मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८९
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

सेन्सेशनलाईज न करता समाजचित्रण
>>सेन्सेशनलाईज न करता कोलंबियन ड्रग माफिया, अमेरिका (आणि अमेरिकन एजन्सीतली आपापसांतली नाटकं) आणि कोलंबियन समाज यांचं चित्रण बघण्यासाठी.<<
'वायर'मध्ये ज्याप्रमाणे अॅक्शन कमी आणि व्यक्तींमधले गुंतागुंतीचे संबंध अधिक आहेत तसं काही आहे का? 'ब्रेकिंग बॅड'मध्ये उत्कंठावर्धक अॅक्शन फार होती.
होय, पण व्यक्तीपातळीवर न
होय, पण व्यक्तीपातळीवर न ठेवता व्यक्तीसमूहपातळीवर.
उदा० ड्रग कार्टेल्सना कोलंबिया आणि इतर दक्षिण अमेरिकन देशांत एवढा जनाधार कसा मिळाला यावर मार्मिक भाष्य आहे. उदा2: दोन कार्टेल-स्पर्धकांच्या (एस्कोबार आणि काली) कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये काय फरक होता आणि त्याचा त्यांच्या यशापयशावर कसा परिणाम झाला.
+१
आबा नेमकं बोललेले आहेतच.
पण, ही एक सिरीज संथ गोष्ट आणि तीव्र ॲक्शनचा मस्त तोल साधते. कंटाळा नाही येत.
शिवाय, स्टीव्ह मर्फीचं निवेदनही झकास आहे. गोष्ट भराभर पुढे जाते. अभिनय तर सगळ्यांचेच अफाट आहेत. पेन्या, मर्फी, पाब्लो आणि विशेषत: पाब्लोचा ड्रायव्हर लिमाँ आणि त्याच्या मैत्रिणीचं काम छोटंसं असलं तरी खूपच लक्षात राहतं. लिमाँने दरवेळी नीती-अनीती मध्ये फसलेला ड्रायव्हर तर मस्तच उभा केलाय. त्याची वेगळी गोष्टही मस्त लिहीलेली आहे.
विपरीत मत
माझ्या मते व्यक्तींमधले संबंध हा भाग अमेरिकीपणाकडून - उत्कंठावर्धक अॅक्शन - मार खातोय. पहिला ऋतू प्रभावी वाटला तेवढं पुढे काही उरलं नाही. पहिले काही भाग पाहा, वाटलं तर पुढचं पाहा नाही तर गोष्टीत काय होतं ते मी सांगेन.
(तशीच भीती आता 'ऑरेंज इज द न्यू ब्लॅक'बद्दलही वाटायला लागली आहे. पहिल्यापेक्षा पुढचे ऋतू अधिक प्रभावी होते. पण नवीनतम ऋतू जिथे संपवला आहे तिथे फारच निराशा झाली.)
(पण त्याच कारणासाठी 'रिव्हर' पाहाच. तुझ्या टायपाची आहे ती... तो... जे काय आहे ते!)
अरे वा , छान झालं हे . म्हणजे
अरे वा , छान झालं हे . म्हणजे आता येत्या एक दोन वर्षात माया ताई आरोप मुक्त होतील अशी आशा .( होपफुली हे जर फास्ट ट्रॅक केलं तर २०१९ च्या निवडणुकीत त्या निवडून सुद्धा येऊ शकतील ) आता दे भ बाबुराव बजरंगी यांच्यासंबंधी असे आर्टिकल, खोट्या आरोपातून व कोर्टाच्या निर्णयातून मुक्तता कधी याची वाट बघायची .
बापट अण्णा, पुरोहीतांची केस
बापट अण्णा, पुरोहीतांची केस लै डेंजर आहे. आणि तुमच्यासारखे (मंजे काँग्रेसी हिंदू दहशतवाद थेरी मान्य असणारे) अजून चार निघाले तर मराठी बामनांची पुढची पिढी देशप्रेमाच्या फंदातच पडणार नाही. थेट अमेरिका आणि लंडन. मग तिथं बसून सेफ पुरोगामी पुरोगामी खेळायचं.
===============
दंगेखोर हिंदू चिक्कार असतात नि ते जेलमधे जावेत. पण कोडनानींची केस मिसकॅरिएज ऑफ जस्टिस आहे तर वाचा वा वाचू नका. पण कुठेही रिलेट नका करू.
प्रभाकर नानावटी
https://swarajyamag.com/magazine/in-hot-blood-review-a-tantalising-read…
नानावटी हे नाव हिंदूंतही असते का प्रभाकर हे नाव पारशांतही असते?
पैसा... रुपया..
कॅशलेस करायला गेलात सगळं तरी लुटालुट काही थांबत नाही.
