला भडकाऊ श्रेणी ज्याने कुणी दिली त्यांना एक विनंती आहे. ही कशाच्या आधारावर दिली आहे?
कारण....
>>बाकी, अशी यादी बनविल्याबद्दल कौतुक वाटते.>> असे ऋषिकेश यांनी म्हटले म्हणून मी हे अशा अर्थाने म्हणालो की कौतुक नको कारण अनुभव व वाचनाअंती हे पॉइन्टस गोळा केलेले आहेत. ते काही मोठे लेखन नव्हे.
आता एका निरुपद्रवी स्पष्टिकरणरूपी प्रतिसादाला भडकाऊ अशी श्रेणी देऊन त्या माणसाचे 'पुण्य' कमी करण्याचा कुणाचा उद्देश असेल तर माहित नाही.
..
चोर हे पुरेशी माहिती (आर्थिक परिस्थिती, जाण्यायेण्याच्या वेळा, घरातले लोक वगैरे वगैरे) अशी माहिती काढूनच योजना आखतात. फार आधुनिक कुलुपयंत्रणा, सीसीटीव्ही, दाराभोवती /घरात सुरक्षागॅजेट्सचं जंजाळ, ट्रिपल लेयर पोलादी दरवाजा , ऑटोमॅटिक वरवंटा (आभार पु.लं.) अशा पॅरेनॉईड गोष्टींनी आपण आपल्या घरात फार काही डबोले आहे अशी माहिती आपोआपच पसरवत असतो. सामान्य पातळीच्या सुरक्षायोजनाच राबवाव्यात. त्याउप्परही रिबॉक बूट सोडून बाटा चप्पल चोरणार्यांच्या वंशातला कोणी चोर आलाच तर घरात तीसचाळीस हजार कॅश असू द्यावी. जीव जाऊ द्यायचा नसेल / हातीपायी शाबूत रहायचे असेल तर.
गवि - कॅश
घरात तीसचाळीस हजार कॅश ठेवणे तितकेच धोकादायक नाही का? शिवाय सगळेच काही जबरी चोर्या करत नाहीत.
पण तुमचा प्रतिसाद निश्चितपणे विचारत घेण्यासारखा आहे.
कॅश
त्याउप्परही रिबॉक बूट सोडून बाटा चप्पल चोरणार्यांच्या वंशातला कोणी चोर आलाच तर घरात तीसचाळीस हजार कॅश असू द्यावी.
इथे तीसचाळीस हजार रुपये असा अर्थ अभिप्रेत अाहे असं समजतो. कारण तीसचाळीस हजार डॉलर्स कॅश फक्त मॉब्सटर वगैरेच लोक हाताळतात. याउलट तीसचाळीस हजार झांबियन क्वाचा ठेवले तर काय भिकारी माणूस अाहे अशा विचाराने दया येऊन चोरच खिशातले सगळे काढून ठेऊन निघून जाईल.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
शंका
माहिती संकलनाचा प्रयत्न उत्तम, पण खालिल गोष्टींचे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयोजन कळले नाही -
(१४) दिवाळीत जास्तीचे अॅटमबॉम्ब्/बाण/भुईनळे आणून ठेवावेत, पुढील वर्षी ते वाजवुन पुन्हा नविन स्टॉक भरुन ठेवावा! माचिस्/सिगारेट लायटर इत्यादी सहज सापडेल असेच दोन चार ठिकाणी ठेवावे.
(२१) आपण कधी कधी डुप्लिकेट चाव्या शेजारी अथवा जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडे ठेवतो. चावी हरवल्यास विसरल्यास कामी यावे म्हणून. दुर्दैवाने चोरी झालीच तर पोलीस हा प्रश्न विचारतात्. याच्या चाव्या कोणाकोणाकडे आहेत? पोलीसाना चुकूनही चाव्या कोणाकडे आहेत ते सांगू नये.
