Skip to main content

ही बातमी समजली का - ११९

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.

____

एकाकी लांडग्यांच्या (Lone Wolf Terrorist) हल्ल्यांविरुद्ध करायचे सात उपाय :
1. हे असले माथेफिरू एकाकी लांडगे कसे तयार होतात आणि हल्ले कसे प्लॅन करतात याची माहिती काढून तिचे संश्लेषण करणे . "कोण" हल्ला करणार आहे हे समजले तर उत्तमच, पण ते जवळजवळ अशक्य दिसते.
2. हल्ल्याआधी कोणत्या प्रकारचे छुपे संवाद घडत असतात याची माहिती काढून तिचे संश्लेषण करणे, व सर्व सुरक्षा यंत्रणांना ती पुरवत राहणे . यात माहिती काढणारे आणि तिचे संश्लेषण करणारे यांच्यात जवळचे सहकार्य अपेक्षित आहे .
3. मुसलमान समाजाशी जवळचे संबंध ठेऊन माहिती मिळवण्यास त्यांचे सहकार्य मिळवणे. तसेच त्या समाजातील प्रतिष्ठित लोकांतर्फे समाजात दहशतवादाविरुद्ध मत तयार करणे . दहशतवादी हे आपल्या समाजाची (निदान सुप्त का होईना ) वाहवा मिळविण्यासाठी असली कृत्ये करतात हे लक्षात ठेवणे.
4. कोणत्या, कशा प्रकारच्या घटनांनी (राजकीय? सामाजिक? वैयक्तिक ?) दहशतवादी हल्ले "ट्रिगर" होतात यावर संशोधन करणे .
5. दहशतवाद्यांना "स्फूर्ती ' कशापासून आणि कोणत्या लोकांपासून मिळते ते शोधून काढणे. अशी 'स्फूर्तिस्थाने " निकामी करणे आणि दहशतवादामागची "उदात्तता", त्याविरुद्ध प्रचार करून नष्ट करणे.
6. पालक , शाळा, विद्यापीठे येथे माहिती सत्रे घेत राहणे . अनेक दहशतवादी तरुण विदयार्थी असतात . त्यांची दहशतवादाकडे आकृष्ट होणार्याच्या व्यवच्छेदक लक्षणांची (अचानक अबोल होणे, फेसबुक वरच्या पोस्ट्स , शस्त्रास्त्रातील नवा इंटरेस्ट , मध्यपूर्वेची वारी, मित्रमंडळ बदलणे, मशिदीच्या वाऱ्या आणि धर्माची कर्मकांडे वाढणे इत्यादी इत्यादी ) माहिती सर्वांना पुरविणे.
7. कोणाच्या हातात बंदुका जाऊ शकतात यावर सक्त सामाजिक नियंत्रण . लष्करी हल्ल्याजोग्या ("assault") बंदुकांची खरेदी कोण करत आहे यावर नियंत्रण .

हे सर्व खालील लेखातून घेतले आहे :
Preventing Lone Wolf Terrorism: some CT Approaches Addressed
by Edwin Bakker and Beatrice de Graaf
http://www.terrorismanalysts.com/pt/index.php/pot/article/viewFile/prev…
आणि भारतात हल्ली मॉल, थिएटर यांची आपली आपली सुरक्षा असते असे दिसते . ते फारच उत्तम!

मिलिन्द Fri, 22/07/2016 - 04:35

"प्रेसिडेंट" ट्रम्प ने लष्कराला घटनेविरुद्ध, मूर्ख किंवा आतताई ऑर्डर्स दिल्या (ट्रम्प चे आजवरचे बोलणे लक्षात घेता जे अशक्य नाही!) तर अमेरिकेत लष्करी क्रांती होईल !
http://www.latimes.com/opinion/op-ed/la-oe-kirchick-trump-coup-20160719…

अनुप ढेरे Fri, 22/07/2016 - 12:13

http://swarajyamag.com/politics/1991-the-real-villain-was-rajiv-gandhi-…

१९९०-९१चे खरे हिरो चंद्रशेखर आणि यशवंत सिन्हा होते आणि खरे व्हिलन राजीव गांधी होते असं मांडणारा लेख.

बाकी, त्या वेळेला मी लै लहान होतो आणि राजकारणातल काहीही समजत नव्हतं. पण एकंदरीत त्या अर्टिकलमधनं कोणीही कोणाशीही अलाईन झालेलं होत तेव्हा असं दिसतय. चंद्रशेखर सरकारमध्ये , जे काँग्रेसच्या पाठिंब्यावर होतं त्यात यशवंत सिन्हा अर्थमंत्री! व्हीपी सिंगसरकारसाठी कम्युनिस्ट आणि भाजपा एकाच बाजूला!

नितिन थत्ते Fri, 22/07/2016 - 13:41

In reply to by अनुप ढेरे

ऐला सरकार पाडणं हे व्हिलनपणा असेल तर सरकार टिकावं म्हणून शिबू सोरेनला लाच देणं आणि कदाचित आणीबाणी घोषित करणं हे "राष्ट्रकार्य" समजायला हवं !!!

;)

देवेगौडा आणि गुजराल यांच्या सरकार इतकंच चंद्रशेखर यांचं सरकारही अनैतिक होतं. ते अनैतिक सरकार निर्माण देखील राजीव गांधींनीच केलं होतं.

अनुप ढेरे Fri, 22/07/2016 - 14:33

In reply to by नितिन थत्ते

चच्चा, फक्त सरकार पाडलं म्हणून नाय पण गव्हर्नर, अर्थ सल्लागार यांच्याकडे दुर्लक्ष करून सगळे निर्णय, जे घातक होते, घेणं म्हणून देखील खलनायक म्हटलय.

देवेगौडा आणि गुजराल यांच्या सरकार इतकंच चंद्रशेखर यांचं सरकारही अनैतिक होतं.

देवेगौडा/गुजराल अनैतिक का होतं समजलं नाही.

अनुप ढेरे Fri, 22/07/2016 - 14:34

http://www.nytimes.com/2016/07/21/technology/peter-thiels-embrace-of-tr…

Though Silicon Valley has well-known problems with diversity in its work force, people here pride themselves on a kind of militant open-mindedness. It is the kind of place that will severely punish any deviations from accepted schools of thought — see how Brendan Eich, the former chief executive of Mozilla, was run out of his job after it became public that he had donated to a campaign opposed to gay marriage.

चिंतातुर जंतू Fri, 22/07/2016 - 14:37

लोकांनी गॅस सबसिडी नाकारल्यामुळे सरकारचे नक्की किती पैसे वाचले, ह्याविषयी सरकारचे दावे आणि सीएजीनं ते खोडून काढणं ह्यावर लोकसत्ताचा अग्रलेख -
संख्या संमोहन

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 22/07/2016 - 21:17

In reply to by चिंतातुर जंतू

आक्रस्ताळा अग्रलेख न लिहिण्याबद्दल अभिनंदन करूनही, तक्रारी आहेत. उदाहरणार्थ ही वाक्यं पाहा -

गतसाली आपण ८३१३ हजार मेट्रिक टन (टीएमटी- थाउजंड मेट्रिक टन) इतका स्वयंपाकाचा गॅस आयात केला. या वर्षी ही आयात ८८८५ हजार मेट्रिक टन इतकी झाली. म्हणजे वाढली. पण तरीही आपला खर्च कमी झाला. कारण किमतीच कमी झाल्या. या किमती किती प्रमाणात कमी झाल्या? आपण ब्युटेन वायूच्या आयातीसाठी ८२५ डॉलर प्रति मेट्रिक टन इतकी रक्कम मोजत होतो. ती सध्या फक्त ३१५ डॉलर प्रति मेट्रिक टन इतकी कमी झाली आहे. प्रोपेन या वायूच्या किमतीतही तितकीच घट झाली आहे. गतसाली प्रोपेन वायूच्या एका मेट्रिक टनाच्या आयातीसाठी ८१० डॉलर मोजावे लागत होते. ही किंमत कमी होऊन सध्या २९५ डॉलर इतकी झाली आहे.

अशी आकडेवारी लिहिणं स्वागतार्ह; पण त्या आकड्यांबद्दल लिहिलेले शब्द फसवे आहेत.
१. स्वयंपाकाचा गॅस, ब्यूटेन आणि प्रोपेन ह्या वायूंबद्दल ही वाक्यं आहेत. हे तीन निराळे वायू का प्रोपेन/ब्यूटेनपैकी एक स्वयंपाकाचा गॅस ह्याची वाच्यता लेखात नाही.
२. "प्रोपेन या वायूच्या किमतीतही तितकीच घट झाली आहे" म्हणजे नक्की काय? ब्यूटेनची किंमत दर एककाला ५१० डॉलर कमी झाली; प्रोपेनची ५१५. हा फरक नगण्य असला तरीही आहे.
२ अ. प्रोपेन आणि ब्यूटेन किती प्रमाणात वापरले जातात त्यानुसार आकडेही बदलतील.

मुद्दा योग्य; लेखाचा सूरही पटण्यासारखा; पण मांडणीत सुधारणेस वाव आहे.

नितिन थत्ते Sat, 23/07/2016 - 08:05

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>"प्रोपेन या वायूच्या किमतीतही तितकीच घट झाली आहे" म्हणजे नक्की काय? ब्यूटेनची किंमत दर एककाला ५१० डॉलर कमी झाली; प्रोपेनची ५१५. हा फरक नगण्य असला तरीही आहे.

??
राघांची शिकवणी लावायला हवी.

दोन्ही गॅसची किंमत ~८०० डॉलर होती ती आता ~३०० डॉलर झाली आहे. तेव्हा दोन्ही गॅसची किंमत तितकीच कमी झाली हे व्हॅलिड विधान आहे. ५१० आणि ५२० डॉलर हे खरोखरच 'समान' म्हणाता येतील.

>>१. स्वयंपाकाचा गॅस, ब्यूटेन आणि प्रोपेन ह्या वायूंबद्दल ही वाक्यं आहेत. हे तीन निराळे वायू का प्रोपेन/ब्यूटेनपैकी एक स्वयंपाकाचा गॅस ह्याची वाच्यता लेखात नाही.

