Skip to main content

ही बातमी समजली का? - ६२

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.

===========

Oh sh*% !!!

Observing there was a “conscious effort on his part to somehow accommodate” the Aditya Birla Group flagship Hindalco in the 2005 allocation of the Talabira-II coal block in Orissa, a special court Wednesday summoned former prime minister Manmohan Singh, who also held the coal portfolio then, as an accused in the case.

नितिन थत्ते Thu, 12/03/2015 - 11:01

In reply to by गब्बर सिंग

पंचतारांकित हॉटेल्स भरपूर कचरा निर्माण करत असावेतच.

या कराचे दुसरे जस्टिफिकेशन गब्बर मोडमध्ये देता येईल.....
झोपड्या/चाळींमधील लोक डॉण्ट माइण्ड घाण & कचरा. इफ दॅट घाण & कचरा इज टु बी एलिमिनेटेड, इट शुड बी पेड ब्य दोज हू मेक फस अबाउट इट.

गब्बर सिंग Thu, 12/03/2015 - 11:12

In reply to by नितिन थत्ते

पंचतारांकित हॉटेल्स भरपूर कचरा निर्माण करत असावेतच. - किती टक्के कचरा पंचतारांकित हॉटेल्स निर्माण करतात ? व किती टक्के कचरा वर्थलेस फडतूस लोक निर्माण करतात ?? मोघम उत्तर द्या.

----

झोपड्या/चाळींमधील लोक डॉण्ट माइण्ड घाण & कचरा. इफ दॅट घाण & कचरा इज टु बी एलिमिनेटेड, इट शुड बी पेड ब्य दोज हू मेक फस अबाउट इट.

ह्म्म.

दम हे मुद्दे मे.

याच न्यायाने - Those who make fuss about poverty alleviation and expanding the welfare state - should be forced to pay for poverty alleviation and welfare funds. Right ???

नितिन थत्ते Thu, 12/03/2015 - 11:20

In reply to by गब्बर सिंग

>>याच न्यायाने - Those who make fuss about poverty alleviatio.....

हॅ हॅ हॅ...
आमचे असे आर्ग्युमेंट मुळातच नाही. त्यामुळे ते तुम्ही आम्हाला लागू करू शकत नाही.

ज्योक्स अपार्ट. ही बातमी दिशाभूल करणारी आहे. खरी बातमी खालील प्रमाणे आहे.
Govt Considering swacchh bharat cess on all services

गब्बर सिंग Thu, 12/03/2015 - 11:34

In reply to by नितिन थत्ते

ही बातमी दिशाभूल करणारी आहे. खरी बातमी खालील प्रमाणे आहे.

ठीकाय.

----

खरंतर कचरा या शब्दाची डेफिनिशन/व्याप्ती थोडी बदलून फडतूसांना त्यात समाविष्ट करायला हवे. वर्थलेस गरीब लोक हाच एक मोठा कचरा आहे. म्हंजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे - दोज हू मेक फस अबाऊट इट विल बी मोअर दॅन विलिंग टू पे फॉर इट्स ट्रीटमेंट (जसे सिवेज ट्रीटमेंट प्लँट). व या कचर्‍याची विल्हेवाट सुयोग्य पद्धतीने (उदा. बायो डिग्रेडेबल कचर्‍याच्या बाबतीत ...) लावली जाऊ शकते.

राजेश घासकडवी Sun, 15/03/2015 - 00:47

In reply to by गब्बर सिंग

खरंतर कचरा या शब्दाची डेफिनिशन/व्याप्ती थोडी बदलून फडतूसांना त्यात समाविष्ट करायला हवे. वर्थलेस गरीब लोक हाच एक मोठा कचरा आहे.

अहाहा! आजचा दिवस मला सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवावासा वाटतो. इनकम रिडिस्ट्रिब्यूशन करून या फडतूस कचऱ्याचं रूपांतर नॉनफडतूस, नॉनकचऱ्यात करण्यासाठी श्रीमंतांनी पैशे का काढून द्यावे, याचं इतकं सुंदर आर्ग्युमेंट मिळेल असं वाटलं नव्हतं. आणि ते प्रत्यक्ष गब्बरच्या कळफलकातून यावं...

आज सोनियाचा दिनु, वरसे अमृताचा घनु...

गब्बर सिंग Sun, 15/03/2015 - 03:18

In reply to by नगरीनिरंजन

धन्यवाद तुम्हा दोघांचे.

(हे नेमके कसे करायचे ते सांगतो. गरिबांचे क्लासिफिकेशन करायचे - अ) ट्रिटमेंट प्लँट मधून काढण्यायोग्य गरीब, ब) बायोडिग्रेडेबल गरीब वगैर. असे अनेक ग्रुप करावे. जे सुधरू शकतात त्यांना ट्रीटमेंट प्लँट मधे घालायचं... म्हंजे उठता लाथ बसता बुक्की व जास्त विरोध केल्यास अँप्युटेशन वगैरे ची ट्रीटमेंट. बायोडिग्रेडेबल म्हंजे जे सुधरू शकत नाहीत त्यांना सरळ गाडायचं..... लेट देम डिग्रेड इन्टू व्हॉट दे अ‍ॅक्च्युअली आर.)

गवि Thu, 12/03/2015 - 11:23

In reply to by गब्बर सिंग

किती टक्के कचरा पंचतारांकित हॉटेल्स निर्माण करतात ? व किती टक्के कचरा वर्थलेस फडतूस लोक निर्माण करतात ?? मोघम उत्तर द्या.

फडतूस लोक बाथटबात नहात नाहीत, बेसिनवर हात धुतला की तो पुसायला फराफरा अर्धा मीटर टिपकागद ओढून बोळा करुन फेकत नाहीत, प्रत्येक व्यक्तीमागे एक साबण एका आंघोळीला वापरुन उरलेला फेकत नाहीत आणि घरातल्या पाणी पिण्याच्या ग्लासासहित प्रत्येक गोष्टीला प्लॅस्टिक वेष्टने वापरत नाहीत इतके सांगता येईल.

पंचतारांकित कचरा पर हेड भरपूर जास्त असतो. पण त्याची मॅनेजमेंट जास्त चांगली असते हेही खरंच.

अनु राव Thu, 12/03/2015 - 16:45

In reply to by गब्बर सिंग

सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त टॅक्स लावणे हीच का असतात ते कळत नाही. त्यापेक्षा स्वच्छते बद्दल नियल बनवुन आणि ते न पाळल्यास दंड लावुन स्वच्छता होत नाही का?

सरकारमधल्या लोकांना खायला पैसे कमी पडतायत म्हणुन टॅक्स लावुन पैसे जमवण्याची ही नाटके चालली आहेत असे आपले माझे मत.

बॅटमॅन Thu, 12/03/2015 - 16:53

In reply to by अनु राव

सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त टॅक्स लावणे हीच का असतात ते कळत नाही.

सर्व प्रश्नांचे उत्तर एक तर जळजळीत निषेध करणे नैतर स्वागत करणे का असते ते कळत नाही.

