Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८६

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

---

हवेतल्या वेगवेगळ्या गॅसेस चे तापमान वेगवेगळे असते का? जसे की पाण्याचे वाफेचे तापमान १०० C. अजून कोणत्या गॅस चे तापमान ५०० C. ?

मग हवेचे average temperature कोणत्या घटक वायूमुळे एवढे कमी असते?

अनु राव Tue, 01/08/2017 - 10:26

In reply to by -प्रणव-

पाण्याची वाफ तर १०० C लाच असेल ना ?

नाही. पाण्याची वाफ कुठल्याही तापमानाला असु शकते. अगदी -५० सेल्सि ला पण पाण्याची वाफ असु शकते. प्रेशर किती आहे त्यानुसार ते ठरते.

-प्रणव- Tue, 01/08/2017 - 10:35

In reply to by अनु राव

प्रेशर किती आहे त्यानुसार ते ठरते.

नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर घ्या. या प्रेशरला पाण्याचे वाफेचे तापमान १०० C असेल ना?

अनुप ढेरे Tue, 01/08/2017 - 10:46

In reply to by -प्रणव-

साध्या तापमानाला पाण्याचे रेणु लूज होऊन हवेत जातात. त्याने हवेतलं बाष्प बनतं. त्याला १००से. जरुरी नाही.

-प्रणव- Tue, 01/08/2017 - 11:05

In reply to by अनुप ढेरे

साध्या तापमानाला पाण्याचे रेणु लूज होऊन हवेत जातात

ते ठीक आहे पण मी पाण्याच्या भांड्याचे तापमान १०० C आहे असे म्हणत नाहीए. मी फक्त पाण्याचे वाफेचे तापमान या बद्दल बोलत आहे.

-प्रणव- Tue, 01/08/2017 - 11:21

In reply to by अनु राव

वातावरणाचे तापमान = average(temp of all constituent gases) असे म्हणू शकतो का?

आणि गॅसेस मधल्या रेणूंमध्ये खूप एनर्जी असते (कारण ते जास्त स्पीड ने फिरत असतात) म्हणून त्यांचे तापमानही liquid पेक्षा जास्त असेल नाही?

अनु राव Tue, 01/08/2017 - 10:50

In reply to by -प्रणव-

अहो, तो १०० से ला बॉइलिंग पॉइंट म्हणतात ॲट १ बार.
पण एक व्हेपर प्रेशर म्हणुन असते. ते म्हणजे लिक्विड च्या वेपर्स नी लिक्विड वर टाकलेले प्रेशर. कधी हि कुठलेही लिक्विड फक्त लिक्विड फॉर्म मधे नसते, लिक्विड बरोबर त्याच्या व्हेपर्स पण इक्विलिब्रिअम मधे असतात.
-----

जसे जसे तापमान वाढत जाते तसे तसे व्हेपर प्रेशर वाढत जाते. १०० से. ता ते १ बार होते ( म्हणजे ऍटमॉस्फेरिक ) म्हणुन पाणी उकळायला लागते.

-प्रणव- Tue, 01/08/2017 - 11:21

In reply to by अनु राव

कधी हि कुठलेही लिक्विड फक्त लिक्विड फॉर्म मधे नसते, लिक्विड बरोबर त्याच्या व्हेपर्स पण इक्विलिब्रिअम मधे असतात

हे जे वॉटर व्हेपर आहे, त्याचे स्वत:चे देखील काही तापमान असेलच की नाही. ते किती असते?

हे व्हेपर दोन प्रकारे हवेत जाते - पाणी उकळल्यामुळे आणि evaporation मुळे. प्रोसेस कोणती का असेना - दोन्ही प्रोसेसेस मधून तयार झालेल्या वाफेचे स्वत:चे तापमान एकच असेल नाही?

नितिन थत्ते Tue, 01/08/2017 - 13:12

In reply to by -प्रणव-

यातून आलेला प्रश्न - एक ग्रॅम बाष्प (व्हेपर- नॉट स्टीम) कन्डेन्स झाली तर ५४० कॅलरी बाहेर पडतात का?

अनु राव Tue, 01/08/2017 - 13:28

In reply to by नितिन थत्ते

५४० कॅलरी बाहेर पडतात का

येस, फक्त ५४० नाही तर त्या तापमान आणि प्रेशर ला जी लॅटंट हिट असेत तेव्हड्या कॅलरिज बाहेर पडतील.
म्हणुनच कोरड्या हवामानापेक्षा दमट हवामानात एसी वर जास्त लोड येतो ( जर तापमान सेम असेल तर ).

बॅटमॅन Tue, 01/08/2017 - 16:22

मरकेश सोडून पुण्यात उत्तम शावार्मा कुठे मिळतो? चिकन + मसाला हे काँबो आणि सोबत रोलही चामट नसला तर अजूनच बेष्ट.

मरकेशची खासियत = आतला स्पाईस मिक्स, शिवाय व्हिनेगारात बुडवलेल्या बिटाचे व गाजराचे तुकडे आणि नॉनचामट रोल मट्रल. तसे पाहिजे नायतर मजा नाय.

गौराक्का Tue, 01/08/2017 - 19:48

In reply to by बॅटमॅन

अल शॉरमा , कांदिवली, पोईसर जिमखान्याजवळ.
कार्टर्स ब्लू वांद्रे.
शालिमार, भेंडी बाजार
किंग्स शॉरमा, भायखळा, जे जे जवळ.