हे ठीक आहे. स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) हा प्रोपेन आणि ब्यूटेनचे योग्य प्रमाणातील मिस्रण असते हे सामान्य लोकांना माहिती नसण्याची शक्यता आहे. तेव्हा प्रोपेन आणि ब्यूटेनच्या किंमतींचा स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीशी काय संबंध हे स्वष्ट करायला हवे होते.

अर्थात अग्रलेखाचा विषय मोदी सरकार* कसे फेकूपणा करते हा आहे. अग्रलेखात डिटेल्ड कॅलक्युलेशन दाखवायची गरज आहे असे नाही.

*एलपीजी सबसिडीबाबतचा क्लेम मोदीसरकारने केला होता की भक्तांनी परस्पर सोशल मीडियात पसरवलेला आकडा होता हे मला ठाऊक नाही.

चिंतातुर जंतू Sat, 23/07/2016 - 14:52

In reply to by नितिन थत्ते

>> एलपीजी सबसिडीबाबतचा क्लेम मोदीसरकारने केला होता की भक्तांनी परस्पर सोशल मीडियात पसरवलेला आकडा होता हे मला ठाऊक नाही.

LPG Subsidy In Bank Accounts Has Saved Rs. 15,000 Crore: PM Narendra Modi (२६ मार्च २०१६ची बातमी)

CAG audit nails Centre’s claim on LPG subsidy saving
इथून उद्धृत :

From the ramparts of Red Fort in 2015, Prime Minister Narendra Modi claimed that India has saved Rs 15,000 crore annually in subsidy outgo for cooking gas thanks to DBTL and GiveItUp campaign. “We got the LPG gas subsidy under direct cash benefit transfer. We used the Jan Dhan Yojana and Aadhar cards. Because of this, middlemen and black marketers have been hit. We corrected the system and Rs 15,000 crore, which was stolen every year in the name of gas subsidy, has been saved," Modi said, addressing the nation from the Red Fort.

गब्बर सिंग Fri, 22/07/2016 - 22:20

No criticism of government by officials on social media: Proposed rules

Earlier, a government official was supposed to intimate the government of purchase of every automobile, refrigerator, radiogram or television set. The earlier rule even included horses.

यामागे हेतू म्हंजे भ्रष्टाचार रोखणे हा असावा असा माझा कयास. पण भ्रष्टाचार हा राजकारणी पण करू शकतात. मग हेच नियम राजकारण्यांना लावा की. तिथे मात्र शेपुट घालणार.

( कै च्या कै नियम करायचे आणि वर "The best government is that which governs least." ची शेखी मिरवायची.)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 22/07/2016 - 22:24

सहा काश्मिरी मुलांच्या प्रतिक्रिया. ह्या प्रातिनिधीक असतीलच असं नाही; पण जनमत भारताविरोधात कसं तयार होत असेल ह्याचा अंदाज येऊ शकेल -
We Asked Children In Kashmir What They Feel About ‘India’. This Is What They Said

मिलिन्द Fri, 22/07/2016 - 22:53

In reply to by .शुचि.

मुलांचे मेंदू धुणे अगदीच सोपे असते . धार्मिक, राज्य सरकार निवडणे, मुक्त हालचाल , भाषिक इत्यादी सर्व स्वातंत्र्ये असताना आपल्याला भारतापासून का "स्वात्नत्र्य" हवे आहे याबद्दल पालक काय सांगतात ?

धार्मिक, राज्य सरकार निवडणे, मुक्त हालचाल , भाषिक इत्यादी सर्व स्वातंत्र्ये असताना आपल्याला भारतापासून का "स्वात्नत्र्य" हवे आहे याबद्दल पालक काय सांगतात ?

सॉलिड!!! __/\__

मिलिन्द Sat, 23/07/2016 - 01:46

In reply to by .शुचि.

काश्मीरबाबत माझा दृष्टिकोन सोपा आहे. "इस्लामी" राज्य हे स्त्रियांसाठी नेहमीच अत्यंत घातक आणि जुलुमी असते. त्यामुळे मुल्ला-मौलवींपासून काश्मिरी स्त्रीचे रक्षण करण्यासाठी भारतासारखे इहवादी राष्ट्रच पाहिजे. "स्वात्नत्र्य " वगैरे देऊन चालणार नाही . सैन्याने फार सिव्हिलियन माणसे मारणे मात्र बंद करावे. आत्तापर्यंत 78,000 मृत्यू झाले आहेत (त्यात 25-30 हजार बाहेरचे घुसखोर असावेत: 1990 पासून वर्षाला एक हजार या हिशेबाने!) . याबाबतीत 100,000 हा मॅजिक नंबर दिसतो: एक लाख मृत्यू झाले की जग त्याला "टेरर" वगैरे मानायचे बंद करते आणि स्वातंत्र्य-युद्ध मानू लागते.

सैन्याने फार सिव्हिलियन माणसे मारणे मात्र बंद करावे.

हे नेमके कसे जमवावे? ('फार'च्या नेमक्या व्याख्येबद्दल पुन्हा कधीतरी बोलू.)

बोले तो, रोज मारण्याकरिता उपलब्ध सिव्हिलियनांचे राशनिंग करावे काय? म्हणजे, पर (सैनिकी) क्यापिटा इतक्याइतक्या सिव्हिलियनांची कमाल मर्यादा घालून देऊन, त्याकरिता प्रत्येक सैनिकास राशनकार्डे (आ ला सोशालिझम) उपलब्ध करून देऊन, प्रतिदिनी त्यात्या दिवशीच्या 'कोट्या'च्या परवान्याकरिता प्रत्येक सैनिकास ते राशनकार्ड हातात घेऊन मैलोनमैल लांब रांगेत उभे करावे काय?

आणि मग, 'आम्ही तो रेशनचा तांदूळ वापरत नाही, पण आमच्या मोलकरणीला लागतो म्हणून तिला आमच्या कार्डावर घेऊ देतो'-टैप मध्यमवर्गीय भ्रष्टाचार सैनिकांतही सुरू व्हावा काय? बोले तो, 'मी इतके सिव्हिलियन रोज मारत नाही. तू माझा उरलेला कोटा घे', असे काही?
..........
कश्मीरमधील तूर्तासची सैन्याची प्रचंड संख्या१अ जमेस धरता या रांगा मैलोनमैल जाणे अवघड नसावे, अशी अटकळ.

१अ असे ऐकून आहोत ब्वॉ.

मराठी मध्यमवर्गीयांत राशनचा उच्चार असाच करायचा प्रघात आहे.

मिलिन्द् पद्की Sat, 30/07/2016 - 00:43

In reply to by 'न'वी बाजू

भारताच्या सुमारे 13.5 लाख सैन्यापैकी निम्म्याहून अधिक - 7 लाख- सैन्य काश्मीर मध्ये तैनात आहे.
आणि "इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा" असा न्याय लावून एखाद्या घरात जर अतिरेकी लपला असेल (किंवा अशी शंका असेल ) तर ऍक्शनमध्ये त्या घरातली माणसे मेली तरी चालतील अशी भारतीय सैन्याची धारणा दिसते. "जास्त" ची व्याख्या अशी : काश्मिरात अतिरेकी घुसखोरांचे प्रमाण वर्षाला 500 ते हजार इतके आहे . त्याहून अधिक माणसे मेली तर तुम्ही स्थानिकांना मारत आहात . काही स्थानिक काश्मिरीही हिंसेत सहभागी आहेत हे मान्य आहे ! पण मुख्यतः ते दगड मारतात . अशी गर्दी पांगविण्यासाठी रबर बुलेट्स , पाण्याचे झोत , अश्रूधूर (मोदींचे भाषण ?) अशी अनेक तंत्रे उपलब्ध आहेत. गर्दी पांगविण्यावर इझ्राएल मध्ये मोठा रिसर्च चालतो, आणि त्यांनी विकसित केलेली तंत्रे जगभरचे लोक विकत घेतात , तशीही भारत घेऊ शकतो . डोळे फोडणारे छरे मारणाऱ्या बंदुकांचा वापरही क्षम्य नाही .
भारताची ब्रिटिशांपासून मानसिक फारकत ही जालियनवाला बाग हत्याकांडापासून सुरु झाली होती , आणि "राज्य करण्याची ही चुकीची पद्धत आहे, याने साम्राज्य लयाला जाईल " असे भाषण चर्चिल सारख्या कडव्या साम्राज्यवाद्याने केले होते.

'न'वी बाजू Sat, 30/07/2016 - 02:33

In reply to by मिलिन्द् पद्की

आणि "इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा" असा न्याय लावून एखाद्या घरात जर अतिरेकी लपला असेल (किंवा अशी शंका असेल ) तर ऍक्शनमध्ये त्या घरातली माणसे मेली तरी चालतील अशी भारतीय सैन्याची धारणा दिसते.

याबद्दल मला खात्रीलायक माहीत नाही, पण तरीही हे खरे आहे, असे क्षणभर मानून चालू. पण भारतीय सैन्याची धारणा तूर्तास मरू दे.

काही स्थानिक काश्मिरीही हिंसेत सहभागी आहेत हे मान्य आहे ! पण मुख्यतः ते दगड मारतात .

काही स्थानिक कश्मीरींच्या धारणा आणि त्यांच्या त्या व्यक्त करण्याच्या पद्धतीही तूर्तास मरू देत.

अशी गर्दी पांगविण्यासाठी रबर बुलेट्स , पाण्याचे झोत , अश्रूधूर (मोदींचे भाषण ?) अशी अनेक तंत्रे उपलब्ध आहेत.

बरोबर.

गर्दी पांगविण्यावर इझ्राएल मध्ये मोठा रिसर्च चालतो, आणि त्यांनी विकसित केलेली तंत्रे जगभरचे लोक विकत घेतात , तशीही भारत घेऊ शकतो .

ज्यूइश ष्टेटचा फ्यान नाही. शिवाय, त्यांनी विकसित केलेली तंत्रे 'मानवतावादी' वगैरे असण्याबाबत प्रचंड साशंक आहे. त्यामुळे, इस्राएलला या( संभाषणा)त न आणलेलेच बरे. परंतु जमावातील लोकांना कमीत कमी इजा होईल अशा रीतीने पांगविण्याची तंत्रे वापरण्याबाबत सहमत आहे. पण ते तूर्तास जाऊ द्या.

डोळे फोडणारे छरे मारणाऱ्या बंदुकांचा वापरही क्षम्य नाही .