काही झालं की भारतावर टीका करण्याची अहमहमिका का लागते ते कळत नाही.

adam Thu, 12/03/2015 - 11:56

गब्बरचा यथायोग्य प्रतिवाद ह्यापूर्वी झालेला आहे.
पुन्हा तेच मुद्दे ( फडतूस व्ह्र्सेस धनदांडगे छापाचे) तो मांडतो आहे.
आधीच्या चर्चेकडे दुर्लक्ष करुन अथवा त्या चर्चा विसरुन गब्बरच्या मुद्द्यांना पुन्हा पुन्हा प्रतिवाद करत त्याच्या जाळ्यात्/ट्रॅपमध्ये अडद्कू नका.
.
.
ही काही ठळक उदाहरणे :-
अजोंचे हे मुद्दे आहेत. (ह्यातले काहे एमी मांडू इच्छित होतो, पण त्यांच्याइतके नेमके मला जमले नव्हते मांडायला.)
१. सरकार गरीबांकडून अप्रत्यक्ष कर घेऊन श्रीमंतांना सेवा देते.
२. सरकार श्रीमंतांकडून कर घेऊन त्यांना डब्बल सेवा देते.
३. सरकार कधीच न फेडायचे लोन घेऊन श्रीमंतांना सेवा देते.
४. सरकार राष्ट्रीय संपत्ती विकून श्रीमंतांचे चोचले पुरवते.
५. सरकार त्याच्या व्यवसायात झालेले सगळे फायदे श्रीमंतांवर उधळते.
http://www.firstpost.com/business/govt-may-cap-subsidy-burden-1-gdp-fy1…
श्रीमंतांची/सर्वांची पांढरी कमाई १००. काळी १००. या दोनशेमधले १ रु सबसिडी. आणि तिचा इतका गवगवा.
.
.
त्यानंतर त्याने हा माझा प्रतिसाद इग्नोर मारलेला आहे 'बेसिक' म्हणून :-
http://www.aisiakshare.com/node/3784#comment-91249
.
.

http://www.aisiakshare.com/node/2458
ह्या धाग्यावर ऑस्ट्रियन स्कूलबद्दलची चर्चा पहा.
अक्षय पूर्णपात्रे ह्यांनी खणखणीत ब्याटिंग केलेली आहे.
.
.
तू एक दोनदा लोकांशी बोलताना "मुद्दा मान्य" असे तो म्हणालेला आहे.
त्यामुळे चर्चा त्या त्या वेळी तेवढ्यापुरती थांबली.
पण पुन्हा दुसर्‍या दिवशी तेच मुद्दे घेउन आलेला आहे.
"गरिब फुकटे आहेत; जिवंत जाळा" वगैरे.
त्यांचे प्रतिवाद केल्यावर ज्या ज्या वेळी "मुद्दे मान्य" म्हणालास; ते चर्चा थांबवायलाच होते का ?
मुद्दे मान्य असतील; तर पुन्हा जुना खोडला गेलेला मुद्दा का आणावा ?
.
.
पृथ्वी गोल आहे हे सिद्ध झाले की "हो मला मान्यच आहे" असे म्हणायचे;
आणि लागलिच पुन्हा पुढल्या दिवशी लोकं आपल्या कामात गढून गेले की
पुन्हा मोठमोठ्याने "पृथ्वी सपाट आहे हो" असे म्हणत तर्कटे मांडणे सुरु करायचे;
असे हे होत नाहिये का ?
.
.
मागील वेळी जे चर्चा करुन गेलेत ते ह्यावेळी बिझी असतात किम्वा जुना प्रतिवाद, त्यातले तपशील विसरलेले असतात खूपदा;
आणि गब्बर उग्ग्गाच इतर बिचार्‍या आमच्यासारख्या बुद्धीदुर्बळांवर बौद्धिक जोर आजमावून दाखवतो.
.
.
गरिबांची कत्तल केली पाहिजे हे म्हण्णे आता त्याने थांबवायला हवे; तुला जर वरील गोष्टी मान्य असल्या तर.
नाही; तर प्रतिवाद सुरु ठेव.
.
.
लोकं "गे" असण्याबद्दल माझे आज काहीही म्हण्णे नाही. पूर्वी मी "त्यांनी गे असू नये" असे म्हणत होतो.
(एखाद्या उपचारांनी ते 'बरे' होत असतील तर करावेत असे मला वाटे.)
हे भूमिका बदलल्याचे लक्षण आहे. "मान्य आहे" म्हणताना हे असे व्हायला हवे.
.
.
वैधानिक इशारा :-
नवीन मुद्दे येत नसतील; तर नवा प्रतिवादही येणार नाही.
तुम्ही तेच तेच प्रो-धनदांडगे मुद्दे मांडा. मी तेच तेच (वरील मजकूर) कॉपी पेस्ट करत राहीन.

गब्बर सिंग Thu, 12/03/2015 - 13:04

In reply to by adam

आधीच्या चर्चेकडे दुर्लक्ष करुन अथवा त्या चर्चा विसरुन गब्बरच्या मुद्द्यांना पुन्हा पुन्हा प्रतिवाद करत त्याच्या जाळ्यात्/ट्रॅपमध्ये अडद्कू नका.

एखादी कंपनी तेच तेच प्रॉडक्ट बाजारात विकते. उदा. साबण. ते तुम्ही पैसे देऊनही वारंवार खरेदी करता. इथे माझ्याशी प्रतिवाद करताना तर तुम्हाला पैसे पण द्यायला लागत नैय्येत. मग समस्या काय आहे ??

एखादी बाब (उदा. कचरा) वर्थलेस आहे हे सांगितले की ते सिद्ध करावे लागते का ?? तुम्ही कचर्‍याच्या बाजूने हिरीरीने प्रतिवाद करता का ??? का करत नाही ??? जर कचरा वर्थलेस नाही असे काही जण म्हणत असतील (उदा. waste ventures) तर ??? तो मॉनेटाईझ करायला व प्रोसेस करायला काय केले जाते ??? टाकाऊ वस्तूचा टिकाऊ उपयोग हे तत्व फक्त कचर्‍याच्याच बाबतीत वापरावे का ???

adam Thu, 12/03/2015 - 13:50

In reply to by गब्बर सिंग

समस्या काय आहे
समस्या आहेच; असे म्हण्णे नाही.
एक सूचना मात्र जरुर आहे.
तू तेच मुद्दे मांडलेस तर आम्हीही तीच उत्तरं देत राहू;
ते मुद्दे चुकीचे किंवा गैरलागू ठरेपर्यंत.
तस्मात् कॉपी-पेस्ट करुन उत्तरं मिळत राहतील.
वरील प्रतिसाद पुन: पुनः कॉपी पेस्ट केला जाइल;
जिथे जिथे त्यातील काही भाग लागू ठरतो आहे असे वाटत राहील तोपर्यंत.

वृन्दा Thu, 12/03/2015 - 16:05

In reply to by adam

मनोबा, गब्बरने "पंचतारांकीत हॉटेल्स्ची" नवीनच बातमी दिलेली आहे. थत्तेंनी उलटून त्याच्या तोंडी प्रतिवाद घातलेला आहे की गब्बर मोड मध्ये अमकं म्हणता येईल वगैरे. त्यामुळे गब्बरने फक्त सहमती दर्शवली आहे. अन मग त्याच्यावर आगपाखड करण्यात आलेली आहे.

adam Thu, 12/03/2015 - 16:16

In reply to by वृन्दा

गब्बरने "पंचतारांकीत हॉटेल्स्ची" नवीनच बातमी दिलेली आहे.
बातमी नवीन असली तरी भूमिका तीच आहे. तर्कात काहीही नाविन्य्,सुधारणा नाही.
आधी ज्या ज्या बाबींमुळे त्याची भूमिका योग्य वाटत नव्हती; तेच मुद्दे इथेही लागू आहेत.
दरवेळी नवी बातमी देउन तेच ते का सांगत सुटायचं ?

अरे बातमी तर देतो ना तो? तो वैविध्यदुर्बळ असेल बातमी देण्यात. कोणी परफेक्ट नसतं. पण त्या बातम्या तर कळतात, त्या अनुषंगाने त्याच्या तोंडची वाक्य नका ना घालू मग कोण कशाला बोलेल. अन जर तुम्ही तोच प्रतिवाद केलात तर समोरची व्यक्ती आपल्या त्याच त्याच प्रतिवादाला चिकटून बसते.

adam Thu, 12/03/2015 - 16:41

In reply to by वृन्दा

'पृथ्वी गोल आहे ' असं एकदा म्हणून झालं; त्यावर चर्चा झाली. त्यावर समोरच्यानं 'होय ती गोलच आहे' हे मान्य केलं.
आज सकाळी पुन्हा उठून 'पृथ्वी पर्फेक्ट समभुज त्रिकोणाच्या आकारात आहे ' म्हणत विधान केलं तर ?
कसं बसं पुन्हा त्रिकोणाबद्दल चर्चा झाली, गोल असल्याचं पटलं म्हणे आणि मग पुन्हा पुढच्या दिवशी 'पृथ्वी पंचकोनी आहे हो' म्हणत दवंडी पिटली तर ?
.
.
अन जर तुम्ही तोच प्रतिवाद केलात
आँ? हे दोन्ही बाजूला लागो होत नै का तै ?
.
.
तर समोरची व्यक्ती आपल्या त्याच त्याच प्रतिवादाला चिकटून बसते.