१४टॅन Tue, 08/08/2017 - 08:17

In reply to by गौराक्का

किंग्ज शोरमा चांगला आहे. फक्त ७०-८०-९० ह्या रेट्समध्ये मिळतो, आणि मी गेलेलो तेव्हा मोजून सतरा सेकंदात हातात दिलेला. साईझ चांगली असते. अल शोरमा तर बेष्टच आहे. मी आधीही लिहिलंय ह्यावर. आपला मराठी (खरंतर आमगेंलो कोंकणी) माणूस. माझा उगीच शिवसैनिक बायस. लोल.
अवांतर:
आधी म्हंमदल्लीफेम उस्मानकडची रबडी, फिरनी, तिथल्याच एका अत्यंत सुमार हॉटेलातला अतिसुमार शोरमा इत्यादी चापल्यानंतर झोमॅटो वर वाचून किंग्जकडे गेलो. खरंतर त्या किंग्जनंतर जे आहेत ते किंग्जपेक्षा जास्त स्वच्छ दिसतात. पण तेव्हढी भूक नव्हती. मग ते सगळं जिरवायला ग्रँटरोडपर्यंत चालत गेलो.

अनु राव Tue, 01/08/2017 - 11:22

हे व्हेपर दोन प्रकारे हवेत जाते - पाणी उकळल्यामुळे आणि evaporation मुळे. प्रोसेस कोणती का असेना - दोन्ही प्रोसेसेस मधून तयार झालेल्या वाफेचे स्वत:चे तापमान एकच असेल नाही?

कसे सांगु तुम्हाला. :-(
वाफेचे तपमान पाण्याच्या तपमानाइतकेच असते.
तुम्ही मुळात वाफ होण्यासाठी १०० से तापमान पाहिजे हे मनातुन काढुन टाका.
वाफ उणे तापमानापासुन कुठल्याही तापमानाला तयार होऊ शकते.

-प्रणव- Tue, 01/08/2017 - 14:42

In reply to by अनु राव

वाफेचे तपमान पाण्याच्या तपमानाइतकेच असते.

हे मला फार आश्चर्यकारक वाटत आहे !

उपप्रश्न - माठातले पाणी थंड का राहते याचे स्पष्टीकरण असे वाचले होते की - पाण्यातली उष्णता evaporation ने निघून जाते. पाण्याच्या पृष्ठभागावरच्या गरम molecules चे vapour मध्ये रूपांतर होते आणि उरलेले पाणी थंड राहते.

हे जर खरे असेल तर मग खालील प्रोसेस होत असेल.

ओरिजिनल गरम पाणी -> evaporation -> थंड पाणी + पाण्याची वाफ

असे असेल तर मग पाण्याच्या वाफेचे तापमान ओरिजिनल गरम पाण्याच्या तापमानापेक्षा अधिक असायला हवे नाही? (आगाऊ धन्यवाद )

-- व्यनितून मिळालेले उत्तर --

थंड पाणी आणि पाण्याची वाफ हे एकाच तापमानाला असते. जी उष्ण्ता पाण्यातुन काढली जाते तिच वापरुन वाफ बनते. पण त्या उष्णतेमुळे तापमान वाढत नाही तर तिचा उपयोग मोलेक्युलर बाँड मोडण्यात होतो. तापमान वाढत नाही पण उष्णता तर वापरली जाते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/08/2017 - 21:26

In reply to by -प्रणव-

मोलेक्युलर बाँड मोडण्याबद्दल काही समजलं नाही. पाण्याची वाफ/बाष्प बनताना रेणूंची मोडतोड कशाला होईल? फक्त द्रवावस्थेतून वायू अवस्थेत जाण्यासाठी, हा बदल होण्यासाठी जी उष्णता लागते - लेटंट हीट - ती पाण्यातून येते; म्हणून माठातलं पाणी (भोवतालापेक्षा) गार राहतं. किंवा घाम आल्यावर (घाम न येण्यापेक्षा) थंड वाटतं, इ.

अनु राव Tue, 01/08/2017 - 21:30

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो तै, मोलेक्युलर बाँड म्हणजे मला दोन वॉटर मोलेक्युल मधे असलेले ॲट्रक्शन म्हणायचे होते. h2o मधले बाँड नाही.

Nile Tue, 01/08/2017 - 21:36

In reply to by अनु राव

दोन समान रेणुंमधील फोर्सेसना साधारणपणे कोहेसिव्ह फोर्स असं म्हणतात. मॉल्युक्युलर बॉंड म्हणजे दोन अणूंमधील फोर्स.

अनु राव Tue, 01/08/2017 - 21:40

In reply to by Nile

अहो निळुभाऊ, सोप्प्या शब्दात सांगायचा प्रयत्न केला होता. आणि प्रश्नकर्त्याला पण ऑव्हरऑल अंदाज आला होता.
रुम टेंम्प च्या हवेतल्या वाफेचे तापमान १०० से. का नाहि ह्या प्रश्नापासुन प्रवास सुरु झाला होता हे लक्षात घ्या.

Nile Tue, 01/08/2017 - 21:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मोल्युकर बॉंड मोडला जात नाही. पाण्याची वाफ आणि पाणी यांचं मॉल्युकुल्यर स्ट्रक्चर सारखंच असतं.

माठ, वाळा वगैरे गोष्टी पाण्याच्या थेंबांचा आकार लहान करतात. लहान लहान थेंब पृष्ठभाग वाढल्याने लवकर बाष्पीभवन होऊन माठातल्या पाण्याला थंड करतात.

-प्रणव- Wed, 02/08/2017 - 06:08

In reply to by Nile

माठ, वाळा वगैरे गोष्टी पाण्याच्या थेंबांचा आकार लहान करतात.

माठाबद्दल म्हणत असाल तर समजू शकतो (त्यातल्या छिद्रातून जे पाणी बाहेर येते त्याचे बाष्पीभवन लवकर होते - नॉर्मल सर्फेसवरच्या पाण्यापेक्षा).

