मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८४
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----
तथाकथित उच्चं जातींचे (
तथाकथित उच्चं जातींचे ( म्हणजे ब्राह्मण आणि मराठा ) सोडून उरलेल्या ६०-६२ टक्के रयतेला बहुजनसमाज म्हणून संबोधित करण्याची पद्धत असावी . परंतु हे संबोधन तसे लूजली समाजातील प्रस्थापित व कंट्रोल असणारी लोकं सोडून इतरांना संबोधण्यासाठी वापरले जात असावे . अर्थात बऱ्याच वेळा विशेषतः राजकीय नेते हि बाऊंड्री स्वतःच्या सोयीने इकडे तिकडे हलवतात व ब्राह्मण सोडून उर्वरित जनतेला बहुजन समाज असे संबोधतात असे माझे वैयक्तिक मत ( जे चूकही असू शकते ) मला वाटते या विषयावर राही , जंतू , कोल्हटकर किंवा इतर कोणी जाणकार यांनी मत प्रदर्शित करणे जास्त योग्य .
बहुजन म्हणजे नक्की कोण?
>>मराठा आणि बहुजनसमाज म्हणजे नक्की कोण? मराठे बहुजनांत येत नाहीत का? <<
>>तथाकथित उच्चं जातींचे ( म्हणजे ब्राह्मण आणि मराठा ) सोडून उरलेल्या ६०-६२ टक्के रयतेला बहुजनसमाज म्हणून संबोधित करण्याची पद्धत असावी .<<
बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशी राम ह्यांच्या मते -
According to Mandal Commission report, there are nearly 1500 castes among the SCs, 1000 castes among the STs and 3743 castes among the OBCs. The number of such castes is more than 6000. These are all such castes which have been victims of the Manuvadi social order. Some of them have been victimized less and some have been victimized more. But the truth is that all these 6000 castes have been victims of the manuvadi social order. Should not all these castes organize together to fight against the exploitative ‘caste system’ ? Among these castes some castes are bigger and some are smaller in terms of population. If all these castes remain divided among themselves then they will remain as minorities. But if these castes organize among themselves by creating a feeling of fraternity, they can become a majority – Bahujans. These people are 85 % of country’s population and thus they constitute of a very big strength in the country.
ह्यावरून हे स्पष्ट व्हावं की जातिव्यवस्थेत स्वतःला क्षत्रिय म्हणजेच सवर्ण मानत असल्यामुळे मराठ्यांना बहुजन म्हणणं त्यांना मान्य नव्हतं.
मूळ
>>मला वाटते कि बहुजन समाज पार्टी अस्तित्वात यायच्या आधी शंभरेक वर्षांपासून हा शब्द मराठी भाषेत वापरात असावा . आणि राजकारण्यांनी तो भयानक लुजली तो वापरला आहे .<<
>>ते बहुजन हिताय म्हणजे शब्दशः अर्थ . हे बहुजन म्हणजे सामाजिक /राजकीय अर्थाने वापरले जाणारे .<<
माझ्या मते मुळात आंबेडकरांनी (कदाचित बौद्ध तत्त्वज्ञानापासून प्रेरणा घेऊन) 'बहुजन' हा शब्द मी वर दिलेल्या अर्थानं वापरायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे. आणि त्यामुळेच अनेक आंबेडकरवादी संघटनांच्या नावात 'बहुजन' असतं. उदा. भारिप-बहुजन महासंघ, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, बहुजन क्रांती मोर्चा वगैरे. नंतर संभाजी ब्रिगेड वगैरेंनी जेव्हा गरीब मराठ्याची बाजू मांडण्याचा दावा सुरू केला तेव्हा हा शब्द काबीज करण्याचा (काही प्रमाणात यशस्वी) प्रयत्न केला. त्यालाच एक प्रकारचं सामाजिक-राजकीय अप्रोप्रिएशन म्हणता येईल.
बहुजन: वि.रा. शिंदे यांचे मत
बहुजन हा शब्द विठ्ठल रामजी शिंदे यांनी पहिल्यांदा वापरला असावा. 'बहुजन' या कॅटेगरीत त्यांनी शेतकरी, शिपाई यांचा समावेश केला आहे, पण जहागीरदार व सरदारांचा समावेश केलेला नाही. त्यांच्या मते शिक्षक, उद्यमी, दुकानदार, मजूर, अस्पृश्य व स्त्रियाही 'बहुजन' वर्गाचा भाग आहेत.
http://virashinde.com/index.php/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE,-%…
आभार आणि एक प्रश्न
>>बहुजन हा शब्द विठ्ठल रामजी शिंदे यांनी पहिल्यांदा वापरला असावा. 'बहुजन' या कॅटेगरीत त्यांनी शेतकरी, शिपाई यांचा समावेश केला आहे, पण जहागीरदार व सरदारांचा समावेश केलेला नाही. त्यांच्या मते शिक्षक, उद्यमी, दुकानदार, मजूर, अस्पृश्य व स्त्रियाही 'बहुजन' वर्गाचा भाग आहेत.<<
माहितीपूर्ण आणि ससंदर्भ प्रतिसादाबद्दल आभार. पुढे ह्या शब्दाचा संदर्भ (खाली कोल्हटकर म्हणतात त्याप्रमाणे) बदलला का? नाही तर दलितांच्या संघटनांमध्ये बहुजन शब्दाचा वापर पण अन्य संदर्भात सार्वजनिक संभाषितात त्याचा अर्थसंकोच का झाला असेल?
बहुजन शब्दाचा संदर्भ
पुढे ह्या शब्दाचा संदर्भ (खाली कोल्हटकर म्हणतात त्याप्रमाणे) बदलला का? नाही तर दलितांच्या संघटनांमध्ये बहुजन शब्दाचा वापर पण अन्य संदर्भात सार्वजनिक संभाषितात त्याचा अर्थसंकोच का झाला असेल?
प्रतिसाद द्यायला उशीर झाला जरा. शब्दाचा प्रवास कसा झाला हे निश्चितपणे मलाही माहीत नाही. पण राजकीय युती जशजशा बदलत गेल्या तसतसा शब्दाचा अर्थ बदलला असणार. उदा. ब्राह्मणेतर चळवळ १९३०च्या सुमारास कॉंग्रेसमध्ये विलीन झाली. किंवा पूर्वी फुल्यांच्या दृष्टीने शूद्र (ब्राह्मणेतर सवर्ण) + अतिशूद्र (दलित)+ स्त्रिया हे शोषित होते, पण पुढे शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली शूद्रांचे क्षत्रियीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याने ही युती तुटली.