त्याने चिटकून बसू नये; त्याने आमचे म्हण्णे बरोबर आहे हे मान्य केले आहे.
नसल्यास त्यातील चुका दाखवून द्याव्यात.
' चुकाही दाखवणार नाही, तुमचे म्हण्णे बरोबर हे मान्यही करीन पण माझे म्हण्णेही सोडणार नाही ' अशी भूमिका चमत्कारिक आहे.
.
.
तो म्हटलेला नाही अशा कोणत्याही गोष्टी मी त्याच्या तोंडी घाअतल्यात असे वाटत नाही;
मला वाटते की त्याचेही असे म्हण्णे नसावे की मनोबाने त्याच्या तोंडी काही गोष्टी घातल्यात.

अजो१२३ Thu, 12/03/2015 - 17:01

In reply to by adam

आता तू देखिल तेच करू लागला आहेस. तेच म्हणणं (आणि त्याच स्वरुपात) पु:पुनः. टिंकूनं संक्षेपात सांगीतलं, खूप झालं होतं.

adam Thu, 12/03/2015 - 17:05

In reply to by अजो१२३

ए गपे.
'खूप झालं' असं तुला स्वतःच्या प्रतिसादाबद्दल वाटतं का बे ?
.
.
बाकी कुणी 'पृथ्वी सपाट आहे ' म्हणत दवंडी पिटू लागला की मला त्यानच दोन पाच दिवसापूर्वी ती गोल असल्याचं जे कबूल केलं होतं;
त्याचा व्हिडिओ दाखवणं अवश्यमेव वाटतं.
"पृथ्वी गोल नाही " असे विधान आधी करावे.
आणि मग 'ती त्रिकोनी आहे' असे तरी करावे.
'गोल नाही' म्हटल्यावर मग आधीचे मुद्दे खोडून दाखवावेत
.
.
आणि हो, शतकी धाग्यांवर कंटाळवाणी पुराणमतवादी भंकस मी अक्रत नाही.
इथे मात्र मी सर्रळ घोशित पॉलिसी व स्ट्रॅटेजी म्हणून करतो आहे

adam Thu, 12/03/2015 - 17:11

In reply to by अजो१२३

मला गप्प बसवायचय ?
सोप्पय!
गब्बरनं (किंवा अजो, शुचिमामी वगैरेंनी) त्याचे मुद्दे योग्य आहेत व इतरांचे (वरती क्वोट केलेले) चुकीचे आहेत हे सिद्ध करावे.
करता येत नसल्यास गब्बरला त्याचे तेच ते मुद्दे सोडायला सांगावे.
त्याने ते सोडले, की मी शांत होतो.
शुचि, अजो किंवा गब्बर ह्यातील काहिच करत नाहीयेत.
शुचिमामी व अजो फक्त 'गप्प बस' इतकच म्हणत आहेत.
हे असे 'गप्प बस' म्हण्णे अ-शहाणपणाचे आहे.

वृन्दा Thu, 12/03/2015 - 18:37

In reply to by घाटावरचे भट

कशाला मिटवायचं मन चे बिनबुडाचे आरोप एकदा मिटवू. पण त्याने तो फुशारेल त्याचं काय? "म्हातारी मेल्याचं काही नाही, पण काळ सोकावतो." ;)

वृन्दा Thu, 12/03/2015 - 22:10

In reply to by adam

मी तर अज्जिबातच गप्प बसणार नाहीये. "दोन्ही" बाजूंनी आहे असं म्हणतोस अन फक्त गब्बरवर आगपाखड करतोस हा दुटप्पीपणा झाला.
_________
तो त्याचे मुद्दे का रे सोडेल, वा!! तुल तुझच खरं करायचं असतं. मला माहीते तू गब्बरशी खवतूनही भांडतोस.
____
दुट्टप्पी, भांडकुदळ कुठला. (इथे वाकुल्या दाखवल्याची स्मायली कल्पावी)
______
अन त्याने तुमचे मुद्दे कधीही मान्य केलेले नाहीत कारण तो त्यांना तात्विक पाठींबा देऊच शकत नाही. त्याचे विचार भिन्न पण कन्सिस्टंटच्च आहेत. तूच दाखव केव्हा त्याने मुद्दा मान्य केला?
_____
समं हा प्रश्न ऐरणीवरच घ्या. मनची फार मनमानी चालू आहे. वेगळा धागाच काढा. कधी नाही भांडले इतकी भांडते अन मनला हरवतेच ;)
_________

शुचि, अजो किंवा गब्बर ह्यातील काहिच करत नाहीयेत.

होय होय आंघोळ करता करता प्रतिसाद देऊ की काय. मुद्दाम मी ऑफीसला निघायच्या वेळी, तू आरोप कर अन सूंबाल्या कर. आता तू नाही देतेस उत्तर ते????? सांग ना आता का गप्प? ;)
___
मनोबा माझ्या "रेप्युटेशन" च्या घरात काही काळापुरताच बुध (वाचस्पती) ग्रह आलाय बरं का. मेरे से पंगा मत ले. छुट्टी कर दूंगी :)

वृन्दा Thu, 12/03/2015 - 23:10

In reply to by adam

http://www.aisiakshare.com/node/2458
ह्या धाग्यावर ऑस्ट्रियन स्कूलबद्दलची चर्चा पहा.
अक्षय पूर्णपात्रे ह्यांनी खणखणीत ब्याटिंग केलेली आहे.

अरारारा! हे बाकी खरय की रे मनोबा. अन तू वाचनखूण साठवलीयेस ना त्याची? शोभतं का तुला ;) = ))
____
एनीवे "दस्तुरखुद्द" गब्बरने यावरती बोलावे की पूर्णपात्रे त्याचे हृदयपरीवर्तन करु शकले का? असल्यास गब्बरने मुद्दे परत काढू नयेत, नसल्यास हृदयपरीवर्तन का होत नाहीये? यावर आत्मचिंतन करावे.
मी रजा घेतेय = शेपूट घातलेली आहे.

बॅटमॅन Thu, 12/03/2015 - 14:39

In reply to by ऋषिकेश

सोनिया गांधीचे गेश्चर, टायमिंग अनेकदा लोकांवर चांगला इंपॅक्ट करणारे असते

या केसमध्ये काय चांगला इंपॅक्ट होईल ते समजले नाही. लोकांवर याचा इफेक्ट फार काही होईल असे वाटत नाही.

नितिन थत्ते Thu, 12/03/2015 - 14:48

In reply to by बॅटमॅन

"पक्षाने आपल्याला वार्‍यावर सोडले" असा आरोप जयंती नटराजन यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ही कृती पक्षात चांगला संदेश पोचवेल.

बॅटमॅन Thu, 12/03/2015 - 14:50

In reply to by नितिन थत्ते

अच्छा ओक्के. प्रतिसादातून जनरल लोकांवरच चांगले इंप्रेशन पडेल असे वाटले म्हणून शंका उपस्थित केली. किमान सध्या तरी काँग्रेसबद्दल नेहमीचे सपोर्टर सोडून कुणाचे मत चांगले होईलसे वाटत नाही.

ऋषिकेश Thu, 12/03/2015 - 14:58

In reply to by बॅटमॅन

मनमोहन सिंग यांच्याबद्दल आदर असणारे केवळ काँग्रेसचे सपोर्टर्सच नव्हे तर इतरही काही कुंपणावरचे किंवा अगदी विरोधकही आहेत. श्री सिंग हे शेवटी शेवटी 'निष्क्रीय'/'मौनी' पंतप्रधान म्हणून विरोधकांनी प्रसिद्ध करवलेले होते, तरी त्यांची प्रतिमा "स्वच्छ" अशी अनेकांच्या मनात होती. अशावेळी त्यांच्यावर आरोप होत असताना काँग्रेस पाठिंबा देईल मात्र एका सीमारेषेवर थांबेल अशी अटकळ त्यांनी या गेश्चरमधून बाद केली.