वाळे दोन ठिकाणी वापरलेले पाहिलेत - एक माठात टाकायला आणि दुसरे कुलरच्या साईडला. माठात टाकलेल्या वाळ्याचा काय फायदा होतो माहित नाही. कारण माठाचे झाकण बंद असते, मग पाण्यावर तरंगत असणाऱ्या/पाण्यात बुडालेल्या वाळ्याने बाष्पीभवन होण्यास कशी मदत होत असेल?

नितिन थत्ते Wed, 02/08/2017 - 07:52

In reply to by -प्रणव-

माठातल्या वाळ्याचा उपयोग पाण्याला सुगंध येण्यासाठीच (फक्त होतो).
------------------------------------------
माठाऐवजी तांच्याच्या तपेल्याला ओला कपडा गुंडाळून पण थंडावा मिळवता येतो. पण कपडा वाळल्यावर पुन्हा पुन्हा ओला करावा लागतो. माठ मुळात सच्छिद्र असल्याने तसे करावे लागत नाही.

कूलरच्या बाजूस लावलेल्या वाळ्याचाही सुगंध येण्यापुरताच उपयोग असतो. तिथे वाळ्याऐबजी सुती कापड (किंवा काथ्याचा पडदा) लावले तरी चालेल. परंतु सुती कापडाला ओले राहिल्यावर काही काळाने घाण वास सुटतो तसा वास वाळ्याच्या तट्ट्यांमुळे येत नाही (कळत नाही).

Nile Thu, 03/08/2017 - 00:45

In reply to by नितिन थत्ते

उद्देश पाण्याच्या पृष्ठभाग वाढवून जास्तीतजास्त हवेचा संपर्क येणे हा असतो. बंद माठात टाकलेल्या वाळ्याचा त्यादृष्टीने फायदा होत नाही. पण कुलर मध्ये लावलेल्याचा होतो. कारण कूलरच्या पंख्याने ढकललेली हवा वाळ्यातील अनेक छोट्या छोट्य भोगद्यांतून जाताना त्यातील पाण्याच्या बाष्पीभवनाने थंड होते.

सुती कापडाची जाडी फार नसल्याने त्याचा वाळ्याइतका फायदा होणार नाही. 'व्हॉईड रेशो' म्हणजे ओपन एरीया/टोटल एरीया ऑप्टीमम असायला लागतो. जास्त ओपन एरीया असेल तर पाण्याची बाष्पीभवन व्हायला जास्त वेळ लागेल आणी हवा तितकी थंड होणार नाही. कमी ओपन एरीया असेल तर हवेचा 'फ्लो रेट' कमी होईल. बाष्पीभवन कमी होईल.

तिरशिंगराव Sat, 05/08/2017 - 10:57

In reply to by Nile

मला वेगळीच शंका आहे. अनु राव या शास्त्रज्ञ आहेत का, हे तपासण्यासाठीच, काहीजणांनी वेड पांघरले असावे किंवा माठ असण्याचे ॲक्टिंग केले असावे. नाहीतर, १०० लाच चिकटून राहून, इतकी तोंडची वाफ कोणी दवडेल का ?

Nile Tue, 01/08/2017 - 21:33

मुळात, बेसिक प्रिन्सिपल असा आहे की ओपन सिस्टीममध्ये (ज्यात एनर्जीचे देवाणघेवाण होते) तिथे संपूर्ण सिस्टीमचे तापमान एकच होण्याची प्रक्रीया सुरू असते. सिस्टीम किती मोठी यावर त्या प्रक्रियेचा वेळ ठरतो.

पृथ्वीवरती होणार्‍या हवामानबदलात या तापमानाचा हात असतोच हे आपण लहानपणापासून शिकलेलो आहोतच. (मतलई वारे, कमी दाबाचा पट्टा वगैरे, पाणी आणि जमिन यांचे वेगवेगळ्या रेटने तापणे थंड होणे वगैरे)

आता मुळ प्रश्न. वातावरणातल्या गॅसचे तापमान. साधारण मोजण्याइतका वातावरणाचा भाग घेतला तर तापमान साधारण सारखेच असते. ज्याला आपण हवा म्हणतो ते वेगवेगळ्या गॅसेसचे मिश्रण असते. तेव्हा त्यांचे तापमान सारखेच असते.

पण जर तुम्ही मोठा भाग घेतला तर तापमान बदलते. उदाहरणार्थ, समुद्रसपाटीपासून जसजसे वर जाल तसतसे वातावरणातील तापमान बदलते वगैरे.

वरती जो बाष्पी/द्रवीभवनाविषयी संवाद झालेला आहे, ते नीट समजून घ्यायला खालील आकृती पहा. Phase Diagram असा शोध करून त्याविषयी वाचल्यास शंका निरसन व्हावे.

१४टॅन Wed, 02/08/2017 - 23:01

आत्ताच फेसबुकावर हा प्रकार पाहिला.

कमेंट्स वाचा. एन्जॉयिंग करंटली. गब्बरसिंगबुवा आणि अनुताईंची एकदम आठवण आली. डकवला इथे दुवा.

गब्बर सिंग Sat, 19/08/2017 - 00:00

In reply to by १४टॅन

ती तांबड्या रंगाच्या वर्तुळात असलेली मुलगी जर त्या पार्टी करणाऱ्या मंडळींच्या घरची कामवाली बाई असेल तर तिचे ते च काम आहे. तिला रेस्तराँ मधे आणणे व तिने जाणे / न जाणे हे परस्परसंमतीनुरूपच होईल व व्हावे.

उगीचच - तिला बसायला खुर्ची द्यायला हवी आणि खायला द्यायला हवे - असला पॅट्रोनायझींग उद्योग इतरांनी करू नये.

पुढे गेलेल्यांनी/यशस्वितांनी नेहमी मागे राहिलेल्यांची सेवा केली पायजे, नम्रता बाळगली पायजे, अन चौफेर लक्ष देऊन उपेक्षितांना यंव दिलं पायजे अन त्यंव दिलं पायजे == हा असला पॅट्रोनायझिंग बकवास जितक्या लवकर बंद होईल तितके चांगले.