'बहुजनहिताय बहुजनसुखाय' ह्या वाक्याचा बौद्ध उगम.
बहुजनहिताय बहुजनसुखाय.
(महापरिनिब्बान सुत्त ३८, जच्चन्धवग्गो इ.) (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि आकाशवाणी ह्यांचे बोधवाक्य.)
’evaj vutte ayasma anando bhagavantaj etad avoca: 'titthatu bhante bhagava kappaj titthatu sugato kappaj bahujana-hitaya bahujana-sukhaya lokanukampaya atthaya hitaya sukhaya deva-manussanan' ti 'alaj dani ananda ma tathagataj yaci akalo dani ananda tathagataj yacanayati' महापरिनिब्बान सुत्त ३८ येथून. (मला पालीचे ज्ञान नसल्याने रोमन अक्षरात जसे मिळाले तसे येथे दाखविले आहे.)
पुढील उतार्यामध्ये तेच शब्द अन्य एका बौद्ध लिखाणात आणि देवनागरी लिपीमध्ये दिसतात. अर्थ अंदाजाने कळतो.
’एवम्पि खो आयस्मा आनन्दो भगवता ओळारिके निमित्ते कयिरमाने, ओळारिके ओभासे कयिरमाने, नासक्खि पटिविज्झितुं; न भगवन्तं याचि – ‘‘तिट्ठतु, भन्ते, भगवा कप्पं; तिट्ठतु सुगतो कप्पं बहुजनहिताय बहुजनसुखाय लोकानुकम्पाय अत्थाय हिताय सुखाय देवमनुस्सान’’न्ति, यथा तं मारेन परियुट्ठितचित्तो । दुतियम्पि खो…पे॰… ततियम्पि खो भगवा आयस्मन्तं आनन्दं आमन्तेसि।’ (जच्चन्धवग्गो आयुसङ्खारोस्सज्जनसुत्तम्.)
अभिजात संस्कृत वाङ्मयात हा शब्दप्रयोग कोठेच आढळत नाही. बौद्ध धर्माचे अलीकडील उत्थानाधर्म भारतात मागे पडल्यानंतर अलीकडच्या स्वातन्त्र्योत्तर काळातच त्याचा पुन:प्रसार झालेला दिसतो. अभिजात संस्कृत वाङ्मय वाचणार्या-लिहिणार्यांच्या विचारविश्वात बहुजनहित आणि बहुजनसुख ह्याला महत्त्वाचे स्थान नव्हते ह्याचे हे द्योतक आहे असे मला वाटते.
जे अभिजन किंवा महाजन नाहीत
जे अभिजन किंवा महाजन नाहीत ते बहुजन्. गब्बुच्या भाषेत फडतुस्.
साफ चूक.
फडतूस हा शब्द सामाजिक कॉंटेक्स्ट पेक्षा आर्थिक कॉटेक्स्ट मधून पहा. मला तो व तसा अभिप्रेत आहे.
(१) वेल्फेअर सिस्टिम मधे शून्य किंवा अत्यंत नगण्य योगदान करून सुद्धा तिच्यातून सध्या व दणकून लाभ ओरपणारे.
(२) अनेक वर्षे सरकारकडून लाभ उकळून सुद्धा स्वत:ला "उपेक्षित", "रंजलेगांजलेले", "वंचित", "आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक", "तळागाळातले" अशा निरनिराळ्या नामाभिदानांखाली प्रेझेंट करून आणखी लाभ उकळण्याचा इरादा राखणारे.
ज्यांना अभिजन कॅटेगरीत प्र
ज्यांना अभिजन कॅटेगरीत प्रवेश मिळाला नाही ते. मी तुम्हाला शब्द कुठुन आला ते सांगितले. अभिजन साठी इंग्लिश मधे "जेंट्री" शब्द आहे. बाकीच्या वर्गानी ज्यात प्रवेश मिळावा अशी आस धरावी असा क्लास्. जे लोक आस धरतात ते बहुजन्.
आता उलटे झाले आहे, अभिजनांना बहुजन होण्याचे डोहाळे लागले आहेत
कालबाह्य
>>शास्त्रीय संगीत ऐकणारे, गोल्फ खेळणारे, ऑर्गनिक फुड खाणारे हे अभिजन आणि वाट बघतोय रिक्शावालासारखी गाणे ऐकणारे, कबड्डी खेळणारे, वडापाव खाणारे, अम्मा कॅंटीनमधे जेवणारे लोक बहुजन अशी विभागणी करता येईल काय ?<<
ही व्याख्या खूप जुनी झाली आहे. जे लोकप्रिय ते टाकाऊ समजणं अभिजनांमध्ये कालबाह्य झालं ते साधारण १९६८मध्ये. अर्थात, अमेरिकेसारख्या मागास देशातून अशा व्याख्या आजही येत राहतात. पण कोलंबसोत्तर अमेरिका अभिजन कधीच नव्हती त्यामुळे त्यानं काही फरक पडत नाही.
१९६८
>>.. ते साधारण १९६८मध्ये...
हा काय संदर्भ आहे जरा सांगाल ?<<
साधारण दुसऱ्या महायुद्धानंतर खूप वेगळे विचार वाहत होते. त्यानं लोकांच्या आयुष्यात बदल केले तसेच ते इतर बाबींतही होऊ लागले. उदा. लार्किनची ही कविता पाहा. (त्यात तुमचे लाडके बीटल्सही आहेत!). लेडी चॅटर्लीला साहित्यिक मूल्य वगैरे असू शकतं हेच तेव्हाच्या ढुढ्ढाचार्यांना मान्य नव्हतं. त्या सगळ्याचा कळस १९६८मध्ये गाठला गेला. अखेर ते सगळं क्रांतीबिंती न होता मिटलं खरं, पण हे आंदोलन करणारे विद्यार्थी (म्हणजे त्यांच्यातले काही) आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले लोक पुढे जाऊन विविध ज्ञानशाखांमध्ये प्रस्थापित झाले तेव्हा त्यांनी 'पाॅप्युलर कल्चर'ला तुच्छ लेखण्याऐवजी त्याचं विश्लेषण वगैरे करायला सुरुवात केली. त्यातून अनेक निकष बदलले. आपल्याकडचे काही (अर्थात सगळे नाही - आपल्याकडे 'कोसला' १९६३साली प्रकाशित झालेली होती आणि वासुनाका १९६५मध्ये!) तथाकथित उच्चभ्रू वगैरे लोक ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ राहिले. त्याला कोण काय करणार!