त्याच बरोबर काँग्रेस पक्ष (अनेकांच्या मते सोनिया) त्यांना केवळ वापरून घेत आहेत, पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडत आहेत वगैरे चर्चाही चालु होत्या. पक्षाला गरज होती तेव्हा पंतप्रधानपदाचा काटेरी मुकुट त्यांना चढवला व आता अश्यावेळी पक्षाने अंतर दिले अशी प्रतिमा पक्षाला घातक ठरू शकते. ती ही श्री सिंग यांच्यासारख्या आदरणीय आणि वयानेही ज्येष्ठ व्यक्तीला दिल्यास अधिकच! (श्री सिंग यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर असणारे अनेक आहेत)
===

दुसरे असे की असे चालत जाणे, थेट मिडीयाशी बोलणे वगैरेमुळे मिडीया अटेंशन मिळते जे काँग्रेसला गरजेचे आहे.
कोणत्याही लढाईत आधी स्वतःला विरोधी "पोल" ही जागा बळकवावी लागते. सध्या काँग्रेस अगदीच चाचपडत होता. अश्या कृतीने अख्ख्या काँग्रेसच्या उच्चपदस्थांना कोणत्यातरी कारणासाठी एकत्र येऊन ठामपणे कृती करण्याचे गेश्चर पक्षकार्यकर्त्यांतही आशा फुंकेल असे वाटते. (याला पार्श्वभूमी श्री राहुल गांधी ऐन संसद भरली असतेवेळी सुट्टीवर निघुन जाणे, , त्या विरुद्ध श्रीमती गांधी स्वतः पुढे येऊन पाठिंबा देत आहेत.)

==

अर्थात हे निव्वळ माझे अंदाज/मत.

ऋषिकेश Thu, 12/03/2015 - 17:19

In reply to by बॅटमॅन

अजून एक रोचक अँगल असाही आहे:
आता भाजपा म्हणतेय "आमचा श्री सिंग यांच्या 'इंटिग्रिटी'वर अविश्वास नाही, पण काँग्रेसपक्षाला मात्र धडा शिकवायचाय"
श्रीमती गांधी यांच्या आम्ही आणि श्री सिंग एकच असे दाखवल्याने/बिंबवल्याने श्री सिंग यांना निर्दोष सोडवल्यावर काँग्रेस निर्दोष आहे असा घोष करायला त्या मोकळ्या होतील :)

(याच ऐवजी सरकारने वद्रांच्या केसेसवर कारवाई केली असती तर काँग्रेसला बॅकफुटला जावे लागले असते. श्री सिंग यांच्यावर कारवाई आधी सुरू करून भाजपाने चुकीच्या पावलाने चालायाला सुरूवात केलीय का ते आता सांगता येणे कठीण असले, तरी त्याचा फायदा श्रीमती गांधींनी योग्य सुरवात करून उचलला असे म्हणता येईल)

सव्यसाची Thu, 12/03/2015 - 23:34

In reply to by ऋषिकेश

(याच ऐवजी सरकारने वद्रांच्या केसेसवर कारवाई केली असती तर काँग्रेसला बॅकफुटला जावे लागले असते. श्री सिंग यांच्यावर कारवाई आधी सुरू करून भाजपाने चुकीच्या पावलाने चालायाला सुरूवात केलीय का ते आता सांगता येणे कठीण असले, तरी त्याचा फायदा श्रीमती गांधींनी योग्य सुरवात करून उचलला असे म्हणता येईल)

डॉ. मनमोहन सिंग यांना जे समन्स दिले आहेत ते न्यायालयामधुन मिळाले आहेत ना? यात भाजपाने किंवा सरकारने कारवाई केली असे कसे म्हणता येईल हे कळाले नाही.

ऋषिकेश Fri, 13/03/2015 - 09:27

In reply to by सव्यसाची

यात दोन गोष्टी आहेत.
१. राजकारण इज बॅटल ऑफ पर्सेप्शन्स. प्रत्यक्षात समन्स कोणी दिलेय वगैरे बाबींकडे सामान्य लोक पटकन/प्रथम लक्ष देत नाहीत.
२. या केसमध्ये मात्र आधी सीबीआयने श्री सिंग यांची चौकशी केली नव्हती व त्याची गरज नाही असे प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिले. कोर्टाने ते नामंजूर करत श्री सिंग यांची चौकशी करायचे आदेश दिले हे खरे आहे. पण ती चौकशी कोणत्या भुमिकेतून करायची हे सीबीआयला ठरवायचे होते. सीबीआयने श्री सिंग यांची चौकशी एक "आरोपी" म्हणून करायचे ठरवले आहे (ते नुसती चौकशी करून मग आरोप ठेवायचे के नाही हे ठरवू शकले असते) व तशी नोटीस दिली आहे. ज्या सीबीआयने चौकशीचीही गरज नाही असे काँग्रेसकाळात म्हटले होते तीच सीबीआय त्याच व्यक्तीला थेट आरोपी समजत चौकशी सुरू करते यात पॉलिटिकल अँगल नाही असे वाटत असेल तर मुद्दा खुंटतो.
म्हणजे सीबीआय वायली नी सरकार वायले असा तर्क करणार असाल तर मी एक सुचक हसून "ओके" असे म्हणून मुद्दा सोडून देईन :)

सव्यसाची Fri, 13/03/2015 - 11:19

In reply to by ऋषिकेश

मला केसबद्दल इतक्या तपशिलात माहिती नाही. पण आधी एकदा सीबीआयने त्यांच्या घरी जाउन स्टेट्मेंट घेतले होते ना?
सीबीआय वायले आहे असे मला वाटत नाही.

बॅटमॅन Fri, 13/03/2015 - 11:25

In reply to by ऋषिकेश

ज्या सीबीआयने चौकशीचीही गरज नाही असे काँग्रेसकाळात म्हटले होते तीच सीबीआय त्याच व्यक्तीला थेट आरोपी समजत चौकशी सुरू करते यात पॉलिटिकल अँगल नाही असे वाटत असेल तर मुद्दा खुंटतो.

म्हणजे काँग्रेसकाळातल्या पवित्र्याला पोलिटिकल अँगल नाही असे सुचवायचे आहे का?

अनुप ढेरे Fri, 13/03/2015 - 11:32

In reply to by ऋषिकेश

मला तरी सिंग यांना भाजपा जाणूनबुजून अडकवतय असं वाटत नाही.

या केसमध्ये मात्र आधी सीबीआयने श्री सिंग यांची चौकशी केली नव्हती व त्याची गरज नाही असे प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिले. कोर्टाने ते नामंजूर करत श्री सिंग यांची चौकशी करायचे आदेश दिले हे खरे आहे.

सो कोर्टाला देखील सिंग यांचा काही संबंध नाही सीबीआयची भुमिका मान्य नव्हती. सो त्या भुमिकेमागे राजकीय हस्तक्षेप असण्याचा संशय बळावतो. आता सरकार बदलल्यावर जी लॉजिकल भुमिका आधी घेण शक्य नव्हत राजकीय हस्तक्षेपामुळे, ती घेणं आता शक्य आहे एवढच दिसत यात.

अनु राव Fri, 13/03/2015 - 12:11

In reply to by अनुप ढेरे

जाणुन बुजुन तर अजिबातच नाही. ममोंचा संपूर्ण हात आहे ह्यात कारण त्यांना खूर्चीला चिकटुन बसायचे होते. त्यांना प्रामाणीक वगैरे लेबल लावू नये. प्रामाणिक असते तर हे होउनच दिले नसते. किंवा कमीतकमी राजिनामा तरी दिला असता.