प्रसंग एक -
आज सकाळची गोष्ट, दुचाकीमध्ये पेट्रोल भरायला गेले, इंडिकेटर बघून पेट्रोल भरेपर्यंत, दुसऱ्याने कार्ड स्वाईप करायला घेतलं , झाकण फिरवे पर्यंत, गाडी आगे लो वगैरे करेपर्यंत ३४५ रुपयांचं स्वाईप केलेलं. इंडीकेटर वर ३४३.४५ च रिडींग मी स्वतः पाहीलं होतं. त्यावरून वादावादी, मागच्या लोकांचा त्रागा, दिवसाची सुरुवात बंड्ल झाल्यामुळे चिडचिड हे सगळं.. वर आणि ते पेट्रोल पंप वाले जाने दो ना मॅडम १ रुपये के लिये कितना मचमच वगैरे टोमणे मलाच वर मारतात.
कॅश देताना रुपयांसोबत पैसे देणं शक्य नसणं एक वेळ समजूही शकते मी, पण कार्डसाठी इतकी कटकट का करावी लागते...?
प्रसंग दोन -
मी आणि माझी मैत्रिण बाहेर जेवायला गेल्तो, बाटलीतल्या पाण्याची दुप्पट किंमत बिलात लावलेली. त्यांना विचारले तर सर्विस चार्जेस आहेत म्हणून सांगितलं. बिलात जि स टी होतंच. एम आर पी पेक्षा जास्त किमतीत तुम्ही विकू शकत नाही म्हणून वाद घातला तेव्हा त्याने वरचे वीस रुपये माझ्यावर उपकारकेल्यागत तोंड करून कमी केले. त्यात मैत्रिण जाउ देना, कशाला भांडतेस वगैरे करतच होती.
आपला वेळ, उर्जा शक्ती डोकं पणाला लाऊन हे सगळं करायचा कधी कधी कंटाळा येतो. मग चिडचिड होत राहते. आपण नियमाने जे पैसे असतील ते द्यायला तयार असून फसवले गेल्याची भावना येते. बरं बाकीचे लोक आवाज उठवत नाहीत, आपणच तेवढे भांडत बसतो त्यामुळे आधी तंबी मिळते कधी कधी , तिथे जाऊन वाद नको घालूस एक दोन रुपयांसाठी... मी तुला देतो / देते पैसे वगैरे.
मुळात आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हेच फार कमी लोकांना जमतं , काही लोक वेळ नाही, कशाला वाद म्हणून सोडून देतात. आणि आम्ही मात्र भांडकुदळ ठरतो.
कुठेतरी, कुणाचं तरी चुकतंय असं वाटतं.. नाही का?
मी आणि माझी मैत्रिण बाहेर
मी आणि माझी मैत्रिण बाहेर जेवायला गेल्तो, बाटलीतल्या पाण्याची दुप्पट किंमत बिलात लावलेली. त्यांना विचारले तर सर्विस चार्जेस आहेत म्हणून सांगितलं. बिलात जि स टी होतंच. एम आर पी पेक्षा जास्त किमतीत तुम्ही विकू शकत नाही
असे नाहिये गौरक्का ह्या केस मधे.
बाटली एमारपी पेक्षा जास्त नाही विकू शकणार, पण तुम्हाला हॉटेल नी सर्व्हिस दिली आहे ते पाणी पिण्यासाठी, त्याचे ते जास्तीचे चार्ज लाऊ शकतात. पुढच्या वेळि तुम्ही बाटली बाहेरुन विकत हॉटेल मधे घेउन जा
ओके, मे बी मी बरोबर मांडणी
ओके, मे बी मी बरोबर मांडणी केलेली नाही.
खाद्यपदार्थ - क्षयझ रुपये
पाण्याची बाटली - ४० रुपये
------------------------------------
एकूण - क्षयझ + ४० रुपये
+ ९% एसजिएसटी
+ ९% सिजिएसटी
+ ड% सर्विस चार्जेस
हे बिल होतं , तरीही, बाटलीचे जास्त पैसे द्यायचे का?
+ ड्% सर्विस चार्जेस लावणं जास्त चुकीचं नाही का?
पण तुम्हाला हॉटेल नी सर्व्हिस
पण तुम्हाला हॉटेल नी सर्व्हिस दिली आहे ते पाणी पिण्यासाठी, त्याचे ते जास्तीचे चार्ज लाऊ शकतात.
यावरुन आठवलं. हल्लीच एका तारांकित हॉटेलात मेन्यूमधे ब्रँडेड पेयाच्या फक्त नावाऐवजी "Service of" अशी रचना करुन किंमत (जास्त) दिली होती. उदा. "Service of Pepsi Rs. 150" इ.
याखेरीज एमआरपीवरुन भांडणार्यांवर उपाय म्हणून मध्यंतरी खास "Packaged specially for xyz mall" किंवा तत्सम रिमार्कने मुळातच तिप्पट एमआरपी छापलेल्या पाण्याच्या बाटल्या/ चिप्स वगैरे पाहिले. एकूण काय तर एमआरपी हा आकडा पकडून भांडणं फुलप्रूफ ठरु शकत नाही. त्याला सोप्या पळवाटा निघू शकतात.
