मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६६
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----
ही प्रतिसादमाला इथून वेगळी काढली आहे -
वर्षभर? शेतकर्यांना कोण पुरवतं फुकट पाणी? उलट पैसे मोजल्याने जास्त माज येतो. आंघोळीला शॉवर किंवा टब वापरणे, संडासात सारखे फ्लश वापरणे, लाद्या, खिडक्यांच्या ग्रिल, कार पाण्याणे धुणे, घरात स्विमिंग पुल बांधणे हे सगळे पैसे मोजुनही केले जातेच की?
तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ? जेवढे जास्त पैसे मोजले जातात तेवढा जास्त माज येतो ?? कसाकाय ??
माणूस अन्न विकत घेतो. जेवढे जास्त विकत घेतो तेवढा जास्त माज करतो ? माज करून टाकून देतो ? अपव्यय करतो ?
पैशाचा माज असणारे
पैशाचा माज असणारे हॉटेल/रेस्टॉरंटमध्ये हावरटसारखे खाद्यपदार्थ मागवून अर्धवट खाऊन उष्ट टाकताना बर्याचदा आढळतात. गिर्हाईक खाद्यपदार्थाचे पैसे मोजत असल्यामुळे अशावेळी हॉटेल/रेस्टॉरंट मालक गिर्हाईकाला समज देण्याच्या भानगडीत पडत नाही.
अहो एखाद्या माणसाने पैसे मोजून अन्न विकत घेतले व त्यातले काही सोडून दिले याचा अर्थ त्याने आपल्या खिशाला चाट लावून घेतला असा नाही का होत ?
त्याच्या खिशाला चाट पडला हीच त्याला शिक्षा नाही का ? त्याला पैशाचा माज असण्याची ?
तुम्हाला जेवढं समोर दिसतं तेवढंच घडत असतं का ? जे तुम्हाला दिसत नाही ते अस्तित्वात नसतंच का ?
एखाद्याला स्वताच्या कष्टाच्या
एखाद्याला स्वताच्या कष्टाच्या आणि कायदेशीर मार्गानी कमावलेल्या पैश्यानी गरज नसताना खूप पदार्थ मागवुन नंतर ते टाकुन द्यायला आवडत असतील. त्याला त्यात मनस्वी आनंद मिळत असेल.
तर अश्या ह्या कोणाला ही त्रास न देता मिळवलेल्या आनंदाला पण तुम्ही टोचुन टोचुन पारखे करणार का त्या साध्यासरळ माणसाला?
तुम्हाला काही माणुसकी वगैरे दिलीच नाही का हो देवानी?
पुढच्या वेळी हाटेलात जाइन तेंव्हा काही मागवताना मला फार टेंशन येणार आहे, की काही उरले आणि गोडश्यांना कळले तर ते कीती बोल लावणार आहे ह्या विचारानी.. भुकच मरेल एकदम.
म्हणजे पैशाच्या माजाने अपव्यय
म्हणजे पैशाच्या माजाने अपव्यय करतात हे तुम्हाला मान्य आहे.
अन्नाचा होणारा अपव्यय ही पैशाचा माज केल्याबद्दलची शिक्षा असते.
असा माज करणारी व्यक्ती ही स्वतःच्या माज करण्याबद्दल खुशीची गाजरं खात असते पण ते चूक असते. वस्तुस्थिती उलट असते.
वरील दोन वाक्यांमधे अतिसुलभ करून सांगितलेले मर्म जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्हास केवळ रजनिकांतच वाचवू शकतो.
हावरटसारखे खाद्यपदार्थ मागवून
पैशाचा माज असणारे हॉटेल/रेस्टॉरंटमध्ये हावरटसारखे खाद्यपदार्थ मागवून अर्धवट खाऊन उष्ट टाकताना बर्याचदा आढळतात. गिर्हाईक खाद्यपदार्थाचे पैसे मोजत असल्यामुळे अशावेळी हॉटेल/रेस्टॉरंट मालक गिर्हाईकाला समज देण्याच्या भानगडीत पडत नाही.
आपल्या गरीब देशातील या अन्नाच्या उदात्तीकरणामुळेच, ओबेसिटीचे दुष्परिणाम जाणवत आहेत. नाही हे वाक्य खरे आहे. हे टाकू नये, ते टाकू नये या आचरट आग्रहांपायीच जाडी वाढते.
!
आचरट आग्रहांमुळेही जाडी वाढते, हे विधान मान्य आहे. पण अन्नाच्या उदात्तीकरणाचा आणि लठ्ठपणाच्या समस्येच्या संबंधांमागचं सरसकटीकरण पटण्यासारखं नाही.
उदाहरणार्थ, गेल्या १० वर्षांत मी स्वतःचं वजन सरासरी १० किलो वाढवलं आहे. ह्यात ना आचरट आग्रहांचा दोष आहे ना अन्नाच्या उदात्तीकरणाचा. माझं वजन वाढलं याचं कारण मी घेतलेले चुकीचे निर्णय.
उदाहरणार्थ मी कंपनीच्या
उदाहरणार्थ मी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये जेवायला जातो तेव्हा काही पदार्थ हे स्वतःला घेऊ देत नाहीत. ते पदार्थ कॅन्टीनवाला स्वतः वाढतो. जेवणासाठी लायनीत पंधरावीस लोक आपल्यामागे उभे असताना हे कमी दे, ते कमी दे असे सांगून त्यांचा खोळंबा करणे 'दररोज' शक्य होत नाही. अशा स्थितीत 'पानात टाकायचे नाही' हा संस्कार वजनवाढीस कारणीभूत होतो.
कंटाळा विरुद्ध आरोग्य
मला आणि बऱ्या अर्ध्याला स्वयंपाक करायचा (आणि त्यापुढची आवराआवर करायचा) अतोनात कंटाळा आहे. पण विकतचं अन्न खाऊन माझ्या आरोग्याची, माझ्या शरीराची हानी मीच करून घेते हे लक्षात आल्यामुळे आम्ही कंटाळवाणा स्वयंपाक (आणि भांडी घासण्याची कामं) करतो आणि फार वेळा बाहेरचं अन्न खात नाही. बाहेरचं अन्न न खाणं, वारंवार बाहेर खायला लागल्यास त्यातल्या त्यात बरं अन्न खाणं, आरोग्यासाठी हानीकारक असणारे पदार्थ वाढणाऱ्या ठिकाणी खायला जाणंच टाळणं असे माझे पर्याय असतात.