अनु राव Thu, 12/03/2015 - 15:28

In reply to by ऋषिकेश

सोनिया गांधीचे गेश्चर, टायमिंग अनेकदा लोकांवर चांगला इंपॅक्ट करणारे असते याचा पुन्हा प्रत्यय आला

हे गंभिरतेने केलेले विधान आहे का उपहास आहे ह्याचाच विचार करते आहे.

तसेही टीना फॅक्टर मुळे सोगांना रबरस्टँपच्या मागे आपण ठामपणे उभे आहोत हे दाखवणे गरजेचे आहे. रबरस्टँप ला एकटे पडल्याची भीती वाटुन त्याने आपले मौन सोडले तर मोठीच आफत होइल. तसेही २-३ वर्षाचा प्रश्न आहे, तो पर्यंत वकिल लोक केस उभी रहाणार नाही ह्याची नक्की काळजी घेतील.

नितिन थत्ते Thu, 12/03/2015 - 15:30

In reply to by अनु राव

>>तसेही २-३ वर्षाचा प्रश्न आहे,

ही मोठी न्यूज आहे.

२-३ वर्षात पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार आहे का? :O

गब्बर सिंग Fri, 13/03/2015 - 00:18

In reply to by ऋषिकेश

सोनिया गांधीचे गेश्चर, टायमिंग अनेकदा लोकांवर चांगला इंपॅक्ट करणारे असते याचा पुन्हा प्रत्यय आला.

सोनियाबाईंनी आवळा देऊन कोहळा काढला.

नगरीनिरंजन Thu, 12/03/2015 - 16:36

पडलेल्या ऑईल प्राईसमुळे छोट्या फ्रॅकिंग कंपन्यांचे दिवाळे निघायला सुरुवात झाली आहे.

http://fortune.com/2015/03/09/bpz-resources-bankruptcy-oil/

http://www.bloomberg.com/news/articles/2015-03-09/dune-energy-falls-to-oil-price-drop-in-texas-bankruptcy-filing

http://www.bloomberg.com/news/articles/2015-03-05/oil-driller-missing-first-bond-payment-marks-junk-s-fast-decline

राजेश घासकडवी Sun, 15/03/2015 - 01:06

In reply to by नगरीनिरंजन

मग या छोट्या फ्रॅकिंग कंपन्यांना मोठ्या फ्रॅकिंग कंपन्या विकत घेतील की मोठ्या/मध्यम ट्रॅडिशनल कंपन्या विकत घेतील? आणि यथावकाश फ्रॅकिंग थांबल्यावर ट्रॅडिशनल तेलाचं उत्पादन कमी होऊन (किंवा स्थिर होऊन) किंमत वाढेल (आणि मग कधीतरी पुन्हा फ्रॅकिंग फायदेशीर ठरेल) की ट्रॅडिशनल कंपन्या उत्पादन जास्त ठेवून, किमती कमी ठेवून फ्रॅकिंग आर्थिकदृष्ट्या कधीच यशस्वी होणार नाही याची काळजी घेतील? आणि यातून ग्राहकांचा फायदा होईल की काही ना काही जादू होऊन अर्थव्यवस्था दणादण कोसळायला लागतील?

नगरीनिरंजन Sun, 15/03/2015 - 01:29

In reply to by राजेश घासकडवी

मोठ्या कंपन्या यांना लगेच विकत घेतीलही पण या छोट्या कंपन्यांच्या अ‍ॅसेट्स विकत घेऊन प्रॉडक्शन रॅम्प अप करण्यात मोठ्या कंपन्यांना स्वारस्य नसेल.
यथावकाश तेलाच्या किंमती वाढल्यावर मग पुन्हा नव्या जोमाने फ्रॅकिंग सुरु होईल.
अशी आवर्तने काही काळ सुरुच राहणार. जोपर्यंत सौरऊर्जेमुळे तेलाची मागणी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खाली जात नाही तोवर. त्यानंतर फ्रॅकिंग किफायतशीर राहणार नाही.
बाकी सध्या ग्राहकांचा फायदा होतोय आणि अर्थव्यवस्था तेजीत आहेत असे तुम्हाला म्हणायचे असेल तर खरेच जादूच लागेल मग अशा अर्थव्यवस्था कोसळायला.
हे म्हणजे व्हेंटिलेटरवर असलेला माणूस कोणती जादू होऊन मरणार असे विचारण्यासारखे आहे.

अजो१२३ Thu, 12/03/2015 - 18:06

http://www.business-standard.com/article/news-ians/humans-began-dominat…
पृथ्वीचा इतिहास लिहिताना पाषाणयुग, हिमयुग, ताम्रयुग, लोहयुग, डायनोसोरयुग, इ इ शब्द वापरतात. इसवी १६१० पासून मानवयुग चालू झाले आहे म्हणे (डिक्लेर करायला फार उशिर केला, ते असो.)
------------
(मानवयुगच जर १६१० ला चालू झाले असले तर आम्ही आमचा प्रतिगामीपणा ही बातमी छापायला यायच्या आत त्यागला हे आमचं नशीब.)

adam Thu, 12/03/2015 - 18:20

In reply to by अजो१२३

मानवयुगच जर १६१० ला चालू झाले असले तर आम्ही आमचा प्रतिगामीपणा ही बातमी छापायला यायच्या आत त्यागला हे आमचं नशीब.
तुम्ही प्रतिगामीपणा त्यागल्याचं घोषित केलत म्हणजे प्रतिगामीपणा त्यागलात असं होत नाही.
आणि हो गणितात दोन अधिक दोन पाच होत नाहित.

अजो१२३ Thu, 12/03/2015 - 18:28

In reply to by adam

गणितात दोन अधिक दोन पाच होत नाहित.

गणितातल्या दोन, अधिक आणि पाच या तीनही संकल्पना अनैसर्गिक आहेत असा मागे माझा चुकीचा समज होता. आता मी असं म्हणत नाही. कोणी जुन्या चूका मान्य केल्या तर उदारपणे माफ करावं. टू एर इज ...

नगरीनिरंजन Thu, 12/03/2015 - 18:28

In reply to by अजो१२३

१६१० पासूनच्या पुढच्या काळाला ॲंथ्रोपोसिन म्हणायचे बहुतेकांनी मान्य केले कारण मानवाचा फार मोठा परिणाम (लक्षावधी वर्षे टिकेल असा) पृथ्वीव्यवस्थेवर झाला. अर्थात तरीही काही लोक माणसाचा कशातच काहीच हात नाही असे पालुपद काही सोडत नाहीत.

गब्बर सिंग Fri, 13/03/2015 - 12:07

India’s Defense Budget is Inadequate for Military Modernization - By Gurmeet Kanwal

Gurmeet Kanwal, a former brigadier in the Indian Army, is a Delhi-based adjunct fellow with the Wadhwani Chair in U.S.-India Policy Studies at the Center for Strategic and International Studies in Washington, D.C.

Given India’s increasing vulnerabilities and rising international demands on it to act as a net provider of security as a regional power, the country’s defense expenditure is inadequate to create the capabilities that the armed forces will need in future. India’s political leadership and the bureaucracy that guides it must learn to look at defense expenditure as a form of insurance: if properly utilized, it deters military adversaries from contemplating war and enables the armed forces to acquire the capabilities necessary to fight and win if deterrence fails.

अजो१२३ Fri, 13/03/2015 - 12:23

http://economictimes.indiatimes.com/news/science/milky-at-least-50-per-…
आपली दुधगंगा वाटली त्यापेक्षा कमीत कमी ५०% मोठी निघाली आहे. आणि तारे केंद्रातल्या कृष्णविवरात सामावत जात असले तर स्पायरलच्या सगळ्या फांद्या जिथे एकत्र येतात त्या केंद्रस्थानी खूप जास्त तारे असायला हवेत. पण केंद्रापासून ५०-६० हजार प्रकाशवर्षे तारे खूप कमी आहेत. कशामुळं कळलं नाही.

