पुरोगामी - प्रतिगामी

मराठीतील एका वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखातून एकंदरीत पुरोगाम्यांवर दुगाण्या झाडल्या. त्यामुळे खरंतर मी हे लिखाण केले.

पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतीवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी नसतात, मनुवादी नसतात, धर्मवादी नसतात, कर्मविपाकसिद्धांतवादी नसतात, शब्दप्रामाण्यवादी नसतात, कट्टर धार्मिक नसतात. अखिल मानवजातीचं अधिक भलं कसं होईल या दृष्टीने पुरोगामी व्यक्ती विचार करते. पुरोगामी विचाराच्या लोकांना हे माहित असतं की या जगात 'बदल' हीच एक शाश्वत गोष्ट आहे.

या उलट प्रतिगामी व्यक्ती सर्वसाधारणपणे सनातनी विचारांच्या, मागे बघून पुढे जाण्याचा प्रयत्न करणा-या, असहिष्णू, कट्टर धार्मिक, दैववादी, शब्दप्रामाण्यवादी, धर्मग्रंथवादी, मनुवादी, संकुचित विचारांच्या, आपल्याच कंपूचं फक्त कसं भलं होईल हे पाहणा-या, स्थितिवादी, सतत भूतकाळाचे दाखले देणा-या, असतात.

एखादी व्यक्ती बालपणातून तरुणपणात प्रवेश करताना पुरोगामी विचारधारेची का आणि कशी होते आणि त्याच परिस्थितीतील दुसरी व्यक्ती सनातनी कशी होते हे पाहणे मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय असू शकतो. पण सामान्यपणे आपल्याला असे म्हणता येईल की व्यक्तीचे बालसंगोपन, आरोग्य, बौद्धिक आणि भावनिक क्षमता, अभ्यास, आकलन यातून व्यक्तीची भूमिका ठरत असते. संतुलित बालसंगोपन झालेली, अधिक बुद्धिमत्ता असणारी, अभ्यासू, ज्ञानी आणि चांगल्या संस्कारांची व्यक्ती पुरोगामी बनते. सुमार बुद्धीची पण स्वार्थ समजणारी, असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेली व्यक्ती सनातनी बनते असे सुचवण्याचा येथे दूरान्वयेदेखील प्रयत्न नाही, गैरसमज नसावा. या विवेचनाच्या आधारे आपण स्वतः कोण आहोत हे समजून घेतले तर चांगले.

मानवी प्रवृत्तींमधील पुरोगामी - प्रतिगामी हा विचारभेद अथवा झगडा चिरंतन आहे. आहार निद्रा मैथुन या जैविक प्रेरणांच्या पातळीवर असलेल्या आदिम मनुष्यप्राण्यांमध्येही असा प्रवृत्ती भेद असू शकणे शक्य आहे. अखिल मानवजातीचा विचार करताना ज्ञात मानवी इतिहासात आपल्याला स्पष्टपणे हा विचारभेद अथवा प्रवृत्तीभेद दिसतो आणि दिसत राहील. भारताच्या ज्ञात इतिहासात पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी शक्तींचा संघर्ष अनेकदा झालाय असे दिसून येते. यातील काही महत्वाचे आणि भारतवर्षाच्या इतिहासाला कलाटणी देणारे संघर्ष आपण पाहू.

वर्ण व्यवस्थेत उच्च कुलीन नसलेल्या चंद्रगुप्त मौर्य कुलीन राजांची १०-१२ पिढ्यांची पुरोगामी विचारांची राजसत्ता भारतात सुमारे २३०० वर्षांपूर्वी होती. महान सम्राट अशोक याच कुळातील राजा होता. पुढे मौर्य बृहदत्त राजा असताना त्याच्या वैदिक ब्राम्हण सरदार पुष्यमित्र शुंगाने, मौर्याची बहुजन आणि बौद्ध धर्मीय अहिंसावादी सत्ता, सैन्यात फितुरी माजवून संपुष्टात आणली. राजा बनून सनातन वैदिक ब्राह्मणी धर्माला राजाश्रय देऊन प्रसार केला. शुंगाने वेद, श्रुती, स्मृती, पुराणांचे आणि वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन घडवून आणले. भृगु कडून मनुस्मृती संकलित करवून घेतली. त्याच शुंगाने कौटिल्याचा अर्थशास्त्र हा त्याकाळचा प्रागतिक विचारांचा ग्रंथही यशस्वीरीत्या नष्ट केला. त्यानंतर अनेक शतके हा ग्रंथ विस्मृतीत गेलेला होता. (आजचे हिंदुत्ववादी कौटिल्याच्या (चाणाक्य) ग्रंथाचा हरघडी दाखल देताना दिसतात त्यांना हा इतिहास माहित आहे काय?)

ज्ञानेश्वर - नंतरच्या काळातील हा संघर्ष संत ज्ञानेश्वर यांनी केला. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी संन्यास सोडून परत गृहस्थ बनलेल्या ज्ञानदेवांच्या मातापित्यांना तत्कालीन सनातन्यांनी एवढा जीव नकोस करून टाकला असणार की बिचा-यांनी कोवळ्या वयाच्या चार तेजस्वी पोरांना पोरकं करून त्यांनी नदीत आत्महत्या केली. सनातन्यांनी मुलांना वाळीत टाकले. तत्कालीन देववाणीत म्हणजे संस्कृत भाषेत असलेले ज्ञान ‘परि अमृताते पैजा जिंके’ अशा प्रकृत मराठी लोकभाषेत आणण्याचे बंडखोर कार्य याच ज्ञानदेवांनी केले. वेदांचे सार असणा-या श्रीमत्भगवतगीतेचे भावार्थदीपिकेत म्हणजेच ज्ञानेश्वरीत रूपांतरण हे त्यांनी जनसामान्यांसाठी केलेले एक मोठेच कार्य होय. अशा ज्ञानदेवांनी अकाली समाधी घेतली पण त्यांनी स्थापन केलेला समतावादी वारकरी संप्रदाय मात्र महाराष्ट्रात भरपूर वाढला. याच विचारांच्या अधिक बंडखोर तुकोबांनी ब्राह्मणी व्यवस्थेला जोरदार हादरे दिले. याच संप्रदायातील स्वतः निरक्षर असलेल्या गाडगे महाराजांनी बुद्धिप्रामाण्यवादाची सुरुवात केली.

शिवछत्रपती विरुद्ध ब्राम्हणशाही - शिवछत्रपतीं पुरोगामी होतेच. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका’ अशी सक्त ताकीद ते आपल्या मावळ्यांना द्यायचे. लोककल्याणकारी राज्याची, तेव्हाच्या काळात अनपेक्षित अशी भूमिका आणि कृती, शिवाजी महाराजांनी आयुष्यभर केली. अनेक वर्षांची गुलामगिरी संपवून आपल्यातला एकजण स्वतंत्र राजा होतोय याने आनंदी होण्याऐवजी अशा राजाच्या राज्याभिषेकाला तत्कालीन सनातनी शक्तींनी जातीपातीच्या मुद्द्यावर विरोध केला होता. नंतरच्या काळात संभाजी राजे आणि ब्राह्मणी अष्टप्रधान हा संघर्ष अधिक टोकदार झाला आणि टप्प्याटप्प्याने सनातनी शक्ती शिरजोर होत गेल्या. राजाराम महाराजांची कारकीर्द, त्यांचे सल्लागारांवर अवलंबून असलेले राजकारण, नंतर शाहू महाराजांची कारकीर्द आणि त्यामध्ये पेशवाईची सुरुवात हा घटनाक्रम आपल्यासमोर आहेच. डोंगराएवढ्या कर्तृत्ववान बाजीरावालाही प्रतिगाम्यांनी छळलंच. उत्तर पेशवाईत जातीपातींचा आणि कर्मकांडांचा अतिरेक झाला. काही लोकांना अस्पृश्य मानून कंबरेला झाडू आणि गळ्यात मडकं अडकवण्याची सक्ती केली गेली. या उलट ब्रिटिशांनी त्याच अस्पृश्यांच्या कंबरेला मनाची तलवार आणि छातीवर शौर्य पदकं लावली आणि पेशवाईचा पराभव केला.

सन १८५७ चे पहिले स्वातंत्र्य युद्ध हा संघर्ष जुनी वैदिकधर्माधिष्ठित राजसत्ता परत स्थापन करण्याचा करण्याचा अयशस्वी उठाव होता. आधुनिक यंत्र तंत्र आणि विचारांच्या ब्रिटिशांचा त्यामध्ये विजय झाला.

टिळक, आगरकर, शाहू, फुले - काँग्रेसची स्थापना होऊन रानड्यांच्या पुरोगामी नेतृत्वाला बाजूला सारून टिळकमहाराजांचे युग सुरु झाले. आचार विचार आणि कृतीने टिळक हे सनातनी ब्राह्मणच होते. आधी स्वातंत्र्य का आधी समाजसुधारणा या वादात टिळकांनी आगरकरांच्या विरुद्ध भूमिका घेतली. शाहू आणि सनातनी यांच्या वेदोक्त का पुराणोक्त या वादात टिळकांच्या समोर सोन्याच्या ताटात पेश केलेली, पुरोगामी भूमिका घेण्याची ऐतिहासिक सुसंधी आली होती. टिळकांची त्याकाळची राजकीय आणि सामाजिक ताकद पहाता त्यांनी जरी शाहूंच्या बाजूने बहुजनवादी भूमिका घेतली असती तरी त्यांना विरोध झाला नसता. पण टिळकांनी त्यांच्या प्रवृत्तीधर्माला अनुसरून सनातन्यांनी बाजू घेतली. मग शाहू महाराज आणि टिळक आयुष्यभर भांडत राहिले.

गांधीजी - राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे धार्मिक होते पण त्याहूनही जास्त ते मानवतावादी होते. गांधीजी हे प्रच्छन्न हिंदू असून सनातनी धर्माला आतून पोखरून टाकतील याची अट्टल सनातन्यांना मोठी भीती होती. त्यातच गांधीजींची अस्पृश्यतानिवारणाची चळवळ, मुस्लिम अनुनयाचं राजकारण, फाळणी, मुस्लिमांचे अत्याचार असे ठपके ठेऊन शिक्षा सुनावून त्यांचा खून करण्यात आला. राष्ट्रपित्याचा खून करून गोंधळ माजवून देऊन त्या धुराळ्यात नवजात भारतवर्षाचा ताबा घ्यायचा असे सनातन्यांचे व्यापक कारस्थान होते, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. पण गांधीजींवर या देशातील जनता करत असलेले अपरंपार सच्चे प्रेम सनातन्यांना दिसू शकले नाही. देशवासीयांच्या एकत्रित शहाणपणाचे आकलनही हिंदुत्ववाद्यांना होऊ शकले नाही. उलट त्यांच्याच जातबांधवांना राखरांगोळी झालेली घरेदारे सोडून शहरात आणि नंतर परदेशात परागंदा होण्याची वेळ आली.

आणीबाणी - इंदिराजींच्या वेळी आणीबाणी पूर्व काळात नोकरशाहीने अक्षरशः धुमाकूळ घातला. जनमानस विटले आणि विरुद्ध गेले. विद्यार्थ्यांची आंदोलने चालू झाली. विरक्त आयुष्य जगणा-या जयप्रकाश नारायणांना पुढे करून त्यांच्या मागे जनसंघी आणि सनातनी शक्ती एकजूट झाल्या. सैन्याने, पोलिसांनी सरकारचे आदेश पळू नये अशा चिथावण्या देण्यात आल्या. देश कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रशासन मोडून पडण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आणीबाणी आणावी लागली. पण इंदिराजी या नेहरूंच्या सर्वोत्तम शिष्या होत्या. त्यांनी घटनेच्या चौकटीतच तत्कालीन परिस्थितीवर उपाय शोधून काढले. तसेच त्यांचा लोकशाही मूल्यांवर अधिक विश्वास होता. त्यामुळे आणीबाणी व्यवस्थित स्थिरस्थावर झालेली असतांना आणि विशेष कोणतीही अनिवार्य परिस्थिती नसतानाही त्यांनी आणीबाणी उठवून निवडणूक जाहीर केल्या. त्यांचे टीकाकार म्हणतात की स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी इंदिराजींनी आणीबाणी उठवली पण असे कोणतेही आंतरराष्ट्रीय दडपण इंदिराजींवर नव्हते. या निवडणुकां नंतर सनातनी शक्ती सत्तेमध्ये भागीदार झाल्या. पण हि सत्ता टिकू शकली नाही. मोजक्या समाजवाद्यांना हा जनसंघी कावा समजला होता आणि त्यापैकी एक मधू लिमये होते. त्यांनी दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतल्यामुळे हे सरकार पडले.

राजीव गांधींचा खून - उच्चवर्गीय विचारांचा पगडा असलेल्या शक्तींनी तंत्रिकांशी आणि देशाबाहेरील शक्तींशी हातमिळवणी करून उमद्या राजीव गांधींचा निर्घृण खून घडवून आणला. याचे खापर लिट्टे आणि प्रभाकरनवर फुटेल असा पुराव्यांचा डोलारा उभा केला. नेत्याचा खून घडवून आणल्यावर निर्नायकी झालेल्या पण सहानुभूतीच्या लाटेवर बहुमत मिळवलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करून देश ताब्यात घेण्याचा हा मोठा कट होता. पण काँगेसजनांनी खंबीरपणा दाखवून ती परिस्थिती टाळली. राजीव गांधी सुधारणावादी होते पण राजकारणी म्हणून कच्चे होते. राम जन्मभूमीचे मंदिराचे कुलूप उघडणे, शाहबानो प्रकरणात कायदा बनवणे, श्रीलंकेत शांतीसेना पाठवणे या सारख्या चुका त्यांच्याहातून झाल्या. तरीही संगणक क्रांती, पंजाब करार, नागा करार, मध्यपूर्वेतील राजकारणात अमेरिकेच्या विरुद्ध भूमिका अशा अनेक गोष्टी त्यांच्या खात्यावर जमा आहेत.
पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी संघर्षातील अजून एक आध्याय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं खून करून सनातन्यानी लिहिलाय. तुम्ही डोक्यात विचार घालता आणि ते आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही तुमच्या डोक्यात गोळी घालू आणि तुम्हालाच संपवून टाकू असा हा उरफाटा तर्क आहे. सनातन्यांचे इतरांचा बुद्धीभेद करण्याचे तंत्र चांगलं आहे पण ते धार्मिक उन्माद आणि भावनेवर आधारित आहे.

श्रुतिस्मृतिपुराणोक्ताने आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर थोडंही परिचलन (Deviation) कट्टर वैदिक सनातनी सहन करू शकत नाहीत. या बाबतीत थोडेसेही, कृतीचे तर सोडाच - विचारांचेही स्वातंत्र्य, कोणालाही नाही, हाच सनातनधर्म आहे. सध्याच्या आधुनिक काळात वैदिक सनातनी विचारांचे उच्च वर्णीय लोक, तोंडदेखला सर्वसमावेशकतेचा मुखवटा घेऊन, सतत हिंदुत्वाच्या अस्मितेचे राजकारण करतात आणि प्रत्यक्ष लढायला बहुजन समाजातून अनुयायी मिळवतात. मूळ भारतीय समाज सहिष्णू आहे त्याला उन्मादावस्थेला नेण्याचे राजकारण वारंवार केले जाते. या सनातनी विचारामुळे भारतवर्षाच्या झालेली कुंठित अवस्था, एक हजार वर्षांचे अंधारयुग, पराभवांचा इतिहास, पारतंत्र्य, जातीपातींमध्ये दुभंगलेला समाज, दारिद्र्य, मागासलेपणा हा सगळा परिणामही आपल्या समोर आहेच.

या दरम्यानच्या कालखंडात प्रतिगामी शक्तींनी मोदीजींच्या नेतृत्वाखालची सत्ता मिळवली आहे. वैचारिक असहिष्णुता, धार्मिक तेढ, सामान नागरी कायद्याची चर्चा, अल्पसंख्यांकांना असुरक्षित वाटेल असे सामाजिक वातावरण, धार्मिक उन्माद, राज्यघटनेविषयी बेगडी प्रेम, उच्चवर्गीयांची दादागिरी, भांडवलदार धार्जिणे निर्णय, हुकूमशाहीची भलावण, कायद्याची आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवणे, युद्धजन्य उन्माद पसरवण्याचा प्रयत्न, देशप्रेमाची स्वघोषित व्याख्या करून विरोधकांवर देशद्रोहाचा शिक्का मारणं, पुरोगाम्यांची निंदा नालस्ती करणं, हे उद्योग देशभर चालू आहेत.

वरील विवेचनाच्या पार्श्वभूमीवर जर मी पुरोगामी विचारांचा असेन तर मला त्याची अजिबात शरम अथवा खंत वाटणार नाही उलट अभिमानच वाटेल हे नक्की. प्रत्येकाने स्वतःची स्वभाववृत्ती तपासून वरील उदाहरणांपैकी आपण कोणाला जवळचे मानतो, आपले मानतो हे नक्की ठरवल्यास गोबेल्स प्रचाराला बळी पडण्यापासून स्वतःला आणि पर्यायाने देशाला वाचवता येईल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

Word Salad !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(वरील लेखात उल्लेख केलेल्या लोकसत्तातील अग्रलेखाबद्दल मी लिहिलेल्या पत्राचा मसुदा ऐसीच्या वाचकांच्या चर्चेसाठी उपलब्ध करून देत आहे. )

‘पुरोगाम्यांचे प्राक्तन’ (लोकसत्ता, 22 नोव्हेंबर) या संपादकीयामुळे तरी पुरोगामी व पुरोगामित्व हे विषय चर्चेसाठी ऐरणीवर आले आहेत, हेही नसे थोडके! संपादकीयात उल्लेख केल्याप्रमाणे पुरोगामित्वाचा शिक्का घेऊन मिरवणारेच converting the converted या वर्तुळात फिरत असतात. इतर पुरोगामी मात्र जमेल तेवढे, जमेल तितके, जमेल तेथे पुरोगामी विचारांची पेरणी करत असतात. परंतु हे पीक उगवत नाही, उगवले तरी करपून जाते वा पिकाचा गैरवापर होतो यास पुरोगामी कितपत जबाबदार, हे वाचकांनी ठरवावे.
संपादकीयात उल्लेख केलेली उदाहरणं सामान्यपणे राजकीय भूमिकेबदेदल असल्यामुळे लोकशाही व्यवस्थेत बहुमत शिरसावंद्य मानणे स्वाभाविकच ठरेल. परंतु बहुमताचे निर्णय चुकीचे आहेत हे सांगणेसुद्धा (पुरोगाम्यांचा) गुन्हा ठरत असेल आणि तो आवाज दाबून टाकण्याचे प्रयत्न होत असतील तर त्या समाजाचे भवितव्य धोक्यात आहे, असे म्हणण्यास वाव आहे. गेली तीस वर्षे बहुतेक पर्यावरण तज्ञ पर्यावरणाच्या धोक्याविषयी उपलब्ध प्लॅटफॉर्मवरून इशारा देत असूनही असे काही घडणार नाही हा शहामृगी पवित्रा राजकीय नेते घेत असल्यास तज्ञांच्यावर दोषारोप करण्यात तथ्य नाही. आज घेतलेल्या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत याचा तसूभरही विचार न करता आपलेच घोडे दामटत असल्यास यापुढे धोका आहे हा विचार मांडण्यास यानंतर कोणीही पुढे येणार नाहीत वा धजणार नाहीत.

