मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८०
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००पेक्षा अधिक आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----
एकेकाळी मला बॉलीवूड मधली सर्जनशीलता संपुष्टात येण्याचं स्वप्न पडायचं. तर, माझा असा प्रश्न आहे की, ती संपली आहे का?
जस्ट्फॉर्फनः करण जोहरचं विकीपान पाहिलंत तर, जवळपास अर्ध्या फिल्म्सची नावं जुन्या गाण्यांवर बेतलेली आहेत. उरलेल्या अर्ध्यांमध्ये ओके जानू, डिअर झिदगी इ. ५०%.
त्यानंतर, नवीन तम्मा तम्मा अगेन, हम्मा चं वाह्यात रिमीक्स इ. पासून जुन्या प्रेतांत पेंढा भरायचं काम फार जोमात सुरू आहे.
ह्यांचं तिच्यायला नावही वर्जिनल नाहीये.
भाषा सायंटिफिक नाही, ग्रामर
भाषा सायंटिफिक नाही, ग्रामर सायंटिफिक आहे. तेवढे सायंटिफिक आणि खोलात जाऊन रचलेले ग्रामर एकाच भाषेचे असल्याने त्या भाषेलाही सायंटिफिक म्हणतात, इतकेच.
पाणिनीने संस्कृताचे व्याकरण रचले. ते इतके काँप्रिहेन्सिव आणि अचूक आहे की लोक आजही त्याची तारीफ करतात. त्यातच अभावितपणे त्याच्या अचूकपणाचे नाते संस्कृताशी लावले जाते, इतकेच काय ते. त्यानं जर तमिळ किंवा चिनी भाषेचं व्याकरण रचलं असतं तर लोक त्या भाषांना सायंटिफिक म्हणाले असते.
बाकी ती रूपं पाठ करायची गरज ग्रीक आणि लॅटिनमध्येही आहे बरं! जे लोक ती/त्यासदृश भाषा नेटिव्हली बोलायचे त्यांना त्याची गरज नव्हती. पुढे बोलींचे स्वरूप बदलल्यावर पाठ करायची गरज भासली. आणि आजही नवीन भाषा शिकताना रूपे पाठ करणे हा एक अनिवार्य भाग आहे. तेव्हा संस्कृतातली रूपे पाठ करणे हा गुणात्मक फरक नसून प्रमाणाचा फरक आहे कारण तिथे तीन वचने, तीन लिंगे, आठ विभक्त्या, तीन काळ, त्यातही काही उप-काळ, काही अर्थ इ. आहेत. पण पुन्हा एकदा सांगतो की हे असलं सगळं प्राचीन ग्रीक आणि लॅटिनमध्येही आहे, उदाहरणादाखल इथे पहा.
प्राचीन ग्रीक विभक्ती टेबल्स.
https://en.wikipedia.org/wiki/Ancient_Greek_grammar_(tables_with_transl…
बाकी तरी कुठेय्?
इतकं injective function दुसऱ्या कुठल्याही भाषेच्या व्याकरणात असलेलं माहिती नाही.
मग ते अक्षर-उच्चार असो, शब्द- अर्थ असो किंवा काहीही.
मध्यंतरी अंध व्यक्तींसाठी असलेल्या 'स्पीच टू टेक्स्ट' प्रणालीसाठी संस्कृत ही आदर्श भाषा आहे, असं कुठेतरी वाचल्याचं स्मरतं.
तसंच 'ब्राह्मणी क्लिष्ट भाषा' म्हणून 'मृत' भाषा घोषित करा असा डाव्यांनी केलेला कांगावाही आठवतो.
जाता जाता, केनी सेबास्टिअनचा हा व्हिडीओ पहा, सामान्य मुंबईकर लोकांच्या मनात संस्कृतबद्दल काय आहे, त्याचं उत्तम प्रातिनिधीक आहे.
Why Sanskrit is Useless.
भारतीय भाषा, मोस्टली.
साध्या इंग्रजीतही फार झोल आहेत. त्यात पेपर आणि सोशल मिडीआवरून वर्षाव होत असलेलं अमेरिकन इंग्लिश, आणि शाळेत शिकवलं जाणारं ब्रिटीश, ह्यांच्यातला तिढा कायम आहे. परत त्यात शब्दांच्या फोनेटिक उच्चारांवर अडून बसलेली मंडळी दिसतात. (एडुकेशन, डिरेक्ट इत्यादी.) शिवाय सारखं स्पेलिंग आणि अर्थ भलतेच असणारे शब्दही असंख्य आहेत, हिंदी-मराठी-इंग्रजी इ. मध्ये. स्पेलिंगच्या जsरा चुकीमुळे अर्थ तिसराच निघणारेही त्यात.
सॅंपल स्पेस बऱ्यापैकी मर्यादित आहे म्हणण्यास वाव आहे. काऊंटर एक्झॅम्पल असावं, हीच आशा.
दहा दिवसांपूर्वीच मोदी सरकार
दहा दिवसांपूर्वीच मोदी सरकार आकड्यात फेरफार करते आणि पुढे काय करेल सांगता येत नाही असे फिअरमाँगरींग केले गेले होते.
अजुन एक उदाहरण असे दिसेल.
देशभरात अलरेडी हजारो कॉन्संट्रेशन कॅम्पस २०१४ पासुन सुरु झालेत त्याची संख्या दुप्पट होइल. अश्या टाइपचे. कोणी तरी स्वता हे कॅम्प बघितल्याचा दावा पण करेल.
हा तर माझा गौरव आहे.
मायावतीचं मला कौतुक वाटतं. खालच्या जातीत जन्माला आलेली, घराणेशाहीचा पाठिंबा नसलेली बाई भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री झाली. हे तिचं स्वतःचं कर्तृत्व आहे. मी मायावतीएवढी कर्तबगार नाही आणि उच्चजातीत जन्माला आल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी सहजरीत्या मिळाल्या.