(१९)ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत असे अनेक लोक टेडी बेअर व तत्सम सोफ्ट टॉइज गाडीच्या मागे डिकीत काचेतून आरामत दिसू शकतील अशा प्रकारे ठेवलेले असतात. खेळण्यासाठी जरुर बरोबर बाळगावीत, पण अशी खेळणी सहज दिसू शकतील अशी ठेऊ नयेत. तसेच मुलांची नावे गाडीच्या काचेवर लिहू नये, कारण या दोन्हीमुळे घरात लहान मुले आहेत ह्या गोष्टीची रस्त्यावरून येता जाता आपसूक जाहिरात होते.
१४, २१, १९
१४
आवाज करुन चोरट्यांना घाबरवायला.
२१
डुप्लिकेट चावी शेजार्यांकडे असल्यास पोलीस त्यांना अपरिमित त्रास देतात. म्हणून.
१९
या वाक्याच्या पुढेच याचे कारण दिले आहे:
शिवाय असे वाहन महागडे असेल तर "पार्टी मालदार आहे" असा (बरोबर अथवा गैर) समज करून गुन्हेगार अपहरणाची योजना बनवू शकतात. (मुलांच्या अपहरणाची).
ठीक
ठीक, लक्षात आलं होतं, पण हे फारच-पॅरॉनॉइड स्वरूपाचं वाटलं म्हणून परत विचारलं, तसेच, पोलिसांना (चोरी झाल्यावर) माहिती न देणं आपल्या सुरक्षेचं नाही असं वाटतं, साधारण सुरक्षेचे नियम पाळावेत, ते करुनही चोरी झाल्यास चोरांना विरोध न करता जमेल तेवढी सावधनता बाळगावी व चोरीच्या कारणांचे विश्लेषण करून त्यातुन बोध घ्यावा.
सामाजिक विषमतेतून निर्माण होणार्या अपप्रवृत्तींसाठी बंधने का/किती/कशी घालावीत, की/व विषमता दूर होण्यासाठी प्रयत्न करावा, हे चर्चेचे/सापेक्ष मुद्दे आहेत.
तुमची चेकलिस्ट चांगली आहे, पण अशा प्रकारच्या चेकलिस्ट वाढत गेल्यास जगणे मुश्किल होइलसे वाटते.
होम अलोन
लहान मुलांना शिकवून ठेवावे: अनोळखी व्यक्तीनी फोन केला तर.. घरात कोणी नाही असं सांगु नये.
लहान मुलांना 'होम अलोन' च्या सर्व भागांची पारायणे करण्यास सांगावी. जमलेच तर, स्वतः सुद्धा संजीवकुमारच्या 'अंगुर' सिनेमाची पारायणे करावीत.
हे बघा
लहान मुलांना शिकवून ठेवावे: अनोळखी व्यक्तीनी फोन केला तर.. घरात कोणी नाही असं सांगु नये.
लहान मुलांना 'होम अलोन' च्या सर्व भागांची पारायणे करण्यास सांगावी. जमलेच तर, स्वतः सुद्धा संजीवकुमारच्या 'अंगुर' सिनेमाची पारायणे करावीत.>>
http://zeenews.india.com/news/nation/kidnapped-child-in-us-found-dead-fa...
http://articles.philly.com/2012-10-26/news/34750533_1_ransom-note-saanvi...
संजीवकुमारच्या 'अंगुर' सिनेमाची पारायणे ही चेष्टेत केलेली/तिरकस टिप्पणी छान आहे, पण ह्या लिंकवरची बातमी वाचा. उदाहरण अमेरिकेतील असलं तरी त्यात गुंतलेले सगळे भारतीय आहेत म्हणून लिंक देतोय. शोधून सापडल्यास भारतात घडलेल्या घटनेचीही लिंक्स देईन. अपहरण आणि हत्त्या करणारा फॅमिली फ्रेन्ड होता. अशा वेळी "अनोळखी व्यक्तींनी फोन केला तर.." हे बदलून "आई-वडील-आजोबा-आजी वगळता कुणीही फोन केला तर..." हे लिहावं लागेल. शेजारी पाजारी, सहकर्मचारी कोणावरच विश्वास ठेवण्याचा जमाना नाही! यास्तव आपण कधी बाहेर जातो, घरी कोण असतं वगैरे दैनंदिनी तर कोणालाच माहित होउ देउ नये.