अगदी ठीक. पण तेही तूर्तास सोडा.

भारताची ब्रिटिशांपासून मानसिक फारकत ही जालियनवाला बाग हत्याकांडापासून सुरु झाली होती

भारताची / भारतीयांची ब्रिटिशांपासून फारकत? निकाह कधी झाला होता?

बोले तो, कितीश्या भारतीयांना 'आपण ब्रिटिश आहो' असे मनापासून वाटत होते? ब्रिटिशांचे आधिपत्य ही आम्ही फ्याक्ट ऑफ लाइफ म्हणून स्वीकारलेली फार फार तर एक तडजोड होती. 'आम्ही ब्रिटिश आहोत' या भ्रमात आम्ही बहुतांशी कधीच नव्हतो. पण आमचे एक सोडा.

आमच्यापेक्षासुद्धा, आम्ही (बोले तो ब्रिटिश हिंदुस्थानची प्रजा) सुद्धा ब्रिटिश आहोत, असे कितीशा ब्रिटिशांना (बोले तो 'मदर कंट्री'चे रहिवासी आणि नागरिक) वाटत होते?

मग आम्हाला त्यांच्याबद्दल काही का वाटावे? आमचे ते लागतच होते कोण?

आणि मग आम्ही त्यांच्यापासून स्वतंत्र होण्यासाठी, त्यांचे जोखड मानेवरून झटकून टाकण्यासाठी का झटू नये?

आता इथून थोडेसे मागे जाऊ.

पण मुख्यतः ते दगड मारतात . अशी गर्दी पांगविण्यासाठी रबर बुलेट्स , पाण्याचे झोत , अश्रूधूर (मोदींचे भाषण ?) अशी अनेक तंत्रे उपलब्ध आहेत. गर्दी पांगविण्यावर इझ्राएल मध्ये मोठा रिसर्च चालतो, आणि त्यांनी विकसित केलेली तंत्रे जगभरचे लोक विकत घेतात , तशीही भारत घेऊ शकतो . डोळे फोडणारे छरे मारणाऱ्या बंदुकांचा वापरही क्षम्य नाही .

कश्मीरींचे - आपल्या भारताच्या सहनागरिकांचे, मग भले त्यांना तसे वाटो वा ना वाटो - whatever grievances, real or perceived, they may hold against the government, ते व्यक्त करत असताना सरकारने केलेल्या कृतीतून डोळे फुटले, याबद्दल भारतातल्या सोडा, या संस्थळावरच्या किती जणांना सहनागरिक म्हणून त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते? गेला बाजार, तेसुद्धा 'आपले भारतीय' आहेत, अशी भावना होते? (भले 'त्यांना' तसे वाटत असो वा नसो.)

जमाव कोठेही होतात. मुंबईच्या फ्लोरा फौण्टनजवळसुद्धा झाला होता. त्यावर मुंबई प्रांताच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी - मोरारजी देसाईंनी - सुद्धा अशीच काही कृती केली होती. ('फायर!') लोके मेली. किती मेली, यावर मोरारजी देसाईंत आणि इतरांत मतभेद आहेत. (मोरारजी: ८०, इतर: १०५.) किती मेले, हा गौण मुद्दा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या योग्यायोग्यतेबद्दलही मतभेद असू शकतात; तो मुद्दा नाही. परंतु, ही जी माणसे (मोरारजींच्या आदेशामुळे) मेली, त्यांच्याबद्दल आपल्या मनात कोणती भावना होते? का?

कश्मीरींना काय वाटते, ते सोडा. (भारतीय सरकारलाही काय वाटते, ते सोडा.) कश्मीरी लोक हे (whatever be their sentiments towards us) 'आपले लोक' आहेत, असे जर आपल्यालाच वाटत नसेल, तर we have already lost Kashmir, we are merely holding her by military force as long as we can.

(आणि मग भारत सरकार काय करणार? कायदे करून 'कश्मीरचा/भारताचा नकाशा चुकीचा छापला' वगैरे फुसक्या कारणांसाठी आम भारतीय (बिगरकश्मीरीसुद्धा) नागरिकांस प्रचंड दंड करणार / तुरुंगात डांबणार. त्याने नेमके काय साध्य होते?)

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे खोटे आहेच असा दावा नाही; फक्त, भारतीय सैन्याच्या धोरणांधारणांबद्दल माझ्याजवळ प्रथमहस्त/विश्वासार्ह माहिती नाही, इतकेच.

ज्यूंचा नव्हे. फरक आहे.

ब्रिटिश हिंदुस्थान ही ब्रिटिशांची अ‍ॅट बेष्ट रखेल आणि अ‍ॅट वर्ष्ट दासी होती, असे विधान करायचा मोह होतो, परंतु अतिअवांतर करण्याच्या जातीच्या खोडीस चर्चेच्या हितार्थ तूर्तास लगाम घालीत आहे. असो.

सैराट Sat, 30/07/2016 - 19:03

In reply to by 'न'वी बाजू

श्रेणी देता येत नाही म्हणून इथे लिहितोय प्रतिसाद खूप आवडला न.बा.सर

मिलिन्द Tue, 02/08/2016 - 00:52

In reply to by 'न'वी बाजू

कश्मीरी लोक हे 'आपले लोक' आहेत, असे जर आपल्यालाच वाटत नसेल, तर we have already lost Kashmir, we are merely holding her by military force as long as we can. असे नसेल अशी आशा आहे . असे असले तर आज ना उद्या काश्मीर जाणारच. पण सत्य काय आहे? एक लहानशी दहशतवादी जात सर्व काश्मिरींना वेठीस धरत आहे काय ? एक मशिनगनवाला दोन खेड्यांना ताब्यात ठेवू शकतो. पण अनेकदा नागरिक दहशतवाद्यांना मदत करतानाही दिसतात . याउलट 2014 च्या निवडणुकीत 76% मतदान झाले होते . म्हणजे बहुसंख्य काश्मिरींचा दहशतवादाला पाठिंबा नाही. मग वेगाने विकास करणे, त्यातून काश्मिरी तरुणांना आकर्षित करून घेणे ही मोदींची स्ट्रॅटेजी काय वाईट आहे ?

मिलिन्द Tue, 02/08/2016 - 02:44

In reply to by 'न'वी बाजू

संस्थानी राजांची राज्य करण्याची पद्धत इतकी बेकार होती की लोक त्यांच्यापासून पळून जाऊन ब्रिटिश इंडियात आश्रय घेत. जातीपातींबद्दल ब्रिटिश न्यूट्रल होते, आणि शेतसारा ठरविण्याची त्यांची पद्धत न्याय्य होती . "हे राज्य आपल्यासाठी घातक आहे " हे ठसवायला लोकमान्य टिळकांना प्रचंड परिश्रम करावे लागले , आणि त्यासाठी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" अशी पदवी दिली गेली.

शेतसारा ठरविण्याची त्यांची पद्धत न्याय्य होती .

मौंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनचे आत्मचरित्र वाचल्यावर कळेल की हा शेतसारा वगैरे गोष्टी मोस्टली मराठ्यांच्या राज्यपद्धतीचेच कटकॉपीपेस्ट मारले होते. पण ब्रिटिशांची नसलेली म्हणून ती अन्याय्यच असणार, वादच नाही.

मिलिन्द Tue, 02/08/2016 - 02:37

In reply to by 'न'वी बाजू

" respected Indian journalist Prem Shankar Jha has three eminently sensible suggestions: The first step, that Indian security forces declare a unilateral cease-fire, delete the Indian police’s history sheets and give all those on them a respite from fear. The second, to fully support chief minister Mehbooba Mufti in her efforts to heal the wounds inflicted on the wounded Kashmiri psyche. Thirdly, equip the police with suitable technology to deal with stone pelters and others without the use of lethal force."

नितिन थत्ते Sat, 23/07/2016 - 07:44

In reply to by मिलिन्द

>>धार्मिक, राज्य सरकार निवडणे, मुक्त हालचाल , भाषिक

ही स्वातंत्र्ये (राज्य सरकार निवडण्यासहित) ब्रिटिश कालात भारतीयांनाही होती. वसाहती अंतर्गत स्वायत्ततासुद्धा (कॅनडा ऑस्ट्रेलियासारखी) ब्रिटिशांनी देऊ केली होती. आपले स्वातंत्र्याकांक्षी नेते आणि लोक चुकलेच म्हणायचे. ;)

मिलिन्द् पद्की Sat, 30/07/2016 - 00:26

In reply to by नितिन थत्ते

पण ब्रिटिश मोठ्या प्रमाणावर भारत धुवून नेत होते, आणि सध्याचा भारत काश्मीर मध्ये प्रचंड मदत ओतत आहे , हा या दोन्हीतला महत्वाचा फरक आहे . तसेच धार्मिक ओळख ही भ्रामक/खोटी ओळख असून तिच्या आधारावर स्वतंत्र्य मागणे गैर आहे .

गब्बर सिंग Sat, 30/07/2016 - 00:40

In reply to by मिलिन्द् पद्की

तसेच धार्मिक ओळख ही भ्रामक/खोटी ओळख असून तिच्या आधारावर स्वतंत्र्य मागणे गैर आहे .

(१) धार्मिक ओळख ही खोटी ओळख कशीकाय ?
(२) व्यक्तीची खरी ओळख कोणती व कशी ?

मिलिन्द Tue, 02/08/2016 - 00:41

In reply to by गब्बर सिंग

कारण धर्म हे एक कोणताही पुरावा नसलेले गारुड आहे. माणसाची "खरी" ओळख ही फक्त माणूस अशी असली पाहिजे. त्यानंतर त्याने केलेल्या कृती , मिळविलेल्या पदव्या वगैरे.

गब्बर सिंग Tue, 02/08/2016 - 00:54

In reply to by मिलिन्द

कारण धर्म हे एक कोणताही पुरावा नसलेले गारुड आहे. माणसाची "खरी" ओळख ही फक्त माणूस अशी असली पाहिजे. त्यानंतर त्याने केलेल्या कृती , मिळविलेल्या पदव्या वगैरे.

मग सगळे विश्व हे एक देश म्हणून जाहीर करूया की.

तुमच्याच म्हणण्यानुसार - माणसाची खरी ओळख एथ्निसिटी, वंश, भाषा ही नाहीच. माणूस हीच आहे व त्यानंतर केलेली कृती, पदव्या वगैरे.

