Skip to main content

भारतीय शाकाहार आणि भूतदया

व्यवस्थापकः सदर प्रतिसाद मुळ ललित लेखनात प्रतिसाद म्हणून काही सदस्यांच्या वाचनात अवांतर व/वा रसभंग ठरू शकेल मात्र स्वतंत्र चर्चेसाठी वेगळा विषय म्हणून या प्रतिसादाचे महत्त्व लक्षात घेऊन धागा वेगळा करत आहोत. श्री अरूण जोशी यांना आवश्यक वाटल्यास अधिक तपशीलात हे लेखन विस्तारू/संपादित करू शकतील, शिवाय योग्य ते शीर्षकही देऊ शकतील.

===========

सिगारेट, दारू नि तंबाखू यांना विज्ञान नि परंपरा हे दोघेही त्याज्य मानतात.
----------
त्यावरून व्यक्तिचे पूर्ण व्यक्तिमत्व कळत नाही पण इतकेच निकष कोणाला महत्त्वाचे वाटू शकतात.
-----------------
@बॅटमॅन - शाकाहारी व्यक्तित भूतदयेचा भाव जास्त असू शकतो. बरेचदा असतो (हे मी पाहिलेले आहे). त्याकारणाने शाकाहारी व्यक्ति जास्त दयाळू असू शकते. (मांसाहार करणार्‍या प्रत्येकास स्वतः बकरी वा बैल कापायला सांगीतला, फक्त हे पाहायला कि त्यांचेत मानसिक विरोध होतो का, तर जितक्या सहजतेने नि आवडीने ते मांस खातात तितक्या सहजतेने नि आवडिने ते कापाकापी करणार नाहीत (हे ही भारतात प्रचंड पाहिलेले आहे). अपरोक्ष गोष्टींत काय होतं याचा मानवता फार विचार करत नाही.

खासकरून जी व्यक्ति परंपरागत रित्या मांसाहारी आहे, पण नंतर तिचे शाकाहार स्विकारला आहे (जसे जॉर्ज बर्नॉड शॉ.) ती विशेष भूतदयावादी असते.
----------------
भूतदयावाद (नि म्हणून एक मानवी चांगुलपण) नि आहारपद्धती यांचा संबंधच नाही हे विधान भारतीय परिप्रेक्ष्यात गैरलागू आहे.

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 15:06

In reply to by सलील

हा हा हा. एक नंबर प्रतिसाद.

वैसे तो लाकडी फर्निचरही वापरू नये कारण अत्यावश्यक नसतानाही फुकट झाडे मरतात. लाकडी फर्निचर वापरणारे लोक हे कोंबडीखाऊ लोकांइतकेच दोषी आहेत. मोठे आले टिकोजीराव!

सलील Tue, 23/09/2014 - 15:18

In reply to by बॅटमॅन

हो ना राव. पूर्वी मी पण ह्याच मताचा होतो. हे साले कोंबडीखाऊ मुसलमान आणि बाकीचे वगैरे असेच असतात वगैरे वगैरे. अनुभाअंती लक्षात आले असले काहीही नाही. सगळे तितकेच स्वार्थी असतात. एकदा त्या श्री श्री रविशंकर ह्यांच्या कळपात जावून पाहून आलो. जनता आपले मौन व्रत वगैरे करत आणि एक बाबाजी एक उंच खुर्चीवर बसून उपदेशाचे डोस वर डोस पाजत होता. हा बाबाजी स्वतः बाकीच्यान्पासून वेगळा. ह्याला जेवण वेगळे, ह्याला सर्व करायला एक कुमारिका दिमतीला आणि वर लोक आपले शाकाहाराचे गुणगान करण्यात मग्न. ह्या जेवणाने असे होते आणि तसे होते. मग ह्याला स्वतःला का बरे पंख डास चावू नयेत म्हणून आणि बाकीच्यांना त्रास होतो तर ईश्वरी इच्छा. इतका प्रचंड विरोधाभास मला जाणवला. असो. आमचा बागकामवाला बागेत धामण दिसली तरी मुद्दाम मारणार नाही स्वतः कोंबडी खाऊ असून. त्यामुळे ते भूतदया वगैरे ज्याच्या त्याच्या मूळच्या प्रवृत्तीवरच अवलंबून असते. आधी नसले तरी नंतर कधीतरी काही कारणाने जेंव्हा स्वतःवर वाईट वेळ आली की मग जाणीव होवून येते पण हे असले खाण्यावर अवलंबून आहे ह्यावरचा साफ विश्वास उडाला आहे.

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 15:23

In reply to by सलील

हे प्युअर व्हेजवाले शाकाहार श्रेष्ठ आहे हे ठसवायला इतकी वैचारिक हिंसा करतात की यांनाही बटाट्यासारखे सोलून, कांद्यासारखे तळून वांग्यागत भाजले पाहिजे मग कळेल शाकाहारातली हिंसा.

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 15:11

In reply to by सलील

आपण उल्लेखिलेले त्रास हे शाकाहारी नि मांसाहारी दोघेही निसर्गाला देतात.
प्लस मांसाहारी हे अजून एक त्रास देतात.
म्हणून फरक आहे.

गवि Tue, 23/09/2014 - 15:22

In reply to by सलील

सलील, अगदी हाच मुद्दा आहे योग्य.

झाडे वनस्पती म्हणजे कनिष्ठ जीव असे कोणत्यातरी जीवशास्त्राच्या संकेतानुसार मानले गेले असावे. ते घट्ट धरुन शाकाहार (वनस्पतीभक्षण) म्हणजे जणू आहारच नव्हे किंवा त्यात कोणतीही हिंसा नाही किंवा असली तर ती कमीजास्त दर्जाची / पातळीची आहे इत्यादि काहीही म्हणणे सर्वथैव अयोग्य आहे.

मुख्य मुद्दा असा की आपण सर्वचजण परजीवी आहोत. हत्या केल्याशिवाय जगणे शक्य नाही. झाडे वनस्पती यांची हत्या म्हणजे हत्या नव्हे कारण त्यांना सेंट्रल नर्व्हस सिस्टीम नसते, वेदना होत नाहीत इ इ अशी गृहीतक मान्य केली की मग काहीही म्हणता येऊ शकेल.

बाकी सर्व अवयव मरुदेत, झाडांना नुसते डोळे जरी असते तरी ते झाड कापताना मनुष्य इतका निर्विकार राहू शकला नसता.

पण दुर्दैवाने (झाडांच्या) त्यांना मारताना कसली तडफड दिसत नाही, ओरडणे, आचके असे काही नसते. म्हणून ते ऑपॉप कनिष्ठ (मारण्यास सोपे अन सोयीचे?!) जीव ठरतात.

बिरड्याची दोन वाट्या उसळ ओरपताना त्यातली प्रत्येक बी पुढे एक झाड होण्याचं पोटेन्शियल असलेली होती हे कोणी लक्षात घेतो का? झाडे उगवू देऊन त्याची फक्त फळे काढणारे लोक तरी परवडले, पण फणसाच्या आठळ्या उकडून खाणारे अन कणीस भाजून खाणारे लोक.. यांना काय म्हणावं ?

जास्त कोवळी भाजी म्हणजे जास्त चांगली, जून नको म्हणताना कोवळा दुधी तोडला जातो आणि बेबीकॉर्न बाल्यावस्थेतच तोडून विकले जातात. मेथीची इंचभर लांब दोन छोट्या पर्णिका उगवलेल्या रोपांची पेंडी जून मेथीपेक्षा जास्त आवडीने खाल्ली जाते. या सर्वांमधे आणि कोवळ्या कोकराचे मांस जास्त लुसलुशीत असते, किंवा माश्याची गाबोळी आम्हाला खास आवडते असे म्हणणार्‍यांमधे साम्य नाही असे म्हणणे सोपे आहे.. कारण एकच.. वनस्पती हे कनिष्ठ जीव हे घट्ट गृहीतक.

तेच अत्यंत चुकीचं आहे. डास, ढेकूण, उंदीर यांच्याप्रमाणे आपल्याला कोणताही उपद्रव न देता उलट सर्वार्थाने जगाला अनुकूल ठरणार्‍या वनस्पती कनिष्ठ आणि त्यांना नष्ट करुन खाणे ही हिंसा नव्हेच.. यावर पुढे काय स्पष्टीकरण द्यावे?

सलील Tue, 23/09/2014 - 15:30

In reply to by गवि

अगदी अगदी. हाच विचार आमच्या जैन आणि मारवाडी मित्रांच्या संगतीत माझ्या मनात आला. कारण प्राणी मारताना होणारा त्रास ह्यावरच सगळे अवलंबून आहे पण मुदलात वनस्पतींचा आक्रोश दिसत नाही म्हणून त्रास होत नाही हे कसे लक्षात नाही हे मला तेंव्हा कोडे पडले होते. ह्याशिवाय आमच्या बागेत भरपूर गुलाबाची फुले येत असत. दोन आज्ज्या रोज येवून फुले तोडत. मी त्यांना एकदा म्हणालो की अहो ते झाड किती सुंदर दिसतंय तुम्ही कसेही तोडून कुरूप तर केलेच परत वर कळ्या पण तोडयात. ह्यावर आलेले उत्तर म्हणजे महान होते. देवाला कळ्या चांगल्या आणि तुम्हाला इतकी झाडे आहेत मग एका झाडाचे झाले असे तर काय बिघडले. कसली आली देवपूजा आणि शाकाहारी भूतदया.

गवि Tue, 23/09/2014 - 15:36

In reply to by सलील

वनस्पती विरुद्ध प्राणी श्रेष्ठ कोण असा चंपक अंकातल्याटाईप प्रश्न इथे नाहीये.

वनस्पती आणि प्राणी या दोघांनाही मारण्याबाबत अपरिहार्यता नाकारणे शक्यच नाहीये.

प्रश्न फक्त त्या दोन्हीतली क्रूरता आवश्यक म्हणून स्वीकारणे आणि त्यातल्या एका कशालातरी "कमी" क्रूर किंवा "जास्त" क्रूर असे म्हणण्यात किंवा भूतदया हा शब्द वापरण्यात काही अर्थ नाही इतकाच आहे.

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 15:44

In reply to by गवि

का हो गवि, हे खावं का ते खावं याचा इतका विचार का करावा? सजीवसृष्टी असावी, ती पुढे जावी, वाढावी असे विचार फार प्रबल दिसतात आपल्या प्रतिसादांत. का? अनीश्वर जगात हे असले काय आन नसले काय, काय फरक पडतो? मी आज मेलो, तर उद्या माझ्या किती पिढ्याचे किती लोक (ते ही माझे जीन्स पातळ पातळ होते जातात पिढीगणिक, त्यांना किती माझं म्हणावं हा इश्श्यूच आहे.) असावेत नि किती नसावेत हे मेल्यावर मला अनीश्वर जगात काय फरक पडतो? किंवा कोणाचीच पिढी पुढे नै गेली तरी काय फरक पडतो? मी गेलो कि नाही ते महत्त्वाचं . ते अगोदर पाहावं. मरणानंतर (माझे अस्तित्व) काहीच नसताना एवढा विचार का करावा?
-------------
निसर्गाला आपलं संतुलन कसं करावं हे माहित आहे. तुम्ही तुमचा विवेक काय स्पष्ट सांगतो ते पहा.

घनु Tue, 23/09/2014 - 15:38

In reply to by गवि

झाडे उगवू देऊन त्याची फक्त फळे काढणारे लोक तरी परवडले, पण फणसाच्या आठळ्या उकडून खाणारे अन कणीस भाजून खाणारे लोक.. यांना काय म्हणावं ?

ह्यावरून अशोक नायगावकरांची 'शाकाहारी हिंसाचार' ही कविता आठवली :
आय होप ही कविता वाचून तरी मांसाहार मांसाहार ओरडणार्‍या शाकाहारांना आपणही फार वेगळे नाही ही समज यावी.