नुकताच वाचनात आलेला हा लेख असाच ... - India’s urban elites are wilfully blind to their complicities in the exploitation of domestic workers

१४टॅन Sat, 19/08/2017 - 14:18

In reply to by गब्बर सिंग

पुढे गेलेल्यांनी/यशस्वितांनी नेहमी मागे राहिलेल्यांची सेवा केली पायजे, नम्रता बाळगली पायजे, अन चौफेर लक्ष देऊन उपेक्षितांना यंव दिलं पायजे अन त्यंव दिलं पायजे == हा असला पॅट्रोनायझिंग बकवास जितक्या लवकर बंद होईल तितके चांगले.

तुमचं कधीकधी पटतं, कधीकधी नाही पटत. म्हणजे, आपण फक्त जरा सुशिक्षित आणि सुखवस्तू कुटूंबात जन्म घेतल्यामुळे, सगळे अवयव ठीकठाक असल्यामुळे ज्या बऱ्याच अडचणी आपल्याला येत नाहीत, त्यांचं, त्या भाग्याचं भान बाळगणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मग त्या बाबतीत जरा कमनशिबी असलेल्या लोकांसाठी जरा आपण कष्ट घ्यायला हरकत नसावी, असं माझं मत आहे.
बाकी आपण जर सगळंच पूर्णत: स्वकर्तृत्वाने मिळवलेलं असेल, तर मात्र त्याचं पूर्ण श्रेय स्वत: घ्यावं आणि जे लोक ते करू शकले नाहीत, त्यांना उगीच patronize करु नये, ह्याच्याशी सहमत. मग लोकांना किंमत राहत नाही, आणि लोक फक्त जळण्याचं आणि/किंवा भिका मागण्याचं काम फार कलात्मकरित्या करतात, हे अनुभवून/पाहून झालेलं आहे.

गब्बर सिंग Sun, 20/08/2017 - 00:40

In reply to by १४टॅन

तुमचं कधीकधी पटतं, कधीकधी नाही पटत. म्हणजे, आपण फक्त जरा सुशिक्षित आणि सुखवस्तू कुटूंबात जन्म घेतल्यामुळे, सगळे अवयव ठीकठाक असल्यामुळे ज्या बऱ्याच अडचणी आपल्याला येत नाहीत, त्यांचं, त्या भाग्याचं भान बाळगणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मग त्या बाबतीत जरा कमनशिबी असलेल्या लोकांसाठी जरा आपण कष्ट घ्यायला हरकत नसावी, असं माझं मत आहे.

हे नेहमीचंच आहे. अध्यात्मवादी मंडळी बहुतेकदा या मताची असतात. व याची पाळंमुळं कर्मयोगात आहेत. की तुम्ही तुमच्या आईवडीलांच्या पोटी जन्माला आलात व त्यानुसार तुम्हाला बरंच काही मिळालं .... त्यात तुमचे कोणतेही कर्तृत्व नाही. तुम्ही ते चयन केलेले नाही. व म्हणून तुम्ही एकप्रकारचं भान बाळगणं गरजेचं आहे. पण ते मागे राहिलेले आहेत त्यांनी मात्र कोणतेही भान बाळगण्याची गरज नाही कारण त्यांना यंव मिळालं नाही अन त्यंव मिळालं नाही. त्यांनी व त्यांच्या आईवडिलांनी ते earn केलेलं नसलं व तुमच्या आईवडिलांनी ते earn केलेलं असलं म्हणून काय झालं ? समस्या ही आहे की - ते जे भान आहे ते त्या "Have Not" च्या प्रति का असावं ते मात्र सांगितले जात नाही. त्या भानातून जे काही कष्ट घ्यायचे आहेत ते कष्ट त्या Have Not लोकांसाठी का घेतले जावेत ते मात्र सांगितले जात नाही. कारण आईवडिलांनी ते earn केलेलं आहे हे सोयिस्कर पणे विसरलं जातं. earn केलं म्हणून काय झालं ? ते "मानो या ना मानो" समाजाचं ॠण च आहे असं काहीतरी मनावर बिंबवलं जातं. आणि समाज म्हंजे कोण ?? तर हे जे सगळे Have Not आहेत ते म्हंजे समाज. जे earn करतात ते अचानक समाजाच्या बाहेरचे होतात.

ओबामा ने याच्यापुढे जाऊन If You've Got A Business, You Didn't Build That - असे महाचक्रम विधान केलेले होते. ओबामा समर्थक मंडळी ... त्याला असं म्हणायचं नव्हतं अन तसं म्हणायचं नव्हतं ची मखलाशी करतात.

अर्थशास्त्रद्न्य लॉरा टायसन यांनी तर "समाज हा उद्योगांना ऑपरेट करण्याची परवानगी देतो व म्हणून उद्योगांनी समाजासाठी खपलं पाहिजे" असं विधान केलं होतं. जणू काही उद्योग जे काही ऑपरेट करतात ते समाजाकडून सगळं ओरबाडून/लुबाडून आणि earn न करता.

समाजवाद हे या चक्रमपणाचे पुढचे पाऊल आहे. की - A and B deciding what C, D, and E should do for F, G, H....Z.

रॅडिकल साम्यवादी तर earn करणे ह्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जोडीला "लेबर थियरी ऑफ व्हॅल्यु" चा बकवास सुरु करतात.

earn करणे यामधे इतरांसाठी काहीतरी व्हॅल्युएबल प्रोव्हाईड करणे हा मुख्य भाग असतो हे साम्यवाद्यांनी लोकांना विसरायला लावलेले आहे.