अमेरिकेत ट्रम्प निवडून आले, ब्रिटनने Brexitचा निर्णय घेतला, रशियात पुतिन यांचे राज्य आले वा भारतात नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाकडे सत्ता आली म्हणून पुरोगामी धोक्याची हूल उठवतात वा व्यक्ती म्हणून त्यांच्यावर दोषारोप करत आहेत असे नसून पुरोगाम्यांना या संबंधात काही धोके लक्षात आल्यामुळे (व अजूनही लोकशाहीतील विचार स्वातंत्र्य शिल्लक असल्यामुळे) विरोधी विचार प्रकट करण्याचे धाडस करत आहेत. हे इशारे करण्यामागे इतिहासात कॅलिगुला, इव्हान दि टेरिबल, रोबोस्पीअर, पिनोशेट, हिट्लर, मुसलोनी, मार्गारेट थॅचर, रिचर्ड निक्सन, कोरियातील किम्स यासारख्या क्रूर व हुकुमशहांचे दाखले असून यांच्यामुळे त्या त्या देशातील समाजावर दुरवस्था ओढवल्यामुळे पुरोगामी धोक्याचा घंटा वाजवत आहेत.

संपादकीयात म्हटल्याप्रमाणे समाजाची वैचारिक मशागत करण्यास पुरोगाम्यांनी अग्रक्रम द्यावे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. आणि यथाशक्ती ते करतच आहेत. परंतु या अवाढव्य समाजात काही बदल घडवण्यास माध्यमांची, न्यायालयाची व शासन व्यवस्थेची सुद्धा साथ हवी. परंतु हे स्रोत दिवसे न दिवस संकुचित पावत असल्यामुळे पुरोगाम्यांचे प्रयत्न दगडावर डोके आपटल्यासारखे होत आहेत.

याचबरोबर पुरोगामी विचारांचे विकृतीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे योग्य विचार जनसामान्यापर्यंत पोहोचत नाहीत वा पोहोचवले जात नाहीत. ‘आम्ही धार्मिक आहोत, परंतु अंधश्रद्ध नाही’ या विधानात विरोधाभास असू शकतो यावरच समाजाचा विश्वास नाही. कारण धार्मिक असणे हे केवळ सैद्धांतिक पातळीवरील अभ्यासाचा विषय नसून धार्मिकतेच्या अनुषंगाने रूढी-परंपरा, देव-देवस्की, गंडे-दोरे, उपास-तपास, उत्सव-यात्रा इत्यादींचाही त्यात समावेश होत असतो. त्यामुळे धार्मिकांचा आम्ही अंधश्रद्ध नाही या विधानात काही तथ्य नाही, हेच पुरोगाम्यांनी कितीही ऊर बडवून सांगितले तरी परिणाम शून्य! एक प्रयत्न म्हणून लोकानुनय करत पुरोगामी विचारांचा प्रचार- प्रसार करण्याच्या रणनीतीचे अवलंब केल्यास – अवधूत परळकर (लोक मानस, 23 नोव्हेंबर) यानी उल्लेख केल्याप्रमाणे – हा प्रयत्नसुद्धा हाणून पाडण्यास व प्रसंगी डॉ. दाभोलकरासारख्या पुरोगाम्याचा खून करण्यास समाजातील दुष्ट शक्ती मागे पुढे पाहणार नाहीत.

एक मात्र खरे की पुरोगामी विचारांना मृत्यु नाही, अंत नाही वा पूर्ण विरामही नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच अग्रलेखाला उत्तर म्हणून अवधूत परळकर यांचं पत्र लोकसत्ताने छापलं होतं - खोटय़ांवरून खऱ्यांची परीक्षा कशी काय?
प्रतिगामीपण अशिक्षितपणातून जन्माला येते. पुरोगामी होण्यासाठी सुशिक्षितपणा ही पूर्वअट असते. हिंदुत्ववादी जसा स्वत:ला अभिमानाने हिंदुत्ववादी म्हणवतो तसा कोणताही पुरोगामी स्वत:ला पुरोगामी म्हणताना आढळणार नाही. पुरोगामीपणा मिरवणारे लोक पुरोगामी असण्याची शक्यता कमी असते.

खोटे पुरोगामी समोर ठेवून पुरोगामी या संकल्पनेची टिंगल करणे हे काही बरोबर नाही. पण हे सर्रास केले जाते. ‘पुरोगाम्यांचे प्राक्तन’ हा अग्रलेख (२३ नोव्हेंबर) पुरोगामीपणाला या अंगाने भिडावा हे ‘दुर्दैव’च. घरातल्या खोटय़ा नोटा मोजून एखाद्याची श्रीमंती ठरवायचा हा प्रकार आहे. वास्तविक समाजातल्या सर्वानी पुरोगामी असले पाहिजे, निदान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने वैचारिकदृष्टय़ा सुशिक्षित असले पाहिजे.

या अग्रलेखाचा रोख खोटय़ा पुरोगामी लोकांवर हल्ला चढवणारा आहे हे स्पष्ट आहे. लेखनाच्या ओघात आलेली काही निरीक्षणे पटण्यासारखी आहेत. उदाहरणार्थ- ‘मुद्दा मान्य असणाऱ्यांनाच तो पुन्हा पुन्हा समजावून सांगणे हा पुरोगामी लोकांचा उद्योग’.

पण ही कोणत्याही वैचारिक गटाची मर्यादा आहे. मी स्वत: मुद्दा न पटणाऱ्यांना मुद्दा पटवून द्यायचा प्रयत्न सतत करीत आलो आहे. आणि मला त्यात आजतागायत शून्य यश मिळाले आहे. आपल्याखेरीज आपले ऐकायला कोणी का उत्सुक नाही? – ‘सलमान खानच्या चित्रपटाला लोक अधिक गर्दी का करतात? चांगल्या दर्जेदार चित्रपटाला गर्दी का करीत नाहीत?’ या प्रश्नासारखा हा प्रश्न आहे. मानसशास्त्रज्ञ याचा वेध घेऊ शकतील.

‘अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या संकोचाबद्दल सामान्य नागरिकास खंत वाटायला हवी’- असे एक विधान अग्रलेखात आहे. आता अशी खंत वाटत नसेल तर तो दोष समाजाचा की पुरोगाम्यांचा? अशा प्रकारची खंत वाटणे हे शहाणपणाचे लक्षण नाही काय? समूहाच्या शहाणपणाच्या अभावी हे घडते, असे म्हणण्याऐवजी पुरोगाम्यांवरल्या अविश्वासामुळे हे घडते असे कसे म्हणता येईल? समाजाचा चांगल्या मूल्यांवर विश्वास नाही हेच यातून दिसून येते. या देशात सुधारकांना कायम दगड खावे लागले आहेत. इतिहास हेच अधोरेखित करतो. ही स्थिती समाजाच्या निर्बुद्धपणाची किंवा अशिक्षितपणाची द्योतक आहे. ‘बेगडी पुरोगामित्व’ असा शब्दप्रयोग लेखात आहे. समाज या बेगडीपणालाच पुरोगामित्व समजून चालत असेल आणि नावे ठेवत असेल तर तो समाजाच्या आकलनाचा दोष आहे. अग्रलेखातही बेगडी पुरोगामित्वाची उदाहरणे देऊन पुरोगामी नेत्यांवर झोड उठवली आहे, त्यातूनही हेच समोर येते.

‘नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहून जनतेने या पुरोगाम्यांना पूर्णपणे भिरकावून दिले’ असे अग्रलेखात म्हटले आहे. आता हे जनतेने चांगले केले की वाईट केले? शहाणी मूल्ये भिरकावून लोक वाईट मूल्यांच्या मागे धावले, तर त्यात चूक कोणाची? चांगल्या मूल्यांचा आग्रह धरणाऱ्या पुरोगाम्यांची की वाईट मूल्यांचे आकर्षण असणाऱ्या लोकांची?

मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी अमेरिकन जनतेच्या अध्यक्षीय निवडीचेही उदाहरण इथे देता येईल. अशा स्थितीत प्रतिगामी शक्तींना बळ दिल्याबद्दल पुरोगाम्यांनी जनतेलाच बोल लावले तर त्यात चूक काय? लोकांना आपल्या लायकीचे सरकार मिळते म्हणतात. तशी लोकांना आपल्या आवडीची मूल्यव्यवस्था मिळते असे का नाही म्हणायचे?

स्वत:ला पुरोगामी म्हणवून न घेणारे एक खरेखुरे पुरोगामी, नरेंद्र दाभोलकर यांचा भर समन्वय साधण्यावर असायचा, संवाद साधून आपले विचार प्रतिपक्षाला पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न असायचे. पण त्यात त्यांना यश आल्याचे दिसत नाही. पुरोगामी गटाच्या बाहेर आज जो मोठा समाज आहे तो नरेंद्र दाभोलकर यांच्याकडे समाजशत्रू म्हणूनच बघतो. अशा वातावरणात पुरोगामी आपसातच बोलत राहिले तर नवल नाही. अटळच आहे ते.

– अवधूत परळकर, माहीम (मुंबई)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खोटे पुरोगामी समोर ठेवून पुरोगामी या संकल्पनेची टिंगल करणे हे काही बरोबर नाही. पण हे सर्रास केले जाते.

खर्‍या पुरोगाम्यांना काही प्रश्न

१. खोटे आणि खरे पुरोगामी ओळखायचे कसे?

२. तुमच्या मते ह्या लेखाचे लेखक ( संता ) खरे पुरोगामी आहेत का खोटे पुरोगामी?

३. बरं ते लेखक ( संता ) कसे ही आणि कुठलेही पुरोगामी स्वताला समजत असतील तरी तो मुद्दा सोडुन देऊन फक्त लेख म्हणुन तुम्ही ह्या लेखाची कीती टिंगल कराल? फक्त टिंगलच कराल की तुम्हाला असले लिखाण वाचुन अतिशय मानसिक त्रास होइल, वाईट वाटेल?

४. हे असे लेख पाडणारे जर समाजापुढे पुरोगामी म्हणुन येत असतील तर त्यामुळे एकुणच पुरोगामी विचारांची टिंगल, हेटाळणी होणे तुम्हाला स्वाभाविक वाटत नाही का?

५. चौथ्या प्रश्नाचे उत्तर जर "हो" असे असेल तर खर्‍या पुरोगाम्यांनी ह्या लेख पाडणार्‍या स्वघोषित पुरोगाम्यांना आवरायला पाहिजे असे तुम्हाला वाटत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पत्र मी प्रथम वाचलं तेव्हा इतकं हसलो होतो.

आज पुन्हा हसलो.

या पत्रलेखकाचं मत(जितकं मला कळलं) ते हे की आमचे पुरोगामी,उदात्त विचार समाज मान्य करत नसेल,त्यांना ते कळत नसतील तर तो त्यांच्या अकलेचा दोष. त्यांची तेवढीच लायकी. आम्ही मात्र बरोबरच. पण इतका मोठा व वैविध्यपूर्ण (पक्षी: भारतीय, अमेरिकन आणि आता युरोपीयही)समाज आपले मत ऐकत नसेल तर आपल्याही विचारांत वा निदान त्याच्या प्रचारात-अंमलबजावणीतही काही त्रुटी निश्चितच असतील व त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा किमान आत्मपरीक्षणाचा सूरही त्यात नाही. इथे म.गांधी उजवे ठरतात व भारतीय जीवनपद्धती,अध्यात्माची बैठक घेऊनही ते यशस्वी कसे ठरले याचेही उत्तर मिळते.

(दाभोलकरांसारखे सन्माननीय अपवाद वगळता)आजचे पुरोगामी म्हणजे कालचे 'सुधारक' नव्हेत. फुले, शाहू, आंबेडकर,सावरकर, रानडे, कर्वे आदी हे सुधारक कृतिशील विचारवंत होते. आज मात्र पुरोगामित्व हे फक्त एक 'स्टेट ऑफ माइंड' म्हणून उरलं आहे असं दिसतं. म्हणूनच पुरोगामी होण्यासाठी मला काय ‘करावे’ लागेल ? असा धागा काढावा लागला होता.

मला वैयक्तिक होण्यात रस नाही,पण आता उघड करण्यास हरकत नाही, पूर्वोक्त लेखात मी उल्लेख केलेला 'जिथे पुरोगामी ही एक शिवी आहे’ हा लेख परळकरांचाच.

आजचे पुरोगामित्व हे आत्ममग्न व निव्वळ प्रतिक्रियात्मक झाले आहे ही त्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. तिनेच त्याचा अंत होणार आहे. हेच स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे लक्षात घेत नाहीत. वरील पत्रही याचेच एक उदाहरण आहे इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

त्या धाग्यावर तुम्हाला अनेकांनी गंभीरपणे उत्तरं दिली होती. पण ती वाचण्या-समजून घेण्यापेक्षा 'पुुरोगाम्यांचा नायनाट होतोय पाहा' असं काहीतरी टवाळीसदृश बोलण्याचा तुमचा हेतू आहे हे वरच्या लिखाणातल्या टोनवरून लक्षात येतं.

आज कृतिशील पुरोगामी नाहीत असं तुम्ही म्हणता, यात तुमचं अज्ञान असू शकेल ही शक्यता तुम्ही ध्यानात घेतली आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टवाळीसदृश बोलण्याचा तुमचा हेतू आहे

पण ती वाचण्या-समजून घेण्यापेक्षा

यावरून माझ्याबद्दल काही समजुती तुम्ही करून घेतल्या आहेत असे दिसते. तसे होण्याला (निदान ऐसीपुरते)माझे लिखाण हे एकच कारण दिसते व तो दोष माझ्या लिखाणाचा व पर्यायाने माझाच आहे हे मी नम्रतेने कबूल करतो.

आजचे पुरोगामित्व हे आत्ममग्न व निव्वळ प्रतिक्रियात्मक झाले आहे ही त्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. तिनेच त्याचा अंत होणार आहे. हेच स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे लक्षात घेत नाहीत. वरील पत्रही याचेच एक उदाहरण आहे इतकेच.

हे पुरोगामित्वाविषयीच्या तळमळीतून लिहिलेलं आहे असं जर ध्वनित होत नसेल तर तोही दोष माझ्या भाषेचा.

इथे परळकरांनाच उद्धृत करतो-

पण ही कोणत्याही वैचारिक गटाची मर्यादा आहे. मी स्वत: मुद्दा न पटणाऱ्यांना मुद्दा पटवून द्यायचा प्रयत्न सतत करीत आलो आहे. आणि मला त्यात आजतागायत शून्य यश मिळाले आहे. आपल्याखेरीज आपले ऐकायला कोणी का उत्सुक नाही? – ‘सलमान खानच्या चित्रपटाला लोक अधिक गर्दी का करतात? चांगल्या दर्जेदार चित्रपटाला गर्दी का करीत नाहीत?’ या प्रश्नासारखा हा प्रश्न आहे. मानसशास्त्रज्ञ याचा वेध घेऊ शकतील.

त्या धाग्याबद्दल-
मी एक अ‍ॅप्लिकेशन इंजिनियर आहे. कुठल्याही प्रिंसिपलचं प्रॅक्टीकल अ‍ॅप्लिकेशन कसं करावं यात मला रस आहे. तेच मी पुरोगामित्व,सेक्युलरिझम आदीबाबतीत लावण्याचा प्रयत्न केला की जेणेकरुन या संकल्पना फक्त वैचारिक आहेत की प्रॅक्टीकलही आहेत याचा मला शोध घ्यायचा होता. उदा. समजा मी एखादा सेक्यूलर असून एक तयार कपड्यांचा व्यापारी आहे. माझ्या धर्मविषयक आस्था घरापुरत्याच मर्यादित ठेवून सार्वजनिक व्यवहारात त्या अजिबात आणू नये अशा विचारांचा मी आहे. असं असताना आता इतर धार्मिक हिंदू लोक दिवाळी या धार्मिक सणानिमित्त मोठी खरेदी करतात व त्या काळात मालाला उठाव असतो म्हणून मी नवा माल आणतो, त्याआधी जुना माल ग्राहकांच्या माथी मारतो, 'सेल' जाहीर करतो इ. थोडक्यात ग्राहकांच्या धर्मकल्पनांचा माझ्या व्यवसायासाठी वापर करतो. असं करताना ही माझ्या सेक्यूलरिझमच्या तत्वाशी प्रतारणा होते काय? असे अनेक प्रश्न माझ्यासमोर असतात. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

पुरोगामीपणा म्हणजे नक्की काय असतं, याबद्दल तुमची सध्याची मतं काय आहेत? काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे समर्थक हे सगळे पुरोगामी, असं अजूनही मानता का? कोणालाही न फसवता, न लुबाडता, (मान्य असलेले) कायदे पाळून, सगळ्यांचीच सोय (विन-विन) प्रकारच्या वर्तनातून आपल्या चरितार्थाची सोय लावणं आणि पुरोगामीपणा यांचा अर्थाअर्थी काय संबंध आहे?

१. उदाहरणार्थ, ३७७वं कलम पुरोगामी लोक अमान्य करतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी नसतात, मनुवादी नसतात, धर्मवादी नसतात, कर्मविपाकसिद्धांतवादी नसतात, शब्दप्रामाण्यवादी नसतात, कट्टर धार्मिक नसतात.

हे सर्क्युलर रेफरन्ससारखे आहे. म्हणजे "तुम्ही नोटबंदीला विरोध करता म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार्‍यांचे साथीदार आहात" या सारखं !!

चंद्रगुप्त मौर्य ते पुष्यमित्र शुंग वाचून जोतिबा फुल्यांचं लिखाण वाचतोय असं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सन १८५७ चे पहिले स्वातंत्र्य युद्ध हा संघर्ष जुनी वैदिकधर्माधिष्ठित राजसत्ता परत स्थापन करण्याचा करण्याचा अयशस्वी उठाव होता. आधुनिक यंत्र तंत्र आणि विचारांच्या ब्रिटिशांचा त्यामध्ये विजय झाला.