Selective ... Mr.Gabbar
Selective ... Mr.Gabbar rhymed aditi and Mayavati . Hence aditi expressed her views about Mayavati .If you want the honorable PM to be praised , please ask Mr. Gabbar to rhyme his name with Aditi.I am sure aditi would oblige you, him and him. ( For your info. I start my day by his namasmaran 107 times first thing in the morning
अदितीला एरवीही याच नेमक्या
अदितीला एरवीही याच नेमक्या कारणांसाठी मोदींचं कौतुक नाही. आणि तो बाई असला असता तरी नसतं. ऋषिकेशीय लिंगनिरपेक्ष भाव लावून मोदीला बाई केलं (मला वाटतं फक्त अशी मादीमोदी ५६ इंच इ इ लाजत लाजत म्हणाली असती.) तरी अदितीला कौतुक नसतं. अदिती धार्मिक, उजवे इ इ शब्दांबद्दल भयंकर आकस आहे. केवळ एक मीराबाई त्या आकसातून वाचलीय असं माझं निरीक्षण आहे.
+१. शिवायः १. ती प्रस्थापित
+१.
शिवायः
१. ती प्रस्थापित मोठ्या पक्षाची निवड होती असं नाही. (ही मोदीची केस आहे.)
२. तिने आपल्या जातीचे (मंजे खालच्या सर्व जातींचे ) कल्याण हाच मुद्दा ठेवला.
३. स्वतःच्या लोकप्रियतेवर निवडून आली. (आंबेडकर पण काँग्रेसचे नव्हते तेव्हा हारले, मुंबै सारख्या शिकलेल्या लोकांच्या जागेत.)
४. युपीत जे जातीय राजकारण होतं त्यात मुस्लिमांनी, ब्राह्मणांनी, मुसलमानांनी आणि विखुर्लेल्या दलितांनी ती जिंकेल असं वाटावं असं काही नव्हतं.
५. ती फार काही प्रभावी वक्ता वा प्रकांड पंडित वा शिक्षित इ इ काही नव्हती.
=========================================================================
मी मायावतीएवढी कर्तबगार नाही
मायावती कर्तबगार आहे का नाही हा वादाचा प्रश्न आहे.
Mayawati was born on 15 January 1956 at Shrimati Sucheta Kriplani Hospital, New Delhi in a Hindu Dalit family.[1][2] Her father, Prabhu Das, was a post office employee at Badalpur, Gautam Buddha Nagar.[3] The sons in the family were sent to private schools, while the daughters went to "low-performing government schools".[11]
Mayawati studied for her B.A. in 1975 at the Kalindi College and obtained her LLB from the Campus Law Centre, part of the University of Delhi. She completed a B.Ed. from VMLG College, Ghaziabad, in 1976.[3] She was working as a teacher in Inderpuri JJ Colony, Delhi, and studying for the Indian Administrative Services exams, when Dalit politician Kanshi Ram visited her family home in 1977. According to biographer Ajoy Bose, Ram told her: "I can make you such a big leader one day that not one but a whole row of IAS officers will line up for your orders."[11] In 1983, Mayawati was awarded her LL.B from Delhi University. Impressed by her speaking skills and ideas, Kanshi Ram included her as a member of his team when he founded the Bahujan Samaj Party (BSP) in 1984.[12] Mayawati was first elected to Parliament in 1989.[13]
देअर इज नथिंग दलित लाइक इन हर ओन लाइफ.
=========================
आणि उच्चजातीत जन्माला आल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी सहजरीत्या मिळाल्या.
अर्थातच, पण असा काही नियम नाही.
एवीएम मशिनचा प्रोग्रामिंगचा
एवीएम मशिनचा प्रोग्रामिंगचा कोड, जो तिच्यामते बीजेपीने गंडवलाय, ती सभेत लोकांना, तिच्या टिपिकल खालीमुंडी वाचन स्टाइलने, वाचून दाखवणार.
Procedure EVMGHOL (Symbol as object, Party as Var, Voter as Var,....)
If symbol = Lotus, Exit;
If symbol = Hathi, Hathi = Lotus;
If symbol = Cycle, Cycle = Lotus;
If symbol = Anythig Else, That thing = Lotus;
If voter = Dalit and Pichhada, Count = Count + 0;
If voter = Musalman, Count = Count + 0;
Exit
आय टी कॉन्ट्रॅक्टर्स आणि एफ
आय टी कॉन्ट्रॅक्टर्स आणि एफ टी ई (फुल टायमर्स) यांमध्ये वर्तणुक/एटीकेटस च्या बाबतीत काय फरक असतात्/असायला हवे? उदाहरणार्थ वीमेन्स डे ला आम्हाला एमेल आली होती की "ज्यांना मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी व्हॉलंटीयर करा" तर मी केले. व सॅम्स क्लब मध्ये जाऊन ऑफीसच्या २ तासांत सामान आणले. इतर जण डॉलर शॉप मध्ये गेले. त्यांचेही २ तास बुडले.
त्यांना ते तास कॉम्पेनसेट करावे लागले नाहीत पण मला (कॉन्ट्रॅक्टर) लागले.
अजुन एक मागील एका कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर्सना काहीही सेलिबृएट करण्याकरता बोलवत नसत.