शाकाहारी हिंसाचार

गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत
क्रुरपणे त्वचा सोलली जातीय दुधी भोपळ्याची
सपास्सप सुरी चालवत कांद्याची कापाकापी चाललीय
डोळ्यांची आग-आग होतोय........
शहाळ्या-नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय
हे भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी
तडतडतेय मोहरी........
हा अखेरचा फडफडाट कढीपत्त्यांच्या पंखांचा उकळत्या तेलात
आणि तिखट टाकलं जातंय भाजीच्या अंगावर डोळ्यात........
धारेवर किसली जातायत गाजरं
पिळवणूक चाललीय आंब्याची
सर्वहारा बनलीय कोय......
वरवंट्याखाली चिरडतेय मीठमिरची
बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात
फड्क्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय
चक्का बनण्यासाठी......
हे भरडले जातायत गहू
लाहीलाही होतीय मक्याची ज्वारीची
भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात
पोलीस नुस्तेच बघतायत......
संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्रं
उतरवली जातायत दिवसाढवळ्या
मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी
आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जातंय जखमांवर
हे काय चाललंय युगानुयुगे शाकाहारी......
--अशोक नायगावकर

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 16:00

In reply to by सलील

वनस्पती टाहो फोडत नाहीत म्हणून ते खाताना त्रास होत नाही. उद्या असे दिसून आले की वनस्पतीनाही तेवढाच त्रास होतो मग काय करणार बुवा?

Nerve concentration is not uniform even in human body.
----------
उद्या कुत्र्यांना माणसांपेक्षा जास्त बुद्धी दिसून आली तर? असेही म्हणा ना. इतक्या हुशार लोकांना आपण घरातही घेतले नाही गंड राहिल लोकांना स्ट्रे डोग्ज बघून.
---------
Pain has a bilogical meaning and also a human perception. Why do you want to assign different meaning to them?

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 16:02

In reply to by अजो१२३

उद्या कुत्र्यांना माणसांपेक्षा जास्त बुद्धी दिसून आली तर? असेही म्हणा ना. इतक्या हुशार लोकांना आपण घरातही घेतले नाही गंड राहिल लोकांना स्ट्रे डोग्ज बघून.

काय रोचक प्रतिसाद आहे. स्वतः मात्र एकांगी बोलून बाकी लोकांकडून सर्व बाजू वदवण्याच्या अट्टाहासाला काय अर्थ आहे?

Pain has a bilogical meaning and also a human perception. Why do you want to assign different meaning to them?

म्हणजे वनस्पतींनाही भावभावना, वेदना, इ. होतात असे साम्गणारे कोण ते जगदिशचंद्र बोस येडेच म्हटले पाहिजेत.

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 18:36

In reply to by बॅटमॅन

म्हणजे वनस्पतींनाही भावभावना, वेदना, इ. होतात असे साम्गणारे कोण ते जगदिशचंद्र बोस येडेच म्हटले पाहिजेत.

माझी इच्छा नाही, पण बॅटमॅनला कंटेन करायला, पातळी सोडून विशेषणे वापरने आवश्यक आहे. मी केव्हाचा ती शांतपणे वाचतोय. पण आता सदस्यत्त गेले तर गेले, आय विल रिप्लाय इन काइंड.
-----------
विधानाचा गाढवी अर्थ काढला आहे. वेदनेची जैविक आणि मानवी व्याख्या/अर्थ बदलू नये या विधानाला वनस्पतींना भावना नसतात असे वाचणार महामूर्खच म्हटला पाहिजे.

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 18:39

In reply to by अजो१२३

मी प्रतिसादाला शिव्या घालतोय. प्रतिसाद मूर्खपणाचा आहे याचा अर्थ प्रतिसादक मूर्ख आहे असा होत नाही. तेव्हा ती धमकी कृपया स्वतःकडेच ठेवावी.

विधानाचा गाढवी अर्थ काढला आहे. वेदनेची जैविक आणि मानवी व्याख्या/अर्थ बदलू नये या विधानाला वनस्पतींना भावना नसतात असे वाचणार महामूर्खच म्हटला पाहिजे.

जशास तसे. वेदनेची अमुक एकच व्याख्या प्रमाण मानणे हा शहाणपणा माझ्या मते नाही.

सलील Tue, 23/09/2014 - 16:25

In reply to by अजो१२३

भाऊ काय बी झेपले नाही बा.
why not agree to disagree. I don't object you being a non vegetarian, in fact I am too vegetarian but why this hypocrisy and holier than thou attitude ??

जो जे वांछिल तो ते खावो!!!

सलील Tue, 23/09/2014 - 16:32

In reply to by मन

why not agree to disagree. I don't object you being a vegetarian, in fact I am too vegetarian but why this hypocrisy and holier than thou attitude ?? असे वाचावे. पुन्हा माफी माफी ह्या पामराला माफी. हे म्हणजे ब्राह्म्हत्येचे पातक लागले अजोंना नॉन व्हेज म्हणून. दाती त्र्यूण धरुण शरण.

सलील Tue, 23/09/2014 - 16:32

In reply to by मन

why not agree to disagree. I don't object you being a vegetarian, in fact I am too vegetarian but why this hypocrisy and holier than thou attitude ?? असे वाचावे. पुन्हा माफी माफी ह्या पामराला माफी. हे म्हणजे ब्राह्म्हत्येचे पातक लागले अजोंना नॉन व्हेज म्हणून. दाती त्र्यूण धरुण शरण.

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 18:31

In reply to by सलील

भाऊ काय बी झेपले नाही बा.

चामडं कापलं दुखतंय मंजे नख कापलं तर बी तितकंच दुकत असंल अस्लं काय बी मनू नगा.

in fact I am too vegetarian but why this hypocrisy and holier than thou attitude ??

My own food habit is immaterial in deciding who is more compassionate.

in fact I am too vegetarian but why this hypocrisy and holier than thou attitude ??

Holier than thou? How? One set of people can be superior than some other set of people. Why should I care people would allege that way while defending vegeterianism if it holds qualitative merit?

in fact I am too vegetarian but why this hypocrisy and holier than thou attitude ??

If vegeterianism has no merit and you have chosen to be one, what is wrong with you?

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 18:37

In reply to by अजो१२३

Ajo says- My own food habit is immaterial in deciding who is more compassionate.

So in similar way, why not see the sentence

in fact I am too vegetarian but why this hypocrisy and holier than thou attitude

in the same light? स्वतःचं लॉजिक इतरांना लावू देण्यात मात्र अजो खळखळ करतात हे रोचक आहे.

If vegeterianism has no merit and you have chosen to be one, what is wrong with you?

हे वाक्य अतिशय मूर्खपणाचे आहे. हे म्हणजे, पुरुष असणे/नसणे यात काही अर्थ नसेल तर तुम्ही पुरुष का झाला म्हणण्यापैकी आहे.

सलील Wed, 24/09/2014 - 02:14

In reply to by अजो१२३

सवय हो सवय बाकी काही नाही. लहानपणापासून शाकाहारी आहे म्हणून. माझ्या पोराला मात्र मी हे असले काही शिकवले नाहीये. तो घरी मोदक आणि पालकाच्या भाजीवर जितका ताव मारतो तितकाच चिकन वरपण ताव मारतो. शेवटी पचत असेल आणि आवड असेल तर शाकाहार केला काय आणि मांसाहार केला काय काही फरक पडत नाही.

बाकी आधी तुम्ही म्हणता तसेच समाज होते पण नंतर निरीक्षणाअंती दूर झाले. काही लोकांचे मांसाहार करणर्यांना तुच्छ लेखाणे, उगचच कोणी काही खात असले कि असे काही कटाक्ष टाकणे कि बस काय लोक हे वगैरे आणि स्वतः कसे वागतो आहोत ह्याचे काहीही भान नाही. आमच्या शाळेत ६वित असताना एका शाकाहारी शिक्षकांनी कोंबडी खाणे कसे वाईट ह्याचे वर्णन केले होते. पण हेच सर पोरांना जीव तोडून मारायचे आणि भरपूर छळायचे तेंव्हाच प्रश्न पडला होता की ह्या माणसात आणि कासया मध्ये काय फरक आहे. फक्त साले आह्मी पुढील वर्गात जाईपर्यंत जीव मुठीत धरून राहिलो. मग काय फायदा हो.

अजो१२३ Wed, 24/09/2014 - 11:05

In reply to by सलील

काय राव, असं कूठं असतंय का? सवय हो सवय मंजे? सवय म्हणून काहीही परंपरागत निरर्थक गोष्टी पाळाल का? सवय हो सवय म्हणत हुंडा घ्याल? सती जाल? तीन तास जप करत बसाल (देव नाही हे माहित असून)? किमान १०८ गायत्री मंत्र?
-------------
ज्या सवयीत काय मंजे काही तथ्य नाही, जी सवय तोटा आहे तिला कुरवाळण्यात काय अर्थ आहे?
----------------
जरा आपल्या सवयी नक्की उद्गम काय आहे याचा विचार करून प्रकरण काय आहे ते सांगू शकता का? मांसाहार शाकाहाराइतकाच "भूतदयावादी आहे", मूलाला असल्या (फालतू) सवयी लावल्या नाहीत, तर स्वतःचा अपवाद का? नक्की काय गोम आहे?
-----------
मी एक लहान मूल आहे. माझ्या घरात दोन खेळणी आहेत. एक लाकडी पोपट. दुसरा रिमोटने चालणारे हेलिकॉप्टर. मला खेळायला खूप आवडते. पण मी केवळ लाकडी पोपट खेळतो. कारण हेलिकॉप्टर खेळायची "सवय" नाही. अरे हे काय? लावून घ्या ना सवय. असली कित्ती मस्त मस्त आनंददायक खेळणी आहेत बाजारात. नंतर ती ही आवडतील. उगाच ते हेलिकॉप्तर सडवताय कशाला?
------------
आपण मांसाहार्‍यांपेक्षा जास्त भूतदयावादी आहोत हे मान्य करण्यात (इन केस तसे असेल तर, मला नक्की माहित नाही.) इतका गंड का? होलिअर दॅन दाऊ म्हणून हिणवतोय, दांभिक आहे असे म्हणतील का लोक याची भिती? म्हणू देत लोकांना, तुमच्या आत्म्याला जे वाटतं त्याला इतरांची साक्ष कशाला हवीय?

बॅटमॅन Wed, 24/09/2014 - 11:31

In reply to by अजो१२३

जरा आपल्या सवयी नक्की उद्गम काय आहे याचा विचार करून प्रकरण काय आहे ते सांगू शकता का? मांसाहार शाकाहाराइतकाच "भूतदयावादी आहे", मूलाला असल्या (फालतू) सवयी लावल्या नाहीत, तर स्वतःचा अपवाद का? नक्की काय गोम आहे?

नॉनव्हेज अमंगळ असूनही भारतीय जन्ता खाते, काय गोम काय आहे? सगळे बिनडोकच असावेत नै तसे मानणारे?

आपण मांसाहार्‍यांपेक्षा जास्त भूतदयावादी आहोत हे मान्य करण्यात (इन केस तसे असेल तर, मला नक्की माहित नाही.) इतका गंड का? होलिअर दॅन दाऊ म्हणून हिणवतोय, दांभिक आहे असे म्हणतील का लोक याची भिती? म्हणू देत लोकांना, तुमच्या आत्म्याला जे वाटतं त्याला इतरांची साक्ष कशाला हवीय?