श्री. बहादुरशाह ज़फ़र हे जुनी वैदिकधर्माधिष्ठित राजसत्ता परत स्थापन करण्यासाठी लढले, हे वाचून भडभडून आले.

----------

'परत' बोले तो, हातातून घालवल्यात जमा असलेली जुनी मुघल राजसत्ता ही मुळात वैदिकधर्माधिष्ठित होती, हा इतिहास त्या दुष्ट सेक्युलरवाद्यांनी आजवर दडवला होता, तो आता कोठे प्रकाशात येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्यक्षात श्री. जफर हे लढलेच नाहीत. तर श्री. टोपे, श्री. पांडे, गं.भा. नवलकर इत्यादि मंडळीच लढली असे सत्य सेक्युलर इतिहासकारांनी दडवले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गं.भा. नवलकर

नवलकर नव्हे, नेवाळकर.

प्रत्यक्षात श्री. जफर हे लढलेच नाहीत. तर श्री. टोपे, श्री. पांडे, गं.भा. नवलकर इत्यादि मंडळीच लढली असे सत्य सेक्युलर इतिहासकारांनी दडवले होते.

दडवले होते, की घडवले होते? (पक्षी: ठोकून दिले होते?)

----------

अर्थात, 'नेवाळकर' हे ब्राह्मणी रिव्हीजन असण्याची शक्यता अगदीच नाकारण्यायोग्य नसावी, नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>नवलकर नव्हे, नेवाळकर

हो हो; चुकलंच !! (श्री. गूगल यांनी नवलकर सांगितल्याने "इत्यादि ब्राह्मण मंडळीच लढली " हे वाक्य बदलून "इत्यादि मंडळीच लढली " असे बदलले ते बदलले नसते तरी चालले असते).

>>दडवले होते, की घडवले होते?

सेक्युलरांनी "हे ब्राह्मण लढले" या बरोबरच "श्री. जफर (सुद्धा) लढले" असे ठोकून दिले होते. प्री-अंदमान काळात श्री. सावरकरसुद्धा स्युडो सेक्युलर असल्याने सहा सोनेरी पाने पुस्तकाच्या आधीच्या आवृत्तीत त्यांनीही श्री जफर लढले असे लिहिले होते असे म्हणतात. नंतर पोष्ट-अंदमान काळात त्यांना सत्याची जाणीव होऊन त्यांनी नंतरच्या आवृत्तीत सुधारणा केली असे (श्री. फडके) म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नुसते श्री?? कमीतकमी 'धर्मवीर' तरी पायजेलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

धर्मवीर धर्मात्मा श्री. बहादुरशाह ज़फ़र.

ग़ुस्ताख़ीबद्दल एक दफ़ा मुआफ़ी असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेंव्हा १८५७ चे उठाव करणारे शिपाई बहादुरशहा जफरला दिल्लीत परत गादीवर बसवायला गेले तेंव्हा त्याने "ये क्या बोल रहे हैं ये मुझे समझता नहीं है, इन से कहिये की ये चले जाये" असा निरोप त्यांना पाठविला होता. याचा अर्थ बहुधा त्याला राज्यावर परत बसायचे नव्हते असा मी अल्पमतीने काढला आहे . पहा बुवा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

या उलट प्रतिगामी व्यक्ती सर्वसाधारणपणे सनातनी विचारांच्या, मागे बघून पुढे जाण्याचा प्रयत्न करणा-या, असहिष्णू, कट्टर धार्मिक, दैववादी, शब्दप्रामाण्यवादी, धर्मग्रंथवादी, मनुवादी, संकुचित विचारांच्या, आपल्याच कंपूचं फक्त कसं भलं होईल हे पाहणा-या, स्थितिवादी, सतत भूतकाळाचे दाखले देणा-या, असतात.

चंद्रगुप्त मौर्य, ज्ञानेश्वर+++, शिवाजी महाराज, टिळक, आगरकर, फुले, शाहु महाराज, १८५७ चे स्वातंत्र्यसमर ज्यांनी लढले त्या व्यक्ती, इंदिरा गांधी, राजीव गांधी ह्या व्यक्ती भूतकालातल्या नाहीत ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बु - तुझा वर्ड सॅलेड चा प्रतिसाद आवडला. हा लेख म्हणजे सॅलेड पोटात गेल्यानंतर बाहेर पडल्यावर जसे दिसेल्/असेल तसे वाटतय.

बादवे, लेखकानी स्वताला पुरोगामी म्हणले आहे का लेखात? नसले म्हणले तर त्यांना ऐसीहातिक दाखले देण्याची मुभा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीहातिक दाखले

लोल!

पन हा पन इन्टेण्डेड होता कं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

इंटेंडेड नव्हते असे मी सांगीतले तर तुम्हाला पटेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"कहीं की ईंट कहीं का रोड़ा, भानुमती ने कुनबा जोड़ा. तसाच हा लेख आहे. बहुतेक लेखकाला ही माहित नसेल त्याने काय लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"कहीं की ईंट कहीं का रोड़ा, भानुमती ने कुनबा जोड़ा. तसाच हा लेख आहे. बहुतेक लेखकाला ही माहित नसेल त्याने काय लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख किंचित पसरट झालेला आहे हे खरं आहे. पण सुरुवातीच्या काही परिच्छेदात पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्यातले फरक मांडण्यात लेखक यशस्वी झालेला आहे. ते वाचून जर कोणाला प्रतिवाद करणं झेपत नसेल तर ठीक आहे, पण वर्ड सॅलड किंवा निरर्थक वगैरे म्हणणं हेही निरर्थकच ठरतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खोडसाळ अशी श्रेणी दिली आहे.

भडकाऊ अशी श्रेणी दिली नाही कारण "ते वाचून जर कोणाला प्रतिवाद करणं झेपत नसेल तर ठीक आहे" असं म्हणून विवाद घडवून आणण्याचा केविलवाणा यत्न होता गुर्जींचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला म्हणतात शूटिंग दे मेसेंजर. पण सध्याच्या काळात त्याचीच चलती आहे. कोणी विरोध केला, अमुक एक गोष्ट चुकीची आहे असं सकारण म्हटलं की विचारजंत, सिक्युलर वगैरे म्हणायचं, आणि सैनिक तिथे लढतात, किंवा त्यावेळेला तुम्ही का नाही बोललात वगैरे व्हॉटअबाउट्री करायची. पोस्ट-ट्रुथ वर्ल्ड आहे, दुसरं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला म्हणतात शूटिंग दे मेसेंजर.

प्रश्न - खोडसाळ ही श्रेणी देणे हे शूटिंग दे मेसेंजर आहे ? की भडकाऊ ही श्रेणी न देणे ?

उत्तर -

(१) हो
(२) नाही
(३) माहीती नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला म्हणतात चेंजिंग द सब्जेक्ट. अहो पण ते करताना तुम्ही लॉजिकली काहीतरी बरोबर लिहा की. 'अ बरोबर की ब चूक?' या प्रश्नाला पर्यायी उत्तरं म्हणून 'हो, नाही, माहीत नाही'???? त्या मोदींच्या अॅपची उत्तरं निवडायला तुम्हालाच ठेवलं होतं का? 'तुम्ही बायकोला रोज फटकावून काढता हे बरोबर की तिच्यावर नुसतं वस्सकन ओरडता हे बरोबर?' पर्याय हो, नाही, माहीत नाही...

तुम्हाला एवढं साधं जमत नाही आणि लेखाला 'वर्ड सॅलड' म्हणताय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उलटा चो...

अहो थेट प्रश्न होता.

ठीकाय पुन्हा विचारतो (वेगळ्या शब्दात) -

मी दोन वाक्ये लिहिली. "खोडसाळ अशी श्रेणी दिली आहे" हे पहिले वाक्य. "भडकाऊ श्रेणी दिली नाही ..." असे दुसरे वाक्य.

माझ्या नेमक्या कोणत्या वाक्याला तुम्ही "शूटिंग द मेसेंजर" म्हणताय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उलटा चोर? अहो, तुम्हाला तुमचं लॉजिकल ग्रामर चुकलं एवढंही मान्य नाही. मग कुठच्या आधारावर मूळ लेखाला वर्ड सॅलड म्हणताय? असा मूळ प्रश्न होता. शूटिंग द मेसेंजर हे 'मी भांडणं लावण्याचा प्रयत्न करतोय' अशा प्रकारच्या आरोपाला होतं. श्रेणी काय दिली त्याने काय फरक पडतोय? तुम्ही काहीही स्पष्टीकरण न देता मुळात ठीकठाक लिहिलेल्या पण किंचित पसरट असलेल्या लेखाला अकारण 'वर्ड सॅलड' म्हटलं. त्याची कारणपरंपरा न देताच इतरांवर आरोप केले. काय म्हणावं? असो. काहीतरी सविस्तर मांडणी करा, मग बोलू. लेखकाने आपल्या परीने केलेली आहे.

एकंदरीत युक्तिवाद समजून न घेता नुसत्याच काड्या घालण्याच्या प्रवृत्तीचा कंटाळा आलेला आहे. तसंच हा वाद घालायचाही. तुम्हाला काय हवं ते करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शूटिंग द मेसेंजर हे 'मी भांडणं लावण्याचा प्रयत्न करतोय' अशा प्रकारच्या आरोपाला होतं.

एवढंच खुलासा-कम-उत्तर अपेक्षित होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर्ण व्यवस्थेत उच्च कुलीन नसलेल्या चंद्रगुप्त मौर्य कुलीन राजांची १०-१२ पिढ्यांची पुरोगामी विचारांची राजसत्ता भारतात सुमारे २३०० वर्षांपूर्वी होती. महान सम्राट अशोक याच कुळातील राजा होता. पुढे मौर्य बृहदत्त राजा असताना त्याच्या वैदिक ब्राम्हण सरदार पुष्यमित्र शुंगाने, मौर्याची बहुजन आणि बौद्ध धर्मीय अहिंसावादी सत्ता, सैन्यात फितुरी माजवून संपुष्टात आणली. राजा बनून सनातन वैदिक ब्राह्मणी धर्माला राजाश्रय देऊन प्रसार केला. शुंगाने वेद, श्रुती, स्मृती, पुराणांचे आणि वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन घडवून आणले. भृगु कडून मनुस्मृती संकलित करवून घेतली. त्याच शुंगाने कौटिल्याचा अर्थशास्त्र हा त्याकाळचा प्रागतिक विचारांचा ग्रंथही यशस्वीरीत्या नष्ट केला. त्यानंतर अनेक शतके हा ग्रंथ विस्मृतीत गेलेला होता. (आजचे हिंदुत्ववादी कौटिल्याच्या (चाणाक्य) ग्रंथाचा हरघडी दाखल देताना दिसतात त्यांना हा इतिहास माहित आहे काय?)

तांबड्या रंगाने रंगवलेल्या वाक्यात उल्लेखलेले भृगु हे अतिप्राचीन भृगु ऋषि होते की दुसरे व नवीनच भृगु नावाचे "गृहस्थ" होते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही लिबरल भूमिका आहे. मराठीत पुरोगामी म्हणताना साधारण लिबरल असाच अर्थ अपेक्षित असतो. ही भूमिका उजवी नाही की डावी नाही. एक व्यवस्था फेकून देण्याची किंवा दुसरी कुठचीतरी व्यवस्था उभारण्याची नाही. अनावश्यक पोथ्याधिष्ठित जुलुमाची जोखडं झटकून देण्याची आहे. अंतिमतः संपूर्ण मानवजात एक आहे, सर्वजण समान आहेत हा त्या भूमिकेचा गाभा आहे. 'आपण विरुद्ध ते' या मांडणीला विरोध करत स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांवर सर्वांचा स्वीकार करण्याची ही भूमिका आहे. जिथेजिथे पोथ्याधिष्ठित जुलुम पसरतो, तिथेतिथे त्याविरुद्ध उठणारा आवाज हा लिबरल असतो.

यात नक्की अस्वीकारार्ह काय आहे ते कळत नाही. पण तरीही भलत्यासलत्या पुराणमतवादी संकल्पना उराशी बाळगणारे त्याला विरोध करतात हे दुर्दैव. गेली कित्येक शतकं ग्लोबल स्केलवर पुरोगाम्यांचा विजय आणि प्रतिगाम्यांचा पराजय होत आलेला असला तरीही सध्या एक प्रतिगामी लाट जगभर पसरते आहे हे नाकारता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात नक्की अस्वीकारार्ह काय आहे ते कळत नाही.

यात नेमके अस्वीकारार्ह आहे ते श्री चॅप्लिन यांचे Greed ला सर्वस्वी वाईट ठरवणे हे.

त्यांच्या भावना उदात्त (छानछान) आहेत. पण Greed ने लोकांचे मन दूषित केलेले आहे हे अस्वीकारणीय आहे. Greed हे अत्यंत उत्तम मूल्य आहे. त्यात काहीही वाईट नाही हा माझा मुद्दा आहे. ज्यांना Greed हे मूल्य म्हणून आत्मसात करायचे आहे त्यांना अवश्य करू द्यावे. हेन्री फोर्ड काय, बिल गेट्स काय किंवा इतर कुठला उद्योगपति काय ... हे लोक Greed ने प्रेरित झालेत हे शेंबडं पोर सुद्धा सांगेल. पण त्यांच्या Greed ने प्रेरित झालेल्या कृत्या ह्या समस्याजनक कमी आणि मददगार जास्त सिद्ध झालेल्या आहेत.
.
हो. काँटेक्स्ट महत्वाचा आहे, भावनाओंको समझो वगैरे. पण श्री चॅप्लिन यांचा मुद्दा हा दिनदयाळ उपाध्याय यांच्या तत्वज्ञानाच्या जवळपास जातो.
.
.
.
खालील व्हिडिओ हा प्रतिवाद म्हणून नाही पण वेगळा विचार म्हणून पहा.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रीडसारखे शब्द असे आउट ऑफ कॉंटेक्स्ट घेऊ नकात. वरच्या भाषणात 'ग्रीड दॅट लीड्स टु हेट्रेड अॅंड टिरनी' ही वाईट असं म्हटलेलं आहे. 'सर्वांना आनंदी करण्याची इच्छा - ग्रीड' ही बाळगावी असंच सुरुवातीला म्हटलेलं आहे. तेव्हा ग्रीड कधी सकारात्मक असते, आणि कधी त्याज्य असते हे भाषणात सांगितलेलं आहेच. तेव्हा भावनाओंको समझो नाही, शब्दोंको नीट समझो असंच म्हणायचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय पटले.

ग्रीड मधे "गुड ग्रीड" अँड "बॅड ग्रीड" असा भाव करा असं त्या व्हिडिओत कुठेही म्हंटलेले नैय्ये. ग्रीडमुळे मनं कलूषित झालेली आहेत असंच म्हंटलेलं आहे. शब्दांकडे लक्ष देण्यासारखे लक्षवेधक शब्द नैय्येतच मुळी. ते भाषण उपाध्यायांच्या एकात्मिक मानवतावादाची नव्या बाटलीतील जुनी दारू वाटतं. We think a lot but not feel - वगैरे भोंगळ वाक्ये आहेत.

Quest for cosmic justice.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑ अच्चं जालं, प्लतिगामी मंजे दूष्त वैत्त बलंका.

बाकी ऐतिहासिक चुका कशा खंडीभर आहेत ते आवडले. अशेच अजून फेकूचंदी लिखाण येऊद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुरोगामी विचारसरणीमुळे झालेल्या ऐतिहासिक चुका, (तसेच प्रतिगामीत्वामुळे टाळल्या गेलेल्या ऐतिहासिक चुका) वाचायला आवडतील , द्याल काही वानगीदाखल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑ अच्चं जालं, प्लतिगामी मंजे दूष्त वैत्त बलंका.

यात आश्चर्यकारक नक्की काय आहे? प्रतिगामी विचारसरणी आहेच दुष्ट वैट्ट वगैरे. तुम्ही काही चांगल्या प्रतिगामी विचारांची, आचारांची उदारहणं देणार आहात प्रतिवादासाठी की नुसतेच बोबडे बोल लिहिणार आहात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला व सनातनी विचार - जन्मा पेक्षा कर्म श्रेष्ठ. व्यक्ती कोणाच्या पोटी जन्मली त्यापेक्षा व्यक्तीने तिच्या आयुष्यात कोणते कर्म, किती उत्तम तर्‍हेने केले हे जास्त लक्षणीय/विचारणीय असावे.
लक्षणीय/विचारणीय कशासाठी असावे - तर व्यक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी.

हा विचार आजच्या कालात रिलेव्हंट आहे का ? - हो. आज बर्‍याच प्रमाणावर आचरणात आणला जातो आहे.
कसा आचरणात आणला जातो - व्यक्तीचा व्यवसाय हा जन्माधारित नसून कर्माधारित आहे.

हा विचार कसा आला - हा धर्मपुस्तकातून (महाभारत, श्रीमद्भग्वदगीता) आलेला विचार आहे.

हा विचार सनातनी कसा - याच विचारास आचरणात आणले म्हणून भरतभूमिचे भारत हे नाव (भरत या नावावरून) पडलं. हा अतिप्राचीन व धर्मजन्य विचार आहे. (बोनस - प्रस्थापितांनी (म्हंजे दुष्यंत शकुंतलेचा पुत्र सम्राट भरत) तो पुढे ठेवला व मुख्य म्हंजे आचरणात आणला. हा विचार उपेक्षितांनी/विस्थापितांनी आणला/राबवला नाही.)

हा चांगला विचार आहे कारण कोणी कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे ती जन्माला येणारी व्यक्ती ठरवू शकत नाही. म्हंजे जन्माधारित निर्णयपद्धतीच्या विपरीत आहे. जन्माधारित निर्णयपद्धतीत प्रचंड रिस्क होती ... व या विचारसरणीने ती रिस्क कमी केली. रिस्क नेमकी कोणती होती - तर योग्यता सिद्ध करायला न लागता पदग्रहण करता येत होते.

------

संभाव्य आक्षेप - काय ओ गब्बर सिंग, आजचे सनातनी लोक त्यानुरुप वागतात का ? जातियता हे या विचाराच्या विपरीतच आहे की. मग सनातनी मंडळी जातियतेस घट्ट चिकटून बसतात की नाही !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच विचारास आचरणात आणले म्हणून भरतभूमिचे भारत हे नाव (भरत या नावावरून) पडलं.

हे कशावरुन?
.
भा = आभा, तेज
रत = संलग्न
तेजामध्ये रममाण झालेला देश तो भारत ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे कशावरुन?

सांगतो.

-

भा = आभा, तेज
रत = संलग्न
तेजामध्ये रममाण झालेला देश तो भारत ना?

अं ... हं.

