मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८५
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----
वपू द्वेष करण्यासारखे
वपू द्वेष करण्यासारखे नाहीतच्. एका ठराविक वयात त्यांचे लिखाण चांगले वाटते आणि नविन पॉसीबिलिटीच्या कडे बोट दाखवु शकते. ग्रॅज्युएशन च्या पायऱ्यांमधे वपु आठवी ते दहावी क्वॉलीफाय इयत्तेला होयला हरकत नाही.
संदीप खरे मात्र बोगस आहे.( बोगस म्हणजे कृत्रीम, प्लॅस्टीक, खोटा वगैरे वगैरे )
कुठे पाहिला द्वेष?
ह्या:! दवणे आणि वपु ह्यांच्यात तुलना म्हणजे पार्थिव पटेल आणि धनराज पिल्ले ह्यांच्यातल्या तुलनेसारखं आहे.
खरेंची सर्जनशीलता एका मर्यादेपर्यंत आहे.
सांस लेती हैं जिस तरह सायें, माझ्याच किनाऱ्यावरी लाटांचा आज पहारा, हा एका ओळीतला 'पंच' असो, किंवा असेल चांडाळ हा मूर्तिभंजक...! मध्ये योजलेला कळस असो, खरेंच्या कोणत्याच कवितेत तो जाणवत नाही. मध्यंतरी त्यांची 'नास्तिक' ऐकलेली, जी मला फार्फार आवडली. 'विशेष उल्लेखनिय' अशी ती एकच.
वपु
'इथे' वपुंचा एवढा द्वेष करतात का, ते माहित नाही. अगदी सुरूवातीला त्यांची पार्टनर ही कादंबरी एकदम टचिंग वाटली होती. नंतर समज वाढल्यानंतर ते कमी कमी अावडू लागले व नंतर अावडायचे बंद झाले. एकदा एका समिक्षकांचे एक वाक्य वाचनात अाले - ‘अापल्या कृतक अायुष्याच्या किरट्या रेघोट्या मारून त्यालाच वाङमय म्हणणारे’ वगैरे, अाणि वपुंची अाठवण अाली. मात्र काही गोष्टींमुळे वपुंचे लिखाण वाचणे टाळावेसे वाटू लागले, त्यातली मुख्य म्हणजे प्रचंड अात्मस्तुती! ती काही वेळेला अाडून अाडून तर कधी सरळ सरळ दिसू लागली. एका पुस्तकात तर त्यांनी कितीतरी पाने प्रस्तावना लिहीली अाणि त्यातला मुख्य भाग अलूरकर म्युझीक वाल्याने त्यांना कसे फसवले, यावरच! अरे ठीकाय, तुंम्हीपण कॅसेट विकून पैसे मिळवले ना? पण म्हणून तुंम्ही चक्क पुस्तकातली पाने एखाद्याची बदनामी करण्यासाठी वापरणार? तेही तो माणूस लेखक, लिहीणारा नसताना? अाणखी एक बाब म्हणजे, त्यांचा पुस्तकातून बहुजन समाजातल्या (नाॅन पांढरपेशे/ ब्राम्हणेतर इ।)पात्रांबाबत येणारा विखारी उल्लेख. बर्याच वर्षात त्यांचं काही वाचलं नाही, पण पुढच्या वेळी तुंम्ही लक्ष देऊन वाचा, तुंम्हालाही हे दिसेल.
आबांशी सहमत
मराठी वाड्मय (तो ड सांभाळा अदिती म्याडम) म्हणजे वपु/पुल आणि कविता म्हणजे संदीप खरे - क्या बात है ह्या पलिकडे न बघून ह्या एवढ्यांचाच उदोउदो करणारे डोक्यात जातात
पण म्हणून लेखक वाईट आहेत असं मुळीच नाहीये.
पुलंबद्दल काय लिहिणार? असोच. पुल लेखक म्हणून पकाव आहेत असं वाटण्यासारखं त्यांनी लिहिलंय हे खरंय्- पण असं ब्लॅंकेट स्टेटमेंट मला तरी मान्य नाही.
--------
वपुंचं रिपिटेशन प्रचंड आहे. आणि परीघसुद्धा अतिशयच मर्यादित. त्यामुळे त्यांची १ लाईनर्स लोक ष्टेटस म्हणून शेअर करतात ते प्रचंड विनोदी वाटतं.
उदा. आज नळाला पाणी येईल की नाही ह्याची चिंता करत, चड्ड्यांना पडलेली भोकं नाईलाजाने नजरेआड करून सकाळी कपडे चढवत "पेरूचापपा" वगैरे टाईप विनोद करणाऱ्या मध्यमवर्गीयांबद्द्ल लिहिणार्या वपुंचं
"गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं" टाईप वाक्य म्हणजे शिकरणात बांगडा पडल्यागत वाटतं. हा प्रकार झेपत नाही.