अस्वस्थ वारे
साधारण १९९६/९७ साली मराठी पॉप नावाचा तथाकथित प्रकार उदयाला येत होता. बहुधा त्याची सुरुवात 'गारवा' अल्बमने झाली होती. त्याच आसपास एक 'अस्वस्थ वारे' नावाचा अल्बमही आला होता. त्यात रविंद्र साठे, महालक्ष्मी अय्यर, नंदू भेंडे, मिलिंद जोशी वगैरे पब्लिकने गायलेली गाणी होती. त्याची गाणी कुठे मिळू शकतील काय? नॉस्टॅलजिया म्हणून हवी आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे 'सकाळ'ने हा अल्बम स्पॉन्सर केला होता. मी सकाळ ऑफिसमधे जाऊन क्यासेट आणल्याचं आठवतं.
भटोबा , एक करेक्शन .
भटोबा , एक करेक्शन .
... बहुधा त्याची सुरुवात 'गारवा' अल्बमने झाली होती...
या पूर्वी , तीन पैशांचा तमाशा जोरात असताना ( १९८४ -८५ मध्ये असेल बहुधा ) आनंद मोडकांचं संगीत असलेला नंदू भेंडे , माधुरी पुरंदरे , रवींद्र साठे आणि एक कुणी तरी ( हेमा लेले .. जंतू टू कन्फर्म धिस ) यांनी गायलेला आणि (हं ) सुधीर मोघेंनी गाणी लिहिलेली .. ( अरेरे ) मराठी पॉप नावाचा अल्बम आला होता . फार प्रसिद्धी अभावी , किंवा इतर काही कारणांनी फारसा चालला नसावा . महालक्ष्मी अय्यर, मिलिंद जोशी ? इंगळे वगैरे हि मंडळी नंतरची ..
जात
जेव्हा जात विचारली जाते.
तुम्हाला कधी कोणी तुमची जात काय विचारलेय का?
शाळेत असताना शिक्षक प्रत्येकाला रोल नंबर नुसार उभं करीत आणि जात विचारत.हं जात कोणती तुझी? हिंदू-मराठा? अरे पण रजिस्टर वर कुणबी आहे!! उद्या येताना दाखला आण. जोशी म्हणजे ब्राह्मण! नाही?का?
प्राथमिक(जिल्हा परिषद) मध्ये असताना बाई म्हणत जे Sc-St असतील त्यांनी उभं राहा त्यानां कपडे आले आहेत. तेव्हा प्रश्न पडायचा त्यांनाच का आम्हाला कधी? त्या पोरांना पण तोच प्रश्न आम्हालाच का?
आम्ही शाळेत असताना खिचडी ची प्रथा नव्हती सरसकट प्लास्टिक पिशवीत तांदूळ द्यायचे. पण त्या लोकांचे पिकअप करयला रिक्षा यायची एवढा जास्त मिळायचा त्यांना! आईला विचारलं म्हणाली त्या लोकांसाठी आंबेडकरनी भारी स्कीम काढल्यात, आपल्याला नाही. ते लोक बाप्पाची पूजा नाही करत, आंबेडकर ची करतात!
कॉलेज पर्यंत जात मागे होती. लिविंग सर्टिफिकट वर जात, जात दाखला, जात पडताळणी दाखला आणि काय काय.
जातीभेद जातिभेद जे काही असतं ते लहानपणापासूनच मुलांच्या डोक्यात कोंबण्याची सुरवात शाळेत प्रवेश घेतल्यापासून होते व पुढं स्वतःच कार्ट शाळेत टाकेपर्यंत चालते!
अशानी काय घंटा समाज सुधारणा करणार आहोत आपण!!
.
.
(टीप:प्रस्तुत रडगाणे आरक्षण विरुद्ध किंवा त्याच्या बाजूने नाही)
१. मी असं विचारलं आहे कि
१. मी असं विचारलं आहे कि जातीत असं न सांगावं असं काय आहे?
=========================================================
२. "(फक्त )भटांना तसाही जात सांगायला घंट्याचा प्रॉब्लेम न्सतो." हा भटीय वा अन्यथा गोड गैरसमज असावा. अनेक 'बामन कभी न मारो' पंथाचे लोक आपल्या जातीचा खूप अभिमान बाळगून असतात. ब्राह्मणांचा कसलाच रेफरन्स न देता आपली जात फार महान आहे असे मानणारेच जास्त असतात्. त्यात काही अयोग्य नाही.
1. One should certainly
1. One should certainly respect the choice of others. But I have asked him the logic of choice not to discuss caste.
2. Pride is essential to life. Men and women constitute 100% society and all of them can have pride of their respective gender. Similarly, all the castes together constitute 100% society and all of them can have pride of their castes.
=============================
बाय द वे, ब्राह्मण ही एकच जात अभिमान करण्याजोगी/करणारी आहे हा लै स्टॉंग गैरसमज इथे दिसतो.
१. त्याच्या मते जात ही जाहीर
१. त्याच्या मते जात ही जाहीर करण्याजोगी गोष्ट नाही. त्याचे लॉजिक विचारण्यात हशील काय? उद्या वांगे का आवडत नाही विचारतील लोक.
२. हागणेही जगण्याकरिता इसेन्शिअल असते. त्यामुळे रोज कितीवेळा, कितीवाजता, किती ग्रॅम आणि कशा प्रकारे हागलो हे सांगावे काय?
बिनकामी इतरांची उलटतपास
बिनकामी इतरांची उलटतपासणी करू इच्छिणारे तुम्ही कोण?
१. जगात लॉजिक विचारायला बंदी आहे का?
२. मी त्यांना प्रश्न विचारला आहे तेव्हा (अगदी दस्तुरखुद्द तुम्हाला जरी विचारला) प्रश्न विचारण्यासच बंदी करणारे तुम्ही कोण?
=============================
यात उलटतपासणी काही नाही. "मला जात विचारली जाते." हा विषादाचा मुद्दा नसू शकत नाही का?
"काय हो, तुमच्या बायकोने
"काय हो, तुमच्या बायकोने तुमच्यावर कितिंदा चिटिंग केली आहे?" हा प्रश्न आणि
"तुमची जात काय आहे" हा प्रश्न यांत गुणात्मक फरक आहे.
===============================
जगात कोणिहि कोणासही कोणताही प्रश्न विचारावा असं मी म्हणालो नाही. जात विचारणं (आणि मे बी तुम्ही मेंशन केलेल्या चार्-पाच गोश्ह्टी ओके असाव्यात्.)