आपल्याकडे अशी परंपरा आहे की जन्मदात्याच्या नावातील पहिल्या अक्षरास आणखी एक अ जोडला तर पुत्राचे नाव तयार होते. जसे वसुदेव - वासुदेव, मरुत - मारुति, पराशर - पाराशर, दशरथ - दाशरथ, भगिरथ - भागिरथी, जमदग्नि - जामदज्ञ वगैरे. भारत ही भूमि आहे व भरत राजाची अपत्य नाही. खरंतर भरताची मातृभूमि आहे. पण भरताने या भूमिला कर्मयोगाचे मूल्य बहाल करून तिला वेगळा जन्म दिला असा विचार मांडून भारत असे नाव या भूमि ला पडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म शक्य आहे. मी तरी कुठे वाचलेले नाही. पण असू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर, चिकण्या, तुझा फोटो पाठवून दे रे बाबा कोणाला तरी. कारण पुरोगामी, प्रतिगामी आणि पुरातन या शब्दांमध्ये तुझा प्रचंड गोंधळ आहे. सगळंच पुरातन म्हणजे प्रतिगामी नाही रे. समानतेवर आधारित विचार, व त्यातून सर्वांना स्वातंत्र्य देणारा व बंधनं दूर करणारा विचार हा पुरोगामीच असतो. मग तो चार्वाकाने मांडलेला असो की कृष्णाने. जन्माधिष्ठित जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था कुठल्यातरी पोथीत सांगितली आहे म्हणून आणि म्हणूनच केवळ लादून शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारणारा विचार आणि आचार हा प्रतिगामी. हजारो वर्षं चाललेल्या त्या समाजव्यवस्थेविरुद्ध उभी राहाणारी आंबेडकरी विचारसरणी आणि त्यांचा आचार हे पुरोगामी.

गंमत अशी असते की धर्मपुस्तकांत खूप वेगवेगळे विचार सांगितलेले असतात. त्यात काही स्वीकारार्ह गोष्टी असतात. पण बऱ्याच वेळा इतर विरोधी गोष्टीही असतात. त्यातलं नीरक्षीर करण्याची प्रवृत्ती ही अनेकवेळा पुरोगामी असते.

दुसरं काहीतरी उदाहरण सांग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(१) “If you can't fly then run, if you can't run then walk, if you can't walk then crawl, but whatever you do you have to keep moving - Martin Luther King
सतत प्रगतीचा ध्यास धरणे हे पुरोगामित्वाचे लक्षण आहे.
(२) जुन्या आचार्/विचारांस कवटाळून बसणे हे प्रतिगामीत्वाचे लक्षण आहे.
.
जुने विचारही उत्तम असू शकतात तसेच नवे विचारही धोकादायक, मनुष्याचा विकास मागे नेणारे असू शकतात. जे जे पुरोगामी ते ते आंधळेपणाने चांगले व जे जे प्रतिगामी ते आंधळेपणाने टाकाऊ असे काही नसते.
______________________

या उलट प्रतिगामी व्यक्ती सर्वसाधारणपणे सनातनी विचारांच्या, मागे बघून पुढे जाण्याचा प्रयत्न करणा-या, असहिष्णू, कट्टर धार्मिक, दैववादी, शब्दप्रामाण्यवादी, धर्मग्रंथवादी, मनुवादी, संकुचित विचारांच्या, आपल्याच कंपूचं फक्त कसं भलं होईल हे पाहणा-या, स्थितिवादी, सतत भूतकाळाचे दाखले देणा-या, असतात.

अधोरेखीत शब्द महत्त्वाचा. नेहमी तसेच असते असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे जे पुरोगामी ते ते आंधळेपणाने चांगले व जे जे प्रतिगामी ते आंधळेपणाने टाकाऊ असे काही नसते.

एकंदरीत प्रतिसादांवरून तुमचाही 'पुरोगामी म्हणजे आधुनिक, प्रतिगामी म्हणजे पौराणिक, जुने, सनातन किंवा इतर धर्मांत सांगितलेले विचार' असा गैरसमज झालेला दिसतो आहे. तुम्ही आंधळेपणा हा शब्द वापरलेला आहे. एखादा विचार योग्य आहे की नाही, न्याय्य आहे की नाही हे तपासून न पाहाता आंधळेपणाने त्याला चिकटून राहाणे हे प्रतिगामित्वाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. योग्य ते स्वीकारायचं, आणि अयोग्य ते नाकारून त्याविरुद्ध बंड करायचं अशी पुरोगामी परंपरा आहे. आंबेडकरांनी हे केलं. पण म्हणून हिंदू धर्मात जे काही आहे ते सरसकट आंधळेपणाने टाकून दिलं नाही. 'अतिथि देवो भव' हा विचार जुना आहे, कुठल्यातरी पोथीमध्ये लिहिला आहे म्हणून तो त्याज्य मानला नाही. तर केवळ त्या व्यवस्थेतल्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. डोळसपणा नाही तिथे पुरोगामित्वाबद्दल शंका घ्यावी लागते.

एक उदाहरण सांगतो. 'मुलींनी जीन्स घालू नयेत' याबद्दल फतवे निघतात अधूनमधून. हा प्रतिगामी विचार झाला. स्वातंत्र्य मर्यादित करणारा. पण मूलतः जीन्स घालणं हा पुरोगामी विचार नाही. पण हवे ते कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असावं, आणि त्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध लढा द्यावा हा त्यामागचा विचार पुरोगामी. मात्र तक्रार करणारे लोक बऱ्याच वेळा म्हणताना दिसतात 'जीन्स घालणं म्हणजे प्रगती होते का?' जे आंधळेपणाने, फॅशन म्हणून जीन्स घालतात त्यांच्यात हा पुरोगामी विचार असेलच असं नाही. जिथे डोळसपणे आचार असतो, केवळ बदलासाठी बदल नसतो तो आचार व त्यामागचा विचार पुरोगामी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर पार्वतीने स्वतःचा पति स्वतः निवडला, ती शंकरांबरोबर समानतेच्या नात्याने द्युत खेळे. ती नाना प्रश्न विचारुन त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करे तर मग स्त्रीमुक्ती हा विचार पुरोगामी कसा? स्त्रीमुक्ती हा विचार प्रतिगामी का नाही म्हणता येणार?
.
सरस्वती ही स्त्रीच ज्ञानाची देवी म्हणतात तर मग स्त्रियांनी शिकू नये हा विचार प्रतिगामी कसा? मध्यंतराचा कालखंड विकृत व दमनकारी होता असे म्हणता येईल. पण स्त्रियांनी शिकू नये हा विचार ना प्रतिगामी आहे ना पुरोगामी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारण आजच्या समाजात बहुसंख्य स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे . एकीकडे सरस्वतीची, कालीची पूजा व दुसरीकडे लाखो स्त्री-भ्रूण -हत्या हेच प्रतिगामी समाजाचे आजचे सत्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

लेखकाने जे जे प्रतिगामी ते ते त्याज्य असा चूकीचा आगलावा दृष्टीकोन मांडलेला आहे त्यामुळे वरती खळबळ व वाद झालेले आहेत. पुरोगामी असणे हे उत्तमच.
पण प्रतिगामी असणे हे "लॉक स्टॉक बॅरल" त्याज्य असे म्हणता येत नाही. पूर्वसुरींच्या अनेक उत्तम विचारांवरतीच सुधारणांचा डोलारा ऊभा असू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखकाने जे जे प्रतिगामी ते ते त्याज्य असा चूकीचा आगलावा दृष्टीकोन मांडलेला आहे त्यामुळे वरती खळबळ व वाद झालेले आहेत.

लेखकाने प्रतिगामी लोकांवर कोरडे ओढण्यापेक्षा पुरोगामी लोकांची थोडी अतिरेकी भलावण केलेली आहे. आणि वर वाद झालेले आहेत ते लेखकाने केलेल्या मांडणीविरोधात काहीच मुद्दे नसतानाही लोकांनी गलिच्छ पिंका टाकल्यामुळे उद्भवलेले आहेत.

पण प्रतिगामी असणे हे "लॉक स्टॉक बॅरल" त्याज्य असे म्हणता येत नाही. पूर्वसुरींच्या अनेक उत्तम विचारांवरतीच सुधारणांचा डोलारा ऊभा असू शकतो.

चांगलं प्रतिगामित्व म्हणजे नक्की काय? पूर्वसुरींनी मांडलेला विचार आपल्या आचारात आणणं म्हणजे प्रतिगामिता नाही. आता अनेक संतांनी सांगितलं आहे की जगावर प्रेम करा. तो संदेश केवळ जुन्या काळातला आहे म्हणून प्रतिगामी ठरत नाही. 'अमुक एखादी गोष्ट केवळ जुन्या काळपासून चालू आहे म्हणूनच चालू ठेवायची' हा हट्टाग्रह म्हणजे प्रतिगामिता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरचे काही प्रतिसाद वाचून. शिक्षीत, सधन, उच्च-मध्यमवर्गीय लोकांची परिस्थिती इतकी वाईट असेल तर सामान्यांचं काय अशी भिती वाटून गेली. कदाचीत, परिस्थितीचे चटके ज्यांना लागतात ते अशा बाबतीत जास्त सजग असतीलही. दुर्दैवी पण आशादायक, बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

निळ्या, चिकण्या, तुझे फोटो पाठव कोणालातरी. कारण शिक्षण आणि निरर्थक पिंका टाकून ट्रोलिंग करण्याची प्रवृत्ती यात तू प्रचंड गल्लत करतो आहेस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील प्रतिसाद हा डोक्यावर पडल्यावर सुचला किंवा कसे याबद्दल विचार करतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद,
आपल्या सर्वच प्रतिक्रिया अभ्यासपूर्ण आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःचे ढोल ऊर्फ ड्रम बीटिंग

http://www.misalpav.com/node/8468

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्तेचाचा, तुम्ही मराठी जालावरचे पुराणपुरुष आहात हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदितीदेवी या त्याहून पुराणपुरुष आहेत. आणि प्रकाश घाटपांडे/नानावटीसुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यना देखील जुने असावेत असे उपक्रमा वरुन वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थत्तेचाचा, मला तुमच्यात इंटरेस्ट, बाकीच्यांची नावे कशाला देताय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I won't hold it against you. यात तुमची काही एक चूक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>थत्तेचाचा, मला तुमच्यात इंटरेस्ट

घाबरलो ना, बै !!

यारों हसीनोंकी गली से मैं गुजरता हूं; बस दूर ही से करके सलाम !!!

(हलकेच घेणे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

( नंदन हा जालावरचा पुराणपुरूष असावा. (सद्ध्या अ‍ॅक्टीव्ह सगळ्यात जुना.) )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

येस. मुक्तसुनीतही असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

किंवा हा जंतूधागा --
http://www.misalpav.com/node/17722

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ताम्हणकरांचं हे लिखाण वाचून मनात काही विचार आले.

लेखकाला स्वतःला पुरोगामी म्हणवून घ्यायचंय का हा प्रश्न बाजूला ठेवला तरी, लेखकाची स्वतःची भूमिका काय हे पुरेश्या स्पष्टपणे मांडण्यात ते यशस्वी झालेले नाहीत, कदाचित हा माझ्या आकलन मर्यादेचा दोषही असू शकतो.

पुरोगामित्वावरचा ठाम विश्वास दर्शविण्यात लेखक कमी पडले आहेत असे वाटते, शेवटच्या परिच्छेदात जरी त्यांनी “जर मी पुरोगामी विचारांचा असेन तर मला त्याची अजिबात शरम अथवा खंत वाटणार नाही” असा म्हटलं असलं तरी त्यातून त्यांची केवळ दुबळी मानसिकता दिसून येते.

पुरोगामी विचारसरणी, भूतकाळ उगाळत बसणे यात गुंगून राहत नाही तर मानवजातीला भविष्याभिमुख होण्यासाठी निरंतर कृतिशील व प्रयत्नशील राहते. या प्रक्रियेचे प्रतिगामी-पुरोगामी असे बाइनरी विभाजन न करता, मानवी संस्कृतीची व्यामिश्रता जाणून-समजून घेऊन जे-जे त्याज्य ते टाकून देणे आणि जे-जे हितकर ते अंगीकारणे हे स्वरूप असते. एखादा विचार केवळ एखाद्या पुस्तकात (ग्रंथात म्हणा हवे तर) लिहिला आहे म्हणून तो पूज्य/त्याज्य असे म्हणता येणार नाही, मग ते पुस्तक मनुस्मृती, हदीस, नवा करार असो की, राज्यघटना, नागरी दंड संहिता वा इतर काही.

पुरोगामित्वाने एकलारेपण सोडून सर्वंकषतेची कास धरणे हे मला अधिक महत्वाचे वाटते. निषेध वा पुरस्कार करण्याचे मापदंड निश्चित झाल्यावरच मग “प्रतिगामी शक्तींनी मोदीजींच्या नेतृत्वाखालची सत्ता मिळवली आहे” की नाही याची सत्यता पडताळून पाहता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं आयडीनाम वाचून माझा शेंबुडच गायब झाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्मग्रंथातले "योग्य ते घेऊन, टाकाऊ ते टाकून" पुढे जाणे हे बोलणे सोपे, पण करणे नेहमीच अत्यंत अवघड असते, कारण धर्मग्रंथ देवदत्त, अपौरुषेय असून त्यात कदापीही बदल करणे /होणे शक्य नाही अशी त्या त्या धर्मातील धर्मलंडांची भूमिका असते. त्रिवार तलाक याबद्दल अशी भूमिका सध्याच मुसलमान धर्मवाद्यांनी घेतली आहे हे दिसतेच आहे . ज्यू धर्मात , बायबलच्या "जुन्या करारामध्ये" अनेक अमानुष शिक्षा आहेत . त्या आता कोणी पाळत नाही. पण मग त्या काढून का टाकत नाही असे विचारल्यावर ते शक्य नाही असेच उत्तर परवा अमेरिकेत रेडियोवर ऐकायला मिळाले . ख्रिश्चन समाज बायबल कडे दुर्लक्ष करूनच पुढे जाऊ शकला आहे . हिंदू धर्मानेही, प्रखर लढ्यानंतर का होईना, अनेक सुधारणा मान्य केल्या आहेत, आणि नशिबाने हिंदू धर्मात "ब्रम्हवृन्द" फारसे प्रबळ नाहीत . परंतु जातपात,आणि स्त्रीचे दुय्यम स्थान याबाबत जे सुप्त समज आहेत , त्यांच्यापुढे बहुसंख्य लोक जाऊ शकलेले नाहीत. तो लढा वैचारिक पातळीवर करावा लागणार आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

नशिबाने हिंदू धर्मात "ब्रम्हवृन्द" फारसे प्रबळ नाहीत

असं नाहीय हं.

अहो, हिंदू धर्मात, किंवा ज्याला कशाला हिंदू धर्म म्हणतात त्यात, "ब्रम्हवृन्द" प्रबळ आहे म्हणूनच तर तुलनेने हिंदू धर्म सर्वाधिक प्रागतिक, खऱ्या अर्थाने पुरोगामी, आणि वर्तमानाभिमुख आहे. (आदर्श जीवनप्रणाली नाही, पण सर्वोत्तम आहे).

तुलनात्मक उदाहरणे द्यायला हवीत का? तुमची "ब्रम्हवृन्द" ची व्याख्या सांगितलात तर देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>नशिबाने हिंदू धर्मात "ब्रम्हवृन्द" फारसे प्रबळ नाहीत .

ही खरी गोष्ट आहे. सध्याचे मुख्यमंत्री सत्तेवर आल्यावर पुण्यातल्या ब्रह्मवृंदाला आपली सत्ता आली असल्याचा उगाचच भास झाला. मग त्यांनी काशीबाई मस्तानीच्या निमित्ताने आपला आवाज उठवला. पण आपला भास हा भासच असल्याचे लवकरच त्यांना कळले !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Formal "Church" formation. An apex body giving decisions ex cathedra.
Even Islam does not have this. The ulema in each area functions as a "franchise". That is why there are so many "interpretations" of Islam.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

ऐसीवरचे खरे पुरोगामी माझ्या प्रश्नांना का टाळतायत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे घ्या तुम्हाला काही प्रश्न.
१. ऐसीवर खरे पुरोगामी आहेत असं कोणी सांगितलं? सगळे खोटारडेच असतील तर?
२. कदाचित खरे असतीलही, पण त्यांना तुमचे प्रश्न हे गंभीरपणे ज्ञान मिळवण्यासाठी नसून उगाच लोकांच्या अंगावर जाण्यासाठी आहेत असं वाटलं असेल तर?
३. त्या खऱ्याखुऱ्या पुरोगाम्यांना उग्गाच्च्या उग्गाच प्रश्न विचारणाऱ्यांचा आणि त्यांना उत्तरं देण्याचा कंटाळा आला असेल तर?
४. इथेच या लेखावर बरेच प्रतिसाद आहेत त्यांतून तुमच्या बहुतेक प्रश्नांना उत्तरं मिळतात असं वाटलं असेल तर?
५. तुम्हीच गूगल करून पाहा आणि मिळतील ती उत्तरं मांडा असं सुचवायचं असेल तर?
६. सरळ उत्तर न देता 'ए चिकणे, तुझा फोटो पाठव कोणालातरी' असलं काहीतरी यडपटासारखं बरळायचं असेल तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला माझे चांगले इंटेशन दिसतच नाही तर काय करणार Sad

मी खरी पुरोगामी, पण असले लेख पाडणार्‍या स्युडो पुरोगाम्यांमुळे मला स्वताला चारलोकात "मी पुरोगामी आहे" असे सांगायला लाज वाटते. कारण चार लोक माझ्या कडे पण काय वेडी/विकृत बाई आहे असे बघायला लागतील.
कदाचित बर्‍याच ऐसीकरांचे तसेच असावे.

इथेच या लेखावर बरेच प्रतिसाद आहेत त्यांतून तुमच्या बहुतेक प्रश्नांना उत्तरं मिळतात असं वाटलं असेल तर?

नाही उत्तर मिळाले. माझे प्रश्न सोप्पे होते, खरा/खोटा पुरोगामी ओळखायचा कसा आणि लेखक कोणत्या कॅटेगेरीत मोडतो?

तुम्हीच गूगल करून पाहा आणि मिळतील ती उत्तरं मांडा असं सुचवायचं असेल तर?

ऐसी करांनी माझ्या ह्या प्रश्नांची उत्तरे आधीच जालावर दिली असतील हे माहिती नव्हते.

सरळ उत्तर न देता 'ए चिकणे, तुझा फोटो पाठव कोणालातरी' असलं काहीतरी यडपटासारखं बरळायचं असेल तर?