थोडक्यात, सत्य काहीही असो पण मला अमुकच खरं वाटतंय म्हणून ओरडायचं? भलताच विनोदी प्रकार आहे. मुद्दे संपल्यावर भावनेला हात घालणं सुरू झालंय =))

अजो१२३ Wed, 24/09/2014 - 11:54

In reply to by बॅटमॅन

भारतीय जन्ता

प्रतिसाद एकूण धाग्याच्या अनुषंगाने नाही. फक्त भारतीय जनतेचा गील्ट सेंन्स कसा आहे ते सांगायला आहे. उगाच बिनडोक, बायस्ड, गाढवी, असंबद्ध, इ इ इंटर्प्रितेशन करू नये.
---------------
नच खाणे (उपवास) - सात्विक शाकाहार (उपासाचे तथाकथित पवित्र पदार्थ) - संपूर्ण शाकाहार - मांसाहार (अंडी, मासे, चिकन, मटन असल्या क्रमाने)- गोमांस असा सर्वसाधारण गील्टसेंन्सचा स्पष्ट क्रम भारतात आहे. दिसत नसला तर डोळे उघडे करा.
-------
हो, वरचे वाक्य पून्हा वाचा. "गिल्ट सेन्स आहे" असे लिहिले आहे. आपली आहारपद्धती त्यांना या पद्धतीने अकोमोडेट करावी लागते.
-----------
याला अपवाद चिकार आहेत. जलकिनारी मासे कोनताही गिल्ट सेन्स देत नाही. मुस्लिमांना डुक्कर सोडून सामान्य कोणत्याही मांसाहाराचा गिल्ट सेन्स नाही, इ. पण तो नाहीच आणि कोणालाच नाही हे लै झाले. देव, पावित्र्य म्हटले कि (काही अपवाद वगळ्यास) शाकाहार मस्ट असतो.
-------------
मांसाहारी मुस्लिम पवित्र महिन्या उपाशी असतात. बीफ म्हटले कि मुरलेला बंगाली टरकतो. एक भूतदयेचा क्रम आहे. बिनडोकपणा नाही. तो क्रम प्रत्येकाचा वेगळा आहे म्हणून ते बिनडोक नाहीत होत. ते सगळेच क्रम तुम्ही पाहता म्हणून तुम्हाला सगळेच बिनडोक वाटतात. जो आपला आपला क्रम पाहतो तो आपले मते बिनडोक नसतो.
---------------
मात्र वनस्पती नि प्राणी यांच्या भावना, सजीवत्व हे समान आहे असे मानणारे लोक कंप्लीट बिनडोक असतात.

बॅटमॅन Wed, 24/09/2014 - 12:01

In reply to by अजो१२३

आणि समजा तुम्ही उल्लेखिलेल्या पैकी गिल्ट सेन्स जर कुणाला नसेल तर तो तुमच्या मते महामूर्खच असेल. हरकत नाही.

पण मग असा गिल्ट सेन्स पाळूनही खाणारी जन्ता ट्रिपल महामूर्ख आहे. एक मूर्खपणाची गोष्ट अब्जावधी लोकांनी केली म्हणून तिचा शहाणपणा होत नाही. डोके गहाण ठेवणार्‍या फडतुसांचा हवाला दिल्याने तर नाहीच नाही.

अजो१२३ Wed, 24/09/2014 - 12:33

In reply to by बॅटमॅन

आणि समजा तुम्ही उल्लेखिलेल्या पैकी गिल्ट सेन्स जर कुणाला नसेल तर तो तुमच्या मते महामूर्खच असेल. हरकत नाही.

महामूर्ख? अजिबात नाही. संबंधच नाही. फार हूशार असू शकतो. कमी भूतदया असणारा नक्की असेल. स्वतःचे मते नसेल पण लोकांचे मते असेल.

पण मग असा गिल्ट सेन्स पाळूनही खाणारी जन्ता ट्रिपल महामूर्ख आहे. एक मूर्खपणाची गोष्ट अब्जावधी लोकांनी केली म्हणून तिचा शहाणपणा होत नाही. डोके गहाण ठेवणार्‍या फडतुसांचा हवाला दिल्याने तर नाहीच नाही.

गिल्ट सेन्स आणि बुद्धिमत्ता यांचा धाग्यात काहीही संबंध नाही. उगाच तिसरंच असंचंद्ध फालतू प्रकरण मधे आणू नकात. गिल्ट असणारे, नसणारे लोक हुशार, मूर्ख दोन्ही असू शकतात. आपली चर्चा "भूतदयाजनित अपराधभाव व मानवी बुद्धिमता" या विषयावर नाही. "भारतीय आहारशैली आणि भूतदया" या विषयावर आहे.
--------------
असे अब्जावधी लोक मूर्ख असतात कि नसतात हा भिन्न विषय आहे. त्यावर काही एक चर्चा न करता मी ते विशुद्ध गाढव असतात असे मानले तरी केवळ त्यांत अपराधीभाव असतो इतक्याच कारणाने ते "अधिक भूतदयावादी" ठरतात. असा अपराधीभाव ही कृती कमी क्रूर, संख्येने कमी, कमी वेळा, चांगल्या पधतीने इ करण्यात परिणित होतोच होतो.

बॅटमॅन Wed, 24/09/2014 - 13:48

In reply to by अजो१२३

गिल्ट सेन्स आणि बुद्धिमत्ता यांचा धाग्यात काहीही संबंध नाही. उगाच तिसरंच असंचंद्ध फालतू प्रकरण मधे आणू नकात. गिल्ट असणारे, नसणारे लोक हुशार, मूर्ख दोन्ही असू शकतात. आपली चर्चा "भूतदयाजनित अपराधभाव व मानवी बुद्धिमता" या विषयावर नाही. "भारतीय आहारशैली आणि भूतदया" या विषयावर आहे.
--------------
असे अब्जावधी लोक मूर्ख असतात कि नसतात हा भिन्न विषय आहे. त्यावर काही एक चर्चा न करता मी ते विशुद्ध गाढव असतात असे मानले तरी केवळ त्यांत अपराधीभाव असतो इतक्याच कारणाने ते "अधिक भूतदयावादी" ठरतात. असा अपराधीभाव ही कृती कमी क्रूर, संख्येने कमी, कमी वेळा, चांगल्या पधतीने इ करण्यात परिणित होतोच होतो.

बॅट बॉल आमचीच, नियमही आमचेच. बॉलही आम्हीच टाकणार अन शॉटही आम्हीच मारून वर 'डब्बल सेंच्युरी' चा पुकारा देखील आम्हीच करणार. क्या बात है!!!

अजो१२३ Wed, 24/09/2014 - 14:58

In reply to by बॅटमॅन

बॅट बॉल आमचीच, नियमही आमचेच. बॉलही आम्हीच टाकणार अन शॉटही आम्हीच मारून वर 'डब्बल सेंच्युरी' चा पुकारा देखील आम्हीच करणार. क्या बात है!!!

असं आहे. असू शकतं.
----------------
बुद्धिबळात प्यादे नियमांनीच हलवायचे असतात, त्याचे कडक नियम असतात. पण कोणते प्यादे कसे चालते याचा अर्थ असा होत नाही कि ते प्यादे, पीस हवेत फेकून मारता येत नाही. पाहिजे तेवढा चेस खेळा, कृत्रिम नियम बनवा, पण मूळ नियम लक्षात ठेवा. जरा भानावर या.

बॅटमॅन Wed, 24/09/2014 - 15:02

In reply to by अजो१२३

कृत्रिम नियम बनवा, पण मूळ नियम लक्षात ठेवा. जरा भानावर या.

तुमच्या फूल्स पॅराडाईस मधून तुम्ही भानावर या. तुमचा नियम तो मूळ अन बाकीच्यांचा कृत्रिम हे म्हणायला तुमच्याकडे तुमचा पूर्वग्रह सोडून काही म्हणजे काहीच आधार नाही.

पण असल्या प्रवचनांवर बाकी सनातन किंवा तत्सम ठिकाणी तुम्हांला ट्यार्पी चांगला मिळेल.

चुकीची माहिती, तितकेच गंडलेले विश्लेषण आणि तितकेच आग्रही प्रतिपादन ही तुमच्या विवेचनातील वैशिष्ट्ये सनातनला जशीच्या तशी लागू पडतात.

सलील Wed, 24/09/2014 - 13:00

In reply to by अजो१२३

सवयच हो सवय बाकी खरच काही नाही. बायको घरात करत नाही आणि बाहेर फार महाग आहे. फुकट संधी मिळाली किंवा स्वतःहून गेलो कधी मधी तरी नक्कीच खातो. दुसरे म्हणजे वासाची सवय. आमचा एक मित्र अट्टल शाकाहार पासून अट्टल मांसाहारी बनला आहे. माझी तेवढी आंतरिक उर्मी नाहीये. ह्यात भूतदयेचा कुठलाही प्रश्न नाही. जे आवडते ते खावे, बाकी काही नाही.

गवि Tue, 23/09/2014 - 14:24

In reply to by बॅटमॅन

एक विनोद म्हणून सांगितला जातो पण त्यात सुप्पर तथ्य आहे. कर्बद्विप्रणिल वायू शोषून उपयुक्त ऑक्सिजन देणार्‍या वनस्पती नष्ट करणारे शाकाहारी आणि ऑक्सिजन संपवून कार्बनडाय ऑक्साईड हवेत वाढविणारी कोंबडीबकरी खाणारे मांसाहारी यात तुलनेत बरे काय?

घाटावरचे भट Tue, 23/09/2014 - 14:45

In reply to by गवि

ऑक्सिजन संपवून कार्बनडाय ऑक्साईड हवेत वाढविणारी कोंबडीबकरी खाणारे मांसाहारी

हे कधी कधी इतर वायूदेखील सोडतात बरं का हवेत. ;-) (हे लिहिण्याचा मोह आवरला नाही. क्षमस्व!)

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 15:33

१. मांसाहार्‍यांनी हत्या करून मांस खाणे
२. मांसाहार्‍यांनी इतरांकडून हत्या करून घेऊन मांस खाणे
३. मांसासाठी प्राणी विकणे
४. मांसासाठी प्राणी विकणे
५. त्रासदायक, हानीकारक उंदरांचा पालींचा जीव घेणे
६. प्राणघातक ठरू शकणार्‍या सापाला मारणे
७. बैलाचे वृषण ठेचणे
८. गायीचे दूध पिणे
९. शुद्ध शाकाहारी असणे
१०. अगदी वनस्पती देखिल न खाता मरूनच जाणे
----------------------
वरील कृती मनुष्याच्या क्रौर्याच्या उतरत्या क्रमाने लावा म्हटल्यास त्याची दोन उत्तरे असू शकतातः १. क्रम आहे २. क्रमाला अर्थ नाही.
------
जर क्रमाला अर्थ नाही असे म्हटले तर "अंततः" भूतदया नावाची संकल्पनाच नाही असे म्हटल्यासारखे होते. कारण काय जास्त चांगले आणि काय जास्त वाइट यांना कोणताही एक निकष घेऊन सांगायचे नाहीय. हे वाईट ना? मग सगळेच वाईट. सगळेच सारखेच वाइट. पण असं नसतं. सुनेला त्रास देणारे सगळेच वाईट. पण जीव घेणारे जास्त वाईट. त्रास देणारे कमी वाईट. मुळात कमी जास्त हेच मान्य करायचे नसेल तर भावनांना अर्थ उरत नाही.
-------
वरील ऑप्शन्स मधे कोनताही क्रम मान्य केला तर "भूतदया" नावाचा एक रियल कंसेप्ट आहे असे होते. कोणतीही कृती करण्यासाठी कमी क्रूर आणि जास्त क्रूर असे पर्याय असतात हे निर्विवाद आहे. शरीराला काही होणार नाही, कायद्याने काही होणार नाही हे माहित असताना सर्वात चांगला पर्याय निवडणारा तो श्रेष्ठ, उत्तम. मग कोणती कृती करणार?
--------
सजीव खाणारे (तो कोणता का सजीव असेना) सगळे सारखे हे मान्य केले तर त्या निकषावर भूतदया नावाची संकल्पनाच नाही असे होते. अगदी दुसर्‍या निकषावर सुद्धा बेसिस एकदम सगळे सारखे म्हटले कि ती नोशनच अर्थहिन होते. म्हणजे मदत करणे हा भूतदयेचा दुसरा निकष मानू. आपले सर्वस्व देणे ते त्रास न देण्याचा उपकार करणे हे सगळे सारखेच मानले तर भूतदया कचर्‍यात निघते. असे करत एक एक निकष काढून टाकले कि ते मूल्यच कचर्‍यात जाते. शेवटी असे करत सगळ्या भावना देखिल कचर्‍यात काढता येतात. पण तेच यात कमी जास्त आहे म्हटले कि त्याला अर्थ प्राप्त होतो.
---------
मग क्रमच नाही हे म्हणणे टाळू.
-----------
क्रम आहे असे म्हटल्यावर, आणि माणसाला विवेकाने चयन करता येते म्हटल्यावर, तुम्ही कस्साही क्रम लावा. पण काहीतरी क्रम लावा.

गवि Tue, 23/09/2014 - 15:43

In reply to by अजो१२३

आपण जे मारतो त्याला भूतदयेच्या भांजणीत योग्य तो क्रम देऊन आपण अधिक भूतदयापूर्ण आहोत असा आभास स्वतःसाठी निर्माण करण्यात काही शाकाहारी लोक यशस्वी होतात असे म्हणता येईल यावर.