अमेरिकेत राहून, विशेषतः बाहेर खायला गेल्यावर, 'प्रमाणात खाणं कसं जमणार' असा एक प्रश्न मला बरेचदा पडायचा. अमेरिकन संस्कृतीतच त्याचं उत्तर मिळालं. हे उत्तर भारतातही सहज मिळतं; पोट भरलं की उरलेलं अन्न डब्यात भरायचं आणि नंतर खायचं. फुकट जात नाही आणि अतिपोषणही होत नाही.
दिनक्रमात काहीही बदल न करता, फक्त खाण्याकडे लक्ष देऊन मी गेल्या साडेपाच महिन्यांत साडेतीन किलो वजन कमी केलं आहे. आणखी साडेतीन किलो वजन कमी केलं तर डॉक्टर बहुतेक 'गोल्ड स्टार' काढेल माझ्या हातावर! ;-)
अनेकदा अमका थिअरम, तमका
अनेकदा अमका थिअरम, तमका सिंड्रोम अशा छान संकल्पना असतात. ज्यामुळे आपल्याला पाल्हाळ न लावता फक्त तो कीवर्ड उच्चारला की काम फत्ते ह्ओते उदा - अॅड होमिझम वगैरे.
तशी खालील घटना/वस्तुस्थिती/संकल्पनेला काही नाव आहे का?
मी म्हटलं अमकी गोष्ट म्हणजे समुद्रात टाचणी शोधण्यासारखे आहे. दुसरा म्हणाला - अरे टाचणी काय खसखशीचा दाणा शोधण्यासारखे आहे. तरी दुसर्याच्या म्हणण्याला विशेष अर्थ रहात नाही. कारंण समुद्राचे आकारमान, व्याप्ती इतकी आहे की दोन्ही गोष्टी समान पातळीच्या अवघडच होऊन जातात.
स्टार्ट अप च्या फॅन्स साठी एक
स्टार्ट अप च्या फॅन्स साठी एक प्रश्न........
ओला किंवा उबर या टॅक्सीसेवांचे दर सध्याच्या रिक्षांच्या दरापेक्षा कमी आहेत आणि ते वातानुकूलित टॅक्सी सेवा देतात म्हणजे त्यांचा ऑपरेटिंग खर्च (व्हेरिएबल कॉस्ट) रिक्षापेक्षा जास्त असणार.
शिवाय रिक्षामधील प्रारंभीची गुंतवणूक वातानुकूलित कारपेक्षा बरीच कमी असणार (अडीच लाख वि सहा लाख). म्हणजे त्यांची कॅपिटल सर्व्हिसिंग कॉस्टसुद्धा कमी असणार.
लोकांकडून ऐकले आहे की हे ओला उबरचे टॅक्सीचालक तरीसुद्धा बराच पैसा कमावतात (महिना ५०-६० हजार रु). रिक्षा चालवण्याचा खर्च कमी आणि भाडेउत्पन्न जास्त आहे म्हणजे रिक्षाचालक याहूनही जास्त कमावत असावेत. तेव्हा रिक्षाचालक महिना ८०-९० हजार रुपये कमावत असावा (म्हणजे जवळजवळ आयटीमधील अॅव्हरेज पगाराइतका). जे काही रिक्षाचालक आसपास दिसतात त्यांपैकी कोणी आयटी व्यावसायिकाइतका श्रीमंत दिसत नाही. जे ८-१० वर्षे रिक्षाव्यवसाय करीत आहेत ते सुद्धा खूप काही माया बाळगून असलेले दिसत नाहीत.
हे काय गौडबंगाल आहे?
एक: गिर्हाइकाला कितीही कमी
एक: गिर्हाइकाला कितीही कमी दर पडला तरी चालकाला कंपनी १६ रु देतेच देते. (सर्ज प्रायसिंग लावलं तरी चालकाला जास्तीचे पैसे मिळत नाहीत. ते कंपनी ठेवते) रिक्षाचा दर प्रति कीमी १६ नाही बहुधा. सो ते एक.
दोनः प्रत्येकाला दिवसाला किमान १२ फेर्या घ्याव्याच लागतात नाहीतर कंपनी दंड करते. सो ओला/उबर वाले टाइम्पास कमी करत असावेत. आणि जनरली लोक लांबच्या अंतरासाठी ट्याक्सी करतात. सो त्यांचं रनिंगपण भरपूर होत असणार. आणि अनेक चालक दोन्ही, ओला आणि उबरवर लॉग्ड-इन असतात. सो दोन्हीच्या किमान फेर्या घ्याव्या लागून खूप टॅक्सी चालवली जात असावी.
सो .... जर ओला कंपनी हा
सो .... जर ओला कंपनी हा दरातला फरक सबसिडाइज करत असेल तर असे किती काळ चालू शकेल? पुढे जाऊन या कंपन्या इन्व्हेस्टर्सचे पैसे घेऊन आणि बँकांची लोन घेऊन बंद पडल्या तर ?
कॅपिटलिझममध्ये कंपनी धंदा करता न आल्यामुळे बंद पडणे मान्य. पण मुळातच जर बिझिनेस मॉडेल व्हाएबल नसेल तर अशा कंपन्या चालू देणे म्हणजे वेस्ट ऑफ रिसोर्सेस.
यांना बँकांनी कर्ज देऊ नये. नाहीतर अनलिमिटेड पर्सनल लाएबिलिटीवर कर्ज द्यावे.
अन्यथा आता विमानप्रवासावर सरकार सबसिडी देणार आहे तशी टॅक्सी प्रवासावर द्यावी लागेल.
सबसिडाईज करत नाहीत
उबर किंवा ओला या कंपन्या ड्रायवर लोकांना सबसिडाईज करत नाहीत. सुरुवातीला प्रमोशनल बोनस असतो (माफक बोनस आहे). एकदा बिझनेस मॉडेलची ओळख झाल्यावर हा बोनस बंद होतो. याउलट प्रत्येक फेरीतील २५ टक्के उत्पन्न उबर/ओलाला द्यावे लागते. उबर/ओला हे फक्त अॅप देतात. गाडीचा मेंटेनन्स, पोलीसांचे हप्ते, पेट्रोल-इन्शुरन्स अशी कोणतीही भानगड ओला/उबर यांना नाही.
पूर्ण सहमत. फ्लिपकार्ट याच
पूर्ण सहमत. फ्लिपकार्ट याच मार्गावर आहे. वॅल्युएशन बरच कमी झालय. नवीन गुंतवणुकदार नाही मिळतेत. क्यांपसमध्ये दिलेल्या ऑफर्सपण डिले केल्या आहेत. किराणा घरपोच देणार्या कंपन्या आणि जेवण पार्सल देणार्या काही कंपन्यापण याच मार्गावर चालल्या आहेत. पण ओला/उबर वाटत नाही की बंद पडतील. कारण त्यांची युटिलिटी नक्कीच इतर प्रकारच्या स्टार्टाप्सपेक्षा जास्तं आहे.