नाही
नाही. ते बदलले नाही. फक्त आता पूर्वी पेक्षा जास्त मेमरी वापरता येते कॉम्प्युटर ला. पूर्वी २ चा ३२ वा घात (४ गिग्ज) इतकी मेमरी अॅक्सेस करता येत असे. आता २ चा ६४ वा घात इतकी करता येते. खालच्या लिन्क वर नंबर्स पाहिले तर ४ गिगाबाइट च्या ऐवजी आता "त्यापेक्षा बरीच जास्त" करता येते (तो आकडा नक्की किती आहे किंवा कसा "म्हणायचा" ते लक्षात नाही) :)
http://www.tsm-resources.com/alists/pow2.html
अदृष्टपरीक्षा म्हणजे काय? पान
अदृष्टपरीक्षा म्हणजे काय? पान क्रमांक ३५ https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/United%20stateschi%20loksthiti…
'जनुकीय नात्याचा निर्देशांक'
'जनुकीय नात्याचा निर्देशांक' ही संकल्पना आपल्याला याचं उत्तर द्यायला उपयोगी पडते. आई-मुलगा यांच्यात ५० टक्के, आई आणि मामा यांत ५० टक्के, आणि मामा आणि त्याची मुलगी यांच्यात ५० टक्के जनुकं समान असतात. या सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर येतं १/८. म्हणजे माझ्याकडे तो वाईट जीन असेल तर माझ्या मामेबहिणीकडेही तोच जीन असण्याची शक्यता १/८. आता अशा लग्नातून होणाऱ्या संततीपैकी १/४ संततीत हा जीन दोघांकडून येईल. म्हणजे एकूण संततीच्या १/३२. म्हणजे ३ टक्के. ज्या काळात २५ टक्के मुलं लहानपणीच मरत त्यात हा आकडा लपणं शक्य आहे. त्यातही एकंदरीतच हा जीन संपूर्ण समाजात किती पसरलेला आहे त्यानुसार ही टक्केवारी अजूनच नगण्य होईल.
माहितीसाठी धन्यवाद. अजून थोडी
माहितीसाठी धन्यवाद. अजून थोडी माहिती मला इथे मिळाली https://www.dawn.com/news/1323037/cousin-marriage-triggers-disorder
The trend of marriages between cousins, within a clan or caste should be discouraged as the number of children suffering from a group of genetic diseases, called Lysosomal Storage Disorder (LSD) in medical terminology, is on the rise.
Such children do not survive more than five years if not diagnosed and treated as early as possible. Treatment of LSD changes outcome from miserable death to a near normal but it is very expensive.
कॉलिंग भडकुले
फ्रेंच जेवण मिळतं म्हणून 'आर्थर्स थीम'मध्ये गेलो होतो. जेवण चांगलं होतं, पण सर्व वेळ 'लडकी ब्युटिफुल्ल कर गयी चुल्ल' नाही तर 'बेशर्मी की हाईट', 'तम्मा तम्मा' वगैरे गाणी जोरजोरात चालू होती. तळघरात बहुधा डान्स फ्लोअर होता. जेवण करणाऱ्या कुणालाच त्याची काही अडचण होत होती असं वाटत नव्हतं. पाश्चात्य संस्कृ तीवर असा सूड उगवला म्हणून भारतीयांचा अभिमान बाळगावा, की चांगलं जेवण धड शांत जेवूसुद्धा देत नाहीत म्हणून दु:खी व्हावं? भडकुले मामी काय सल्ला द्याल्?
भडकुले मामी
भडकुले मामी
तळघरातल्या नृत्यपीठाइतकाच खोल प्रश्न आहे. पण याचं उत्तर सांस्कृतिक आणि फौडिक नसून आर्थिक आणि धांदिक आहे.
पुण्यात प्रांतिक अन्न देणारी खानावळ चालवायची तर त्या प्रांतातल्या मूळ लोकांना तिथे येण्यापासून परावृत्त करणं अतिशय गरजेचं असतं. उदा० 'खानदेश' नावाच्या खानावळीत जळगावचा माणूस चुकूनही घुसला नाही पाहिजे. 'मालवणचे कालवण' वरपायला फार्फारतर कोथ्रूडची मंडळी आली पाहिजेत. अस्सल मालवणी आला तर खानावळीची मांदेली उघडी पडेल.
मूळ फ्रेंचाला काही कळू नये म्हणून त्या हाटेलाने पदार्थांची नावंही गूढरम्य केली आहेत. 'रंगीबेरंगी ढब्बू मिरची आणि अळंबीची टमाट्याच्या जाडसर रसात केलेली भाजी' याला काही अतर्क्य कारणाने 'विक्तूरिया तीन' असं म्हणतात. 'सार्डिनिया' या पदार्थाचा सार्डिन्सशी संबंध नाही.
याच लायनीवर गाणीही फ्रेंच न लावता उलटपक्षी फ्रेंच कानांच्या आरपार जातील अशी लावतात.
त्यामुळे मूळ फ्रेंचमानव चुकून तिथे आलाच तर 'से नपा ला क्युसिने फ्रांकुआ. वा ते फेअs फूत्रा...' म्हणून त्वरित पळ काढेल. (पार्डन माय फ्रेंच.)
पुढच्या वेळी गेलात की चित्राहुती घालून मगच जेवा असं सुचवेन.
>>प्रांतिक अन्न देणारी खानावळ
>>प्रांतिक अन्न देणारी खानावळ चालवायची तर त्या प्रांतातल्या मूळ लोकांना तिथे येण्यापासून परावृत्त करणं अतिशय गरजेचं असतं
हा पाइंट एका माणसाने पूर्वी मला सांगितला होता. मराठी हाटेले उडपी किंवा पंजाबी हाटेलांसारखी यशस्वी का होत नाहीत याचं कारण "हाटेलवाला मराठी माणसाला टारगेट ठेवून मराठी हाटेल चालवतो" हे आहे असं सांगितलं होतं.
प्याट द एक्सप्याट मामी
>> मूळ फ्रेंचाला काही कळू नये म्हणून त्या हाटेलाने पदार्थांची नावंही गूढरम्य केली आहेत.
नुसती नावंच नव्हेत तर प्रत्यक्ष पदार्थही फ्रेंचाला दुग्ध्यात टाकतील. आता केजन तिकडे न्यू ऑर्लीन्समध्ये खपतही असेल फ्रेंच म्हणून, पण फ्रेंचासाठी ते पंचाईतीचं ठरतं. ह्याला फ्रेंच नाही म्हटलं तर आपण वसाहतवादी ठरतो, आणि म्हटलं तर आपल्या संस्कृतीशी गद्दारी वगैरे. बिचाऱ्या एक्सप्याटांनी काय करायचं मामी? आमच्यासोबत ते येतात तेच कसनुसं तोंड घेऊन आणि वेटरनं समोर आणून ठेवलेल्या पदार्थांना तोंडदेखलं बोट लावतात आणि भुकेले घरी परततात.