अजो१२३ Fri, 13/03/2015 - 18:37

भारतीय जातीय, धार्मिक समीकरणे ही युरोपीय समीकरणांपेक्षा खूप श्रेष्ठ आणि सरस आहेत असे मला वाटते.
युरोपातली मुस्लिम मायनोरिटी खरोखरच मायनोरिटी आहे. रशियातले मुसलमान काढले तर युरोपात ३-४% मुसलमान आहेत. त्यातलेही मुस्लिम बहुल देश काढले तर इतरत्र अजूनच कमी. म्हणजे "मायनॉरिटीचा त्रास" नावाचा प्रकार असलाच तर या देशांचा प्रचंड कमी आहे. भारताच्या तुलतेने नाही म्हणावा.
चार्लि हेब्डोची घटना झाल्यापासून एकट्या फ्रान्समधे -
१. २५ मशिदींवर हल्ले
२. मुस्लिम हॉटेलांवर बाँम्बफेक
३. २०१४ मधे जे एक वर्षात झाले तितके एका महिन्यात
http://news.yahoo.com/anti-muslim-incidents-soar-france-wake-paris-atta…
आता
१. हे सगळे लोक शिकलेले आहेत.
२. हे सगळे लोक श्रीमंत आहेत.
तरीही धार्मिक उन्माद ...
-----------------------
त्यामानाने आमच्या देशातले लोक गरीब आणि अशिक्षित आहेत. त्यांना भूलवता येते. त्यांच्या भावना तीव्र आहेत. शिवाय भारतात हिंदू -मुस्लिम संघर्षाचा कडवा इतिहास आहे. मतदान लोक कसे करतात ते पाहून कळेल. पण आमच्या देशात जेव्हा बाँबस्फोट होतात, हल्ले होतात, तेव्हा "देशव्याप्त इस्लामफोबिया" होत नाही. फ्रान्सच्या तुलनेत मला भारताचा अभिमान आहे. नो पन इंटेंडेड. धार्मिक समीकरणे हाताळण्यात "आज" ते क्ष मॅच्य्योर असले तर आम्ही १०*क्ष आहोत.

ऋषिकेश Sat, 14/03/2015 - 16:00

In reply to by चिंतातुर जंतू

NH-10 कालच पाहून आलो. मला चित्रपट आवडला. बॉलिवूडच्या नेहमीच्या रितीपेक्षा, मुळातच संवाद कमी असणारा चित्रपट आहे.
नक्की काय कट्स होते कळायला मार्ग नाही.

चित्रपटाचे एक परिक्षण इथे

वृन्दा Sun, 15/03/2015 - 16:44

In reply to by नगरीनिरंजन

ननि तुम्ही NRI आहात का? असल्यास तुमच्यावर अन्य धाग्यात लोक तुटून पडू शकतात.
अन जर तुम्ही NRI नसाल, तर, एखाद्या NRI व्यक्तीने हेच शब्द उच्चारले तर....!!

अजो१२३ Mon, 16/03/2015 - 12:00

In reply to by गब्बर सिंग

http://zeenews.india.com/news/india/live-snooping-is-done-silently-not-…
काँग्रेससुद्धा अशा स्पदतांत मागे नाही. राहुल गांधींना फॉर्म भरायला लावला तर म्हणे स्नूपिंग केले. म्हणावं, बंधुंनो, स्नुपिंग असं फॉर्म मधले प्रश्न विचारून विचारून करतात का? का देशाचा टाईमपास करता? उठ सूठ काहीही काढायचं आणि रडायचं.

राजेश घासकडवी Sun, 15/03/2015 - 01:13

In reply to by चिंतातुर जंतू

मला हे नक्की कळलं नाही. आता महाराष्ट्रात जर गोवंशहत्याबंदी असेल, तर महाराष्ट्रातून बीफ (मांस) कसं गोव्यात नेणार? की गाईबैलच नेणार?

गब्बर सिंग Mon, 16/03/2015 - 07:43

‘It’s now ok to speak of India-Israel defence ties… We’re not shy, ashamed’

इस्रायल चे राजदूत .... त्यांची मुलाखत.

COOMI KAPOOR: In the present Indian government, you have a powerful ally in the RSS. It’s said that the RSS had a hand in last year’s meeting in the US between the PMs of the two countries. Tell us about your relations with the RSS.

Our relationship has always been based on communication between Israel and India, not between Congress or RSS in India and Labour or Likud in Israel.

COOMI KAPOOR: But you do have relations with the RSS.

We have relations with all of Indian society, the various parties, movements and groups. I don’t have specific relations.

------------------

Column: Why not ban the RSS?

------------------

Mosque is not a religious place _____ Subramanian Swamy

While speaking in Guwahati on Friday, Swamy had reportedly said, “A mosque is not a religious place. It is just a building and it can be demolished any time. If anyone disagrees with me on this, I am ready to have a debate on the issue. I got this information from people of Saudi Arabia

-----------------

'PK' Becomes Top-Grossing Film of All Time in India

याचा नेमका अर्थ काय होतो ?

१) हिंदूंना जे ऑफेन्सिव्ह वाटते (असं हिंदुत्ववादी मंडळी म्हणतात) ते हिंदु आवर्जुन बघतात ??
२) की भारतातले हिंदु सोडून बाकीचे लोक "हिंदूंना जे ऑफेन्सिव्ह वाटते" ते आवर्जून बारबार (पुन्हापुन्हा चित्रपटास जाऊन) बघतात (व त्यामुळे चित्रपटाचा गल्ला भरतो.) ???
३) काहीतरी काँट्रोव्हर्सी निर्माण केली की चित्रपट जोरात चालतो.
४) काहीही अर्थ काढू नये. तो एक चित्रपट च आहे. व तो एक पब्लिकला आवडेल असा चित्रपट आहे. बाकी काही नाही व त्यातून इतर कोणताही अर्थ काढायचा यत्न करणे बाष्कळपणा आहे.

-----------

PK is the first Indian film to gross US$10 million in North America (US and Canada).

अनिवासी भारतीय मंडळींनी (इंटरनेट हिंदूंचा भरणा मुख्यत्वे यांच्यातच आहे) हा पिक्चर आवर्जून बघितला ??? ते या पिक्चरमुळे ऑफेंड झाले नाहीत.

अस्वल Mon, 16/03/2015 - 11:29

In reply to by गब्बर सिंग

मला तर पर्याय ५) ह्यात एलियन्स लोकांचा हात डोळा आहे असं वाटतं.
शिवाय किक, दबंग वगैरे चित्रपटांनी ३०० करोड का गाठले, त्याचं कारणही शोधायला हवं...

ऋषिकेश Mon, 16/03/2015 - 14:06

In reply to by अजो१२३

पूर्ण अवांतरः
सॅनिटरी पॅड्सवरून एका स्त्री स्टँड अप कॉमेडीयनचा एक जोक आठवला. (कॉमेडीयनचे नाव विसरलो)
ती एकदम नाट्यमय आवाजात सुरू होते "आधी पॅड्स एका पातळ कागदाने सेपरेट केलेले असतात, मग त्यावर प्लॅस्टिकचे कव्हर असते, मग केमिस्ट त्याला एका प्लॅस्टिक पिशअवीत घालतात, ती पिशवी एका रद्दी पेपरमध्ये गुंडाळली जाते, ते पुडके अतिशय गुप्तपणे एका खाकी पिशवीत घातले जाते नी ती खाकी पिशवी इरत कोणालाही दिसणार-समजणार नाही इतक्या गुप्तपणे नी वेगात ग्राहकाच्या पर्स/पिशवीमध्ये सरकवली जाते."
मग ती एक पॉज घेते आणि म्हणते
"बहुदा अफगाणिस्तान बॉर्डरवर ड्रग्जची आयात करणारी व्यक्ती ड्रग्जसुद्धा इतक्या गुप्तपणे नी लपवून आणत नसतील"

तिच्या बोलण्याचा ढंग, टायमिंग आणि आधी निर्माण केलेले वातावरण यामुळे हा विनोद ऐकून मी व पत्नई अक्षरशः फुटलो होतो =))

धर्मराजमुटके Mon, 16/03/2015 - 23:23

In reply to by ऋषिकेश

नशीब ! बाईच्या जातीला काय माहित ?? अहो तुम्हाला पॅड्स देताना दुकानदाराला ध्वनीच्या गतीने काम करावे लागते तर पुरुषांना त्यांचे सामान देताना प्रकाशाच्या गतीने काम करावे लागते.