इथं आहे
इथं स्पष्टीकरण मिळालं.
https://www.quora.com/How-much-money-does-an-Olacab-or-Uber-driver-make…
उबर फी, मेंटेनन्स, टोल वजा जाता ड्रायवर एका किलोमीटरला १० रुपये कमावतात. दिवसाला दहा तास गाडी चालवली तर सरासरी २५० किमी होतात. म्हणजे २५०० रुपये. महिन्याला २० दिवस काम केले तर ५०००० रु. ३० दिवस केले तर ७५०००.
किती रिक्षावाले दहा तास गाडी चालवत असतात हा प्रश्नच आहे.
(शिवाय टीडीएस वगैरे प्रकार नसल्याने ट्याक्स वगैरेच्याही भानगडी नसाव्यात.)
उबर फी, मेंटेनन्स, टोल वजा
उबर फी, मेंटेनन्स, टोल वजा जाता ड्रायवर एका किलोमीटरला १० रुपये कमावतात
उबर आणि ओला चे पुण्यातले दर ८ रुपया किलोमिटर पासुन चालु होतात. सर्व जाउन एक किमी ला १० रुपये कसे मिळणार.
तसेही डीजेल गाडी असली तरी १ किमी ला ३ रुपये तर नुस्ते इंधनाचे. विमा, मेंटेनंस १ रुपया पर किमी. गाडीची कॉस्ट स्प्रेड ओव्हर वापर काढला तर ४ रुपये पर किमी.
म्हणजे पर किमी कॉस्टच ८ रुपये आहे कमीत कमी. कसे परवडते आणि ड्रायव्हर लोकांना फायदा होतो काय माहीती.
------
तसेही दिवसाला २००० रुपये फायदा होण्यासाठी, जर किमी मागे ४ रुपये मिळत असतील ( मिळतात की नाही माहीती नाही ), दर दिवशी ५०० किमी गाडी चा मिटर डाऊन पाहिजे. हे शहरात शक्य तरी आहे का?
तेच....परवडत नाही हा
तेच....
परवडत नाही हा निष्कर्ष मी रिक्षावाला जास्त पैसे घेऊनही श्रीमंत होत नाही या निरीक्षणातून काढलेले आहे.
व्हेरिएबल कॉस्टच निघत नाही असे असेल तर ते बिझिनेस मॉडेल भविषातही व्हाएबल असणार नाही.
दुसरी शक्यता..... कमी दर, भारी सर्व्हिस हे सर्व इंट्रोडक्टरी ऑफरचा भाग आहेत. नंतर या सर्व सुविधा बंद होतील. खटारा टॅक्सीज, एका टॅक्सीत सहा प्रवासी* वगैरे प्रकार कदाचित सुरू होतील.
*याची शक्यता किती ते सांगता येत नाही. पण ज्या ठिकाणी शेअर रिक्षा चालतात तिथे रिक्षावाले आणि प्रवासी यांच्यातले नाते ठीकठाक असते.
व्हेरिएबल कॉस्टच निघत नाही
व्हेरिएबल कॉस्टच निघत नाही असे असेल तर ते बिझिनेस मॉडेल भविषातही व्हाएबल असणार नाही.
दुसरी शक्यता..... कमी दर, भारी सर्व्हिस हे सर्व इंट्रोडक्टरी ऑफरचा भाग आहेत.
पण सध्याचा लॉस बेअर कोण करतय? ओला, उबेर वगैरे करत असतील तर कठीण आहे, पण वाटत तर नाही कंपन्या लॉस बेअर करतील म्हणुन.
उबर-ओला ही गब्बरछाप
उबर-ओला ही गब्बरछाप भांडवलदारांकडून स्टार्टपमध्ये इन्वेस्ट केलेले पैसे गरीब ड्रायवरांकडे वळते करण्याची समाजवादी स्कीम आहे असे समजा!
One of the most interesting features of Uber, for example, is that the drivers own their own capital and set their own hours of work and, in most ways, the conditions of that work. Uber simply allows people with their own capital to put it to work by more effectively connecting them with demanders of that service.
लॉस होत नसेल तर (समजा ९०
लॉस होत नसेल तर (समजा ९० टक्के रिक्षावाले माजखोर असतात तरी ५%) रिक्षावाले श्रीमंत का होत नाहीत ते सांगा.
-------------------------------------
किंवा कॅब कुठे आहे हे ट्रॅक केले जाऊ शकत असल्याने ओला कॅबवाल्याला पुढचे भाडे ताबडतोब मिळू शकते जे रिक्षावाल्याला मिळत नाही.
हा तर तंत्रज्ञानाचा मोठाच फायदा म्हणायला हवा.
-------------------------------------
आणखी एक शक्यता....... मुंबईच्या वेशीवर ३५ रुपये टोल द्यावा लागतो. परंतु १४०० रु महिना दराने सर्व टोलनाक्यांसाठी एकत्रित पास मिळतो. तसा तो कॅबवाला घेतो आणि प्रत्येक ग्राहकाकडून मात्र ३५ रुपये वसूल करतो. तसे असेल तर टोल हा टॅक्सीवाल्यांच्या कमाईचा स्रोत आहे असे म्हणावे लागेल.
उबर एस्टिमेटर
उबर आणि ओला चे पुण्यातले दर ८ रुपया किलोमिटर पासुन चालु होतात. सर्व जाउन एक किमी ला १० रुपये कसे मिळणार.
तसेही डीजेल गाडी असली तरी १ किमी ला ३ रुपये तर नुस्ते इंधनाचे. विमा, मेंटेनंस १ रुपया पर किमी. गाडीची कॉस्ट स्प्रेड ओव्हर वापर काढला तर ४ रुपये पर किमी.
म्हणजे पर किमी कॉस्टच ८ रुपये आहे कमीत कमी. कसे परवडते आणि ड्रायव्हर लोकांना फायदा होतो काय माहीती.
उबरवर प्रतिकिमी किंमत दाखवतात ती ग्राहकाला शेवटी द्यावी लागणारी किंमत नाही. इतक्या कमी किंमतीत रिक्षावाला पण नेत नाही.
उदा. शिवाजीनगर ते पिंपरी या १२ किमी अंतराचे एस्टिमेट काढले तर ते १८० ते २२० रुपये इतके आहे. प्रवासाची सरासरी किंमत २०० रुपये पडेल असे गृहित धरले तर पर किमी किंमत १६ रु. पडते. ही किंमत माझ्या गणिताशी मिळतीजुळती आहे.