वपुंची कित्येक वाक्यं "टाळ्याखेचक"च आहेत. पण मला त्यांचं फॅंटसीशी असलेलं कनेक्शन आवडतं. "भदे"/"बदली"/भांडणारे जोशी"/जे.के. मालवणकर = असल्या प्रकारांत वपु फॅंटसीची जोड देतात ते सॉलिड.
====
खरेंच्या कविता मला तरी आवडतात. सगळ्या? नाही. पण काहीकाही मस्तच आहेत. (यूट्यूबवर एकदा त्यांचा "आयुष्यावर बोलू काही"चा विडिओ पाहिला आणि डोळ्यांना फोड आले. अरे किती दरिद्रीपणा कराल रे?
अगदीच गचाळ.)
=======
संदीप कुलकर्णी आवडत नाहीत- कुठल्याश्या खरेंच्या अल्बमात त्यांनी मिळेल ती सगळी वाद्य कोंबून संगीत दिलंय, "संधीप्रकाशात" मात्र बरंय.
===
दवणे मूर्तिमंत शॉट आहेत. उगाच काहीही प्रसवतात. हे जर कुणाला मान्य नसेल तर कृपया दवणेंचं चांगलं लेखन काय आहे ते सांगून टाका.
खऱ्यांचा पहिला कवितासंग्र
खऱ्यांचा पहिला कवितासंग्रह 'मौनाची भाषांतरे' हा चांगला होता. काही कविता मला खरंच आवडल्या होता. खरे कवीचे गीताकार झाले आणि सगळं बिनसलं बहुतेक.
दुसरं म्हणजे त्यांची कुलकर्णींबरोबरची पार्टनरशिप. कुलकर्णी तशाही फार उच्च दर्जाच्या चाली देत नाहीत. आणि दमलेल्या बाबाची कहाणी वगैरे तर कहर आहे. ग्लोरिफिकेशन ऑफ मिडलक्लास मीडियॉक्रिटी वगैरे वगैरे...
खऱ्यांनी शैलेश रानडेंसोबत बनवलेला पहिला अल्बम 'दिवस असे की' त्यातल्या त्यात बरा होता. निदान त्याला बेनिफिट ऑफ डाउट द्यायचं झालं तर नवखेपणाच्या इनोसन्सचं तरी देता येतं. नंतरचे सर्वच अल्बम सुमार आहेत.
खरेतर
मलाही खऱ्यांच्या कविता आवडतात.
मौनांची भाषांतरातल्या त्याच्या गंभीर कविता उत्तम आहेत. (उदा. स्थलांतराच्या कविता). त्याच्या स्वत:च्या कविता आणि त्याच्या कवितांतून डोकावणारे "बाकीबाब", क्वचित आरती प्रभू यांचे प्रभाव मला अजून मोहक वाटतात.
एखाद्या आवडीची सुरुवात व्हायला खरे, पुल अशी पापिलवार माणसेच कारण असतात. काहीजण त्यांच्यावरच समाधान पावतात, काही पुढे जातात. खरे, पुलंना सुमार म्हणणाऱ्यांची कीव येते.
ङ?
पूर्वीच्या गमभनमध्ये 'वाङ्मय' या शब्दातला ङ कसा लिहायचे? तशी सुधारणा करते.
---
वपुंबद्दल अस्वलाशी बहुतांशी सहमत; त्यानं केलेलं वर्णन फारच आवडलं. वपुंच्या एकोळी मला विनोदी वाटतात आणि विनोद करुण. फँटसीवाले, "मिस्टर भदे इज प्रेग्नंट", असले म०म०व० विनोद आता 'meh' वाटतात.
ज्या लेखक, कवी, राजकीय टीकाकार, किंवा कोणीही, ज्यांचं लेखन आवडत नाही, मतं पटत नाहीत, त्यांचा द्वेष काय करायचा! किमान हलकटपणे बोलायचं असेल तर, अबापटांसारखी प्रतिक्रिया देईन; कमाल हलकटपणा करायचा असेल तर 'नाही त्यांची पत तेवढी, त्यांचा दोष नाही त्यात', असं म्हणून मोकळी होईन. जे लोक आवडत नाहीत, किंवा ज्यांचे विचार पटत नाहीत त्यांचा द्वेष करण्यात कोणीही, स्वतःची बुद्धी आणि ऊर्जा खर्च का करावी? ज्यांना करायची त्यांना करू दे; I've a life!