काय कोणाला बरळायचे असेल तर बरळु दे ना. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा इतका टोकाचा संकोच ऐसीवर व्हावा असे वाटते का तुम्हाला. तसेही ह्या लेखापेक्षा जास्त येडपटा सारखे कोणी बरळु शकेल असे तुम्हाला वाटते का? ( खर सांगा हं )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> काय कोणाला बरळायचे असेल तर बरळु दे ना. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा इतका टोकाचा संकोच ऐसीवर व्हावा असे वाटते का तुम्हाला. <<

बस कर पगली, अब रुलाएगी क्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्वताला चारलोकात "मी पुरोगामी आहे" असे सांगायला लाज वाटते. कारण चार लोक माझ्या कडे पण काय वेडी/विकृत बाई आहे असे बघायला लागतील.

म्हणजे आत्ता बघत नाहीत, अशी आपली प्रामाणिक समजूत आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरळ उत्तर न देता 'ए चिकणे, तुझा फोटो पाठव कोणालातरी' असलं काहीतरी यडपटासारखं बरळायचं असेल तर?

प्रश्न सरळ भाषेत विचारलेला नव्हता. खरंतर प्रश्न नव्हताच तो. ते एक विधान होते. चेष्टेच्या सुरातले होते. ते विधान खाली नमूद करत आहे.

गब्बु, तू आता काहीही बोलायला लागला आहेस असे अत्यंत खेदानी नमुद करायला लागते आहे.

व म्हणून मी उत्तर चेष्टेच्याच सुरात दिले.

बोनस - संदर्भ - GRE word = bantering.

बाकी : "ए चिकणे, तुझा फोटो पाठव" हा गब्बर चा कॉपीराईटेड डायलॉग असावा का यावर विचार करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्रर्र... मला वाटलं की तुम्ही जर कोणाला वर्ड सॅलड म्हणून हिणवू शकता, तर तुमच्या बोलण्याला यडपट बरळणं म्हटलेलं चालेल. मला वाटलं होतं की यु कुड टेक व्हॉट यू डिश आउट. तुम्हाला झेपलं नसेल तर सॉरी हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्रर्र... मला वाटलं की तुम्ही जर कोणाला वर्ड सॅलड म्हणून हिणवू शकता, तर तुमच्या बोलण्याला यडपट बरळणं म्हटलेलं चालेल. मला वाटलं होतं की यु कुड टेक व्हॉट यू डिश आउट. तुम्हाला झेपलं नसेल तर सॉरी हा.

नाय नाय. मी इतरांना (ते कोणीही असोत) फडतूस म्हणतो ... मग इतर कुणीही मला काहीही बोललं तरी ठीकाय. अभिव्यक्तीवर बंधनं कमीतकमी असावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय नाय. मी इतरांना (ते कोणीही असोत) फडतूस म्हणतो ... मग इतर कुणीही मला काहीही बोललं तरी ठीकाय. अभिव्यक्तीवर बंधनं कमीतकमी असावीत

काय रे गब्बु तू. फारच सत्प्रवृत्त आहेस ( किंवा ढोंगी आहेस ) .

माझे मात्र तुझ्या सारखे नाही. मी इतरांना काहीही म्हणीन. इतरांपैकी काही सिलेक्टेड लोकांनी मला काहिही म्हण्ले तरी चालेल ( जसे तू, शुचि, मनोबा, बॅटोबा, थत्तेचाचा आणि चिंजं ही सध्याची लिस्ट ). बाकीच्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला माझ्या लेखी मान्यता नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजचे पुरोगामित्व हे आत्ममग्न व निव्वळ प्रतिक्रियात्मक झाले आहे हे म्हणणे कितपत खरे आहे ? पुरोगामी विचारांचा प्रचंड प्रभाव सरकारी धोरणांवर दिसतो: उदा. स्त्री-भ्रूण-हत्ये विरुद्धचे कायदे , अगदी सोनोग्राफीवर सुद्धा बंदी , किंवा ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करायला महाराष्ट्र्राच्या आजच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नकार देणे , किंवा घटस्फोट आणि मालमत्तेविषयक कायदा आता बराच स्त्रियांच्या बाजूचा झाला आहे हे सत्य वगैरे वगैरे.
किंबहुना पुरोगाम्यांचा प्रभाव नको तितका वाढत जाईल या भीतीने राम-जन्मभूमी नावाचे निर्लज्ज, आपमतलबी 'आंदोलन' करून, हजारो निरपराध नागरिकांची हत्या घडवून सध्याचे सरकार आणले गेले आहे. या प्रचंड पाताळयंत्री उद्योगावरून प्रतिगाम्यांनी पुरोगामी विचारांचा किती धसका घेतला आहे हेच सिद्ध होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

लेख आणि प्रतिक्रिया रोचक आहेत.

कॉन्जर्व्हेटीव्ह विचारसरणीला १. प्रतिगामी २. पुराणमतवादी अशा प्रकारची भाषांतरं योजलेली आढळतात. कॉन्जर्व्हेटीव्ह विचारसरणीवाल्यांचा विरोध या शब्दांपासूनच सुरू होईल. समाज, लोक, राष्ट्र , संस्कृती यांना "जतन" करणारे, त्यांच्यातला "बिघाड थांबवणारे" लोक हे १. मागे जाणारे, काळाच्या मागे पडलेले २. जुनाट, कालसुसंगत नसलेले आहेत असा त्याचा सूचित अर्थ आहे आणि त्यामुळे या भाषांतरांमधे मतप्रदर्शन आहे. त्यामुळे पुरोगामी/प्रतिगामी या मांडणीमधे सुरवातीलाच माशी शिंकते.

तर, एकंदर या कॉन्जर्व्हेटीव्ह विचारसरणीमधे मला एका समूहाच्या पातळीवर जाणवलेली - आणि प्रसृत केलेली - भयाची, असुरक्षिततेची भावना (जिला अनेक पदर असू शकतात) हा सर्वात प्रमुख घटक दिसतो. संस्कृतीचं रक्षण आणि संवर्धन, देशाला रसातळापासून नेण्यापासून वाचवणं, "परक्या" लोकांच्या अतिक्रमणापासून, अरेरावीपासून "स्वकीय" किंवा "धरतीच्या लेकरांना" वाचवणं ही मला कॉन्जर्व्हेटीव्ह विचारसरणीची प्रमुख लक्षणं दिसतात. (पहा : "मुस्लिमांची अरेरावी ठेचून काढणे" , "ज्यू नावाच्या नीच वंशाची घाण काढून टाकणे" , "मेक्सिकन बेकायदा लोकांना अडवण्याकरता भिंत बांधणे" , "बांगलादेशीयांना हाकलणे" , "माजलेल्या भैय्या लोकांची नांगी ठेचणे")

तर एकंदर कॉन्जर्व्हेटीव्ह विचारसरणीमधे "आपण कोणीतरी ग्रेट्,महान होतो आणि त्या स्थितीकडे आपल्याला परत जायचंय आणि त्याकरता आहे तो माजलेला चिखल स्वच्छ करायचाय आणि असं करणार्‍या आम्हाला सत्ता द्या नाहीतर तुमचा नाश ठरलेला आहे" असं एकंदर नॅरेटिव्ह मला जाणवतं. "सनातन तेजाची प्रभात"/"मेक द कंट्री ग्रेट अगेन" आणि "भ्रष्टाचारमुक्त देश"/"ड्रेन द स्वांप" अशी - थोडक्यात Grandiose delusions and fear-mongering ( xenofobia in particular) ही द्विसूत्री मला इथे दिसते. आता या दोन गोष्टी कितपत रास्त आहेत यावर वादंग माजतात हे उघड आहे. आणि जगात घडलेल्या अलिकडच्या बर्‍याच राजकीय घडामोडींमधे या दोन घटकांचं प्राबल्य कॉन्जर्व्हेटीव्ह विचारसरणीच्या सरशीमागे दिसतं.

त्यामुळे माझ्यामते प्रतिगामी पेक्षा कॉन्जर्व्हेटीव्ह करता योग्य असा प्रतिशब्द - आणि तशी मांडणी - सुसंगत होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

चांगल्यापैकी सहमत आहे.

माझ्या मते काँझर्व्हेटिव्ह लोकांना परंपरा, अथॉरिटी, लॉयल्टी यांचे खूप प्रेम असते.

तुमचा तिसरा परिच्छेद हा थोडा बदलला तर तो पुरोगाम्यांचे वर्णन होऊ शकेल. आपले कोणीतरी शोषण केलेले आहे व त्यामुळे आपली दयनीय अवस्था आहे व त्यासाठी ते शोषक हटवले पाहिजेत व म्हणून आम्ही सत्तेवर येणे महत्वाचे आहे असं पुरोगाम्यांना ठसवायचं असतं. ते जे शोषक आहेत त्यांच्या पॉवर चा वापर तुमच्या विरुद्ध करतील व आणखी शोषण करतील असे पुरोगाम्यांचे नॅरेटिव्ह असते. बर्नी सँडर्स हे उत्तम उदाहरण. कॉर्पोरेट ग्रीड, बँकांना बडवा, मिलियनेअर्स आणि बिलियनेअर्स ची भीती घालायची. पुढे "तुम्हाला तुमच्या वैद्यकीय उपचारानंतर दिवाळखोरी जाहीर करायला लागेल" अशी भीती घालायची. दुसरे वेगळे उदाहरण क्रुश्चेव्ह. "वुई विल बेरि/बुरी यू" ही दर्पोक्ती - आम्ही ताकदवान आहोत आणि आम्ही "तुमचे" तथाकथित शोषण मोडून काढू असा दावा करणारेच होते. राहता राहिल्या "Grandiose delusions". सोव्हिएत युनियन हे माझ्या मते विश्वातले सर्वात Grandiose delusion होते. A supposedly fully integrated corporation. साम्यवादा च्या फंदात खरंतर पुरोगामी नसतात पण त्यांना समाजवादाच्या जवळपास खूप जायला हवं असतं. बर्नी सँडर्स ना नॉर्डिक मॉडेल चे प्रेम आहे. कुमार केतकरांचं सुद्धा कॅस्ट्रो, सोव्हिएत युनियन यांचं प्रेम मधून मधून उफाळून यायचं. आजकाल केतकर काय लिहितात ते माहीती नाही. इंदिराबाईंनी "गरीबी हटाव" चा नारा दिला होता तो सुद्धा असाच होता. अतिमहानतेचा सोस. जणू काही गरीब हे जन्मतःच नीतीवान, चरित्रवान, कष्टाळू, प्रज्ञावान असतात आणि संपत्तीवर त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच असतो. गरीबी हटली नाहीच. आणि गरीब पण हटले नाहीत. पी साईनाथ हे एक असेच (माझ्या मते) पुरोगामी. "पाणी हा मूलभूत अधिकार असायला हवा" म्हणे. हे म्हंजे ओबामा सारखे "हेल्थकेअर इज अ राईट" म्हणण्यासारखेच आहे. सेक्युलर भारतदेश बनवण्याचा सोस हे पण Grandiose delusion आहे. सेक्युलर सरकार बनवले तरी डोक्यावरून पाणी गेले अशी स्थिती आहे. पंचवार्षिक योजना हे सुद्धा Grandiose delusion होते. बरं झालं मोदींनी त्यांचं तेरावं घातलं ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद,
आपल्या प्रतिक्रियेची अभ्यासपूर्वक नोंद घेतली आहे. मुद्दाम वेळ काढून आपण लिहिलेत आणि त्या मुळे मी वैचारिक दृष्ट्या थोडा पुढेच गेलो हे नक्की. माझ्या लेखाच्या खूप वरच्या पातळीवरून केलेली समीक्षा. पुनश्च धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम +१!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पुरोगामी लोकांना भ्रष्टाचार फार गंभीर वाटत नाही असं वाटायला लागलं होतं. तो समज आता पक्का होत चालला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

भ्रष्टाचाराच्या व्याख्येवर अवलंबून आहे. एकादशीला अंडी खाणे हा "भ्रष्टाचार" पुरोगाम्यांना डेफिनेटली चालतो.

बाकी भ्रष्टाचाराविरोधात जेन्युइन आंदोलनं आपल्या देशात तरी ज्यांना "पुरोगामी/फुरोगामी" म्हणून हिणवले जाते त्यांच्यातल्या लोकांनीच केली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जंगलात दूरवर देवीचं देऊळ होतं. सर्व प्राणी दर एकादशीला तिथे चालत जाऊन तिचे दर्शन घ्याचे. कोंबडी मात्र रिक्षाने जायची. का?
कारण एकादशीला कोंबडी चालत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

हीहीही!!! फारच सुंदर जोक. मझा आ गया !!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वित्झर्लंडातल्या गायी समाधानी का असतात?

कारण त्यांच्या दुधाचे चीज होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा!! वा!! Smile फारच मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरेशास्त्री - खर्‍या का खोट्या पुरोगाम्यांबद्दल बोलताय तुम्ही? आधी असे दोन प्रकारचे पुरोगामी असतात असे वर कोणीतरी म्हणले आहे. तुम्ही कुठलेही वाइट उदाहरण दिलेत पुरोगाम्यांचे की "हे" लोक म्हणणार की तो तर खोटा पुरोगामी आहे. खरा कोणे, खोटा कोण हे तर सांगायचे नाही.

थोडक्यात काय तर, "मी" सोडुन बाकी सर्व खोटे पुरोगामी इतकी साधी सरळ स्ट्रॅटेजी असते.

अजुन एक, जो स्वताच्या तोंडानी "मी पुरोगामी" असे ओरडतो आहे आणि वर असे लेख पाडतो आहे तो नक्की "खोटा पुरोगामी" असणार अशी माझी थिअरी.

------
काल हा लेख वाचुन मला पुण्यातल्या एका पुरोगामी समाजवाद्याचे नाव आठवले. माझी मुलगी लहान होती तेंव्हा मी तिला त्याचा धाक घालायचे ( "रडणे थांबव नाहीतरे कुमार ला फोन लाविन" अशी धमकी देऊन )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकशाहीचे गुणगान गाताना बिन्दिक्कत हुकूमशहांचं उदात्तीकरण केलं जातं. इथेही नेहेमीप्रमाणे आणिबाणीची भलामण केलेली आहे. कशी ती अपरिहार्य होती वगैरे टॅण-टॅण करून. कॅस्ट्रोची चर्चा अलिकडेच पाहिली. जालावर देखील क्युबा कसा आरोग्य, शिक्षण, रोजगार याबाबत आयडीअल होता अशा पोस्टी पाहिल्या आहेत. (खखोदेजा.) "संघी लोकांना हुकूमशाहीबद्दल आकर्षण असतं. पण आरामदायी हुकूमशहीपेक्षा थोडी कमी आरामदायी लोकशाही हवी." असं म्हणणारे लोक सोशलिस्ट हुकूमशाहीबद्दल बरोब्बर उलट भूमिका घेतात आणि भरपूर ग्लोरिफिकेशन करतात. "त्याने कत्तली केल्या त्या वाईट पण..." अशी पालुपदं दिसतात. हा विरोधाभास त्यांना समजत नाही का विरोधाभास आहे हे लोकांना समजणार नाही असा समज असतो कोणास ठाऊक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

वरील प्रतिसादात xenophobia असं स्पेलिंग* पायजेलाय. बाकी सगळं मान्य आहे.

*प्रतिवाद न आल्यास व्याकरणाच्या चुका काढा !! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

*प्रतिवाद न आल्यास व्याकरणाच्या चुका काढा !! (लोळून हसत)

शिकलात तुम्ही थत्ते. तुम्हीही ऐसीच्या तालमीत बनलात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हुष्य! आपण आपल झेपेल तेवढ पुरोगामी व सोसेल तेवढ प्रतिगामी असलेल बरं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

या गामींच्या कच्छपी न लागता, माणसाने पुरो-प्रति का होऊ नये ?
बाकी, प्रतिगामी जसे दैववादाचा आंधळा पुरस्कार करतात तसेच पुरोगामी ही आणीबाणी सारख्या घटनांची सोयीची भलामण करतात, हे पाहून करमणुक जाहली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी जौंद्या !!!
पण एकूण राजीव गांधींच्या खुनाबाबतचे विवेचन पाहता हा कुमार केतकरांचा डु आयडी आहे की काय असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नै म्हंजे सगळंच ठेवा आधी बाजूला आणि मला एक सांगा, आपल्याच लेखावर आपणच प्रतिक्रिया दिली म्हंजे तुम्ही 'थोर' आणि 'मान्यवर' लेखक नाही असं काही आहे काय हो ?
म्हंजे बर्‍याच दिवाळी-दसर्‍याला इंपोर्टेड लेखकांचं पाह्यलंय आधी (त्यांचं समजू शकतो एकवेळ) आणि हे लेखकराव पण आपलं लिखाण इथं टाकून चर्चेतून गायब आहेत ( ते दोन धन्यवादी प्रतिसाद ग्राह्य धरलेले नाहीत). गुर्जी आणि इतरजण आपले बसलेत भांडत. Wink
प्रतिसादाची सुविधा असताना आढ्यतेने चार-चार दिवस (आणि त्यानंतरही) न (धन्यवादी प्रतिसादाव्यतिरिक्त) फिरकणार्‍या लोकांना इतरेजनांना बौद्धिके देण्याचा काही अधिकार नाही असं वाटतं. एकप्रकारे जे मताशी सहमत आहेत त्यांनाच धन्यवादी प्रतिसाद देऊन इतरांना इग्नोर करुन लेखकु त्या लोकसत्तेच्या अग्रलेखाच्या एका मुद्द्यालाच (converting the converted) थोडेफार सिद्ध करत आहेत इथं.

याउप्पर ज्या या अशा नाक वर करुन चालणार्‍या स्वयंघोषित तथाकथित लोकांमुळे पुरोगामी विचारांचं (जे इथे अनेकजण समर्थपणे मांडतात) खूप नुकसान होतं ही वस्तुस्थिती आहे.

त्याचबरोबर लेखात, त्यातल्या बर्‍याचशा रेफरन्सेसमध्ये गंभीर आणि द्वेषमूलक चुका दिसत असूनही फक्त पुरोगामीपणाचा झेंडा लावलाय म्हणून इथल्या बर्‍याच जणांनी (गुर्जींसहित!) त्यावर सुस्प्ष्ट टिका/वक्तव्य न करता फक्त विरोध करणार्‍यांचा परामर्श (लेखकाच्या वतीने म्हणू हवेतर) घेण्याचे हाती घेतलेले पाहून तर सखेद आश्चर्य पण वाटलं. म्हंजे हाच लेख जर परंपरांची भलामण करणारा (ते मुखपत्रीय लेखन आठवा) असता तर याच लोकांनी याच संदर्भांची पहिली पिसं काढली असती. त्यांनीच सपशेल चूक अशा मुद्द्यांवर एकतर बोलणं टाळलंय अथवा मोघम असा पुसट उल्लेख करून "पण सुरुवातीच्या काही परिच्छेदात पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्यातले फरक मांडण्यात लेखक यशस्वी झालेला आहे" असं जर गुर्जींचं मत होत असेल तर ते खूपच आश्चर्यकारक वाटतंय.