:)
मूळ फ्रेंचमानव चुकून तिथे आलाच तर 'से नपा ला क्युसिने फ्रांकुआ. वा ते फेअs फूत्रा...' म्हणून त्वरित पळ काढेल.
.......गाळीव इतिहासातलं सरवट्यांनी चितारलेलं 'तोबा तोबा, ये उर्दूसे बचाव' म्हणत पळ काढणाऱ्या मुघल सैनिकांचं नि 'पाव लगाके पळता हय के नही' म्हणत तलवार घेऊन पाठलाग करणाऱ्या मराठ्याचं चित्र आठवलं.
रँडम लिहिण्याचा धागा आहे म्हणून...
फ्रेंचमधला tres drole (उच्चारी साधारण - त्रे ध्रोल) 'फार विनोदी' हा साधारण सकारात्मक शब्दप्रयोग ऐकल्यावर मला 'ट्रोल' हा शब्द आठवतो. हल्ली मैत्रांना नावं ठेवण्यासाठी याचा सरसकट वापर सुरू केला आहे. या मैत्रांना फ्रेंच येत नाही, याची खात्री केली आहे.
माझं फ्रेंच ऐकून मूळ फ्रेंच लोक (आणि फ्रेंच अस्मिता बाळगणारे महाभाग) हातात बागेत१ धरून ('जीव मुठीत धरून'च्या चालीवर) पळतील.
१. पाव लगाके पळता हय के नही
जंतू ,
जंतू ,
जंतू आर्थर'स थिम मध्ये पहिल्यांदा ? काय हे ? ( या गुन्ह्या बद्दल फ्रेंच च्या पेप्रात ५ मार्क वजा . शिवाय तुमचे रेटिंग हुच्भ्रू पासून उच्भ्रू ला डाउन ग्रेड !!) ;)
१. कुठल्या आर्थर'स थिम मध्ये गेला होतात ? KP का बालेवाडी हाय स्ट्रीट ?
२. कोणाला खाल्लेत? ( मेरी ला का एलिझाबेथ ला ?)
३. आता हे उगाचच , म्हणजे अनुताई मोड ... आर्थर'स थिम वाल्यानी या जेवणाबरोबर कुठले संगीत वाजवावे असे तुम्हाला वाटते ? पॉप चालले असते का ?
( एका बाबतीत एकमत , भयंकर मोठ्याने लावलेली साली हि पिच्चर ची गाणी , सगळ्याच ठिकाणी रसभंग करतात , किंवा आपले वय झाले आहे )
>> जंतू आर्थर'स थिम मध्ये
>> जंतू आर्थर'स थिम मध्ये पहिल्यांदा ? काय हे ? ( या गुन्ह्या बद्दल फ्रेंच च्या पेप्रात ५ मार्क वजा . शिवाय तुमचे रेटिंग हुच्भ्रू पासून उच्भ्रू ला डाउन ग्रेड !!) ;)
'य' वर्षांपूर्वी गेलो होतो. तेव्हा तिथे ब्रॉयगेलची चित्रं लावलेली होती. उदा. -

Par Yelkrokoyade — Travail personnel, CC BY-SA 3.0, Lien
एका बाबतीत एकमत , भयंकर
एका बाबतीत एकमत , भयंकर मोठ्याने लावलेली साली हि पिच्चर ची गाणी , सगळ्याच ठिकाणी रसभंग करतात , किंवा आपले वय झाले आहे
से.बा. रस्त्यावरच्या एका हाटिलात आवाज कमी करा अशी विनंती केली असता "इतर लोक आवाज कमी आहे अशी तक्रार करतात. त्यामुळे गाण्यांचा आवाज कमी होणार नाही" असं उत्तर मिळालेलं.
>>त्यामुळे गाण्यांचा आवाज कमी
>>त्यामुळे गाण्यांचा आवाज कमी होणार नाही" असं उत्तर मिळालेलं.
कुठलं हे रेस्टो , बघायला पाहिजे यांच्याकडे ... नाव तर सांगा त्यांचं .
बादवे : फ्रोझन मंकी ( जो खरं तर पब हि नाहीये ) मध्ये आम्ही एकदा सर्व मित्र सहकुटुंब जाण्याचे पातक केले होते . एका मित्राची पत्नी हि एकाच वेळी हळुवार कविमनाची , पण त्याच वेळी खमकी शाळा शिक्षिका होती. तिथे गेल्यागेल्या डेसिबल लेव्हल ऐकून बाईंचा भडका उडाला आणि त्यांनी म्यानेजर पासून सगळ्यांची जोरदार हजेरी घेतली . त्या दिवशी फ्रोझन मंकी ने बरेच डेसिबल आणि बरेच तरुण कस्टमर गमावले . ( आम्हाला परत तिथे प्रवेश बंदी असेल बहुधा )
तात्पर्य : ढेरेशास्त्री , आवाजाचा त्रास होत असेल तर शाळा मास्तरीणीला बरोबर घेऊन जा , आवाजही कमी होईल आणि शाळामास्तरीणीच्या जाचातूनही तुमची सुटका होईल . असो.
IN FEBRUARY 1970 a 16-year
What documents at the time called “the Great Proletarian Cultural Revolutionary bugle to advance” first sounded 50 years ago, on May 16th 1966, when Mao approved a secret circular declaring war on “representatives of the bourgeoisie” who had “sneaked into the Communist Party, the government, the army and various spheres of culture”. Just over a year later Mao wrote to his wife, Jiang Qing, that he wanted to create “great disorder under heaven” so as to achieve “greater order under heaven”.
.
.
He achieved only the first. Between May 1966 and Mao’s death in 1976, which in effect ended the Cultural Revolution, over 1m died, millions more were banished from urban homes to the countryside and tens of millions were humiliated or tortured. The Communist Party does not want any public commemoration of those horrors. Though it has called the Cultural Revolution a “catastrophe”, it fears that too much scrutiny might call into question the party’s fitness to rule. But debate about it still rages on the internet in China, and even occasionally surfaces in mainstream publications.
.
.
.
.