स्मृतींत जपल्या
>>पेज लोड झाल्यावर गमभन ऑटोमेटिक डिफॉल्ट असायचं, ते असलं तर जास्त आवडेल.<<
गेल्या वेळी तुम्ही जी टंकनपद्धत वापरली होती ती लाॅगिन झाल्यावर डिफाॅल्ट असते. मला हे सोयीचं वाटतं, कारण ह्यात गमभन आणि बोलनागरी दोन्हींच्या वापरकर्त्यांची सोय आहे. मी बोलनागरी वापरतो.
आवडत नाही, कृती निकृष्ट द
शैली आवडत नाही, कृती निकृष्ट दर्जाच्या आहेत, अनु राव म्हणाल्या तशी भाषा कृत्रीम वगैरे वाटते आदी कारणांमुळे मला अमुक अमुक माणुस आवडत नाही असे म्हणणे ठीकच आहे. असे म्हणल्याने या व्यक्तिंच्या फॅन्सना वाईट वाटत असेल तर तो त्यांचा दोष होतो मात्र त्यांच्या फॅन्सच्या निर्बुद्धपणावरचा उतारा म्हणुन त्यांना(वपु, पुलं, खरे) एकदमच मोडीत काढणे मला तरी द्वेशातुनच आलेलं वाटतं. लोकांना आवडतं म्हणुन वाईट हा टिपिकल अभिजनवाद त्याच्या मागे आहे. त्यात आणि त्या माणसाच्या समग्र कृतींचा आढावा न घेताच हे बोलणे हे चुकीचे नाही का? कुठलीही कलाकृती अॅब्सोल्युट ग्रेट/भंगार कशी असू शकते? त्यात ज्या टिपिकल ममव पणाला शिव्या घालतात त्याच ममव पणातून हे असलं bashing येतं असं माझं मत आहे.
भारत विंडिज मॅचमध्ये
— Ali (@AleyFarooq) June 28, 2017
http://www.thehindu.com
http://www.thehindu.com/entertainment/rendering-a-historical-historic/a…
हा लेख मस्त आहे.
What then is Kannadaness? We can extend the same question to what has come to be known as “Hindi film music”. If for a moment we think what its constituents are, we realize it has nothing to do with Hindi. It is SD Burman, Naushad, Khayyam, OP Nayyar, Pankaj Mullick, Madan Mohan, and a whole lot of them who came from different parts of the country and gave Hindi film music its immortal quality. Kannadaness, similarly, is perhaps what flows into Kannada and becomes its own: the ability to hold, synthesize, and assimilate.Film music of India encapsulates the idea of India itself -- the secular and diverse fabric of the Indian consciousness.
हे विशेष आवडले.
यंदा २१ ऑगस्ट 2017 ला खग्रास ग्रहण आहे
यंदा २१ ऑगस्ट ला खग्रास ग्रहण आहे, खाली south ला दिसणार आहे, नीट बघायचे असेल तर कुठे जावे? कोणत्या ग्रुप ला कॉन्टॅक्ट करावा? कोणी (३/१४) माहिती देईल का? SC मध्ये जायचा विचार आहे..
http://www.starnetlibraries.org/2017eclipse/
आधीचे लेखन वर आणावे का ?
काही व्यावहारिक सल्ले
जिथे ढग नसतील अशा कोणत्याही ठिकाणी जाऊन ग्रहण बघा. अर्थात ग्रहणाच्या पट्ट्यातच. पट्ट्याच्या मध्याच्या जवळ गेलात तर आणखी उत्तम. ग्रहणासाठी विशेष तयारीची गरज नाही.
काही व्यावहारिक सल्ले -
१. ग्रहण बघायचंच, असं पक्कं ठरवलं असेल तर दोन-तीन ठिकाणी बघण्याची तयारी ठेवा. एका ठिकाणी ढग आले तर दुसऱ्या ठिकाणी जाण्याची तयारी असू द्या. थोडक्यात रोड ट्रिप आणि त्यासाठी आवश्यक हॉटेलांची व्यवस्था किंवा कॅरॅव्हॅन या गोष्टी. (आम्ही नॅशव्हिल, कॅन्सस सिटी आणि कॅस्पर - वायोमिंग अशा तीन ठिकाणी हॉटेलांच्या खोल्या अडवून ठेवल्या आहेत.)
जमलं तर ग्रहण बघू, अशा विचारांचे असाल तर एक ठिकाण ठरवा. तिथे ढग आले नाहीत तर उत्तमच. नाही तर ढगांच्या आडूनही चंद्राची सावली दिसण्याची शक्यता असते.