===================
रस्त्याने जाणाऱ्या रॅंडम स्त्रीला काय विचारले जाऊ शकते याचा एक व्हिडिओ.
https://www.youtube.com/watch?v=BpRhUNgKrGg&t=3s
पुण्याचाच आहे.
स्त्रीयांच्या छातिबद्दल बोलूच नये असा काहि नियम नाहि. त्याबद्दल बऱ्याच प्रकारे संवाद समाजात होतोच.
एक विशिष्ट संदर्भ असेल तर अगदी छातीचं कवतुक केलेलं चालून जावं.
स्त्रीयांच्या छातिबद्दल
स्त्रीयांच्या छातिबद्दल बोलूच नये असा काहि नियम नाहि. त्याबद्दल बऱ्याच प्रकारे संवाद समाजात होतोच.
एक विशिष्ट संदर्भ असेल तर अगदी छातीचं कवतुक केलेलं चालून जावं.
ठीक आहे, नियमाचे मला सांगू नका. स्वत: प्रयोग केल्यावर त्या स्त्रीने पोलिसात तक्रार केल्यावर दोष तिचाच हे कसे प्रूव्ह करणार तेवढे सांगा. कुठलाही प्रश्न कुणीही कुणालाही विचारू नये असा नियम नसल्यामुळे गुणात्मक फरक वगैरे तद्दन शहरी बामणी शब्द इथे शोभत नाहीत.
स्वत: प्रयोग केल्यावर त्या
स्वत: प्रयोग केल्यावर त्या स्त्रीने पोलिसात तक्रार केल्यावर दोष तिचाच हे कसे प्रूव्ह करणार तेवढे सांगा.
हा विषय समान, समांतर इ इ असतील तर अशी तक्रार करणाऱ्या माणसाने पोलिसांत का तक्रार केली नाही म्हणे? स्त्रीला छाती विचारणे आणि कोणाला जात विचारणे (किंवा बालकाला कितवित आहेस म्हणून विचारणे) यात काहीही साम्य नाही.
=====================
जात विचारणे हाच लै मोठा ऑफेन्स असेल तर भेदभावाची खाज असलेला माणूस रोज जेलमधे जाईल्. प्रत्येक माणसाला रोज अनेक नवी माणसे भेटतात्. रोज नवा माणूस याला जेलमधे टाकेल्. पण असं होत नाही. कारण इट इज नॉट अ बिग डिल्.
स्त्रीला छाती विचारणे आणि
स्त्रीला छाती विचारणे आणि कोणाला जात विचारणे (किंवा बालकाला कितवित आहेस म्हणून विचारणे) यात काहीही साम्य नाही.
साम्य तर नक्कीच आहे. जातीचा अभिमान असतो आणि अभिमानाची जगायला गरज असते त्याप्रमाणेच छाती हाही एक आवश्यक अवयव असून त्याच्या अभिमानाची जगायला गरज असते. त्यामुळे दोन अभिमानास्पद गोष्टींबद्दल प्रश्न विचारणे हे सेमच असले पाहिजे.
हा विषय समान, समांतर इ इ असतील तर अशी तक्रार करणाऱ्या माणसाने पोलिसांत का तक्रार केली नाही म्हणे?
इर्रिलेवंट. ते त्यांना जाऊन विचारा.
जात विचारणे हाच लै मोठा ऑफेन्स असेल तर भेदभावाची खाज असलेला माणूस रोज जेलमधे जाईल्. प्रत्येक माणसाला रोज अनेक नवी माणसे भेटतात्. रोज नवा माणूस याला जेलमधे टाकेल्. पण असं होत नाही. कारण इट इज नॉट अ बिग डिल्.
बर ते अॅट्रॉसिटीचं काय मग? इट इजंट अ बिग डील असंच ना?
ज्यांना अॅटॉसिटी करायची आहे
ज्यांना अॅटॉसिटी करायची आहे ते लै बेरकि असतात्. त्यांना जात विचारावी पण लागत नसते.
================
जातिआधारित अन्याय करायची पहिली पायरी जात ओळखणे आहे हे मान्य्. पण ती पहिलि पायरि म्हणजेच अॅट्रॉसिटि नव्हे. तिचा एवढा बाऊ नको. (फायर करण्याची पहिली पायरी हायर करणे असते. मग म्हणून काय हायरिंगवर टिका करायची कि काय?)
==============
जातिआधारित अन्याय करणारास शिxआ द्या, तो भाग वेगळा, पण जात विचारणे हाच जातिआधारित अन्याय हा बिनडोकपणा आहे.
जातिआधारित अन्याय करायची प
जातिआधारित अन्याय करायची पहिली पायरी जात ओळखणे आहे हे मान्य्. पण ती पहिलि पायरि म्हणजेच अॅट्रॉसिटि नव्हे. तिचा एवढा बाऊ नको. (फायर करण्याची पहिली पायरी हायर करणे असते. मग म्हणून काय हायरिंगवर टिका करायची कि काय?)
देव मानावा की नाही असल्या तद्दन भुक्कड, क्षुल्लक आणि निरर्थक गोष्टींवर तासन्तास वायफळ चर्चा करणारे जातीबद्दल आणि तिच्या बाऊबद्दल शिकवू लागलेले पाहून मजा वाटली.
जातिआधारित अन्याय करणारास शिxआ द्या, तो भाग वेगळा, पण जात विचारणे हाच जातिआधारित अन्याय हा बिनडोकपणा आहे.
जरा थोडे शब्द बदलून हेच वाक्य असे होईल:
बलात्कार करणारास शिव्या द्या, तो भाग वेगळा. पण जबरदस्ती म्हणजेच अन्याय हा बिनडोकपणा आहे.
१. का आवडत नाही तर जस्ट
१. का आवडत नाही तर जस्ट आवडत नाही असे उत्तर असेल तर प्रॉब्लेम काय आहे? सर्वांनी स्पष्टीकरण दिलंच पाहिजे हा कसला अडाणी आग्रह आहे?
२. बद्धकोष्ठ वगैरे झाला असेल तरची गोष्ट वेगळी. काय कसं काय चाल्लंय विचारताना सकाळी कसे हागलेलात असं विचारतो का कधी बॉस किंवा कलीग किंवा नातलग?
गांधीजी
२. बद्धकोष्ठ वगैरे झाला असेल तरची गोष्ट वेगळी. काय कसं काय चाल्लंय विचारताना सकाळी कसे हागलेलात असं विचारतो का कधी बॉस किंवा कलीग किंवा नातलग?