रीक्षावाले बहुदा जास्त/
रीक्षावाले बहुदा जास्त/ लांबच्या/ खूप जवळच्या फेर्या टाळण्यात मग्न असल्याने त्यांचा जास्त वे़ळ रीक्षा स्टँडवर जात असावा.
आणि जास्त लांबची भाडी (जास्त लाभदायक) रीक्षाच्या वेगमर्यादेमुळे जास्त घेता येत नसावीत.
उदा. मर्यादीत ट्रॅफीकच्या रस्त्यावर १५-२० कीमीच्या २५-३० फेर्या दिवसभरात टॅक्सीवाला करु शकत असेल तर रीक्शावाला १५-२० फेर्या करु शकत असावा.
त्यामुळेही उत्पन्नावर परीणाम होउ शकतो.
पुण्यात सगळ्यात आधी तर ते
पुण्यात सगळ्यात आधी तर ते 'कोण-कुठे जाणार नै मंच' स्थापन होऊन एक स्टँड अप मिटिंग होते. रिक्षाचा क्रम काहीही असला तरी तुम्हाला जायचेय तिथे कोणालाच यायचे नसते. नक्की या मिटिंग्मध्ये काय बोलतात हे कळलेले नाही पण बरंच बोलुन, खाणाखुणा, तोंडातील ऐवजांच्या पिंकांचा सडा वगैरे घालून झालं की नाही कोणीच यायला तयार नाही असे उत्तर मिळाते!
यांना नक्की कुठे जायचे असते कोणास ठाऊक
एकदा तर एका रिक्षावाल्याने स्वारगेटला जायला अधिक पैसे मागितले होते कारण काय म्हणे तर तिथून रिटर्न भाडे मिळात नाही. ऐकून ह ह पुवा झालेली
श्रीमंत दिसणं अनेक घटकांवर
श्रीमंत दिसणं अनेक घटकांवर अवलंबून असतं
तो आपली मिळल्त मुळ गावी पाठवून देत सेल किंवा घरी खायची तोंड बरीच आणि तो कमावता एकटाच अशी परिस्थिती असु शकेल.
फार खाणारी तोंड नसतील तर फक्त रिक्षा चालवून घर व्यवस्थित चालवता येते + सेव्हिंङ उत्तराअयुष्याची तजवीज सगळे करता येते हे फार जवळून पाहिलंय
स्टार्ट अप च्या फॅन्स साठी
ओला उबर च्या जाहिरातीतील ५० - ६० K चे आकडे केवळ विक्रमी टोकाचे असावेत हे त्यांच्या drivers बरोबर गप्पा मारल्यावर लगेच लक्षात येते. net कमाई २० - २५ च्या वर जात नसावी.
रिक्षा चे दर चढे असले तरी technology चा फायदा मिळत नसल्याने idling आणि empty driving मुळे उत्पन्न नसावे.
रिक्षाच्या union चे नेते (अगदी डॉक्टर वगैरे असले तरीही)सुद्धा तंत्रज्ञानाच्या बाबतीत अशिक्षित असल्याने GPS इंटरनेट वगैरे वापरून कार्यक्षमता वाढवण्या पेक्षा आंदोलने करण्यात उर्जा खर्च करत असतात. स्वतः रिक्षावाले तर अडाणीच असतात. ओला त्यांना "तंत्रज्ञान संघटीत" करायचा प्रयत्न करताना दिसते. पण फार प्रतिसाद नसावा.
माझी हिरवट दरी...
याची आठवण झाली:
How Green Was My Valley is a 1939 novel by Richard Llewellyn. The title of the novel appears in two sentences. It is first used in Chapter Thirty, after the narrator has had his first sexual experience. He sits up to "... look down in the valley." He then reflects: "How green was my Valley that day, too, green and bright in the sun."
;)
बोलाची कढी म्हणावं का
बोलाची कढी म्हणावं का (असंगाशी?) संग टळल्याबद्द्ल हुश्श?
http://www.loksatta.com/desh-videsh-news/us-senate-fails-to-recognise-i…
अमेरिकेची पोलीस यंत्रणा वाटेल ती नावे पुराव्याशिवाय घालू शकते!
अमेरिकेची दहशतवादासाठी जी संशयितांची यादी आहे (आठ लाख लोक!) तिच्यात कोणाचे नाव घालताना त्या व्यक्तीला बचावाची संधी दिली जात नाही . त्यामुळे एका अर्थी पोलीस यंत्रणा मनमानी करून त्यांना वाटेल ती नावे पुराव्याशिवाय घालू शकते . या मुद्द्यावर रिपब्लिकनांनी काल डेम चे विधेयक फेटाळले . ते योग्य वाटते . आज ज्यांना दहशतवादाच्या नावाखाली विमान प्रवासाची बंदी आहे त्यांना बंदूकही घेता येऊ नये अशा जातीचे विधेयक एक "सौम्य" रिपब्लिकन बाई आणणार आहेत . काय होते बघू या !
तिकडे भेंडीवर धागा चालूआहे
तिकडे भेंडीवर धागा चालूआहे म्हणून......
मराठी माध्यमातून भौतिकशास्त्र शिकलो तेव्हा विद्युतभार तपासण्यासाठी "भेंडगोळीचा विद्युतदर्शी" असे एक उपकरण पुस्तकात दिलेले होते. लंबकाप्रमाणे दोर्याला टांगलेला गोळा असे चित्र होते. प्रत्यक्ष पहायला मिळाला नाही कधी. ती भेंडगोळी या भाजीच्या भेंडीशी संबंधित असते का?
------------------------
जव्हारला आमच्या आजीच्या घराजवळ भेंडीचे झाड म्हणून झाड होते. तशी झाडे जव्हारमध्ये इतरत्रही होती. त्याला लिंबापेक्षा छोटी हिरवी फळे लागत (त्यांचा आकार शिंगाड्यासारखा होता). आणि झाड चिंचेच्या झाडासारखे मोठे होते. त्या फळातून लेमन यलो रंगाचा स्राव निघे. तो आम्ही कागदावर चित्र रंगवायला वापरत असू. त्या फळाचा बाकी काही उपयोग कोणी करताना पाहिले नव्हते.
जव्हारखेरीज इतरत्र मी ते झाड आणि फळ पाहिलेले नाही.
इतर कोणी पाहिले आहे का?