-------------

बाकी आपण जर सगळंच पूर्णत: स्वकर्तृत्वाने मिळवलेलं असेल

हे त्या रॅडिकल साम्यवादी मंडळींप्रमाणेच आहे. स्वकर्तृत्व हे नेहमी After seeking co-operation from others च असते. व इतरांचे co-operation हे earn केले जाते हे सोयिस्कर रित्या विसरले जाते किंवा इतरांचे co-operation मिळवणे हे लबाडी करूनच मिळवले जाते असा सोयिस्कर समज करून दिला/घेतला जातो.

-------------

जाताजाता : काल आमच्या एका कलीग ने तर "नारायण मूर्थी साहब नी इंडिया के लिये क्या किया ?" हा प्रश्न विचारून आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन केले होते.

नितिन थत्ते Sun, 20/08/2017 - 11:10

In reply to by गब्बर सिंग

>>इतरांचे co-operation हे earn केले जाते हे सोयिस्कर रित्या विसरले जाते

इतरांचे को ऑपरेशन अर्न करण्याची संधी सुद्धा भारतात बऱ्याचवेळा आपल्या जन्मावर अवलंबून असते हे गब्बरभौंना मान्य नाही.

गब्बर सिंग Sun, 20/08/2017 - 14:08

In reply to by नितिन थत्ते

इतरांचे को ऑपरेशन अर्न करण्याची संधी सुद्धा भारतात बऱ्याचवेळा आपल्या जन्मावर अवलंबून असते हे गब्बरभौंना मान्य नाही.

हास्यास्पद मुद्दा आहे.

जगातले भारतातले सर्व निर्णय हे भेदभाव, शोषण, लबाडी यावर चालतात या गृहितकावर हे बाक्य आधारलेले आहे.

ती संधी इतरांसाठी सुद्धा असते हे थत्तेचाचांना मान्य असूनही ते तसे कबूल करणार नाहीत.

---

इतरांचे को ऑपरेशन अर्न करण्याची संधी सुद्धा भारतात बऱ्याचवेळा आपल्या जन्मावर अवलंबून असते

हे अयोग्य कसे आहे ते मात्र थत्तेचाचा सांगणार नाहीत.

गब्बर असे थेट म्हणेल की सर्व प्रकारचा भेदभाव हा योग्य च असतो. व तो (सरकार सोडून इतर कोणीही) केला तरी तो योग्यच.

पण थत्तेचाचा मात्र तसे थेट म्हणणार नाहीत. त्यांच्यामते विकसितांनी भेदभाव करायला नाय पायजे. पण विकसनशीलांनी मात्र अवश्य भेदभाव करावा. उदा. सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्याकडच्या कर्मचाऱ्यांमधे स्त्रियांना वरियता नाही दिली तरी चालेल. पण बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मात्र स्त्रीपुरुष भेदभाव करायचा नाही.

नितिन थत्ते Sun, 20/08/2017 - 19:46

In reply to by गब्बर सिंग

>>पण थत्तेचाचा मात्र तसे थेट म्हणणार नाहीत. त्यांच्यामते विकसितांनी भेदभाव करायला नाय पायजे. पण विकसनशीलांनी मात्र अवश्य भेदभाव करावा. उदा. सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्याकडच्या कर्मचाऱ्यांमधे स्त्रियांना वरियता नाही दिली तरी चालेल. पण बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मात्र स्त्रीपुरुष भेदभाव करायचा नाही.

का बुवा? मी असं कधी म्हटलं? किंवा मी असा भेदभाव करतो असे कशावरून वाटले?

उलट महिलांना "सेम कामासाठी कमी पगार द्यावा लागत असता" तर सर्व कंपन्यांनी महिलांना प्रायोरिटीने कामावर घेतले असते हे तुमचे मत मला मान्य आहे.

चिमणराव Fri, 04/08/2017 - 18:04

हे कधी होणार? -
अचरटबाबा
गुरुवार, 03/08/2017 - 13:14
ओ मी दोन दिवसांपासून इकडे फक्त वाचत आहे.
बागकाम,बातमी समजली का या धाग्यांवरच लिहित आहे.
( बागेतल्या बाकावर बसल्यावर दोनतीनजण आजुबाजुला फेय्रा मारत चुळबुळ करत असतील तर मी लगेच उठतो. )
अजो१२३
गुरुवार, 03/08/2017 - 12:07
अचरट आणि अदिती करिता दोन वेगळे खरडफळे ठेवायचे .

मला कधी मिळणार?

'न'वी बाजू Sat, 05/08/2017 - 16:20

In reply to by आदूबाळ

- हा 'faq तुला' प्रकार म्हणजे आमच्या काळी जो α q b cos u r 2 sec c असा एक सुडोत्रिकोणमितीय फॉर्मुला असायचा (मधल्या स्पेसेस वाचनीयतेकरिता मी घातल्या आहेत. फॉर्मुल्यातील प्रथमाक्षर हे ग्रीक अक्षरमालिकेतीलसुद्धा प्रथमाक्षरच आहे.), त्या पठडीतला आहे काय?

- पण मग ही 'पिवळ्या पीतांबरा'च्या पठडीतली द्विरुक्ती नाही काय?

चिमणराव Sat, 05/08/2017 - 07:53

युपिएससीच्या परीक्षेतलं एक कूट-

? + ? + ? = ३०

( १,३,५,७,९,११,१३,१५ वापरून)

---
तीन विषम संख्या घेऊन एक समसंख्या येईल का?

( वाटसपवर आलेलं असेल हे कूट )

१४टॅन Sat, 05/08/2017 - 09:40

In reply to by चिमणराव

१५.३+५.७+९ (एक संख्या परत वापरायची नाही वगैरे असेल तर)

तीन विषम संख्या घेऊन एक समसंख्या येईल का?