आम्ही तुमच्यासाठी छानसं जग निर्माण करू - या संकल्पनेपायी किती मारले गेले त्याची गिनती केली तर कम्युनिझम हा विश्वाच्या इतिहासातला सर्वात मोठा दह्शतवाद म्हणायला हरकत नसावी. ते सुद्धा जेमतेम शंभर सव्वाशे वर्षांच्या कालावधीत. इस्लाम गेली अनेक शतकं परधर्मियांना मारतोय परंतू अल्पावधीतच् अचाट "कामगिरी" करून दाखवणारा कम्युनिझम एकटाच्. आणि कम्युनिझम ची ही कामगिरी भारतीय जनतेपासून दडवून ठेवणारे शिक्षणतद्न्य व समाजधुरीण-कम्-विचारवंत् त्याहून धन्य्.
सोप्पंय.
आपला वेळ, ऊर्जा, स्रोत, शांतता या सगळ्या गोष्टी बरबाद करण्यासाठी! भस्सकन आत्महत्या करणं हा गुन्हा आहे; म्हणून हळू, हळू, हळू, हळू पण नक्की जीव घेतील अशा गोष्टी कराव्यात. उदाहरणार्थ पोकळ रँटीला भाव देण्याऐवजी स्वतःसाठी व्यायाम करता येईल, किंवा झोप काढता येईल; पण स्वतःची सेवा करायचं सोडून ताण आणि रक्तदाब वाढवून घ्यायचे!
जर सोयीस्कर भूमिका घ्यायची
जर सोयीस्कर भूमिका घ्यायची असेल तर तुमच्या मताला पोकळ रॆंटीपलिकडे कोणी महत्त्व का द्यावं?
अभिनिवेशयुक्त् उचित प्रश्न विचारण्याचा केविलवाणा यत्न्.
ज्यांच्या मताला तुम्ही महत्व देता व दिलं व ज्यांच्या मतांना तुम्ही गांभीर्यानं घेतलं त्यानंतर सुद्धा तुमचे असे काय महाप्रचंड् मतपरिवर्तन झाले ??
प्रश्नाचं उत्तर अपेक्षित नाही. उत्त्तर स्वत्:ला च द्यावे हे सुचवितो.
.तर नोकरी सोडा; कोर्टानं
.तर नोकरी सोडा; कोर्टानं डॉक्टरांना सुनावलं! : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-h…
संरक्षण देण्याची सरकारची जबाबदारी सरकार पार पाडत नसताना, सरकारला जाब विचारायच्या ऐवजी हे न्यायालय डॉक्टरांना अक्कल शिकवते आहे. न्यायाधिशांना धमकी मिळाली तर लगेच झेड सिक्युरीटी घेऊन फिरतात्.
कठीण आहे सर्व्...
रोचक
न्यायालयाच्या आर्ग्युमेंटमध्ये नक्की काय चूक आहे, हे समजून घ्यावयास आवडेल.
मुख्यत:, डॉक्टरांना संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची कशी, हे कळले नाही. (कॉलिंग गब्बर.)
(न्यायाधीशांना झेड सेक्युरिटी असावी की नसावी, हा मुद्दा वैध असू शकतो, परंतु तो स्वतंत्र मुद्दा आहे. न्यायाधीशांना झेड सेक्युरिटी (ट्याक्सपेयरच्या खर्चाने हे अध्याहृत) देणे हे (तत्त्वत:) गैर आहे, हे जरी मानले, तरी त्याने 'डॉक्टरांना संरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे' हे ऑपॉप (स्वयं)सिद्ध होत नाही. तरी इतर काही आर्ग्युमेंट असल्यास कृपया कळवावे.)
बाकी, नोकरी न करण्याचा (किंवा इतर कोणती नोकरी करण्याचा) विकल्प डॉक्टरांकडे आहेच. (न्यायाधीश बनण्या-न बनण्याचा विकल्पही न्यायाधीशांकडे आहेच, आणि तो विकल्प वापरून न्यायाधीश बनण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि, प्रस्थापित व्यवस्थेस अनुसरून त्या जॉबबरोबर येणारा झेड सेक्युरिटीचा पर्कही ते उपभोगतात. यात मला काही गैर दिसत नाही. हं, आता प्रस्थापित व्यवस्था बदलून तो पर्क काढून घ्यावा किंवा कसे, हा स्वतंत्र - आणि वैध - मुद्दा असू शकतो. तो बदल करणे आपल्या कुवतीत असल्यास जरूर करावा. पण मुद्द्यांची सरमिसळ करण्यात काही हशील दिसत नाही.)
डॉक्टरांना संरक्षण देण्याची
डॉक्टरांना संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची कशी, हे कळले नाही.
हा प्रश्न किंवा खटला फक्त सरकारी हॉस्पिटलात काम करणाऱ्या डॉक्टर्स चा आहे. ( खाजगी काम करणाऱ्या डोक्टर्स चा नाही)
सरकार नी त्याच्या नोकरांची नोकरीच्या ठीकाणी सुरक्षीतता बघणे हे सरकारचे काम आहे.
?
सरकार नी त्याच्या नोकरांची नोकरीच्या ठीकाणी सुरक्षीतता बघणे हे सरकारचे काम आहे.
कौन साला ऐसे कहता है? (अर्थात, कौनसा ला - law - ऐसे कहता है?)
बोले तो, (आपल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा पुरविणे) हे सरकारचे काम आहे -पक्षी, सरकारास ते बंधनकारक आहे - असे कोणता कायदा म्हणतो, ते दाखवून द्या, नि मगच पुढचे आर्ग्युमेंट करा.
By 2084, will Islam rule the
By 2084, will Islam rule the world?
The novelist Boualem Sansal foresees the universal caliphate becoming a grim reality within the next two generations
Boualem Sansal’s prophetic novel very clearly derives its lineage from George Orwell’s Nineteen Eighty-Four. A totalitarian surveillance state, a fundamentalist religious autocracy, is portrayed as being totally intolerant of free-thinkers. This is a powerful satire on an Islamist dictatorship. It is unsurprising that Sansal’s writings are censored in his native Algeria.