घराबाहेर पडायचा कंटाळा असेल तर फेक न्यूज माध्यमं ;-) ग्रहण टीव्हीवर दाखवतीलच. शिवाय, प्रत्यक्ष ग्रहण बघितलेलं नसेल तर काय बघायचं राहून गेलं हे समजणारच नाही. मग आनंदी आनंद गडे...!
२. आधीच ग्रँड टीटॉन आणि तत्सम निसर्गसुंदर स्थळं उन्हाळ्यात महाग असतात. त्यात ग्रहण म्हणजे तिथे कुंभमेळा भरणार. राहणं, खाणं, जाणं अशा सगळ्याच सुविधांवर ताण येणार. शिवाय ऐन वेळी ढग आले, किंवा रस्त्यात बायसन आला तर, अशा गोष्टींचा विचार करून जागा निवडा.
३. संपूर्ण ग्रहणाचा कार्यक्रम ३-४ तास चालतो. तो पूर्ण वेळ पाहणार असाल तर खाणं-पिणं आणि जाणं या गोष्टींची सोय होईल अशा जागा निवडा.
४. लवकरात लवकर, सूर्य बघण्यासाठी आवश्यक असे चष्मे विकत घ्या. ऐन वेळी काही गडबड झाल्यास ती निस्तरायला वेळ नसतो. दुर्बीण, कॅमेऱ्याचे फिल्टर अशा गोष्टी वापरणार असाल तर त्यासाठीही हीच सूचना.
आता माझ्या ग्रहणगोष्टी -
१९९९ साली, ऑगस्टमध्ये, कच्छच्या रणात आम्ही ग्रहण बघायला गेलो होतो. तिथेही ढग होतेच. खग्रास स्थिती लागायच्या वेळेस एक प्रचंड सावली आमच्या दिशेला चाल करून आल्यासारखं वाटलं. आम्ही ढगांच्या नावानं आणखी खडे फोडले. "ढगांची सावली घेऊन काय करू, लोणचं घालू!" ग्रहण दीड मिनिटांचं असणार होतं. दीड मिनीटांत लक्षात आलं, आता सावली आली तशी निघून जात्ये. म्हणजे ती सावली चंद्राची होती. त्या प्रचंड पसरलेल्या, सपाट रणात एक अनंत, काळी रेघ आपल्या दिशेनं प्रचंड वेगानं येत्ये, हा अनुभव अभूतपूर्व होता. ती सावली निघून जाताना मळभ कमी झाल्यासारखं वाटलं. हे असं ग्रहण अनुभवणं १९९५ साली ग्रहण दिसूनही जमलेलं नव्हतं.
अर्थात, तोपर्यंत एकही खग्रास ग्रहण न बघितलेल्या मैत्रांना त्या सावलीतली गंमत पुरेशी आकळली नाही.
२०१२ सालचं कंकणाकृती ग्रहण आम्ही लबक, टेक्सास या गावातून पाहणार होतो. पण ऐन वेळी सकाळी लक्षात आलं की ढगांचा हलण्याचा इरादा नाही. मग तीन तास गाडी हाकत न्यू मेक्सिकोत गेलो आणि रस्त्याच्या कडेला, एका शेताडीत हौशी लोकांचा जमाव दिसला, त्यांच्याबरोबर ग्रहण बघितलं. तिथून गाव आणि पेट्रोलपंप फार लांब नव्हते. त्यामुळे तेवढ्यापुरतं खाणं-पिणं, जाणं अशी सोय तीन तासांनंतर सहज झाली.
मला फोटो काढायची हौस असली तरी मी ग्रहणाचे फोटो न काढण्याची शक्यताच खूप. कारण एक तर एवढे चिकार लोक फोटो काढणार, मी काय नवे तीर मारणार आहे! फोटो काढलेच तर माणसांचे, किंवा पक्ष्यांच्या गंमतीजंमतींचे काढेन. शिवाय, खग्रास ग्रहण प्रत्यक्षात बघणं हा अनुभवच एवढा सुंदर असतो की फोटो काढण्याचं काम यंत्र किंवा इतर हौशी लोकांकडे द्यावं आणि आपण याचि देही याचि डोळा ग्रहणाचा लुत्फ लुटावा. मी दुर्बीणसुद्धा नेणार नाही. प्रत्यक्ष ग्रहण बघणं ही चैन माझ्यासाठी पुरेशी आहे. पण बहुदा बरा अर्था फोटो आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी जमा करेल. त्यानं २०१२ साली व्हिडिओ बनवला होता.