बाय द वे - निरंकुष जागतिकीकरण या संज्ञेचा अर्थ तोच होतो. Unfettered trade of goods, services, capital, labor, information, and ideas.

फक्त सुरुवात कुठे करायची हा प्रश्न येइल. आखाती देशात सुरुवात करूया का ?

मिलिन्द Fri, 22/07/2016 - 23:04

सीरियामध्ये अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यात 56 ते 212 निरपराध ठार . हे आपल्या परिवारासह आयसिस पासून पळून जाणारे नागरी लोक होते.
https://www.washingtonpost.com/news/worldviews/wp/2016/07/21/an-airstri…

याला कोलॅटरल डॅमेज असे म्हणतात. बडे-बडे शहरोंमे ऐसे छोटे-छोटे हादसे होते ही है.

मिलिन्द Sat, 23/07/2016 - 01:36

In reply to by दगड

असे हजारो (लाखो ?) इराकी-सीरियन लोक "कोलॅटरल डॅमेज" मध्ये मेले आहेत. इराक आक्रमणानंतर लवकरच हा आकडा इतका फुगू लागला की अमेरिकेने त्यावर सोपा उपाय काढला : त्याची मोजदाद ठेवणे बंद केले. पण मग इथले लोक काही दहशतवादी हल्ला झाला की इनोसेंट्ली विचारतात : "त्यांची" आपल्यावर एव्हढी खुन्नस का आहे? तेंव्हा हसावे का रडावे ते कळत नाही .

गब्बर सिंग Sat, 23/07/2016 - 01:46

.शुचि. Sat, 23/07/2016 - 02:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बातमी फार आवडली. मन्या/बोके फार श्रुड, हुष्षार, गोडुले, देखणे, राजस व डँबिस असतात.

http://img.picturequotes.com/2/2/1178/cats-are-like-music-its-foolish-to-try-to-explain-their-worth-to-those-who-dont-appreciate-them-quote-1.jpg

गब्बर सिंग Sat, 23/07/2016 - 02:13

Japanese 'rent men' who are paid just to listen

व्यक्तीला अनेकदा स्वतःची दु:खं, मतं, राग, त्वेष, विषाद, विषण्णता, उचंबळून येणे .... असं बरंच काही व्यक्त करून मोकळं व्हायचं असतं. त्यासाठी हे...

.शुचि. Sat, 23/07/2016 - 02:24

In reply to by गब्बर सिंग

बातमी intriguing आहे.

http://aisiakshare.com/node/3695
लिसनर.
वरील धाग्यात एका कवितेचे रसग्रहण आहे जिच्यात, नायकाने त्याची मध्यमवयीन दु:खे एका स्त्रीपाशी व्यक्त केलेली आहेत (माझ्या मते ती भाडोत्री वेश्या आहे). आणि त्याचे आभाळाप्रमाणे भरुन आलेले दु:ख, मन मोकळे झाल्यावर त्याला तिच्याबद्दल मनस्वी कृतज्ञता वाटते आहे.

चिमणराव Mon, 25/07/2016 - 08:18

डिजिटल दरी.
दिल्लीत एका माणसाचा(वय पन्नासपुढे) खून -कात्रीने वार केलेले-जाताना खुनी व्यक्तीने फक्त एलअडी टिव्ही नेला.पोलीसांना इमारतीच्या वेबकॅमात एक मुलगी(तोंड लपवलेली) मोठा टिव्हीस्क्रीन नेताना दिसली.तिला पकडल्यावर कबुली.-या माणसाने तिचे व्हिडिओ चित्रण करून ब्लॅकमेल करून बोलवून अत्याचार करायचा.त्या दिवशी तिने चिडून खून केला आणि व्हिडिओ 'त्या टिव्हित आहेत'असं तो माणूस सांगायचा म्हणून तो नेऊन नदीत फेकला.

लोळगे सायकल कंपनी Mon, 25/07/2016 - 16:22

In reply to by चिमणराव

एक तांत्रिक पिल्लू - स्मार्ट टीव्हीमधे खरच व्हिडीओ साठवता येतात, ४-८ जीबी स्टोरेज सहज असते.

अनु राव Mon, 25/07/2016 - 16:07

In reply to by नितिन थत्ते

थत्ते चाचा, तुम्ही तुमचा मसाला घालताय बातमी मधे. शरीया सारखा कडक कायदा हवा असे म्हणले तर शरीया हवा असे लिहीताय.

नितिन थत्ते Mon, 25/07/2016 - 17:53

In reply to by अनु राव

त्या अर्थी नाही हो !!

शरिया सारखा कायदा म्हणाजे बलात्कार झालेला पहायला दोन पुरुष साक्षीदार हवेत वगैरे !!!

अनु राव Mon, 25/07/2016 - 18:59

In reply to by नितिन थत्ते

तेजायला, असा आहे होय शरिया कायदा.

रा.ठां ना कोणीतरी समजावयाला पाहिजे, त्यांना पण पूर्ण माहीती नाहीये.

नितिन थत्ते Mon, 25/07/2016 - 19:59

In reply to by अनु राव

Why are rape "victims often punished" by Islamic courts as adulterers? Under Islamic law, rape can only be proven if the rapist confesses or if there are four male witnesses. ... Even the rape of a Muslim woman is almost impossible to prove under strict Islamic law (Sharia).

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 25/07/2016 - 20:29

In reply to by अनुप ढेरे

किंवा बायकांनी बुरख्यात बंदीत राहावं अशी अपेक्षा असावी.
(देशीवादी आणि उजव्यांच्या वळचणीला जाणाऱ्यांचा काय भरवसा!)

गब्बर सिंग Tue, 26/07/2016 - 04:52

काळवीट मारण्याच्या प्रकरणातून सलमान खान निर्दोष सुटला

ठीकाय पण ... कोर्ट बायस्ड असतात, भारतात बहुतेक निर्णय अल्पसांख्यांकांच्या विरूद्ध लागतात वगैरे पांडित्यपूर्ण आरोपांचं काय झालं ???

का सलमान निर्दोष असण्याची शक्यताच नाही ?

नितिन थत्ते Tue, 26/07/2016 - 07:13

In reply to by गब्बर सिंग

त्याने पतंग उडवला तेव्हाच तो निर्दोष ठरला.

>> भारतात बहुतेक निर्णय अल्पसांख्यांकांच्या विरूद्ध लागतात

तो अल्पसंख्य समाजातील नसल्याने*च त्याला शिक्षा झाली नाही. ;)
*तो घरात गणपती वगैरे ठेवतो. त्याअर्थी तो खरा अल्पसंख्यांक** नाही
**A True muslim will not kill an innocent person च्या चालीवर.

>>का सलमान निर्दोष असण्याची शक्यताच नाही ?

गणपतीची पूजा करतो म्हणजे तो हिंदू आहे. तेव्हा तो बाय डिफॉल्ट गरीब (स्वभावाचा), अहिंसक आणि सहिष्णु असणार. आधीच्या सरकारने हिंदूंवरच्या आकसाने त्याला खोट्या खटल्यात गुंतवले होते !! ;)

सलमान निर्दोष असण्याची शक्यता काय? तो निर्दोष आहे याची खात्रीच होती. बिच्चार्‍या सलमानला उगीच त्रास दिला म्हणून खरंतर त्याने सरकारवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला पाहिजे. सलमान म्हणजे काय फडतूस वाटला काय?

घाटावरचे भट Tue, 26/07/2016 - 09:56

In reply to by गब्बर सिंग

राजस्थानातील काळविटांच्या आत्महत्यांना मुंबईत राहाणारा सलमान कसा काय जबाबदार असू शकतो?

गब्बर सिंग Tue, 26/07/2016 - 10:19

In reply to by घाटावरचे भट

राजस्थानातील काळविटांच्या आत्महत्यांना मुंबईत राहाणारा सलमान कसा काय जबाबदार असू शकतो?

यहीं तो मै कह रहा हूं. काळवीटांच्या समस्यांवर वारंवार प्रयत्न करूनही व तोडगा काढूनही त्या सुटत नसल्यामुळे काळाला सुद्धा वीट आला. त्यामुळे काळाने सुद्धा त्यांच्याकडे (अक्षम्य) दुर्लक्ष करायचे ठरवले (जसे महाराष्ट्र सरकार शेतीकडे अक्षम्य दुर्लक्ष करते तसे...) व त्यामुळे काळवीटांनी आत्महत्या सुरु केल्या.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 26/07/2016 - 18:50

In reply to by गब्बर सिंग

बहुतेक निर्णय अल्पसांख्यांकांच्या विरूद्ध लागतात वगैरे पांडित्यपूर्ण आरोप नक्की कोण करत होतं?

गब्बर सिंग Wed, 27/07/2016 - 00:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बहुतेक निर्णय अल्पसांख्यांकांच्या विरूद्ध लागतात वगैरे पांडित्यपूर्ण आरोप नक्की कोण करत होतं?

Statistics confirm that the criminal justice system is inefficient, and prejudiced against minorities and poor

Notably, 21.1 per cent of undertrials in jails are Muslim, even as their percentage among convicts is only 16.4 per cent, closer to the community’s composition in the country’s population. These statistics are yet more confirmation that India’s criminal justice system remains grossly inefficient and blatantly prejudiced against the minorities and the poor. The cost of justice is kept prohibitively high by infrastructural flaws and deficiencies, while unreformed mindsets operating in a setting of poorly institutionalised norms contribute to the entrenched prejudices.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 27/07/2016 - 03:04

In reply to by गब्बर सिंग

एक विदाबिंदू घेऊन त्यातून मुद्दा सिद्धासिद्ध करणं, असा सांख्यिकीचा गैरवापर सुरू आहे तर. माझं संपलं; तुमचं चालू द्या.

गब्बर सिंग Wed, 27/07/2016 - 03:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एक विदाबिंदू घेऊन त्यातून मुद्दा सिद्धासिद्ध करणं, असा सांख्यिकीचा गैरवापर सुरू आहे तर. माझं संपलं; तुमचं चालू द्या.

मी फक्त तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले होते.