कधीच नाही.
सिद्धता:
विषम संख्या ह्या १ मॉड्युलो २ असतात, आणि सम संख्या ० मॉड्युलो २.
३ विषम संख्यांची बेरीज = १ मॉड्युलो २ + १ मॉड्युलो २ + १ मॉड्युलो २ = १ मॉड्युलो २ होतं, म्हणजे विषमच.
जनरलायझेशन: विषम संख्यांची विषम वेळा बेरीज केली तर कधीच सम संख्या मिळणार नाही.

बॅटमॅन Mon, 07/08/2017 - 12:59

In reply to by गौराक्का

3! विषम नाही. विषम संख्येने दर्शवलेली सम संख्या आहे. दर्शवण्याइतपतच विषम चालत असेल तर मग काय काहीही चालून जावे. पण तसे अभिप्रेत आहेअ से वाटत नाही.

गौराक्का Mon, 07/08/2017 - 14:02

In reply to by बॅटमॅन

नुसत्या (अपूर्णांक , ऋण इ इ नसलेल्या) विषम संख्येने हे उत्तर येणे शक्य नाही. त्यामुळे असली काहीतरी भानगड करणे अगरवाल काकांना अपेक्षित असावे.

बादवे, हे व्हॉट्सॲप वाले सगळे कुणाचा तरी हवाला देउन बाकीच्यांना कामाला का लावतात? खरं उत्तर (पटेल असं) फार कमी वेळेस असतं प्रश्न ओतणाऱ्या कडे.

चिमणराव Sat, 05/08/2017 - 11:47

वाटसपमधून कॅापी पेस्ट-
>>हे गणित UPSC मुख्य परिक्षेतील आहे.फक्त वैभव अगरवाल यानेच सोडवले आहे. सोडवू शकाल?

❓➕❓➕❓=30

1 ,3 ,5 ,7 ,9, 11, 13 ,15

यापैकी अंक वापरा
कोणताही अंक कितीही वेळा वापरा
Best of luck..>>

अबापट Mon, 07/08/2017 - 16:34

हे शब्द फार म्हणजे फारच फेमस आहेत . कुणाकडे माहिती आहे का की हे कोण नक्की , त्यांचे प्रमाण किती वगैरे .
लोकप्रिय न्यूज चॅनेल्स ची मालकी व त्यांचे राजकीय लिनींग याबद्दल कोणाकडे माहिती असल्यास शेअर करणार का ?
मी सुरुवात करतो . NDTV : प्रणव रॉय .

अनुप ढेरे Mon, 07/08/2017 - 17:28

In reply to by अबापट

कळवणेस अत्यंत दु:ख होते पण एन्डिटीव्हीचे मालक अंबानी आहेत.

( संदर्भ १ , संदर्भ २, संदर्भ ३ )

अनुप ढेरे Mon, 07/08/2017 - 17:29

In reply to by अनु राव

वर वायर आणि कॅराव्हानचे लेख आहेत. अण्णांचा नक्की विश्वास बसेल.

हे बरेच दिवस आहे पब्लिक डोमेनमध्ये. कव्हरेज मिळत नाही.

अबापट Mon, 07/08/2017 - 17:43

म्हणजे आता तो खरा पेड न्यूज चा मालक झाला म्हणायचं क्काय ? पगारी नोकर ??
ढेरे सरकार , मला वाटलं होतं तेही तुम्ही धुळीला मिळवलंत ... आता सांगा मूळ प्रश्नाचं उत्तर कि नक्की पेड न्यूज वाले प्रेस्टिट्यूट्स सिक्युलर कोण ?
... अण्णांचा नक्की विश्वास बसेल....
और ये क्या हय ? लावला का शिक्का आमच्या पण XX वर ? घाला शिव्या आता !!! ;)

चिमणराव Mon, 07/08/2017 - 18:35

NDTV वाले त्यांची टीम मोबाइल वर्ल्ड काँग्रेसला कवरिजला बार्सलोनाला पाठवते ( cnbc awaaz ही ) प्रवेश फी पंधराशे डॅा,राहाण्याचा,जाण्याचा खर्च आहेच. स्थानिक माणसालाही जाऊन बातमी दे म्हटलं तरी खरं चालेल.
दुसरा एक - न्यूज नेशन-
मोदी मागच्या वर्षी अचानक नवाज शरिफकडे भेटले जेवले याचा लाइव टेलिकास्ट केलेला.
यांच्यामागे कोण?

गब्बर सिंग Tue, 08/08/2017 - 02:23

“Before you marry a person, you should first make them use a computer with slow Internet service to see who they really are.” —Will Ferrell

बॅटमॅन Tue, 08/08/2017 - 17:30

In reply to by अजो१२३

सोशल मीडिया आजकालच वर आलाय म्हणून तिकडे शिव्या आजकालच दिसतात. अन्य ठिकाणी अगोदरपासूनच दिसत होत्या.

Nile Thu, 10/08/2017 - 03:12

In reply to by अजो१२३

अहो, आता तुम्ही इथे इतकी वर्षं असूनसुद्धा तुम्ही कोणत्या ग्रहावरून आलेला आहात याविषयी अनेकांना संशय आहे. तरी आम्ही तुम्हाला इथल्यातलेच एक मानतो आहोतच ना, असेना का कितीही विचित्र.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 10/08/2017 - 04:04

In reply to by गब्बर सिंग

नाचता येईना अंगण वाकडे, या म्हणीला 'न'वा आयाम मिळाला.

बॅटमॅन Thu, 10/08/2017 - 16:36

हगायला जातो असे सांगायचे असेल किंवा हगतोय असे सांगायचे असेल तर जे अनेक अप्रत्यक्ष मार्ग आहेत त्यापैकी खास देशप्रेमी मार्ग म्हणजे "पाकिस्तानला जाऊन आलो" किंवा "क्षयझ पाकिस्तानात आहे" असे सांगणे होय. मराठी सोडून अन्य भाषिकांत अशा प्रकारचा शब्दप्रयोग कुणी ऐकलाय का?