२०१२ सालच्या कंकणाकृती ग्रहणाच्या वेळेस ग्रहण लागलेला सूर्य अस्ताला गेला. त्या सूर्यकोरीचा व्हिडीओ बऱ्या अर्ध्यानं गेल्याच आठवड्यात एका वर्गमित्राच्या आजीला दाखवला. ७५+ वयाच्या आजीनं लगेच "ग्रहण बघितलंच पाहिजे" असं फर्मान काढलं. आता आजोबा, माझा वर्गमित्र आणि त्याचं कुटुंब सगळ्यांना ग्रहण बघायला जावंच लागेल. आजी पुरेशी डँबिस बाई वाटली!
खग्रास स्थिती असताना सूर्याकडे बघण्यासाठी फिल्टरची गरज नाही; तेव्हा फिल्टर काढूनच सूर्याकडे बघा. आणि आजूबाजूलासुद्धा बघायला विसरू नका. पण एरवी, अगदी ९९% सूर्य झाकलेला असतानाही, फिल्टरशिवाय सूर्याकडे बघू नका.
अमेरिकेतून मागचं खग्रास ग्रहण ९९ वर्षांपूर्वी दिसलं होतं. या पुढचं खग्रास ग्रहण सप्टेंबर २०२४मध्ये दिसणार आहे.
अन्य काही ऐसीकरही ग्रहण बघणार असल्याच्या धमक्या खाजगीत देतात. त्यांनीही भर घालावी.
असेच म्हणतो. एरवीही ह
असेच म्हणतो. एरवीही हरियाणा म्हणजे आनंदच, पण बुरखा चालतो तर घुंघटानेच काय घोडं मारलंय? कुणासाठी "घुंघट माय चॉईस" वगैरे असू शकत नाही का? की घुंघटवाल्या बायका फेसबुक ट्विटर इ. वापरत नसल्याने ते कळत नै? फेक अकौण्ट काढून मायघुंघटमायरूल्स अशी फेक चळवळ यशस्वी केली तर हे लिबरल्स त्याला पाठिंबाही देतील.
लिबरल लोकांनी त्यांचा क
लिबरल लोकांनी त्यांचा कशाकशाला पाठींबा नसेल याची स्पेसिफिक लिस्ट द्यावी. स्पेसिफिक लिस्ट म्हणजे आयटम्स अॅन्ड नॉट तत्व्स (प्रिंसिपल्स्). मज्जा येईल्. शिवाय का नसेल ते ही सांगावे, अजून मज्जा येईल.
===================
आयुष्यात लिबरल लोक आजूबाजूला असणं म्हणजे एक अनोखं मनोरंजन आहे.
देशात/राज्यात mbbs / md
देशात/राज्यात mbbs / md डॉक्टरांची संख्या किती असायला हवी हे कोण व कसे ठरवतात?
आजकाल कोणालाही उठून कुठेना कुठे इंजिनिअरिंग ला प्रवेश मिळू शकतो, डॉक्टरांचे तसे नसावे, कारण सीट्स कमी आहेत. पण हे सीट्स चे प्रमाण कमी असणे खरीखुरी कॉलेजसची टंचाई आहे कि सरकारने जाणूनबुजून त्या कमी ठेवल्या आहेत?
डॉक्टर होण्यासाठी भरपुर
डॉक्टर होण्यासाठी भरपुर सिटा असतात्.
सरकार कडे नविन कॉलेज्/सिटा तयार करण्यासाठी पैसा नाही त्यामुळे सरकार फारच क्वचित नविन कॉलेज चालु करते.
पण खाजगी कॉलेजेस भरपुर आहेत्.
प्रश्न सिटा किती आहेत हा नसुन, डॉकटरीचे शिक्षण खाजगी कॉलेजातुन घेण्यासाठी जो प्रचंड खर्च येतो तो देण्याची कुवत असलेला वर्ग भारतात खुप कमी आहे. तसेच फक्त बेसिक डॉक्टरी डिग्री घेउन आयटी मधल्या ट्रेनी इतके उत्पन्न पण मिळत नाही. त्यामुळे डिमांड नाही. डिमांड वाढली तर सीटा पण त्याच वेगानी वाढतील्.
आयुष्यभर तद्दन फालतू
आयुष्यभर तद्दन फालतू विषयांवर संशोधन (लेखन) करणाऱ्या मंडळींचं पोट, संसार कसा चालतो?
उदा. बॅटमनने दिलेली टीळकांवरील - मिथ ऑफ लोकमान्य - च्या लेखाकाने भयंकर संदर्भ वाचले आहेत. पण गुगलमधे त्यावर एका वाचकाचा एक कमेंट नाही. अशा पुस्तकांचा विक्रय किति असणार? मग कोण पोसतं या लोकांना?