-----

माझा स्वतःचा मुद्दा सुद्धा हाच आहे की - मुस्लिमांचे कन्व्हिक्शन चे प्रमाण व त्यांचे लोकसंख्येतील प्रमाण ह्यांच्यात तफावत आढळली की त्यातून (इंडियन एक्सप्रेस च्या संपादकीय मंडला ने) भारतीय कोर्ट सिस्टिम बायस्ड असल्याचा निष्कर्ष काढणे हे वैचारिक लांब उडी मधे डझनभर सुवर्णपदके (ऑलिंपिक, एशियाड, कॉमनवेल्थ वगैरे) जिंकण्याप्रमाणे आहे.

माझा अध्याहृत counterpoint काय आहे हे तुम्हाला माहीती असेलच.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 26/07/2016 - 20:50

इरोम शर्मिला ह्यांनी १६ वर्षं चालवलेलं उपोषण संपवून विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बातमीचा दुवा

गब्बर सिंग Wed, 27/07/2016 - 02:58

हिंदी सिनेमा च्या पहिल्या अनेक अभिनेत्र्या ज्यु होत्या

---

भारताचे संस्कृतिधन - वैद्यकीय क्षेत्रातले.

ग्रेट हा शब्द फक्त भारतीय संकृतीसाठीच जन्माला आलेला आहे - असं एकदा डिक्लेअर करून टाका.

नितिन थत्ते Wed, 27/07/2016 - 06:35

In reply to by गब्बर सिंग

>>Dr Hegde was also critical about the 'wrong priorities' of various governments and universities while initiating scientific researches. "We come across many science research journals which are of no use to anyone, while there's a dearth of studies which actually would be useful to mankind," he added.

वैज्ञानिक लेखनाबद्दल अशी 'समज' असलेल्यांना आधुनिक विज्ञान जुन्या "ज्ञाना"ला महत्त्व देत नाही अशी खंत वाटणे स्वाभाविक आहे.

राही Thu, 28/07/2016 - 10:45

In reply to by गब्बर सिंग

भारतीय संदर्भात 'ज्यू' म्हटले की अनेक स्मरणे जागी होतात. सुलोचना ही मला वाटते स्टार स्टेटस किंवा वॅल्यू असणारी हिंदी सिनेमातली पहिली अभिनेत्री असावी. तिच्या नावावर सिनेमा विकला जाण्याएव्हढे ग्लॅमर तिला होते.
आशा भेंडे याही मूळच्या लिली एझीकेल. (हे लेखात आहेच.) सुप्रसिद्ध भारतीय इंग्लिश कवी-लेखक-अभिनेता-समीक्षक प्रा. निस्सिम एझीकेल यांची बहीण. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट अभिनेते आत्माराम भेंडे यांच्या त्या पत्नी, नंदू(सदानंद) भेंडे यांची आई. आणखीही अनेक नावे येतात. रेचेल गडकर या काही काळ इंदिरा गांधी यांच्या सचिवांपैकी एक होत्या असे आठवते. ससून कुटुंब तर प्रसिद्धच आहे. आय्ज़ॅक किहिमकरांचेही नाव आठवलेच.

सुनील Thu, 28/07/2016 - 11:10

In reply to by राही

सत्तरच्या दशकातील एक विख्यात क्रिकेट अंपायर जुडा रुबेन आणि कवयित्री वंदना विटणकर.

अलिबागला जाणार्‍यांना बहुधा डी सॅमसन यांचा आईसक्रीम सोडा माहिती असतो. त्याचे जनक सॅमसन दिगोडकर हेही त्यांच्यापैकीच.

राही Thu, 28/07/2016 - 13:02

In reply to by सुनील

आणि मस्जिद स्टेशनचे नाव ज्या 'जुनी मशीद'वरून पडले आहे ती मशीद नसून एक सिनेगॉग आहे आणि तो शामजी हसाजी दिवेकर या कोंकणी ज्यूने बांधला आहे. याचे दुसरे नाव सॅम्युएल एझीकेल. याच्या नावाने एक सॅम्युएल स्ट्रीटही या भागात आहे. अठराव्या शतकातल्या या कर्तृत्ववान सॅम्युएलविषयी काही रंजक माहिती इतिहासात नमूद आहे.
बनी रुबेन हे नावही आठवतेय. पण हे रुबेन ज्यू होते की काय ते नक्की माहीत नाही.

'न'वी बाजू Fri, 29/07/2016 - 18:09

In reply to by राही

आणि मस्जिद स्टेशनचे नाव ज्या 'जुनी मशीद'वरून पडले आहे ती मशीद नसून एक सिनेगॉग आहे आणि तो शामजी हसाजी दिवेकर या कोंकणी ज्यूने बांधला आहे.

पण मग लोक त्यास 'मशीद' असे (आणि त्या विभागास 'मशीद बंदर' असे) का (आणि कधीपासून) संबोधू लागले असावेत?

(तसेही पुण्यातील सिनेगॉगास 'लाल देऊळ' असे संबोधतातच म्हणा.)

गब्बर सिंग Wed, 27/07/2016 - 23:43

शारिया सारखे कडक कायदे हवेत ___ राज ठाकरे.

----------

क्रोनी कॅपिटलिझम बद्दल....

----------

बरखा दत्त आणि अर्नब यांच्यात भांडणं लागलियेत.

स्युडो हा शब्द जिकडेतिकडे लावायची आता शर्यत लागेल. एक जण स्युडो सेक्युलरिझम म्हणणार दुसरा स्युडो लिबरल म्हणणार तिसरा स्युडो पॅट्रिऑटिझम म्हणणार चौथा स्युडो कॉन्झर्व्हेटिव्ह म्हणणार.

.शुचि. Wed, 27/07/2016 - 23:55

In reply to by गब्बर सिंग

स्युडो हा शब्द जिकडेतिकडे लावायची आता शर्यत लागेल. एक जण स्युडो सेक्युलरिझम म्हणणार दुसरा स्युडो लिबरल म्हणणार तिसरा स्युडो पॅट्रिऑटिझम म्हणणार चौथा स्युडो कॉन्झर्व्हेटिव्ह म्हणणार.

=)) =)) प्लीज हसवु नका.

गब्बर सिंग Thu, 28/07/2016 - 08:41

States to be ranked on health, edu parameters

Unleash the power of competition.

फक्त एवढंच करा की हे इन्स्टिट्युशनलाईझ करा. भविष्यात दुसरे सरकार आले तर त्यांना ही यंत्रणा बरखास्त करता येता कामा नये.

मुख्य आरोप कम समस्या तिन असणार आहेत -

(१) आमच्या राज्याची तुलना अमक्या अमक्या राज्याशी करणं चूक आहे कारण ..... ते आधीच विकसित आहेत... नाहीत वगैरे.
(२) रँकिंग मुळे राज्याराज्यांत भांडणं लागतात व म्हणून राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी ही संकल्पना कॅन्सल करण्यात येत आहे,
(३) सर्वात महत्वाचे - चांगली रँक मिळाली की केंद्राकडून काय मिळणार ? आणि मुख्य म्हंजे वाईट रँक मिळाली की (ती सुधारण्यासाठी) काही मिळणार नसेल तर ते राज्य आणखी तळातगाळात जाणार - व हे अनफेअर आहे, अन्याय्य आहे वगैरे वगैरे वगैरे नेहमीचेच आरोप होणार. क्लासिक प्रॉब्लेम इन डेव्हलपमेंट - In so far as they under-perform (ranking declines) they will get the funds from central Govt. and in so far as they outperform (improve the ranking) they will not get funds from center. Why should they improve ?

गब्बर सिंग Fri, 29/07/2016 - 04:16

Sushma Swaraj condoles death of Mahasweta Devi, but with wrong books

कसलं लास्टींइग इम्प्रेशन ? अशी कोणती कृति तुम्ही केलीत की जी त्या दोन पुस्तकांमधून मिळालेल्या इम्प्रेशन च्या आधारावर होती ??

----

No Chinese incursion in Uttarakhand, only transgression: Defence Minister Parrikar

(१) incursion वि. transgression : दोन्ही मधे काय फरक आहे ??
(२) भारतीय सैन्याकडून असं transgression कधी घडलंय का ? किमान चीन ने तसा आरोप (भारतावर) कधी केलेला आहे का ?? कन्फ्युजन (differing perceptions) दोन्ही बाजूला असेल तर आगळीक दोन्ही बाजूने होऊ शकते. मग दर वेळी त्त्यांच्याच बाजूने आगळीक होते व आपल्या बाजूने कधीच होत नाही असं आहे का ? असेल तर सरकार शेपुट घालत आहे असं म्हणावं का ??

“India-China border is not formally demarcated. There are areas where both sides have differing perceptions of LAC. Barhoti (Uttarakhand) is one such area. There was no incursion, just transgression which has been settled. There is a well defined mechanism to settle such transgressions,” Parrikar said in Lok Sabha

-------------

Every 4th person categorised as ‘beggar’ in India is Muslim

ही बातमी प्रकाशित करण्यामागचा हेतू काय आहे तेच मला समजत नैय्ये -

२५% हे प्रमाण अयोग्य आहे की योग्य ?
०% असते तर योग्य असतं का ?
१००% असते तर योग्य असतं का ?
की असं म्हणणार - आम्ही फक्त डेटा दिला (बातमी दिली) ... त्याच्यातून काय अर्थ काढायचा ते तुमचं तुम्ही ठरवा ? ( म्हंजे वाचकांनी, जनतेने, राजकारण्यांनी, मौलवींनी, मुस्लिम जनतेने ? )

Under the Bombay Prevention of Begging Act, 1959, anyone having no visible means of subsistence and found wandering about in a public space is deemed as a beggar. All those who solicit alms in a public place under any pretence including singing, dancing, fortune-telling or street performing are also deemed as beggars. The Act gives discretionary powers to the police to pick up anyone on suspicion that he is a beggar or a destitute with no means of fending for himself.

नितिन थत्ते Fri, 29/07/2016 - 06:49

In reply to by गब्बर सिंग

>>अशी कोणती कृति तुम्ही केलीत की जी त्या दोन पुस्तकांमधून मिळालेल्या इम्प्रेशन च्या आधारावर होती ??