इथे गुर्जी हे फक्त प्रतिकात्मक आयडी आहेत (आणि त्यांच्या लॉजिकल अशा प्रतिसादाबद्दल आदर असतोय म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा.. Smile )

बाकी "फोटो पाठव" अथवा "वर्ड सॅलड" वर (कुठल्याही बाजूने) वाद प्रतिवाद करण्यात काही हशील नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

लेखकाने लेख टाकून चर्चेत भाग न घेण्याच्या तक्रारीबद्दल सहमत. चर्चा पुढे नेण्याची आणि तीत काही गैरसमज निर्माण न होऊ देण्याची, लोकांच्या प्रश्नांना वेळोवेळी उत्तरं देण्याची जबाबदारी चर्चाप्रस्ताव मांडणाराकडे असते. ही अपेक्षा ऐसीच्या धोरणांतही लिहिलेली आहे. इथे लेखकाने केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतल्याचं खटकलं.

त्याचबरोबर लेखात, त्यातल्या बर्‍याचशा रेफरन्सेसमध्ये गंभीर आणि द्वेषमूलक चुका दिसत असूनही फक्त पुरोगामीपणाचा झेंडा लावलाय म्हणून इथल्या बर्‍याच जणांनी (गुर्जींसहित!) त्यावर सुस्प्ष्ट टिका/वक्तव्य न करता फक्त विरोध करणार्‍यांचा परामर्श (लेखकाच्या वतीने म्हणू हवेतर) घेण्याचे हाती घेतलेले पाहून तर सखेद आश्चर्य पण वाटलं.

इथे माझा उल्लेख, प्रातिनिधक म्हणून का होईना, केल्याने उत्तर देणं भाग आहे. एकंदरीत बरोबर पण तपशीलात चुका असं असेल तर मी तरी शक्यतो एकंदरीत बरोबर काय आहे हे पाहाण्याचा प्रयत्न करतो. (पटाईतकाकांचे अंधश्रद्धेबाबतचे विचार पूर्णपणे पटलेले नसतानाही त्यातलं योग्य काय ते निवडण्याचा मी प्रयत्न केला. एरवी उरलेल्या भागाची तुम्ही म्हणता तशी पिसं काढता आली असती.) त्यात पुरोगामी हा शब्द पाहूनच वांत्या होण्याचं प्रमाण सध्या प्रचंड आहे. त्यामुळे प्रतिसाद हे जास्त रिअॅक्टिव्ह झाले हे खरं आहे. पण त्याचबरोबर मी लेखाच्या विषयाला जोड देणारे मुद्दे, स्वतंत्र प्रतिसादही लिहिलेले आहेत. दुर्दैवाने सुरुवातीचे प्रतिसाद हे भस्सकन 'वर्ड सॅलड' म्हणणारे होते. त्यात लेखनाचं आकलन असण्यापेक्षा एक पिंक टाकून देण्याची प्रवृत्ती दिसली. अशा प्रवृत्तींचा ऐसीवर प्रादुर्भाव होऊ नये हीही माझ्यावर संपादक-व्यवस्थापक म्हणून जबाबदारी आहे. ऐसीवर लेखकाकडून एक किमान प्रयत्न घेण्याची अपेक्षा असते तशीच लेखावर किंवा प्रतिसादावर टीका करणाराकडूनही असते. असो. वाचनीय लेख आणि प्रतिसादांची परंपरा ऐसीवर कायम राहो हीच सदीच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला जे म्हणायचंय ते मूळ लेखात म्हटलं आहेच. त्यानंतर जरा वेळ मिळाला नाही.
पण पूर्वग्रहदूषित मतांचे परिवर्तन करण्याची गरज नाही.
'त्याचबरोबर लेखात, त्यातल्या बर्‍याचशा रेफरन्सेसमध्ये गंभीर आणि द्वेषमूलक चुका आहेत' त्या कोणत्या? ते कोणीही सांगितले नाही, त्यामुळे त्यावरही लिहिण्यासारखे नाही. संपादकीय सहभागाबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संयमी प्रतिसादाबद्दल आभार.
मी मला खटकलेल्या गोष्टी मांडल्या आणि एकंदरीत आपल्या भावना पोचल्या.. ( या लेखाबद्दलची माझी मते तशीच आहेत पण ते असो).

वाचनीय लेख आणि प्रतिसादांची परंपरा ऐसीवर कायम राहो हीच सदीच्छा.

अर्थात बिनशर्त सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात जाणाऱ्या मताचा विरोध करण्याची आवश्यकता वाटते.

प्रतिसादाची सुविधा असताना आढ्यतेने चार-चार दिवस (आणि त्यानंतरही) न (धन्यवादी प्रतिसादाव्यतिरिक्त) फिरकणार्‍या लोकांना इतरेजनांना बौद्धिके देण्याचा काही अधिकार नाही असं वाटतं.

व्यक्तिगत मानहानीकारक मजकूर, तत्सम अपवाद वगळता कोणी काय बौद्धिकं (वा, वा संघिष्ट शब्द पुरोगाम्यांबद्दल वापरून पवित्र करून घेतला) घ्यावीत यावर ऐसीवर काहीही बंधन नाही, कधीही असू नये. अशा लेखन आणि लेखकांकडे लक्ष द्यायचं का नाही, याचा निर्णय घेण्यासाठी सदस्य समर्थ आहेत, तेवढी सदस्यांची पात्रता निश्चितच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात जाणाऱ्या मताचा विरोध करण्याची आवश्यकता वाटते.

अर्थात, त्यात दुमत नाहीच. या वाक्याचा माझ्या प्रतिसादाशी संबंध दिसला नाही.

व्यक्तिगत मानहानीकारक मजकूर, तत्सम अपवाद वगळता कोणी काय बौद्धिकं (वा, वा संघिष्ट शब्द पुरोगाम्यांबद्दल वापरून पवित्र करून घेतला) घ्यावीत यावर ऐसीवर काहीही बंधन नाही, कधीही असू नये.

बंधन असावे अशी मागणीही नाही (तुम्हाला का वाटलं काय माहीत!). मात्र तशी अपेक्षा ठेवण्यात काय गैर आहे ?
सारांशरुपाने घासकडवींच्या या मताशी सहमत,

चर्चा पुढे नेण्याची आणि तीत काही गैरसमज निर्माण न होऊ देण्याची, लोकांच्या प्रश्नांना वेळोवेळी उत्तरं देण्याची जबाबदारी चर्चाप्रस्ताव मांडणाराकडे असते.

इथे तुम्ही/ गुर्जी अथवा इतर सदस्य हिरिरीने मते मांडत असताना, एखादा मुद्दा, विचारलेल्या शंका अथवा केलेले आक्षेप या सगळ्याला उत्तर देत असताना लेखक जर "माझे मत मांडून झालेले आहे आणि आता इतरांच्या पूर्वग्रहदूषित(!) मतांचे परिवर्तन करायची गरज नाही " असा पवित्रा घेत असेल तर तो आढ्यताखोरपणाच झाला हो. कोणाच्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अपेक्षा एकतर्फी नसावी इतकीच अपेक्षा.

बौद्धिकं (वा, वा संघिष्ट शब्द पुरोगाम्यांबद्दल वापरून पवित्र करून घेतला)

यावर आक्षेप.. बौद्धिकं ही संकल्पना कोणाची मक्तेदारी नाही आणि पुरोगामित्व देखील कोणाची मक्तेदारी नसावी.
पुरोगाम्यांबद्दल वापरून काही पवित्र/मलिन होत नाही की संघिष्टांबद्दल वापरुन काही मलिन/पवित्र होत नाही (त्या तुमच्या संकल्पना असाव्यात).
मी कोणत्याच बाजूचा नाही, कोणत्याच शब्दांचे पेटंट कोणी घेतलेले/कोणाला दिलेले मान्य नाही आणि म्हणून न पटलेल्या प्रत्येक गोष्टीला त्याच जोड्याने टोले देऊ शकतो, पुरोगाम्यास कोल्हापुरी आणि संघिष्टास पादुका असला प्रकार अमान्य आहे ( उपमा, भावार्थ समजून घ्याल अशी अपेक्षा, नै म्हंजे आजकाल कोणाच्या भावना कशा दुखावतील सांगता येत नै म्हणून ढिस्क्लेमर.)

काही सदस्यांबद्दल मनात एक गृहितक धरुन सदैव तिरकस प्रतिसाद देण्याची तुमची पद्धत तुमच्या लॉजिकल प्रतिसादांनादेखील उगीच भ्रष्ट करते असं वाटतं ( पटलं तर घ्या नै तर सोडून द्या, तुम्ही कसे प्रतिसाद द्यावेत हे सांगायचा मला अधिकार नाही हे मान्य आहेच).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

... असा पवित्रा घेत असेल तर तो आढ्यताखोरपणाच झाला हो.

मतभेद आहेत. पण आता वेळ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखकाचे विचार मान्य अमान्य कसेही असले तरी एक प्रश्न आहे- ही लेबलं लावून काय मिळतं?
म्हणजे समजा, मी मानलं की "पुरोगामी" आहे असं ठरवलं तर मी नक्की कोण असेन आणि काय करावं अशी अपेक्षा आहे?
पुरोगामी ह्या अवाढव्य लेबलाखाली नक्की काय काय येतं आणि त्याचा अर्थ काय?
प्रत्येक जण ह्या शब्दाचा हवा तसा अर्थ काढून त्यावर पुन्हा वाद वगैरे घालणार, मग त्याच्या बाजूने आणि विरूद्ध बोलणार.
मुळात हे असले उद्योग हवेच कशाला? मुद्द्यावर बोला.
उदा. "संडासातच शी करावी का" ह्या प्रश्नावर तुमचं काय मत आहे? जर तुम्ही "कुठेही हगावं" ह्या मताचे असाल तर तुम्हाला प्रतिगामी म्हणावं की त्यापेक्षा "हे काही बरोबर नाही." म्हणून मुद्द्याला विरोध करावा?

मला हा ओव्हरऑल "पुरोगामी प्रतिगामी" वाद बर्‍यापैकी निरर्थक वाटतो. स्वतःला एखाद्या लेबलाखाली पुराव्याने शाबीत करण्यासाठी इतका आटापिटा करण्यापेक्षा तीच उर्जा प्रत्यक्ष मुद्द्यांवर भांडण्यात खर्च झालेली बरी.

१ - पु.ल. दुसरं कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या उदाहरणादाखल हा लेख वाचा. महारोचक आहे.

https://thewire.in/86687/open-defecation-swachh-bharat/

Kamars are not the only ones feeling the pain of the Swachh Bharat Abhiyan. Many villagers from other social groups – particularly the elderly – have been hit. Kankabti, a 55-year-old woman from Mundrakasa village has been coerced into using the toilets by the members of the vigilance committee. She says that while in the toilet, she feels like she is inside a pucca ghar (finished house) whereas her house is only made of clay (kaccha ghar). She is not in the habit of sitting in that position and is being forced into using the toilets.

हा पेपर पुरोगामी आहे असा माझा समज आहे. सो पुरोगामी लोक कुठेही हगावं या मताचे नसतात असं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

खरोखर कसला विनोदी लेख आहे! याच्यात एक मस्त सिनेमा होण्याचं पोटेन्शियल आहे. या लेखामध्ये जे 'अहाहा, ते नैसर्गिक, वाटेल तेव्हा वाटेल तिथे हगणं हेच कसं स्वातंत्र्याचं प्रतीक आहे' वगैरे चित्र उभं केलं आहे ते फारच पोरकट वाटलं.

इथे पुरोगामी आणि प्रतिगामी या लेबलांचा खेळ दिसून येतो. संडासात शी करावी यात एक बंदिस्तपणा आहे, त्यामुळे त्याकडे 'निर्बंध' म्हणून पाहाता येतं. आणि असे निर्बंध घालणारे अन्यायकारक असं चित्र लेखात उभं केलं आहे. मात्र 'मलमूत्रनिस्सारणव्यवस्था सुनियोजित व्हावी' असा हेतु बाळगणंही योग्यच आहे. त्यामुळे त्या दिशेकडे प्रवास करणं हे माझ्या मते पुरोगामी पाऊल आहे.

याचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रवास आणि रस्त्यांविषयी देता येईल. जेव्हा रस्ते नसतात तेव्हा टोळीतला कोणीही कोणाकडेही डायरेक्ट रस्त्याने जातो. मात्र टोळीचं जेव्हा गाव होतं, आणि चालत प्रवासाऐवजी वाहनांनी प्रवास होतो, तेव्हा रस्ते निश्चित करणं, आणि त्यांवर जाण्याचे नियम निश्चित करणं महत्त्वाचं ठरतं. एकंदरीत जनतेचं आयुष्य सुरळित होण्यासाठी सर्वांवर काही मर्यादित नियम/बंधनं घालून घेणं हे मला गैर वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटाकडे आलेला हा परिच्छेद वाचलात का? विशेषतः त्यातली पहिली दोन-तीन वाक्यं -

Cleanliness is no doubt imperative, as is good health. For centuries we have thought and conversed about this and even made some changes. For this reason, we need to be sure that any such programme needs to have people’s participation and their trust and is not built upon coercion and fear. Our society needs to be vigilant about such a problem. We can ask, is the campaign around ODF India and toilets actually for cleanliness and health? Is it producing the clean and healthy India that it envisions? Do toilets themselves ensure cleanliness and health? Or, are Swachh Bharat Abhiyan activities equivalent to sweeping up the dirt in one’s house only to deposit it under one’s pillow?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या वाक्यांचा आणि मी जे लिहिलं आहे त्याचा नक्की काय संबंध आहे?

माझा मुद्दा हा केवळ कुठच्या ध्येयाकडे प्रवास करावा याबद्दलचा आहे. त्या प्रवासात लोकांना फरफटत नेण्यापेक्षा सगळ्यांनीच जाणूनबुजून, निवांतपणे का होईना, पण शक्य तितक्या आनंदाने प्रवास करावा हे उत्तमच.

मी एक पर्यायी प्रश्न विचारतो. हेल्मेट वापरण्याची कायद्याने सक्ती व्हावी का? माझ्या मते व्हावी. ज्यांना हेल्मेटं न वापरता मुक्त फिरण्याची सवय आहे, त्यांना ही जबरदस्ती वाटेल का? हो, अर्थातच वाटेल. पण समाजाच्या भल्यासाठी, आणि किंबहुना हेल्मेटं न घालणारांच्या भल्यासाठी ते आवश्यक आहे का? हो, आहे. आता या जबरदस्तीचा त्रास किती आणि त्यातून फायदा किती, हे तपासून पाहावं लागतंच. कारण एंड जस्टिफाय द मीन्स यासारख्या टोकाच्या तत्त्वज्ञानावर कोणी विश्वास ठेवू नये.

बायदवे, त्या लेखात जी काही आकडेवारी वापरलेली आहे ती अत्यंत हास्यास्पद आहे. संडासात जाण्यासाठी तुम्हाला दरवेळी १२ लीटर पाणी वापरावं लागतं असं म्हटलेलं आहे. लेखक कधी फ्लशशिवायच्या संडासात गेलेला/ली नाही का...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखामध्ये जे 'अहाहा, ते नैसर्गिक, वाटेल तेव्हा वाटेल तिथे हगणं हेच कसं स्वातंत्र्याचं प्रतीक आहे' वगैरे चित्र उभं केलं आहे ते फारच पोरकट वाटलं.

असं चित्र मलातरी दिसलं नाही. जिथे हवं तिथे, हवं तेव्हा घाण करणं हे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, असं तुम्हाला कोणत्या लेखात दिसलं, किंवा कोणत्या ओळींमुळे जाणवलं, किंवा आपण एकच लेख वाचला का, असे प्रश्न पडले.

तुमचा पर्यायी प्रश्न सोडूनच द्या. कारण तो प्रश्न अवाजवी तुलना करणारा आहे. हेल्मेट वापरून आरोग्याला विघातक असं काहीही घडत नाही. लेखात लिहिल्यानुसार, ते संडास वापरल्यामुळे पिण्याचं पाणी प्रदूषित होत आहे. फुटक्या नळांचा फोटो लेखात जोडलेला आहे. एक प्रश्न सोडवण्यासाठी दुसरा प्रश्न तयार करायची गरज नाही; जे तिथे घडत आहे. शिवाय इतर प्रश्न लेखात मांडलेले आहेतच.

दुसरी गोष्ट, हेल्मेटं वापरून किंवा न वापरता दुचाकी चालवणं ही मनुष्यांची नैसर्गिक प्रेरणा नाही. विधी करणं ही नैसर्गिक प्रेरणा आहे, त्यामुळे त्याची 'संस्कृती' अनेक पिढ्या तयार झालेली आहे; संस्कृती आणि सवयीशी जोडल्या गेलेल्या गोष्टी बदलणं, अगदी ज्यांची इच्छा आहे त्यांनाही, कठीण जातं. (हौस असल्यास, 'वेळ पुरत नाही' अशी तक्रार करणाऱ्या सुगृहिणींना, मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करून फ्रीजरमध्ये ठेवायला सांगा.)

लेख वाचून मला समजलं ते - संडास वापरले जावेत ही कल्पना योग्यच आहे; पण पिढ्यान्‌पिढ्या बाहेर विधी करणाऱ्यांना अचानक सक्ती - प्रत्यक्षात साम, दाम हे पर्याय न वापरता थेट दंड - करून संडासात जाण्याचा आग्रह केल्यास योजना फसते; लोकांवर अन्याय होतो.

शिवाय जे संडास आहेत ते स्वच्छ ठेवण्यासाठी पाणी खर्च होतं. लेखक कोणत्या संडासात गेले आहेत किंवा गेले नाहीत, ते मला माहीत नाही (पण खरंच, या पातळीवर येऊन चर्चा करायची आहे?), पण तिथे उपलब्ध असलेले संडास स्वच्छ राखण्यासाठी प्रत्येक वापरानंतर १२ लिटर पाणी वापरावं लागतं, हा आकडा कल्पनातीत नाही. आमच्या घरी असणारे संडास एका वेळेस ४.५ लिटर आणि ७ लिटर पाणी वापरतात आणि ते विशेष प्रकारचे, अधिक पैसे खर्च करून आणलेले, लो-फ्लो आहेत. (अमेरिकेत लो-फ्लो प्रकरणाआधी १३ लिटर ते २६ लिटर वापरणारे संडास होते ही गोष्ट सहज गूगलून समजली.) भारतात, शहरांमध्ये लोफ्लो संडास दिसले नाहीत; त्यामुळे तिथे असलेले संडास १२ लिटर पाणी वापरतात, हा आकडा हास्यास्पद का वाटला हेही समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यामुळे तिथे असलेले संडास १२ लिटर पाणी वापरतात, हा आकडा हास्यास्पद का वाटला हेही समजलं नाही.