बॉस किंवा कलीगने आजतागायत विचारलेले नाही, परंतु गांधीजींना अशी सवय होती, असे कोठेतरी वाचले होते मध्यंतरी.
(बाकी, नातलगांचे म्हणाल, तर जॉइंट्ट फ्यामिली संस्कृतीशी किंवा तिचा प्रादुर्भाव असलेल्या एखाद्या जातीशी कधी पाला पडला असल्यास अशा एखाद्या नगाशी वाट क्रॉस होणे अगदीच अशक्य नाही. विशेषत: आजमितीस 'थेरडे' या क्याटेगरीत गणल्या जाऊ शकणाऱ्या आणि त्याअगोदरच्या पिढ्यांत.)
कम टू थिंक ऑफ इट...
...त्यांनी स्वत: होऊन किती 'डे' वगैरे घोषित केले असावेत (आणि त्याकरिता बस, ट्रेन, प्लेन, बोट, ट्रक, सायकल, भिंत किंवा काहीही स्वत: चालविले असावे) याबद्दल साशंक आहे. ती ड्रायडेछाप थेरे बहुधा त्यांच्या नावावर इतरच चमच्यांनी सुरू केली असावीत, अशी अटकळ आहे.
अजो, जात सांगितल्यावर समोर
अजो, जात सांगितल्यावर समोरच्याचा रिस्पॉन्स उत्तरानुसार बदलतो ना. ज्यांना निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळणार याची खात्री असते त्यांना जात सांगायला तुमच्याएवढा आनंद कसा वाटेल्? माझा एक जवळचा मित्र परळीला भाड्याने रूम बघत होता, एकजात सर्व घरमालकांनी जात विचारली. उत्तर न देता तो निघून यायचा. जिथे असा अनुभव आला नाही अश्या ठिकाणी तो राहतोय सध्या. थोडक्यात, जात विचारणे इतके किरकोळ नाहीये.
परळिला ट्रेनमधे शेजारी बस
परळिला ट्रेनमधे शेजारी बसले तरी जात सांगावी लागते. सांगणाराचा उद्देश काय ते महत्त्वाचं आहे. एवढा चांगला जोशी आडनावाचा ब्राह्मण असून मला दिल्लित ब्राह्मण लोकांनी जागा नाही दिले. वर हे सांगितले कि जोशी आडनावाचे ब्राह्मण सर्वश्रेस्ठ असतात्. त्यांना आम्ही नॉन खातो का नाही याचं उत्तर महत्त्वाचं होतं.
जात विचारणं किरकोळच आहे. थोड्या समान कल्चरचे लोक एकत्र राहतात. राहू इच्छितात्. (मराठवाड्याची मुलं सि ओ इ पीत एका रूममधे असायची.) महाराष्ट्रात मंगळवारी दाबून चिकन खातील, उत्तर भारतात हात नै लावत्. फरक पडतो. अन्यही फरक पडत असावेत्. म्हणून लोक विचारत असावेत्.
एक्झॅक्टली..
एक्झॅक्टली..
अजो, तुमचा pride वगैरे फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. जर मी खालच्या जातीचा आहे आणि मला कुणी जात विचारली तर मी अभिमानाने सांगितली काय किंवा न्-अभिमानाने, त्याने मला मिळणाऱ्या भेदभावयुक्त वागणूकीत फरक पडत नाही. शिवाय जात सांगितल्याने तोटाच होणार असेल तर अभिमान वाटेलच कसा?
मी भेटलो तुम्हाला तर नाही
मी भेटलो तुम्हाला तर नाही विचारणार !!! मास मच्छि खातो का हे पण विचारणार नाही . त्याकरिता मात्र तुमच्या गावातील मराठा क्लब मध्ये भेटायला पाहिजे . तिथे बसून कांदा भाजी आणि बटाटे वडा खाऊ ( माहित आहे ना कुठे आहे तो माजी मराठा क्लब आणि आजी बॅडमिंटन इन्स्टिट्यूट का काय ते !!! देसाईंच्या मराठा शॉप च्या गल्लीत )
बहुजन म्हणजे तीन किंवा
बहुजन म्हणजे तीन किंवा जास्त मनुष्य. मूळ शब्द संस्कृत आहे. एकवचन, द्विवचन आणि बहुवचन अशी तीन वचने त्या भाषेत आहेत. एक: जन:, द्वौ जनौ, बहव: जना: असे. सिंपल. (बहु म्हणजे सून असे असले तरी सूनेकडच्या लोकांना बहुजन म्हटल्याचे ऐकवत नाही.)
जातिआधारित अन्याय करायची प
जातिआधारित अन्याय करायची पहिली पायरी जात ओळखणे आहे हे मान्य्. पण ती पहिलि पायरि म्हणजेच अॅट्रॉसिटि नव्हे. तिचा एवढा बाऊ नको. (फायर करण्याची पहिली पायरी हायर करणे असते. मग म्हणून काय हायरिंगवर टिका करायची कि काय?)देव मानावा की नाही असल्या तद्दन भुक्कड, क्षुल्लक आणि निरर्थक गोष्टींवर तासन्तास वायफळ चर्चा करणारे जातीबद्दल आणि तिच्या बाऊबद्दल शिकवू लागलेले पाहून मजा वाटली.
जातिआधारित अन्याय करणारास शिxआ द्या, तो भाग वेगळा, पण जात विचारणे हाच जातिआधारित अन्याय हा बिनडोकपणा आहे.
जरा थोडे शब्द बदलून हेच वाक्य असे होईल:
बलात्कार करणारास शिव्या द्या, तो भाग वेगळा. पण जबरदस्ती म्हणजेच अन्याय हा बिनडोकपणा आहे.
हो, अगदि. पण इतकाहि छछोरपण करू नये कि भौतिकशास्त्राच्या परिxएत देखिल बल हा शब्द वापरणे गुन्हा मानले जावे.
मी म्हणतोय तो हा कायदा आहे
मी म्हणतोय तो हा कायदा आहे. भारतीय संविधान, आर्टिकल क्र. १५.
https://en.wikisource.org/wiki/Constitution_of_India/Part_III#Article_15...
मराठा मोर्चा आणि मूळ अर्गुमेंटचा जर संबंध असेल तर स्त्रीच्या छातीसंबंधित प्रश्न विचारण्याचाही संबंध आहे.