हाजार चुराशीर मां पुस्तकात चळवळीत कार्यरत असलेल्या तरुणांना "जमावाकडून ठार मारले जाण्याचा" उल्लेख आहे. ही मेथडॉलॉजी त्यांचा पक्ष आत्मसात करत आहे. हे लास्टिंग इंप्रेशन कदाचित महाश्वेता देवींच्या लेखनातून झाले असेल.
----------------------------------
>>All those who solicit alms in a public place under any pretence including singing, dancing, fortune-telling or street performing are also deemed as beggars.

बापरे !!! कै च्या कै व्याख्या आहे. डोंबारी सुद्धा भिकारी !!!! एक प्रकारे मोबदला आधी न ठरवता परफॉर्मन्स केला तर तो भिकारी अशी काहीतरी कल्पना दिसते. "द्या कायतरी समजून जे योग्य वाटेल ते !" असं म्हणणं म्हणजे भीक मागणं.

'न'वी बाजू Fri, 29/07/2016 - 18:34

In reply to by गब्बर सिंग

(१) incursion वि. transgression : दोन्ही मधे काय फरक आहे ??

Intent (vs. lack thereof)?

(२) भारतीय सैन्याकडून असं transgression कधी घडलंय का ? किमान चीन ने तसा आरोप (भारतावर) कधी केलेला आहे का ??

वनमयूरन्याय.

बोले तो, भारतीय सैन्याकडून चिनी (किंवा इतर कोणत्याही) हद्दीत जर असे ट्रान्सग्रेशन घडले, तर सामान्यत: त्याची बातमी (१) भारतीय वर्तमानपत्रांपर्यंत पोहोचण्याची, (२) त्यानंतर भारतीय वर्तमानपत्रांतून ती छापून येण्याची, (३) त्यानंतर ती तुम्ही वाचण्याची शक्यता किती? त्याची परिणती एखाद्या तितक्याच मोठ्या मारामारीत झाल्याखेरीज?

जंगलात जर मोर नाचला, आणि ते पाहायला जर तुम्ही जंगलात कडमडला नाहीत, तर मोर जंगलात नाचलाच नाही???

मिलिन्द् पद्की Sat, 30/07/2016 - 00:14

In reply to by गब्बर सिंग

नेहरूंनी सैन्याच्या चौक्या फार पुढे - जवळ जवळ चीनच्या हद्दीत बांधायला घेतल्या होत्या. हे कुरापत काढल्यासारखे होईल आणि त्यातून भारतावर चीनचा हल्ला होईल , तेंव्हा हे करू नये अशा प्रकारचा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (रणदिवे गट ) केला होता . तो देशद्रोही मानून कम्युनिस्ट पक्षाचा सर्व पॉलिटब्युरो- रणदिवेसह - नेहरूंनी महिनाभर तुरुंगात टाकला होता असे वाचल्याचे आठवते . (चू भू दे घे )

मिलिन्द Mon, 01/08/2016 - 22:20

In reply to by 'न'वी बाजू

Thanks a lot ! Consider: "After May 1961 Chinese troops occupied Dehra Compass and established a post on the Chip Chap River.The Chinese, however, did not believe they were intruding upon Indian territory. In response the Indians launched a policy of creating outposts behind the Chinese troops so as to cut off their supplies and force their return to China.
There were eventually 60 such outposts, including 43 north of the McMahon Line."

As to the Namorugna's policy on constantly maligning Nehru with blatant lies, is it even worth considering?

चिमणराव Fri, 29/07/2016 - 10:44

खुनाचे आरोप कित्येकदा फॅारेन्सिक पुराव्यातून सिद्ध करता येतात आणि साक्षीदारांची गरज भासत नाही.प्राणी मारणे ,बलात्कार वगैरेत साक्षीदार पंचनाम्याअभावी खटला फकरच कमकुवत होतो.

गब्बर सिंग Sat, 30/07/2016 - 01:04

In reply to by .शुचि.

"But I'm also hearing a lot of support for Khan and his standing up to Trump. And a lot of sadness that Muslims are still having to prove they are 'good Americans.'"

A lot of sadness that america still has to prove that it does not discriminate....असा प्रतिप्रश्न आला तर काय करणार ?

गब्बर सिंग Mon, 01/08/2016 - 07:01

Gurdip Singh case shows how Sushma Swaraj has made foreign ministry accessible to everyone

हे सगळं खरं असेल तर प्रशंसनीय आहे.

-------

समाजवादाची सुमधुर फले : Venezuela food shortages leave zoo animals hungry

Some 50 animals have starved to death in the last six months at one of Venezuela's main zoos, according to a union leader, due to chronic food shortages that have plagued the crisis-stricken South American nation.

निकोलस माडुरो यांनी स्टॅलिन च्या ही पुढची पायरी गाठली असावी असं वाटतंय मला. स्टॅलिन च्या कालात रशियात प्राणिसंग्रहालये होती का ? काय परिस्थिती होती त्यांची ? १९९२ नंतर काय स्थिती झाली ??

--------

प्राण्यांचं काय घेऊन बसलात ....

Venezuela's new decree: Forced farm work for citizens - A new decree by Venezuela's government could make its citizens work on farms to tackle the country's severe food shortages.

---------

कामगारांचा दोन सप्टेंबरला देशव्यापी संप

अनु राव Mon, 01/08/2016 - 11:55

In reply to by गब्बर सिंग

Gurdip Singh case shows how Sushma Swaraj has made foreign ministry accessible to everyone

हे सगळं खरं असेल तर प्रशंसनीय आहे.

संकटात अडकलेले आपले नागरिक वगैरे परत आणणं समजू शकते.
पण गुन्हेगारास वाचवण्याचे काय प्रयोजन ?

गब्बर सिंग Mon, 01/08/2016 - 12:33

In reply to by अनु राव

संकटात अडकलेले आपले नागरिक वगैरे परत आणणं समजू शकते.
पण गुन्हेगारास वाचवण्याचे काय प्रयोजन ?

भारत हे एक बडे राष्ट्र आहे. भारतीय नागरिकांच्या जीवनाचे सरासरी मूल्य अधिक आहे. इंडोनेशियन नागरिकांच्या सरासरी मूल्या पेक्षा जास्त.

जेव्हा भारत अतिगरीब राष्ट्र होते तेव्हा भारतीय नागरिकांना (उदा आखाती देशात) कस्पटासमान वागवले जात होते. आखाती देशात पोहोचल्यावर काही ठिकाणी त्यांचे पासपोर्ट्स काढून घेतले जात असत. आता परिस्थिती तितकी वाईट नाही. थोडीफार असेलही. पण पूर्वीइतकी वाईट नाही. भारताची बार्गेनिंग पॉवर जास्त आहे. व तिच्या जोरावर भारत सरकारने संकटात सापडलेल्या आपल्या नागरिकांना तिथून इकडे आणणे योग्यच आहे. गुन्हा भारतीय भूमिवर घडलेला नसेल तर भारतात त्याच्यावर (कदाचित) खटला दाखल करता येणार नाही.

त्याच १० गुन्हेगारांमधे एखादा पाकिस्तानी नागरिक असता तर सुषमा स्वराज यांनी - इंडोनेशियन सरकारने त्या पाकी नागरिकाला देहदंडाची शिक्षा द्यायलाच हवी असा आग्रह धरायला हवा होता. कारण पाकी नागरिकाचे जीवनमूल्य भारतीय नागरिकापेक्षा अत्यंत कमी आहे. व तसे मानले जायला हवे. पाकड्यांना आखातात अतिकस्पट वागणूक एवढ्यासाठीच दिली जाते. लेकिन अफसोस की त्या १० जणांत एकही पाकि नसावा.

अनु राव Mon, 01/08/2016 - 14:41

In reply to by गब्बर सिंग

प्रश्न असा होता गब्बु की एखाद्या गुन्हेगारासाठी हे सर्व करण्याचे प्रयोजन काय?

उद्या इंडोनेशियानी "तुझ्या बडे राष्ट का बडा नागरीक ह्या लॉजिक नी" त्या गुन्हेगार भारतीयाला सोडला तर त्याचे काय करायचे?

गब्बर सिंग Mon, 01/08/2016 - 15:36

In reply to by अनु राव

प्रश्न असा होता गब्बु की एखाद्या गुन्हेगारासाठी हे सर्व करण्याचे प्रयोजन काय?
उद्या इंडोनेशियानी "तुझ्या बडे राष्ट का बडा नागरीक ह्या लॉजिक नी" त्या गुन्हेगार भारतीयाला सोडला तर त्याचे काय करायचे?

प्रश्न ठीकठाक आहे.

गुन्हेगार तो "त्यांच्या" नजरेत आहे. भरतभूमीच्या दृष्टीने तो निर्दोष आहे.

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी - असं होता कामा नये.

तो तिथे गुन्हेगार असेलही. पण तो एका (होऊ घातलेल्या) महासत्तेचा नागरिक आहे. त्याला उचित मान मिळायला हवा. समानता वगैरे बकवास ... नको.

त्याला सोडला व तो भारतात आला तर त्याचे काय करायचे ते भारतीय पोलिस ठरवतीलच की. त्याने भारतीय भूमिवर कोणताही गुन्हा केलेला असेल तर त्यास शिक्षा मिळेलच व गुन्हा केलेला नसेल तर त्यास त्याचे स्वातंत्र्य आहेच की.

अनु राव Mon, 01/08/2016 - 16:15

In reply to by गब्बर सिंग

म्हणुनच त्या इटलीच्या दोघांना मानसन्मानानी परत इटलीला पाठवावे असे मला वाटायचे. ते दिसायला पण एकदम स्मार्ट राजबिंडे, मॅचो होते असे प्रथम दर्शनी बघितल्या बघितल्या मनात आल्याचे आठवते.

गब्बर सिंग Mon, 01/08/2016 - 16:35

In reply to by अनु राव

म्हणुनच त्या इटलीच्या दोघांना मानसन्मानानी परत इटलीला पाठवावे असे मला वाटायचे. ते दिसायला पण एकदम स्मार्ट राजबिंडे, मॅचो होते असे प्रथम दर्शनी बघितल्या बघितल्या मनात आल्याचे आठवते.

अं ... हं.

इटली हे भारताच्या दृष्टीने छोटे, व कमी ताकद असलेले राष्ट्र आहे. त्यांना कमी सन्मान मिळायला हवा. भारतास जास्त.

ते दिसायला कसेही असोत ... त्यांना इथेच ठोकून काढायला हवे. देहदंड हे अत्युत्तम.