The religious structure of the political state is familiar. The one true god is Yolah and his prophet or ‘Delegate’ is Abi. Abi’s book, the Gkabul, is the foundation of the religion; it is sacrosanct and immutable. Places of worship are mockbas and the nation is named Abistan after the true disciple. There are nine calls to prayer each day. An official language has been instituted, Abilang. Orwell’s Newspeak chimes in the memory.
कम्युनिझम चा नारा असाच होता
कम्युनिझम चा नारा असाच होता की. समस्त विश्वातील कामगारांनो एक व्हा व समस्त विश्वात् प्रोलेटेरियट चे सरकार यावे. कष्टकऱ्यांना न्याय मिळावा वगैरे वगैरे.
माजी कम्युनिस्ट्स् कुमार केतकर अशाच अर्थाचे अग्रलेख लोकसत्तेत लिहीत होते अगदी २००५ पर्यंत्.
नया दौर, काला पत्थर, कुली सारखे चित्रपट सुद्धा ....
रशियातले लोक् सुद्धा "कॅपितलिझाम विल कोलॅप्स्" वगैरे नारेबाजी करत होते.
...
त्याच धर्तीवर इस्लामवाद्यांनी समस्त विश्वात आपली आवडती आयडिऑलॉजी आणायचा इरादा व्यक्त केला तर बिघडले कुठे ?
नैतरी जगात त्यांचा बोलबाला आहेच्. मग मधेच हिंदूंचा मुद्दा आणून मोडता कशाला घालताय ?
Fifth Column: Hindus vs India
Fifth Column: Hindus vs India ____ तवलीन सिंग्.
First, full disclosure. I understand Hindu rage. Without being Hindu by faith I admit that it makes me very angry when I see ‘secular’ Indians use the word Hindu, mostly to say something pejorative. It makes me very angry that in the Indian schools and colleges I attended, I learned a great deal about ancient Greece, Rome and Egypt and almost nothing about ancient India. It was long after my education was supposedly complete that I first read Iqbal’s beautiful verse that celebrates the survival of India’s civilisation, when others disappeared from the world. It makes me angry that even today Indian children go to schools that teach them Indian history written by colonial historians and that they leave school knowing more about Western civilisation than their own. What I do not understand is why educated, intelligent Hindus are not using their rage to rectify these things. Why are they not building schools that are truly Indian? Why are they not building institutions of classical Indian studies and languages? Why have these not been built in states where BJP governments have ruled for decades? In these states we should by now have seen changes in school curriculums made specifically to give Indian children an idea of their magnificent civilisation and literary heritage.
अजो, या संपूर्ण लेखावर तुमचे मत द्या.....
>> It makes me very angry
>> It makes me very angry that in the Indian schools and colleges I attended, I learned a great deal about ancient Greece, Rome and Egypt and almost nothing about ancient India.
हे वाचून एकच लक्षात आलं की बाई शाळेतच गेल्या नसाव्यात भारतातल्या शाळेत गेल्या नसाव्यात. मला तरी शालेय जीवनात great deal about ancient Greece, Rome and Egypt चे शिक्षण मिळाल्याचे स्मरत नाही. आम्ही कॉंग्रेस सरकारांनी अनुदान दिलेल्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो.
परंतु हे विधान बहुतेक जुनी-राजवट-द्वेष्टे लोक बिनधास्त ठोकून देतात. अजून एक असेच ठोकून दिले जाणारे विधान म्हणजे इतिहासाच्या पुस्तकात स्वातंत्र्यलढा म्हणाजे गांधी नेहरू एवढेच शिकवले जाते. ते खोटे असल्याचेही मी विद्यासह यापूर्वीच ऐसीवरच दाखवून दिले आहे.
वास्तव
>>हे वाचून एकच लक्षात आलं की बाई भारतातल्या शाळेत गेल्या नसाव्यात.<<
हे वाचून एकच लक्षात यायला हवं होतं - १९५०साली जन्मलेल्या आणि 'डूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलेल्या बाईंचं वास्तव सरकारी अनुदानाच्या शाळेत वाढलेल्या मर्त्य माणसांपेक्षा वेगळं असतं.
(बाकी, कत्तलखाने आणि रोमियोंविरोधातल्या कारवाईबद्दल बाई काय म्हणतात त्याविषयी मतं ऐकायला आवडतील.)
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/List_of_The_Doon_School_alumni
इथे डुन स्कुलच्या टर्रेबाज माजी विद्यार्थ्यांची यादी आहे. भारतावर प्रभाव टाकायच्या पदावर यातल्या बऱ्याछ व्यक्ती होत्या. २+२ करून घ्यावे.
अजून एक असेच ठोकून दिले
अजून एक असेच ठोकून दिले जाणारे विधान म्हणजे इतिहासाच्या पुस्तकात स्वातंत्र्यलढा म्हणाजे गांधी नेहरू एवढेच शिकवले जाते. ते खोटे असल्याचेही मी विद्यासह यापूर्वीच ऐसीवरच दाखवून दिले आहे.
थत्तेचाचा, लिंक द्या ओ या प्रतिसादाची.
अगदी सहमत.
मलाही असेच आठवतेय. अगदी हडाप्पापासुन (दीर्घ सुउ ऊ उमटलाच नाही.) ते वैदिक काळ, वेद, उपनिषदे, वेदांगे, गीता, मग बुद्ध, महावीर, त्यांची तत्त्वज्नाने, मौर्य, मगध, चन्द्रगुप्त, अशोक, गुप्त कालखंड, तत्कालीन वाङमय, राष्ट्रकुउट, अजंठा-वेरुउळ, आदि शंकराचार्य, मुस्लिम आक्रमण, विजयनगर, बहामनी, चोल, चालुक्य, पुलकेशिन, हर्षवर्धन, यादव, भक्तिपंथ, वारकरी, सल्तनत, मुघल, मराठा, पेशवे, ईस्ट इंडिया कंपनी, इंग्रज, स्वातंत्र्य चळवळ, समांतर सशस्त्र चळवळ सारे काही शाळेत वेगवेगळ्या यत्तांत शिकवले होते. जुने जग, रोमन साम्राज्य, ग्रीस, ईजिप्त, धर्मयुद्धे, बाय्झंटाईन साम्राज्य, विद्येचे पुनरुज्जीवन, इस्लामचा उदय-विस्तार, फ्रेन्च राज्यक्रांति, अमेरिकन यादवी युद्ध, ब्रिटिश राजेशाही, त्यातुउन विकसित झालेली लोकशाही हेही थोडक्यात आणि नेमके-मोजके होतेच. शिवाय पुउर्वीची पाठ्यपुस्तके वर्णनात्मक, समावेशात्मक असत. ऑब्जेक्टिव नसत.