आणि जात विचारणे हे पवित्र कार्य आहे असे अजो मानतो. जात विचारणे हेच एकमेव महत्त्वाचे आहे असे अजोचे मत आहे. बाकी कौशल्य, स्वभाव वगैरे गेले गा च्या गा त. पण साली जात विचारलीच पायजे आणि नाय सांगितली तर घराबाहेर काढलेच पाहिजे. कळाले अजोकल्पित मत.
त्या धाग्यावर आनंदयात्री कंफ्यूज होईल.
१. The State shall not discriminate against any citizen on grounds only of religion, race, caste, sex, place of birth or any of them.
२. No citizen shall, on ground only of religion, race, caste, sex, place of birth or any of them, be subject to any disability, liability, restriction or condition with regard to -
access to shops, public restaurants, hotels and places of public entertainment; or
the use of wells, tanks, bathing ghats, roads and places of public resort maintained whole or partly out of State funds or dedicated to the use of general public.
१. बरखा दत्तचं उदाहरण दिलंच मागे. रिपिट करतो. ते प्रशासनास बंधनकारक आहे, नागरिकास नाहि.
२. २ मधे घर भाड्याने देण्याबद्दल काहि नाही.
तेव्हा राजदीप जसा सर्वधर्मसमभावाच्या तापानं फणफणतो, तसं करू नका. कंचा कायदा बियदा नाही. लिंका फेकायच्या म्हणून फेकायच्या हे अशोभनीय आहे.
=======================
शिवाय जात विचारणे चूक नाही असं मी म्हणालो आहे. त्यातलं पावित्र्य, आणि आद्यकर्तव्यता इ इ बद्दल उगाच कैपण फेकू नकात्.
लोलवा. घर भाड्याने देणे इत
लोलवा. घर भाड्याने देणे इतकीच याची व्याप्ती नसून कैक अन्य ठिकाणीही असते. तेव्हा ओव्हरसिम्प्लिफिकेशन अनपेक्षित नसले तरी दु:खदायक आहे.
शिवाय जात विचारणे चूक नाही असं मी म्हणालो आहे. त्यातलं पावित्र्य, आणि आद्यकर्तव्यता इ इ बद्दल उगाच कैपण फेकू नकात्.
जे समर्थन चालू आहे ते पाहता तेवढंच फक्त म्हणायचं बाकी राहिलंय म्हणून म्हणालो. तेवढाच तुमचा भार हलका केला तर त्याबद्दल आभार मानणं दूर वर मलाच शिव्या घालताव! खऱ्याची दुनियाच नाय ऱ्हायली भेंडी.
तेवढंच फक्त म्हणायचं
तेवढंच फक्त म्हणायचं बाकी राहिलंय
तोच तर मुद्द्दा. जे मला म्हणायचं नाही तेच मला म्हणायचं आहे असं रेटायचं. तुम्ही फक्त मला जे म्हणायचं आहे त्याचा प्रतिवाद करा. मला जात विचारायची आहे म्हणजे अॅटॉसिटि करायची आहे असं होत नाही. असं कोणी पेप्रात जातिआधारित वरवधु मागतात त्यांना देखिल म्हणत नाही. ति जाहिरात सरळ जात विचारणं आहे. आणि अगदी अति उच्चभ्रू लोकांचं. आमच्या उदगीरच्या म्हातारिचं नाहि.
मूळात तुम्हाला जात या शब्दावरून १००% फक्त निगेटिवच सुचत असेल म्हणून असं होत असेल्.
=============================
सरकारने जे डिस्क्रिमिनेशन करू नका म्हटलं आहे ते होत नाहि. जे चालेल म्हटलं आहे ते होतं. त्यात भाड्याच्या जागेचा प्रश्न नाही. उगाच लोलवू नका.
=============================
जगात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बुद्ध धर्मांच्या प्रसारामुळं स्थानिक सांस्कृतिक व्हेरियेशन्स नष्ट झाली आहेत्. भारतात किमान जातिच्या नावाखाली खूप ओरिजनल वैविध्य टिकून आहे. तुम्हाला कळत नाहि हे दु:ख्दायक आहे.
जगात हिंदू मुस्लिम ख्रिश्च
जगात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बुद्ध धर्मांच्या प्रसारामुळं स्थानिक सांस्कृतिक व्हेरियेशन्स नष्ट झाली आहेत्. भारतात किमान जातिच्या नावाखाली खूप ओरिजनल वैविध्य टिकून आहे. तुम्हाला कळत नाहि हे दु:ख्दायक आहे.
जावईशोध लावल्याबद्दल अभिनंदन. वैविध्य से नही, भेदभाव से डर लगता है.
तोच तर मुद्द्दा. जे मला म्हणायचं नाही तेच मला म्हणायचं आहे असं रेटायचं. तुम्ही फक्त मला जे म्हणायचं आहे त्याचा प्रतिवाद करा.
अजोईय लॉजिक अजोच्या अर्गुमेंटला लावलं फक्त तर इतका गुस्सा बरोबर नाही ओ.
आणि जात विचारणे हे पवित्र
आणि जात विचारणे हे पवित्र कार्य आहे असे अजो मानतो. जात विचारणे हेच एकमेव महत्त्वाचे आहे असे अजोचे मत आहे. बाकी कौशल्य, स्वभाव वगैरे गेले गा च्या गा त. पण साली जात विचारलीच पायजे आणि नाय सांगितली तर घराबाहेर काढलेच पाहिजे. कळाले अजोकल्पित मत.
आणि थोबाडाला मोठं टाळं लावणे हे पवित्र कार्य आहे असे बॅटमॅन मानतो. प्रश्न न विचारणे हेच एकमेव महत्त्वाचे आहे असे बॅटमॅनचे मत आहे. बाकी कौशल्य, स्वभाव वगैरे गेले गा च्या गा त. पण साली प्रश्न टाळलाच पायजे आणि विचारला तर घराबाहेर काढलेच पाहिजे. कळाले बॅट्कल्पित मत.
हम्म, बरा प्रयत्न आहे. पण
आणि थोबाडाला मोठं टाळं लावणे हे पवित्र कार्य आहे असे बॅटमॅन मानतो. प्रश्न न विचारणे हेच एकमेव महत्त्वाचे आहे असे बॅटमॅनचे मत आहे. बाकी कौशल्य, स्वभाव वगैरे गेले गा च्या गा त. पण साली प्रश्न टाळलाच पायजे आणि विचारला तर घराबाहेर काढलेच पाहिजे. कळाले बॅट्कल्पित मत.
अजून जरा मेहनत घ्यायला पायजे. कोंबडी पळाली च्या जागी चिकनी चमेली घालून तीच चाल ठेवल्याने मूळ तडका आहे असा उतरेल असे नाही.