अर्थात एखादा पाळत ठेउन असेल तर अवघडच आहे सगळं, पण तरी आपण काळजी घ्यायलाच हवी - मग तो पॅरानोया वाटला तरी चालेल. आपण अंगूर मधल्या संजीवकुमार सारखे विक्षिप्त वाटलो तरी चालेल, पण शेवटी जीव महत्वाचा.
टायमर प्लग
एक टायमर असलेला प्लग मिळतो. आपण बाहेरगावी जाण्यापूर्वी तशा एक किंवा दोन प्लगना दिवे लावून संध्याकाळच्या वेळी तीन ते चार तास चालू ठेवले तर घरी कोणीतरी आहे असा भास होतो.
यापलिकडे आपल्या आयुष्यात किती पॅरानॉइड व्हायचं हा प्रश्न मला आहे. वरचे सर्व उपाय पाळूनही चोरी होण्याची शक्यता आहेच. ही कमी झालेली शक्यता, त्यातून वाचलेले शक्य पैसे आणि त्यासाठी आपल्याला होणारा मानसिक व आर्थिक खर्च याचाही हिशोब प्रत्येकाने स्वतंत्रपणे करावा.
आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टी केवळ पैशांच्याच नसतात. फोटो, कॉंप्युटरवरील नोंदी, लेखन या गोष्टींमध्ये खूपच मानसिक गुंतवणुक असते. बॅकअप वगैरे घेऊन या गोष्टी सुरक्षित कराव्या. एकेकाळी जमीनजुमला सोडून आपली सगळी मालमत्ता घरात साठवलेली असायची. आजकाल तसं नसतं. घर, शेअर्स, बॅंकातले पैसे, या सर्वात नव्वदेक टक्के मालमत्ता असते. आपण स्वतः म्हणजे आपलं पुढचं उत्पन्न मिळवण्याचं साधन ही सर्वात महत्त्वाची मालमत्ता असते. तेव्हा कधीतरी चोर येऊ शकतो, चोरी करून बऱ्याच वस्तू घेऊन जाऊ शकतो याची तयारी ठेवावी.
घरा फटाके ठेवणं जरा धोक्याचच
घरात फटाके ठेवणं जरा धोक्याचच वाटतय. याला काही पर्याय सुचवा, ही विनंती.
अत्यंत लॉजिकल पर्याय आहे!
घरच शिल्लक राहिले नाही, तर भविष्यात घरफोडीचा प्रश्न उद्भवणार नाही, असा साधा विचार त्यामागे आहे.
+१
झोपडीत रहायला जावं. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी.
घर विकून झोपडी भाड्याने घेताना पैसे उरलेच तर त्याचं सोनं विकत घेऊन झोपडीच्या जमिनीखाली पुरावं. झोपडपट्टीत सोनं असण्याचा संशय कोणाला येणार? शिवाय चोरांचा शेजार असण्याची शक्यता वाढते. शेजार्यांशी मैत्री वाढवावी हे आडकित्तांनी आधीच सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे वागल्यास मित्राच्या/मैत्रिणीच्या घरी चोरी करण्याचा उफराटा विचार झोपडपट्टीतले धडधाकट (आठवा: पांगळी श्रीमंती, धडधाकट गरीबी) लोकं करणार नाहीतच. झोपडपट्टीत आणि गरीबांमुळेच आज जी काय माया, ममता, शेजारधर्म वगैरे मानवी गुण टिकून आहेत. सोसायट्या, बंगले आणि फ्लॅटमधले लोकं तर मेले हैवानच असतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नाही ठेवले तरी चालेल
ऋता, हाच एक पर्याय आहे. जमले तर करायचे, फार अडचणीचे वाट्ल्यास नाही
कोणाचाही फोन आला तरी हा धागा
कोणाचाही फोन आला तरी हा धागा वाचल्यामुळे मी आता "आई-बाबा घरी नाहीत, नंतर फोन करा" अशी कॉलर ट्यून लावलेली आहे. घरात कोणी नसतानाही "आई-बाबा आहेत पण फार कामात आहेत; फोन करूनच घरी या" अशी पाटीच लावून दिलेली आहे. तीन कुत्रेही पाळले आहेत. घराबाहेरच्या पाटीवर मात्र सात कुत्रे असल्याचं लिहीलेलं आहे. रोज रात्री झोपताना कुत्र्याच्या भुंकण्याची रेकॉर्ड घराबाहेरच्या स्पीकरवर लावूनच झोपते.