रेड बुल Mon, 16/03/2015 - 16:22

रशियाचे प्रेसिडंट व्लादिमीर पुतीन १० दिवस झाले अज्ञातवासी झाले आहे. त्यांचे सर्व कार्यक्रम स्थगीत केले गेले आहेत... इथे कुणाला माहित आहे काय त्यांचे काय चालु आहे ;)

बॅटमॅन Mon, 16/03/2015 - 16:24

In reply to by रेड बुल

त्यांचा फोनही लागत नैये. इस्माईलभाईंनी चारमिनारच्या मिनारवरून क्रेमलिनवाल्यांना केलेला कॉल डिसायफर करण्याचा प्रयत्न केला पण त्यात "हल्लो, कौन हावला बोलरा रे उधर...मेर्कु कामां नै हे समझरा, पच्चीस्साल्से चार्मिनार्पे बैठा हुवा हूं...." इतकेच ऐकू आले.

बॅटमॅन Mon, 16/03/2015 - 17:55

In reply to by रेड बुल

इस्माईलभाईपेक्षा सलीमफेकू व मामा हे दोघे जास्त खंग्री श्या देतात.

बाकी तुम्हांला हे लोक माहिती नसतीलसे वाटत नाही.

रेड बुल Mon, 16/03/2015 - 17:59

In reply to by बॅटमॅन

माहिती द्यावी. तसेच त्यांच्या श्या का पावल्या असे तुम्हाला वाटले हे सुधा स्पश्ट करावयास आधीच सुचवले आहे.

बॅटमॅन Mon, 16/03/2015 - 18:00

In reply to by रेड बुल

द अंग्रेझ नामक पिच्चर बघावासे सुचवतो.

बाकी त्यांच्या श्या का पावल्या? हे राम. इणोद ओ. त्याचा प्रयत्न किती क्षीण असला तरी काय झाले.

रेड बुल Mon, 16/03/2015 - 18:10

In reply to by बॅटमॅन

हे राम.

थोडी माहिती काढली... Ismail bhai is apparently the gang leader and his gang comprises Saleem Pheku- a habitual liar, Jahangir - a self claimed hardcore gangster, Gafoor and Chaus who all follow Ismail bhai throughout the film.

तरीही आपल्या उदाहरणांचे संदर्भ लक्षात आले नाहीत ते स्पश्ट करावे.

पुतीन अचानक गायब झाले होते व विषेशतः काही कार्यक्रम अचानक काही कारण न देता रद्दही केले गेले होते त्यामुळे काहीतरी गंभीर प्रकार आहे असे वाटत होते. विशेषतः त्यांच्या विरोधी नेत्याची हत्या, युक्रेनपरिसरात चिघळलेला तिढा वगैरे वगैरे वगैरे...

ऋषिकेश Mon, 16/03/2015 - 16:32

In reply to by रेड बुल

अरारारारारारारा
काय ही रशियन लोकं त्यांचा प्रमुख १० दिवस दिसला नाही की मग यांना असे प्रश्न पडु लागतात.
आमचे पडदासन्मुख मोदी १० तास जरी दिसले नाहीत तरी आमचा मिडीया जिवाच्या आकांताने कॉस्पिरसी थियर्‍या पसवेल! :P

चिंतातुर जंतू Mon, 16/03/2015 - 16:54

एके काळचे मुंबईचे पोलीस कमिशनर ज्युलिओ रिबेरो ह्यांनी आजच्या 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये लिहिलेल्या लेखात त्यांना आजच्या भारतात राहणारा एक ख्रिस्ती मनुष्य म्हणून जी असुरक्षितता जाणवते आहे तिच्याबद्दल लिहिलं आहे : As a Christian, suddenly I am a stranger in my own country, writes Julio Ribeiro

अजो१२३ Tue, 17/03/2015 - 11:06

In reply to by सुनील

हे वाचून तर प्रतिमा अजूनच खालावली.
१. भारतात गेली ५०० वर्षे मिशनरींनी हिंदूंचे धर्मांतर केले. त्यातल्या कोणाला आपल्या मूळ धर्मात जायचे असेल तर त्यांना मदत करण्यात चूक काय? किंवा तसा विचार मांडण्यात, तसे आंदोलन करण्यात, तसा इनिशिएटिव घेण्यात चूक काय? महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षाने रिबेरोंवर जबरदस्ती केली का? प्रेमाने विचारलं. त्यात चुकलं काय?
२. अगदी ओरिजनलच श्रिश्चन लोकांना हिंदू बना म्हणून सांगण्यात काही गैर नाही.
३. महाराष्ट्र सरकारने घरवापसी योजना काढली आहे का? बिना कायदा करता? नाही ना? मग त्या उपाध्यक्षाला का दोष देता. ते पर्सनल आहे.
------------
आणि राजकीय पातळीवर सुद्धा थोडं थोडं पर्स्नल चालतं. मोदी प्रत्येक देशात जाऊन मंदिरांत, मठांत पूजा करतात. पण त्याच मुळे तिथल्या लोकांना आणि सत्ताधार्‍यांना ते आपले वाटतात. उगाच इनसेक्यूर वाटतंय म्हणणं गैर आहे. कोणाला फोर्स केले तर यंत्रणा आहे, तक्रार करा. पण धर्मांतराचा प्रयत्न होतोय हेच चूक म्हणणे सौ चूहे खाके नै का झालं हो रिबेरो?

ऋषिकेश Tue, 17/03/2015 - 11:14

In reply to by अजो१२३

माझ्या लेखी रीबेरोंची त्यांच्या कार्याबद्दलची प्रतिमेचे यामुळे वर्धनही होत नाही की खालावतही नाही. ते असो.

==
नंतरच्या दुव्यातील घटनेबद्दल अजोंच्या मुद्द्यांशी सहमती आहे. स्वत: रिबेरो मी घरवापसी करणार असे म्हणाल्यावर समोरच्याने काही मदत केली तर त्यालाच दुषणे देणे गैर वाटते. जोवर राजीखुशीचा मामला आहे तोवर धर्मबदलाला संमती हवीच.

अनु राव Tue, 17/03/2015 - 11:29

In reply to by ऋषिकेश

हा एकुणच प्रकार एनट्रॅपमेंट चा वाटला. घरवापसी बद्दल चे गरळ काढण्यासाठी केलेले नाटक होते. आधी मला घरवापसी करायची आहे म्हणुन घोळात घ्यायचे आणि मग हिंदूंच्या जातीव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारायचे.
भारतातली जातव्यवस्था ही खरीखुरी धर्मनिरपेक्ष आहे. कीतीही धर्म बदला तुमची जात तुम्हाला सोडत नाही आणि लोक पण जातीला सोडत नाहीत. रीबेरो ला ५०० वर्षापूर्वीची आपली जात अजुन आठवते आहे ह्यातच काय ते आले.

अजो१२३ Tue, 17/03/2015 - 11:59

In reply to by अनु राव

रीबेरो ला ५०० वर्षापूर्वीची आपली जात अजुन आठवते आहे ह्यातच काय ते आले.

असंही म्हणणं चूक असू शकतं. केवळ पूर्वजांचा इतिहास म्हणून त्यांनी, सधन, सुशिक्षित आहेत म्हणून पूर्वजांनी, लक्षात ठेवलेली असू शकते.

अजो१२३ Tue, 17/03/2015 - 13:49

In reply to by बॅटमॅन

सदर प्रतिसाद जेन्यूईन आहे. काश्मिरचे लोक देखिल हे सांगताना पाहिले आहेत. बरेच मुसलमान सुद्धा. हे खानदानी जी के आहे. रिबेरो जातीयवादी इ इ आहेत असं म्हणू नये इतकंच सुचवायचं होतं.