अलीकडे पाठ्यपुस्तके वाचण्याकडे कोणाचाच कल नाही. शिवाय आपापल्या आवडत्या मुद्द्यांना इतर मुद्द्यांचा बळी देऊनही का होईना, जास्त जागा मिळावी असा हट्टही असतो.
अलीकडे पाठ्यपुस्तके वाच
शिवाय आपापल्या आवडत्या मुद्द्यांना इतर मुद्द्यांचा बळी देऊनही का होईना, जास्त जागा मिळावी असा हट्टही असतो.
(१) या प्रवृत्तीस माझा फुल्ल पाठिंबा आहे. याला अॅडव्होकसी म्हणतात. यातूनच विवाद जन्माला येतात. इनजनरल बोलायचे तर विवादोत्सुक मंड्ळींपैकी जी मंडळी नवखी असतात त्यांना वस्तुनिष्ठ, निष्पक्ष, ब्यालन्स्ड, सर्वसमावेशक, अनेकांगी बहुआयामी (एकांगी च्या विरुद्ध) धाटणी/शैली/ढब चे वेड असते.
(२) माझ्या मुद्द्याच्या उलट बाजूच हट्टाने मांडायची झाली तर - जॉर्ज सोरोस म्हणतो की "dig out data to rebut your own point/argument".
'वस्तुनिष्ठ'चा अर्थ मी 'जसे
'वस्तुनिष्ठ'चा अर्थ मी 'जसे आहे तसे, वास्तवाला धरून' असा लावेन. समोर जे जे काही आहे, बाजूने किंवा विरुद्ध, ते सर्व लक्ष्यात घेऊन केलेली मांडणी नवथर कशी असेल? मग जॉर्ज सोरोस काहीही म्हणो.
एखादी संकल्पना स्फुरणे आणि ती प्रत्यक्षात आणता येते की नाही हे बघणे, अमूर्तातून मूर्ताकडे जाणे हे तर उच्च प्रतीचे संशोधन. (अलीकडे गवेषण). पण यात पूर्वग्रह नसतो. पूर्वग्रह आणि पूर्वसंकल्पना यात फरक आहे. संकल्पना ही स्फूर्तीतून येते आणि पूर्वग्रह हा दूषित-कलुषित मनातून. गढूळलेल्या मनात स्फूर्तीची वीज चमकत नसते.
कोणताही निष्कर्ष काढताना सगळे पुरावे, शक्यता तपासून तावून-सुलाखून घ्याव्यात ही संशोधनाची पद्धतच आहे. खरा संशोधक हा नेहमीच नवनव्या तथ्यांच्या शोधात असतो. आणि त्या अनुषंगाने आपले निष्कर्ष बदलायलाही. कारण कोणताही नवा पुरावा ही त्याच्यासाठी एक रोमांचक घटना असते. त्यासाठी तो आयुष्यभराची शोधकमाई टाकून द्यायलाही तयार असतो.
पूर्वग्रहवाल्यांचे असे नसते. ते हट्टी असतात आणि आपल्या मतांना घट्ट धरून ठेवतात. त्यापुरतेच पुरावे पाहातात/शोधतात. इतरांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष्य करतात. समोरच्या ढीगभर पुराव्यांतला एकच आपल्या बाजूचा असला तरीही त्याचेच ढोल बडवतात.
चर्चा
आपल्या मुद्द्याचे इतर मुद्द्यांच्या तुलनेतले कमीजास्त महत्त्व ठाउक नसताना (किंवा कमी हे ठाउक असताना बळेच) अधिकाधिक प्रकाशझोताची मागणी आणि अपेक्षा करणे ही दंडेली आणि आडदांडपणा आहे. अॅड्वोकसी नव्हे. विवादापेक्षा वावदूकपणाच वाढतो यातून. 'अभ्यासोनी प्रगटावे' हे केव्हाही चांगले.
ज्योतिष वि. ऐच्छिक विकल्प्
खरं तर कोणत्याही विष्हयात जसजसे खोल जावे तसतसे असेच लक्षात येते की आपल्याला तर काहीच् माहीत नाही. हेच् ज्योतिष या वि ष् याबद्दलही येइल त्यामुळे मी असे म्हणणार नाही की मी खूप ज्योतिष् वाचलं पण जे वाचलं व पडताळलं त्यावरुन एवढे लक्षात आले की, हे स्युडोशास्त्र "फ्री विल्" अर्थात "ऐच्छिक विकल्पाच्या" विरुद्ध आहे.
हा एक फार मोठा नकारात्मक मुद्दा आहे. आणि या मुद्द्यामुळेच या शास्त्रावरील माझा विश्वास डळमळीत झालेला आहे. किंबहुना हळूहळु उडण्याच्याच मार्गावर आहे.
स्वभाव प्रेडिक्ट कर
स्वभाव प्रेडिक्ट करण्याच्या अंगाचाच अर्थात मी थोडाफार अभ्यास केलेला. प्रेडिक्टिव्ह अॅस्ट्रॉलॉजीचा नाही. पण फ्री विलच्या अगदी विरुद्ध आणि रिजिड शास्त्र आहे असे लक्षात आले आहे.