हे खरं आहे. उजव्यांना
हे खरं आहे. उजव्यांना घाईघाईनं हिंदूराष्ट्र हवं आहे. डाव्यांना उजव्यांचं जगात असणंच अमान्य आहे. दोघांचाही एकमेकांवर विश्वास नाही. संवादाची पातळी खालची आहे. आणि परिस्थिती खालावते आहे कारण याला स्वार्थी, मूर्ख आणि स्वार्थी आणि मूर्ख लोक खतपाणी घालत आहेत.
काँग्रेसची अधिकृत पॉलिसी
काँग्रेसची अधिकृत पॉलिसी भ्रष्टाचार करणे आहे का? पण सगळे काँग्रेसी गावापासून दिल्लीपर्यंत करतात. मी काँग्रेसला भ्रष्टतावादी पक्ष म्हणणार नाही. पक्षातल्या कितीतरी लोकांना काही मार्ग मिळाला तर ते तो शुद्ध करून घेतील. अशी इच्छाशक्ती असणारे काँग्रेसी चिकार आहेत. पर उनकी अपनी समस्याए है. बीजेपीला मत देणारे काही लोक काय म्हणतात याने ती त्या पक्षाची भूमिका होत नाही. आपले थत्ते तर अशी टिका करतात जणू काय प्रत्येक भक्त भाजपचा मोठा पदाधिकारी आहे आणि पक्षाचि अधिकृत भूमिका मांडतोय. काँग्रेसचं सत्तेवर येणं बीजेपीसाठी नॉर्मल आहे (राजकीय पराभव असून). तसं काँग्रेसचं नाही. त्यांना भाजप विरोधी पक्ष म्हणून देखिल नको आहे. हा पक्षच देशाला धोका आहे असं ते म्हणतात. भूमिकांत फरक आहे. ल्क्षात घ्या. भाजपचा "काँग्रेसमुक्त भारत" हा नारा केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा दाखवतो.
================
http://www.misalpav.com/comment/959168#comment-959168 इथे पाहा. गौरी लंकेश पूर्वी जे काही झालं ते धरायचंच नाही. आपल्या कम्यूनिटीला काही झालं ती अंध:काराची सुरुवात, मळभ, देशाचं अवघड भविष्य, इ इ. याला म्हणतात अस्तित्व मान्य नसणं.
शिवाजीच्या काळापासून
हे पत्र* सोमी वर इ स पूर्व काळापासून** फिरत आहे.
पण यातला मजकूर फारच विसंगत आहे. भारताविषयी लिहिले असेल तर - १८३५ मध्ये भारत इंग्रजांनी अगोदरच जिंकला होता. दुसरे म्हणजे शिक्षण व्यवस्था ही देश जिंकल्यावर बदलेल ना? उलट कसे होणार?
*मी पाहिलेल्या फोटो(शॉप) मध्ये आफ्रिका ऐवजी इंडिया असे.
**म्हणजे फार जुन्या काळापासून - जेव्हा सोशल मीडिया नव्हती आणि असले मेसेजेस ईमेलवरून पसरवले जात तेव्हापासून.
तसे नव्हतेच?
दि.२६/१/२०१४ च्या लोकसत्तामध्ये मेकोले :काल, आज या नावाच्या पुस्तकाचे समीक्षण आले आहे. (मेकोले हा शब्द मोबाइलवरून लिहिता येत नाहीय) त्यात लेखकद्वयांनी पुराव्यानिशी असे लिहिले आहे की जे भाषण मेकोलेचे म्हणून गणले जाते ते वस्तुत: त्याचे नव्हतेच.तो त्या भाषणाच्या काळात इंग्लंडमध्ये नव्हता. त्याने उलट भारतीय संस्कृतीची भलावण केली आहे. ब्रितिश पार्लमेंटच्या त्या दिवसाच्या इतिवृत्तातही ते नाही. बरेच पुरावे दिले आहेत. एव्हढा जुना स्रोत शोधायला आत्ता वेळ नाही. जमल्यास शोधेन.
इतिवृत्ताची खरी नक्कल?
ही इतिवृत्ताची सत्यप्रत वाटत नाही. एक तर इतिवृत्तात कुणाचे फोटो नसतात. १८३५ मध्ये तर नसतीलच नसतील. शिवाय तारीखही मागाहून टाकलेली दिसते. म्हणजे हा प्यारा कुठून तरी उद्धृत केलेला आहे आणि खाली पुरावा म्हणून स्वत:च ब्रिटिश पार्लमेंटचा आणि मेकोलेचा उल्लेख तारीख टाकून केलेला आहे. अर्थात हे इतके उघड आहे की इतक्या स्पष्टीकरणाची गरजही नाही .
गब्बरसिंगसारखे लोक
गब्बरसिंगसारखे लोक
असल्याच गोष्टींवर विश्वास ठेवतात. खर्या बातम्या 'फेक न्युज' म्हणून दुर्लक्षतात. दुर्दैवाने* असल्या फालतू गोष्टींच्या लिंका अन फोटो इथे देऊन ऐसीवरही कचराकुंडी करून ठेवतात.
कचराकुंडी-कम-ड्रेनेज स्वत:च असले कांगावे करत असेल तर काय बोलणार !!!