अनु, तुम्ही उगीचच समानतेच्या मृगजलात अडकत आहात.

समानता हा बकवास आहे.

अनु राव Mon, 01/08/2016 - 16:45

In reply to by गब्बर सिंग

ते दिसायला कसेही असोत ... त्यांना इथेच ठोकून काढायला हवे. देहदंड हे अत्युत्तम.

मी समानतेच्या मृगजळात अजिबात अडकत नाहीये. दोन इटालियन सुंदर मुलींना तुरुंगात टाकावे असे तुला वाटले असते का? सर्व भारतीय पोलिस वगैरे गराड्यात पण ते उठुन दिसत होते ( नक्की कोणी कोणाला पकडलय तेच कळत नव्हते ). मी समानतेची मागणी करत नाहीचे, उलट त्यांना असमानतेनी वागवायला पाहिजे होते. त्यांना २-३ भारतीय जहिरातींचे काँट्रॅक्ट देऊन मग इटलीला पाठवायला पाहिजे होते.

बॅटमॅन Mon, 01/08/2016 - 21:23

In reply to by अनु राव

म्हणजे तुमच्या राज्यात खूनबलात्कार वगैरे काहीही केले तरी चालेल, फक्त राजबिंडे असले पाहिजे. हो की नाही?

अनु राव Tue, 02/08/2016 - 09:24

In reply to by बॅटमॅन

बरोबरीच्या माणसाचे खून चालतील कदाचित, बलात्कार नाही चालणार, चोरी नाही चालणार.

काय बॅट्या, सुंदर मुलींना बर्‍याच गोष्टी माफ असतात की नाही, उलट कवि शायर तर त्यांच्या साठी खून वगैरे करायला तयार असतात. पण हेच स्मार्ट, रुबाबदार पुरुषाबद्दल म्हणले तर तुला आवडत नाही.

गब्बु - एखाद्या अतिसुंदर मुलीवर खुनाचा खटला चालु आहे आणि तू ज्युरी असशील तर काय करशील?

गब्बर सिंग Tue, 02/08/2016 - 09:32

In reply to by अनु राव

गब्बु - एखाद्या अतिसुंदर मुलीवर खुनाचा खटला चालु आहे आणि तू ज्युरी असशील तर काय करशील?

गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा देईनच पण ....

ती अतिसुंदर मुलगी जर श्रीमंत असेल तर मी तिच्याबाबतीत माझे निकष काही प्रमाणावर शिथील करेन.
पण जर ज्याचा खून झाला तो श्रीमंत असेल तर तिच्याबाबतीत माझे निकष काही प्रमाणावर अधिक कडक करेन.
दोघेही श्रीमंत असतील तर त्यातल्या ज्याने अधिक कर भरलेला आहे त्याला काही प्रमाणावर झुकते माप.

( माझे अल्गोरिथम क्लियर आहे - नियम लावताना श्रीमंतांना झुकतं माप मिळायलाच हवं. )

अनु राव Tue, 02/08/2016 - 10:38

In reply to by गब्बर सिंग

गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा देईनच पण ....

तूच ज्युरी असलास तर गुन्हा सिद्ध करायचा की नाही तुझ्याच हातात असेल ना. निर्दोष ठरवु शकतोस तू तिला ( तिने खून केला आहे की नाही हे इममटेरीअल आहे, ती अतिसुंदर आहे हे महत्वाचे ).

( माझे अल्गोरिथम क्लियर आहे - नियम लावताना श्रीमंतांना झुकतं माप मिळायलाच हवं. )

हाय राम, जिथे तिथे फक्त पैसा.

----------

पण बॅट्या तुला उत्तर मिळाले ना. गुन्हा केलाय की नाही ते महत्वाचे नाही, कोण आरोपी हे महत्वाचे.

बॅटमॅन Tue, 02/08/2016 - 15:54

In reply to by अनु राव

हाय राम, जिथे तिथे फक्त पैसा.

त्याप्रमाणे तुम्ही सौंदर्याचा निकष लावा म्हणजे किमान प्रामाणिक आहात हे तरी पटेल. =))

बॅटमॅन Tue, 02/08/2016 - 15:53

In reply to by अनु राव

बरोबरीच्या माणसाचे खून चालतील कदाचित, बलात्कार नाही चालणार, चोरी नाही चालणार.

खून का चालतील? शिवाय एक गुन्हा चालतो तर बाकी गुन्ह्यांनी काय घोडं मारलंय?

काय बॅट्या, सुंदर मुलींना बर्‍याच गोष्टी माफ असतात की नाही,

तुमच्या राज्यात असतील. आमच्यात नसतं बॉ असलं काही. सुंदर मुलींना पाहून गोष्टी फ्री देणे वगैरे किस्से अमेरिकेतले ऐकलेत, भारतातले नै ऐकले कधी.

बाकी कवि-शायरांचे काय सांगताय? "शत्रूला रुधिराचे स्नान घालू" वगैरे कविता लिहिणार्‍यांना कुणा टग्याद्वारे एक धक्का देऊन बघा फक्त, फारतर "टग्याने मारला धक्का" अशी कविता बाहेर पडेल. अजून घंटा काही होणार नाही.

अनु राव Tue, 02/08/2016 - 16:03

In reply to by बॅटमॅन

खून का चालतील? शिवाय एक गुन्हा चालतो तर बाकी गुन्ह्यांनी काय घोडं मारलंय?

"बरोबरीच्या माणसाचे" हे शब्द काढुन टाकलेस बॅटोबा.

तूच लिहीले होतेस की "तुमच्या राज्यात", एकदा माझेच राज्य आहे म्हणल्यावर मीच ठरवणार ना काय चालेल काय नाही.

बॅटमॅन Tue, 02/08/2016 - 16:08

In reply to by अनु राव

हा हा हा, एकदा माझेच राज्य आहे म्हटले की काहीही करा. फक्त ते न्याय्य वगैरे असल्याच्या थाटात बोलू नका.

अनु राव Tue, 02/08/2016 - 16:12

In reply to by बॅटमॅन

एकदा माझेच राज्य आहे म्हटले की काहीही करा. फक्त ते न्याय्य वगैरे असल्याच्या थाटात बोलू नका.

माझ्या राज्यात माझे न्याय्य. तुझ्या राज्यात तुझेच न्याय्य.

शुचि आणि मनोबांच्या राज्यात सर्वांचेच न्याय्य.

.शुचि. Tue, 02/08/2016 - 18:52

In reply to by अनु राव

शुचि आणि मनोबांच्या राज्यात सर्वांचेच न्याय्य.

असेच काही नाही आय अ‍ॅम पॅशनेट अबाऑऑट फ्यु थिंग्स. पण इतक्या कमी गोष्टी आहेत की, त्या कळून येत नाहीत. जाऊ देत.

.शुचि. Tue, 02/08/2016 - 18:49

In reply to by बॅटमॅन

सुंदर मुलींना पाहून गोष्टी फ्री देणे वगैरे किस्से अमेरिकेतले ऐकलेत,

याईक्स!! नो लंच इज फ्री :( डिसगस्टिंग फेव्हर्स!

अनु राव Mon, 01/08/2016 - 16:57

In reply to by गब्बर सिंग

इटली हे भारताच्या दृष्टीने छोटे, व कमी ताकद असलेले राष्ट्र आहे.

हे कैच्या कै. पर कॅपिटा जीडीपी कीती इटली आणि भारताचा? विकासाच्या बाबतीतला क्र्मांक कीती?
आणि ईटली कन्यका भारताची १० वर्ष स्युडो पंतप्रधान होती हे विसरलास तू.

बॅटमॅन Mon, 01/08/2016 - 21:25

In reply to by अनु राव

उद्या भारताचा जीडीपी अमेरिकेपेक्षा जास्त झाला तरीही पर क्यापिटा कमीच असणारे, तेव्हा ते एक असोच.

बाकी इटलीचे भारताच्या दृष्टीने फार कै महत्त्व आजिबात नाही. कोणे एके काळी असले तर असूदे. आज नक्कीच अत्यधिक नाही.

मिलिन्द Mon, 01/08/2016 - 22:32

In reply to by अनु राव

नाही, ती "खरी" (म्हणजे सत्ताधारी) पंतप्रधान होती. स्युडो पंतप्रधान मनमोहन सिंग होते!

गब्बर सिंग Tue, 02/08/2016 - 01:41

In reply to by अनु राव

हे कैच्या कै. पर कॅपिटा जीडीपी कीती इटली आणि भारताचा? विकासाच्या बाबतीतला क्र्मांक कीती?

पर कॅपिटा जीडीपी हा सरासरी जीवनमूल्य ह्या ठिकाणी फारसा महत्वाचा क्रायटेरिया नाही. मिलिटरी ताकद हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे.

टॅक्स चुकवणार्‍या भारतीय नागरिकास पोलिस पकडतात तेव्हा भारतीय पोलिसाचे पर कॅपिटा जीडीपी हे त्या टॅक्स चुकवणार्‍या माणसापेक्षा (अनेकदा) कमीच असते की. तरीही पोलिस त्याला पकडतात. कारण बळ जास्त असते म्हणून.

आता तू म्हणशील की - बळ असते पेक्षा "भारतात बव्हंशी प्रमाणावर कायद्याचे, नियमांचे राज्य असते म्हणून पोलिस त्याला पकडतात".

पण मग ते भारतातल्या भारतात. इंटरनॅशनल पोलिटिकल सिस्टिम ही कुठे कायद्याच्या आधारावर चालते ??

(इटली हे नेटो चे सदस्य राष्ट्र आहे.)

अनु राव Mon, 01/08/2016 - 16:11

In reply to by गब्बर सिंग

Venezuela's new decree: Forced farm work for citizens - A new decree by Venezuela's government could make its citizens work on farms to tackle the country's severe food shortages.

हे तर ख्मेर रुज सारखे झाले. आता तरी लोकांचे डोळे उघडणार आहेत का?

गब्बर सिंग Mon, 01/08/2016 - 16:36

In reply to by अनु राव

हे तर ख्मेर रुज सारखे झाले. आता तरी लोकांचे डोळे उघडणार आहेत का?

समाजवाद्यांना हालहाल करून ठार मारले तरी ते आपले ग्रह सोडत नाहीत.