कारण चाळीत राहाताना वर्षानुवर्षं सुमारे दोन ते तीन लीटरचं टमरेल वापरून लहान ते मोठ्यांची गरज भागायची, म्हणून.

असो. एकंदरीत आपण जे म्हणतो आहोत त्यात इतका मोठा सामायिक भाग आहे तरी जणू काही कोर्टात दोन बाजू लढवत असल्याप्रमाणे चर्चा का चालू आहे हे कळत नाही. तेव्हा थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखामध्ये जे 'अहाहा, ते नैसर्गिक, वाटेल तेव्हा वाटेल तिथे हगणं हेच कसं स्वातंत्र्याचं प्रतीक आहे' वगैरे चित्र उभं केलं आहे ते फारच पोरकट वाटलं.

माझं मत या मताच्या लंबमितीमध्ये आहे.

कारण चाळीत राहाताना वर्षानुवर्षं सुमारे दोन ते तीन लीटरचं टमरेल वापरून लहान ते मोठ्यांची गरज भागायची, म्हणून.

चाळीत राहताना आजूबाजूचा पाणीवापर, एकंदर मलनिःसारणाची शहरी सोय आणि आकारमानामुळे पडत असलेला फरक, चाळीतले संडास किती स्वच्छ असायचे या गोष्टींशी तुलना करता खेड्यांतले, कमी माणसांसाठी असलेले संडास किती कमी पाण्यात स्वच्छ राहतील? हा प्रश्न विचारण्याचं कारण - अमेरिकेत लो-फ्लो संडास आले तेव्हा लॉस एंजलिसमध्ये मलनिःसारणाचा प्रश्न आला, असा इतिहास आहे. कारण आधीच्या व्यवस्थेत घन आणि द्रवपदार्थांचं गृहीत धरलेलं प्रमाण नवीन व्यवस्थेमध्ये मोडलं.

तरीही, प्रत्यक्षात तिथे अस्तित्वात असलेल्या शौचकूपांची पाहणी करून आलेल्या पत्रकारांना आकडे समजत नाहीत आणि मला इंटरनेटवरून आकडे समजतात, हा आग्रह का, हे ही समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकोळी वाक्यांतल्या चकचकाटाच्या हव्यासापोटी गुंतागुंतीची विधानं समजून घेण्यात आपण कमी पडतो का?

लेखातली मला दिसलेली, बरंच काही सुचवणारी वाक्यं -

... Not surprisingly, no Kamar was part of this committee.

कधीही, कुठेही विधी करण्याविरोधात कृती करणाऱ्या कमिटीत कोणीही कमार लोक नाहीत. याचा अर्थ, ज्यांच्या प्रथा मोडायच्या आहेत त्यांना विश्वासात घेतलं जात नाहीये. बाहेरून स्वच्छता लादली जात आहे. (अमेरिका कशी इतर देशांवर लोकशाही लादत सुटते, तसंच.)
हाच समज बळकट करणारा परिच्छेद पुढे येतो -

As the villagers here put it, the government asked them to use saam daam dand bhed (reason, lure, punishment, divisiveness). However, it is the dand (punishment) variety that is most commonly used from withholding salaries of panchayat secretaries who fail to build toilets in their villages to preventing villagers from using their ration cards if they are not using the toilets...

आणि तशाच अर्थाचं स्पष्टीकरण देणारे परिच्छेद पुढे येतच राहतात.

पाण्याचा वाढता वापर, पिण्याचं पाणी दूषित करणारे संडास, संडासांचं आयुष्य संपलं की पुढे काय होणार याबद्दल असणारी अनिश्चितता, लोकांच्या सवयी लक्षात न घेता बनवलेले संडास, बांधलेल्या संडासांबद्दल मान्य केलेले पैसे लोकांना न देणं, गावकऱ्यांच्या निरनिराळ्या समूहांमध्ये या योजनांमुळे लागलेली भांडणं, असे त्या लोकांचे कितीतरी प्रश्न लेखात मांडलेले आहेत, ते तुम्हाला खरंच दिसत नाहीत का?

पण तुमच्याच भाषेत सांगायचं तर, पुरोगामी हा शब्द काढला की लगेच उजव्यांना 'कुठे-कुठे हगू मी' असा आनंद होतो बहुतेक! स्वच्छ भारत घोषणेमुळे ही हगवण थांबणार का? पण एक मिनीट, या लेखात जे लिहिलं आहे त्यात पुरोगामी असं काहीच नाहीये. लेखातला विचार फक्त उदारमतवादी, सर्वसमावेशक आहे; एवढंच. 'दिखावे पे न जाओ, अपनी अकल लगाओ'; प्लासिबो आहे तो. आता तरी कॉफी घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुर्दैवाने लेबलं महत्त्वाची ठरतात असं सध्या मला चित्र दिसतं आहे. त्यातही 'कॉल समवन अ डॉग अॅंड शूट इट' असे प्रकारही चालताना दिसतात. म्हणून कोणाला ती लेबलं लावावी आणि कोणाला लावू नये याबद्दलची चर्चा थोडी तरी महत्त्वाची ठरते.

माझा तर मुद्दा असा असतो की पुरोगामी हे लेबल कुठच्यातरी व्यक्तीला लावण्यापेक्षा विचार व आचारांना लावावं. म्हणजे मग 'हा अमुकतमुक स्वतःला पुरोगामी म्हणवतो म्हणे, पण त्यावेळी तर तो तसं वागला.' वगैरे मूर्ख तक्रारी नष्ट होतील. कोणीच परफेक्ट पुरोगामी नसतो, कोणीच कायमचा प्रतिगामी नसतो. प्रत्येकच जण या समाज नावाच्या गुंतागुंतीतून शक्य तसा मार्ग काढत जगत असतो. त्यामुळे कुठच्याही व्यक्तीचा मार्ग एकाच दिशेला असेल असं दरवेळी सांगता येत नाही.

पण पुरोगामी म्हणजे काय हे स्पष्ट झालं तर निदान तो शब्द ऐकला की नी जर्क रिअॅक्श्नने शिव्या बाहेर पडतात ते कमी होईल अशी आशा आहे. मग चर्चा त्या शिव्यांबद्दल होण्याऐवजी मूळ मुद्द्यांबद्दल जास्त होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणीबाणी, राजीव आणी इन्दिरा बद्दल काही आधार? फार (conspiracy) टाईप वाटले.

>> प्रत्यक्ष लढायला बहुजन समाजातून अनुयायी मिळवतात
हे खरे आहे. यान्च्याईतके येडपट कोणी नसतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतीवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी नसतात, मनुवादी नसतात, धर्मवादी नसतात, कर्मविपाकसिद्धांतवादी नसतात, शब्दप्रामाण्यवादी नसतात, कट्टर धार्मिक नसतात. अखिल मानवजातीचं अधिक भलं कसं होईल या दृष्टीने पुरोगामी व्यक्ती विचार करते. पुरोगामी विचाराच्या लोकांना हे माहित असतं की या जगात 'बदल' हीच एक शाश्वत गोष्ट आहे.
या उलट प्रतिगामी व्यक्ती सर्वसाधारणपणे सनातनी विचारांच्या, मागे बघून पुढे जाण्याचा प्रयत्न करणा-या, असहिष्णू, कट्टर धार्मिक, दैववादी, शब्दप्रामाण्यवादी, धर्मग्रंथवादी, मनुवादी, संकुचित विचारांच्या, आपल्याच कंपूचं फक्त कसं भलं होईल हे पाहणा-या, स्थितिवादी, सतत भूतकाळाचे दाखले देणा-या, असतात.

साहेब, तुमचा गीतेचा गाढा अभ्यास दिसतो. म्हणजे कोणत्याही दोन परस्पर्विरोधी समाजघटकांचे इतके व्यवस्थित (आणि एककल्ली) वर्णन करायचा काँफिडन्स कृष्णाशिवाय दुसर्‍याला कसा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

साहेब, तुमचा गीतेचा गाढा अभ्यास दिसतो. म्हणजे कोणत्याही दोन परस्पर्विरोधी समाजघटकांचे इतके व्यवस्थित (आणि एककल्ली) वर्णन करायचा काँफिडन्स कृष्णाशिवाय दुसर्‍याला कसा?

शाबास !!!

जियो प्यारे जियो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत ट्रंप, रशियात पुतिन, भारतात मोदी नि ऐसीवर अरुणजोशी.

तामिळनाडूत शशिकला
उ० कोरियामध्ये किम जॉन्ग ऊन
टाटामध्ये रतन
मसापमध्ये ठाले पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हे चवथे कोण?
===================
आबा कवाधरनं कावत्यात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे जे रतन टाटा आहेत, ते म्हणे दत्तक घेतले गेले टाटांकडे म्हणुन टाटा नाव लावतायत.

ते पारशी आहेत का? हा अत्यंत सिरीअस प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उलट त्यांच्याच जातबांधवांना राखरांगोळी झालेली घरेदारे सोडून शहरात आणि नंतर परदेशात परागंदा होण्याची वेळ आली. >> याच्याबद्दल अधिक (पण थोडक्यात) कुठे वाचायला मिळेल? मिपावर याचा परतपरत उल्लेख होत असतो. टोन साधारण असा असतो की 'प्रत्येक ब्राह्मण कुटुंबाकडे शेकडो एकर जमीन, पेटारे भरभरुन सोनंनाणं होतं. मराठ्यांनी ते सगळं हिसकावून घेतलं. हे भोगावं लागलेली आणि त्यातून फिनीक्सप्रमाणे भरारी घेणारी ब्राह्मण हीच एकमेव कम्युनीटी आहे.'

माझा 'अंदाज' असा आहे की या दंगलीचा त्रास RSSशी संबंध असलेल्या थोड्याफार लोकांनाच झाला असावा. खरंच ऐश्वर्य लुटलं गेलं असे सांगत फिरण्यासाठी सिंधी, पंजाबी, शिख, कश्मिरी पंडीत हे मराठीब्राह्मणांपेक्षा कितीतरी जास्त योग्य(;-() लोक आहेत. ऐश्वर्य म्हणण्यासारखं काही कधीच ब्राह्मणांकडे नव्हतं. दे वेअर नेवर अ रिच कम्युनिटी लाइक पारसी, जैन. (मराठादेखील अॅज अ कम्युनिटी श्रीमंत नाहीत असे मला वाटते. त्यातली ठरावीक कुटुंबच अतिश्रीमंत आहेत. तसंतर गरीब जैनपण भेटलेत मला Biggrin पण पुर्ण भारताचा विचार केला तर ते रिच कम्युनीटी ठरतील).
सर्वसामान्य ब्राह्मणाचा किडुकमिडूक संसार या ४८च्या दंगलीत उधळला गेला का?
फाळणी/आतंकवाद इतकी या दंगलीची तीव्रता/दाहकता होती का?

PS: नुकसान झालंच नाही असे म्हणणे नाही किती नुकसान झालं हा प्रश्न आहे.
===
शाहू आणि सनातनी यांच्या वेदोक्त का पुराणोक्त या वादात टिळकांच्या समोर सोन्याच्या ताटात पेश केलेली, पुरोगामी भूमिका घेण्याची ऐतिहासिक सुसंधी आली होती. टिळकांची त्याकाळची राजकीय आणि सामाजिक ताकद पहाता त्यांनी जरी शाहूंच्या बाजूने बहुजनवादी भूमिका घेतली असती तरी त्यांना विरोध झाला नसता. पण टिळकांनी त्यांच्या प्रवृत्तीधर्माला अनुसरून सनातन्यांनी बाजू घेतली. मग शाहू महाराज आणि टिळक आयुष्यभर भांडत राहिले. >> याच्याबद्दलपण अ+थो वाचायला आवडेल. परवाच एका मित्र म्हणत होता की 'मराठ्यांना शिक्षणापासून कोणी कधी वंचीत केलं होतं? त्यांना इतकी वर्ष शिकून प्रगती का करता आली नाही?'
मी त्याला महर्षी शिंदे आणि जनाक्का शिंदेच उदा सांगितलं. दलितांइतका त्रास नाही पण अगदी बाहें फैलाके स्वागत नव्हतं झालं शिकू इच्छिणार्या मराठ्यांचं. दलितांना वंचीत ठेवणारे मराठा नव्हते. उलटा मराठ्यांनीच आरक्षणाचा कंसेप्ट आणलाय. एवढी तुटपुंजी माहितीच मला होती.
की याचा आणि टिळकxशाहु वादाचा संबंध नाही.

===
आणीबाणीला डिफेंड करणारे आणि नोटबंदीला एक महिन्यानंतरही डिफेंड करणारे या दोघांत काडीचाही फरक नाही. यापार्श्वभुमीवर माबोवरचे दिनेश, अमा, सई केसकर हे आयडी लक्षणीय ठरतात.

===
ऐसीवर ज्या काही 'फार चांगल्या चर्चा' झाल्यात त्यांचं एकत्र कलेक्शन कुठे मिळेल का? मला आठवतंय तेव्हांपासून एकच शब्द/वाक्य पकडून त्यावर तूशानाकीमीशाना पकडापकडी अनंत काळपासून चालूय (मीमराठीवरुन ट्रोल यायच्याआधीपासून).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>PS: नुकसान झालंच नाही असे म्हणणे नाही किती नुकसान झालं हा प्रश्न आहे.

माझ्या "नात्यात" अशा प्रकारे घर लुटले गेलेले एकही नाहीत. अर्थात माझे नातेवाईक मेनली पुण्यात आणि कोकण - नाशिक भागात होते. प. महाराष्ट्रात (आउटसाइड पुणे) माझे कुणी नातेवाईक त्या काळी नव्हते. त्यामुळे माझ्या माहितीला डिस्काउंट करावे लागले.

>> RSSशी संबंध असलेल्या थोड्याफार लोकांनाच झाला असावा.

तसे नसावे.

>>टिळकांची त्याकाळची राजकीय आणि सामाजिक ताकद पहाता त्यांनी जरी शाहूंच्या बाजूने बहुजनवादी भूमिका घेतली असती तरी त्यांना विरोध झाला नसता.

तसे होत नाही. टिळकांची ताकद त्यांच्या सनातनी असण्यात होती. दुसरे म्हणजे अशी सनातन्यांमध्ये ताकद असलेल्याला यू टर्न घेता येत नाही. अडवाणींकडे कितीही राजकीय ताकद असली तरी जिनांचं कौतुक करण्याची मोकळीक त्यांना नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>> अर्थात माझे नातेवाईक मेनली पुण्यात आणि कोकण - नाशिक भागात होते. प. महाराष्ट्रात (आउटसाइड पुणे) माझे कुणी नातेवाईक त्या काळी नव्हते. त्यामुळे माझ्या माहितीला डिस्काउंट करावे लागले. <<

देशावर घरं जाळण्याच्या पुष्कळ कहाण्या आहेत. माझ्या आजोबांची कहाणी मात्र कोकणातली आहे. ते गावातल्या एकमेव शाळेचे मुख्याध्यापक होते. आमचं घर जाळायला गावाबाहेरून जमाव आला होता. नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडायचा आदेश त्यांनी दिला खरा, पण माझ्या आजोबांचे शाळेतले अनेक सहकारी मुस्लिम होते. त्यांनी मध्ये पडून जमावाला आवरलं आणि आमचं घर वाचवलं. थोडक्यात, आमचं आर्थिक नुकसान काहीच झालं नाही. मात्र, त्यानंतरची पिढी (माझे आजोबा आणि त्यांची ८-१० भावंडं ह्या सगळ्यांची मुलं) सुट्टी आणि शेतीची कामं एवढ्यापुरतं गावी जायचं आणि स्थायिक मात्र मुंबई-पुण्यातच व्हायचं अशीच होती. त्यामुळे वडिलोपार्जित काहीही नाही आणि शून्यातून आपलं विश्व उभारावं लागलं असं त्यांच्यापैकी प्रत्येकाचंच होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्यामुळे वडिलोपार्जित काहीही नाही आणि शून्यातून आपलं विश्व उभारावं लागलं असं त्यांच्यापैकी प्रत्येकाचंच होतं.

हेच बोल्तो. त्याशिवाय कूळ कायद्यात जमीनी गेलेल्यांत माझे आजोबा होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> त्याशिवाय कूळ कायद्यात जमीनी गेलेल्यांत माझे आजोबा होते. <<

हो ते एक विसरलोच. कूळ कायद्यात आमच्याही जमिनी गेल्या. त्यामुळे निर्वाहासाठी स्वतःच हातपाय हलवावे लागतात आणि आयतं बसून काहीही मिळणार नाही हा धडा आपोआप मिळाला. शिवाय, सांगायचं राहिलेलं म्हणजे माझ्या आजोबांचा संघाशी अजिबात संबंध नव्हता. आणि फाळणीत उत्तरेकडे झालेल्या दंगलींइतकी ह्या दंगलींची दाहकता नक्कीच नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

घर आणि जमीन कूळ कायद्यात जाऊ नये म्हणून माझ्या आजोबांनी सरकारी नोकरी २० वर्षं पूर्ण करून सोडली; आणि पुढे ९२ वर्षांचे होऊन मरेस्तोवर शेती केली. माझे हे आजोबा अजिबातच संघिष्ट नाहीत. त्यांचं गाव रायगड जिल्ह्यात. त्यांना १९४८मध्ये काही त्रास झाल्याचं त्यांनी कधी सांगितलं नाही, म्हणजे झाला नसावा.

पण शेतीसाठी जमिनीतले मोठमोठे दगड उचलण्यापासून कष्ट करावे लागले; शहरातून गावात स्थलांतरित झाल्यामुळे गावकऱ्यांकडून (आणि स्वतःच्या नातेवाईकांकडून) सुरुवातीला त्रास देणं झालं. सुरुवातीला शेतीकामासाठी मजूरही मिळाले नाहीत. पण शेजारच्या डोण्यातल्या कातकऱ्यांना हाताशी धरून त्यांना व्यवस्थित शेती करता आली. आजोबांच्या पुतण्यांना कष्ट न करता जमीन मिळाली; पण त्या जमिनीतलं उत्पन्न एवढं कमी आहे की त्यांना नोकऱ्या धराव्याच लागल्या.

आता ही जमीन कातकरी कसतात; त्यांची आर्थिक परिस्थिती अगदी हलाखीची नाही एवढंच. आणि त्या गावातल्या अनेकांना नोटबंदीचा कसा त्रास होतोय, हा आणखी निराळा विषय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शिवाय, सांगायचं राहिलेलं म्हणजे माझ्या आजोबांचा संघाशी अजिबात संबंध नव्हता.