जशास तसे
आयुष्यभर तद्दन फालतू विषयांवर संशोधन (लेखन) करणाऱ्या मंडळींचं पोट, संसार कसा चालतो?
उदा. बॅटमनने दिलेली टीळकांवरील - मिथ ऑफ लोकमान्य - च्या लेखाकाने भयंकर संदर्भ वाचले आहेत. पण गुगलमधे त्यावर एका वाचकाचा एक कमेंट नाही. अशा पुस्तकांचा विक्रय किति असणार? मग कोण पोसतं या लोकांना?
अडाणचोट प्रश्न बिकॉज ऑफ चॉईस ऑफ वर्ड्स.
सोशल मीडिया आणि
सोशल मीडिया आणि हिंदुत्वाच्या प्रचारानंतर तर मराठे भलतेच फेमस झालेले आहेत. त्याच्या अगोदरचा काळ जितका पाहिला त्यात बंगाली, कन्नड, व उत्तरेकडचे असे पाहिलेय. बंगालीभाषकांना माहिती तर असतेच (थॅंक्स टु जदुनाथ सरकार इ.) आणि मत न्यूट्रल असते. फार कै पडलेले नसते. सेम अबौट कन्नड. उत्तरेकडेही तेच. तिकडे तर अज्ञानच.
ही परिस्थिती आता झपाट्याने बदललेली आहे. मराठे हे बहुतेक भारतीयांना आज ऐकून तरी माहिती आहेत. आणि महाराज तर आहेतच आहेत. आज बहुतेक बिगरमराठी लोकांना अटकेपारवाली सिच्वेशन माहिती नसली तरी शिवाजी-औरंगजेब खुन्नस वगैरे माहिती असते.
ही प्रतिक्रिया
ही प्रतिक्रिया कुठे द्यायची या गोंधळात दोन दिवस घालवले.
भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड बरोबर जी फायनल खेळली, ती मी संपूर्ण बघितली. माझ्या मते, इंग्लंडच्या तीन मुलींना चुकीचे आऊट ठरवण्यांत आले. तिन्ही बळी झुलन गोस्वामीच्या बोलिंगवर होते. पहिला कॉट बिहाइंड द विकेट निर्णय चुकीचा होता कारण बॉलचा बॅटला स्पर्शच झाला नव्हता. दुसऱ्या आणि तिसऱ्या पायचीतच्या निर्णयामधे फारच झोल होता कारण , दोन्ही वेळेस बॅटला बॉलचा ठळक स्पर्श झाला होता. एकंदरीत, इंग्लंड विजयी झाले, तो नॅचरल जस्टिसच झाला असे वाटते.
अगदी बरोबर्
अगदी बरोबर्
निर्णयाला रिव्ह्युचा पर्याय होता, आणि त्यांनी घेतला नाही
पहिला कॅच आऊट ला एज लागली की नाही हे फलंदाजाला नीट माहित असणारच, तरी रीव्ह्यु घेतला नाही
तसेच दुसरा एल बी बॉल ट्रॅकिंगमधे पहिल्या दोन निकषांवर बाद होता आणि तिसऱ्या निकषावरही पंचांचा निर्णय दाखवत होता (जो बाद दिला गेला होता). म्हणजे आउटच निर्णय राहिला असता (दुसऱ्या एल बी ला रीव्ह्यु घेतला नव्हता पण नंतर रीप्ले मधे पाहिल्)
माझ्या मते, आपण मॅच हरलो ते स्वत्: स्वत्:चे टेन्शन वाढवुन (अनेक निर्धाव चेंडु मग एकदम चेंडुची योग्यता न ओळखता मोठे फटके मारायची घाई)
आणि मग तेच प्रेशर कसे हाताळयचे हे न कळल्याने (९२-९६ खूप सामने आणि मधे दादा कप्तान असताना काही अंतिम सामने आपण असे हरायचो)
जस्ट सम माऊज
फेलो माऊवाद्यांसाठी.
असं गॉडझिला, किंग कॉंगचंही कोणी करावं.
एक त्रुटी
दोन नंबरच्या चित्रात माऊ अंड्यातून बाहेर पडताना दाखविलेली आहे.
१. माऊ हा एक सस्तन प्राणी आहे, हे आतापावेतो सर्वज्ञात असावे.
२. डक-बिल्ड प्लॅटिपस उर्फ बदकचोचा वगळल्यास इतर बहुतांश सस्तन प्राणी हे अंडी घालत नाहीत (पक्षी: अंडे फोडून जन्मास येत नाहीत), आणि माऊ तर नाहीच नाही, हेही बहुधा सामान्यज्ञान असावे.