हे लोक चेकवा
हे लोक चेकवा
https://twitter.com/jgopikrishnan70
https://twitter.com/ARanganathan72
https://twitter.com/nitingokhale
https://twitter.com/dravirmani
मला वैयक्तिक, जग्गी आणि आनंद रंगनाथन आवडतात. याशिवाय मधु किश्वर, गुरुमुर्थीपण आहेत.
भाजप सांस्कृतिक दृष्ट्या राइट
भाजप सांस्कृतिक दृष्ट्या राइट विंगर
बरोबर. पण वाजपेयी सरकार आर्थिक राईट विंगर होतं असं म्हणता येईल. पेंशन रिफॉर्म, निर्गुंतवणुक वगैरे गोष्टी त्यांच्या खात्यावर आहेत. मोदीही गव्हर्मेंट हॅज नो बिझनेस ऑफ बिईंग इन बिझनेस, मिनिमम गवर्मेंट मॅक्सिमम गव्हर्नंस, नरेगाची निंदा आदी करत होते निवडणूकीआधी.
हा प्रश्न पडलेला आधी. साबण
हा प्रश्न पडलेला आधी. साबण होता तेव्हा.
हे वाचा.
हो, पण
लय फरक आहे ओ दोघांत. मनोबाला प्रश्नासाठी प्रश्न विचारायचे असतात. मला उत्तर हवे असते म्हणून मी प्रश्न विचारतो.
तर मूळ प्रश्नाकडे येतो. हो, म्हणजे सांबारापेक्षाही रसम फ्लेवर्ड असेल तर नक्कीच. त्याखालोखाल सांबार.
जर्मनीत कुठेतरी स्पाईस्ड वाईन की बियर पितात असे ऐकले/वाचले होते त्यामुळे कुतूहल जागृत झाले.
जर्मनीत कुठेतरी स्पाईस्ड वाईन
जर्मनीत कुठेतरी स्पाईस्ड वाईन की बियर पितात
जर्मनीतच नाही, सगळीकडेच ख्रिसमसाला 'मल्ड वाईन' पितात. बीबीसी फूड्सची ही राष्ट्रीय रेसिपी बघ: http://www.bbc.co.uk/food/recipes/mulledwine_8156
बेसिकली वाईन घ्यायची, त्यात बिर्याणीत घालतो ते मसाले घालून उकळायची आणि गरमागरम हानायची.
साबण
केतकरीय ज्नानकोषात काही जुनी माहिती होती. आता तो लेख संपादित झालेला दिसतोय. अद्ययावत झाला खरा पण जुनी माहिती उडाली.
तेल आणि राख एकत्र केले असता पदार्थ स्वच्छ होतो हे इतर लोकांप्रमाणे आपल्यालाही कित्येक शतकांपूर्वीपासून माहीत होते. शुचित्वासाठी भस्म अथवा विभूति वापरण्याची प्रथा प्राचीन आहे. त्यातूनही चिताभस्म अधिकच उपयोगी कारण त्यात लाकडाची राख अधिक प्रमाणात असते. स्वयंपाकाची भांडी राखेने घासण्याची प्रथा कानाकोपऱ्यातून अजूनही टिकून आहे .जगात इतरत्र मिळते तशी आपल्याकडेही एक खास गुणधर्म असलेली , राखेचे प्रमाण अधिक असलेली अल्कलाइन माती काही ठिकाणी मिळत असे, अजूनही मिळते. त्यात मुलतानी मिट्टी प्रसिद्ध आहे. लखलखीत कांतीसाठी आजही तिचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या मातीत काही खनिजेही असतात जी झिलईसाठी उपयुक्त असतात. तर सौम्य तैलाम्ल आणि राख वा मातीसारखा अल्कधर्मी यांच्या मिश्रणातून स्वच्छताकारक पदार्थ निघतो हे आपल्याला माहीतही होते आणि आपण तो सुरुवातीला ओबड धोबड रूपात आणि नंतर संस्कारित कृतीनुसार बनवतही होतो.
शिवाय रिठे, जांभळाची साल, बाभळीची कांडी असे फेनकारक वनस्पतिज पदार्थ आपण वापरत होतो. त्यात कडुलिंब, कुडा, कडू जिरे, शिकेकाई, बावची, नागरमोथा, गवला कचरी, मेथी, खस खस अश्या अनेक औषधी वनस्पतींची वेगवेगळी मिश्रणे वापरून लेप, उटणी, कल्प अशी सौंदर्यप्रसाधनेही बनवत होतो .
व्हॉट्सॅपवर नवरात्र
व्हॉट्सॅपवर नवरात्रीनिमित्ताने एक झकास मेसेज फिरतोय, मी तो उत्साहाने सगळ्यांना फॉरवर्ड करतोय. (बाटलेला लिबरल दुप्पट वेगाने मेसेज फॉरवर्ड करतो म्हणे)
त्या मेसेजातला महत्त्वाचा मुद्दा हा; की
पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय, की कोण ठरवतं हे रंग म्हणून? किंवा याच दिवशी हाच रंग घालायचा ही परंपरा कितीशे वर्षांपासून चालत आली आहे म्हणून? हो. आम्हाला पडला हा प्रश्न. आणि आम्ही त्याचं उत्तरही शोधून काढलं. गंमत म्हणजे आमच्या उत्तराला क्विंटचं अनुमोदनही मिळालं. उत्तर आणि त्यामागची कथा मोठी रंजक आहे हो. वाचाच मग आता..