भेंड, भेंडा, रान भेंडी
आपण उल्लेख केलेले झाड अगदी कॉमन असते. हे झाड म्हणजे माल्वासे-Malvaceae (जास्वंदीच्या) कुटुंबातले थिस्पेशिआ पॉपुल्निआ (Thespesia Populnea). ही झाडे अलीकडे खूप मोठ्या संख्येने रस्त्याच्या कडेने लावलेली दिसतात. पान मोठे, कपाशीच्या पानासारखे,(हेही मालवासे कुळातले) फूल फुलताना मोहक पिवळ्या रंगाचे आणि अंतर्भागी गडद जांभळ्यामरून रंगाचे. सुरुवातीला पाकळ्या पिवळ्या रंगाच्या असतात पण दुसर्या दिवशी गुलाबी-जांभळ्या रंगाच्या होतात. हे मध्यम उंचीचे असते. याला गोल फळे येतात. याला कित्येक ठिकाणी पॅसिफिक रोज़्वुड, इन्डिअन रोज़वूड, इन्डिअन कॉर्क ट्री, पोर्शिआ ट्री म्हटले आहे. मराठीत याला पारस भेंडी, पारोसा पिंपळ, पिंपरणी असेही म्हणतात. ह्याच्या कोवळ्या फळांतून पिवळसर द्राव सरतो.
बाकी रान भेंडी या मराठी नावाचा बॉटनिकल नॉमेन्क्लेचर फार गोंधळाचा आहे. Abelmoschus Ficulneus, Hibiscus Ficulneus, Malachra Capitata ह्या आणखी काही प्रजाति वेगवेगळ्या प्रदेशांत रान भेंडी, जंगली भेंडी म्हणून ओळखल्या जातात.
बेहड्यालाही भेड, भेंड असे काही ठिकाणी म्हणतात. शास्त्रीय नाव टर्मिनालिया बेलिरिका (Terminalia Bellirica) असे आहे. आवळा, बेहडा आणि हिरडा/हरडा ही तीन फळे त्रिफळा चूर्णात वापरतात. बेहडा सारक असतो. याची फळे लिंबापेक्षा लहान परंतु गोल गरगरीत नसतात. थोडीशी ओवल आणि किंचित टोक असलेली; निरीक्षण केले तर कळतील न कळतील अशा पाच पृष्ठभागांच्या पट्ट्या असलेली असतात. हे झाड मोठे होते.
धन्यवाद.पारोसा पिंपळ याचे
धन्यवाद.
पारोसा पिंपळ याचे चित्र मी पाहिलेल्या भेंडीच्या फळांशी जुळते आहे. पण तिथे त्या झाडाला पारोसा पिंपळ म्हणत नसत.
त्या फळातून पिवळा रंग निघे. त्याबरोबर ते फळ बर्यापैकी कडक (सुपारीच्या शहाळ्याइतपत) असल्यामुळे ते आम्ही डोक्यावर टण्णू मारण्यासाठी वापरत असू.
भेंड आणि रानभेंडी
नितिन थत्ते आणि सुमी,
भेंड हा मध्यम उंचीचा वृक्ष असतो. फुले सुंदर असली तरी दाट नसतात. हे झाड फुलांनी अगदी लहडून असे जात नाही. पर्णसंभारही (कॅनॉपी) भव्य नसतो. थोडक्यात हे झाड फार आकर्षक नसते. वड पिंपळ उंबर या वृक्षांप्रमाणेच याचीही मुद्दाम लागवड (कल्टिवेशन) होत नाही. अलीकडे रस्त्यांच्या कडेने लावतात.
रानभेंडी हे एक झुडूप असते. शेताच्या बांधावर उगवते आणि शेताला गायबकर्यांपासून संरक्षण म्हणून उपयोगी पडते.
अतिशय हलक्या वजनाच्या लाकडी
अतिशय हलक्या वजनाच्या लाकडी गोळीला भेंडगोळी असे नांव आहे. "भेंडीचे लाकूड" असे काहीतरी मिळत असे. घरच्याघरी हा विद्युत्दर्शी तयार करण्यासाठी कडब्याच्या काड्या सोलून त्यातील गाभ्याचे तुकडे दोरीने टांगून, व स्थिरविद्युत तयार करण्यासाठी केसांत फिरविलेला कंगवा असा प्रकार केला जाई, असे आठवते.
ओहो, अनेक धन्यवाद.
ओहो, अनेक धन्यवाद. विज्ञानाच्या पुस्तकात विद्युत्प्रवाहासंबंधीचे सुरुवातीचे जे धडे होते त्यातली निम्मी वाक्ये अन सगळे प्रयोग भेंडगोळीनेच सुरू व्हायचे. पण भेंडगोळी म्हणजे काय हेच्च माहिती नसल्यामुळे तो फिलॉसॉफर्स स्टोनसारखा काहीतरी एग्झॉटिक पदार्थ वाटायचा.
+
विज्ञानाच्या पुस्तकात विद्युत्प्रवाहासंबंधीचे सुरुवातीचे जे धडे होते त्यातली निम्मी वाक्ये अन सगळे प्रयोग भेंडगोळीनेच सुरू व्हायचे. पण भेंडगोळी म्हणजे काय हेच्च माहिती नसल्यामुळे तो फिलॉसॉफर्स स्टोनसारखा काहीतरी एग्झॉटिक पदार्थ वाटायचा.
+१
पुस्तकात जरा स्पष्टीकरण द्यायला किंवा दुसरा साधा शब्द वापरायला काय जात होते कोण जाणे!
पुन्हा भेंड
१)भेंड/आष्टा/पारस पिंपळ/पिंपरणी/पारोसा पिंपळ (Thespesia Populnea) हे झाड हा एक प्रकार. हे सुमारे तीस-चाळीस फूट उंच वाढते. फुले पिवळे असतात आणि कोमेजताना गुलाबी जांभळी होतात. याच्या फळांतून पिवळसर रंगाचा चिकट द्राव निघतो.