पुरोगामी लोकांना तिन पिढ्यांपासून शुद्ध असणं आवश्यक दिसतंय. खाली अदितीही तेच म्हणतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भलतेच बै तुम्ही विनोदी! तुमचा हा विनोद वाचायला माझे संघिष्ट वडील, तीन सख्खे, संघिष्ट काका आणि वडलांचे संघिष्ट वडील जिवंत नाहीत; हा त्यांच्यावर अन्यायच झाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही नि चिंजं मंजे कोळश्याच्या खाणीतले हिरे कि हो मग!!!
===================
तुमच्या संघद्वेषाचा जन्म घरीच झालाय कि कसं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संघद्वेषाचा जन्म घरीच झालाय कि कसं?

माझे वडील संघात जायचे; घरात ते माझ्या बाबतीत स्त्रीवादी होते; माझ्यावर ट्रेडीसनल अत्याचार करणाऱ्या लोकांना परस्पर टोलवायचे; पण लग्नासारख्या गोष्टींत 'संस्कार नकोत तर सोहोळाही करू नका' असं म्हणायचे; त्यांना भेटायला येताना एक मुलगा काळा शर्ट घालून आला होता म्हणून त्याच्याशी ओळखीच्या मुलीचं लग्न लावून देऊ नये, असं एकदा म्हणाले होते; स्वतःच्या मित्राबरोबर प्रवासात, बाहेर असताना दारू प्यायल्याचं आपल्या 'संस्कारक्षम' वयाच्या मुला-मुलीला सांगायचे; मी एकदा 'मला गणित समजत नाही, माझ्यासाठी शिक्षक शोधा' असं म्हटल्यावर माझ्यावर विश्वास दाखवला नव्हता ... आता याचा एकत्रित अर्थ जसा हवा तसा लावा, किंवा go figure.

माझी आई संघाबद्दल ambivalent, तटस्थ होती. संघिष्ट लोक तिला त्रास देत नसत तोवर ती संघाबद्दल तक्रार करत नसे. तिला चिकार काम असताना, आजूबाजूला नैसर्गिक आपत्ती आली आणि संघाचे लोक "वहिनी पंधरा पोळ्या द्या" वगैरे मदत मागायला आले की ती त्यांना वाटेला लावून देत असे. किमान इतपत उत्तर दिल्याची आठवण आहे, "कणीक आणि पोळपाट-लाटणं कुठे आहे ते दाखवते. तुम्ही या, पोळ्या बनवा आणि घेऊन जा. मला वेळ नाही."

माझा संघद्वेष नक्की कुठे आणि कसा जन्माला आला, किंबहुना माझे संघाबद्दलचे विचार संघविरोधी आहेत का माझ्या भावना संघद्वेष्ट्या आहेत; ही गुंतागुंत इथे, प्रतिसादात लिहिण्यासारखी नाही. आणि इथे लिहिलं आहे त्यातलं साटल्य किती पोहोचेल, याबद्दल शंका वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुरोगामी लोकांना तिन पिढ्यांपासून शुद्ध असणं आवश्यक दिसतंय

हिटलर ने ६ पिढ्या शुद्ध नॉर्डन असण्याचा आग्रह धरला होता असं काहीतरी ऐकल्याचं स्मरतंय. माझे एक नातेवाईक जर्मनीत डॉक्टरेट करायला गेले होते त्यांनी सांगितल्याचं आठवतंय. कारण त्याची मागची ७ वी पिढी अशुद्ध होती म्हणे. खरंखोटं राजिवड्यावरचा विश्वेश्वर च जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्याही आजोबांची बरीच जमीन कुळकायद्यात गेली. परंतु त्यापूर्वीच माझ्या पणजोबांपासूनच शेतीवरचे अवलंबणे संपले होते. पणजोबा वकील होते आणि आजोबा वैद्य.

कुळकायद्यात मराठ्यांनी "स्वतः शेती करतो" या बेसिसवर आपल्या जमिनी वाचवल्या असे म्हणतात. ते ब्राह्मणांना* जमले नाही असे म्हणतात. खखोठाना.

*ब्राह्मणांकडे आलेल्या शेतजमिनी मुख्यत: दान म्हणून आल्या होत्या (आणि उरलेल्या सावकारीतून). त्यामुळे आम्ही शेती करतो हे आर्ग्युमेंट करता आले नसावे. पुन्हा खखोठाना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्या पणजोबांच्याही जमिनी कूळकायद्यात गेल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण माझ्या आजोबांचे शाळेतले अनेक सहकारी मुस्लिम होते. त्यांनी मध्ये पडून जमावाला आवरलं आणि आमचं घर वाचवलं.

मुस्लिमांनी वाचवणं हे सामान्य आहे. उपखंडात ५:१ या प्रमाणात लोकसंख्या भारत : (पाक +बांगलादेश) अशी मानू. फाळच्या वेळी ४० कोटींस या प्रमाणात विभागले तर तिकडे ६.५ कोटी लोक होते. पैकी ३०% हिंदू होते. म्हणजे २ कोटी. पैकी फक्त ५,००,००० मेले. तेव्हा बाकीचे १ कोटी ९५ लाख स्थानिक मुस्लिमांच्या सहायानेच इकडे आले. (जगात माणूसकीची इतकीही कमी नाही.)
===============
आता त्या उपकारापोटी इकडे येऊन सेक्यूलर झाले आणि आम्हाला ताप द्यायला लागले हा भाग अलहिदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आमचं घर जाळायला गावाबाहेरून जमाव आला होता.

माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे, गांधीहत्येनंतर महाराष्ट्रात जे काही जाळपोळीचे प्रकार घडले, त्यांचे टार्गेट प्रामुख्याने 'ब्राह्मण' हे होते., अशा परिस्थितीत, एखाद्या सीकेपी सद्गृहस्थांचे घर जाळण्यात जमावास स्वारस्य का असावे, याबद्दल कुतूहल वाटते. असो.

..........

बोले तो, गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे हा जातीने (कोकणस्थ) ब्राह्मण असल्याकारणाने, 'ब्राह्मण तेवढे वै.६ दु.!!!!!!' या लॉजिकखाली महाराष्ट्रातील प्रामुख्याने कोकणस्थ, देशस्थ तथा कऱ्हाडे ब्राह्मण राहात असलेल्या काही घरांची जाळपोळ झाल्याचे ऐकिवात आहे. (सारस्वत राहात असलेल्या काही घरांची जाळपोळ झाली किंवा कसे, याबद्दल खात्रीलायक किंवा अनेक्डोटलसुद्धा माहिती नसल्याकारणाने त्यांचा ज़िक्र येथे केलेला नाही; अन्यथा, त्यांनासुद्धा क्वचित्प्रसंगी आणि काही गणनांनुसार ब्राह्मणांमध्ये गणण्यात येते, असे कळते. (चूभूद्याघ्या.) शिवाय, जाळपोळ प्रामुख्याने ज्या भागांत झाली, त्या भागांत तसाही सारस्वतांचा प्रादुर्भाव - प्रीडॉमिनन्स अशा अर्थाने - कितीसा होता, हाही प्रश्न आहेच. परंतु तो वेगळा विषय आहे. तर ते एक असो.)

नाही म्हणायला, घरमालक बिगरब्राह्मण (उदा. मुसलमान वगैरे) परंतु भाडेकरू प्रामुख्याने ब्राह्मण असलेल्या घराससुद्धा आग लावण्यास जमाव आल्याचा (आणि घरमालकाने तो परतवून लावल्याचा) अनेक्डोटसुद्धा ऐकलेला आहे, नाही असे नाही. परंतु तो तृतीयहस्त (बोले तो, मित्राच्या आजीने मित्राला त्याच्या लहानपणी कधीतरी सांगितले आणि मित्राने नंतर कधीतरी ते मला न्यारेट केले टैप्स) असल्याकारणाने आणि मला व्यक्तिश: त्याबद्दल तपशीलवार तर सोडाच, परंतु काहीही माहिती नसल्याकारणाने, 'सांगोवांगीची गोष्ट म्हणजे विदा नव्हे' या तत्त्वास अनुसरून तो सोडून देऊ.

गृहीतक. कदाचित चुकीचेही असू शकेल. चूभूद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

PS: नुकसान झालंच नाही असे म्हणणे नाही किती नुकसान झालं हा प्रश्न आहे.

सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात एका खेड्यात आमचं कुटुंब होतं. आमच्या आजोबांचं किराणामालाचं दुकान होतं. जोडूनच वाडा होता. गावातलं एकुलतं दुकान (म्हंजे मोनोपोली च म्हणा ना). त्यांनी मोनोपोली प्रॉफिट घेतला की नाही ते ठाऊक नाही. पण रात्रीच्या वेळी जमाव आला आणि वाड्यातल्या पहारेकर्‍यांना फितवण्यात आलं आणि घरातल्या सगळ्यांना बाहेर काढून घर पेटवण्यात आलं. त्यात सगळं धान्य, सुकामेवा, मसाले भस्मसात झाले. दुसर्‍या दिवशी घालायला कपडे, खायला अन्न नाही. शेजारीण जी ब्राह्मणेतर होती तिने पहिले दोन महीने खूप मदत केली. ती १९९८ पर्यंत आमच्या घरी येऊन जाऊन होती. ६ भावंडं मामाच्या मदतीने वाढली. आमचे तीर्थरूप वय-ज्येष्ठताक्रमात द्वीतीय. खरंतर त्यातली थोरली तिघं जी होती त्यांनी धाकट्या तिघांना सांभाळलं असं मला सांगण्यात आलं. विशेष म्हंजे मामांचं घर जवळच्या दुसर्‍या एका गावात होतं ते मात्र जाळलं वगैरे नाही. का ते ठाऊक नाही. पण हे घर जाळण्याचे प्रकार पश्चिम महाराष्ट्रापुरतेच मर्यादित होते असे ऐकतो. कोकणात हे असे घडले नाही. (कोकण हे पश्चिम महाराष्ट्रात का येत नाही या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही.). आजोबा १९६२ च्या आसपास गेले. १९६५ च्या आसपास सगळे लोक कराडात आले. आजी २००२ मधे गेली. पण आजीच्या बोलण्यात (किंवा इतर कोणाच्याही बोलण्यात) या घटनेचा जास्त जिक्र व्हायचा नाही. पण खूप सोनंनाणं जे एका पेटीत होतं ते मात्र लुटण्यात आलं असं ऐकल्याचं आठवतंय (घर जळण्याआधी की नंतर ते माहीती नाही).

--

अ‍ॅमी ने किडूकमिडूक या शब्दाचा प्रयोग नेमक्या उलट अर्थाने केला आहे किंवा कसे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणिबाणि आणि नोटबंदी यांना सारखं मानणारे लोक आहेत???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अरे बायकोला हिटलर म्हणणारे नवरे नसतात का? त्यात काय एवढं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आमच्या आजोबांकडे जमिनीच नसल्याने कुठल्याच कायद्याने त्यांचे काहीच नुकसान झाले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वसामान्य ब्राह्मणाचा किडुकमिडूक संसार या ४८च्या दंगलीत उधळला गेला का?

पाकिस्तान बनलेल्या बंगाल धरून सर्व प्रांतांत ब्राह्मणाच्या हत्या नि त्यांच्या बायकांवर रेप सर्वात जास्त झाले. हिंदुंचे लिडर आणि मुस्लिम बनायला सर्वात अवघड अशी त्यांचा प्रतिमा होती. (प. महाराष्ट्रात अन्य हिंदुंनी ब्राह्मणांना गांधीवधामुळे मारणे हे एक वेगळी लोकल घटना आहे. दिल्लीत कोणीही शीखविरोधी नाही, पण इंदिरा गांधीच्या हत्येनंतर एका दिवसात ३००० मारले गेले. १९८४ पासून निदर्शने करणार्‍या लोकांना देखिल , सामान्य शीखाला जाउच द्या, त्यांना नक्की कोण्या हिंदू जातीने मारले ते माहित नाही. ते कॉग्रेसच्या नॉन शीख कार्यकत्यांनी हत्या केल्या से म्हणतात. तस्संच काहीसं गोडसे भाउ मुळे प. महाराष्ट्रात झालं. महाराष्ट्रात ब्राह्मण वि मराठा संघर्ष असेल, पण चांगल्या पातळीवर आहे, केवळ हितांसाठी आहे, आकसापोटी नाही.)
(बाय द वे, नथुराम गोडसेंना उत्तर भारतात, विशेषतः पंजाब, हरयाणा, हिमाचल, उत्तर प्रदेश लोक (अब्राह्मण आणि ग्रामीण देखिल) खूप मानतात. राजकीय गप्प्पांत अनेक ग्रामीण लोक्कांना नथुरामच्या राज्याचा ब्राह्मण असण्याचा मला गर्व असावा असं कायसं म्हणायचं असतं. नथूराम मुळे त्यांचं फार भलं झालं (नि त्यांच्यावर अन्याय होत आहेत हे देशाला नि जगाला कळालं.) असं ते म्हणतात. अन्यथा आज मणिप्पुर गेल्या ६० दिवसांपासून जळतंय हे तुम्हाला माहित नाही तसं फाळणीचा फारसा फरक कुठे पडला नसता.
====================
निजामाने देखिल हैदराबाद संस्थानात ब्राह्मनांना मेन टार्गेट केले होते. ब्राह्मणांचा भारत सरकारला असलेला पाठींबा त्याची सगळ्यात मोठी अडचण होती. दिड वर्षे दक्षिन पाकिस्तानात राहून ब्राह्मणांनी ज्या हत्या नि बलात्कार सहन केले आहेत त्याला तोड नाही. सुदैवाने याला पुरावा शेष आहे - गावागावातली हुतात्मा स्मारके नि त्यावर कोरलेली नावे. काँग्रेस सरकारने या दीड वर्षाच्या काळातील इतिहासावरच्या पुस्तकांना (त्यांच्या नेहमीच्या हलकटपणाला अनुसरून) बंदी घातली आहे. ज्यांनी कष्टाने इतिहास लिहिला ते आता मेले देखिल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रत्येक ब्राह्मण कुटुंबाकडे शेकडो एकर जमीन, पेटारे भरभरुन सोनंनाणं होतं. मराठ्यांनी ते सगळं हिसकावून घेतलं.

असं म्हणणारे बहुतेक विसरले कि हे सगळं दिलं देखिल मराठ्यांनीच होतं.
==========
तसे काही कुलकर्णी/देशमुख अशात असतील, मात्र जोशी पहिलेपासून कंगाल होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अ‍ॅमी मंजे बाई कि बापडा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तसे होत नाही. टिळकांची ताकद...मोकळीक त्यांना नसते. >> माझा मुद्दा मी नीट मांडला नाहीय.
1. शाहु x टिळक वाद नक्की कोणकोणत्या मुद्द्यांवरुन होता?
2. शिक्षणक्षेत्र ब्राह्मणेतरांसाठी खुलं करायचं हा त्या वादाचा एक मुद्दा होता का?
3. 'मराठ्यांना शिक्षणापासून कोणी कधी वंचीत केलं होतं? त्यांना इतकी वर्ष शिकून प्रगती का करता आली नाही?' हा मुद्दा खोडायला जनाक्का, महर्षी शिंदेखेरीज कोणकोणती उदा देता येतील?

===
घरं जाळण्याची उदा कोल्हटकर, जंतू, गब्बर यांनी दिली आहेत. त्यावरुन या दंगलीत जीवीतहानी, बलात्कार, मारहाण हे प्रकार नसावेत असे वाटते.

मालमत्तेचं नुकसान झालं ते वाईटच. पण इतर दंगलींपेक्षा दाहकता कमी हे मान्य करायला हरकत नसावी.

===
दुसरा बेसीक प्रश्न: जाळपोळ करणारा जमाव केवळ मराठ्यांचा होता का?

===
वडिलोपार्जित काहीही नाही आणि शून्यातून आपलं विश्व उभारावं लागलं असं त्यांच्यापैकी प्रत्येकाचंच होतं. >> हे केवळ ब्राह्मणांसोबतच झाल्यासारखं का 'मिरवलं' जातं? इथे ऐसीवरच मोरेंचा दिअंतला लेख, माझे मराठा मोर्चा धाग्यावरचे प्रतिसाद वाचा. आमच्या तीन पिढ्यांचा शेतीशी, गावाशी संबंध नाही. आजोबांच्या पिढीतच सगळे नोकरदार, न्युक्लिअर कुटुंबात होते. अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून एकटीने उच्चमध्यम वर्गात गेलेली माझी ९६ कुळी मैत्रिण आहे. माझ्या वडिलांचा आणि माझादेखील इन्हेरीटन्स शून्य आहे. आणि त्यात ढोल वाजवत फिरण्यासारखं काहीही आम्हाला वाटत नाही.

तो वरील ३र्या मुद्द्यातला मित्र 'मराठ्यांची ६०-७० एकर वडिलोपार्जीत जमीन असते' म्हणत होता. '३ कोटी लोकसंख्या म्हणजे ६० लाख कुटुंबाची प्रत्येकी एवढी जमीन? तेपण आत्ताच्या काळात?' विचारल्यावर ७-८ एकर जमीनवर आला.

काहीच जमीन नसलेले मराठा असतील तर त्यांनी जमीन विकून पैसे दारुवर, गाड्यांवर, सोनसाखळ्यांवर उधळले असणार असा अजूनेक स्टिरीओटाइप मिपावर फार कॉमनय.

===
असं म्हणणारे बहुतेक विसरले कि हे सगळं दिलं देखिल मराठ्यांनीच होतं.
+
ब्राह्मणांकडे आलेल्या शेतजमिनी मुख्यत: दान म्हणून आल्या होत्या (आणि उरलेल्या सावकारीतून). त्यामुळे आम्ही शेती करतो हे आर्ग्युमेंट करता आले नसावे.
>> एक्झेक्टली! ही शंका मला आलेली. ज्यांनी जमिनी दिल्या त्यांनीच त्या परत काढून घेतल्या. तरी ह्ये अजूनही दोनतीन पिढ्यांनंतरही रडतायत. असो.

===
अॅमी ने किडूकमिडूक या शब्दाचा प्रयोग नेमक्या उलट अर्थाने केला आहे किंवा कसे ? >> किडूकमिडूकचा जो अर्थ आहे त्याच अर्थाने वापर केला आहे. ४८मधे इतरांसारखेच बहुतांश ब्राह्मणदेखील गरीब होते. त्यांना दंगलीचा त्रास झाला का? बादवे शेजारीण कोणत्या जातीची होती?

===
आणि हो जाताजाता १२० प्रतिसादांनंतर धाग्याशी संबंधीत एकमेव(?) प्रतिसाद आला तर तो 'विनोदी'? फारच विनोदी आहेत ब्वॉ विचारवंत श्रेणीदाते ;->

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0