तर , आमच्या आठवणीप्रमाणे साधारण २००३च्या सुमारास आपल्या महाराष्ट्र टाईम्सने श्रावणक्वीन आणि नवरात्रीचे नऊ रंग हा प्रकार चालू केला. पहिले दोन-तीन दिवस मटा पुरवणीमध्ये त्या दिवसाच्या रंगाच्या सुंदरशा साडीमधल्या मॉडेलचे फोटो हे आकर्षण होतं. मग आलं तुमचेही असे ऑफिसमध्ये सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घातल्याचे फोटो पाठवा म्हणून आवाहन. मग काय, बॅंका, शाळा , ऑफिसेस मधल्या ग्रुप फोटोजनी मटा पुरवणीची मधली दोन आणि कधी कधी शेवटचं पानही खाऊन टाकलं.
आणि कहर म्हणजे
क्विंंटचा लेख. त्यात त्यांनी २००३साली मटाचे संपादक असलेल्या भरतकुमार राऊतांनाच या प्रश्नाचं उत्तर द्यायला साद घातली आणि उत्तर जाम खडबडायला लावणारं होतं. ते म्हणाले, यात धार्मिकता वगैरे काही नाही, तर लोकसत्तेच्या तुलनेनं घसरत चाललेला मटाचा खप वाढवण्यासाठी त्यांनी केलेली ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. राऊतांनी हेरला रोज ऑफिसला जाणार्या मध्यमवयीन बायकांचा वाचकवर्ग. आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी मग फोटोज, छान छान साडीतल्या मॉडेल्स हे सगळं रोजच्या मटाच्या पुरवणीत येऊ लागलं..
ह्यावर छान चर्चा व्हावी, ऐसी जरा अजून भरलेलं दिसावं आणि जमलं तर खरेखोटेपणाही तपासून मिळावा म्हणून हा उद्योग.
नवरात्रातले कपडे इ असंच चालू
नवरात्रातले कपडे इ असंच चालू राहिलं तर यातून एक भयानक प्रथा पुढे चालू होइल. कारण शेवटी धार्मिक लोकांना डोकं नसतं. ते कशाचं काहिही करू शकतात. याला शह म्हणून पुरोगामी बायकांनी इंद्रधनुष्य वस्त्र कोड नवरात्रभर राबवला पाहिजे. त्यामुळे या नवरात्र पाळणाऱ्या बायकांचा विचका होइल आणि आपण समाजाला भविष्यातल्या एका घोर कुप्रथेपासून वाचवू.
म्हणजे पहा, काही प्रतिगामी वाईट घडलं तर मेणबत्त्या लावायची, निषेध करायची पुरोगाम्यांना सवय जडली आहे. पण याची परिणीती कधी भविष्यात "घटली प्रतिगामी कुघटना कि मारले मेणबत्तीसाठी मेद देणारे प्राणी" या कुप्रथेत होणार नाही, कारण पुरोगाम्यांना अक्कल असते, भान असतं.
===================
कशाची मर्यादा काय असावी, एक आपलं सांगून पाहिलं.
काय सांगता!
नवरात्र ही कुप्रथा नाही? अहो, नवरात्रात मुंबईत म्हणे कित्येक गुजराती पोरी... म्हणजे, असे ऐकून तरी आहे ब्वॉ. हं, आता सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे, वगैरे सर्व ठीकच, परंतु तरीही. शिवाय, याच काळात निरोधचाही खप जोरदार वाढतो, असेही ऐकून आहे. चूभूद्याघ्या.
नबा, आपण एकमात्र आयडी आहात जो
नबा, आपण एकमात्र आयडी आहात जो नेहमी खरोखरचे " न फरक पडणारे" प्रतिसाद देतो. कसं जमतं हो? अतिटतस्थ प्रतिसाद असतात तुमचे. क्वचितच तुम्हाला अवांतराचे अवांतर (मंजे विषयाशी निगडीत) प्र्तिसाद देऊन भांडताना पाहिलंय एका बाजूनं. क्वचित पण नाही वाटतं. सिरियसली सांगतो, असं करण्यामागचं तुमचं मनन काय ते एकदा लिहा.
==============
बाकी पुरोगाम्यांच्या मते जे पूर्वापार चालत आहे ते सर्व कुप्रथा आहे. ते उद्या म्हणतील पूर्वज करत होते म्हणून गुजराती पोरिंपुढे तुम्ही दिलेले ते तीन टींब जे तुम्ही ऐकून आहात ते बंद करा.