२)कॉर्क ओक ट्री (Quercus Suber) हा दुसरा वनस्पतिविशेष. ही झाडे स्पेन-पोर्ट्युगाल मध्ये विपुल संख्येने सापडतात. त्यांची व्यावसायिक लागवड केली जाते. कारण ह्याच्या सालीपासून(bark) उत्तम कॉर्क मिळते जे वाइन-बाटल्यांच्या झाकणासाठी (स्टॉपर) सर्वोत्तम मटीरिअल असते. प्लास्टिक, काच या माध्यमांपेक्षा कितीतरी उत्तम. cork oak असे गूगल केले तर हे कॉर्क गोळा करण्याच्या अत्यंत सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण पद्धतीसंबंधी तसेच कॉर्कच्या अभिनव पेशीरचनेविषयी (ज्यायोगे ते वाइन-स्टॉपर म्हणून सर्वोत्तम ठरते) अतिशय रंजक माहिती मिळेल. पूर्वी औषधांच्या, तेलांच्या बाटल्यांना ह्याच वृक्षाच्या सालींची बुचे असत. आणि ती बाटलीत घट्ट खुपसलेली असत. बाहेरची कडा लाखेने हवाबंद केलेली असे. ही बुचे बाहेर काढण्यासाठी मळसूत्री स्क्रू मिळे. (कॉर्क ओपनर.) तो बुचात अलगद खुपसून हळूवारपणे फिरवून फिरवून बूच बाटलीच्या बाहेर काढावे लागे. जास्त ताकद लावली तर एकतर ते बूच अर्धे तुटून बाहेर येई आणि उरलेला अर्धा भाग बाटलीच्या मानेतच राही; किंवा ते बूच सगळेच बाटलीत ढकलले जाई. मग पंचाईत. कारण उघडलेली बाटली गळतीसुरक्षित राखणारे कोणतेही इतर झाकण त्या काळी उपलब्ध नसे.
स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीविषयीच्या मूळ प्राथमिक प्रयोगात ह्याच कॉर्कचा वापर केला गेला होता.
३)बुचाचे झाड/गगनजाई/आकाशमोगरा/आकाशनिंब (Millingtonia Hortensis) हा आणखी एक वृक्ष. हे एक अगदीच वेगळे झाड आहे. हे उंच वाढते. ह्याला गुच्छांनी फुले येतात. ती सुगंधी असतात. त्यांचे देठ लांब असल्याने एकात एक गुंफून वेण्या-गजरे करता येतात. ह्या झाडाची साल-बार्क मूळ कॉर्कला (थोडासा निकृष्ट) पर्याय म्हणून आपल्याकडे वापरतात. म्हणून याचे नाव बुचाचे झाड. ऐसीवर ह्या झाडासंबंधी नुकताच एक धागा येऊन गेला आहे.
४)रानभेंडी/जंगली भेंडी(Abelmoschus Ficulneus) ही वनस्पती हे एक झुडुप असते. सहा फुटांपर्यंत वाढते. शेताच्या बांधावर दिसते. ह्याची रचना अगदी आपल्याकडच्या भाजीभेंडीच्या (okra, Abelmoschus Esculetus) झुडुपासारखी असते. रानभेंडी ही आपल्या सध्याच्या भेंडीभाजीची पूर्वज असू शकेल असे काही वनस्पतिशास्त्रज्ञ मानतात. ह्याची फळे दिसायला भेंडीसारखीच पण बुटकी आणि काटेरी लव असलेली असतात. फुले भाजीभेंडीसारखीच पण लहान असतात. मला वाटते ह्याच झुडुपाच्या काड्यांतला गर भेंडगोळी म्हणून वापरला गेला असावा. कारण तो अगदी हलका असतो. पण हा अर्थात पूर्णपणे माझा अंदाज. त्याला आधार काहीच नाही.
काही विवाहीत स्त्रीया सब समाजको साथ लिए आगे है बढते जाना
सारख दोन्ही परीवारांना जोडण्यसाठी सासर-माहेर दोन्ही कडच आडनाव एकत्रित वापरतांना दिसतात. उदा. मराठीतल्या प्रख्यात समीक्षीका रेखा इनामदार-साने इ.
तर मला गंमत वाटते मी विचार करतो काही कॉम्बीनेशन्स किती मनोरंजक होतील किती मोठ विनोदाच पोटेन्शीयल यात आहे. उदा बघा समजा
एखादी कोमल वाघमारे च एखाद्या सोहन वाघाशी लग्न झाल. तर
कोमल वाघ-वाघमारे
किंवा एखाद्या दामलेंच्या माधुरीने जर लेल्यांच्या अजीत शी लग्न केल
माधुरी-लेले-दामले
किंवा जर दामले-लेले मग कुणी सुचवल ले ला ब्रिज करा
माधुरी दामलेले
किंवा सान्यांची सरला नेनेंच्या सुरेश बरोबर
सरला साने-नेने किंवा सानेने
नवराही एक नाव ठेवत असतो मात्र ते आणि जुन मिळुन लावण्याची फॅशन नाही
नाहीतर
गौरी-कालिंदी
किंवा बघा गोरेंची कालिंदीच धवल काळे बरोबर लग्न झाल तर
कालिंदी गोरे-काळे
किंवा गौरी-काळे-गोरे
पोटेन्शीयल आहे खुप यात
मला वाटतं, हे डबल आडनांवाचं झालंय आधी.
तसंच, आपल्याकडे 'मिडल नेम' म्हणून वडिलांचं/नवर्याचं नांव लिहितात, जे चुकीचं आहे. आपल्या मराठी लोकांत 'मधलं' नांव नसतंच. जे उदा. ख्रिश्चनांत असतं.
पूर्वी उदा. मैनाबाई भ्र.(भ्रतार) पोपट आगलावे असे लिहित, किंवा आवडाबाई बा(प) दगडू कानकाटे. स्पेसिफिकली नातं उल्लेखून लिहिलं जाई, आडनांव/कुलनाम लिहायलाच हवं असंही नव्हतं.
विविध प्रांत धर्म जाती देश इ. नुसार नांव लिहिण्याची, किंवा नांव ठेवण्याची पद्धत कशी बदलते याबद्दल अधिक माहिती मिळाली तर आवडेल
तसंच, आपल्याकडे 'मिडल नेम'
तसंच, आपल्याकडे 'मिडल नेम' म्हणून वडिलांचं/नवर्याचं नांव लिहितात, जे चुकीचं आहे. आपल्या मराठी लोकांत 'मधलं' नांव नसतंच. जे उदा. ख्रिश्चनांत असतं.
चुकीचं कसं काय? आपण मिडल नेम म्हणून वडिलांचं/नवर्याचं नांव लिहितो, उ. भारतात काही जण कुमार वगैरे लिहितात, काही पाश्चिमात्य लोक आपलंच दुय्यम नाव लिहितात. पण ह्यातलं एक चुकीचं असं कसं म्हणायचं? काही पाश्चिमात्य लोकही मिडल नेम म्हणून वडिलांचं नाव लिहितात ना? उदा. हॅरी जेम्स पॉटर?
नाही.अल्बस सिवरस हॅरी पॉटर
नाही.
"अल्बस सिवरस" पॉटर हे हॅरीच्या मुलाचं नांव आहे. पहिलं अल्बस, अन मधलं सिवरस.