मांसाहारी लोक (कदाचित काही गिल्ट असल्यानी की काय कोण जाणे, पण) स्वतःला अधिक भूतदयापूर्ण म्हणताना दिसत नाहीत इतकेच.

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 15:48

In reply to by गवि

आपण जे मारतो त्याला भूतदयेच्या भांजणीत योग्य तो क्रम देऊन आपण अधिक भूतदयापूर्ण आहोत असा आभास स्वतःसाठी निर्माण करण्यात काही शाकाहारी लोक यशस्वी होतात असे म्हणता येईल यावर.

धन्यवाद. धाग्यात तेव्हढीच आर्गूमेंट आहे.

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 15:52

In reply to by अजो१२३

प्रतिसादात जे "क्रमाला" मी अवास्तव महत्त्व दिलं आहे तेच मुळी भावना, मूल्ये रियल आहेत कि आभासी आहेत यावर समोरच्याचं काय मत पडतं हे दाखवण्यासाठी दिलं आहे.

अनुप ढेरे Tue, 23/09/2014 - 15:53

In reply to by अजो१२३

ते लिहा म एक्स्प्लिसिट. नाहीतर क्रमवारी लावण्यात काही हशील नाही असचं म्हणतील लोक. क्यानिबलिझमचा मुद्दा टाकाच.

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 15:52

In reply to by अजो१२३

पण काहीतरी क्रम लावून तुमचा प्रतिसाद द्या.

हा निरर्थक अट्टाहास कशासाठी? सगळ्यांनी तुमच्याप्रमाणेच विचार करावा हा आग्रह का म्हणून?

गवि Tue, 23/09/2014 - 16:01

In reply to by बॅटमॅन

बेस्ट टू वर्स्ट क्रम स्वमताने खाली देतो:

१. त्रासदायक, हानीकारक उंदरांचा पालींचा जीव घेणे / प्राणघातक ठरू शकणार्‍या सापाला मारणे (आधी सलामत अली, मग नजाकत अली)
२. सवयीनुसार शुद्ध शाकाहारी किंवा मांसाहारी असणे
३. मांसासाठी प्राणी विकणे (आवश्यक सेवा)
४. मांसाहार्‍यांनी हत्या करून किंवा मांसाहार्‍यांनी इतरांकडून हत्या करून घेऊन मांस खाणे (स्वतः कुकर लावणे किंवा अस्सल घरगुती खानावळीत जेवणे, फणस स्वतः सोलणे अथवा कामवालीकडून सोलून घेणे इ इ)
५. गायीचे दूध पिणे
६. बैलाचे वृषण ठेचणे
७. अगदी वनस्पती देखिल न खाता मरूनच जाणे (मानसिक उपचाराची गरज.. कारण मुळात आपले असणे हीच एक उचापत आहे हे मान्य करुन गप जगणे येत नसल्याने)
..
..
१००. शुद्ध शाकाहारी असणे आणि त्याला कमी दांभिक समजून मांसाहारींना जास्त दांभिक मानून समाधान करुन घेणे.

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 16:06

In reply to by गवि

साहेब, आपणांस वेदनेची बायोलॉजी (प्राणी आणि वनस्पती) वाचणे गरजेचे आहे.
------
You are fair in your choices. But you could keeping scientific facts aside.

गवि Tue, 23/09/2014 - 16:17

In reply to by अजो१२३

फक्त वेदना?

अस्तित्वाचं काय?

वेदना होत नसतील वनस्पतींना असं गृहीत धरु. पण तरीही त्यांना वाढायचं असतं आणि मोठं होऊन जगायचं असतं हे तरी मान्य आहे की नाही? आपण काहीतरी तोडलं कापलं खाल्लं नसतं तर जे पेशीला पेशी जोडत मोठं झालं असतं आणि आपल्यासारखीच अनेक जीवांची निर्मिती केली असती अशा एका वनस्पतीचं हे नैसर्गिक जीवन संपवणे, आणि तेही ती अत्यंत निरुपद्रवी असताना, इनफॅक्ट उपकारक असताना.. हे प्राणी मारण्यापेक्षा जास्त भूतदयापूर्ण आहे कारण फक्त वेदनेची बायॉलॉजी किंवा अ‍ॅनोटॉमी.. असं मानायचं?

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 19:07

In reply to by गवि

अहो मरताना अस्तित्वही जातं आणि वेदनाही होते. काय आर्ग्यूमेट करून राहिले?
--------
तुम्ही तुमचा क्रम प्रामाणिकपणे दिसला असला तर (I have no reason to think otherwise) वनस्पतीची वेदना आपणांस प्राण्यांपेक्षा जास्त जाणवते वा किंचितही कमी जाणवत नाही असे वाटते.
मंजे:
१. झाडाची फांदी तुटली कि गविंच्या काळजात चर्र होत असणार. कोणाचा हात कापून रस्त्यावर पडला तर चालायचंच म्हणून तुम्ही पुढे जाणार.
२. कोणी लॉन मो करत असले कि गवि साईडला ढसाढसा विषाद करत असणार. हिटलरला त्या मो करणाराची उपमा देणार.
३. लाकडाच्या डायनिंग टेबलावर जेवताना (शाकाहार्‍याला जसं ओल्या कातडीवर जेवताना वाटेल) तसं तुम्हाला वाटत असणार.
४. धान्याच्या कोठारात गेलं कि तुम्हाला रक्तामांसाने भरलेल्या अ‍ॅबेटोयर पेक्षा जास्त कुबट वाटर असणार.
५. लोक वृक्ष तोडतात किंवा काटतात तेव्हा आपण "सामूहिक हत्या पाहतोय" अशा मानसिकतेत असता.
६.....
कारण शाकाहारी लोक रक्त पाहून ओवररिअ‍ॅक्ट करतात. कारण प्राणी आणि वनस्पती हे सारखेच्. सर्वार्थाने.
---------
हे प्रश्न गंभीरपणे सामान्यजनास अ‍ॅडमिनिस्टर करून फीडबॅक घ्याल?
--------

वेदना होत नसतील वनस्पतींना असं गृहीत धरु. पण तरीही त्यांना वाढायचं असतं आणि मोठं होऊन जगायचं असतं हे तरी मान्य आहे की नाही?

वेदना होतात. पण प्रश्न तो नाही. निसर्गाचं संतुलन आहे. माणसे सोडून कुठेच काय खायचं हा चॉइस नाही. प्रश्न नाही. इतर सजीव नियमांना बाध्य आहेत. त्यांना वाढायचं असतं हो, पण त्याला एक मर्यादा आहे. झाडाची सगळीच फळे (कोणी नाही खाल्ली तरी) नवे झाड बनू शकत नाहीत. प्राण्यांनी खात राहून (त्यातही बरेचदा बी खाणे अभिप्रेत नसते) ते वाढतात. कधीकधी प्राणी खातात हेच त्यांना उपकारक ठरते. मंजे प्राणी त्यांना इतर प्रदेशात नेतात. मनुष्य बी साठवतात. हे सगळं मांसाहारी देखिल करतात.

पण गवि, वाढायचं त्याला वाढू दिलं नाही, मोठं व्हायचं त्याला मोठं होऊ दिलं नाही हा सगळ्याच सजीवांच्या बाबतीत समान अन्याय होत नाही. त्यातही एक स्पेक्ट्र्म निघतो. नशीब तुम्ही जज नाहीत (माझं एक आपलं गृहितक) नैतर हस्तमैथून करणारांना हेच लॉजिक लावून रेरेस्ट ऑफ रेर मिलियन होमिसाईडसच्या केसमधे फाशी दिले असते. अहो माणसामाणसात देखिल बायको जगवा, बाळ असू देत हा प्रस्थापित संकेत आहे. तुम्हा लोकांना प्राणी नि वनस्पतींमधला फरक दिसत नाही हे नवल आहे.
-------
हलकेच घेणे.

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 19:17

In reply to by अजो१२३

वनस्पती आणि प्राणी यांत अद्वैत नाहीच. पण म्हणून त्यांच्या वेदनेची इ. क्रमवारी लावण्याचे बंधन का म्हणून असावे? प्रत्येक गोष्ट क्राउडसोर्सिंगवर आधारित मताप्रमाणे लेबल करायची तर त्याच्याइतकी निरर्थक गोष्ट नाही.

वनस्पतींनाही त्रास होतो इ. म्हटले की त्या विधानाचा प्रमाणाबाहेर विस्तार करून त्यातली हास्यास्पदता दाखवण्याने तुमचा मूळ मुद्दा आजिबात सिद्ध होत नाही. शेवटी 'असमान' गोष्टींमध्ये अधिक 'वाईट/क्रूर' काय आहे याचा निकष सब्जेक्टिव्ह आहे हेच जर मान्य होत नसेल तर मग चर्चाच व्यर्थ आहे.

एकूण अर्ग्युमेंटची मांडणीच अशी सब्जेक्टिव्हिटीला ऑब्जेक्टिव्हिटीचा मुलामा लावून केल्यामुळे त्यात काही अर्थच नाही. 'अमुक एक गोष्ट चूक आहे- कशावरून? तर चार लोकांना विचारा आणि पहा.' काय फालतूपणा आहे? प्रत्येक गोष्टीत जनमानसाची साक्ष काढल्याने काय होतं? सत्य तर आजिबात कळत नाही.

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 19:28

In reply to by बॅटमॅन

गर्भ एका विषिष्ट वयापूर्वी काढला तर ते तितके वाइट मानत नाहीत. नंतर काढला तर मानतात. या दोघांत फरकच नाही कसे म्हणता येईल?
फरक असतो. क्रम असतो. प्रामाणिक असाल तर मान्य कराल. चोचलेही करायचे आणि शाकाहार्‍यांनाच अपराध्याच्या कडघरात ठेवायचं हा निव्वळ दुट्टप्पीपणा आहे.
---
जाताजाता झाडाचं पान तोडा. काहीच वाटणार नाही. हा काही संस्कृतीचा संस्कार नाही. नैसर्गिक आहे. तेच कुत्री मारत जा. चिकार अस्वस्थ व्हाल. फरक नाही. फरक नाही. खाणे योग्य, अयोग्य, शास्त्रीय, अशास्त्रीय, परवडणारे, न परवडणारे, इ इ बद्दल मी बोलत नाहीय, त्या सगळ्या बाबतीत ते खरे असतील, पण पर्याय असताना, आणि भारतीय पार्श्वभूमी असताना, मांसाहार करणे हे कमी भूतदया असल्याचे लक्षण आहे. फार कमी नसेल, पण किंचित तरी असेल. स्पेसिस स्पेसिफिक असेल, पण त्या मर्यादेत तरी कमी असेलच असेल. मंजे चिकन खाणारा माणूस 'माणसांसाठी' शाकाहार्‍यांपेक्षा चांगला असू शकतो, पण एकूणात भूतदया म्हटले कि तो मार खातो. मग ते वेज लोक किती का वनस्पती खाईनात.

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 20:22

In reply to by अजो१२३

गर्भ एका विषिष्ट वयापूर्वी काढला तर ते तितके वाइट मानत नाहीत. नंतर काढला तर मानतात. या दोघांत फरकच नाही कसे म्हणता येईल?
फरक असतो. क्रम असतो. प्रामाणिक असाल तर मान्य कराल. चोचलेही करायचे आणि शाकाहार्‍यांनाच अपराध्याच्या कडघरात ठेवायचं हा निव्वळ दुट्टप्पीपणा आहे.

फरक आहे इथवर मान्य आहे. बाकी या केसमध्ये क्रमवारी लावणे हास्यास्पद आहे. अन तुमचे म्हणणे मानले तर प्रामाणिक, अन्यथा अप्रामाणिक हा दुटप्पीपणाही तितकाच रोचक आहे. नॉनव्हेज म्हणजे चोचले असतील तर शाकाहारही चोचलेच आहेत. तुमच्या बिनबुडाच्या दुटप्पीपणाला केवळ दुसरा दुटप्पीपणा हेच खरे उत्तर आहे. कारण तुम्हांला मुळातून फक्त नॉनव्हेजवाल्यांना अपराधी ठरवायचं आहे. हेच मी नास्तिक, गे-लेस्बियन, इ. धाग्यांच्या वेळेसही पाहिले आहे.