मराठी भाषक लोकांमध्येही हा शब्दप्रयोग किती कॉमन आहे? मी तरी ऐकलाय आसपास.

'न'वी बाजू Thu, 10/08/2017 - 19:10

In reply to by बॅटमॅन

...हीदेखील मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हती.

पं. मुहम्मदशास्त्री जीनांचे आभार मानावेत तितके थोडे आहेत.

अनु राव Fri, 11/08/2017 - 09:39

नोटाबंदी मुळे सरकारला ४०,००० कोटी रुपयांचा बांबु.
गब्बु च्या लाडक्या आरबीआय ने सरकारला अपेक्षे पेक्षा २५-३० हजार कोटी डिव्हिडंड कमी दिला. त्याचे कारण असे
१. रिव्हर्स रेपो मुळे बँकांना १० हजार कोटी व्याजापाई द्यायला लागले.
२. नविन नोटांचा खर्च १० हजार कोटी
३. जुन्या नोटा गोळा करण्याचा आणि नष्ट करायला ५ हजार कोटी.,

सरकारने बजेट मधे ७० हजार कोटी आरबीआय देइल असे धरले होते, पण दिले ३१ हजारच.
--------------
क्रूड ११० डॉलर होते तेंव्हा इतकी किंम्मत सध्या पेट्रोल ची आहे. आमची नुस्ती लुट चालु आहे.
थत्तेचाचा, चिंजं, तुम्ही सोगांना ह्या सरकारला पाडण्यासाठी काहीतरी करायची विनंती करा प्लिज.

अजो१२३ Fri, 11/08/2017 - 10:28

In reply to by अनु राव

10+10+५ = २५ होतात, ४० नाही. यातले ३०% आयकर म्हणून सरकारकडेच येणार. वर १५.५% सेवाकर म्हणून येणार.
कंपन्यांना कमी व्याज द्यायला लागणार, त्यांची व्हायाबिलिटी वाढणार.
आणि सगळ्या पैशांचा हिशेब होणार
हे काय कमी फायदे आहेत का?
उद्या सरकारात ज्या शेतकऱ्याने १ लाख पेक्षा जास्त कॅश जमा केली तर कर्जमाफी नाही म्हटलं तर फायदाच फायदा आहे.
===========================
क्रूडच्या किमतीचा आणि पेट्रोलच्या किमतीचा काहितरी संबंध आहे का? मंजे आहे, पण कितपत? आणि क्रूड जेव्हा १००ला होतं तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा ओ एम सी नी कॅश लॉस दाखवला होता. आज दाखवत आहेत का? रिलायन्सचे ५००० पंप पाडले त्या किंमत न वाढायच्या भूषणाने. आज कोणी ढुंकून बघत नाही भारतीय मार्केट कडे.

अनु राव Fri, 11/08/2017 - 10:35

In reply to by अजो१२३

यातले ३०% आयकर म्हणून सरकारकडेच येणार. वर १५.५% सेवाकर म्हणून येणार.

हे काय आहे?

क्रूड जेव्हा १००ला होतं तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा ओ एम सी नी कॅश लॉस दाखवला होता. आज दाखवत आहेत का?

ओएमसी लॉस दाखवतात का फायदा ह्याची काळजी मी का करावी? माझ्या पर्स मधुन महिन्याला २००० रुपये जास्त गेले ते माझ्यासाठी महत्वासे आहे. बर, त्या बदल्यात मला काहिहि बेनिफिट पण मिळाले नाही. मी का म्हणुन हे सहन करावे?

अनु राव Fri, 11/08/2017 - 11:50

In reply to by नितिन थत्ते

मी तुमच्याकडे बघते. तुम्हाला सोगांच्या ऐवजी कोणी पोगा हे काम करेल असे वाटत असेल तर तुम्ही पोगाला सांगा.
मुद्दा हे सरकार घालवण्याचा आहे.

अनु राव Fri, 11/08/2017 - 10:32

10+10+५ = २५ होतात, ४० नाही.

अजो, किती इमोशनल रीडींग. बजेट मधे सरकारनी ७० हजार कोटी पकडले होते आणि मिळाले ३१ हजार कोटी, म्हणजे बांबु ३९ हजार कोटींचा लागला ना.
तो २५ हजार कोटींवा हिशोब मार्केट एक्पेक्टेशन ५८ हजार कोटीच होते त्याच्या अगेन्स्ट दिला आहे.

गब्बर सिंग Fri, 11/08/2017 - 11:02

In reply to by अनु राव

गब्बु च्या लाडक्या आरबीआय ने

कैच्याकै !!!

मी कधी म्हणालो आर्बीआय माझी लाडकी आहे म्हणून ??

---

म्हणजे बांबु ३९ हजार कोटींचा लागला ना

अश्लील अश्लील.

अजो१२३ Fri, 11/08/2017 - 11:13

In reply to by अनु राव

तुमच्या क्लेममधे "नोटबंदीमुळे" असाही उल्लेख आहे ना? डिविडेंड कमी का झाला याची बाकी कारणे अनु-लेख्खित का करता?
ग्रामरकडे लक्ष देत जा राव.

अनु राव Fri, 11/08/2017 - 11:26

In reply to by अजो१२३

डिविडेंड कमी का झाला याची बाकी कारणे अनु-लेख्खित का करता?

बाकी काही कारणे असतील तर उल्लेख करणार ना.
आणि बारीक्सारीक टुच्ची कारणे असतील असे समजा तुम्ही ( तुमच्या खुषी साठी ) तरी २५ हजार कोटीची जबाबदारी कोण घेणार?

आणि काही बोलण्याआधी पेट्रोल ४५ रुपये लिटर करा, मगच बाकी बोला.
गेल्या आडिच वर्षात पेट्रोल डिझेल वरच्या करापोटी मिळालेले जास्तीचे ३ लाख कोटी कुठे गेले हे पण सांगा. ३ लाख कोटी मधे नजरेत भरण्याइतका फरक दिसायला हवा होता.