सध्या मेटलवर्क शिकते आहे, स्वतःच लोखंडी दरवाजा आणि अलॉयची कुलपं बनवते आहे. बाहेरच्या लोकांचा काय भरवसा? लाकूड नकोच, कापायला सोपं, आग लागते. आणि काय न काय.
चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याची वॉर्निंग बाहेर लिहीलेली नाही. तेवढंच चोरट्यांना गंडवल्याचं समाधान! सकाळी उठल्यावर आधी रात्रीचं रेकॉर्डींगच बघते. हळुहळू रात्रीची झोप बंद करून दिवसा झोपायचं ठरवलेलं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
(No subject)
उपयुक्त!
अत्यंत उपयुक्त!
'जाहीरनामा'?
'पब्लिक डिक्लरेशन ऑफ अ प्रायवेट इंटेन्शन'?
डिक्लरेशन चालेल, डिस्प्ले
डिक्लरेशन चालेल, डिस्प्ले कायदाबाह्य आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धागा व अदितिचा हा प्रतिसाद
धागा व अदितिचा हा प्रतिसाद वाचून सर्वसंग-परित्यागाचा विचार बळावत आहे.
अजून थोडे..
चोराला संधीच न देणे हा सर्वात चांगला उपाय! म्हणजेच त्यांच्या पुढचा विचार करणे.( जसे लेखात म्हटले आहेच.)
शक्यतो किमती वस्तूंचा विमा उतरवून ठेवावा उदा. Laptop वगैरे..बँकेत लॉकर घेतलेला बरा. रोख रक्कम घरात कमी ठेवावी.डेबिट कार्ड हाताशी असतेच.
कार्यालयात मीटिंग मध्ये फोन सायलेंट ठेवला जातो. तरी डिस्प्ले दिसेल असा समोर ठेवावा..मुलांचा / पाळणा घरातून किंवा स्कूल बस चालकाचा चा फोन येऊ शकतो.
इमारतीत दुपारी घरी असणारी काही माणसे असतात. (मुलांनी कार्यालयात फोन केला तर आपण गरज पडल्यास) त्याना मदतीची विनंती करू शकतो.
अहो बरवे,
विमा पर्यंत बरोबर. म्हणजेच तुमच्या बरोबर. सहमत.
पण, प्यारानॉईया जरा कमी केलात तर बरे.
घरात पैसे / दागिने मिळाले नाहीत तर जबरी मारहाण करतात. नपेक्षा पैसे फेकून मोकळे व्हा.
अन सगळ्यात महत्वाचे, सोशल अॅनिमल व्हा. तुमचं घर आहे ना? तुमची सोसायटी, तुमची गल्ली, तुमचं गाव. अहो 'तुमचं' हा शब्द महत्वाचा आहे. कोण कुठले चोर दरवडेखोर येतील अन चोरून जातील ही हिम्मत होऊच कशी शकते? एक हाक आली तर ४ तरूण मुलं उभी राहू शकत नाहीत तुमच्या बिल्डिंग मधली? मग कशाला ते जिम अन स्विमिंग पूल वाली बिल्डिंग घेतली? हिम्मत कशी होते पाय ठेवायची तुमच्या घरात यां चोर दरवडेखोरांची?
माय होम इज माय कॅसल. एकटा राजा कॅसल सांभाळू शकत नाही. शेजार्या पाजार्यांची मदत लागतेच. ते करायला शिकायला हवं. अन्यथा कुलुपं लावा किंवा फटाके फोडा अन काठ्या फिरवत रस्त्यावरून संचलनं करा, किंवा १०१ युक्त्या करा. शष्प फरक पडणार नाही.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
हेही खरंच..