पण पर्याय असताना, आणि भारतीय पार्श्वभूमी असताना, मांसाहार करणे हे कमी भूतदया असल्याचे लक्षण आहे. फार कमी नसेल, पण किंचित तरी असेल. स्पेसिस स्पेसिफिक असेल, पण त्या मर्यादेत तरी कमी असेलच असेल. मंजे चिकन खाणारा माणूस 'माणसांसाठी' शाकाहार्‍यांपेक्षा चांगला असू शकतो, पण एकूणात भूतदया म्हटले कि तो मार खातो. मग ते वेज लोक किती का वनस्पती खाईनात.

तथाकथित भारतीय पार्श्वभूमी म्हणजे जे सांगताहात ते फक्त ३.५% वाले भट अन काही वैश्य जमाती यांना लागू आहे. उरलेला ७०% भारत नॉनव्हेज आहे. या मायनॉरिटीची टिकोजीरावी अरेरावी बाकीच्या ७०% नी का मान्य करावी? म्हणे भारतीय पार्श्वभूमी. माय फुट! ३०% लोकांसाठीची व्याख्या उरलेले ७०% का मान्य करतील?

भूतकाळाचे ज्ञान करून घ्यायची इच्छा नाही, वर्तमानकाळाबद्दलही अशीच झापडबंद भूमिका आहे. संवाद कसला होणार घंट्याचा?
शिवाय भारतीय पार्श्वभूमी म्हणजे काय याची व्याख्याही गंडलेली आहे. बहुजन समाज नॉनव्हेज खातोच. मग उरलं काय त्या अर्ग्युमेंटात? निव्वळ हजारो वेळेस चावला गेलेला चोथा.

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 20:40

In reply to by बॅटमॅन

अन तुमचे म्हणणे मानले तर प्रामाणिक, अन्यथा अप्रामाणिक हा दुटप्पीपणाही तितकाच रोचक आहे.

हा नियम फक्त बॅटमअ‍ॅन या आयडीसाठी आहे. बाकींना नाही.

उरलेला मोर दॅन ८०% भारत नॉनव्हेज आहे. या मायनॉरिटीची टिकोजीरावी अरेरावी बाकीच्या ८०% नी का मान्य करावी? म्हणे भारतीय पार्श्वभूमी. माय फुट! २०% लोकांसाठीची व्याख्या उरलेले ८०% का मान्य करतील?

भारत वेज देश आहे. इथे मुसलमान, ख्रिश्चन आठवड्यात १४ पैकी १२ जेवणे शाकाहारी घेतात. अगदी रग्गड पैसा आला तरी प्रत्येकच जेवण मांसाहारी घेत नाहीत. पावित्र्याचा संबंध येतो तेव्हा बव्हंशी नॉनवेज टाळतात इथले लोक. दिल्लीत मंगळवारी हिंदू नॉन वेज खात नाहीत. कारण ? तो पवित्र दिवस आहे!!! मंजे पावित्र्याचं आणि मटणाचं कैतरी वाकडं आहे ही भावना आहे. आन त्या ३.५% पैकी बरेच कामाख्यासारख्या जागी किती बळी यात सहभागी असतात. भारतात जात कोणतीही असो, प्राणी खाणे हे शाखा खाण्यापेक्षा अपवित्र मानतात. अन हे मानायचे नसले तर आपल्या अंध जगात सुखाने रहा.
इथे काय काय विधाने ऐकू येतात -
१. आम्ही खातो, पण माय बाप नाही. ते अजून संस्कृती पाळतात.
२. खातो, पण घरी शिजवत नाही.
३. सगळे खातात, पण आई नाही.
४. ते गेले, तेव्हापासून सोडलं.
५. देवाधर्माला लागले (वागणं चांगलं झालं आहे), तुळशीच्या माळा घातल्या, तेव्हापासून सोडलं.
७. सुधरला, खात नाही आता.
८. मी अंडेच खातो, चिकन नाही. चिकनच खातो, मटन नाही.
९. नव्या जगात राहायचं म्हणून मूलांना खाऊ देत आहे.
१०. मूल झालं, मग सोडलं.
११. आम्ही काय दरच वेळी तसं खात नाही.
१२. आम्ही या या जातीचे, म्हणून खात नाही.
१३. भूतदया, म्हणून खात नाही.

------------------
भट लोक आता आता कधे मधे खायला लागले म्हणून मांसाहाराबद्दल गंड अस्थानी ठरत आहे हा लै मोठा शोध आहे. मांसाला स्पर्शच न केलेले लोक भारतात अगोदरपासूनच फारच कमी आहेत. पण म्हणून ते स्वतःला शाकाहार्‍यांइतके (ऐसीवर जसे टिच्चून आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलेच, वाईट तर नाहीच नाही हा कांगावा चालू आहे तसे) भूतदयावादी समजत नाहीत. बामन पवित्र. का? खात नाही म्हणून. अशी धारणा राहिली आहे. आजही काही अंशी आहे. मांस न खाणे भारतात अधिक श्रेअयस्कर मानले जात नाही असा समज बाळगणे लैच करंटेपणाचे आहे. पण तुला तो शोभतो.

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 20:55

In reply to by अजो१२३

पुन्हा एकदा सरसकटीकरण आणि बिनबुडाच्या विधानांनी भरलेला प्रतिसाद. असो.

तर- नॉनव्हेज आहे म्हणजे कधी ना कधी तरी नॉनव्हेज खातो असा अर्थ. रोजचे प्रत्येकच जेवण नॉनव्हेज असा नाही.

तुम्ही ज्या १३ केसेस दिल्यात त्यात फक्त आणि फक्त लोकांचा पूर्वग्रह आहे. लोकांचा पूर्वग्रह ही वस्तुनिष्ठ सत्यासाठीची कंडिशन कधीपासून होऊ लागली? या हिशेबाने न्यूटनलाही तुम्ही लोक असे म्हणतात, तू रहा तुझ्या अंध जगात असे म्हणून गप्पच बसवले असते.

शिवाय लोक नॉनव्हेज म्हणजे वाईट असे मानत असूनही का जातात मग (शेण इ.) खायला? ते विचारा की.

निव्वळ लोक असे म्हणतात म्हणून भूतदया जास्ती हे पर्सेप्शन आहे, रिअ‍ॅलिटी नाही. एखादी मान्यता लोक सांगतात तेव्हा ती आहे तश्शी तुम्ही मानता या अंधविश्वासाचे हसू येते. यातून बाहेर पडणे गरजेचे आहे.

चर्चा पर्सेप्शन बद्दल नसून वस्तुनिष्ठ निकषांवर चालली आहे असा माझा समज होता. पण निव्वळ हे (फडतूस, बिनडोक इ.) लोक अमुक अमुक मानतात म्हणून तमुक गोष्ट अशीच आहे वगैरे मुक्ताफळे वाचली की हसूही येत नाही आजकाल.

चर्चा फक्त 'भारतातले मांसाहाराचे (डोके न वापरता इ.) कॉमन पर्सेप्शन' याबद्दल असती तर तुमच्या सर्व मुद्यांना हो म्हटले असते. पण पर्सेप्शन आणि रिअ‍ॅलिटी हे या केसमध्ये कोसो दूर आहेत अन वर्स्ट पार्ट म्हणजे तुम्हांला हे दिसत नाही, कारण अगोदरच अजंडा ठरवल्या गेला आहे. त्यामुळे असल्या बिनबुडाच्या दाव्याला मी किंवा अजून कोणी रॅशनल माणूस कधीच हिंगलणार नाही.

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 21:17

In reply to by बॅटमॅन

बिनडोकपणाची हद्द झाली.
--------------
भारतीय जनमानसात नॉनवेजची काय प्रतिमा आहे याला तू जे टक्के दिले (भट, वैश्य्)त्याच्या विरोधात मी लिहिले होते.
-------------
आता मंतो लोक मंडले मनून काय झालं? न्यूटनचं काय झालं असतं?
-------------------
भारतीय जनमानसात नॉनवेज कमी पवित्र आणि वेज जास्त यासाठी भट आणि वैश्य लागत नाहीत इतकेच सांगायचे होते. ते कसेही वागले तरी भारतात इतर सर्व लोकांत नॉनवेज अमंगलच मानतात (८०% नी भटांचे का ऐकावे म्हणालास म्हणून मी सगळेच भारतीय काय काय बोलत असतात ते सांगीतले.)
-------------
प्रामाणिकपणा नाही, ट्रोलपणा, येड पांघरून पेडगावला जायचे, अख्खा प्रतिसाद नक्की काय संदेश देऊ इच्चितो ते न पाहता चवताळून काहीही प्रतिक्रिया द्यायची असे चालू ठेवलेस तर म्हणत काय आहे हेच शेवटपर्यंत कळणार नाही. ते मान्य अमान्य असायचा प्रश्न लै पुढचा.

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 23:14

In reply to by अजो१२३

हा हा हा. हा तर अतिशयच महाविनोदी प्रतिसाद आहे. तरी उत्तर देतो.

या धाग्यावर तुम्ही सलील यांना विचारले होते की व्हेजिटेर्यन असण्यात काही मेरिट नाही असे मत असेल तर तुम्ही व्हेज का झालात? व्हॉट इज राँग विथ यू?

त्याच प्रकारे मीही विचारतो, की नॉनव्हेज खाण्यात काही अमंगल आहे असे भारतीय जन्तेला वाटत असेल तर मुळात खावेच कशाला? डोके सडले आहे काय? त्या हिशेबाने तसा गिल्ट असणारी अख्खी भारतीय जन्ता महामूर्ख अन बिनडोक आहे.

शिवाय, मुद्यांचा प्रतिवाद करता नाही आला की चर्चा ऑब्जेक्टिव्ह भूतदयेवरून भारतीय जनतेच्या पर्सेप्शनकडे ढकलायची ही युक्ती लोकांना फसवायला चांगली आहे, पण इथे तिचा परिणाम होणार नाही. तुम्हांला काय बोलायचे आहे ते मी पुरतेपणी ओळखून आहे.

आयत्यावेळी मुद्दे बदलणे, अंदाधुंद तर्क मांडून समोरच्यांनी मात्र त्यातून नीट निष्कर्ष काढावा अशी अपेक्षा व्यक्त करणे, आणि शेवटी पूर्ण चर्चेचा फोकसच बदलून टाकणे- हा प्रकार आता अंगवळणी पडलेला आहे. त्यामुळे इथे कसल्याही प्रकारचा कांगावा टिकणार नाही. स्वतःपुरता गैरसमज बाळगायला व जोपासायला अर्थातच तुम्ही स्वतंत्र आहात. :)

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 20:40

In reply to by बॅटमॅन

अन तुमचे म्हणणे मानले तर प्रामाणिक, अन्यथा अप्रामाणिक हा दुटप्पीपणाही तितकाच रोचक आहे.

हा नियम फक्त बॅटमअ‍ॅन या आयडीसाठी आहे. बाकींना नाही.

उरलेला मोर दॅन ८०% भारत नॉनव्हेज आहे. या मायनॉरिटीची टिकोजीरावी अरेरावी बाकीच्या ८०% नी का मान्य करावी? म्हणे भारतीय पार्श्वभूमी. माय फुट! २०% लोकांसाठीची व्याख्या उरलेले ८०% का मान्य करतील?

भारत वेज देश आहे. इथे मुसलमान, ख्रिश्चन आठवड्यात १४ पैकी १२ जेवणे शाकाहारी घेतात. अगदी रग्गड पैसा आला तरी प्रत्येकच जेवण मांसाहारी घेत नाहीत. पावित्र्याचा संबंध येतो तेव्हा बव्हंशी नॉनवेज टाळतात इथले लोक. दिल्लीत मंगळवारी हिंदू नॉन वेज खात नाहीत. कारण ? तो पवित्र दिवस आहे!!! मंजे पावित्र्याचं आणि मटणाचं कैतरी वाकडं आहे ही भावना आहे. आन त्या ३.५% पैकी बरेच कामाख्यासारख्या जागी किती बळी यात सहभागी असतात. भारतात जात कोणतीही असो, प्राणी खाणे हे शाखा खाण्यापेक्षा अपवित्र मानतात. अन हे मानायचे नसले तर आपल्या अंध जगात सुखाने रहा.
इथे काय काय विधाने ऐकू येतात -
१. आम्ही खातो, पण माय बाप नाही. ते अजून संस्कृती पाळतात.
२. खातो, पण घरी शिजवत नाही.
३. सगळे खातात, पण आई नाही.
४. ते गेले, तेव्हापासून सोडलं.
५. देवाधर्माला लागले (वागणं चांगलं झालं आहे), तुळशीच्या माळा घातल्या, तेव्हापासून सोडलं.
७. सुधरला, खात नाही आता.
८. मी अंडेच खातो, चिकन नाही. चिकनच खातो, मटन नाही.
९. नव्या जगात राहायचं म्हणून मूलांना खाऊ देत आहे.
१०. मूल झालं, मग सोडलं.
११. आम्ही काय दरच वेळी तसं खात नाही.
१२. आम्ही या या जातीचे, म्हणून खात नाही.
१३. भूतदया, म्हणून खात नाही.