==============================
माझं म्हणाल तर जगात कुप्रथा वैगेरे काही नसतं. उगाच आपल्याला आवडत नाही, सोयीचं नाही त्याला कुप्रथा म्हणत सुटायचं. आणि स्वत: शंभर पाळायच्या. शिक्षण आणि अक्कल असून.
पुरोगाम्यांचा अंमळ गैरसमज
पुरोगाम्यांचा अंमळ गैरसमज झालेला दिसतो. ऑब्जेक्शन सनीला नाही. तिच्याजागी भरल्या मळवटाची नववारीतली बाई टाका अशा प्रकारचा नाही त्याला विरोध. त्यातला नवरात्राचा संदर्भ काढा असा आहे.
उद्द्या आम्ही अनिस ने प्रभावित झालो, नि प्रत्येक सभा नारळ फोडून चालू केली तर ते बोंबलतील, तसं.
नवरात्र आणि ड्रेस कोड दोन्ही
नवरात्र आणि ड्रेस कोड दोन्ही कुप्रथा आहेत. त्यातल्या दुसरीबद्दल मी बोलत होतो.
=================
मेणबत्त्यांचे पण अनेक उपयोग आहेत. आणि मेणबत्ती लॉबी तसे उपयोग करते असे ऐकून आहे. मूळात मेणबत्ती लॉबी त्याकरिताच अस्तित्व्वात आली आहे. विजेचा पुरवठा अधिक रिलायेबल* झाल्याने घरातून मेणबत्त्या गायब झाल्या आणि गैरसोय होऊ लागली. म्हणून एक सामाजिक अँगल देऊन मेणबत्त्या घरात परत आणल्या गेल्या. असे ऐकून आहे.
======================
शिवाय मेणबत्ती लॉबी ही दुर्गा आणि महिषासुराच्या दांडियाबद्दल** बरंच काही जाणते असं आम्ही ऐकून नाही आहोत तर आम्हाला चक्क माहीत आहे. तर तुम्ही अहो, ब्वॉ म्हनून जे थोडे आश्चर्य ओतले आहे ते मूळ प्रथेत अभिप्रेत आहे असे मेणबत्ती लॉबी म्हणते. नंतर दांडीया ही एक सामान्य सामाजिक प्रक्रिया आहे असे म्हणते. मग प्रत्यक्ष मेणबत्ती वापरते. मग सकाळी उठल्यावर नविन हिशेब मांडून पुन्हा कुप्रथा म्हणते. लॉजिक माफ असल्याचे फायदे!!
==============================================
*हे करण्याचं पातक भाजपचं म्हणून रागही त्यांचेवर.
** संसदेतल्या लाईनवर क्षमा प्रार्थून
नवरात्रात मुंबईत म्हणे
नवरात्रात मुंबईत म्हणे कित्येक गुजराती पोरी...
ऐकून असल्याबद्दलच म्हणाल तर ... "अहोरात्रात प्रत्येक नगरात प्रत्येक पोरगी ..." च्या आसपास आलं आहे असं आम्ही ऐकून आहोत. त्यामुळं नवरात्राचा वेगळा रंग दिसणार नाही. आमची पिढी कमनशिब्यांची शेवटची असंही ऐकून आहोत.
आता सर्वत्र चांदीचे दिवस आहेत.
आपण आनंदी आहात याचा आनंद आहे.
आपण आनंदी आहात याचा आनंद आहे. आमंत्रण द्यायची इच्छा नाही असं आहे तर मंजे काही आकस आहे तर ते दुर्दैवी आहे म्हणेन. म्हणजे कोणत्याही आनंदाकरता वा वारुणीकरिता स्रोत म्हणून तुम्हाला कधी मोजलेलं नाही, म्हणून मेटेरियालिस्टिक फ्रंटवर दुर्दैवी नाही, तर आमचा शुद्ध वैचारिक विरोध व्यक्तिगत तळ्यात कसा ओव्हरफ्लो करून घेता म्हणून. अगेन, फक्त आकस असल्यास हे सगळं.
====================
वास्तविक, मी तुम्हाला इतकं महत्त्व देतो, इतकं महत्त्व देतो (तुम्ही देखिल मान्य करता) कि तुम्ही आकस बिकस जाऊ द्या, आभारी असलं पाहिजे.
================================
ऐसीच्या "फायरब्रँड फेमिनिस्ट"* म्हणून आपणांस सप्रेम, सादर, सविनय ग्रीन टी प्यायचे आमंत्रण.
========================
* यात बायकांच्या भल्याचं काही असलं वा नसलं तरी.
खरे आहे. एवढेच नाही तर
खरे आहे. एवढेच नाही तर लोकसत्तानेही हे रंग जाहिर करायला सुरुवात केली आहे आणि महिलावर्गात दोन गट पडले आहेत. लोxमटा ॥ ताज्याबातमीप्रमाणे भाचीच्या ओफिसने लोकसत्ता "फॅाल्लो" करायचे ठरवले आहे कारण त्यांच्या लिस्टितल्या साड्या प्रत्येकीकडे आहेत. मटाचा राखी/ग्रे निवडणुकीत हरला आहे.