हं, आता माऊ नुकताच त्या अंड्याचा चट्टामट्टा करून जिभल्या चाटून मिशा पुसून चालू लागलेली असल्यास गोष्ट वेगळी.
Attractive girls....
It is rare to see this in PMT. The girl adjacent to me and two more girls from back seat are wearing tight black leggings and a white short shirt( aakhud formal shirt) as a top. They've attractive physique, light make up( office make up) and look very young... may be final year college students. It looks like it is their uniform and they may be student of some hotel management course or something similar.
I am trying to ignore this and look outside the window.
This is the starting pont of the bus, and bus is yet yo start. People are getting tickets
रस्ता / वाट (विशेषतः गाव-शहर
रस्ता / वाट (विशेषतः गाव-शहर यांच्या वस्तीतला) या अर्थाचे वेगवेगळे शब्द रुढ दिसतात.
रस्ता, मार्ग, गल्ली, पेठ, आळी, बोळ वगैरे.
रस्त्याची रुंदी, लांबी वगैरेनुसार किंवा अन्य फीचर्सनुसार वेगवेगळी संबोधनं चिकटतात का? की केवळ प्रादेशिक भाषांतला फरक ? की समानार्थी शब्दच?
याप्रमाणेच इंग्रजीतही स्ट्रीट, रोड, अव्हेन्यू, लेन, वे वगैरे शब्द असतात. त्यातही काही फरक असतो का?
अॅव्हेन्यू, स्ट्रीट वगैरे...
वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे अर्थ होऊ शकतात.
तसा मूळ अर्थ पाहायला गेले, तर अॅव्हेन्यू म्हणजे दुतर्फा झाडी असलेला रस्ता, तर स्ट्रीट म्हणजे (अनु रावांनी सुचविल्याप्रमाणे) दुतर्फा घरे/दुकाने/तत्सम इमारती असलेला रस्ता. पण न्यूयॉर्क किंवा मायॅमीसारख्या एकमेकांना काटकोनात जाणाऱ्या रस्त्यांची जाळी (ग्रिड्ज़) असणाऱ्या शहरांत या संज्ञांचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. तेथे या जाळ्यातल्या रस्त्यांपैकी जे मोठे रस्ते आहेत, त्यांपैकी पूर्वपश्चिम जाणारे ते स्ट्रीट आणि दक्षिणोत्तर जाणारे ते अॅव्हेन्यू, आजूबाजूची झाडे किंवा इमारती आणि/किंवा त्यांचा अभाव बी डॅम्ड, असे साधेसोपे गणित आहे. मग त्यांपैकी कुठलातरी एक स्ट्रीट हा क्ष अक्ष आणि कुठलातरी एक अॅव्हेन्यू हा य अक्ष मानून, त्या संदर्भअक्षापासून कितवा रस्ता आहे आणि कितव्या क्वाड्रंटात आहे, यावरून त्याचे नंबरीकरण होते. उदा. मायॅमीचे घ्या. (न्यूयॉर्कच्या ग्रिडचे क्ष/य अक्ष नक्की कोणते याची मला कल्पना नाही, मायॅमीची (स्मरणशक्ती जितपत साथ देते तितपत) थोडीफार कल्पना आहे, म्हणून मायॅमीचे उदाहरण.) तर मायॅमीत फ्लॅगलर स्ट्रीट हा क्ष अक्ष आणि मायॅमी अॅव्हेन्यू हा य अक्ष. तर, उदाहरणार्थ, फ्लॅगलर स्ट्रीटच्या दक्षिणेकडला आठवा रस्ता त्याचा तिसऱ्या क्वाड्रंटातला (यानी कि मायॅमी अॅव्हेन्यूच्या पश्चिमेकडला) भाग म्हणजे SW 8th Street, तर चौथ्या क्वाड्रंटातला (म्हणजे मायॅमी अॅव्हेन्यूच्या पूर्वेकडला) भाग हा SE 8th Street. मायॅमी अॅव्हेन्यूच्या पश्चिमेस एकशेसातावा रस्ता हा फ्लॅगलर स्ट्रीटच्या उत्तरेस NW 107th Avenue तर फ्लॅगलर स्ट्रीटच्या दक्षिणेस SW 107th Avenue. अँड सो ऑन अँड सो फोर्थ. हे झाले मोठ्या रस्त्यांचे.