ग्रामरकडे लक्ष देत जा राव.

मुद्दे संपले कि अशी प्रतिक्रीया द्यायला लागते ...

नितिन थत्ते Fri, 11/08/2017 - 17:53

In reply to by अनु राव

(नोव्हेंबर १६ अखेरीस)मार्केटचे एक्स्पेक्टेशन ३ लाख कोटींचा डिव्हिडंड मिळेल असे होते ना?

http://blogs.timesofindia.indiatimes.com/Swaminomics/now-modi-can-turn-…

What will Modi do with this windfall? He can transfer a whopping Rs 10,000 into each of 250 million Jan Dhan accounts that have been opened since he came to power. This will absorb Rs 2.5 lakh crore, leaving Rs 50,000 crore for other purposes like infrastructure. He could also hold a lottery to distribute part of this Rs 50,000 crore to all other citizens, giving every voter a chance to benefit from the bonanza.

अनु राव Fri, 11/08/2017 - 11:52

In reply to by अजो१२३

याच्या ५४.५% ची जबाबदारी.

हे कैच्या कै लॉजिक आहे तुमचे अजो. नोटाबंदी वॉज अ कंम्प्लिट फेल्युअर.

चिंतातुर जंतू Fri, 11/08/2017 - 17:57

In reply to by नितिन थत्ते

डिसरप्शन म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित होतं / आहे? उदा :
Mumbai GST protest: Power loom owners and weavers take problems to GST Council
Teething troubles: Confusion, fear among traders as they face problems in migrating to GST

नितिन थत्ते Fri, 11/08/2017 - 18:05

In reply to by चिंतातुर जंतू

१. आय टी लेव्हलचे डिसरप्शन- सर्वर हँगिंग नव्हे पण सेलर-परचेसरचा डेटा टॅली न होणे वगैरे
२. जीएसटीच्या दायऱ्यात न येऊ पाहणाऱ्यांची ससेहोलपट
३. मालाची अनुपलब्धता वगैरे

चिंतातुर जंतू Fri, 11/08/2017 - 19:01

In reply to by नितिन थत्ते

मला दिसलेल्या काही गोष्टी :

>>१. आय टी लेव्हलचे डिसरप्शन- सर्वर हँगिंग नव्हे पण सेलर-परचेसरचा डेटा टॅली न होणे वगैरे<<

एका सुप्रसिद्ध रीटेल इलेक्ट्राॅनिक कन्झ्यूमर वस्तू उत्पादक कंपनीच्या पुण्यातल्या गोदामात काम करणारे एक गृहस्थ सांगत होते. कंपनीनं त्यांना झीरो स्टाॅक करायला सांगितला. त्याप्रमाणे केला. मग नवा स्टाॅक यायला थोडा वेळ लागला. मग नवी आयटी सिस्टिम त्रास देऊ लागली. मी शेवटचं ऐकलं ते गेल्या आठवड्यात. तेव्हा ते सांगत होते की सिस्टिम कधीही सुरळीत होऊ शकते, पण अद्याप झालेली नाही. त्यामुळे गोदामात माल असून विकता येत नाही.

दुसरे एक गृहस्थ मुंबईत कुठल्याशा इंजिनियरिंग इंडस्ट्रीतले कंट्रोल पॅनल वगैरे प्रकारची मशिनरी बनवतात. त्यांचा धंदा जीएसटीनंतर बसलेला आहे कारण मालाला मागणीच नाही. प्रत्येक लीडपासून प्रत्यक्ष विक्री होण्यासाठी खूप वेळ आणि कष्ट लागत आहेत असं ते म्हणाले.

तिसरे गृहस्थ बांधकाम व्यवसायात आर्किटेक्चरल कन्सल्टन्सी चालवतात. बांधकाम व्यवसाय आधीच वाईट परिस्थितीत होता. आता मंदी आणखीच जोरात चालू आहे असं ते म्हणाले. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांवर चालत असल्याने कदाचित हा 'जीएसटीच्या दायऱ्यात न येऊ पाहणाऱ्यांची ससेहोलपट' असा प्रकार असू शकेल. हे आणि वरचे सगळे गृहस्थ मात्र स्वतःच्या कंपनीला जीएसटी कम्प्लायंट करून आहेत आणि त्यांचा व्यवसाय काळ्या पैशाचा नाही.

>>३. मालाची अनुपलब्धता वगैरे<<

छोट्या उद्योजकांकडून येणारा माल उपलब्ध नाही असं मी स्वतः अनुभवतो आहे. त्यात अनेक स्थानिक ब्रँडचा समावेश आहे. उदा. बिस्किटं, रसायनरहित गूळ, लाह्या, साबण वगैरेंसारखे पदार्थ.

अनु राव Sat, 12/08/2017 - 11:22

In reply to by चिंतातुर जंतू

मेजर डिसरप्शन झाले नाही ह्याचा अर्थ लोकांनी वर्काराऊंड शोधले आहेत आणि पूर्वीपेक्षा काहीहि फरक पडला नाहिये.

जसे नोटाबंदी मधे डिसरप्शन झाले नाही आणि जवळजवळ सगळे पैसे बँकांमधे जमा झाले. नोटाबंदी इव्हन बऱ्यापैकी जरी यशस्वी झाली असती तर मोठ्ठे डिसरप्शन दिसले असते.

Nile Fri, 18/08/2017 - 21:11

In reply to by बॅटमॅन

क्यांपात पुर्वी एक फक्त कबाब बनवणारं हाटेल होतं. नाव विसरलो. ब्येष्ट कबाब असायचे. थोडं महाग होतं. अजून आहे का माहित नाही.