अनेक फॉर्म्स उदा. पासपोर्टसाठीचा भरताना आधी स्वतःचे नांव असते, त्यात मिडल नेम मधे आपण वडिलांचे/नवर्याचे नांव लिहितो.
खाली परत वडिलांच्या नावाचा वेगळा कॉलम असतो. तसाच नवर्याच्या नावाचाही असतो.
स्वतःचं नांव, मग वडिलांचं मग आडनांव ही मराठी लोकांची कन्सेप्ट आहे, असं मला वाटतं. साउथ इंडियन नांवे गावाच्या नावापासून सुरु होतात म्हणे..
माझ्या माहितीनुसार कोर्टकज्जाच्या कामांत नांवे लिहिताना अजूनही ते भ्रतार व बाप वापरले जाते.
येस्स ते आहे. शाहू मोडक हे
येस्स ते आहे. शाहू मोडक हे किरिस्ताव असल्याचे माहिती नव्हते बाकी. धन्यवाद!
अवांतरः पुण्यातील शेखसला दर्ग्याच्या मुजावराचे आडनाव क्षीरसागर असल्याचे वाचले होते मध्यंतरी. चेक करायला पाहिजे. देवळाचा दर्गा झाला तसा पुजार्याचा मुजावर झाला, पण आडनाव मात्र त्याने तेच ठेवले असे वाचून/ऐकून आहे.
इंग्लिश लोकांच्यात नॉर्मली
इंग्लिश लोकांच्यात नॉर्मली मधले नाव हे कोणातरी प्रिय व्यक्तीचे नाव दिलेले असते. म्हणजे माझ्या मुलीचे मधले नाव द्यायचे असेल तर माझ्या अगदी जवळच्या मैत्रीणीचे नाव किंवा माझ्या वर खुप प्रभाव असलेल्या बाईचे नाव देइन मी.
एखाद्या व्यक्तीचे नाव कोणी मुला/मुलीचे मिडल नेम म्हणुन दिले तर ती त्या व्यक्ती साठी अभिमानाची गोष्ट असते.
पुस्तकाचा कॉपीराइट किती वर्ष
पुस्तकाचा कॉपीराइट किती वर्ष असतो?
पुस्तक अनेक वर्ष आउट ऑफ प्रिंट असेल तर उपलब्ध पुस्तकाची कॉपी काढता येते का? (कॉपीराइट लॅप्स होतो का?)
विचारण्याचा उद्देश - पेटंट कायद्यानुसार पेटंटधारक पेटंट घेऊन बसून राहू शकत नाही. त्याने त्या वस्तूचे उत्पादन केले नाही तर त्याला पेटंट हक्क दुसर्याला द्यावे लागतात.
भारतात लेखकाच्या मृत्युनंतर ६० बर्षे..
भारतात लेखकाच्या म्रुत्युनंतर ६० बर्षे...पूर्वी ५० होता..."lifetime of the author + sixty years[8] from the beginning of the calendar year next following the year in which the author dies."
पुस्तक अनेक वर्ष आउट ऑफ प्रिंट असेल तर उपलब्ध पुस्तकाची कॉपी काढता येते का? नाही
exemptions
>> पुस्तक अनेक वर्ष आउट ऑफ प्रिंट असेल तर उपलब्ध पुस्तकाची कॉपी काढता येते का? नाही
Does the law allow any use of a work without permission of the owner of the copyright, and, if so, which are they?
Subject to certain conditions, a fair deal for research, study, criticism, review and news reporting, as well as use of works in library and schools and in the legislatures, is permitted without specific permission of the copyright owners. In order to protect the interests of users, some exemptions have been prescribed in respect of specific uses of works enjoying copyright. Some of the exemptions are the uses of the work
- for the purpose of research or private study,
- for criticism or review,
- for reporting current events,
- in connection with judicial proceeding,
- performance by an amateur club or society if the performance is given to a non-paying audience, and
- the making of sound recordings of literary, dramatic or musical works under certain conditions.
ही बातमी बघा. ह्या प्रमाणे
ही बातमी बघा. ह्या प्रमाणे "कडकनाथ" नावाच्या जातीच्या कोंबडीची अंडी प्रत्येकी रुपये ५० ह्या प्रमाणे विकली जातात. आख्खी कोंबडी १४०० रुपयांना.
इथले तंगडीप्रेमी लोकांना काही माहीती आहे का ह्या "कडकनाथ" जाती बद्दल.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/hen-and-egg-selling-on-olx-126…
कडकनाथ ठाऊक नाही, पण
कडकनाथ ठाऊक नाही, पण बंधुराजांनी एकदा छोट्या नारळाएवढी अंडी आणली होती, त्यात प्रत्येकी २-३ पिवळे बलक होते. ही अंडी 'लेगहॉर्न'/लेघॉर्न जातीच्या कोंबडीची आहेत, व कोंबडी गुडघ्याइतकी उंच असते, असे त्यांनी तेव्हा सांगितल्याचे आठवते आहे.
नेटू गेल्यावर हे सापडलं : http://medifitbiologicals.com/kadaknath-chicken-breed/

लिंकेत हे आहे :
MEDICINAL PROPERTIES:
Kadaknath has special medicinal value in homeopathy and a particular nervous disorder.The tribal uses kadaknath blood in the treatment of chronic disease in human beings and its meat as aphrodisiac (Believed to infuse vigor in Make).Experts says that Viagra or Sildenafil Citrate is basically a vasodilator designed for increasing blood flow to the heart and the melanin pigmant in kadaknath does the same.kadaknath chicken has a peculiar effectiveness in treating women’s discuss, sterility, Menoxenic(abnormal menstruation), habitual abortion.
अॅफ्रोडिझिअॅक म्हटलं की अव्वाच्या सव्वा किम्मत आलीच! प्लस
कडक"नाथ" नांव कसं पडलं असावं, तेही आलंच..
गुजरात-मध्यप्रदेशातल्या बिल्ल आदिवासी भागातील (आमच्या खानदेशाजवळच) मूळ देशी ब्रीड असून काळं कोबडं असल्याने चेटुक बिटुक करण्याच्या कामीही लै उपेगी असेलसं दिसतंय.
(१) आर्थ्रायटिस अर्थात
(१) आर्थ्रायटिस अर्थात सांधेदुखी हा ऑटो-इम्युनिटी आजार आहे ना? म्हणजे स्वतःचीच रोगप्रतिकारक्षमता आपल्यावरच हल्ला करते व सांध्यांना सूज येते.