तुमचा एखादा स्वभावविशेष हा तुम्ही हायलाईट करु शकता. प्रयत्नांती बदलू शकता हेच मुळी या शास्त्राला अमान्य आहे. आणि मानवी आयुष्ह्याची सर्वात मोठी व महत्वपूर्ण देणगी "ऐच्छिक विकल्प्" ही आहे असे मी मानते.
बरेच ग्रुप्स जॉइन केले, वाचन केले पण २ प्रकारचे लोक दिसले - (१) इन्टर्नली ड्रिव्हन (स्वेच्छेने मोटिव्हेट होणारे) व (२) एक्स्टर्नली डिव्हन (बाह्य फॅक्टर्स्वरती आरोपण करणारे) पैकी एक्स्टर्नली ड्रिव्हन लोक दैववादी, ज्योतिष्हवादी दिसतात आणि स्वत:ला लिमिट करुन घेणारे दिसतात्.
टिन एज मध्ये स्वत:ची आयडेंटिटी डिफाइन करताना अशा स्युडोशास्त्राची कुबडी घेणं एक गोष्ह्ट झाली पण आपला स्वभाव त्या शास्त्राला आयुष्ह्यभर डिफाइन करुन "देणं" , तशी परवानगी देऊन स्वत:वर मर्यादा घालून घेणं दुसरी व बौद्धिक दिवाळखोरी झाली. आणि बौद्धिक पेक्षा आत्मिक! आत्मिक का तर आपल्या मर्यादा आपण उल्लंघायचा प्रयत्न नाही करायचा तर कोणी?
__________
यावर अशी मखलाशी होऊ शकते की ज्योतिष्ह हे फक्त "कल दर्शविते", गॅरन्टी देत नाही. अशी मखलाशी काही नामवंत ज्योतिष्हि (वेस्टर्न्) करताना दिसतात्. अरे शिंच्यांनो मग आमचा कल आम्ही जाणतोच की मग तुम्हाला कसले पैसे द्यायचे? अजुन एक पाहीले आहे की काही ज्योतिष्ही (सॅम जेप्पी) म्हणतात "हे शास्त्र मेसी आहे = भोंगळ आहे, त्यात चुकांना वाव आहे." पण असे प्रांजळपणे ,मान्य केले की लोक त्या प्रांजळपणाच्या कह्यात येऊन ज्योतिष्हावर विश्वास ठेवतील असे मानणे हे नाइव्ह आहे. तसे होत नाही.
___________
१८० डिग्रीज छा अबाऊट टर्न पहाण्याची संधी आयुष्ह्याने २ दा दिली. एकदा भूत व वास्तुशास्त्र् या अंधश्रधांबाबत व पुनरपि , पुनश्च् एकदा ज्योतिष्ह या विष्हयाबद्दल्.
____________
बाय द वे ज्या ज्या ९-१०लोकांनी मला सहज म्हणुन कुंडली दाखवली त्यांची मी आभारी आहे कारण त्यांचे निरीक्षण देखिल करुन मला पडताळता आले. पैकी अॅमी, गब्बर, अभ्या बॅट्या, मनोबा, सखि हे झाले येथिल लोक्. काही घरचे लोक ज्यांचे देखिल निरीक्षण केले. काही स्वभावविशेष्ह जुळले काही नाही. पैकी जुळलेले विशेष्ह हे बाय फ्ल्युक (चुकुन्) असावेत्.
_________
ज्योतिष्ह शास्त्राचा अजुन एक पिटफॉल हा की समोरच्याला लेबल करुन, स्वत:चे विचार संकुचित व सोईस्कर करुन घेणे. मग त्यामुळे खल लोकांना सज्जन समजले जाण्याचा धोका असतो तसाच सज्जन लोकांना खल समजण्याचा. (मेए असे म्हणत नाही की जग हे ब्लॅक & व्हाईट आहे. ग्रे हा रंगही आहे.असो,)
हे आता बास झाले. अर्थात त्याचा अर्थ हा नाही की मी त्या शास्त्राविरुद्धची crusader होइन्. Everybody on his or her own.
जन्मपत्रिका
https://books.google.co.in/books?id=-aRUCAAAQBAJ&pg=PP103&lpg=PP103&dq=…
कोणतेही कर्म बुद्धि वापरून करावे असे सर्वत्र सांगितलेले दिसते. रस्त्यावर चालताना/ गाडी चालवताना अनेक चिह्ने, पाट्या दिसतात त्यानुसार मार्गक्रमण केल्यास उद्दिष्ट गाठण्याची शक्यता वाढते. पुढे वळण आहे म्हणून पाटी आहे. पाटी हे एक सावधगिरीसाठी चिह्न आहे. पाटी हेच वळण नांही. नेहमीच सावधगिरी, तारतम्य आणि सद् असद्विवेक वापरून कर्म करणे हे मानवाचे कर्तव्य. पत्रिका ऑर नो पत्रिका. कर्मातून प्राक्तन निर्माण होते. म्हणून पत्रिकेला फार महत्त्व देऊ नये.
बापरे
>>ज्योतिष्ह शास्त्राचा अजुन एक पिटफॉल हा की समोरच्याला लेबल करुन, स्वत:चे विचार संकुचित व सोईस्कर करुन घेणे. मग त्यामुळे खल लोकांना सज्जन समजले जाण्याचा धोका असतो तसाच सज्जन लोकांना खल समजण्याचा.
बापरे !! लोक असं पाहून - म्हणाजे हा अमूक राशीचा आहे म्हणजे असा असा असणार असं गृहीत धरून त्याच्याशी कसा व्यवहार करायचा हे ठरवतात?



प्रत्येक प्रकारच्या शब्दाच्या
प्रत्येक प्रकारच्या शब्दाच्या प्रत्येक विभक्तीची रूपं (आणि प्रत्येक धातूच्या प्रत्येक पुरुषाची रूपं) पाठ करायची गरज पडते अशा भाषेला लोक सायंटिफ़िक का समजतात?
की भाषा शिकण्याची ही पद्धत खंप्लीट गंडलेली आहे?
प्रश्न खोडसाळ नाही. नुकताच जेन्युइनली पडला आहे.