------------------
भट लोक आता आता कधे मधे खायला लागले म्हणून मांसाहाराबद्दल गंड अस्थानी ठरत आहे हा लै मोठा शोध आहे. मांसाला स्पर्शच न केलेले लोक भारतात अगोदरपासूनच फारच कमी आहेत. पण म्हणून ते स्वतःला शाकाहार्‍यांइतके (ऐसीवर जसे टिच्चून आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलेच, वाईट तर नाहीच नाही हा कांगावा चालू आहे तसे) भूतदयावादी समजत नाहीत. बामन पवित्र. का? खात नाही म्हणून. अशी धारणा राहिली आहे. आजही काही अंशी आहे. मांस न खाणे भारतात अधिक श्रेअयस्कर मानले जात नाही असा समज बाळगणे लैच करंटेपणाचे आहे. पण तुला तो शोभतो.

'न'वी बाजू Wed, 24/09/2014 - 06:22

In reply to by गवि

१. त्रासदायक, हानीकारक उंदरांचा पालींचा जीव घेणे / प्राणघातक ठरू शकणार्‍या सापाला मारणे (आधी सलामत अली, मग नजाकत अली)

पालींची बदनामी थांबवा!!!!!!

गवि Wed, 24/09/2014 - 09:44

In reply to by 'न'वी बाजू

चुकी झाली बाजूराव.. मूळ वाक्य तसेच क्वोट करताना नुस्ते चोप्य पस्ते केले. पाली हा प्राणी खरोखर उपद्रवी या गटात बसत नाही. उलट जरा उपकारकच आहे.

याचे प्रायश्चित्त म्हणून मी माझी वार्षिक सुट्टी कोंकणात न जाता पालसंवर्धनाला वाहून घेण्यात अर्पण करीन असे वचन देतो.

बॅटमॅन Wed, 24/09/2014 - 16:05

In reply to by गवि

पालसंवर्धनास पालघर नामक ठिकाणी गेलात तर पाल भी बढे और कोंकण भी ना छूटे असा कोंकणपालयोग येईल असे (आघावपणे इ.इ.) सुचवतो.

सलील Tue, 23/09/2014 - 16:12

In reply to by अजो१२३

आपण बुवा क्रम देण्यास असमर्थ आहोत. कारण तसेही फार काही सध्या होणार नाहीये. म्हणजे बघा तुम्हाला एखाद्याला मदत करायची असेल तर ती तुम्ही कशीही करालच हो. आणि जेंव्हा संकटात असाल तेंव्हा तुमचे ऑपशंस बघून तुम्ही समोरच्याला मारायचे का सोडायचे ह्याचा विचार कराल.शिवाय परिस्थितीनुसार पण निर्णय घ्याल. आत्ता एक क्रम लावून त्यातले काही नंतर गाळावेसे वाटले तर काय करणार आहात. पण तुम्हीच विचार करून बघा सुनेला काय ते एकदाच मारावे हे चांगले का रोज थोडे थोडे करून २०-३० वर्ष मारावे. कुठल्या निकषांवर पहिले वाईट आणि दुसरे चांगले असे म्हणणार. फक्त जिवंत आहे म्हणून?

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 16:14

In reply to by सलील

कुठल्या निकषांवर पहिले वाईट आणि दुसरे चांगले असे म्हणणार. फक्त जिवंत आहे म्हणून?

अर्थात! रोज १० वेळा बलात्कार करून जिवंत ठेवले तरी ते ठार मारण्यापेक्षा कमी क्रूर असे त्यांचे म्हणणे आहे.

मन Tue, 23/09/2014 - 15:51

खूप झालं.
आज मांसाहाराला चांगलं म्हणताय.
उद्या दारुतही काही वाईट नाही म्हणाल.

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 15:55

In reply to by मन

दारूबद्दल आयुर्वेदाचा श्लोकः

किन्तु मद्यं स्वभावेन यथैवान्नं तथा स्मृतम् |
अयुक्तियुक्तं रोगाय, युक्तियुक्तं यथाऽमृतम् ||

"मद्य हे अन्नाप्रमाणेच आहे. डोके बाजूला ठेवून (बेवड्यागत) प्याल्यास ते रोगाला कारणीभूत होते, तर नीट मापात प्याल्यास, डोके वापरून जरा लिमिटमध्ये घेतल्यास जणू अमृताप्रमाणे काम करते."

बोल आता!

अवांतरः ग्रंथाचे एक पानही न पाहता त्याला मोडीत काढण्याच्या मूर्ख व तद्दन बिनडोक प्रकाराचा मी (या ठिकानी या माद्यमातूण इ.इ.) निषेध करतो.

मन Tue, 23/09/2014 - 16:02

In reply to by बॅटमॅन

आयुर्वेद किंवा एकूणच परंपरागत ज्ञानातले बाकीचे दाखले बरे सोयीने मोडीत काढता ?
"ब्रह्मचर्य हेच जीवन आणि **नाश हाच मृत्यू " हे विसरायला बरं आवडतं.

आयुर्वेदाची बदनामी थांबवा.
दुटप्पीपणा थाम्बवा

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 16:06

In reply to by मन

"ब्रह्मचर्य हेच जीवन आणि **नाश हाच मृत्यू " हे विसरायला बरं आवडतं.

** हा शब्द अश्लील आहे का? ते एक असोच.

पण या पुस्तकात आयुर्वेदातली कुठली उद्धरणं घेतली आहेत ते सांगा. मूळ अवतरणं देता येत नसतील तर हे प्रोव्होकेशन आम्ही स्वीकारणार नाही ज्जा!

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 16:02

In reply to by बॅटमॅन

हे ग्रंथ लै डेंजर असतात. भावड्यांनो, ग्रंथ कधीही वाचू नकात. कितीही पिली तरी ती "नीट मापाच्या" खालीच आहे असे वाटते. ग्रंथावर जाऊ नकात.

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 16:06

In reply to by अजो१२३

ग्रंथ वाचू नका म्हणणारे पूर्वग्रहदूषित ग्रंथद्वेष्टे लोकच जास्त डेंजर असतात. त्यांच्यापासून दूर रहावे.

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 16:09

चला ऋषिकेश मला पुन्हा ट्रोल म्हणण्यापूर्वी लॉग आउट करत आहे.
--------------
माझे मत काही का असेना, आपल्या सर्वांच्या व्यक्तिगत मताचा, मतस्वातंत्र्याचा आदर आहेच!

सविता Tue, 23/09/2014 - 16:14

बरं काय ठरलं मग?

मी संध्याकाळी खाटिकाच्या दुकानात जायचं का भाजीच्या(का उपाशी मरायचं) हा सर्वात ज्वलंत प्रश्न मला भेडसावतो आहे!

सलील Tue, 23/09/2014 - 16:20

In reply to by सविता

दोन्ही ठिकाणी जावून या आणि जे चावीने खाणार त्याला केप्र देणार असा काहीतरी करून बघा.

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 16:18

अजोंचे दावे निराधार, बायस्ड अन सरळ सरळ चूक आहेत.

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 18:23

In reply to by बॅटमॅन

होय रे बाबा, जगात सगळे तुझ्यासारखे समदृष्टीचे लोक नाहीत नशीब जगाचं. नाहीतर कशालाही चांगलं वाईट म्हणता यायचं नाही.

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 18:40

In reply to by अजो१२३

चांगलं वाईट अशी लेबलं लावून काय मोठं मिळवणार आहेत लोक देव जाणे. समाज जसे काय या लेबलिंगची वाटच पाहतो आहे.

अजो१२३ Tue, 23/09/2014 - 19:16

In reply to by बॅटमॅन

तेच ते. कशालाही चांगलं वाईट म्हणू नका. ( समाजाने असे काही म्हणणे तर शिव शिव.) काहीही नंगानाच करा. जमाना सुधरला म्हणा.

मन Tue, 23/09/2014 - 16:31

निरंकारी संत म्हण्वले जाणारे भिंद्रनवाले (ऑपरेशन ब्लू स्टार १९८४ मध्ये ह्यांचा मृत्यू झाला ) व्ह्जिटेरिअन होते.

अतिशहाणा Tue, 23/09/2014 - 16:34

बॅटमॅन यांची क्षमा मागूनः येथे अजोंचे (पुन्हा एकदा) द्विशतक झाले आहे असे या ठिकानी या माध्यमातून जाहीर करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होताय.

बॅटमॅन Tue, 23/09/2014 - 17:25

In reply to by अतिशहाणा

हबिणंदण करायचंच तर या ठिकानी आमचं करा. द्विशतकाला मोट्ठा हात्भार लाव्न्यात आम्चाच वाटा सिंव्हाचा हाये.

Nile Wed, 24/09/2014 - 02:43

In reply to by काळा मठ्ठ बैल …

बाकी शाकाहार मानवाला चांगला का मासांहार हे जाऊद्या पण या मानवाने इतर प्राणीसृष्टीची पार वाट लावून ठेवलीए. आजकालच्या गाई शहरातील कागद-कचरा सुद्धा खाऊ लागलेल्या आहेत. आता इथेच पहा ना, हे बैलोबा आले हा कचरा खायला! ;-)

मन Wed, 24/09/2014 - 09:31

मी इथल्यांपेक्षा अधिक शाकाहारी आहे असं दिसतय.
अजोंनी शाकाहार हाच कसा श्रेष्ठ आहे हे आता सिद्ध केलय.
आता लोकं ते खुल्या मनाने मान्य करतात की नाही ते पहायचे.
चर्चेने भारावून जाउन मी अधिकाधिक शाकाहारी रहायचे ठरवले आहे.

बॅटमॅन Wed, 24/09/2014 - 11:02

In reply to by मन

एक करेक्शन. सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय इतकेच. तो यशस्वी अजून झालेला नाही. अर्थात- प्रीचिंग टु कन्व्हर्टेड असेल तर त्यात कै अर्थ नाय.

'न'वी बाजू Wed, 24/09/2014 - 15:31

In reply to by मन

मी इथल्यांपेक्षा अधिक शाकाहारी आहे असं दिसतय.

इथे सर्वात जास्त शाकाहारी मी असण्याची शक्यता अज्जीच (साभार: बॅटमॅन) नाकारता येणार नाही. कारण, मी भाज्या तर खातोच; शिवाय, मी गायी, बकर्‍यासुद्धा खातो, आणि गायी, बकर्‍या गवत खातात, सबब, (ट्रान्झिटिविटीने) मी गवतसुद्धा खातो.

शिवाय, 'ऑल फ्लेश इज़ ग्रास' म्हटल्यावर, जो जितका मांसाहार जास्त करतो, तितका तो अधिक शाकाहारी, हे ओघानेच आले, नाही का?

------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी डुकरे फारशी खात नाही; सबब, डुकरे जे काही खातात, ते खाण्याचा आरोप मला तितकासा लागू होत नाही. परंतु, जितपत प्रमाणात डुकरे मी खातो, तितपत प्रमाणात ट्रान्झिटिविटी माझ्यापुरती मान्य करण्यास मला प्रत्यवाय नाही. इत्यलम्|

अनुप ढेरे Wed, 24/09/2014 - 15:55

In reply to by 'न'वी बाजू

डुकरे जे काही खातात,

मांसासाठी वाढवतात त्या डुकरांना, पिग फार्म्समध्येही तेच खायला घालतात का?