" कालचा मटा पाहिलास का?"
"नाही,पाहाते."
"पाचव्या पानावरच्या तिसय्रा फोटोत मागून डाविकडून तिसरी मी आहे!"
"नक्की पाहते!!"
२००३ नसेल
श्रावणक्वीन २००३च्या सुमारास सुरू झालं. त्याच्या आगेमागे चारपाच वर्षं हे नवरंग प्रकरण सुरू झालं असावं. तळवलकरांच्या सुवर्णयुगानंतर मटाच्या खपात घसरण सुरू झाली. पूर्वीचं डुढ्ढाचार्यी रूप बदलून काही नवं करण्याचं मालकांनी ठरवलं. युवापुरवणी सुरू करताना हेतुपुरस्सर प्रमाणभाषेची ऐसी की तैसी करून, शुद्धलेखनाचे विधिनिषेध झुगारून देऊन तरुणांच्या तोंडची बोली जशीच्या तशी वापरली गेली. फिल्मी gossip आणि पेज ३ कल्चर नव्याने broad sheet मराठी पत्रकारितेत अवतरलं. थोडीशी खळबळ माजली पण ' बोरीबंदरच्या थेरडी' च्या मराठी अवताराने गांभीर्य, भारदस्त्य, वार्धक्य, भाषासौष्ठव वगैरे टाकून देऊन थोडं ' थैल्लर्य' स्वीकारलं ते स्वीकारलं . मग शोभायात्रा, फ्लोट वगैरे सुरू झालं. केतकर गेले, इतरही काहींना जावं लागलं. खप चांगलाच वाढला. आर्थिक गणितं जुळवताना प्रबोधनाचे दिवस संपून लोकानुनयी पत्रकारितेचं युग आलं. तेही साहजिकच होतं म्हणा. माहितीच्या सहज उपलब्धतेमुळे लोक आपली मतं स्वत: बनवू लागले. अग्रलेखांची गरज आणि उपयुक्तता संपली. मनोरंजनाची गरज वाढली. माझ्या मते, ती तात्पुरती अयशस्वी ठरलेली युवापुरवणी हा मराठी पत्रकारितेतला एका नव्या युगाचा उदय होता.
म्हणा की
म्हणा की खुश्शाल आणि उघड उघड. त्यासाठी रंगसफेती कशाला? फक्त इतकंच की १) 'त्या'ला म्हातारा, बुड्ढा, थेरडा, सटिया गेलेला अशी अनेक विशेषणं आधीच लावून जुनी झालेली आहेत. तेव्हा कॉपीराइटची अडचण आहे. २) हा पोरबंदरात जन्मला फक्त. मात्र बोरीबंदरच्या दगडी इमारतीसारखा स्थाणु आणि दगडी राहिला नाही. त्यामुळे त्याला साबरमतीचा, मुंबईचा, वर्धेचा असा कुठलाही बुड्ढा म्हणता येईल. अगदी नाताळचासुद्धा. कारण आफ्रिका सोडतानाही तो पंचेचाळीस वर्षांचा म्हणजे त्या काळाच्या मानाने बुड्ढाच होता.
तरूणाईची भाषा
मी गेल्या काही वर्षांत मराठी पेपर्सच्या सो कॉल्ड तरूणाईकरता असलेल्या पुरवण्यांमधे जी भाषा पाहिली आहे ते एकदम कृत्रिम वाटली होती. म्हणजे त्या पेपर्स मधल्या कोणीतरी सध्याचे तरूण कसे बोलत असतील याची कल्पना करून रॅण्डम शब्द इंग्रजीत वापरून "बनवलेली". ती किती प्रातिनिधिक होती शंकाच आहे :)
+१. भाषेबद्दल.
सो कॉल्ड तरूणाईकरता असलेल्या पुरवण्यांमधे जी भाषा पाहिली आहे ते एकदम कृत्रिम वाटली
भाषेबद्दल:
मराठी तरुणाई आणि ह्या वर्गाबद्दलचे गैरसमज ह्याबाबत स्वतंत्र पुस्तकच काढता येईल. एक चित्रपटांत दाखवतात ती. एक मालिकांत दाखवतात ती. एक नाटकांत दिसते ती.
मुंबईतल्या उपनगरांतही अत्यंत शुद्ध भाषेत, प्रगल्भ शैलीत नवीन नाटकं लिहीली जातात. मी आजपर्यंत जितकी पाहिली आहेत, त्यातल्या एकातलीही भाषा अशुद्ध किंवा इंग्रजाळलेली नव्हती. व्हिवा पुरवणी म्हणजे ह्या, फारेण्ड म्हणताहेत त्या अडाण**पणाचा कळस आहे. व्हिवा ही पुरवणी, फ्रेंड्ज, जीओटी युवा पीपल्सची आहे. आम्ही लग्नाळू, झिंगाट आदी गोष्टी मराठी युवाज्यन्तेच्या आहेत. (मी दोन्हींमध्ये असतो. :D ) त्यांच्या भाषा ह्या सगळ्याला साजेशाच असतात मग. चिंजंनी एकदा वर्गवारीच्या विनोदाबद्दल लिहीलेलं आठवतंय.