चिंतातुर जंतू Tue, 17/03/2015 - 11:54

In reply to by ऋषिकेश

>> स्वत: रिबेरो मी घरवापसी करणार असे म्हणाल्यावर समोरच्याने काही मदत केली तर त्यालाच दुषणे देणे गैर वाटते.

रिबेरो त्याला दूषणं देत आहेत असं वाटतं का? ते केवळ काही प्रश्न विचारून त्याला निरुत्तर करत आहेत. अशा प्रश्नांनी तो निरुत्तर होत असेल, तर त्याला अधिक गृहपाठ करण्याची गरज आहे एवढंच ह्यातून फार तर दिसेल. त्याचा दोष रिबेरोंना का बरं द्यावा?

When I told him that I was ready for ‘Ghar Wapsi’ he was visibly excited. When I asked him what caste I would be assigned on re-conversion, he said he would have to ask. After a brief pause, he wanted to know the caste to which my Hindu ancestors belonged. I mentioned that they were Saraswats. He opined that I would revert to that caste. My reply “How can you be so sure since my forebears had eaten all sorts of prohibited meat?” That stumped him. He reverted to his need to consult.

अनु राव Tue, 17/03/2015 - 11:58

In reply to by चिंतातुर जंतू

ते केवळ काही प्रश्न विचारून त्याला निरुत्तर करत आहेत.

प्रश्नच विचारायचे असतील तर सरळ सरळ विचारावेत ना. नस्ती नाटके कशाला करायची?

तसेही वर रिबेरोंच्या प्रतिमेबद्दल काहीतरी लिहीले आहे? काय विषेश कर्तृत्व आहे त्यांचे. म्हणजे त्यांच्या जॉब चे केआरए होते त्यापेक्षा काही जास्त केले की काय त्यांनी. ( केआरए तरी पूर्णे केले का हा मुळातला संशय आहे ते वेगळेच )

ऋषिकेश Tue, 17/03/2015 - 12:01

In reply to by चिंतातुर जंतू

प्रश्न इथेच संपत असता तर ठिक आहे.
पण मला रिबेरोंना निव्वळ शंकासमाधान किंवा समोरच्याला निरुत्तर करण्यातली मजा अनुभवणे याहून अधिक काही म्हणायचेय असे वाटतेय.

अजो१२३ Tue, 17/03/2015 - 12:07

In reply to by ऋषिकेश

"८५ वर्षांचा ख्रिश्चन रिटायर्ड" म्हातारा "महाराष्ट्रासारख्या अत्यंत मोठ्या महत्त्वपूर्ण आणि आर एस एस च्या जन्मदात्या राज्याच्या सत्ताधारी भाजपच्या उपाध्यक्षाला" मस्तंपैकी निरुत्तर करून मजा अनुभवत आहेत आणि वर इनसेक्यूअर फील करत आहेत? अरे भाय, ये क्या नौटंकी है?

अनु राव Tue, 17/03/2015 - 12:09

In reply to by अजो१२३

प्रसिद्धीची भुक ८५ व्या वर्षी पण सोडवत नाहीये.
त्याने जे काय नाटक केले ते स्वतापाशी ठेवायचे ना, लगेच छापुन कशाला आणायचे. कीती चीप असतात लोक :-(

चिंतातुर जंतू Tue, 17/03/2015 - 13:43

In reply to by अनु राव

>> त्याने जे काय नाटक केले ते स्वतापाशी ठेवायचे ना, लगेच छापुन कशाला आणायचे. कीती चीप असतात लोक Sad

अगदी अगदी. हे बघा ना, आपण म्हणतो ते मीडिया छापतं म्हणून काहीही बरळत असतात आजकाल लोक. मग उगीच रिबेरोसदृश फिअर-माँगरिंग लोकांचं फावतं.

अजो१२३ Tue, 17/03/2015 - 13:47

In reply to by चिंतातुर जंतू

भागवत आणि रिबेरो यांचे विचार इतके समसमान निघावेत हा किती योगायोग आहेत. "माझे डी एन ए भागवतांपेक्षा फार वेगळे नाहीत" इति रिबेरो. "(रिबेरोंसारखे)मायनॉरिटीचे डी एन ए ने सुद्धा भारतीय आहेत" इति भागवत.
---------------

अनु राव Tue, 17/03/2015 - 13:56

In reply to by चिंतातुर जंतू

अगदी अगदी. हे बघा ना, आपण म्हणतो ते मीडिया छापतं म्हणून काहीही बरळत असतात आजकाल लोक. मग उगीच रिबेरोसदृश फिअर-माँगरिंग लोकांचं फावतं.

दोन उदाहरणात फरक आहे चिंज.

८५ वर्षांच्या कालबाह्य झालेल्या रीबेरोंकडे आपणहुन कोणी ही बातमीदार गेलेला नसणार त्यांचे मत कींवा ही घटना विचारायला. रादर कोणाला काय कल्पना असणार रीबेरो कुठे रहातात आणि सकाळी काय करतात ह्याची. ह्याचाच अर्थ रीबेरोंनी स्वता बातमी छापुन आणण्या साठी प्रयत्न केले. हे नुस्तेच इथे थांबत नाही, बातमी चमचमीत व्हावी म्हणुन नौटंकी पण केली. हा सर्व प्रकार म्हणजे येनेकेन कारणेन पेपर मधे नाव छापुन आणण्याचा प्रयत्न आहे.

तुमच्या दुसर्‍या उदाहरणात, बातमीदार मागे लागत आहेत बातमी साठी.

अजो१२३ Tue, 17/03/2015 - 12:03

In reply to by चिंतातुर जंतू

रिबेरो त्याला दूषणं देत आहेत असं वाटतं का?

हो वाटतं. रिबेरो मुक्तकंठानं त्याची स्तुति करताहेत का?

अनुप ढेरे Tue, 17/03/2015 - 11:13

In reply to by चिंतातुर जंतू

I am a stranger in my own country, असं कधीतरी नारायण मूर्ती म्हणालेले तेही आठवलं. तेव्हा पब्लिकनी बरचं झोडपलेलं त्यांना. who says it is your country वगैरे शेलके अब्युस आठवले. तेव्हा विचारवंतांनी त्यांना वाटत असलेल्या असुरक्षिततेबद्दल लिहिल्याचं आठवत नाय.

अजो१२३ Tue, 17/03/2015 - 11:21

In reply to by अनुप ढेरे

मला नवख्यासारखं वाटतंय, मला दुरावल्यासारखं वाटतंय, अमकं झालं तर मी देश सोडेन, तमकं झालं तर मी हे त्यागेन इ इ विचारवंतांच्या आयवोरी टोवरची ऊंची वाढल्याची लक्षणे आहेत.

सव्यसाची Mon, 16/03/2015 - 18:27

In reply to by चिंतातुर जंतू

मला वाटते हि बातमी बरीच जुनी आहे. कुठल्यातरी इंग्रजी पेपरात पहिल्यांदा वाचल्याचे आठवतंय. त्यावर एसबीआय ने या अफवांचे खंडन पण केले होते.
http://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/sbi-chief-arundhati-bhattacharya-scotches-reports-of-scrapping-1-bn-loan-pact-with-adani/articleshow/46557318.cms

हि बातमी १३ तारखेची. मटाने कर्ज रद्द झाल्याची बातमी १४ तारखेला छापण्याचे का ठरवले असेल? कि १३ ला 'गॉसिप आहे' असे म्हणणाऱ्या एसबीआय ने अचानक १४ ला कर्ज रद्द होणार आहे असे ठरवले म्हणून?

गब्बर सिंग Wed, 18/03/2015 - 04:18

In reply to by अजो१२३

मी मागे असं म्हणालो होतो की - मी मोदींचा चाहता आहे पण मोदी जे करतात त्या सगळ्याला पाठिंबा नाही. त्यावेळी अजोंनी मला "प्रत्येक वेळी हा डिस्क्लेमर लावायला च लागतो का ?" असा प्रश्न केला होता.

त्याचे उत्तर आहे. मोदींनी अडाणींना अनड्यु फेवर करायला हवा. तो ते करत नाहीत. व माझा नेमका याला पाठिंबा नाही.