हेही खरंच..
पण लिस्ट मध्ये भर घालण्यासाठी थोडे वाढवले.
बिरबलाच्या (?) गोष्टीप्रमाणे ऐन वेळेला काय कामी येईल सांगता येत नाही!
;;)
>>विमा पर्यंत बरोबर. म्हणजेच
>>विमा पर्यंत बरोबर. म्हणजेच तुमच्या बरोबर. सहमत.
धन्यवाद.
घरात पैसे / दागिने मिळाले नाहीत तर जबरी मारहाण करतात. नपेक्षा पैसे फेकून मोकळे व्हा.
आजकाल घरात पैसे-दागिने कुणीच ठेवत नाही फारसे. सणासुदीचे दिवस वगळले तर सगळे बँकेतच ठेवतात हो. दागिन्यांसाठी तर लॉकर पण असतात बँकेत (हे एफ.वाय.आय. बरं का )
>>अन सगळ्यात महत्वाचे, सोशल अॅनिमल व्हा.
जितकं व्हायचं तितकं लोकं होतातच....पण....
>>तुमचं घर आहे ना? तुमची सोसायटी, तुमची गल्ली, तुमचं गाव. अहो 'तुमचं' हा शब्द महत्वाचा आहे. कोण कुठले चोर दरवडेखोर येतील अन चोरून जातील ही हिम्मत होऊच कशी शकते? एक हाक आली तर ४ तरूण मुलं उभी राहू शकत नाहीत तुमच्या बिल्डिंग मधली?
अहो खून झाल्यावर आम्ही हाक कशी मारणार बुवा? बिल्डींग मधे मुले येत नाहीत असे कुणी सांगितले? ज्यांना यायचं ते येतात, नाही ते नाहीच येणार. पेपर वाचलेत तर त्यातल्या अनेक घटना काळजी न घेतल्याने घडलेल्या आहेत. वरची लिंक बघितलीत का? ओळखीच्याच माणसाने (फॅमिली फ्रेन्ड) अपहरण आणि हत्या केली होती.
>>मग कशाला ते जिम अन स्विमिंग पूल वाली बिल्डिंग घेतली? हिम्मत कशी होते पाय ठेवायची तुमच्या घरात यां चोर दरवडेखोरांची?
चोर-दरवडेखोरांचीच हिंमत होते हो. आणि सगळ्या इमारतींना जिम अन स्विमिंग पूल नसतात. पण....
>>शेजार्या पाजार्यांची मदत लागतेच. ते करायला शिकायला हवं. अन्यथा कुलुपं लावा किंवा फटाके फोडा अन काठ्या फिरवत रस्त्यावरून संचलनं करा, किंवा १०१ युक्त्या करा. शष्प फरक पडणार नाही.
जमेल तितकी मदत करतातच सगळे. तरी पण समजा......पण...
अॅन्ड फायनली माय लॉर्ड, मे आय प्लीज ड्रॉ युवर अटेन्शन टुवर्ड्स पॉइंट नंबर १६ ऑफ द अबव्ह आर्टिकल
(१६) मी म्हणजे राजा, बायको म्हणजे राणी, पोरे म्हणजे राजकुमार/राजकन्या, अन माझे घर म्हणजे माझे राज्य, हे असे वागताना, तुमच्या राज्यात, तुमच्या माहितीच्या पाहुण्यांची वेळीअवेळीची वर्दळ जरुर असु द्यावी, टेहेळणी करणार्यांस याचा वचक बसु शकतो.
हे तुम्ही वाचलं नसेलच......जाऊच दे...यु हॅव सिंपली मिस्ड द पॉइंट.
त्याचं काये मंजोजी, माझी घाण
त्याचं काये मंजोजी,
माझी घाण सवय नडली. धागा तुमचा आहे हे विसरून त्यांना पर्तिसाद दिला
असो.
जुनी सवय आहे. माफ करून टाका.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-