तुम्हाला तरुण जनतेच्या मराठीचं अगदी, अनबायस्ड, 'रॉ' सँपल हवं असेल, तर इन्स्टाग्रामवर https://instagurum.com/u/_marathi_cute_chats.love
इत्यादी पाने बघा. बरंच काही कळेल.
चेपुवर सेमी इंग्लिश मिडिअम, महाराष्ट्रीअन्स मीम, इत्यादी पाने बघा.
या सायटीवर येणाऱ्या लोकांपैकी
या सायटीवर येणाऱ्या लोकांपैकी अनेक जण आयटीवाले आहेत. त्यांच्यासाठी एखादा धागा असावा का ? आयटीधागा स्पेशल. म्हंजे आयटी वाल्यांच्या जिव्हाळ्याचे विषय असा धागा असावा का ? असा धागा या सायटीवर अस्थानी होईल असं नाही .... पण एकदा असा धागा काढला की ह्याचप्रकारचे व याच विषयाशी संलग्न् विविध धागे निघतील व त्याच त्याच विषयांचे/धाग्यांचे प्राबल्य होईल व ..... खेळ/क्रीडा/राजकारण/समाजकारण/कला/साहित्य हे विषय मागे पडतील !!!!
स्युडो म्हणजे विरुद्ध नाही तर
स्युडो म्हणजे विरुद्ध नाही तर जे नाही त्याचा देखावा करणारे विशेषण आहे. स्युडोलिबरल म्हणजे कॉन्झर्व्हेटिव्ह नाही तर लिबरल असण्याचा दावा करणारे आणि दिखावा करणारे पण मुळात कॉन्झर्व्हेटिव्ह
यू आर स्टेटिंग द ब्लीडींग ऑब्व्हियस.
ते माहितिये ओ.
पण स्युडोकाँझर्व्हेटिव व स्युडोकम्युनल असे काही असते का ?
सॉरी गब्बु. बापटण्णा आणि
सॉरी गब्बु. बापटण्णा आणि चिंजं ना स्युडोलिबरल म्हणुन घेण्याची संधी डोळ्यासमोर असल्यामुळे ऑब्व्हियस दिसले नाही.
पण स्युडोकाँझर्व्हेटिव व स्युडोकम्युनल असे काही असते का ?
असे इन-थिअरी नसावे. पण अजो स्युडोकाँझर्व्हेटिव असावेत. पण तसेही ते आउटलायर असल्यामुळे काउंट होतील का ते माहिती नाही..
बापटण्णा आणि चिंजं ना
बापटण्णा आणि चिंजं ना स्युडोलिबरल म्हणुन घेण्याची संधी डोळ्यासमोर असल्यामुळे
स्युडो मंजे ढोंग करणारे. म्हणजे स्वत:शी ढोंग करणारे.
===================================
तर हे दोघे ढोंगी नाहीत म्हणून स्यूडो (लिबरल इ) नाहीत. ते जे काही आहेत ते प्रामाणिकपणे आहेत, आणि त्यांचं तसं असणं चूक आणि निरर्थक आहे हे त्यांना कळत नाही. त्यांनी स्वत:ला लिबरल म्हणावं आणि आपण त्यांना अप्रामाणिक म्हणावं हे दोन्ही चूक आहे. ते जे काही आहेत ते म्हणायला (अर्थातच लिबरल सोडून) अप्रामाणिकपणा सुचित करणार नाही असं दुसरं नामाभिधान शोधावं लागेल.
स्युडो मंजे ढोंग करणारे.
स्युडो मंजे ढोंग करणारे. म्हणजे स्वत:शी ढोंग करणारे.
स्वताशीच ढोंग करणारे अर्थ बरोबर नाही.
संत मनोबानी पूर्वीच सांगितले आहे ( जे बरोबर आहे ) "स्वताच्या मनाला फसवता येत नाही" त्यामुळे स्वताशी ढोंग पण करता येत नाही.
स्वताला लोकांसमोर लिबरल दाखवण्याचे नक्कीच फायदे असावेत म्हणुनच स्युडोलिबरल असतात पण स्युडोकाँन्झर्वेटिव्ह नसतात.
स्युडो वा ढोंगी या शब्दांचे
स्युडो वा ढोंगी या शब्दांचे अर्थ मला, आपणांस नि मनोबाला सेमच अभिप्रेत आहेत. मात्र हे दोघे अप्रामाणिक (फक्त तेवढ्या संदर्भात, तेवढ्यापुरते) असं जे आपण म्हणत आहात ते मला मान्य नाही. तसं म्हणायला आधार नाही.
==============
आणि फायद्यासाठी का होईना, खोटं का होइना "खऱ्या" लिबरलपणाचं यशस्वी ढोंग करता आलं पाहिजे तर स्युडो ना?
=======================
हे लोक फार तर फार फॅशनचे व्हिक्टिम आहेत.



नार्कोस
'नार्कोस' पाहावी का? का पाहावी?