बॅटमॅन Wed, 24/09/2014 - 15:59

In reply to by अनुप ढेरे

शिवाय, सर्व जातीची डुकरेही ते खातात का? डुक्कर म्हणजे लोकांना उकिरडे फुंकणारा जीव इतकेच ठौक असते. पण ते अन सुळेवाले रानडुक्कर या दोन वेगळ्या जाती आहेत. रानडुकरे काय खातात?

'न'वी बाजू Sun, 28/09/2014 - 19:28

In reply to by अनुप ढेरे

मी (१) डुक्कर नसल्याकारणाने, (२) कधीही मांसासाठी वाढविला गेलेलो नसल्याकारणाने आणि (३) कधीही एखाद्या पिग फार्मवर वाढलेलो नसल्याकारणाने, मांसासाठी पिग फार्म्सवर वाढविल्या जाणार्‍या डुकरांस नेमके काय खाऊ घालतात, यासंबंधी कोणतीही स्वानुभूती अथवा चक्षुर्वै माहिती मजजवळ नाही. (शिवाय, डुकरांशी माझी केवळ तोंडओळखच असल्याकारणाने, कसून चौकशी करण्याचा मार्गही मस उपलब्ध नाही.) सबब, क्षमस्व.

बॅटमॅन Sun, 28/09/2014 - 22:14

In reply to by 'न'वी बाजू

डुकरांशी माझी केवळ तोंडओळखच असल्याकारणाने,

आँ? नक्की का?

(डुकराशी 'तोंड'ओळख करून घ्यावयास घाबरणारा) बॅटमॅन.

'न'वी बाजू Mon, 29/09/2014 - 08:02

In reply to by बॅटमॅन

कोणत्याही प्रेमप्रकरणाप्रमाणे, डुकराच्या तोंडओळखीतसुद्धा दोन प्रकार असतात - एकतरफी प्रकरण आणि फुल-'ब्लोन' प्रकरण. आमचे प्रकरण पहिल्या प्रकारचे आहे.

बोले तो, आम्हांस डुकरांची तोंडओळख आहे, परंतु डुकरांस आमची तोंडओळख नाही.

यावरून, आमच्यातली आणि डुकरांतली तोंडओळख ही आपणांस अपेक्षित प्रकारातली नाही, हे स्पष्ट व्हावे. (आपणांस बहुधा दुसरा अर्थात फुल-'ब्लोन' प्रकार अभिप्रेत असावा, असे वाटते; चूभूद्याघ्या.) पाहा विचार करून.

ऋषिकेश Wed, 24/09/2014 - 09:51

शेवटचा प्रतिसाद (Score: 2 रोचक)
अरुणजोशी
पुण्य: 1
Tue, 23/09/2014 - 15:33 |

ही वेळ भविष्यातील आहे काय?
या धाग्यावरील वचनाला या धाग्यापुरते जागा!

अजो१२३ Wed, 24/09/2014 - 11:20

In reply to by ऋषिकेश

का हो? भाषेचे दौर्बल्य आहे ते. तुम्हाला वाटलं "धाग्यावरचा अरुणजोशी याचा कोणत्याही हालतीत शेवटचा" , मला म्हणायचे होते "आतापर्यंत मांडलेल्या सार्‍या मुद्द्यांच्या प्रतिवादासाठी शेवटचा", कोणी म्हणेल, " अजोंचा ऐसीवरचा शेवटचा, आजचा, या महिन्याच्या शेवटचा", कोणी " अजोंच्या जीवनातील कोणत्याही फोरमवरील शेवटचा."
----------------
आणि शेवटचा म्हणून आणखी काही प्रतिसाद टाकले तर त्यात एवढं काय? निघतो म्हणत मित्र अजून एक तास गप्पा मारतो. तुम्हाला ऐकायच्या नसतील तर बेडरूममधे जा ना.
----------------
अजो काहीही म्हणो, त्याला धरून चेपायचा, असा फॉर्म्यूला झालेला दिसतो ऐसीवरचा.
--------------------
-------------------
------------------
या धाग्यावरचे माझे बरेच सारे प्रतिसाद पांचट, विनोदी, हलक्याने घ्यायचे, इ इ आहेत. इतर बरेच प्रतिसाद सरकास्टिक आहेत (खवचट नव्हेत). पण भूतदयावाद आणि शाकाहार आणि मांसाहार आणि भारत इ इ जे मी विचार मांडले आहेत त्याचा गाभा गंभीर अभिप्रेत आहे. शिवाय मी तो मुद्दा अत्यंत प्रामाणिकपणे मांडत आहे. कृपया आशयाच्या गांभीर्यावर व प्रामाणिकपणावर शंका घेऊ नये.

ऋषिकेश Wed, 24/09/2014 - 11:34

In reply to by अजो१२३

खिक्, मला कंटाळा आलाय त्याच त्या मुद्द्यांचा/गुद्द्यांचा म्हणून तुच लिहिलेल्याची आठवण करून दिल्यावर थांबशील अश्या आशेने ते लिहिले होते

तुम्हाला ऐकायच्या नसतील तर बेडरूममधे जा ना.

हे शेवटी आलंच रे! असो. हा मी चाललो (कुठे ते सांगणार नै)
चालु आहेच, तरी चालु देशीलच!!

अजो१२३ Wed, 24/09/2014 - 12:07

In reply to by ऋषिकेश

आय हॅव नो व्हॅल्यू फॉर यूवर कंटाळा. तू जिथे लांब गप्पा मारतोस तिथे मी कधीही येऊन पिंक टाकत नाही कि तेच तेच (अजून चार विशेषणे) चाललंय म्हणत. सबब विषयावर तुझे परिपक्व चिंतन मनन झाले असेल. आम्हाला अजूनही विषय रोचक वाटतो. उगाच मधे येऊन चालू द्या म्हणत रसभंग का करता?
------------------
तुम्ही सगळे एक भूमिका घेत आहात. मी एकटा एक भूमिका घेत आहे. मीच थांबावे अशी आशा का? हा केवळ एक संवाद आहे. जालीय मित्रांसोबतचा. आय हॅव नॉट एक्झॉस्टेड माय वेपन्स.
--------------------
तुम्ही सगळे काय निर्बुद्ध, रसहीन चर्चा करताय हा काय वाह्यात पावित्रा आहे? तुम्हाला किती, कसा, काय, इफ अ‍ॅट ऑल सहभाग घ्यायचाय याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. लोक चर्चा करत असताना मधेच येऊन "वायजर दॅन दाऊ", "प्रबुद्ध दॅन दाऊ" असा चिंतातुरी पावित्रा कशाला?

मन Wed, 24/09/2014 - 12:13

In reply to by अजो१२३

ऋषीकेशीय प्रवृत्ती, गवीय मनोवृत्ती, घाकडवीय लॉजिक, चिंतातुरी पवित्रा ह्या शब्दांसाठी अजोंना भाषिक्/भाषीय ऑस्कर दिलं जावं.
:D

बॅटमॅन Wed, 24/09/2014 - 13:49

In reply to by अजो१२३

तुम्ही सगळे एक भूमिका घेत आहात. मी एकटा एक भूमिका घेत आहे. मीच थांबावे अशी आशा का? हा केवळ एक संवाद आहे. जालीय मित्रांसोबतचा. आय हॅव नॉट एक्झॉस्टेड माय वेपन्स.
--------------------
तुम्ही सगळे काय निर्बुद्ध, रसहीन चर्चा करताय हा काय वाह्यात पावित्रा आहे? तुम्हाला किती, कसा, काय, इफ अ‍ॅट ऑल सहभाग घ्यायचाय याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. लोक चर्चा करत असताना मधेच येऊन "वायजर दॅन दाऊ", "प्रबुद्ध दॅन दाऊ" असा चिंतातुरी पावित्रा कशाला?

सगळ्यांविरुद्धची भूमिका घेणे या एकमेव क्रिडेन्शिअलमुळे आपली भूमिका लै भारी आहे असे वाटणे रोचक आहे.

शिवाय, 'होलियर दॅन दाउ' या अरुणजोशीय पवित्र्यापुढे 'वायजर/प्रबुद्ध दॅन दाउ' हाच योग्य प्रतिपवित्रा आहे. तुमचे बिनबुडाचे टुमणे इतरांना निर्बुद्ध अन रसहीन वाटले अन तसे बोलून दाखवले तर तुम्हांला त्रास का होतो ते कळले नाही. लोकांना एखादी चर्चा रसहीन वाटते तर त्यांनी तसे बोलूही नये काय? तुम्ही नाही का वाट्टेल ते ताशेरे ओढत असता गे आणि नास्तिकांवर?

अजो१२३ Wed, 24/09/2014 - 15:07

In reply to by बॅटमॅन

सगळ्यांविरुद्धची भूमिका घेणे या एकमेव क्रिडेन्शिअलमुळे आपली भूमिका लै भारी आहे असे वाटणे रोचक आहे.

कमाल आहे. तुझ्यातल्या पुरोगाम्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? अरे एकट्याची भूमिका आहे म्हणूनच ती भारी आहे असं कशातून सुचित होत आहे? एकटा वि सगळे आहे म्हणून माझे तोंड बंद करू नकात असं मी म्हणतोय. Let me argue till I am tired ( or you are tired) or there is some consensus. त्याला बोर झालं म्हणून इथे येऊन पकाऊ गप्पा मारताय म्हणणं, एका सीमेपलिकडे, अनुचित आहे.
------------------
अवांतरः
ऐसीवरचे जे कोणी माझे प्रतिवादी आहेत, ते मांसाहारी असोत नसोत, माझ्यामते कमी भूतदयावादी असोत, पण स्वतःचे नजरेत ते स्वतःस कमी भूतदयावादी मानण्यास अजिबात तयार नाहीत, ही अतिशय आनंदाची बाब मानतो.

बॅटमॅन Wed, 24/09/2014 - 15:18

In reply to by अजो१२३

एकटा वि सगळे आहे म्हणून माझे तोंड बंद करू नकात असं मी म्हणतोय. Let me argue till I am tired ( or you are tired) or there is some consensus. त्याला बोर झालं म्हणून इथे येऊन पकाऊ गप्पा मारताय म्हणणं, एका सीमेपलिकडे, अनुचित आहे.

तुमचं तोंड बंद करण्याची जुर्रत इथे कोण करू शकतो? अन मुख्य म्हणजे, काही बोललं तरी जोपर्यंत संपादकीय अधिकार वापरून धागा वाचनमात्र केला जात नाही तोपर्यंत हा आरोप निराधार आहे. ही चर्चा थांबवा असे सुचवणे अन संपादकीय अधिकारात मुसक्या बांधणे यांत लै फरक आहे. त्यामुळे एक सूचना फक्त केली तर 'तोंड बंद करू नका' इ.इ. आरोप इर्रिलेवंट आहेत.

शिवाय, मेन म्ह. एखाद्याला जर ही चर्चा पकाऊ वाटली अर तसे त्याने बोलून दाखवण्यात चूक काय आहे? ही सीमा जी आहे ती नक्की कोण ठरवतं आणि कशाच्या आधारे?

ऐसीवरचे जे कोणी माझे प्रतिवादी आहेत, ते मांसाहारी असोत नसोत, माझ्यामते कमी भूतदयावादी असोत, पण स्वतःचे नजरेत ते स्वतःस कमी भूतदयावादी मानण्यास अजिबात तयार नाहीत, ही अतिशय आनंदाची बाब मानतो.

असेच म्हणतो ;)

अजो१२३ Wed, 24/09/2014 - 15:58

In reply to by बॅटमॅन

अन मुख्य म्हणजे, काही बोललं तरी जोपर्यंत संपादकीय अधिकार वापरून धागा वाचनमात्र केला जात नाही तोपर्यंत हा आरोप निराधार आहे.

असा आरोप कोणी केला? ऋषीकेश एक सदस्य म्हणून आपले "बोर झाल्याचे" मत मांडत होता. त्यातला अविर्भाव चूक आहे असे मला वाटले. तसे मी लिहिले.

बॅटमॅन Wed, 24/09/2014 - 16:03

In reply to by अजो१२३

अच्चा, असं झालं होय. मला वाटलं की 'माझे तोंड बंद करू नका' हा अगदी टाहो वगैरे असेल म्हणून क्लॅरिफाय केलं इतकंच.