अनु राव Mon, 01/08/2016 - 16:53

In reply to by गब्बर सिंग

समाजवाद्यांना हालहाल करून ठार मारले तरी ते आपले ग्रह सोडत नाहीत.

एकदम असहमत.

समाजवादी लोक तत्वासाठी जान वगैरे देत नाहीत ( जान वगैरे सोड रे, काहीच देत नाहीत ). त्यांना समाजखादी म्हणले पाहिजे. दुसर्‍यांचे जे मिळेल ते खातात. त्यांची भुक पण खुप मोठी असते. आमच्या काकांनी २ तुकडे फेकले तर त्यांच्या बद्दल कौतुकाचे लेख लिहीतात. कमीतकमी पैश्यासाठी भाटगीरी करायची हे समाजवाद्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे ( तशी बरीच लक्षणे आहेत, पण आत्ता ते नको ).

गब्बर सिंग Tue, 02/08/2016 - 03:51

In reply to by मिलिन्द

Also Muslims, rationalists, feminists, secularists and rationalists of all sorts.

आमचा मुद्दा हा आहे की - त्या विशिष्ठ धर्माचे मूळ नाव "शांतताप्रिय" असेच होते. नंतर ते इस्लाम वगैरे करण्यात आले. इतर धर्मांनी, भाषांनी तो "शांतता" त्या धर्मामधूनच उचलला / चोरला.

फेमिनिझम हा शब्दपण त्या विशिष्ठ शांतताप्रिय धर्मातूनच प्रसवला. त्या विशिष्ठ शांतताप्रिय धर्माचे प्रेषित लोक सगळे फेमिनिस्टच होते. त्या धर्माची स्थापनाच मुळी एका जेंडर न्युट्रल असलेल्या फेमिनिस्ट व्यक्तीने केलेली आहे.

खरंतर रॉबर्ट ऑमन ने रॅशनल वागणूकीची व्याख्या केली ती सुद्धा त्या विशिष्ठ शांतताप्रिय धर्मातल्या सर्वोच्च ग्रंथाततून उचलूनच. इथे ते संपूर्ण व्याख्यान वाचायला मिळेल. दुसर्‍या पानावर रॅशनल ची व्याख्या आहे.

त्या शांतताप्रिय धर्मातल्या सर्वोच्च ग्रंथातल्या पहिल्या वाक्यात १० शब्द आहेत व ते सर्व सेक्युलर या शब्दाचे विविध अर्थ आहेत.

उदा. इष्क पर जोर नही या चित्रपटातलं हे गाणं - "ये दिल दिवाना है, दिल तो दिवाना है, दीवाना दिल है ये, दिल दीवाना". तसे.

मिलिन्द Tue, 02/08/2016 - 04:19

In reply to by गब्बर सिंग

इस्लाम हा जगातील सर्वात भिकारचोट धर्म आहे असे जर तुमचे म्हणणे असेल तर मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे.

गब्बर सिंग Tue, 02/08/2016 - 04:33

In reply to by मिलिन्द

इस्लाम हा जगातील सर्वात भिकारचोट धर्म आहे असे जर तुमचे म्हणणे असेल तर ......

माझं खरंच असं म्हणणं नाही.

माझं हे म्हणणं आहे की - (१) इस्लाम, मुस्लिम्स, मौलाना, इस्लामिक परंपरा, इस्लामी शिकवण यांच्यात प्रचंड रिफॉर्म्स ची गरज आहे, (२) दुसरे म्हंजे पुरोगाम्यांनी - काहीही झाले तरी इस्लाम ला अ‍ॅबसॉल्व्ह करण्याचा चंग बांधल्याप्रमाणे वागूबोलू नये. (अर्थात ते असं म्हणतील की त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.)

बॅटमॅन Tue, 02/08/2016 - 05:14

In reply to by गब्बर सिंग

नेमके हेच म्हणायचे आहे. दोष इतरांतही आहेत पण त्यांना ठोकणारे बक्कळ लोकही आहेत. स्वयंघोषित पुरोगाम्यांपैकी जवळपास प्रत्येकजण इस्लामची मात्र वकिलीच करतो तेवढे सोडले तरी बास आहे.

गब्बर सिंग Tue, 02/08/2016 - 05:44

In reply to by बॅटमॅन

आमच्या एका मित्राने तर "यांच्यावर कमी टीका होते आहे म्हणून यांच्यावर पण टीका करायला हवी असा गब्बर चा होरा आहे" असा चमत्कारिक (अविचारी) डायल्याग मारला होता.

----

दोष इतरांतही आहेत पण त्यांना ठोकणारे बक्कळ लोकही आहेत.

नेमके.

उदा. कॅपिटलिझम मधे सुद्धा दोष आहेत.

हारुन शेख Tue, 02/08/2016 - 19:28

In reply to by गब्बर सिंग

अ‍ॅबसॉल्व्ह करू नका ठीकच. पण म्हणून लगेच भिकारचोट वैगेरे ??? हे टोक नाही तर ते टोक अवघड आहे बाबा लोकं .

गब्बर सिंग Tue, 02/08/2016 - 20:40

In reply to by हारुन शेख

अ‍ॅबसॉल्व्ह करू नका ठीकच. पण म्हणून लगेच भिकारचोट वैगेरे ??? हे टोक नाही तर ते टोक अवघड आहे बाबा लोकं .

वाटलंच मला !!!

कोण काय म्हणाले याचा विचार न करता उचलली बंदूक आणि सुरु गोळीबार.

हारुन शेख Tue, 02/08/2016 - 20:55

In reply to by गब्बर सिंग

तुम्हाला नाही म्हणालो मिलिंद यांनाच म्हणतोय. उलट तुम्ही तर ती तिमूर कुरानची लिंक दिली त्याबद्दल धन्यवाद. सगळं वाचून काढतो सावकाश.

.शुचि. Tue, 02/08/2016 - 22:00

In reply to by गब्बर सिंग

हो ना तुम्ही तर स्पष्ट म्हणालात ना -

माझं खरंच असं म्हणणं नाही.

मग हारुन शेख तुम्हाला म्हटले असे का वाटले?

गब्बर सिंग Tue, 02/08/2016 - 22:10

In reply to by .शुचि.

दोन कारणे

(१) हारून शेख यांचा प्रतिसाद माझ्या प्रतिसादाला उत्तर म्हणून होता
(२) हारून शेख यांनी "अ‍ॅबसॉल्व्ह करू नका पण...." अशी सुरुवात केली.

नितिन थत्ते Tue, 02/08/2016 - 20:52

In reply to by हारुन शेख

धर्म (व्हॉटेव्हर दॅट एनकम्पासेस) सगळेच भिकारचोट* असतात. त्या धर्मात जन्मलेले** लोक त्या भिकारचोटपणाला किती चिकटून राहतात यावर त्या "धर्माचा भिकारचोटपणा" मोजला जातो.

*धर्म भिकारचोट असतात कारण ते मूलत: आउटडेटेड असतात.

**धर्माचे अनुयायी असं इथे म्हटलेलं नाही. कारण धर्मात न जन्मता त्या धर्माचे अनुयायी असणारे लोक फारच कमी/निग्लिजिबल असतील. त्यामुळे त्यांचा विचार करायची गरज नाही.

हारुन शेख Tue, 02/08/2016 - 21:02

In reply to by नितिन थत्ते

भिकारचोट हे जरा अति वाटलं. भाषा. टाकाऊपण म्हणता आलं असतं भिकारचोटऐवजी. शिवाय धर्म (फक्त इस्लामच नाही तर इतरही / कोणताही ) पूर्ण टाकाऊ / भिकारचोट असतो हे काही मला पटत नाही. बऱ्यापैकी उपयोगी संस्था आहे ती. त्यातला टाकाऊ / भिकारचोट भाग त्याज्य समजावा आणि तो काढून टाकावा धर्मालाच टाकाऊ / भिकारचोट लेबल लावणं अतिरेकी आहे. दुसरं टोक आहे ते.

नितिन थत्ते Tue, 02/08/2016 - 21:07

In reply to by हारुन शेख

ठीक आहे. भिकारचोट ऐवजी यूजलेस (टाकाऊ) म्हणू.

टाकाऊ गोष्टी काढून टाकल्या तर धर्मात (विशेष) उरतं काय? सत्य बोलावे, इतरांना त्रास देऊ नये वगैरे ?

हारुन शेख Tue, 02/08/2016 - 21:16

In reply to by नितिन थत्ते

'सत्य बोलावे, इतरांना त्रास देऊ नये वगैरे' तितक्या महत्वाच्या गोष्टी नाहीत असे म्हणायचे असेल तर माझा पास. शेवटी नीतीच्या कल्पना व्यक्तिसापेक्ष असणारच. माझ्या मते ह्या गोष्टीच धर्माला महत्वपूर्ण आणि उपयोगी संस्था ठरवतात.

मिलिन्द Tue, 02/08/2016 - 21:45

In reply to by हारुन शेख

तो शब्द चुकीचा होता. तुमच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. पण जगात जिथे जिथे मोठ्या कत्तली , बलात्कार, बॉम्ब स्फोट चालू आहेत त्यातल्या बऱ्याचशा जागी इस्लाम चा संबंध आहे (अल कायदा, आयसिस , बोको हराम, लष्कर-ए-जांघवी (पाकिस्तानात शियांना मारणारे) , अल शबाब, तालिबान वगैरे वगैरे !) हे मान्य व्हायला हरकत नसावी . सौदी अरॅबिया हे तर एक यशस्वी आयसिस आहे असेच म्हणावे लागते: सरकारच दर वर्षी शेकडो शिरच्छेद करते . इस्लाम मध्ये दर वर्षी हजारो मुलीही "ऑनर किलिंग " साठी मारल्या जात आहेत.
प्रोटेस्टंट अमेरिकेने जसे आपल्याच समाजातली एक कीड म्हणून "कू क्लक्स क्लॅन" या वंश-द्वेष्ट्या प्रोटेस्टंट संघटनेच्या हिंसक कारवायांचा पूर्ण बंदोबस्त केला, तसे आता मुस्लिम समाजाकडून व्हायला नको का?

गब्बर सिंग Tue, 02/08/2016 - 21:51

In reply to by मिलिन्द

तुमच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो.

हम आहट भी भरते है तो हो जाते है बदनाम
वोह कत्ल तक करते है और चर्चा भी नही होता