याव्यतिरिक्त बारकेसारखे रस्ते/गल्ल्या/बोळ हे प्लेस/प्लाझा/कोर्ट/टेरेस/वे/ड्राइव्ह यांपैकी काही असू शकतात. (ड्राइव्ह हा क्वचित्प्रसंगी मोठा रस्ताही असू शकतो.) या बारक्यासारक्या रस्त्यांचेसुद्धा आडव्या/उभ्याप्रमाणे काही अय्यर/अय्यंगार वर्गीकरण बहुधा आहे, ते कधी काळी कोणी समजावून सांगण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता, परंतु तूर्तास ते विसरलो. असो.
कधीकधी काही रस्त्यांना नंबराबरोबर नावही असू शकते. उदा. SW 72 St. हा Sunset Dr. किंवा SW 88th St. हा Kendall Dr.सुद्धा असू शकतो. किंवा SW 8th St. हा काही भागांत Tamiami Trail तर काही भागांत Calle Ocho (उच्चारी 'काये ओचो' - स्पॅनिशमध्ये शब्दश: अर्थ 'Street Eight')-सुद्धा असू शकतो. अँड सो ऑन अँड सो फोर्थ.
तर हे झाले मायॅमी किंवा न्यूयॉर्कसारख्या बऱ्यापैकी शिस्तबद्ध ग्रिड सिस्टीम असणाऱ्या शहरांबद्दल. बाकी आमच्या मेट्रो अटलांटासारख्या (आणि त्यातही विशेषेकरून त्यातल्या परिघाबाहेरच्या/उपनगरी भागासारख्या) कोठूनही कोठेही आणि वेडेवाकडे कसेही जाणारे रस्ते असलेल्या, ग्रिडबिडला न जुमानणाऱ्या, किंबहुना ग्रिडच्या भानगडीतही न पडलेल्या किंवा शहराच्या मध्यवर्ती भागात आणि त्यातही अगदी मर्यादित प्रमाणात चुकून थोडीफार कोठे ग्रिड सापडलीच, तर ती केवळ आफ्टरथॉट म्हणून आणि अत्यंत हाफहार्टेडली तथा हॅपहॅझर्डली टाकलेल्या शहरात रस्त्यांच्या प्रकारांचे खास असे काही लॉजिक नाही. (एक तर अर्ध्याअधिक रस्त्यांचे नाव पीचट्री समथिंग-ऑर-द-अदर असते. पीचट्री स्ट्रीट, पीचट्री इंडस्ट्रियल बुलेवार्ड, पीचट्री पार्कवे, ओल्ड पीचट्री रोड, साउथ ओल्ड पीचट्री रोड - याचा ओल्ड पीचट्री रोडशी माझ्या माहितीत तरी काहीही संबंध नाही - अन् काय काय! 'त्या पीचट्री कायश्याश्या रस्त्यावर आणि वॅफल हाउसच्या समोर' हे वर्णन - वॅफल हाउस ही अनेक दक्षिणी राज्यांतून आणि इंडियानात विखुरलेली एक बऱ्यापैकी भिकार दर्जाची खाणावळमालिका आहे - तर हे वर्णन मेट्रो अटलांटात जवळपास कशालाही नाही तरी बऱ्याच कशाकशाला लागू व्हावे. शिवाय, एका पीचट्रीने दुसऱ्या पीचट्रीला काही चमत्कारिक कोनातून छेद दिला, तर अगोदरच गोंधळलेल्या एखाद्या नवख्यास अधिकच बहार यावी. तर तेही एक असो बापडे.
बाकी, बुलेवार्डचा नक्की अर्थ माहीत नाही. तेच पार्कवेबद्दल. पार्कवेचा पार्काशी किंवा पार्किंगशी काही संबंध वरकरणी तरी दृग्गोचर होत नाही. असो.
अशी अनेक मुंगसे इथे वाचावयास
अशी अनेक मुंगसे इथे वाचावयास मिळतील.



इथे वपुंचा एवढा द्वेष का
इथे वपुंचा एवढा द्वेष का केला जातो(केला तरी हरकत नाहीच पण जेन्युइनली कारण जाणून घ्यावेसे वाटते). म्हणजे वपु इतके टाकाऊ होते का? निदान दवणेंशी तुलना करावी इतके? सेम गोज अबाऊट संदिप खरे. त्याच्यावर इतकी टिका का होते इथे? त्याच्या सगळ्याच कविता फालतू आहेत का? की हे सगळे पॉप्युलर होते/आहेत म्हणून त्यांच्यावर डूख धरून असतात लोक? की जे जे लोकमान्य त्याला चांगलं म्हटलं की आपण हुच्चभ्रू राहत नाही ह्या compulsion पायी यांना वाईट साईट बोलावं लागतं?