हे काय पाहतो आहे मी गब्बरभाऊ...
वरचे डॉ गोडबोले 'पैशाला प्राधान्य न देता पेशंट बरा करण्याचं ध्येय आणि मनाचा मोठेपणा असल्याशिवाय हे शक्य नाही" ह्या तत्वानुसार पेशंटला परवडेल इतकीच फी पेशंटच्या स्वेच्छेने घेतात ह्या बाबीला तुम्ही टाळी वाजवलेली दिसते.
तुमचे आतापर्यंतचे जे आम्ही वाचले आहे त्यानुसार असले मोफतचे देकार देणे तुम्हाला बिलकुल मान्य नाही असे तुम्ही वारंवार सांगितले आहे. 'फडतुसांचे' असले फाजील लाड झाले नाही पाहिजेत, ज्यांना परवडते त्यांनी आपल्या पैशाने जे हवे ते विकत घ्यावे, फुकटच्याची अपेक्षा बालगू नये, त्यांना बाहेरचा रस्ता मोकळा आहे, त्यांनी दुसरे काही जमले नाही तर जरूर मरून जावे अशा प्रकारचे रोकठोक आणि कर्तव्यकठोर विचार तुम्ही आणि तुमचे अंतेवासी वेळोवेळी मांडत आले आहेत. त्या विचारांशी डॉ गोडबोलेंना तुम्ही वाजवलेली टाळी कशी बसते हे कृपया स्पष्ट करावे अशी विनंति आहे.
डॉ गोडबोलेंच्या खालीच तुम्ही प्रेसिडेंट रेगन ह्यांचे जे विचार दाखविले आहेत ते मात्र तुमच्या नेहमीच्या भूमिकेशी सुसंगत आहेत.
अवश्य.
अवश्य, काकाश्री.
(१) डॉक्टर मंडळींवर हा आरोप नेहमी केला जातो की त्यांना व्हीटॅमिन-एम रोगाची लागण झालेली आहे. माझ्या एका मित्राच्या फेबु भिंतीवर एका माणसाने तर हा आरोप केला की खाजगी डॉक्टर लोक लुटालूट करतात. त्याच्या नेमके विपरीत आहे हे डॉ. गोडबोलेंचे उदाहरण. असे अनेक लोक अनुकंपा, सेवा, कणव, परार्थ् भावनेने काम करीत असतात.
अर्थात डॉ. गोडबोले असं सुद्धा म्हणतील की कणव, परार्थ, अनुकंपा हे बडेबडे लब्ज त्यांना वापरायचे नाहीत कारण त्यांना फक्त रुग्णसेवा करायची आहे. पण ती त्यांची विनम्रताच असेल. त्याच परार्थभावनेचे आणखी एक उत्तम उदाहरण आहे. आमच्या कराड जवळ तळमावले या गावात एक डॉक्टर केतकर म्हणून आहेत्. ते सुद्धा असेच सेवाभावनेने काम करीत आहेत्. गेली अनेक दशके. सगळे डॉक्टर्स लुटालुट करतात हा आदर्शवादी-कम्-समाजवादी मंडळींनी पसरवलेला गैरसमज आहे.
(२) डॉ. गोडबोलेंचे कार्य Pro bono आहे. डॉ. गोडबोले हे स्वेच्छेने त्यांची व्यावसायिकता (बिझनेस स्ट्रॅटेजी) अंमलात आणत आहेत. त्यात त्यांना खूप फायदा होण्याची शक्यता नाही असे किमान सकृतदर्शनी दिसते. स्वेच्छेने म्हंजे त्यांना कोणीही (मुख्यत्वे सरकारने) बळजबरी केलेली नाही. यात ना फोर्स्ड्-रिडिस्ट्ऱिब्युशन आहे ना फोर्स्ड क्रॉससब्सिडायझेशन आहे. जर तोटा होतच असेल तर तो डॉ. गोडबोलेंचाच होईल व त्यांना तो स्वेच्छेने मान्य आहे. त्यामुळे ह्यात समस्या काहीच नाही. यातून पेशंट चे वेल्फेअर घडतेच. मला हीच व अशीच वेल्फेअर सिस्टिम मान्य आहे. ऐच्छीक. ( ज्यांना असं वाटतं की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मदत व्हावी ते स्वेच्छेने करतीलच व त्यांनी अवश्य करावी.)
माझी समस्या ही आहे की (अमेरिकेत काय किंवा भारतात काय किंवा ब्रिटन मधे काय्) - व्यक्तीला तिचे जीवन अनमोल वाटते. परंतु त्या अनमोल जीवनाच्या रक्षणासाठी दमड्या मोजायला व्यक्ती कांकू करते. व सरकारकरवी डॉक्टरांवर दबाव आणते किंवा औषध बनवणाऱ्या कंपन्यांवर दबाव आणते. हा दबाव म्हंजे बलप्रयोगच असतो. उदा. ब्रॅंडेड औषधे देण्याविरोधी कायदे करणे, डॉक्टरांना औषध कंपन्यांबरोबर नेगोशिएट करण्यास मज्जाव करणे, औषधांच्या किंमतीवर बंधने लावणे वगैरे.
Crux of my argument revolves around - (अ) If the patient cannot pay and if the treatment is not free-of-cost then who will pay ?, (ब्) is the payer making the payment voluntarily ?
एखादा मरीज ज्याच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत व कोणीही नातेवाईक्/मित्र् त्याला स्वेच्छेने पैसे देत नाही. असे असेल व तो गरजू असेल तर काही डॉक्टर्स व अनेकदा अनोळखी माणसे सुद्धा स्वेच्छेने पैसे देतात. पण तसे नसेल (म्हंजे कोणीही पैसे देत नसेल) तर सरकारने मधे पडून इतरांकडून बळजबरीने घेतलेल्या पैशातून त्याला वाचवण्यापेक्षा त्याने मरून जाणे हे उत्तम आहे. हा माझा मुद्दा आहे. जीवन अनमोल असेल तर - (अ) त्याने हेल्थ इन्श्युरन्स घ्यायला हवा होता, (ब्) उपचारासाठी कर्ज काढायला हवे होते - जे उपचारानंतर फेडले जाऊ शकते. (क्) सरकारने मदत करायचीच असेल तर सरकारला उपचारानंतर घसघशीत मोबदला देणार का ? (ड) अन्यथा अवश्य मरावे. फक्त मरण्यापूर्वी अंत्यसंस्काराचे पैसे बाजूला काढून ठेवावेत्.