(२) एडसमध्ये इम्युनिटी कमी कमी होत जाते
प्रश्न - एडसवाल्या रुग्णांना सांधेदुखी होऊ शकत नाही/ झालेली बरी होते असे काही आहे का?
सगळ्यात आधी, सगळेच संधिवात
सगळ्यात आधी, सगळेच संधिवात ऑटोइम्यून नाहीत.
दुसरे, यातल्या दोन्ही इम्युनिट्या वेगवेगळ्या आहेत.
इम्युनिटी कशी काम करते हे आधी समजून घ्यावे लागेल तरच नक्की काय गडबड आहे, ते लक्षात येईल. हे वाचा :
https://en.wikipedia.org/wiki/Immune_system

अग्दीच सोप्पं करून सांगायचं, तर इम्युनिटी सेल्युलर व ह्युमोरल अशा दोन ढोबळ प्रकारांत विभागतात. (याव्यतिरिक्तही आहे, पण वरची लिंक वाचून थोडी लिंक लागेल.)
पैकी सेल्युलर इम्युनिटीदेखिल ५ (मुख्य) प्रकारच्या पांढर्या पेशींद्वारा राबवली जाते. या पेशी बहुतेकदा बाहेरून येणारे जंतू डायरेक्टली मारून टाकतात. उदा. अक्षरश: अमिबा अन्नकण खातो, तश्या प्रकारे पॉलिमॉर्फ्स हे जिवाणू गिळंकृत करतात. लिंफोसाट्स पैकी 'किलर' टी सेल्स व्हायरसेसना मारतात, इ.
तर एड्सचा व्हायरस किलर टी सेल्सलाच इन्फेक्ट करतो.१ त्यामुळे साध्या सर्दीचा व्हायरस आपल्या जिवाला भारी पडतो.
दुसर्या ह्युमोरल प्रकारच्या इम्युनिटीत बाहेरून येणार्या आक्रमकांविरुद्ध चक्क केमिकल वॉरफेअर खेळले जाते. ते मुख्यत्वे अँटीजेन व अँटीबॉडी असे असते. अँटीजेन हा हल्लेखोराने निर्माण केलेला विषारी पदार्थ असू शकतो, किंवा त्याच्या पेशीवरील काही रेणूंची रचना. अँटीबॉडी हे या केमिकल्सना निष्प्रभ करण्यासाठी शरिराने बनवलेले केमिकल असे समजा. लेगो ब्लॉक्स एकमेकांत फिट व्हावेत तसे अँटीजेन-अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस तयार होतात, जे 'न्यूट्रल' असल्याने शरीरास नुकसान करीत नाहीत.
संधिवातात, चुकीच्या अँटीबॉडीज तयार होऊन, आपल्याच शरिरातील सांध्यांतील चिकण आवरणांना लक्ष्य बनवतात, व यामुळे बॉलबेअरिंग गंजल्यासारखा परिणाम उत्पन्न होतो. हे बनवताना, एड्समुळे मरणार्या किलर टी सेल्सचा संबंध नसल्याने एड्सवाल्याला (व्हायचा असेल, तर) संधिवात होतोच होतो.
***
१ : व्हायरस एकाद्या पेशीवर हल्ला करतो, म्हणजे त्या पेशीत व्हायरसचे जेनेटिक मटेरिअल उर्फ डिएनए अथवा आरएनए प्रवेश मिळवते. यानंतर हा डीएनए पेशीच्या डीएनएसोबत जोडला जाऊन तो पेशीचे मूळ कार्य बंद करून पेशीला स्वतःच्या -अर्थात व्हायरसच्या- कॉपीज बनवायला भाग पाडतो. पेशीतील रिसोर्सेस संपून ही फॅक्टरी नष्ट होईपर्यंत व्हायरसेस तयार होतात, अन मग तिथून बाहेर पडून नव्या पेशींवर हल्ला करतात.
व्हायरस जिवंत पेशींच्या आत काम करीत असल्याने त्याला मारायचे, तर जिवंत पेशीदेखिल मारावी लागेल, म्हणून अँटीव्हायरस औषधे तयार करणे कठीण आहे.
***
वरील माहीती सामान्य वाचकास मूळ प्रश्नाच्या अनुषंगाने ढोबळ माहिती देण्याच्या उद्देशाने दिलेली आहे. तिच्या १००% सायंटिफिक अॅक्युरसीबद्दल चर्चा, उर्फ कीस काढणे करता येईल ;)
धन्यवाद. मी नवर्याबरोबर हे
धन्यवाद. मी नवर्याबरोबर हे जेव्हा डिस्कस केले (तो वैद्यकिय क्षेत्रात नाही) तेव्हा अगदी हाच मुद्दा त्यालाही सुचला की वेगवेगळ्या प्रकारच्या रोगप्रतिकारक्षमता असाव्यात. पण आपण अधिक नीट विषद केल्याने त्या कयासाला पुष्टीच मिळाली. मी हा प्रतिसाद पुनः नीट वाचेन.
आफ्स्पा कायदा अहितकारक असून
आफ्स्पा कायदा अहितकारक असून त्यात बदलाची आवश्यकता आहे हे आजवर फक्त वाजपेयी नावाच्या पंतप्रधानालाच जाहिरपणे बोलणे शक्य झाले आहे.
या कायद्यात (किंवा 'मुस्लिम पर्सनल लॉ'मध्ये) जर बदल होऊ शकेल तर तो केवळ भाजपाचे राज्य असतानाच असा माझा विश्वास आहे. सद्य स्थितीचा फायदा घेत आफ्स्पा तर दुसर्या एका केसचा फायदा घेत ट्रिपल तलाक पद्धत बंद करून या सरकारला या दोन्ही कायद्यात योग्य ते बदल करायची सुबुद्धी होईल का नि तेवढे धैर्य ते दाखवतील हाच तो प्रश्न आहे.
पैकी युपी निवडणुका बघा आफ्स्पामध्ये बदल लगेच होणे अशक्य दिसते. मात्र किमान पोलरायझेशनसाठी तरी ट्रिपल तलाक बंद करण्याचे पाऊल उचलले तर त्याचे मी स्वागतच करेन

पैशाचा माज असणारे
पैशाचा माज असणारे हॉटेल/रेस्टॉरंटमध्ये हावरटसारखे खाद्यपदार्थ मागवून अर्धवट खाऊन उष्ट टाकताना बर्याचदा आढळतात. गिर्हाईक खाद्यपदार्थाचे पैसे मोजत असल्यामुळे अशावेळी हॉटेल/रेस्टॉरंट मालक गिर्हाईकाला समज देण्याच्या भानगडीत पडत नाही.