अजो१२३ Wed, 24/09/2014 - 16:03

In reply to by बॅटमॅन

शिवाय, मेन म्ह. एखाद्याला जर ही चर्चा पकाऊ वाटली अर तसे त्याने बोलून दाखवण्यात चूक काय आहे? ही सीमा जी आहे ती नक्की कोण ठरवतं आणि कशाच्या आधारे?

धन्य.
ऋषिकेश - बॅटोबा पकवत आहेत.
अजो - नाहीत.
बॅटोबा - ऋषिकेश बरोबर बोलतोय.
धन्य धन्य

बॅटमॅन Wed, 24/09/2014 - 16:06

In reply to by अजो१२३

ऋषिकेश - बॅटोबा पकवत आहेत.
अजो - नाहीत.
बॅटोबा - ऋषिकेश बरोबर बोलतोय.
धन्य धन्य

यात थोडी दुरुस्ती खालीलप्रमाणे:

ऋषिकेश - अजो पकवत आहेत.
अजो- मी नाही.
बॅटोबा - ऋषिकेश बरोबर बोलतोय.

ही योग्य व्हर्जन आहे.

घनु Wed, 24/09/2014 - 17:20

In reply to by अजो१२३

"गोड" ही श्रेणी असती तर नक्कीच दिली असती ह्या प्रतिसादासाठी :) हा माझा खवचट प्रतिसाद अजिबात नाहीये, मनापासून म्हणतोय बरं!

गवि Wed, 24/09/2014 - 15:26

अजो आणि बॅटमॅन.. तुम्हा दोघांना अथकतेसाठी ड्युरासेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

;)

इट गोज ऑन अँड ऑन अँड ऑन..

अजो१२३ Wed, 24/09/2014 - 16:01

In reply to by गवि

एक गवीय भूतदया म्हणून प्रतिसाद माझ्याकडून शेष आहे. प्राणी आणि वनस्पती यांचे सजीत्वाची, संवेदनांची जी अभिनव समदृष्टी आपणांस प्राप्त झाली आहे, तिचेबद्दल.
--------
हा प्रतिसाद बघून तुम्हाला पण आल्सो रन द्यायला पायजेल.

मन Wed, 24/09/2014 - 17:21

http://aisiakshare.com/node/3264?page=1#comment-75522
.
.
.
ह्यास घनु "चिडलात की काय?" असे विचारित आहेत.
अजो असे चिडले असल्यास आमचा प्रदीर्घ सल्ला :-
***********************सल्ला सुरु***************************************
अजो, चिडलात का ?

भूत दया विसरून लोकं नॉन व्हेज खाताहेत ?
लोकं जुन्या जमान्याला वाईट म्हणताहेत?
गे-लेस्बिअन असण्याला ओके म्हणताहेत ?
जागतिक अर्थव्यवस्था खड्द्यात चाल्लिये?
तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण आपल्याकडे असल्या प्रकरणावर एकदम जालिम उपाय आहे. रामबाण. काय करायचं, एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्यायचा. आता तुम्ही म्हनाल याने काय होईल! तुम्ही दीर्घ श्वास घेऊन सोडलात की तुमचं मन स्थिरावेल. मन स्थिरावलं की संसद का सत्सद काय म्हणतात ती विवेकबुद्धी जागॄत होइल. ती विवेकबुद्धी जागॄत झाली की तुम्ही सारासार विचार करू लागाल. या विचारांतून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नॉनव्हेज्,जुना जमाना,ग्-लेस्बिअनबद्दल वर विचार करायची काहीच गरज नाही.
.
त्याचं असं आहे की नको तेवढं आणि बर्‍याचदा नको तिथं डोकं चालवून थोडंसं डोकं पिकलंय...(डोकं थोडंसं पिकलंय!). तेव्हा मनात असा विचार आला की विचार न करता काहीतरी लिहावं. आता तुम्ही विचाराल की 'का लिहावं असं विचार न करता?'. अहो मग फरक काय राहिला माझ्यात आणि इतर लेखकांत? हा एक अभिनव उपक्रम (उपद्व्याप) आहे. टिळ्कांनी इंग्रज सरकारबद्दल विचारलेला प्रश्न सध्या तुमच्या मनातही माझ्याबद्दल डोकावत असेल. ('हा प्रश्न कोणता?' असा प्रश्न ज्यांना पडला असेल त्यांच्यासाठी: 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?'). आहे. माझे डोके ठिकाणावर आहे. काळंजी नसावी. फक्तं ते ठिकाण कुठं सापडंत नाहीये. असो.
.
नाही नाही. हा लेख असा अर्धवट वाचून सोडून देण्याचा विचार तुमच्या मनाला स्पर्शूही देऊ नका. फारंच वैतागला असाल तर एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. (श्वास बरंका.....लेख वाचणं नाही).
मुद्द्याचं बोलायचं झालं तर बोलण्याचा मुद्दा काय असावा! कशाला हवाय तो मुद्देसूदपणा! कशाला हवाय एका वाक्याचा दुसर्‍या वाक्याशी संबंध! कशाला हवेत ते अक्षरा-अक्षरामधील, शब्दा-शब्दामधील, आवाजा-आवाजांमधील ते परस्पर ग्राह्य संबंध! थोडा वेळ सगळं बाजूला ठेवा. पाटी स्वच्छ पुसून कोरी करा. आता या पाटीवर आपल्याला एक चित्र काढायचं आहे. कशाचं? पोकळीचं. (पोफळीचं नाही हो...). पोकळीचं. निर्वात पोकळीचं. कसं काढाल? सोप्पंय! काही काढायची गरजंच नाहीये. याचा काय अर्थ? अं हं....विचार करायचा नाही....अजिबात विचार करू नका. वाचंत रहा. (थोडंसंच राहिलंय!).
.
जगात कोणी ना कोणी काही ना काही करंत असतो. जगात कोणी ना कोणी काही च्या काही करंत असतो. मीही ठरंवलंय की जीवनाचं ध्येय ठरंवायचं. 'काहीही' करून 'काहीही ' होत नसतं तर 'काहीतरी' होण्यासाठी 'काहीतरी' करावं लागतं- हे मला आता कळून चुकलंय...(अं हं..चुकून कळ्लंय!). काय म्हणजे काय असतं, कोण म्हणजे कोण असतं याची प्रत्येकाला पारख हवी. 'जे आहे ते का आहे' आणि 'जे नाही ते का नाही' हे कळ्ल्याशिवाय 'जे आहे ते नसते तर...' आणि 'जे नाही ते असते तर...' याचा अंदाज कसा येणार! जसेजसे आपण पुढे जातो, आपण तसेतसे का जातो आणि आपण तसेतसेच का जातो याचा अभ्यास करायला हवा. 'आपल्याला इतके प्रश्न क पडतात?' विचारलात कधी हा प्रश्न स्वत:ला? समजलेल्या गोष्टी समजून घेण्याची समज आपणांत होती म्हणून त्या समजल्या. पण न समजलेल्या गोष्टी का समजत नाहीत हे समजून घेतले तर समजदारीचे कृत्य होईल ही समजूत चूक की बरोबर हे समजले पाहिजे.

'काय लिहीलंय हे?', 'का लिहीलंय हे?' वाटलं ना असं? वाटू द्या. काय वाट्टेल ते वाटू द्या. काय वाटावं हे आपल्या हातात नसतं. पण काय 'वाटून' घ्यावं हे मात्र आपल्या हातात असतं. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं वाटत असतं. कुणाला बरं वाटत असतं तर कुणाला वाईट वाटत असतं. कुणाला हसावं- नाचावं-बागडावं वाटत असतं तर कुणाला रडावं वाटत असतं; तर कुणाला पहावं...करावं...करून पहावं..पाहून करावं...वाजवावं...खाजवावं..............
प्रत्येकाला वेगवेगळं वाटत असतं कारण प्रत्येकाची वाट वेगळी असते. आयुष्यात पुढे पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला वाट लागंत असते....आणि आयुष्यात पुढे पुढे जाताना प्रत्येकाची वाट लागंत असते...!

हुश्श! एवढं लिहीलं...मन हलकं झालं...तुम्हाला वाटंत असेल की या लेखकाला 'मन' नाही तर 'पोट' हलकं करण्याची गरज आहे. वाटूद्या...मी त्याबद्द्ल काही वाटून घेणार नाही. तुम्ही इथपर्यंत वाचंत आलात त्याबद्द्ल तुमचं मनापासून कौतुक. कांडी संपत आलीये...नाहीतर अजून लिहीलं असतं.

....आलो....आलो...कोणीतरी बोलावतंय....जायला हवं....बरंय तर मग्.....तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या..!

कळावे.....लोभ असावा....(खरं तर माणसाला लोभ नसावा....!).

प्रेम असावे........
***********************सल्ला समाप्त***************************************

बॅटमॅन Wed, 24/09/2014 - 17:41

In reply to by मन

अजो- भूतदया क्षणभरासाठी बाजूला ठेवून या प्रतिसादासाठी मनोबावर भूतक्रौर्याचा प्रयोग दाखवण्याबद्दल काय मत आहे ;)

अजो१२३ Wed, 24/09/2014 - 18:02

In reply to by बॅटमॅन

मनोबा कैच्या कै माणूस आहे. कोणत्याही विधानावर दोन तर्कांपलिकडे तो वाद-प्रतिवाद करू शकत नाही. (गेम लेवल दोनला गेला कि धापा टाकत रिजाईन मारतो). आपलं छान आहे. आपण कोणत्याही गोष्टीचा वाईट्ट किस पाडू शकतो. म्हणून भावनिक, प्रभवनशील आणि तरीही स्थिर राहतो.
------------
इतकं पुरे त्याला?

बॅटमॅन Wed, 24/09/2014 - 18:15

In reply to by अजो१२३

हम्म, रोचक असलं तरी पुरे नाय वाटत. प्रत्यक्ष भेटूनच धोपटला पाहिजे. ;)

अधोरेखित प्रस्तावावर मात्र बरीच जन्ता सहमत होईल असा कयास इ. आहे.

अजो१२३ Wed, 24/09/2014 - 18:04

In reply to by बॅटमॅन

करेक्शन - मांसाहार, शाकाहार किंवा आहार बाजूला ठेउन. भूतदया आपल्याला फार प्रिय आहे ही गोष्ट लै आनंदाची आहे. मेकॅनिझम जौ दे.

गवि Wed, 24/09/2014 - 18:51

In reply to by बॅटमॅन

पण आता ती बाटली तिकडे न घातली जाता योग्य ठिकाणी उपयोगात येणार असल्याने त्या दणकट रचनेचे प्रयोजन उरले नव्हते.

अजो१२३ Wed, 24/09/2014 - 18:19

In reply to by मेघना भुस्कुटे

तुम्हाला प्राणी आणि वनस्पती गवींसारखे (गवींना प्राणी वा वनस्पती नाही म्हणतंय, गवी म्हणतात तसे) डिट्टो समानच वाटतात का?

वामन देशमुख Wed, 24/09/2014 - 23:58

काय ठरलं मग शेवटी?

अंडी की भेंडी?
कोंबडी की अंबाडी?
शेळी की पोळी?
बकरी की भाकरी?
बदक की मोदक?
डुक्कर की शक्कर?
गाय की साय?
बटन (मश्रूम) की मटन?
सुव्वर# की तुव्वर#?
कंदी* की पंदी*?

एकदाचं सांगून टाका मग मी खायला मोकळा...

--------------------
#हिंदी
* तेलुगु

वामन देशमुख Mon, 29/09/2014 - 11:08

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन गारू,

  1. आता अर्थ समजला/ आता कळलं = इप्पुडू अर्धमअयिन्दि.
  2. बाधा पडकंडी = दुखः करू नका :(

अवांतर: नुव्वू अंटे नाकु चाला चाला चाला इष्टमे, अदि माटालोने चेप्पालेका मुद्दे अडीगाने..
हे ऐकून Heart Attack येणार नाही याची काळजी घ्या.

बॅटमॅन Mon, 29/09/2014 - 14:32

In reply to by वामन देशमुख

ओह ओक्के, धन्यवादंडि :)

नुव्वू अंटे नाकु चाला चाला चाला इष्टमे, अदि माटालोने चेप्पालेका मुद्दे अडीगाने..

रेंड नंबर सेंटेन्सलो अर्थंकालेदंटे ना फ्रेंडकि चेप्पानु, तरवाता अर्थमायिन्दि. :)