सगळे डॉक्टर्स लुटालुट कर
सगळे डॉक्टर्स लुटालुट करतात हा आदर्शवादी-कम्-समाजवादी मंडळींनी पसरवलेला गैरसमज आहे.
नॉर्मली डॉक्टर लुटालुट अजिबात करत नाहीत्. खरेतर ते करत असलेल्या कामाचा नीट मोबदला त्यांना मिळत नाही असे माझे मत आहे.
स्पेसिफिकली आयटी मधे काम(?) करणारी लोक बघुन तर मला मोठी फी घेणारा डॉक्टर सुद्धा सेवाभावी वाटतो.
अनु राव यांच्याशी सहमत
अनु राव यांच्याशी सहमत व्हायला लागणे यासारखी वाईट गोष्ट नाही. पण सहमत आहे. विशेषत: आयटी बाबत.
(आयटी मधील नॉन* आयटी प्रोफेशनल) नितिन थत्ते
*आयटी कंपनीतल्या फंक्शनल (डोमेन नॉलेज असलेल्या) माणसांना टेक्निकल माणसापेक्षा जास्त मोबदला मिळतो याचे बऱ्याच टेक्निकल माणसांना वैषम्य असते.
नॉर्मली डॉक्टर लुटालुट
नॉर्मली डॉक्टर लुटालुट अजिबात करत नाहीत्. खरेतर ते करत असलेल्या कामाचा नीट मोबदला त्यांना मिळत नाही असे माझे मत आहे.
एकदम सहमत.
-----
यात आणखी एक मुद्दा अॅडवतो.
सर्वसामान्यपणे आदर्शवादी कम समाजवादी कम अध्यात्मवादी मंडळींचा हा नेहमी चा दावा असतो की सगळ्या गोष्टी पैशात मोजता येत नाहीत. पण त्यांचं अव्यक्त म्हणणं हे असतं की ते सोडून बाकीचे सगळे लोक सगळ्या गोष्टी पैशात मोजतात. डॉक्टर हे उत्तम उदाहरण आहे त्यांच्या मुद्द्याच्या प्रतिवादासाठी. मानवी जीवन अनमोल आहे असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे डॉक्टर ने प्राण वाचवले तर माणूस डॉक्टर च्या पाया पडायला सुद्धा तयार असतो. व म्हणून डॉक्टर लोकांना एक प्रकारचा विशेष आदर समाजात मिळतो. हा न मोजता येणारा मोबदला आहे.
अवांतर - डिग्नीटी ऑफ लेबर च्या मुद्द्याला सुद्धा ही बाब छेद देणारी आहे.
>>ना फोर्स्ड क्रॉससब्सिडाय
>>ना फोर्स्ड क्रॉससब्सिडायझेशन आहे.
गब्बर इथे चुकलेला आहे. जे लोक सर्जरीला त्यांचेकडे येतात ते* (इतर रुग्णांनी ऐच्छिक म्हणून न दिलेली) कन्सल्टिंगची फी सबसिडाइज करतात.
*आणि लाजून वाजवीपेक्षा जास्त कन्सल्टिंग फी देणारे भिडस्त पेशंट
असो. ते त्यांचे बिझिनेस मॉडेल आहे. कन्सल्टिंग फी ऐच्छिक असल्याने पेशंट बेस वाढून अधिक पेशंट सर्जरीला मिळत असतील.
sleeping over law cannot be
sleeping over law cannot be an excuse
आता ह्याचा शब्दश: अर्थ घेऊन चीरफाड करु नका.
पेशंट ला हे माहीती पाहिजे की हा डॉक्टर माझ्या कडुन जास्त पैसे घेउन दुसऱ्यांवर वापरतो आहे. जर माहिती नसेल तर तो डॉक्टरांच्या क्रॉससबसिडाइज करण्याला नंतर विरोध करु शकत नाही.
पेशंट ला ही पूर्ण अधिकार आहे दुसऱ्या डॉक्टर कडे जाण्याचा. हा सर्जरीचा धंदा काही डॉक्टर गोडबोल्यांची मोनॉपॉली नाही.
सरकार चे क्रॉससबसिडाइज करणे म्हणजे मात्र वेगळे आहे. तिथे करदात्याला दुसरा ऑप्शनच नाहीये.,
फी
जास्त फी घेणं म्हणजे लुटणं नाही, तर रुग्णाला काय झाले आहे त्याचे , तपासणी करुन निदान करणे शक्य असताना ही त्याला सर्व प्रकारच्या आवश्यक + अनावश्यक , महागड्या टेस्टस करायला लावणे. त्यातून हॉस्पिटलायझेशन झाल्यावर, आठच दिवसांपूर्वी केलेल्या सर्व चाचण्या पुन्हा करायला लावणे.
गब्बर इथे चुकलेला आहे. जे
गब्बर इथे चुकलेला आहे. जे लोक सर्जरीला त्यांचेकडे येतात ते* (इतर रुग्णांनी ऐच्छिक म्हणून न दिलेली) कन्सल्टिंगची फी सबसिडाइज करतात.
अं ... हं.
अनु ने बरोब्बर उत्तर दिलेले आहे.
(१) क्रॉससब्सिडायझेशन हे तेव्हाच होते जेव्हा मामला ऐच्छिक नसतो तेव्हा.
(२) मामला ऐच्छिक असतो तेव्हा काही वेळा ते (आनंद चित्रपटातले) रमेश देव् (डॉ. प्रकाश कुल्कर्णी) जे ललिता कुमारी सिन्हांबरोबर जे करतात ते होतं
(३) तिरशिंगरावांच्या खालील् मुद्द्याचा अंशत: प्रतिवाद (२) मधे असू शकतो.
जास्त फी घेणं म्हणजे लुटणं नाही, तर रुग्णाला काय झाले आहे त्याचे , तपासणी करुन निदान करणे शक्य असताना ही त्याला सर्व प्रकारच्या आवश्यक + अनावश्यक , महागड्या टेस्टस करायला लावणे. त्यातून हॉस्पिटलायझेशन झाल्यावर, आठच दिवसांपूर्वी केलेल्या सर्व चाचण्या पुन्हा करायला लावणे.


मराठा आणि बहुजनसमाज म्ह
मराठा आणि बहुजनसमाज म्हणजे नक्की कोण? मराठे बहुजनांत येत नाहीत का? माझ्या माहितीप्रमाणे मराठा या लेबलखाली येणाऱ्यांची संख्या (९६, ९२, कुणबी वगैरे सगळे मिळून) महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या ३५% पर्यंत आहे.